जळली तृणके गिरी बोडके
वणवा बिन बोभाटा
कशाच उरल्या तशाच अजुनी
पायखुणांच्या वाटा
काजळ तनभर माळशिरावर
त्यात विखुरलेल्या लाटा
पोत धुळीचे अधिक उजळले
शेष न एकहि काटा
या वळणावर उभा एक मी
निरखित लामण रेषा
काळावरती उठून दिसल्या
विरलेल्या विधिलेशा
.......................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1335
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा व्वा अज्ञातजी
विं.दा करंदिकर आठवले , खुप
नेहमी प्रमाणेच उत्तम कविता.
उत्तम
सर्वांचे आभार आणि नवीन