Skip to main content

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/09/2025 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले. महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती. देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला. २००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली. २०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली. शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21589
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

सहमत. सद्य परिस्थिती पहाता संघ अधिक बलशाली व्हावा हिच श्रींची इच्छा असावी. यदा यदा ही.....

आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे.

In reply to by कपिलमुनी

१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.

दुर्दैवानी (का सुदैवानी?) संघ कुणाच्याही टिकेमुळे थांबला नाही, थांबणार नाही. कुठलाही राजकीय पक्ष किंवा संघटना १००% "सर्व समाविष्ट" नाही हे वास्तव आहे. पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या "जातीत" जाणार, "रोटी-बेटी" व्यवहार कसा होणार हा प्रश्न वाचून गंमत वाटली. हिंदू किंवा इतर धर्मातून "शांती प्रिय" धर्मात जाणार्यांना/ ओढल्या गेलेल्यांना हा पर्याय असेल का किंवा विचारायची परवानगी आणि "धमक" असेल काय असा विचार मनात डोकावून गेला! ह्या धाग्यावर संघाविषयी मत मतांतरे वाचून अंमळ करमणूक झाली हे नक्की ! असो! एवढे टंकून थांबतो!

In reply to by नावातकायआहे

इतर धर्मात स्वागत करतात.. त्यातही भरपूर उपप्रकार आहेत. पण हिंदू एवढे कडक नाहीत. आणि आपण आपल्या धर्माची संख्या वाढवायची असेल. धर्म वाढवायचा टिकवायचा असेल तर आपलाच धर्म सुधारायला हवा ना. दुसरीकडे बोट घालून काय मिळणार ?

मी एका बाबतीत मात्र पूर्ण निश्चिंत आहे. संघाला भारत हा देश हिंदूराष्ट्र म्हणून आता कधीही घोषित करता येणार नाही. तसेच हिंदू समाजावर पण पूर्ण नियंत्रण संघाला कधीही मिळवता येणार नाही.

In reply to by युयुत्सु

एवढा ठाम निष्कर्ष कसा काढलात याविषयी उत्सुकता आहे. बाकी श्री. विवेक देशपांडे यांचा खालील व्हिडिओ पाहिला. RSS Exposed: Vivek Deshpande on Hindutva, Caste & Modi | The Politics | #gandhi #ambedkar #rssत्यात त्यांनी मांडलेले खालील मुद्दे रोचक आहेतः गेल्या ११ वर्षात संघाने सर्व शासकीय, निमशासकीय संस्था इथे फार मोठ्या प्रमाणात संघाचे कार्यकर्ते घुसवले आहेत. उदा. शासनात लॅटरल एन्ट्री प्रथम वर्ग अधिकारी. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्याला शासनाचे नोकर सचिव आहेतच, पण मुख्यमंत्र्यांनी म्हणे आधीच्या व आत्ताच्या कार्यकाळात वेगळे ओएसडी पण नेमले आहेत, जे संघाचे कार्यकर्ते आहेत. विद्यापीठातही मोक्याच्या जागी संघ कार्यकर्ते आहेत (उदा. जे एन यु कुलगुरू). नुकत्याच एक भाजप संघाच्या प्रचारक न्यायाधीशही झाल्या. गोदी मिडीयात तर अनेक पत्रकार संघाच्या बाजूचे आहेत. याच्या शिवायही त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, पण हिंदू राष्ट्र हे त्यांनाही शक्य वाटत नाही. तुंम्हाला ठामपणे हिंदूराष्ट्र म्हणून आता कधीही घोषित करता येणार नाही असे का वाटते?

