Skip to main content

आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !

लेखक दशानन यांनी रविवार, 27/09/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस ! ह्या वीराला शत शत नमन ! * सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य ! ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!

वाचने 3292
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by सोनम

आपण त्याचे जन्मभर ऋणी राहू. दिपाली :)

शहिद भगतसिंग आणि त्यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे आपण आजन्म ऋणी राहू.. त्यांच्या नि:स्वार्थी बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत! शतश: प्रणाम!! - कोकणी फणस

भगतसिंहाना शतशः सलाम !!!! प्रभो

यांना कोटी कोटी प्रणाम --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

कोटी कोटी प्रणाम ह्या महान वीराला.

"मेरा रंग दे बसंती चोला" म्हणत हसत हसत फाशी जाणार्‍या हिंदुस्थानच्या या महान सुपुत्रास शतशः प्रणाम!!!!!!!!!!!! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

हिंदुस्थानच्या या महान सुपुत्रास शतशः प्रणाम!!!!!!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हिंदुस्थानच्या या महानायकास कोटी कोटी प्रणाम !!! मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

आपण सलाम , मुजरा , प्रणाम करू.. पुढे काय? :(

In reply to by लवंगी

व्यर्थ न हो बलिदान म्हणत आपला खारीचा वाटा उचलायचा.

वीर शहीद भगतसिंगाला विनम्र वंदन! ... धागा धागा अखंड विणु या, शहिदांचे नित स्मरण करू या.

सुरासों पहचानीए जो लड़े दीन के हेत, पूर्जा पूर्जा कट मरे कभी ना छड़े खेत!!! आमच्या हिरोला विनम्र अभिवादन! -क्रांतीकारी.

In reply to by Nile

नाईल्या, मस्त पंक्ती :) हुतात्मा भगतसिंग ह्यांना विनम्र अभिवादन _/\_

माझ्या मतदार बंधु आणु भगिनीण्नो (त्यांच्या) ऐन तारुण्यात देशासाठी म्हणुन फासावर जाण्यासाठी लागणारे अलोट धैर्य (?) भगतसिंग आणि अश्याच इतर अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी दाखवले, त्यांचा आज देशाला विसर पडत चालला आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचे समाजाला स्मरण रहावे म्हणुन आमचा पक्ष नक्की काहीतरी करेल, याचा मला विश्वास वाटतो. या थोर क्रांतिकारकांना वंदन करुन मी आपल्याला असे सांगु ईच्छितो की, या देशाच्या प्रगतीसाठी आम्ही पहिल्या पासुन ठोस कामे करीत आलो आहेत, तरी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मला बहुमताने विजयी करा. च्यायला, प्रचाराच्या नावाखाली काहीही बडबडतात राव, काय काय म्हणुन सहन करायचे?