मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या साड्यांचं काय करायचं?

नूतन ·

कंजूस 21/01/2026 - 13:59
१.पन्नाशीच्या पुढच्या बायकांची फुकटची हौस. २. कोणत्यातरी समारंभात साडी नेसून गेल्यावर तिथे दोन तरी बायका आठवण काढतात " अगं हीच साडी तू दोन वर्षांपूर्वी तमक्या समारंभात नेसली होतीस ना?" झाले ती साडी कपाटात पार मागे टाकण्यात येते. बायकांची स्मरणशक्ती फार असते. ३.भारतात कुठेही भटकंतीला गेल्यावर खरेदी करायची नाहीत या तत्त्वावर जातो.( गुजरात, राजस्थान,मप्र,तमिळनाडू, कर्नाटक) मी बराच स्पीड ब्रेकर लावला आहे.

कपिलमुनी 21/01/2026 - 14:02
जुन्या बाजारात कोपरा पकडून विकायला बसा. ५०-१०० ला एक जाते . मी अशा साड्या / कपडे विकणार्‍या माणसाला विकले आहेत . पोतभर कपड्यांचे १००० घेउन आलो .

त्यातल्या त्यात साड्या फार महाग असतात म्हणुन समस्याही मोठी होते. शर्ट्/पँट विरले/फाटले/विटले की देउन टाकता येतात किवा टाकुन देता येतात. टॉवेल/चादरी वगैरे पायपुसणी म्हणुन किवा ओटा पुसायला कामी येतात. पुनर्वापर करायचा तर अधिकचे पैसे मोजावे लागतात, पण निदान पिशव्या, गोधड्या वगैरे शिवुन घेता येतील. आजकाल काही बुटीक छान ३ पीस वगैरे शिवुन देतात साड्यांचे. (माझ्या माहीतीत एक कमला नेहरु पार्क समोर आहे). तेव्हा जास्तीच्या साड्या तिकडे घेउन जा, ते पोत बघुन ह्याचा ड्रेस टिकाउ होईल का हे बघुन वेगवेगळ्या फॅशनप्रमाणे २पीस्/३पीस शिवुन देतात. नाहीतर जुन्या बाजाराचा किवा दान करायचा पर्याय आहेच.

श्री. रितेश देशमूख व सौ. जनाबाई डिसुझा ह्यांनी आपल्या आईच्या जुन्या साडीपासून आपल्या मुलाना कुडते शिवले होते. बाकी ह्या घरातल्या साडीच्या पसाऱ्याला कंटाळून मी बेड ला दोन मोठे कप्पे करवून घेतले जी त्यात साड्या कोंबून कपाट मोकळे करवून घेतले. माझ्या एका खात्यात माझे सगळे कपडे मावतात! पण साड्यांना ३ कप्पे असूनही जागा कमी पडते!

चित्रगुप्त 21/01/2026 - 19:14
पुर्वी हिरिरीने प्रतिसाद देणार्‍या मिपाबायका गायबलेल्या आहेत आता. बायकी विषयावर पुरुषी प्रतिसाद. गम्मत आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. पण बायकोच्या कपाटे भरभरुन असलेल्या साड्यांची विल्हेवाट लावण्याबद्दल विषय काढण्याची पण कोणत्याही नवर्‍याची प्राज्ञा नाही. साड्यांचे एक गाठोडे बांधून कुठेतरी टाकून येणे हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. कुणाला हव्या असल्या तर तिथून घेऊन जातील, आपण एकदा त्याग केला की त्या वस्तूचे काही का होईना. एकदा मनातून मोह सोडता आला, की सोपे आहे.

कंजूस 21/01/2026 - 20:11
साड्यांपासून टू पीस पंजाबी ड्रेस, टॉप वगैरे सहज होतात. पण पातळ ( झिरझिरीत ) साड्यांना आतून अस्त्र लावावे लागते. माझी पत्नी घरीच शिवते. पण इतक्या ढीगभर साड्यांचे काय करायचे? एक निरीक्षण- ठाण्यात गोखले रोडवरती साड्यांची बरीच दुकाने आहेत. तिथे तुम्हाला आई -मुलगा -आणि सून साड्यांची दुकाने फिरताना दिसतील. तिथल्या साड्या सहजच पंधरा हजारांच्या वरच्या असतात. पण आई पंजाबी ड्रेसमध्ये असते, सून जीन पँटमध्ये, मग यांना साडी कशाला हवी असते? मुलगा दुकानाबाहेरच ताटकळत उभा राहतो आणि शेवटी कार्ड देतो एवढाच त्याचा खरेदीतील सहभाग.

In reply to by कंजूस

इतक्या ढीगभर साड्यांचे काय करायचे?
Dress (चित्र सौजन्य नवं तंत्रज्ञान ) साड्यांचे सदरे कसे होतील माहिती नाही आणि अशा सद-यांना लोकप्रियता मिळाली की हा प्रश्न बहुतेक वेळी पडणार नाही असे वाटले. -दिलीप बिरुटे

सौन्दर्य 22/01/2026 - 02:58
पूर्वी म्हणजे निदान १९९० पर्यंत तरी मुंबईत बोहारिणी दारोदार फिरत असत. जमल्यास त्यांच्याशी घासाघीस करून एखादा चमचा, वाटी किंवा गेला बाजार एखादा डबा मिळवता आला तर पहा. प्रत्येक दिवशी फक्त एकच साडी बोहारिणीला दाखवायची, घासाघीस करण्यात संपूर्ण दुपार सहज निघून जाईल. वर शांतपणा, सौजन्य, घासाघीस करण्याची कला वगैरे गुण अंगात जोपासता येतील. अगदीच काही जमत नसेल तर साड्या घराबाहेर काढून ठेवा, नंतर त्यांचे काय झाले हे पाहू देखील नका. हल्लीच्या ह्या महागाईच्या जमान्यात घरातील एखादे कपाट रिकामे झाले तर तेव्हढीच जागा वापरायला मिळाल्याचे समाधान लाभेल.

In reply to by सौन्दर्य

कंजूस 22/01/2026 - 05:04
बोहारिणी प्रकार संपलेल्यात जमा आहे. म्हणजे त्या अजूनही फिरतात पण कपड्यांच्या बदल्यात देत असलेल्या वस्तू टाकावू असतात. टिकावू नसतात. क्वालिटी खराब असते. ज्या चांगल्या साड्या आश्रमवालेही घेत नाहीत त्या बदल्यात चमचे, पाट, टब कोण घेणार?

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/01/2026 - 16:42
सोलापूरला काशीकापडी म्हणून एक समाज आहे. जुने कपडे घेऊन ते नॉमिनल रिपेअर करुन किंवा तसेच विकायचा त्यांचा पारंपारिक धंदा आहे. ते घेतात जुन्या साड्या पण त्याची फार कमी किंमत देतात. साड्या ह्या द्राक्ष, दाळींब बागा झाकण्यासाठी वापरल्या जातात. . जुन्या वस्तू विकण्यासाठी आणि त्यांची किंमत ठरवण्यासाठी जी सारासार बुध्दी लागते त्याचा प्रचंड अभाव शहरात दिसून आला आहे. ओएलएक्स, मायगेटसारख्या अ‍ॅपवर जुन्या वस्तूंच्या लावलेल्या किमती बघून हसावे की रडावे तेच कळत नाही. त्यात परत ती वस्तू विकली न गेल्याने पडून राहते आणि शेवटी स्क्रॅपवाल्यांच्या सांगेल त्या रेटमध्ये खालसा केली जाते. वस्तूंचा आणि त्याच्या किमतीचा मोह फार बेक्कार. . ह्या कार्यक्रमासाठी, त्या लग्नासाठी म्हणून बायकोने हौसेने शेरवानी सदृश्य कुर्ते घ्यायला लावलेले, सगळे इकडे परदेशात येताना देउन टाकावे लागले. बरं वापरले म्हणावे तर एकेकदाच वापर झालेला. त्यावेळी कळले कि कित्येक अनावश्यक वस्तू आपण गोळा करुन ठेवलेल्या होत्या. अगदी कारपासून छोट्या कॅन्व्हासपर्यंत सगळ्या वस्तू १५ दिवसात येतील तशा किमतीला देऊन पुन्हा नवीन संग्रह करायला सज्ज झालो आहोत.

ज्या वागण्यावरून एका विशिश्ठ ठिकाणी राहण्यार्या आणि एका विशिश्ठ समुहातील लोकान्ना नावे ठेवली गेली, चेश्टा, टिन्गल टवाळी केली गेली, चिक्कू कन्जूस म्हणून हेटाळले गेले तेच आज Reuse, Reduce, Recycle करा म्हणून सर्वान्ना सान्गितले जात आहे. मोठ्या, प्रसिद्ध लोकान्नी केले सान्गितले की ऐकले जाते (नपेक्शा 'follow' केले जाते). काय हरकत आहे तीच साडी पुन्हा नेसायला? वेगळ्या जागी, वेगळ्या लोकानसमोर नेसावी. मुळात हा विचार बदलत नाही तोवर हा प्रश्न सुटणार नाही. या नाहीतर वेगळ्या स्वरूपात समोर येत राहणार.

गामा पैलवान 22/01/2026 - 17:44
जमलेल्या साड्यांचं काय करायचं ते माहीत नाही. पण साड्यांचा ढीग जमू नये म्हणून एक उपाय म्हणजे साड्या भाड्याने आणणे. याच न्यायाने जमलेल्या साड्या कदाचित भाड्याने देता याव्यात. -गा.पै.

सुबोध खरे 22/01/2026 - 19:20
आमच्या सासूबाई १० वर्षा पूर्वी अचानक गेल्या. त्यावेळेस त्यांनी आयुष्यभर मोठ्या हौसेने जमवून ठेवलेल्या साड्या वस्तू भांडी इ त्यांच्या सुनेने अक्षरशः कुणालाही देऊन टाकल्या. माझ्या पत्नीने त्यातील काही आईने स्वतःच्या हाताने कशिदा केलेल्या साड्या आईची आठवण म्हणून घरी आणल्या. परंतु निदान ७५ तरी साड्या होत्या. प्रत्येक साडीच्या आत त्याचा परकर ब्लाउज त्याला साजेसे काही दागिने (उदा छल्ला) असे सर्व व्यवस्थित इस्त्री करुन ठेवलेले होते. परंतु इतक्या साड्या घेऊन येणे शक्य नव्हते. बहुतांश साड्या या "अशाच कुणाला" तरी देण्यात आल्या चार वर्षांपूर्वी आमचे वडील गेले तेंव्हा त्यांचे उत्तम शर्ट जे मला येतात ते मी आजही त्यांची आठवण म्हणून वापरत आहे. पण माझी उंची जास्त असल्यामुळे त्यांच्या पँट्स काही उपयोगी आल्या नाहीत. त्या ते काम करत असलेल्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना देण्यात आल्या. आमचे वडील नेहमी सांगत असत. एखादी वस्तू आपल्याला नको असेल तर सरळ रस्त्यावर ठेवा. कोण घेऊन जातं आणि काय करतं हे पाहू नका. उगाच नको असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन तेवढ्यात पुण्य मिळवण्याचा हव्यास नको. त्याप्रमाणे त्यांची पादत्राणे किंवा इतर वस्तू आम्ही अक्षरशः रस्त्यावर ठेवली. काही तासात गरजू व्यक्ती त्या घेऊन गेले. गेली कित्येक वर्षे मी हा उद्योग करत आलो आहे. आपल्या मागे अशा नको असलेल्या वस्तू कोण घेऊन जातं याच्याशी तुम्हाला काय करायचंय?

In reply to by सुबोध खरे

छान विचार! तुमच्या वडिलांचे विचार आवडले. मध्ये एक माणुसकीची भिंत म्हणून उपक्रम निघाला होता, रस्त्यावर कुठेतरी असलेल्या भिंतीवर कपडे वगैरे टांगून जायचे, गरजू ते नेतील. पण अनेक गॅरेजवाल्यांनी हात पुसायला फडके झाले म्हणून पोतेच्या पोते नेले. हा उपक्रम नंतर दिसला नाही.

नमस्कार मंडळी, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
अरे देवा, लै जीवघेणा विषय काढला. आमच्या इकडे, एक एक साडी जेव्हा कपाटातून आठवणीच्या रुपाने बाहेर पडायला लागते, तेव्हा या साड्यांचं काही तरी झालं पाहिजे असे कायम वाटले आहे. वरच्या कप्प्यातल्या खालच्या कप्प्यात येतांना त्या प्रत्येक साडीची एक दीर्घ कथा असते. साड्या अशा वरतून खाली, खालून वर जाताना. किंवा घरात हा साड्यांचा पसारा मांडलेला दिसलो की आपण पुरुष मेलोच समजायचे. हळवा विषय असतो. फार संयमाने तेवढा काळ घालवावा लागतो. संयमाने प्रतिसाद द्यावा लागतो. आपण असतो काही तरी कामात आणि यांचा प्रत्येक मोग-याच्या पाकळीप्रमाणे एक पाकळीचा साडीच्या आठवणीचा गंध यायला लागतो. प्रत्येक साडीच्या वेगळी आठवण. च्यायला लक्षात तरी कशा राहतात म्हणतो या कथा. ही तेव्हा घेतली होती, ही तेव्हा नेसले होते. अमक्याने घेतली होती. तमक्याने घेतली होती. ही चांगली होती आणि ती चांगली होती. कधी कधी जड अंतकरणाने त्या साड्या देऊन डबे घेताना पाहिलं आहे. साड्या आणि डबे दोघांचीही संख्या वाढतच जाते. पण, हा साड्यांचा आकंठ झरा अजून्ही काही आटला नाही. अधून मधून विशेष कार्यक्रमाच्या वेळी ही कशी दिसते आणि ती कशी दिसते यातूनही अजून काही सुटका झालेली नाही. आपण पण ही भारी ती भारी, असे अधून मधून दाद देत असतो. खोटं कशाला बोला. सुखी संसारासाठी दाद द्यावी लागते. काही तरी उपाय नक्की कळवा. -दिलीप बिरुटे (संसारी आणि नम्र)

अलीकडे सगळ्या मराठी चित्रपटांमध्ये एक ट्रेंड बोकाळला आहे. त तो नाटकांमध्येही दिसतो. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तर हा ट्रेंड सगळीकडेच दिसतोय. आजकाल साड्यांचे कपडे फेटे ड्रेपरी म्हणून ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये वापरली जाते. वरती डॉक्टर बिरुटे सरांनी जे ए आय चित्र काढले आहेत साधारणतः त्याच स्टाईलमध्ये पण पारंपारिक म्हणजे कुर्ता वगैरे अशा स्टाईलमध्ये मी अनेक ठिकाणी साड्यांचे केलेले कपडे पाहिले. अलीकडची उदाहरणे दि फोक आख्यान या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे किंवा द किरण माने शो या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे. त्यामुळे बिरूटे सर म्हणतात तसा ट्रेंड इतर लोकांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. जर असे टेलर्स कोणी या साड्यांचे पारंपारिक कपडे किंवा नवीन कपडे करत असतील तर या सर्व साड्या रिपर्पज करता येतील. एखादा स्टार्टअप बिजनेस सुद्धा मास्केल वरती हे करू शकतो म्हणजे चांगल्या साड्या घेऊन तुम्हाला त्याच स्टार्टअप मधून हवे ते बाकीचे कपडे घेण्यासाठी कुपन देणे, बहुतेक कपडे हे याच साड्यांना रिपर्पज करून केलेले असतील. जपानी लोक आपले की मोनो सुद्धा देऊ शकतात आणि तिथे तर किमोनो न्यूट्रल रंगाचे असतात साड्यांसारखे खूप कलात्मक आणि भरगच्च नसतात

आजकाल ते मान्यवर शिलाई यासारखे अनेक ब्रँड्स निघालेले आहेत ज्यांच्यामध्ये लग्नाचे कपडे मिळतात. पुरुषांचे लग्नाचे कपडे हा एक वेगळा धाग्याचा विषय आहे. मान्यवर सारख्या ठिकाणी एखादा नवा नवरदेव गेला की त्याच्यासाठी एक छोटेसे स्टेज तयार केलेले असते. नवरदेवाबरोबर केलेले तीन-चार त्याचे "मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" छापाचे मित्र असतात. असा बकरा आला की स्टोअरमधून दहा-पंधरा लोक त्या नवरदेवावर हल्ला चढवतात. त्याला विचारायला काही कळायच्या आतच तिकडून इकडून तिकडून लगेच वेलवेट चे कपडे मोठ्या महागड्या शेरवाण्या आणल्या जातात. नवरदेवाला चढवल्या जातात आणि लगेच त्याला आरशासमोर उभे केले जाते. मला माझा किस्सा आठवला. माझ्या लग्नाआधी माझ्या मित्राचे लग्न झाले होते आणि त्याला मला घेऊन लग्नाचे कपडे काढायचे होते. परंतु मला काही कारणाने ते शक्य झाले नाही. जेव्हा तो 85 हजार रुपयांचे कपडे घेऊन आला स्वतःसाठी फक्त तेव्हा मला हसावे की रडावे हे कळेना. उभ्या संपूर्ण आयुष्यात अशी वेलवेट ची शेरवानी तो फक्त एकदाच घालणार होता, ते अत्यंत डिस्प्रपोर्शनल गचाळ दिसणारे हेल्मेट वजा फेटा तोही आयुष्यात एकदाच घालणार होता आणि तेवढ्यासाठी त्यांनी जवळजवळ लाख रुपये उडवले होते. माझ्या लग्नामध्ये मग मी साडेतीनशे रुपयांचा अत्यंत स्वस्त एक जॅकेट आणले त्यावेळेस नेहरू जॅकेटचे मोदी जॅकेट असे नामकरण झाले होते. माझ्या काकूची एक जुनी पण चांगले पॅटर्न असलेली साडी घेऊन मी ते जॅकेट काकूच्या ओळखीच्या एका टेलरला दिले. ही टेलर वेगवेगळे hacks करण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध होती. तरी साडीचे काठ काढून त्या जॅकेट ला ते असे फिट केले की ते साडेतीनशे रुपयांचे जॅकेट तात्काळ 30000 रुपयांचे वाटू लागले. उरलेल्या साडीचा तिने अत्यंत चांगला असा फेटा देखील तयार केला. त्यानंतर एक बाराशे रुपयाचा मऊ सुती असा साधा कुर्ता आणि पायजमा आणि त्यावर हे जॅकेट आणि फेटा असा माझा लग्नाचा पोशाख तयार झाला. हा कुर्ता मी पुढे अनेक दिवस वापरला कारण तो नेहमीच्या वापराचाच होता खास लग्नासाठी केलेला नव्हता. माझा हा फेटा आणि हे जॅकेट नंतर माझ्या दोन मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरले. आता मला ते लहान होते नाहीतर ते अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि माझे लहान भाऊ कधीतरी ते कुठल्या ना कुठल्या समारंभाला घालत असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अरे वा! माझे लग्न झाले तेव्हा मी देखील हे मान्यवर वगैरेत गेलो होतो, मला घेरून प्रचंड मोठा हल्ला स्टाफ ने चढवला होता, पण किमती पाहून मी यशस्वी माघार घेतली, व थेट रेंटने कपडे देतात त्यांच्याकडे गेलो, अडीच की ३ हजारात त्यांनी तो मान्यवरचाच शेरवानी सारखा काहितरी प्रकार भाड्याने दिला! ३ दिवसाने भावाबरोबर परत पाठवून दिला, जी गोष्ट आयुष्यभर नंतर कधी घालायची नाही तिच्यासाठी कपाटात जागा अडकवून का ठेवावी? नंतर मी अनेक लग्नात असे रेंट ने मिळणारे ब्लेझर्स वापरले ६०० रुपयात ३ दिवसासाठी उत्तम गुणवत्तेचे ब्लेझर्स मिळाले. असो हा विषय साड्यांचा आहे, साड्यांच्या बाबतीतही हा प्रकार करायला हवा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 23/01/2026 - 13:07
वाह वाह , प्लीज या ड्रेसचा फोटो पाठवा माझ्या नवऱ्याचा आणि भावाचा महागडा लग्नातला शेरवानी कपाटात जागा अडवतो. किती वेळा सांगते ड्रेपरीला विकून टाका तर माझ्याकडे किती पाषाण हृदयी आहेस म्हणून पाहतात . साड्यांचे मला काहीच वावडे नाही .येऊ द्या अजून,, दिल मांगे मोअर !! साड्यांचे ड्रेस शिवले पण ते जास्त वापरले जात नाही खूप भरजरी तर कधी ऑफ बिट वाटतात .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

१. जॅकेट : ३५० रुपये २. कुर्ता पायजमा : ११५० रुपये (जो साधा सोपा होता म्हणून पुढे अनेक वेळा वापरला गेला ३. टेलर चार्ज : फुकट (१०० रुपये धरू) ४. ब्रोच : उधार एकुण वापर : अनेकदा, अजूनही वापरात lol

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 23/01/2026 - 14:49
वाह ,काठही सुबक निवडले आहेत .फेटा तर क्लासच!!!ही आयडियाची कल्पना वापरणार आहे .धन्यवाद !

कंजूस 23/01/2026 - 13:04
हा एक जुना लेख सापडला. दुकानदाराकडून अपमान.. https://www.misalpav.com/node/29703 एवढं करून घेतलेल्या महागड्या साड्यांचं काय करायचं हा प्रश्न आहेच.

खटपट्या 23/01/2026 - 21:53
पुर्वी साड्यांच्या गोधड्या शिवल्या जात असत. पण भरजरी साडया गोधड्यांसाठी वापरल्या जात नाहीत कारण त्यांची जर अंगाला खुपते. तरी ज्या सुती साड्या असतील त्यांच्या गोधड्या शिवाव्यात. आता तर गोधड्या शिवुन देणार्‍या संस्था आलेल्या आहेत. पुर्वी गोधड्या शिवुन देणार्‍या बायकांचा एक ग्रुप गल्लोगल्ली फिरत असे. आता तो ही दिसत नाही. बोहारीण हा प्रकार इतिहास जमा होत चालला आहे. ठाण्यात कोपरी ला काही शतके जुना चिंधी बाजार भरतो. सर्व बोहारीणी तिथे जमा होतात. तिथे जाउन चौकशी करुन त्यांना पत्ता दिल्यास त्या घरी येउन योग्य भावात साडया घेउन जातात. या बोहारणींचे प्रभाग ठरलेले असतात. योग्य त्या बोहारीणीकडे तुम्हाला डायरेक्ट केले जाते.

नूतन 25/01/2026 - 02:26
नमस्कार मंडळी.प्रथम आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद . प्रतिसाद वाचून ,माझ्याइतकाच‌‌ हा प्रश्न तुम्हालाही गंभीर वाटला असं जाणवलं. (विशेषतः पुरुष मिपाकरांना). खरंतर हे लिहिताना मला महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल अशी आशा होती. पण बहुदा बायकांच्या साडी खरेदी च्या सोसावर मी ताशेरे ओढले आहेत असा त्यांचा गैरसमज झाला की काय, असं वाटून त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नसावी असा आपला माझा तर्क! पण साड्यांइतकीच पुरुषांच्या समारंभीय कपड्यांची देखील हीच गोष्ट आहे, नाही का? असो .‌या चर्चेतून सुचवलेले काही मार्ग असे आहेत.. १.कवडीमोलाने जुन्या बाजारात विकणे.. यासाठी मनावर दगड ठेवता यायला हवा २. त्याचे ड्रेस शिवणे.. किती साड्यांचे शिवणार? ३ मोह सोडून गाठोडे बांधून टाकून देणे.. पुन्हा एकदा तेच ४ . विचार बदलणे ... कुणाच्या बोलण्याची पर्वा न करता त्याच साड्या पुन्हा पुन्हा वापरणे...हे बरोबर आहे. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही.. ५ साड्यांची लायब्ररी करणे..यात ब्लाऊजचा मुद्दा महत्वाचा आहे. मॅचिंग मिळाला तरी मापात जमायला हवा. भाड्याच्या कपड्यांत पण हा प्रश्न येऊ शकतो असं वाटतं. ६ अभिनव कल्पना.. साड्यांपासून वस्तू बनवून विकणे. साड्या देणाऱ्यांना बदल्यात कूपन देणे...पण त्या नव्या वस्तू नको असतील तर कूपन घेणं निरर्थक होईल . ७ ठाम राहून फक्त दीर्घकाळ वापरले जातील असेच कपडे खरेदी करणे. यातून सध्या तरी मी काढलेला निष्कर्ष असा.. मुळात अनावश्यक खरेदी न करणं. कपडे खरेदी करताना ते पुन्हा पुन्हा वापरले जातील असेच घेणे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या सोयीनुसार वागणे. आणि त्यातूनही मोह पडलाच तर चार घटकेची हौस झाली म्हणायची आणि फार विचार न करता कवडी मोलाने विकून टाकायचं अन्यथा गाठोडे बांधून टाकून द्यायचं. तर सध्या पुरता माझ्या कडून या चर्चेला विराम देते. अर्थात काही वेगळा मार्ग असेल तर त्याचं स्वागत आहे.

खरंतर हे लिहिताना मला महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल अशी आशा होती.
मिपावर आता महिला राहिल्यातच कुठे ? एकेकाळी मिपावर अनेक उत्तमोत्तम लिहिणार्‍या लेडीज बायका होत्या त्या आता सगळ्या गायबल्यात. त्यांच्यासाठी मिपावर लेडीज स्पेशल डबा बनविण्यात येणार होता तो देखील बनला की नाही कल्पना नाही. असो. स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :)

सर्वसाक्षी 25/01/2026 - 13:58
स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :) साहेब, चटका बसल्यावर वेदना होणारच! साठी घेणं, ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं. साहजिकच या मुद्द्यावर पुरुष वर्ग भरभरून व्यक्त झाला तर नवल ते काय

In reply to by सर्वसाक्षी

चटका बसल्यावर वेदना होणारच!
वेदना जाणावयास जागवू संवेदना हे गीत तुम्ही ऐकलं असेलच असं गृहित धरुन चालतो :)

In reply to by सर्वसाक्षी

अभ्या.. 25/01/2026 - 14:42
ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं. स्टोरी इथेच थांबत नाही. हे सगळे तर तमाम नवरोबांनी "अगदी अगदी" म्हणायलाच पाहिजे अशी घोषणा अहे पण पुढे .... "बघ की क्रीती सॅनॉन कसली भारी नेसती" "एकदा येवला/इंदूर/वाराणसी/म्हैसूर्/कोची/चेन्नै ला गेले की................" "बघा तुमच्या मित्राने सेपेरेट वॉकिन वॉर्डरोब करुन घेतलाय बायकोसाठी...." "कपाटातल्या काही आईला/बहिणीला देते मग जागा रिकामी झाली की....." "एखादी तरी पैठणी किंवा सिल्क पाहिजेच सुनेला द्यायला वारसा म्हणून......." "शेवटी साडीचा ग्रेस साडीलाच....." . हे अगली बार..... असतेच.......

कंजूस 21/01/2026 - 13:59
१.पन्नाशीच्या पुढच्या बायकांची फुकटची हौस. २. कोणत्यातरी समारंभात साडी नेसून गेल्यावर तिथे दोन तरी बायका आठवण काढतात " अगं हीच साडी तू दोन वर्षांपूर्वी तमक्या समारंभात नेसली होतीस ना?" झाले ती साडी कपाटात पार मागे टाकण्यात येते. बायकांची स्मरणशक्ती फार असते. ३.भारतात कुठेही भटकंतीला गेल्यावर खरेदी करायची नाहीत या तत्त्वावर जातो.( गुजरात, राजस्थान,मप्र,तमिळनाडू, कर्नाटक) मी बराच स्पीड ब्रेकर लावला आहे.

कपिलमुनी 21/01/2026 - 14:02
जुन्या बाजारात कोपरा पकडून विकायला बसा. ५०-१०० ला एक जाते . मी अशा साड्या / कपडे विकणार्‍या माणसाला विकले आहेत . पोतभर कपड्यांचे १००० घेउन आलो .

त्यातल्या त्यात साड्या फार महाग असतात म्हणुन समस्याही मोठी होते. शर्ट्/पँट विरले/फाटले/विटले की देउन टाकता येतात किवा टाकुन देता येतात. टॉवेल/चादरी वगैरे पायपुसणी म्हणुन किवा ओटा पुसायला कामी येतात. पुनर्वापर करायचा तर अधिकचे पैसे मोजावे लागतात, पण निदान पिशव्या, गोधड्या वगैरे शिवुन घेता येतील. आजकाल काही बुटीक छान ३ पीस वगैरे शिवुन देतात साड्यांचे. (माझ्या माहीतीत एक कमला नेहरु पार्क समोर आहे). तेव्हा जास्तीच्या साड्या तिकडे घेउन जा, ते पोत बघुन ह्याचा ड्रेस टिकाउ होईल का हे बघुन वेगवेगळ्या फॅशनप्रमाणे २पीस्/३पीस शिवुन देतात. नाहीतर जुन्या बाजाराचा किवा दान करायचा पर्याय आहेच.

श्री. रितेश देशमूख व सौ. जनाबाई डिसुझा ह्यांनी आपल्या आईच्या जुन्या साडीपासून आपल्या मुलाना कुडते शिवले होते. बाकी ह्या घरातल्या साडीच्या पसाऱ्याला कंटाळून मी बेड ला दोन मोठे कप्पे करवून घेतले जी त्यात साड्या कोंबून कपाट मोकळे करवून घेतले. माझ्या एका खात्यात माझे सगळे कपडे मावतात! पण साड्यांना ३ कप्पे असूनही जागा कमी पडते!

चित्रगुप्त 21/01/2026 - 19:14
पुर्वी हिरिरीने प्रतिसाद देणार्‍या मिपाबायका गायबलेल्या आहेत आता. बायकी विषयावर पुरुषी प्रतिसाद. गम्मत आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. पण बायकोच्या कपाटे भरभरुन असलेल्या साड्यांची विल्हेवाट लावण्याबद्दल विषय काढण्याची पण कोणत्याही नवर्‍याची प्राज्ञा नाही. साड्यांचे एक गाठोडे बांधून कुठेतरी टाकून येणे हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. कुणाला हव्या असल्या तर तिथून घेऊन जातील, आपण एकदा त्याग केला की त्या वस्तूचे काही का होईना. एकदा मनातून मोह सोडता आला, की सोपे आहे.

कंजूस 21/01/2026 - 20:11
साड्यांपासून टू पीस पंजाबी ड्रेस, टॉप वगैरे सहज होतात. पण पातळ ( झिरझिरीत ) साड्यांना आतून अस्त्र लावावे लागते. माझी पत्नी घरीच शिवते. पण इतक्या ढीगभर साड्यांचे काय करायचे? एक निरीक्षण- ठाण्यात गोखले रोडवरती साड्यांची बरीच दुकाने आहेत. तिथे तुम्हाला आई -मुलगा -आणि सून साड्यांची दुकाने फिरताना दिसतील. तिथल्या साड्या सहजच पंधरा हजारांच्या वरच्या असतात. पण आई पंजाबी ड्रेसमध्ये असते, सून जीन पँटमध्ये, मग यांना साडी कशाला हवी असते? मुलगा दुकानाबाहेरच ताटकळत उभा राहतो आणि शेवटी कार्ड देतो एवढाच त्याचा खरेदीतील सहभाग.

In reply to by कंजूस

इतक्या ढीगभर साड्यांचे काय करायचे?
Dress (चित्र सौजन्य नवं तंत्रज्ञान ) साड्यांचे सदरे कसे होतील माहिती नाही आणि अशा सद-यांना लोकप्रियता मिळाली की हा प्रश्न बहुतेक वेळी पडणार नाही असे वाटले. -दिलीप बिरुटे

सौन्दर्य 22/01/2026 - 02:58
पूर्वी म्हणजे निदान १९९० पर्यंत तरी मुंबईत बोहारिणी दारोदार फिरत असत. जमल्यास त्यांच्याशी घासाघीस करून एखादा चमचा, वाटी किंवा गेला बाजार एखादा डबा मिळवता आला तर पहा. प्रत्येक दिवशी फक्त एकच साडी बोहारिणीला दाखवायची, घासाघीस करण्यात संपूर्ण दुपार सहज निघून जाईल. वर शांतपणा, सौजन्य, घासाघीस करण्याची कला वगैरे गुण अंगात जोपासता येतील. अगदीच काही जमत नसेल तर साड्या घराबाहेर काढून ठेवा, नंतर त्यांचे काय झाले हे पाहू देखील नका. हल्लीच्या ह्या महागाईच्या जमान्यात घरातील एखादे कपाट रिकामे झाले तर तेव्हढीच जागा वापरायला मिळाल्याचे समाधान लाभेल.

In reply to by सौन्दर्य

कंजूस 22/01/2026 - 05:04
बोहारिणी प्रकार संपलेल्यात जमा आहे. म्हणजे त्या अजूनही फिरतात पण कपड्यांच्या बदल्यात देत असलेल्या वस्तू टाकावू असतात. टिकावू नसतात. क्वालिटी खराब असते. ज्या चांगल्या साड्या आश्रमवालेही घेत नाहीत त्या बदल्यात चमचे, पाट, टब कोण घेणार?

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/01/2026 - 16:42
सोलापूरला काशीकापडी म्हणून एक समाज आहे. जुने कपडे घेऊन ते नॉमिनल रिपेअर करुन किंवा तसेच विकायचा त्यांचा पारंपारिक धंदा आहे. ते घेतात जुन्या साड्या पण त्याची फार कमी किंमत देतात. साड्या ह्या द्राक्ष, दाळींब बागा झाकण्यासाठी वापरल्या जातात. . जुन्या वस्तू विकण्यासाठी आणि त्यांची किंमत ठरवण्यासाठी जी सारासार बुध्दी लागते त्याचा प्रचंड अभाव शहरात दिसून आला आहे. ओएलएक्स, मायगेटसारख्या अ‍ॅपवर जुन्या वस्तूंच्या लावलेल्या किमती बघून हसावे की रडावे तेच कळत नाही. त्यात परत ती वस्तू विकली न गेल्याने पडून राहते आणि शेवटी स्क्रॅपवाल्यांच्या सांगेल त्या रेटमध्ये खालसा केली जाते. वस्तूंचा आणि त्याच्या किमतीचा मोह फार बेक्कार. . ह्या कार्यक्रमासाठी, त्या लग्नासाठी म्हणून बायकोने हौसेने शेरवानी सदृश्य कुर्ते घ्यायला लावलेले, सगळे इकडे परदेशात येताना देउन टाकावे लागले. बरं वापरले म्हणावे तर एकेकदाच वापर झालेला. त्यावेळी कळले कि कित्येक अनावश्यक वस्तू आपण गोळा करुन ठेवलेल्या होत्या. अगदी कारपासून छोट्या कॅन्व्हासपर्यंत सगळ्या वस्तू १५ दिवसात येतील तशा किमतीला देऊन पुन्हा नवीन संग्रह करायला सज्ज झालो आहोत.

ज्या वागण्यावरून एका विशिश्ठ ठिकाणी राहण्यार्या आणि एका विशिश्ठ समुहातील लोकान्ना नावे ठेवली गेली, चेश्टा, टिन्गल टवाळी केली गेली, चिक्कू कन्जूस म्हणून हेटाळले गेले तेच आज Reuse, Reduce, Recycle करा म्हणून सर्वान्ना सान्गितले जात आहे. मोठ्या, प्रसिद्ध लोकान्नी केले सान्गितले की ऐकले जाते (नपेक्शा 'follow' केले जाते). काय हरकत आहे तीच साडी पुन्हा नेसायला? वेगळ्या जागी, वेगळ्या लोकानसमोर नेसावी. मुळात हा विचार बदलत नाही तोवर हा प्रश्न सुटणार नाही. या नाहीतर वेगळ्या स्वरूपात समोर येत राहणार.

गामा पैलवान 22/01/2026 - 17:44
जमलेल्या साड्यांचं काय करायचं ते माहीत नाही. पण साड्यांचा ढीग जमू नये म्हणून एक उपाय म्हणजे साड्या भाड्याने आणणे. याच न्यायाने जमलेल्या साड्या कदाचित भाड्याने देता याव्यात. -गा.पै.

सुबोध खरे 22/01/2026 - 19:20
आमच्या सासूबाई १० वर्षा पूर्वी अचानक गेल्या. त्यावेळेस त्यांनी आयुष्यभर मोठ्या हौसेने जमवून ठेवलेल्या साड्या वस्तू भांडी इ त्यांच्या सुनेने अक्षरशः कुणालाही देऊन टाकल्या. माझ्या पत्नीने त्यातील काही आईने स्वतःच्या हाताने कशिदा केलेल्या साड्या आईची आठवण म्हणून घरी आणल्या. परंतु निदान ७५ तरी साड्या होत्या. प्रत्येक साडीच्या आत त्याचा परकर ब्लाउज त्याला साजेसे काही दागिने (उदा छल्ला) असे सर्व व्यवस्थित इस्त्री करुन ठेवलेले होते. परंतु इतक्या साड्या घेऊन येणे शक्य नव्हते. बहुतांश साड्या या "अशाच कुणाला" तरी देण्यात आल्या चार वर्षांपूर्वी आमचे वडील गेले तेंव्हा त्यांचे उत्तम शर्ट जे मला येतात ते मी आजही त्यांची आठवण म्हणून वापरत आहे. पण माझी उंची जास्त असल्यामुळे त्यांच्या पँट्स काही उपयोगी आल्या नाहीत. त्या ते काम करत असलेल्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना देण्यात आल्या. आमचे वडील नेहमी सांगत असत. एखादी वस्तू आपल्याला नको असेल तर सरळ रस्त्यावर ठेवा. कोण घेऊन जातं आणि काय करतं हे पाहू नका. उगाच नको असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन तेवढ्यात पुण्य मिळवण्याचा हव्यास नको. त्याप्रमाणे त्यांची पादत्राणे किंवा इतर वस्तू आम्ही अक्षरशः रस्त्यावर ठेवली. काही तासात गरजू व्यक्ती त्या घेऊन गेले. गेली कित्येक वर्षे मी हा उद्योग करत आलो आहे. आपल्या मागे अशा नको असलेल्या वस्तू कोण घेऊन जातं याच्याशी तुम्हाला काय करायचंय?

In reply to by सुबोध खरे

छान विचार! तुमच्या वडिलांचे विचार आवडले. मध्ये एक माणुसकीची भिंत म्हणून उपक्रम निघाला होता, रस्त्यावर कुठेतरी असलेल्या भिंतीवर कपडे वगैरे टांगून जायचे, गरजू ते नेतील. पण अनेक गॅरेजवाल्यांनी हात पुसायला फडके झाले म्हणून पोतेच्या पोते नेले. हा उपक्रम नंतर दिसला नाही.

नमस्कार मंडळी, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
अरे देवा, लै जीवघेणा विषय काढला. आमच्या इकडे, एक एक साडी जेव्हा कपाटातून आठवणीच्या रुपाने बाहेर पडायला लागते, तेव्हा या साड्यांचं काही तरी झालं पाहिजे असे कायम वाटले आहे. वरच्या कप्प्यातल्या खालच्या कप्प्यात येतांना त्या प्रत्येक साडीची एक दीर्घ कथा असते. साड्या अशा वरतून खाली, खालून वर जाताना. किंवा घरात हा साड्यांचा पसारा मांडलेला दिसलो की आपण पुरुष मेलोच समजायचे. हळवा विषय असतो. फार संयमाने तेवढा काळ घालवावा लागतो. संयमाने प्रतिसाद द्यावा लागतो. आपण असतो काही तरी कामात आणि यांचा प्रत्येक मोग-याच्या पाकळीप्रमाणे एक पाकळीचा साडीच्या आठवणीचा गंध यायला लागतो. प्रत्येक साडीच्या वेगळी आठवण. च्यायला लक्षात तरी कशा राहतात म्हणतो या कथा. ही तेव्हा घेतली होती, ही तेव्हा नेसले होते. अमक्याने घेतली होती. तमक्याने घेतली होती. ही चांगली होती आणि ती चांगली होती. कधी कधी जड अंतकरणाने त्या साड्या देऊन डबे घेताना पाहिलं आहे. साड्या आणि डबे दोघांचीही संख्या वाढतच जाते. पण, हा साड्यांचा आकंठ झरा अजून्ही काही आटला नाही. अधून मधून विशेष कार्यक्रमाच्या वेळी ही कशी दिसते आणि ती कशी दिसते यातूनही अजून काही सुटका झालेली नाही. आपण पण ही भारी ती भारी, असे अधून मधून दाद देत असतो. खोटं कशाला बोला. सुखी संसारासाठी दाद द्यावी लागते. काही तरी उपाय नक्की कळवा. -दिलीप बिरुटे (संसारी आणि नम्र)

अलीकडे सगळ्या मराठी चित्रपटांमध्ये एक ट्रेंड बोकाळला आहे. त तो नाटकांमध्येही दिसतो. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तर हा ट्रेंड सगळीकडेच दिसतोय. आजकाल साड्यांचे कपडे फेटे ड्रेपरी म्हणून ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये वापरली जाते. वरती डॉक्टर बिरुटे सरांनी जे ए आय चित्र काढले आहेत साधारणतः त्याच स्टाईलमध्ये पण पारंपारिक म्हणजे कुर्ता वगैरे अशा स्टाईलमध्ये मी अनेक ठिकाणी साड्यांचे केलेले कपडे पाहिले. अलीकडची उदाहरणे दि फोक आख्यान या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे किंवा द किरण माने शो या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे. त्यामुळे बिरूटे सर म्हणतात तसा ट्रेंड इतर लोकांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. जर असे टेलर्स कोणी या साड्यांचे पारंपारिक कपडे किंवा नवीन कपडे करत असतील तर या सर्व साड्या रिपर्पज करता येतील. एखादा स्टार्टअप बिजनेस सुद्धा मास्केल वरती हे करू शकतो म्हणजे चांगल्या साड्या घेऊन तुम्हाला त्याच स्टार्टअप मधून हवे ते बाकीचे कपडे घेण्यासाठी कुपन देणे, बहुतेक कपडे हे याच साड्यांना रिपर्पज करून केलेले असतील. जपानी लोक आपले की मोनो सुद्धा देऊ शकतात आणि तिथे तर किमोनो न्यूट्रल रंगाचे असतात साड्यांसारखे खूप कलात्मक आणि भरगच्च नसतात

आजकाल ते मान्यवर शिलाई यासारखे अनेक ब्रँड्स निघालेले आहेत ज्यांच्यामध्ये लग्नाचे कपडे मिळतात. पुरुषांचे लग्नाचे कपडे हा एक वेगळा धाग्याचा विषय आहे. मान्यवर सारख्या ठिकाणी एखादा नवा नवरदेव गेला की त्याच्यासाठी एक छोटेसे स्टेज तयार केलेले असते. नवरदेवाबरोबर केलेले तीन-चार त्याचे "मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" छापाचे मित्र असतात. असा बकरा आला की स्टोअरमधून दहा-पंधरा लोक त्या नवरदेवावर हल्ला चढवतात. त्याला विचारायला काही कळायच्या आतच तिकडून इकडून तिकडून लगेच वेलवेट चे कपडे मोठ्या महागड्या शेरवाण्या आणल्या जातात. नवरदेवाला चढवल्या जातात आणि लगेच त्याला आरशासमोर उभे केले जाते. मला माझा किस्सा आठवला. माझ्या लग्नाआधी माझ्या मित्राचे लग्न झाले होते आणि त्याला मला घेऊन लग्नाचे कपडे काढायचे होते. परंतु मला काही कारणाने ते शक्य झाले नाही. जेव्हा तो 85 हजार रुपयांचे कपडे घेऊन आला स्वतःसाठी फक्त तेव्हा मला हसावे की रडावे हे कळेना. उभ्या संपूर्ण आयुष्यात अशी वेलवेट ची शेरवानी तो फक्त एकदाच घालणार होता, ते अत्यंत डिस्प्रपोर्शनल गचाळ दिसणारे हेल्मेट वजा फेटा तोही आयुष्यात एकदाच घालणार होता आणि तेवढ्यासाठी त्यांनी जवळजवळ लाख रुपये उडवले होते. माझ्या लग्नामध्ये मग मी साडेतीनशे रुपयांचा अत्यंत स्वस्त एक जॅकेट आणले त्यावेळेस नेहरू जॅकेटचे मोदी जॅकेट असे नामकरण झाले होते. माझ्या काकूची एक जुनी पण चांगले पॅटर्न असलेली साडी घेऊन मी ते जॅकेट काकूच्या ओळखीच्या एका टेलरला दिले. ही टेलर वेगवेगळे hacks करण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध होती. तरी साडीचे काठ काढून त्या जॅकेट ला ते असे फिट केले की ते साडेतीनशे रुपयांचे जॅकेट तात्काळ 30000 रुपयांचे वाटू लागले. उरलेल्या साडीचा तिने अत्यंत चांगला असा फेटा देखील तयार केला. त्यानंतर एक बाराशे रुपयाचा मऊ सुती असा साधा कुर्ता आणि पायजमा आणि त्यावर हे जॅकेट आणि फेटा असा माझा लग्नाचा पोशाख तयार झाला. हा कुर्ता मी पुढे अनेक दिवस वापरला कारण तो नेहमीच्या वापराचाच होता खास लग्नासाठी केलेला नव्हता. माझा हा फेटा आणि हे जॅकेट नंतर माझ्या दोन मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरले. आता मला ते लहान होते नाहीतर ते अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि माझे लहान भाऊ कधीतरी ते कुठल्या ना कुठल्या समारंभाला घालत असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अरे वा! माझे लग्न झाले तेव्हा मी देखील हे मान्यवर वगैरेत गेलो होतो, मला घेरून प्रचंड मोठा हल्ला स्टाफ ने चढवला होता, पण किमती पाहून मी यशस्वी माघार घेतली, व थेट रेंटने कपडे देतात त्यांच्याकडे गेलो, अडीच की ३ हजारात त्यांनी तो मान्यवरचाच शेरवानी सारखा काहितरी प्रकार भाड्याने दिला! ३ दिवसाने भावाबरोबर परत पाठवून दिला, जी गोष्ट आयुष्यभर नंतर कधी घालायची नाही तिच्यासाठी कपाटात जागा अडकवून का ठेवावी? नंतर मी अनेक लग्नात असे रेंट ने मिळणारे ब्लेझर्स वापरले ६०० रुपयात ३ दिवसासाठी उत्तम गुणवत्तेचे ब्लेझर्स मिळाले. असो हा विषय साड्यांचा आहे, साड्यांच्या बाबतीतही हा प्रकार करायला हवा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 23/01/2026 - 13:07
वाह वाह , प्लीज या ड्रेसचा फोटो पाठवा माझ्या नवऱ्याचा आणि भावाचा महागडा लग्नातला शेरवानी कपाटात जागा अडवतो. किती वेळा सांगते ड्रेपरीला विकून टाका तर माझ्याकडे किती पाषाण हृदयी आहेस म्हणून पाहतात . साड्यांचे मला काहीच वावडे नाही .येऊ द्या अजून,, दिल मांगे मोअर !! साड्यांचे ड्रेस शिवले पण ते जास्त वापरले जात नाही खूप भरजरी तर कधी ऑफ बिट वाटतात .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

१. जॅकेट : ३५० रुपये २. कुर्ता पायजमा : ११५० रुपये (जो साधा सोपा होता म्हणून पुढे अनेक वेळा वापरला गेला ३. टेलर चार्ज : फुकट (१०० रुपये धरू) ४. ब्रोच : उधार एकुण वापर : अनेकदा, अजूनही वापरात lol

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti 23/01/2026 - 14:49
वाह ,काठही सुबक निवडले आहेत .फेटा तर क्लासच!!!ही आयडियाची कल्पना वापरणार आहे .धन्यवाद !

कंजूस 23/01/2026 - 13:04
हा एक जुना लेख सापडला. दुकानदाराकडून अपमान.. https://www.misalpav.com/node/29703 एवढं करून घेतलेल्या महागड्या साड्यांचं काय करायचं हा प्रश्न आहेच.

खटपट्या 23/01/2026 - 21:53
पुर्वी साड्यांच्या गोधड्या शिवल्या जात असत. पण भरजरी साडया गोधड्यांसाठी वापरल्या जात नाहीत कारण त्यांची जर अंगाला खुपते. तरी ज्या सुती साड्या असतील त्यांच्या गोधड्या शिवाव्यात. आता तर गोधड्या शिवुन देणार्‍या संस्था आलेल्या आहेत. पुर्वी गोधड्या शिवुन देणार्‍या बायकांचा एक ग्रुप गल्लोगल्ली फिरत असे. आता तो ही दिसत नाही. बोहारीण हा प्रकार इतिहास जमा होत चालला आहे. ठाण्यात कोपरी ला काही शतके जुना चिंधी बाजार भरतो. सर्व बोहारीणी तिथे जमा होतात. तिथे जाउन चौकशी करुन त्यांना पत्ता दिल्यास त्या घरी येउन योग्य भावात साडया घेउन जातात. या बोहारणींचे प्रभाग ठरलेले असतात. योग्य त्या बोहारीणीकडे तुम्हाला डायरेक्ट केले जाते.

नूतन 25/01/2026 - 02:26
नमस्कार मंडळी.प्रथम आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद . प्रतिसाद वाचून ,माझ्याइतकाच‌‌ हा प्रश्न तुम्हालाही गंभीर वाटला असं जाणवलं. (विशेषतः पुरुष मिपाकरांना). खरंतर हे लिहिताना मला महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल अशी आशा होती. पण बहुदा बायकांच्या साडी खरेदी च्या सोसावर मी ताशेरे ओढले आहेत असा त्यांचा गैरसमज झाला की काय, असं वाटून त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नसावी असा आपला माझा तर्क! पण साड्यांइतकीच पुरुषांच्या समारंभीय कपड्यांची देखील हीच गोष्ट आहे, नाही का? असो .‌या चर्चेतून सुचवलेले काही मार्ग असे आहेत.. १.कवडीमोलाने जुन्या बाजारात विकणे.. यासाठी मनावर दगड ठेवता यायला हवा २. त्याचे ड्रेस शिवणे.. किती साड्यांचे शिवणार? ३ मोह सोडून गाठोडे बांधून टाकून देणे.. पुन्हा एकदा तेच ४ . विचार बदलणे ... कुणाच्या बोलण्याची पर्वा न करता त्याच साड्या पुन्हा पुन्हा वापरणे...हे बरोबर आहे. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही.. ५ साड्यांची लायब्ररी करणे..यात ब्लाऊजचा मुद्दा महत्वाचा आहे. मॅचिंग मिळाला तरी मापात जमायला हवा. भाड्याच्या कपड्यांत पण हा प्रश्न येऊ शकतो असं वाटतं. ६ अभिनव कल्पना.. साड्यांपासून वस्तू बनवून विकणे. साड्या देणाऱ्यांना बदल्यात कूपन देणे...पण त्या नव्या वस्तू नको असतील तर कूपन घेणं निरर्थक होईल . ७ ठाम राहून फक्त दीर्घकाळ वापरले जातील असेच कपडे खरेदी करणे. यातून सध्या तरी मी काढलेला निष्कर्ष असा.. मुळात अनावश्यक खरेदी न करणं. कपडे खरेदी करताना ते पुन्हा पुन्हा वापरले जातील असेच घेणे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या सोयीनुसार वागणे. आणि त्यातूनही मोह पडलाच तर चार घटकेची हौस झाली म्हणायची आणि फार विचार न करता कवडी मोलाने विकून टाकायचं अन्यथा गाठोडे बांधून टाकून द्यायचं. तर सध्या पुरता माझ्या कडून या चर्चेला विराम देते. अर्थात काही वेगळा मार्ग असेल तर त्याचं स्वागत आहे.

खरंतर हे लिहिताना मला महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल अशी आशा होती.
मिपावर आता महिला राहिल्यातच कुठे ? एकेकाळी मिपावर अनेक उत्तमोत्तम लिहिणार्‍या लेडीज बायका होत्या त्या आता सगळ्या गायबल्यात. त्यांच्यासाठी मिपावर लेडीज स्पेशल डबा बनविण्यात येणार होता तो देखील बनला की नाही कल्पना नाही. असो. स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :)

सर्वसाक्षी 25/01/2026 - 13:58
स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :) साहेब, चटका बसल्यावर वेदना होणारच! साठी घेणं, ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं. साहजिकच या मुद्द्यावर पुरुष वर्ग भरभरून व्यक्त झाला तर नवल ते काय

In reply to by सर्वसाक्षी

चटका बसल्यावर वेदना होणारच!
वेदना जाणावयास जागवू संवेदना हे गीत तुम्ही ऐकलं असेलच असं गृहित धरुन चालतो :)

In reply to by सर्वसाक्षी

अभ्या.. 25/01/2026 - 14:42
ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं. स्टोरी इथेच थांबत नाही. हे सगळे तर तमाम नवरोबांनी "अगदी अगदी" म्हणायलाच पाहिजे अशी घोषणा अहे पण पुढे .... "बघ की क्रीती सॅनॉन कसली भारी नेसती" "एकदा येवला/इंदूर/वाराणसी/म्हैसूर्/कोची/चेन्नै ला गेले की................" "बघा तुमच्या मित्राने सेपेरेट वॉकिन वॉर्डरोब करुन घेतलाय बायकोसाठी...." "कपाटातल्या काही आईला/बहिणीला देते मग जागा रिकामी झाली की....." "एखादी तरी पैठणी किंवा सिल्क पाहिजेच सुनेला द्यायला वारसा म्हणून......." "शेवटी साडीचा ग्रेस साडीलाच....." . हे अगली बार..... असतेच.......
नमस्कार मंडळी. हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात. तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं? घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात.

