Skip to main content

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 27/01/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्‍या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.' आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..?? राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल. ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!! -- काँमॅ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16429
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही काही प्रतिक्रिया वाचून खरंच मौज वाटली. सचिन, राहूल आणि लक्ष्मण हे संघावरती भार झालेले असून, ते फॉर्म मध्ये नसताना देखील केवळ वरिष्ठ म्हणून त्यांना सहन करावे लागत आहे असा काहीसा सुर ह्या प्रतिक्रियांमध्ये दिसला. पण मुळात परिस्थीती अशी आहे का ? क्रिकेटकडे खेळ म्हणून बघणे हा झाला आपला सामान्य रसीकांचा दृष्टीकोन. मात्र बोर्ड आणि आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? आज निव्वळ सचिन संघात नाही म्हणून मॅच न बघणारे अनेक लोक मला माहिती आहेत. हे खेळाडू खेळत नसून त्यांना खेळवले जात आहे हे आपल्या लक्षात कधी येणार ? सर्व संघानी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात आपला तुल्यबळ संघच पाठवायला हवा, हा आयसीसीचा पहिला नियम आहे. त्यामुळे तर काही काळापूर्वी दुबळा संघ सचिनच्या हाताखाली राष्ट्रकुलला आणि तुल्यबळ संघ ट्राय सिरीज खेळायला रवाना झाला होता. गंमतीचे उदाहरण सांगतो. गेल्या २ वर्षात आगरकर, झहिर खान पासून अनेक भारतीय संघात खेळणारे किंवा पदार्पण करणारे खेळाडू पुण्यात विविध सामन्यांसाठी येऊन गेले. आगरकर रणजीसाठी तर झहिर बहूदा ऑईल कंपन्यांच्या सामन्यासाठी येऊन गेला. ह्या खेळाडूंना बघायला ५० प्रेक्षक देखील हजर नव्हते. आणि जेंव्हा सचिनचा मुलगा अर्जुन शालेय सामन्यासांठी पुण्यात आला तेंव्हा त्याला बघायला २५० च्या वर लोकांची गर्दी. ह्याला म्हणतात नाममहात्म्य. उद्या कोहलीच्या कर्णधारपदाखीला त्रिमुर्ती,सेहवाग, धोनी ह्यांना वगळून संघ पाठवला तर किती लोक पहाटे उठून सामना बघतील ? किती प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील ? आणि मुख्य म्हणजे ह्या संघाच्या सामन्यांना कोण प्रायोजक आपले पैसे लावेल ? दोन वर्षापूर्वीच्या आयपीएलला सचिन शेवटी एकदाचा फिट घोषीत होऊन खेळायला येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना काय गर्दी होत होती ? सचिन आल्यावर तिच गर्दी किती वाढली ? प्रत्यक्ष तुम्हीच घेतलेला हा अनुभव आहेत. शेवटी रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? मुद्यात दम आहे. ठाण्याला, युवीची फलंदाजी आणि युवीला जवळून बघायला मिळावे म्हणून ऐववेळी आयपीएलच्या तिकिटासाठी केलेला खटाटोप आणि धावपळ आठवली. -दिलीप बिरुटे

सेंच्युरी नाही म्हणून सचिनला घरी बसवा ... महाराष्ट्राची प्रगती नाही म्हणून सी एम ना घरी बसवा.. जनलोकपाल नाही म्हणून अण्णांना म्हणून घरी बसवा.. ( मंदाकिनी , भन्नाट पूर्ण न के ल्याबद्दल परा ला घरी बसवा) बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?

In reply to by कपिलमुनी

बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?>>> तु कंपनीत असताना मिसळपाव उघडुन बसतोस, तुलाही घरी बसवता येईल! ;)

१२० कोटींतल्या ११ना , २ कोटींतल्या ११ कडून हरताना पाहून एक मिपाकर म्हणून मान शरमेने खाली गेली.

