Skip to main content

आले अंबानीच्या मना

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 30/07/2025 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता. नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही. नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे. आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे. नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0 या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA

वाचने 26006
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

महादेवीचं काय ठरलं शेवटी...? -दिलीप बिरुटे

एक प्रयोग म्हणून हे करून पाहा : तुम्ही जी कोणती AI सिस्टिम वापरता त्या सिस्टिमला आधी कंटेक्स्ट करून विचारा की " तुम्ही एक तर्कशुद्ध विचार करणारी व्यक्ती आहात, आता एका वाक्यात, सोप्या शब्दात उत्तर द्या की वंताराने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय? " मी जेमिनी वापरतो , मला ही उत्तर मिळाले - From a purely rational standpoint focused on the elephant's welfare, the elephant should not be returned to the Jain math.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो, कारण हत्ती हा जैन मठाचा सांस्कृतिक आणि धार्मिक भाग होता, आणि जर तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात होती, तर तो परत पाठवणं नैतिक आणि न्याय्य ठरेल. Chat gpt

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेमिनी किंवा चॅटजीपीटी

अ‍ॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये

पण हे दोघापेक्षा तिसर्‍याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?

In reply to by प्रसाद गोडबोले

वंताराने कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना लक्षात घेऊन जैन मठाचा हत्ती परत पाठवावा, जर मठ आणि गावकरी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील.

मराठीत प्रश्न विचारल्यास काही वेगळे उत्तर मिळते का हे तपासून पाहण्यासाठी मी मराठीत चर्चा केली जेमिनी सोबत : पूर्णपणे तर्कशुद्ध विचारकरून आणि उपलब्ध माहिती पुराव्यांच्या विचार करून सोप्या शब्दात उत्तर द्या की वनतारा ने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय ? >>> माहिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्तीण महादेवीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य दिले गेले असल्यामुळे तिला जैन मठात परत पाठवू नये.

In reply to by प्रसाद गोडबोले

एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत ते हत्तीची काय काळजी घेणार?

In reply to by रामचंद्र

मुळातच व्यक्तीद्वेष हा त्यांच्या आणि त्यांच्या विचारांच्या लोकांच्या चर्चेतील मूळ मुद्दा असल्याने त्यांनी हे लिहिणे स्वाभाविक आहे. वनतारा ही अंबानी ऐवजी रॉबर्ट वाड्रा चालवत असते तर एक चकार शब्द उच्चारला नसता त्यांनी. मुळात हत्तीचे हित हे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये जाण्यातच आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य समजू शकतो. आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्यात काही खुसपट काढता येईना म्हणून अंबानी वर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे हे हत्यार त्यांनी उपसले आहे बस.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा आणि एखाद्या आजारी व्यक्तीवर अन्याय करणारा आहे ज्या आजाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. .

In reply to by सुबोध खरे

किती ते प्रेम पण? कोणता आजार आहे असा? तुम्ही त्यांचे पर्सनल डॉक्टर आहात की त्यांचे डॉक्टर रोज तुमच्या सोबत बसून तुम्हाला माहिती देतात? आणी मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? मी ही प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं.

नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadn…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात

हत्ती

परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे दोनदा लिहिल्यास ती परत येईल असे वाटून दोनदा लिहिले आहे का? ते काय असते ना- दोन निगेटिव्हचा गुणाकार एक पॉझिटिव्ह असतो की काहीतरी. :)

