पाकृ आवडली. लगेच बनवायला घेतली. खाली देत आहे.
अस्तित्त्व म्हणजे एक राडा असतो
नेटाने रोज रोज भोगायचा असतो
अस्तित्व म्हणजे एक गाडा असतो
फार जड पण ओढायचा असतो
क्ष: स्वातंत्र्य
(य, क, व):
(आज, उगवणे, प्रकाश)
(माज, उतरणे, जमिन)
(लाज, वाटणे, विहिर)
(खाज, असणे, विकार)
(बाज, झोपणे, अंधार)
......
हे सर्व असूनही कविता प्रणालीप्रमाणे बनवता येत नाही. कोणी मदत करू शकेल का?
स्वातंत्र्य कुठे आहे आज?
उगवलेल्या वर्तमानास पूसतो
परवशतेत का प्रश्नांचा माज?
उतरतांना जमिनीस पूसतो
पारतंत्र्यात कसली असावी लाज?
खचतांना थिजून पूसतो
का व्यक्त करण्याची खाज?
'चिरंतन' मुक्त उत्तरतो
---------
कृपया प्रयत्नपूर्वक पाडलेल्या वरील ओळींचे गुणांकण करावे.
हा प्रयत्न निश्चितच चांगला आहे. पण गहन सामाजिक आशय असलेल्या कविता करण्याची स्थलकालाची मर्यादा तुम्ही ताणता आहात असं वाटतं. मुळात कवितकचा धडा गोड, हलकंफुलकं काव्य कसं करावं हे शिकवणारा आहे. असे तिखटजाळ प्रश्न पुसण्याने अश्रू पुसण्याची पाळी न येवो.
तोंड भाजणार नाहीत, पण जिभेला तर्रारी येईल अशा बेताच्या ज्वलंत कविता करण्याचे धडे नंतर येतीलच.
हिंटप्रमाणे कशीबशी कविता तयार केली. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे केल्या. त्यावर असा शेरा. प्रयत्नांसाठी तरी काही गुण दिले जावेत.
'क्ष' चूकलेला दिसतोय. क्ष कसा निवडावा यावर विस्तारपूर्वक मार्गदर्शन करावे.
कोठुन येते मला कळेना
प्रसवता ही कविवर्याला
कसे सुचते ते समजेना
कॅलफोर्न्याच्या घासकडव्याला
लेखे नाही काव्ये नाही
काय राहीले डकवायाला?
धडे काही कळले नाही
काय जाहले प्रसवायाला?
खुळ्या मनाचे खुळे बोल हे
भोके पडीती पण कवितेला
शीघ्र रचना करिती, परि ती
दिव्य कसबे कसली त्याला?
बालकवींची क्षमा मागुन.
किती दिवस लागले भौ लेख कंप्लिट करायला ? :)
हळु हळु वाचून पुर्ण करून प्रतिक्रिया देतो .. अंमळ १३% च वाचलंय ! सुंदर आणि अभ्यासपुर्ण लिहीलंय हो !
-(क्रमश: वाचक) टारेश किबोर्डबडवी
खदखदती भावना आणि (इतरांच्या) अस्तित्वाच्या जहरी बोचण्या असतील तर असा लेख चार ते पाच तासात सहज पडून जातो...;)
शिवाय, आमच्याकडे "लेखनिक" प्रणालीदेखील आहे, त्याने काम सुकर होतं.
राजेश
इतरांच्या अस्तित्वाच्या जहरी बोचण्या =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
दुव्यावरील कवितकाच्या आवृत्तीबरोबर काही होमवर्कही होता. एक प्रश्न पुढीलप्रमाणे:
खालील कवितेत गाळलेल्या जागा भरा
ती आरशाकडे रिक्त बघते,
आवर्तनांच्या वेदनांचे
प्रतिबिंब शोधते
तोच दिसतो
खिन्न
--------
---------
--------------
----------------
हा प्रश्न कसा सोडवावा याबाबत मार्गदर्शन अपेक्षित आहे.
