Skip to main content

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 29/06/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. १. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात...... .....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते. नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण - याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते. आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे. ८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे. ९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील. १०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात. ११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही. भाग ६ समाप्त. पुढे चालू.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15608
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे पहा पराशेठ, गेले बरेच दिवस पहातोय, तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात. सविताभाभीसारख्या देवीसमान पवित्र हिंदू स्त्रीबद्दल बोलताना पातळी सांभाळा, इतकंच म्हणतो. माझं नाव जाहीरपणे घेतलं म्हणून लिहिलं. नाहीतर शशिकांत ओकांच्या या लेखनावर प्रतिसाद द्यायची माझी काही टाप होती का?

In reply to by राजेश घासकडवी

तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात.
छ्या... ओकांच्या धाग्यावर लोकांना उचकावण्यासाठी वेगळे प्रयत्न कशाला? त्यांना तुम्हालाच उचकवायचं होतं. तुम्ही उगाचच उचकलात. ओकांच्या धाग्यावर घासूगुर्जींना प्रतिसाद द्यायला लावतोच, असं परा परवा म्हणत होता. ते असं खरं केलं त्यानं... छ्या... तुमचं काही जात नाही हो. पैज मी हरलो ना. कुठून भरू आता ती? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमचा टोन बदलल्याने आणि तुमचे चित्त पावन नसल्याने तसेच तुम्ही स्पॅनीश दिसत नसल्याने आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.
आमचा टोन कधीच बदलत नाही :) आमचे चित्तही पावन अन् पवित्र आहे.... ( तुमचे काय ते तपासून घ्या.) राहीला प्रश्न स्पॅनीश दिसण्याचा तसे आम्ही दिसण्याचा सुतराम संबंध नाही. आम्हाला न पाहताच आम्ही तसे दिसत नाही, असा कयास कम जावई शोध बरा लावलात :) असो आम्हि पक्के भारतिय दिसतो यात मात्र तीळमात्र शंका नाहि.
आणि हो उगा आमचा आणि सविताभाभीचा संबंध जोडू नये. घासुगुर्जींना राग येतो.
तुमचा आणि सविताभाभींचा संबंध जोडण्याचा प्रश्न आला कुठे? मी केवळ श्री.Nile यांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाला दाद दिली. अवांतर : 'त्या' धाग्यावरील प्रतिक्रियेतून बर्‍याच जणांना ते स्पॅनीश लोकांसारखे दिसत आहेत,असा भास झालेला दिसला आणि याचे त्यांना कोण कौतुक अन् अभिमान....हे पाहून मलाही भरुन आले.. :) . . . . . . . . . अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात (मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी) म्हणून मि काय स्वतःला पारशी समजत नाहि ब्वॉ... आणि स्पॅनीशही.. आम्ही आपले भारतियच भले ;) जयहिंद

In reply to by अजातशत्रु

अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात (मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी)
हिंदुस्थानातले पारशी लोक सर्वसाधारणतः (थोड्याशा वेगळ्या बाजाची का होईना, पण) गुजराती बोलतात, अशी ऐकीव माहिती होती. 'पारशी' भाषेबद्दल नव्यानेच ऐकले. असो.

In reply to by अजातशत्रु

अजातशत्रु, तुम्ही डॉक्यावर पडला आहात काय हो ? माझ्या प्रतिसादात मी अगदी व्यवस्थित श्री. निळ्या ह्यांचे वाक्य कॉपी पेस्ट करुन मग त्यानंतर माझा प्रतिसाद दिला आहे. त्याचा अर्थ मी तो प्रतिसाद श्री. निळ्या नालायक ह्यांनाउद्देशुन दिलेला आहे. थोडे निट वाचा, वाचलेले मेंदूपर्यंत जौन त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येउ द्या, मग त्यावर भाष्य करा ना :) दिसले पाचर की निघाले लगेच शेपूट घेउन :P