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा.. हम्म, सहमत आहे. आवडता विषय काथ्याकुटायला घेतल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे (ऑष्ट्रेलियात चव गेल्याने नाराज असलेला)

चवकशीच्या कुठल्या अ‍ॅक्टान्वये हा धागा काढला आहे हे धाग्याच्या सुरुवातीलाच (किंवा मध्ये, किंवा शेवटी, किंवा कुठेही) स्पष्ट न केल्याने सदर धाग्याला फाट्यावर मारण्यात आलेले आहे. बाकी ररा पुरेसे बोलले आहेतच. आणि त्यांच्या प्रतिसादातूनही काही कळले नसेल, तर काहीही कळण्यापलिकडे गेल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गप्प रहायचे ठरवण्यात आले आहे. पराषेटना 'डायरीदान' या नावाने लेखमाला सुरु करण्याची विनंती! --असुर

---- मुळीच घरी बसवू नये. क्रिकेट सारख्या मोठया खेळात हरण्याच्या अश्या छोट्या छोट्या घटना होतच असतात. त्याचं काय मोठं मनाला लावून घ्यायचं? अश्या छोट्या घटनांमुळे आपण त्यांनाच काय, कोणालाही घरी बसवू नये.

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.
१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.
अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.
१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता! २. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

In reply to by प्रशांत उदय मनोहर

सुनीलसोबत कपीलचं नाव पाहून आश्चर्य वाटलं. कपीलची निवृत्ती लांबली. इतकी, की सचिनची आत्ताची कामगिरी परवडली, अशी कपीलची स्थिती झाली होती. तो हॅडलीचा विक्रम एकदाचा पार झाला आणि मग अनेकांनी हुश्श केलं होतं. निवृत्तीबाबत अलीकडच्या काळातला सर्वाधिक हुशार खेळाडू सुनीलच. अगदी अनपेक्षीतपणे त्याने निवृत्तीची घोषणा केली. :)

In reply to by प्रशांत उदय मनोहर

>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. =) ) =) ) =) ) =) ) =) ) लेखामागची परिस्थिती काय जब्बरदस्त टिपलीय. खपलो हे वाचून..

In reply to by यकु

>>>>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. बहुदा या वाक्याचा कॉपीराईट छोटा डॉन कडे आहे. :-D

In reply to by मोदक

आम्ही इतरांची वाक्ये चोरत नाही.

In reply to by प्रशांत उदय मनोहर

ते तर तुमचेच वाक्य आहे... उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका. http://www.misalpav.com/node/19879#comment-355215 आमची मेमरी थोडी गंडली असावी. :-)

सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. लबर एक. प्रशांतराव दंडवत घ्या आमचा. :) -दिलीप बिरुटे

उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. - कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?

In reply to by ५० फक्त

कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?
ते ठीक आहे हो! पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्‍याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला. बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)

अनेक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने अती क्रिकेट भारतीय जनतेच्या आणी खेळाडूंच्या माथी मारले आहे. त्यात आय पी एल ह्या व्यावसायिक स्पर्धेची भर पडली .त्यात तर सामन्यांचा रतीब असतो. पूर्वी सचिनने २० २० देशासाठी खेळायचे टाळले होते. पण आता तोही'' दुनिया हिला देंगे'' म्हणत ह्या सर्कशीत दाखल झाला आहे. आपले खेळाडू एक तर प्रचंड थकलेले आहेत किंवा दुखापती लपवून खेळत आहेत. भारतीय संघाबद्दल म्हटले तर कुंबळे गेल्यावर एकहाती गोलंदाजीची धुरा वाहणारा एकही पर्याय उपलब्ध नाहीं आहे. जहीर दुखापतीने त्रस्त बाकीचे आयाराम ,गयाराम आहेत. क्रिकेट सामने गोलंदाज जिंकून देतात. परदेशात ८ सामने सलग हरणे कुणालाच मान्य होणार नाहीं. कणेकरांचे एक वाक्य आठवले . एकदा कपिल देव पाकिस्तान विरुद्ध हरल्यावर म्हणाला होता '' हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार'' त्यावर ते म्हणतात '' हे आम्हालादेखील कळते, पण हरणारा संघ नेहमी आपलाच का असतो. ता .क आता आय पी एल ५ चे बिगुल वाजले आहे. त्यात पाटा खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी पहायला सज्ज होऊया.

