Skip to main content

दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्‍हा

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 31/05/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते. त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती. कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे. भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे. नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा. एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते. इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती. काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे. सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल. एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.

वाचने 57773
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

>>पण आपले व त्यांचे उच्चार, आपले हिंदीवरील प्रभुत्व, व खाण्या - पिण्याचे समान पदार्थ यामुळे बराच एकजिनसीपणा आला आहे. म्हणजे दाक्षिणात्य लोक निव्वळ वेगळे म्हणून त्यांचा त्रास आणि उत्तर भारतीय आपल्यासारखे असल्यामुळे त्यांचा त्रास नाही असेच ना? त्रास वगैरे गोष्टी या प्रवृत्तीवर आधारलेल्या असाव्यात, अमुक एका समाजाविरुद्ध तो डायरेक्टेड नसावा. बाकी ओपन दाक्षिणात्य अपवाद असतात(मलयाळी सोडून) हे मान्यच आहे, तसे उत्तर भारतीयपण. त्यांच्या लेखी भारतात हिंदी सोडून अन्य भाषा आणि उत्तर भारतीय सोडून अन्य संस्कृती अस्तित्वातच नसते. बाकी दाक्षिणात्य कितीही स्वतःत गुरफटलेले असले तरी इन जनरल ते थोडेतरी मिसळतात असा अनुभव आहे.

दर पाच मैलावर भाषा बद्लते म्हणजे पंच क्रोशी तील भाषा बद्ली होते असे म्हट्ले जाते मराठी सुद्धा १)पुणेरी - काय हो आजची बात मी काय आहे ते सांगा २)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोला ३)नाग पुरी- काय बे,आज पेपर ला काय हाय ४)गोंय ची- कित्या वार्ता असान ५)कोल्हापुरी-म्हंजे आजची बातमी सांगतु का ६)अहिराणि- ७)बेळगावी,जत्,जम खिंडी- काय बा,हमाला आजची बातमी सांगा की वो -- ८)सातारी-पन म्या बातमी सांगतु नव्ह ९)माल वणी-आज ची बातमी काय असा १०)विरार्,वसई- आजची खबर काय/केम ११) १२) निवड्णुकी च्या वेळी होउ पाहणारे /होउ घात लेले आम दार्,खास दार सुद्धा मुलाखाती च्या वेळी अशीच मराठी टी व्ही वर वापरताना दिसतात

In reply to by शकु गोवेकर

२)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोला
कै च्या कै, वाट्टेल ते.....?

In reply to by शकु गोवेकर

पंच क्रोशीतील (पंचक्रोशीतील) मुंबई ची ( मुंबईची) नाग पुरी (नागपुरी) गोंय ची (गोंयची) माल वणी (मालवणी)...... .................. बाकी चालू दे.

In reply to by शकु गोवेकर

बेळगावात कधी पाय तरी टाकला आहे काय ? उगाच नाटका सिनेमातली पात्रे बघून काहीही ठोकू नका.

In reply to by शकु गोवेकर

१. मुंबई मध्ये खुप english शब्द वापरून एक वेळ माणस बोलतात. हे असल रस्त्यावर राहणारे पण बोलत नाहीत. २. विरार वसई मध्ये अशी भाषा बोलली जाते हे तुम्हाला कोणी सांगीतल? प्रतिक्रीया द्यायची म्हणून काहीही लिहु नका Please.

In reply to by शिल्पा नाईक

सहमत बरेच लोकांचा गैरसमज आहे की मुंबईकरांच्या मराठीवर हिंदी टोनचा प्रभाव असतो.. पण प्रत्यक्षात आम्ही मुंबईकर हिंदीतले काही शब्दच वापरतो, ते ही बरेचदा चपलखपणे बसतील असे, पण अ‍ॅक्सेंट हा मराठीच असतो... तसेच हिंदी सुद्धा आम्ही चांगलीच बोलतो..