मित्रा,
ओकांना कॉर्नर करण्याचा ..
गेल्या काही वर्षापासून मिपाकरांनी हे माझ्याबाबत अनुभवलेले आहे. प्रयत्न झाले. पुढेही होतील... बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा.... अन्य ठिकाणी याला जास्त जोर आहे. 'मला वेळ नाही म्हणून नड रे - - ला, असे फुकाचा वेळ असलेला एक दुसऱ्याला सुचवतो. आडनावाचे विडंबन, ठक कि भ्रम अशा प्रतवारीत नाडीवाल्यासेनांना दोन्हीकडे टाकावे, परदेशी नियतकालिकातून त्यांनी जर नाडीला मान्यता दिली तर मग आम्ही पाहू. आदि वाचून मजा वाटली. साधे सोपे सरळ अनुभव घेण्याचे काम कसेही करून टाळणे हे मला नवीन नाही. आम्ही अनुभव घ्यायची गरज नाही. तर्कानेच आम्ही नाडीग्रंथांना उडवून लावतो. नाडीला प्रायमाफेसी केसच नाही असे म्हणणारे अनेक मान्यवर आहेत. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की ... असे लोक या पुढे नाडी ग्रंथांचा अनुभव घेण्यास पुढे आले व नाडीग्रंथांतील अदभूतता पटली तरी समाजात आपली प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून ते नाडीग्रंथांना दूषणे देत राहतात. असे मला पुर्वीच प्रत्ययाला आले आहे. नाडीग्रंथांतील लिपी व काव्यानंद घेण्याचा धागा गाजला. तेथे नाडीग्रंथांवरील लिखाणाचा बंदोबस्त करावा असा धागा निघाला. कालांतराने कोणाला 'शरण आलो' म्हणून तर कोणाला नाडीकथनाचे फोलपण सांगणारे आम्हीच मुर्ख ठरलो. म्हणून नाद सोडावा लागला. यात ओकांचे काहीही मोठेपण नाही. महर्षींच्या कार्याची फक्त झलक त्यांनी लोकांना सादर केली इतकेच. नाडीमहर्षींच्या कथनात येते की बुद्धीच्या वाटेने सामोरे जाऊ नकोस. हृदय-प्रेम भावनेने सामोरे जा व पहा.

In reply to by शशिकांत ओक

पण एक गोश्ट आवर्जून नमूद करतो...
बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा....
आपल्या लिखाणातून माझ्या मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.

In reply to by आत्मशून्य

मित्रा,
मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.
श्री. जी. ईश्वरनजींचा संपूर्ण लेख त्याच्यावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या बाबत कसे बुद्धीभ्रम करतात. शोध-अभ्यास करायची वरवर भाषा करून प्रत्यक्षात काही न करता कशी शेखी मिरवतात. नाडीकेंद्रात बसून ब्लँक ताडपट्यावर लेखन केले जाते म्हणून त्यात इच्छुक व्यक्तीचे नाव कोरलेले दिसते. ते ग्राहकाला दाखवले जाते असे विधान केले. मात्र तसे असेल तर केद्रातील हा खोटेपणा का उघड केला नाही याचे स्पष्टीकरण कै. मा.श्री. रिसबुडांसारख्या खऱ्या विचारकाला ते टरकावतात कि तुम्ही लेख नीट वाचलेला नाही म्हणून.... आता नाडीकेंद्राचे संचालक ईश्वरनजींनी अशा खोडसाळ आरोपांना ठणकाऊन काय काय म्हटले आहे ते आपण वाचत आहात. हा या लेखाचा गाभा आहे. आणखी काय काय भाष्य हवे..

In reply to by शशिकांत ओक

समजा आपण मूर्ती नसलेले मंदीर कीती सूंदर आहे यावर पाने खरडत आहात... काय उपयोग त्याचा जर मंदीराच्या आत मूर्तीच नाहीये ? त्याच प्रमाणे आपले लेख आणी त्याचा गाभा काहीही असो काय उपयोग त्या लेखनाचा जर मूलभूत शंका समाधान तूम्ही करत नाही ?

In reply to by शशिकांत ओक

गोडवे गायले गेले म्हणून मंदीर बघायला गेलो तर ... मूर्तीच नाहीये असा अनूभव आला... तेव्हां किती गोडवे गाणार मूर्ती नसलेल्या मंदीराचे ....? ठीक आहे ज्यांच्या आज्ञेने आपण काम करत आहात ते पटीने श्रेष्टच, खरतर तूलनेचा विचारच नाही... पण याचा अर्थ असा नाही की लोकांपूढे आपलंच घोड सतत दामटत रहायचं...... लोकांच्या प्रश्नांचे शंका समाधान करता येत नसेल तर गूरू आज्ञा पाळयला अजून जेकाही जास्त प्रयत्न करावे लागतील त्यात पूढाकार घ्या. उगीच लोकांची उत्सूकता जागी झालि अथवा तूमच्या लिखणावर शंका व्यक्त केल्या की त्याना हीकडे जा तिकडे .. हे माझ्या अखत्यारेत नाही, पैसा खर्च करावा लागेल अशी तोंडाला पाने नका पूसु... गूरूंचा मान राखावा.....

ओक साहेब! तुमच्या चिकाटिला सलाम!

In reply to by नावातकायआहे

क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.
अतिशय चुकीचा प्रतिसाद. असे सेल्समन वैयक्तिकरीत्या फोन करुन अथवा प्रत्यक्ष भेटुन त्यांचे काम करत असतात. ओक साहेबांनी कोणाच्याही खव मध्ये जाउन माझे लेख वाचा, किंवा फोन करुन माझे लेख वाचा अशी विनंती केलेली नाही. धाग्यासमोर लेखकाचे नाव दिसत असताना देखील धागा उघडायचा आणि वर लेखकालाच अशा शब्दात बोचकारायचे हे अत्यंत चुक आहे. संपादकांनी ह्याची त्वरित दखल घ्यावी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेट तुमच्याच शब्दांत, बोर्डावर नाचल्यानंतर लोकं शिट्या मारतात अशी तक्रार करू नये.

