Skip to main content

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ?

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 24/08/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे, "मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अ‍ॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत. नथुरामने गांधीजींचा नाही तर गांधीवादाचा खून केला सॉरी सॉरी हत्या केली, सॉरी सॉरी वध केला वगैरे विधाने मिपावर चमकत असत. गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले वगैरे विषयांना १०० प्रतिसाद हमखास असल्याने आजही अशा विषयांची आठवण होते. कालपर्यंत अहिंसेने प्रश्न सुटणार नाहीत म्हणणारे, गांधींना आणि गांधीवादाला भंपक म्हणणारे त्यांच्यापैकीच काहीजण आज अतिशय प्रेमाने दुसर्‍या गांधीवाद्याबद्दल लेख टाकत आहेत. उपोषणापूर्वी राजघाटावर जाऊन चिंतन करणार्‍या या नेत्याच्या सेवाव्रताला सलाम ठोकत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत, उपासाने त्यांच्या क्षीण होणार्‍या प्रकृतीची काळजी करत आहेत. भ्रष्टाचारावर अण्णांचा तोडगाच प्रभावी असल्याचे छातीठोक सांगत आहेत. अण्णांचा मार्ग हाच खरा मार्ग हे पटवून देण्याची अहमिका लागली आहे. उजवे-डावे सर्व एकत्र होऊन अण्णा विरोधकांचा समाचार घेत आहेत. गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.
  • मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
  • अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
  • आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
  • की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?

वाचने 16608
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by श्रावण मोडक

लोकांच्यात काड्या सारायला! ;) काडीरंग

की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
बरोबर. (हा धागा कौल असायला हवा होता)

एव्हढं कशाला डोकेफोड करुन घ्यायची? एका वाक्यात उत्तर देता येईल. मिपा हे समाजाच्या एका सरमिसळलेल्या मोठ्या भागाचे प्रतिबिंब आहे, आणि समाज ही एक गुंतागुंतीची चीज आहे. शिंपल! अवांतरः एकुणातच, पडलेले प्रश्न हे हितचिंतेमधून पडले असावेत काय?

In reply to by धमाल मुलगा

सहमत आहे. मिपा मोठ्या समाजाचे प्रतिबिंब आहे :) मोठ्या समाजात डावे, उजवे, अतिरेकी छुपे देशद्रोही हे सगळे येणारच .. अंमळ टाईमपास करायचा असेन तेव्हा वाचेन इतर प्रतिक्रिया सविस्तर.

In reply to by आनंदयात्री

इतर प्रतिक्रिया सविस्तर. हे देखील सध्याच्या प्रवाहाला अनुसरून लिहीण्याची पद्धत आहे का? पळा मारतंय आता. ;)

काही का असेना. काँग्रेसवाल्यांनाच आता गांधीवाद/दी नडतोय याचाच आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. ;-)

ह्म्म्म.... माझ्या टाळक्यातले इचार :--- गांधीवादी असो वा सावरकरवादी देशाचे काही तरी भले झाले पाहिजे असा विचार टाळक्यात का नसावा ? व्यक्ती विरोध आणि व्यक्तीच्या विचारांना विरोध या दोन गोष्टी आहेत... प्रत्येकाचे प्रत्येक विचार पटायलाच हवे असे नाहीत्,तसेच त्या व्यक्तीचे काही विचार पटायलाही हरकत नसावी... अण्णा भगतसिंग आणि राजगुरु यांना विसरु नका असे देखील त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत... अण्णा स्वतः गांधीवादी असुन त्यांनी ही नावे घेतली आहेत. असो... जाता जाता :--- सध्या आंदोलन शांतता मार्गाने चालु आहे, परंतु असामाजिक तत्व अशाच संधीच्या शोधात असतात ! उद्या जर या स्थितीचा फायदा घेउन कोणी हिंसाचार सुरु केला तर तो थांबवणे महाकठिण जाईल... परिस्थीती चिघळण्याच्या आधीच तोडगा निघायला हवा असे वाटते आहे. अण्णांची सध्याची प्रकॄती पाहुन काळजी वाटते आहे. कालाय तस्मे नमः !