आपण आपल्या दृष्टीकोनातून बघतो. तमीळ मध्ये त, थ, द, ध हे वेगवेगळे नाहीत. त्या मुळे स्वाती चे स्वाथी करतात. आपल्या मध्ये सुद्धा खुप स्ट्रॉन्ग mti (mother tongue influence) आहे. आपण इंग्रजी बोलताना तो जाणवतो. हिंदी बोलताना तो जाणवतो. बंगाल्यांमध्ये पण खूप असतो. मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव आठवत नाही आता) ते म्हणत होते तमीळ लोक देवनागरी मध्ये का नाही लिहित तामीळ. मला असे म्हणायचे आहे का बरे लिहावे त्यांनी देवनागरी मध्ये तामीळ. त्यांची भाषा छान आहे. समृद्ध आहे. आपल्या परसेप्शन मध्ये ती वेगळी आहे म्हणून करप्ट आहे असे का वाटावे. आपले ते चांगले आपले ते बरोबर, दुस-यांचे सगळे चूकीचे असे का वाटते आपल्याला.

In reply to by रणजित चितळे

मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव आठवत नाही आता) ते म्हणत होते तमीळ लोक देवनागरी मध्ये का नाही लिहित तामीळ. मला असे म्हणायचे आहे का बरे लिहावे त्यांनी देवनागरी मध्ये तामीळ. त्यांची भाषा छान आहे. समृद्ध आहे. आपल्या परसेप्शन मध्ये ती वेगळी आहे म्हणून करप्ट आहे असे का वाटावे. याचे कारण असे असावे की पूर्वी मराठी भाषा देखील फक्त मोडीत लिहीली जायची. देवनागरीचा वापर कमी होता. शाळांमधे देखील मोडी शिकवली जायची. परंतु महाराष्ट्राने पुरोगामित्व स्विकारून देवनागरी लिपीचा अंगिकार केला तद्वत तमिळनाडूनेही तो का करू नये. कदाचित असा असेल त्यांचा आशय. आपले ते चांगले आपले ते बरोबर, दुस-यांचे सगळे चूकीचे असे का वाटते आपल्याला. आपले चांगले आहे ते बरोबर वाटण्यात काहीही चूक नाही. अतिरेकी सहिष्णुतेमुळे आपले जितके नुकसान झाले आहे तितके दुसर्‍या कशानेही झाले नसेल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

याचे कारण असे असावे की पूर्वी मराठी भाषा देखील फक्त मोडीत लिहीली जायची. देवनागरीचा वापर कमी होता. शाळांमधे देखील मोडी शिकवली जायची. परंतु महाराष्ट्राने पुरोगामित्व स्विकारून देवनागरी लिपीचा अंगिकार केला
फक्त मोडी नव्हे. मराठी लिहिण्यासाठी मोडी आणि देवनागरीचा वापर पूर्वीपासून होत होता. मोडीचा वापर मुख्यतः पत्रव्यवहारासाठी होत असे. काव्य वगैरे देवनागरीमध्येच लिहिले जात असे. श्रवणबेळगोळ येथील 'श्रीचामुंडराजें करवियलें' हा शिलालेख सुद्धा देवनागरीमध्येच आहे. तेव्हा मराठीने मोडी सोडून नव्या देवनागरीचा अंगिकार केला असे नसून छपाईसाठीच्या सोपेपणामुळे (मुख्यतः) मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत.

