Skip to main content

काश्मिर आणि लेह

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 10/08/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे. यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर. गेले काही दिवस काश्मिरमधील सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण त्याच बरोबर निसर्गानेही थैमान घातले आहे. नद्यांना मोठाले पूर आहेत, भुस्खलन मोठ्याप्रमाणावर चालु आहे, अतिवृष्टीने काश्मिरलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. मात्र ह्या भारतीय बांधवांचे नशीब त्यांच राज्यातील लेख/लडाख मधील नागरीकांसारखे नाही. त्यांच्यासोबत आहेत केवळ सैन्यदलाचे जवान. अगदी मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते कोणालाच काश्मिर विषयी काळजी वाटत नाही का? काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का? जर भारतीय जनता, भारत सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असेल आणि तरीही त्यांनी आम्ही भारताचा भाग आहोत म्हणावे अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य वाटते? पुन्हा नमुद करतो लेख लडाख किंवा इतर कुठेही दिलेली मदत हे योग्य पाऊल आहेच आहे. इथे ते उदा. घेतले कारण फरक अगदी डोळ्यासमोर आहे.

वाचने 14729
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का?
का वागवायच? पाकीस्तानात जायचाय त्यांना,मग जाउ दे. कधी भारताचा झेंडा जाळताना विचार नाही करत आम्ही भारतात राहतो म्हणुन! आणि हे सर्व होतंय,कारण हा निसर्गाचा कोप आहे.अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. जय हींद!!!

In reply to by शानबा५१२

कोणाला पाकिस्तानात जायचंय? सामान्य काश्मीरवासियांना? कुठून मिळाली हि माहिती? अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. हे गमतीशीरच.

In reply to by शिल्पा ब

उगाच माझ्या हींदुप्रेमी भावनांना ठेच पोहचवु नका! हो त्या काश्मिरच्या लोकानांच जायच आहे पाकीस्तानला. http://www.dawn.com/2008/08/16/top17.htm अजुन एका ईमेलमधे फार उत्तेजक(?) फोटोज आहेत्,ते ईथे दीले तर गोंधळ होईल. (ही कामे काही लोकांची असु शकतात्,पण ह्यांचे प्रमाण मोठे आहे) तिथले लोक आतंकवाद्यांना मदत करतात तेव्हा ते नेहमीच मजबुर नसतात.(स्त्रोत: माझे काही ओळखीचे आर्मीमेन)
हे गमतीशीरच.
बर्,बरं

In reply to by शानबा५१२

उगाच माझ्या हींदुप्रेमी भावनांना ठेच पोहचवु नका! तुम्हीच लिहिलेल्या प्रतिसादाविषयी विचारलं मी...आणि त्यात तुम्च्या हींदुप्रेमी भावनांना कशी काय ठेच पोहोचवली...आणि तुम्हीच काय ते एकटे भारतप्रेमी हिंदू सॉरी हींदु आणि बाकीचे नाही या थाटात लिहिले नाही तर बरे. पाकिस्तानी पेपरच्या लिंक देऊन काय होणार?

In reply to by शानबा५१२

अपेक्षित प्रतिसाद. हेच म्हणतोय मी जर आपणासारखे भारतीयच काश्मिरला भारताचा भाग मानत नाही तर जगाने तो मानावा हा अट्टाहास का चालु आहे? मी काश्मिरला भारताचा भाग मानतो आणि म्हणूनच इतर भारतातील कोणत्याही नागरीकांइतकीच मला काश्मिरींचीही काळजी वाटते.

In reply to by ऋषिकेश

मी काश्मिरला भारताचा भाग मानतो आणि म्हणूनच इतर भारतातील कोणत्याही नागरीकांइतकीच मला काश्मिरींचीही काळजी वाटते.
+१, हेच म्हणतो. चर्चा रोचक आहे, हळुहळु भर घालत जाईन. @ शानबा : आपण जरा आपल्या लेखणीला लगाम घालाल तर बरे होईल. उगाच काहीही खरडण्यात आपले भले नाही इतकेच सांगतो, इथे संयमाने लिखाण अपेक्षित आहे. कुठलाही मुद्दा संयमानेच आला पाहिजे, जमत नसल्यास आपल्यापुढे 'न लिहण्याचा ' पर्याय उपलब्ध आहे. उगाच तुमच्या एखाद्या तिरसट आणि बेसलेस प्रतिसादामुळे चर्चेची वाट लागु नये अशी इच्छा आहे. कळावे.

In reply to by छोटा डॉन

माझी ही प्रतिक्रीया बेसलेस नाही,तिरसट असावी. http://www.dawn.com/2008/08/16/top17.htm http://weirdindia.blogspot.com/2006/09/holy-cow-beef-eating-great-sin-a… भावना कधी कधी संयम ओलंडतात्,मी लिहल आहे ते एखाद्या धर्माविषयी तेढ आहे म्हणुन नाही,तर हे खर आहे,माझ्यामते तरी(सिद्ध करु शकतो)

In reply to by शानबा५१२

हो, पण भारतीय असोत वा पाकिस्तानी, नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना मदत करण्याविषयी अढी का? मागे पाकिस्तानात भूकंपाने बरेच बळी गेले होते तेव्हाही भारताने मदत पाठवली होती. का तुम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करतानाही देशाच्या सीमांचा विचार करता?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

का तुम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करतानाही देशाच्या सीमांचा विचार करता?
मानवता हा सर्वात उच्च धर्म,हे माझं मत. पण ह्याला अंधश्रद्धा म्हणा नाहीतर अजुन काही पण आज आपण जे काही नवीन आजार वगैरे बघतोय त्याचा उगम हा आपण प्रगतीच्या नावाखाली केलेला अन्याय हाच आहे.असो. माझा आक्षेप काश्मिरमधल्या लोकांना खरे भारतीय समजण्याला आहे.आपणास हव असल्यास मी काही ईमेल पाठ्वीन ते पहा,मी हे का लिहतोय हे पटेल.

In reply to by शानबा५१२

माझी ही प्रतिक्रीया बेसलेस नाही,तिरसट असावी.
आणि हे सर्व होतंय,कारण हा निसर्गाचा कोप आहे.अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. मी ह्याला "बेसलेस" म्हणालो आणि ते "बेसलेस"च आहे. निसर्गाचा कोप असा जाती / धर्म पाहुन होत असतो असा अंदाज बांधणे किंवा तसे मत व्यक्त करणे म्हणजे शुद्ध तर्कटीपणा आहे. >>भावना कधी कधी संयम ओलंडतात्, मान्य आहे, म्हणुनच मी आपल्याला "संयमाने लिहा" असे सुचवले आहे, मी माझ्या प्रतिसादात कुठेही "लिहु नका" असे सुचवले नाही केवळ तो संयमाने जमत नसेल तर न लिहण्याचा पर्याय वगळता. >>मी लिहल आहे ते एखाद्या धर्माविषयी तेढ आहे म्हणुन नाही,तर हे खर आहे,माझ्यामते तरी(सिद्ध करु शकतो) असु शकेल. पण उपरोक्त 'निसर्गाच्या कोपाचे' विधान मात्र चुकच आहे. आता तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल : असे १००० दुवे देता येतील, पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' काय भारताच्या बाजुने बोलणार आहे काय ? बाकी कुठल्याही दुव्यापेक्षा तिथल्या सामान्य जनतेला अजुनही भारतात राहु वाटते ही भावना महत्वाची. सिद्ध काय मी ही करु शकतो, माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते. त्यांना भारतातच रहायचे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास धरणे म्हणजे त्यांचा अपमान आहे, असो.