आले अंबानीच्या मना

स्वधर्म ·

तरी त्यांना सुचवले होते की तुम्ही "हा हत्ती हत्तीईदला कुरबानी द्यायला पाळला आहे" असे म्हणा. कुर्बानी विरुद्ध बोलण्याच्या ना PETA मध्ये दम आहे, ना दाभोळकरमध्ये, ना अंबानी मध्ये, ना हायकोर्ट मध्ये, ना सर्वोच्च कोर्ट मध्ये. इतकी सोपी तकिया करून ते लोकं स्वतःचा हत्ती स्वतःकडे ठेऊ शकले असते ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 31/07/2025 - 02:55
त्यापेक्षा हत्तीला नाम घ्यायला लावायला पाहिजे. किंवा सर्व गावकऱ्यांनी एकेक लाख नामाची कॉन्ट्री काढली असती तरी गेलाबाजार काही अब्जात नाम कलेक्ट होऊन हत्तीला पाहिजे तिथं राहता आलं असत. कुठली कुर्बाणी आणि कुठला अंबानी . बिटकॉइनच्या तोंडांत मारल असलं चलन आहे नाम.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 31/07/2025 - 04:35
तुम्ही सुचवलेला उपाय एकदम 'नामी, आहे. पण नांदणीच्या गावकर्‍यांना प्रिपेड पर्याय आता नाही. पोस्टपेड चालेल का?

In reply to by अभ्या..

नाही. नामाचा सरकारी कामात इत्यादी उपयोग होत नाही. आमच्या देवस्थानात मोर पाळलेले होते. तेही फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नेले होते. नामाचा उपयोग ते मोर नेल्यानंतर " ही देखील रामाचीच इच्छा" हे कळण्यासाठी होतो. तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 31/07/2025 - 15:07
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. ओके, तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ? सुरुवात कुणी केली?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2025 - 04:32
पंत, एरव्ही अध्यात्म, नाम, अभंग इ. विषय असेल तर लोकांचा बुध्दीभ्रम तुंम्हाला सहज जमतो. त्याबाबत वादच नाही. पण इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. ताबडतोब दाखवून दिले जाईल. हां, आता प्रत्यक्ष महानेते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांचेच नांव यात आले त्यामुळे तुमची घालमेल समजू शकतो, पण त्याबद्दल 'एबीपी माझा'ला मोठ्या मनाने माफ करून टाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2025 - 15:40
इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by स्वधर्म

अहो काय बरळताय ? कसला आलाय द्वेष अन् काय ! आम्ही स्वतः अगदी चवीने बोकड , बोल्हाई मटण खातो. तेही आमच्या मुस्लिम मित्रांच्या सोबत जाऊन ! PETA किंवा तुमच्या सारखे दुतोंडी लोकं इन जनरल जो मांसाहार चालतो त्या बाबत कधीही काहीही बोलल्याचे पुरावे नाहीत. तुमच्यात स्पष्ट बोलण्याची धमक नाही , किमान हमीद मियां तरी सुस्पष्ट बोलले आहेत हे पहा बी

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 05/08/2025 - 17:26
हिंदू कधीही दुसर्‍या धर्माच्या लोकांचा द्वेष करत नाही. त्यामुळे देशात दुसर्‍या धर्माच्या लोकांची संख्या वाढली. द्वेष असता तर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू कमी झाले तसे आपल्या देशात झाले असते. बाकी जे त्यांच्या परमेश्वराला मानत नाही त्यांच्या विरोधात सतत जेहाद केले पाहिजे. यावर ते 100 टक्के ठाम असतात.

कंजूस 31/07/2025 - 05:38
खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. इकडे तो मठालाही सांभाळायचा खर्च वाढत असेल. गावकऱ्यांचा विरोध झाल्यावर दुसऱ्या मालकाने इतर उपाय कामाला लावले. कोल्हापुरातले दुसरे असे एक उदाहरण म्हणजे मंगेशकर (लता) यांच्या मालकीचा स्टुडिओ विकून तिथे काही मॉल वगैरे येणार होता. कोल्हापुरातल्या लोकांनी अडसर घातला. तो हेरिटेज/ वारसा आहे इत्यादी. दोन्ही बाबतीत वस्तू तीनशे वर्षांपूर्वींच्या नाहीत. मुद्दा असा आहे की मालक आपल्या मालमत्तेचे काहीही करू शकतो कायद्याने, त्यात इतरांनी भावनावश होऊन अडथळा आणणे बरोबर आहे का?

कंजूस 31/07/2025 - 05:48
इथे दुसरा मालक अंबानी कुटुंबीय आहे. त्यांचे आणि केंद्रातील वरीष्ठांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेतली की आपण भक्त ठरू शकतो याची कल्पना आहे. अंबानींच्या टेलीकंपनी जियोचे कार्ड सर्विस वापरणारे किंवा न वापरणारे भक्त/ विरोधक ठरतील का?

कंजूस 31/07/2025 - 06:37
आपला फोन नंबर एका सर्विस प्रवाइडरकडून दुसऱ्याकडे नेणे म्हणजे 'नंबर पोर्ट'. आपण बरेच जण ' pre paid' plan घेतो. Post paid/ बिलींग प्लान घेत नाही. यात धोका असतो. आपण फोन कॉल्स करतो, डेटा इंटरनेट वापरत राहतो आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल येऊ शकते. Pre paid प्रकारात तसे होत नाही. अमर्याद इंटरनेट वापरले जात नाही. डेटा लिमीट संपल्यावर बंद पडते. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की वोडाफोन किंवा बीएसएनेल चा नंबर जियोकडे बदलल्यास pre paid नंबर मिळतो. तसं एरटेलचं नाही. एरटेलला पोर्टिंग करायचं झाल्यास चार ते सहा महिने post paid प्लान घ्यावा लागतो. तो महागडा आहे. शिवाय सहा महिन्यांनी pre paid करायला गेल्यास ते त्रास देतात.

कोर्टाने काय म्हंटले आहे? फक्त अंबानी अंबानी म्हणून रागाने नाचण्यात अर्थ नाही. But the high court cited a June 2024 report about the elephant's health, diet and nutrition, social environment, hygiene and cleanliness of shelter, veterinary care and work schedule, and said they "appear to be absolutely dismal". citing an elephant's right to quality life must take precedence over humans' right to use it for religious purposes. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/elephant-relocated-to-gujarat-facility-from-kolhapur-devotees-bid-emotional-adieu-101753844026798.html

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 31/07/2025 - 11:18
या देशात कशावरही विश्वास नाही, कोर्ट कमिटि नेमते आणि त्या अहवालावर निर्णय देते . ती कमिटी मॅनेज झाली कि जमले

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वधर्म 31/07/2025 - 15:38
माई, तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मानवाच्या धार्मिक अधिकार व इच्छांपेक्षा प्राण्याचा सुरक्षित जीवनाचा अधिकार अधिक महत्वाचा आहेच. केवळ धार्मिक आहेत, किंवा गावकर्‍यांना हत्तीण हवीशी वाटते, त्यांना तिचा लळा आहे, म्हणून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. तरीही अंबानीच्या वनतारातच हत्तीणीचे चांगले संवर्धन होईल असे मानणे, म्हणजे जरा जास्तच होतंय. तुमच्या दुव्यात म्हटले आहे: The relocation took place after the Supreme Court dismissed a petition filed by the mutt, challenging the Bombay High Court order upholding the decision of a High Powered Committee to relocate the animal to the Gujarat facility. या हाय पॉवर कमिटीत कोण कोण होते? त्यांच्याविषयी कुठेच माहिती मला तरी मिळाली नाही. त्यांचे काही हितसंबंध होते का? बरं एकदा राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने, डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत प्रमाणपत्र दिलेले होते. या हाय पॉवर कमिटीने वनतारा अधिकार्‍यांची भेट, मठाने ऑफर नाकारणे वगैरे झाल्यावर नवीन अहवाल दिलाय. हे सगळं तितकं निष्पाप सरळ दिसतंय का तुंम्हाला? राजू शेट्टी यांनी जामनगरलाच का? हा मुद्दा मांडला आहे. एक तर केरळ मध्ये हत्तींचे उत्तम संगोपन करण्याची परंपरा व क्षमता आहे. तसेच जामनगरला तापमान ४५ अंशापर्यंत जाते. हे असे असताना, 'गुजरात महाराष्ट्राला जवळ असल्याने' तिला जामनगरला हलवायचा आदेश दिला. हा न्यायालयाचा तर्क तुंम्हाला कसा वाटतो?

Bhakti 31/07/2025 - 10:53
अंबानीने अशाप्रकारे एकल असणाऱ्या सर्व हत्तींना वनतारात घेऊन जावं.हत्तींचा कळप बनवावे.इतक्या पैशांचा कधी उपयोग होणार,तो वापर करावा.गावकऱ्यांना आनंद व्हायला पाहिजे.हत्तीला निसर्गात राहण्याची संधी आता यापुढे मिळणार,बास झाली की गावची सेवा.

In reply to by कपिलमुनी

फक्त अंबानी नाही, अंबानी + PETA + हाय कोर्ट + सुप्रीम कोर्ट हे सगळेच समान दोषी आहेत. नीच लोकं. जो समाज जाहीरपणे मुक्या जनावरांची हिंसा करतो त्याला पाठीशी घालतात, अन् जो टोकाचा अहिंसक समाज मुक्या जनावराला देवासारखे प्रेमाने वागवत आहे त्याच्याकडून तो प्राणी हिसकावून घेतात. असला हा नीच समाज. ही ह्या नीच लोकांची धर्मनिरपेक्षता आणि ही ह्याचे सेक्युलॅरिझम. जे लोकं एकट्या अंबानीचे नाव घेऊन टार्गेट करत आहेत ते स्वतःचे पूर्वग्रह बायस दाखवून देत आहेत बस.

मी माझा पाळीव घोडा किवा गाय किवा तत्सम प्राणी विकायचे नाही किवा उलट ठरवले तर पेटा हरकत घेउ शकते? किवा गेलाबाजार एखाद्या शेजार्‍याने आकसाने पेटाकडे तक्रार केली की मी माझ्या कुत्र्याचा छळ करतो तर पेटा कारवाई करु शकते?

अमर विश्वास 31/07/2025 - 15:43
भरपूर हसलो लेख वाचून ... वनतारा मध्ये २०० हत्ती आहेत ... तरी अंबानी आपले सर्व उद्योग सोडून जयसिंगपूर मधल्या हत्तीच्या मागे लागला ... भारी लॉजिक आहे

In reply to by अमर विश्वास

स्वधर्म 31/07/2025 - 15:49
त्यांच्याकडे पॉलिमर, फोन नेटवर्क, पेट्रोकेमिकल, देशातील बहुसंख्य माध्यमे, आणि काय काय एवढे उद्योग आहेत. तरी पण किराणा दुकानं काढली... खूपच हसण्यासारखे आहे हे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 01/08/2025 - 16:00
तुमचा काय आकस आहे, कल्पना नाही. पण हे सगळे खोटे वाटत असेल, तर हे घ्या दुसऱ्या माध्यमांतील दुवे सकाळने या घटनेचे सखोल वृत्तांकन केले आहे: https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mahadevi-elephant-full-story-in-marathi-nandani-kolhapur-temple-jain-math-vanatara-relocation-supreme-court-order-emotional-farewell-ambani-peta-animal-rights-srk94 टी व्ही ९ मराठी https://www.tv9marathi.com/trending/will-mahadevi-the-elephant-return-to-nandani-math-kolhapur-1459506.html

In reply to by स्वधर्म

नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. अमेरीकेत एक प्राणीसंग्रहालया बघीतले. सरकारने बरेच खुले,मोकळे ढाकळे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलायं पण खाणे पिणे आणी सतत माणसांचा संपर्क टाळता आला नाही. त्यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक स्वभाव बदलले असल्यास नवल नाही. जनुकीय बदल घडतो का यावरही कदाचित संशोधन झाले असावे. माणसाला जर जंगलात डांबून ठेवले तर कसे वाटेल? माझे मत कुणालाच पटणार नाही. जाऊ द्यात. मराठी माध्यमांतून निष्पक्ष पत्रकारिता होत नाही असे माझे मत आहे आणी लोकशाहीत मतस्वातंत्र्य आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलमानुसार मी मत व्यक्त करत आहे. नाही पटलं तर सोडून द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 01/08/2025 - 21:58
>> नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. हत्तींसाठी निसर्गातील रहिवासच सर्वोत्तम, हे मत मला पटते. हत्तीणीची मठात काळजी घेतली जात असेल पण तरीही ते हत्तीसाठी नैसर्गिक नाहीच. जामनगरला तापमान ४० च्या वर जाते. धागा काढण्याचे कारण हे की सगळी चक्रे हलून, जुने रिपोर्ट असताना हाय पॉवर कमिटी नेमून, ना ना प्रकार करून नेमके तिला कुणाकडे पाठवण्यात आले, ते तितके सरळ दिसले नाही.

In reply to by स्वधर्म

प्रचेतस 01/08/2025 - 22:54
आयुष्यभर मानवी सहवासात राहिलेले प्राणी नैसर्गिक सहवासात जगू शकत नाही. त्यांची स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याची क्षमता संपलेली असते.

दुसरी बाजू कळायला मार्ग नाही. म्हणजे खरंच पेटा वाल्याना हत्तीणीची दया आली म्हणून हे सर्व झालं हे माहिती नाही. पण अशी कोर्टाच्या निगराणीत हाय पॉवर कमिटी नेमून तपासणी केली तर पाळीव प्राणीच कांय खुद्द माणसांना पण असंच कुठं तरी सोडावं लागेल. धाग्यात लिहिल्या प्रमाणे वनतारा चे अधिकारी आधी पाहणी करून गेले नंतर त्यांनी मठाला ऑफरही दिली. ऑफर नाकारल्यावर परत पेटा वाले येऊन कोर्टात गेल्यावर हत्तीण वनतारातच जात असेल तर नक्कीच काळबोर आहे असं वाटतंय. आणि हत्तीण जर वनतारात जात असेल तर राज्य सरकार कडून मदतीची अपेक्षा ठेवणाही चुकीचं होत.

विवेकपटाईत 31/07/2025 - 21:37
एका शेतकर्‍याने 10 किलो वजनी लाल भोपळा राजाला अर्पण केला. त्याच वेळी एका श्रेष्ठी ने एक हत्ती राजाला नजराणा म्हणून दिला. राजाने हत्तीच्या बदल्यात भोपळा श्रेष्ठीला दिला. राजा शेतकर्‍याला श्रेष्ठी ने दिलेला हत्ती देऊ लागला. तर शेतकरी म्हणाला, मला हत्ती नको. मला माझा भोपळाच परत द्या. हत्ती पाळण्याचा खर्च शेतकरी उचलू शकत नव्हता. अंबानीला हत्ती पाळण्याचा खर्च उचलू द्या. बाकी पेटा ही हिंदू विरोधी संस्था आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.

ह्या हत्तीणीला अझीम प्रेमजी किंवा आनंद महिंद्र ह्यांनी आपल्या घरी नेले असते तर हा धागाच निघाला नसता असा ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/08/2025 - 15:51
या विशिष्ट प्रकरणात मालकांच्या मालकांवरून रोख हटवण्यासाठी विशिष्ट धर्माच्या द्वेषाची मात्रा चालत नसल्याने आता दुसर्‍यांना सेक्युलर म्हणून जुन्या घटना काढल्यावर तरी चालतंय का, याची चाचपणी सुरू आहे का? एवढ्यावर थांबू नका, नेहरू + हत्ती असं काही मिळतंय का बघा. बाकी सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला होता त्यात सेक्युलर व धर्मांध असा भेद करणे तुंम्हालाच जमते.

In reply to by स्वधर्म

कसला रोख हटवणे अन् कसलं काय ! आम्ही तुमच्या एकांगी सिक्युलारिझम आणि भूतदया वगैरे चा बुरखा फाडत आहोत बस. ह्या प्रकरणात अंबानी चे नाव नसते तर तुम्ही चकार शब्द काढला नसता . तुम्हाला हत्तीशी अन् जैन धर्मियांच्या भावनांशी काहीही घेणे देणे नाहीये. पर्युषण पर्वात हिंसा करू नका असे जैन धर्मीय म्हणतात तेव्हा त्याला विरोध करायला तुमच्या सारखी च माणसे आघाडीवर असतात. आणि नेहरू + हत्ती काय शोधायचं ! नेहरू अन् त्यांच्या बाष्कळ धोरणांमुळे 1965 च्या युद्धात चारीमुंड्या चित हार अन् झालेली मनुष्यहानी सर्वांना माहीत आहे . आणि तरीही अजून एका - नेहरूने 1949 मध्ये इंदिरा नावाची हत्तीण जपान मधील एका zoo ला गिफ्ट केली होती ! तेव्हा "आले नेहरूंच्या मना" असा लेख लिहा आता. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे घ्या तुमच्या लाडक्या NDTV ची लिंक आहे ! https://www.ndtv.com/offbeat/jawaharlal-nehru-death-anniversary-when-pandit-nehru-gifted-an-elephant-to-japan-2236072 Ele आता खरेच जर तुम्ही " आले नेहरूंच्या मना" असा नेहरूंवर टीका करणारा लेख लिहिलात तर मानलं की तुमचं सिक्युलरिझम खरं ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/08/2025 - 16:41
अहो, नेहरूंनी हत्ती 'दिलाय' **** यांच्यासारखा 'काढून' घेतला नाहीये. कशाला वाढवताय?

In reply to by स्वधर्म

कशाला वाढवताय?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्या लेखणीतून एक तरी खऱ्या अर्थाने सेक्युलर वाक्य लिहिले जाते काय ते ! उदाहरणार्थ, माझं उपहासमुक्त, सरळ स्पष्ट मत मांडून मी थांबतो : PETA चे लोकं हरामखोर आहे. जैन सारख्या अत्यंत अहिंसक धर्माच्या लोकांकडून श्रद्धेने पूजिला जाणारा हत्ती काढून घेण्याचे कारस्थान पाताळयंत्री आहे. त्याला बळ देणारे अंबानी अन् त्यांची कमिटी की काय हेही त्या पापात तितकेच भागीदार आहेत . मुळात धर्माच्या प्रश्नात सरकार ने ढवळाढवळ करणे अक्षम्य चूक आहे. इथे हाय कोर्ट चुकले अन् सुप्रीम कोर्ट ही चुकले. तेही ह्या पापाचे भागीदार आहेत. आणि सर्वात शेवटी एन सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे लोकोत्तर बहुमताने निवडून आलेले नेते म्हणून आदरणीय मोदी आणि सन्माननीय महामहीम राष्ट्रपती ह्यांच्या डोळ्यादेखत हा अन्याय झाला असल्याने तेही ह्या पापात भागीदार ठरतात. आता जैन धर्मात ढवळाढवळ करून दाखवली तितकीच अन्य धर्मात ढवळाढवळ करून त्यांनी मुक्या जनावरांचा जीव वाचवून दाखवावा . आमचे लोकमान्य टिळक म्हणाले होते तसे म्हणून मी माझे 4 शब्द संपवतो - ह्या न्यायासनाच्या वर एक उच्च न्यायासन आहे, तिथे ईश्वर साक्ष आहे . तिथे नक्की न्याय होईल, सदर पापातील सर्वांभागीदारांना एकुणएक हिशेब चुकता करायला लागेल ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे ! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 15:46
तुंम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळेच या प्रकरणात चुकले आहेत हेच मत, 'हे सगळं सरळपणे घडलं नाहीये' या स्वरुपात या धाग्यात मांडले होते. माझा तुमच्या या आणि आधीच्या प्रतिसादांबद्दल हाच मुद्दा आहे की तुंम्ही या प्रकरणाला इतर असंबध्द विषय चिकटवत आहात. या धाग्यात सेक्युलर वाक्य लिहीले का नाही याचा मूळ मुद्द्याशी कसलाही संबंध नाही. सेक्युलरिझम हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर वेगळा धागा काढावा, ही विनंती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वधर्म 01/08/2025 - 15:26
प्रेमजी, महिंद्रा सोडा, हत्तीण तुंम्ही घरी नेली असती तरी धागा निघाला नसता. फक्त ज्या पध्दतीने घटना घडत किंवा घडवून आणल्या गेल्या, त्यामुळे कोणालाही यात सगळं कसं साधं सरळ घडत गेलं असं वाटणार नाही.

In reply to by कपिलमुनी

अरे वाह ! तुम्ही pattern detection करायला लागला आहात हे पाहून आनंद झाला. :) इतरही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जानारे pattern लवकरच तुमच्या लक्षात येतील अशी आशा आहे.

In reply to by कपिलमुनी

स्वधर्म 01/08/2025 - 15:29
एखादी कमिटी नेमून तिच्या कडून फक्त हवा तसा अहवाल आणला की झाले. यात आपले राज्य आणि केंद्र सरकार एकदम निष्णात आहे.

रामचंद्र 01/08/2025 - 17:55
बंधयुक्त मालकी हक्कातून नैसर्गिक अधिवासातल्या मालकी हक्काकडील हे बळजबरीचे हस्तांतरण आहे, गडचिरोलीचे हत्ती गुजराथला नेले तसे. मग त्यातल्या त्यात पैसा घालून अंबानींनी किमान केरळमध्ये आपले केंद्र उघडावे म्हणजे किमान हत्तीला तरी बरे वाटेल. नाही तरी वनतारात प्राणी आनंदाने रहावेत अशीच अंबानींची इच्छा असणार. तर त्या त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवावे हे योग्य. म्हणजे हत्ती केरळात, पेंग्विन अंटार्क्टिकावर आणि सिंह गीरमध्ये याप्रमाणे. प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य असा बदल व्हायला हवा. आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, पक्षीविक्रीची दुकाने हे प्रकार पूर्णपणे आणि स्वयंस्फूर्तीने बंद व्हायला हवेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 01/08/2025 - 18:33
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य इथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अ‍ॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.

आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सदर मठ त्या हत्तिणीला मोहरम मधील उरूस साठी भाड्याने देत असे . बेकार हसतोय =))))) Joke सेक्युलॅरिझम च्या मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट मौन पालुयात=)))) अर्थस्य पुरुषो दास:

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 15:52
मुळात पाळीव नसलेले जंगली प्राणी पाळणे हेच प्राण्यांवर अन्यायकारक आहे. मग ते नांदणी मठ असो वा इस्कॉन वा वनतारा. प्राणी भाड्याने देणारे व घेणारे दोघेही दोषीच आहेत. एकदा प्राणी पाळला, की त्याला नियंत्रणात ठेवणं आलं, मग माहूत आला व अंकुशही आलाच. त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 05/08/2025 - 16:13
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-) त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 05/08/2025 - 17:43
अभ्या, तुंम्ही अत्यंत रोचक माहिती बाहेर काढली आहे. दुवा द्याल तर फारच सोईचे होईल. मिरवणुकीत हत्ती भाड्याने देणे यात बराच पैशाचा व्यवहारही आहेच. विषय डायव्हर्ट करणे हे अफलातून कौशल्य असले आणि बहुतांश लोकांच्या लक्षात येत नसले, तरी त्याचा न्याय व नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 05/08/2025 - 17:50
पेटाच्याच साईटवर आहे. माधुरी स्टोरी केलीय त्यांनी. अगदी स्क्रीन शॉट्स आहेत. एकाखाली एक अशा दोन इमेजेस आहेत. वरची इमेज गणेशोत्सवांच्या भाड्यांची लिस्ट, खालची एक इमेज मोहरम मिरवणुकीची. अगदी धर्मच काढायचा तर मठ जैन आहे, गिर्‍हाईके हिंदू बहुसंख्य आहेत, एक मुस्लीम आहे. सेक्युलॅरिझम अजून काय वेगळा असतो. सिलेक्टेड हवी तीच इमेज टाकण्यातला हेतू नीच असतो. माहीती आहे तर सगळीच द्यावी. . पहा... सगळेच कळेल.

In reply to by स्वधर्म

माझ्या वरील प्रतिसादात माहुताच्या धर्माचा काडीमात्र उल्लेख नाही. आणि तुम्हाला कळत नसलं तरी माझ्यालेखी हत्तीची देव स्वरूपात पूजा करणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमाला हत्ती पाठवणे आणि मुक्या जनावराला देवाच्यानावाने बळी देणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमात पाठवणे ह्यात जमीन आसमान च फरक आहे. आणि तसाच फरक नांदणी मठ , इस्कॉन आणि वनातारा ह्यातही आहे. तुम्हाला फक्त त्या वणतारा त अंबानी अन् पर्यायाने मोदी दिसत असल्याने हत्तीचे स्थलांतर सहन झाले नाहीये इतकेच सत्य आहे ! आणि बरं झालं की तुम्हीच अंकुशाचा उल्लेख केलात. त्यावरून हेच सिद्ध होते की हत्तीला त्रास दिला जात होता आणि म्हणूनच हत्तीचे स्थलांतर करणे हाच निर्णय योग्य होता , आहे ! तुम्हाला वनतारा आवडत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र टूतारा वन्यजीव रेस्सुक्यू सेंटर सुरू करा आणि आणि घेऊन जा हत्तीला. फडणवीसांनी असे वन्यजीव रेस्सुक्यू अभियान सुरू केले तर त्यातही तुम्ही खोटंच काढणार आहात !!

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 20:26
ते अभ्या यांनी बाकीच्या १४ वेळा ज्या धर्मांच्या मिरवणूकीत पाठवल्याची माहिती दिली आहे. तर जाता जाता तुमचं त्याबाबतही मत देऊनच टाका. का एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे? बाकी ते मोहरमचा उल्लेख करणं, नेमका माहूताचा व अंकुशाचा फोटो त्यासोबत डकवणं परंतु यात विशिष्ट धर्माचा 'काडीमात्र' उल्लेख नाही आणि त्यावर रोख नाही असं म्हणणं यामुळे मला ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण आठवली. पण ते असो.

In reply to by स्वधर्म

एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे?
होय. मी तर स्पष्टच लिहिले आहे की माझ्या प्रतीसादात . माहूत एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी काहीही विरोध नाही. पण हेच लोकं देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात ही त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा लोकांना अहिंसा परमो धर्म: मानणाऱ्या जैन धर्मियांनी हत्ती भाड्याने देणे हेच पाप मानले गेले पाहिजे. बाकी मलाही "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नाहाने" ही म्हण आठवली. :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 22:28
तुमचा आक्षेप 'मुक्या जनावरांचा जीव घेतात ' याला असेल तर हा शाकाहार विरूध्द मांसाहार मुद्दा होईल, जो या धाग्यात पूर्णतः गैरलागू आहे. तो वाद वेगळा धागा काढून घाला. तुमचा आक्षेप 'देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात' याला असेल, तर अशी प्रथा आजही हिंदू धर्मातही आहे. (मांढरदेवी, कालीमाता, बिरोबाची जत्रा' इ. मग एकाच विशिष्ट धर्मावर रोख का? बाकी तुमच्याबरोबर भेंड्या खेळायला मजा येत आहे तोपर्यंत खेळाव्यात असा विचार आहे.

In reply to by स्वधर्म

हो मग ! आहेच की. त्या हत्तीचा माहूत कोणी कालिमाता बिरोबा येथे बळी देणारा असता तरीही मी हेच म्हणेन. ( मांढरदेवीला बळी देण्याची प्रथा माझ्या माहिती नुसार बंद झाली आहे.) आणि शाकाहार विरुद्ध मांसाहार हा मुद्दा कसा नसू शकतो ! हत्ती जैनांचा आहे . जैन धर्माचा पायाच अहिंसा आणि शाकाहार हा आहे. अहो जे जैन संत चुकून देखील नजरेला न दिसणाऱ्या मुक्या जीवांची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतात ते जैन लोकं पराकोटीच्या हिंसक लोकांना स्वतःचा देवस्थान च हत्ती कोणत्या भरोशावर पाठवतात ! हे असं ते न कळत पणे करत असतील तर मूर्खपणा आहे आहे कळून देखील करत असतील तर दांभिकपणा आहे. दोन्हीही परिस्थितीत बिचाऱ्या मुक्या हत्तीचे आयुष्य क्लेशकारक होत आहे. ह्या असल्या क्रूर व्यवस्थेपेक्षा वनतारा हजारपतीने उत्तम !

कपिलमुनी 02/08/2025 - 10:53
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. तिथलं वातावरण, तापमान , खाद्य हत्तीना अनुकूल नाहीये.. कर्नाटक केरळ असता तर ठीक.. तिथे हत्तींचा वावर आहे.. केवळ पैसे आहेत म्हणून माज..त्यात चौकीदार ही चोर है

कपिलमुनी 02/08/2025 - 10:57
दुवा हाडांचे आजार असल्याने गौरी नावाची हत्तीण "रेस्क्यू" करण्यात आले होती.. तिला ३ दिवस लग्नाच्या दारात शोभेसाठी उभे केले होते.. आता ३ दिवस असे उभे करणे यावर सरकार न्यायालय आणि. पेटा आवाज काढणार नाहीत

In reply to by कपिलमुनी

सुखद बदल ! ह्या हत्तीच्या निमित्ताने अंबानी आणि त्या आडून मोदींना शिव्या घालायचा जो एकांगी प्रकार चालला आहे त्यात सहभागी न होता तुम्ही PETA, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट , आणि एकूणच सरकार ह्या सर्वांवर समान तीव्रतेने टीका करत आहात हा बदल अत्यंत सुखावह आहे !

Bhakti 02/08/2025 - 16:16
हत्ती. एक लघु निबंध हत्ती हा largest land mamal आहे. त्याच्या African अणि Asian ह्या दोन प्रजाती आहेत. हत्ती हा एक pack animal आहे. पण natural setting मध्ये तो त्याच्या species मध्ये रहाणे पसंद करतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. पण अहिंसा परम धर्म वगैरे मानत नाही. Male elephants aggressive असतात. विशेषत: मदमस्त असताना. Females त्या मानाने docile असतात. हत्ती हा प्रचंड intelligent अणि emotional प्राणी आहे. पण त्याच्या भावना अणि बुद्धी primarily survival instincts अणि primordial behavior वर चालते. हत्ती महाकाय असून relatively weak eyesight, sharp hearing and sense of smell plus ability to sense vibrations are their physical traits. माणसाने हत्तीला godlike status दिले असले तरी हस्तिदंत करता शिकार करणे. युद्धात वापरणे. ओझी वाहाणे, Circus मध्ये खेळवणे. Zoo मध्ये ठेवणे. मिरवणुकीत फिरकणे असे abusive प्रकार हत्तीवर लादले जातात. हत्तीला विचाराल तर ह्यातील एकही गोष्ट तो स्वतःहून करणार नाही. त्याला ईतर हत्ती बरोबर चरत उंडारत फिरायला आवडत. त्याकरता तो आपल्या शेतात बागेत येतो. पण हत्ती हा pet नाही. पाळीव प्राणी नाही. Domesticated नाही. तो trained and conditioned आहे बस्स. ही so called माणसाबरोबर Co exist होण्याची प्रक्रिया खूप क्रूर असते. विशेषत एव्हड्या अवाढव्य प्राण्याला हाताळायला अंकुश वापरावा लागतो. आणि आयुष्याचा बराच काळ captivity मध्ये घालवावा लागतो. साखळदंड सकट. नाहीतर पिंजरा किवा enclosure मध्ये. त्यांचे प्रजनन वगैरेही ईतर पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसाना परवडत नाही. हत्ती पोसणे अफाट काम आहे हे खरंय. Circus वाईट आहे. आता तिथे प्राणी वापरत नाहीत. Zoo पण बंद व्हायला पाहिजेत. Peting zoo आणि resorts वर पण नियंत्रण हवे. एव्हडच काय forest reserve वर पण बंदी यावी. हत्ती असो किवा वाघ तुमच्याबरोबर selfie काढायला आतुर नसतो. पण माणूस प्राण्याच्या हौसेला मोल नाही. ताब्याती एक हौस म्हणजे गणपती उत्सव. पण त्याने हत्तीला थेट त्रास होत नाही किवा कामाला लावल जात नाही. पण temple elephant किवा मठाची हत्तीण हे एक occupation आहे. Petting zoo मधला हत्ती हेही एक occupation च आहे. Quality of life and conditions may differ. Bonded labour. Loosely put. हत्तीला काय समजत नाही? आणि काय समजत? कोल्हापूर की जामनगर ही नावे समजत नाहीत. Habitat समजते. हत्तीला अम्बानी समजत नाही ना जिओ एयरटेल मधला फरक. हत्तीला नाव समजत नाही. Positive negative reinforcement , association, conditioning and response behavior समजतो. हत्ती court ची पायरी चढत नाही. त्याला पेटा माहिती नाही. पण वन तारा मधला हिरवे पण जाणवेल ईतर हत्ती दिसतील. मिळणारे जेवण उमजेल. हत्तीला attachment असते. पण ती Co dependency नसते. हत्ती माहूत मानतो आणि primary caregiver वर depend करतो. पण प्रत्येक केळी भरवून photo काढणारे आणि ह्या विषयावर reel बनवणारे त्याच्या गिनती ahet का? किंबहुना हत्ती ही post वाचेल का हा प्रश्न मला पडत नाही. हत्तीला परंपरा धर्म आण बाण शान वगैर संकल्पना कळतात का हो? महादेवी aka माधुरी is a working elephant who is close to her retirement. तिला आराम, योग्य आहार, विहार, आरोग्य सेवा आणि काळजी घेणारी ( नुसती काळजी करणारी तेही social media वर नव्हे) माणस आजूबाजूला हवीत. आपल्यालाही तेच हव असत नाही retirement ला? बघा तिच्या बुद्धीने विचार करून. #meateatingmonk

In reply to by Bhakti

Bhakti 05/08/2025 - 11:09
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या सवयींनुसार, नैसर्गिक वृत्तीने जगायचा हक्क आहे. कोणाच्या सांगण्यानुसार नाही. आता तेच आयुष्य माधुरीला वनतारामध्ये मिळतंय. ती केव्हा खाणार, कुठे फिरणार, विश्रांती कधी घ्यायची हे सगळं ती स्वतः ठरवते, आपल्या गतीने .. https://www.facebook.com/share/r/16wJLCZfWi/

एक प्रयोग म्हणून हे करून पाहा : तुम्ही जी कोणती AI सिस्टिम वापरता त्या सिस्टिमला आधी कंटेक्स्ट करून विचारा की " तुम्ही एक तर्कशुद्ध विचार करणारी व्यक्ती आहात, आता एका वाक्यात, सोप्या शब्दात उत्तर द्या की वंताराने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय? " मी जेमिनी वापरतो , मला ही उत्तर मिळाले - From a purely rational standpoint focused on the elephant's welfare, the elephant should not be returned to the Jain math.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो, कारण हत्ती हा जैन मठाचा सांस्कृतिक आणि धार्मिक भाग होता, आणि जर तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात होती, तर तो परत पाठवणं नैतिक आणि न्याय्य ठरेल. Chat gpt

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 04/08/2025 - 15:59
जेमिनी किंवा चॅटजीपीटी

अ‍ॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये

पण हे दोघापेक्षा तिसर्‍याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 04/08/2025 - 16:19
वंताराने कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना लक्षात घेऊन जैन मठाचा हत्ती परत पाठवावा, जर मठ आणि गावकरी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील.

मराठीत प्रश्न विचारल्यास काही वेगळे उत्तर मिळते का हे तपासून पाहण्यासाठी मी मराठीत चर्चा केली जेमिनी सोबत : पूर्णपणे तर्कशुद्ध विचारकरून आणि उपलब्ध माहिती पुराव्यांच्या विचार करून सोप्या शब्दात उत्तर द्या की वनतारा ने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय ? >>> माहिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्तीण महादेवीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य दिले गेले असल्यामुळे तिला जैन मठात परत पाठवू नये.

In reply to by प्रसाद गोडबोले

एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत ते हत्तीची काय काळजी घेणार?

In reply to by रामचंद्र

मुळातच व्यक्तीद्वेष हा त्यांच्या आणि त्यांच्या विचारांच्या लोकांच्या चर्चेतील मूळ मुद्दा असल्याने त्यांनी हे लिहिणे स्वाभाविक आहे. वनतारा ही अंबानी ऐवजी रॉबर्ट वाड्रा चालवत असते तर एक चकार शब्द उच्चारला नसता त्यांनी. मुळात हत्तीचे हित हे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये जाण्यातच आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य समजू शकतो. आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्यात काही खुसपट काढता येईना म्हणून अंबानी वर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे हे हत्यार त्यांनी उपसले आहे बस.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/08/2025 - 18:54
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा आणि एखाद्या आजारी व्यक्तीवर अन्याय करणारा आहे ज्या आजाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. .

In reply to by सुबोध खरे

किती ते प्रेम पण? कोणता आजार आहे असा? तुम्ही त्यांचे पर्सनल डॉक्टर आहात की त्यांचे डॉक्टर रोज तुमच्या सोबत बसून तुम्हाला माहिती देतात? आणी मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/08/2025 - 19:20
मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? मी ही प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं.

नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadnavis-on-mahadevi-elephant-of-nandani-math-to-file-petition-in-supreme-court/articleshow/123115303.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 05/08/2025 - 17:32
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात

हत्ती

परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे दोनदा लिहिल्यास ती परत येईल असे वाटून दोनदा लिहिले आहे का? ते काय असते ना- दोन निगेटिव्हचा गुणाकार एक पॉझिटिव्ह असतो की काहीतरी. :)

तासगावच्या गणपती देवस्थानच्या गौरी हत्तीणीसाठी अंबानींच्या वनताराकडून २ कोटींची ऑफर आली आहे. ती ऑफर आपण स्विकारणार नाही असे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी म्हटले आहे. जर गौरी या हत्तीणीची योग्य ती काळजी घेतली जात असेल तर खरं तर तिला तिथून हलवायचे काहीही कारण नाही. त्यामुळे देवस्थान जर अंबानींची ऑफर नाकारत असेल तर चांगलेच आहे. पैशांसाठी त्यांनी गौरीला तिथे पाठवायलाही नको. https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/tasgaon-gauri-elephant-gets-2-crore-offer-from-vantara-anant-ambani-sangli-ganapati-panchayatan-trustee-rajendra-patwardhan-claims/articleshow/123132791.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines मी सांगलीत पाच वर्षे राहिलो आहे. सांगलीचे गणपती देवस्थान सांगलीचे पूर्वीचे संस्थानिक पटवर्धन यांचे कुटुंब बघतात. मेने प्यार किया वाली भाग्यश्री पटवर्धन त्याच कुटुंबातील. या पटवर्धनांचा तासगावच्या पटवर्धनांशी काही संबंध आहे की नाही माहित नाही. तर सांगायचा मुद्दा हा की सांगलीच्या गणपती देवस्थानात मी होतो तेव्हा बबलू नावाचा एक हत्ती होता. तो हत्ती सांगलीची शान मानला जायचा. वयोमानानुसार त्याचे निधन झाल्यानंतर सांगलीच्या गणपती मंदिराजवळच्या भागात दुखवटा म्हणून कडकडित बंद पाळण्यात आला होता. तासगावच्या त्या हत्तीणीविषयीही स्थानिक लोकांची तशीच आत्मियता असली तरी आश्चर्य वाटू नये. केरळमध्ये पूर्वी गुरूवायूरच्या मंदिरात मोठे लोक हत्ती दान द्यायचे. जयललितांनीही तिथे हत्ती दान केला होता. नंतरच्या काळात तिथे इतके हत्ती झाले की देवस्थानला सांभाळणे कठीण झाले. त्यानंतर यापुढे दान म्हणून हत्ती स्विकारले जाणार नाहीत असे देवस्थानने जाहीर केले. आज तिथे कित्ती हत्ती आहेत याची कल्पना नाही. पण ते हत्ती पण असेच वनतारामध्ये नेणार का? अशा देवस्थानात कुठेही हत्ती असले तर त्यांची योग्य ती देखभाल केली पाहिजे आणि त्यांची कुठेही आबाळ व्हायला नकोच. पण त्याचबरोबर असे हत्ती कुठेही हलवायच्या आधी स्थानिक लोकांच्या भावनांचाही विचार करायला हवा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हत्ती हा पाळीव प्राणी नाही. हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. किमान हिंदू , बौद्ध, जैन आणि शीख इत्यादी अहिंसा शांतताप्रिय भारतीय धर्माच्या लोकांनी हत्ती पाळण्याचा अट्टाहास करू नये. अगदीच हौस असल्यास गाय पाळावी. - एक सनातनी हिंदू म्हणून तासगावच्या देवस्थानचा आणि विशेषत: ब्राह्मण म्हणून पटवर्धनांचा मी जाहीरपणे निषेध करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
याविषयी कल्पना नाही. मात्र आपल्याकडे राजेरजवाडे आणि श्रीमंत लोकांकडे हत्ती ठेवायची परंपरा होतीच. अगदी चंद्रगुप्त मौर्याकडे हत्ती होते- सेल्युकस निकेटरने त्याला ५०० हत्ती दिले होते असे उल्लेख आहेत असे वाचले आहे. शिवाजी महाराजांकडेही हत्ती होते. आनंदाच्या प्रसंगी हत्तीवरून साखर वाटणे हे पण अगदी कॉमन होते. सगळीकडे अशी क्रूर वागणूक हत्तींना दिली जायची का? काहीही असले तरी एक प्राणीप्रेमी म्हणून कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही वाईट वागणूक दिली जाऊ नये हे नक्कीच. (शाकाहारी) चंसूकु

स्वधर्म 06/08/2025 - 17:14
हा धागा काढताना, हे जे हत्ती अगदी पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वनतारालाच पाठवायचा प्रकार चालू होता तो तसा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. बर्‍याच मिपाकरांनी अतिशय उत्तम माहिती व दुवे दिलेले आहेत. हत्तीसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास हाच सर्वात हिताचा या मताशी मी सहमत आहे. परंतु काही सदस्य ती वनतारात गेली ते तिच्यासाठी जास्त चांगलं (हजारपटीने) असे म्हणत आहेत. इथे आणि इथे. तिथले हवामान निश्चितच केरळ किंवा काझीरंगा, आसाम यांच्याइतके हत्तींसाठी नैसर्गिक नाही. कपिलमुनी म्हणत आहेत तसे, ईशान्य भारतातील अनेक ठिकाणांहून हत्ती वनताराला पाठवण्यात आले आहेत. त्याचा एक पॅटर्न दिसून येतो. हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी - प्रशांत कदम यांचा रिपोर्ट https://youtu.be/gE6GqvWwGUo?si=CgSnd9Bg8O7rlaT_ शिवाय साम दाम दंड भेद याचा वापर कसा केला जातो ते आपण माधुरीच्या बाबत पाहिलेच. ईथे तासगांवच्या हत्तीबाबत कसा डाव रचण्यात आला होता ते विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सुदैवाने त्यांना माहुताच्या किंवा वैरण पुरवणार्‍याच्या धर्माविषयी आकस नाही जसा इथल्या तथाकथित अध्यात्म पूर्ण समजलेल्या सनातनींना आहे. तासगावच्या हत्तीवर वनताराचा डोळा? ३ कोटीची ऑफर? ।। वज्रधारी न्यूज ।। मला कोणत्याही धर्मासाठी, परंपरेसाठी अशा प्रकारे हत्तीला वेठीला धरलं जावं हे योग्य वाटत नाही. परंतु सगळं कसं वनतारात पाठवण्यासाठीच घडून येतं, ते तितकं साधं सोपं सरळ वाटत नाही. पैसा ही शक्ती आहे, पण ज्यावर नजर पडेल, ते माझं असं असेल, तर अवघड आहे. उद्या पुणे महापालिकेला पाणी नीट स्वच्छ ठेवता येत नाही म्हणून कोणीतरी कोर्टातून खडकवासला धरणसाखळी मालकांकडेच द्या असं म्हणून कोर्टात जातील आणि त्याना हवा तसा निकालही लागेल. नागरिक कधी जागे होणार?

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 06/08/2025 - 17:28
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात नॉर्मल्च म्हणा, न्यू नोर्मल असावी) वाटणारी गोष्ट म्हणजे, राजू शेट्टींच्या म्ह्णण्यानुसार नांदणी मठाला हत्तीणीच्या बदल्यात दोन कोटी देणगी /किवा मठाचे बांधकाम ही ऑफर दिली आहे ती पेटाच्या खूशबू गुप्ता ह्यांनी. आणि पेटा स्वतः सांभाळ करणार नाहीचेत. मग कुणाचे दोन कोटी? कशासाठी अशी सुपारी? प्लान्ड सिस्टिमॅटिकली लीगल एनकाउंटर झाले हे लिटरली. .

In reply to by अभ्या..

स्वधर्म 06/08/2025 - 18:37
खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. भक्तांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय का? Stockholm syndrome is a psychological response where hostages or abuse victims develop positive feelings and an emotional bond with their captors or abusers. It's a coping mechanism where victims align with their captors to reduce the perceived threat and increase their chances of survival. The term originated from a 1973 bank robbery in Stockholm, Sweden, where hostages formed an emotional bond with their captors.

In reply to by स्वधर्म

नागरिक कधी जागे होणार
? 2029 च्या निवडणुकांच्या नंतर. कारण तो पर्यंत तुम्हाला असले धागे काढायला काहीना काही खुसपट कारणं मिळतच राहतील ! बाकी मुख्यमंत्री श्री. फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हत्ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. शिवाय सरकार हत्तीला सुविधा पुरवणार म्हणे . #लाडकी हत्तीण योजना मुंबईत देखील सरकारी खर्चाने कबुतरांना खायला देणार आहेत म्हणे =)))) त्यावर एक लेख पाडा की आता. फुल मजा आहे पुढील काही वर्षे =))))

रामचंद्र 06/08/2025 - 22:49
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी असे कोणीच म्हणत नाही. मुख्यमंत्रीसुद्धा जनभावना जपण्यासाठी सरकार मठाच्या बाजूने आहे, असेच म्हणत आहेत. लोकांचा विरोध एक धनदांडगा सरकारला आणि एका संस्थेला हाताशी धरून बळजबरीने हत्तीचे अपहरण करत आहे, या गोष्टीला आहे. त्या मठाच्या निमित्ताने लोक हत्तीमागे तरी उभे राहिले. गडचिरोली जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीकाठचे हत्ती गुजराथला कधीच पोहोचले पण त्यांच्यासाठी कुणी लढा दिला नाही. मुळात मठात हत्तीला बरे वाटते की नाही, हे समजत नाही. पण गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. मग त्यांना उचलून गुजराथमध्ये नेणे, हे तर नक्कीच चुकीचे म्हणता येईल. खरे तर या बाबतीत मेनका गांधींनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. पण पक्षश्रेष्ठींपुढे काही चालत नसावे, किंवा मुलाच्या वाटचालीत अडथळा नको म्हणून गप्प बसावे लागत असावे. आणि केरळमधल्या त्या aty

गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. सहमत,असतीलही परंतू संख्या जास्त झाली,किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. हत्ती पोसणे किती खर्चिक आसते हे वेगळे सांगावयास नको. मठाकडे भरपूर पैसा असणार. मठ,साधू,संन्यासी निसंग,निर्मोही असायला पाहिजेत पण ते तर संस्थानिका पेक्षाही मोठे. अफ्रिकेतून बिबटे आणले व मध्यप्रदेश मधे सोडले तेव्हांही कुणी आवाज उठवला नाही. एवढी आरडाओरड फक्त राजकिय दृष्टीकोनातून आहे. बाकी व्यक्ती परत्वे वेगळा दृष्टिकोन असणार पण व्यक्तीद्वेश मात्र असू नये.

हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? आपण सर्व मिपाकर मिळून एक छोटा हत्ती पाळुयात, तो मोठा झाल्यावर अंबानीला विकून पैसा कमावू, मिपावर तसेही अनेक रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते हत्तीची निगराणी करतील, हत्तीला मूवी काकांच्या शेतात ठेवू, डॉक खरे हत्तीची तब्येत पाहतील, चंद्रसूर्यकुमार अर्थतज्ज्ञ आहेत जमा खर्चाचा हिशेब ठेवतील.

कंजूस 07/08/2025 - 13:28
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत घेतला तर आपल्या पोटात का दुखावे? रानटी हत्ती पाळीव करण्यासाठी क्रूरपणा करतात हे मान्य . पण अशा पाळीव प्राण्यांना/ हत्तींना पिल्ले होतात ती अगोदरपासूनच पाळीव असतात. दक्षिणेत बऱ्याच देवळांत असे हत्ती आहेत आणि त्या देवस्थानाला दिलेल्या देणग्यांतून हत्तींचा खर्च भागतो. पिढ्यानपिढ्या माहूत असतात आणि त्यांचे हत्तींशी संबंध फारच कौटुंबिक असतात. या देवळातल्या हत्तींकडून काही लाकडाचे ओंडके ओढणे वगैरे काम नसतं. देवळांत आठ ते बारा आणि पाच ते सात उभे राहून भाविकांना आशिर्वाद देणे हेच काम. आता प्राणी कोणताही म्हटला की त्याला आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू आलेच. महाराष्ट्र सरकारने ती हत्तीण अंबानीकडून परत आणली तरी जैन मठवाले घेणार नाहीत. मग सांभाळणार कोण? मठवाल्यांना हा हत्ती नव्हे तर एकूण हत्तीच ठेवायचा नसेलही. म्हणून तो निर्णय घेतला असेल.

स्वधर्म 07/08/2025 - 13:48
लोकसत्ताची बातमी: https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-public-representatives-welcome-vantaras-stance-on-returning-elephants-phm-00-5286136/ 'जनभावना लक्षात घेऊन' असे सर्व लोक, वनताराचे मु. का. आ. इ. म्हणत आहेत. १० हजाराहून जास्त जिओ सिम परत करणे, रिलायन्सच्या पंपावर पेट्रोल न भरणे याही गोष्टी 'वर' पर्यंत गेल्या असतीलच.

In reply to by स्वधर्म

गाव करील ते राव काय करील? पैसा, सत्ता, अंबानी, पेटा नी माजलेले सत्ताधीश नी त्यांचे मीपावरील समर्थक ह्यांच्या नाकावर टिच्चून लढा देऊन हत्तीण परत आणाऱ्या कोल्हापूर करांचे अभिनंदन! :) हत्ती पळवणारी टोळी तरीही सुधारेल असे वाटत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

करणार शंभर टक्के अभिनंदन करणार ! फक्त हत्ती परत यायची वाट पहात आहे. एकदा का हत्ती परत आला की मिपावर लेख लिहिणार ! अहो लोकोत्तर असा हा क्षण आहे, असेल. धर्मसत्तेने राजसत्तेवर मिळवलेला विजय असेल हा . आजवर सरकारने शाहाबानो साठी सुप्रीम कोर्टाला तोंडावर पाडल्याचे पाहिले होते, आता पहिल्यांदाच "जनभावनेचा" रेट्याने "महादेवी" साठी देखील सुप्रीम कोर्ट आणि सर्व व्यवस्था चारीमुंड्या चीत करता येऊ शकते हे सिद्ध होईल. आता हत्ती परत येण्याची वाट पाहूयात फक्त !

कपिलमुनी 07/08/2025 - 13:57
उद्या एखादे गरीब आईवडील मुलांची काळजी घेउ शकत नसतिल तर सरकारने मुलांची पण सोय करावी .. ती पोरे पण काढून घेऊन कोणाला तरी संभाळायला द्यावीत ( परदेशात अशी सोय आहे म्हणे )

रामचंद्र 07/08/2025 - 22:30
मठाची हत्तीण यावरून आठवलं, पूर्णचंद्र तेजस्वींची उमा कुलकर्णी अनुवादित 'कृष्णेगौडाची हत्तीण' कुणी वाचली आहे का? अस्सल भारतीय परिस्थितीचं वास्तव हसतखेळत उभं केलं आहे. अंदाजे वीसएक वर्षांपूर्वी एका साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.

Bhakti 08/08/2025 - 11:27
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल. प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतीलः सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल
. -माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 08/08/2025 - 13:19
बरं मग,या वनतारा आधी अशा हत्तींना ज्या ठिकाणी उपचारांसाठी पाठवले जायचे तिथे माधुरीला या आधी का पाठवले नाही? वनतराला हत्ती बळकावयाचे असतील तर ,तिथल्या सगळ्याच हत्तींना बरं झालं की तिथून जंगलात पाठवा यासाठी आंदोलन का नाही करावं मग? एकाच हत्तीसाठी काळेबेरे वाटत नाही का?

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 12:56
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.