In reply to by मिहिर

फक्त मोडी नव्हे. मराठी लिहिण्यासाठी मोडी आणि देवनागरीचा वापर पूर्वीपासून होत होता. मोडीचा वापर मुख्यतः पत्रव्यवहारासाठी होत असे. काव्य वगैरे देवनागरीमध्येच लिहिले जात असे. श्रवणबेळगोळ येथील 'श्रीचामुंडराजें करवियलें' हा शिलालेख सुद्धा देवनागरीमध्येच आहे. तेव्हा मराठीने मोडी सोडून नव्या देवनागरीचा अंगिकार केला असे नसून छपाईसाठीच्या सोपेपणामुळे (मुख्यतः) मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. असहमत. पत्रव्यवहार राज्यकारभार संपूर्णत:, इतकेच नव्हे तर कारकूनी कित्ते देखील सरसकट् मोडीतच लिहीले जात. 'श्रीचावुंडराये करवियलें' हे देवनागरीत नाही कारण सदरलेखामधे पृष्टमात्रा वापरल्या आहेत. पृष्ठमात्रा देवनागरीत वापरल्या जात नाही (कमीतकमी सध्याच्यातरी). मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. छपाईतंत्र जसे सुधारत होते तसे मोडीमधे पुस्तके छापणे ही काही अत्यंत कीचकट किंवा अवघड बाब नव्हती. देवनागरीचा वापर हा विषेशत्वाने केला गेला. यावर सकाळमधे पूर्वी देखील अनेक लेख येऊन गेले आहेत. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. माझ्यामते या पूर्णतः भिन्न गोष्टी नाहीत. सार्वत्रिकीकरणासाठी आणि सोपेपणासाठी केलेल्या / स्वीकारलेल्या ह्या सुधारणा आहेत. असेक एक उदाहरण म्हणून 'अ‍ॅ' या व्यंजनाकडे बघता येईल. वस्तुतः हे व्यंजन मराठी अंकलिपीत अस्तित्वात नाही परंतु इंग्रजी शब्दांचा उच्चार नेमकेपणाने दाखवण्यासाठी मराठी भाषेने हे नवे व्यंजन स्वीकारले अन्यथा हिंदी भाषेप्रमाणे बँकेला 'बैंक' म्हणत राहीलो असतो. फरक आहे या वॄत्तीचा अभाव असण्याचा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्रीमंत - देवनागरी लिपीचा वापर करणे ही फारच लांबची गोष्ट झाली. मध्य व उत्तर भारताची संस्कृती थोडा उदारपणा दाखवून समजून घेतली तरी अनंत उपकार होतील. अन परदेशात आपल्या सवयी व भावना संयमात ठेवून वागले तरी इतर देशाबद्दल चुकीचे चित्र उभे राहणार नाही. अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे. एखादं उदां देता का?

In reply to by श्रीरंग_जोशी

अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे. एखादं उदा. देता का?

In reply to by शिल्पा ब

त्याच्या वापराचे उदाहरण तर मलाही कधी दिसले नाही. परंतु २००१ साली याबाबतची बातमी वृत्तपत्रात वाचल्याचे स्मरणात आहे. त्यामागचा उद्देश परभाषांमधून हिंदीमध्ये येणाऱ्या शब्दांचा अपभ्रंश टाळणे हा होता. जसे बाळ ला बाल असे म्हटले जाते. एकंदरीत राजमान्यता मिळाली तरी 'ळ' अक्षराला हिंदी भाषेत लोकमान्यता मिळालेली नाही. परंतु भाषेविषयी अधिकार असणाऱ्या समितीने उदारपणा दाखवला हे स्पृहणीय आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

ळ संस्कृतमध्ये आहे, पण हिंदीमध्ये तो घेतला गेला हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे.

In reply to by बॅटमॅन

हिंदीमधे ळ लिहीता येईल पण तो हिंदीभाषिक बोलणार कसा? :) पुढची पायरी - आता हा ळ इंग्रजीत कसा नेता येईल. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाषाशास्त्रविषयक/प्राचीन भारतीय इतिहासविषयक इंग्रजी पुस्तकांमध्ये ळ हा विंग्रजी एल् च्या खाली एक डॉट् देऊन लिहिला जातो, ट व ड हे अनुक्रमे इंग्रजी टी व डी च्या खाली डॉट् देऊन लिहिले जातात, ऋ हा इंग्रजी आर् च्या खाली एक डॉट् देऊन लिहिला जातो, इ.इ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

