Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Madhavi_Bhave on गुरुवार, 04/12/2012 - 12:22
मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे. मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे "कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला. ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल. माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही". ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार. मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.
  • Log in or register to post comments
  • 27134 views

प्रतिक्रिया

Submitted by सविता००१ on गुरुवार, 04/12/2012 - 17:38

Permalink

असहमत

अजिबात म्हणजे अजिबातच नाही पटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीती on गुरुवार, 04/12/2012 - 18:03

Permalink

मला वाटत तुम्ही कोकणात फक्त

मला वाटत तुम्ही कोकणात फक्त पर्यटनापुरतेच फिरत असाव्यात.... कारण तिथलं रहाणीमान जरका जवळून पाहीलत तर ते अजिबात अस्वच्छ नाही. हां हाटेलांच्या बाबतीत म्हणाल तर हे थोडफार खर आहे.....कारण कोकणी माणुस अजून त्या बाबतीत पुढारलेला नाही किंवा थोडा अनुत्साही आहे.(एका अथीर्‍ ते बरच आहे...कारण त्यामुळेच तिथलं नैसगिक सौंदर्य टिकुन आहे.) मात्र कोकणी माणुस अत्यंत स्वच्छ आणि कष्टाळू आहे........आणि हे अकालाबाधित सत्य आहे. कोकणकन्या...प्रीती
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on गुरुवार, 04/12/2012 - 18:32

Permalink

शहर

पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटते
हे केवळ कोकणच नाही तर सर्वत्र लागू होते- मोठी शहरे आणि खेडी,जिल्हा शहरे ह्यांच्या राहणीमानात तफावत असल्याने तसे आपल्याला वाटते. उ.दा.मोठ्या शहरांमध्ये दुकाने ९.३० -१० पर्यंत चालु असतात तर ईतरत्र भारतात ८ वाजले की आवरते घ्यायला चालू होते. मल्याळी,उडपी लोकांचा कष्टाळू म्हणून मुंबईत उल्लेख केला जातो. पण दक्षिण कर्नाटकातली,उत्तर केरळातील गावे पाहिलीत तर ती "उदासपणात्,निष्क्रियतेत' कोकणाला मागे टाकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on गुरुवार, 04/12/2012 - 18:29

Permalink

चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो...

चला कोकणातले-बाहेरचे-देशावरचे-मराठवाडी-खानदेशी-वैदर्भी असे वेगवेगळे गट करुन उभे राहा बघू मुलांनो. मुंबईकर-नागपूरकर-कोल्हापूरकर-पुणेकर असेही गट चालतील. तुम्हाला हवा तो गट निवडा. समोरासमोर उभे राहा आणि शिव्यागाळी सुरु करा. (त्वेषाने शेजारी जमिनीवर थुंकायला परवानगी आहे.) अंगावर धाऊन जाणारा गडी बाद. हा खेळ खेळल्यावर मग शांत बसा. प्रमुख पाहुणे आल्यावर तुम्हाला सगळ्यांना एका सुरात 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत गायचे आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री. कचरे हे आपल्याला 'हागणदारीमुक्त गाव मोहिमेचे यश' या विषयावर दोन शब्द सांगतील. नंतर प्रत्येकाने तीन टाळ्या वाजवायच्या आहेत. शेवटी फक्त क्लास मॉनिटर सुकुमार दांडगे आणि गर्ल्स मॉनिटर कु. सुनयना तिरळे हे दोघेच 'जय हिंद' अशी घोषणा देतील. तुम्ही सर्वांनी 'जय महाराष्ट्र' असे मागोमाग म्हणायचे आहे. यात काही बेशिस्त दिसली तर याद राखा. उद्यापासून सर्वांची रवानगी माळावर (गुरं राखण्यासाठी) -तुमचा प्रेम्मळ- ज. रा. शौचे गुरुजी
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/12/2012 - 18:33

In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू

Permalink

बा*** भां**

प्रभुदेवा __/\__ Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 04/14/2012 - 04:57

In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू

Permalink

आयशपथ !

आयशपथ , भाण्णं हा आमच्या म्हारास्ट्र देशाचा प्रानच हाय ! लातूरकर , नांदेडकर, बारामतीकर, मालवणकर, ठाणेकर , कलानगरकर , दादरकर आन आनखी कंची यादी पायज्यल हाय ? म्हून शान मुक्यमंतरी तिकाडन येतुया ! त्ये बर, त्ये झालं राजकारनाचं ! हिकडं बी सुबोधवाले, दुर्बोधवाले, प्रसादगुनवाले, यांची बी भांडानं हायतच की ! तवा कयाला कुनी कुनाचं त्वांड दाबायचं म्हन्तो म्या ! आप्ला खौ रा.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on गुरुवार, 04/12/2012 - 18:48

Permalink

कोकण हे अतिशय सुंदर आहे.