In reply to by छोटा डॉन

माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते.
माझे काही नातेवाईक बॉर्डरहुन आल्यावर जे काही कथन करतात्,ते ऐकुन आपणही रागाने लाल व्हाल. पण जे तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसांकडुन ऐकता ते विरुध्द आहे,त्यात फक्त चांगली बाजु मांडलेली असते. माझ्यामते ह्या नाण्याच्या दोन बाजु आहेत. मला वाद निर्माण नाही करायचा पण खर(निदान मला दीसत तस) बोलुन वाद निर्माण होत असेल्,तर त्याला चर्चा म्हणुन संभाळुन घ्याव ही माफक अपेक्षा!

In reply to by छोटा डॉन

सिद्ध काय मी ही करु शकतो, माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते. मग डानराव साहेब तुमचे मित्र अजुनही काश्मिरात राहतात काय?

In reply to by वेताळ

वेताळ भाउ , असले अडचणीत आणणारे प्रश्न तुम्ही विचारणार आणि आमची वाचा बसली की सेक्युलर म्हणून तुम्ही आमची संभावना करणार.. हे बर न्हव. अवांतर : धागा काय आणि चर्चा काय... सं डु म्हणावे काय , या प्रकाराला. ?

In reply to by वेताळ

अरेच्चा, आता ह्या धाग्यात चर्चा करण्यासारखे काही राहिले नाही ह्या कल्पनेने आम्ही हा धागा उघडला काय नाही आणि इथे लगेच 'आमची बोल्ती बंद केल्याच्या बाता' काय सुरु झाल्या. असो. >>मग डानराव साहेब तुमचे मित्र अजुनही काश्मिरात राहतात काय? होय, अजुनही ते काश्मिरमध्येच राहतात, अर्थात सगळेच नाही, पण काही जण नक्कीच आहेत. अजुन डिटेलमध्ये सांगतो. आमचा एक मित्र पुण्यातुन 'सिव्हिल इंजिनियर' झाला आणि आता काश्मिरात परतुन तिकडे काहीबाही करतो आहे लोकांसाठी, सरकारी आणि खासगी कंत्राटे वगैरे घेतो तिकडेच. त्याचे एकंदरीत बरे चालले आहे असे आम्हाला ज्ञात आहे. दुसर्‍याचे असेच आहे काहीसे, तो डॉक्टर आहे, काही काळ श्रीनगरमध्ये त्याने प्रॅक्टिस केली आणि आता उच्चशिक्षणासाठी सध्या दिल्लीत आहे, पण तिकडे चक्कर असतेच. बाकी उरलेले जरी आता तिकडे रहात नसले तरी वर्षातुन २-३ वेळा जंगी सुट्टी वगैरे घेऊन अगदी रेग्युलरली जातात हे माहित आहे. एकाने तर शिक्षण चालु असतानाच त्याला रामराम ठोकुन तिकडे वडिलोपार्जित धंद्यात हात घातला होता, त्याचेही उत्तम चालु आहे. बाकी हे दंगेधोपे, आतंकवादी कायवाया वगैरेंचा त्रास त्यांनाही होतो पण ते म्हणुन काश्मिर सोडायच्या किंवा आपले आख्खे कुटुंबच इकडे स्थलांतरीत करुन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला ज्ञात नाही, बाकी असो. सेक्युलरवरुन आठवले बरं का, हे मित्र हिंदु आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे आहेत आणि दोघांनाही अलमोस्ट सारखाच त्रास होतो, कमाल आहे नाही सेक्युलॅरिझमची ! बघु, त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी ! - ( अडचणीतल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बघु, त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी !
कल्पना चांगली आहे. (इंग्रजीत तर इंग्रजीत. निदान एक बाजू फर्स्टहँड तरी कळेल.)
सेक्युलरवरुन आठवले बरं का, हे मित्र हिंदु आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे आहेत आणि दोघांनाही अलमोस्ट सारखाच त्रास होतो, कमाल आहे नाही सेक्युलॅरिझमची !
आतंकवाद्यांच्या 'सेक्युलरिझम'विषयी बोलत असाल तर गोष्ट वेगळी. अन्यथा सेक्युलरिझमचा संबंध कळला नाही.

In reply to by पंगा

त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी छान कल्पना! ते मराठी आंतरजाल वगैरे जाऊ दे. जेव्हा काश्मीर धडाड्न पेटलं होतं ना ८० च्या दशकात, तेव्हा तिथे गेले ते महाराष्ट्रातलेच तरुण. क्ष्थानिक लोकांना बरोबर घेऊन जेकेएलएफचं, हुर्रियतचं कंबरडं मोडलं ना, ते आपल्या मराठी पोरांनीच बरं. अगदी यासीन मलीक परत भारतीय लोकशाहीत आला तेव्हाच. अन आजही काश्मीरच्या दहशतवादग्रस्त लोकांच्या पोरांसाठीची रेसिडेंशियल स्कुल कुठं आहे माहिती आहे? ती आहे महाराष्ट्रातच. जेव्हा काश्मीर म्हणल्यावर सगळ्यांना कापरं भरायचं तेव्हाही महाराष्ट्र अन काश्मीरचं भावनिक नातं होतं अन आजही आहे.

In reply to by शानबा५१२

का वागवायच? पाकीस्तानात जायचाय त्यांना,मग जाउ दे. कधी भारताचा झेंडा जाळताना विचार नाही करत आम्ही भारतात राहतो म्हणुन ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा करू नका.. ऊचलली जीभ लावली टाळ्याला! मूलतत्त्ववाद माणसाला आंधळा करतो हेच खरे, मिपावर असले प्रतिसाद अपेक्षित नव्हते. मुळात काश्मिरमधील जनता हि भारतीय आहे हे सांगण्याची गरजच नाही.. अन सध्या काश्मिरींचा संघर्ष तिथल्या राज्य सरकाराविरुद्ध असलेल्या असंतोषामुळे सुरू आहे, सुरक्षा दलाच्या कारवाईचे फक्त निमित्त ठरले.. काही देशविघातक शक्ती असल्याच गोष्टींचे भांडवल करून भारताची प्रतिमा मलिन करु पहात आहेत.. त्याचप्रमाणे काश्मीरबद्दल ऊर्वरीत भारतीयांच्या मनात असंतोष तयार होईल असेही कृत्य ह्याच देशविघातक शक्ती करीत असतात.. अन काही ऊंटावरचे शहाणे ह्याच गोष्टींना प्रमाण मानून आपली मतं तयार करीत आहेत.. घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?

In reply to by भारतीय

ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा करू नका.. ऊचलली जीभ लावली टाळ्याला!
हे देशप्रेम की आमच्याबद्दलची नाराजी माहीती नाही. पण एखाद्या तुमच्या ओळखीच्या माणसाला तिथल्या सो कॉल्ड भारतीयांनी शत्रुशी मिलीभगत केल्याने जखमी व्हायला लागल की राग येतोच.आपणास ईथे बातम्या वाचुन ह्या गोष्टी कळतात का? नाही ना,मग तुम्हाला 'त्यांचा' पुळका येणारचं! सर्व जनमत माझ्याविरोधात असल तरी मी माझ्या मतांवर ठाम आहे/राहीन. जय हींद!!!