असहमत. पत्रव्यवहार राज्यकारभार संपूर्णत:, इतकेच नव्हे तर कारकूनी कित्ते देखील सरसकट् मोडीतच लिहीले जात. 'श्रीचावुंडराये करवियलें' हे देवनागरीत नाही कारण सदरलेखामधे पृष्टमात्रा वापरल्या आहेत. पृष्ठमात्रा देवनागरीत वापरल्या जात नाही (कमीतकमी सध्याच्यातरी).
बळंच? श्रीचावुंडराये करवियलें चा फटू बघा आणि कोई मुझे कहो कि ये देवनागरी नही है???????? marathi बाकी, मोडी आणि देवनागरीची तुलना केली तर लगेच कळून येईल की मोडी मागे का पडली ते. आणि अर्थातच, मराठी आणि तमिऴ देवनागरीत लिहिणे जवळपास पूर्णतःच वेगळे आहे.

मान्य आहे त्यांच्या भाषेत थ, भ नसतील पण इंग्रजी भाषेत एखाद्या स्पेलिंग चा उच्चार जसा होतो त्याचा काही संबंध ठेवावा ना. Thick चा उच्चार कुणी तिक नाही करत मग परभाषिक लोक मुथय्या, थिमय्या असे उच्चार करणारच. साध्या मराठी माणसांना दक्षिण भारताबद्दल जेवढी माहिती असते त्या तुलनेत त्या लोकांना महाराष्ट्राबद्दल किती माहिती असते हा विचार केल्यास कळेल हा कोश किती घट्ट विणलेला आहे. एका तटस्थ माणसाकडून ऐकले होते... परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

>> परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे. जोशीसाहेब, इतकं जनरलायझेशन करू नका! ह्यातूनच पुढे द्वेषाचे तण उगवतात!

In reply to by मराठे

नक्कीच, द्वेषभावना वाढीस लागेल असे आपल्याकडून काहीच घडू नये. ते मत एका त्रयस्थ व्यक्तीचे आहे. मा. त. क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक दक्षिणी सहकारी आहेतच. अन वरील सर्व वर्णनाला अपवाद असणारेही लोक पाहिले आहेत (विशेष करून मोठ्या हुद्द्यावरील).

In reply to by श्रीरंग_जोशी

परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे. किंचित सहमत. असे सरसकटपणे मात्र म्हणता येणार नाही. तरीही नॉर्थ इंडीयनांबाबत बोलायचे झाल्यास, इतकेही माजू नये असे म्हणावे लागेल.......सगळ्यांनाच नाही पण बर्‍याचजणांना. ;)

In reply to by श्रीरंग_जोशी

ह्याच धर्तीवर आपल्या मराठमोळ्या लोकांचे हिंदी तसेच फारिन मध्ये गेल्यावर आपल्या नावाची होणारी चिरफाड या वर पण ढासू धागा येऊ दे!! बाकी बॉस हा मराठी असल्या पेक्षा सौथ इंडिअन असलेला कधीही चांगला असे माझे वैयक्तिक मत आहे.

केमिकल फर्म्युला फार व्हिनिगार यीज सी हेच् थ्री सी वो वो हेच या लोकांना च, छ, ज, ़झ मधला फरक (क,च,ट,त,प च्या वर्गांमधल्या अनुनासिक वगळता उरलेल्या चार व्यंजनांमधला भेद ) कळत नाही किंवा तो भेद असूनही गौण मानला जातो त्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. पाच-सहावर्षांपूर्वीची गोष्ट. एन.सी.एल.मध्ये आमच्या लॅबेत सुगता चौधुरी (बंगाली), टिजो (मलयालम्) तसेच काही मराठी, कन्नड इ. लोकं होते. एकजण सुगताला म्हणाला - your name is very big, so we'll call you "su" (सू) यावर टिजो उद्गारला, - but where are the animals? आम्हाला काही कळलं नाही की या प्राण्याला प्राणी कुठे हा प्रश्न अचानक का पडला? मग लक्ष्यात आलं की या महोदयांनी "सू" हा शब्द "झू" (zoo)सारखा वापरला. :-O

