Skip to main content

ठाणे अरबस्तान ला जोडण्याचा कुटील डाव ?

लेखक रानरेडा
Published on रवीवार, 28/09/2025
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली. आज ठाणे विकले गेले माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित. ठाणे आता संपले आहे ते अरब लोकांना विकले आहे आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार . जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ... कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !

वाचन संख्या 4162
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

काही जमले नाही, मुळात ठाण्यातला मॉल अरबाना विकला गेला तर पुरोगामी, विवेकवादी का दुखावतील? अधोगामी, मनुवादी हे दुखावले जायला हवेत ना? ठाण्यात बुरखा किंवा उंट फिरू लागले तरीही त्याचा त्रास सनातनी मनुवाद्यांना व्हायला हवा की पुरोगाम्याना? ह्यावेळी काही जमले नाही! सो रानरेडा उर्फ उडता डुक्कर उर्फ ताजेप्रेत पुढल्या वेळी चांगला प्रयत्न करा, ह्या तीन पेली कुठल्याही आयडीने केला तरीही चालेल. :)

मोदींकडून अजून काय अपेक्षा ठेवणार? देश विकायला काढला आहेच, ठाण्यापासून सुरवात. मी पूर्वी गाऊन विकायचो, आता बुरखा विक्रीचे दुकान टाकीन म्हणतो, नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता हे खरेच आहे, परत या परत या, नेहरू तुम्ही परत या

"आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार . जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार" अबुधाबीच्या ह्या कंपनीने गेल्या वर्षी गुजरातमधील प्रसिद्ध गिफ्ट सिटीमध्ये ऑफिस चालु केले आहे. गुंतवणूकही केली आहे. गिफ्ट सिटीमध्ये ऊंट आणि बुरखाधारी स्त्रिया फिरत आहेत का हे आधी बघावे लागेल. तुमच्या त्या उबर अ‍ॅपवरुन 'उबर गो,ऑटोप्रमाणे 'उंट' हा पर्याय येतो का? हे गांधीनगरमध्ये राहणार्याना विचारायला हवे. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2062830

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नको लक्ष देऊस माई, काहीतरी पांचट विनोद करायचा प्रयत्न होता त्यांचा, पण विनोद गंडल्याने ते विजनवासात गेले, मागेही श्रीगुरुजींचा दांडपट्टा फिरल्यावर गायबले होते ते आताच आले.

ठाण्याची उपनगरे असलेल्या भिवंडी, कौसा, मुंब्रा, कळवा इत्यादी परीसरातील जनतेच्या आग्रहानुसार विकले असेल.

या निमित्ताने ठाणे बेलापूर रस्ता , एल बी एस मार्ग आणि घोडबंदर रस्ता हे प्रशस्त आणि खड्डे मुक्त होतील हा फायदा तरी होईल.

आता त्याचे नाव सुधा बद्लुन लेक शोर माल असे झाले आहे नविन मालकाचे नाव अबु धाबि इन्वेस्मेन्त ओथ्रिति असे आहे पुर्विचे मालक सिन्गापुर चे होते व त्यानि हा माल २०१६ साली ९०० करोद् रुपायाला घेतला होत आता अबुधाबी कम्पनिने हाच माल २०२५ साली १९०० करोद रुपायला घेतला आहे हा आतापर्यत चा भारतातिल सर्वात मोथा व्यवहार आहे हि ठाणे कराना नापसन्द भेट ठ्ररल आहे

मी तर आता नमाज शिकण्याचे क्लास लावले आहेत. क्लास मधे चादर फुकट मिळते, पण घरी प्रक्टीस करण्यासाठी स्वतःची चादर घ्यावी लागेल असे उस्मान शे़ख सर म्हणाले. उस्मानशेख सर फावल्या वेळात बोकडाचे मटण विकतात. गेल्या रविवारी मी त्यांच्याकडून मट्ण घेतले. चांगले निघाले. ते म्हणाले हलाल मट्ण खात जा. आता मी लांडी विजार घालण्याचा सराव करतो आहे. नमाज योगा सारखाच वाटू लागला आहे. मराठीत भाषांतर केलेले कुराण सरांनी मला मोफत दिले. मला आता खूप बरे वाटू लाग्ले आहे. क्रुपया खोड्साळपणा करुन खतना संदर्भात प्रश्न विचारु नयेत. मी उत्तर देणार नाही.