कोकण हे अतिशय सुंदर आहे. गावी गेल्यावर खरच refresh व्हायला होते. कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात. पण कोकणाचा जेवढा विकास व्हायला हवा होता तेवढा होत नाहि आहे.याला फक्त आपले राजकारणी जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/12/2012 - 18:53

In reply to कोकण हे अतिशय सुंदर आहे. by गोंधळी

Permalink

+१

कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात.
प्रचंड सहमत आहे. घरं कशी पोराबाळांनी बहरलेली असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on गुरुवार, 04/12/2012 - 19:05

In reply to +१ by परिकथेतील राजकुमार

Permalink

मुळातच व्यवसायिकतेचा अभाव

मुळातच व्यवसायिकतेचा अभाव कोकणी(मराठी)माणसात असल्याने पर्यटनाच्या बाबतीत मागे आहे.याचि खंत वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 04/12/2012 - 20:33

Permalink

वरच्या काही प्रतिक्रिया मध्ये

वरच्या काही प्रतिक्रिया मध्ये कोकण स्वच्छ असुन देशावरच घाण आहे असे म्हटले आहे , मग ती स्वच्छता सोडुन एव्हढे लोक देशावरच्या घाणीत का बरे आले
  • Log in or register to post comments

Submitted by साती on गुरुवार, 04/12/2012 - 20:53

Permalink

आळशी!

कोंकणी माणूस आळशी का आहे? एक कामसू माणूस(घाटावरचा असेल बहुदा) कोंकणात आला. माडाखाली पंचा टाकून भरदुपारी निजलेल्या कोंकण्यास म्हणाला- "अरे आळशी कोंकण्या,उठ. भर दुपारी काय झोपलास?" "उठून काय करू?" "काई कामधंदा कर" "मग काय होइल?" "पैसे मिळतील." "मग?" "ते गुंतवून मोठा उद्योग काढ." "मग?" "आणखी पैसे मिळतील" "मग?" "शहरात राहा,घर घे,गाडी घे" "मग" "आणखी कष्ट कर्,आणखी पैसे कमव" "मग?" "कुठल्यातरी निसर्गरम्य खेड्यात फार्म हाऊस बांध" "मग?" "सुट्टीच्या दिवशी मस्त निवांत तिथे जाऊन झाडांच्या सावलीत आराम कर" "मग,आत्ता काय करतोय वेगळे,शिंच्या? " असं आमचा कोंकणी म्हणतो. मिपावर आज बर्वेबाई,गणपा सगळे या ना त्या प्रकारे कोंकणाचीच आठवण करून देतायत. आज रात्रभर स्वम्नात माड,पोफळी नी आंबेच दिसणार बहुदा.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 04/12/2012 - 20:56

In reply to आळशी! by साती

Permalink

सौ सुनार

सौ सुनार की................. =))
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 04/12/2012 - 21:58

In reply to सौ सुनार by गणपा

Permalink

+१

=))
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on गुरुवार, 04/12/2012 - 21:19

Permalink

आवडले नाही

आवडले नाही :( अजिबातच पटले नाही कोकणातली माणसं खूपचं प्रेमळ व कष्टाळू असतात
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on गुरुवार, 04/12/2012 - 21:41

Permalink

कोकन सुरगाना सटाना नाहि

कोकन सुरगाना सटाना नाहि का? फक्त कोकन रत्नागिरि ....आपन म्हनता ...ते ....कोकन ..आहे का ? आंम्हि सर्वानां कोकनि समझतो ! आपन कोनते कोकनि ???????????????/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 04/12/2012 - 21:58

Permalink

चला, आता इथे कोकण कुठे मिळेल

चला, आता इथे कोकण कुठे मिळेल ते शोधणे आला. परा, कॅन यु हेल्प?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/12/2012 - 22:07

Permalink

पटलं नाही

भावेबाई, तुम्ही फारच थोडं कोकण आणि कोकणी माणूस पाहिला असावा. लहान असताना वेंगुर्ल्याला रहात होता हे लक्षात घेतलं तरीही हेच म्हणते. कोकण स्वच्छ करायची गरजच पडत नाही, कारण पावसाळ्यात सगळं पार धुऊन निघतं! कोकणी माणसं पण स्वच्छताप्रेमीच. तुम्ही झाडाखालचा पातेरा खत म्हणून वापरण्याबद्दल लिहिलंय , तेही अगदी व्यवहार्य आहे. शिवाय खताचे पैसेही वाचले ना! अगदी गावातली लोकं सुद्धा नीटनेटकी असतात. मी लहान असताना रत्नागिरीजवळच्या खेड्यात रहात होते, पण तिथेही लोकांकडे संडास असायचे. रस्त्याच्या कडेला पोरांनी हगून ठेवलंय असं मी कोकणात कधीच पाहिलं नाही. उदासीनता म्हणताय त्याला एक कारण कदाचित असू शकेल की बहुतेकांची मुलंबाळं मुंबईत नाहीतर परदेशात सुद्धा जातात, कोकणात लागवड करण्यासारखी जमीन फार कमी आहे. देशावर जसं थोड्या श्रमात भरपूर पीक घेता येतं ते कोकणात शक्य नाही. कोकणातली सगळी पिकं फार मेहनतीने घ्यावी लागतात, मग ते आंबे असोत, नारळ असो, की भातशेती. कोकणी माणूस आळशी हे मला प्रचंड विनोदी विधान वाटतं. इतके कष्ट करून हातात पैसेही फार येत नाहीत. आणि कोकणी माणूस सतत उद्योगात राहिल्यामुळे तमाशा वगैरे अवांतर गोष्टी कोकणात बघायलासुद्धा मिळणार नाहीत. ती सगळी घाटावरच्या पैसेवाल्या आणि भरपूर वेळ हाताशी असलेल्या लोकांची मिरासदारी. कोकणात पर्यटन उद्योग फार वाढला नाही तर बरं, कारण मग सगळी झाडी तोडून रिसॉर्ट बांधायच्या मागे लोक लागतील आणि गोव्यातल्यासारख्या सगळ्या गोष्टी कमर्शियल होऊन बसतील. कोकणचा विकास म्हणजे तरी काय हो? शिक्षणाचं प्रमाण देशावरच्यापेक्षा जास्तच आहे. पुरेसे पैसे कष्ट करून मिळतायत. फुकटचा बडेजाव आणि पैशांची उधळमाधळ फार दिसणार नाही. कोणीही भीक मागत फिरत नाही. आणखी काय हवं?
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 04/12/2012 - 22:11

Permalink

आश्चर्य!

