Skip to main content

भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी बुधवार, 15/02/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली. ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे.. पण ह्याच कंपन्या अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?(उदाहरणार्थ "MATLAB",ANSYS,PSpice). कि या कंपन्या फक्त "support" देण्याचे काम करीत आहेत...मला माहित आहे कि बँकिंग क्ष्रेतात काही भारतीय कंपनी अग्रेसर आहेत मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत??? मिपा वर बरेच "IT" मधील बरीच तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत असे माहित आहे म्हणून योग्य उत्तराच्या अपेक्षेत.... :) ह्या लेखाने मला IT and non IT हा वाद मला बिलकुल काढायचा नाहीये.... ;)

वाचने 44649
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

सगळ्या गाड्या व्यवस्थित रूळावरून धावत आहेत. क्या बात ?

काही काळापूर्वी Los Angeles मधील श्री. पुराणिक यांच्याशी भेट झाली. सदर गृहस्थ IBM मधे Cosumer Marketing/IT Development विभागाचे प्रमुख आहेत. ते IBM च्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी outsourcing चे काम बघतात. त्यांच्याशी बोलताना वरील विषयातील त्यांची कळकळ अक्षरशः जाणवत होती. त्यांच्या मते भारतीय आयटी कंपन्यांची उदासीन वृत्ती हे यामागचे एकमेव कारण आहे. Development साठी पूरक शिक्षणपद्धती तयार करणे आणि संशोधनासाठी पैसा ओतणे या दोन मार्गांनीच सुरुवात होऊ शकते. याबाबतीत त्यांनी अझीम प्रेमजी, एन्.एस राघवन(Infosys), रवी पंडित (KPIT) अशा दिग्गजांशी चर्चा केल्याचे सांगितले पण त्यातून त्यांचे एकच मत बनले की Service Industry मधून मिळणारा अफाट पैसा अशा मार्गाने गुंतवायला कोणतीही कंपनी तयार नाही त्यामुळे परदेशातून पाठवल्या जाणार्‍या maintainence project वर काम करणे याल पर्याय नाही........ :(

अतिशय सुदृढ व निकोप चर्चा वाचुन ब-याच गोष्टी कळाल्या, माझा आयटि क्षेत्रावर राग आहे कारण आम्ही शाळा कॉलेजातुन बाहेत पडलो १९९६-९९ च्या काळाअत, या आयटि क्षेत्रानं माझे खुप चांगले मित्र मैत्रिणी तोडुन नेले. आणि आज ही ते सगळे पैशानी श्रीमंत आहेत हा राग नाही पण या पैशानं आमची मैत्री तोडली याचं वाईट वाटतंय.

In reply to by ५० फक्त

नीटसे कळले नाही पन्नास राव. जी मैत्री पैशाने तुटते ती चांगली होती हे फारसे पटले नाही. मुद्दा तुम्ही नीट मांडला नाहीत कदाचित.

अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ? ........................................................................... मुळात अभियंत्रीकी कारखान्याची सरकारने का वाट लावली हा प्रष्ण महत्वाचा आहे.. त्या मुळे "निर्माण करण्याचे "कौशल्य असलेले कुशल कामगार निर्माण होत नाहित.. सा~या वस्तुसाठी आज आपण व जग चिन वर अवलंबुन आहोत.. खर तर भारतात ति क्षमता होति.. पण आता बस चुकली.... शोप फ्लोअर वर -१० तास उभा राहुन काम करणा~या इंजीनिअरला किंमत नाहि.. पण त्याच ईजीनिअरने एखादा सोफ्ट वेअर चा कोर्स केला कि ए.सी त बसुन महिन्याला ६ आकडी पगार.. हा खरा प्रष्ण आहे.. तरुणांची कष्टाची सवय मोडली "softwares" वाल्यांनी... 'पृथ्वी ही भगवान विष्णुच्या शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे', अण्णाभाऊ साठे

In reply to by अविनाशकुलकर्णी

प्रोग्रॅमिंग साठी कष्ट अन कौशल्य लागत नाही काय? की प्रोग्रॅमिंगचा कोड एसी च्या व्हेंट मधुन टपा टपा खाली पडतो ?