In reply to by खटपट्या

का? मॉल मध्ये इतर धर्मियांना प्रवेश नाही का? दुबई ला तडफडत शॉपिंग ला जाणारे धर्म बदलून जातात का? . काही कारण नसता असा प्रतिसाद का देऊ वाटतो? संपादक मंडळ का चालवून घेतात अशी धार्मिक टिप्पणी ती पण विनाकारण आणि काहीही विनोदी, उपरोधिक नसणारी

In reply to by अभ्या..

अहो सर, तुम्हाला वाइट का वाटले? संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि धागाकर्त्याने लिहिल्याप्रमाणे ठाणे जर अरबस्तानला जोड्णार अस्तील तर आपण तयारी करायला नको का? तुमच्या भावना दुखावल्या अस्तील तर माफ करा पण माझा प्रतिसाद धाग्याच्या विषयाला धरुन आहे.

In reply to by खटपट्या

तुम्ही हलाल मटण ऐवजी हलाल पोर्क खायला सुरुवात करा म्हणजे तुमचे रूपांतर पूर्णत्वास जाईल.

In reply to by सुबोध खरे

दहा वर्षांत हलाल मटणाऐवजी झटका मटणाचा प्रसार आपले विश्वगुरू करतील असे त्यांच्या भक्तांना वाटायचे. पण #गजवा_ए_हिंद_२०४७ चे ते खंबीर पुरस्कर्ते असल्यामुळे तसे काही झाले नाही.

In reply to by कांदा लिंबू

#गजवा_ए_हिंद_२०४७ ही आयडीया तर भिकारचोट आहेच पण त्याचा खंबीर पुरस्कर्ता तर विश्वभिकारचोट आहे म्हणायचे. त्यात काय इतके लाजायचे? आणि झटका बिटका काही नसते बरं का. मल्हार सर्टिफाईड असते ते.

In reply to by कांदा लिंबू

मी म्हटलं ना, विश्वगुरूंच्या भक्तांना रेल्वेत (आणि इतरत्रही) साध्या अन्न निवडीचे स्वातंत्र्य नाही.‌ >NHRC notice to railways on serving of ‘only halal-processed meat’ on trains The complainant has alleged that Hindu and Sikh passengers do not get food options that match their religious beliefs, affecting their freedom of choice and religious rights

In reply to by खटपट्या

संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही का? मला माहीत आहे. सबका साथ सबका विकास, डीएनए एकाच आहे, अजमेर दर्ग्याला दरवर्षी चादर ही सर्व त्याचीच निदर्शक आहेत. मागच्या दहा वर्षांत नॅशनल हाइवेंवर मोक्याच्या वळणावर उभी राहिलेली दोन हजारांहून अधिक नवीन प्रार्थनास्थळे ही त्यासंबंधितच तयारी आहे. #गजवा_ए_हिंद_२०४७

In reply to by खटपट्या

संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही का? नाही बाबा, तुम्हाला कोण सांगतं असं? . आणि इतके सिरियसली घेताहात होय धाग्याकर्त्याला? मग ठिक आहे. करा तयारी जोरात. आणी भावना बिवना काही दुखावल्या नाहीत. तुमच्यासारखे धर्मवीर असता ठाण्यात, आम्ही निर्धास्त आहोत आमच्या धर्मासह.

In reply to by अभ्या..

ओह, धागाकर्ता सिरियस नाही आहे? बरं बरं. मी ठाण्यात असतो? मलाच कसं माहीत नाही? असो. पोपुलर फ्रंट ऑफ इंडीया या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पकड्ले तेव्हा त्यांच्यकडे कागद्पत्रे सापडली होती. त्यात २०४७ हे टार्गेट वर्ष आहे. पण तुम्हाला जास्त माहीती असेल तर सांगा. असो.

In reply to by खटपट्या

का? मॉल मध्ये इतर धर्मियांना प्रवेश नाही का? दुबई ला तडफडत शॉपिंग ला जाणारे धर्म बदलून जातात का? . काही कारण नसता असा प्रतिसाद का देऊ वाटतो? संपादक मंडळ का चालवून घेतात अशी धार्मिक टिप्पणी ती पण विनाकारण आणि काहीही विनोदी, उपरोधिक नसणारी