लेख वाचून आश्चर्य वाटले. कदाचित "अस्वच्छ" ह्या शब्दाच्या व्याखेबाबतच काही गैरसमज असावा. राहिलेले, खरकटे अन्न, मानवी मल-मूत्र आदी गोष्टी मी तरी कुठल्याही कोकणातील घराजवळ किंवा गावातील रस्यांवर पाहिलेल्या नाहीत. झाडाखाली जमलेल्या पालापचोळ्याला अस्वच्छता म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी! खाजगी घरे तर सोडाच पण कोकणातील सार्वजनिक देवळे पहावीत. परीसर तर स्वच्छ असतोच शिवाय देवळाबाहेर भिकारी-कुष्टरोग्यांची गर्दीदेखिल नसते. आणि हे काही फक्त आडगावातील देवळांबाबतीतच नव्हे तर जिथे भक्त आणि पर्यटकांचा सतत राबता असतो अशा प्रसिद्ध देवळांबाबतीतदेखिल खरे आहे. देशातील अन्य भागातील प्रसिद्ध देवळाशी तुलना केलीत तर, कोकणातील देवळांची स्वच्छता आणि भिकारीमुक्त परिसर डोळ्यांना सुखावतो. उरला भाग आळशीपणाचा. कोकणच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण किती याची काही कल्पना आहे? कोकणची जमीन सुपीक नाही. भात हे काही नगदी पिक नाही. निर्यातयोग्य आंबा सर्वत्र होत नाही. तरुण रक्ताचा अभाव. मनि-ऑर्डर इकॉनॉमी वर भर. असे असूनही कोकणातील किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात? पर्यटन - आपल्या घरातील एखाद-दुसरी खोली पर्यटकांना राहण्यासाठी द्यायची. त्यांच्या खाण्या-पिण्याची घरगुती सोय करायची. ही संकल्पना अत्यंत यशस्वीपणे कोकणात राबवलेली दिसेल. आज अक्षरशः हजारो कुटुंबे अशा पद्धतीने - फार नाही पण चार पैसे - जास्तीचे कमावीत आहेत. असो, बरेच काही लिहिता येईल. पण तूर्तास इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on गुरुवार, 04/12/2012 - 23:24

Permalink

कोकणी माणूस...!!!!!

मा_भा ना नमस्कार..!!! मिपावर कोकण आणल्याबद्दल. मी मुम्बईत जन्मलेला माणुस आजोळ कोकणातले आणी मुळ गाव सुद्धा त्यामुळे अगदी लहानपणापासुन कोकणात जाणारा व तिकडे रमणारा. आजही नियमीतपणे कोकणात जाणारा. # कोकणी माणुस ह आळशी अजिबात नसुन तो उद्योगीच आहे, बरीच मेहनत केल्याशीवय त्याला सुखासुखी काही मिळत नाही. कोकणचा एकन्दरीत भूगोल , शेती व उद्योग्धन्दे पाहीले म्हणजे लक्षात येते. ज्यान्ची मनीओर्डेरची सुद्धा सोय नाही त्यान काबाड्कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसतोच तो आळ्शी कसा ??..देश स्वतन्त्र होउन ६५ वर्षे झाली कोकणात किती विकास झाला. हा, तो तुम्च्या आम्च्यासारखा नाइलाजाने घड्याळाशी बान्धलेला शहरी माणसासारखा घाईगडबडीत दिसत नसेल कदाचीत. म्हणून तो आळशी नव्हे. # राहता राहीला प्रश्ण स्वछतेचा कोकणातले घर व आन्गण हे स्वछ ठेवावेच लागते त्याला पर्याय नाही व ते तसे असते. आन्गणाबाहेर सगळे प्रचन्ड रान असते त्याची झाड्लोट शक्य नसते त्याच्या आकार्-मानामुळे, तिकडे पडलेला पालापाचोळा, झुडपे व वेड्यावाक्ड्या झाडान्मुळे आपल्याला अस्वछ वाटले असावे. (कोकणी ) विनोद१८
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 04/13/2012 - 00:05

Permalink

मलातरी कोकणी माणूस अजिबातच

मलातरी कोकणी माणूस अजिबातच अस्वच्छ वाटला नाही. पालापाचोळा असणे म्हणजे अस्वच्छता नव्हे. Image removed. देवळाच्या आत आणि आजूबाजूचा परिसर प्रचंड स्वच्छ होता. तिथल्या गुरवांकडे आम्ही जेवलो तर अतिषय स्वच्छ, चवदार आमटीभात आणि लोणचे वाढले. माझे काका कोकणात गेली पन्नास वर्षे तरी राहतायत. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर द्यायला पैसे नसले तर लोक शेतातले काहीबाही आणून देतात पण फुकट काही नको असते. मला तरी वर्षानुवर्षे चांगलाच अनुभव आला आहे. यापुढे बिल्डर्स, नेतेमंडळी काय वाट लावतील ती वेगळी.
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड_बोका on Fri, 04/13/2012 - 01:04

Permalink

फक्त कोंकण आणि अस्वच्छ..? तेही विशेषतः पुर्ण भारतात

ईथे अमेरीकेत राहुन जेव्हा भारतात जाता...तेव्हा मला तर कोंकणीच नाही तर प्रत्येक भारतीय माणुस अस्वच्छ आणी आळ्शी वाटतो. आणी येवढेच नाही तर अडाणी सुध्धा. साधा "सिव्हीक सेन्स" नाही आहे. माझ्याकडे अगणीत उदाहरण आहेत. तुम्ही काहीही म्हणा मला कही फरक पडणार नाही. बाकी तुमचे चालु द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 04/13/2012 - 01:27

In reply to फक्त कोंकण आणि अस्वच्छ..? तेही विशेषतः पुर्ण भारतात by खादाड_बोका

Permalink

?