तासगावच्या गणपती देवस्थानच्या गौरी हत्तीणीसाठी अंबानींच्या वनताराकडून २ कोटींची ऑफर आली आहे. ती ऑफर आपण स्विकारणार नाही असे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी म्हटले आहे. जर गौरी या हत्तीणीची योग्य ती काळजी घेतली जात असेल तर खरं तर तिला तिथून हलवायचे काहीही कारण नाही. त्यामुळे देवस्थान जर अंबानींची ऑफर नाकारत असेल तर चांगलेच आहे. पैशांसाठी त्यांनी गौरीला तिथे पाठवायलाही नको. https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/tasgaon-gauri-elephan… मी सांगलीत पाच वर्षे राहिलो आहे. सांगलीचे गणपती देवस्थान सांगलीचे पूर्वीचे संस्थानिक पटवर्धन यांचे कुटुंब बघतात. मेने प्यार किया वाली भाग्यश्री पटवर्धन त्याच कुटुंबातील. या पटवर्धनांचा तासगावच्या पटवर्धनांशी काही संबंध आहे की नाही माहित नाही. तर सांगायचा मुद्दा हा की सांगलीच्या गणपती देवस्थानात मी होतो तेव्हा बबलू नावाचा एक हत्ती होता. तो हत्ती सांगलीची शान मानला जायचा. वयोमानानुसार त्याचे निधन झाल्यानंतर सांगलीच्या गणपती मंदिराजवळच्या भागात दुखवटा म्हणून कडकडित बंद पाळण्यात आला होता. तासगावच्या त्या हत्तीणीविषयीही स्थानिक लोकांची तशीच आत्मियता असली तरी आश्चर्य वाटू नये. केरळमध्ये पूर्वी गुरूवायूरच्या मंदिरात मोठे लोक हत्ती दान द्यायचे. जयललितांनीही तिथे हत्ती दान केला होता. नंतरच्या काळात तिथे इतके हत्ती झाले की देवस्थानला सांभाळणे कठीण झाले. त्यानंतर यापुढे दान म्हणून हत्ती स्विकारले जाणार नाहीत असे देवस्थानने जाहीर केले. आज तिथे कित्ती हत्ती आहेत याची कल्पना नाही. पण ते हत्ती पण असेच वनतारामध्ये नेणार का? अशा देवस्थानात कुठेही हत्ती असले तर त्यांची योग्य ती देखभाल केली पाहिजे आणि त्यांची कुठेही आबाळ व्हायला नकोच. पण त्याचबरोबर असे हत्ती कुठेही हलवायच्या आधी स्थानिक लोकांच्या भावनांचाही विचार करायला हवा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हत्ती हा पाळीव प्राणी नाही. हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. किमान हिंदू , बौद्ध, जैन आणि शीख इत्यादी अहिंसा शांतताप्रिय भारतीय धर्माच्या लोकांनी हत्ती पाळण्याचा अट्टाहास करू नये. अगदीच हौस असल्यास गाय पाळावी. - एक सनातनी हिंदू म्हणून तासगावच्या देवस्थानचा आणि विशेषत: ब्राह्मण म्हणून पटवर्धनांचा मी जाहीरपणे निषेध करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
याविषयी कल्पना नाही. मात्र आपल्याकडे राजेरजवाडे आणि श्रीमंत लोकांकडे हत्ती ठेवायची परंपरा होतीच. अगदी चंद्रगुप्त मौर्याकडे हत्ती होते- सेल्युकस निकेटरने त्याला ५०० हत्ती दिले होते असे उल्लेख आहेत असे वाचले आहे. शिवाजी महाराजांकडेही हत्ती होते. आनंदाच्या प्रसंगी हत्तीवरून साखर वाटणे हे पण अगदी कॉमन होते. सगळीकडे अशी क्रूर वागणूक हत्तींना दिली जायची का? काहीही असले तरी एक प्राणीप्रेमी म्हणून कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही वाईट वागणूक दिली जाऊ नये हे नक्कीच. (शाकाहारी) चंसूकु