क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन बीसीसीआय समोर सपशेल लोटांगण घातले नसते, आणी WADA ची नियमावली बंधनकारक केली असती तर ८०% क्रिकेटपटू डोप टेस्ट मधे फेल होऊन घरीच बसले असते.

आणखी काही दिवसात एक दिवसीय श्रुंखला सुरु होईल, त्यात सचिन तेन्डुलकर आपले १००वे शतक काढेल, भारत २-३ सामने जिंकेल. सर्वजण आपापल्या घरी सुखाने नांदू लागतील. हेही दिवस जातील !

क्रिकेटमध्ये लक्ष घालणे कमी केल्यापासून डोक्याला होणारा किती ताप आणि अन्यथा फुकट गेलेला किती वेळ मी वाचवत आहे याचाच विचार करत आहे कालपासून या धाग्यावरील गरमागरम चर्चा वाचून.

छान माहितीपूर्ण चर्चा. सर्वांच्या मताचा आदर आहेच..! :) बाय द वे, आज ऑस्ट्रेलियाने ४-० अशी मालिका जिंकली आणि आपण आपला परदेशातला सलगच्या ८ व्या पराभवाचा विश्वविक्रम नोंदवला! सचिन, द्रविड आणि लक्ष्मणसह सर्व धुरंधर खेळाडूंचा विजय असो..! :)

In reply to by कॉमन मॅन

झोपलेल्याला उठवता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. ;) शेंचुरी मारुनच दम खाणार बघा तुम्ही. यांना घ्यारे (भारतीय संघाच्या) आत. =))

क्रिकेट ११ लोकाचा खेळ आहे.तो जितका ताकतीने खेळता येतो त्याबरोबर डोक्याचावापर करुन देखिल खेळावे लागते.सचिन,द्रविड किंवा लक्ष्मण ह्यांच्यावर टिका करण्याअगोदर त्याची जागा भरुन काढणार्‍या ३ खेळाडुंची नावे तरी दे बाबा इथे.देवाने हात व मालकानी मिसळपाव उपलब्द करुन दिले म्हणुन काहीबाही लिहणे बंद कर. लेका सचिन किंवा इतराना म्हातारे म्हनण्यापेक्षा दिवसभर एकाद्या मैदानावर नुसते चालुन तरी दाखव मग तुझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दुर होईल.

In reply to by वेताळ

लेका सचिन किंवा इतराना म्हातारे म्हनण्यापेक्षा दिवसभर एकाद्या मैदानावर नुसते चालुन तरी दाखव मग तुझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दुर होईल.
आम्ही मैदानात चालण्या, न चालण्यामुळे सचिन आणि इतर खेळाडूंच्या परदेशात सलग ८ वेळा तोंडावर आपटण्याच्या नाकर्तेपणाचे समर्थन कसे होऊ शकते हे समजले नाही.
देवाने हात व मालकानी मिसळपाव उपलब्द करुन दिले म्हणुन काहीबाही लिहणे बंद कर.
मानणार नसलो तरी आपल्या मौलिक सुचनेचा आम्ही आदर करतो.. धन्यवाद.

पण त्याला म्हातारा किंवा त्याने घरी बसावे हे सांगण्याची आपली योग्यता आहे का ते तपासुन पहावे.सचिनने कधीच स्वःताचे गोडवे गायले नाहित किंवा कधीच कुणावर टिका केलेली नाही. त्याला प्रत्येकवेळी टारगेट करणे हे चुकीचेच आहे.त्याने किती पैसे मिळवावे हे ठरवणारे तुम्ही कोण? बरे अजुन सचिनने पैसे मिळवताना देखिल काही नियम पाळले आहेत. तो कधीच मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे कमावत नाही.तो फिट नसताना सहसा खेळत नाही.नावे ठेवताना जरा विचार करावा. बाकी काही नाही.