In reply to by अभ्या..

Bhakti 08/08/2025 - 16:07
अच्छा वनतारा पार्ट -२ का? घ्या आता, महाराष्ट्राने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे का मग?
फक्त तेवढाच विषय नाही हो जर त्या हत्ती ची एवढीच काळजी होती, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर तिला 1.एकदाही मातृ सुख का दिलं गेलं नाही 2. तिला पैसे मिळतात म्हणून बाहेर भाड्याने का दिलं गेलं 3. अंकुश टोचणे गरजेचे आहेस का. 4. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे त्यात मादा प्रमुख असते मग तिला तसं का राहू दिलं नाही किंवा तसा प्रयत्न का केला गेला नाही. 5. हत्तीचे तळवे हे डांबरी रोडवर किंवा सिमेंट रोडवर किंवा दगडावर चालण्यासाठी किंवा राहण्यासाठी बनलेले आहेत का. 6. हत्तीचा अन्न कोणतं तिला पेढे किंवा शिजवलेले पदार्थ भरवणे योग्य आहे का आता सरते शेवटी आला वनताराचा मुद्दा.... आठवते का बघा . वनमंत्र्यांनी वनतारा च्या धर्तीवर सूर्यतारा सुरू करण्याचे संकेत आधीच दिले आहेत आणि त्यातही हे सूर्यतारा अंबानी किंवा अदानीकडे सोपवणार असेही सांगितले होते. आता विचार करा कोणी कोणाच्या खांद्यावर कधी कशी केव्हा बंदूक ठेवली आणि कोणाला गोळी मारली निमित्त नांदणीचा हत्ती आणि इप्सीत सांगली_कोल्हापूर मध्ये वनतारा पार्ट टू........ #copied

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 13:13
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?

In reply to by अभ्या..

Bhakti 08/08/2025 - 13:27
हत्तीण म्हातारी झाली आहे ओ,जंगलात डायरेक्ट कसं पाठवणार.आणि पाठवलं तरी काही अडचणी येऊ शकतील.तज्ञांचे मत हा तर प्रकारचं गावकरी,मठावाले पाहत नाहीयेत.

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 15:05
मठाने ३३ वर्षांपूर्वी हत्तीचे पिल्लू आणले होते. हत्तीचे आयुष्यमान ७०+ वर्षे असते. म्हणजे माधुरी चाळीसच्याही आत आहे. मी वर दिलेलाच व्हिडिओ पुन्हा पहा Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता? यात ३ मिनिटानंतर सांगितल्याप्रमाणे वनताराने पद्मावती हत्तीण ही आसाममधून हजारो किमीचा प्रवास करून जेंव्हा वनताराला नेली, तेंव्हा ती ५५ वर्षांची असून गरोदर होती. तिचा हा सगळा प्रवास गरोदर अवस्थेत केला गेला. त्यामुळे माधुरी हत्तीण म्हातारीआहे असे म्हणता येणार नाही. पण तुंम्ही वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा: जानेवारी २०२५ मधील बातमीनुसार वनताराने अरूणाचल प्रदेशमधून एका वेळेस २० हत्ती नेले आहेत. त्यात एक बछडाही होता. आता हे सगळे हत्ती अर्थातच म्हातारे नाहीत. २०२१ पासून वनताराने ३९ हत्ती फक्त अरूणाचल प्रदेश मधून नेले आहेत. आजमितीला सदर याचिकेच्या बाबत वनताराने स्वतःच कोर्टात त्यांच्याकडे असलेल्या हत्तींची संख्या २३८ सांगितली आहे. तरी पण तुंम्ही या प्रकाराकडे इतकं सरळ बघत असाल तर, अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे खूप भाबडा किंवा पक्षपाती दृष्टीकोन आहे. बाकी मठातील लोक काळजी घेतात का? घेऊ शकतात का, हे तज्ञच ठरवू शकतील. पण दोन बाजू मठाच्या बाजूच्या आहेत. १. माधुरी तिथे गेली ३३ वर्षे जगली आहे. २. गावकृयांचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे. नाहीतर कोण पूर्ण वर्षाचा रिचार्ज भरला असताना जिओचा फोन परत करेल? टीपः असे असले तरी हत्ती हा कळपात रहाणारा व जंगली प्राणी असून त्याला एकट्याला माणसांनी व मानवी वस्तीत पाळणे, मग त्याच्यावर कितीही प्रेम असले तरी अन्यायकारक आहे. बाय द वे: भारत सरकार ला एक वनखातं असतं, त्याला एक मंत्री असतो. त्यात अनेक आय एफ एस अधिकारी बंगला गाडी व नोकर दिमतीला असे रहातात असे ऐकून आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही का?

In reply to by स्वधर्म

Bhakti 08/08/2025 - 15:48
बरं ती म्हातारी नाही ? ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,जे वयानुसार नाही नसेल पण अकाली म्हातारपणासारखेच आहे. पण आजारीही नाही का? का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.पण वनतारा हे मुद्दामहून हत्ती बळकावत आहेत तर सर्वच हत्तींची वनिताला मधून थेट जंगलात मुक्तता करावी यासाठी आता माणूसकी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोहिम उघडावी. तिला कोल्हापूरला आणून काय हाशील होणार‌ काय माहिती? परत तेच म्हणते "झेपत नाही तर हत्ती पाळू नये" आणि वनताराला सांगेन की "कशाला पैशे वाया घालवता,ज्याचा हत्ती ते पाळतील नाहीतर भाड्याने देतील , तुम्हाला काय करायचं?कशाला हत्तींना ५ तारांकित सुविधा देता,जाऊ द्या की उडत"

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 16:14
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता. म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अ‍ॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्‍यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 16:26
>> का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? या व्हिडिओत स्पष्ट सांगितलेले आहे, की वनविभागाच्या डॉक्टरांचा महादेवी निरोगी असल्याचा रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला व हाय पेटाच्या याचिकेनंतर पॉवर कमिटी नेमण्यात आली होती, त्यांनी वेगळा रिपोर्ट दिला. Nandni Elephant Kolhapur: जैन मठातील हत्ती अंबानींच्या वनतारात, नांदणीच्या महादेवीचं काय होणार? बाकी >> ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते या बाबत मी आधीच सहमती नोंदवली आहे. पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही? अख्या भारतातून हत्ती कसे वनताराला नेले जात आहेत, याचे वर दिलेले संदर्भ तरी बघा. Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?

In reply to by स्वधर्म

Bhakti 08/08/2025 - 16:43
घटनाक्रम असा आकलनात येतोय. म्हणजे माधुरी ठणठणीत होती,तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. पुढे गावकऱ्यांनी आंदोलन केले ,ओके आता हत्ती परत गावात येणार ,ओके पण २०० एकर जागा महाराष्ट्राची बळकवणार(जे आता सांगितले जात आहे),नॉट ओके आता मठाने सरळ कोर्टात जाऊन हत्ती बरा झाला की सरकारी/मोकळ्या जंगलात सोडावा अशी केस करावी.तर खरंच सर्व हत्तींना न्याय मिळेल.
पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही?
अहो,आजारी माणसाला थेट जंगलात सोडता येते का?(तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजारी असल्याचा रिपोर्ट खोटा पण आरोग्याविषयी कोणतीच रिस्क आजारी असणाऱ्यांच्या जवळची व्यक्ती घेत नाही,या दृष्टिकोनातून मी तिला मानसिक आजारी (एकटी) तर नक्कीच समजते) नाही मग वनतारात जायची वेळ यायच्या आधी आम्हाला ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा हा मोठेपणा सर्वांनी ज्यांनी हत्ती पाळला त्यांनी घ्यावा ,हीच आता कळकळीची विनंती आहे. थांबते आता,माधुरी देव तुला खूप आरोग्यदायी आयुष्य देवो! _/\_

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 16:53
>> ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा याबाबत मी आधीच सहमत आहे. गावकर्‍यांचे कितीही प्रेम असले तरी जंगलातील राहणे तिच्यासाठी मठापेक्षा चांगलेच आहे असे मी अनेकदा म्हटलेच आहे. >> तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. याला तुंम्ही ओके म्हणत आहात, माझेही तेच म्हणणे होते.

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 17:01
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्‍यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.

In reply to by स्वधर्म

कॉमी 09/08/2025 - 18:53
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे हत्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जातीये असे असेलच असे नाही. कितीही प्रेम असले तरी शेवटी हत्तीची काळजी घेण्याचे कसब, रिसोर्सेस त्यांच्याकडे असतीलच असे नाही. एकूण हया चर्चेत मला असे वाटले - अंबानीचे नाव आल्यावर जे कोणी "मठात हत्तीची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही" असे मत देणाऱ्या सगळ्या संस्था, व्यक्ती ऑटोमॅटिकली बायस्ड आहेत असा सूर जाणवला. हे फारसे पटले नाही. समाजमाध्यमांत दिसणाऱ्या फोटो आणि व्हिडीओज वरून मठात हत्ती टूणटूणीत आहे असा निष्कर्ष घाईघाईचा वाटतो.

In reply to by कॉमी

स्वधर्म 09/08/2025 - 21:37
बरोबर! प्रेम असणे वेगळे, काळजी घ्यायची क्षमता असणे वेगळे व हत्तीसाठी माणसांत रहावे लागते हे ही वेगळे! हा लेख लिहिताना मलाही फक्त मठ व नांदणीचे गावकरी यांच्यावर अन्याय झालाय असे वाटत होते. पण जसजशी चर्चा पुढे गेली तसतसे काही सदस्यांच्या प्रतिसादामुळे हत्तीवरही कसा अन्याय होत होता हे लक्षात आले. मिपाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्थात आपले म्हणणे अधिक माहिती मिळाली तर बदलण्याची लवचिकता हवी. हे सगळे केवळ माणसाच्या हट्टासाठी, भावनेसाठी व हौसेसाठी असते असे लोकसत्ताचा आजचा अग्रलेख म्हणतो. माधुरी हत्ती व मुंबईतली कबुतरे या दोन वादांच्या संदर्भात. भूतदयेचे भूत

कपिलमुनी 08/08/2025 - 14:37
पुष्पक विमानातून फिरत असताना राधिका नामे भार्येने अनंतास पृच्छा केली , ही खाली गर्द हिरवी वनराई दिसते ती कोणती बरे ? अनंत वदला , करवीर नगरीहून काही कोस दूर असलेले हे राधानगरी नावाचे निबिड अरण्य आहे , इथे वेगवेगळे पशु पक्षी रहतात, त्या अरण्यावर मोहीत होउन ती स्त्री म्हणाली, नाथ ..मजला या अरण्यात निवास करायचा आहे . अनंत करवदला, "करवीर नगरीची माणसे लई वांड ! हित पैसा नाय माणुस्की बघत्यात".. नाथाचे हे बोलणे ऐकून राधिका रुष्ट झाली .. भार्येचा म्लान मुखकमल पाहून अनंतास गमेना.. सर्व पिझ्झा , बर्गर त्यास तॄणासमान भासू लागले.. अरण्य तर हवे पण कोल्हापूरकर तर लैच हार्ड अशी त्याची द्विधा मनस्थिति झाली.. तेव्ढ्यात त्याला नारदमुनींची आठवण झाली.. फोन फिरवताच मुनी हजर झाले , मनीची व्यथा ओळखली .. म्हणाले, राजन , अशी स्कीम करा की कोल्हापूरकरांनी २००-३०० एकर स्व:ताहून तुम्हाला द्यायला हवी.. नारदाने अनंताशी कानगोष्ट केली आणि गालातल्या गालात हसत अंबानी पुत्राने पेटास्त्र बाहेर काढले .. --------------------------------------------------------------- बाकी तुम्ही सूज्ञ आहातच .. आता वनतारा पार्ट २ सूरू झाला की भेटू

In reply to by कपिलमुनी

Bhakti 08/08/2025 - 15:00
तुमच्या जंगलात नेऊ नका, आमच्याकडे मोकळी जागा मागू नका.साखळदंडात राहू द्या हत्ती ,एकटा रडत डोलत. ह्यांना म्हणे माणूसकी,आणि म्हणे अंबानीच तेवढा व्यापारी!! झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 15:12
आपल्या प्रतिसादाची चुकामूक झाली. पण हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासाशिवाय व एकटे ठेऊ नये याबाबत सहमत आहे. प्राण्याच्या लैंगिक सुखावर माणसाच्या हौशीसाठी घाला घालणे कमालीचे क्रूर आहे. पण... वनताराच का? केरळ, काझीरंगा, अरूणाचल, आसाम, त्रिपुरा ही भारतीय वनखात्याच्या अखत्यारितील ठिकाणे का नकोत?

In reply to by स्वधर्म

कॉमी 09/08/2025 - 18:57
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला तर जगणार नाही. वनतारा मध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक अधिवास आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल.

In reply to by कॉमी

अभ्या.. 09/08/2025 - 20:17
ओह्ह्ह्हो, जरा उशीर केला मालक तुम्ही. हत्ती तर परत येणारेच आहे, सोबत नांदणीला सरकारमान्य अंबानींच्या वनताराची सॅटेलाईट सेंटरची ग्रँड ऑफर घेऊन आलाय. नुसती लक्ष्मी न्हाई, गजान्तलक्ष्मी हाय गजान्तलक्ष्मी..

In reply to by कॉमी

हत्तीच्या तब्येतीची काळजी वनताऱ्याला पळवून नेल्यावरच कशी झाली? आणी खरोखर काळजी असेल तर वनताराच का? स्थानिक डॉक्टरनी हत्तीची तब्येत चांगली आहे असा रिपोर्ट दिला, तरीही तो रिपोर्ट झिडकारून सत्तेचा गैरवापर करून हत्ती पळवणे समर्थनीय का?

In reply to by कॉमी

स्वधर्म 09/08/2025 - 21:45
मलाही एका वन्यजीवांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने सांगितले की जंगली हत्तींना सगळी झाडे, पाणी, खायला कुठे मिळेल व त्याच्या वाटा माहित असतात. ऋतूमानानुसार हे सगळे त्यांना माहित असते. त्यामुळे एका हत्तीला सोडले तर तगेल की नाही हा प्रश्नच आहे. एकट्या नंतर सोडलेल्या हत्तीला इतर हत्ती कळपात सामावून घेतील का हाही प्रश्नच आहे.

In reply to by Bhakti

रीडर 09/08/2025 - 22:38
या मठ, गावकरी वगैरे लोकांचा कांगावा बंद करून हत्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जिथे नीट काळजी घेतली जाईल तिथेच तिला राहू द्यायला हवं. या लोकांनी तिची काळजी काय घेतली ते दिसतयंच. वनतारा मध्ये या मठापेक्षा नक्कीच चांगलं आयुष्य मिळेल तिला. स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना त्रास देणं बंद करायला हवं.

तरी त्यांना सुचवले होते की तुम्ही "हा हत्ती हत्तीईदला कुरबानी द्यायला पाळला आहे" असे म्हणा. कुर्बानी विरुद्ध बोलण्याच्या ना PETA मध्ये दम आहे, ना दाभोळकरमध्ये, ना अंबानी मध्ये, ना हायकोर्ट मध्ये, ना सर्वोच्च कोर्ट मध्ये. इतकी सोपी तकिया करून ते लोकं स्वतःचा हत्ती स्वतःकडे ठेऊ शकले असते ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 31/07/2025 - 02:55
त्यापेक्षा हत्तीला नाम घ्यायला लावायला पाहिजे. किंवा सर्व गावकऱ्यांनी एकेक लाख नामाची कॉन्ट्री काढली असती तरी गेलाबाजार काही अब्जात नाम कलेक्ट होऊन हत्तीला पाहिजे तिथं राहता आलं असत. कुठली कुर्बाणी आणि कुठला अंबानी . बिटकॉइनच्या तोंडांत मारल असलं चलन आहे नाम.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 31/07/2025 - 04:35
तुम्ही सुचवलेला उपाय एकदम 'नामी, आहे. पण नांदणीच्या गावकर्‍यांना प्रिपेड पर्याय आता नाही. पोस्टपेड चालेल का?

In reply to by अभ्या..

नाही. नामाचा सरकारी कामात इत्यादी उपयोग होत नाही. आमच्या देवस्थानात मोर पाळलेले होते. तेही फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नेले होते. नामाचा उपयोग ते मोर नेल्यानंतर " ही देखील रामाचीच इच्छा" हे कळण्यासाठी होतो. तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 31/07/2025 - 15:07
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. ओके, तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ? सुरुवात कुणी केली?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2025 - 04:32
पंत, एरव्ही अध्यात्म, नाम, अभंग इ. विषय असेल तर लोकांचा बुध्दीभ्रम तुंम्हाला सहज जमतो. त्याबाबत वादच नाही. पण इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. ताबडतोब दाखवून दिले जाईल. हां, आता प्रत्यक्ष महानेते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांचेच नांव यात आले त्यामुळे तुमची घालमेल समजू शकतो, पण त्याबद्दल 'एबीपी माझा'ला मोठ्या मनाने माफ करून टाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2025 - 15:40
इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by स्वधर्म

अहो काय बरळताय ? कसला आलाय द्वेष अन् काय ! आम्ही स्वतः अगदी चवीने बोकड , बोल्हाई मटण खातो. तेही आमच्या मुस्लिम मित्रांच्या सोबत जाऊन ! PETA किंवा तुमच्या सारखे दुतोंडी लोकं इन जनरल जो मांसाहार चालतो त्या बाबत कधीही काहीही बोलल्याचे पुरावे नाहीत. तुमच्यात स्पष्ट बोलण्याची धमक नाही , किमान हमीद मियां तरी सुस्पष्ट बोलले आहेत हे पहा बी

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 05/08/2025 - 17:26
हिंदू कधीही दुसर्‍या धर्माच्या लोकांचा द्वेष करत नाही. त्यामुळे देशात दुसर्‍या धर्माच्या लोकांची संख्या वाढली. द्वेष असता तर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू कमी झाले तसे आपल्या देशात झाले असते. बाकी जे त्यांच्या परमेश्वराला मानत नाही त्यांच्या विरोधात सतत जेहाद केले पाहिजे. यावर ते 100 टक्के ठाम असतात.

कंजूस 31/07/2025 - 05:38
खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. इकडे तो मठालाही सांभाळायचा खर्च वाढत असेल. गावकऱ्यांचा विरोध झाल्यावर दुसऱ्या मालकाने इतर उपाय कामाला लावले. कोल्हापुरातले दुसरे असे एक उदाहरण म्हणजे मंगेशकर (लता) यांच्या मालकीचा स्टुडिओ विकून तिथे काही मॉल वगैरे येणार होता. कोल्हापुरातल्या लोकांनी अडसर घातला. तो हेरिटेज/ वारसा आहे इत्यादी. दोन्ही बाबतीत वस्तू तीनशे वर्षांपूर्वींच्या नाहीत. मुद्दा असा आहे की मालक आपल्या मालमत्तेचे काहीही करू शकतो कायद्याने, त्यात इतरांनी भावनावश होऊन अडथळा आणणे बरोबर आहे का?

कंजूस 31/07/2025 - 05:48
इथे दुसरा मालक अंबानी कुटुंबीय आहे. त्यांचे आणि केंद्रातील वरीष्ठांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेतली की आपण भक्त ठरू शकतो याची कल्पना आहे. अंबानींच्या टेलीकंपनी जियोचे कार्ड सर्विस वापरणारे किंवा न वापरणारे भक्त/ विरोधक ठरतील का?

कंजूस 31/07/2025 - 06:37
आपला फोन नंबर एका सर्विस प्रवाइडरकडून दुसऱ्याकडे नेणे म्हणजे 'नंबर पोर्ट'. आपण बरेच जण ' pre paid' plan घेतो. Post paid/ बिलींग प्लान घेत नाही. यात धोका असतो. आपण फोन कॉल्स करतो, डेटा इंटरनेट वापरत राहतो आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल येऊ शकते. Pre paid प्रकारात तसे होत नाही. अमर्याद इंटरनेट वापरले जात नाही. डेटा लिमीट संपल्यावर बंद पडते. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की वोडाफोन किंवा बीएसएनेल चा नंबर जियोकडे बदलल्यास pre paid नंबर मिळतो. तसं एरटेलचं नाही. एरटेलला पोर्टिंग करायचं झाल्यास चार ते सहा महिने post paid प्लान घ्यावा लागतो. तो महागडा आहे. शिवाय सहा महिन्यांनी pre paid करायला गेल्यास ते त्रास देतात.

कोर्टाने काय म्हंटले आहे? फक्त अंबानी अंबानी म्हणून रागाने नाचण्यात अर्थ नाही. But the high court cited a June 2024 report about the elephant's health, diet and nutrition, social environment, hygiene and cleanliness of shelter, veterinary care and work schedule, and said they "appear to be absolutely dismal". citing an elephant's right to quality life must take precedence over humans' right to use it for religious purposes. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/elephant-relocated-to-gujarat-facility-from-kolhapur-devotees-bid-emotional-adieu-101753844026798.html

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 31/07/2025 - 11:18
या देशात कशावरही विश्वास नाही, कोर्ट कमिटि नेमते आणि त्या अहवालावर निर्णय देते . ती कमिटी मॅनेज झाली कि जमले

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वधर्म 31/07/2025 - 15:38
माई, तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मानवाच्या धार्मिक अधिकार व इच्छांपेक्षा प्राण्याचा सुरक्षित जीवनाचा अधिकार अधिक महत्वाचा आहेच. केवळ धार्मिक आहेत, किंवा गावकर्‍यांना हत्तीण हवीशी वाटते, त्यांना तिचा लळा आहे, म्हणून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. तरीही अंबानीच्या वनतारातच हत्तीणीचे चांगले संवर्धन होईल असे मानणे, म्हणजे जरा जास्तच होतंय. तुमच्या दुव्यात म्हटले आहे: The relocation took place after the Supreme Court dismissed a petition filed by the mutt, challenging the Bombay High Court order upholding the decision of a High Powered Committee to relocate the animal to the Gujarat facility. या हाय पॉवर कमिटीत कोण कोण होते? त्यांच्याविषयी कुठेच माहिती मला तरी मिळाली नाही. त्यांचे काही हितसंबंध होते का? बरं एकदा राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने, डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत प्रमाणपत्र दिलेले होते. या हाय पॉवर कमिटीने वनतारा अधिकार्‍यांची भेट, मठाने ऑफर नाकारणे वगैरे झाल्यावर नवीन अहवाल दिलाय. हे सगळं तितकं निष्पाप सरळ दिसतंय का तुंम्हाला? राजू शेट्टी यांनी जामनगरलाच का? हा मुद्दा मांडला आहे. एक तर केरळ मध्ये हत्तींचे उत्तम संगोपन करण्याची परंपरा व क्षमता आहे. तसेच जामनगरला तापमान ४५ अंशापर्यंत जाते. हे असे असताना, 'गुजरात महाराष्ट्राला जवळ असल्याने' तिला जामनगरला हलवायचा आदेश दिला. हा न्यायालयाचा तर्क तुंम्हाला कसा वाटतो?

Bhakti 31/07/2025 - 10:53
अंबानीने अशाप्रकारे एकल असणाऱ्या सर्व हत्तींना वनतारात घेऊन जावं.हत्तींचा कळप बनवावे.इतक्या पैशांचा कधी उपयोग होणार,तो वापर करावा.गावकऱ्यांना आनंद व्हायला पाहिजे.हत्तीला निसर्गात राहण्याची संधी आता यापुढे मिळणार,बास झाली की गावची सेवा.

In reply to by कपिलमुनी

फक्त अंबानी नाही, अंबानी + PETA + हाय कोर्ट + सुप्रीम कोर्ट हे सगळेच समान दोषी आहेत. नीच लोकं. जो समाज जाहीरपणे मुक्या जनावरांची हिंसा करतो त्याला पाठीशी घालतात, अन् जो टोकाचा अहिंसक समाज मुक्या जनावराला देवासारखे प्रेमाने वागवत आहे त्याच्याकडून तो प्राणी हिसकावून घेतात. असला हा नीच समाज. ही ह्या नीच लोकांची धर्मनिरपेक्षता आणि ही ह्याचे सेक्युलॅरिझम. जे लोकं एकट्या अंबानीचे नाव घेऊन टार्गेट करत आहेत ते स्वतःचे पूर्वग्रह बायस दाखवून देत आहेत बस.

मी माझा पाळीव घोडा किवा गाय किवा तत्सम प्राणी विकायचे नाही किवा उलट ठरवले तर पेटा हरकत घेउ शकते? किवा गेलाबाजार एखाद्या शेजार्‍याने आकसाने पेटाकडे तक्रार केली की मी माझ्या कुत्र्याचा छळ करतो तर पेटा कारवाई करु शकते?

अमर विश्वास 31/07/2025 - 15:43
भरपूर हसलो लेख वाचून ... वनतारा मध्ये २०० हत्ती आहेत ... तरी अंबानी आपले सर्व उद्योग सोडून जयसिंगपूर मधल्या हत्तीच्या मागे लागला ... भारी लॉजिक आहे

In reply to by अमर विश्वास

स्वधर्म 31/07/2025 - 15:49
त्यांच्याकडे पॉलिमर, फोन नेटवर्क, पेट्रोकेमिकल, देशातील बहुसंख्य माध्यमे, आणि काय काय एवढे उद्योग आहेत. तरी पण किराणा दुकानं काढली... खूपच हसण्यासारखे आहे हे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 01/08/2025 - 16:00
तुमचा काय आकस आहे, कल्पना नाही. पण हे सगळे खोटे वाटत असेल, तर हे घ्या दुसऱ्या माध्यमांतील दुवे सकाळने या घटनेचे सखोल वृत्तांकन केले आहे: https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mahadevi-elephant-full-story-in-marathi-nandani-kolhapur-temple-jain-math-vanatara-relocation-supreme-court-order-emotional-farewell-ambani-peta-animal-rights-srk94 टी व्ही ९ मराठी https://www.tv9marathi.com/trending/will-mahadevi-the-elephant-return-to-nandani-math-kolhapur-1459506.html

In reply to by स्वधर्म

नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. अमेरीकेत एक प्राणीसंग्रहालया बघीतले. सरकारने बरेच खुले,मोकळे ढाकळे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलायं पण खाणे पिणे आणी सतत माणसांचा संपर्क टाळता आला नाही. त्यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक स्वभाव बदलले असल्यास नवल नाही. जनुकीय बदल घडतो का यावरही कदाचित संशोधन झाले असावे. माणसाला जर जंगलात डांबून ठेवले तर कसे वाटेल? माझे मत कुणालाच पटणार नाही. जाऊ द्यात. मराठी माध्यमांतून निष्पक्ष पत्रकारिता होत नाही असे माझे मत आहे आणी लोकशाहीत मतस्वातंत्र्य आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलमानुसार मी मत व्यक्त करत आहे. नाही पटलं तर सोडून द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 01/08/2025 - 21:58
>> नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. हत्तींसाठी निसर्गातील रहिवासच सर्वोत्तम, हे मत मला पटते. हत्तीणीची मठात काळजी घेतली जात असेल पण तरीही ते हत्तीसाठी नैसर्गिक नाहीच. जामनगरला तापमान ४० च्या वर जाते. धागा काढण्याचे कारण हे की सगळी चक्रे हलून, जुने रिपोर्ट असताना हाय पॉवर कमिटी नेमून, ना ना प्रकार करून नेमके तिला कुणाकडे पाठवण्यात आले, ते तितके सरळ दिसले नाही.

In reply to by स्वधर्म

प्रचेतस 01/08/2025 - 22:54
आयुष्यभर मानवी सहवासात राहिलेले प्राणी नैसर्गिक सहवासात जगू शकत नाही. त्यांची स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याची क्षमता संपलेली असते.

दुसरी बाजू कळायला मार्ग नाही. म्हणजे खरंच पेटा वाल्याना हत्तीणीची दया आली म्हणून हे सर्व झालं हे माहिती नाही. पण अशी कोर्टाच्या निगराणीत हाय पॉवर कमिटी नेमून तपासणी केली तर पाळीव प्राणीच कांय खुद्द माणसांना पण असंच कुठं तरी सोडावं लागेल. धाग्यात लिहिल्या प्रमाणे वनतारा चे अधिकारी आधी पाहणी करून गेले नंतर त्यांनी मठाला ऑफरही दिली. ऑफर नाकारल्यावर परत पेटा वाले येऊन कोर्टात गेल्यावर हत्तीण वनतारातच जात असेल तर नक्कीच काळबोर आहे असं वाटतंय. आणि हत्तीण जर वनतारात जात असेल तर राज्य सरकार कडून मदतीची अपेक्षा ठेवणाही चुकीचं होत.

विवेकपटाईत 31/07/2025 - 21:37
एका शेतकर्‍याने 10 किलो वजनी लाल भोपळा राजाला अर्पण केला. त्याच वेळी एका श्रेष्ठी ने एक हत्ती राजाला नजराणा म्हणून दिला. राजाने हत्तीच्या बदल्यात भोपळा श्रेष्ठीला दिला. राजा शेतकर्‍याला श्रेष्ठी ने दिलेला हत्ती देऊ लागला. तर शेतकरी म्हणाला, मला हत्ती नको. मला माझा भोपळाच परत द्या. हत्ती पाळण्याचा खर्च शेतकरी उचलू शकत नव्हता. अंबानीला हत्ती पाळण्याचा खर्च उचलू द्या. बाकी पेटा ही हिंदू विरोधी संस्था आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.

ह्या हत्तीणीला अझीम प्रेमजी किंवा आनंद महिंद्र ह्यांनी आपल्या घरी नेले असते तर हा धागाच निघाला नसता असा ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/08/2025 - 15:51
या विशिष्ट प्रकरणात मालकांच्या मालकांवरून रोख हटवण्यासाठी विशिष्ट धर्माच्या द्वेषाची मात्रा चालत नसल्याने आता दुसर्‍यांना सेक्युलर म्हणून जुन्या घटना काढल्यावर तरी चालतंय का, याची चाचपणी सुरू आहे का? एवढ्यावर थांबू नका, नेहरू + हत्ती असं काही मिळतंय का बघा. बाकी सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला होता त्यात सेक्युलर व धर्मांध असा भेद करणे तुंम्हालाच जमते.

In reply to by स्वधर्म

कसला रोख हटवणे अन् कसलं काय ! आम्ही तुमच्या एकांगी सिक्युलारिझम आणि भूतदया वगैरे चा बुरखा फाडत आहोत बस. ह्या प्रकरणात अंबानी चे नाव नसते तर तुम्ही चकार शब्द काढला नसता . तुम्हाला हत्तीशी अन् जैन धर्मियांच्या भावनांशी काहीही घेणे देणे नाहीये. पर्युषण पर्वात हिंसा करू नका असे जैन धर्मीय म्हणतात तेव्हा त्याला विरोध करायला तुमच्या सारखी च माणसे आघाडीवर असतात. आणि नेहरू + हत्ती काय शोधायचं ! नेहरू अन् त्यांच्या बाष्कळ धोरणांमुळे 1965 च्या युद्धात चारीमुंड्या चित हार अन् झालेली मनुष्यहानी सर्वांना माहीत आहे . आणि तरीही अजून एका - नेहरूने 1949 मध्ये इंदिरा नावाची हत्तीण जपान मधील एका zoo ला गिफ्ट केली होती ! तेव्हा "आले नेहरूंच्या मना" असा लेख लिहा आता. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे घ्या तुमच्या लाडक्या NDTV ची लिंक आहे ! https://www.ndtv.com/offbeat/jawaharlal-nehru-death-anniversary-when-pandit-nehru-gifted-an-elephant-to-japan-2236072 Ele आता खरेच जर तुम्ही " आले नेहरूंच्या मना" असा नेहरूंवर टीका करणारा लेख लिहिलात तर मानलं की तुमचं सिक्युलरिझम खरं ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/08/2025 - 16:41
अहो, नेहरूंनी हत्ती 'दिलाय' **** यांच्यासारखा 'काढून' घेतला नाहीये. कशाला वाढवताय?

In reply to by स्वधर्म

कशाला वाढवताय?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्या लेखणीतून एक तरी खऱ्या अर्थाने सेक्युलर वाक्य लिहिले जाते काय ते ! उदाहरणार्थ, माझं उपहासमुक्त, सरळ स्पष्ट मत मांडून मी थांबतो : PETA चे लोकं हरामखोर आहे. जैन सारख्या अत्यंत अहिंसक धर्माच्या लोकांकडून श्रद्धेने पूजिला जाणारा हत्ती काढून घेण्याचे कारस्थान पाताळयंत्री आहे. त्याला बळ देणारे अंबानी अन् त्यांची कमिटी की काय हेही त्या पापात तितकेच भागीदार आहेत . मुळात धर्माच्या प्रश्नात सरकार ने ढवळाढवळ करणे अक्षम्य चूक आहे. इथे हाय कोर्ट चुकले अन् सुप्रीम कोर्ट ही चुकले. तेही ह्या पापाचे भागीदार आहेत. आणि सर्वात शेवटी एन सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे लोकोत्तर बहुमताने निवडून आलेले नेते म्हणून आदरणीय मोदी आणि सन्माननीय महामहीम राष्ट्रपती ह्यांच्या डोळ्यादेखत हा अन्याय झाला असल्याने तेही ह्या पापात भागीदार ठरतात. आता जैन धर्मात ढवळाढवळ करून दाखवली तितकीच अन्य धर्मात ढवळाढवळ करून त्यांनी मुक्या जनावरांचा जीव वाचवून दाखवावा . आमचे लोकमान्य टिळक म्हणाले होते तसे म्हणून मी माझे 4 शब्द संपवतो - ह्या न्यायासनाच्या वर एक उच्च न्यायासन आहे, तिथे ईश्वर साक्ष आहे . तिथे नक्की न्याय होईल, सदर पापातील सर्वांभागीदारांना एकुणएक हिशेब चुकता करायला लागेल ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे ! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 15:46
तुंम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळेच या प्रकरणात चुकले आहेत हेच मत, 'हे सगळं सरळपणे घडलं नाहीये' या स्वरुपात या धाग्यात मांडले होते. माझा तुमच्या या आणि आधीच्या प्रतिसादांबद्दल हाच मुद्दा आहे की तुंम्ही या प्रकरणाला इतर असंबध्द विषय चिकटवत आहात. या धाग्यात सेक्युलर वाक्य लिहीले का नाही याचा मूळ मुद्द्याशी कसलाही संबंध नाही. सेक्युलरिझम हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर वेगळा धागा काढावा, ही विनंती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वधर्म 01/08/2025 - 15:26
प्रेमजी, महिंद्रा सोडा, हत्तीण तुंम्ही घरी नेली असती तरी धागा निघाला नसता. फक्त ज्या पध्दतीने घटना घडत किंवा घडवून आणल्या गेल्या, त्यामुळे कोणालाही यात सगळं कसं साधं सरळ घडत गेलं असं वाटणार नाही.

In reply to by कपिलमुनी

अरे वाह ! तुम्ही pattern detection करायला लागला आहात हे पाहून आनंद झाला. :) इतरही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जानारे pattern लवकरच तुमच्या लक्षात येतील अशी आशा आहे.

In reply to by कपिलमुनी

स्वधर्म 01/08/2025 - 15:29
एखादी कमिटी नेमून तिच्या कडून फक्त हवा तसा अहवाल आणला की झाले. यात आपले राज्य आणि केंद्र सरकार एकदम निष्णात आहे.

रामचंद्र 01/08/2025 - 17:55
बंधयुक्त मालकी हक्कातून नैसर्गिक अधिवासातल्या मालकी हक्काकडील हे बळजबरीचे हस्तांतरण आहे, गडचिरोलीचे हत्ती गुजराथला नेले तसे. मग त्यातल्या त्यात पैसा घालून अंबानींनी किमान केरळमध्ये आपले केंद्र उघडावे म्हणजे किमान हत्तीला तरी बरे वाटेल. नाही तरी वनतारात प्राणी आनंदाने रहावेत अशीच अंबानींची इच्छा असणार. तर त्या त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवावे हे योग्य. म्हणजे हत्ती केरळात, पेंग्विन अंटार्क्टिकावर आणि सिंह गीरमध्ये याप्रमाणे. प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य असा बदल व्हायला हवा. आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, पक्षीविक्रीची दुकाने हे प्रकार पूर्णपणे आणि स्वयंस्फूर्तीने बंद व्हायला हवेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 01/08/2025 - 18:33
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य इथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अ‍ॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.

आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सदर मठ त्या हत्तिणीला मोहरम मधील उरूस साठी भाड्याने देत असे . बेकार हसतोय =))))) Joke सेक्युलॅरिझम च्या मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट मौन पालुयात=)))) अर्थस्य पुरुषो दास:

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 15:52
मुळात पाळीव नसलेले जंगली प्राणी पाळणे हेच प्राण्यांवर अन्यायकारक आहे. मग ते नांदणी मठ असो वा इस्कॉन वा वनतारा. प्राणी भाड्याने देणारे व घेणारे दोघेही दोषीच आहेत. एकदा प्राणी पाळला, की त्याला नियंत्रणात ठेवणं आलं, मग माहूत आला व अंकुशही आलाच. त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 05/08/2025 - 16:13
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-) त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 05/08/2025 - 17:43
अभ्या, तुंम्ही अत्यंत रोचक माहिती बाहेर काढली आहे. दुवा द्याल तर फारच सोईचे होईल. मिरवणुकीत हत्ती भाड्याने देणे यात बराच पैशाचा व्यवहारही आहेच. विषय डायव्हर्ट करणे हे अफलातून कौशल्य असले आणि बहुतांश लोकांच्या लक्षात येत नसले, तरी त्याचा न्याय व नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 05/08/2025 - 17:50
पेटाच्याच साईटवर आहे. माधुरी स्टोरी केलीय त्यांनी. अगदी स्क्रीन शॉट्स आहेत. एकाखाली एक अशा दोन इमेजेस आहेत. वरची इमेज गणेशोत्सवांच्या भाड्यांची लिस्ट, खालची एक इमेज मोहरम मिरवणुकीची. अगदी धर्मच काढायचा तर मठ जैन आहे, गिर्‍हाईके हिंदू बहुसंख्य आहेत, एक मुस्लीम आहे. सेक्युलॅरिझम अजून काय वेगळा असतो. सिलेक्टेड हवी तीच इमेज टाकण्यातला हेतू नीच असतो. माहीती आहे तर सगळीच द्यावी. . पहा... सगळेच कळेल.

In reply to by स्वधर्म

माझ्या वरील प्रतिसादात माहुताच्या धर्माचा काडीमात्र उल्लेख नाही. आणि तुम्हाला कळत नसलं तरी माझ्यालेखी हत्तीची देव स्वरूपात पूजा करणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमाला हत्ती पाठवणे आणि मुक्या जनावराला देवाच्यानावाने बळी देणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमात पाठवणे ह्यात जमीन आसमान च फरक आहे. आणि तसाच फरक नांदणी मठ , इस्कॉन आणि वनातारा ह्यातही आहे. तुम्हाला फक्त त्या वणतारा त अंबानी अन् पर्यायाने मोदी दिसत असल्याने हत्तीचे स्थलांतर सहन झाले नाहीये इतकेच सत्य आहे ! आणि बरं झालं की तुम्हीच अंकुशाचा उल्लेख केलात. त्यावरून हेच सिद्ध होते की हत्तीला त्रास दिला जात होता आणि म्हणूनच हत्तीचे स्थलांतर करणे हाच निर्णय योग्य होता , आहे ! तुम्हाला वनतारा आवडत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र टूतारा वन्यजीव रेस्सुक्यू सेंटर सुरू करा आणि आणि घेऊन जा हत्तीला. फडणवीसांनी असे वन्यजीव रेस्सुक्यू अभियान सुरू केले तर त्यातही तुम्ही खोटंच काढणार आहात !!

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 20:26
ते अभ्या यांनी बाकीच्या १४ वेळा ज्या धर्मांच्या मिरवणूकीत पाठवल्याची माहिती दिली आहे. तर जाता जाता तुमचं त्याबाबतही मत देऊनच टाका. का एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे? बाकी ते मोहरमचा उल्लेख करणं, नेमका माहूताचा व अंकुशाचा फोटो त्यासोबत डकवणं परंतु यात विशिष्ट धर्माचा 'काडीमात्र' उल्लेख नाही आणि त्यावर रोख नाही असं म्हणणं यामुळे मला ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण आठवली. पण ते असो.

In reply to by स्वधर्म

एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे?
होय. मी तर स्पष्टच लिहिले आहे की माझ्या प्रतीसादात . माहूत एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी काहीही विरोध नाही. पण हेच लोकं देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात ही त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा लोकांना अहिंसा परमो धर्म: मानणाऱ्या जैन धर्मियांनी हत्ती भाड्याने देणे हेच पाप मानले गेले पाहिजे. बाकी मलाही "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नाहाने" ही म्हण आठवली. :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/08/2025 - 22:28
तुमचा आक्षेप 'मुक्या जनावरांचा जीव घेतात ' याला असेल तर हा शाकाहार विरूध्द मांसाहार मुद्दा होईल, जो या धाग्यात पूर्णतः गैरलागू आहे. तो वाद वेगळा धागा काढून घाला. तुमचा आक्षेप 'देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात' याला असेल, तर अशी प्रथा आजही हिंदू धर्मातही आहे. (मांढरदेवी, कालीमाता, बिरोबाची जत्रा' इ. मग एकाच विशिष्ट धर्मावर रोख का? बाकी तुमच्याबरोबर भेंड्या खेळायला मजा येत आहे तोपर्यंत खेळाव्यात असा विचार आहे.

In reply to by स्वधर्म

हो मग ! आहेच की. त्या हत्तीचा माहूत कोणी कालिमाता बिरोबा येथे बळी देणारा असता तरीही मी हेच म्हणेन. ( मांढरदेवीला बळी देण्याची प्रथा माझ्या माहिती नुसार बंद झाली आहे.) आणि शाकाहार विरुद्ध मांसाहार हा मुद्दा कसा नसू शकतो ! हत्ती जैनांचा आहे . जैन धर्माचा पायाच अहिंसा आणि शाकाहार हा आहे. अहो जे जैन संत चुकून देखील नजरेला न दिसणाऱ्या मुक्या जीवांची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतात ते जैन लोकं पराकोटीच्या हिंसक लोकांना स्वतःचा देवस्थान च हत्ती कोणत्या भरोशावर पाठवतात ! हे असं ते न कळत पणे करत असतील तर मूर्खपणा आहे आहे कळून देखील करत असतील तर दांभिकपणा आहे. दोन्हीही परिस्थितीत बिचाऱ्या मुक्या हत्तीचे आयुष्य क्लेशकारक होत आहे. ह्या असल्या क्रूर व्यवस्थेपेक्षा वनतारा हजारपतीने उत्तम !

कपिलमुनी 02/08/2025 - 10:53
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. तिथलं वातावरण, तापमान , खाद्य हत्तीना अनुकूल नाहीये.. कर्नाटक केरळ असता तर ठीक.. तिथे हत्तींचा वावर आहे.. केवळ पैसे आहेत म्हणून माज..त्यात चौकीदार ही चोर है

कपिलमुनी 02/08/2025 - 10:57
दुवा हाडांचे आजार असल्याने गौरी नावाची हत्तीण "रेस्क्यू" करण्यात आले होती.. तिला ३ दिवस लग्नाच्या दारात शोभेसाठी उभे केले होते.. आता ३ दिवस असे उभे करणे यावर सरकार न्यायालय आणि. पेटा आवाज काढणार नाहीत

In reply to by कपिलमुनी

सुखद बदल ! ह्या हत्तीच्या निमित्ताने अंबानी आणि त्या आडून मोदींना शिव्या घालायचा जो एकांगी प्रकार चालला आहे त्यात सहभागी न होता तुम्ही PETA, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट , आणि एकूणच सरकार ह्या सर्वांवर समान तीव्रतेने टीका करत आहात हा बदल अत्यंत सुखावह आहे !

Bhakti 02/08/2025 - 16:16
हत्ती. एक लघु निबंध हत्ती हा largest land mamal आहे. त्याच्या African अणि Asian ह्या दोन प्रजाती आहेत. हत्ती हा एक pack animal आहे. पण natural setting मध्ये तो त्याच्या species मध्ये रहाणे पसंद करतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. पण अहिंसा परम धर्म वगैरे मानत नाही. Male elephants aggressive असतात. विशेषत: मदमस्त असताना. Females त्या मानाने docile असतात. हत्ती हा प्रचंड intelligent अणि emotional प्राणी आहे. पण त्याच्या भावना अणि बुद्धी primarily survival instincts अणि primordial behavior वर चालते. हत्ती महाकाय असून relatively weak eyesight, sharp hearing and sense of smell plus ability to sense vibrations are their physical traits. माणसाने हत्तीला godlike status दिले असले तरी हस्तिदंत करता शिकार करणे. युद्धात वापरणे. ओझी वाहाणे, Circus मध्ये खेळवणे. Zoo मध्ये ठेवणे. मिरवणुकीत फिरकणे असे abusive प्रकार हत्तीवर लादले जातात. हत्तीला विचाराल तर ह्यातील एकही गोष्ट तो स्वतःहून करणार नाही. त्याला ईतर हत्ती बरोबर चरत उंडारत फिरायला आवडत. त्याकरता तो आपल्या शेतात बागेत येतो. पण हत्ती हा pet नाही. पाळीव प्राणी नाही. Domesticated नाही. तो trained and conditioned आहे बस्स. ही so called माणसाबरोबर Co exist होण्याची प्रक्रिया खूप क्रूर असते. विशेषत एव्हड्या अवाढव्य प्राण्याला हाताळायला अंकुश वापरावा लागतो. आणि आयुष्याचा बराच काळ captivity मध्ये घालवावा लागतो. साखळदंड सकट. नाहीतर पिंजरा किवा enclosure मध्ये. त्यांचे प्रजनन वगैरेही ईतर पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसाना परवडत नाही. हत्ती पोसणे अफाट काम आहे हे खरंय. Circus वाईट आहे. आता तिथे प्राणी वापरत नाहीत. Zoo पण बंद व्हायला पाहिजेत. Peting zoo आणि resorts वर पण नियंत्रण हवे. एव्हडच काय forest reserve वर पण बंदी यावी. हत्ती असो किवा वाघ तुमच्याबरोबर selfie काढायला आतुर नसतो. पण माणूस प्राण्याच्या हौसेला मोल नाही. ताब्याती एक हौस म्हणजे गणपती उत्सव. पण त्याने हत्तीला थेट त्रास होत नाही किवा कामाला लावल जात नाही. पण temple elephant किवा मठाची हत्तीण हे एक occupation आहे. Petting zoo मधला हत्ती हेही एक occupation च आहे. Quality of life and conditions may differ. Bonded labour. Loosely put. हत्तीला काय समजत नाही? आणि काय समजत? कोल्हापूर की जामनगर ही नावे समजत नाहीत. Habitat समजते. हत्तीला अम्बानी समजत नाही ना जिओ एयरटेल मधला फरक. हत्तीला नाव समजत नाही. Positive negative reinforcement , association, conditioning and response behavior समजतो. हत्ती court ची पायरी चढत नाही. त्याला पेटा माहिती नाही. पण वन तारा मधला हिरवे पण जाणवेल ईतर हत्ती दिसतील. मिळणारे जेवण उमजेल. हत्तीला attachment असते. पण ती Co dependency नसते. हत्ती माहूत मानतो आणि primary caregiver वर depend करतो. पण प्रत्येक केळी भरवून photo काढणारे आणि ह्या विषयावर reel बनवणारे त्याच्या गिनती ahet का? किंबहुना हत्ती ही post वाचेल का हा प्रश्न मला पडत नाही. हत्तीला परंपरा धर्म आण बाण शान वगैर संकल्पना कळतात का हो? महादेवी aka माधुरी is a working elephant who is close to her retirement. तिला आराम, योग्य आहार, विहार, आरोग्य सेवा आणि काळजी घेणारी ( नुसती काळजी करणारी तेही social media वर नव्हे) माणस आजूबाजूला हवीत. आपल्यालाही तेच हव असत नाही retirement ला? बघा तिच्या बुद्धीने विचार करून. #meateatingmonk

In reply to by Bhakti

Bhakti 05/08/2025 - 11:09
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या सवयींनुसार, नैसर्गिक वृत्तीने जगायचा हक्क आहे. कोणाच्या सांगण्यानुसार नाही. आता तेच आयुष्य माधुरीला वनतारामध्ये मिळतंय. ती केव्हा खाणार, कुठे फिरणार, विश्रांती कधी घ्यायची हे सगळं ती स्वतः ठरवते, आपल्या गतीने .. https://www.facebook.com/share/r/16wJLCZfWi/

एक प्रयोग म्हणून हे करून पाहा : तुम्ही जी कोणती AI सिस्टिम वापरता त्या सिस्टिमला आधी कंटेक्स्ट करून विचारा की " तुम्ही एक तर्कशुद्ध विचार करणारी व्यक्ती आहात, आता एका वाक्यात, सोप्या शब्दात उत्तर द्या की वंताराने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय? " मी जेमिनी वापरतो , मला ही उत्तर मिळाले - From a purely rational standpoint focused on the elephant's welfare, the elephant should not be returned to the Jain math.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो, कारण हत्ती हा जैन मठाचा सांस्कृतिक आणि धार्मिक भाग होता, आणि जर तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात होती, तर तो परत पाठवणं नैतिक आणि न्याय्य ठरेल. Chat gpt

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 04/08/2025 - 15:59
जेमिनी किंवा चॅटजीपीटी

अ‍ॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये

पण हे दोघापेक्षा तिसर्‍याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 04/08/2025 - 16:19
वंताराने कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना लक्षात घेऊन जैन मठाचा हत्ती परत पाठवावा, जर मठ आणि गावकरी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील.

मराठीत प्रश्न विचारल्यास काही वेगळे उत्तर मिळते का हे तपासून पाहण्यासाठी मी मराठीत चर्चा केली जेमिनी सोबत : पूर्णपणे तर्कशुद्ध विचारकरून आणि उपलब्ध माहिती पुराव्यांच्या विचार करून सोप्या शब्दात उत्तर द्या की वनतारा ने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय ? >>> माहिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्तीण महादेवीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य दिले गेले असल्यामुळे तिला जैन मठात परत पाठवू नये.

In reply to by प्रसाद गोडबोले

एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत ते हत्तीची काय काळजी घेणार?

In reply to by रामचंद्र

मुळातच व्यक्तीद्वेष हा त्यांच्या आणि त्यांच्या विचारांच्या लोकांच्या चर्चेतील मूळ मुद्दा असल्याने त्यांनी हे लिहिणे स्वाभाविक आहे. वनतारा ही अंबानी ऐवजी रॉबर्ट वाड्रा चालवत असते तर एक चकार शब्द उच्चारला नसता त्यांनी. मुळात हत्तीचे हित हे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये जाण्यातच आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य समजू शकतो. आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्यात काही खुसपट काढता येईना म्हणून अंबानी वर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे हे हत्यार त्यांनी उपसले आहे बस.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/08/2025 - 18:54
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा आणि एखाद्या आजारी व्यक्तीवर अन्याय करणारा आहे ज्या आजाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. .

In reply to by सुबोध खरे

किती ते प्रेम पण? कोणता आजार आहे असा? तुम्ही त्यांचे पर्सनल डॉक्टर आहात की त्यांचे डॉक्टर रोज तुमच्या सोबत बसून तुम्हाला माहिती देतात? आणी मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/08/2025 - 19:20
मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? मी ही प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं.

नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadnavis-on-mahadevi-elephant-of-nandani-math-to-file-petition-in-supreme-court/articleshow/123115303.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 05/08/2025 - 17:32
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात

हत्ती

परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे दोनदा लिहिल्यास ती परत येईल असे वाटून दोनदा लिहिले आहे का? ते काय असते ना- दोन निगेटिव्हचा गुणाकार एक पॉझिटिव्ह असतो की काहीतरी. :)

तासगावच्या गणपती देवस्थानच्या गौरी हत्तीणीसाठी अंबानींच्या वनताराकडून २ कोटींची ऑफर आली आहे. ती ऑफर आपण स्विकारणार नाही असे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी म्हटले आहे. जर गौरी या हत्तीणीची योग्य ती काळजी घेतली जात असेल तर खरं तर तिला तिथून हलवायचे काहीही कारण नाही. त्यामुळे देवस्थान जर अंबानींची ऑफर नाकारत असेल तर चांगलेच आहे. पैशांसाठी त्यांनी गौरीला तिथे पाठवायलाही नको. https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/tasgaon-gauri-elephant-gets-2-crore-offer-from-vantara-anant-ambani-sangli-ganapati-panchayatan-trustee-rajendra-patwardhan-claims/articleshow/123132791.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines मी सांगलीत पाच वर्षे राहिलो आहे. सांगलीचे गणपती देवस्थान सांगलीचे पूर्वीचे संस्थानिक पटवर्धन यांचे कुटुंब बघतात. मेने प्यार किया वाली भाग्यश्री पटवर्धन त्याच कुटुंबातील. या पटवर्धनांचा तासगावच्या पटवर्धनांशी काही संबंध आहे की नाही माहित नाही. तर सांगायचा मुद्दा हा की सांगलीच्या गणपती देवस्थानात मी होतो तेव्हा बबलू नावाचा एक हत्ती होता. तो हत्ती सांगलीची शान मानला जायचा. वयोमानानुसार त्याचे निधन झाल्यानंतर सांगलीच्या गणपती मंदिराजवळच्या भागात दुखवटा म्हणून कडकडित बंद पाळण्यात आला होता. तासगावच्या त्या हत्तीणीविषयीही स्थानिक लोकांची तशीच आत्मियता असली तरी आश्चर्य वाटू नये. केरळमध्ये पूर्वी गुरूवायूरच्या मंदिरात मोठे लोक हत्ती दान द्यायचे. जयललितांनीही तिथे हत्ती दान केला होता. नंतरच्या काळात तिथे इतके हत्ती झाले की देवस्थानला सांभाळणे कठीण झाले. त्यानंतर यापुढे दान म्हणून हत्ती स्विकारले जाणार नाहीत असे देवस्थानने जाहीर केले. आज तिथे कित्ती हत्ती आहेत याची कल्पना नाही. पण ते हत्ती पण असेच वनतारामध्ये नेणार का? अशा देवस्थानात कुठेही हत्ती असले तर त्यांची योग्य ती देखभाल केली पाहिजे आणि त्यांची कुठेही आबाळ व्हायला नकोच. पण त्याचबरोबर असे हत्ती कुठेही हलवायच्या आधी स्थानिक लोकांच्या भावनांचाही विचार करायला हवा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हत्ती हा पाळीव प्राणी नाही. हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. किमान हिंदू , बौद्ध, जैन आणि शीख इत्यादी अहिंसा शांतताप्रिय भारतीय धर्माच्या लोकांनी हत्ती पाळण्याचा अट्टाहास करू नये. अगदीच हौस असल्यास गाय पाळावी. - एक सनातनी हिंदू म्हणून तासगावच्या देवस्थानचा आणि विशेषत: ब्राह्मण म्हणून पटवर्धनांचा मी जाहीरपणे निषेध करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
याविषयी कल्पना नाही. मात्र आपल्याकडे राजेरजवाडे आणि श्रीमंत लोकांकडे हत्ती ठेवायची परंपरा होतीच. अगदी चंद्रगुप्त मौर्याकडे हत्ती होते- सेल्युकस निकेटरने त्याला ५०० हत्ती दिले होते असे उल्लेख आहेत असे वाचले आहे. शिवाजी महाराजांकडेही हत्ती होते. आनंदाच्या प्रसंगी हत्तीवरून साखर वाटणे हे पण अगदी कॉमन होते. सगळीकडे अशी क्रूर वागणूक हत्तींना दिली जायची का? काहीही असले तरी एक प्राणीप्रेमी म्हणून कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही वाईट वागणूक दिली जाऊ नये हे नक्कीच. (शाकाहारी) चंसूकु

स्वधर्म 06/08/2025 - 17:14
हा धागा काढताना, हे जे हत्ती अगदी पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वनतारालाच पाठवायचा प्रकार चालू होता तो तसा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. बर्‍याच मिपाकरांनी अतिशय उत्तम माहिती व दुवे दिलेले आहेत. हत्तीसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास हाच सर्वात हिताचा या मताशी मी सहमत आहे. परंतु काही सदस्य ती वनतारात गेली ते तिच्यासाठी जास्त चांगलं (हजारपटीने) असे म्हणत आहेत. इथे आणि इथे. तिथले हवामान निश्चितच केरळ किंवा काझीरंगा, आसाम यांच्याइतके हत्तींसाठी नैसर्गिक नाही. कपिलमुनी म्हणत आहेत तसे, ईशान्य भारतातील अनेक ठिकाणांहून हत्ती वनताराला पाठवण्यात आले आहेत. त्याचा एक पॅटर्न दिसून येतो. हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी - प्रशांत कदम यांचा रिपोर्ट https://youtu.be/gE6GqvWwGUo?si=CgSnd9Bg8O7rlaT_ शिवाय साम दाम दंड भेद याचा वापर कसा केला जातो ते आपण माधुरीच्या बाबत पाहिलेच. ईथे तासगांवच्या हत्तीबाबत कसा डाव रचण्यात आला होता ते विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सुदैवाने त्यांना माहुताच्या किंवा वैरण पुरवणार्‍याच्या धर्माविषयी आकस नाही जसा इथल्या तथाकथित अध्यात्म पूर्ण समजलेल्या सनातनींना आहे. तासगावच्या हत्तीवर वनताराचा डोळा? ३ कोटीची ऑफर? ।। वज्रधारी न्यूज ।। मला कोणत्याही धर्मासाठी, परंपरेसाठी अशा प्रकारे हत्तीला वेठीला धरलं जावं हे योग्य वाटत नाही. परंतु सगळं कसं वनतारात पाठवण्यासाठीच घडून येतं, ते तितकं साधं सोपं सरळ वाटत नाही. पैसा ही शक्ती आहे, पण ज्यावर नजर पडेल, ते माझं असं असेल, तर अवघड आहे. उद्या पुणे महापालिकेला पाणी नीट स्वच्छ ठेवता येत नाही म्हणून कोणीतरी कोर्टातून खडकवासला धरणसाखळी मालकांकडेच द्या असं म्हणून कोर्टात जातील आणि त्याना हवा तसा निकालही लागेल. नागरिक कधी जागे होणार?

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 06/08/2025 - 17:28
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात नॉर्मल्च म्हणा, न्यू नोर्मल असावी) वाटणारी गोष्ट म्हणजे, राजू शेट्टींच्या म्ह्णण्यानुसार नांदणी मठाला हत्तीणीच्या बदल्यात दोन कोटी देणगी /किवा मठाचे बांधकाम ही ऑफर दिली आहे ती पेटाच्या खूशबू गुप्ता ह्यांनी. आणि पेटा स्वतः सांभाळ करणार नाहीचेत. मग कुणाचे दोन कोटी? कशासाठी अशी सुपारी? प्लान्ड सिस्टिमॅटिकली लीगल एनकाउंटर झाले हे लिटरली. .

In reply to by अभ्या..

स्वधर्म 06/08/2025 - 18:37
खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. भक्तांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय का? Stockholm syndrome is a psychological response where hostages or abuse victims develop positive feelings and an emotional bond with their captors or abusers. It's a coping mechanism where victims align with their captors to reduce the perceived threat and increase their chances of survival. The term originated from a 1973 bank robbery in Stockholm, Sweden, where hostages formed an emotional bond with their captors.

In reply to by स्वधर्म

नागरिक कधी जागे होणार
? 2029 च्या निवडणुकांच्या नंतर. कारण तो पर्यंत तुम्हाला असले धागे काढायला काहीना काही खुसपट कारणं मिळतच राहतील ! बाकी मुख्यमंत्री श्री. फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हत्ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. शिवाय सरकार हत्तीला सुविधा पुरवणार म्हणे . #लाडकी हत्तीण योजना मुंबईत देखील सरकारी खर्चाने कबुतरांना खायला देणार आहेत म्हणे =)))) त्यावर एक लेख पाडा की आता. फुल मजा आहे पुढील काही वर्षे =))))

रामचंद्र 06/08/2025 - 22:49
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी असे कोणीच म्हणत नाही. मुख्यमंत्रीसुद्धा जनभावना जपण्यासाठी सरकार मठाच्या बाजूने आहे, असेच म्हणत आहेत. लोकांचा विरोध एक धनदांडगा सरकारला आणि एका संस्थेला हाताशी धरून बळजबरीने हत्तीचे अपहरण करत आहे, या गोष्टीला आहे. त्या मठाच्या निमित्ताने लोक हत्तीमागे तरी उभे राहिले. गडचिरोली जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीकाठचे हत्ती गुजराथला कधीच पोहोचले पण त्यांच्यासाठी कुणी लढा दिला नाही. मुळात मठात हत्तीला बरे वाटते की नाही, हे समजत नाही. पण गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. मग त्यांना उचलून गुजराथमध्ये नेणे, हे तर नक्कीच चुकीचे म्हणता येईल. खरे तर या बाबतीत मेनका गांधींनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. पण पक्षश्रेष्ठींपुढे काही चालत नसावे, किंवा मुलाच्या वाटचालीत अडथळा नको म्हणून गप्प बसावे लागत असावे. आणि केरळमधल्या त्या aty

गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. सहमत,असतीलही परंतू संख्या जास्त झाली,किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. हत्ती पोसणे किती खर्चिक आसते हे वेगळे सांगावयास नको. मठाकडे भरपूर पैसा असणार. मठ,साधू,संन्यासी निसंग,निर्मोही असायला पाहिजेत पण ते तर संस्थानिका पेक्षाही मोठे. अफ्रिकेतून बिबटे आणले व मध्यप्रदेश मधे सोडले तेव्हांही कुणी आवाज उठवला नाही. एवढी आरडाओरड फक्त राजकिय दृष्टीकोनातून आहे. बाकी व्यक्ती परत्वे वेगळा दृष्टिकोन असणार पण व्यक्तीद्वेश मात्र असू नये.

हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? आपण सर्व मिपाकर मिळून एक छोटा हत्ती पाळुयात, तो मोठा झाल्यावर अंबानीला विकून पैसा कमावू, मिपावर तसेही अनेक रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते हत्तीची निगराणी करतील, हत्तीला मूवी काकांच्या शेतात ठेवू, डॉक खरे हत्तीची तब्येत पाहतील, चंद्रसूर्यकुमार अर्थतज्ज्ञ आहेत जमा खर्चाचा हिशेब ठेवतील.

कंजूस 07/08/2025 - 13:28
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत घेतला तर आपल्या पोटात का दुखावे? रानटी हत्ती पाळीव करण्यासाठी क्रूरपणा करतात हे मान्य . पण अशा पाळीव प्राण्यांना/ हत्तींना पिल्ले होतात ती अगोदरपासूनच पाळीव असतात. दक्षिणेत बऱ्याच देवळांत असे हत्ती आहेत आणि त्या देवस्थानाला दिलेल्या देणग्यांतून हत्तींचा खर्च भागतो. पिढ्यानपिढ्या माहूत असतात आणि त्यांचे हत्तींशी संबंध फारच कौटुंबिक असतात. या देवळातल्या हत्तींकडून काही लाकडाचे ओंडके ओढणे वगैरे काम नसतं. देवळांत आठ ते बारा आणि पाच ते सात उभे राहून भाविकांना आशिर्वाद देणे हेच काम. आता प्राणी कोणताही म्हटला की त्याला आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू आलेच. महाराष्ट्र सरकारने ती हत्तीण अंबानीकडून परत आणली तरी जैन मठवाले घेणार नाहीत. मग सांभाळणार कोण? मठवाल्यांना हा हत्ती नव्हे तर एकूण हत्तीच ठेवायचा नसेलही. म्हणून तो निर्णय घेतला असेल.

स्वधर्म 07/08/2025 - 13:48
लोकसत्ताची बातमी: https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-public-representatives-welcome-vantaras-stance-on-returning-elephants-phm-00-5286136/ 'जनभावना लक्षात घेऊन' असे सर्व लोक, वनताराचे मु. का. आ. इ. म्हणत आहेत. १० हजाराहून जास्त जिओ सिम परत करणे, रिलायन्सच्या पंपावर पेट्रोल न भरणे याही गोष्टी 'वर' पर्यंत गेल्या असतीलच.

In reply to by स्वधर्म

गाव करील ते राव काय करील? पैसा, सत्ता, अंबानी, पेटा नी माजलेले सत्ताधीश नी त्यांचे मीपावरील समर्थक ह्यांच्या नाकावर टिच्चून लढा देऊन हत्तीण परत आणाऱ्या कोल्हापूर करांचे अभिनंदन! :) हत्ती पळवणारी टोळी तरीही सुधारेल असे वाटत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

करणार शंभर टक्के अभिनंदन करणार ! फक्त हत्ती परत यायची वाट पहात आहे. एकदा का हत्ती परत आला की मिपावर लेख लिहिणार ! अहो लोकोत्तर असा हा क्षण आहे, असेल. धर्मसत्तेने राजसत्तेवर मिळवलेला विजय असेल हा . आजवर सरकारने शाहाबानो साठी सुप्रीम कोर्टाला तोंडावर पाडल्याचे पाहिले होते, आता पहिल्यांदाच "जनभावनेचा" रेट्याने "महादेवी" साठी देखील सुप्रीम कोर्ट आणि सर्व व्यवस्था चारीमुंड्या चीत करता येऊ शकते हे सिद्ध होईल. आता हत्ती परत येण्याची वाट पाहूयात फक्त !

कपिलमुनी 07/08/2025 - 13:57
उद्या एखादे गरीब आईवडील मुलांची काळजी घेउ शकत नसतिल तर सरकारने मुलांची पण सोय करावी .. ती पोरे पण काढून घेऊन कोणाला तरी संभाळायला द्यावीत ( परदेशात अशी सोय आहे म्हणे )

रामचंद्र 07/08/2025 - 22:30
मठाची हत्तीण यावरून आठवलं, पूर्णचंद्र तेजस्वींची उमा कुलकर्णी अनुवादित 'कृष्णेगौडाची हत्तीण' कुणी वाचली आहे का? अस्सल भारतीय परिस्थितीचं वास्तव हसतखेळत उभं केलं आहे. अंदाजे वीसएक वर्षांपूर्वी एका साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.

Bhakti 08/08/2025 - 11:27
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल. प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतीलः सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल
. -माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 08/08/2025 - 13:19
बरं मग,या वनतारा आधी अशा हत्तींना ज्या ठिकाणी उपचारांसाठी पाठवले जायचे तिथे माधुरीला या आधी का पाठवले नाही? वनतराला हत्ती बळकावयाचे असतील तर ,तिथल्या सगळ्याच हत्तींना बरं झालं की तिथून जंगलात पाठवा यासाठी आंदोलन का नाही करावं मग? एकाच हत्तीसाठी काळेबेरे वाटत नाही का?

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 12:56
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.

In reply to by अभ्या..

Bhakti 08/08/2025 - 16:07
अच्छा वनतारा पार्ट -२ का? घ्या आता, महाराष्ट्राने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे का मग?
फक्त तेवढाच विषय नाही हो जर त्या हत्ती ची एवढीच काळजी होती, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर तिला 1.एकदाही मातृ सुख का दिलं गेलं नाही 2. तिला पैसे मिळतात म्हणून बाहेर भाड्याने का दिलं गेलं 3. अंकुश टोचणे गरजेचे आहेस का. 4. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे त्यात मादा प्रमुख असते मग तिला तसं का राहू दिलं नाही किंवा तसा प्रयत्न का केला गेला नाही. 5. हत्तीचे तळवे हे डांबरी रोडवर किंवा सिमेंट रोडवर किंवा दगडावर चालण्यासाठी किंवा राहण्यासाठी बनलेले आहेत का. 6. हत्तीचा अन्न कोणतं तिला पेढे किंवा शिजवलेले पदार्थ भरवणे योग्य आहे का आता सरते शेवटी आला वनताराचा मुद्दा.... आठवते का बघा . वनमंत्र्यांनी वनतारा च्या धर्तीवर सूर्यतारा सुरू करण्याचे संकेत आधीच दिले आहेत आणि त्यातही हे सूर्यतारा अंबानी किंवा अदानीकडे सोपवणार असेही सांगितले होते. आता विचार करा कोणी कोणाच्या खांद्यावर कधी कशी केव्हा बंदूक ठेवली आणि कोणाला गोळी मारली निमित्त नांदणीचा हत्ती आणि इप्सीत सांगली_कोल्हापूर मध्ये वनतारा पार्ट टू........ #copied

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 13:13
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?

In reply to by अभ्या..

Bhakti 08/08/2025 - 13:27
हत्तीण म्हातारी झाली आहे ओ,जंगलात डायरेक्ट कसं पाठवणार.आणि पाठवलं तरी काही अडचणी येऊ शकतील.तज्ञांचे मत हा तर प्रकारचं गावकरी,मठावाले पाहत नाहीयेत.

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 15:05
मठाने ३३ वर्षांपूर्वी हत्तीचे पिल्लू आणले होते. हत्तीचे आयुष्यमान ७०+ वर्षे असते. म्हणजे माधुरी चाळीसच्याही आत आहे. मी वर दिलेलाच व्हिडिओ पुन्हा पहा Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता? यात ३ मिनिटानंतर सांगितल्याप्रमाणे वनताराने पद्मावती हत्तीण ही आसाममधून हजारो किमीचा प्रवास करून जेंव्हा वनताराला नेली, तेंव्हा ती ५५ वर्षांची असून गरोदर होती. तिचा हा सगळा प्रवास गरोदर अवस्थेत केला गेला. त्यामुळे माधुरी हत्तीण म्हातारीआहे असे म्हणता येणार नाही. पण तुंम्ही वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा: जानेवारी २०२५ मधील बातमीनुसार वनताराने अरूणाचल प्रदेशमधून एका वेळेस २० हत्ती नेले आहेत. त्यात एक बछडाही होता. आता हे सगळे हत्ती अर्थातच म्हातारे नाहीत. २०२१ पासून वनताराने ३९ हत्ती फक्त अरूणाचल प्रदेश मधून नेले आहेत. आजमितीला सदर याचिकेच्या बाबत वनताराने स्वतःच कोर्टात त्यांच्याकडे असलेल्या हत्तींची संख्या २३८ सांगितली आहे. तरी पण तुंम्ही या प्रकाराकडे इतकं सरळ बघत असाल तर, अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे खूप भाबडा किंवा पक्षपाती दृष्टीकोन आहे. बाकी मठातील लोक काळजी घेतात का? घेऊ शकतात का, हे तज्ञच ठरवू शकतील. पण दोन बाजू मठाच्या बाजूच्या आहेत. १. माधुरी तिथे गेली ३३ वर्षे जगली आहे. २. गावकृयांचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे. नाहीतर कोण पूर्ण वर्षाचा रिचार्ज भरला असताना जिओचा फोन परत करेल? टीपः असे असले तरी हत्ती हा कळपात रहाणारा व जंगली प्राणी असून त्याला एकट्याला माणसांनी व मानवी वस्तीत पाळणे, मग त्याच्यावर कितीही प्रेम असले तरी अन्यायकारक आहे. बाय द वे: भारत सरकार ला एक वनखातं असतं, त्याला एक मंत्री असतो. त्यात अनेक आय एफ एस अधिकारी बंगला गाडी व नोकर दिमतीला असे रहातात असे ऐकून आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही का?

In reply to by स्वधर्म

Bhakti 08/08/2025 - 15:48
बरं ती म्हातारी नाही ? ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,जे वयानुसार नाही नसेल पण अकाली म्हातारपणासारखेच आहे. पण आजारीही नाही का? का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.पण वनतारा हे मुद्दामहून हत्ती बळकावत आहेत तर सर्वच हत्तींची वनिताला मधून थेट जंगलात मुक्तता करावी यासाठी आता माणूसकी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोहिम उघडावी. तिला कोल्हापूरला आणून काय हाशील होणार‌ काय माहिती? परत तेच म्हणते "झेपत नाही तर हत्ती पाळू नये" आणि वनताराला सांगेन की "कशाला पैशे वाया घालवता,ज्याचा हत्ती ते पाळतील नाहीतर भाड्याने देतील , तुम्हाला काय करायचं?कशाला हत्तींना ५ तारांकित सुविधा देता,जाऊ द्या की उडत"

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 16:14
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता. म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अ‍ॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्‍यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 16:26
>> का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? या व्हिडिओत स्पष्ट सांगितलेले आहे, की वनविभागाच्या डॉक्टरांचा महादेवी निरोगी असल्याचा रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला व हाय पेटाच्या याचिकेनंतर पॉवर कमिटी नेमण्यात आली होती, त्यांनी वेगळा रिपोर्ट दिला. Nandni Elephant Kolhapur: जैन मठातील हत्ती अंबानींच्या वनतारात, नांदणीच्या महादेवीचं काय होणार? बाकी >> ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते या बाबत मी आधीच सहमती नोंदवली आहे. पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही? अख्या भारतातून हत्ती कसे वनताराला नेले जात आहेत, याचे वर दिलेले संदर्भ तरी बघा. Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?

In reply to by स्वधर्म

Bhakti 08/08/2025 - 16:43
घटनाक्रम असा आकलनात येतोय. म्हणजे माधुरी ठणठणीत होती,तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. पुढे गावकऱ्यांनी आंदोलन केले ,ओके आता हत्ती परत गावात येणार ,ओके पण २०० एकर जागा महाराष्ट्राची बळकवणार(जे आता सांगितले जात आहे),नॉट ओके आता मठाने सरळ कोर्टात जाऊन हत्ती बरा झाला की सरकारी/मोकळ्या जंगलात सोडावा अशी केस करावी.तर खरंच सर्व हत्तींना न्याय मिळेल.
पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही?
अहो,आजारी माणसाला थेट जंगलात सोडता येते का?(तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजारी असल्याचा रिपोर्ट खोटा पण आरोग्याविषयी कोणतीच रिस्क आजारी असणाऱ्यांच्या जवळची व्यक्ती घेत नाही,या दृष्टिकोनातून मी तिला मानसिक आजारी (एकटी) तर नक्कीच समजते) नाही मग वनतारात जायची वेळ यायच्या आधी आम्हाला ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा हा मोठेपणा सर्वांनी ज्यांनी हत्ती पाळला त्यांनी घ्यावा ,हीच आता कळकळीची विनंती आहे. थांबते आता,माधुरी देव तुला खूप आरोग्यदायी आयुष्य देवो! _/\_

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 16:53
>> ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा याबाबत मी आधीच सहमत आहे. गावकर्‍यांचे कितीही प्रेम असले तरी जंगलातील राहणे तिच्यासाठी मठापेक्षा चांगलेच आहे असे मी अनेकदा म्हटलेच आहे. >> तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. याला तुंम्ही ओके म्हणत आहात, माझेही तेच म्हणणे होते.

In reply to by Bhakti

अभ्या.. 08/08/2025 - 17:01
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्‍यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.

In reply to by स्वधर्म

कॉमी 09/08/2025 - 18:53
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे हत्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जातीये असे असेलच असे नाही. कितीही प्रेम असले तरी शेवटी हत्तीची काळजी घेण्याचे कसब, रिसोर्सेस त्यांच्याकडे असतीलच असे नाही. एकूण हया चर्चेत मला असे वाटले - अंबानीचे नाव आल्यावर जे कोणी "मठात हत्तीची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही" असे मत देणाऱ्या सगळ्या संस्था, व्यक्ती ऑटोमॅटिकली बायस्ड आहेत असा सूर जाणवला. हे फारसे पटले नाही. समाजमाध्यमांत दिसणाऱ्या फोटो आणि व्हिडीओज वरून मठात हत्ती टूणटूणीत आहे असा निष्कर्ष घाईघाईचा वाटतो.

In reply to by कॉमी

स्वधर्म 09/08/2025 - 21:37
बरोबर! प्रेम असणे वेगळे, काळजी घ्यायची क्षमता असणे वेगळे व हत्तीसाठी माणसांत रहावे लागते हे ही वेगळे! हा लेख लिहिताना मलाही फक्त मठ व नांदणीचे गावकरी यांच्यावर अन्याय झालाय असे वाटत होते. पण जसजशी चर्चा पुढे गेली तसतसे काही सदस्यांच्या प्रतिसादामुळे हत्तीवरही कसा अन्याय होत होता हे लक्षात आले. मिपाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्थात आपले म्हणणे अधिक माहिती मिळाली तर बदलण्याची लवचिकता हवी. हे सगळे केवळ माणसाच्या हट्टासाठी, भावनेसाठी व हौसेसाठी असते असे लोकसत्ताचा आजचा अग्रलेख म्हणतो. माधुरी हत्ती व मुंबईतली कबुतरे या दोन वादांच्या संदर्भात. भूतदयेचे भूत

कपिलमुनी 08/08/2025 - 14:37
पुष्पक विमानातून फिरत असताना राधिका नामे भार्येने अनंतास पृच्छा केली , ही खाली गर्द हिरवी वनराई दिसते ती कोणती बरे ? अनंत वदला , करवीर नगरीहून काही कोस दूर असलेले हे राधानगरी नावाचे निबिड अरण्य आहे , इथे वेगवेगळे पशु पक्षी रहतात, त्या अरण्यावर मोहीत होउन ती स्त्री म्हणाली, नाथ ..मजला या अरण्यात निवास करायचा आहे . अनंत करवदला, "करवीर नगरीची माणसे लई वांड ! हित पैसा नाय माणुस्की बघत्यात".. नाथाचे हे बोलणे ऐकून राधिका रुष्ट झाली .. भार्येचा म्लान मुखकमल पाहून अनंतास गमेना.. सर्व पिझ्झा , बर्गर त्यास तॄणासमान भासू लागले.. अरण्य तर हवे पण कोल्हापूरकर तर लैच हार्ड अशी त्याची द्विधा मनस्थिति झाली.. तेव्ढ्यात त्याला नारदमुनींची आठवण झाली.. फोन फिरवताच मुनी हजर झाले , मनीची व्यथा ओळखली .. म्हणाले, राजन , अशी स्कीम करा की कोल्हापूरकरांनी २००-३०० एकर स्व:ताहून तुम्हाला द्यायला हवी.. नारदाने अनंताशी कानगोष्ट केली आणि गालातल्या गालात हसत अंबानी पुत्राने पेटास्त्र बाहेर काढले .. --------------------------------------------------------------- बाकी तुम्ही सूज्ञ आहातच .. आता वनतारा पार्ट २ सूरू झाला की भेटू

In reply to by कपिलमुनी

Bhakti 08/08/2025 - 15:00
तुमच्या जंगलात नेऊ नका, आमच्याकडे मोकळी जागा मागू नका.साखळदंडात राहू द्या हत्ती ,एकटा रडत डोलत. ह्यांना म्हणे माणूसकी,आणि म्हणे अंबानीच तेवढा व्यापारी!! झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??

In reply to by Bhakti

स्वधर्म 08/08/2025 - 15:12
आपल्या प्रतिसादाची चुकामूक झाली. पण हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासाशिवाय व एकटे ठेऊ नये याबाबत सहमत आहे. प्राण्याच्या लैंगिक सुखावर माणसाच्या हौशीसाठी घाला घालणे कमालीचे क्रूर आहे. पण... वनताराच का? केरळ, काझीरंगा, अरूणाचल, आसाम, त्रिपुरा ही भारतीय वनखात्याच्या अखत्यारितील ठिकाणे का नकोत?

In reply to by स्वधर्म

कॉमी 09/08/2025 - 18:57
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला तर जगणार नाही. वनतारा मध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक अधिवास आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल.

In reply to by कॉमी

अभ्या.. 09/08/2025 - 20:17
ओह्ह्ह्हो, जरा उशीर केला मालक तुम्ही. हत्ती तर परत येणारेच आहे, सोबत नांदणीला सरकारमान्य अंबानींच्या वनताराची सॅटेलाईट सेंटरची ग्रँड ऑफर घेऊन आलाय. नुसती लक्ष्मी न्हाई, गजान्तलक्ष्मी हाय गजान्तलक्ष्मी..

In reply to by कॉमी

हत्तीच्या तब्येतीची काळजी वनताऱ्याला पळवून नेल्यावरच कशी झाली? आणी खरोखर काळजी असेल तर वनताराच का? स्थानिक डॉक्टरनी हत्तीची तब्येत चांगली आहे असा रिपोर्ट दिला, तरीही तो रिपोर्ट झिडकारून सत्तेचा गैरवापर करून हत्ती पळवणे समर्थनीय का?

In reply to by कॉमी

स्वधर्म 09/08/2025 - 21:45
मलाही एका वन्यजीवांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने सांगितले की जंगली हत्तींना सगळी झाडे, पाणी, खायला कुठे मिळेल व त्याच्या वाटा माहित असतात. ऋतूमानानुसार हे सगळे त्यांना माहित असते. त्यामुळे एका हत्तीला सोडले तर तगेल की नाही हा प्रश्नच आहे. एकट्या नंतर सोडलेल्या हत्तीला इतर हत्ती कळपात सामावून घेतील का हाही प्रश्नच आहे.

In reply to by Bhakti

रीडर 09/08/2025 - 22:38
या मठ, गावकरी वगैरे लोकांचा कांगावा बंद करून हत्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जिथे नीट काळजी घेतली जाईल तिथेच तिला राहू द्यायला हवं. या लोकांनी तिची काळजी काय घेतली ते दिसतयंच. वनतारा मध्ये या मठापेक्षा नक्कीच चांगलं आयुष्य मिळेल तिला. स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना त्रास देणं बंद करायला हवं.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला.

रूढी, समजुती, परंपरा व त्यामागची संभाव्य शास्त्रीय, तार्किक कारणे

सौन्दर्य ·

बोलबोलेरो 18/02/2020 - 10:59
सुन्दर धागा! मलाही असेच वाटते. अशी एक परम्परा म्हणजे, स्नानाआधी तेल लावणे, माखू घालणे. त्यामुळे, त्वचेत व शरीरात पुरेशी आर्द्रता राखली जाते, व संभाव्य त्वचाविकार अस्थीविकार टाळता येउ शकतात. स्वानुभव आहे!

आम्ही मित्र मित्र श्रमपरिहराल बसलो की प्रत्येक जण ग्लासामधले द्रव्य बोटाने चार थेंब चारी दिशांना शिंपडतो. आपल्या भोवताली घुटमळणारे अतृप्त आत्मे हे थेंब पिउन तॄप्त व्हावे व कार्यक्रम सुरु असताना त्यांनी एखाद्या कार्यक्रमार्थीला झपाटू नये असा त्या मागे उद्देश असावा. तसेच बाटलीतले सगळे द्रव संपले की बाटलीला बुच लावून ती उपडी करुन ठेवायची व पाच दहा मिनिटांनी उघडून झाकणात जमा झालेले शेवटचे सात आठ थेंब एखाद्या अविवाहीत मित्राला पाजायचे अशी एक पध्दत आहे. अविवाहीत मनुष्याचे लवकरच लग्न व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करण्याची ही एक पध्दत असावी. एखाद्याला चैतन्य चुर्ण देताना ते बोटांच्या चिमटीत पकडुन देत नाहीत तर ते हातावर ठेवुन हात पुढे करायचा असतो व घेणार्‍याने ते देणार्‍याच्या हातातुन चिमटीने घ्यायचे असते. असे केल्याने मैत्री वाढते असे म्हणतात. जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर. चैतन्यकांडी पण दुसर्‍याला देताना ती दोन बोटाच्या बेचकीत न पकडता चिमटीत पकडुन द्यावी असे पूर्वज सांगून गेले आहेत. धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा. अजून आठवले की लिहितो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि 18/02/2020 - 12:39
धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा.
कांडी दिल्यास त्याला आयुष्यभर जे चटके बसतात ते टाळण्यासाठी काही रुढी?

In reply to by गवि

माहितगार 18/02/2020 - 13:17
चैतन्यचूर्णाचा विडे वाटावेत, चैतन्य विड्याच्या चैतन्य पिंकावाटे कफाचा सुकार पसरुन कांडीने फुप्फुसात पसरलेल्या उष्णतेस थंडावा देतो . आपल्याला फुप्फुसातील थंडी इतर फुफूसात पसरवण्यासाठी उबळ दाबू नये अशा काही प्रथा पाळल्याकी झाले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सौन्दर्य 20/02/2020 - 00:41
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सौन्दर्य 20/02/2020 - 00:42
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.

माहितगार 18/02/2020 - 13:02
अंधश्रद्धा निर्मुलनवादी किती कोकलले आणि त्यांनी स्वतः स्विकारले नाही तरी त्यांच्या स्वतःसहीत तर्कापेक्षा, संबंधीत व्यक्ती प्रभावित होणार्‍या व्यक्तीकडची अतर्क्य वक्तव्ये आणि अंधश्रद्धा अधिक चटकन खपतात. सर्वसाधारण व्यवहारात भावना तर्कपूर्णतेला सहज मात देते. कोणतीही संस्था त्यात धर्मसंस्था आली (कोणताही धर्म आणि विशेषतः हिंदू धर्म एक चांगले उदाहरण आहे) तर्कपूर्ण माणसाने मांडलेल्या केवळ तर्कांवर धावत नाही प्रत्यक्षात दैनंदीन जिवनात अंधश्रद्धा बाळगणारे धर्मसंस्था टिकवून असतात. अतर्क्य विधानांचे तर्कपूर्ण अथवा अतर्क्य समर्थन कसे करायचे ते संबंधीत समुदाय बघून घेत असतो. रांगोळीने वातावरणास प्रसन्नता आणि सौंदर्य लाभते . फारतर कलाकारास आपली कलात्मक अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळते हे म्हणणे पुरेसे असावे. पण या तर्काचा क्रम वर येण्याच्या आधी १) पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे जीव घरात शिरकाव करू शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. २) तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणार्याला कळत असावे. हे लौकर खपते यातही काही तर्क आहे यास अधिक अतर्क्य केले तर कदाचित अधिक चटकन खपेल. एखादी प्रथा काही व्यक्ती कुटुंबे समुह पाळतात तेव्हाच काही जाणीवपूर्वक पाळत नाहीत, अंधश्रद्धा चटकन खपते हा नियम एखादी प्रथा न टाळली जाण्याबाबतही तेवढाच लागू शकत असावा.

माहितगार 18/02/2020 - 13:34
दिवेलागणी नंतर केर काढू नये यात धागा लेखातील पहिला तर्क - मौल्यवान गोष्ट अनवधानाने अंधारात बाहेर टाकली जाऊ नये - ह्या कारणाची शक्यता अधिक पण तरीही धागा लेखकाचा तर्क क्रमांक २ चटकन खपेल, सरपटणारा प्राणी डिवसेल या कारणाने दिवेलागणी नंतर केर न काढता डिवसणारा प्राणी तसाच राहुदेणे तर्कशुद्धतेवर घासल्यास टिकत नाही, झोपलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते त्यामुळे डिवसणारे प्राणी घालवले जावेत म्हणून दिवेलागणी नंतर झोपण्याआधी केर काढणे श्रेयस्कर असा तर्क ही मांडता येऊ शकतो. अशा तर्क-मुल्य-मांडणी अंशतः स्थलकालसमुह सापेक्ष असतात. महाभारत काळात कंबरेच्या खाली शस्त्राचा वार करु नये व्यक्ती जिवंत राहील्यास त्याला किमान कुठे जाता आले पाहीजे या मुल्यास प्राधान्य होते. आताच्या काळात पायावर गोळी मारा कंबरेच्या वर वार करु नका पंगु झाला तर ठिक व्यक्ती जगली पाहीजे असा विचार आहे. तसे पहाता दोन्ही मांडणी परस्पर विरोधी आहेत आताच्या काळातला महाभारत वाचताना मनोमन तत्कालीन प्रथेचे आपोआप समर्थन करतो, आणि तिच व्यक्ती आजच्या काळात गोळी पायावर न मारता पूर्ण एनकाऊंटर का केला असा प्रश्नही विचारते. आणि माणूस स्वतःच्या तत्वातली अशी काँट्राडीक्शन्स घेऊन सहज जिवन कंठत असतो.

In reply to by माहितगार

महासंग्राम 19/02/2020 - 14:34
पलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते
हे वाक्य वाचुन भुलभुलैय्या मधला रसिका जोशी चा झाडू वाला प्रसंग आठवला :)

चौकस२१२ 18/02/2020 - 14:58
सुन्दर धागा! समाजात दोन टोके दिसतात दुर्दैवाने १) "हे असेच असते पूर्वीपासून" म्हणून प्रश्न विचारू नका, पाळा आणि नाही पाळलेत तर तुम्ही धर्मविरुद्ध म्हणून समोरच्याला ला झोडपणारे २) सगळे जे आहे त्यामागे काही तर्क असेल हे विचारात ना घेता झोडपणारे आणि खास करून ज्यांना फक्त हिंदू धर्मातील प्रथातच खोट दिसते असे अति टोकाचे अंधश्रदनिर्मूल वाले ( सर्वच नाही )

योगी९०० 18/02/2020 - 20:40
छान विषयावर धागा... माझ्यामते हिंदू धर्मात कोणी एकमेकांना भेटल्यावर शेकहँन्ड न करता हात जोडून नमस्कार करणे ही प्रथा आहे त्या मागेही शास्त्रीय कारण असावे. एकमेकाला स्पर्श न करता उगाचच रोगराईचा प्रसार होऊ नये हा उद्देश असावा. मला अजूनही कोणालाही शेकहॅन्ड करायला आवडत नाही. कारण त्या व्यक्तीने त्याचा हात आधी कोठे वापरला असेल काय माहीत? उगाच जखम खाजवली असेल किंवा नाका तोंडात बोट घातली असतील.

In reply to by योगी९००

माहितगार 18/02/2020 - 21:06
अंशतः सहमत. अगदीच अस्पृश्यताही समर्थनीय ठरत नाही त्याच वेळी युरोपीय ज्या नव्या वसाहतीत गेले अशा अनेक वसाहतींमध्ये युरोपीय नव लोकसंपर्कातून वीषाणू जिवाणू बाधा होऊन इम्यूनिटी नसल्याने साथीचे आजार पसरुन अख्खी लोकसंख्या नामशेष झाली ते ही सयुक्तीक ठरत नाही. काही वीषाणू संक्रमण अटळ असते शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीस काही पर्याय नाही. सरसकट अस्पृश्यतेत रुपांतरण न करता किमान आजारी आणि अशक्त व्यक्तींनी शेकहँड टाळणे ठिक. कारण हात स्वच्छ असतील तरीही श्वसना वाटे वीषाणू संक्रमणाचा धोका शिल्लक रहातो. इतर सशक्त व्यक्तिंनी पुरवी प्रमाणे अभ्यागतांचे स्वागत हात पाय धुण्यासाठी गरम पाणी साबण देऊन करावे आणि नंतर हस्तांदोलन करावे असे वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक 19/02/2020 - 12:18
रूढी, परंपरा आणि कर्मकांडे यात सतत नवनवीन गोष्टींची भर पडताना दिसते. त्यात जगभरच्या इतर संस्कृतीमधून घेतलेल्या उसन्या प्रथांचाही समावेश होत चाललेला आहे. खर्चिक, दांभिक आणि निरूपयोगी गोष्टी तर आधुनिक कर्मकांडांमधेही असतातच. (प्री वेडिंग शूट, तथाकथित टीम बिल्डींग अ‍ॅक्टिव्हिटीज , कंपनीच्या खर्चाने केलेले नाईट आउट, बेबी शॉवर, व्हेलेंटाईन डे, हॅलोविन डे, अमुक डे तमुक डे, लग्नप्रसंगी वराची चप्पल पळवणे, आंतरपाट मधे असताना वराने वधूला उजलून घेणे, सोवळ्या ओवळ्यासारखे स्थानमहात्म्य दर्शक आधुनिक टाय डे, ब्लेझर डे सारखे ड्रेस कोड पाळणे, फीत कापून उद्घाटन करणे, संचलणे आणि कवायती इ.). यात अमुक एक संस्कृती आणि अमुक एक धर्माचा संबंध दिसला की अन्यायकारक किंवा शोषणपूरक नसलेल्या प्रतिकात्मकतेला देखील एक ठराविक समाजघटक कडाडून विरोध करताना दिसतो हे गमतीशीर वाटते. असो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 19/02/2020 - 15:25
.... ‘आपण पाळत आलेल्या किंवा आसपास दिसण्यात येणाऱ्या...
सद्य वर्तमान काळ, भूतकाळातील तत्कालीन वर्तमानकाळाबद्दल सकारात्म्कता, सांस्कृतिक परंपरांच्या ठेव्यातील सकारात्मक उद्दीश्टे शोधण्याचा, न्हाऊ घातलेल्या पाण्यातील बाळ फेकले जाणार नाही याचा रचनात्मक प्रयत्न धागा लेखातून दिसून येतो
अनेक कालबाह्य रुढी व परंपरा संस्कृतीच्या/धर्माच्या नावाने गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात. शास्त्र असतं ते! ;)
घाटपांडे साहेबांच्या समतोल दृष्टीकोण सहसा मला भावतो, बाळाला न्हाऊ घातलेले पाणी टाकले जावे संस्कृती आणि समाज अधिक उन्नत व्हावा म्हणून टिका नक्कीच गरजेच्या असतात त्यांचे स्वागत करावयास हवे पण न्हाऊ घातलेले पाणी फेकुन दिल्या नंतर एक बाळ शिल्लक रहाणार असते त्याकडे दुर्लक्ष करण्याची टिकाकारांची अपेक्षा कितपत रास्त असते ? १९ व्या शतकातले २० व्या शतकात, २०व्या शतकातले काही सुधारणा संशोधन २१ व्या शतकात बाद होणार असते म्हणजे १९ अथवा २० शतकात झालेल्या सुधारणा आणि संशोधनाच्या उद्दीष्टात तत्कालिन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादेत झालेल्या प्रयत्नांचे उद्दीष्ट्ये सकारात्मक आणि शास्त्रीय म्हणजे गिव्हन अंडरस्टँडींगमध्ये लॉजीकल आणि पद्धतशिर नसतीलच असे नव्हे. हे डिस्काऊंटींग अंडरस्टँडिंग आम्ही १९ वा २० व्या शतका बाबत दाखवू शकतो तर प्राचीन काळाबाबतही तत्कालीन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन का दाखवू नये. ऋग्वेदात बहिणीच्या प्रस्तावास नकार देणारा यम, इंद्रपूजा नाकारुन पर्वत पूजा श्रेयस्कर असल्याचे सुचवणारा कृष्ण, शेतीच्या आर्थिक वृद्धीसाठी गाईं-बैलांचे सेवन करण्याचे थाबंवणारा समाज, ईश्वराच्या नावाने अर्चांसाठी केल्या जाणारे प्राणी बळी थांबवण्यासाठी चळवळी प्रमाणे झटणे, अद्वैत सिद्धांत, काम्य व्रतांना नाकारून इश्वराच्या नावाने कर्मयोग सांगणे, सत्यं शिवम सुंदरम, अहं ब्रह्मास्मी , कराग्रे वसते लक्ष्मी, शुभम करोती पसायदान, अशी महा वाक्ये प्रचलित करणे या त्या त्या काळाच्या उपलब्ध मर्यादेत झालेल्या सुधारणाच असतात. घरात येणारी नवी सून धनधान्याने भरलेला तांब्या पायाने लवंडते यात धान्याची नासाडी पहाणार की घरात येणार्‍या नव्या सदस्यांच्या छोट्या मोठ्या चुकांचा बाऊ न करता घरातील आपले पणाचा आधिकार पहाणार ? भाकरीचा तुकडा ओवाळून टाकताना नसलेली नजर काढण्याचे अंधश्रद्धात्मक औचित्य आजच्या काळात शिल्लक नसेल कदाचित पण अंधश्रद्धेच्या मर्यादा लक्षात ठेऊन केवळ प्रेमापोटी काढलेल्या नजरेच्या कृती मागचे अनमोल प्रेमाची अनुभूती केवळ तर्कांच्या हट्टांसाठी त्याज्य करावी काय? किंवा व्यक्तिंना वेळोवेळी ओवाळणे असेल. ओवाळल्याने अथवा आशीर्वाद दिल्याने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यात यशस्वी होतेच असे नाही तर्कांची कसोटी कडक केली तर शुभ शब्दातील शुभ शब्दच नव्हे तर सकारात्मक इच्छांना ही अर्थ कारण त्रयस्थाच्या इच्छा केवळ इच्छा असतात त्यांचे भविष्यातील घटनाक्रमाशी आणि फलिताशी नात्याची ग्वाही देणे कदापी संभव नसते म्हणून सदिच्छा व्यक्त करणे आशिर्वाद देणे आशिर्वाद देताना चार रंगित तांदूळाचे दाणे फेकणे ओवाळणे इत्यादीतील प्रसन्नता मानसिक समाधान आनंद विश्वास यांचा प्रत्यय थांबवणे खरेच गरजेचे आहे काय ? कुंकू अथवा टिकली टेक्निकली यात शृंगार तरी आहे. पुरुषांनी कपाळावर गंध लावणे अंधश्रद्धेच्या यादीत सहज ढकलता येते त्यात नटण्याचाही उद्देश्य नसतो. कालच्या हिशेबाने कुंकू गंधाचा सांस्कृतिक शिरकाव कदाचित अंधश्रद्धेनेही झाला असेल. पण कपाळावरील कुंकू आणि गंधामुळे स्त्रीपुरुष संवाद-काळात कपाळ व डोळ्यांवर लक्ष केंद्रीत ठेवणे सोपे होऊन ऑगलींगच्या शक्यता कमी रहात असतील - (मी पडदा पद्धतीचा समर्थक नाही हे यावेळी नमुद करतो) आणि प्रथेचे उपयुक्तता आणि सौंदर्य मुल्य असेल तर प्रथा केवळ जुनी आहे म्हणून दडपण्यात काही अर्थ असेल का ? डोक्यावरच्या पदराचे अट्टाहास पुरुषसत्ताकतेचे निदर्शक म्हणून मागे टाकणे श्रेयस्कर असले तरी, नवीन कितीही पोषाख आले तरी नऊवारीसाडीचे स्त्री संदर्भात उपयुक्तता मुल्य कसे कमी होते ? असो.

मयतीच्या वेळी मडक्यात विस्तव ठेवून ते दहन विधीला नेण्याचे कारण त्यावेळी नदी काठी अंत्यसंस्कार केले जात ,नदी काठी वारे असे त्यामुळे अग्नि पेटायला अडचणी येत म्हणुन खबरदारीचा उपाय म्हणुन विस्तव मडक्यात ठेवला जाई. आज ती परिस्थिती नाही पण प्रथा मात्र पडली ती तशीच चालू आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 19/02/2020 - 16:20
ज्या काळात सहज अग्नी प्रज्वलन साधनांची कमतरता राहीली असेल आणि नेलेल्या अग्नीचे वार्‍यापासून संरक्षण हा उद्देश्य समजण्या सारखा आहे. दहनासाठी नदी काठ निवडले जाणे मडक्यात अग्नी नेण्याच्या दृष्टीने अंशतः दुय्यम बाब असावी. (आता हि माझी छिद्रान्वेषी तर्क चिकित्सा निरुद्देश्यच आहे- पुढे जाऊन कुणि त्याचे इतर कोणतेही म्हणजे सार्कॅझम सहीत अर्थ काढू नयेत -एखादी नवी अंधश्रद्धा शब्दपुजा जन्मू म्हणून फॉर रेकॉर्ड )

शशिकांत ओक 20/02/2020 - 19:18
जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर.
चुरडून त्यात चुना अंगठ्याने मळून तयार बुकणा द्यायला हात खाली अन चिमटीत पकडून अलगद गालाच्या खळीत साठवायला घेणार्‍याचा हात वर असतो हे लक्षात येते...!

वकील साहेब 21/02/2020 - 14:57
मयताच्या वेळी चिता पूर्णपणे पेट घेतल्याची खात्री करून घराकडे निघण्यापूर्वी मडक्यातील पाणी चितेभोवती फिरवले जाते. ज्याचे शास्त्रीय कारण असे समजले की आप्तेष्ट, नातेवाईक निघून गेल्यानंतर एखादे जाळीत लाकूड खाली पडून अजूबाजूचे वाळलेले गवत, पालापाचोळा आदीने पेट घेऊ नये म्हणून असे केले जायचे. ही प्रथा सुरु झाली त्यावेळी आत्ताच्या प्रमाणे स्मशानभूमी नव्हत्या हे समजून घ्यावे.

वकील साहेब 21/02/2020 - 15:21
मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा एक भाग म्हणून मयत व्यक्तीला घराच्या बाहेर शेजारपाजारचे चार लोक येऊन अंघोळ घालतात. ज्याने मयत व्यक्तीच्या अंगावर काही मारहाणीच्या खुणा आहे की नाही हे समजते. म्हणजे पोस्टमोर्टम ची जुनी पद्धत म्हणा की. मयत व्यक्तीला कडक पाण्याने अंघोळ घातली जाते. आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात देखील जेथे व्यक्ती मयत झाल्याचे डॉक्टर चुकीचे निदान करतात तेथे जुन्या काळात एखाद्या जिवंत व्यक्तीला चुकून मयत घोषित करून त्याचे दहन होऊ नये म्हणून गरमागरम पाण्याने अंघोळ घटली जायची. जेणेकरून जर व्यक्ती जिवंत असेल तर चटका बसल्याने काहीतरी हालचाल नक्की होईल. वर आणि वधूला विवाहा पूर्वी हळद लावण्याच्या निमित्ताने चारचौघात अंघोळ घातली जाते जेणेकरून मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावर कोड किंवा अन्य काही त्वचारोग असेल तर ते समजतात. स्थळ पाहण्याच्या वेळी असे थेट विचारता येत नाही म्हणून लग्न लागण्यापूर्वी एका प्रथेतून पाहिलेली हि एक सोय. आताच्या सारखे डायनिंग टेबल किंवा गुळगुळीत फरशा नव्हत्या तेव्हा लोक मातीवर बसून जेवण करत असत. त्यामुळे एखादा किडा, मुंगी ताटात जाण्याची शक्यता असायची. म्हणून जेवणापूर्वी ताटा भोवती पाणी फिरवले जायचे. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी कोणाला काही देऊ नये अशीहि एक प्रथा होती. जेव्हा काडेपेटीचाही शोध लागलेला नव्हता तेव्हा चुलीत विस्तव जपून ठेवला जात असे. स्वयंपाक झाला कि शेणापासून केलेला एक गवरी सदृश्य मुटका चुलीत ठेऊन त्यावर राख लोटली जायची मुटका आत सावकाश जळत राहायचा. पण हवा न लागल्याने त्याचे ज्वलन अत्यंत सावकाश व्हायचे. जेव्हा पुन्हा स्वयंपाक करायची वेळ व्हायची तेव्हा फक्त तो मुटका फोडला कि आत विस्तव जिवंत असायचा. त्यावर गोवऱ्या, वाळलेल्या काड्या असे काही टाकले कि पुन्हा जाळ तयार व्हायचा. पण काही काही वेळी असा मुटका खूप वेळ झाल्याने विझून जायचा. मग शेजारी पाजारी विस्तव मागायला जावे लागायचे. पण सायंकाळच्या वेळी विस्तव द्यायला गेलं. आणि अंधारात ठेचकळल्याणे विस्तव जर चुकून कुठे खाली पडला तर दारात बांधलेल्या जनावारचे गवत, वाळलेल्या गोवऱ्या, पालापाचोळा आदीने पेट घेतला तर कुडाची घरे जाळायला वेळच किती लागायचा? म्हणून सायंकाळच्या वेळी कुणाला काही देऊ नये अशी प्रथा पडली असावी.

माहितगार 21/02/2020 - 18:59
जेवणापुर्वी ताटाभोवती पाणि फिरवण्याच्या तत्कालिन शक्य कारणाचा मुद्दा पटला. लग्नापुर्वी हळद लावून स्नान घालण्याचे कारण हळद लावण्याने सौंदर्यात वृद्धी होते हा समज अधिक कारण असावे. पुर्वी विवाहास सरळ सरळ शरीर संबंध असेच संबोधले जात असल्यामुळे या विषयावर मुलामुलींचा संकोच कमी करणे असाही उद्देश्य असू शकेल. सोबतच कुटुंबाचा सामुहीक थट्टा मस्करी आनंद हेच महत्वाचे घटक असावेत. तत्कालीन धार्मिक विश्वासात एकदा ठरल्यानंतर त्वचारोग वगैरेवरुन विवाह मोडणे शक्य राहीले असेल असे वाटत नाही. सायंकाळी काही न देण्याचा संबंध सायंकाळी लक्ष्मी घरी येते या समजूतीशी असावा कारण समकक्ष प्रथा लक्ष्मीपूजन तसेच गौरी म्हणजे महालक्ष्मी पूजनाच्या वेळीही दिसून येत. मयताला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात तो पर्यंत विश्वास न बसलेल्यांची मानसिक समजूत काढण्याचा प्रयत्न अधिक असावा, आपण म्हणता तसे साशंकीत मृत्यू असेल तर लक्षात यावे असा दुय्यम हेतु असू शकतो. पण आधुनिक वैद्यकीय पद्धतीला समजणार नाही आणि गरम पाण्याच्या स्नानाने व्यक्ती जिवंत होण्यास मदत होईल या दाव्या बद्दल प्रथम दर्शनी साशंकता वाटते आणि मिपा डॉक्टरांनी आणि जाणकारांनी यावर मत व्यक्त करणे अधिक उचित असावे. व्हायरल (विषाणू) अथवा बॅक्टेरीअल (जिवाणू) आजाराने किंवा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला असल्यास आणि आधुनिक वैद्यकीय चाचणी नंतर मृत घोषीत केले असल्यास गरम पाण्यातूनही विषाणू जिवाणू पसरणार नाहीत का अशी माझी आपली व्यक्तीगत साशंकता आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार काय अधिक योग्य ते डॉक्टरांनी सांगितलेले बरे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 21/02/2020 - 20:28
साधारण ८० अंश सेल्सियस ला सर्व जिवाणू आणि विषाणूच नव्हे तर बरीचशी विषे सुद्धा निष्क्रिय/ मृत होतात. त्या मुळे अगदी उकळते नसले तरी कढत पाणी असेल तर त्याने बहुसंख्य जिवाणू आणि विषाणू निष्क्रिय/ मृत होतील आणि बरीचशी विषे सुद्धा. रूढी त्यासाठी आहे का हे माहिती नाही

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 21/02/2020 - 19:58
मी सुद्धा व्यक्तिपुजांचा मुलतः विरोधक आहे पण देवाच्या नावाने बदलण्यास युक्त नियम पुस्तके परंपरा बदलू दिल्या जात नसतील तर नवे देवाची कालांतराने देव म्हणून जागा घेणारे बदललेल्या काळाचे नवे देव तयार व्हावेत म्हणून थोडा काळ एरवी असह्य व्यक्ती पूजा सहन करुन घेण्यास हरकत नसावी. तोंडपुजेपणा व्यक्तिशहः व्यक्तीपूजा न करणार्‍ञांना कठीण वाटले तरी एकदा तोंडपुंजेपणाची स्पर्धा करण्याचे ठरवलेले असले तर इतरांना मागे टाकणे कठीणही नसावे.