हा धागा काढताना, हे जे हत्ती अगदी पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वनतारालाच पाठवायचा प्रकार चालू होता तो तसा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. बर्‍याच मिपाकरांनी अतिशय उत्तम माहिती व दुवे दिलेले आहेत. हत्तीसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास हाच सर्वात हिताचा या मताशी मी सहमत आहे. परंतु काही सदस्य ती वनतारात गेली ते तिच्यासाठी जास्त चांगलं (हजारपटीने) असे म्हणत आहेत. इथे आणि इथे. तिथले हवामान निश्चितच केरळ किंवा काझीरंगा, आसाम यांच्याइतके हत्तींसाठी नैसर्गिक नाही. कपिलमुनी म्हणत आहेत तसे, ईशान्य भारतातील अनेक ठिकाणांहून हत्ती वनताराला पाठवण्यात आले आहेत. त्याचा एक पॅटर्न दिसून येतो. हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी - प्रशांत कदम यांचा रिपोर्ट https://youtu.be/gE6GqvWwGUo?si=CgSnd9Bg8O7rlaT_ शिवाय साम दाम दंड भेद याचा वापर कसा केला जातो ते आपण माधुरीच्या बाबत पाहिलेच. ईथे तासगांवच्या हत्तीबाबत कसा डाव रचण्यात आला होता ते विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सुदैवाने त्यांना माहुताच्या किंवा वैरण पुरवणार्‍याच्या धर्माविषयी आकस नाही जसा इथल्या तथाकथित अध्यात्म पूर्ण समजलेल्या सनातनींना आहे. तासगावच्या हत्तीवर वनताराचा डोळा? ३ कोटीची ऑफर? ।। वज्रधारी न्यूज ।। मला कोणत्याही धर्मासाठी, परंपरेसाठी अशा प्रकारे हत्तीला वेठीला धरलं जावं हे योग्य वाटत नाही. परंतु सगळं कसं वनतारात पाठवण्यासाठीच घडून येतं, ते तितकं साधं सोपं सरळ वाटत नाही. पैसा ही शक्ती आहे, पण ज्यावर नजर पडेल, ते माझं असं असेल, तर अवघड आहे. उद्या पुणे महापालिकेला पाणी नीट स्वच्छ ठेवता येत नाही म्हणून कोणीतरी कोर्टातून खडकवासला धरणसाखळी मालकांकडेच द्या असं म्हणून कोर्टात जातील आणि त्याना हवा तसा निकालही लागेल. नागरिक कधी जागे होणार?

In reply to by स्वधर्म

सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात नॉर्मल्च म्हणा, न्यू नोर्मल असावी) वाटणारी गोष्ट म्हणजे, राजू शेट्टींच्या म्ह्णण्यानुसार नांदणी मठाला हत्तीणीच्या बदल्यात दोन कोटी देणगी /किवा मठाचे बांधकाम ही ऑफर दिली आहे ती पेटाच्या खूशबू गुप्ता ह्यांनी. आणि पेटा स्वतः सांभाळ करणार नाहीचेत. मग कुणाचे दोन कोटी? कशासाठी अशी सुपारी? प्लान्ड सिस्टिमॅटिकली लीगल एनकाउंटर झाले हे लिटरली. .

In reply to by अभ्या..

खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. भक्तांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय का? Stockholm syndrome is a psychological response where hostages or abuse victims develop positive feelings and an emotional bond with their captors or abusers. It's a coping mechanism where victims align with their captors to reduce the perceived threat and increase their chances of survival. The term originated from a 1973 bank robbery in Stockholm, Sweden, where hostages formed an emotional bond with their captors.

In reply to by स्वधर्म

नागरिक कधी जागे होणार
? 2029 च्या निवडणुकांच्या नंतर. कारण तो पर्यंत तुम्हाला असले धागे काढायला काहीना काही खुसपट कारणं मिळतच राहतील ! बाकी मुख्यमंत्री श्री. फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हत्ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. शिवाय सरकार हत्तीला सुविधा पुरवणार म्हणे . #लाडकी हत्तीण योजना मुंबईत देखील सरकारी खर्चाने कबुतरांना खायला देणार आहेत म्हणे =)))) त्यावर एक लेख पाडा की आता. फुल मजा आहे पुढील काही वर्षे =))))

या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी असे कोणीच म्हणत नाही. मुख्यमंत्रीसुद्धा जनभावना जपण्यासाठी सरकार मठाच्या बाजूने आहे, असेच म्हणत आहेत. लोकांचा विरोध एक धनदांडगा सरकारला आणि एका संस्थेला हाताशी धरून बळजबरीने हत्तीचे अपहरण करत आहे, या गोष्टीला आहे. त्या मठाच्या निमित्ताने लोक हत्तीमागे तरी उभे राहिले. गडचिरोली जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीकाठचे हत्ती गुजराथला कधीच पोहोचले पण त्यांच्यासाठी कुणी लढा दिला नाही. मुळात मठात हत्तीला बरे वाटते की नाही, हे समजत नाही. पण गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. मग त्यांना उचलून गुजराथमध्ये नेणे, हे तर नक्कीच चुकीचे म्हणता येईल. खरे तर या बाबतीत मेनका गांधींनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. पण पक्षश्रेष्ठींपुढे काही चालत नसावे, किंवा मुलाच्या वाटचालीत अडथळा नको म्हणून गप्प बसावे लागत असावे. आणि केरळमधल्या त्या aty

गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. सहमत,असतीलही परंतू संख्या जास्त झाली,किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. हत्ती पोसणे किती खर्चिक आसते हे वेगळे सांगावयास नको. मठाकडे भरपूर पैसा असणार. मठ,साधू,संन्यासी निसंग,निर्मोही असायला पाहिजेत पण ते तर संस्थानिका पेक्षाही मोठे. अफ्रिकेतून बिबटे आणले व मध्यप्रदेश मधे सोडले तेव्हांही कुणी आवाज उठवला नाही. एवढी आरडाओरड फक्त राजकिय दृष्टीकोनातून आहे. बाकी व्यक्ती परत्वे वेगळा दृष्टिकोन असणार पण व्यक्तीद्वेश मात्र असू नये.

हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? आपण सर्व मिपाकर मिळून एक छोटा हत्ती पाळुयात, तो मोठा झाल्यावर अंबानीला विकून पैसा कमावू, मिपावर तसेही अनेक रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते हत्तीची निगराणी करतील, हत्तीला मूवी काकांच्या शेतात ठेवू, डॉक खरे हत्तीची तब्येत पाहतील, चंद्रसूर्यकुमार अर्थतज्ज्ञ आहेत जमा खर्चाचा हिशेब ठेवतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नक्की हत्तीच ना? देखभाल करणाऱ्यांची नावे बघून जास्तीत जास्त कागदी वाघ बनू शकेल.

कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत घेतला तर आपल्या पोटात का दुखावे? रानटी हत्ती पाळीव करण्यासाठी क्रूरपणा करतात हे मान्य . पण अशा पाळीव प्राण्यांना/ हत्तींना पिल्ले होतात ती अगोदरपासूनच पाळीव असतात. दक्षिणेत बऱ्याच देवळांत असे हत्ती आहेत आणि त्या देवस्थानाला दिलेल्या देणग्यांतून हत्तींचा खर्च भागतो. पिढ्यानपिढ्या माहूत असतात आणि त्यांचे हत्तींशी संबंध फारच कौटुंबिक असतात. या देवळातल्या हत्तींकडून काही लाकडाचे ओंडके ओढणे वगैरे काम नसतं. देवळांत आठ ते बारा आणि पाच ते सात उभे राहून भाविकांना आशिर्वाद देणे हेच काम. आता प्राणी कोणताही म्हटला की त्याला आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू आलेच. महाराष्ट्र सरकारने ती हत्तीण अंबानीकडून परत आणली तरी जैन मठवाले घेणार नाहीत. मग सांभाळणार कोण? मठवाल्यांना हा हत्ती नव्हे तर एकूण हत्तीच ठेवायचा नसेलही. म्हणून तो निर्णय घेतला असेल.

लोकसत्ताची बातमी: https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-public-representatives-welco… 'जनभावना लक्षात घेऊन' असे सर्व लोक, वनताराचे मु. का. आ. इ. म्हणत आहेत. १० हजाराहून जास्त जिओ सिम परत करणे, रिलायन्सच्या पंपावर पेट्रोल न भरणे याही गोष्टी 'वर' पर्यंत गेल्या असतीलच.

