Skip to main content

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 27/06/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे. जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात. संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!! या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही. जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!! काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... आमेन!!!! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23043
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

In reply to by वाहीदा

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एवढे agitate अन annoy व्हायला काय झाले ? मला ज्यात सोईस्कर वाटेल त्यातच मी लिहणार ना भाऊ वाचायला त्रास होत आहे की आणखिन काही कारण असावे ?? राग राग का करतोस रे बाबा ?

In reply to by वाहीदा

आम्हाला लग्गेच खरे ठरवल्याबद्दल धन्यवाद. जल जल म्हणजे पाणी का मला पराबद्दल जळजळ वाटते अशी तुमची विनोदी समजूत झाली हे काही समजले नाही. बाकी प्रत्येक वेळेस "हा शेवटचा प्रतिसाद" म्हणून पुढचा प्रतिसाद देताच तर उगाच असं कशाला लिहायचं तेसुद्धा काही समजलं नाही.

In reply to by वाहीदा

जगजित सिंग यांनी गायलेली आहे,अर्थात ही नज्म या प्रकारात मोडते.माझी अतिशय लाडकी गझल आहे ही,आपण केलेलं विडंबन उत्तम आहे...आपको हमारा सलाम.

हे तर भारीच आहे की...... मुंबईमधल्या कंपू कार्यालयास भेट देण्याचा मनसुबा धरणारा - प्रास. अरे, कुणी जमात-ए-कंपू कार्यालयाचा मुंबईतला पत्ता देतं का रे पत्ता? भांडुपचाही चालेल ;-)

In reply to by प्रास

उशीरच केला की हो.. भांडूपातल्या कार्यालयाला कधीच टाळं लागलं. त्या भिंद्रनवालेला गजाआड केला की हो. आता ते केंद्र अंमळ नव्या मुंबईकडं सरकलंय अशी खबर आहे. :)

काहींनी आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या आहेत, मि तरी आजच पाहीलेय त्यांना कंपूच्या आतले आणि बाहेरचे दोन्ही कडून मनसोक्त दाद मिळाली, (कोणत्याही कंपुत नसलेला)


जबरदस्त! हे थत्तेचाचांपेक्षा लई भारी झालंय. तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे. :)

In reply to by साती

तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे.
अगा बाब्बो... :)

मस्त! स्वाती

तुम्ही पि.डा. नांव का घेतले आहे ते. मजेशीर लिखाण. पण खरे प्रतिसाद वाचायला मिळाले नाहीत. नुसतं मेलो, खपलो यापलिकडचेही प्रतिसाद वाचायला आवडले असते.

हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा किंवा कंपूबाजीच अर्थ लावण्यासाठी उघडलेला नाही....अस तुमच म्हणण आहे,तर मग मी तुमच्याशी चर्चा थांबवतो...फक्त मिपाटवाळांमध्ये मधे एकिचं बळ आहे, हा युक्तिवाद तुंम्ही गांभीर्यानी तपासावा,अशी इच्छा मी या निमित्तानी व्यक्त करतो...मिपाटवाळांमधे अनेक कंपू पडलेले आहेत.आणी ते ऐतिहासिक काळापासुन एकमेकाला भडक भगवे, विचारजंती, संघिष्ट, हिरवे, कॉंग्रेसवाले आणि सर्वात वाईट म्हणजे संपादक म्हणुन झिडकारतात,भांडतात.जर तत्व खरी/प्रामाणिक असती तर असं झालं नसतं,हे तरी तुम्हाला पटावं,अशी आमची एक आपली इच्छा...(असं होईल अशी भविष्यवाणी जालिंदरगुरुजींनी पण वर्तवली होती)या अंतर्गत विषमतेची कारणं तुंम्ही तपासा...तुमच्या म्हणण्या प्रमाणे आंम्ही सर्व बिगर कंपूवाले, नवखे आयडी असंघटित/विभक्त आहोत,हे खर आहे.पण आज मिपावर सुद्धा (आणी एकंदरीत आंजावर) जेवढे लोक टवाळांमधे आले.त्यांच्यात आपापसात मतभेद नाही विषमता आहे.कारण ज्या तत्वांवरुन तुंम्ही ऐक्य करायला जाता,ती तत्वच विषमतावादी आहेत... लोक त्या तत्वांमुळे एक होत नाहित,तर भय/इहलौकिक फायदे हे नजरेसमोर ठेउन एक होतात...त्यामुळे हेतुची पुर्तता झाली,की आपापसात झगडे सुरु होतात...मिपावरील इतिहासात बहुतेक सर्व टवाळ कंपू नेहमी एकमेकांना संपवण्या साठी भांडणं करत आले,हे तर खर आहेच...त्याची दखल घ्या...आणी नीलकांत मिपाटवाळांना एकत्र आणु शकले नाहित हा काही त्यांचा दोष नव्हे...कुठल्याही सुधारकाला समाज स्वतःच्या आडमुठ्या /कर्मठ प्रव्रुत्तीमुळे दुर ढकलत असतो...हे त्या सुधारकाच अपयश नसुन त्या समाजाच दुर्दैव असत,हे तर उघड आहे...असो... आपण हे सर्व समजुन उमजुन घ्याल अशी,पुन्हा एकवार मी भाबडी आशा व्यक्त करुन ही चर्चा माझ्याकडुन थांबवतो... काव्यकीडा-लेखसेन...भरभर लिहितो मी कवनी आम्ही ''जन्मानी'' मिपाकर नसुन,मिपावर ''आमचा'' जन्म झालेला आहे....