In reply to by प्रशांत उदय मनोहर

माझ्या मुलाला तेलुगु लोक मुकुल म्हणण्याऐवजी मुख्खल म्हणतात. इतकेच नाही तर नावाचे स्पेलींग माहीत असलेले लोक असं विचारत होते की मुख्खल तो पिक्कल जैसाही लगता है| अयसा नाम कायकू दिया? काय बोलायचे? :)

लहानपणी ग्रूपमध्ये एक तामिळ मुलगा होता.खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या घरी आम्ही गेलो. वडिलांनी दरवाजा उघडला."आहे का?" आम्ही मित्रांनी विचारले."आगनीकुगया"वडिल म्हणाले. अर्थच लागेना. शेवटी लाईट पेटला- मित्र संडासात होता.

In reply to by चिरोटा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=))=)) =))=)) =)) =)) =)) तोंडातल्या तोंडात बोललं की कुठल्याही भाषेची अशी काशी होते. तोतर्‍या माणसांची त्यामुळंच चेष्टा केली जाते.

एकदा आमच्या कंपनीमध्ये एक नवी मुलगी रुजू झाली. तिला कुणीतरी कार्यालयात जाण्याऱ्येण्याच्या सोयीविषयी विचारले तर ती म्हणाली की ती डायली राइड शटल चा वापर करते. कुणाला काही कळेचना. मग एकाचा दिवा पेटला की तिला डेली राइड असे म्हणायचे आहे.

खास करून पहिली नोकरी करणाऱ्या अभियंत्यांच्या विपत्र किंवा इतर ठिकाणी व्याकरणाची पार ऐशीतैशी झालेली असते. आपल्याला लहानपणीपासून सांगण्यात येते की दक्षिण भारतीय लोकांचे इंग्रजी फार उत्तम असते. त्यामुळे हि बाब अधिक ठळकपणे लक्षात येते...

In reply to by श्रीरंग_जोशी

कदाचित द़़क्षिण भारतिय म्हणजे फक्त मद्रासी म्हणजे केवळ अय्यर्/अय्यंगार नामक व्यक्तीच असा (स्वातंत्र्यपूर्व)समज असल्याने असेल. अजूनही वरील आडनावाच्या(वा ज्ञातीच्या:टॅम्ब्रॅम!!) लोकांचे इंग्रजी बोलणे/लिहिणे बरेच उजवे असते असा माझा अनुभव आहे.

दुसर्‍या देशात, राज्यात आपण जातो तेव्हा एक वेगळी संस्कृती तिथे असते. आपण तिथे रुळण्याकरता आपल्याला कसे बदलावे लागेल ह्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलाच पाहिजे. नाहीतर एक स्टिरियोटाईप बनतो. बोलण्यात, वागण्यात, आचार (मॅनर्स) ह्या बाबतीत बरोबर चूक असे काही नसते. भोवतालचे बहुजन जे करतात तेच प्रमाण मानणे फायद्याचे ठरते. पण स्वत:चे आत्मपरीक्षण केले गेले पाहिजे. त्याकरता तेवढी प्रगल्भता असली पाहिजे. परक्या भागात आपली संस्कृती टिकवणे आणि ती दुसर्‍यावर लादणे ह्यातला फरक ओळखता आला पाहिजे.