In reply to by स्वधर्म

गाव करील ते राव काय करील? पैसा, सत्ता, अंबानी, पेटा नी माजलेले सत्ताधीश नी त्यांचे मीपावरील समर्थक ह्यांच्या नाकावर टिच्चून लढा देऊन हत्तीण परत आणाऱ्या कोल्हापूर करांचे अभिनंदन! :) हत्ती पळवणारी टोळी तरीही सुधारेल असे वाटत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

करणार शंभर टक्के अभिनंदन करणार ! फक्त हत्ती परत यायची वाट पहात आहे. एकदा का हत्ती परत आला की मिपावर लेख लिहिणार ! अहो लोकोत्तर असा हा क्षण आहे, असेल. धर्मसत्तेने राजसत्तेवर मिळवलेला विजय असेल हा . आजवर सरकारने शाहाबानो साठी सुप्रीम कोर्टाला तोंडावर पाडल्याचे पाहिले होते, आता पहिल्यांदाच "जनभावनेचा" रेट्याने "महादेवी" साठी देखील सुप्रीम कोर्ट आणि सर्व व्यवस्था चारीमुंड्या चीत करता येऊ शकते हे सिद्ध होईल. आता हत्ती परत येण्याची वाट पाहूयात फक्त !

उद्या एखादे गरीब आईवडील मुलांची काळजी घेउ शकत नसतिल तर सरकारने मुलांची पण सोय करावी .. ती पोरे पण काढून घेऊन कोणाला तरी संभाळायला द्यावीत ( परदेशात अशी सोय आहे म्हणे )

मठाची हत्तीण यावरून आठवलं, पूर्णचंद्र तेजस्वींची उमा कुलकर्णी अनुवादित 'कृष्णेगौडाची हत्तीण' कुणी वाचली आहे का? अस्सल भारतीय परिस्थितीचं वास्तव हसतखेळत उभं केलं आहे. अंदाजे वीसएक वर्षांपूर्वी एका साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.

मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल. प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतीलः सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल
. -माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरं मग,या वनतारा आधी अशा हत्तींना ज्या ठिकाणी उपचारांसाठी पाठवले जायचे तिथे माधुरीला या आधी का पाठवले नाही? वनतराला हत्ती बळकावयाचे असतील तर ,तिथल्या सगळ्याच हत्तींना बरं झालं की तिथून जंगलात पाठवा यासाठी आंदोलन का नाही करावं मग? एकाच हत्तीसाठी काळेबेरे वाटत नाही का?

In reply to by Bhakti

खरंच ताई. फार भाबड्या आणि निर्मळ मनाच्या आहात तुम्ही. . जपून राहा, दुर्मिळ प्रजाती होतेय ही.

In reply to by Bhakti

मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.

In reply to by अभ्या..

अच्छा वनतारा पार्ट -२ का? घ्या आता, महाराष्ट्राने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे का मग?
फक्त तेवढाच विषय नाही हो जर त्या हत्ती ची एवढीच काळजी होती, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर तिला 1.एकदाही मातृ सुख का दिलं गेलं नाही 2. तिला पैसे मिळतात म्हणून बाहेर भाड्याने का दिलं गेलं 3. अंकुश टोचणे गरजेचे आहेस का. 4. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे त्यात मादा प्रमुख असते मग तिला तसं का राहू दिलं नाही किंवा तसा प्रयत्न का केला गेला नाही. 5. हत्तीचे तळवे हे डांबरी रोडवर किंवा सिमेंट रोडवर किंवा दगडावर चालण्यासाठी किंवा राहण्यासाठी बनलेले आहेत का. 6. हत्तीचा अन्न कोणतं तिला पेढे किंवा शिजवलेले पदार्थ भरवणे योग्य आहे का आता सरते शेवटी आला वनताराचा मुद्दा.... आठवते का बघा . वनमंत्र्यांनी वनतारा च्या धर्तीवर सूर्यतारा सुरू करण्याचे संकेत आधीच दिले आहेत आणि त्यातही हे सूर्यतारा अंबानी किंवा अदानीकडे सोपवणार असेही सांगितले होते. आता विचार करा कोणी कोणाच्या खांद्यावर कधी कशी केव्हा बंदूक ठेवली आणि कोणाला गोळी मारली निमित्त नांदणीचा हत्ती आणि इप्सीत सांगली_कोल्हापूर मध्ये वनतारा पार्ट टू........ #copied

In reply to by Bhakti

माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?

In reply to by अभ्या..

