माझी तू त्याची होताना .. एक आठवण .. एक प्रवास...
सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना
मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?
एकाच वाटेचे पक्षी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?
माझ्या डोळ्यातील आसु अन
तुझ्या ओठांवरील हसु
यांचे साधर्म्य जाणताना
सांग ना सखे तुच आता
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?
सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?
--- शब्दमेघ ( डिसेंबर २००६ )
एक आठवण :
मी लिहिलेली माझी ही पहिलीच कविता .. (डिसेंबर, २००६) .. नेटवरतीच पहिल्यांदा कविता लिहायला सुरुवात केल्यानंतर सर्व प्रोत्साहन पर रिप्लाय देणार्या सर्व वाचकांमुळेच पुढचा प्रवास छान झाला ...
लेख आणि त्यातल्या त्यात कविता लिहिणे मला कधीच जमत नव्हते( लेख तर जमत नाहितच अजुन, हाच लेख कसा तरी लिहितोय)... आणि कधी जमेल हे स्वप्नातही वाटत नव्हते .. कारण मराठी मध्ये चक्क मी कायम काठावर पास होणारा मुलगा होतो.. अजुनही शुद्धलेखनाच्या भरमसाठ चुका होतच आहेत..
जून २००६ मध्ये मित्राने ऑर्कुट अकाँट ओपन करुन दिल्यावर ते कसे वापरायचे यामध्येच १-२ महिने निघुन गेले.. हळु हळु कम्युनिटी म्हणजे काय कळायला लागले आणि शब्दांच्या प्रवासास सुरुवात झाली.
डिसेंबर पर्यंत कविता फक्त वाचायचो .. रिप्लाय द्यायचो .. नेटवर बसण्याआधी फक्त एक कविता पाठ होती ती म्हणजे "कणा" .. यापलीकडे कवितेचे जग माझे तरी जास्त नव्हते ..
लोक कसे कविता करतात याचे खुप कोडे पडायचे मला ..
हळु हळु रिप्लाय देत देत शब्द जोडु लागलो होतो .. आणि विशेष म्हणजे शब्दांपेक्षा ही जास्त असे असंख्य मित्र त्यामध्ये जोडले गेले , बरेचसे जे आजही माझ्या सोबत आहेत .. आनंद त्या गोष्टीचा जास्त आहे ..
कविता लिहायला सुरुवात केल्यावर भेटलेले - नाम गुम जायेगा (सुनिल सामंत), राहुल देशपांडे , सनिल पांगे , संदिप सुरळे , सुधीर मुळीक, चैताली आहेर , विजय कणसे, स्व.अहं ब्रम्हास्मी या मित्रांकडुन लिहिण्यास खरेच खुप प्रोत्साहन मिळाले ..
माझ्या कवितेच्या प्रवासाचे खरे उगमदाते हेच आहेत..
कवितेच्या प्रोग्रॅम साठी जेंव्हा पहिल्यांदा पुण्यात गेलो होतो आणि घरी कळाले की गाणे-कविता च्या प्रोग्रॅमसाठी हा रात्री घरी आला नाही त्यावेळी आईची प्रतिक्रिया होती काय भिकारनाद लागलाय पोराला . असो ..
कविता लिहायला लागलो.. कविता वाचुन दाखवणे किण्वा मित्रांना ऐकविने हे जमत नसल्याने (अजुनही जमत नाहिच त्यामुळे मित्र जवळ राहिले आहेत असे मला वाटते .. त्यामुळे तुम्ही मित्र नसाल तर मैत्री करु शकता .. कवितेचे शब्द कधीच आयकायला मिळणार नाहि .. हा पण मित्र झाला तर शिव्या ऐकावव्या लागतात ती बात वेगळी) बर्याचश्या कविता तश्याच विस्मरणात जात होत्या.. आणि मग मला आनखिन एक सवय लागली ती डायरी मेंटेंन करायची ..
पहिली डायरी जेंव्हा माझ्या मित्र मैत्रीनींनी वाचली तेंव्हा मी ढापुन कविता करतो हेच त्यांचे माझ्याबद्दलचे मत होते ..
कारण मुळातच गावाकडची भाषा बोलणारा .. बर्यापैकी उद्धठ .. आणि दु:खाचे लवलेशही चेहर्यावर नसणारा एकुलता एक बिन्धास्त मुलगा असणारा मी आणि डायरीतील रडक्या, करुन कविता यांचा ताळमेळ असणे शक्यच नाही असे त्यांचे म्हणने होते ..