परक्या भागात आपली संस्कृती टिकवणे आणि ती दुसर्‍यावर लादणे ह्यातला फरक ओळखता आला पाहिजे. +१ आमचं (आता काही दिवसच राहिलेत, तरी पण आमचंच ;-) ) इंदूर याचं जितंजागतं उदाहरण आहे. पहिल्यापासूनच मराठी लोक इथे होते वगैरे ठिकच, कारण आता अख्ख्या उ.प्र. बिहार मधले उथळ खळखळाट करणारे लोंढे म.प्र. मध्येही आले आहेत. पण इंदूरमध्ये मराठी आणि हिंदीचा वापर असा काही सेम टू सेम रक्तात भिनलाय की मूळ हिंदी वाल्यांना बिलकुल वाटत नाही हे परके आहेत आणि या हिंदी भागात गाड्यांच्या मागे 'मी मराठी' असं ठळक लिहीलेलं असलं तरी हिंदीवाल्यांनी मराठी लोकांना ठोकलं असं गेल्या सात महिन्यात तरी एकदाही झालेलं नाही

In reply to by यकु

मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये पूर्वीपासून स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन उत्तमरीत्या केले आहे. विशेषतः तेथील स्थानिक भाषा व संस्कृतीचा योग्य मान ठेवून.

एकदा मी अन माझा नव्याने रुजू झालेला कानडी सहकारी टॅक्सी ने जात होते. चालक नायजेरियन होता. माझ्या सहकाऱ्याकडे पाहून मोठ्या उत्साहाने व प्रेमाने म्हणाला, 'कियाली...?'....... 'कियाली...?' सहकाऱ्याला काहीच कळेना? प्रथम मला वाटले की चालक त्याच्या मातृभाषेत काही विचारतोय की काय? तेवढ्यात माझा दिवा पेटला, त्याला म्हणायचे होते 'कि हाल हैं?'. पूर्वी कधी तरी एका पंजाबी ग्राहकाकडून 'हॉउ आर यू? ' चे भारतीय भाषांतर त्याने शिकून घेतले होते? अन कुणीही भारतीय ग्राहक भेटला की तो संवादाची सुरुवात या शब्दाने करीत असे. मला या गोष्टीचे फार कौतुक वाटले. दुर्दैवाने कानडी सहकाऱ्याला पंजाबी ढंगाचे हिंदी कळणे शक्यच नव्हते. त्यामुळे मला अनुवादकाची भूमिका वटवावी लागली. चालकाने देखील नेमका उच्चार शिकून घ्यायचा प्रयत्न केला.

आपल्याला किती भाषांचे किती ज्ञान आहे आणि आपण बोंबलत किती गावे आणि देश हिंडलो आहोत हे सांगण्याची सोय करणारा धागा आला एकदाचा. थोड्या वेळाने मोकळा वेळ मिळाला की विकीची मदत घेऊन देईन माझा सविस्तर प्रतिसाद.

परा गुरूजी - माझ्यासाठी आपले मिपावरील स्थान असे आहे जसे एकलव्यासाठी द्रोणाचार्यांचे. अमेरिकेसारख्या देशात कामासाठी वास्तव्य असणे यात विशेष असे काय? अन आपल्याच देशातील इतर भाषेचे जुजबी ज्ञान असणे यातही विशेष असे काही नाही.

In reply to by शिल्पा ब

टी राजेंदर एक आघाडीचा दिग्दर्शक आहे तामीळ चित्रपटांचा. जरा शीघ्रकोपी आहे एवढच!!

आता गंमत पहा कि सगळ्या मीडिया चे camunication रोमन लिपी मध्ये होते... महाराष्ट्रास सगळे मीडिया दक्षिण भारतीय समाजात असल्याने ... Solapur चे शोलापूर होते... काही गमती बंगाली मध्ये V चा उच्चार "भी" असा करतात त्यामुळे सौरभ ला ते sauraV असे लिहितात आणि मग मराठी वर्तमानपत्रा मध्ये पण सौरव असे लिहून येते ... कारण बंगली लिपी > रोमन > देवनागरी अशा प्रवासाची गमत अवांतर : हवा > अरबी शब्द , मान > संस्कृत प्रत्यय ... मग हवानाम मराठी शब्द कसा ..?!