In reply to by अविनाशकुलकर्णी

अभियांत्रिकी उद्योगाची भारतात वाट लागली आहे असे तुम्हाला का वाटते? भारतातील जी.एम.आर /जी.व्ही.के या सारख्या EPC कंपन्या कोणत्या गोष्टीत कमी आहेत? आज जी.एम.आर ग्रुपने बांधलेले दिल्ली/हैद्राबाद विमानतळावरील टर्मिनल किंवा जी.व्ही.के ग्रुपने बांधलेले बंगलोर विमानतळावरील टर्मिनल आंतरराष्ट्रीय निकषांवर कुठे कमी पडेल असे वाटत नाही. इस्तंबूलमधील विमानतळाच्या modernization चे काम जी.एम्.आर ग्रुपने आधीच पूर्ण केले आहे. तसेच ब्राझील्/स्पेनमधील विमानतळांसाठी पण तो ग्रुप मध्यंतरी आपल्या निविदा सादर करत होता. १९८० च्या सुमारास मारूती उद्योगबरोबर collaboration करावे यासाठी सुझुकी उद्योगाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. पण आज भारतीय वाहन उद्योगातील टाटा कंपनी जाग्वारसारखी युरोपीयन कंपनी विकत घेऊ शकते. महिन्द्राचे ट्रॅक्टर्स अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात. अडानी, जी.व्ही.के सारख्या कंपन्या इतर देशांमध्ये खाणी विकत घेण्याची पात्रता ठेवतात. अशी इतर अनेक उदाहरणे देता येतील. भारतीय अभियांत्रिकी कंपन्या आपला ठसा जगात उद्योगाची वाट लागलेली असताना कशा उमटवू शकतील?

आपल्याकडे "श्रमप्रतिष्ठा" हा अस्पृश्य विचार आहे. त्यास कोणीच शिवत नाही. तथाकथित उच्चदर्जाची कामं (व्हाईट / येलोकॉलर) करणारे लोक प्रतिष्ठीत आणि इतर सगळे, "वाले" वाले लोकं शेलक्या दर्जाची कामं करतात एक विचार वाचलेला

कोण आय टी वाले आणि कोण इतर ते समजले. चेर्चा उदबोधक होत चालली आहे. पाय कसा मोडायचा (अक्षराचा) ते कोणी सांगावे.

ही चर्चा वाचून एक सुचले तसे इथे मांडत आहे. यातले गुण-दोष वगैरेवर मी फारसा विचार केला नाहीये. आयटी कंपन्यांमधून कितीतरी मनुष्यबळ बेंचवर (पक्षी फुकट जाणारे मॅन-अवर्स) असतात. मान्य कि काही लोक अनऑफिशिअली काही प्रोजेक्ट्सवर वापरले जातात. पण बाकीच्या लोकांना पगार देऊन बिनकामाचे पोसावे लागते. नुसते बेंचवर माश्या मारत बसवण्यापेक्षा छोटी छोटी मॉड्युल्स बनवण्यासाठी वापरले तर चालणार नाही का? उदा. एखादे मॅथेमॅटीकल सॉफ्टवेअर डोळ्यापुढे ठेवा. बेंचमार्क सॉफ्टवेअरः मॅटलॅब. आणि करा एक एक मॉड्युल. मॅट्रिक्स अ‍ॅडिशन, मल्टीप्लिकेशन वगैरेचे कोड तर नुकतेच इंजिनीअर झालेले लोक पण बनवू शकतात. त्यात हळूहळू सुधारणा करत गेल्यास ३-४ वर्षातच एखादे चांगले सॉफ्टवेअर डेव्हलप का होणार नाही? घेतलेल्या लोकांचे स्किलसेट वाढेलच, शिवाय कंपनीला काही रेवेन्युपण तयार होऊ शकेल.

In reply to by कुंदन

ही कल्पना चांगली आहे. मोठ्या भारतिय आय टी कंपन्या अशा प्रकारचे काही बनवतही असतात. प्रॉड्कट्स नव्हे पण पोर्टल्स,साईटस वगैरे व त्याचा उपयोग कस्टमर मिळवण्यासाठीही केला जातो. पण मॅटलॅब म्हणजे पॅकेज सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी फक्त programming skills पुरेशी असतात का? विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.( I T च्या भाषेत domain knowledge असलेला). अशा प्रकारच्या सॉफ्ट्वेयरवर काम केलेले कुणी आहे का?

