च्च! ज्युनिअर केजीतल्या मुलांना मार्क वगैरे म्हणजे अतिच आहे. :S धड mortar skill सुद्धा विकसित झालेली नसतात. इतक्या लहान वयात हे असे ओझे लादून काय साध्य होते.
हम्म!
आजकाल इतक्या लहान मुलांना मर्क्स देण्याची चढाओढ शाळाशाळांमध्ये लागलेली असते. चौथी इयत्ता पूर्ण होइपर्यंत हळूहळू त्यांना मार्क्स किंवा ग्रेडस बद्दल कळावे असे वाटते. इतक्यावेळा अभ्यासातून आलेल्या ताणाचा विषय चघळला जातो, अगदी नको ती पायरी विद्यार्थी गाठतात पण आजूबाजूला बघताना लोकांच्या मानसिकतेत काहीही बदल झाला नसल्याचे जाणवते. या विषयावरचा असलेला '३ इडियटस' हा सिनेमा म्हणूनच तरूण वर्गाला जास्त आवडल्याचे समजते.
तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी.
रेवती
>तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी.
खरे आहे.
तिज्यायला...बालवाडीत हिंदी???...
पाचवीत येईपर्यंत हिंदी आणी विंग्रजीचा संबंध पण नव्हता आधी.
धड एक भाषा नीट शिकवा म्हणा आधीतरी...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
माझ्या मोठ्या भावाच्या बाबतीत पण असेच झाले होते. आई म्हणाली होती एकदा की त्याला ज्युनिअर की सिनिअर केजी मध्ये "भ" काढता येत नसे आणि म्हणुन त्याला त्याच्या बाई ओरडत असत.........माझा मोठा भाऊ मग घरी येऊन रडत असे व शाळेत जायला भीत असे. काही दिवस सहन केल्यावर मग एके दिवशी माझ्या आईने सरळ शाळेत जाऊन त्या बाईंविरुद्ध कंप्लेंट केली. मुख्याध्यापिका अतिशय सज्जन होत्या. त्यांनी आईला पुर्ण सहानुभुती दाखवत त्या बाईंना समज दिली. पुढे परत त्या बाई माझ्या भावाला "भ" काढता येत नाही म्हणुन ओरडल्या नाहीत. पण ती गोष्ट माझ्या भावाच्या अजुनही लक्षात आहे. तो म्हणतो कि जर का त्या बाई समोर आल्या तर मी त्यांना तुमचं वागणं किती चुकीचं होतं हे नक्की सांगणार आहे. अशा गोष्टी पटकन विसरल्या जात नाहीत. भोचक साहेब व बाकी सभासद ज्यांची लहान मुले आहेत, तुमच्या मुलाला/मुलीला ती टीचर असाच त्रास देत राहिली तर सरळ शाळेत कंप्लेंट करा. टीचर विरुद्ध तक्रार केली तर परीक्षेत कमी मार्क देतील वगैरे विचार करु नका. असे काही होत नाही. तुमच्या मुलीला तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोण करणार. आत्ता ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या त्यात पालकांनी मुलांना सपोर्ट केला असता तर त्या टाळत्या आल्या असत्या असे वाटते. ह्या विषयावर प्रभुसरांचे मत वाचण्यास उत्सुक आहे.
अमोल, तू म्हणतोस ते खरंही असेल... पण शिकवणे ही तारेवरची कसरत आहे हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. लहान मुलांना, विशेषतः केजी वगैरे मधल्या मुलांना थोडीफार तरी जबरदस्ती करावीच लागते. आणि प्रत्येक मूल सारखेच सेन्सिटिव्ह नसते. प्रत्येकाला वेगवेगळी टेक्निक्स वापरावी लागतात. कदाचित, त्या बाईंनी जबरदस्ती केली नसती आणि भावाचे अक्षर खराब राहिले असते तर आपण बाईंनाच दोष दिला असता ना? अर्थात शिक्षकही माणसेच आहेत आणि रागलोभाचे बळी असतातच. म्हणून म्हणले की कोणतीही एक बाजू धरून उपाय नाही... तारेवरची कसरत आहे, प्रत्येक पाऊल टाकताना त्याक्षणीचा तोल सांभाळायला हातातली काठी डावीकडे की उजवीकडे झुकवायची हे बघावे लागते.