In reply to by मराठी_माणूस

पैसा फेको, तमाशा देखो*। ... तमाशा नाही आवडला तर शिव्या मिळणार, आवडला तर शिट्या! नाड्यांचा फक्त प्तरंगी तमाशाच आहे एवढंच काय ते गोष्टीचं सार. कोणातरी निबंधलेखक ढोंग्याला महर्षी म्हटलं म्हणून काय तो ज्ञानी माणूस थोडाच होणार? अगदी इसापनीती आणि पंचतंत्रातही असल्या प्रकारांच्या विरोधातल्या बोधकथा सापडतात. *मिपावर पैसा फेकावा लागत नाही, नाड्यांच्या तमाशासाठी फेकावा लागतो म्हणतात. मुद्दामच डिस्को दिवे लावले प्रतिसादात. लक्ष वेधून घ्यायला बरं पडतं.

पिवळा ... मित्रा,
मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे... तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे.... माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ झाला असेल तर.... कदाचित....मन बदललेले नसेल तर.... विचार करा. मग ठरवा.

रवीवारी सकाळी आपल्याशी फोनवर बोलणे झाले त्याप्रमाणे मी आपण सूचवलेल्या नाडीकेंद्रात एका मित्रासोबत गेलो होतो व त्यांना आपण माझी पट्टी मलाच का देत नाही हा प्र्श्न विचारला तर सूरूवातीला त्यांनी दूर्लक्ष केले, मी थोडा मूद्दा ताणून धरत पून्हा हाच प्रश्न विचारला तर त्यांचा चेहरा थोडासा कडवट भासून उत्तर आले की हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही. पण मी चीकाटी सोडली नाही व पून्हा चर्चेच्या योगात हाच प्रश्न केला की माझी पट्टी मला का देत नाहीत तर फक्त इतकेच सांगून संभाषण आटोपते घ्यावे लागले की पट्या त्यांना परत करायच्या असतात... आता सांगा बरे हा कोणाचा पराभव आहे ? अवांतर : प्रतीसादास प्रतीक्रीया न आल्याने पून्हा डिस्कोमोड मधे एडीट करत आहे.

In reply to by आत्मशून्य

आपण माझी पट्टी मलाच का देत नाही?
१. नाड्या ह्या पुरातन ऋषींनी लिहिलेल्या असल्याने तो अमुल्य ठेवा आहे. तो जतन करुन ठेवणे हा नाडीकेंद्रांचाच हक्क आहे. २. आणखी शेकडो वर्षांनी जेव्हा तुम्ही पुनर्जन्म घेउन ह्याच नाडी केंद्रावर पट्टी मागायला याल तेव्हा ती उपलब्ध असली पाहिजे. नाहीतर माझी पट्टीच मिळाली नाही म्हणून नाडी थोतांड असे लिहायला तुम्ही पुन्हा मोकळे. ३. पोपटाने तुमचे कार्ड काढून त्यातले भविष्य वाचून झाल्यावर ते कार्ड पुन्हा गट्ठ्यात जाते, त्यात तुमचे भविष्य आहे म्हणून तुम्हाला देउन टाकत नाहीत. तुम्ही तिथेही 'माझे कार्ड मला द्या' असा हट्ट धरता का? *ओकांना अजून हे कसे सुचले नाही?

मित्रा,
हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही.
पुर्वी हे लोक मला असेच दमवायचे. कल आना, करून - तर कधी हेडऑफिस से पुछकर बताएंगे । असे म्हणून कटवायचे. आपल्याला थोडासा मासला मिळाला इतकेच. असो. चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.

In reply to by शशिकांत ओक

चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.
तूम्हीच का उत्तर देत नाही ?

In reply to by Nile

उत्तराने बिंग फुटलं तर?
तर मग पोरी उठून येतील. (कळले नसल्यास झिम्मा खेळणार्‍या कोकणच्या राजाकडे पृच्छा करा.)

प्रतिसाद वर योग्य ठिकाणी हलवला आहे. येथून काढून टाकावा.

In reply to by पंगा

प्रतिसाद कसा काय हलवता येतो ? मला कधि जमले नाही. शिकवन्याचि क्रुपा करावी. अति अवांअरः लिहिलेले कळावे म्हनुन मुद्दाम ब्लॅक मधे लिहिलेले आहे.

माननीय ओक साहेब, आपण आज वर शेकडो वेळा नाडी केंद्रावर अनेक लो़कांच्या नाड्या काढवल्या आहेत, तरी त्यापैकी निदान काहींचे ऑडियो-व्हिडियो रेकॉर्डिंग मिपावर का टाकत नाही?

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त,
ऑडियो-व्हिडियो रेकॉर्डिंग मिपावर का टाकत नाही?
नाडी केंद्रावर जाऊन तेथील अनुभवाची सीडी वा ऑडिओ मिपाकरांपैकी टाकावी अशी मी मिपाकरांना विनती करतो. तेंव्हा आपण केंद्रावर वर्णी लाऊन ते काम करावे ही विनंती.