In reply to by चिरोटा

विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.
हा मुद्दा मी पुर्वीही सांगितला आहे, तो इथे

सोकाजी रावांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे, मी आयटीतील ३ र्‍या पिढीचा,म्हणजे आउट सोर्सिंगचा पिक अनुभवणार्‍या पिढीतील. माझ्या मते आपण डिजिटल स्लेव्हरी मध्ये आहोत आणि या स्लेव्हरीतुन जर बाहेर पडायचे असेल तर जश्या अमेरिकन कंपन्या इकोसिस्टिम तयार करतात त्याच तोडीचे किंवा त्याहुन सरस इकोस्टिम आपण बनवली पाहिजे होती ! [ उदा. हिंदुस्थानातील स्मार्टफोनची जवळपास ९७% बाजारपेठ ही अँड्रोइड ओएसवर आहे म्हणजेच गुगल ही इकोसिस्टिम पूर्णपणे नियंत्रित करते. ] या ३ पिढ्यांच्या काळात भारतीय आयटी कंपन्यांनी बक्कळ नफा मिळवला आहे परंतु या क्षेत्रात असुन त्यांनी राष्ट्रासाठी तसेच येणार्‍या आयटी जनरेशनसाठी त्यांनी विचार केला नाही. @ बिरुटेसर 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' असं आयटीत आहे म्हणे. आयटी हा महासागर आहे, फक्त प्रोग्रॅमिंग म्हणजे आयटी नाही आणि प्रोग्रॅमिंग करायला देखील डोक लागतच ! आयटीतील सर्वात क्रिटिकल भाग म्हणजे ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क ! ट्रबल शुटिंग म्हणजे माहित नसलेल्या आणि अचानक उप्तन्न झालेल्या समस्येवर / त्रुटी वर कमीत कमी वेळेत अचूक सोल्युशन देणे. या सोल्युशन देण्यावर क्लायंटचा बिझनेस इंपॅक्ट अवलंबुन असतो... सोल्युशन देण्यास जितका उशिर तितका क्लायंटला तोटा अधिक त्यामुळे क्लायंट कडुन ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क वर सर्वात अधिक दबाव निर्माण केला जातो आणि कंपनीच्या टिमकडुन अर्थातच टिमवर. ट्रबल शुटिंग करणारा कन्सल्टंट हा मल्टिटास्किंग करतो, म्हणजे एकाच वेळी तो, चॅटवर क्यायंटशी, त्याच्या मॅनेजरशी बोलत असतो, फोनवर कॉल घेत असतो, मेल ला रिप्लाय देत असतो आणि मुख्य म्हणजे ज्या सिस्टिम मध्ये इश्यू निर्माण झालेला असतो त्या सिस्टिम चे ट्रबल शुटिंग देखील करत असतो... हे सर्व करताना तो प्रचंड ताणात असतो, हे सर्व करताना तो त्याच्या मेंदूवर प्रचंड ताण देतो ज्याच्या परिणाम स्वरुप इश्यू चे सोल्यूशन मिळवले जाते. [ हे काम २४ x ७ चालते. ] शिफ्ट मध्ये काम करणारे कर्मचारी यात सगळ्यात जास्त भरडले जातात कारण ते शरिराच्या नैसर्गिक वेळेच्या विरुद्ध काम करतात. याचे परिणाम हे पुढे आयुष्यभर सहन देखील करावे लागतात / लागू शकतात. साधारण ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क करणारा व्यक्ती मल्टिटास्किंग मध्ये चँपियन झालेला असतो... मल्टिटास्किंग म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देउन काम करणे याचा दुसरा अर्थ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करणे ! थोडक्यात तुम्ही डिस्ट्रॅक्शन प्रॅक्टिस करता, रोज, अनेक महिने , अनेक वर्ष ! जी गोष्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करता त्यात तुम्ही तरबेज बनता हा गुणधर्म आहे, त्यामुळे साधारण १०+ वर्ष मध्ये या प्रोफाइल मध्ये घालवलेली लोक त्यांची लक्ष केंद्रीत करायची क्षमताच गमावून बसतात आणि नविन तंत्रज्ञान शिकण्यास ते असमर्थ ठरतात.अश्या अनेक गोष्टी आयटीच्या महासागरात आहेत, प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video