तुम्ही खूपच पुढच्या वर्गातले प्रश्न विचारता आहात. आत्ता मी उत्तर देतो, पण वर्गाबरोबर राहा. नाहीतर प्रायव्हेट ट्यूशन लावा.
ती आरशाकडे रिक्त बघते,
आवर्तनांच्या वेदनांचे
प्रतिबिंब शोधते
तोच दिसतो
खिन्न
आनंदी
खिन्न
नाही दिसत
पण गवसले बिंब
तृप्तीच्या आचमनांनी
भरलेला आरसा ती पाहतो
श्री सुनीत, कवितकाची पुढील आवृत्ती तुम्हाला संपादीत करण्याचे निमंत्रण आहे का? 'राजसी मृद्गंधजातकी सलामी पापडामधला' या ओळीत 'मृद्गंधजातकी'च्या जागी 'पद्मासक्त' शब्द योग्य वाटेल का?
तुम्ही अनेक वेगवेगळ्या शहांची (मी चार तरी मोजले) मयुरासनं मोडून त्यांची शब्दरत्नं खुबीने मिसळल्याबद्दल तुम्हाला विशेष गुण मिळाले. पण प्रतिबिंबाचा जादूटोणा वापरता न आल्यामुळे, आशयगर्भतेला योग्य किनार लावता आली नाही असंच म्हणावं लागतं. आकारबंध विस्कळीत झाला. तुम्हीदेखील वेगळ्याच वर्गातल्या प्रश्नाचा विचार करत असावात असं वाटलं. खिन्नशी क्लिन्नचे ध्वनिमाधुर्य तुम्ही ठेवलं आहे, आणि दुर्गमतेचं ओझं तुम्हाला पेललं नाही, तरी वाचकाला त्याहूनही पेलणार नाही इतपत भान ठेवलेलं आहे. त्याचीही गुणवाटपात नोंद केलेली आहे.
मिसळपाववर जाऊन
विसोबाला कळवा
तो घासोबुवा कडवा
आला म्हणून
एकीकडं घेऊन
कानात सांगा हळू
कोणालाबी कळू
देऊ नका
खेचरांवरती कालच
निघाला तांडा
एकशे सात Xण्डा
(फुल्या भरा !)
जनातल्या मनात
उतरला "घाशा"
त्याची चांगली सेवा
झाली पायजे
काथ्याकूटी मठात
उतरतील बुवा
त्यांचे चांगली सेवा
झाली पायजे
सगळ्या संपादकां
आताच सांगून ठेव
मंडाळीना सगळ्यां
"चांदण्या वाटप "
यांना सगळं माफ
शिव्याबिव्यांसकट
तात्या म्हणतो माझी
माणसं आहेत
कळता कामा नये
अनुस्काला अक्षर
नाहीतर लष्कर
बोलवील बया
विसोबाच्या कानात
सांगितलेली गोष्ट
ऐकू गेली स्पष्ट
अनुस्काला
(पुन्हा एकदा कोलटकरांची क्षमा मागून !)
पंढरपूरला जाऊन
विठोबाला कळवा
तो बळवंतबुवा भडवा
येतोय म्हणून
एकीकडं घेऊन
कानात सांगा हळू
रख्माईला कळू
देऊ नका
मुंबईहून कालच
निघाला तांडा
एकशेसात रांडा
संगती आहेत
कबीराच्या मठात
उतरतील बुवा
त्यांची चांगली सेवा
झाली पायजे
च्यावाल्यांना सगळ्या
आत्ताच सांगून ठेव
मंडळीना शेव
गाठ्या फुकट
यांना सगळं फुकट
शेव पुरी भाजी
विठ्ठल म्हणतो माझी
माणसं आहेत
कळता कामा नये
यातलं रख्माईला अक्षर
नाहीतर ती लष्कर
बोलवील बया
विठोबाच्या कानात
सांगिरलेली गोष्ट
ऐकू गेली स्पष्ट
रख्माईला
कवितेच्या वर्गात विडंबन केल्याबद्दल श्री सुनीत यांचा निषेध. त्यांच्या दोन्ही प्रतिसादात वर दिलेल्या प्रणालीचे पालन झालेले नाही. या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीही या प्रकारामुळे त्रासलो आहे. धागाप्रवर्तकांनी या प्रकाराविरुद्ध मोहीम सुरू करावी. श्री सुनीत यांनी वरच्या वर्गातल्या मुलांसमोर प्रतिभेचे कसब दाखवावे. उगाच आम्हा नवशिक्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करू नये.