In reply to by स्वधर्म

भारताला **“हिंदू राष्ट्र”** घोषित करण्याच्या कल्पनेभोवती अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न उभे राहतात. खाली या कल्पनेसमोरील मुख्य अडचणी (चॅलेंजेस) शक्य तेव्हढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या आहे्त. १. संविधानिक (कायदेशीर) अडचणी अ) भारताचे धर्मनिरपेक्ष संविधान भारताचे संविधान (१९५०) देशाला “सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक” असे घोषित करते. “धर्मनिरपेक्ष” हा शब्द १९७६ मध्ये (४२व्या दुरुस्तीने) स्पष्टपणे घातला गेला, पण त्याची भावना सुरुवातीपासून होती. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी संविधानाच्या प्रस्तावनेत (Preamble) आणि धर्मस्वातंत्र्याशी संबंधित कलमांमध्ये (कलम २५–३०) मोठे बदल करावे लागतील. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “Basic Structure Doctrine” (केसवानंद भारती खटला, १९७३) नुसार, संसद संविधानाची मूळ रचना बदलू शकत नाही — आणि धर्मनिरपेक्षता ही त्या मूलभूत रचनेचा भाग आहे. त्यामुळे ही दुरुस्ती न्यायालयात रद्द होण्याची शक्यता आहे. ब) मूलभूत अधिकारांवर परिणाम कलम १४ (समानता), १५ (धर्मावर आधारित भेदभावास मनाई), आणि २५–२८ (धर्मस्वातंत्र्य) यावर थेट परिणाम होईल. हिंदूंना विशेष प्राधान्य दिल्यास अल्पसंख्याकांवर भेदभाव झाल्याचा दावा होऊ शकतो. २. धार्मिक व सामाजिक विविधता अ) भारत धर्म-बहुल राष्ट्र आहे. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम, तसेच ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू इ. धर्मांचे लोक राहतात. हिंदू राष्ट्राची घोषणा अल्पसंख्याक समुदायांमध्ये घबराट, असुरक्षितता निर्माण करू शकते. ब) हिंदू धर्मातील अंतर्गत विविधता हिंदू धर्म एकसंध नाही; त्यात हजारो पंथ, जाती, प्रादेशिक परंपरा आणि देवता आहेत. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय? — यावरच हिंदूंत मतभेद निर्माण होऊ शकतात. उदा. शैव–वैष्णव, लिंगायत, दलित परंपरा इ.कोणती परंपरा “अधिकृत” मानायची, हा विवाद उभा राहील. ३. राजकीय अडचणी अ) बहुसंख्यवाद vs लोकशाही मूल्ये भारतीय लोकशाही सर्वसमावेशकता आणि विविधतेवर आधारित आहे, फक्त बहुसंख्यांची सत्ता यावर नाही. हिंदू राष्ट्राची घोषणा बहुसंख्यवादाकडे झुकणारी वाटू शकते, ज्यामुळे लोकशाही तत्त्वांवर प्रश्नचिन्ह येईल. ब) राजकीय ध्रुवीकरण (polarization) धर्म राजकारणाचे प्रमुख केंद्र बनल्यास पक्षीय संघर्ष तीव्र होऊ शकतो. अल्पसंख्याक बहुल राज्ये व प्रादेशिक पक्ष केंद्राशी संघर्ष करू शकतात. क) संघराज्य व्यवस्थेवर परिणाम ईशान्य भारतातील ख्रिश्चन बहुल राज्ये (नागालँड, मिझोराम) आणि दक्षिणेतील सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न राज्ये (केरळ, तमिळनाडू) हिंदू राष्ट्र घोषणेवर प्रखर विरोध करू शकतात. यामुळे संघराज्यीय ताण किंवा वेगळेपणाच्या चळवळी वाढू शकतात. ४. आंतरराष्ट्रीय परिणाम अ) राजनैतिक (Diplomatic) परिणाम भारताची जागतिक ओळख एक धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणून आहे. हिंदू राष्ट्र झाल्यास, मुस्लिम बहुल शेजारी देशांशी (बांगलादेश, मालदीव) संबंध ताणले जाऊ शकतात. मध्यपूर्वेतील देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांवरही परिणाम होऊ शकतो. ब) जागतिक प्रतिमा व अर्थव्यवस्था पाश्चात्य लोकशाही देशांकडून टीका, गुंतवणुकीत घट आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. भारताची “सॉफ्ट पॉवर” कमकुवत होईल. ५. सामाजिक तणाव आणि हिंसाचाराचा धोका हिंदू राष्ट्राची घोषणा झाल्यास काही ठिकाणी हिंसाचार, दंगली, धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. कट्टर गट (majority आणि minority दोन्ही) सक्रिय होऊ शकतात. कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ६. संकल्पनेतील अस्पष्टता “हिंदू राष्ट्र” ही कल्पना कायदेशीर दृष्ट्या स्पष्ट नाही. ती दोन प्रकारे समजली जाते — 1. संस्कृतीप्रधान राष्ट्र (RSS शैली) 2. धर्माधिष्ठित राज्य (कठोर हिंदू कायदे लागू) या दोन दृष्टिकोनांमुळेच अंतर्गत मतभेद व गोंधळ निर्माण होतो. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे हे फक्त प्रतीकात्मक नाही, तर संपूर्ण संविधानिक साच्यात, सामाजिक समतेत आणि राष्ट्रीय एकात्मतेत आमूलाग्र बदल घडवणारे पाऊल ठरेल. भारतातील विविधता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष परंपरा लक्षात घेता अशी घोषणा कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची व वादग्रस्त ठरेल. सर्वात महत्त्वाचे - असे धाडस करण्याने जो गोंधळ निर्माण होईल तो हाताळायची क्षमता संघ किंवा कोणत्याच हिंदू संघटनेमध्ये नाही, असे माझे मत आहे. आज मोठा समुदाय सध्याच्या घटनेवर जिवापाड प्रेम करतो, या समुदायाला डिवचणे महागात पडेल.

In reply to by युयुत्सु

आज केवळ अशक्य वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी कित्येक दशकांच्या अथक प्रयत्नांनी आणि अद्भुत रणनीती वापरून संघाने करून दाखविल्या आहेत. मग ही उद्दिष्टपूर्ती केल्याशिवाय संघ राहील काय? आणि याला विरोध करणारे कायम विस्कळीत राहतील असे डावपेच आखले जातच असतात, ते डोळे उघडे ठेवून पाहिले तर लक्षात येतात.

In reply to by रामचंद्र

हिंदू राष्ट्र करायची मुळीच आवश्यकता नाही. इतर धर्मांचे लांगूलचालन थांबवलं आणि सर्व धर्माना खरोखरच समानता आणली पाहिजे एवढंच पुरे आहे. साधं समान नागरी कायदा आणायचा म्हटलं तरी काँग्रेसी आणि समाजवादी वृत्तीचे लोक बाप मेल्यासारखा टाहो फोडतात. तरी बरं हे घटनेतील मूलभूत कलम आहे. तेवढं सोडून बोलायचं हि टिपिकल समाजवादी वृत्ती. कुराण किंवा महंमदाबद्दल काही बोललं तर सर तन से जुदा म्हणणाऱ्या लोकांचा निषेध करण्याची हिम्मत नाही किंवा बकर ईद ला "प्राणी मात्रांवर दया दाखवा" म्हणायची शक्ती नाही. तेंव्हा घटनेतील समानता तत्वे आठवत नाहीत. दांभिकतेचा हद्द आहे.