In reply to by शानबा५१२

हे देश्प्रेमच असावं, तुमच्याबद्दल नाराजी नाही.. ऊलट ईतर धाग्यांमधले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल आदरच आहे.. पण तुमच्या ह्या मताशी सहमती अजिबात नाही.. अन तुमच्या काश्मिरविषयक दृष्टीकोणाला एकच उत्तर आहे,, मी वर म्हटल्याप्रमाणे.. "घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?"

In reply to by शानबा५१२

ओ.के. ऊलट ईतर धाग्यांमधले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल आदरच आहे. ह्या वाक्यामुळे आपल्या प्रतिसादाच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली. तुमच्या आग्रहाखातर तुमच्याविषयीचे मत बदलत आहे ;)

In reply to by शानबा५१२

"घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?" १००% मान्य पण त्याला काही मर्यादा असाव्यात.
या संवादाला काही जालीय संदर्भही आहे का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी माझी मतं असे व्हीडीओ बघुन नाही बनवली,पण असे चित्र खुप काही सांगुन जाते. (I am talking about content of the video,and not about any other content on the webpage!) हे बघा कशाला असल्या भारतद्वेष्ट्यांना जवळ करायचं??

काश्मिरातही मदत करण्याची इच्छा असणे ठीक आहे, पण ते शक्य आहे का? पाकव्याप्त काश्मिरात कशी मदत पोचवणार?

शानबा शी पुर्णपणे सहमत नाही आहे. पण पुर्णपणे असहमत देखील नाही आहे. कश्मिरी जनतेला भारतापसुन वेगळे निघायचे नाही आहे अशी आपल्याला स्वत:ची समजुत करुन घ्यायची असेल तर आपली अवस्था डोळे मिटुन दुध पिणार्‍या मांजरीसारखी होइल. १. जागोजागी तिथे जो हिंसाचार चालतो तो केवळ पाकिस्तानी अतिरेकी करतात असे वाटते की काय आपल्याला? स्थानिक लोकांची फूस आणि मदत नसेल तर हे सगळे शक्य आहे का? २. वाऱंवार तिथे जे पाकिस्तानी झेंडे फडकवले जातात ते काय प्रत्येकवेळेस पाकिस्तानी अतिरेकी येउन फडकवतात का? ३. इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्यावर (एवढे मोठे सैन्य असताना) आणि इतर ठिकाणी ही तिथे जे हल्ले होतात ते नक्के कोण करते? ४. हे सगळे केवळ पाकिस्तानी दहशतवादी करत असले असते तर आत्तापर्यंत सैन्याने त्याचा कधीच बीमोड केला असता. स्थनिक लोकांची फूस असल्यामुळे आणि स्थानिक लोकच या कार्यांमध्ये असल्यामुळेच सैन्य हवालदिल होते असे नाही का वाटत? माझा मित्र २ वर्षांपुर्वी तिथे गेला होता. तेव्हा तेथील स्थानिक बोट चालक त्याला म्हणाला "आप हिंदुस्थान से आये हो. हमारे देश मे आपका स्वागत है". तुम्ही हिंदुस्थानी नाही का असे मित्राने विचारल्यावर "साब आप मेहेमान हो मेहेमान की तरह रहो. कश्मीर जन्नत है उसके मजे लुटो. क्यो ऐसे सवाल पुछ्कर मुसीबत मोड लेना चाहते हो?" असे त्याला सुनावले गेले. टुर गाईड ने नंतर लगेच मित्राला शांत राहण्याची आणि जास्त प्रश्न न विचारण्याची विनंती केली. मित्राने तरीही नंतर चिकाटीने नावड्याकडे विषय काढला आणि मुद्दाम आडुनआडुन विचारले की "यहा हमे कुछ खतरा तो नही?" त्यावर नावडी शांतपणे म्हणाला "साब हम लोग आप हिंदुस्थानी टुरीस्ट्स को कुछ तकलीफ नही देते. आपसेही तो हमारी रोजी रोटी चलते है. ये सब तो पाकिस्तानी आतंकवादी करते है. अगर आप यहा पर हमारे मेहमान बनके रहोगे तो हमारे लोग आपको कोई तकलीफ नही पहुचायेंगे" तिथले लोक स्थानिक आतंकवाद्यांना अतिरेकी मानतच नाहीत. ते तर त्यांच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आहेत. अतिरेकी म्हणजे फक्त पाकिस्तानी आणि तालिबानी. एकुण काय त्यांना पाकिस्तानात जायचे नसेलही कदाचित. पण त्यांना भारतातही रहायचे नाही आहे. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत घेण्यात त्यांना काही गैरही वाटत नाही.

In reply to by मृत्युन्जय

तुमच्या स्नेह्याने स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणून स्वीकारली...तरीही केवळ काही "स्वातंत्रसैनिक" म्हणवणारे लोक अशा देशविघातक कारवाया करून देशाचा एक तुकडा जर वेगळा करू इच्छित असतील तर त्याला विरोध हा केला पाहिजे....उद्या माओवादी असेच म्हणतील...द्यायचा का त्यांना हवा असलेला भाग तोडून? श्रीलंकेसारख्या देशाने इतका काळ लढा देऊन अशाच पद्धतीने देशाचे तुकडे करायच्या प्रयत्नात असलेल्या तामिळी वाघांना काबूत आणलं....लगेच एक भाग तोडून दिला नाही...असा विचारच कसा करू शकता?

In reply to by शिल्पा ब

अजिबात तोडुन देऊ नये. शेवटी कश्मिर भारताचाच भाग आहे. आणि मदत देखील केलीच पाहिजे. जसा महाराष्ट्र तसेच काश्मीर. शेवटी कश्यपांची भूमी आहे ती. आपलेच बांधव आहेत. माझा मुद्दा केवळ स्थानिकांच्या मनात असलेल्या आप्ल्या अढीविरुद्धा मर्यादित आहे. बाकी मी असे अजिबात मानत नाही की तो भारताचा भूभाग नाही किंवा त्यांना मदत करु नये. हे सगळे होण्यास भारतीय राजकारण्यांनी कश्मीरकडे केलेले दुर्लक्षच कारणीभूत आहे असेही वाटते.

In reply to by शिल्पा ब

पण लंकन लोकानी तामिळवाघाना पिटाळले ते अहिंसेच्या मार्गाने का हो?ह्याबद्दल जरा माहिती घ्याल का? त्याचा मार्ग काश्मिरात अमंलात आणयला तुमचा विरोध असणार का ?

