गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वाचने
56154
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
In reply to असत्य by विकास
दुवा hotos_stream">https:/
In reply to (No subject) by पुष्कर जोशी
इतक्या चांगल्या
In reply to आम्ही कसले... by विकास
थोडेसे अवांतर
In reply to इतक्या चांगल्या by ऋषिकेश
...
In reply to थोडेसे अवांतर by आजानुकर्ण
दुर्लक्ष
In reply to ... by विकास
उत्तर
In reply to दुर्लक्ष by आजानुकर्ण
अजून एक उदाहरण
In reply to उत्तर by विकास
एक काय अनेक उदाहरणे आहेत
In reply to अजून एक उदाहरण by निनाद मुक्काम …
नजमा हेपतुल्ला
In reply to एक काय अनेक उदाहरणे आहेत by श्रीरंग_जोशी
मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या
In reply to उत्तर by विकास
तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल
In reply to मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या by ऋषिकेश
आभार
In reply to तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल by विकास
हम बोलेगा तो
In reply to आभार by ऋषिकेश
असहमत
In reply to हम बोलेगा तो by विकास
सहमत
In reply to असहमत by ऋषिकेश
आजानुकर्ण
In reply to दुर्लक्ष by आजानुकर्ण
"नुकतीच बंगालमध्ये झालेली
In reply to आजानुकर्ण by चिंतामणी
मराठी बाणा ऑन
आकड्यांचे आणि आघा ड्यांचे गणित....
In reply to मराठी बाणा ऑन by खटपट्या
गेल्या ६-७ तासात परिस्थिती
लोकसत्ता
In reply to गेल्या ६-७ तासात परिस्थिती by श्रीगुरुजी
राजकारण
In reply to लोकसत्ता by विकास
.
In reply to राजकारण by आजानुकर्ण
उमेदवार की मुद्दे?
विश्वास
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
नवीन बाण...
In reply to विश्वास by विकास
सहज आट्।अवले म्हणून..
In reply to नवीन बाण... by विकास
महागाई आर्थिकमंदी आणि
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
बाण
In reply to भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ by अनामिका
+१
In reply to बाण by सुनील
अजून एक ...
In reply to बाण by सुनील
समजा
निर्विवाद....... नमो
सलया नगरपालीका निवडणूका
काय ठरलं मग?
ठरतंय ठरतंय!
In reply to काय ठरलं मग? by नाना चेंगट
ठरु द्या ठरु द्या
In reply to ठरतंय ठरतंय! by ऋषिकेश
त्यात काय ठरायचय!
मोदी व गुजरातमधील हिंसाचार
- माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
- १९९२-९३ मुंबईतील दंगलीमध्ये मुस्लिम वस्ती असणाऱ्या चाळींवर हल्ला झालाच तर प्रत्युत्तर म्हणून गच्च्यांवर मोठाल्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवले जात असे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते स्व सुनील दत्त स्वतः तेथे जाऊन मुस्लिम जमावाला शांत करत होते.
असे एकतरी उदाहरण गुजरातमध्ये त्या काळात ठळकपणे आढळले नाही. सरकारी आकड्यानुसार १२०० हून अधिक लोक मारले गेले. शेकडो लोक हरवले. अनेक लोकांना वाटते माध्यमे मोदींच्या विरोधात होती पण एवढ्या संख्येने लोक मारले गेलेच नं? माध्यमांच्या भूमिकेमुळे या हिंसक घटनांची तीव्रता बदलत नाही. या हिंसाचारामुळे भारतातल्या व भारताबाहेरच्याही इस्लामी दहशतवादी गटांना नव्या लोकांना आकृष्ट करण्यासाठी भरभरून कच्चा माल मिळाला. १२ मार्च १९९३ नंतर मुंबईवर १० वर्षे हल्ला झाला नव्हता. ऑगस्ट २००३ पासून दर वर्षा दोन वर्षांनी अनेक हल्ले झाले. अंदाजे ६०० हून अधिक निरपराध लोक मारले गेले. बहुतांश हल्यांच्यावेळी पकडले गेलेल्या संशयितांनी गुजरात मधील अन्यायाचा बदला हेच कारण सांगितले. या काळात कधी नव्हे ते महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांमध्येही इस्लामी दहशतवाद्यांचे जाळे सशक्त झाले. अन त्या काळात कुणी या गोष्टींना थोपवण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोदी सरकारवर टिका केली की मोदी त्यास गुजराती अस्मितेचा अपमान हे शीर्षक देत. मोदींविरुद्ध कुणी काही बोलले म्हणून संपूर्ण गुजरातची अस्मिता का दुखावली जावी? 