हत्तीण म्हातारी झाली आहे ओ,जंगलात डायरेक्ट कसं पाठवणार.आणि पाठवलं तरी काही अडचणी येऊ शकतील.तज्ञांचे मत हा तर प्रकारचं गावकरी,मठावाले पाहत नाहीयेत.

In reply to by Bhakti

मठाने ३३ वर्षांपूर्वी हत्तीचे पिल्लू आणले होते. हत्तीचे आयुष्यमान ७०+ वर्षे असते. म्हणजे माधुरी चाळीसच्याही आत आहे. मी वर दिलेलाच व्हिडिओ पुन्हा पहा Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता? यात ३ मिनिटानंतर सांगितल्याप्रमाणे वनताराने पद्मावती हत्तीण ही आसाममधून हजारो किमीचा प्रवास करून जेंव्हा वनताराला नेली, तेंव्हा ती ५५ वर्षांची असून गरोदर होती. तिचा हा सगळा प्रवास गरोदर अवस्थेत केला गेला. त्यामुळे माधुरी हत्तीण म्हातारीआहे असे म्हणता येणार नाही. पण तुंम्ही वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा: जानेवारी २०२५ मधील बातमीनुसार वनताराने अरूणाचल प्रदेशमधून एका वेळेस २० हत्ती नेले आहेत. त्यात एक बछडाही होता. आता हे सगळे हत्ती अर्थातच म्हातारे नाहीत. २०२१ पासून वनताराने ३९ हत्ती फक्त अरूणाचल प्रदेश मधून नेले आहेत. आजमितीला सदर याचिकेच्या बाबत वनताराने स्वतःच कोर्टात त्यांच्याकडे असलेल्या हत्तींची संख्या २३८ सांगितली आहे. तरी पण तुंम्ही या प्रकाराकडे इतकं सरळ बघत असाल तर, अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे खूप भाबडा किंवा पक्षपाती दृष्टीकोन आहे. बाकी मठातील लोक काळजी घेतात का? घेऊ शकतात का, हे तज्ञच ठरवू शकतील. पण दोन बाजू मठाच्या बाजूच्या आहेत. १. माधुरी तिथे गेली ३३ वर्षे जगली आहे. २. गावकृयांचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे. नाहीतर कोण पूर्ण वर्षाचा रिचार्ज भरला असताना जिओचा फोन परत करेल? टीपः असे असले तरी हत्ती हा कळपात रहाणारा व जंगली प्राणी असून त्याला एकट्याला माणसांनी व मानवी वस्तीत पाळणे, मग त्याच्यावर कितीही प्रेम असले तरी अन्यायकारक आहे. बाय द वे: भारत सरकार ला एक वनखातं असतं, त्याला एक मंत्री असतो. त्यात अनेक आय एफ एस अधिकारी बंगला गाडी व नोकर दिमतीला असे रहातात असे ऐकून आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही का?

In reply to by स्वधर्म

बरं ती म्हातारी नाही ? ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,जे वयानुसार नाही नसेल पण अकाली म्हातारपणासारखेच आहे. पण आजारीही नाही का? का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.पण वनतारा हे मुद्दामहून हत्ती बळकावत आहेत तर सर्वच हत्तींची वनिताला मधून थेट जंगलात मुक्तता करावी यासाठी आता माणूसकी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोहिम उघडावी. तिला कोल्हापूरला आणून काय हाशील होणार‌ काय माहिती? परत तेच म्हणते "झेपत नाही तर हत्ती पाळू नये" आणि वनताराला सांगेन की "कशाला पैशे वाया घालवता,ज्याचा हत्ती ते पाळतील नाहीतर भाड्याने देतील , तुम्हाला काय करायचं?कशाला हत्तींना ५ तारांकित सुविधा देता,जाऊ द्या की उडत"

In reply to by Bhakti

मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता. म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अ‍ॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्‍यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?