In reply to by रामचंद्र

श्री रामचंद्र कलम ३७० आणि राम मंदिर या शिवाय आणखी काही संघाने केले असल्यास कृपया नमूद करावे. माझ्यामते कलम ३७० हट्वणे हे फक्त महत्त्वाचे होते. त्यातील गुंतागुंत लक्षात घेतली तर हिंदुराष्ट्र ही कल्पना अशक्यप्राय आहे, हे लक्षात येते. पण अखंड भारत, विश्वगुरु, सनातन धर्म अशा अनेक संकल्पना रूजविण्यात संघ अपयशी ठरला आहे आणि ठरेल. पुड्या सोडून गोंधळ निर्माण करायचे काम हे लोक चांगले करू शकतात.

In reply to by युयुत्सु

पुड्या सोडून गोंधळ निर्माण करायचे काम हे लोक चांगले करू शकतात.
स्वानुभवावरून सहमत! - (एकेकाळचा गोंधळी) सोकाजी

In reply to by युयुत्सु

आपण ज्याला पुड्या सोडणे म्हणता हाच मुळात डावपेचाचा एक भाग आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळात या मंडळींना विधिंनिषेधाचे वावडे तर अजिबातच नसते. काश्मीरमध्ये जे काही झाले ती कल्पनेकडील बाब होय. शेषराव मोर्‍यांच्या पुस्तकात वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली आहे असे वाटते. ते वाचल्यावर असे काही घडेल ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती. ते करून दाखवले मोदींनी. राम मंदिर खरे तर तार्किक्दृष्ट्या स्पष्ट मुद्दा आहे. जगात कुठेही मोठ्या अतिमहत्त्वाच्या धार्मिक स्थळाला चिकटून त्याच्या विरोधातील धर्मस्थळ नाही. जर अन्यधर्मीय धार्मिक स्थळ तिथे लगतच उभे राहिले असेल तर आधीचे दुसर्‍या धर्माचे स्थळ उद्ध्वस्त न करता आल्यामुळे चिकटून ती वस्तू विरुद्ध धर्मीयांनी ती उभारली आहे हे उघड आहे. (अल अक्सा मशिदीचाही मुद्दा लक्षात घ्या.). मक्का-मदिना, व्हॅटिकन सिटी यांना खेटून अन्य कुठले धर्मस्थळ उभे राहू शकेल का? मात्र खास हिंदू बनिया वृत्तीने त्वयार्धं मयार्धं करत शेवटी राममंदिर प्राप्त करून घेतले आहे. हीसुद्धा एक अशक्य वाटणारी बाब होती. डॉ. आंबेडकरांच्या अगदी थेट विरोधात नाही तरी अन्य समाजांतले ऐतिहासिक नायक प्रयत्नपूर्वक पुढे आणायचे, बहुजन समाजातून आवर्जून आपल्या विचारसरणीचे नेतृत्व पुढे आणायचे. अशा अनेक मार्गांनी संघाची म्हणा, परिवाराची म्हणा वाटचाल सुरूच आहे. आजूबाजूच्या घटनांकडे लक्ष दिले तर बर्‍याच गोष्टी लक्षात येतील. इतके दिवस ईशान्य भारतात फारसा वाव नव्हता पण अनेक दशके तिथे बर्‍यापैकी सेवाकार्य करून जमतील तितक्या जनतेला आपल्याकडे वळवण्यात--जोडीला सामदामदंडभेदनीती आहेच, आता तर सत्ताही--यश आले आहे. केरळ आणि तामिळनाडूतही लक्षणीय यश आता दूर नाही. आपण कलम 370 आणि राममंदिराशिवाय काय असं जे विचारता तेव्हा खर्‍या अर्थाने राष्ट्रासाठी उपयुक्त असं काय, असं आपल्याला अपेक्षित असावं. संघाच्या कल्पनेत अशा बाबी असतीलच असं नाही. त्याच्या दृष्टीने वेगळ्या गोष्टी अपेक्षित असतील. आता पर्यावरण, प्रदूषण यांना त्याच्या लेखी फारसं महत्त्व नसावं. आता मोदींनीच आवाहन केले होते, स्वच्छता अभियानासाठी. खरं तर पक्षविरहित, सर्वांनीच याला हातभार लावायला हवा होता. केवळ परिवारानेही जरी मनापासून काम केलं असतं तरी भाजपला केवळ या मुद्द्यावर विजय मिळाला असता. पण तसं घडलं नाही खरं. अन्य प्रदूषणांबाबत धर्माच्या नावाने कांगावा करून चुकीच्या गोष्टींचे समर्थन केलं जाताना आपण सारे पाहतोच. आणि संघाला विरोध करणारे इतक्या चिकाटीने, संयमाने, धीराने, 'मिळेल तिथं, मिळेल तसं, मिळेल तेव्हा' असं धोरण राबवून काम करताना दिसतात काय, विचार करावा. बरं संघात जाऊन आयुष्याला एक दिशा मिळून चांगलं आयुष्य स्वकष्टाने जगणारेही अनेक आहेत. त्यामुळे संघाबाबतच्या वास्तवाचा परत परत उच्चार करून वस्तुस्थिती बदलणार नाही, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती.