बोलबोलेरो 18/02/2020 - 10:59
सुन्दर धागा! मलाही असेच वाटते. अशी एक परम्परा म्हणजे, स्नानाआधी तेल लावणे, माखू घालणे. त्यामुळे, त्वचेत व शरीरात पुरेशी आर्द्रता राखली जाते, व संभाव्य त्वचाविकार अस्थीविकार टाळता येउ शकतात. स्वानुभव आहे!

आम्ही मित्र मित्र श्रमपरिहराल बसलो की प्रत्येक जण ग्लासामधले द्रव्य बोटाने चार थेंब चारी दिशांना शिंपडतो. आपल्या भोवताली घुटमळणारे अतृप्त आत्मे हे थेंब पिउन तॄप्त व्हावे व कार्यक्रम सुरु असताना त्यांनी एखाद्या कार्यक्रमार्थीला झपाटू नये असा त्या मागे उद्देश असावा. तसेच बाटलीतले सगळे द्रव संपले की बाटलीला बुच लावून ती उपडी करुन ठेवायची व पाच दहा मिनिटांनी उघडून झाकणात जमा झालेले शेवटचे सात आठ थेंब एखाद्या अविवाहीत मित्राला पाजायचे अशी एक पध्दत आहे. अविवाहीत मनुष्याचे लवकरच लग्न व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करण्याची ही एक पध्दत असावी. एखाद्याला चैतन्य चुर्ण देताना ते बोटांच्या चिमटीत पकडुन देत नाहीत तर ते हातावर ठेवुन हात पुढे करायचा असतो व घेणार्‍याने ते देणार्‍याच्या हातातुन चिमटीने घ्यायचे असते. असे केल्याने मैत्री वाढते असे म्हणतात. जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर. चैतन्यकांडी पण दुसर्‍याला देताना ती दोन बोटाच्या बेचकीत न पकडता चिमटीत पकडुन द्यावी असे पूर्वज सांगून गेले आहेत. धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा. अजून आठवले की लिहितो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि 18/02/2020 - 12:39
धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा.
कांडी दिल्यास त्याला आयुष्यभर जे चटके बसतात ते टाळण्यासाठी काही रुढी?

In reply to by गवि

माहितगार 18/02/2020 - 13:17
चैतन्यचूर्णाचा विडे वाटावेत, चैतन्य विड्याच्या चैतन्य पिंकावाटे कफाचा सुकार पसरुन कांडीने फुप्फुसात पसरलेल्या उष्णतेस थंडावा देतो . आपल्याला फुप्फुसातील थंडी इतर फुफूसात पसरवण्यासाठी उबळ दाबू नये अशा काही प्रथा पाळल्याकी झाले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सौन्दर्य 20/02/2020 - 00:41
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सौन्दर्य 20/02/2020 - 00:42
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.

माहितगार 18/02/2020 - 13:02
अंधश्रद्धा निर्मुलनवादी किती कोकलले आणि त्यांनी स्वतः स्विकारले नाही तरी त्यांच्या स्वतःसहीत तर्कापेक्षा, संबंधीत व्यक्ती प्रभावित होणार्‍या व्यक्तीकडची अतर्क्य वक्तव्ये आणि अंधश्रद्धा अधिक चटकन खपतात. सर्वसाधारण व्यवहारात भावना तर्कपूर्णतेला सहज मात देते. कोणतीही संस्था त्यात धर्मसंस्था आली (कोणताही धर्म आणि विशेषतः हिंदू धर्म एक चांगले उदाहरण आहे) तर्कपूर्ण माणसाने मांडलेल्या केवळ तर्कांवर धावत नाही प्रत्यक्षात दैनंदीन जिवनात अंधश्रद्धा बाळगणारे धर्मसंस्था टिकवून असतात. अतर्क्य विधानांचे तर्कपूर्ण अथवा अतर्क्य समर्थन कसे करायचे ते संबंधीत समुदाय बघून घेत असतो. रांगोळीने वातावरणास प्रसन्नता आणि सौंदर्य लाभते . फारतर कलाकारास आपली कलात्मक अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळते हे म्हणणे पुरेसे असावे. पण या तर्काचा क्रम वर येण्याच्या आधी १) पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे जीव घरात शिरकाव करू शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. २) तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणार्याला कळत असावे. हे लौकर खपते यातही काही तर्क आहे यास अधिक अतर्क्य केले तर कदाचित अधिक चटकन खपेल. एखादी प्रथा काही व्यक्ती कुटुंबे समुह पाळतात तेव्हाच काही जाणीवपूर्वक पाळत नाहीत, अंधश्रद्धा चटकन खपते हा नियम एखादी प्रथा न टाळली जाण्याबाबतही तेवढाच लागू शकत असावा.

माहितगार 18/02/2020 - 13:34
दिवेलागणी नंतर केर काढू नये यात धागा लेखातील पहिला तर्क - मौल्यवान गोष्ट अनवधानाने अंधारात बाहेर टाकली जाऊ नये - ह्या कारणाची शक्यता अधिक पण तरीही धागा लेखकाचा तर्क क्रमांक २ चटकन खपेल, सरपटणारा प्राणी डिवसेल या कारणाने दिवेलागणी नंतर केर न काढता डिवसणारा प्राणी तसाच राहुदेणे तर्कशुद्धतेवर घासल्यास टिकत नाही, झोपलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते त्यामुळे डिवसणारे प्राणी घालवले जावेत म्हणून दिवेलागणी नंतर झोपण्याआधी केर काढणे श्रेयस्कर असा तर्क ही मांडता येऊ शकतो. अशा तर्क-मुल्य-मांडणी अंशतः स्थलकालसमुह सापेक्ष असतात. महाभारत काळात कंबरेच्या खाली शस्त्राचा वार करु नये व्यक्ती जिवंत राहील्यास त्याला किमान कुठे जाता आले पाहीजे या मुल्यास प्राधान्य होते. आताच्या काळात पायावर गोळी मारा कंबरेच्या वर वार करु नका पंगु झाला तर ठिक व्यक्ती जगली पाहीजे असा विचार आहे. तसे पहाता दोन्ही मांडणी परस्पर विरोधी आहेत आताच्या काळातला महाभारत वाचताना मनोमन तत्कालीन प्रथेचे आपोआप समर्थन करतो, आणि तिच व्यक्ती आजच्या काळात गोळी पायावर न मारता पूर्ण एनकाऊंटर का केला असा प्रश्नही विचारते. आणि माणूस स्वतःच्या तत्वातली अशी काँट्राडीक्शन्स घेऊन सहज जिवन कंठत असतो.

In reply to by माहितगार

महासंग्राम 19/02/2020 - 14:34
पलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते
हे वाक्य वाचुन भुलभुलैय्या मधला रसिका जोशी चा झाडू वाला प्रसंग आठवला :)

चौकस२१२ 18/02/2020 - 14:58
सुन्दर धागा! समाजात दोन टोके दिसतात दुर्दैवाने १) "हे असेच असते पूर्वीपासून" म्हणून प्रश्न विचारू नका, पाळा आणि नाही पाळलेत तर तुम्ही धर्मविरुद्ध म्हणून समोरच्याला ला झोडपणारे २) सगळे जे आहे त्यामागे काही तर्क असेल हे विचारात ना घेता झोडपणारे आणि खास करून ज्यांना फक्त हिंदू धर्मातील प्रथातच खोट दिसते असे अति टोकाचे अंधश्रदनिर्मूल वाले ( सर्वच नाही )

योगी९०० 18/02/2020 - 20:40
छान विषयावर धागा... माझ्यामते हिंदू धर्मात कोणी एकमेकांना भेटल्यावर शेकहँन्ड न करता हात जोडून नमस्कार करणे ही प्रथा आहे त्या मागेही शास्त्रीय कारण असावे. एकमेकाला स्पर्श न करता उगाचच रोगराईचा प्रसार होऊ नये हा उद्देश असावा. मला अजूनही कोणालाही शेकहॅन्ड करायला आवडत नाही. कारण त्या व्यक्तीने त्याचा हात आधी कोठे वापरला असेल काय माहीत? उगाच जखम खाजवली असेल किंवा नाका तोंडात बोट घातली असतील.

In reply to by योगी९००

माहितगार 18/02/2020 - 21:06
अंशतः सहमत. अगदीच अस्पृश्यताही समर्थनीय ठरत नाही त्याच वेळी युरोपीय ज्या नव्या वसाहतीत गेले अशा अनेक वसाहतींमध्ये युरोपीय नव लोकसंपर्कातून वीषाणू जिवाणू बाधा होऊन इम्यूनिटी नसल्याने साथीचे आजार पसरुन अख्खी लोकसंख्या नामशेष झाली ते ही सयुक्तीक ठरत नाही. काही वीषाणू संक्रमण अटळ असते शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीस काही पर्याय नाही. सरसकट अस्पृश्यतेत रुपांतरण न करता किमान आजारी आणि अशक्त व्यक्तींनी शेकहँड टाळणे ठिक. कारण हात स्वच्छ असतील तरीही श्वसना वाटे वीषाणू संक्रमणाचा धोका शिल्लक रहातो. इतर सशक्त व्यक्तिंनी पुरवी प्रमाणे अभ्यागतांचे स्वागत हात पाय धुण्यासाठी गरम पाणी साबण देऊन करावे आणि नंतर हस्तांदोलन करावे असे वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक 19/02/2020 - 12:18
रूढी, परंपरा आणि कर्मकांडे यात सतत नवनवीन गोष्टींची भर पडताना दिसते. त्यात जगभरच्या इतर संस्कृतीमधून घेतलेल्या उसन्या प्रथांचाही समावेश होत चाललेला आहे. खर्चिक, दांभिक आणि निरूपयोगी गोष्टी तर आधुनिक कर्मकांडांमधेही असतातच. (प्री वेडिंग शूट, तथाकथित टीम बिल्डींग अ‍ॅक्टिव्हिटीज , कंपनीच्या खर्चाने केलेले नाईट आउट, बेबी शॉवर, व्हेलेंटाईन डे, हॅलोविन डे, अमुक डे तमुक डे, लग्नप्रसंगी वराची चप्पल पळवणे, आंतरपाट मधे असताना वराने वधूला उजलून घेणे, सोवळ्या ओवळ्यासारखे स्थानमहात्म्य दर्शक आधुनिक टाय डे, ब्लेझर डे सारखे ड्रेस कोड पाळणे, फीत कापून उद्घाटन करणे, संचलणे आणि कवायती इ.). यात अमुक एक संस्कृती आणि अमुक एक धर्माचा संबंध दिसला की अन्यायकारक किंवा शोषणपूरक नसलेल्या प्रतिकात्मकतेला देखील एक ठराविक समाजघटक कडाडून विरोध करताना दिसतो हे गमतीशीर वाटते. असो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 19/02/2020 - 15:25
.... ‘आपण पाळत आलेल्या किंवा आसपास दिसण्यात येणाऱ्या...
सद्य वर्तमान काळ, भूतकाळातील तत्कालीन वर्तमानकाळाबद्दल सकारात्म्कता, सांस्कृतिक परंपरांच्या ठेव्यातील सकारात्मक उद्दीश्टे शोधण्याचा, न्हाऊ घातलेल्या पाण्यातील बाळ फेकले जाणार नाही याचा रचनात्मक प्रयत्न धागा लेखातून दिसून येतो
अनेक कालबाह्य रुढी व परंपरा संस्कृतीच्या/धर्माच्या नावाने गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात. शास्त्र असतं ते! ;)
घाटपांडे साहेबांच्या समतोल दृष्टीकोण सहसा मला भावतो, बाळाला न्हाऊ घातलेले पाणी टाकले जावे संस्कृती आणि समाज अधिक उन्नत व्हावा म्हणून टिका नक्कीच गरजेच्या असतात त्यांचे स्वागत करावयास हवे पण न्हाऊ घातलेले पाणी फेकुन दिल्या नंतर एक बाळ शिल्लक रहाणार असते त्याकडे दुर्लक्ष करण्याची टिकाकारांची अपेक्षा कितपत रास्त असते ? १९ व्या शतकातले २० व्या शतकात, २०व्या शतकातले काही सुधारणा संशोधन २१ व्या शतकात बाद होणार असते म्हणजे १९ अथवा २० शतकात झालेल्या सुधारणा आणि संशोधनाच्या उद्दीष्टात तत्कालिन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादेत झालेल्या प्रयत्नांचे उद्दीष्ट्ये सकारात्मक आणि शास्त्रीय म्हणजे गिव्हन अंडरस्टँडींगमध्ये लॉजीकल आणि पद्धतशिर नसतीलच असे नव्हे. हे डिस्काऊंटींग अंडरस्टँडिंग आम्ही १९ वा २० व्या शतका बाबत दाखवू शकतो तर प्राचीन काळाबाबतही तत्कालीन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन का दाखवू नये. ऋग्वेदात बहिणीच्या प्रस्तावास नकार देणारा यम, इंद्रपूजा नाकारुन पर्वत पूजा श्रेयस्कर असल्याचे सुचवणारा कृष्ण, शेतीच्या आर्थिक वृद्धीसाठी गाईं-बैलांचे सेवन करण्याचे थाबंवणारा समाज, ईश्वराच्या नावाने अर्चांसाठी केल्या जाणारे प्राणी बळी थांबवण्यासाठी चळवळी प्रमाणे झटणे, अद्वैत सिद्धांत, काम्य व्रतांना नाकारून इश्वराच्या नावाने कर्मयोग सांगणे, सत्यं शिवम सुंदरम, अहं ब्रह्मास्मी , कराग्रे वसते लक्ष्मी, शुभम करोती पसायदान, अशी महा वाक्ये प्रचलित करणे या त्या त्या काळाच्या उपलब्ध मर्यादेत झालेल्या सुधारणाच असतात. घरात येणारी नवी सून धनधान्याने भरलेला तांब्या पायाने लवंडते यात धान्याची नासाडी पहाणार की घरात येणार्‍या नव्या सदस्यांच्या छोट्या मोठ्या चुकांचा बाऊ न करता घरातील आपले पणाचा आधिकार पहाणार ? भाकरीचा तुकडा ओवाळून टाकताना नसलेली नजर काढण्याचे अंधश्रद्धात्मक औचित्य आजच्या काळात शिल्लक नसेल कदाचित पण अंधश्रद्धेच्या मर्यादा लक्षात ठेऊन केवळ प्रेमापोटी काढलेल्या नजरेच्या कृती मागचे अनमोल प्रेमाची अनुभूती केवळ तर्कांच्या हट्टांसाठी त्याज्य करावी काय? किंवा व्यक्तिंना वेळोवेळी ओवाळणे असेल. ओवाळल्याने अथवा आशीर्वाद दिल्याने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यात यशस्वी होतेच असे नाही तर्कांची कसोटी कडक केली तर शुभ शब्दातील शुभ शब्दच नव्हे तर सकारात्मक इच्छांना ही अर्थ कारण त्रयस्थाच्या इच्छा केवळ इच्छा असतात त्यांचे भविष्यातील घटनाक्रमाशी आणि फलिताशी नात्याची ग्वाही देणे कदापी संभव नसते म्हणून सदिच्छा व्यक्त करणे आशिर्वाद देणे आशिर्वाद देताना चार रंगित तांदूळाचे दाणे फेकणे ओवाळणे इत्यादीतील प्रसन्नता मानसिक समाधान आनंद विश्वास यांचा प्रत्यय थांबवणे खरेच गरजेचे आहे काय ? कुंकू अथवा टिकली टेक्निकली यात शृंगार तरी आहे. पुरुषांनी कपाळावर गंध लावणे अंधश्रद्धेच्या यादीत सहज ढकलता येते त्यात नटण्याचाही उद्देश्य नसतो. कालच्या हिशेबाने कुंकू गंधाचा सांस्कृतिक शिरकाव कदाचित अंधश्रद्धेनेही झाला असेल. पण कपाळावरील कुंकू आणि गंधामुळे स्त्रीपुरुष संवाद-काळात कपाळ व डोळ्यांवर लक्ष केंद्रीत ठेवणे सोपे होऊन ऑगलींगच्या शक्यता कमी रहात असतील - (मी पडदा पद्धतीचा समर्थक नाही हे यावेळी नमुद करतो) आणि प्रथेचे उपयुक्तता आणि सौंदर्य मुल्य असेल तर प्रथा केवळ जुनी आहे म्हणून दडपण्यात काही अर्थ असेल का ? डोक्यावरच्या पदराचे अट्टाहास पुरुषसत्ताकतेचे निदर्शक म्हणून मागे टाकणे श्रेयस्कर असले तरी, नवीन कितीही पोषाख आले तरी नऊवारीसाडीचे स्त्री संदर्भात उपयुक्तता मुल्य कसे कमी होते ? असो.

मयतीच्या वेळी मडक्यात विस्तव ठेवून ते दहन विधीला नेण्याचे कारण त्यावेळी नदी काठी अंत्यसंस्कार केले जात ,नदी काठी वारे असे त्यामुळे अग्नि पेटायला अडचणी येत म्हणुन खबरदारीचा उपाय म्हणुन विस्तव मडक्यात ठेवला जाई. आज ती परिस्थिती नाही पण प्रथा मात्र पडली ती तशीच चालू आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 19/02/2020 - 16:20
ज्या काळात सहज अग्नी प्रज्वलन साधनांची कमतरता राहीली असेल आणि नेलेल्या अग्नीचे वार्‍यापासून संरक्षण हा उद्देश्य समजण्या सारखा आहे. दहनासाठी नदी काठ निवडले जाणे मडक्यात अग्नी नेण्याच्या दृष्टीने अंशतः दुय्यम बाब असावी. (आता हि माझी छिद्रान्वेषी तर्क चिकित्सा निरुद्देश्यच आहे- पुढे जाऊन कुणि त्याचे इतर कोणतेही म्हणजे सार्कॅझम सहीत अर्थ काढू नयेत -एखादी नवी अंधश्रद्धा शब्दपुजा जन्मू म्हणून फॉर रेकॉर्ड )

शशिकांत ओक 20/02/2020 - 19:18
जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर.
चुरडून त्यात चुना अंगठ्याने मळून तयार बुकणा द्यायला हात खाली अन चिमटीत पकडून अलगद गालाच्या खळीत साठवायला घेणार्‍याचा हात वर असतो हे लक्षात येते...!

वकील साहेब 21/02/2020 - 14:57
मयताच्या वेळी चिता पूर्णपणे पेट घेतल्याची खात्री करून घराकडे निघण्यापूर्वी मडक्यातील पाणी चितेभोवती फिरवले जाते. ज्याचे शास्त्रीय कारण असे समजले की आप्तेष्ट, नातेवाईक निघून गेल्यानंतर एखादे जाळीत लाकूड खाली पडून अजूबाजूचे वाळलेले गवत, पालापाचोळा आदीने पेट घेऊ नये म्हणून असे केले जायचे. ही प्रथा सुरु झाली त्यावेळी आत्ताच्या प्रमाणे स्मशानभूमी नव्हत्या हे समजून घ्यावे.

वकील साहेब 21/02/2020 - 15:21
मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा एक भाग म्हणून मयत व्यक्तीला घराच्या बाहेर शेजारपाजारचे चार लोक येऊन अंघोळ घालतात. ज्याने मयत व्यक्तीच्या अंगावर काही मारहाणीच्या खुणा आहे की नाही हे समजते. म्हणजे पोस्टमोर्टम ची जुनी पद्धत म्हणा की. मयत व्यक्तीला कडक पाण्याने अंघोळ घातली जाते. आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात देखील जेथे व्यक्ती मयत झाल्याचे डॉक्टर चुकीचे निदान करतात तेथे जुन्या काळात एखाद्या जिवंत व्यक्तीला चुकून मयत घोषित करून त्याचे दहन होऊ नये म्हणून गरमागरम पाण्याने अंघोळ घटली जायची. जेणेकरून जर व्यक्ती जिवंत असेल तर चटका बसल्याने काहीतरी हालचाल नक्की होईल. वर आणि वधूला विवाहा पूर्वी हळद लावण्याच्या निमित्ताने चारचौघात अंघोळ घातली जाते जेणेकरून मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावर कोड किंवा अन्य काही त्वचारोग असेल तर ते समजतात. स्थळ पाहण्याच्या वेळी असे थेट विचारता येत नाही म्हणून लग्न लागण्यापूर्वी एका प्रथेतून पाहिलेली हि एक सोय. आताच्या सारखे डायनिंग टेबल किंवा गुळगुळीत फरशा नव्हत्या तेव्हा लोक मातीवर बसून जेवण करत असत. त्यामुळे एखादा किडा, मुंगी ताटात जाण्याची शक्यता असायची. म्हणून जेवणापूर्वी ताटा भोवती पाणी फिरवले जायचे. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी कोणाला काही देऊ नये अशीहि एक प्रथा होती. जेव्हा काडेपेटीचाही शोध लागलेला नव्हता तेव्हा चुलीत विस्तव जपून ठेवला जात असे. स्वयंपाक झाला कि शेणापासून केलेला एक गवरी सदृश्य मुटका चुलीत ठेऊन त्यावर राख लोटली जायची मुटका आत सावकाश जळत राहायचा. पण हवा न लागल्याने त्याचे ज्वलन अत्यंत सावकाश व्हायचे. जेव्हा पुन्हा स्वयंपाक करायची वेळ व्हायची तेव्हा फक्त तो मुटका फोडला कि आत विस्तव जिवंत असायचा. त्यावर गोवऱ्या, वाळलेल्या काड्या असे काही टाकले कि पुन्हा जाळ तयार व्हायचा. पण काही काही वेळी असा मुटका खूप वेळ झाल्याने विझून जायचा. मग शेजारी पाजारी विस्तव मागायला जावे लागायचे. पण सायंकाळच्या वेळी विस्तव द्यायला गेलं. आणि अंधारात ठेचकळल्याणे विस्तव जर चुकून कुठे खाली पडला तर दारात बांधलेल्या जनावारचे गवत, वाळलेल्या गोवऱ्या, पालापाचोळा आदीने पेट घेतला तर कुडाची घरे जाळायला वेळच किती लागायचा? म्हणून सायंकाळच्या वेळी कुणाला काही देऊ नये अशी प्रथा पडली असावी.

माहितगार 21/02/2020 - 18:59
जेवणापुर्वी ताटाभोवती पाणि फिरवण्याच्या तत्कालिन शक्य कारणाचा मुद्दा पटला. लग्नापुर्वी हळद लावून स्नान घालण्याचे कारण हळद लावण्याने सौंदर्यात वृद्धी होते हा समज अधिक कारण असावे. पुर्वी विवाहास सरळ सरळ शरीर संबंध असेच संबोधले जात असल्यामुळे या विषयावर मुलामुलींचा संकोच कमी करणे असाही उद्देश्य असू शकेल. सोबतच कुटुंबाचा सामुहीक थट्टा मस्करी आनंद हेच महत्वाचे घटक असावेत. तत्कालीन धार्मिक विश्वासात एकदा ठरल्यानंतर त्वचारोग वगैरेवरुन विवाह मोडणे शक्य राहीले असेल असे वाटत नाही. सायंकाळी काही न देण्याचा संबंध सायंकाळी लक्ष्मी घरी येते या समजूतीशी असावा कारण समकक्ष प्रथा लक्ष्मीपूजन तसेच गौरी म्हणजे महालक्ष्मी पूजनाच्या वेळीही दिसून येत. मयताला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात तो पर्यंत विश्वास न बसलेल्यांची मानसिक समजूत काढण्याचा प्रयत्न अधिक असावा, आपण म्हणता तसे साशंकीत मृत्यू असेल तर लक्षात यावे असा दुय्यम हेतु असू शकतो. पण आधुनिक वैद्यकीय पद्धतीला समजणार नाही आणि गरम पाण्याच्या स्नानाने व्यक्ती जिवंत होण्यास मदत होईल या दाव्या बद्दल प्रथम दर्शनी साशंकता वाटते आणि मिपा डॉक्टरांनी आणि जाणकारांनी यावर मत व्यक्त करणे अधिक उचित असावे. व्हायरल (विषाणू) अथवा बॅक्टेरीअल (जिवाणू) आजाराने किंवा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला असल्यास आणि आधुनिक वैद्यकीय चाचणी नंतर मृत घोषीत केले असल्यास गरम पाण्यातूनही विषाणू जिवाणू पसरणार नाहीत का अशी माझी आपली व्यक्तीगत साशंकता आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार काय अधिक योग्य ते डॉक्टरांनी सांगितलेले बरे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 21/02/2020 - 20:28
साधारण ८० अंश सेल्सियस ला सर्व जिवाणू आणि विषाणूच नव्हे तर बरीचशी विषे सुद्धा निष्क्रिय/ मृत होतात. त्या मुळे अगदी उकळते नसले तरी कढत पाणी असेल तर त्याने बहुसंख्य जिवाणू आणि विषाणू निष्क्रिय/ मृत होतील आणि बरीचशी विषे सुद्धा. रूढी त्यासाठी आहे का हे माहिती नाही

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 21/02/2020 - 19:58
मी सुद्धा व्यक्तिपुजांचा मुलतः विरोधक आहे पण देवाच्या नावाने बदलण्यास युक्त नियम पुस्तके परंपरा बदलू दिल्या जात नसतील तर नवे देवाची कालांतराने देव म्हणून जागा घेणारे बदललेल्या काळाचे नवे देव तयार व्हावेत म्हणून थोडा काळ एरवी असह्य व्यक्ती पूजा सहन करुन घेण्यास हरकत नसावी. तोंडपुजेपणा व्यक्तिशहः व्यक्तीपूजा न करणार्‍ञांना कठीण वाटले तरी एकदा तोंडपुंजेपणाची स्पर्धा करण्याचे ठरवलेले असले तर इतरांना मागे टाकणे कठीणही नसावे.
मला नेहमीच असे वाटत आले आहे की आपल्या हिंदू धर्मातील कित्येक श्रद्धा, समजुती, रितीरिवाज, रूढी, परंपरा ह्यांना शास्त्रीय बैठक होती. कालांतराने त्यातील शास्त्रीय किंवा तार्किक बैठक विस्मृतीत गेली व पुढील पिढी त्या गोष्टी एक परंपरा किंवा श्रद्धा, समजुती म्हणून पाळत आली. अशी शास्त्रीय बैठक विस्मृतीत जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, फारसे प्रश्न विचारलेले पूर्वी आवडत नसत. दुसरे कारण हे ही असू शकते की समोरच्याचे समाधान होईल असे उत्तर त्यांच्याकडेही कदाचित नसावे.

गावाला शाळेत लोकसहभागातून ग्रंथालय सुरू करायची योजना आहे

dhanraj205 ·

dhanraj205 22/02/2018 - 17:57
ग्रामग्रंथालय नियोजन पुस्तकांचे स्वरूप १: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी) २:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी) ३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे, ४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक ) ५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य ६: स्पर्धा परीक्षा साहित्य ७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे. ७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक ८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके ##ग्रंथालय साहित्य तीन कपाट एक टेबल News paper stand शाळेलगत चार सिमेंट sits ## कार्यवाही १;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने २: अध्यक्ष व सचिव joint account ३: निधी लोकसहभागातून उभा करणे ४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे ५: पुस्तके खरेदी करणे

dhanraj205 22/02/2018 - 17:58
## लोकसहभाग १: गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग २:संस्था व दानशूर व्यक्ती सहभाग ## ग्रंथालय पुस्तक विनियोग १: deposit फक्त १०० रु प्रति वर्ष (१ कुटुंब) २:इतर गावासाठी २०० रु ३:वृत्तपत्रे फक्त शालेय प्रागनातच वाचले जातिल ४: ऱोज १:३० ते २:३० दरम्यान पुस्तके दिलि जातील ५: एका वेळस एक पुस्तक दिले जाईल ६:आठवड्यात पुस्तक परत करने बंधंनकारक राहिल ७: पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक मार्फतच केले जाईल ८: तक्रार निवारण बाबत बैठकी घेतल्या जातील ९: ग्रंथालयाचि मालमत्ता पुर्ण गावाची असेल त्यामुळे पुस्तक फाटने , हरवने , पुस्तक बांधनी , नवीन पुस्तके खरेदी , भेट स्विकारने, वृत्तपत्रे व मासिक खरेदि यास पुर्न गाव म्हणजे समिती जबाबदार असेल . ##पुस्तक संख्या कमीत कमी 2500 ३०% स्पर्धा परीक्षा pustake ३०% बाल व किशोर सहित्य ३०% प्रौढ व महिला व इतर साहित्य १०% विशेष वांग्मय साहित्य ## निधी बाबत ए कुन जमा होनाऱ्या निधीपैकी १५% निधी राखिव ठेवण्यात येइल ( मासिक व वृत्तपत्रे)

dhanraj205 22/02/2018 - 17:57
ग्रामग्रंथालय नियोजन पुस्तकांचे स्वरूप १: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी) २:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी) ३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे, ४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक ) ५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य ६: स्पर्धा परीक्षा साहित्य ७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे. ७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक ८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके ##ग्रंथालय साहित्य तीन कपाट एक टेबल News paper stand शाळेलगत चार सिमेंट sits ## कार्यवाही १;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने २: अध्यक्ष व सचिव joint account ३: निधी लोकसहभागातून उभा करणे ४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे ५: पुस्तके खरेदी करणे

dhanraj205 22/02/2018 - 17:58
## लोकसहभाग १: गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग २:संस्था व दानशूर व्यक्ती सहभाग ## ग्रंथालय पुस्तक विनियोग १: deposit फक्त १०० रु प्रति वर्ष (१ कुटुंब) २:इतर गावासाठी २०० रु ३:वृत्तपत्रे फक्त शालेय प्रागनातच वाचले जातिल ४: ऱोज १:३० ते २:३० दरम्यान पुस्तके दिलि जातील ५: एका वेळस एक पुस्तक दिले जाईल ६:आठवड्यात पुस्तक परत करने बंधंनकारक राहिल ७: पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक मार्फतच केले जाईल ८: तक्रार निवारण बाबत बैठकी घेतल्या जातील ९: ग्रंथालयाचि मालमत्ता पुर्ण गावाची असेल त्यामुळे पुस्तक फाटने , हरवने , पुस्तक बांधनी , नवीन पुस्तके खरेदी , भेट स्विकारने, वृत्तपत्रे व मासिक खरेदि यास पुर्न गाव म्हणजे समिती जबाबदार असेल . ##पुस्तक संख्या कमीत कमी 2500 ३०% स्पर्धा परीक्षा pustake ३०% बाल व किशोर सहित्य ३०% प्रौढ व महिला व इतर साहित्य १०% विशेष वांग्मय साहित्य ## निधी बाबत ए कुन जमा होनाऱ्या निधीपैकी १५% निधी राखिव ठेवण्यात येइल ( मासिक व वृत्तपत्रे)
वर सांगितल्याप्रमाणे मला माझ योगदान द्यायचे आहे तरी स्वस्त आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके कुठे मिळतील मार्गदर्शन करावे

मिपावर अजून काय हवे?

दशानन ·

दशानन 29/08/2017 - 00:07
मिपाचा वाढदिवस (आठवडा) सुरु आहे, तेव्हा मागायला लाजू नका ;) शक्य असेल तर मिपा आवर्जून हे बद्दल करेल याची खात्री आहे म्हणून धागा टाकला आहे, तुम्ही हि सामील व्हा... व आपल्या मागण्या येथे द्या ;)

In reply to by पिलीयन रायडर

दशानन 29/08/2017 - 00:21
>>व्हेरिफाईड सदस्य म्हणजे, त्याचे असणे कोणी ना कोणी (येथे कॉज आहेत) मान्य केले आहे कि मी या "आयडीला" व्यक्तिगत स्वरुपात ओळखतो. याचा फायदा सदस्यांना नसून संकेतस्थळाला आहे, व असावा. कारण लिहणारा व्यक्ती "जबाबदारी" टाळू शकणार नाही व "संभाव्य" कायदे / नियम यांच्या कचाट्यातून हे स्थळ म्हणजे मिपा सुरक्षित राहील.

कपिलमुनी 29/08/2017 - 01:02
मिपाच्या मुख्य पानावर अभिप्राय द्यायची सोया आहे त्यामुळे या धाग्याचे वेगळे काय प्रयोजन आहे ? बाकी मिपा मालक समर्थ आणि सदैव अभिप्रायासाठी उपलब्ध आहेतच

थॉर माणूस 29/08/2017 - 01:46
अनेक वर्षे वाचक आणि नंतर सदस्य असा माझा मिसळपाव वरचा प्रवास आहे, तरी अजूनही लेखक होऊन धागा लिहीण्याचा टप्पा पार केलेला नाही, असो. :) हे संस्थळ अनेक वर्षे उत्तमरीत्या चालू आहे, त्याबद्दल प्रथम मालक/चालक/वाहक सगळ्यांचेच आभार. नाहीतर अचानक उगवणारी आणि गायब होणारी किंवा अगदी चालू अवस्थेतून अचानक गायब झालेली उदाहरणे देखील आहेत. त्यामुळे सुधारणा होणे चांगले असले तरी मालकांनी बदल करणार नाही पण संस्थळ मात्र चालू राहील असे सांगीतले तरी आनंदच होईल.

कंजूस 29/08/2017 - 09:13
मिपासर्चबद्दल - गुगलवर अवलंबून राहाण्यापेक्षा एक टॅग्ज आधारित लिस्ट दाखवता येऊ शकेल. लेखक जे काही टॅग्ज देतात त्याशिवाय एक रेडिमेड ड्रॅापडाउन मेनू करायचा आणि त्यातले निवडण्याचे आवश्यक करायचे. सर्चमध्ये ते टॅग्ज दाखवले की फक्त एक निवडायचा, काही शब्दवगैरे लिहायचे नाहीत. आणि एकदा पाचसहा जणांनी सर्व लेखांना योग्य टॅग्ज दिले की झाले काम. ही पद्धत आणल्यावर मात्र पुढचे लेख सिद्ध केलेल्या टॅग्जमधून एकतरी निवडल्याशिवाय प्रकाशित होणार नाही असा जॅमर ठेवायचा. डेटाबेसमधून फक्त त्या प्रकारातलेच लेख दाखवले जा

उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे. मलाही मि.पा.वर अनेक बदल व्हावेसे वाटतात सध्याचा ईंटरफेस अनेकांना आवडलेला नाही, तरी मला तरी तोच सुटसूटीत वाटतोय. एक तर वर्गवार विभागणी असल्यामुळे आपल्याला हव्या त्याच विभागात चटकन जाता येत. जुना ईंटरफेस ज्यात सगळे धागे एकाखाली एक स्वरुपात दिसायचे त्यामधे अडचण अशी होती कि समजा कोणी खरोखरच दोनशे कविता टाकल्यातर ( ;-) )अनेक धागे कारण नसताना खाली जातील. तेव्हा आता आहे हाच ईंटरफेस कायम रहावा असे वाटते. मायबोलीवर आहे तश्या किमान तीन सुविधा मि.पा.वर हव्यात असे माझे मत आहे. १ ) धागा शोधण्याची सोय, हि फारच आवश्यक आहे. २ ) एखादा धागा आवडला तर तो व्हॉटसअ‍ॅपवर थेट शेअर करणारे बटन. ३ ) तिसरी सोय म्हणजे फोटो अपलोडींग. अनेक नव्याने लिहीणार्‍यांना हिच फार मोठी अडचण होते. अगदी मलासुध्दा हिच अडचण जाणवली होती, म्हणून बराच काळ लिहिण्याचे थांबविले होते. ४ ) फोटो प्रत्येकवेळी अल्बमवरुन लोड करणे त्रासदायक होते. मायबोलीवर थेट हार्ड डिस्कवरचे फोटो लोड करण्याची सोय आहे. खरेतर एखादी एच.टी.एम.एल. फाईलमधले कंटेंट आहे तसे पेस्ट करण्याची सोय आहे. माझ्यासारख्या भटकंतीचे धागे लिहीणार्‍याला या फोटो अपलोड करण्याच्या गैरसोयीमुळे फार वेळ जातो. या प्रकारामुळे मी माझे धागे आधी ब्लॉगवर लिहून ठेवले आहेत, पण धागा टाकताना फोटो अपलोडींगमधे वेळ जातोच. यावर काही उपाय निघाला तर फारच बरे होईल. ५) एखाद्याचा आय्,डी.काही कारणाने थेट उडण्यापेक्षा त्याला आधी वॉर्निंग देण्यात आले तर बरेच होईल. निदान ती व्य्क्ती शक्य झाल्यास सुधारणा करेल. अर्थात सुधारणा दिसली नाही तर कारवाई आहेच. ६ ) आय.डी. व्हेरीफाईड करुन घ्यावा याच्याशी सहमत. या अश्याच चर्चा आम्ही फक्त मि.पा.कर असलेल्या "मिळून मिसळून" या टेलिग्राम ग्रुपवर करीत असतो. त्या चर्चेतून ज्या सुधारणा मला व्हाव्या असे वाटले त्या लिहील्या.

In reply to by दुर्गविहारी

बाजीप्रभू 30/08/2017 - 07:53
मला हे बदल झाले तर मिपा अजून आवडेल. १) प्रतिसादांचा क्रम नवा ते जुना असा असायला हवा... "खफ" मधे आहे तसा. उदा. ताज्या घडामोडी - १,२..... ९, हा धागा मोबाईलवर वाचायचा झाला तर तोंडाला फेस येतो.... स्क्रोल करत करत आजच्या तारखेला येईल पर्यंत धीर सुटतो. २) कि-वर्ड वरून संबंधीत लेख शोधण्याची सुविधा PC वरही चालवता आली पाहिजे.

In reply to by दुर्गविहारी

ऋतु हिरवा 30/08/2017 - 19:16
मी मिपावर नवीन आहे. मलाही फोटो टाकायला खूप अडचणी येतात. त्यामुळे फोटो टाकणे सोपे झाले तर बरे होईल .

उपयोजक 29/08/2017 - 12:39
अॅपचा मुद्दा पटला! २०१४ नंतर या अॅपमधे काहीच बदल झालेले नाहीत.याअॅपमधे नोटीफिकेशनचीही सोय हवी.म्हणजे कोण प्रतिसाद देतंय तेही कळेल.मुख्य म्हणजे उपप्रतिसाद वेळेत देता येईल.

कंजूस 29/08/2017 - 14:32
फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट ग्रुप बनवावा आणि तिथे आपल्या आइडीनावाला मिपाकर आडनाव लावून( उदा माझे kanjoos mipakar) लॅागिन व्हावे म्हणजे हा कोण हे कळायला सोपे जाईल. तिथे फोटो अपलोड करावा. तिथून इथे सहज आणता येतो. ज्यांना खरी ओळख लपवायची असेल तेही साध्य होईल. फेसबुकच्या मोठ्य सर्वरचा उपयोग करून घेता येईल.

कंजूस 29/08/2017 - 14:38
नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच होईल. असे हे समांतर मिपा करण्याचा/चालवण्याचा उद्देश नाही परंतू काही प्रश्न लगेच सुटतील. एक वेगळे फेसबुक अकाउंट उघडावे लागेल इतकेच. तेसुद्धा वेगळ्या ब्राउजरात ठेवले तर तेही चालू राहील एकाचवेळी. मोबाइलचा स्क्रीन लॅाक असतोच. लॅागआउट करायचेच नाही.

In reply to by कंजूस

अभ्या.. 29/08/2017 - 15:43
कंकाका तुम्ही जेवढे प्रयोग आंतरजालावर करता ना त्याच्या निम्मे जरी मी माझ्या व्यवसायात केले असते तरी डबल प्रॉफिट काढला असता. बाकी काई नाही ओ, आळस आणि सगळे काही आयते मिळवायचा सोस नडतो. ;)

सानझरी 29/08/2017 - 16:24
वरच्या काळ्या पट्टीत ठळक अक्षरात "मिसळपाव" लिहीलंय ते काढलं तर फार बरं होईल. ऑफिसमधे दुरुनसुद्धा कोणालाही ते वाचता येतं. हे काय बघतेयस असं विचारलं तर मिसळपावची रेसिपी बघतेय हे कारण सांगुन कलिग्ज लोकांना टोलवलंय.

प्रसाद_१९८२ 29/08/2017 - 16:34
मुळ लेखातील मुद्दा क्रं. दोन बाबत काही करता आले तर पाहा. प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेल्यास नवीन प्रतिसाद शोधणे अतिशय कठिण होऊन जाते.

साहना 29/08/2017 - 16:36
पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो. माझ्या मते जुना लेआऊट चांगला होता. पाहिजे तर तिथे "pinned" पोस्ट चा कन्सेप्ट आणावा पण सध्याचे मुखपृष्ठ अतिशय वाईट आहे.

In reply to by साहना

कंजूस 30/08/2017 - 03:28
>>>पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो.>>> *असं होत असेल -फारच स्लो - तर दोष हा डिवाइसचा वाटतोय. * लेख "डिस्कवर" करणे - यासाठी दोन वेगळे बुकमार्क वापरून प्रश्न सुटतो. १) Link:http://www.misalpav.com/content/all आणि दुसरा २) link:http://www.misalpav.com/ * ब्राउजरचे सेटिंग्ज फुल व्ह्यु/ रीडिंग व्ह्यु/ कॅालम व्ह्यु केल्यानेही लेआउट बदलता येतो.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अभ्या.. 29/08/2017 - 16:49
ऑलरेडी भकास केलायत की ओ, मी काय म्हणतो टफिमामा, एक नवीन संस्थळाच बघा राव, हाय तुमच्यात ते पोटेन्शल.

In reply to by यशोधरा

दशानन 31/08/2017 - 22:49
हो, अगदी पूर्णपणे. शक्यतो हाच मोठा गाढवपणा माझा होता मी हवे किंवा असावे ते ते उपलब्ध करत गेलो.. व पुढील सगळा इतिहास आहे. पण त्या चुका दुसरा कोणी करु नये यासाठी देखील मी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परत एकदा पण, अपडेटेड होणे ही काळाची गरज आहे, व पूर्ण अपडेटेड असे काही या फिल्डमध्ये नसते ही, पण 5-7 वर्षाने ना का होईना बेसिक चेंज हा साईटला नव्हे तर सदस्यांना हवा असतो व तो करावा लागेल. परत.. पण, आपली भूमिका आणि बेसिक गरजच (साईट रिसोर्स) यात नेहमी तफावत असते हे लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत. मला मिपा वाचायला आणि लेख लिहायला अगदी सोपं वाटतं. मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून कसही वापरलं तरी मस्त जमत. माझ्या दृष्टीने तर आहे हे झक्कास चालू आहे

पैसा 29/08/2017 - 21:19
सगळ्या मागण्यांना +१! फक्त ८ क्रमांक बॅकस्पेस बद्दल माझा अनुभव असा की हा प्रॉब्लेम क्रोम ब्राउझरातच येतो. फायरफॉक्सला हा प्रॉब्लेम नाही. एकूण गमभन आणि अपडेटेड क्रोम ब्राउझरचे काहीतरी वाकडे आहे. अँड्रॉईड मोबाईल क्रोमचे तर अगदीच!

In reply to by पैसा

सही रे सई 30/08/2017 - 20:22
बॅकस्पेस चा प्रयोग लगेच फायरफॉक्स मधे करुन पाहिला तर तिथे हे चालतय. पण पल्याडच्या साईट वर क्रोम वर पण गमभन चालतय बॅकस्पेस ने सुद्धा. हे कसं काय? असा प्रश्न पडला आहे.

In reply to by पैसा

सही रे सई 01/09/2017 - 03:56
तसं काही आपल्याला पण इथे करता येईल का सहज शक्य असेल तर? नसेल सहज होण्यासारखे तर मग वेळ मिळेल तसा आणि प्राधान्यक्रमानुसार करावे. पण हे फा.फॉ. चे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by सही रे सई

पैसा 01/09/2017 - 07:17
ते नीलकांत बघेल. पण बहुतेक लेटेस्ट द्रुपल वर गमभन नीट चालत नाहीये, त्यामुळे पुढच्या upgrade ला बदलावे लागणार आहे.

In reply to by पैसा

माझाही हाच अनुभव आहे. बाकी नवीन लेआऊट जास्त सुटसुटीत वाटते.

उपयोजक 30/08/2017 - 07:46
आपण सगळे मिपाकडून एवढ्या अपेक्षा करतोय पण मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये. माबोसारख्या मिपानंदेखील जाहिराती स्विकाराव्यात का? यामुळे अपेक्षित सोयींसाठी आवश्यक निधी मिळेल.

In reply to by उपयोजक

कंजूस 30/08/2017 - 12:49
>>मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये.>> म्हणूनच आहे त्या चौकटीला बाहेरून आधार देण्याचा फुकटचा उपाय सुचवला.आपली सोय आपल्या उपलब्ध साधनांतून बघायची.

अत्रे 30/08/2017 - 08:50
आपल्या प्रतिसादाला कोणी रिप्लाय केला की आपल्याला नोटोफिकेशन आले तर बरे होईल. यातल्या तांत्रिक बाबी माहित नाहीत पण https://www.discourse.org या फोरम सॉफ्टवेअर चा उपयोग होईल का?

In reply to by अत्रे

टर्मीनेटर 31/08/2017 - 08:46
फोरम सॉफ्टवेअरपेक्षा फेसबुक कॉमेंट सिस्टीम चा वापर केला तर जास्ती छान होईल. माझ्या अंदाजे मिपा हे जुमला ह्या सीएमएस वर आधारित आहे, आणि त्यासाठी जुमला चं एक्सटेंशन पण उपलब्ध आहे.

एस 30/08/2017 - 20:19
पेजिनेशन ही अनावश्यक गोष्ट आहे असे मला वाटते. सगळे प्रतिसाद एकाच पानावर आले तर काय फरक पडतो? पेज लोड व्हायला वेळ लागेल थोडा इतकेच. फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर चढविण्याची सोया झाली तर खूप बरे होईल. अर्थात आर्थिकदृष्टीने ते परवडायला हवं. तांत्रिक माहिती नसल्याने पास.

इरसाल 31/08/2017 - 11:51
सही आपोआप यायला हवी पुर्वीसारखी. ## सही सुरु ## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. ## सही समाप्त ##

In reply to by उपयोजक

नाखु 16/09/2017 - 16:14
सही असेल तर प्रतिसाद देण्यात अर्थ आहे, नाहितर धागा सुद्धा व्यर्थ आहे ! मिपा "खोकले" यांच्या मिपा माझा तर मी (नक्की)कुणाचा या धुराळा संग्रहातुन साभार

सप्तरंगी 31/08/2017 - 17:17
अगदी सुरुवातीला काही ठरवुन मिपा वर लॉगिन केलं होत तेंव्हा जे बाकी कुठे लिहिणे शक्य नाही ते इथे लिहिता येईल असा विचार होता पण मिपा वर लॉगिन करायला सुद्धा (लॉगिन name साठीही ) मला google मराठी typing उघडावे लागते. मग मराठीत type करून तिथून इथे कॉपी पेस्ट करावे लागते. इथे फोटो / लिंक अपलोड करणे फबी सारखे सोपे नाही. त्यामुळे इच्छा असूनही लिहिणे होत नाही. इथे असलेले सगळेच लेख फार उत्तम आहेत असे वाटत नाही, वैचारिक -creative लेखांची कमी जाणवते. जे असते ते तसे हलके-फुलके असते. खूप दिवसांनी इथे आले तरी फार काही मिस केले आहे असे वाटत नाही. इथे बरेच लोक एकमेकांना ओळखत असावेत आणि त्यानुसार एकमेकांच्या पोस्ट वर comment करतात, म्हणजे काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे त्यावर त्यांचे रिप्लाय अवलंबून असतात त्यामुळे जरा उपरे हि वाटते. त्यामुळेही मी तरी कविता-लेख इथे share करायची फारशी हिम्मत केली नाही. आणि मी उगीच वेळ घालवते आहे का असे वाटून त्याचीही गरजही वाटेनाशी झाली. यात मिपा या संस्थळाचा दोष नाहीच पण मिपाकरांचा असूच शकतो. आजकाल फार rarely लॉगिन करते पण एखादा लेख आवडला तर पटकन shareहि करता येत नाही. like, unlike, love सारखे काही साधे सोपे पर्याय असतील जे लॉगिन न करताही येऊ शकेल तरी बरे. बाकी अजूनही लोकांनी सांगितले आहेच तेही लक्षात घ्यावे. may be जे मी लिहिले आहे ते तुम्हाला अपेक्षित नसावे कारण यात फारश्या technical गोष्टी सुचवलेल्या नाही तरीही लिहिले.

In reply to by सप्तरंगी

एस 01/09/2017 - 00:19
सप्तरंगीताई, येथे अगदी नवीन लोकांच्याही उत्तम लेखनाचे कौतुक होते आणि प्रोत्साहनदेखील दिले जाते. यातला 'उत्तम लेखन' हा भाग महत्त्वाचा आहे. आणि उपरेपणा म्हणाल तर तो बहुतांशी आपल्या मानण्या-न मानण्यावर अवलंबून असतो. तांत्रिक अडचणी आणि सोयीसुविधांची सूचना लक्षात घेण्याजोगी आहे. लेखनासंबंधी काही मदत लागल्यास साहित्य संपादक असतातच. इतरही जुने लोक मदत करतात. तेव्हा बिनधास्त येथे लिहा, लेख-कविता टाका. मिपा आपलांच असां. :-)

दशानन 13/09/2017 - 14:51
मिपावर काळापासून एक अडचण जाणवत आहे, नवीन प्रतिसाद संख्येवर क्लिक केल्यावर देखील केवळ मुख्य धाग्यावर पोचत आहे मी, खरं तर नवीन प्रतिसादावर जायला हवे. ही अडचण मला मोबाईल क्रोम मध्ये येत आहे. लॅपटॉपवर पाहिले नाही.

दशानन 29/08/2017 - 00:07
मिपाचा वाढदिवस (आठवडा) सुरु आहे, तेव्हा मागायला लाजू नका ;) शक्य असेल तर मिपा आवर्जून हे बद्दल करेल याची खात्री आहे म्हणून धागा टाकला आहे, तुम्ही हि सामील व्हा... व आपल्या मागण्या येथे द्या ;)

In reply to by पिलीयन रायडर

दशानन 29/08/2017 - 00:21
>>व्हेरिफाईड सदस्य म्हणजे, त्याचे असणे कोणी ना कोणी (येथे कॉज आहेत) मान्य केले आहे कि मी या "आयडीला" व्यक्तिगत स्वरुपात ओळखतो. याचा फायदा सदस्यांना नसून संकेतस्थळाला आहे, व असावा. कारण लिहणारा व्यक्ती "जबाबदारी" टाळू शकणार नाही व "संभाव्य" कायदे / नियम यांच्या कचाट्यातून हे स्थळ म्हणजे मिपा सुरक्षित राहील.

कपिलमुनी 29/08/2017 - 01:02
मिपाच्या मुख्य पानावर अभिप्राय द्यायची सोया आहे त्यामुळे या धाग्याचे वेगळे काय प्रयोजन आहे ? बाकी मिपा मालक समर्थ आणि सदैव अभिप्रायासाठी उपलब्ध आहेतच

थॉर माणूस 29/08/2017 - 01:46
अनेक वर्षे वाचक आणि नंतर सदस्य असा माझा मिसळपाव वरचा प्रवास आहे, तरी अजूनही लेखक होऊन धागा लिहीण्याचा टप्पा पार केलेला नाही, असो. :) हे संस्थळ अनेक वर्षे उत्तमरीत्या चालू आहे, त्याबद्दल प्रथम मालक/चालक/वाहक सगळ्यांचेच आभार. नाहीतर अचानक उगवणारी आणि गायब होणारी किंवा अगदी चालू अवस्थेतून अचानक गायब झालेली उदाहरणे देखील आहेत. त्यामुळे सुधारणा होणे चांगले असले तरी मालकांनी बदल करणार नाही पण संस्थळ मात्र चालू राहील असे सांगीतले तरी आनंदच होईल.