In reply to by Bhakti

>> का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? या व्हिडिओत स्पष्ट सांगितलेले आहे, की वनविभागाच्या डॉक्टरांचा महादेवी निरोगी असल्याचा रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला व हाय पेटाच्या याचिकेनंतर पॉवर कमिटी नेमण्यात आली होती, त्यांनी वेगळा रिपोर्ट दिला. Nandni Elephant Kolhapur: जैन मठातील हत्ती अंबानींच्या वनतारात, नांदणीच्या महादेवीचं काय होणार? बाकी >> ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते या बाबत मी आधीच सहमती नोंदवली आहे. पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही? अख्या भारतातून हत्ती कसे वनताराला नेले जात आहेत, याचे वर दिलेले संदर्भ तरी बघा. Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?

In reply to by स्वधर्म

घटनाक्रम असा आकलनात येतोय. म्हणजे माधुरी ठणठणीत होती,तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. पुढे गावकऱ्यांनी आंदोलन केले ,ओके आता हत्ती परत गावात येणार ,ओके पण २०० एकर जागा महाराष्ट्राची बळकवणार(जे आता सांगितले जात आहे),नॉट ओके आता मठाने सरळ कोर्टात जाऊन हत्ती बरा झाला की सरकारी/मोकळ्या जंगलात सोडावा अशी केस करावी.तर खरंच सर्व हत्तींना न्याय मिळेल.
पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही?
अहो,आजारी माणसाला थेट जंगलात सोडता येते का?(तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजारी असल्याचा रिपोर्ट खोटा पण आरोग्याविषयी कोणतीच रिस्क आजारी असणाऱ्यांच्या जवळची व्यक्ती घेत नाही,या दृष्टिकोनातून मी तिला मानसिक आजारी (एकटी) तर नक्कीच समजते) नाही मग वनतारात जायची वेळ यायच्या आधी आम्हाला ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा हा मोठेपणा सर्वांनी ज्यांनी हत्ती पाळला त्यांनी घ्यावा ,हीच आता कळकळीची विनंती आहे. थांबते आता,माधुरी देव तुला खूप आरोग्यदायी आयुष्य देवो! _/\_

In reply to by Bhakti

>> ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा याबाबत मी आधीच सहमत आहे. गावकर्‍यांचे कितीही प्रेम असले तरी जंगलातील राहणे तिच्यासाठी मठापेक्षा चांगलेच आहे असे मी अनेकदा म्हटलेच आहे. >> तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. याला तुंम्ही ओके म्हणत आहात, माझेही तेच म्हणणे होते.

In reply to by Bhakti

३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्‍यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.

In reply to by स्वधर्म

गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे हत्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जातीये असे असेलच असे नाही. कितीही प्रेम असले तरी शेवटी हत्तीची काळजी घेण्याचे कसब, रिसोर्सेस त्यांच्याकडे असतीलच असे नाही. एकूण हया चर्चेत मला असे वाटले - अंबानीचे नाव आल्यावर जे कोणी "मठात हत्तीची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही" असे मत देणाऱ्या सगळ्या संस्था, व्यक्ती ऑटोमॅटिकली बायस्ड आहेत असा सूर जाणवला. हे फारसे पटले नाही. समाजमाध्यमांत दिसणाऱ्या फोटो आणि व्हिडीओज वरून मठात हत्ती टूणटूणीत आहे असा निष्कर्ष घाईघाईचा वाटतो.

In reply to by कॉमी

बरोबर! प्रेम असणे वेगळे, काळजी घ्यायची क्षमता असणे वेगळे व हत्तीसाठी माणसांत रहावे लागते हे ही वेगळे! हा लेख लिहिताना मलाही फक्त मठ व नांदणीचे गावकरी यांच्यावर अन्याय झालाय असे वाटत होते. पण जसजशी चर्चा पुढे गेली तसतसे काही सदस्यांच्या प्रतिसादामुळे हत्तीवरही कसा अन्याय होत होता हे लक्षात आले. मिपाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्थात आपले म्हणणे अधिक माहिती मिळाली तर बदलण्याची लवचिकता हवी. हे सगळे केवळ माणसाच्या हट्टासाठी, भावनेसाठी व हौसेसाठी असते असे लोकसत्ताचा आजचा अग्रलेख म्हणतो. माधुरी हत्ती व मुंबईतली कबुतरे या दोन वादांच्या संदर्भात. भूतदयेचे भूत