In reply to by वेताळ

अहिंसेचा मार्ग अवलंबवावा (कोणत्याही अतिरेक्यांच्या बाबतीत) असे मी कुठे म्हंटले ते दाखवून द्या... लिहिण्याआधी जरा वाचून पहा.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. कश्मिरींच्या मनात हि भावना (वेगळे निघण्याची) आली असल्यास ती का आली ह्याचासुद्धा विचार आपण करायला हवा.. आणि केवळ ऐकिव माहीतीवर आपले मत तयार करुही नका.. आपण आपल्या मित्राचा जो अनुभव वर सांगितला आहे अगदी तसाच अनुभव माझ्याही एका मित्राला आला होता.. फक्त ठिकाण वेगळे होते, काश्मिरऐवजी ईशान्य भारत! आता तुमच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर.. १)जागोजागी तिथे जो हिंसाचार चालतो तो केवळ पाकिस्तानी अतिरेकी करतात असे वाटते की काय आपल्याला? स्थानिक लोकांची फूस आणि मदत नसेल तर हे सगळे शक्य आहे का? --- होय! तो हिंसाचार पाकिस्तानी अतिरेकीच बहुतांशी ठिकाणी करतात.. काही ठिकाणी काश्मिरी युवक देखील हिंसाचारात सामील असू शकतील पण ते केवळ वाट चुकलेले आहेत असे समजण्यात काय चूक आहे? बहुतांश काश्मिरी तरुणांना हिंसाचार नकोच आहे.. २)वाऱंवार तिथे जे पाकिस्तानी झेंडे फडकवले जातात ते काय प्रत्येकवेळेस पाकिस्तानी अतिरेकी येउन फडकवतात का? पाकिस्तानी झेंडे जिथे फडकवले जातात तो भाग पाकीस्तान सीमेलगतचाच आहे. अन तुम्हासही सांगणे कि शितावरून भाताची परिक्षा नको! ३)इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्यावर (एवढे मोठे सैन्य असताना) आणि इतर ठिकाणी ही तिथे जे हल्ले होतात ते नक्के कोण करते? नेमके काय म्हणायचे आहे ? ४)हे सगळे केवळ पाकिस्तानी दहशतवादी करत असले असते तर आत्तापर्यंत सैन्याने त्याचा कधीच बीमोड केला असता. स्थनिक लोकांची फूस असल्यामुळे आणि स्थानिक लोकच या कार्यांमध्ये असल्यामुळेच सैन्य हवालदिल होते असे नाही का वाटत? सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे!

In reply to by भारतीय

मृत्युन्जय.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. कश्मिरींच्या मनात हि भावना (वेगळे निघण्याची) आली असल्यास ती का आली ह्याचासुद्धा विचार आपण करायला हवा.. मान्य. परंतु काहीही कारण असले तरीही आत्ता ती भावना आहे ना. यावर उपाययोजना करणे जरुरीचे आहे आणि हे करताना तिथली जनता आपल्या विरोधात आहे याची पण जाणीव होणे गरजेचे आहे. आणि केवळ ऐकिव माहीतीवर आपले मत तयार करुही नका.. ज्याच्याकडुन महिती मिळाली तो **दोस्त आहे. त्याने जे काही सांगितले त्यावरुन अजुन काही मत तयार नाही करता येत. आपण आपल्या मित्राचा जो अनुभव वर सांगितला आहे अगदी तसाच अनुभव माझ्याही एका मित्राला आला होता.. फक्त ठिकाण वेगळे होते, काश्मिरऐवजी ईशान्य भारत! तिथे किती हिंसाचार चालतो. कृपया बोडो अतिरेक्यांचे उदाहरण देऊ नका. काश्मिरी अतिरेकी आणि बोडो यामध्ये जमिनस्मानाचा फरक आहे. --- होय! तो हिंसाचार पाकिस्तानी अतिरेकीच बहुतांशी ठिकाणी करतात.. काही ठिकाणी काश्मिरी युवक देखील हिंसाचारात सामील असू शकतील पण ते केवळ वाट चुकलेले आहेत असे समजण्यात काय चूक आहे? काहीच चुक नाही. वाट चुकलेल्यांची संख्या खुप जास्त आहे हे मात्र नक्की. बहुतांश काश्मिरी तरुणांना हिंसाचार नकोच आहे.. जे ऐकले आहे जे पाहिले आहे आणि जे वाचले आहे त्यावरुन त्यांना वेगळे व्हायचे आहे हे नक्की आणि त्यांना सत्याग्रहाचा मार्ग योग्या वाटतो असे मला तरी वाटत नाही. पाकिस्तानी झेंडे जिथे फडकवले जातात तो भाग पाकीस्तान सीमेलगतचाच आहे. मान्य. पण झेंडे फडकवणारे सगळे पाकिस्तानी आहेत की काय? अन तुम्हासही सांगणे कि शितावरून भाताची परिक्षा नको! भातावरुन शिताची केलेली चालेल का?
  1. नेमके काय म्हणायचे आहे ?
एवढ्या मोठ्या सैन्यावर हल्ला करण्याचे धारिष्ट्य ते दाखवतात यातच सगळे आले. सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. मान्य. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे पुर्णपणे अमान्य. तिथे ज्या प्रमाणात हिंसाचार चालु आहे ते बघता. प्रमाण अत्यल्प आहे असे म्हणवत नाही. अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे! हे मात्र मान्य

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय.. आता प्रतिवादात पडत नाही.. काही काश्मिरींच्या मनात भारताबद्दल अढी असू शकते हे पुर्णपणे मान्य ! पण म्हणून आपणही पुर्ण काश्मिरबद्दल अढी बाळगावी हे पटत नाही. फक्त हे विसरू नका कि ते काही काश्मिरी (तुमच्यामते बहुतांश) वाट चुकलेले जरी असले तरी त्याच्या भारतीय असण्यावर प्रश्नचिन्ह कृपा करून ऊठवू नका.. (तुम्ही ते उठवलेही नाहीये, म्हणुन आभार).. शेवटी तेही भारताचच कार्ट आहे हो!

In reply to by भारतीय

मला तुमचे म्हणने पुर्णपणे पटले आहे. शंका नसावी. काश्मीर भारताचाच भूभाग आहे आणि त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे याची पुर्ण जाण आहे मला. काश्मीरबद्दल अढी देखील बाळगुन नाही आहे मी. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की पुढची पावले उचलताना आपल्याला वास्तवाचे भान असणे गरजेचे आहे. नाहीतर "हिंदी चिनी भाई भाई" चे जे झाली तसे व्हायचे.

काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे मी आणि येथील सर्वजण मानतात. कोणिही म्हणत नाही की तो भाग पाकिस्तानला द्या. तु म्हणतोस की "काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का?". याचे प्रकारे मी विचारतो की भारताच्या नागरीकाला देशात कुठेही घर, जमीन घेता येते. फक्त काश्मीरात नाही असे का? त्यांना घटनेने जे विषेश अधीकार दिले आहेत ते इतर राज्यांना का नाहीत? यातील सर्वात महत्वाचा प्रश्ण. हे सारे संपवुन शांतता नादायला पाहीजे असेल तर काय करायला पाहीजे? ती कोणाची जबाबदारी आहे? ज्यांना सत्ता नाही ते फुटीरवादी नेत्यांना आणि अतिरेक्यांना मदत करतात हे काश्मीरमधील सर्वात मोठे दुखणे आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेचे वेळीसच दंगली का होतात याचे उत्तर कोणिही देइल. काश्मिरला भेट दिलेल्या आणि टुरीस्ट कंपन्याबरोबर काम करणा-या लोकांचा अनूभव आहे की सामान्य माणूस यात भाग घेत नाही. काही जण बळजबरीमुळेच भाग घेतात. त्यांना जाणीव आहे की शांतता असेल तरच त्यांची "रोजीरोटी" चालू रहाणार आहे. पण तसे झाले तर भारताचा वरचश्मा होईल. मग हे होउ न देण्यासाठी सिमेपलीकडुन बळ दिले जाते आणि त्याला स्थानीक फुटिरतावादी नेते साथ देतात. त्यांच्या जोडीला असंतुष्ट आत्मे (मेहबुबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहंमद सैद सारखे नेते) असतात. मग प्रश्ण सुटायचा कसा? "ऑपरेशन सदभावना" याला चांगले यश येत होते. पण केंद्रात सत्ताधारी बदलल्यावर ते काम बंद का केले याचे उत्तर मिळाले तरी बरीच दुखणी कमी होतील.