प्रतिसाद कळला नाही. जर वाद उकरून काढायचा प्रयत्न असेल तर तो फारच क्षीण वाटला. जर वरच मत खरच असेल तर मग तिथली सिटिझनशीप घेउन खुशाल तिथेच सुखाने रहा. हाकानाका. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Fri, 04/13/2012 - 05:15

In reply to ? by गणपा

Permalink

गणपाभाऊ, त्यांनी उपहासाने

गणपाभाऊ, त्यांनी उपहासाने लिहीलयं असं वाटतयं.
  • Log in or register to post comments

Submitted by Madhavi_Bhave on Fri, 04/13/2012 - 11:18

Permalink

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मी एकदम सपशेल माघार घेते आणि माझी चूक मान्य करते तेव्हा हा विषय आपण येथेच थांबवूया. फक्त एक लक्षात घ्याल अशी अपेक्षा करते "मी कोकणी माणसाचा उपहास करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला नव्हता कारण मी स्वताला कोकणीच समजते. कोठेतरी मनात माझ्या सल होता आणि कोठेतरी अशी तळमळ देखील आहे कि मनात आणले तर कोकणी माणूस खूप पुढे जावू शकतो आणि तो जाइलही". विषय मला नीट मांडता आला नाही असेच मी समजते. बाकी माझ्या कोकण विषयीच्या आपुलकीबद्दल कोणी शंका घेवू नये. जरी मी फक्त दहाच वर्षे वेन्गुर्लायला काढली असली तरी देखील माझ्यासाठी माझे बालपण म्हणजे माझे वेन्गुल्यातील बालपणच आणि ते मला अगदी नीट आठवते आहे. बाकी सर्वांनी माझ्या पहिल्याच लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या पण बर्याच समझुती दूर झाल्या. ह्याचे फलित म्हणजे पुढच्या वेळी कोकणात जाताना मी वेगळ्या दृष्टीने कोकण बघण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 04/13/2012 - 12:31

Permalink

इथे

इथे एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते. मी खुप पूर्वी पासून गणपतीपुळे येथे नियमितपणे दर्शनाला जातो. अगदी तिथले गणेशमंदीर कौलारु होते तेव्हापासून. पण आपल्या स्वयंघोषीत महागुरुंचा एक भंपक चित्रपट आला होता काही वर्षांपूर्वी "नवरा माझा नवसाचा" तो चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिथे गर्दी प्रचंड वाढली. गणेश दर्शनाचा मुळ उद्देश बाजुला पडून समुद्र किनार्‍यावर धिंगाणा करण्याचा उद्देश डोके वर काढू लागला. त्या प्रकाराच्या धिंगाण्याला अजिबात विरोध नाही, पण हे करतांना त्या सुंदर, स्वच्छ किनार्‍याचे रुपांतर एका अस्वच्छ आणि ओंगळ जागेत होऊ लागले. आता यात कोकणी माणसाचा सहभाग अगदी नगण्य आहे, कारण हि अस्वच्छता पसरण्याचे महान कार्य तिथे येणार्‍या पर्यटकाचे आहे. कोकणी माणसाचा दोष असेल तर तो इतकाच कि, अस्वच्छता पसरविण्यार्‍यांवर वचक ठेवायचे काम, तिथल्या शासन यंत्रणेला जमले नाही. तिथल्या शासन यंत्रणेवर कोकणी माणसचं आहेत. पण त्यांना याची फार पर्वा दिसत नाही. आजची गणपतीपुळ्यातली परिस्थिती पाहीली कि मला देऊळ चित्रपट आठवतो. देऊळ मधील गाव तर दुर्लक्षित होते, मागासलेले होते, पण गणपतीपुळे तसे अजिबात नव्हते. अगदी काही वर्षांपूर्वी जिथे अत्यंत शांत आणि सुस्वरुप गाव नांदत होते तेथे आज प्रचंड कलकलाट आणि उबग आणणारी दृश्य दिसतात. तिथे किनार्‍यावर "वॉटर स्पोर्टस्" या गोंडस नावाखाली पर्यावरणाचा यथेच्छ र्‍हास चालू आहे. आणि हे सगळं करणारी माणसे कोकणी वाटत नाही. विषाद एकाच गोष्टीचा वाटतो कि थोड्याश्या फायद्यासाठी कोकणी माणूस हे सगळं सहन करतो. आता मंदिर एकदम झकपक झाले, निवासाच्या चांगल्या सोयी झाल्या. पंचतारांकित रिसॉर्टस झाली, पण या सगळ्याची किंमत भयंकर आहे, आणि ती कोकणी माणसालाच मोजावी लागणार, पर्यटकांना नाही. ते काय, नविन ठिकाण शोधतील. पण गावाचा र्‍हास हा गावकर्‍यांच्या येणार्‍या पिढ्यांनाच भोगावा लागेल! हि फक्त गणपतीपुळे याच ठिकाणची परिस्थिती असेल असे वाटत नाही. पण इतर ठिकाणी मी जास्त फिरलो नसल्यामुळे त्यावर काही बोलत नाही. मला कुठल्याही वादात शिरण्याची इच्छा नाही पण जे काही चालले आहे ते काही फार भूषणावह नाही, इतकेच म्हणेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 04/13/2012 - 19:44

