Skip to main content

अखेर

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 22/11/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1743
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

शब्दात प्रतिक्रीया नोंदवायला तुमच्या कविते एवढीच प्रगल्भता आणी प्रतिभाही लागेल...ती माझेपाशी नाही. आपल्या ह्या काव्यांजलीस विनम्र अभिवादन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अगदी असेच म्हणायला आलो होतो!! अआ. माझ्या भावनांना शब्द दिल्याबद्दल आपले आभार!!

(समृद्धी, प्रगतीचा हा शाप म्हणायचा की वास्तविकता ?) अतिशय सुंदर कविता !

ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... आता शक्यच नाही .

अगदी मनातून खोलवरून आल्यासारखे वाटले. एवढी सुंदर कविता वाचावयास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राघव