अक्षय, कवन कर.
घाशा, कवन कर .
धना, कवन कर.
कवन कवन कवन.
हा पहा मुसु आला.
त्याला श्री. जोडा.
शालजोडीतला हाणा.
या बालांनो या रे या
शेंबूड पुसुनि सारे या
काव्य करा रे काव्य करा
वेळ फुकट दवडा खरिचा
काम करे , तोचि फसे
बरि नाही, वृत्ती अशी !
जालावरती पडीक असा !
सुंदर काव्याची शाळा !
या बालांनो या रे या ....
सुरुवातीला मजा आली मग अवघड वाटू लागले.
काम करे , तोचि फसे
बरि नाही, वृत्ती अशी !
म्हणजे काम केल्यास माणूस फसतो, असे काही सांगायचे आहे का? माणूस फसल्याशिवाय काम करूच शकत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे वरची कविता एकाचवेळी बंडखोर वाटते पण शेवटी मूख्य प्रवाहात येण्याचे आमंत्रण देऊन कविता उपलब्ध चौकटीस मान्यही करते.
(रसग्रहणाचीही प्रायवेट ट्युशन चालू असल्याने वरचे लिहिले.)
हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही
पण गोड गोड असल्याने तोंडास मिठी बसते. दीर्घकालीन परिणाम - शाळकरी भावुकतेने लडबडलेले चिकट बाप्ये/पोट्ट्या प्रेमात पडतात. अर्थात आपणही तसेच असाल, तर मग समानशीले व्यसनेषु...
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
मालिकेची सुरुवात तर छान झाली आहे.
बाकी या अशा लेखासाठी ( Content & Quality both) किती माकडं टंकायला (आणि कितीवेळ ) लागतील देवजाणे ?
जाता जाता, तुमच्या मयूरसिंहासनाच्या जनाकाचं Decoding केंव्हा करताय? :?
नंदू
>> म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.>>
काय सुंदर ओळ आहे. अहो कविता कविता म्हणतात ती हीच की!!
:)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
साला हा ग्रासस्टांझाज एक नंबरचा वाय झेड आहे.
लय भारी लेख राव ! संदीप खरेची सगळी सीक्रेट्स कळली.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
ती गेली तेव्हा रिमझिम
घन ओथंबोनि झरती
घनव्याक्कुळ मीही रडलो
नदीलाही सागर भरती
वार्याने हलविले रान
असा वारा हा बेभान
नदीलाही पूर मग आले
उतरून नभा अन गेले
ती नव्हती संध्यामधुरा
माझिया व्यथेचि पूर्ति
माझिया मृत्युतच होते
येते ती आणखी जाते
स्वर्गंगेच्या त्या तीरी
जांभूळ पिके तरुवरी
हा ढोल कुणाचा वाजे
अन स्कंधि कुणाचे ओझे
(मुसु भावसर्गमी रमता
प्रतिभेची पडली लत्ता !
हृदयस्थ वाजती तारा
बाळुचे वाजती बारा !)
* संपादित : काही यतिभंगांची दुरुस्ती
** येथे "यति" ही वैयाकरणी संज्ञा आहे. तेथील यतिंनी घाबरू नये.
क्ष, य, क, व पायर्या दाखवाव्या. नाहीतर क्रेडिट दिले जाणार नाही. दुसर्या वर्गमित्राकडून फक्त आउटपुट घेतल्याचे समजले जाईल.
वर्गमित्राकडून आउटपुटसह अल्गोची पूर्ण प्रतही घेण्याची तसदी घेतल्याशिवाय परीक्षार्थ्याला अभ्यासातले गांभीर्य कळले, हे लक्षात येत नाही.
बरं, जे दिलंय ते तर तपासून पाहू....