In reply to by चिंतामणी

नागरीकाला देशात कुठेही घर, जमीन घेता येते. फक्त काश्मीरात नाही असे का? त्यांना घटनेने जे विषेश अधीकार दिले आहेत ते इतर राज्यांना का नाहीत?
ह्या व अश्या प्रश्नांना गृहित धरूनच मी उदाहरण देताना लेहचे दिले आहे. तेही जम्मु आणि काश्मिर राज्यातच आहे. तिथेही हेच नियम आहेत. इतर भारतीयांना लेह-लडाखमधेही जमिन खरेदी करता येत नाही. त्यांनाही विषेश अधिकार आहेत. तरीही इतर भारतीय लेह, जम्मुच्या नागरीकांना भारतीय मानतात मात्र काश्मिर खोर्‍यातील नागरीकांना काही भारतीय परकेच मानतात, असा सापत्न भाव का? काश्मिरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन नाहि अथवा तेथील राजकीय परिस्थितीवरही तुर्तास भाष्य करत नाहि आहे. सध्या काश्मिरात आहे ती नैसर्गिक आपत्ती. अश्यावेळी त्यांना सहृदयतेने त्यांना तुम्ही आमचे आहात, आम्ही तुम्हाला मदत करतोय सांगायचे का तुम्ही आमचे नाहीत, बघा तुमचे तुम्ही म्हणायचे?

लेह मधे नको इतकी, उतू जाईल इतकी मदत होते आहे व भारतव्याप्त काश्मिरमधे मदतीविना रोज जीव जात आहेत इतके असंतुलन आहे की काय? असे असेल असे वाटले नव्हते. असे असल्यास अरेरे!

In reply to by सहज

लेह मधे नको इतकी, उतू जाईल इतकी मदत होते आहे
नाही परिस्थिती इतकी भयाण आहे की लेहला होणारी मदतही अपुरी आहे. तिथेही मदतीची गरज आहेच आहे. मात्र फरक असा आहे की सबंध देशाची निदान तिथे मदत करण्याची इच्छा आहे, आणि केवळ इच्छा नसून सार्‍या भारतातून लेहच्या नागरीकांना मदत करण्याची कृती घडते आहे. त्याच वेळी काश्मिर मधील भारतीयांचे काय?

काश्मिर घाटीतील लोक स्वतःला भारतीय समजतात का? मागेच एका चर्चे काश्मिरातल्या लोकांना पाकिस्तानात जायचे होते पण नेहरुंनी त्यांना फसवून भारतात आणले असा सूर दिसला . :) असो. वरील प्रश्नाचे उत्तर हो असे असेल तर पुढे मत लिहू शकेन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मागेच एका चर्चे काश्मिरातल्या लोकांना पाकिस्तानात जायचे होते पण नेहरुंनी त्यांना फसवून भारतात आणले असा सूर दिसला :) बाकी लेखाबद्दल नो कमेंटस.

In reply to by अवलिया

नाही. असा सूर नव्हता. लोकांना कुठे जायचे हे कोणालाच माहिती नव्हते. राजाने नाइलाजाने भारतात यायचे ठरवले. असा सूर होता.

In reply to by नितिन थत्ते

नाही नाही. असाही नव्हता. मुस्लिम बहुल काश्मिर भारतात कसा आला? त्यासाठी राजाला त्याचा दिवाण किंवा प्रधान अकाश्मिरी देऊन कसे भारतात ओढले असा होता. नेहरु काश्मिरी होते काय?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, आणि प्रश्न असा आहे की "तुम्ही काश्मिरिंना भारतीय समजता का?" (ते स्वतःला काहीही समजो) याचे उत्तर जर हो असेल तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करता येईल

In reply to by ऋषिकेश

"तुम्ही काश्मिरिंना भारतीय समजता का?" (ते स्वतःला काहीही समजो) मला वाटते दोन्ही गोष्टी परस्पर संबंधीत आहेत. ते जर स्वतःला भारतीय समजत नसतील (नसतील तर बर का. समजत नाहीतच य अर्थाचे विधान नाही हे) तर आपण काय समजतो हे गैरलागु आहे इथे. हे म्हणजे "तुम्ही ऐश्वर्या रायला स्वतःची बायको समजता का (ती स्वतःला काहीही समजो)" या धाटणीचे वाटते

In reply to by मृत्युन्जय

उदा रोचक आहे. :) ;) फक्त फरक असा आहे की मी ऐश्वर्या रायवर माझा हक्क सांगत नाहि. जर मी तो हक्क सांगत असेन व तो तिच्यासकट इतरांनीही मान्य करावा अशी अपेक्षा असेल तर निदान मला तिच्याशी बायकोप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. अर्थात मी तिच्याशी कसेही वागलो आणि तिची इच्छा नसेल तर ती माझी होणार नाहि. पण तिच्यावर हक्क सांगताना "निदान" मी तिला बायको मानणे गरजेचे आहे. तसेच काश्मिरवर जर आपण हक्क सांगत असु तर... वगैरे वगैरे

In reply to by ऋषिकेश

अर्थात मी तिच्याशी कसेही वागलो आणि तिची इच्छा नसेल तर ती माझी होणार नाहि हेच वाक्य ऐकायचे होते ;)

In reply to by ऋषिकेश

पण उद्या त्याना भारतिय समजुन घरात घेतले आणि त्यानी आणलेला बॉम्ब जर घरात फुटला तर आपले मत कसे दुसर्‍याला कळणार? ह्यावर तुमचे मत काय?

सगळी चर्चा नुसती विडीओ, फोटो, आक्षेपार्ह विधाने यांवर आधारीतच दिसतेय. मी कारगिल युद्धाच्या २ महिने आधी श्रीनगरमध्ये होतो. लेह ते श्रीनगर २ दिवसांचा बसप्रवासही श्रीनगरमधील स्थानिकांबरोबर केला. पाकड्यांच्या शेलींगमध्ये कारगिलच्या पुढे छानीगुंडला १० तास बस अडकली त्यांत आम्हां दोघांशिवाय सर्व काश्मिरी मुस्लिमच होते. त्यांच्यापैकी एकाकडे आम्ही दिवसभर होतो तो एरिया म्हणजे अतिरेक्यांचा एके काळचा तळ होता. सर्वत्र कर्फ्यु.. दर १०० मी.वर कमांडो. .. पण आम्हांला शिकार्‍याच्या मालकापासून सगळ्यांचा जो अनुभव आला तो मृत्युन्जयांच्या मित्रापेक्षा उलट आला. सगळ्यांचा सूर एकच होता तो म्हणजे राजकारण्यांमुळे आम्ही भारतापासून तुटत आहोत. तिथे इंडस्ट्री नाही. उत्पन्नाचं मुख्य साधन पर्यटन. त्यांवरच घाला पडतोय,..सरकार काही करत नाही... फायदा राजकारण्यांचा... आपण आहोत मोकळे त्या लोकांना फुकाच्या शिव्या द्यायला..त्यांनी कांय करावं?... आपल्या अशाच पूर्वग्रहदुषित मानसिकतेमुळे पुर्वेकडची राज्येदेखील घालवून बसू... जरा स्वतः अनुभवून या.... ...