In reply to by पुष्कर जोशी

इतर भाषांमधून शब्द आयात करणे हे कुठल्याही भाषेच्या प्रवाहीपणाचे लक्षण आहे. हवामानच काय गणना करणे अवघड होईल एवढे तत्सम व तत्भव शब्द आपल्य भाषेत मिळतील. इंग्रजीचेच बघाना कर्म, गुरू, मंत्र, अवतार, निर्वाण कितीतरी शब्द सर्रास वापरले जातात.

श्रीरंग जोशी म्हणतात - ''कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते." आणि सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल." ---- .सर्व दक्षिणी भाषा या आपआपल्या परीने समृद्ध आहेत आणि निदान १००० वर्षे तरी विकसित होत आल्या आहेत. त्यांच्या रूढी प्रमाणे त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिण्यासाठी आणि उच्चारासाठी एक किंवा दुसरी पद्धत ( convention ) वापरली म्हणून त्यांची पद्धत विचित्र आणि मराठी पद्धत तेवढी थोर असे म्हणता येत नाही. . इंग्लिश मातृभाषा मानणार्या वेगवेगळ्या लोकांच्या स्पेलिंग आणि उच्चार यामध्ये साम्य असत अस नाही. schedule या शब्दाचा ब्रिटीश आणि अमेरिकन उच्चार सारखा नाही. george bernard shaw याने यावर त्याच्या खास शैलीत अशी मल्लीनाथी केलेली आहे.तो म्हणतो - - America and Britain are two nations divided by a common language -. .स्वातंत्र्या नन्तरच्या काही वर्षात नेहरू यांनी असे विधान केले होते - we have many English languages such as पंजाबी इंग्लिश, मराठी इंग्लिश ,बेंगाली इंग्लिश and मल्याळी इंग्लिश. .थोडे अवांतर - .थोडे अवांतर - १. फक्त मराठीत च च ज झ या व्यंजन समूहांचा दन्त्य आणि तालव्य असे दोन्ही उच्चार होतात यातील दन्त्य उच्चार दक्षिण भारतीय भाषांची देण आहे असे वाटते. संस्कृत आणि इतर उत्तरेकडील भाषात फक्त तालव्य उच्चार ऐकू येतो. २. आपण शासन या शब्दाचा सरकार अशा अर्थाने वापर करतो जसे महाराष्ट्र शासन व तसेच चेष्टा या शब्दाचा अर्थ थट्टा मस्करी असा करतो. माझ्या एका दक्षिणेतील पण मुंबईत वावरलेल्या मित्राला याचे हसू येते. बाकीच्या भाषांत या शब्दांचे punishment आणि effort असे मूळ संस्कृत मध्ये असलेले अर्थ वापरतात. .-भाय आर यु भांडरींग इन द भरान्डा लाईक ए भेग्याबॉन्ड मिस्टर भर्मा - हे बंगाली उच्च्चारांचे विडम्बन आपल्याला माहित असेलच.