In reply to by राजेश घासकडवी

विडंबन ठिकठाक केलत,पण तुंम्हाला विषयाचा अभ्यास असता तर ते फक्त भाषिक पातळीवरच राहिलं नसतं...अर्थात गंभीर विषयांचं विडंबन होऊ नये अश्या काही मताचा मी माणुस नाही...फक्त ते आशय गर्भ झालं असतं तर अजुन मजा आली असती... बाकी मी भरभर कवनी लिहिणारा आहे अस तुंम्ही व्यक्त केलच आहे,फक्त तुमच्या सारखी भगवी कफनी माझ्याकडे नाहीये...(बराबर वळीकलं का नाय मी?) ... ...लाजेश खास-आडवी.......मग कुठेही असोत ते ओटी किंवा पडवी...ह्ही ह्ही ह्ही....

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे आशयगर्भ वगैरे काय असतं, आपल्याला काय माहीत नाही ब्वॉ... आणि ते भगवी कफनीचं तर स्स्सूप्पकन् बाउन्सर गेलं. पण एक सांगावंसं वाटतं, फार टेन्शन घेऊ नका. अहो गमतीत चाललंय. मीही तसा तुमच्यासारखाच नवखा आहे इथे. आपल्यासारख्या नवख्यांनी एकमेकांशी भांडलं तर या कंपूबाजांसमोर आपला काय पाड लागणार? तेव्हा चिल.. आणि नावाच्या विडंबनाच्या बाबतीत काय बोलू? माझ्या नावाची प्रोफेशनल सही विडंबकाकडून शेकड्याने विडंबनं झालेली आहेत... त्यामुळे आल इज बेल. परा ग

In reply to by राजेश घासकडवी

तुमचं नवखेपण गेलं नाही का अजुनही. नव्या नवरीला सुद्धा आठवड्याच्या आत घरात कामाला सुरुवात करावी लागते.

In reply to by शिल्पा ब

अहो शिल्पावैनी, नीलकांतजींनी काय म्हटलं होतं? बहुतेक लोक मिपावर सदस्यत्व घेतल्यावर साताठ महिने घाबरत घाबरत वावरतात, वाचनच जास्त लेखन कमी असं करतात. त्यामुळे एक वर्षाच्या आसपास सदस्यत्व असलेले सगळे नवखेच. चांगली तीनेक वर्षं निर्ढावल्यावर तुम्ही जुने होता. तुमचा आयडी नंबर चार आकडी आहे ना? म्हणजे तुम्हीसुद्धा नवख्याच. हे तीन आकडी आणि दोन आकडी लोक खरे जुने, मुरब्बी, कंपूबाज... आता तुम्हाला हौसच असेल घरकाम करण्याची तर काय बोलू... म्हणवा स्वतःला जुन्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा पब्लिकनी उचलुन धरला की हे घासुगुर्जी आणि राडीयाबै लगेच येउन तो धागा हायजॅक करतात. ते नाही जमले तर धाग्याची खरडवही करतात. ह्या जुन्या सदस्यांना ताकिद मिळणे गरजेचे आहे. घंटानाद..सध्या मुक्काम परभणी

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>>घंटानाद..सध्या मुक्काम परभणी फु ट लो.... :) ए घंटा, आख्यान बंद केलं का? का तिथेपण घंटाच?