पुष्पक विमानातून फिरत असताना राधिका नामे भार्येने अनंतास पृच्छा केली , ही खाली गर्द हिरवी वनराई दिसते ती कोणती बरे ? अनंत वदला , करवीर नगरीहून काही कोस दूर असलेले हे राधानगरी नावाचे निबिड अरण्य आहे , इथे वेगवेगळे पशु पक्षी रहतात, त्या अरण्यावर मोहीत होउन ती स्त्री म्हणाली, नाथ ..मजला या अरण्यात निवास करायचा आहे . अनंत करवदला, "करवीर नगरीची माणसे लई वांड ! हित पैसा नाय माणुस्की बघत्यात".. नाथाचे हे बोलणे ऐकून राधिका रुष्ट झाली .. भार्येचा म्लान मुखकमल पाहून अनंतास गमेना.. सर्व पिझ्झा , बर्गर त्यास तॄणासमान भासू लागले.. अरण्य तर हवे पण कोल्हापूरकर तर लैच हार्ड अशी त्याची द्विधा मनस्थिति झाली.. तेव्ढ्यात त्याला नारदमुनींची आठवण झाली.. फोन फिरवताच मुनी हजर झाले , मनीची व्यथा ओळखली .. म्हणाले, राजन , अशी स्कीम करा की कोल्हापूरकरांनी २००-३०० एकर स्व:ताहून तुम्हाला द्यायला हवी.. नारदाने अनंताशी कानगोष्ट केली आणि गालातल्या गालात हसत अंबानी पुत्राने पेटास्त्र बाहेर काढले .. --------------------------------------------------------------- बाकी तुम्ही सूज्ञ आहातच .. आता वनतारा पार्ट २ सूरू झाला की भेटू

In reply to by कपिलमुनी

तुमच्या जंगलात नेऊ नका, आमच्याकडे मोकळी जागा मागू नका.साखळदंडात राहू द्या हत्ती ,एकटा रडत डोलत. ह्यांना म्हणे माणूसकी,आणि म्हणे अंबानीच तेवढा व्यापारी!! झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??

In reply to by Bhakti

आपल्या प्रतिसादाची चुकामूक झाली. पण हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासाशिवाय व एकटे ठेऊ नये याबाबत सहमत आहे. प्राण्याच्या लैंगिक सुखावर माणसाच्या हौशीसाठी घाला घालणे कमालीचे क्रूर आहे. पण... वनताराच का? केरळ, काझीरंगा, अरूणाचल, आसाम, त्रिपुरा ही भारतीय वनखात्याच्या अखत्यारितील ठिकाणे का नकोत?

In reply to by स्वधर्म

पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला तर जगणार नाही. वनतारा मध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक अधिवास आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल.

In reply to by कॉमी

ओह्ह्ह्हो, जरा उशीर केला मालक तुम्ही. हत्ती तर परत येणारेच आहे, सोबत नांदणीला सरकारमान्य अंबानींच्या वनताराची सॅटेलाईट सेंटरची ग्रँड ऑफर घेऊन आलाय. नुसती लक्ष्मी न्हाई, गजान्तलक्ष्मी हाय गजान्तलक्ष्मी..

In reply to by कॉमी

हत्तीच्या तब्येतीची काळजी वनताऱ्याला पळवून नेल्यावरच कशी झाली? आणी खरोखर काळजी असेल तर वनताराच का? स्थानिक डॉक्टरनी हत्तीची तब्येत चांगली आहे असा रिपोर्ट दिला, तरीही तो रिपोर्ट झिडकारून सत्तेचा गैरवापर करून हत्ती पळवणे समर्थनीय का?

In reply to by कॉमी

मलाही एका वन्यजीवांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने सांगितले की जंगली हत्तींना सगळी झाडे, पाणी, खायला कुठे मिळेल व त्याच्या वाटा माहित असतात. ऋतूमानानुसार हे सगळे त्यांना माहित असते. त्यामुळे एका हत्तीला सोडले तर तगेल की नाही हा प्रश्नच आहे. एकट्या नंतर सोडलेल्या हत्तीला इतर हत्ती कळपात सामावून घेतील का हाही प्रश्नच आहे.