कंजूस 29/08/2017 - 09:13
मिपासर्चबद्दल - गुगलवर अवलंबून राहाण्यापेक्षा एक टॅग्ज आधारित लिस्ट दाखवता येऊ शकेल. लेखक जे काही टॅग्ज देतात त्याशिवाय एक रेडिमेड ड्रॅापडाउन मेनू करायचा आणि त्यातले निवडण्याचे आवश्यक करायचे. सर्चमध्ये ते टॅग्ज दाखवले की फक्त एक निवडायचा, काही शब्दवगैरे लिहायचे नाहीत. आणि एकदा पाचसहा जणांनी सर्व लेखांना योग्य टॅग्ज दिले की झाले काम. ही पद्धत आणल्यावर मात्र पुढचे लेख सिद्ध केलेल्या टॅग्जमधून एकतरी निवडल्याशिवाय प्रकाशित होणार नाही असा जॅमर ठेवायचा. डेटाबेसमधून फक्त त्या प्रकारातलेच लेख दाखवले जा

उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे. मलाही मि.पा.वर अनेक बदल व्हावेसे वाटतात सध्याचा ईंटरफेस अनेकांना आवडलेला नाही, तरी मला तरी तोच सुटसूटीत वाटतोय. एक तर वर्गवार विभागणी असल्यामुळे आपल्याला हव्या त्याच विभागात चटकन जाता येत. जुना ईंटरफेस ज्यात सगळे धागे एकाखाली एक स्वरुपात दिसायचे त्यामधे अडचण अशी होती कि समजा कोणी खरोखरच दोनशे कविता टाकल्यातर ( ;-) )अनेक धागे कारण नसताना खाली जातील. तेव्हा आता आहे हाच ईंटरफेस कायम रहावा असे वाटते. मायबोलीवर आहे तश्या किमान तीन सुविधा मि.पा.वर हव्यात असे माझे मत आहे. १ ) धागा शोधण्याची सोय, हि फारच आवश्यक आहे. २ ) एखादा धागा आवडला तर तो व्हॉटसअ‍ॅपवर थेट शेअर करणारे बटन. ३ ) तिसरी सोय म्हणजे फोटो अपलोडींग. अनेक नव्याने लिहीणार्‍यांना हिच फार मोठी अडचण होते. अगदी मलासुध्दा हिच अडचण जाणवली होती, म्हणून बराच काळ लिहिण्याचे थांबविले होते. ४ ) फोटो प्रत्येकवेळी अल्बमवरुन लोड करणे त्रासदायक होते. मायबोलीवर थेट हार्ड डिस्कवरचे फोटो लोड करण्याची सोय आहे. खरेतर एखादी एच.टी.एम.एल. फाईलमधले कंटेंट आहे तसे पेस्ट करण्याची सोय आहे. माझ्यासारख्या भटकंतीचे धागे लिहीणार्‍याला या फोटो अपलोड करण्याच्या गैरसोयीमुळे फार वेळ जातो. या प्रकारामुळे मी माझे धागे आधी ब्लॉगवर लिहून ठेवले आहेत, पण धागा टाकताना फोटो अपलोडींगमधे वेळ जातोच. यावर काही उपाय निघाला तर फारच बरे होईल. ५) एखाद्याचा आय्,डी.काही कारणाने थेट उडण्यापेक्षा त्याला आधी वॉर्निंग देण्यात आले तर बरेच होईल. निदान ती व्य्क्ती शक्य झाल्यास सुधारणा करेल. अर्थात सुधारणा दिसली नाही तर कारवाई आहेच. ६ ) आय.डी. व्हेरीफाईड करुन घ्यावा याच्याशी सहमत. या अश्याच चर्चा आम्ही फक्त मि.पा.कर असलेल्या "मिळून मिसळून" या टेलिग्राम ग्रुपवर करीत असतो. त्या चर्चेतून ज्या सुधारणा मला व्हाव्या असे वाटले त्या लिहील्या.

In reply to by दुर्गविहारी

बाजीप्रभू 30/08/2017 - 07:53
मला हे बदल झाले तर मिपा अजून आवडेल. १) प्रतिसादांचा क्रम नवा ते जुना असा असायला हवा... "खफ" मधे आहे तसा. उदा. ताज्या घडामोडी - १,२..... ९, हा धागा मोबाईलवर वाचायचा झाला तर तोंडाला फेस येतो.... स्क्रोल करत करत आजच्या तारखेला येईल पर्यंत धीर सुटतो. २) कि-वर्ड वरून संबंधीत लेख शोधण्याची सुविधा PC वरही चालवता आली पाहिजे.

In reply to by दुर्गविहारी

ऋतु हिरवा 30/08/2017 - 19:16
मी मिपावर नवीन आहे. मलाही फोटो टाकायला खूप अडचणी येतात. त्यामुळे फोटो टाकणे सोपे झाले तर बरे होईल .

उपयोजक 29/08/2017 - 12:39
अॅपचा मुद्दा पटला! २०१४ नंतर या अॅपमधे काहीच बदल झालेले नाहीत.याअॅपमधे नोटीफिकेशनचीही सोय हवी.म्हणजे कोण प्रतिसाद देतंय तेही कळेल.मुख्य म्हणजे उपप्रतिसाद वेळेत देता येईल.

कंजूस 29/08/2017 - 14:32
फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट ग्रुप बनवावा आणि तिथे आपल्या आइडीनावाला मिपाकर आडनाव लावून( उदा माझे kanjoos mipakar) लॅागिन व्हावे म्हणजे हा कोण हे कळायला सोपे जाईल. तिथे फोटो अपलोड करावा. तिथून इथे सहज आणता येतो. ज्यांना खरी ओळख लपवायची असेल तेही साध्य होईल. फेसबुकच्या मोठ्य सर्वरचा उपयोग करून घेता येईल.

कंजूस 29/08/2017 - 14:38
नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच होईल. असे हे समांतर मिपा करण्याचा/चालवण्याचा उद्देश नाही परंतू काही प्रश्न लगेच सुटतील. एक वेगळे फेसबुक अकाउंट उघडावे लागेल इतकेच. तेसुद्धा वेगळ्या ब्राउजरात ठेवले तर तेही चालू राहील एकाचवेळी. मोबाइलचा स्क्रीन लॅाक असतोच. लॅागआउट करायचेच नाही.

In reply to by कंजूस

अभ्या.. 29/08/2017 - 15:43
कंकाका तुम्ही जेवढे प्रयोग आंतरजालावर करता ना त्याच्या निम्मे जरी मी माझ्या व्यवसायात केले असते तरी डबल प्रॉफिट काढला असता. बाकी काई नाही ओ, आळस आणि सगळे काही आयते मिळवायचा सोस नडतो. ;)

सानझरी 29/08/2017 - 16:24
वरच्या काळ्या पट्टीत ठळक अक्षरात "मिसळपाव" लिहीलंय ते काढलं तर फार बरं होईल. ऑफिसमधे दुरुनसुद्धा कोणालाही ते वाचता येतं. हे काय बघतेयस असं विचारलं तर मिसळपावची रेसिपी बघतेय हे कारण सांगुन कलिग्ज लोकांना टोलवलंय.

प्रसाद_१९८२ 29/08/2017 - 16:34
मुळ लेखातील मुद्दा क्रं. दोन बाबत काही करता आले तर पाहा. प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेल्यास नवीन प्रतिसाद शोधणे अतिशय कठिण होऊन जाते.

साहना 29/08/2017 - 16:36
पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो. माझ्या मते जुना लेआऊट चांगला होता. पाहिजे तर तिथे "pinned" पोस्ट चा कन्सेप्ट आणावा पण सध्याचे मुखपृष्ठ अतिशय वाईट आहे.

In reply to by साहना

कंजूस 30/08/2017 - 03:28
>>>पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच स्लो आणि बेभरवशाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधायचा लेआउट मध्ये लेख "डिस्कवर" करणे मुश्किल जाते. नवीन पांच लेख आले कि सहावा गायब होतो.>>> *असं होत असेल -फारच स्लो - तर दोष हा डिवाइसचा वाटतोय. * लेख "डिस्कवर" करणे - यासाठी दोन वेगळे बुकमार्क वापरून प्रश्न सुटतो. १) Link:http://www.misalpav.com/content/all आणि दुसरा २) link:http://www.misalpav.com/ * ब्राउजरचे सेटिंग्ज फुल व्ह्यु/ रीडिंग व्ह्यु/ कॅालम व्ह्यु केल्यानेही लेआउट बदलता येतो.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अभ्या.. 29/08/2017 - 16:49
ऑलरेडी भकास केलायत की ओ, मी काय म्हणतो टफिमामा, एक नवीन संस्थळाच बघा राव, हाय तुमच्यात ते पोटेन्शल.

In reply to by यशोधरा

दशानन 31/08/2017 - 22:49
हो, अगदी पूर्णपणे. शक्यतो हाच मोठा गाढवपणा माझा होता मी हवे किंवा असावे ते ते उपलब्ध करत गेलो.. व पुढील सगळा इतिहास आहे. पण त्या चुका दुसरा कोणी करु नये यासाठी देखील मी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परत एकदा पण, अपडेटेड होणे ही काळाची गरज आहे, व पूर्ण अपडेटेड असे काही या फिल्डमध्ये नसते ही, पण 5-7 वर्षाने ना का होईना बेसिक चेंज हा साईटला नव्हे तर सदस्यांना हवा असतो व तो करावा लागेल. परत.. पण, आपली भूमिका आणि बेसिक गरजच (साईट रिसोर्स) यात नेहमी तफावत असते हे लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत. मला मिपा वाचायला आणि लेख लिहायला अगदी सोपं वाटतं. मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून कसही वापरलं तरी मस्त जमत. माझ्या दृष्टीने तर आहे हे झक्कास चालू आहे

पैसा 29/08/2017 - 21:19
सगळ्या मागण्यांना +१! फक्त ८ क्रमांक बॅकस्पेस बद्दल माझा अनुभव असा की हा प्रॉब्लेम क्रोम ब्राउझरातच येतो. फायरफॉक्सला हा प्रॉब्लेम नाही. एकूण गमभन आणि अपडेटेड क्रोम ब्राउझरचे काहीतरी वाकडे आहे. अँड्रॉईड मोबाईल क्रोमचे तर अगदीच!

In reply to by पैसा

सही रे सई 30/08/2017 - 20:22
बॅकस्पेस चा प्रयोग लगेच फायरफॉक्स मधे करुन पाहिला तर तिथे हे चालतय. पण पल्याडच्या साईट वर क्रोम वर पण गमभन चालतय बॅकस्पेस ने सुद्धा. हे कसं काय? असा प्रश्न पडला आहे.

In reply to by पैसा

सही रे सई 01/09/2017 - 03:56
तसं काही आपल्याला पण इथे करता येईल का सहज शक्य असेल तर? नसेल सहज होण्यासारखे तर मग वेळ मिळेल तसा आणि प्राधान्यक्रमानुसार करावे. पण हे फा.फॉ. चे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by सही रे सई

पैसा 01/09/2017 - 07:17
ते नीलकांत बघेल. पण बहुतेक लेटेस्ट द्रुपल वर गमभन नीट चालत नाहीये, त्यामुळे पुढच्या upgrade ला बदलावे लागणार आहे.

In reply to by पैसा

माझाही हाच अनुभव आहे. बाकी नवीन लेआऊट जास्त सुटसुटीत वाटते.

उपयोजक 30/08/2017 - 07:46
आपण सगळे मिपाकडून एवढ्या अपेक्षा करतोय पण मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये. माबोसारख्या मिपानंदेखील जाहिराती स्विकाराव्यात का? यामुळे अपेक्षित सोयींसाठी आवश्यक निधी मिळेल.

In reply to by उपयोजक

कंजूस 30/08/2017 - 12:49
>>मिपा हा मोफत चालणारा उपक्रम आहे याचा विसर पडू नये.>> म्हणूनच आहे त्या चौकटीला बाहेरून आधार देण्याचा फुकटचा उपाय सुचवला.आपली सोय आपल्या उपलब्ध साधनांतून बघायची.

अत्रे 30/08/2017 - 08:50
आपल्या प्रतिसादाला कोणी रिप्लाय केला की आपल्याला नोटोफिकेशन आले तर बरे होईल. यातल्या तांत्रिक बाबी माहित नाहीत पण https://www.discourse.org या फोरम सॉफ्टवेअर चा उपयोग होईल का?

In reply to by अत्रे

टर्मीनेटर 31/08/2017 - 08:46
फोरम सॉफ्टवेअरपेक्षा फेसबुक कॉमेंट सिस्टीम चा वापर केला तर जास्ती छान होईल. माझ्या अंदाजे मिपा हे जुमला ह्या सीएमएस वर आधारित आहे, आणि त्यासाठी जुमला चं एक्सटेंशन पण उपलब्ध आहे.

एस 30/08/2017 - 20:19
पेजिनेशन ही अनावश्यक गोष्ट आहे असे मला वाटते. सगळे प्रतिसाद एकाच पानावर आले तर काय फरक पडतो? पेज लोड व्हायला वेळ लागेल थोडा इतकेच. फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर चढविण्याची सोया झाली तर खूप बरे होईल. अर्थात आर्थिकदृष्टीने ते परवडायला हवं. तांत्रिक माहिती नसल्याने पास.

इरसाल 31/08/2017 - 11:51
सही आपोआप यायला हवी पुर्वीसारखी. ## सही सुरु ## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. ## सही समाप्त ##

In reply to by उपयोजक

नाखु 16/09/2017 - 16:14
सही असेल तर प्रतिसाद देण्यात अर्थ आहे, नाहितर धागा सुद्धा व्यर्थ आहे ! मिपा "खोकले" यांच्या मिपा माझा तर मी (नक्की)कुणाचा या धुराळा संग्रहातुन साभार

सप्तरंगी 31/08/2017 - 17:17
अगदी सुरुवातीला काही ठरवुन मिपा वर लॉगिन केलं होत तेंव्हा जे बाकी कुठे लिहिणे शक्य नाही ते इथे लिहिता येईल असा विचार होता पण मिपा वर लॉगिन करायला सुद्धा (लॉगिन name साठीही ) मला google मराठी typing उघडावे लागते. मग मराठीत type करून तिथून इथे कॉपी पेस्ट करावे लागते. इथे फोटो / लिंक अपलोड करणे फबी सारखे सोपे नाही. त्यामुळे इच्छा असूनही लिहिणे होत नाही. इथे असलेले सगळेच लेख फार उत्तम आहेत असे वाटत नाही, वैचारिक -creative लेखांची कमी जाणवते. जे असते ते तसे हलके-फुलके असते. खूप दिवसांनी इथे आले तरी फार काही मिस केले आहे असे वाटत नाही. इथे बरेच लोक एकमेकांना ओळखत असावेत आणि त्यानुसार एकमेकांच्या पोस्ट वर comment करतात, म्हणजे काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे त्यावर त्यांचे रिप्लाय अवलंबून असतात त्यामुळे जरा उपरे हि वाटते. त्यामुळेही मी तरी कविता-लेख इथे share करायची फारशी हिम्मत केली नाही. आणि मी उगीच वेळ घालवते आहे का असे वाटून त्याचीही गरजही वाटेनाशी झाली. यात मिपा या संस्थळाचा दोष नाहीच पण मिपाकरांचा असूच शकतो. आजकाल फार rarely लॉगिन करते पण एखादा लेख आवडला तर पटकन shareहि करता येत नाही. like, unlike, love सारखे काही साधे सोपे पर्याय असतील जे लॉगिन न करताही येऊ शकेल तरी बरे. बाकी अजूनही लोकांनी सांगितले आहेच तेही लक्षात घ्यावे. may be जे मी लिहिले आहे ते तुम्हाला अपेक्षित नसावे कारण यात फारश्या technical गोष्टी सुचवलेल्या नाही तरीही लिहिले.

In reply to by सप्तरंगी

एस 01/09/2017 - 00:19
सप्तरंगीताई, येथे अगदी नवीन लोकांच्याही उत्तम लेखनाचे कौतुक होते आणि प्रोत्साहनदेखील दिले जाते. यातला 'उत्तम लेखन' हा भाग महत्त्वाचा आहे. आणि उपरेपणा म्हणाल तर तो बहुतांशी आपल्या मानण्या-न मानण्यावर अवलंबून असतो. तांत्रिक अडचणी आणि सोयीसुविधांची सूचना लक्षात घेण्याजोगी आहे. लेखनासंबंधी काही मदत लागल्यास साहित्य संपादक असतातच. इतरही जुने लोक मदत करतात. तेव्हा बिनधास्त येथे लिहा, लेख-कविता टाका. मिपा आपलांच असां. :-)

दशानन 13/09/2017 - 14:51
मिपावर काळापासून एक अडचण जाणवत आहे, नवीन प्रतिसाद संख्येवर क्लिक केल्यावर देखील केवळ मुख्य धाग्यावर पोचत आहे मी, खरं तर नवीन प्रतिसादावर जायला हवे. ही अडचण मला मोबाईल क्रोम मध्ये येत आहे. लॅपटॉपवर पाहिले नाही.
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे. १. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी. अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत. २. नवीन प्रतिसाद अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ?

वृद्धाश्रमाबद्दल माहिती

विमल ·

रेवती 04/08/2017 - 20:17
पुण्याजवळ खराडी गावात अण्णासाहेब बेहेरे वृद्धाश्रम आहे. सर्व सोयिंनी युक्त आहे व वृद्धश्रमाच्या बाहेरच बस स्टॉप असल्याने बसेस मिळतात.

कंजूस 04/08/2017 - 21:14
जर कोणीच विचारत नाही तर पुणे काय अन पॅरिस काय सर्व सारखेच हो. टिटवाळा स्टेशनजवळचे खडवली स्टेशन आहे तिथे ८० वृद्धांची सोय होते. दर गुरुवारी आजारींना बसने घाटकोपरच्या राजावाडी हॅास्पिटलात उपचार करून नेऊन आणतात. आश्रमाजवळच नदी, स्वामिमठ आहे. रम्य ठिकाण.

कंजूस 07/08/2017 - 10:57
>>माहिती आहेत तेवढ्याची यादी उपलबध करावी >> मिळते . वरच्या खडवलीच्या आश्रमात चौकशीसाठी गेलो होतो ( थोड्या वर्षांपुर्वींची गोष्ट आहे ) तेव्हा तिथल्या संचालकाने सांगितलं - आमच्याकडे आता जागा नाही परंतू हे घ्या म्हणून कपाटातून फाइली काढून समोर ठेवल्या. त्यात सर्व आश्रमांचे पत्ते,फोन नं,महिना खर्च दिलेले होते!! इतकं समाजकार्य चालतं.

पैसा 07/08/2017 - 11:00
तुमचा हेतू स्तुत्य आहे, पण वृद्धाश्रमात सोय करण्यासाठी त्या बाई किंवा त्यांचे घरचे यांची तयारी आहे का? इथे पत्ते जमा होत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, की कोणाला गरज पडल्यास सांगता येतील. पण त्या बाईंची स्वतःची तयारी आहे का हे आधी विचारात घ्यावे लागेल.

In reply to by पैसा

विमल 07/08/2017 - 13:19
पैसाताई, माफी काय मागायची त्यात? तुमचा मुद्दा रास्त आहे. बाई एकदा बोलता-बोलता म्हणाल्या होत्या की त्यांना वेगळी खोली घेऊन रहावसं वाटतं पण या वयात, तेही आजारपणं असतांना ते झेपणार नाही म्हणून सहन करते. त्यावरून मी अंदाज केला की बाईंना त्यांची सोय होईल अश्या ठिकाणी वेगळं रहायला आवडेल. त्यांच्या मनात (कदाचित टॅबूमुळे) वृद्धाश्रमाचा विचार आलाच नसावा. त्यामुळे त्यांची मर्जी जाणण्याआधी माहिती हाताशी असणं मला गरजेचं वाटलं. उगाच त्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय सांगून आशा दाखवावी आणि नंतर त्या दिशेने काहीच मदत करता आली नसती तर त्यांच्या आशा पल्लवित होवून पुन्हा करपण्याची भीती होती. बाई ओळखीतल्या असल्याने आणि विषय नाजूक असल्याने सगळीकडे उघडपणे चौकशीही करता येणार नाहीये. माझा विचार असा आहे की २-३ वृद्धाश्रमात चौकशी करून जिथे जागा असेल तिथल्या माहिती सकट बाईंना हा पर्याय सांगावा. त्यांची वृद्धाश्रमात जाण्याची ईच्छा ठाम असल्यास घरच्यांशी त्या स्वतः बोलतील किंवा मी सामोपचाराने बोलेनच. मी आशा करते की माहिती मागताना मिपाकरांची काही दिशाभूल झाली नसावी. मला माहितीये की मी लष्कराच्या भाकर्‍या भाजतेय पण फक्त बघून गप्प बसायला मन मानत नाही.

In reply to by विमल

पैसा 07/08/2017 - 16:26
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद! तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, पण आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. लोक सहसा तयार होत नाहीत. मुले वगैरे असली तर दोघांनाही ते मान्य होत नाही. माझ्या जवळच्या ओळखीत एका काकूंना झेपत नाही तरी काकांच्या हट्टासाठी मुलांपासून हे काकाकाकू वेगळे राहात आहेत. त्यांची मुले आपल्याजवळ राहा असे सांगत असतानाही. हे एक टोक तर अजून एक घराचे लोक डिमेनशिया झालेल्या आजींसाठी नर्स सुद्धा ठेवायला तयार नाहीत ते इमोशनल कारणांनी की पेड नर्स नीट देखभाल करणार नाहीत. अर्थात सगळा कामाचा भार सुनांनी उचलावा ही अपेक्षा दोन्ही मुलांची. असे बरेच नमुने असतात पण वृद्धाश्रमाचा कोणी विचार करू धजत नाहीत त्याचे कारण लोक काय म्हणतील हा विचार केला जातो, मग त्यामुळे कितीही जणांना त्रास का होईना.

In reply to by पैसा

विमल 08/08/2017 - 15:43
मल व्यक्तिशः वृद्धाश्रम ही संकल्पना अजिबात वाईट वाटत नाही, किंबहुना उत्तमच वाटते. वृद्धाश्रमाला असलेला सामाजिक कलंक दूर झाला तर उलट जास्त संख्येने आणि संरचित सोयी असलेले वृद्धाश्रम बनतील आणि त्यात अनेक जेष्ठ नागरिकांना आरामात आयुष्य व्यतित करता येईल. उगाच वयाला झेपत नसूनही एकटे राहणे किंवा तरूण पिढीला वाटणारा नकोसेपणा सहन करणे यापेक्षा समवयस्क लोकांत राहून आला दिवस आनंदात घालवणे कधीही चांगले, हे माझे मत!

In reply to by विमल

रेवती 09/08/2017 - 00:28
अगदी सहमत आहे. मी वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार हे अगदी विशीत असतानाच ठरवले आहे व मत बदलावेसे वाटले नाही. माझ्या आजेसासूबाई (सासर्‍यांच्या काकू) नव्व्दीत आहेत. वृद्धाश्रमात राहतात व समाधानी आहे. उलट आम्ही सारखं भेटायला गेलेलं त्यांना आवडत नाही. थोडीफार आजारपणे आली तरी तेथील स्टाफकडून काळजी घेतली जाते. घरचेच सारखे फोन करतात की येऊ का न्यायला पण या जात नाहीत. त्यांची कारणे स्पष्ट आहेत. आपला संसार करून व मुलांचे धावपळीचे संसार पाहून कंटाळा आलाय. आजेसासरे व त्यांचा एक मुलगा यांच्या जाण्याने आजेसासूबाईंना सन्यस्त जीवन जगावेसे वाटते व ते रुटीन इतरांसाठी अडचणीचे ठरू शकते.

In reply to by विमल

Rajesh188 02/01/2019 - 20:42
आई वडील म्हातारपणी सांभाळणे हे कर्तव्यच आहे नाहीतर कशाला हवीत मुल. पण ही गोष्ट पण खरी आहे आईवडील सांभाळ ने नाही पण property var हक्क सांगायला हे नालायक हजार आसतात . कायद्यांनी च आशा नालायक मुलांचे अधिकार पुर्णत नाकारले पाहिजेत .म्हणजे aikdya करोडपती chya मुलाला 50000 हजारा पासून प्रॉपर्टी जमा करावी लागेल .

शेखर 07/08/2017 - 17:02
निवारा, पुणे हा एक चांगला पर्याय आहे. अधिक माहिति साठी http://www.niwaraoldagehome.org/ भेट द्या.

कंजूस 09/08/2017 - 21:05
१)"आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. " २)"वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार " - इतकं सोप्प नाही. शेवटी वृद्धाश्रम चालवणे हासुद्धा धंधा झालेला आहे. त्यांचेही बरेच प्रश्न आहेत. आर्थिक संकटे येतात. ९५-९८% आश्रम सुदृढ उठबस करणाय्रांनाच ठेवायला तयार असतात. फार आजारी झाल्यावर नातेवाइकांना घेऊन जायला सांगतात. आपसापात भांडतात म्हातारे

रेवती 09/08/2017 - 21:52
कंकाका, आपापसात तर आपणही इथे भांडतो (म्हणजे काहीतरी वाद घालतो). जिथे कुटुंब असतं तिथे हे सगळं मर्यादेत चालत असतं. आपल्या लिमिटेशन्स ओळ्खून राहिल्यास प्रश्न कमी होतील. सगळे कधीच सुटणार नसतात. जसे, दिवसभर घरातली, बाहेरची, हापिसातली कामे केल्यावरही किती गोष्टी करायच्या उरलेल्या असतात म्हणून आपण जेवण झोप सोडून देतो का? रोजचे मूडस, दुखणं खुपणं कोणालाही चुकलेलं नाही. त्यांचा बाऊ करणं वयाबरोबर कमी होत जायला हवं. आपल्या समाजात नवरे लोक्स घर चालवण्यात फारसा हातभार लावत नाहीत तर बायका बाहेरची कामे करण्यास कचरतात (आताच्या पिढीत तसे नसावे). म्हातारपणी बायको पुढे निघून गेली तर नवरे लोकांना घरात जाऊ दे, वृद्धाश्रमातही मनास काही येत नाही. मग वैताग येतो. वृद्धाश्रम हा धंदा असेल तर असू दे! जोवर सगळे वेळच्यावेळी होतेय तोवर ज्यांना पैसे मिळवायचेत ते लोक पडद्यामागून मिळवून घेणारचेत. माझ्या आजेसाबांना विचारले की "प्रत्येक खोलीत दोनजण रहात असताना तुमच्या खोलीत तुम्ही एकट्याच कश्या?" त्यावर त्यांनी सांगितले की पतीच्या व मुलाच्या जाण्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा झालाय. दुसर्‍या माणसाने कितीही बरी वागणुक दिली तरी त्यांना ते पटत नाही. मग त्याचा आपल्याला व आपला त्या माणसाला त्रास होणार. त्यापेक्षा त्या जागेचे संपूर्ण भाडे भरून राहतात. आपल्या स्वभावातील बदलता व न बदलता येणारे काय आहे हे आपल्याशी पक्के केल्यास अडचणी कमी येतील. ज्या मनुष्याला सगळ्या खोलीचे भाडे देणे परवडत नसेल त्याने आपली आर्थिक मर्यादा समजून अ‍ॅडजस्ट करावे. आता मी जर म्हातारपणी वृद्धाश्रमात जाण्याचे ठरवलेय तर काय काय सवयी असल्या पाहिजेत किंवा असायला नकोत याचा विचार काहीसा करून ठेवलाय पण वाढत्या वयाबरोबर तो आणखी वेगळा असणार आहे याची कल्पना आहे. आजेसाबांना त्यांनी मनाची तयारी कशी केली हेही विचारले तर त्या म्हणाल्या की त्यांचे पती हयात असताना दोघेही हा विचार करायचे व वेगवेगळ्या आश्रमात जाऊन यायचे. बरीच वर्षे त्यांनी आपल्या व मुलांच्या मनाची तयारी केली. सर्व जवळच्या नातेवाईक मंडळींमध्ये स्पष्तीकरण दिले म्हणजे इतरांनी आपल्या मुलांवर बेजबाबदारपणाचा शिक्का मारायला नको. नंतर माझे आजेसाबू आश्रमात जाण्याआधीच गेले पण यांनी निर्णय बदलला नाही. वयाच्या नव्वदित त्या जरा वाकल्या आहेत पण आपला व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी अजिबात सोडल्या नाहीयेत. तब्येत त्यामुळे बरीच चांगली आहे. यशिवाय एक गोष्ट आवडली ती अशी की, त्या आम्हाला सगळा आश्रम आपणाहोऊन दाखवला. इथे जेवणाची व्यवस्था, इथे गच्ची, तिकडे लायब्ररी, टीव्ही रूम वगैरे. सगळे पर्फेक्ट नव्हते तर त्यांनी आम्हाला दाखवताना गच्चीवरून सुर्यास्त चांगला दिसतो (मला मध्ये मध्ये येणार्‍या केबल्स दिसत होत्या), मागील बाजूने नदी वाहते ते वळण चांगले आहे (मला ती गटारगंगा दिसत होती), वाचायला कितीतरी अध्यात्मिक पुस्तके आहेत वगैरे (मला तेथील पडद्यांचा रंग अतिषय उदास वाटला). शेवटी तुम्हाला काय पहायचे आहे? काकूआज्जींनी मला त्यांच्याकडील सेलफोन दाखवला. तो काही फार फॅन्सी नव्हता. "अगं हा शोध लागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं पण माझ्या हयातीत हे यंत्र वापरायला मिळालं ही गंमत आहे की नाही?" या काकूआज्जी व माझ्या सासूबाईंची मोठी बहिण, मावशी या दोघीही वयाने जास्त असूनही टापटिपिनं, नेटकेपणानं राहताना पाहणे आशादायक आहे. या पिढीनं अगदी काटकसरीनं संसार केलेत, जोडीदार पुढे निघून गेल्यावर आणि मोठाली आजारपणे पार पाडल्यावरही सकारात्मक दृष्टी सोडली नाही. हे किती चांगलं आहे.

In reply to by रेवती

विशुमित 09/08/2017 - 23:31
रेवाक्का ... का कोणास ठाऊक तुमचा हा प्रतिसाद वाचत असताना जीवनाबद्दल एक अनामिक भीती वाटली.. छान लिहलंय ..!!

In reply to by विशुमित

मृत्युन्जय 02/01/2019 - 23:03
खरंय. आपल्यासारख्या माणसाला आयुष्याची अखेर सोसावेल काय आणि निभावुन नेता येइल काय ही शंका मनाला चाटुन गेली. शिवाय म्हातारपणातल्या तडजोडी, मानापमान नाही सोसवणार मला. आयुष्याची अखेर मध्यातच झालेली बरी.

In reply to by रेवती

उत्तम प्रतिसाद. त्यामुळेच कोणताही संयमाची परीक्षा बघणारा आजार न होता हसतखेळत मृत्यू यावा अशी मनातून खूप इच्छा आहे.

In reply to by रेवती

स्मिता. 10/08/2017 - 15:50
माझंही असंच मत आहे. उतारवयात आपल्या क्षमता बघून योग्य तो व्यावहारीक निर्णय घेणे कधीही योग्य. तसंच वृद्धाश्रम धंदा झाला तर उत्तमच आहे. एकूण सगळ्यात गोष्टीत व्यावसायीकता येईल. मात्र एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटतो तो असा की जर बहुतेक वृद्धाश्रम हात-पाय चालत असणार्‍याच वृद्धांना ठेवत असतील आणि वृद्धांनी बिछाना पकडला की त्यांना परत न्यायला सांगत असतील तर ते अवघड आहे. आता मूळ चर्चेतल्या बाईंचंच उदाहरण घेतलं तर त्या बाईंना आताच कोणी विचारत नाही. वर त्या मुलांना सांगून वृद्धाश्रमात गेल्या आणि काही महिन्यांनी त्यांनी बिछाना पकडल्यावर वृद्धाश्रमाने परत जायला सांगितले तर कुठे जातील त्या? जरी मुलांनी नेलं तरी घरातली मानसीक अवस्था आतापेक्षाही वाईट होईल. एकदा प्रवेश घेतला की मृत्यू येत नाही तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या सोयी/सेवा पुरवणारे वृद्धाश्रम नाहीत का?

अत्रे 10/08/2017 - 06:54
वृद्धाश्रम / आडमुठ्या वयस्कर लोकांचे जीवन या विषयावर इंग्रजीत एक फार सुंदर पुस्तक/ ग्राफिक नॉवेल आहे. लेखिकेने स्वत:च्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे. Can't we talk about something more pleasant? ss https://www.theguardian.com/books/2016/nov/23/cant-we-talk-about-something-more-pleasant-roz-chast-review-graphic-memoir-new-yorker

कंजूस 10/08/2017 - 10:27
रेवती, प्रतिसाद पटला तरी तो वळत नाही सर्वांचा हे आम्ही जवळच्या तीनचार नातेवाइक,ओळखीचे यांचे अनुभव,एकासाठी वृद्धाश्रम शोधताना सहासात संचालकांची मते ऐकून वेगळी बाजू लक्षात आली.

विमल 10/08/2017 - 16:01
वृद्धाश्रमांची माहिती देणार्‍या तसेच त्याबाबतीत आपले विचार व्यक्त करणार्‍या सर्व सदस्यांचे मनापासून आभार! माहिती सोबत तुमची मतं लिहिल्याने माझ्याही विचारांना चालना मिळाली. कंजूसकाकांच्या प्रतिसादावरून वाटतंय की वृद्धाश्रमात जाणं आणि कायम तिथे राहणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. कदाचित जे आता वयस्कर किंवा वृद्ध आहेत त्यांच्या पिढीला वृद्धाश्रम म्हणजे आयुष्याचं अपयश अशी भावना असावी. ती काही त्यांची चूक नाही, समाजाचेच ते संस्कार! परंतु तरूण पिढी मात्र काळाबरोबर वृद्धाश्रमात राहण्याकरता स्वतःची मानसीक तयारी करत असावी असं वाटतं. अर्थात तरूण वयातले विचार उतारवयातही तसेच राहतील याची काही शाश्वती नाही.

Rajesh188 02/01/2019 - 11:50
वृध्द लोकांचं संगोपन करणे आणि त्यांची काळजी घेणे हे नवीन पिढीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे . त्या साठी ऐक नवीन कल्पना सुचवावे आस वाटत. आपल्या देशात बेकारी खूप आहे त्यामुळे ह्या कामाला मनुष्यबळ उपलब्ध आहे .पहिल्या प्रथम वारसा हक्क म्हणजे वंश परंपरेने property var मिळणाऱ्या कायद्यात अमुलाग्र बदल केला पाहिजे. मुलांचं शिक्षण पूर्ण झाले की आईवडिलांच्या कोणत्याच संपत्तीवर मुलांचं बिलकुल अधिकार राहणार नाही .तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल मग ती property हजारो करोड रुपयाची आसली तर .

In reply to by Rajesh188

एमी 03/01/2019 - 08:19
तुम्ही नक्की काय 'नवीन' कल्पना सुचवत आहात कळले नाही.मला जेवढे माहित आहे त्यानुसार १. स्वार्जित प्रॉपर्टी असेल तर मृत्युपत्र करून ती कोणाच्याही नावावर करता येते. बायको, मुलगा, मुलगी इ कोणीही त्यात हक्क म्हणून वाटा मागू शकत नाही. २. वडिलोपार्जित जमीन असेल तर मात्र त्यात साऱ्या कुटुंबाचा हक्काने वाटा असतो. त्यातून कोणाला बेदखल करता येत नाही.

In reply to by एमी

एमी 03/01/2019 - 08:23
स्वार्जित प्रॉपर्टी म्हणजे व्यक्तीने स्वकमाईतून घेतलेली जमीन, घर इ. वडिलोपार्जित म्हणजे मागच्या ३ (कि ४?) पिढ्या ie जवळपास १०० वर्ष, कोणत्याही वाटण्या न होता, एकत्र कुटुंबात पासऑन होत आलेली जमीन, घर, व्यवसाय, दागिने, आर्ट इ

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 03/01/2019 - 09:45
.तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल @Rajesh188 एक तर आपले कायद्याचे ज्ञान अपुरे आहे आणि त्यातून हा भोळा स्वप्नवाद आहे. जर बापाचे कर्ज मुलाला फेडायला लागते तर बापाची मालमत्ता मुलाला जाईल हा नैसर्गिक न्याय आहे. बेकार तरुणांनी पैसे घेऊन(पगारावर) वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करावा. पण असे काम कुणालाही करायला नको आहे. (अशी माणसे मिळत नाहीत हि वस्तुस्थिती) आणि हे बेकार तरुण केवळ संपत्तीच्या लोभाने वरवर काळजी घेत आहेत असे दाखवतील.मुळात मुले काळजी घेत नाहीत हे ठरवायचे कुणी आणि कसे. बर हे बेकार तरुण खरंच काळजी घेतात याची शहानिशा कुणी करायची?सरकारने? म्हणजे साटेलोटे करून वृद्ध माणसांची संपत्ती हडप करायचा तो राजमार्गच होईल. मग रोगापेक्षा उपाय भयंकर असेच होईल. केवळ आजकालचे तरुण आईबापांची काळजी घेत नाहीत हे म्हणणे अत्यंत एकांगी आहे. अनाथालयातीळ मुलांची वाढणारी संख्या काय दर्शवते? हि मुले पालन पोषण करायला असमर्थ असणाऱ्या किंवा नालायक आईबापांनी जन्माला घातली आहेत. याचा अर्थ केवळ असंख्य मुलंच नालायक आहेत असे नव्हे तर असंख्य आईबापही नालायक आहेत. राहिला प्रश्न मालमत्तेचा. स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जीत मालमत्तेबद्दल कायदा करणारे सरकार कोण? मालमत्ता करणे हा एक अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत हक्क आहे आणि लोकशाहीत असा कायदा न्यायाच्या नैसर्गिक तत्वाच्या विरुद्ध आहे. तेंव्हा हा कायदा होणे नाही.

In reply to by यशोधरा

विमल 04/01/2019 - 05:07
यशोधराताई, तुमचा काळजीयुक्त प्रश्न पाहून बरं वाटलं. तुमच्यासारख्याच बर्याच मिपाकरांना हा प्रश्न पडला असावा. तर झालं असं की आजीबाईंना वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवण्याआधी त्यासाठीची प्राथमिक माहिती येथून जमा करून मी आजीबाईंना सुचवले. पण त्यांना ते काही फारसे पटले नाही आणि त्यांनी नकार दिला. आजही त्या काही महिने एका मुलाकडे तर काही महिने दुसर्याकडे अश्या दुर्लक्षित आयुष्य ढकलत आहेत. वृद्धाश्रमाचा पर्याय असूनही जर त्यांना असेच अपमानास्पद जगणे श्रेयस्कर वाटत असले तर मी तरी काय करणार? तो त्यांच्या घरातला कौटुंबिक प्रश्न असल्याने माझ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. तरी वर प्रतिसाद देणार्या सर्वांचे खूप आभार! कोणालातरी या धाग्यातल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.

रेवती 04/08/2017 - 20:17
पुण्याजवळ खराडी गावात अण्णासाहेब बेहेरे वृद्धाश्रम आहे. सर्व सोयिंनी युक्त आहे व वृद्धश्रमाच्या बाहेरच बस स्टॉप असल्याने बसेस मिळतात.

कंजूस 04/08/2017 - 21:14
जर कोणीच विचारत नाही तर पुणे काय अन पॅरिस काय सर्व सारखेच हो. टिटवाळा स्टेशनजवळचे खडवली स्टेशन आहे तिथे ८० वृद्धांची सोय होते. दर गुरुवारी आजारींना बसने घाटकोपरच्या राजावाडी हॅास्पिटलात उपचार करून नेऊन आणतात. आश्रमाजवळच नदी, स्वामिमठ आहे. रम्य ठिकाण.

कंजूस 07/08/2017 - 10:57
>>माहिती आहेत तेवढ्याची यादी उपलबध करावी >> मिळते . वरच्या खडवलीच्या आश्रमात चौकशीसाठी गेलो होतो ( थोड्या वर्षांपुर्वींची गोष्ट आहे ) तेव्हा तिथल्या संचालकाने सांगितलं - आमच्याकडे आता जागा नाही परंतू हे घ्या म्हणून कपाटातून फाइली काढून समोर ठेवल्या. त्यात सर्व आश्रमांचे पत्ते,फोन नं,महिना खर्च दिलेले होते!! इतकं समाजकार्य चालतं.

पैसा 07/08/2017 - 11:00
तुमचा हेतू स्तुत्य आहे, पण वृद्धाश्रमात सोय करण्यासाठी त्या बाई किंवा त्यांचे घरचे यांची तयारी आहे का? इथे पत्ते जमा होत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, की कोणाला गरज पडल्यास सांगता येतील. पण त्या बाईंची स्वतःची तयारी आहे का हे आधी विचारात घ्यावे लागेल.

In reply to by पैसा

विमल 07/08/2017 - 13:19
पैसाताई, माफी काय मागायची त्यात? तुमचा मुद्दा रास्त आहे. बाई एकदा बोलता-बोलता म्हणाल्या होत्या की त्यांना वेगळी खोली घेऊन रहावसं वाटतं पण या वयात, तेही आजारपणं असतांना ते झेपणार नाही म्हणून सहन करते. त्यावरून मी अंदाज केला की बाईंना त्यांची सोय होईल अश्या ठिकाणी वेगळं रहायला आवडेल. त्यांच्या मनात (कदाचित टॅबूमुळे) वृद्धाश्रमाचा विचार आलाच नसावा. त्यामुळे त्यांची मर्जी जाणण्याआधी माहिती हाताशी असणं मला गरजेचं वाटलं. उगाच त्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय सांगून आशा दाखवावी आणि नंतर त्या दिशेने काहीच मदत करता आली नसती तर त्यांच्या आशा पल्लवित होवून पुन्हा करपण्याची भीती होती. बाई ओळखीतल्या असल्याने आणि विषय नाजूक असल्याने सगळीकडे उघडपणे चौकशीही करता येणार नाहीये. माझा विचार असा आहे की २-३ वृद्धाश्रमात चौकशी करून जिथे जागा असेल तिथल्या माहिती सकट बाईंना हा पर्याय सांगावा. त्यांची वृद्धाश्रमात जाण्याची ईच्छा ठाम असल्यास घरच्यांशी त्या स्वतः बोलतील किंवा मी सामोपचाराने बोलेनच. मी आशा करते की माहिती मागताना मिपाकरांची काही दिशाभूल झाली नसावी. मला माहितीये की मी लष्कराच्या भाकर्‍या भाजतेय पण फक्त बघून गप्प बसायला मन मानत नाही.

In reply to by विमल

पैसा 07/08/2017 - 16:26
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद! तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, पण आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. लोक सहसा तयार होत नाहीत. मुले वगैरे असली तर दोघांनाही ते मान्य होत नाही. माझ्या जवळच्या ओळखीत एका काकूंना झेपत नाही तरी काकांच्या हट्टासाठी मुलांपासून हे काकाकाकू वेगळे राहात आहेत. त्यांची मुले आपल्याजवळ राहा असे सांगत असतानाही. हे एक टोक तर अजून एक घराचे लोक डिमेनशिया झालेल्या आजींसाठी नर्स सुद्धा ठेवायला तयार नाहीत ते इमोशनल कारणांनी की पेड नर्स नीट देखभाल करणार नाहीत. अर्थात सगळा कामाचा भार सुनांनी उचलावा ही अपेक्षा दोन्ही मुलांची. असे बरेच नमुने असतात पण वृद्धाश्रमाचा कोणी विचार करू धजत नाहीत त्याचे कारण लोक काय म्हणतील हा विचार केला जातो, मग त्यामुळे कितीही जणांना त्रास का होईना.

In reply to by पैसा

विमल 08/08/2017 - 15:43
मल व्यक्तिशः वृद्धाश्रम ही संकल्पना अजिबात वाईट वाटत नाही, किंबहुना उत्तमच वाटते. वृद्धाश्रमाला असलेला सामाजिक कलंक दूर झाला तर उलट जास्त संख्येने आणि संरचित सोयी असलेले वृद्धाश्रम बनतील आणि त्यात अनेक जेष्ठ नागरिकांना आरामात आयुष्य व्यतित करता येईल. उगाच वयाला झेपत नसूनही एकटे राहणे किंवा तरूण पिढीला वाटणारा नकोसेपणा सहन करणे यापेक्षा समवयस्क लोकांत राहून आला दिवस आनंदात घालवणे कधीही चांगले, हे माझे मत!

In reply to by विमल

रेवती 09/08/2017 - 00:28
अगदी सहमत आहे. मी वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार हे अगदी विशीत असतानाच ठरवले आहे व मत बदलावेसे वाटले नाही. माझ्या आजेसासूबाई (सासर्‍यांच्या काकू) नव्व्दीत आहेत. वृद्धाश्रमात राहतात व समाधानी आहे. उलट आम्ही सारखं भेटायला गेलेलं त्यांना आवडत नाही. थोडीफार आजारपणे आली तरी तेथील स्टाफकडून काळजी घेतली जाते. घरचेच सारखे फोन करतात की येऊ का न्यायला पण या जात नाहीत. त्यांची कारणे स्पष्ट आहेत. आपला संसार करून व मुलांचे धावपळीचे संसार पाहून कंटाळा आलाय. आजेसासरे व त्यांचा एक मुलगा यांच्या जाण्याने आजेसासूबाईंना सन्यस्त जीवन जगावेसे वाटते व ते रुटीन इतरांसाठी अडचणीचे ठरू शकते.

In reply to by विमल

Rajesh188 02/01/2019 - 20:42
आई वडील म्हातारपणी सांभाळणे हे कर्तव्यच आहे नाहीतर कशाला हवीत मुल. पण ही गोष्ट पण खरी आहे आईवडील सांभाळ ने नाही पण property var हक्क सांगायला हे नालायक हजार आसतात . कायद्यांनी च आशा नालायक मुलांचे अधिकार पुर्णत नाकारले पाहिजेत .म्हणजे aikdya करोडपती chya मुलाला 50000 हजारा पासून प्रॉपर्टी जमा करावी लागेल .

शेखर 07/08/2017 - 17:02
निवारा, पुणे हा एक चांगला पर्याय आहे. अधिक माहिति साठी http://www.niwaraoldagehome.org/ भेट द्या.

कंजूस 09/08/2017 - 21:05
१)"आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नीटशी रुजली नाही. " २)"वय झाल्यावर वृद्धश्रमात रहायला जाणार " - इतकं सोप्प नाही. शेवटी वृद्धाश्रम चालवणे हासुद्धा धंधा झालेला आहे. त्यांचेही बरेच प्रश्न आहेत. आर्थिक संकटे येतात. ९५-९८% आश्रम सुदृढ उठबस करणाय्रांनाच ठेवायला तयार असतात. फार आजारी झाल्यावर नातेवाइकांना घेऊन जायला सांगतात. आपसापात भांडतात म्हातारे

रेवती 09/08/2017 - 21:52
कंकाका, आपापसात तर आपणही इथे भांडतो (म्हणजे काहीतरी वाद घालतो). जिथे कुटुंब असतं तिथे हे सगळं मर्यादेत चालत असतं. आपल्या लिमिटेशन्स ओळ्खून राहिल्यास प्रश्न कमी होतील. सगळे कधीच सुटणार नसतात. जसे, दिवसभर घरातली, बाहेरची, हापिसातली कामे केल्यावरही किती गोष्टी करायच्या उरलेल्या असतात म्हणून आपण जेवण झोप सोडून देतो का? रोजचे मूडस, दुखणं खुपणं कोणालाही चुकलेलं नाही. त्यांचा बाऊ करणं वयाबरोबर कमी होत जायला हवं. आपल्या समाजात नवरे लोक्स घर चालवण्यात फारसा हातभार लावत नाहीत तर बायका बाहेरची कामे करण्यास कचरतात (आताच्या पिढीत तसे नसावे). म्हातारपणी बायको पुढे निघून गेली तर नवरे लोकांना घरात जाऊ दे, वृद्धाश्रमातही मनास काही येत नाही. मग वैताग येतो. वृद्धाश्रम हा धंदा असेल तर असू दे! जोवर सगळे वेळच्यावेळी होतेय तोवर ज्यांना पैसे मिळवायचेत ते लोक पडद्यामागून मिळवून घेणारचेत. माझ्या आजेसाबांना विचारले की "प्रत्येक खोलीत दोनजण रहात असताना तुमच्या खोलीत तुम्ही एकट्याच कश्या?" त्यावर त्यांनी सांगितले की पतीच्या व मुलाच्या जाण्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा झालाय. दुसर्‍या माणसाने कितीही बरी वागणुक दिली तरी त्यांना ते पटत नाही. मग त्याचा आपल्याला व आपला त्या माणसाला त्रास होणार. त्यापेक्षा त्या जागेचे संपूर्ण भाडे भरून राहतात. आपल्या स्वभावातील बदलता व न बदलता येणारे काय आहे हे आपल्याशी पक्के केल्यास अडचणी कमी येतील. ज्या मनुष्याला सगळ्या खोलीचे भाडे देणे परवडत नसेल त्याने आपली आर्थिक मर्यादा समजून अ‍ॅडजस्ट करावे. आता मी जर म्हातारपणी वृद्धाश्रमात जाण्याचे ठरवलेय तर काय काय सवयी असल्या पाहिजेत किंवा असायला नकोत याचा विचार काहीसा करून ठेवलाय पण वाढत्या वयाबरोबर तो आणखी वेगळा असणार आहे याची कल्पना आहे. आजेसाबांना त्यांनी मनाची तयारी कशी केली हेही विचारले तर त्या म्हणाल्या की त्यांचे पती हयात असताना दोघेही हा विचार करायचे व वेगवेगळ्या आश्रमात जाऊन यायचे. बरीच वर्षे त्यांनी आपल्या व मुलांच्या मनाची तयारी केली. सर्व जवळच्या नातेवाईक मंडळींमध्ये स्पष्तीकरण दिले म्हणजे इतरांनी आपल्या मुलांवर बेजबाबदारपणाचा शिक्का मारायला नको. नंतर माझे आजेसाबू आश्रमात जाण्याआधीच गेले पण यांनी निर्णय बदलला नाही. वयाच्या नव्वदित त्या जरा वाकल्या आहेत पण आपला व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी अजिबात सोडल्या नाहीयेत. तब्येत त्यामुळे बरीच चांगली आहे. यशिवाय एक गोष्ट आवडली ती अशी की, त्या आम्हाला सगळा आश्रम आपणाहोऊन दाखवला. इथे जेवणाची व्यवस्था, इथे गच्ची, तिकडे लायब्ररी, टीव्ही रूम वगैरे. सगळे पर्फेक्ट नव्हते तर त्यांनी आम्हाला दाखवताना गच्चीवरून सुर्यास्त चांगला दिसतो (मला मध्ये मध्ये येणार्‍या केबल्स दिसत होत्या), मागील बाजूने नदी वाहते ते वळण चांगले आहे (मला ती गटारगंगा दिसत होती), वाचायला कितीतरी अध्यात्मिक पुस्तके आहेत वगैरे (मला तेथील पडद्यांचा रंग अतिषय उदास वाटला). शेवटी तुम्हाला काय पहायचे आहे? काकूआज्जींनी मला त्यांच्याकडील सेलफोन दाखवला. तो काही फार फॅन्सी नव्हता. "अगं हा शोध लागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं पण माझ्या हयातीत हे यंत्र वापरायला मिळालं ही गंमत आहे की नाही?" या काकूआज्जी व माझ्या सासूबाईंची मोठी बहिण, मावशी या दोघीही वयाने जास्त असूनही टापटिपिनं, नेटकेपणानं राहताना पाहणे आशादायक आहे. या पिढीनं अगदी काटकसरीनं संसार केलेत, जोडीदार पुढे निघून गेल्यावर आणि मोठाली आजारपणे पार पाडल्यावरही सकारात्मक दृष्टी सोडली नाही. हे किती चांगलं आहे.

In reply to by रेवती

विशुमित 09/08/2017 - 23:31
रेवाक्का ... का कोणास ठाऊक तुमचा हा प्रतिसाद वाचत असताना जीवनाबद्दल एक अनामिक भीती वाटली.. छान लिहलंय ..!!

In reply to by विशुमित

मृत्युन्जय 02/01/2019 - 23:03
खरंय. आपल्यासारख्या माणसाला आयुष्याची अखेर सोसावेल काय आणि निभावुन नेता येइल काय ही शंका मनाला चाटुन गेली. शिवाय म्हातारपणातल्या तडजोडी, मानापमान नाही सोसवणार मला. आयुष्याची अखेर मध्यातच झालेली बरी.

In reply to by रेवती

उत्तम प्रतिसाद. त्यामुळेच कोणताही संयमाची परीक्षा बघणारा आजार न होता हसतखेळत मृत्यू यावा अशी मनातून खूप इच्छा आहे.