In reply to by युयुत्सु

सविस्तर व मुद्देसूद उत्तराबद्दल आभार! आपली कार्यकारणमिमांसा अतिशय आवडली. त्यानुसार भारत हिंदू राष्ट्र होणे हे संविधानिक, राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर नुसते अशक्यच नसून अहितकारकही आहे. संदर्भमूल्य असलेले लिखाण आहे यात शंका नाही. खूप धन्यवाद. हे असं असलं तरी संविधान मानतो असं दाखवून आतून ते पूर्णपणे पोखरलं जाईल, ही एक शक्यता आहे. अशा प्रकारची दांभिकता ही भारतात अतिशय सार्वत्रिक आहे.

In reply to by स्वधर्म

संविधान मानतो असं दाखवून आतून ते पूर्णपणे पोखरलं जाईल, ही एक शक्यता आहे.> हाही दीर्घकालीन डावपेचांचाच एक भाग म्हणता येईल.

In reply to by रामचंद्र

हाही दीर्घकालीन डावपेचांचाच एक भाग म्हणता येईल.
हा जर डावपेचाचा भाग असेल तर संघ विष पसरवतो या वरंवार केल्या जाणार्‍या आरोपाला बळकटी मिळते.

In reply to by युयुत्सु

+१

In reply to by युयुत्सु

मान्य आहे. अखेर तो त्यांच्या डावपेचाच भाग आहे. ते याचा प्रतिवाद करत बसत नाहीत, आपले कार्य पुढे चालू ठेवतात आणि त्यादृष्टीने ठोस असं काही साध्य करतात, आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात. विरोधक मात्र टीकेपलिकडे फारसं काही साध्य करू शकत नाहीत. कुठलीही आशा, तशी चिन्हे कुठेही दिसत नसताना कैक पिढ्या जशा संघकार्य करत खपल्या, तसे विरोधक इतक्या मोठ्या प्रमाणावर, सातत्याने, पूर्णपणे निरपेक्ष वृत्तीने करताना दिसतात का, आपणच विचार करा.

In reply to by रामचंद्र

हिंदू कधीच संघटित होणार नाही. उच्च नीच वर्गभेद संघाला नष्ट करता येणार नाही. कारण ते त्यांचे मूळ उद्दीष्ट नाही. हिंदू हिंदूला जोडे फेकून मारत असताना संघ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.

In reply to by आग्या१९९०

हिंदू कधीच संघटित होणार नाही.
वरील वाक्य वास्तवाला धरून नाही आहे. कारण आणिबाणीत सर्व विरोधीपक्ष तुरूंगात असताना घटनेच्या प्रस्तावने दुरूस्ती करून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या दोन शब्दांची भर घातली गेलेली आहे. १९७५ च्या अगोदरच्या घटनेच्या प्रस्तावनेत हे दोन शब्द नाहीत. या शब्दांची योजना बरोबर आहे असे समजून चालणारे जे पक्ष आहेत त्यांची लोकसभेतील मतदान टक्केवारी गेली ५० वर्षे सातत्याने घटत चाललेली आहे. या उलट हे दोन शब्द मंजूर नसलेले व हिंदूहितैषी असलेले जे पक्ष आहेत त्यांची मतदान टक्केवारी वाढत जाताना दिसत आहे. २०२४ च्या लोकसभेत हिंदूहितैषी पक्षांना बऱ्याच जागा गमवायला लागल्या असल्या तरी त्यातील मुख्य़ पक्षाची म्हणजे भाजपाची मतदान टक्केवारी ३७.७ टक्यांवरून ३६.५६ टक्के इतकीच घसरलेली आहे. मात्र बांगला देशातील घटनांनंतर हिंदूहितैषी मतदानात चांगलीच वाढ झालेली असून, त्याचा परिणाम लोकसभेच्या नंतरच्या विधानसभा निवडणूकांत पाहावयास मिळालेला दिसतो. त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमुळे ही प्रक्रीया आणखी जोर पकडून हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी आणखीन वाढायची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज बिहारच्या निवडणूकीत येऊ शकतो. पण हिंदू कधीच संघटित होणार नाही. असा तुमचा आदर्शवाद असेल किंवा, तुमची तशी इच्छा असेल तर त्याला काहीच हरकत नाही. ते तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहेच. असो.

