देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे....
..............
" माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
चांगलं चाललंय... येऊ द्या अजून..
माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत.
चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले.
देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील.
'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :)
उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'.
नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले.
हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :(
ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.
हे नाही कळले बुवा. :?
मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D
असो, तुम्ही चालू द्यात...
मस्त लेख आहे.
मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते.
बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे.
"कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.
देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.
अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O
भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल.
(मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.)
अभिज्ञ. B)
आन्या,सखाराम गटणे
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!!
देवदत्त,
धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन.
राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला.
अभिज्ञ,
ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे.
http://sucheltas.blogspot.com
देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.
केशवराव,
मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन
कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात.
राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते.
ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात.
http://sucheltas.blogspot.com
राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.
गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी.
बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात.
नाना परींदा मधे आवडला होता.
हर तरहा की फिल्मोंका शौकिन,
सचीन जी
सचिनजी,
मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत.
राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं...
--------------------------
अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता.
http://sucheltas.blogspot.com
जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी.
नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)
इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?
प्रतिक्रिया
सही जा
देव आनंद
चांगलं
मस्त लेख
अव्वल नंबर
धन्यवाद
पटले नाही .
केशवराव, मी
राज-दिलीप-देव
हे ही पहा!
सचिनजी, मी
जुने चित्रपट