प्राजुच्या "फुलांची आर्जवे" कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ
मी रविवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजन वाटीकेमध्ये पोहोचलो. "आर्जवे फुलांची " हया प्राजक्ता ( प्राजु ) च्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ. कार्यक्रमाला सुरवात होऊन जवळपास अर्धा-पाऊण तास झाला होता. विशेष म्हणजे प्रकाशित होणार्या कवितासंग्रहाची कवयित्री - प्राजक्ता - काही कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकली नाही.
कार्यक्रम चित्तरंजन वाटिकेत झाडांच्या दाट सावलीत घेण्यात आला होता. मान्यवर पाहुण्यांसाठी टेबल-खुर्च्या आणि इतर उपस्थितांसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. झाडांवर स्पिकर्स लावण्यात आलेले होते. एकूण व्यवस्था अतिशय चांगली झालेली होती. मान्यवरांमध्ये जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे ( अध्यक्षस्थानी ), श्री. सुधीर गाडगीळ ( प्रमुख पाहुणे ) आणि विशेष निमंत्रीत श्री. लक्ष्मीकांत देशमु़ख, जिल्हाधिकारी, कोल्हापूर हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे उसाचा थंड रस देऊन स्वागत करण्यात आले.
मी पोहोचलो त्या सुमारास प्रसिध्द गायिका वीणा जोगळेकरांनी पुस्तकातून निवडलेल्या एकूण कवितांपैकी शेवटची कविता गाऊन झालेली होती. त्यानंतर लगेचच प्राजक्ताला मोबाईल फोनवरुन फोन लावण्यात आला आणि तिचे मनोगत सांगण्यासाठी तिला आईने सांगितले. मोबाईल फोनचा स्पिकर ऑन करून तो माईकजवळ धरण्यात आला होता, त्यामुळे फोनवरचे सर्व बोलणे अगदी स्पष्टपणे सगळ्यांपर्यंत पोहोचत होते. प्राजक्ताने आलेल्या मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून आपले मनोगत अतिशय सुंदर शब्दात सांगितले. स्वतःच्या पहिल्याच पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित न राहू शकल्यामुळे दिलगिरी व्यक्त करताना ती फार हळवी झाली होती.
प्राजक्ताच्या मनोगतानंतर श्री. लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी केलेल्या आपल्या भाषणात- परदेशात राहूनसुध्दा प्राजक्ताने जपलेली मराठी साहित्याची आवड आणि कवितांच्या रुपाने आत्तापर्यंत केलेले थोडे बहुत योगदान- ह्याचे कौतुक केले. पुस्तकातल्या काही कविताही त्यांनी वाचून त्यावर भाष्यही केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. सुधीर गाडगीळ ह्यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत भाषण केले. त्यात त्यांनी कविता संग्रहातल्या आवडलेल्या कविताबद्दल सांगितले. ते पुढे म्हणाले "प्राजक्ताने मनोगत व्यक्त करताना एकही इंग्रजी शब्द उच्चारला नाही ह्याबद्दल मला विशेष कौतुक वाटले. अनेक वर्षे परदेशात राहुनसुध्दा अस्खलीतपणे मराठी बोलणार्या प्राजक्ताचा ' शिष्या' म्हणून अभिमान वाटतो".
श्री. सुधीर गाडगीळांच्यानंतर समारंभाच्या अध्यक्षा कवयित्री आसावरी काकडे ह्यांनी भाषण केले. त्यांनी प्रकाशित झालेल्या ह्या कवितासंग्रहातल्या कविताचे विषय, आशयवार वर्गीकरण करून काही आवडलेल्या ओळी वाचून दाखविल्या आणि आवडण्याचे कारणही सांगितले. त्या आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या कि, " प्राजुची कविता हळुवार, संवेदनाशील आणि गेय आहे. आजकलच्या वास्तववादी आणि मुक्तछंदातल्या कवितांच्या युगात अशी कविता तयार करणे हे कौतुकास्पद आहे".
हा प्रकाशन सोहळा उत्तमप्रकारे पार पडावा ह्यासाठी - प्राजुची आई, प्राजुचे सासरे, श्यामलाताई ह्यांनी बरीच मेहनत घेतल्याचा उल्लेखही मान्यवरांनी आपल्या भाषणामधून केला. त्याचबरोबर प्राजुची कविता सर्वार्थाने समृध्द होण्यामध्ये तिच्या आईने दिलेल्या प्रोत्साहनाचा आणि तिच्यावर केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा आहे असे कवयित्री आणि श्री. देशमुख आपल्या भाषणात सांगितले.
शेवटी श्यामलाताई देसाईंनीसुध्दा पुस्तकातल्या एका कवितेचे वाचन केले.
उपस्थितांची संख्या ७५ पर्यंत पोहोचली होती. मिपा परिवारातील माझ्या व्यतिरिक्त बिपिन कार्यकर्ते, चतुरंग, रेवती आणि लालसा हे समारंभाला हजर होते. लालसा तर चाळीसगांवहून आलेले होते.
http://picasaweb.google.com/prajakta.j.patwardhan/PhulanchiAarjave#
इथे फोटो पहाता येतील.
वर्गीकरण
छान झाला
सोहोळ्याच
प्र.का.टा.आ.
मस्त. पुण्य
धन्यवाद
छान
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन..
In reply to हार्दिक अभिनंदन.. by खादाड_बोका
त्या तुम्ही
In reply to त्या तुम्ही by आनंदयात्री
+१
प्राजुचे अभिनंदन!
फोटो
In reply to फोटो by मीनल
+१
प्राजुंचं
कालंच फोटू
छान
अभिनंदन!!!
अभिनंदन
प्राजू, हार्दिक अभिनंदन!
समारंभ
हार्दिक अभिनंदन प्राजु