In reply to by शाम भागवत

हिंदू कधीच संघटित होणार नाही. असा तुमचा आदर्शवाद असेल किंवा, तुमची तशी इच्छा असेल तर त्याला काहीच हरकत नाही. ते तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहेच.
कसला आदर्शवाद आणि कसली इच्छा ? वस्तुस्थिती आहे. संघटीत म्हणजे जातपात मानणे, आपल्याच धर्मातील दलितांवर अत्याचार करणे, त्यांच्या जमिनी हडप करणे. ह्यात हिंदुवादी सरकार ,पोलिस सामील असणे. ही तुमची हिंदू संघटितची व्याख्या असेल तर मला व्याख्या तपासून घ्यावी लागेल.
२०२४ च्या लोकसभेत हिंदूहितैषी पक्षांना बऱ्याच जागा गमवायला लागल्या असल्या तरी त्यातील मुख्य़ पक्षाची म्हणजे भाजपाची मतदान टक्केवारी ३७.७ टक्यांवरून ३६.५६ टक्के इतकीच घसरलेली आहे. मात्र बांगला देशातील घटनांनंतर हिंदूहितैषी मतदानात चांगलीच वाढ झालेली असून, त्याचा परिणाम लोकसभेच्या नंतरच्या विधानसभा निवडणूकांत पाहावयास मिळालेला दिसतो. त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमुळे ही प्रक्रीया आणखी जोर पकडून हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी आणखीन वाढायची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज बिहारच्या निवडणूकीत येऊ शकतो.
ह्यात संघाचे योगदान काय? हे हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचे कारस्थान आहे. संघ ही राजकीय संघटना नाही. राजकीय संघटना असती तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असता असे सध्या संघाचे कार्यकर्ते बचाव करताना म्हणू लागले आहेत. राजकीय संघटन आणि सामाजिक संघटन ह्यात गोंधळ करू नका. हिंदूंचे सामाजिक संघटन व्हावे हे संघाचे स्वप्न किंवा उद्दीष्ट नाहीच आहे. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघवाल्यांनी मदतकार्य केले म्हणजे हिंदूंचे संघटन केले असे संघाला वाटते का? आणि जेव्हा हिंदू सवर्ण हिंदू दलितांवर अत्याचार करतो तेव्हा संघवाले तेथे काय आणि कोणाला मदत करतात? तोंड तरी उघडतात का?

In reply to by युयुत्सु

जो व्यक्ति आपल्यादेशला मातृभूमि मनातों तो हिन्दू (त्यात सर्व धर्मीय येतात) ही संघाची अवधारणा आहे। संघा सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-m…

In reply to by युयुत्सु

हे पूर्वी ऐकले होते पण तेव्हा विश्वास बसला नव्हता...अर्थात व्हिक्टीम बॅशिंग ही आपली संस्कृती असल्याने फार वेगळे काही होईल असे वाटत नाही. https://youtu.be/FlwSwf2Z3ts?si=3x0peFXrjTH-fl5G

In reply to by युयुत्सु

संघाला कुणावर ही नियंत्रण मिळवायचे नाही आहे. बाकी संघाच्या दृष्टीने जो भारताला मातृभूमी मानतो तो हिंदू. त्या अर्थाने आपला देश हिंदू राष्ट्रच आहे. जगात ही हिंदू राष्ट्र ही भारताची ओळख आहे.

कपिलमुनी,
धर्म वाढवायचा टिकवायचा असेल तर आपलाच धर्म सुधारायला हवा ना. दुसरीकडे बोट घालून काय मिळणार ?
तुम्ही संघाशी जोडले गेले होतात हे नव्याने कळलं. तुम्ही संघात असतांना त्याने राजकारण केल्याचं तुम्हांस आढळून आलं का ? तुमचा रोकडा अनुभव काय म्हणतो ? यापूर्वी संघाने राजकारण केल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. संघ राजकारणाच्या बाहेरंच असेल अशी शिस्त आखून दिली होती. तर मग संघावर स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतल्याचा आरोप कितपत उचित वाटतो ? आधी समाज सुधारला पाहिजे अशी टिळकपूर्व मवाळांची धारणा होती. मग तेच धोरण संघाने चालवलं तर काय बिघडलं ? फक्त संघाने इंग्रजांशी सहकार्य वा विरोध काहीही उघडपणे केला नाही. बाकी, इंग्रजांशी सहकार्य म्हणाल तर गांधींनी दोन महायुद्धांसाठी हिंदी सैनिकांची भरती करायचं आवाहन केलेलं होतंच. मग संघावर आगपाखड नेमकी कशासाठी ? याच न्यायाने भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी आंदोलन उभारणं हे राजकीय पाऊल आहे. ते संघाने उचलावं, अशी अपेक्षा का ठेवली जाते ? मनांत आणलं असतं तर भगतसिंगांची फाशी गांधी सहज रद्द करू शकले असते. ते राजकारणी असूनही त्यांनी ती रहित केली नाही. आणि संघ राजकारण करीत नसूनही त्याने राजकीय आंदोलन उभारायला पाहिजे, असं कसं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by कपिलमुनी

धन्यवाद. इथे या धाग्यावरच चर्चा करूया. -गा.पै.

संघाचे बाबतीत अनेकांचे पूर्वग्रह आहेत. जो व्यक्ति आपल्या देशाला मातृभूमी मानतो तो हिंदू (यात मुस्लिम ईसाई सर्व येतात. काही प्रमाणात मुस्लिम ही संघाच्या शाखेत जातात). संघ हिंसावर कधीच विश्वास ठेवत नाही. सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-m…

एक बेसिक प्रश्न जगात एकूण किती हिंदू राष्ट्रे आहेत ? एकूण किती ख्रिस्ती राष्ट्रे आहेत ? एकूण किती इस्लामिक राष्ट्रे आहेत ? म्हणजे शुद्ध हिंदू शुद्ध इस्लामिक शुद्ध ख्रिस्ती असलेली विचारतोय. अजिबात धर्म निरपेक्ष नसलेली अशी. आणि त्यात म्हणजे अशा धर्मनिरपेक्ष नसलेल्या राष्ट्रात जगण्याचा स्टार ते राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने वाईट झालाय की चांगला झालाय ? तसेच जगातील लोकसंख्या wise सर्वात मोठी पहिले तीन प्रमुख धर्म कुठले ?