'पांच करोड गुजरातियो की अस्मिता' हे घोषवाक्य पुन्हा पुन्हा उच्चारले जात असे. या सर्व गोष्टींमुळे मतांचे धार्मिक धृवीकरण होऊन २००२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना जोरदार विजय मिळाला. नंतर त्यांनी एकतंत्री कारभाराच्या जोरावर गुजरातची प्रगती करून दाखवली त्यात शंकाच नाही. पण त्यापाठीमागे शेकडो निरपराधांचे प्राण गेले होते हे कटुसत्य बदलत नाही. वैयक्तिक द्वेषापोटी संजय जोशींसारख्या अराजकीय संघटकाला कुठलेच पद भेटू नये यासाठी भाजप नेतृत्वाला ब्लॅकमेल करणे हे काय दर्शविते? या हिंसाचाराच्या काळात केंद्रातही भाजप आघाडीचेच सरकार होते पण २००४ साली केंद्रात सत्ताबदल झाल्यावर गुजरातमधील अन्यायाबाबत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बळ आले. काही खटले गुजरातमधील परिस्थितीमध्ये चालवणे शक्य नसल्याने महाराष्ट्रातील न्यायालयांत खटले चालवले गेले. पण एका मर्यादेपलीकडे न्यायालयीन लढायांना यश मिळू शकले नाही. न्यायालयीन खटल्यांमध्ये महत्त्वाचे घटक असतात गुन्ह्याच्या स्थळावरून पोलिसांनी गोळा केलेले फोरेन्सिक व इतर पुरावे, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी इत्यादी. हे खटले लगेच सुरू झाले असते तर प्रत्यक्षदर्शी अधिक जोमाने पुढे आले असते. पण काही वर्षे निघून गेल्यावर अन जसे जमेल तसे का होईना सुरळीत जीवन सुरू झालेले असताना कोणास पुन्हा दुष्टचक्रात अडकावेसे वाटेल? काही साक्षीदार तर मधल्या काळात मरणदेखील पावले होते. लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या व्यक्तीची जबाबदारी असते जनतेच्या जीविताचे संरक्षण करणे. अन त्यापैकी अल्पसंख्याक समुदाय जर बहुसंख्यांकडून बाधित होत असेल तर ही जबाबदारी अधिकच वाढते. या जबाबदारीचे पालन करण्यास नरेंद्र मोदी हे निःसंदेहपणे अपयशी ठरले आहे. असा माणूस जर देशाचा सर्वोच्च पदी बसू पाहत असेल तर लोकशाही व्यवस्थेसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कल्पना करा, हिंदू अल्पसंख्य असणाऱ्या राज्यातील गैरहिंदू मुख्यमंत्र्याने हिंदूविरुद्धचा या तीव्रतेचा हिंसाचार थोपवला नसता अन नंतर त्या राज्यात विक्रमी विकास केला असता तर आपण त्यास भारताच्या पंतप्रधानपदी बसण्यास खुला पाठिंबा दिला असता का?शंका
In reply to मोदी व गुजरातमधील हिंसाचार by श्रीरंग_जोशी
उत्तर
In reply to शंका by आजानुकर्ण
"जे कारण वृत्तपत्रांत छापून
In reply to मोदी व गुजरातमधील हिंसाचार by श्रीरंग_जोशी
कॄपया माझा प्रतिसाद नीट वाचा
In reply to "जे कारण वृत्तपत्रांत छापून by श्रीगुरुजी
२) गुजरातमध्ये संघपरिवाराला
In reply to "जे कारण वृत्तपत्रांत छापून by श्रीगुरुजी
फुकट खात होते असे वृत्तपत्रात
लोकसत्तेमध्ये वाचले होते
In reply to फुकट खात होते असे वृत्तपत्रात by श्री गावसेना प्रमुख
पण त्या कटात तर गोध्र्याचे
In reply to लोकसत्तेमध्ये वाचले होते by श्रीरंग_जोशी
मीही पूर्वनियोजित कटच म्हंटले आहे
In reply to पण त्या कटात तर गोध्र्याचे by श्री गावसेना प्रमुख
क्रियेची प्रतीक्रिया येणारच्.
In reply to मीही पूर्वनियोजित कटच म्हंटले आहे by श्रीरंग_जोशी
क्रियेची प्रतिक्रिया!!
In reply to क्रियेची प्रतीक्रिया येणारच्. by श्री गावसेना प्रमुख
ईष्टापत्ती
सहमत...
अरे
नारायन नारायन्,भगवंत तुम्ही
In reply to अरे by विकास
राहुल आदर्शवादी आणि चांगली व्यक्ती आहे. देशातील तळागाळातील लोकांविषयी त्यांना आस्था आहे. तर मोदी उत्तम प्रशासक आहेत. खुल्या मनाचे आहेत. एक माणूस व्यवस्थेवर आपली छाप सोडू शकतो हे त्यांनी गुजरातमधील विकासकामांतून दाखवून दिले आहे.असे वक्तव्य केले असणार, पण आदर्शवादी आणि चांगली व्यक्ती देशासाठी काय करणार् ह्याचे उत्तर काळच देउ शकतोलाल किल्ला
२००४ च्या भाजप च्या अनपेक्षित
जाणकार नाही पण
In reply to २००४ च्या भाजप च्या अनपेक्षित by पिंपातला उंदीर
पण माझया मते गुजरात दंगली
>>> पण माझया मते गुजरात दंगली
In reply to पण माझया मते गुजरात दंगली by पिंपातला उंदीर
गुरुजी या पक्षानी सोडचिठ्ठी
In reply to >>> पण माझया मते गुजरात दंगली by श्रीगुरुजी
>>> गुरुजी या पक्षानी
In reply to गुरुजी या पक्षानी सोडचिठ्ठी by पिंपातला उंदीर
तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात.
In reply to >>> गुरुजी या पक्षानी by श्रीगुरुजी
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> बिहार मध्ये जवळ पास १६ %
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> बिहार मध्ये जवळ पास १६ %
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>>भाजप सुरवातीपासूनच
In reply to >>> बिहार मध्ये जवळ पास १६ % by श्रीगुरुजी