थोडा फरक आहे, थोडा नाही. अण्णा हजारे आंदोलनाबाबत एका धाग्यात अभय बंगांनी* केलेल्या विश्लेषणाबाबत (ते पटले म्हणून) माझी आणि अन्य दोन-तीन सदस्यांची मते आली. अभय बंग यांनी बिनायक सेन* यांच्याबाबतही असेच काही विश्लेषण केले होते. सरकारचे आणि कोर्टाचे चुकल्याचे म्हटले होते. (अभय बंग या बाबतीत स्वतःशी सुसंगत आहेत.) परंतु त्या बाबतीतले विश्लेषण मिसळपावावर अनेकांनी एक तर ऐकले नव्हते, नाहीतर न पटूनही बंगांबाबतच्या आदरामुळे बिनायक सेन विरोधी मत असलेल्या लोकांनी सरसकट दुर्लक्षिले होते. अण्णा हजारे आंदोलनानंतरच्या पुढल्या विषयात गांधीवाद/घटना-अधिकार्‍यांचे सार्वभौमत्व वगैरे सगळ्या बाबतीत लोक पुनर्विचार करतील. वेगवेगळे लोक पुन्हा वेगवेगळी मते मूलभूत तत्त्वे म्हणून मांडतील. आणि वयोमानानुसार आणि जुन्या ओळखीनुसार तर फरक आहेच. दोन-तीन वर्षांचे जालीय वय म्हणजे जुने-जाणतेपणच होय. कित्येक जुन्या-जाणत्या लोकांचे एकामेकांत तावातावाने "तात्त्विक" भांडून झाले आहे. आता त्यांच्या आपापसातल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांत थोडीफार सबूर दिसून येते. - - - (*वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे. मला पटणारी प्रथा आहे.)

In reply to by धनंजय

वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे म्हणून बंगांना डॉ. बंग म्हणू नये या व्यतिरिक्त असणारा वरील प्रतिसाद मला कोणीतरी मराठीत भाषांतरित करून द्यावा. अनुवादही चालेल. शक्य असल्यास चर्चेशी त्याचा संबंधही सांगावा. मंडळ आभारी असेल. ;)

In reply to by प्रियाली

म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.
आणि प्रा. डॉनी? ;) असो. डॉक्टरांचं कळलं पण बाकी प्रतिसादाचा अर्थ कळला नाही असं म्हणायचं होतं.

In reply to by प्रियाली

प्रस्तावातील प्रश्न : मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत? प्रतिसादातील उत्तर "थोडा फरक आहे, थोडा नाही." राजेश घासकडवी यांनी गेल्या दोन-तीन वर्षांतली काही परिवर्तने नमूद केली आहेत. त्याला जोड म्हणून मी हे नमूद केले आहे की जुने-जाणते पूर्वी तितक्या अटीतटीने एकमेकांच्या विरोधातले मुद्दे मांडत नसावेत. (म्हणजे थोडा फरक झाला.) हे वातकुक्कुट होणे नव्हे. विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही. (म्हणजे थोडा फरक नाही.) प्रस्तावातील प्रश्न : अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे? मिसळपावावरील बर्‍याच चर्चांत उपोषणाचा उल्लेख सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र, घटनात्मक लोकशाही वगैरे प्रक्रियेला ब्लॅकमेल करण्याचे तंत्र वगैरे, अशा प्रकारे वाद झालेले आहेत. याबाबतीत अण्णा हजारे प्रकरणात उपोषणासारख्या "घटनाबाह्य" दबावतंत्राचे समर्थन करण्यासाठी अभय बंग यांची मुलाखत दाखला म्हणून दिली गेली. माझा मुद्दा आहे, की "घटनाबाह्य वैयक्तिकरीत्या शांततामय दबावतंत्राचे" महत्त्व हे मिसळपावावरती अगदी हल्लीच, बिनायक सेन प्रकरणात सर्वमान्य नव्हते. अभय बंगांचे बिनायक सेन यांना समर्थन आहे, ही बाब लक्षणीय आहे. मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे, असे माझे स्पष्टीकरण आहे. प्रस्तावातील प्रश्न : आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत? नाही. कुठल्या राजकीय गन्तव्यांना समर्थन देऊ याबाबत बहुतेक मिसळपाव सदस्यांचे मत स्थिर आहे. वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्या गन्तव्याच्या समर्थनात असले, तेव्हा त्यांचे महत्त्व समजून येणे, मात्र वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्यावेगळ्या गन्तव्याच्या समर्थनात असल्यास त्यांचा धोका समजणे : हे वातकुक्कुट नसून स्थैर्य आहे. प्रस्तावातील प्रश्न : की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे? हा प्रश्न अलंकारिक वाटतो, उत्तर अपेक्षित नसावे :-)

In reply to by धनंजय

विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही.
हे लक्षात आले आहेच. पूर्ण मतपरिवर्तन न होणे धोकादायक वाटते. तो संधीसाधूपणाही असू शकेल.
मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे
शक्य आहे.

"मिपा गांधीवादी बनते आहे का ?" या प्रश्नाचे अनेक अर्थ असू शकतात. मिपाचे चालक गांधीवादी बनलेत का ? मिपाचे प्रशासकीय अधिकारी तसे बनले आहेत का ? मिपाचे अधिकाधिक सभासद गांधीवादी बनलेत का ? मिपाचे सर्व सभासद गांधीवादी बनलेत का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या मते "नाही" अशीच आहेत. एकंदर मिपावर - आणि अन्य संस्थळांवर देशकालसंदर्भातल्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब पडताना दिसते. वर्तमानकालीन परिस्थितीमधे अण्णा हजारे या गांधीवादी व्यक्तीच्या आंदोलनाचा प्रभाव भारतीयांच्या मनावर आहे हे उघड आहे. याचंच प्रतिबिंब इथे पडताना दिसतंय, इतकंच. उद्या कुठल्या अन्य स्वरूपाच्या विचारसरणीतल्या व्यक्ती/घटना ठळक बातम्यांमधे यायला लागल्या तर तशा स्वरूपाच्या चर्चा उद्भवतील.