तसेच मोठी लोकसंख्या असूनही हिंदू राष्ट्र एकही नसेल याचा अर्थ 1 हिंदुलोक हे पुरेसे सहिष्णु आहे असा काढता येऊ शकतो का ? 2 की हिंदुलोक पुरेसे दुबळे आहेत असा काढता येऊ शकतो का ? 3 की हिंदुलोक आणि हिंदू धर्मातील मूलतत्वे पुरेशी आक्रमक नाहीत असा काढता येऊ शकतो का ? 4 की हिंदू लोक हिंदू हा Way of life म्हणुन स्वीकारत असल्याने त्यांना याचे सोयर सुतक नसते का ? 5 आणि समजा भारत इतर देशा प्रमाणे इस्लामिक किंवा ख्रिस्ती प्रमाणे हिंदू राष्ट्र झाला तर याचा परिणाम काय होणार ? 6 सर्वात रोचक बाब already जे एक धर्मीय देश आहेत ते व अधार्मिक किंवा नास्तिक अशी कम्युनिस्ट विचारसरणी असलेले देश वरील सर्व 3 धर्मीय देशा पेक्षा उच्चतम जीवन स्तर असलेली आहेत का ?

श्री० मारवा, आपण उपस्थित केलेले प्रश्न कोणत्याही ए०आय्०ला जर विचारलेत तर पुरेशी समर्पक उत्तरे मिळतील अशी खात्री आहे.

In reply to by मारवा

आदिवासी ऐवजी वनवासी ही सगळ्यात डिपेस्ट आहे. . दोन्ही मिळून अडाणीवासी अशी आगामी काळात दिसणारे बघा. . हिंदुहितैशी पक्ष म्हणे आपले गोग्गोड काका. ह्याट.........

In reply to by अभ्या..

:)))

In reply to by अभ्या..

शबरी वनवासी होती आणि राम नगरवासी होता. दोघेही या भूमीचे आदिवासीच आहेत. -गा.पै.

इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग गम चघळण्यासारखे आहे. कितीही चघळा पोटात काही जात नाही. थोड्या वेळाने स्वादही राहत नाही. आलात तर तुमच्या सह नाही आलात तर तुमच्या विना आणि मध्ये आलात तर तुम्हाला आडवे पाडून या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे रा स्व संघ पुढे जातच राहील. बाकी डावे आणि समाजवादी रडत राहतील हि काळ्या दगडावरची र्रेघ आहे. मग त्यांनी त्याच दगडावर कितीही डोके आपटू द्या.

In reply to by सुबोध खरे

संघ पुढे जातच राहील. ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही, फक्त दसरा संचलन करून ट्रॅफिक वाढवून समाजाला उपद्रव द्यायचे काम करते ती संस्था पुढे गेली काय किंवा मागे गेली काय? काय फर के पडतो?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्री० अमरेंद्र बाहुबली अशा ठिसूळ पायावर काम करणार्‍या संस्था / संघटना उन्माद वाढला की स्वतःच्या वजनाखाली कोसळून पडतात... तेव्हा निश्चिंत असा. संघाचे तळागाळातले मंदबुद्धी कार्यकर्ते हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांना संघाने निर्माण केलेला भ्रम आणि वास्तव यात ताळमेळ साधायची क्षमता नसते. या मंडळीनी २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी घातलेला गोंधळ आणि त्याचा निवडणूक निकालावर झालेला परिणाम सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ... मूलभूत भेडसावणारे प्रश्न सोडवायची क्षमता आणि इच्छा संघामध्ये नाही. २०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र स्वतःची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.

In reply to by युयुत्सु

सहमत आहे! देशात जसजसा सुशिक्षित वर्ग वाढतो आहे, संघाचे कुटील डाव ओळखायची क्षमता देखील वाढत आहे. त्यामुळे बहुजन संघ पासून दूर जात आहेत.

In reply to by युयुत्सु

श्री. युयुत्सु, आपला प्रतिसाद जबरी भेदक आहे. पण '२०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल.' या वाक्याशी अडखळायला झालं. आधीच हाताला काम नसलेली तरूण मुले मुली धर्माच्या नशेत ओढली जात असताना जर अजूनच उन्माद वाढला तर कुणाची मजा? उलट एका पिढीचं प्रचंड नुकसान होईल. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात संघाच्या प्रभावामुळे अनेक बदल झालेत उदा. डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे, बनारस हिंदू विद्यापीठात भुत विद्या व ज्योतिष्य या विशयाचे अभ्यासक्रम सुरू करणे इ. हे बदल ऊगवत्या पिढीसाठी कसे आहेत असे आपल्याला वाटते? त्यात जर अजून धर्माधिष्ठीत प्रतिगामी संघटनांचा प्रभाव वाढला, तर देशाचे जास्तच नुकसान होण्याचा धोका नाही का?

In reply to by स्वधर्म

मुस्लिम युनिव्हर्सिटी माहिती आहे का , भरपूर आहेत ... संत फ्रान्सिस्को शाळा माहिती आहे का , भरपूर आहेत ... काय शिकवतात तिथे ते सर्वांना माहितीच असेल ... त्याचे परिणाम काय होत आहेत ते सुद्धा सर्वांना माहिती आहे ... उन्माद कोणाचाच चांगला नाही हे मान्य ... मुग स्वस्त झाले आहेत एवढेच सांगतो ...