उलट नेटवरील असल्या धंद्याने तु गोत्यात येशील .. आणि नेटवरील मुली चाट करुन फसवतात तु नादि लागु नको .. भोळसाट आहे जरा तू .. असले बरेचसे डोस कायम पाजले जायचे.
"अशीच एक राधा" या स्त्री प्रोफाईल नावाने लिहिलेल्या स्त्रीच्या कवितेमुळे खुप वाद-संवाद झाले, कविता येथे दिल्याच आहेत त्या .. पण पुन्हा असा फेक प्रोफाईल घेवुन कविता लिहायचे नाही हे कळाले .. परंतु राधा म्हणुन ओळखणारे अजुनही त्याच प्रोफाईलने लिहिना असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा ही छान वाटते ..
आपले नाव खुप कॉमन आहे म्हणुन एखाद्या कवितेचे नाव आपल्या प्रोफाईल ला द्यायला पाहिजे असे सगळ्या मित्रांचे मत होते .. शेवटी संदिप ने "शब्दसखा - शब्द झाले मोती" आणि मी माझ्या शब्दमेघ या कवितेवरुन "शब्दमेघ" या नावाने लिहिण्यास सुरुवात केली ..
कविते मुळे आणिखि एक मार्ग मिळाला ..र अंधशाळेतल्या मुलांसाठी ब्रेल लीपीतील पहिल्या कविता प्रकाशित करता आल्या , "शरपंजरी या एक्त्रीत केलेल्या पुस्तका नंतर त्यांच्याच साठीच्या " ये ना तु सख्या" ह्या राहुल सरांच्या अल्बम साठी गाणे देता आले. हा पुर्ण अल्बम हा रंग .. आकारमान यांच्या व्यतिरिक्त आहे हे सांगितले तर कोणाला खरेच वाटत नाहि .. आणि विशेष म्हणजे ऑर्कुट वरती भेटलेलो आम्हा मित्रांचा एकत्र अल्बम निघाला (काही गाणी येथे ऐकता येतील - www.jayshreeganesha.blogspot.com
( झाडांच्या पानात - गणेशा, पिकल शिवार - संदिप , ये ना तु सख्या - चैताली, सावरतो आवरतो पाउस - राहुलसर)
आजकाल हा प्रवास मंदावला आहे , तरी मिसळपाव ने खुप छान मित्र मैत्रीणी दिले आहेतच पण विशेषकरुन प्रकाश सर , नगरीनिरंजन , पाषानभेद यांच्या कवितेमुळे लिहिण्यास प्रोत्साहन मिळते आणि बाकीच्यांच्या आपुलकीच्या शब्दांमुळे खुप छान वाटते .. हा प्रवास जरी मंद झाला असेन तरी नक्कीच काही दिवसात पुन्हा लिहिण्यास सुरुवात होयील आणि याचे श्रेय फक्त मिपाला असेन ..
थांबतो .. बरेच लिहायचे राहुन गेले .. बरेच मनात नसताना लिहिले गेले .. लेख जमत नाहि अजुनही तुम्हाला हा प्रवास बरा वाटला तर कळवा ..
-- गणेशा
वर्गीकरण
माझ्या डोळ्यातील आसु
In reply to माझ्या डोळ्यातील आसु by प्रकाश१११
धन्यावाद ...... तुम्ही वेळ
कविता आणि लेख दोन्ही छान आहे.
In reply to कविता आणि लेख दोन्ही छान आहे. by प्राजु
+१
कविता !!
In reply to कविता !! by सुहास..
शाहीर पाषाणभेद .. अशी
मस्त लिहिता गणेशा..असेच
तुम्हि मस्त लिहिता ! लिहित
कविता छान आहे . लिहित रहा.
प्रवास जरी मंदावला असला तरी. तो पुर्ण व्हावा ही सदिच्चा.
खूपच छान कविता आहे. मला कविता
सर्वांचे मनपुर्वक आभार
खूप छान!
जुन्या आठवणी जागवल्यास लेका
In reply to जुन्या आठवणी जागवल्यास लेका by कानडाऊ योगेशु
योग्या भाड्या .. काय मस्त
पहिलीच कविता छान लिहीलीस
In reply to पहिलीच कविता छान लिहीलीस by नगरीनिरंजन
धन्यवाद हो .. पहिल्या कवितेचा