In reply to by हेम

सगळी चर्चा नुसती विडीओ, फोटो, आक्षेपार्ह विधाने यांवर आधारीतच दिसतेय.
प्रतक्षदर्शींच्या अनुभवावरही.
जो अनुभव आला तो मृत्युन्जयांच्या मित्रापेक्षा उलट आला. .... जरा स्वतः अनुभवून या..
तुम्ही शाश्वती(?) देता का की आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला तुमच्यासारखाच अनुभव येईल्,मृत्युंजयसारखा नाहीच येणार म्हणुन????? काय हो म्हणताय??

वरील अनेक प्रतिक्रियांमधे असे भासते की लेह-लडाख हे वेगळे आहे. तर ते तसे नाही. तोही काश्मीरचाच भाग आहे पण वेगळा आहे अशा दृष्टीने की तेथील लोक फुटीरवादी नाहीत. ते अतिशय शांत, मदत करणारे आणि भारतातच रहाण्याची इच्छा असलेले आहेत. दुर्दैवाने ते शांत आहेत याचाच त्यांना तोटा होतो आहे. आक्रस्ताळी मुलाकडे जास्त लक्ष दिले जाते तसा हा प्रकार आहे. लडाखमधे हवेत प्राणवायु कमी, हिरवाई कमी, गरीबी! बहुतेकांच्या घरातील लोक सैन्यात आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या देशाबद्दल अभिमान आहे. जरा कुठे त्यांच्याकडे पर्यटकांची मेहेरनजर वळली होती तर हे भयानक वास्तव त्यांच्या नशिबी आले. हे मी सर्व स्वतः अनुभवून लिहिले आहे कारण ही नैसर्गिक आपत्ती कोसळण्याच्या चारच दिवस आधी मी तिथे एक आठवडा राहून आलो आहे. काश्मीरवरील फुटीरवाद्यांवर जरुर टीका करा पण संपूर्ण माहिती नसताना त्या गरीब लडाखी लोकांवर अन्याय करु नका हे सांगण्यासाठीच मुद्दाम लिहिले.

लेह लडाख सारखा सुंदर आणि शांत प्रदेश भारतात कुठेच नाही. महाराष्ट्रानंतर जर मला राहयला दुसरे ठिकाण निवडण्यास सांगितले तर मी लडाख निवडेन.

या चर्चेसंदर्भात एक महत्वाचा प्रश्न. चर्चाप्रस्ताव ठेवताना ऋषिकेश म्हणतातः
यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर. गेले काही दिवस काश्मिरमधील सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण त्याच बरोबर निसर्गानेही थैमान घातले आहे. नद्यांना मोठाले पूर आहेत, भुस्खलन मोठ्याप्रमाणावर चालु आहे, अतिवृष्टीने काश्मिरलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे.
सर्वप्रथम प्रश्न पडला की, "अगदी मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते कोणालाच काश्मिर विषयी काळजी वाटत नाही का? " असे अनुमान नक्की कशाच्या संदर्भावर जीवावर काढले? म्हणून गुगलायला लागलो. यातील निसर्गाने काश्मिर मधे थैमान घालून, मोठे पूर आलेत, भूस्खलन झाले आहे वगैरे नक्की कुठे वाचलेत? कारण जेंव्हा मी काश्मिरमधील नैसर्गिक आपत्तीसंदर्भात गुगलून बघितले तेंव्हा केवळ लेह-लडाख भागातीलच बातम्या आल्या. अगदी मुद्दामून डॉन मधील बातम्या शोधल्या तरी केवळ लेह-लडाखच दिसले. संदर्भासाठी खालील काही बातम्यांचे दुवे पहा: Toll climbs in Kashmir flooding यात मुख्य वाक्य काय आहे तर, "Thousands of people in low-lying areas of Leh, the region’s main town, moved to higher ground and spent the night out in the open, Makhdoomi said." Kashmir Flash Floods Kill 103, Devastate Towns त्यातील काही सुरवातीची वाक्ये: "A cloudburst followed by flash floods hit a Himalayan desert region in Indian-controlled Kashmir, sending rivers of mud down mountainsides and killing at least 112 people and injuring another 400, officials said Saturday. Nine bodies were recovered overnight from the debris of collapsed homes in the remote region of Ladakh, said state police chief Kuldeep Khoda. Death toll in Kashmir flooding hits 130 : "SRINAGAR - Authorities stepped up rescue efforts as the weather improved Saturday, a day after flash floods sent rivers of mud down desert mountainsides in Indian-controlled Kashmir, killing at least 130 people and injuring 400 others, officials said. As the rain stopped in the morning, thousands of army, police and paramilitary soldiers cleared roads and the debris from flattened homes in the remote Himalayan region of Ladakh, said Kausar Makhdoomi, a businessman in the area. The airport and some food stores reopened. Thousands of people in low-lying areas of Leh, the region's main town, moved to higher ground and spent the night out in the open, Makhdoomi said." Flash floods kill at least 88 in Kashmir (डॉन मधील बातमी) "Ladakh is a mountainous, Buddhist-dominated region, sitting in the southeastern part of Muslim-majority Kashmir, and is popular with adventure tourists interested in high-altitude trekking and river running." Flash Floods Kill 85 in Indian-Held Kashmir (टाईम मॅगझीन) (SRINAGAR, India) — "A sudden overnight downpour and flash floods swept away houses and killed at least 85 people in Indian-controlled Kashmir's normally arid, mountainous region of Ladakh, officials said Friday." मी काही शोधताना चुकलो असलो तर कृपया येथे नक्की संदर्भ द्या. नाहीतर या चर्चेच्या मूळ मुद्याला अर्थ राहात नाही.

In reply to by विकास

+१ , आत्तापर्यंत वाचलेल्या पूर आणि ढ्गफुटीच्या सगळ्या बातम्या लेह-लडाख संबंधातच आहेत ( प्रचंड नुकसान, जीवितहानी, परदेशी नागरिकांची सुटका इ.). काश्मिरातील पूराबद्द्ल बातमी वाचनात आलेली नाही. काश्मिरातील कर्फ्यू, संप, दगडफेक, स्वातंत्रदिनावर बहिष्कार घालायचं अवाहन इ. बातम्या वाचल्या पण पूर आणि नैसर्गिक आपत्तीबद्द्ल काहीच वाचनात नाही आलं.

In reply to by विकास

मी मुळ परवा बातमी रेडियोवर (१००.७ एफ.एम, AIR चा मुंबईतील एफ.एम. च्यानेल) वर ऐकली होती. त्यामुळे प्रिंटमधे शोधत बसलो नव्हतो वा दुवा दिला नव्हता. अर्थात बातमी शोधल्यास मिळेल असे वाटते. तुर्तास घाईत आहे .. जरा निवांत वेळ मिळाल्यावर लिंका शोधून नक्की देतो. बाकी सिंधुला पूर आला आहे, लेह व पाकिस्तान दोन्हीकडे सगळ्या नद्यांना पूर आले असताना काश्मिरमधे आबाद असेल असे वाटाते का? अर्थातच दुवे शोधून देतो

In reply to by ऋषिकेश

काश्मीर मधुन हिंदु पळत असतांना असा प्रश्न पडला होता का, कि त्यांच्या पद्द्ल मिडीयाला ने का बातमी दिली नाही? पुर्वांचलात ख्रिश्चन अतिरेकी जेव्हा हैदोस घालतात तेव्हा का बातमी दिली नाही? असा प्रश्न पडतो का?