हे सारे काय होऊन राहीले आहे आपल्याला चेष्टा अजिबात सहन होत नाही, सारं कसं शिस्तीत, नियम पाळून व्हायला हवं हे आपले मत वात्रटपणाला एकदम विरोध आपला तर पोराहो आता दंगा एकदम बंद. चाचा कानपुरीया ( गोटा नर्मदेतला)

हॅ हॅ हॅ! - टिंग्या संस्थापक, लष्कर-ए-खरडा

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>संस्थापक, लष्कर-ए-खरडा ही पण एक टिंगीच (थाप) बरका !! ही संस्था अदिती, मनस्वी आणि अजुन काही अबलांना मैत्रीकिड्यापासुन मदत करण्यासाठी हेल्पलाईनच्या स्वरुपात आम्ही स्थापन केली होती. त्या काळाच्या गाजलेल्या खरडमोहिमांमध्ये श्री टिंगोजीराव खेडेकर यांचे कार्य वादातीत आहे पण त्यांचे संघटनेतील स्थान हे भाडोत्री अतिरेकी एवढेच होते हे नमूद् करु इच्छितो.

In reply to by आनंदयात्री

अदिती, मनस्वी या काही अबला काय ... चालू द्यात तुमचे पालथे धंदे, आंद्याशेठ! मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो अबला म्हणजे स्त्री. तुम्ही शालेय जीवनात समानार्थी शब्द तर नक्की पाठ केले असतील .. आठवा बरे. - आंदुत्सु >>मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो. मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता. - (नामानिराळा) आंद्यकांत

In reply to by आनंदयात्री

मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता.
याला म्हणतात ओढवून घेणे. मी बिझी असताना फोन करण्याबद्दल बोलत होते. असो. मनस्वी कुठे आहे अलिकडे? (लैच अवांतर झालं का, समजून घ्या हो मंडळी!)

In reply to by आनंदयात्री

क्काय? अबला आणि स्त्री हे समानार्थी शब्द आहेत? कॉम्प्लान प्या आणि मोठे व्हा. ;) मालक, यापैकी एक 'अबला' तिथंच आहे. मागाहून ती बला वाटली नाही म्हणजे मिळवली. ;)

In reply to by श्रावण मोडक

(न्यूली)मॅरीड लोकांना पब्लिक मध्ये असली विधानं करावी लागतात म्हणतात. ;-) पळा तिच्यायला...

In reply to by Nile

लग्न झालं असेल (किंवा नसतानाही तत्सम (या शब्दाचे वेगळे अर्थ माहिती करून घेण्याचा उपक्रम मी तरी केलेला नाही) तर तो पुरूष पब्लिकमध्ये कदापि स्त्रीचा अबला असा उल्लेख करणार नाही. जो करेल त्याला लगेचच ती सबला कशी असते याचा पुरावा क्लोज्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये त्याच्या बायकोकडूनच मिळतो म्हणतात. इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती (उरलेल्या काहींनी त्यावरून धडे घेऊन आपला मार्ग ठरवावा).

In reply to by श्रावण मोडक

इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती
बिकांच्या प्रतिक्रीयेची वाट पहात आहे. लपुन वारकर्ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रामो,नाईल्या आणि परा यांच्या अवांतर लेखनावर कारवाई होण्याची वाट पहात आहे. - सतत तक्रारकर्ते

In reply to by आनंदयात्री

मिपावर आवश्यक असलेल्या लेखनस्वातंत्र्याचे आम्ही किती पुरस्कर्ते आहोत हे माहिती असतांना सुद्धा तुम्ही आमच्याच धाग्यावर कारवाई होण्याची आशा बाळगतांना पाहून एक मिपाकर म्हणून आणि तुमचा एक पर्सनल मित्र म्हणून आम्हाला शरम वाटते...... त्यांना काय लिहायचं ते त्यांना लिहूद्यात, तुम्हाला काय लिहायचं ते तुम्ही मोकळेपणाने लिहा.... तुमच्या लेखनस्वातंत्र्याचाही मी पुरस्कर्ता आहे.... पण उगाच कारवाई वगैरे वशिल्याला यामध्ये आणू नका हो...... :(

In reply to by पिवळा डांबिस

येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो. :)

In reply to by श्रावण मोडक

>>येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो मोडकांचे पण काका !!! आता तुम्हीच ठरवा बॉ पिडाकाका ..