In reply to by समाधान राऊत

कोणत्याही धर्माची शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात भेसळ करून अवैज्ञानिक गोष्टी करणे हे घटनेत सांगितलेल्या तत्वांच्या विरूध्द आहे. 'दुसरे' (म्हणजेच दुसर्‍या धर्माचे) चुकीचे करतायत म्हणून 'आपण' तसेच चुकीचे केले पाहिजे असे संघाचे तत्वज्ञान आहे काय?

In reply to by स्वधर्म

श्री० स्वधर्म अजून चार वर्षात देशाची लोकसंख्या अजून वाढणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या ताणाने, वेगाने ढासळणारे पर्यावरण भारतीयांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विषयक अनेक समस्या आणखी गंभीर करेल. त्यात भरीला भर म्हणून लायकी असून देशाबाहेर जाऊ न शकणारे आणखी वैफल्यग्रस्त बनतील. देश चालवणे आणखी अवघड बनेल. विश्वगुरु, अखंडभारत सारख्या पुड्या सोडल्याने काहीही साध्य झाले नाही. समरसतेच्या गप्पा तोंडी लावायला पण उपयोगी नाहीत. "सनातन धर्म" हा पण एक लवकरच फुसका बार ठरेल. ज्या धर्माचे धर्मगुरु (प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद, रामभद्राचार्य पातळी सोडून एकेमेकांची निंदानालस्ती करतात) तो धर्म आपल्या अनुयायांना कसले स्थैर्य देणार? तेव्हा आपण स्वस्थपणे बघत राहणे हे केव्हाही शहाणपणाचे....

In reply to by समाधान राऊत

ही बातमी माझ्या पाहण्यात आली होती: https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-50915414#:~:text=A%20presti…. अभ्यासक्रम इथे आहे: https://www.bhu.ac.in/Content/Syllabus/Syllabus_2314320200601051606.pdf आयुर्वेदिक पध्दतीने मानसरोग बरे करणे यांस भूत विद्या म्हणत असावेत. त्यात नेहमीचेच भूत, ग्रह, गृहदोष व मानस यांचा संबंध इ. छद्मविज्ञानही आहेच. आपल्याला हे कितपत पटते ते जरूर सांगा.

In reply to by स्वधर्म

डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे There is a current controversy claiming that Darwin's Theory of Evolution has been removed from science books by the NCERT and periodic tables have been dropped. I would like to publicly state that nothing of this kind has happened." Dharmendra Pradhan said. ते १० वि ला कशाला काढले आहे हा मुद्दा वादास्पद असू शकतो पण डाव्या पुरोगामी गँगने लगेच रडारड सुरु केली कि हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि त्यांना परत जाती वाद आणायचा आहे. https://www.ndtv.com/india-news/no-changes-minister-on-deletion-of-darw…

In reply to by सुबोध खरे

भूत विद्या किंवा ज्योतिष विद्यापीठात शिकवणे यावर इतकी रडारड करण्यासारखे काय आहे? जोवर या पदव्या इतर पदव्याच्या समकक्ष मानल्या जात नाहीत तोवर त्यावर संशोधन करणे किंवा शिकवणे यात इतके रडारड करण्यासारखे काय आहे? भारतात इस्लामिक स्टडी मध्ये पदव्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पी एच डी करणारे हजारो विद्यार्थी आहेत. आता कुराणात पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती अल्लाच्या इच्छेने फिरतो हे सांगितलेले आहे ते मान्य करून हे लोक एम ए करतात पी एच ड्या घेतात आणि आय ए एस ला सुद्धा जातात त्याबद्दल कोणी डाव्या ने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. ( सर तन से जुडा झालं तर काय या भीतीने असावे) London School of Astrology https://www.londonschoolofastrology.com/ The University of Wales Trinity Saint David offers a master's degree in Cultural Astronomy and Astrology. Other options include the Faculty of Astrological Studies, which offers short courses and summer schools. भारतात २५० च्या यावर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत. आतापर्यंत जितके संशोधन झाले त्यात होमिओपॅथी हि प्लॅसिबोपेक्षा जास्त गुणकारी आहे हे सिद्ध झालेले नाही. मीठ पाण्यात विरघळवल्यावर मीठ हे मीठ रहात नाही किंवा एखादा पदार्थ विरळ केल्यावर त्याची शक्ती कितीतरीपट वाढते हे मूलभूत शास्त्राविरुद्धच्या सिद्धांतावर अवलम्बुन असलेले तत्वज्ञान आहे. त्याला शास्त्र म्हणणे अशक्य आहे. जगभर होमिओपॅथी हे छद्म शास्त्र मानले जाते. त्याबद्दल कुणाला काही आक्षेप नाही इथे मिपावरच किती तरी लोक होमिओपॅथीचे हिरीरीने समर्थन करताना आढळेल. डावे पुरोगामी मुळातूनच दांभिक असतात आणि ते तसं परत परत अट्टहासाने सिद्ध करून दाखवत राहतात हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

