वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती
आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.
आपल्या दुर्दैवाने राजकीय पक्षांना यश आले आणि विदर्भ वेगळे राज्य झाले तर मुंबैसह सर्व उर्वरित महाराष्ट्राला वीजेच्या आतापेक्षा जास्त टंचाईला सामोरे जावे लागेल असे वाटते. महाराष्ट्रातील वीजनिर्मितीचा विचार करता ९ पैकी ४ पॉवर प्लान्ट विदर्भात आहेत (पारस, जि. अकोला; कोराडी, जि. नागपूर; खापरखेडा, जि. नागपूर; आणि चंद्रपूर). त्यांची एकत्रित विज निर्मिती क्षमता ४३१८ मेगावॉट आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील भुसावळ, नाशिक, परळी, पोफळी, आणि उरण यांची एकत्रित वीजनिर्मिती आहे ४८१० मेगावॉट..! आताच या सगळ्या प्लान्ट्स मधील विज आपल्या महाराष्ट्राला पूरेशी होत नाही, मग विदर्भ वेगळा झाल्यावरची परिस्थिती काय होईल, विचार करा..! एक लक्षात घ्या, त्यावेळी विदर्भाकडे सरप्लस होणारी वीज त्यांना नैशनल ग्रिडला द्यावी लागेल.
ही माहीती फक्त आपल्या माहीतीसाठी देत आहे. विचार जरूर करावा.
(सर्व आकडेवारी www.mahagenco.in वरून साभार).
वाचने
2933
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला प्रस्ताव
....
In reply to चांगला प्रस्ताव by अक्षय पुर्णपात्रे
या आधीची
@
@
बरोबर
In reply to @ by अभिषेक पटवर्धन