यमकांचा क्रम वेगवेगळ्या कडव्यांत वेगवेगळा आहे. यावरून प्रणाली नीट वापरली नाही - डागडुजी करताना ताजमहालाला विटा लावल्या हे कळतं. -२
वर्गमित्रांच्या काही मूळ ओळी बदलून न साधलेल्या छंदात बसवण्याचा कवीला नाद दिसतो. त्यामुळे ते कवितेच्या खांद्यावरचे ओझे होते -२
कविता कुणाविषयी आहे हे नीट कळत नाही. मध्येत ती असते, थोडा निसर्ग भटकल्यावर मी येतो, एक ओझंवाला येऊन जातो. आणि शेवटी एकदम मुसु, बाळु, आणि यतीन येतात. भरकटलेली. -२
कवितेचा संदेश एकदम शेवटच्या ओळींत आल्यासारखा वाटतो. मग या दोन वेगवेगळ्या कविता एकत्र करण्याचे प्रयोजन कळत नाही. निदान सर्वांना तरी नाही. -२
हस्ताक्षर सुंदर आहे. +२
क्रेडीटासाठी लढविली
खिंड कवतिकि
राग ये "वैद्या"च्या चित्ती
बैसला रागे तो हट्टी
"बाळु"च्या गाण्याची ही रीत जी
जी जी जी जी जी
परि मुसु नाही डगमगे
पेटिला धगें
तमा ती नाही "पायर्यां"ची
स्फूर्तिला नाही क्रेडीटाची
इन्स्पिरेशनच्या नावाचा घोळ हो जी
जी जी जी जी जी
प्रस्तुत वर्गचालकाने प्रस्तुत वर्गातल्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून काही शिष्ट आणि थोराड विद्यार्थ्यांना हाताशी धरून विडंबने लिहिण्यास सुरूवात केलेली आहे. प्रस्तुत धाग्यावर होत असलेल्या प्रस्तुत हैदोसाने कासाविस होऊन प्रस्तुत प्रतिसादलेखक मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदवण्यासाठी निवेदन तयार करत आहे. कृपया प्रस्तुत विचाराशी सहमत असल्यास प्रस्तुत प्रतिसादलेखकास व्यनिने कळवावे.
वरील कवितेला विडंबन म्हटल्याबद्दल आक्षेप. ती मूळ कविता आहे - अग्निरथ छंदातली. जरूर मुख्याध्यापकांकडे तक्रार करावी. अभिजात आणि स्वसिद्ध काव्य विद्यार्थ्यांपुढे ठेवणे हे कवितानिर्मितीविषयक पाठ्यक्रमाला अनुसरूनच आहे.
प्रतिक्रिया
आत्ताच बनवली
गृहपाठ : प्रगत शिक्षणार्थी स्तरावरची कलावादी कविता
दहापैकी साडेनऊ
प्रश्न, मदत
हिंट
प्रयत्न
सामाजिक आशय
कदाचित क्ष चूकला असावा
आमचा पण गृहपाठ.
हाहा
चालू द्यात
छान!
किती दिवस
काळ
इतरांच्या अस्तित्वाच्या =))
हाहाहा
कवितकची आवृत्ती
प्रतिबिंबाचे मंत्रभास
बरोबर आहे
ती आरशाकडे
हा हा
=))
ह्यो बाबा
प्रकाटाआ
दहापैकी सहा मार्क
आणखी एक
=))
सुनीतराव लै दिसांनी
मूळ कविता "निरोप"
मार्क वगैरे नाहीत
क्या बात है!
निषेध
बरं तर पूर्वप्राथमिक वर्गातला धडा ...
तरल
वा वा मस्त धडा!
अय्या किती गोड
कविता Decoded.
उच्च
हा हा
साला
+ १ तर काय!
+१ सहमत. लै
कवितक वापरून माझाबी एक प्रयत्न
शो युवर वर्क फॉर क्रेडिट
तेच म्हणतो मी
संज्ञामग्न पुरुषाची लक्षणे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
क्रेडीटासाठी लढविली
अरे मिस्सळपाव (झुक झुक झुक झुक झुक झुक झुक झुक)
तक्रार
आक्षेप...
Pagination