जगदंब.............जगदंब!!!
अरे काय हे?
एव्हढे छळ? अरेरे....कसं जगत..आपलं...'प्रवास'त असतील तिथले लोक?
आम्ही साला महाराष्ट्रात इतका माज करतो, एका बसमध्ये बसायला जागा मिळाली तरी शेजारचा माणूस डोक्यात जातोय म्हणून सरळ ती बस सोडून दुसर्या बसमध्ये चढतो. 'यष्टी'चे चालक-वाहक अरेरावी करतात पण इतका अमानवी छळ तरी नाहीत मांडत बुवा.
भोचकराव,
आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय :-(
भोचक राव,
तुमचा अनुभव आवडला. माझ्या अंदाजाने हा अनुभव इंदौरच्या सरवटे वरचा असावा. नाकाला होणार्या जाणीवे बद्दल बोलतोय मी !
कमी अधीक फरकाने मध्यप्रदेशात ही अशीच परिस्थीती आहे. इंदौर , उज्जैन, खंडवा, धार आदी भागांत फिरून मी हा अनुभव घेतलेला आहे.
अवांतर : जारीया, आरीया, भीया, खसको ही खास मालवी भाषेतील शब्द आहेत. आणि आताशा इंदौरी भाषेला 'यार' नावाचं नवं क्रियापद लाभल्याचं जास्तच कानावर आलंय. :-)
(इंदौरी) नीलकांत.
horrible donot feel like visiting MP compared to that our ST is thousand times better. If we observe Maharashtra is much much better compared to other states in almost all aspects. however your observation is vey nice and milute you draw the correct picture good one.
भोचक महाराज इंदूरकर,
झक्कास टिपलंय. फक्त आणखी दोन गोष्टींचा (कधी काळी मला दिसलेल्या) उल्लेख त्यात सुचवासा वाटतो.... तो म्हणजे "डिरेवर आणि किलनर' यांची संवाद भाषा.
गाडीत कोंबायला "सवारी' सापडली की दारातील शेवटच्या पायरीवरचा "किलनर' बोंबलतो
- रोक्ये.
आणि एकदा का ती "सवारी' गिळली की, चक्रधारी डिरेवरला कॉल दिला जातो तो
- बढाव.
आताही तेच शब्द आहेत का, माहित नाही. असावेत.
चु. भू. दे. घे.
तुमचाच मित्र
अजय
प्रतिक्रिया
बापरे
जगदंब.............
अनुभव
घेतले
:(
योग्य वर्णन..
horribel
झक्कास टिपलंय