In reply to by आनंदयात्री

मोठ्यांचा आदर करतो आम्हीही... :)

In reply to by श्रावण मोडक

>>मोठ्यांचा आदर करतो आम्हीही... म्हणजे तुम्हाला मी भंपक वाटतो ? मी खरच तुमचा आदर करतो म्हणुन तुम्हाला आदरार्थी संबोधतो. मी भंपक नाही असे सिद्ध करायला काय करू ? अब्दुल कलामांविषयी अनादराने बोलु का ? परफेक्ट सोल्युशन .. ;)

In reply to by आनंदयात्री

अदितीच्या पराक्रमाचा विषय निघाला की पुण्यातली मिपाकर मंडळी हसण्यावारी नेतात कींवा उघड-उघड कमी लेखतात. परुत्सु.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुण्याबाहेरही जग आहे हो पराशेट. पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत. तुम्हाला गटाराच्या दोन बाजूला असे म्हणायचे आहे काय ?? असो, जिकडे छोट्याश्या टेकडीला (खरे तर पुटकुळी आहे ती) पर्वती म्हणू शकतात तिथे त्या नाल्याला प्रतिगंगा म्हणत नाहीत हेच खूप झाले.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टिंग्या संस्थापक, लष्कर-ए-खरडा अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! टिंगीतै खरडा फार खाल्ला तर विदर्भात एक व्याधी होते. याची नोंद ठेवा

सेंचुरी साठी शुभेच्छा :) बा.द् वे- टारु परत तडीपार का??

शंभरी भरण्यास मदत म्हणुन हा प्रतिसाद ;)

फार टवाळक्या नकोत बिन लादेन नाही पण मुल्ला ओमर येत आहे तो नाही तर आहेतच आपले....... जाऊदे दिवे घ्या -- तात्पर्य- अंधार खूप झाला पणती जपून ठेवा

चान चान पिडांकाका, एकदम बिनपाण्यानेच केली आहेत की मूळ धाग्याची! ;) (जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर

In reply to by चतुरंग

>>(जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर मी चुकून 'ज' ला काना वाचला आणि रंगाशेठची किती धुलाई होईल ह्या विचारानं खुर्चीतून सांडलो की. =))

:D क्यालिफोर्निया पीठासनाधिश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसमहाराज १००८ ह्यांच्या दिव्य प्रवचनाचा आज फारा दिवसांनी योग आला! कसं धन्य धन्य वाटलं बरं. :)
उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.
=)) =)) =)) इच्चिभनं....डायरेक्ट पिसंच काढली का? असो. हल्ली म्हणे हलाल-मुर्गा बारामतीकर स्थानबध्दतेत असतात आणि बंद ग्यालरीच्या कठड्याशी रेलून 'ने मजसि ने..परत भांडूपभूमीला...' असं गुणगुणत असतात अशी ऐकिव माहिती आहे. ;)
काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते.
सहमत आहे. डांबिसरावांनी जमात-ए-कंपू ची 'लष्कर-ए-खरडा' ही अतिरेकी कारवायांना वाहिलेली उपसंघटना जाणून बुजून दुर्लक्षित केली आहे काय असा प्रश्न पडला. ;) -मागीन भत्ते.
अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.
ह्या कार्याने प्रभावित होऊन पुढील वर्षी डांबिसमहाराजांना जंतरमंतर येथे 'टवाळपाल' बीलाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे प्रमुखपद देण्याचे सरकंपूचालकांनी ठरवले आहे अशी बातमी आहे. -आनंदछत्री. छ्या:! काय राव डांबिसकाका, ते आपले जुने धंगे-धिंगाणे आठवून हल्ली आपण सगळे असे पुन्हा का करत नाही बरं ह्या विचारानं अंमळ हिरमुसलो राव.