बिपिन कार्यकर्ते
केजी मधल्या मुलांना जबरदस्ती ?
शिस्तीचा अभाव असू नये पण हस्ताक्षर सुधारण्यासाठी केजी च्या वयात जबरदस्ती करणे म्हणजे अतिच वाटतयं .
जय महाराष्ट्र , जय मराठी !
ज्यु.केजी इतक्या लहान वयात लिहायला शिकवणे ही चूक आहे जी आपल्याकडे हल्ली सर्रास करतात! इतक्या लहान वयात मुलांच्या हाताला अक्षरांचे वळण बसणे अवघड असते. मोटर कंट्रोल हा साधारण
पहिलीच्या आसपास यायला लागतो. त्याआधी फक्त अक्षर ओळख एवढेच असते. आणि मार्कांची गोष्ट तर अतिशयच चुकीची आहे, अशाप्रकारे चूक दाखवून देणे ह्याने त्या विद्यार्थ्याचा सर्वांदेखत पाणउतारा होतो आणि ते मनाला लागते. मार्कांच्या भानगडीत न पडता फक्त योग्य-अयोग्य सांगितले जाऊ शकते कारण त्या वयात तेवढेच आव्श्यक असते.
चतुरंग
आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. मुलांवर अवाजवी आपेक्षा लादू नये.
झाड वाटेल तसे वाढू द्यावे, चुकार वेली फक्त त्यावर वाढू देवू नये.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
आपल्याकडच्या बहुतेक शाळा म्हणजे मुलांना कारकून बनवण्याचे कारखाने आहेत. जोपर्यन्त गुणांच्या टक्केवारी वर मुलांची गुणवत्ता ठरवली जाते तोवर अधिक मार्क मिळवण्याची स्पर्धा संपणार नाही.
"औ" काढायला?
"ते जे काही मुलीने काढलं आहे ते "औ" आहे" हे तर त्या बाईला कळलं होतं ना? (कळलं नसतं तर सगळेच मार्क कापले असते ना?) मग प्रॉब्लेम काय आहे? ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल?
२ मात्रा एका कान्यातून नाही आल्या, काय एवढा फरक पडतो? हा प्रश्न त्या बाईला कोणीच विचारताना दिसत नाही आहे? मार्क कापा (मुळात असल्या गोष्टींना मार्क हेच पटत नाही) कापू नका, पण असली तर्कटं लहान मुलांच्या माथी का मारता असा जाब त्या बाईला कोणी विचारणार आहे का? मी दुसर्याच दिवशी त्या बाईची सदिच्छा भेट घेतली असती हे नक्की!!
अवघड आहे!!!
माझ्या मुलाला आम्ही आत्ता मुळाक्षरे शिकवत आहोत. ते ही फक्त अ ते अ: पर्यतच. आणि ते ही फक्त ओळखायला.
लेख विचार करण्यास उद्युक्त करतो हे नक्की.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
त्या बाईंना मिपा वरची सभासद करून घ्या.
अवांतर: कोठे गायब होता ईतके दिवस? ऑ?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
माझी गोष्टतर याहून वेगळी आहे. मला तर चित्रकलेमध्ये नापास केले होते. बाकी सगळ्या विषयात पास
मग माझी आई शाळेत जाऊन भेटली व मी चित्रकलेत पास झालो. अजुनही मी चित्रकलेत नापास होतोय. ईजिनियरींग ड्रॉईंग कसे पास झालो ते पुणे विद्यापीठाला माहिती!!!
@ एक
ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल?
जबरदस्त !!!!
मी ईजिनियर असुन अजुन पट्टीनेपण सरळ "लाईन" मारु शकत नाही.
माझी "लाईन" वाकडी असते..
प्रतिक्रिया
च्च!
+१ सहमत
त्या मॅडम
हम्म! आजकाल
+१
तिज्यायला..
ही टीचर
चांगला लेख
अमोल, तू
केजी
वेलकम टू द
पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...
असे
औच !
पहिली गोष्ट
आपण
हल्लीचे
कारकून बनवण्याचे कारखाने
पण ती मुलगी खरच चुकली का
अवघड
अगदी! आमच्य
त्या
चित्रकला आणि नापास
भोचक, आज तुमची छकुली राहून राहून परत परत आठवते ...