Permalink

माझे मत

एखाद्या व्यक्तिसमूहास दिले गेलेले विशेषण अनेकदा तुलनात्मक असते. तसे ते इथेही भावेबाईंच्या लेखात दिसते आहे. कोकणी लोकांना 'आळशी' संबोधणे रोखठोक व थोडेसे कठोर आहे खरे, पण असे विशेषण अर्थात इतर प्रांतातल्या लोकांच्या तुलनेच्या संदर्भात आहे, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. ह्या बाबतीत, अनेक वर्षे भारतात व जवळजवळ तेव्हढीच वर्षे परदेशी काढल्यामुळे, मीही माझे तुलनात्मक मत (जे संपूर्ण anecdotal आहे, माझ्या निरीक्षणांवर, माहितीवर आधारलेले आहे, त्यास कुठलाही 'विदा' नाही) नोंदवतो... जगातील इतर अनेक देशांतील लोकांच्या तुलनेत, सर्वसाधारण भारतीय कामगार/ मजूर (ह्यात प्रोफेशनल्सचा समावेश नाही), कामतत्परता, कामाची शिस्त, कार्यक्षमता असा अनेक बाबींचा विचार करता, बराच मागे आहे. आणि भारतातील प्रांतांच्या संदर्भात हाच विचार केला तर सर्वसाधारणपणे मराठी माणूस, व महाराष्ट्राच्या प्रांतांपुरता विचार केला तर कोकणी माणूस अशाच परिमाणांनुसार बराच मागे आहे, असे मला वाटते. वर आलेल्या अनेक प्रतिसादांतून असा सूर दिसतो की कोकणी माणूस जगण्याच्या बाबतीत फारश्या अपेक्षा ठेवत नाही, थोडक्यात तो आनंद मानतो. तो 'आहे त्यात सुखी' असतो, कुठल्याही रॅटरेसमधे पडायची त्याला आवश्यकता भासत नाही. थोडक्यात, तो जे काही थोडेसे अगदी जरूरीपुरते करतो, त्यात त्याला आनंद आहे, (त्याला ह्याची कसलीच खंत नाही, तुम्हा बाहेरून आलेल्यांना/ बाहेरून हे न्याहाळत असलेल्यांना ह्याबद्दल काय वाटायचे ते वाटो). ही कारणमीमांसा जरी बरोबर मानली तरी ह्यातून त्याचा दिवसेंदिवस तोटाच होत आलेला आहे, व ह्यापुढेही होत रहाणार आहे. कोकण काही जगापासून वेगळे असलेले बेट नाही. त्याचे त्याच्या परिसराशी संबंध आहेत. तिथे, अगदी 'कमीतकमी अपेक्षेने' रहायचे कुणी म्हटले तरी तेथील जनतेस बाहेरून अनेकानेक ( कोकणच्या संदर्भात तर बहुसंख्य) जिन्नस व सेवा आयात कराव्या लागणार. हे करतांना त्यांना त्या बाहेरील जीवघेण्या स्पर्धेच्या भागीदारांशीच व्यवहार करावा लागणार. म्हणजे 'चढ्या' भावाने त्याला त्या खरीदाव्या लागणार. अर्थात त्यास स्वतःची क्रयशक्ति वाढवणे भाग आहे? वैद्यकीय सेवेचे एक साधे उदाहरण घेऊयात. ही सेवा देणारे बाहेरून शिक्षण घेऊन आलेले असणार, त्यांचे दवाखाने, हॉस्पिटले स्थापन करून ती चालवण्यासाठी त्यांनी बाहेरूनच उपकरणे घेतलेली असणार. तेव्हा त्यांना स्वतःचा किमान चरितार्थ चालवायचा तर काही वाजवी 'सेवाशुल्क' घ्यावे लागणार. ('लोकप्रभे'त लिहीत असलेले सेवाभावी डॉ. कुळकर्णी व तत्सम उदाहरणे अपवाद आहेत, त्यांच्या ह्या चर्चेत विचार करणे इष्ट नाही). तर अगदी जुजबी उत्पन्न असलेला कोकणी माणूस हा खर्च कसा, व कितपत करू शकेल? अनेकांनी कोकणी प्रदेश किती खडतर आहे, त्यात फारशी पिके घेता येत नाहीत, वगैरे लिहीले आहे. हाच निकष लावायचा म्हटला तर फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया, नेपाळ ह्या देशांतील जनतेने काय म्हणावे? ऑस्ट्रेलिया तूर्तास सोडून देऊ. फिलीपीन्सचे उदाहरण घेऊ. द्वीपसमूहाचा बनलेला, नैसर्गिक आपत्यांना सदैव तोंड देत झगडणारा हा देश. पण तेथील अनेकानेक पुरूष व प्रामुख्याने स्त्रिया परदेशांत मोलमजूरी करतात, व भरपूर पैसा देशात धाडतात. मी रहातो त्या, आग्नेय आशियातील एका शहरातच सुमारे २ लाख फिलीपिना घरांघरांतून मोलकरणींची कामे करतात. आमच्या जवळच्याच अशाच एक दोन शहरांतूनही त्या अशाच संखेने आहेत, तसेच त्यांतील अनेक दुबाई व मध्य पूर्वेच्या अनेक शहरांतूनही हीच कामे करत आहेत. ह्यांचे काम पाहून घ्यावे! अत्यंत सुबक, नीटनेटके, तत्पर काम त्या करतात. त्यामुळे त्यांना परदेशात ह्या कामांसाठी मागणी असते. नेपाळ्यांचे असेच. आपल्या तुलनेने बराच मागासलेला हा देश. पण येथील जनताही आमच्या व आजूबाजूच्या शहरांतून रेस्टॉरंट्समधे कामे करतांना आढळून येतात. सेवातत्पर, हसतमुख, व कार्यक्षम असल्याने त्यांना येथे मागणी आहे. तर प्रश्न हा, कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत? संधि उपलब्ध नाहीत, हे सरळ उत्तर थोडे फसवे आहे. कारण मग केरळीयांना अशा संध्या परदेशात, आणी उत्तर भारतीयांना सर्व भारतभर त्या कश्या उपलब्ध होतात? आणि कामे करण्याची, कामे शिकून पुढे जाण्याची मानसिकता मुळात असावयास पाहिजे. मुंबईचेच उदाहरण घेऊ यात. कोकणी माणूस इथे इतरांच्या अगोदर बहुसंख्येने दाखल झाला, तो बहुतेक सर्वच्या सर्व कापड गिरण्यात कामे करण्यासाठी. तो बर्‍याच अंशी तेच करत राहिला, त्यातून त्याला राजकारणात अत्यंत रस, व स्वतःच्या हक्कांविषयी नको तितकी जागरूकता. तेव्हा तो संप करीत राहिला, सर्वाथाने होता तिथेच राहिला. शेवटचा 'संप' तर त्याने अजून मागे घेतलेला नाही. त्यात तो मुंबईबाहेर फेकला गेला. त्या तुलनेने मागाहून मुंबईत आलेले माथाडी कामगार पहा, मावळातून आलेले डबेवाले पाहा. कोकणी आंब्याच्या संदर्भात मला एक प्रश्न नेहमी पडत आलेला आहे. ह्या आंब्यात खराब होण्याचे प्रमाण, इतर प्रांतांतून आलेल्या आंब्यांच्या तुललेने बरेच जास्त वाटते. आमच्या येथे थायलंड, ऑस्ट्रेलिया येथून आंबा येतो. त्यात इतके रिजेक्षन असत नाही. आपला कोकणी आंबा चवीस ह्या सार्‍या आंब्यांच्या अनेक पटींनी मधूर आहे. पण त्यात रिजेक्षन रेट बराच जास्त आहे. असे का असावे? पॅकेजिंगचा परिणाम? का मालच तसा, इतर आंब्यांच्या तुलनेत पटकन खरब होणारा, जास्त 'सेन्सेटिव्ह'? तसे आहे तर मग त्यावर उपाय का शोधले जात नाहीत? शेतीशिवाय इतर उद्योगधंदे कोकणात का येऊ शकत नाहीत? टूरिझमबद्दलचा पैसा ह्यांनी मांडलेला आक्षेप मला, भारतीय संदर्भात मान्य आहे. (बाहेर टूरिझम आले तरीही जागेचे स्वत्व टिकवून ठेवता येते, बाली हे एक सुंदर उदाहरण. पण भारतात हे शक्य नाही, कारण बेधुन्द राजकारण्यांना कुठे थांबायचे हे समजत नसल्याने, एखाद्या ठिकाणात टूरिझम बेफाट वाढवून त्याची रया घालवण्याचे कार्य ते तत्परतेने करतात. गोव्याचे उदाहरण आपल्यापूढे आहेच). असो. लेखिकेने चर्चाविषय चांगल्या रीतिने सादर केला आहे, चर्चाही भावनाविवश न होता व्हावी.
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Fri, 04/13/2012 - 21:11