In reply to by रमेश आठवले

मूळ चर्चाविषय बराच त्रोटक असल्याने मी त्यांच्या भाषेलाच पूर्ण दोष देतोय असा अर्थ निघत असेल तर तो माझ्या मांडणीचा दोष आहे. आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल व उदाहरणांबद्दल धन्यवाद. या चर्चेच्या अगोदर माझ्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर जाणकारांच्या माहितीवर्धक प्रतिसादांमुळे मिळाले आहे. मूळ प्रस्तावात अन प्रतिक्रियांत अनेकांनी उदाहरणे दिली आहेत ती प्रवृत्तीची. मी मा.त. क्षेत्रात काम करत असल्याने नोकरीच्या पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत अवतीभवती बहुसंख्येने असणार्‍या दक्षिण भारतीय सहकार्‍यांकडून आलेल्या अनुभवांनुसारच निरिक्षणे लिहिली आहेत. बरेचदा कामाशी संबंधीत मिटिंग्ज फोनवरून होतात कारण सहभागी होणारे वेगवेगळ्या शहरांत अन देशांत असतात. आता जर कुणी reason चा उच्चार रिजन असा करत असेल तर इतरांचा गैरसमज अन गैरसोय होणारच नं? वर्षानुवर्षे परदेशात राहूनसुद्धा आपले उच्चारांमुळे दुसर्‍यांची गैरसोय होऊ नये असा विचार न करता स्वतःला न बदलणार्‍यांच्या प्रवृत्तीवर हे भाष्य आहे. माझ्या नावाचे स्पेलिंग (Shrirang) इमेल पत्त्यात व माझ्या इमेल स्वाक्षरीत स्पष्ट दिसतानाही Srirang असे करणारे नेहमीच भेटतात. माझ्या वडीलांचे नाव श्रीनिवास असे असूनही तेच नाव असणार्‍या एकाही दक्षिणी सहकार्‍याचे स्पेलिंग मी Shrinivas आजवर केलेले नाही. कालचेच उदाहरण आहे एक प्रेमळ स्वभावाची म्हातारी अमेरिकन मॅनेजर (७० च्या आसपास वय असलेली) फोनवरची मिटींग संपल्यानंतर वैतागून म्हणत होती. अरे किती हे मनि (मणि) एकाच टिममध्ये? नावे घेताना पूर्ण घेत जा की. कोणता मनि (मणि) काय काम करत आहे हे आम्हाला कसे कळणार? मी मराठी माध्यमात शिकलेला असल्याने मला ज्याप्रकारचे इंग्रजी उच्चार पाचवीपासून शिकवले गेले होते ते मी आजही वापरत राहिलो तर माझ्यामुळेही कदाचित इतरांची गैरसोय होईल.

आपल्याच लोकांनी इंग्रजीत लिहितांना राम चे Rama आणि योग चे योगा केले त्याचे काय ?

एवढा मनोरंजक धागा नजरेतून सुटला कसा? :) :) (पण एकंदरीत दक्षिण भारतीय, त्यातल्या त्यात तमिळ, डोक्यात जातात ते त्यांच्या प्रत्येक ठिकाणी फक्त स्वभाषिकांचे कोंडाळे करून राहण्याच्या सवयीने...)

खाना खाया ? = काना काया ? न्युयोर्क मध्ये एका टैक्सी वल्याने विचारले होते की पटेल चा अर्थ दुकान होतो का ? कारण सर्व भारतीय दुकानावर पटेल असे लीहीलेले असते.

महेंद्र ला काना लावला तर महेंद्रा होतो मात्र मात्रा लावली तर महेंद्रे होते.....

"मिस कोल, मिसेस पोल आपके होल मे स्नेक्स खाणे को बुला रही है" (अर्थ- मिस कौल, मिसेस पॉल आपको हॉल मे स्नॅक्स खाने को बुला रही है)

कन्नड जोक . बाईकडे दूधवाला येतो आणि दूध देता देता बाईना विचारतो, आज मालक नोकरीवर का गेले नाहीत? बाईची मुलगी त्याच वेळी बाईला विचारते दुधाचे काय करु? बाई एकाच शब्दात उत्तर देते -- हालिडे हॉलिडे म्हणजे सुट्टी . हाल ईडे म्हणजे दूध ठेव.

In reply to by उद्दाम

हाही एक जोक. तसा यत्ता चौथीतला वैग्रे आहे अन बहुत प्राचीन आहे. एक मुलगा एका मुलीला विचारतो, तुझे नाव काय आणि तू कुठे चाललीस? मुलगी एका शब्दात उत्तर देते. (हो, तीच ती, कुणाच्याही हाथ न आनेवाली)

In reply to by बॅटमॅन

ए अजुन १ अजुन १ - कनडा ज्योक वेटर गिर्र्हाईकाला एन बेकु? (काय पायजे) विचारतो अन त्याचा मित्र विचारतो की ते चित्र कशाचं आहे? तो म्हंतो 'वंटी'. (वंटी= उंट/ One Tea)