In reply to by रेवती

स्मिता. 10/08/2017 - 15:50
माझंही असंच मत आहे. उतारवयात आपल्या क्षमता बघून योग्य तो व्यावहारीक निर्णय घेणे कधीही योग्य. तसंच वृद्धाश्रम धंदा झाला तर उत्तमच आहे. एकूण सगळ्यात गोष्टीत व्यावसायीकता येईल. मात्र एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटतो तो असा की जर बहुतेक वृद्धाश्रम हात-पाय चालत असणार्‍याच वृद्धांना ठेवत असतील आणि वृद्धांनी बिछाना पकडला की त्यांना परत न्यायला सांगत असतील तर ते अवघड आहे. आता मूळ चर्चेतल्या बाईंचंच उदाहरण घेतलं तर त्या बाईंना आताच कोणी विचारत नाही. वर त्या मुलांना सांगून वृद्धाश्रमात गेल्या आणि काही महिन्यांनी त्यांनी बिछाना पकडल्यावर वृद्धाश्रमाने परत जायला सांगितले तर कुठे जातील त्या? जरी मुलांनी नेलं तरी घरातली मानसीक अवस्था आतापेक्षाही वाईट होईल. एकदा प्रवेश घेतला की मृत्यू येत नाही तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या सोयी/सेवा पुरवणारे वृद्धाश्रम नाहीत का?

अत्रे 10/08/2017 - 06:54
वृद्धाश्रम / आडमुठ्या वयस्कर लोकांचे जीवन या विषयावर इंग्रजीत एक फार सुंदर पुस्तक/ ग्राफिक नॉवेल आहे. लेखिकेने स्वत:च्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे. Can't we talk about something more pleasant? ss https://www.theguardian.com/books/2016/nov/23/cant-we-talk-about-something-more-pleasant-roz-chast-review-graphic-memoir-new-yorker

कंजूस 10/08/2017 - 10:27
रेवती, प्रतिसाद पटला तरी तो वळत नाही सर्वांचा हे आम्ही जवळच्या तीनचार नातेवाइक,ओळखीचे यांचे अनुभव,एकासाठी वृद्धाश्रम शोधताना सहासात संचालकांची मते ऐकून वेगळी बाजू लक्षात आली.

विमल 10/08/2017 - 16:01
वृद्धाश्रमांची माहिती देणार्‍या तसेच त्याबाबतीत आपले विचार व्यक्त करणार्‍या सर्व सदस्यांचे मनापासून आभार! माहिती सोबत तुमची मतं लिहिल्याने माझ्याही विचारांना चालना मिळाली. कंजूसकाकांच्या प्रतिसादावरून वाटतंय की वृद्धाश्रमात जाणं आणि कायम तिथे राहणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. कदाचित जे आता वयस्कर किंवा वृद्ध आहेत त्यांच्या पिढीला वृद्धाश्रम म्हणजे आयुष्याचं अपयश अशी भावना असावी. ती काही त्यांची चूक नाही, समाजाचेच ते संस्कार! परंतु तरूण पिढी मात्र काळाबरोबर वृद्धाश्रमात राहण्याकरता स्वतःची मानसीक तयारी करत असावी असं वाटतं. अर्थात तरूण वयातले विचार उतारवयातही तसेच राहतील याची काही शाश्वती नाही.

Rajesh188 02/01/2019 - 11:50
वृध्द लोकांचं संगोपन करणे आणि त्यांची काळजी घेणे हे नवीन पिढीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे . त्या साठी ऐक नवीन कल्पना सुचवावे आस वाटत. आपल्या देशात बेकारी खूप आहे त्यामुळे ह्या कामाला मनुष्यबळ उपलब्ध आहे .पहिल्या प्रथम वारसा हक्क म्हणजे वंश परंपरेने property var मिळणाऱ्या कायद्यात अमुलाग्र बदल केला पाहिजे. मुलांचं शिक्षण पूर्ण झाले की आईवडिलांच्या कोणत्याच संपत्तीवर मुलांचं बिलकुल अधिकार राहणार नाही .तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल मग ती property हजारो करोड रुपयाची आसली तर .

In reply to by Rajesh188

एमी 03/01/2019 - 08:19
तुम्ही नक्की काय 'नवीन' कल्पना सुचवत आहात कळले नाही.मला जेवढे माहित आहे त्यानुसार १. स्वार्जित प्रॉपर्टी असेल तर मृत्युपत्र करून ती कोणाच्याही नावावर करता येते. बायको, मुलगा, मुलगी इ कोणीही त्यात हक्क म्हणून वाटा मागू शकत नाही. २. वडिलोपार्जित जमीन असेल तर मात्र त्यात साऱ्या कुटुंबाचा हक्काने वाटा असतो. त्यातून कोणाला बेदखल करता येत नाही.

In reply to by एमी

एमी 03/01/2019 - 08:23
स्वार्जित प्रॉपर्टी म्हणजे व्यक्तीने स्वकमाईतून घेतलेली जमीन, घर इ. वडिलोपार्जित म्हणजे मागच्या ३ (कि ४?) पिढ्या ie जवळपास १०० वर्ष, कोणत्याही वाटण्या न होता, एकत्र कुटुंबात पासऑन होत आलेली जमीन, घर, व्यवसाय, दागिने, आर्ट इ

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 03/01/2019 - 09:45
.तरुण मुलांनी जे बेकारी नी pareshan आहेत मग ते कोंत देशातील असतील त्यांनी वृध्द व्यकी चा मरेपर्यंत सांभाळ केला तर पूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावावर होईल @Rajesh188 एक तर आपले कायद्याचे ज्ञान अपुरे आहे आणि त्यातून हा भोळा स्वप्नवाद आहे. जर बापाचे कर्ज मुलाला फेडायला लागते तर बापाची मालमत्ता मुलाला जाईल हा नैसर्गिक न्याय आहे. बेकार तरुणांनी पैसे घेऊन(पगारावर) वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करावा. पण असे काम कुणालाही करायला नको आहे. (अशी माणसे मिळत नाहीत हि वस्तुस्थिती) आणि हे बेकार तरुण केवळ संपत्तीच्या लोभाने वरवर काळजी घेत आहेत असे दाखवतील.मुळात मुले काळजी घेत नाहीत हे ठरवायचे कुणी आणि कसे. बर हे बेकार तरुण खरंच काळजी घेतात याची शहानिशा कुणी करायची?सरकारने? म्हणजे साटेलोटे करून वृद्ध माणसांची संपत्ती हडप करायचा तो राजमार्गच होईल. मग रोगापेक्षा उपाय भयंकर असेच होईल. केवळ आजकालचे तरुण आईबापांची काळजी घेत नाहीत हे म्हणणे अत्यंत एकांगी आहे. अनाथालयातीळ मुलांची वाढणारी संख्या काय दर्शवते? हि मुले पालन पोषण करायला असमर्थ असणाऱ्या किंवा नालायक आईबापांनी जन्माला घातली आहेत. याचा अर्थ केवळ असंख्य मुलंच नालायक आहेत असे नव्हे तर असंख्य आईबापही नालायक आहेत. राहिला प्रश्न मालमत्तेचा. स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जीत मालमत्तेबद्दल कायदा करणारे सरकार कोण? मालमत्ता करणे हा एक अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत हक्क आहे आणि लोकशाहीत असा कायदा न्यायाच्या नैसर्गिक तत्वाच्या विरुद्ध आहे. तेंव्हा हा कायदा होणे नाही.

In reply to by यशोधरा

विमल 04/01/2019 - 05:07
यशोधराताई, तुमचा काळजीयुक्त प्रश्न पाहून बरं वाटलं. तुमच्यासारख्याच बर्याच मिपाकरांना हा प्रश्न पडला असावा. तर झालं असं की आजीबाईंना वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवण्याआधी त्यासाठीची प्राथमिक माहिती येथून जमा करून मी आजीबाईंना सुचवले. पण त्यांना ते काही फारसे पटले नाही आणि त्यांनी नकार दिला. आजही त्या काही महिने एका मुलाकडे तर काही महिने दुसर्याकडे अश्या दुर्लक्षित आयुष्य ढकलत आहेत. वृद्धाश्रमाचा पर्याय असूनही जर त्यांना असेच अपमानास्पद जगणे श्रेयस्कर वाटत असले तर मी तरी काय करणार? तो त्यांच्या घरातला कौटुंबिक प्रश्न असल्याने माझ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. तरी वर प्रतिसाद देणार्या सर्वांचे खूप आभार! कोणालातरी या धाग्यातल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
नमस्कार! विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे. बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही.

स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१

आदित्य कोरडे ·

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/01/2017 - 11:37
विशेषतः बलात्कार हा आयुष्य उध्वस्त का करतो या अनुषंगाने काही चर्चा उपाय वगैरे लेखनात आले तर स्वागतच आहे. बाकी अनाहितांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

एमी 31/01/2017 - 07:25
लेख बर्यापैकी आवडला. समाजाचा (फक्त भारतीय नाही) स्त्री विषयक दृष्टीकोन हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे.......... ह्यातून मुक्ततेची गरज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांनासुद्धा तितकीच तातडीची आहे. >> हा भाग जास्त आवडला.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/01/2017 - 11:37
विशेषतः बलात्कार हा आयुष्य उध्वस्त का करतो या अनुषंगाने काही चर्चा उपाय वगैरे लेखनात आले तर स्वागतच आहे. बाकी अनाहितांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

एमी 31/01/2017 - 07:25
लेख बर्यापैकी आवडला. समाजाचा (फक्त भारतीय नाही) स्त्री विषयक दृष्टीकोन हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे.......... ह्यातून मुक्ततेची गरज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांनासुद्धा तितकीच तातडीची आहे. >> हा भाग जास्त आवडला.
(हा लेख लिहिताना मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या “Against our will- Men Women and Rape” ह्या पुस्तकाचा तसेच You tube वरील BBC च्या “Documentary on Women’s liberation movement.” चा प्रामुख्याने आधार घेतला आहे. शिवाय इतर अनेक Documentaries, articles ,मराठी लेख,फेस बुक वरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया- थोडक्यात इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे ह्या विवेचनाला काही मर्यादा पडल्यात ह्याची मला जाणीव आहे. वाचकांनी वाचताना ह्याचे भान ठेवावे ही विनंती) नुकतंच नववर्ष सुरु झालं.

माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे???

टर्बोचार्जड फिलॉसॉफर ·

In reply to by मोदक

पाटीलभाऊ 30/11/2016 - 13:25
राहुल गांधी टफिंच्या माध्यमातून आपली व्यथा मांडतायत असे वाटते :P उद्या-परवा रागा पंतप्रधान झाले तर त्यात मिपाकरांनी दिलेल्या सल्ल्यांचा खारीचा वाटा असणार :D

ज्ञाना 29/11/2016 - 23:33
तुम्ही स्वतःला समजता तितके भित्रे नाही आहात. अशा पद्धतीने सर्वांसमोर अंतरंग खुले करण्यासाठीसुद्धा खूप धैर्य लागतं.

अजुनही लोकांना इथे सिरीयसली चर्चा करायची आहे का? मागच्या धाग्यात अनेकांनी बेनिफिट ऑफ डाऊट देऊन ह्या महाशयांना अत्यंत चांगले प्रतिसाद दिले. त्या सगळ्यांना येड्यात काढणारा हा धागा घेऊन टफि हजर! अशाने जेन्युइन लोकांनाही उद्या कुणी उत्तरं देणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मान्य आहे मला माझे प्रश्न नीट आर्टिक्युलेट करुन लिहीता येत नाहीत,याचा अर्थ मी फक्त मिपाकरांचा वेळ घेतो व टाईमपास करतो असा नाही.मला कळत नाही की माझे प्रांजळ आत्मनिवेदनही लोकांना का खटकते. पिलियन रायडर,तुम्ही मला सल्ला देऊ शकत नसाल तर ठीक आहे पण इतरांना त्यापासून का परावृत्त करता आहात?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मी कशाला काही करायला पाहिजे? तुम्हीच पुरेसे आहात.. एका हळव्या, भित्र्या, ढ आणि आत्महत्याच करावी असा विचारापर्यंत आलेल्या माणसाने गेल्या ७ दिवसात ४ धागे काढलेत. डुआयडींबद्दल तर मी बोलतच नाही. ह्याला अजुनही प्रांजळ आत्मनिवेदन वगैरे म्हणायचे असेल तर चालु द्या.

भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.
कोंबडी नाहितर गेलाबाजार मासळी आपल्या हाताने चिरुन साफ करावे. @ गरीब चिमणा लवकरात लवकर मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार घ्या.

मारवा 30/11/2016 - 00:19
टफि जी कोणी आत्महत्या करतो म्हणायला लागल की माझा मेंदु काम करणे थांबुन जातो मित्रा..... अर्थात माझाच प्रॉब्लेम आहे. एकच विनम्र विनंती आहे जमल्यास बघा आत्महत्या विषयावर विनोद नका करु हो. त्याने जो कोणी खरच अडचणीत असेल त्याला अत्यावश्यक असलेला दिलासा जो त्या काळात थोडा जरी मिळाला तरी फार.... बघा आपण सुज्ञ आहातच.... असो.... तुमच्या भावी जीवनासाठी व वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा !

निनाद 30/11/2016 - 02:27
लैच्च येड्यात काढू र्‍हायले राव पब्लिक्ला! चालू द्या!

आनन्दा 30/11/2016 - 08:46
तुम्हाल खरेच भितीपासून मुक्ती हवी असेल तर, ऐका!.. . . . . . . . . . . . .. . . . . . झालं. आता मुक्ती मिळालेली आहे. तेव्हा शांतपणे पुढचे १५ दिवस मिपापासून लांब रहा. म्हणजे आम्हाला पण तुमच्या धाग्यांच्या भीतीपासून थोडी मुक्ती मिळेल.

तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले नियती कशी काय एव्हडी निष्ठुर होऊ शकते एखाद्याच्या बाबतीत? खरे तर तुम्ही एव्हडे घाबरत नाही आहात कित्ती हिमतीने तुम्ही धागे काढताय भल्याभाल्याना जमत नाही ते स्वगत (दांभिकपणा आणि खोटारडे पणा, या गोष्टीची पण चिंता केली पाहिजे माणसाने, त्यावर एक धागा काढावा का )

In reply to by सामान्य वाचक

खेडूत 30/11/2016 - 10:35
तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले..
याला पूर्वी जयश्री गडकर होणे म्हणत. का? ते त्यांचे चित्रपट पाहिले तरच कळेल.

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

भाते 30/11/2016 - 11:12
तुम्हाला काही कामधंदा नाही हे तुम्ही आधीच जगजाहिर केले आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या समस्येचे ऊत्तर हवे असेल तर एकच धागा दोन संस्थळावर कशाला काढता? तुमचा कोणावरही विश्वास नाही आहे का? मिपावर मिपाकर तुमच्या समस्येचे समाधान करू शकणार नाहीत याची खात्री असल्याने पुन्हा हाच धागा माबोवर काढला ना? मग तिकडे मिळवा ना तुमच्या प्रश्नांची ऊत्तरे. पुन्हा इकडे कशाला येताय? जरी आपल्याला मिपा फुकट असले तरी नीलकांत/ प्रशांत यांना बॅण्डविड्थचे पैसे भरायला लागत आहेत ना! मग हे असले फालतु धागे काढुन ऊगाच त्यांचे पैसे कशाला वाया घालवताय? एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by भाते

प्रसाद_१९८२ 30/11/2016 - 12:27
एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. == सहमत !

पुंबा 30/11/2016 - 11:36
बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
वा रे वा! बेवारस प्राण्याचे हाल बघून व्यथित होता तसे आमचे हाल बघूनदेखील व्यथित व्हा आणि आवरा..

आनन्दा 30/11/2016 - 12:21
या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता
भित्रट स्वभाव असेल मत मॅटर झालाच कसा? तुमचे मॅटर अगोदरच पातळ व्हायला हवे होते.

गामा पैलवान 30/11/2016 - 12:42
टफि, .... याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेने उपाय करा : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sex-change-surgery/articleshow/55693527.cms मात्र उपाय टोकाचा आहे ही धोक्याची सूचना ! आ.न., -गा.पै.

धन्यवाद प्रतिसादकर्त्यांनो,पण माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणीच नीटपणे दिलेले नाही.कृपया या धाग्यावर मला आपला अभिप्राय हवा आहे,टाईमपास करु नये.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

कुंदन 30/11/2016 - 13:37
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे? - बेदरकारपणे वागावे २. अतिहळवेपणावर कशी मात करावी? - बेदरकारपणे वागावे ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! - बेदरकारपणे वागावे

श्रीगुरुजी 30/11/2016 - 14:22
नानासाहेब नेफळे, मिपाकरांना पुन्हा एकदा चु* बनविल्याबद्दल अभिनंदन! बिचार्‍या मिपाकरांना वाटतंय की तुम्हाला खरोखरच समस्या आहेत आणि ते भोळेपणाने मदत करायचा प्रयत्न करतात. आणि ते बघून 'यांना कसं येडं बनवलं' या विचाराने तुम्हाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटतात. असो. तुमचे पुढील धागे खालीलप्रमाणे असतील याची खात्री आहे. - मला मुलींवर छाप पाडता येत नाही आणि मला कोणतीच मुलगी पटत नाही. मी काय करू???????????? - माझ्या अतिशय बावळट आणि अतिकुजकट स्वभावाचे काय करावे??? - माझे सकाळी पोट साफ होत नाही, पण भूक मात्र कचकून लागते. मी काय करावे?????????? - माझा एक आयडी फार काळ टिकत नाही आणि मला सभ्य लिहिता येत नाही. मी काय करावे???????????? - माझा वेळ जाता जात नाही आणि मला कोणतेही काम न करता टीपी करायची सवय लागली आहे. मी काय करावे????????

वरुण मोहिते 30/11/2016 - 15:29
मी शिकवतो दादागिरी कशी करायची . खूप केली आहे :) अवांतर - असल्या धाग्यांवर येत नाही कधी पण खरंच कोणी सल्ला मागणारा असेल त्यालाही प्रॉब्लेम होईल पुढे हे तरी लक्षात ठेवा .

Deserter 30/11/2016 - 19:12
तुम्ही jaw muscle building करा कारण कमकुवत जबड्यातून असे विचार उद्भवतात ,थेट मेंदूशी सम्बंध :))

चित्रगुप्त 30/11/2016 - 20:06
. टर्बोपंत, तुमच्या आधीच्या धाग्याविषयी संशय असूनसुद्धा अनेकांनी आपलेपणाने लिहीले, परंतु आता मात्र सर्वांनाच शंका आहे. आधीच्या धाग्यात सुचवलेले उपाय तुम्ही अमलात आणत आहात का, त्यात प्रतिसादकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत का, हे आधी बघा, आणि एकेका धाग्यात एकेक समस्या मांडण्यापेक्षा एकाच धाग्यात तुमच्या एकूण एक ज्या काही समस्या/विचारणा आहेत त्या मांडा, म्हणजे तुमच्याविषयी समग्र आकलन होईल. अर्थात हे सर्व जर तुमच्या समस्या वगैरे खरोखरीच्या असतील, तरच. मिपाकरांची फिरकी घेण्यासाठी हे सर्व आहे असे लक्षात आले तर यापुढे कुणीही प्रतिसादही देणार नाही आणि धागा उघडूनही पाहणार नाही. तुम्ही जर खरोखर प्रांजळपणे सल्ला मागत असाल, तर तुमचे खरे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तसेच तुम्ही ज्या मानसोपचार तज्ञाचे उपचार घेत आहात, त्यांचे नाव आणि संपर्क पाठवा. याप्रमाणे तुम्हाला जर करायचे नसेल तर तुमचा धागा यापुढे अनेक मिपाकर उघडूनही बघणार नाहीत, याची खात्री बाळगा. व्हा बरे लवकर.

अनन्त अवधुत 01/12/2016 - 06:52
पर्याय अ) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय असेल तर सिंहाच्या जबड्यात हात घाला त्याने तुमचा भिडस्तपणा जाईल. सिंहाने हात खाल्ला तर डोळ्यातून पाणी काढायचे नाही, म्हणजे तुमचा हळवेपणा पण जाईल. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे फेसबुक आणि व्हाट्सअँप वर प्रोफाईल पिक्चर लावा. ते झाल्यावर उंच उडी मारून उंटांचा मुका घ्या. त्याच्या गालाचा घेतला तर उत्तम. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे ... पर्याय ब) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय नसेल तर लाल मुंग्यांच्या वारुळात हात घालून एक मुंगी बाहेर काढा. एकही मुंगी मरायला नको. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... गाढवाच्या मागे उभे राहून त्याला गुदगुल्या करा, गाढव हसले पाहिजे. ते सेल्फीचे विसरू नका. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... तुम्ही अ किंवा ब पैकी दोन गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला कसल्याही गोष्टीची काहीही भीती बाळगायचे कारण नाही. तुम्ही अ आणि ब करू शकलात तर तुमच्यासारखे तुम्हीच. काहीच नाही करू शकलात तर.. तरी पण तुमच्यासारखे तुम्हीच. हे सगळे वाचताना आणि करताना तुम्ही किती शूरवीर, दिलेर आणि जाँबाज आहेत याचा तुम्हालाच प्रत्यय येईल. [टीप]: स्वत:च्या जबाबदारीवर हे उपाय करावेत.

In reply to by अनन्त अवधुत

टवाळ कार्टा 01/12/2016 - 09:54
इतके सगळे करण्यापेक्षा बायकोला "तुला जेवण आज्जीबात जमत नाही" असे सांगा...काठिण्य पातळी वाढवायची असेल तर त्यानंतर "आईच्या हाताच्या जेवणाची सर कश्शालाच नाही" हे सुद्धा म्हणा....

दीपक११७७ 01/12/2016 - 15:10
१. तुम्ही जुन्या पध्दीने दिलाजाणारा एनिमा भर चोकात घ्यावा. किंवा २. शक्य असल्यास डुकरची विष्ठा वाळवुन, छोटे केक बनवुन सकाळी आणि संध्याकाळी गोमुत्रा सोबत खावी

In reply to by मोदक

पाटीलभाऊ 30/11/2016 - 13:25
राहुल गांधी टफिंच्या माध्यमातून आपली व्यथा मांडतायत असे वाटते :P उद्या-परवा रागा पंतप्रधान झाले तर त्यात मिपाकरांनी दिलेल्या सल्ल्यांचा खारीचा वाटा असणार :D

ज्ञाना 29/11/2016 - 23:33
तुम्ही स्वतःला समजता तितके भित्रे नाही आहात. अशा पद्धतीने सर्वांसमोर अंतरंग खुले करण्यासाठीसुद्धा खूप धैर्य लागतं.

अजुनही लोकांना इथे सिरीयसली चर्चा करायची आहे का? मागच्या धाग्यात अनेकांनी बेनिफिट ऑफ डाऊट देऊन ह्या महाशयांना अत्यंत चांगले प्रतिसाद दिले. त्या सगळ्यांना येड्यात काढणारा हा धागा घेऊन टफि हजर! अशाने जेन्युइन लोकांनाही उद्या कुणी उत्तरं देणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मान्य आहे मला माझे प्रश्न नीट आर्टिक्युलेट करुन लिहीता येत नाहीत,याचा अर्थ मी फक्त मिपाकरांचा वेळ घेतो व टाईमपास करतो असा नाही.मला कळत नाही की माझे प्रांजळ आत्मनिवेदनही लोकांना का खटकते. पिलियन रायडर,तुम्ही मला सल्ला देऊ शकत नसाल तर ठीक आहे पण इतरांना त्यापासून का परावृत्त करता आहात?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मी कशाला काही करायला पाहिजे? तुम्हीच पुरेसे आहात.. एका हळव्या, भित्र्या, ढ आणि आत्महत्याच करावी असा विचारापर्यंत आलेल्या माणसाने गेल्या ७ दिवसात ४ धागे काढलेत. डुआयडींबद्दल तर मी बोलतच नाही. ह्याला अजुनही प्रांजळ आत्मनिवेदन वगैरे म्हणायचे असेल तर चालु द्या.

भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.
कोंबडी नाहितर गेलाबाजार मासळी आपल्या हाताने चिरुन साफ करावे. @ गरीब चिमणा लवकरात लवकर मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार घ्या.

मारवा 30/11/2016 - 00:19
टफि जी कोणी आत्महत्या करतो म्हणायला लागल की माझा मेंदु काम करणे थांबुन जातो मित्रा..... अर्थात माझाच प्रॉब्लेम आहे. एकच विनम्र विनंती आहे जमल्यास बघा आत्महत्या विषयावर विनोद नका करु हो. त्याने जो कोणी खरच अडचणीत असेल त्याला अत्यावश्यक असलेला दिलासा जो त्या काळात थोडा जरी मिळाला तरी फार.... बघा आपण सुज्ञ आहातच.... असो.... तुमच्या भावी जीवनासाठी व वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा !

निनाद 30/11/2016 - 02:27
लैच्च येड्यात काढू र्‍हायले राव पब्लिक्ला! चालू द्या!

आनन्दा 30/11/2016 - 08:46
तुम्हाल खरेच भितीपासून मुक्ती हवी असेल तर, ऐका!.. . . . . . . . . . . . .. . . . . . झालं. आता मुक्ती मिळालेली आहे. तेव्हा शांतपणे पुढचे १५ दिवस मिपापासून लांब रहा. म्हणजे आम्हाला पण तुमच्या धाग्यांच्या भीतीपासून थोडी मुक्ती मिळेल.

तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले नियती कशी काय एव्हडी निष्ठुर होऊ शकते एखाद्याच्या बाबतीत? खरे तर तुम्ही एव्हडे घाबरत नाही आहात कित्ती हिमतीने तुम्ही धागे काढताय भल्याभाल्याना जमत नाही ते स्वगत (दांभिकपणा आणि खोटारडे पणा, या गोष्टीची पण चिंता केली पाहिजे माणसाने, त्यावर एक धागा काढावा का )

In reply to by सामान्य वाचक

खेडूत 30/11/2016 - 10:35
तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले..
याला पूर्वी जयश्री गडकर होणे म्हणत. का? ते त्यांचे चित्रपट पाहिले तरच कळेल.

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

In reply to by खेडूत

पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या

भाते 30/11/2016 - 11:12
तुम्हाला काही कामधंदा नाही हे तुम्ही आधीच जगजाहिर केले आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या समस्येचे ऊत्तर हवे असेल तर एकच धागा दोन संस्थळावर कशाला काढता? तुमचा कोणावरही विश्वास नाही आहे का? मिपावर मिपाकर तुमच्या समस्येचे समाधान करू शकणार नाहीत याची खात्री असल्याने पुन्हा हाच धागा माबोवर काढला ना? मग तिकडे मिळवा ना तुमच्या प्रश्नांची ऊत्तरे. पुन्हा इकडे कशाला येताय? जरी आपल्याला मिपा फुकट असले तरी नीलकांत/ प्रशांत यांना बॅण्डविड्थचे पैसे भरायला लागत आहेत ना! मग हे असले फालतु धागे काढुन ऊगाच त्यांचे पैसे कशाला वाया घालवताय? एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by भाते

प्रसाद_१९८२ 30/11/2016 - 12:27
एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. == सहमत !

पुंबा 30/11/2016 - 11:36
बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
वा रे वा! बेवारस प्राण्याचे हाल बघून व्यथित होता तसे आमचे हाल बघूनदेखील व्यथित व्हा आणि आवरा..

आनन्दा 30/11/2016 - 12:21
या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता
भित्रट स्वभाव असेल मत मॅटर झालाच कसा? तुमचे मॅटर अगोदरच पातळ व्हायला हवे होते.

गामा पैलवान 30/11/2016 - 12:42
टफि, .... याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेने उपाय करा : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sex-change-surgery/articleshow/55693527.cms मात्र उपाय टोकाचा आहे ही धोक्याची सूचना ! आ.न., -गा.पै.

धन्यवाद प्रतिसादकर्त्यांनो,पण माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणीच नीटपणे दिलेले नाही.कृपया या धाग्यावर मला आपला अभिप्राय हवा आहे,टाईमपास करु नये.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

कुंदन 30/11/2016 - 13:37
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे? - बेदरकारपणे वागावे २. अतिहळवेपणावर कशी मात करावी? - बेदरकारपणे वागावे ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! - बेदरकारपणे वागावे

श्रीगुरुजी 30/11/2016 - 14:22
नानासाहेब नेफळे, मिपाकरांना पुन्हा एकदा चु* बनविल्याबद्दल अभिनंदन! बिचार्‍या मिपाकरांना वाटतंय की तुम्हाला खरोखरच समस्या आहेत आणि ते भोळेपणाने मदत करायचा प्रयत्न करतात. आणि ते बघून 'यांना कसं येडं बनवलं' या विचाराने तुम्हाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटतात. असो. तुमचे पुढील धागे खालीलप्रमाणे असतील याची खात्री आहे. - मला मुलींवर छाप पाडता येत नाही आणि मला कोणतीच मुलगी पटत नाही. मी काय करू???????????? - माझ्या अतिशय बावळट आणि अतिकुजकट स्वभावाचे काय करावे??? - माझे सकाळी पोट साफ होत नाही, पण भूक मात्र कचकून लागते. मी काय करावे?????????? - माझा एक आयडी फार काळ टिकत नाही आणि मला सभ्य लिहिता येत नाही. मी काय करावे???????????? - माझा वेळ जाता जात नाही आणि मला कोणतेही काम न करता टीपी करायची सवय लागली आहे. मी काय करावे????????

वरुण मोहिते 30/11/2016 - 15:29
मी शिकवतो दादागिरी कशी करायची . खूप केली आहे :) अवांतर - असल्या धाग्यांवर येत नाही कधी पण खरंच कोणी सल्ला मागणारा असेल त्यालाही प्रॉब्लेम होईल पुढे हे तरी लक्षात ठेवा .

Deserter 30/11/2016 - 19:12
तुम्ही jaw muscle building करा कारण कमकुवत जबड्यातून असे विचार उद्भवतात ,थेट मेंदूशी सम्बंध :))

चित्रगुप्त 30/11/2016 - 20:06
. टर्बोपंत, तुमच्या आधीच्या धाग्याविषयी संशय असूनसुद्धा अनेकांनी आपलेपणाने लिहीले, परंतु आता मात्र सर्वांनाच शंका आहे. आधीच्या धाग्यात सुचवलेले उपाय तुम्ही अमलात आणत आहात का, त्यात प्रतिसादकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत का, हे आधी बघा, आणि एकेका धाग्यात एकेक समस्या मांडण्यापेक्षा एकाच धाग्यात तुमच्या एकूण एक ज्या काही समस्या/विचारणा आहेत त्या मांडा, म्हणजे तुमच्याविषयी समग्र आकलन होईल. अर्थात हे सर्व जर तुमच्या समस्या वगैरे खरोखरीच्या असतील, तरच. मिपाकरांची फिरकी घेण्यासाठी हे सर्व आहे असे लक्षात आले तर यापुढे कुणीही प्रतिसादही देणार नाही आणि धागा उघडूनही पाहणार नाही. तुम्ही जर खरोखर प्रांजळपणे सल्ला मागत असाल, तर तुमचे खरे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तसेच तुम्ही ज्या मानसोपचार तज्ञाचे उपचार घेत आहात, त्यांचे नाव आणि संपर्क पाठवा. याप्रमाणे तुम्हाला जर करायचे नसेल तर तुमचा धागा यापुढे अनेक मिपाकर उघडूनही बघणार नाहीत, याची खात्री बाळगा. व्हा बरे लवकर.

अनन्त अवधुत 01/12/2016 - 06:52
पर्याय अ) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय असेल तर सिंहाच्या जबड्यात हात घाला त्याने तुमचा भिडस्तपणा जाईल. सिंहाने हात खाल्ला तर डोळ्यातून पाणी काढायचे नाही, म्हणजे तुमचा हळवेपणा पण जाईल. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे फेसबुक आणि व्हाट्सअँप वर प्रोफाईल पिक्चर लावा. ते झाल्यावर उंच उडी मारून उंटांचा मुका घ्या. त्याच्या गालाचा घेतला तर उत्तम. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे ... पर्याय ब) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय नसेल तर लाल मुंग्यांच्या वारुळात हात घालून एक मुंगी बाहेर काढा. एकही मुंगी मरायला नको. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... गाढवाच्या मागे उभे राहून त्याला गुदगुल्या करा, गाढव हसले पाहिजे. ते सेल्फीचे विसरू नका. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... तुम्ही अ किंवा ब पैकी दोन गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला कसल्याही गोष्टीची काहीही भीती बाळगायचे कारण नाही. तुम्ही अ आणि ब करू शकलात तर तुमच्यासारखे तुम्हीच. काहीच नाही करू शकलात तर.. तरी पण तुमच्यासारखे तुम्हीच. हे सगळे वाचताना आणि करताना तुम्ही किती शूरवीर, दिलेर आणि जाँबाज आहेत याचा तुम्हालाच प्रत्यय येईल. [टीप]: स्वत:च्या जबाबदारीवर हे उपाय करावेत.

In reply to by अनन्त अवधुत

टवाळ कार्टा 01/12/2016 - 09:54
इतके सगळे करण्यापेक्षा बायकोला "तुला जेवण आज्जीबात जमत नाही" असे सांगा...काठिण्य पातळी वाढवायची असेल तर त्यानंतर "आईच्या हाताच्या जेवणाची सर कश्शालाच नाही" हे सुद्धा म्हणा....

दीपक११७७ 01/12/2016 - 15:10
१. तुम्ही जुन्या पध्दीने दिलाजाणारा एनिमा भर चोकात घ्यावा. किंवा २. शक्य असल्यास डुकरची विष्ठा वाळवुन, छोटे केक बनवुन सकाळी आणि संध्याकाळी गोमुत्रा सोबत खावी
माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्की

स्साला... रोच्ची कटकट

मन ·

भम्पक 11/09/2016 - 20:12
अरे वा !! आणि मनोबा लिहिते झाले .... मनोबाचा लडाख फेरीपासूनचा फ्यान ....

कंजूस 11/09/2016 - 20:19
>छोटी छोटी माणसं. छोटी छोटी जिंदगी. त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे प्रॉब्लेम्स. ही लोकच इतकी छोटिशी असतात की त्यांचे मोठ्ठे प्रॉब्लेम्सही अदरवाइज छोटेच असतात! साधी, छोटी , निरागस, इवली, व्रात्य,भाबडी,बेरकी,खोडकर जिंदगी.> :):):):):)

अभ्या.. 11/09/2016 - 21:27
मनोबा, तुला म्हनून सांगतो, लै कै लोड घेऊ नकोस. असला इशान अवस्थी तर मी पण होतो. अजुन आहे म्हणायला हरकत नाही. मॅपिंग माझे प्रमाणापेक्षा जास्त गंडलेले आहे. मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे. बाकी स्कीमा, लॉटर्‍या, लक्की ड्रॉ वगैरे जिंदगीत कधी लागलेले नाहीत. ४ जणाच्या चिठ्या टाकल्या तर त्यात कधी माझी आली नाही एवढ्यावरुन माझे नशीब नावाची चीझ किती --डू आहे ते बघ. राहता राहिलं तुला आर्टिस्ट, त्यांचा परफॉर्मन्स असले ग्लॅमर भारी वाटते. काय नसते सांगतो तुला. फुकट तगमग ती. ती झेपण्यापेक्षा तुझी सरळसोट जिंदगी बरी. शिंका बिंका तर कधीही कुठेही येतात, त्यात काय विचार करायचा. कुठलेच पासवर्ड लक्षात राहात नाहीत, कुलुप चारचरदा चेक करुन परत उघडेच राहिले आहे काय असे डोक्यात कायम असते. बँका वगैरे ऑफिसात उगा भीती वाटते. ड्रायव्हिंग करताना गोंधळतो, वॅलेट चेक करत राहतो. मग काय झाले? काय नसते रे हे. नॉर्मल आहे म्हणे हि जिंदगी. मिपावाल्यानीच सांगितलेय मला. सो. आरामसे रह्यनेका. जो होयेंगा अच्छाच होयेंगा बोलनेका.

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 12/09/2016 - 00:42
मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मी शॉपर्स स्टॉपवरुन एल एंड टी इन्फोटेकला रिक्षा केली होती. नुसतं मागे वळून पाहीलं असतं तर शॉपर्स स्टॉपच्या बाजूलाच असलेला एल एंड टी इन्फोटेकचा बोर्ड दिसला असता. तो रिक्षावालाही महान होता. त्याने रिक्षा संचेती, शिवाजी नगर बस स्थानक, कृषि विद्यापीठ आणि पुढचा भुयारी रस्ता अशी फिरवून मी जिथे रिक्षात बसलो होतो त्याच्या जेमतेम पन्नास पावले मागे उभी केली आणि तीस रुपये घेतले.

In reply to by सतिश गावडे

पगला गजोधर 12/09/2016 - 13:51
पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मग त्यात काय ? मी सुद्धा नटराज(सध्याचा जंगली महाराज रोड वर सध्या मॅकडोनाल्ड आहे त्या जवळचा पार्किंग लॉट) पासून स्वारगेट ला रिक्षांनेच जायचो, हा तुम्हाला लक्ष्मीनारायण ते स्वारगेट म्हणायचे होते का ?

मोदक 11/09/2016 - 23:52
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!

मोदक 11/09/2016 - 23:52
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!

पक्षी 12/09/2016 - 12:42
मन राव, छान मन लावून लिहिलं आहेस.... पण उगा डोक्याला शॉट नको लावू.. जसा आहे तसा राहा. "just live with it" . असल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात सगळ्या बरोबर घडतात, जास्त लक्ष नको देऊ. न्यूनगंड ठेवू नको किंवा इतरांबरोंबर स्वतःची तुलना करू नका. "enjoy yourself". उगा उपदेश म्हणून नाही सांगत,पण मी सुद्धा थोड्या फार प्रमाणात विसरभोळा आहे, गोष्टी विसरतो, वस्तू हरवतो, कामात चुका करतो, घोळ करतो, पण जास्त लक्ष नाही देत. जेवढं मला शक्य आहे तेवढंच करतो आणि बाकी सोडून देतो, चलता है. एखादी गोष्ट जरी विसरोल तर स्वतःला सांगतो "its ok" पुढच्या वेळी लक्षात ठेवेल. छोट्या गोष्टीत मन नको गुंतवू, मी ह्या पावसाळ्यात चक्क चार वेळा छत्री हरवली आणि प्रत्येक वेळी सापडली सुद्धा. एकदा रिक्शा वाल्याने मला 500 रुपयाला गंडवलं, मी त्याला 50 रुपये समजून 500 ची नोट दिली, त्याने ती गुपचूप खिशात ठेवली आणि पसार झाला. मी मागे पळालो पण भाऊ टॉप स्पीड ने भन्नाट सुटले. पण मी मनाला नाही लावली गोष्ट, स्वतःला समजावलं कि जाऊ दे त्याच्या नशिबात होते ते. Don't bother your self. try to enjoy your own company and what you doing.
बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही.
बुटाची लेस पटकन बांधणं "Is not a big deal". आणि तरी सुद्धा लवकर आणि व्यवस्थित बांधायची असेल तर सावकाश आणि लक्षपूर्वक बांधा, भले हि 10 मिनिटं लागले तरी चालतील. कुठलं हि काम मग ते किती हि छोटं/मोठं असू दे, सावकाश आणि मनापासून केल तर व्यवस्थित होतं (हा माझा स्वतःचा अनुभव आहे) .
एकसारखी स्वाक्षरी/सही पुन्हा पुन्हा करता येत नै.
हे सुद्धा नेहमी घडतं माझ्या बरोबर, पण चेक कधी परत आला नाही, उणीस बीस चालतं. आणि परत आला तरी पुढल्या वेळी अजून वेगळी स्वाक्षरी करून पाठवायचा चेक, अश्या वेळी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, बँकेला त्रास द्यायचा. आणि हो जरा फिल्मी डायलॉग मारतो आता ... चेक च्या स्वाक्षरी पेक्षा बँक बॅलन्स महत्वाचा आहे.
ग्रुपसोबत लंच/डिनरला गेलो तर सगळं लक्ष लहान मुलासारखं खाण्याकडच असतं. अगदि सहजतेने मन लावून खात बसतो.
अर्रे वाह छान आहे कि मग, चांगलं हाणायच हाटलीत गेल्यावर, फुकट असेल तर अजून हाणायचं. आणि सगळे हेच करता.
लोकांच्या गप्पा काय चालल्यात; काय टॉपिक आहे; कशाचच भान नै.
काय करायचं असल्या भंपक आणि फालतू गप्पांचं, तरी सुद्धा अधून मधून एखादी काडी सारायची, आपल्या ला जमेल तेवढी आणि झेपेल तेवढी. खूप जास्त होतं आहे, अजून लिहायची इच्छा होती, पण आवरतो आता....

कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार,
हे इमॅजीन करुन बेक्कार हसतोय...

माझ्या एका खास दोस्ताच्या मते हे प्रॉब्लेम्स मुळात प्रॉब्लेम्सच नाहित. किंवा first world problems आहेत. अगदी अगदी. हेच म्हणतो. पण या नसणार्‍या प्रॉब्लेम मधून १०० + प्रतिसाद जनरेट होतील.

माझे आयुष्य फारच बरे आहे कि मग म्हणजे तुम्ही लिहिले तसेच आहे सगळे पण मी डोक्याला त्रास करून घेत नाही

सानझरी 12/09/2016 - 14:00
ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं. लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै.
हा सगळ्याच introvert लोकांचा प्रॉब्लेम आहे. चालायचंच.
आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै
हा तर बर्‍याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. माझी पण सही दर वेळेला निराळी येते. त्यात वाईट नाही वाटून घ्यायचं. अगदी पुलंनी सुद्धा लिहीलंय की सही जमत नाही, असं कुठेसं वाचल्याचं आठवतंय.
आम्हाला चित्रं, संगीत, खेळ/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै
येत नसलं तरी प्रयत्न तर करून बघा. मला खूप काही करावसं वाटतं पण येत काहीच नाही. नविन छंदावर पैसे खर्च केले की आणि ३-४ महिने त्या धुंदीत राहिलं की फार बरं वाटतं. मागे बासरी शिकायला घेतली. त्यात नविन बासरी घेणे, दोन तीन महीने क्लासला जाणे यात बरेच पैसे खर्च केले. पण २ महीने सराव करूनही 'प' काही वाजेना, मग बसरीचा नाद सोडुन दिला. त्या क्लासमधे खुप चांगले मित्र मिळाले आणि शास्त्रिय संगीताची आवड लागली ही जमेची बाजु. त्या नंतर स्केचिंगचं वेड लागलं. स्केच पॅड, चर्कोल पेन्सिल, कलर पेन्सिल, स्केचिंग पेन्स यावर बराच खर्च केला. नंतर स्केचिंगची पुस्तकं घेतली तिही दोनेक हजराच्यावर. ३-४ महीने प्रयत्न करून तेही सोडुन दिलं. आता ती पुस्तकं म्हणजे आयुष्यभराचा ठेवा आहेत. मग नंतर वॉटर कलरचं वेड. त्यातही काही जमलं नाही. आता नविन रंग जसेच्या तसे पडून आहेत. सध्या मी अ‍ॅक्रेलिक रंगांशी कुस्ती खेळत असते. dried flowers craft, ओरिगामी, सायकलींग असे अनेक छंद एकाच वेळेला सुरू असतात. कालच व्यंकटेश माडगुळकरांचं 'वाटा' हे पुस्तक वाचत होते. त्यातला हा एक उतारा-
या जिवनात कंटाळा अटळ आहे आणि तोही अपुर्‍या पांघरुणासारखा असतो. अपुरं पांघरुण तोंडावर घ्यावं म्हटलं तर पाय उघडे राहतात, पायाखाली घ्यावं म्हटलं तर तोंड उघडे. यातून थोडी सुटका होते ती आपल्या छंदामुळे. जमतील तसे छंद लावून घ्यावेत. एका छंदाचा कंटाळा आला की तो टाकावा, दुसरा लावून घ्यावा, किंवा एकाच वेळी अनेक छंद चालू ठेवावेत. मानवी आयुष्य तसं निरर्थकच. कला, राष्ट्रभक्ती, देवधर्म, असे काही काही निर्मून आपणच त्याला अर्थ प्राप्त करून देत नाही का?
आपण व्यवस्थापीडीत (हा शब्द फारच आवडलाय) आहोत हे मोअर ऑर लेस सगळ्यांनाच वाटतं. रिक्षेवाले सगळ्यांनाच फसवतात. मला तर पेट्रोल पंपावरती पण काहिनाकाही हातचालाखी करून फसवतात. आपण बिचारे आहोत हे बर्‍याच लोकांना वाटतं, पण जंगल रूल्स सगळ्यांनाच लागू होतात, आणि लढणं भाग आहे. आणि हो, Murphy's law देखील सगळ्यांनाच लागू होतो. 'Anything that can possibly go wrong, does' त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जास्त टेंशन घ्यायचं नाही. कधीकधी फारच सगळ्या गोष्टींचा उबग आला तर मी पुलंचं हे पत्र वाचते, वाचुन बघा, कदाचित तुम्हालाही आवडेल.

मृत्युन्जय 12/09/2016 - 14:15
टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये चार वर्षाचं बालक जावं ; तितपत गोंधळल्यासारखा चेहरा करुन असतो "असतो" या शब्दातुन जी वारंवारता जाणवते त्यामुळे ड्वाळे पाणावले. काय तो व्यासंग म्हणायचा.

नीलमोहर 13/09/2016 - 18:32
मस्त लिहिलेय, एक नंबर !! यावर खूप काही लिहिता येईल, पण त्यासाठी विचार करावा लागेल, आणि विचार सुरु झाले की चंद्रापासून माच्चू पिच्चूपर्यंत कुठेही फिरून येतात, हे जे तुम्ही लिहिलेय ते पर्फेक्टली नॉर्मल विचार आहेत, गाडी योग्य दिशेने जात असते, तिला तिच्या रस्त्याने जाऊ द्या, मला दिशा, directions लवकर सुधरत नाही, फार विचार करावा लागतो, टेक्नॉलॉजी पटकन समजत नाही, ३d max शिकायचा पुष्कळ प्रयत्न केला, इतकं कॉम्प्लेक्स, मैथेमॅटिकेल टेक्निकल डोक्यात शिरायलाच तयार नाही. पुण्यातील कोणता रस्ता कुठला, भिडे पूल, नदीपात्रातील पूल, झेड ब्रिज सगळे सारखे, त्यात नेहमी कन्फ्युजन, हिशेब पटकन करता येत नाही, आकडे मोडत बसावं लागतं, ऑनलाइन खरेदी आल्मोस्ट नाहीच, paytm amazon ह्यांव त्यांव काहीच नाही, ऑफिसात निम्म्याहून जास्त बायकांचे आठवड्याला कुरियर, ते बघून कसं जमतं ना लांबून म्हणायचं, बास, क्रेडिट कार्ड नाही, ते तरी लांब ड्रायविंग लायसेन्सही नाही ( हे मात्र मनावर घेणार नक्की ) चार माणसांत (बायकांत जास्त) काय बोलावं समजत नाही, मग उगाच इकडे तिकडे बघत, फोनमध्ये डोकं घालून बसायचं, अजून आठवेल तसे टाकेन बरेच काही, i love my own company, दॅट्स ऑल दॅट मॅटर्स, :)

मन१ 14/09/2016 - 11:15
सर्व वाचक , प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. सल्ले दिलेत, पु लं च्या लिंका दिल्यात, माझा उत्साह वाढवायचा प्रयत्न केलात, हे सगळं कसं नॉर्मलच आहेत हे ही सांगितलत, म्हणजे माझी काळजी करता. माझे हितचिंतक आहात.माझे हितचिंतक असण्याबद्दल आभार. व्यक्तिशः स्वतःबद्दल अधिक काही सांगत - बोलत बसणं आत्ता , इथे , ह्या धाग्यावर उचित वाटत नाही. पुनश्च आभार.

भम्पक 11/09/2016 - 20:12
अरे वा !! आणि मनोबा लिहिते झाले .... मनोबाचा लडाख फेरीपासूनचा फ्यान ....

कंजूस 11/09/2016 - 20:19
>छोटी छोटी माणसं. छोटी छोटी जिंदगी. त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे प्रॉब्लेम्स. ही लोकच इतकी छोटिशी असतात की त्यांचे मोठ्ठे प्रॉब्लेम्सही अदरवाइज छोटेच असतात! साधी, छोटी , निरागस, इवली, व्रात्य,भाबडी,बेरकी,खोडकर जिंदगी.> :):):):):)

अभ्या.. 11/09/2016 - 21:27
मनोबा, तुला म्हनून सांगतो, लै कै लोड घेऊ नकोस. असला इशान अवस्थी तर मी पण होतो. अजुन आहे म्हणायला हरकत नाही. मॅपिंग माझे प्रमाणापेक्षा जास्त गंडलेले आहे. मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे. बाकी स्कीमा, लॉटर्‍या, लक्की ड्रॉ वगैरे जिंदगीत कधी लागलेले नाहीत. ४ जणाच्या चिठ्या टाकल्या तर त्यात कधी माझी आली नाही एवढ्यावरुन माझे नशीब नावाची चीझ किती --डू आहे ते बघ. राहता राहिलं तुला आर्टिस्ट, त्यांचा परफॉर्मन्स असले ग्लॅमर भारी वाटते. काय नसते सांगतो तुला. फुकट तगमग ती. ती झेपण्यापेक्षा तुझी सरळसोट जिंदगी बरी. शिंका बिंका तर कधीही कुठेही येतात, त्यात काय विचार करायचा. कुठलेच पासवर्ड लक्षात राहात नाहीत, कुलुप चारचरदा चेक करुन परत उघडेच राहिले आहे काय असे डोक्यात कायम असते. बँका वगैरे ऑफिसात उगा भीती वाटते. ड्रायव्हिंग करताना गोंधळतो, वॅलेट चेक करत राहतो. मग काय झाले? काय नसते रे हे. नॉर्मल आहे म्हणे हि जिंदगी. मिपावाल्यानीच सांगितलेय मला. सो. आरामसे रह्यनेका. जो होयेंगा अच्छाच होयेंगा बोलनेका.

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 12/09/2016 - 00:42
मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मी शॉपर्स स्टॉपवरुन एल एंड टी इन्फोटेकला रिक्षा केली होती. नुसतं मागे वळून पाहीलं असतं तर शॉपर्स स्टॉपच्या बाजूलाच असलेला एल एंड टी इन्फोटेकचा बोर्ड दिसला असता. तो रिक्षावालाही महान होता. त्याने रिक्षा संचेती, शिवाजी नगर बस स्थानक, कृषि विद्यापीठ आणि पुढचा भुयारी रस्ता अशी फिरवून मी जिथे रिक्षात बसलो होतो त्याच्या जेमतेम पन्नास पावले मागे उभी केली आणि तीस रुपये घेतले.

In reply to by सतिश गावडे

पगला गजोधर 12/09/2016 - 13:51
पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मग त्यात काय ? मी सुद्धा नटराज(सध्याचा जंगली महाराज रोड वर सध्या मॅकडोनाल्ड आहे त्या जवळचा पार्किंग लॉट) पासून स्वारगेट ला रिक्षांनेच जायचो, हा तुम्हाला लक्ष्मीनारायण ते स्वारगेट म्हणायचे होते का ?

मोदक 11/09/2016 - 23:52
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!

मोदक 11/09/2016 - 23:52
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!