In reply to माझे मत by प्रदीप

Permalink

आवडला.

प्रदीप प्रतिसाद आवडला. असंच काही या लेखाचं शीर्षक वाचून लिहणार होते. पण लेखिकेने एकदम पाल्यापाचोळ्याचा कचरा केला म्हणून नाही लिहीलं. केवळ वैद्यकीय सेवेतच नव्हे तरशिक्षक,अधिकारी,पर्यटन या सर्वच क्षेत्रात आमच्या अल्पसंतुष्ट वृत्तीने ईतर लोकांची संया वाढवली आहे आणि आम्ही 'हे साले घाटी कोकनाची वाट लावतंत' अशा शिव्या देत आहोत तिथेच. कोंकणात इंडस्ट्र्या नकोत, पर्यटनाधारीत धंदे नकोत मग तुमचा विकास व्हावा म्हणुन काय पाहिजे? माझ्या घरात राहाणारे सारे भाडेकरू कुणि पूण्याचे तर कुणी पार गुजरातचे. बांधकाम,खाणककरी, फोटो स्टुडियो असे धंदे करून लाखोंनी कमावून गेले पण गावातल्या कुणाला चार महिने भातशेती आणि नंतर किरकोळ भाजीपाला याशिवाय दुसरे काही करावेसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 04/13/2012 - 22:03

In reply to आवडला. by साती

Permalink

प्रदिपयांचा प्रतिसाद

प्रदिपयांचा प्रतिसाद आवडला. पण साती अग सगळेच शेती सोडुन इतर उद्योगाला लागले तर आम्ही कोंबड्या आणि मासेच किती खायच्या म्हणतो मी? (खर तर माझी याला काही हरकत नाही) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 04/13/2012 - 20:09

Permalink

मध्य पूर्वेत..

कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत? मध्य पूर्वेतील देशांपैकी मस्कतमध्ये मी गेली ३१ वर्षे रहात आहे. पर्यटन निमित्ताने दुबाई, शारजा, अबुधाबी, बाहरेन इत्यादी शहरांना भेटी दिल्या आहेत. इथे, उपहारगृह आणि कापड, जोडे आणि सरसाधारण वस्तूंच्या दुकानांमधून कोकणी माणूस मी आल्या दिवसा पासून पाहतो आहे. ८१ साली आलो तेंव्हा, बाजारात, मराठी भाषा ऐकू यायची ती ह्या लोकांच्या तोंडूनच. १२ -१२ तास नोकरी/व्यवसाय करणारी ही जमात आहे. फिलीपिनो सुद्धा आहेत. सर्वच नाहीत पण, बहुसंख्य फिलीपिनो स्त्रीया अनैतिक व्यवसायात आहेत. घरगड्यांची कामे करता करता इतर 'कमाई'कडे आकर्षित होतात. त्यांच्या संस्कृतीत ह्यात गैर मानीत नाहीत असे ऐकले आहे. फिलीपिनो स्त्रीयांच्या खालोखाल श्रीलंकन स्त्रीया ह्या व्यवसायात आहेत.आपल्या कोकणी स्त्रीयांचे असे काही उद्योग नाहीत. जे कोकणी आहेत ते पुरुष कर्मचारी आहेत. कष्टकरी आहेत. त्यांची कुटुंब इथे असली तरी ती गृहीणी पदावर संतुष्ट आहेत. इतर 'कमाई'चा प्रश्नच उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 04/13/2012 - 20:25

In reply to मध्य पूर्वेत.. by प्रभाकर पेठकर

Permalink

मध्यपूर्वेचा अनुभव

तिथे कोकणी अनेक वर्षांपासून आहेत हे वाचून आनंद झाला. पण त्यांची संख्या किती आहे? 'विदा' ह्या अर्थाने हे विचारत नाही, तर ज्याप्रमाणे फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात, ज्यातून त्या बर्‍यापैकी पैसा मायदेशात पाठवू शकतात, त्यांच्या तुलनेत कोकणी माणसे कितपत असावीत, असा अंदाज यावा म्हणून विचारतोय. त्यांची संख्या बर्‍यापैकी असल्यास ते बराच पैसा कोकणात पाठवत असावेत, व त्यातून तिथे थोडीफार सुबत्ता दिसावी. तसे प्रत्यक्ष आहे असे वाटत नाही. म्हणून विचारतोय. तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे? आग्नेय आशियातील अनेक मोठ्या शहरांतून फिलीपिना अत्यंत निगुतीने मोलकरणीची कामे करत आहेत. अल्पशा शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. आमच्या येथे श्रीलंकन स्त्रीयाही बर्‍याच प्रमाणात मोलकरणीची कामे करीत असतात. त्यांपैकी फाश्या कुणी शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत असे पाहण्यात आलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 04/13/2012 - 20:49

In reply to मध्यपूर्वेचा अनुभव by प्रदीप

Permalink

कुठे कमी कुठे जास्त...

फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात. फिलीपिनोंपेक्षा कोंकणी कितीतरी जास्त असावेत असे दिसते आहे. चिपळूण, रत्नागिरी, खेड इथले रहिवाशी जास्त आहेत. खेडच्या तर जवळ जवळ प्रत्येक घरातील एक व्यक्ती आखातात आहे असे म्हंटले जायचे. ह्यातील अतिशयोक्ती (असल्यास) वगळता अनेक कोंकणी आखातात आहेत. मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे. तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे? केरळीय मजूर सर्वत्रच जास्त आहेत. उलट त्यांनीच आखातातील रोजगार मिळेल त्या रोजंदारीवर स्विकारून इतरांची कोंडी केली आहे. केरळात घरोघर जास्त मुलं आहेत आणि त्यांनी पैसे कमाऊन घरी पाठवले नाहीत तरी घरातील एक खायचे तोंड कमी झाले हिच वडिलांना मदत अशी विचारधारा आहे. केरळीय मजूर कधी कधी ५-६ वर्ष भारतात घराकडे परतत नाहीत. अशी परिस्थिती आहे. नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात. आपल्या मित्रांना, भावंडांना आखातात नोकर्‍या मिळवून देणे असे उद्योगही करतात. पण कोंकणी कामगारांच्या तुलनेत केरळीय कामगार जास्त आहेत ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 04/13/2012 - 21:00

In reply to कुठे कमी कुठे जास्त... by प्रभाकर पेठकर

Permalink

मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा

मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे.
कोकणी माणसे बर्‍याच संख्येने मध्य पूर्वेत आहेत हे तुमचे निरीक्षण आहे, ते मान्य करतो. पण त्यांच्या मिळकतीचा कोकणावर अगदी अल्प परिणाम दिसतो, ह्याचे आश्चर्य मात्र वाटतच राहील. केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले, (त्यातील काही मग देशोधडीलाही लागले, पण हे प्रमाण अल्प असावे), तिथे सुबत्ता आली. कोकण होता तसाच राहिला, असे सकृतदर्शनी दिसत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 04/14/2012 - 02:06