In reply to by मुक्तसुनीत

अण्णांचा प्रभाव पडणे याच्याशीच संबंधित आहे हा विषय. जर मला स्मगर्लस पसंत नसतील तर मला दाउद पसंत नसेल आणि वीरप्पनही पसंत नसेल पण एखाद्याला गांधी पसंत नसतील तर त्यांना अण्णा पसंत का असावेत? जर गांधींच्या उपोषणाने आणि उपासाने देशाचे प्रश्न सुटले नाहीत, सुटणार नसतील तर अण्णांना पाठिंबा का बरे? :)

In reply to by प्रियाली

अहो उद्या कदाचित "दाऊदभाई जरा जपा" इतपत येतील धागे. म्हणजे काही पाठिंबा नव्हे ! :)

काही असो, मिपावर जास्तीत जास्त वातकुक्कुट (आणि वातकुक्कुट्या!!) असाव्यात असं आम्हाला नेहमीच वाटतं... आमच्या सागुतीसाठी उपयोगी पडतात हो! -राक्षस ऑफ पाताळविजयम् ;)

In reply to by पिवळा डांबिस

आधी कोंबडी की आधी अंडं या प्रश्नाइतकाच कठीण प्रश्न प्रियालीला पडलाय खरा... पण पिडांकडे याचंही उत्तर आहे... ;)

In reply to by पैसा

प्रश्न कठीण नाही पण उत्तर किती कठीण आहे ते कळतंय. ;) आम्हाला वातकुक्कुटच आवडतात. कोंबडी या स्त्रीलिंगी सतत अत्याचार झाल्याने वातकुक्कुटींना बाजूला ठेवावे आणि वातकुक्कुटाचीच सागुती करावी. आमंत्रण द्यायला विसरू नका.

In reply to by प्रियाली

"ही पाकृ अंडी न घालता करावी" आणि रासवट खिचडीला जसे खिचडा म्हणण्यात येते, तसंच वातकुक्कुटाच्या सागुतीला सागुती न म्हणता "तो सागुता" म्हणण्यात यावे अशी उपसूचना मांडण्यात येत आहे.

साम्यं आहे पण त्याचा अन गांधीवादाचा फार संबंध नाही असं आमचं मत आहे. आता आम्हाला अजून मोठं व्हायचं आहे त्यामुळे आमच्या मताला कीती महत्त्व द्यायचं ते मोठ्यांनीच ठरवावे (आणि मोठे नसल्याने कसंही असलं तरी आमचं मत आम्ही देणारचं) गांधींमुळे देशाचं आणि पर्यायाने प्रत्येक भारतीयाचं (म्हणजे 'माझं') मोठं नुकसान झालं असा एक समज बर्‍याच लोकांमध्ये दिसतो. तद्वतच, ह्या भ्रष्टाचारामुळे देशाचं अन (पर्यायाने 'माझं') फार नुकसान होत आहे (मग आम्ही लायसन काढायाला स्वखुशीने १०० च्या नोटा देत असलो तरी) असा पक्का समज जनमानसात आहे असे दिसते. साम्य हे की, गांधीविरोधी मते प्रकट करून किंवा त्या विरोधात (जमेल तितका) सक्रीय सहभाग घेऊन आपण आपले देशप्रेम व्यक्त करतो आहोत असे मान'सीक' समाधान लोकांना लाभत असावे. तसेच (रोजच्या भ्रष्टाचाराला मदत करत असूनही) या अण्णांच्या लढ्याला समर्थन दिल्याने आपण देशासाठी काहीतरी करत आहोत (आणि भ्रष्टाचाराला हातभार लावल्याच्या पापाचे क्षालन करीत आहोत) असे लोकांना वाटत असावे असे आमचे मत झाले आहे. खरं तर सामान्य माणूस समर्थन देताना प्रत्येक वेळी माझे समर्थन कोणत्या 'वादाला' आहे याची काळजी करत असेल असे आम्हाला वाटतच नाही. 'वरलीया रंगाला' भूलून्/प्रेरीत होऊन तो समर्थन करत असतो. दूरगामी परिणामाची चिंता विचारवंत/जंत इत्यादींनी करावी असे त्याने गृहीतच धरलेले असावे. असो.

आजचे आंदोलन गांधीवादी आहे कि नाही हा मुद्दा बाजूला ठेउन गांधींबद्द्ल थोडेसे ... गाधींना बोलण्याआधी अवीनाश धर्माधीकार्यांचा आवाज जरुर ऐकावा. http://www.esnips.com/web/MahatmaGandhi-AvinashDharmadhikari