In reply to by वेताळ

सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक आहे.
असे आम्ही कुठेच म्हटलेले नाही. त्याचा पूर्वीचा खेळ पाहता तो आमचा निश्चितच एक आवडता फलंदाज आहे.
पण त्याला म्हातारा किंवा त्याने घरी बसावे हे सांगण्याची आपली योग्यता आहे का ते तपासुन पहावे.
अशी योग्यता आवश्यकच आहे असे आम्ही मानत नाही. अर्थात, आपल्या मताचा आदर आहेच!
सचिनने कधीच स्वःताचे गोडवे गायले नाहित किंवा कधीच कुणावर टिका केलेली नाही.
त्याच्या व्यक्तिगत गुणांबद्दल आम्ही कुठेच शंका घेतलेली नाही.
त्याला प्रत्येकवेळी टारगेट करणे हे चुकीचेच आहे.
आम्ही त्याला आमच्या आठवणीप्रमाणे सदरहू धाग्यात प्रथमच टार्गेट केलेले आहे. 'प्रत्येकवेळी' हा शब्द वापरण्यापूर्वी आम्ही सचिनला टार्गेट केल्याची अन्य काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
त्याने किती पैसे मिळवावे हे ठरवणारे तुम्ही कोण?
आम्ही निश्चितच कुणी नाही. परंतु आयपीएलसारख्या सामन्यांमधून स्वत:चा लिलाव करून घेण्याऐवजी देशाकरता उत्तम खेळून भरपूर पैसे अगदी अवश्य मिळवावेत असे आम्हाला केवळ सचिनच नव्हे तर भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूबाबत वाटते.
बरे अजुन सचिनने पैसे मिळवताना देखिल काही नियम पाळले आहेत. तो कधीच मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे कमावत नाही.
मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे मिळवणे अथवा न मिळवणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते. सचिन जर तसे पैसे मिळवत नसेल तर तो त्याचा गुण नसून व्यक्तिगत निर्णय आहे असे आम्हाला वाटते.
तो फिट नसताना सहसा खेळत नाही.
ते अपेक्षितच आहे. किंबहुना तेच अपेक्षित आहे!
नावे ठेवताना जरा विचार करावा.
विचार करूनच नावे ठेवली आहेत. त्याच्याबद्दल आदर आहे आणि म्हणूनच त्यानं स्वत:चं अधिक हसं करून न घेता सन्मानाने घरी बसावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. वेताळजी, या निमित्ताने चर्चा करून आम्हाला आमचे मुद्दे मांडण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद..

आता त्ये पल्डे नि ह्ये बरळल्ये आशी आपल्या द्येशाच्यी ष्टाईलच हाय ! आ ! आता त्येला कोन काय करनार ? आरं पॉंटिंगला बी घरी बशिवा आसं म्हणत व्होतेयेच की. मुद्दा काय हाये जो ख्याळ करतो न्ह्व्व्ह त्येला बराबर समाजतं आपुन संपलो किइ न्हाई ? नुस्त्या गप्पा काय कामाच्या ?

काही नाही. सचिनच्या नुसत्या नावावर नुसत्या धांग्याच्यापण सेंच्युरा होतात हे दाखवण्यापुरती 'शंभरी' भरवतोय.

इंडियन वॉल ला आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे वगैरेचा साक्षात्कार झाला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. [संदर्भ] आता राहीला सच्याचा आणि लक्ष्मणचा प्रश्न तर बांग्लादेशाबरोबर एखादा दौरा आयोजित करुन सच्याचे महाशतक होऊ द्यावे, म्हणजे सच्या आता खूप खेळलोय असे म्हणून विश्रांती घेत राहील आणि नव्यांना संधी मिळेल. लक्ष्मनचा काही प्रश्न नाही, त्याला आता विश्रांतीच आहे. -दिलीप बिरुटे