जोवर या पदव्या इतर पदव्याच्या समकक्ष मानल्या जात नाहीत तोवर त्यावर संशोधन करणे किंवा शिकवणे यात इतके रडारड करण्यासारखे काय आहे?
१००% सहमत!
भारतात इस्लामिक स्टडी मध्ये पदव्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पी एच डी करणारे हजारो विद्यार्थी आहेत. आता कुराणात पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती अल्लाच्या इच्छेने फिरतो हे सांगितलेले आहे ते मान्य करून हे लोक एम ए करतात पी एच ड्या घेतात आणि आय ए एस ला सुद्धा जातात त्याबद्दल कोणी डाव्या ने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही.
अगदी अगदी... भारतातच नाही तर परदेशांत जाऊन इस्लामिक लिटरेचर मध्ये PhD करणारेही महाभाग अस्तित्वात आहेत, आणि असा एक महाभाग मला कैरो मध्ये भेटल्याचे मी 2018 साली इथे मिपावरच लिहिलेले आहे. एअरपोर्टवर 'अरुण कुमारची बॅग बदली झाल्याचे' मी त्या लेखात लिहिले होते, पण त्ती बॅग गहाळ झाल्याचे सर्वात जास्त दुःख त्या महाभागालाच झाले होते कारण त्या बॅगेत तिथे उपलब्ध नसलेल्या गुटख्याच्या पुड्या अरुण कुमार त्याच्यासाठी लुधियाणाहून घेऊन आला होता 😂 मदरशांमध्ये शिकलेल्या लोकांकडून अजून किती अपेक्षा करायच्या? डाव्यांची आणि धर्मांधांची युती तशी आता नवीन राहिली नाहीये हे आपण सगळे जाणतो, एकाच ईकोसिस्टीमचे हे सध्यातरी भागधारक झाले आहेत. अर्थात धर्मांधांचे हेतू साध्य झाल्यावर पहिले हे लोकं (तथाकथित निधर्मी) डाव्यांचा गळा पहिले कापतील हे त्या निर्बुद्ध डाव्यांच्या अद्याप लक्षात येत नाहीये हा भाग वेगळा 😀

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर, आयुष्यभर विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले ज्ञान वापरून व्यवसाय केलात. त्यातून बर्‍याच रुग्णांना फायदा झाला असेल यात शंकाच नाही. त्याचमुळे आपण होमिओपॅथी हि विज्ञानाधारित नाही म्हणून खिल्ली उडवली आहे. इथपर्यंत सगळे सुसंगत आहे. पण... संपूर्णपणे काल्पनिक गोष्टींवर आधारित भूतविद्या हा अभ्यासक्रम प्रतिष्ठीत विद्यापीठात शिकवला जातोय यावर तुंम्हाला काहीच आक्षेप नाही. इतर भंपक कोर्सेस कसे जगातील तर विद्यापीठात शिकवतात हा तुमचा डिफेन्स! अवघड आहे. शिवाय ज्या डार्विनने विज्ञानाला संपूर्ण कलाटणी दिली, त्याचा सिध्दांत ९ वी १० वीतून काढला. त्यामुळे १० वी नंतर विज्ञान न घेणारे सर्व मुले मुली तो कधीही शिकू शकणार नाहीत व पारंपारिक पुराणांवरच विश्वास ठेवतील याचे तुंम्हाला काहीच वाटत नाही. तुंम्ही दिलेल्या दुव्यातील त्या मंत्र्याचे प्रतिपादन हास्यास्पद आहे. तुंम्ही विज्ञान पूर्णपणे नाकारले तर समजू शकतो पण त्यावरच आधारित व्यवसाय करायचा आणि व्यक्तीगत आयुष्यात संपूर्ण भंपक गोष्टींवर विश्वास ठेवायचा या आंतर्विरोधाचा ताण नाही येत?

In reply to by स्वधर्म

होमिओपॅथी हि विज्ञानाधारित नाही म्हणून खिल्ली उडवली आहे. खिल्ली उडवलेली नाही. वस्तुस्थिती विशद केली आहे. विज्ञानाधारित आहे हे कुणीही सिद्ध करून दाखवावे. ज्यांचा विश्वास आहे ते त्या प्र्णालीचा वापर करतात. तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या अनुभवात कितीतरी लोकांचे नुकसान झालेले मी स्वतः पाहत आलो आहे. संपूर्णपणे काल्पनिक गोष्टींवर आधारित भूतविद्या हा अभ्यासक्रम प्रतिष्ठीत विद्यापीठात शिकवला जातोय यावर तुंम्हाला काहीच आक्षेप नाही. माझा त्या गोष्टीवर विश्वास नाहीच पण म्हणून मी सार्वजनिक न्यासावर हिरीरीने त्याबद्दल वाद घालायलाच हवा आहे का? तुंम्ही विज्ञान पूर्णपणे नाकारले तर समजू शकतो पण त्यावरच आधारित व्यवसाय करायचा आणि व्यक्तीगत आयुष्यात संपूर्ण भंपक गोष्टींवर विश्वास ठेवायचा या आंतर्विरोधाचा ताण नाही येत? कोणत्या भंपक गोष्टींवर विश्वास ठेवलाय ते सांगता येईल का? डावे पुरोगामी नेहमी अशा गोष्टींवर सार्वजनिक न्यासावर टाहो फोडत असतात पण होमीओपॅथी, बकर ईद ला प्राण्याचा बळी देणे अशा विरूद्ध मूग गिळून गप्प असतात या दुटप्पी दांभिकपणा वर ताशेरे ओढले आहेत. याचा अर्थ फल ज्योतिष किंवा भूत विद्येवर माझा विश्वास आहे हा शोध आपण कसा काय लावला हे समजत नाही