In reply to by विकास

प्रश्न मलाही पडला आहे. मी जी दैनिके वाचतो, न्यूज चॅनेल्स (सी. एन. एन., बी. बी. सी., स्काय न्यूज, अल जझिरा, मिडीया आशिया, युरो न्यूज...) बघतो, ह्यांपैकी कुठेही आपल्या काश्मिरात पूर वगैरे आल्याचा उल्लेख अजून तरी आलेला नाही. पाकिस्तानात मात्र हाहाकार माजला आहे (आणी त्यांचे राष्ट्रपति ह्याही परिस्थितीत यू. के. व फ्रान्सच्या दौर्‍यावर गेले होते) त्याविषयी बरेच काही येत आहे, मदतीच्या नेहमीच्या मागण्यांसकट. तेव्हा ह्या धाग्यात काहीतरी गल्लत झालेली दिसते.

In reply to by विकास

विकास यांच्याशी सहमत. ऋषिकेश यांनी हा धागा टाकल्यापासून मी गोंधळात पडलोय त्यामुळे कसलाच प्रतिसाद सुद्धा टाकला नव्हता आत्तापर्यंत. गेले दोन दिवस प्रिंट मिडीया आणि जालावर काश्मिर वरील नैसर्गिक आपत्ती बद्दल काही बातम्या सापडतात का हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या काही बातम्या वाचण्यात आल्या त्या सगळ्याच लेह-लद्दाख या बद्दलच आहेत. ऋषिकेश यांना ही बातमी कुठे मिळाली या बद्दल विचार करतच होतो. विकास यांच्या प्रतिसादामुळे दुजोरा मिळाला. मला वाटतं एफ एम रेडिओ वर ऐकलेल्या बातमीची जास्त शहानिशा न करता ऋषिकेश यांनी हा धागा टाकण्याची घाई केली [इंग्रजीत काय ते म्हणतात 'जम्पिग द गन' चु. भु. घे.दे.] मला तरी ही बातमी कुठेही न आढळून आल्या मुळे, घडलेल्या नैसर्गिक आपत्ती वर मदत करण्याच्या प्रवृत्तीवर/ईच्छेवर काही बोलणे हे तर्कसंगत नाही. [अवांतरः काश्मिर बद्दल ज्या काही बातम्या वाचायला/ऐकायला मिळत आहेत त्या सगळ्या तिथे काही दिवसांपासून चालू असलेल्या दगडफेकी/गोळीबार/मृत्यू आणि कर्फ्यु या बद्दलच आहेत]

...............................

....

सध्या ऑफीसात आहे (त्यात ऑडीट चालु आहे :) ) त्यामुळे सगळ्या साईट्सचा अ‍ॅक्सेस नाही. काही ठ़ळक वृत्तपत्रांत बातमी मिळाली नाही. मात्र पुढील दुवा बघा. कारगिल या काश्मिरमधील विभागातील परिस्थिती सांगतोय. http://www.groundreport.com/Business/Relief-items-for-Flood-hit-families-of-Kargil_2/2927052 इतर दुवे रात्री घरी पोचल्यावर शोधतो आणि देतो बाकी बातमीबद्दल खात्री वाटली कारण कोणत्यातरी एफ एम वर आलेली बातमी नसून AIRच्या सरकरी च्यानेलवरून आलेली बातमी होती. तरी खात्री करून घ्यायला हवी होती हे खरे.

In reply to by ऋषिकेश

हृषिकेश, माझा, चर्चाप्रस्ताव वाचल्यावर त्यातील काश्मीर (म्हणजे मुस्लीम बहुसंख्य भाग जो अलगतावादी आहे तो) मधली पूरपरीस्थिती वगैरे भाग वाचून काहीतरी गल्लत झाली असावी असे वाटले. ऋषिकेशने मुद्दामून दिशाभूल म्हणून लिहीले गेले असे अजिबात वाटले नाही. किंबहूना तुझे असल्याने मी जास्त उत्सुकतेने माहीती खणायला गेलो. तेंव्हा या संदर्भात गैरसमज नसावा. आता वर जो कार्गिलचा दुवा दिला आहे, तो बरोबरच आहे आणि कार्गिल म्हणल्यावरपण बातम्या मिळतात कारण तो लडाखला लागून असलेला भाग आहे. बर त्या दुव्यात जे काह सांगितले आहे त्यावरून सरकारी मदत पोचत असल्याचेच दिसते, ज्या संदर्भात या चर्चा प्रस्तावात आपण दुर्लक्ष करतो असे म्हणणे होते. तेंव्हा हे देखील नक्कीच योग्य वाटले नाही. कारण बाकी काही नाही तरी किमान पैसे खाण्यासाठी तरी बाबू आणि राजकारणी नक्की मदतीचा हात "जाहीर" पुढे करतील याची मला झोपेत पण खात्री आहे, तेंव्हा या संदर्भात देखील गैरसमज नसावा. भारतातच काय सर्वत्र प्रत्येक वर्षी काही ना काही नैसर्गिक आपत्ती येत असतात. सुदैवाने त्यातील प्रत्येक भिषण नसते, जी असते त्याची बातमी होते. ते दुर्भाग्य या वेळेस लेह ला मिळाले कारण तिथे झालेली ढगफुटी, त्यातून झालेली जिवीत आणि वित्त हानी, कुटूंबांची गेलेली घरदारे आणि हजारो परदेशी आणि स्वदेशी पर्यटक. साधे पहा, इतरवेळचे जाउंदेत पण मुंबईत २६ जुलैचा पाऊस आणि २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला या दोन्ही वेळेस माध्यमांनी प्रसिद्धी दिली पण बाकी सरकारने काय केले? गृहमंत्र्यांना तर तेंव्हा फॅशन परेडच वाटली होती. मग काय मुंबईने वेगळे का होऊ नये म्हणून चर्चा करायची? राजकारणी हे असेच असतात तेंव्हा ते काश्मिर मधेच असे वागतात आणि इतरत्र नाही, असा गैरसमज नसावा. मला पुढचे काही दिवस संशोधन करायला म्हणून वेळ नाही, पण खात्री आहे की सरकारी मदत ही प्रत्येक पक्षाकडून काश्मीरला भरपूर झाली आहे. कदाचीत इतर राज्यांच्या तुलनेत अधिकच... काश्मीरमधे आजही उर्वरीत भारतातील पर्यटक जातात, मोठमोठ्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत, कोकण रेल्वे आता रेल्वे बांधत आहे वगैरे. तेंव्हा काश्मीरकडे उर्वरीत भारतीयांचे दुर्लक्ष झाले असा गैरसमज नसावा. (नुसतेच, "भारतीय जनता" या शब्दात काश्मीरची जनता देखील येते तेंव्हा असे वेगळे लिहीणे मला पटले नाही) या संदर्भात अनिवासी भारत्तीय देखील तात्काळ मदत करू लागले आहेत. या आधी देखील केलेली आहे. तेंव्हा अगदी अनिवासी भारतीयांचे देखील दुर्लक्ष होत आहे असा गैरसमज नसावा.