In reply to मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा by प्रदीप

Permalink

श्री. प्रदीप, केरळात तर

श्री. प्रदीप, केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले. माझ्या आधीच्या प्रतिसादात पुढील विधान आहे: (केरळीय माणसे) नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात. पैसा कमविण्यासाठी केरळीय माणूस काहीही करतो. ८२-८३ च्या काळात दुबाई मध्ये एक घटना घडल्याचे कानावर आले होते. एक केरळीय जोडपे टॅक्सीने चालले होते. टॅक्सी ड्रायव्हरही केरळीय होता. मागे बसलेल्या जोडप्यातील स्त्री, त्या माणसाची पत्नी, रडत होती. आणि तो माणूस, तिचा नवरा, तिला एका अरबाकडे एकदाच शेवटचे जायला विनवत होता. कशाला हे मी तुम्हाला सांगायलाच पाहीजे असे नाही. त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांचा संवाद ऐकला आणि संतापाने दोघांनाही आपल्या टॅक्सीतून खाली उतरवून त्या नवर्‍याला न भूतो न भविष्यती अशा शिव्या घातल्या आणि टॅक्सी घेऊन निघून गेला. सगळे केरळीय असे आहेत असे मला म्हणायचे नाही पण अनैतिक, बेकायदेशीर कामे करायला ते मागे-पुढे पाहात नाहीत. साध्यात साध्या डुप्लीकेट सीडीज विकण्यापासून ते वरील (३० वर्षात) एकदाच ऐकलेल्या घटने पर्यंत काहीही करून पैसा कमवितात. कोकणी माणसांचे नांव ह्या प्रकारांमध्ये कानावर येत नाही. त्यामुळे त्यांच्या हाती पैसा कमी असतो. ते सुद्धा उरलेल्या पैशातून गावच्या घराची डागडुजी करतात, जमीनीचा तुकडा विकत घेतात. पण केरळीयांपेक्षा त्यांच्या हाती पैसा बराच कमी असतो. सज्जन आणि सरळमार्गी केरळीयही बरेच आहेत माझ्या पाहण्यात/ओळखित. तसेच, मोठे उद्योजकही आहेत. साधा इंजिनियर म्हणून आलेल्या केरळीय माणसाने स्वतःच्या कंपन्या चालू करून भरपूर माया कमविली आहे. तसे उदाहरण कोकणी माणसांमध्ये कुठे दिसत नाही हे सत्य आहे. बिचारे कष्टकरी म्हणून आले आणि कष्टकरीच राहिले. पुन्हा कमी उत्पन्नात संतुष्ट राहिले पण गैरमार्गाने माया कमविली नाही आणि उद्योजक म्हणूनही पुढे आले नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनिल पाटकर on Fri, 04/13/2012 - 23:01

Permalink

.मला वाटतं आपला निष्कर्ष योग्य नाही

कोकणी माणूस आळशी आणि अस्वच्छ आहे या आपल्या मताशी मी सहमत नाही .कोकणातील भातशेती यासाठी वारेमाप मेहनत करावी लागते. बहरलेली वाडी, आंबे हे सर्व एका वर्षात उभे राहिलेले नाही.कोकणात गेल्या काही वर्षात विकसित होणारे पर्यटन कोकणी माणसाच्या आळशीपणामुळे नक्किच नाही.आपल्या वृद्ध आईवडीलांना गावी ठेवून मुंबईत कष्टाची भाकरी खात गावी मनीआँर्डर पाठविणारा कोकणी आळशी कसा काय ? .राहिला प्रश्न स्वच्छतेचा ...ती तर व्यक्तीनिहय असते, तरी पण सुंदर सारवलेले अंगण ,,नियमीत स्नान करून होणारी देवपूजा....मला वाटतं आपला निष्कर्ष योग्य नाही
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 04/14/2012 - 08:07

Permalink

फुटकळ वादावरुन चर्चा

फुटकळ वादावरुन चर्चा माहितीपुर्ण आणि अर्थशास्त्रीय मुद्यांकडे वळविल्याबद्दल श्री.प्रदीप यांना धन्यवाद. पेठकर काकांचेही प्रतिसाद माहितीपुर्ण.
  • Log in or register to post comments

Submitted by रघुनाथ.केरकर on Sat, 04/14/2012 - 22:38

Permalink

कोकणातील माणूस हा अतिक्शय

असा ह्या तुमचा वैयक्ती क मत अस्सात....... कोक्णात ह्या असाच चल्ता असा काय नाय..... आम्चे झिल्गे सुधा आता फुद्ड्ला शिक्शान घेवन बिजिनिस करुक लाग्लेय्त. रव्ता रवली गोश्ट घरा फुड्ल्या कचर्याची..... ता काय सगळ्यान कडेच नसता... माजो कोकण आळ्शी नाय आसा.... वायच जरा हात तोक्डे पडतत केवा तरी......
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 04/15/2012 - 21:25

Permalink

आजच मी कोकणातून मुम्बईला आलो.

आजच मी कोकणातून मुम्बईला आलो. माझेही गाव भालवली जवळच आहे. मला मात्र भालवलि गाव आवडला. मी ही माझे घर साफ केले काल. आजुबाजुचा परिसर साफ करताना कम्बर मोडली हो. वाट्ते तितके हे काम सोपे नाहि आहे हो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com