नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मीरा कुमार
त्यांच्या
माझी ढोबळ मते.
मोदी ही इष्टापत्तीच आहे
राजकारण पैशावर चालते विशेषतः
माझा वरती प्रतिसाद व आतच ही
माझ्या पहिल्या प्रतिसादावर
घटनेत बसते का?
घटनाबाह्यदेखिल नाही
उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
आम्ही कसले...
- १९६१ मध्यप्रदेशात जबलपूर मधे पहीली दंगल झाली. (गंमत म्हणजे गांधीहत्येनंतरची महाराष्ट्रातील हत्याकांड त्यांनी यात धरलेली नाही!)
- १९६९ मधे अहमदाबाद दंगलीत १००० च्या घरात माणसे मारली गेली. बातमीत म्हणल्याप्रमाणे इंदिराजींच्या आशिर्वादाने हे झाले होते, जेणे करून मोरारजींचे महत्व कमी होईल.
- नंतरच्या काळात उत्तर प्रदेशात अनेक लहानसहान दंगली-दंगे झाले
- १९७९ - जमशेदपूर-अलीगढ
- १९८० - मोरादाबाद
- १९८४ - शिख हत्याकांड
- १९८७ - मेरट दंगल. ही कदाचीत धार्मिक-जातीय दंगल नसावी. पण राजीव गांधींच्या दबावामुळे सगळ्यांवरचे खटले काढले गेले असे या माहितीत म्हणलेले आहे.
- १९८९ - भागलपूर - परत जातीय-धार्मिक नसावी. पण दंगलच
- १९९२ - ६ डिसेंबर नंतर
- १९९३ - मुंबई दंगल
- २००२ - गुजरात दंगल
यातील एक गुजरात दंगल सोडल्यास इतर कुठल्याही दंगलीत राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे demonize केले गेले नाही अथवा खटले भरले गेले नाहीत. त्या व्यतिरीक्त वरील दुव्यात मंडल कमिशन मुळे झालेल्या दंगलींचा पण उल्लेख नाही. (मंडल अहवाला योग्य-अयोग्य हा येथे मुद्दा नाही.). पण सगळे कसे गप्प... हे तुम्हाला योग्य वाटते का? हे कळल्यास बरे होईल. बरं, तरी देखील सततचे प्रयत्न करून देखील मोदींवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत तरी देखील त्यांना तुम्ही किती दिवस राक्षस (अथवा "मौत का सौदागर") समजणार आहात? हा देखील प्रश्न आहेच. आणि हो हे सगळे मी मोदींच्या समर्थनार्थ अथवा ते कस्से निष्पाप आहेत वगैरे म्हणत लिहीत नाही. काँग्रेस मुस्लीमकार्ड वापरते, भाजपा हिंदू कार्ड तर डावे आणि त्यांचे विचारवंत हे वाट्टेल ते करून भय निर्माण करण्यासाठी मोदीकार्ड वापरतात असे वाटते. जितका सामाजीक तोटा हा सद्यस्थितीत मुस्लीम/हिंदू कार्डांमुळे होत नसेल तितका ह्या मोदीकार्डाने होतो असे मला वाटते. म्हणून या समाजभेदाच्या विरोधात मी आहे. तरी देखील तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो. :-) भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? इंदिरा गांधी गेल्यावर राजीव गांधींना काय येत होते म्हणून ते पर्याय ठरले? त्यामुळे अमूक एक व्यक्ती म्हणजेच पर्याय अशी अवस्था येण्या इतकी आपली लोकशाही दुर्बल नाही. काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय? अजून दिल्ली दूर आहे. आता अफझल गुरूस फाशी देऊन झाल्यावर जर गृहमंत्रालयाकडून साधी चार्जशीटही साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहीत यांच्या विरोधात कोर्टात सादर केली गेली नाही तर काँग्रेसला शिंद्यांचे वक्तव्य कुपथ्य ठरेल... त्यामुळे नजीकच्या काळात नक्की काय घडणार आहे त्यावर हे अवलंबून असेल. मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का? भाजपा हा संघटनात्मक (केडर बेस्ड) पक्ष आहे. जर भाजपाकडे बहुमत असेल तर ते वेगळ्या पद्धतीने पण चर्चा करून निर्णय घेतील. (राष्ट्रीय पातळीवर ते शक्य आहे. राज्यपातळीवर वेगळी परीस्थिती असू शकते). जर आघाडी असली तर आघाडीच्या मतानुसारच ठरेल असे मला वाटते. मग भाजपाला जर मोदी हवे असतील तर ते पटवण्याचा प्रयत्न करतील त्यात काही गैर नाही. एनीवे, "भाजपामध्ये अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा" आहे जी इतरत्र नाही हे आपल्याला देखील मान्य आहे हे पाहून डोळे पाणावले. ;) मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय? कॉलींग क्लिंटन! माझी अल्पमती: मोदींच्या करीश्म्यामुळे भाजपाला २०० जागा मिळतील असे वाटत नाही. आणि डाव्या विचारवंतांनी आणि माध्यमांनी कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे पब्लीक स्वतःची मते बनवेल असे वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा... "ऑल पॉलीटीक्स इज लोकल" (बॉस्टनचा अमेरीकन काँग्रेसमधील एक ऐतिहासीक काँग्रेसमन जो सभापती देखील होता, त्याचे हे प्रसिद्ध वाक्य आहे!). मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? त्याचे उत्तर आधी दिले तेच आहे.... "मोदींच्या नावाने बोटे मोडणार्यांसाठी आपत्ती आहे. (कारण पोटशूळ इतकेच). इतरांसाठी (मोदी समर्थक, अलीप्त वगैरेंसाठी) ही आपत्ती देखील नाही आणि इष्टापत्ती देखील नाही. चांगला कारभार केला तर इष्ट ठरेल, केला नाही तर मागच्या पानावरून पुढे... इतकेच काय ते! "दंगल?
...
स्पष्टीकरण
चौकशी
चौकशी
मोदी नको
असत्य
The SIT also found no truth in the following incidents widely publicised by the NGOs:
* A pregnant Muslim woman Kausar Banu was gangraped by a mob, who then gouged out the foetus with sharp weapons * Dumping of dead bodies into a well by rioteers at Naroda Patiya * Police botching up investigation into the killing of British nationals, who were on a visit to Gujarat and unfortunately got caught in the riots Rohtagi said: "On a reading of the report, it is clear that horrendous allegations made by the NGOs were false. Stereotyped affidavits were supplied by a social activist and the allegations made in them were found untrue."...धन्यवाद
माहिती
(No subject)
दुवा hotos_stream">https:/
इतक्या चांगल्या
थोडेसे अवांतर
...
दुर्लक्ष
उत्तर
अजून एक उदाहरण
एक काय अनेक उदाहरणे आहेत
नजमा हेपतुल्ला
मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या
तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल
आभार
हम बोलेगा तो
असहमत
सहमत
आजानुकर्ण
"नुकतीच बंगालमध्ये झालेली
मराठी बाणा ऑन
आकड्यांचे आणि आघा ड्यांचे गणित....
गेल्या ६-७ तासात परिस्थिती
लोकसत्ता
राजकारण
.
उमेदवार की मुद्दे?
विश्वास
नवीन बाण...
सहज आट्।अवले म्हणून..
महागाई आर्थिकमंदी आणि
भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