In reply to by विकास

त्यावरून सरकारी मदत पोचत असल्याचेच दिसते
ही बातमी आजची आहे. असो पण तुम्हाला खात्री आहे की सरकारी मदत ही प्रत्येक पक्षाकडून काश्मीरला भरपूर झाली आहे तेव्हा इतर सामाजिक प्रश्नांतील संलग्नता /अभ्यास लक्षात घेऊन माझ्यासारख्याने केवळ एखाद्या "ऐकीव" माहितीवर/बातमीवर अधिक काही बोलणे चुकीचे वाटते. तसेही चर्चा प्रस्तावाचे मुळच असे वादात सापडल्याने/डळमळीत झाल्याने फार बोलण्यासारखे राहिलेले नाहि. पुढच्या वेळी बातमीची अधिक ठोस शहानिशा करूनच चर्चाप्रस्ताव टाकेन. दुर्दैवाने काहि कारणाने मलाही सध्या फारसा वेळ मिळेनासा झालाय. फारशी शहानिशा न करता टाकलेल्या ह्या प्रस्तावाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या सल्यास क्षमस्व (ही ओळ सगळ्यांसाठी आहे) माझ्यातर्फे या चर्चाप्रस्तावाचा शेवट करत आहे. सगळ्यांचे आभार

निर्माण झाली आहे ती लेह लडाख भागात झाली आहे.लेह च्या ४० चौरसकिलोमीटर भागात रात्री १२.३० मि. ढगफुटी झाली त्यात जवळजवळ २००मि.लि.पाऊस फक्त अर्ध्या तासात पडला. त्यात पुर येवुन सगळेकडे नुसता चिखल झाला आहे. लेह भागात बरीच घरे मातीची असलेमुळे वित्त व जीव हानी खुप झालेचा अंदाज आहे. ह्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४०चौकिमी चा परिसर सोडला तर इतरत्र काहीच पाउस झाला नाही. मुळात लेहलडाख भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणुन ओळखला जातो.तिथे आजपर्यत कधीच इतका पाउस एका वर्षात झाला नाही तो चक्क अर्ध्या तासात झाला आहे.त्यात अधिकृतरित्या १६०च्या आसपास लोक मृत्यु पावले आहेत. काही संशोधकाचे मत असे आहे कि चीन ने आपल्या नव्या वेदर बॉम्बचे परिक्षण रात्री त्या भागात घेतल्या मुळे ही आपत्ती ओढावली आहे. पंरतु सरकार कडे अजुन काही अधिकृत माहिती नाही.(तशी ती कधीच नसते),जर चीनने तसा बॉम्ब बनवला असेल तर मात्र विचार करण्याची वेळ आली आहे.

In reply to by वेताळ

ह्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४०चौकिमी चा परिसर सोडला तर इतरत्र काहीच पाउस झाला नाही. मी बॉस्टनच्या भागात रहातो. थोडीशी भौगोलीक कल्पना येण्यासाठी, बॉस्टनच्या उत्तर भागात (एम आय टी आणि हार्वर्ड असलेले) केंब्रिज आणि (टफ्ट्स युनिव्हर्सिटी असलेले) समरव्हील ही दोन शहरे आहेत. समरव्हील हे त्यामानाने खूपच लहान शहर आहे, जमीन आणि पाणी धरून केवळ साडेचार स्क्वेअरमाईल्सचे. थोडक्यात बॉस्टन-समरव्हील-केंब्रिज हे सर्व एकमेकांच्या शेजारी असून लागून असलेली शहरे आहेत. मागच्या महीन्यातील म्हणजे १० जुलैस आम्ही दुपारी केंब्रिजमधे एका रेस्टॉरंटमधे असताना मुसळधार पाऊस पडला. तसे त्यात काही विशेष वाटले नाही. पण पैसे देऊन झालेले असताना देखील आम्हाला (आणि तसेच इतर अनेकांना) ताटकळत रहावे लागले... नंतर आम्ही तशाच थोड्या कमी झालेल्या पावसात बॉस्टनमधे गाडीतूनच चक्कर मारली आणि समरव्हीलच्या बाजूस वेशीला लागून असलेल्या (अजून उत्तरेकडील) आर्लींग्टन मधे गेलो. तेथे अर्थातच पाऊस पडून गेल्याचे दिसले पण विशेष नव्हते. मात्र या बॉस्टन-केंब्रिज आणि आर्लींग्टनच्या मधे असलेल्या समरव्हील शहरात मात्र जवळपास साडेचार इंच पाऊस हा एका तासाच्या आत पडला होता. परीणामी येथील पोलीस मुख्यालयाचा पहीला मजला हा पाण्यात गेला होता, एक शाळा ही पूर्ण पाण्यात गेली होती. शिवाय अनेक रहीवाशांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे नुकसान झाले ते वेगळेच. हायवेच्या खालून जाणार्‍या अंडरपासमधे तर पाणी इतके झपाट्याने वाढले की एका बाईची गाडी अडकून ती बाई गाडीतच पाण्याखाली जाणार होती. सुदैवाने एका ऑफड्यूटी फायरफायटरने जाताना पाहीले, तीला बाहेर काढले आणि तीच्याबरोबर मदत येई पर्यंत गाडीच्या टपावर बसून राहीला. केंब्रिज-बॉस्टनमधे पण पाणी साचले पण पावसाचा जोर कमी असल्याने इतके प्रकार घडले नाहीत. आज हे सर्व निस्तरताना लाखो डॉलर्सचा खर्च हा स्थानीक सरकारला पडत आहे तसेच रहीवाशांना देखील त्यांच्या पद्धतीने काही खर्च पडत आहेच. वास्तवीक अशावेळेस नैसर्गिक आपत्ती जाहीर करून राज्य आणि केंद्र (फेडरल) सरकार मदत करते. पण येथे ते होऊ शकले नाही... का? कारण एका विशिष्ठ ठिकाणीच साडेचार चौ.मैलाच्या आतच हे घडले, तसेच थोडे-फार बॉस्टन-केंब्रिज भागात घडले. कायद्याच्या भाषेत येथील संपूर्ण काउंटीमधे घडले नाही, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती जाहीर करता आली नाही. त्यामुळे विमा असल्यास वाचलात नाहीतर पाकीटातून पैसे काढून खर्च करा अशी अवस्था. :(

In reply to by विकास

कायद्याच्या भाषेत येथील संपूर्ण काउंटीमधे घडले नाही, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती जाहीर करता आली नाही कायदा गाढव असतो हे तत्व जागतिक दिसते! आता ढग फुटी म्हणजे, एका छोट्या भागात, फार कमी कालावधीत होणारा प्रचंड पाऊस, हे कळले. पण हे नेमके कसे होते. ह्याचे अनुमान आधी बांधता येते का इ. बद्दल कुणाला माहिती असेल तर द्यावी (हवीतर स्वतंत्र्य धाग्यात).

लेह भागात जो पाउस झाला तसा रेकॉर्ड पाऊस त्याभागात पुर्वी कधी झाला नव्हता.ढगफुटीचा अनुभव २००८ ला आमच्या भागात मी एकदा घेतला आहे.आमच्या इथे १० किमीवर वडगाव म्हणुन एक गाव आहे तिथे पाऊस आमच्या भागाच्या मानाने खुप कमी होतो. २००८ ला तिथे दुपारी ३ला अचानक जोराचा पाऊस सुरु झाला.त्या भागात तो ४-५ चौकिमी भागात तुफान पाऊस अर्ध्याएक तासात पडला. लहान नाले ओढ्याना पुर आला. एका नाल्यात एक वयस्क शेतकरी वाहुन गेला. अजुनही ढगफुती म्हणजे नेमके काय होते ह्यावर ज्यादा माहिती उपलब्द नाही.