पक्षी 12/09/2016 - 12:42
मन राव, छान मन लावून लिहिलं आहेस.... पण उगा डोक्याला शॉट नको लावू.. जसा आहे तसा राहा. "just live with it" . असल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात सगळ्या बरोबर घडतात, जास्त लक्ष नको देऊ. न्यूनगंड ठेवू नको किंवा इतरांबरोंबर स्वतःची तुलना करू नका. "enjoy yourself". उगा उपदेश म्हणून नाही सांगत,पण मी सुद्धा थोड्या फार प्रमाणात विसरभोळा आहे, गोष्टी विसरतो, वस्तू हरवतो, कामात चुका करतो, घोळ करतो, पण जास्त लक्ष नाही देत. जेवढं मला शक्य आहे तेवढंच करतो आणि बाकी सोडून देतो, चलता है. एखादी गोष्ट जरी विसरोल तर स्वतःला सांगतो "its ok" पुढच्या वेळी लक्षात ठेवेल. छोट्या गोष्टीत मन नको गुंतवू, मी ह्या पावसाळ्यात चक्क चार वेळा छत्री हरवली आणि प्रत्येक वेळी सापडली सुद्धा. एकदा रिक्शा वाल्याने मला 500 रुपयाला गंडवलं, मी त्याला 50 रुपये समजून 500 ची नोट दिली, त्याने ती गुपचूप खिशात ठेवली आणि पसार झाला. मी मागे पळालो पण भाऊ टॉप स्पीड ने भन्नाट सुटले. पण मी मनाला नाही लावली गोष्ट, स्वतःला समजावलं कि जाऊ दे त्याच्या नशिबात होते ते. Don't bother your self. try to enjoy your own company and what you doing.
बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही.
बुटाची लेस पटकन बांधणं "Is not a big deal". आणि तरी सुद्धा लवकर आणि व्यवस्थित बांधायची असेल तर सावकाश आणि लक्षपूर्वक बांधा, भले हि 10 मिनिटं लागले तरी चालतील. कुठलं हि काम मग ते किती हि छोटं/मोठं असू दे, सावकाश आणि मनापासून केल तर व्यवस्थित होतं (हा माझा स्वतःचा अनुभव आहे) .
एकसारखी स्वाक्षरी/सही पुन्हा पुन्हा करता येत नै.
हे सुद्धा नेहमी घडतं माझ्या बरोबर, पण चेक कधी परत आला नाही, उणीस बीस चालतं. आणि परत आला तरी पुढल्या वेळी अजून वेगळी स्वाक्षरी करून पाठवायचा चेक, अश्या वेळी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, बँकेला त्रास द्यायचा. आणि हो जरा फिल्मी डायलॉग मारतो आता ... चेक च्या स्वाक्षरी पेक्षा बँक बॅलन्स महत्वाचा आहे.
ग्रुपसोबत लंच/डिनरला गेलो तर सगळं लक्ष लहान मुलासारखं खाण्याकडच असतं. अगदि सहजतेने मन लावून खात बसतो.
अर्रे वाह छान आहे कि मग, चांगलं हाणायच हाटलीत गेल्यावर, फुकट असेल तर अजून हाणायचं. आणि सगळे हेच करता.
लोकांच्या गप्पा काय चालल्यात; काय टॉपिक आहे; कशाचच भान नै.
काय करायचं असल्या भंपक आणि फालतू गप्पांचं, तरी सुद्धा अधून मधून एखादी काडी सारायची, आपल्या ला जमेल तेवढी आणि झेपेल तेवढी. खूप जास्त होतं आहे, अजून लिहायची इच्छा होती, पण आवरतो आता....

कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार,
हे इमॅजीन करुन बेक्कार हसतोय...

माझ्या एका खास दोस्ताच्या मते हे प्रॉब्लेम्स मुळात प्रॉब्लेम्सच नाहित. किंवा first world problems आहेत. अगदी अगदी. हेच म्हणतो. पण या नसणार्‍या प्रॉब्लेम मधून १०० + प्रतिसाद जनरेट होतील.

माझे आयुष्य फारच बरे आहे कि मग म्हणजे तुम्ही लिहिले तसेच आहे सगळे पण मी डोक्याला त्रास करून घेत नाही

सानझरी 12/09/2016 - 14:00
ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं. लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै.
हा सगळ्याच introvert लोकांचा प्रॉब्लेम आहे. चालायचंच.
आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै
हा तर बर्‍याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. माझी पण सही दर वेळेला निराळी येते. त्यात वाईट नाही वाटून घ्यायचं. अगदी पुलंनी सुद्धा लिहीलंय की सही जमत नाही, असं कुठेसं वाचल्याचं आठवतंय.
आम्हाला चित्रं, संगीत, खेळ/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै
येत नसलं तरी प्रयत्न तर करून बघा. मला खूप काही करावसं वाटतं पण येत काहीच नाही. नविन छंदावर पैसे खर्च केले की आणि ३-४ महिने त्या धुंदीत राहिलं की फार बरं वाटतं. मागे बासरी शिकायला घेतली. त्यात नविन बासरी घेणे, दोन तीन महीने क्लासला जाणे यात बरेच पैसे खर्च केले. पण २ महीने सराव करूनही 'प' काही वाजेना, मग बसरीचा नाद सोडुन दिला. त्या क्लासमधे खुप चांगले मित्र मिळाले आणि शास्त्रिय संगीताची आवड लागली ही जमेची बाजु. त्या नंतर स्केचिंगचं वेड लागलं. स्केच पॅड, चर्कोल पेन्सिल, कलर पेन्सिल, स्केचिंग पेन्स यावर बराच खर्च केला. नंतर स्केचिंगची पुस्तकं घेतली तिही दोनेक हजराच्यावर. ३-४ महीने प्रयत्न करून तेही सोडुन दिलं. आता ती पुस्तकं म्हणजे आयुष्यभराचा ठेवा आहेत. मग नंतर वॉटर कलरचं वेड. त्यातही काही जमलं नाही. आता नविन रंग जसेच्या तसे पडून आहेत. सध्या मी अ‍ॅक्रेलिक रंगांशी कुस्ती खेळत असते. dried flowers craft, ओरिगामी, सायकलींग असे अनेक छंद एकाच वेळेला सुरू असतात. कालच व्यंकटेश माडगुळकरांचं 'वाटा' हे पुस्तक वाचत होते. त्यातला हा एक उतारा-
या जिवनात कंटाळा अटळ आहे आणि तोही अपुर्‍या पांघरुणासारखा असतो. अपुरं पांघरुण तोंडावर घ्यावं म्हटलं तर पाय उघडे राहतात, पायाखाली घ्यावं म्हटलं तर तोंड उघडे. यातून थोडी सुटका होते ती आपल्या छंदामुळे. जमतील तसे छंद लावून घ्यावेत. एका छंदाचा कंटाळा आला की तो टाकावा, दुसरा लावून घ्यावा, किंवा एकाच वेळी अनेक छंद चालू ठेवावेत. मानवी आयुष्य तसं निरर्थकच. कला, राष्ट्रभक्ती, देवधर्म, असे काही काही निर्मून आपणच त्याला अर्थ प्राप्त करून देत नाही का?
आपण व्यवस्थापीडीत (हा शब्द फारच आवडलाय) आहोत हे मोअर ऑर लेस सगळ्यांनाच वाटतं. रिक्षेवाले सगळ्यांनाच फसवतात. मला तर पेट्रोल पंपावरती पण काहिनाकाही हातचालाखी करून फसवतात. आपण बिचारे आहोत हे बर्‍याच लोकांना वाटतं, पण जंगल रूल्स सगळ्यांनाच लागू होतात, आणि लढणं भाग आहे. आणि हो, Murphy's law देखील सगळ्यांनाच लागू होतो. 'Anything that can possibly go wrong, does' त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जास्त टेंशन घ्यायचं नाही. कधीकधी फारच सगळ्या गोष्टींचा उबग आला तर मी पुलंचं हे पत्र वाचते, वाचुन बघा, कदाचित तुम्हालाही आवडेल.

मृत्युन्जय 12/09/2016 - 14:15
टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये चार वर्षाचं बालक जावं ; तितपत गोंधळल्यासारखा चेहरा करुन असतो "असतो" या शब्दातुन जी वारंवारता जाणवते त्यामुळे ड्वाळे पाणावले. काय तो व्यासंग म्हणायचा.

नीलमोहर 13/09/2016 - 18:32
मस्त लिहिलेय, एक नंबर !! यावर खूप काही लिहिता येईल, पण त्यासाठी विचार करावा लागेल, आणि विचार सुरु झाले की चंद्रापासून माच्चू पिच्चूपर्यंत कुठेही फिरून येतात, हे जे तुम्ही लिहिलेय ते पर्फेक्टली नॉर्मल विचार आहेत, गाडी योग्य दिशेने जात असते, तिला तिच्या रस्त्याने जाऊ द्या, मला दिशा, directions लवकर सुधरत नाही, फार विचार करावा लागतो, टेक्नॉलॉजी पटकन समजत नाही, ३d max शिकायचा पुष्कळ प्रयत्न केला, इतकं कॉम्प्लेक्स, मैथेमॅटिकेल टेक्निकल डोक्यात शिरायलाच तयार नाही. पुण्यातील कोणता रस्ता कुठला, भिडे पूल, नदीपात्रातील पूल, झेड ब्रिज सगळे सारखे, त्यात नेहमी कन्फ्युजन, हिशेब पटकन करता येत नाही, आकडे मोडत बसावं लागतं, ऑनलाइन खरेदी आल्मोस्ट नाहीच, paytm amazon ह्यांव त्यांव काहीच नाही, ऑफिसात निम्म्याहून जास्त बायकांचे आठवड्याला कुरियर, ते बघून कसं जमतं ना लांबून म्हणायचं, बास, क्रेडिट कार्ड नाही, ते तरी लांब ड्रायविंग लायसेन्सही नाही ( हे मात्र मनावर घेणार नक्की ) चार माणसांत (बायकांत जास्त) काय बोलावं समजत नाही, मग उगाच इकडे तिकडे बघत, फोनमध्ये डोकं घालून बसायचं, अजून आठवेल तसे टाकेन बरेच काही, i love my own company, दॅट्स ऑल दॅट मॅटर्स, :)

मन१ 14/09/2016 - 11:15
सर्व वाचक , प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. सल्ले दिलेत, पु लं च्या लिंका दिल्यात, माझा उत्साह वाढवायचा प्रयत्न केलात, हे सगळं कसं नॉर्मलच आहेत हे ही सांगितलत, म्हणजे माझी काळजी करता. माझे हितचिंतक आहात.माझे हितचिंतक असण्याबद्दल आभार. व्यक्तिशः स्वतःबद्दल अधिक काही सांगत - बोलत बसणं आत्ता , इथे , ह्या धाग्यावर उचित वाटत नाही. पुनश्च आभार.
---स्पष्टीकरण --- " रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय. ---स्पष्टीकरण समाप्त-- तर सांगायचं म्हणजे मी मनोबा. माझं टोपण नाव मनोबा. माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं. बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही. फार प्रयत्न केल्याशिवाय लेस बांधली जात नाही. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही. रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले.

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

चिंटु ·

In reply to by यशोधरा

चिंटु 25/05/2016 - 18:06
हो. इंटरनॅशनल. कोपी पेस्ट केल इंटरनॅशनल शब्द. मला टायपिन्ग येत एकदम चान्गल पण वेळ लागतो. म्हणून लवकर लिहिले चौकशीचे जसे येइल तसे .

चिंटु 25/05/2016 - 18:15
अरे गम्मत नन्तर करा ना.पुरेशी माहिती मिळाल्यानन्तर गम्मत-ओन्ली धागा केला तरी चालेल. सध्या मदत करा ना जमत असेल तर.

In reply to by चिंटु

यशोधरा 25/05/2016 - 18:18
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा खरेच नाही ठाऊक. चांगल्या शाळा म्हणून हल्ली मुक्तांगण, प्रबोधिनी वगैरे हीच नावे ऐकली आहेत.

एस 25/05/2016 - 18:33
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट आहे आणि तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेल्या शैक्षणिक संकल्पना राबवल्या जातात. आंतरराष्ट्रीय शाळा नुसत्या नावाला असतात.

In reply to by एस

चिंटु 25/05/2016 - 18:45
पण मित्राने स्पेसिफिकली सान्गितले आहे इन्टरनॅशनल स्कूल हवे म्हणून. झेड पी शाळा उतम असू शकते हे मला पटते.आपल्या राज्यातच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शाळा आहेत. मी तर त्याला अक्षर नन्दन वगैरे सारख्या किंवा परयायी शाळा असतात ना थोड्या वेगळ्या त्यापण सुचवल्यात पण सध्या त्याने कॅटेगरी पक्की केली आहे सी बी एस इ शाळा जॉइन करायची म्हणून.तर त्याच्या ठरवलेल्या कॅटेगरी नुसार काही शोधता येत आहे का ते बघतो आहे. आपण त्याला कस म्हणणार पुन्हा की एकूणातच तुझी कॅटेगरी बदल म्हणून. त्याचीही काही कारणे असतील ना. तो स्वतः गावातल्या शाळेतून शिकलेला आहे लहान असताना. झेड पी भारी असू शकतेपण.

In reply to by यशोधरा

चिगो 26/05/2016 - 15:48
खर्‍या अर्थाने 'इंटरनॅशनल' असलेल्या शाळांमधे 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम नसतो.. 'आयबी'चा असतो. काही शाळा 'आयसीएसई;चा अभ्यासक्रम शिकवून स्वतःच्या नावामागे 'इंटरनॅशनल' लावतात. तेव्हा तुमच्या मित्राला नेमका सीबीएसई, आयसीएसई की आयबीचा अभ्यासक्रम हवाय, ते विचारा..

प्रचेतस 25/05/2016 - 19:00
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल स्कूल, हिंजवडी. आमच्या हापिसच्या समोरच आहे अगदी. मुले खेळताना दिसतात बरेचदा. दाबून फी आहे. वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील. अभ्यासक्रमही सीबीएसई नै तर फ़ुल्टू इंटरन्याशनल. तुमच्या मित्राला नक्की आवडेल बघा. एकदम नामांकित.

In reply to by प्रचेतस

म्हणजे १० वर्षांत किमान दीड कोटी रुपये झाले. मग तेच बँकेत ठेवले तर १० वर्षांनी घरबसल्या दरमहा १ लाख रुपये मिळतील... असो, देवाच्या, देहाच्या, मद्याच्या बाजारा नंतर शिक्षणाचा बाजारच म्हणा की हो....

In reply to by नाखु

ज्याला शिकायची (ज्ञान मिळवायची) इच्छा आहे, तो शिकतोच. असो, आडातच नसेल तर पोहर्‍यात येत नाही आणि बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना त्रासच जास्त होतो.

In reply to by प्रचेतस

शंतनु _०३१ 13/06/2016 - 18:22
शाळेची फी किती वर्षांची फी आहे ही
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील.
कैच्या काही

विंजिनेर 26/05/2016 - 00:27
इंटरनॅशनल शाळा = सीबीएसी हे समीकरण काही कळाले नाही बुवा. प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा जानेवारीत असते तेव्हा ते ध्यानात ठेवा - शाळेच्या वेबसाईटवर माहिती मिळेलच. बाकी, शाळा सिलेक्षन क्रायटेरीया ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 26/05/2016 - 12:32
ईट स्कुल म्हणजे विटा वापरुन बांधलेले स्कुल (कोबा किंवा शहाबादी फरशी), साधी स्कुल म्हन्जे मातीच्या भिंती असलेले स्कुल त्यात खाली शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसावे लागते( पावसाळ्यात गोणपाट टाकुन)

In reply to by इरसाल

स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by इरसाल

ईंटरन्याशनल स्कुल आणी बीगर ईंटरन्याशनल स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 27/05/2016 - 13:43
एक लिंक देत आहे त्यावर जवळपास सगळ्या शाळांमधला फरक काय आहे त्याचे फायदे तोटे यावर नीट भाष्य केलय. (लिंकमधला मजकुर इंग्रजीत आहे). http://blog.schoolfinder.co.in/2014/02/difference-between-cbse-icse-igcse-ib.html

सुचिकांत 26/05/2016 - 11:21
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल तर आयबी बोर्ड बघा. सीबीएसई कशाला? बाकी मराठी माध्यमात पण दाबून फी घेणाऱ्या शाळा आहेत, पण इंग्रजी शाळांची बरोबरी फीच्या बाबतीत नाही. कधी मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे जाणून घ्यायची इच्छा झाली तुमच्या मित्राला तर, majhishala.majhibhasha@gmail.com ला मेल पाठवायला सांगा. चर्चा करता येईल. - सुचिकांत ९०५२३४४४७६

माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस मध्ये गेला होता. आता आम्हीच शिफ्ट होत आहोत म्हणुन शाळा सोडली ती. पण शाळा बर्‍यापैकी आहे. तरीही चार गोष्टी सांगुन ठेवते. १. माझी अशी अपेक्षा होती की ICSE म्हणजे "घोका आणि ओका" न करता कन्सेप्ट समजावुन सांगण्यावर भर असेल. तसे काही नसते, सगळ्याच शाळा शेवटी सिलॅबस संपवायच्या मागे असतात. २. सिलॅबस जरी भारी असला तरी शिकवणारे हे सर्वसाधारण लोकच असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षक काय निकषांवर घेतले जातात हे ठाऊक नाही. पण सरकारी शाळांप्रमाणे ते खुप अनुभवी असत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. ३. जे लोक स्वतःच साधारण अभ्यासक्रम शिकले ते लोक आपल्या मुलाला काही तरी भन्नाट पद्धतीने शिकवतील हे शक्य नाही. तेव्हा शेवटी परत गाडी परीक्षेसाठी अभ्यास ह्याच रुळावर येते. ४. जवळपास सर्वच शाळांमध्ये अमुक एक ब्रॅण्डचेच खडू द्या, तमुक माणसाकडुनच गणवेष घ्या, आम्हीच वह्या-पुस्तके देणार, प्लास्टिक कव्हरच हवे असे असते. तिथुनच त्यांना पुष्कळ पैसा मिळतो. मला ह्या गोष्टीची मनस्वी चीड आहे. त्यामुळे मी परत येऊन अशा शाळेत मुलाला घालणार नाही. पण कुणाकुणाला त्यात फार मोठा इश्यु वाटत नाही. ट्री हाऊसचा टोटल खर्च आमच्या आवाक्यात होता. (नर्सरी/.केजी:- ट्युशन फीस - ३७०००/-, त्यात पुस्तके आणि शुज मिळाले, गणवेश्+बारिक सारिक स्टेशनरी - ५-७ हजार असेल, बस - ११ हजार ) ५. बस सेवा उत्तम दर्जाची आहे. आत कॅमेरे असल्याने मी ऑफिसातुन मुलाला पाहु शकत होते. ६. इतर उपक्रमही चांगले होतात. त्यातुन थोडे फार पैसे मागतात जसे की फोटो इ चे. पण ते किरकोळ आहेत. ७. पुढे जाउन स्पर्धा परीक्षा कंपल्सरी करतात म्हणे. मला ते आवडले नाही. ज्याला ज्याची आवड आहे ते करु द्यावे. ८. कँटिनची सोय आहे. त्यांनी ती सुद्धा कंपल्सरी करायचा प्रयत्न केला (प्रिस्कुलला). मी तरी जुमानलं नाही. "दमडीही भरणार नाही. मी माझ्या मुलाला डबाच देणार." असं सांगुन आले. ओके म्हणाले. ९. ओव्हरऑल फार चिकित्सक स्वभाव नसेल तर ही शाळा चांगली आहे. वेबसाईट्वर अभ्यासक्रमा विषयी माहिती मिळेल.

In reply to by पिलीयन रायडर

माझा भाचा गोखले नगरच्या साईडला जी परांजपे शाळा (भारती विद्याभवन) आहे, तिथे आहे. वहिनीचा अनुभव उत्तम आहे. पण ती शाळा एस.एस.सी बोर्ड आहे. एक शाखा शिवाजी पुतळ्यापाशी सुद्धा आहे. चौकशी करु शकता.

In reply to by के.के.

हो.. आणि तॉ आशियातली दुसर्‍या क्रमांकाची स्कुल चेन आहे असं ते १०० वेळा सांगतात. पण साध्या अ‍ॅडमिशन आणि फिस च्या पोलीसिज क्लिअर नाहित की कुठे डॉक्युमेन्टेड नाहीत. आधी संगीता रावजी होत्या मुख्यध्यापक तेव्हा चांगलं होतं जरा. आता ज्या आहेत त्यांच्यात फार निर्णयक्षमता नाही असे माझे मत आहे. मला माझ्या कामासाठी अखेर रावजींकडेच जावे लागले होते.

विवेकपटाईत 26/05/2016 - 11:54
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल शाळा आहेतच. शाळेत ac बस ac भरपूर पैसा घेणार्या. बाकी पैसा खर्च करायचा असेल तर देहरादून येथे बर्याच शाळा आहेत. आपल्या मुलाला शाळेंत घाला. काळा आंग्ल माणूस तैयार होऊन बाहेर पडेल. बाकी खरोखरच चांगले शिक्षण आणि स्वस्थ माणूस तैयार पाहिजे असेल तर पतंजलीचे हरिद्वारला आचार्यकुलं आहे. पण तिथे अडमिशन घेणे दुष्कर कार्य आहे.

चिंटु 26/05/2016 - 13:03
सगळ्यान्ना थेन्क्यू. ती हिंजवडीमधली प्रचेतस रावान्ची मर्सिडिज शाळा सप्त तारान्कित का काहीतरी म्हणता यावी अशी आहे. माझ्या मित्राला त्रितारान्कित पुरेशी आहे म्हणाला. त्यावरुन बजेटचा अन्दाज यावा. मिसळपाववरती चवकशी करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष कुणाचा कोणकोणत्या शाळेचा अनुभव कसा आहे हे समजून घ्यावयाचा आहे. म्हणजे साधारणतः पिलियन रायडर काकूंनी जसा नेमका फीडबॅक दिला तशा पद्धतीची माहिती, अनुभव ऐकण्यास आवडेल. इथे दिलेल्या वेबसाइट्स खरोखर कामाच्या आहेतच. त्याहीबद्दल थँक्यू. आणि अजून एक म्हणजे त्याला रेन्टवरती फ्लॅटही हवा आहे. त्यासाठी चान्गल्या सोसायटी तो शोधत आहे. त्याचे ओफिस कर्वेनगर कर्वे रोड वगैरे परिसरात असणार आहे म्हणाला. त्याचे प्राधान्य असे आहे -- १.सोसायटी गेटेड हवी. स्टेन्ड अलोन बिल्डिन्ग नको. २.लहान मोठ्या अ‍ॅमेनिटीज असलेल्या चान्गल्या. म्हणजे स्विमिन्ग पूल जिम्नेशियम वगैरे. २.पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास असावा असा आग्रह नाही. स्वतःची गाडी आहे. ३.फ्लॅटचा,सोसायटीचा प्लान चांगला हवा.हवेशीर , प्रशस्त,पुरेसा सूर्य प्रकाश असणारे हवे. ४.आसपास थोडी शांतता असलेले जास्त चांगले. गोंगाट नको. म्हणजे अगदिच रस्त्यावरचे नको. ५.ऑफिसपासून दहा पंधरा किलोमीटर पर्यंत अंतर असलेले चालेल म्हणाला. ६.पाण्याचा प्रोब्लेम नसायला हवा. फार मागे कोथ्रुड डेपो परिसरात होता म्हणतात किनारा होटेलच्या पलिकडच्या बाजूला.झालच तर खराडी विमाननगर परिसरात पण काही चान्गल्या सोसायटीत पण पाण्याचा प्रोब्लेम होता सुरुवातीला.तर तसे होयला नको आहे. त्याच्या अपेक्षा ऐकून डोळ्यासमोर वारजे नाक्याजवलच्या आदित्य गार्डन सिटीचेच नाव आले.तर अशा सोसायटी सुचवू शकाल का. कोथरुड कर्वेनगर पौड रोड वनाज ते वारजे नाका किन्वा अगदि एस बी रोड , मॉडेल कॉलोनी,आयडीयल कॉलोनी ह्या दरम्यानच्या पट्ट्यात त्याला मिळाल्यास उत्तम, असे मला वाटत आहे. पण तिकडे अशा सोसायटी आहेत का. माझे जे थोडेफार फिरणे झाले आहे त्याप्रमाणे अशा सोसायटी वाकड पिम्पळे सवदागर भागात जास्ती दिसल्या आहेत.पण वाकड पिम्पळे सवदागर शक्यतो नको आहे. बाणेर त्यातल्या त्यात चालेल. मॅजिक ब्रिक्स डोट कोम वगैरेवरती जाउन पाहणे होणारच आहे. पण इथे तुम्ही लोक स्वतःच्या अनुभवातून आणि पाहण्यातून सान्गू शकताल तर ते जास्ती कामाचे वाटते. तुम्ही स्वतः रहात असलेली जागा किन्वा जिथे तुमचे येणे जाणे झाले आहे होत असते अशा जागा हव्या आहे. सिन्हगड रोडवरती सन सिटी आहे म्हणतात. ती कशी आहे कुणी सान्गेल का.

In reply to by यशोधरा

मित्राला म्हणावे, शहर बदला नाहीतर स्वतःला बदला. >>> हा सल्ला सगळ्यात भारी होता.... पिलियन रायडर काकूं >> कॉलींग पिरा ;-)

In reply to by अभ्या..

नाखु 26/05/2016 - 15:51
त्ये त्यांच्या कुटुंबासकट पेईंग गेष्ट म्हणून ठेवणारे यजमान शोधणार आहेत तोवर थोडी कळ काढा. त्या बद्दलच्या (यजमानांनी पाळायच्या) अटी आणि शर्तींवरून शेवटचा हात फिरवायचे काम चालू आहे. "सल्ला आहे का उधारी , संपतच नाही" या लेखातून साभार :पुस्तक मिपा संपादीत :"मिपाची मानगुट आणि वेताळ" संदर्भी नाखु

In reply to by चिंटु

@ चिंटू पिलियन रायडर काकूंनी... "तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))

इरसाल 26/05/2016 - 13:19
या धाग्यावर चिंटुने पहिली ठिणगी टाकली आहे.....पिलीयन रायडर काकु म्हणुन.......भोआकफ ;)

चिंटु 26/05/2016 - 14:32
आहो मी काही पैशेवाला नाहीये. माझा मित्र त्याच्या मुलाची दर महिना जितकी फी भरतो तितका अजून इ एम आय पण भरु शकलो नाही आहे मी. आणि स्वतासाठी विचारायला आवडल असत मला. तुमचे इथले प्रतिसाद मी शुभेच्छा म्हणून स्वीकारतो की आज नसलो तरी उद्या पैशेवाला होइन म्हणून. आमचा जुना परिचय आहे; आणि विशेष कौटुन्बिक समन्ध आहे म्हणून त्याच्यासाठी विचारतो आहे. फार दिवसात भेट नसली तरी आमची दोस्ती चांगली आहे. आणि आता त्याचा इथे गावाशी टच राहिला नाही तर मदत करणे माझे काम आहे. त्याने पण आम्हला गरज असताना मदत केलेली आहे. इथे कोणी पण मधूनच प्रश्न करत राहतात. आणि प्रश्न पण सरळ अर्थाचे नसतात. किंवा "शहर बदला" वगैरे सल्ले देतात. मी ह्याआसाइटवरती नेहमी येत जात राहिलो असतो तरी असच केल असत का. मला कोणी काही विचारल आणि मला जमत असेल तर मी मदत करतो ; आणि करता येत नसेल तर निदान टवाळी करायला जात नाही. कोणता माणूस कोणत्या परिस्थितीत आहे आपल्याला माहित आसते का. आसे करणे मग बरोबर आहे का. आणि पिलियन रायडरजी मी तुम्हाला मुदाम नाही म्हणालो काकू वगैरे. आता लक्षात ठेवतो की काकू पेक्षा सगळ्यन्ना "जी" लावायचे. माफी करा. मला काही इथल्या लोकान्सारख छान छान लिहिता येत नाही. तर माझे दोस्त पण बनत नाहीत. पण मी ही साइट वाचतो. मला तुम्ही लोक चान्गले वाटले म्हणून अलो. मला वाटले की खुप सारे लोक आहेत तर ह्यान्ची मुले शाळेत जात असतील. ह्यान्च्याकडून काही सल्ला मिळेल. आदुबाळने तर किती चान्गली लिन्क दिली आहे. तर असे काही सान्गा ना.

In reply to by चिंटु

यशोधरा 26/05/2016 - 15:24
अहो दादा, तुमच्या मित्राला एकूणच सगळे आखुडशिंगी बहुदुधी हवे आहे असे दिसतेय, जे मिळणे तसे कठीणच आहे. आदुबाळ ह्यांनी दिलेली लिंक पाहिलीत का? सीबीएससी शाळांची लिंक पाहिलीत का? जे हवे आहे त्यासाठी तुम्ही/ तुमचा मित्र स्वतः काही हातपाय हलवताय का? पब्लिक फोरमवर सल्ला मागितल्यावर प्रश्न विचारले जाणार आणि सल्ले पण देणारच की. हे हनकोप,, ते ही नको मग नक्की हवेय तरी काय?

In reply to by चिंटु

"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र आहेत" हा मिपावरचा एक अलिखित नियम आहे. तेव्हा इतके संवेदनाशील (पक्षी : बोली मराठीतला 'टची') होऊ नका. मित्रामित्रांत थोडिशी थट्टामस्करी आणि थोडेशी पायओढी होणारच. ते तर जीवनातले मीठ आहे, नाही का ? किंबहुना, ही विनेदाची झालरच मिपाचे खास वेगळेपण आहे. तेव्हा... दुरावा सोडा आणि मदत आणि चेष्टामस्करी दोन्हीही मित्रत्वाच्या भावनेने मजेत स्विकारा... बघा किती मजा येईल ते !

Maharani 26/05/2016 - 15:26
Mazya maitrinichi mulagi victorius kids educare ya International shalet jate.Ti shala IB abhyaskram follow karat.Shala chan aahe asa ticha abhipray aahe. http://www.victoriouskidsseducares.org/ Hi link bagha.

नितीन पाठक 26/05/2016 - 16:18
नमस्कार, Lexicon International School वाघोली, हडपसर आणि कल्याणीनगर येथे आहे. कृपया सविस्तर माहिती साठी खालील लिंक पहावी. http://www.lexicon.edu.in/# धन्यवाद.........

मला तर असे वाटते की चिंटुचे मित्र कुणा सरदार घराण्याचे वारसदार असावेत ज्यांची बडदास्त ठेवण्याचे काम या बिचार्या चिंटू साहेबांवर आले असावे

झकास 26/05/2016 - 21:24
हे बघा : www.indusschoolpune.com. दोन मित्रांची मुले आहेत ह्या शाळेत. दोघेही खुश आहेत. पण फी वगैरे माहीत नाही.

शैलेन्द्र 26/05/2016 - 23:57
Sorry, I have to write in english due to some technical problem. Mi itakyatach punyat shift jhalo, mulaga ithe ICSE la asalyaane CBSC kinva ICSE board baghat hoto- majya baghanyat aalelyaa kahi changalya shala, tyavarache remark aani varshik Fee 1) Gurukul- E Square mage, changali shala pan admission milane kathin Fee 70 hajar 2) Vidya vally- Sus Gaon- Parat changali aani majori shala admissioncha bharavasa nahi, Fee 70 hajar 3)Ryan International- Bavdhan- OK shala, mala christian vatavaran nahi aavadal- Fee 70 hajar 4)Vibgyor- OK shala, Fee 2 lakh 5) S S Ravishankar- mi ithe admission ghetali- Bhugavla aahe, English madhyamatali marathi shala, Fee 50 K Baki itar anek aahet, thodya far farakane changalya vait..

In reply to by शैलेन्द्र

सस्नेह 27/05/2016 - 14:12
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 K ही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?

In reply to by सस्नेह

नाखु 27/05/2016 - 14:37
है देनेवाले है, इसलीये तो लेनेवाले है!! पी एम्टी बशीतला प्रवाशी नाखु

In reply to by नाखु

सस्नेह 27/05/2016 - 15:04
पी एम्टी बशीतला
अगदी कोंडुसकरच्या बशीची फीसुद्धा कमी आसल. माझा मुलगा सीबीएसई स्कूलला होता त्याची दहावीची फी ४५ ह. होती. यात युनिफॉर्म, पुस्तके वह्या, स्पोर्ट्स ड्रेस, जेवण आणि ट्रान्सपोर्ट हे सगळं अंतर्भूत होतं.

In reply to by सस्नेह

मोजून १० वर्षांपूर्वी मी इंजिनियरींगला वर्षाला मोजून १५००० भरायचो. सहा वर्षात (२ वाय्डी ;) ) / खरंतर आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही कसलाही क्लास/शिकवणी/ट्युशन नाही. माझा इंजिनियरींगचा एकूण खर्च २००१-२००७ एक लाखापेक्षा जास्त नसावा.

इरसाल 27/05/2016 - 10:52
परत (इथे तोंड वेंगा-डुन डोळे उर्ध्व अशी स्मायली)..... टाकलीस काडी..........!!!

चिंटु 13/06/2016 - 15:44
सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. अखेर पवार इन्टरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळाला आहे. शिवाय डोनेशन लाग॑ले नाही काहीही.तुम्ही सगळ्यान्नी दिलेल्या माहितीचा पण उपयोग झाला. चार नवी नावे समजली. निवडताना काय व कसा विचार करावा हेसुद्धा समजले.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:15
इतक्या फिया ऐकल्या की मुलीला साध्याशा मराठी येस्सेस्सी शाळेत घातल्याबद्दल समाधान वाटते. वेळ पडली तर उरलेल्या पैशात तिच्याचसाठी कितीतरी गोष्टी करू शकेन!

In reply to by यशोधरा

चिंटु 25/05/2016 - 18:06
हो. इंटरनॅशनल. कोपी पेस्ट केल इंटरनॅशनल शब्द. मला टायपिन्ग येत एकदम चान्गल पण वेळ लागतो. म्हणून लवकर लिहिले चौकशीचे जसे येइल तसे .

चिंटु 25/05/2016 - 18:15
अरे गम्मत नन्तर करा ना.पुरेशी माहिती मिळाल्यानन्तर गम्मत-ओन्ली धागा केला तरी चालेल. सध्या मदत करा ना जमत असेल तर.

In reply to by चिंटु

यशोधरा 25/05/2016 - 18:18
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा खरेच नाही ठाऊक. चांगल्या शाळा म्हणून हल्ली मुक्तांगण, प्रबोधिनी वगैरे हीच नावे ऐकली आहेत.

एस 25/05/2016 - 18:33
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट आहे आणि तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेल्या शैक्षणिक संकल्पना राबवल्या जातात. आंतरराष्ट्रीय शाळा नुसत्या नावाला असतात.

In reply to by एस

चिंटु 25/05/2016 - 18:45
पण मित्राने स्पेसिफिकली सान्गितले आहे इन्टरनॅशनल स्कूल हवे म्हणून. झेड पी शाळा उतम असू शकते हे मला पटते.आपल्या राज्यातच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शाळा आहेत. मी तर त्याला अक्षर नन्दन वगैरे सारख्या किंवा परयायी शाळा असतात ना थोड्या वेगळ्या त्यापण सुचवल्यात पण सध्या त्याने कॅटेगरी पक्की केली आहे सी बी एस इ शाळा जॉइन करायची म्हणून.तर त्याच्या ठरवलेल्या कॅटेगरी नुसार काही शोधता येत आहे का ते बघतो आहे. आपण त्याला कस म्हणणार पुन्हा की एकूणातच तुझी कॅटेगरी बदल म्हणून. त्याचीही काही कारणे असतील ना. तो स्वतः गावातल्या शाळेतून शिकलेला आहे लहान असताना. झेड पी भारी असू शकतेपण.

In reply to by यशोधरा

चिगो 26/05/2016 - 15:48
खर्‍या अर्थाने 'इंटरनॅशनल' असलेल्या शाळांमधे 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम नसतो.. 'आयबी'चा असतो. काही शाळा 'आयसीएसई;चा अभ्यासक्रम शिकवून स्वतःच्या नावामागे 'इंटरनॅशनल' लावतात. तेव्हा तुमच्या मित्राला नेमका सीबीएसई, आयसीएसई की आयबीचा अभ्यासक्रम हवाय, ते विचारा..

प्रचेतस 25/05/2016 - 19:00
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल स्कूल, हिंजवडी. आमच्या हापिसच्या समोरच आहे अगदी. मुले खेळताना दिसतात बरेचदा. दाबून फी आहे. वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील. अभ्यासक्रमही सीबीएसई नै तर फ़ुल्टू इंटरन्याशनल. तुमच्या मित्राला नक्की आवडेल बघा. एकदम नामांकित.

In reply to by प्रचेतस

म्हणजे १० वर्षांत किमान दीड कोटी रुपये झाले. मग तेच बँकेत ठेवले तर १० वर्षांनी घरबसल्या दरमहा १ लाख रुपये मिळतील... असो, देवाच्या, देहाच्या, मद्याच्या बाजारा नंतर शिक्षणाचा बाजारच म्हणा की हो....

In reply to by नाखु

ज्याला शिकायची (ज्ञान मिळवायची) इच्छा आहे, तो शिकतोच. असो, आडातच नसेल तर पोहर्‍यात येत नाही आणि बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना त्रासच जास्त होतो.

In reply to by प्रचेतस

शंतनु _०३१ 13/06/2016 - 18:22
शाळेची फी किती वर्षांची फी आहे ही
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील.
कैच्या काही

विंजिनेर 26/05/2016 - 00:27
इंटरनॅशनल शाळा = सीबीएसी हे समीकरण काही कळाले नाही बुवा. प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा जानेवारीत असते तेव्हा ते ध्यानात ठेवा - शाळेच्या वेबसाईटवर माहिती मिळेलच. बाकी, शाळा सिलेक्षन क्रायटेरीया ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 26/05/2016 - 12:32
ईट स्कुल म्हणजे विटा वापरुन बांधलेले स्कुल (कोबा किंवा शहाबादी फरशी), साधी स्कुल म्हन्जे मातीच्या भिंती असलेले स्कुल त्यात खाली शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसावे लागते( पावसाळ्यात गोणपाट टाकुन)

In reply to by इरसाल

स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by इरसाल

ईंटरन्याशनल स्कुल आणी बीगर ईंटरन्याशनल स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 27/05/2016 - 13:43
एक लिंक देत आहे त्यावर जवळपास सगळ्या शाळांमधला फरक काय आहे त्याचे फायदे तोटे यावर नीट भाष्य केलय. (लिंकमधला मजकुर इंग्रजीत आहे). http://blog.schoolfinder.co.in/2014/02/difference-between-cbse-icse-igcse-ib.html

सुचिकांत 26/05/2016 - 11:21
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल तर आयबी बोर्ड बघा. सीबीएसई कशाला? बाकी मराठी माध्यमात पण दाबून फी घेणाऱ्या शाळा आहेत, पण इंग्रजी शाळांची बरोबरी फीच्या बाबतीत नाही. कधी मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे जाणून घ्यायची इच्छा झाली तुमच्या मित्राला तर, majhishala.majhibhasha@gmail.com ला मेल पाठवायला सांगा. चर्चा करता येईल. - सुचिकांत ९०५२३४४४७६

माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस मध्ये गेला होता. आता आम्हीच शिफ्ट होत आहोत म्हणुन शाळा सोडली ती. पण शाळा बर्‍यापैकी आहे. तरीही चार गोष्टी सांगुन ठेवते. १. माझी अशी अपेक्षा होती की ICSE म्हणजे "घोका आणि ओका" न करता कन्सेप्ट समजावुन सांगण्यावर भर असेल. तसे काही नसते, सगळ्याच शाळा शेवटी सिलॅबस संपवायच्या मागे असतात. २. सिलॅबस जरी भारी असला तरी शिकवणारे हे सर्वसाधारण लोकच असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षक काय निकषांवर घेतले जातात हे ठाऊक नाही. पण सरकारी शाळांप्रमाणे ते खुप अनुभवी असत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. ३. जे लोक स्वतःच साधारण अभ्यासक्रम शिकले ते लोक आपल्या मुलाला काही तरी भन्नाट पद्धतीने शिकवतील हे शक्य नाही. तेव्हा शेवटी परत गाडी परीक्षेसाठी अभ्यास ह्याच रुळावर येते. ४. जवळपास सर्वच शाळांमध्ये अमुक एक ब्रॅण्डचेच खडू द्या, तमुक माणसाकडुनच गणवेष घ्या, आम्हीच वह्या-पुस्तके देणार, प्लास्टिक कव्हरच हवे असे असते. तिथुनच त्यांना पुष्कळ पैसा मिळतो. मला ह्या गोष्टीची मनस्वी चीड आहे. त्यामुळे मी परत येऊन अशा शाळेत मुलाला घालणार नाही. पण कुणाकुणाला त्यात फार मोठा इश्यु वाटत नाही. ट्री हाऊसचा टोटल खर्च आमच्या आवाक्यात होता. (नर्सरी/.केजी:- ट्युशन फीस - ३७०००/-, त्यात पुस्तके आणि शुज मिळाले, गणवेश्+बारिक सारिक स्टेशनरी - ५-७ हजार असेल, बस - ११ हजार ) ५. बस सेवा उत्तम दर्जाची आहे. आत कॅमेरे असल्याने मी ऑफिसातुन मुलाला पाहु शकत होते. ६. इतर उपक्रमही चांगले होतात. त्यातुन थोडे फार पैसे मागतात जसे की फोटो इ चे. पण ते किरकोळ आहेत. ७. पुढे जाउन स्पर्धा परीक्षा कंपल्सरी करतात म्हणे. मला ते आवडले नाही. ज्याला ज्याची आवड आहे ते करु द्यावे. ८. कँटिनची सोय आहे. त्यांनी ती सुद्धा कंपल्सरी करायचा प्रयत्न केला (प्रिस्कुलला). मी तरी जुमानलं नाही. "दमडीही भरणार नाही. मी माझ्या मुलाला डबाच देणार." असं सांगुन आले. ओके म्हणाले. ९. ओव्हरऑल फार चिकित्सक स्वभाव नसेल तर ही शाळा चांगली आहे. वेबसाईट्वर अभ्यासक्रमा विषयी माहिती मिळेल.

In reply to by पिलीयन रायडर

माझा भाचा गोखले नगरच्या साईडला जी परांजपे शाळा (भारती विद्याभवन) आहे, तिथे आहे. वहिनीचा अनुभव उत्तम आहे. पण ती शाळा एस.एस.सी बोर्ड आहे. एक शाखा शिवाजी पुतळ्यापाशी सुद्धा आहे. चौकशी करु शकता.

In reply to by के.के.

हो.. आणि तॉ आशियातली दुसर्‍या क्रमांकाची स्कुल चेन आहे असं ते १०० वेळा सांगतात. पण साध्या अ‍ॅडमिशन आणि फिस च्या पोलीसिज क्लिअर नाहित की कुठे डॉक्युमेन्टेड नाहीत. आधी संगीता रावजी होत्या मुख्यध्यापक तेव्हा चांगलं होतं जरा. आता ज्या आहेत त्यांच्यात फार निर्णयक्षमता नाही असे माझे मत आहे. मला माझ्या कामासाठी अखेर रावजींकडेच जावे लागले होते.

विवेकपटाईत 26/05/2016 - 11:54
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल शाळा आहेतच. शाळेत ac बस ac भरपूर पैसा घेणार्या. बाकी पैसा खर्च करायचा असेल तर देहरादून येथे बर्याच शाळा आहेत. आपल्या मुलाला शाळेंत घाला. काळा आंग्ल माणूस तैयार होऊन बाहेर पडेल. बाकी खरोखरच चांगले शिक्षण आणि स्वस्थ माणूस तैयार पाहिजे असेल तर पतंजलीचे हरिद्वारला आचार्यकुलं आहे. पण तिथे अडमिशन घेणे दुष्कर कार्य आहे.

चिंटु 26/05/2016 - 13:03
सगळ्यान्ना थेन्क्यू. ती हिंजवडीमधली प्रचेतस रावान्ची मर्सिडिज शाळा सप्त तारान्कित का काहीतरी म्हणता यावी अशी आहे. माझ्या मित्राला त्रितारान्कित पुरेशी आहे म्हणाला. त्यावरुन बजेटचा अन्दाज यावा. मिसळपाववरती चवकशी करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष कुणाचा कोणकोणत्या शाळेचा अनुभव कसा आहे हे समजून घ्यावयाचा आहे. म्हणजे साधारणतः पिलियन रायडर काकूंनी जसा नेमका फीडबॅक दिला तशा पद्धतीची माहिती, अनुभव ऐकण्यास आवडेल. इथे दिलेल्या वेबसाइट्स खरोखर कामाच्या आहेतच. त्याहीबद्दल थँक्यू. आणि अजून एक म्हणजे त्याला रेन्टवरती फ्लॅटही हवा आहे. त्यासाठी चान्गल्या सोसायटी तो शोधत आहे. त्याचे ओफिस कर्वेनगर कर्वे रोड वगैरे परिसरात असणार आहे म्हणाला. त्याचे प्राधान्य असे आहे -- १.सोसायटी गेटेड हवी. स्टेन्ड अलोन बिल्डिन्ग नको. २.लहान मोठ्या अ‍ॅमेनिटीज असलेल्या चान्गल्या. म्हणजे स्विमिन्ग पूल जिम्नेशियम वगैरे. २.पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास असावा असा आग्रह नाही. स्वतःची गाडी आहे. ३.फ्लॅटचा,सोसायटीचा प्लान चांगला हवा.हवेशीर , प्रशस्त,पुरेसा सूर्य प्रकाश असणारे हवे. ४.आसपास थोडी शांतता असलेले जास्त चांगले. गोंगाट नको. म्हणजे अगदिच रस्त्यावरचे नको. ५.ऑफिसपासून दहा पंधरा किलोमीटर पर्यंत अंतर असलेले चालेल म्हणाला. ६.पाण्याचा प्रोब्लेम नसायला हवा. फार मागे कोथ्रुड डेपो परिसरात होता म्हणतात किनारा होटेलच्या पलिकडच्या बाजूला.झालच तर खराडी विमाननगर परिसरात पण काही चान्गल्या सोसायटीत पण पाण्याचा प्रोब्लेम होता सुरुवातीला.तर तसे होयला नको आहे. त्याच्या अपेक्षा ऐकून डोळ्यासमोर वारजे नाक्याजवलच्या आदित्य गार्डन सिटीचेच नाव आले.तर अशा सोसायटी सुचवू शकाल का. कोथरुड कर्वेनगर पौड रोड वनाज ते वारजे नाका किन्वा अगदि एस बी रोड , मॉडेल कॉलोनी,आयडीयल कॉलोनी ह्या दरम्यानच्या पट्ट्यात त्याला मिळाल्यास उत्तम, असे मला वाटत आहे. पण तिकडे अशा सोसायटी आहेत का. माझे जे थोडेफार फिरणे झाले आहे त्याप्रमाणे अशा सोसायटी वाकड पिम्पळे सवदागर भागात जास्ती दिसल्या आहेत.पण वाकड पिम्पळे सवदागर शक्यतो नको आहे. बाणेर त्यातल्या त्यात चालेल. मॅजिक ब्रिक्स डोट कोम वगैरेवरती जाउन पाहणे होणारच आहे. पण इथे तुम्ही लोक स्वतःच्या अनुभवातून आणि पाहण्यातून सान्गू शकताल तर ते जास्ती कामाचे वाटते. तुम्ही स्वतः रहात असलेली जागा किन्वा जिथे तुमचे येणे जाणे झाले आहे होत असते अशा जागा हव्या आहे. सिन्हगड रोडवरती सन सिटी आहे म्हणतात. ती कशी आहे कुणी सान्गेल का.

In reply to by यशोधरा

मित्राला म्हणावे, शहर बदला नाहीतर स्वतःला बदला. >>> हा सल्ला सगळ्यात भारी होता.... पिलियन रायडर काकूं >> कॉलींग पिरा ;-)

In reply to by अभ्या..

नाखु 26/05/2016 - 15:51
त्ये त्यांच्या कुटुंबासकट पेईंग गेष्ट म्हणून ठेवणारे यजमान शोधणार आहेत तोवर थोडी कळ काढा. त्या बद्दलच्या (यजमानांनी पाळायच्या) अटी आणि शर्तींवरून शेवटचा हात फिरवायचे काम चालू आहे. "सल्ला आहे का उधारी , संपतच नाही" या लेखातून साभार :पुस्तक मिपा संपादीत :"मिपाची मानगुट आणि वेताळ" संदर्भी नाखु

In reply to by चिंटु

@ चिंटू पिलियन रायडर काकूंनी... "तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))

इरसाल 26/05/2016 - 13:19
या धाग्यावर चिंटुने पहिली ठिणगी टाकली आहे.....पिलीयन रायडर काकु म्हणुन.......भोआकफ ;)

चिंटु 26/05/2016 - 14:32
आहो मी काही पैशेवाला नाहीये. माझा मित्र त्याच्या मुलाची दर महिना जितकी फी भरतो तितका अजून इ एम आय पण भरु शकलो नाही आहे मी. आणि स्वतासाठी विचारायला आवडल असत मला. तुमचे इथले प्रतिसाद मी शुभेच्छा म्हणून स्वीकारतो की आज नसलो तरी उद्या पैशेवाला होइन म्हणून. आमचा जुना परिचय आहे; आणि विशेष कौटुन्बिक समन्ध आहे म्हणून त्याच्यासाठी विचारतो आहे. फार दिवसात भेट नसली तरी आमची दोस्ती चांगली आहे. आणि आता त्याचा इथे गावाशी टच राहिला नाही तर मदत करणे माझे काम आहे. त्याने पण आम्हला गरज असताना मदत केलेली आहे. इथे कोणी पण मधूनच प्रश्न करत राहतात. आणि प्रश्न पण सरळ अर्थाचे नसतात. किंवा "शहर बदला" वगैरे सल्ले देतात. मी ह्याआसाइटवरती नेहमी येत जात राहिलो असतो तरी असच केल असत का. मला कोणी काही विचारल आणि मला जमत असेल तर मी मदत करतो ; आणि करता येत नसेल तर निदान टवाळी करायला जात नाही. कोणता माणूस कोणत्या परिस्थितीत आहे आपल्याला माहित आसते का. आसे करणे मग बरोबर आहे का. आणि पिलियन रायडरजी मी तुम्हाला मुदाम नाही म्हणालो काकू वगैरे. आता लक्षात ठेवतो की काकू पेक्षा सगळ्यन्ना "जी" लावायचे. माफी करा. मला काही इथल्या लोकान्सारख छान छान लिहिता येत नाही. तर माझे दोस्त पण बनत नाहीत. पण मी ही साइट वाचतो. मला तुम्ही लोक चान्गले वाटले म्हणून अलो. मला वाटले की खुप सारे लोक आहेत तर ह्यान्ची मुले शाळेत जात असतील. ह्यान्च्याकडून काही सल्ला मिळेल. आदुबाळने तर किती चान्गली लिन्क दिली आहे. तर असे काही सान्गा ना.

In reply to by चिंटु

यशोधरा 26/05/2016 - 15:24
अहो दादा, तुमच्या मित्राला एकूणच सगळे आखुडशिंगी बहुदुधी हवे आहे असे दिसतेय, जे मिळणे तसे कठीणच आहे. आदुबाळ ह्यांनी दिलेली लिंक पाहिलीत का? सीबीएससी शाळांची लिंक पाहिलीत का? जे हवे आहे त्यासाठी तुम्ही/ तुमचा मित्र स्वतः काही हातपाय हलवताय का? पब्लिक फोरमवर सल्ला मागितल्यावर प्रश्न विचारले जाणार आणि सल्ले पण देणारच की. हे हनकोप,, ते ही नको मग नक्की हवेय तरी काय?

In reply to by चिंटु

"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र आहेत" हा मिपावरचा एक अलिखित नियम आहे. तेव्हा इतके संवेदनाशील (पक्षी : बोली मराठीतला 'टची') होऊ नका. मित्रामित्रांत थोडिशी थट्टामस्करी आणि थोडेशी पायओढी होणारच. ते तर जीवनातले मीठ आहे, नाही का ? किंबहुना, ही विनेदाची झालरच मिपाचे खास वेगळेपण आहे. तेव्हा... दुरावा सोडा आणि मदत आणि चेष्टामस्करी दोन्हीही मित्रत्वाच्या भावनेने मजेत स्विकारा... बघा किती मजा येईल ते !

Maharani 26/05/2016 - 15:26
Mazya maitrinichi mulagi victorius kids educare ya International shalet jate.Ti shala IB abhyaskram follow karat.Shala chan aahe asa ticha abhipray aahe. http://www.victoriouskidsseducares.org/ Hi link bagha.

नितीन पाठक 26/05/2016 - 16:18
नमस्कार, Lexicon International School वाघोली, हडपसर आणि कल्याणीनगर येथे आहे. कृपया सविस्तर माहिती साठी खालील लिंक पहावी. http://www.lexicon.edu.in/# धन्यवाद.........

मला तर असे वाटते की चिंटुचे मित्र कुणा सरदार घराण्याचे वारसदार असावेत ज्यांची बडदास्त ठेवण्याचे काम या बिचार्या चिंटू साहेबांवर आले असावे

झकास 26/05/2016 - 21:24
हे बघा : www.indusschoolpune.com. दोन मित्रांची मुले आहेत ह्या शाळेत. दोघेही खुश आहेत. पण फी वगैरे माहीत नाही.

शैलेन्द्र 26/05/2016 - 23:57
Sorry, I have to write in english due to some technical problem. Mi itakyatach punyat shift jhalo, mulaga ithe ICSE la asalyaane CBSC kinva ICSE board baghat hoto- majya baghanyat aalelyaa kahi changalya shala, tyavarache remark aani varshik Fee 1) Gurukul- E Square mage, changali shala pan admission milane kathin Fee 70 hajar 2) Vidya vally- Sus Gaon- Parat changali aani majori shala admissioncha bharavasa nahi, Fee 70 hajar 3)Ryan International- Bavdhan- OK shala, mala christian vatavaran nahi aavadal- Fee 70 hajar 4)Vibgyor- OK shala, Fee 2 lakh 5) S S Ravishankar- mi ithe admission ghetali- Bhugavla aahe, English madhyamatali marathi shala, Fee 50 K Baki itar anek aahet, thodya far farakane changalya vait..

In reply to by शैलेन्द्र

सस्नेह 27/05/2016 - 14:12
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 K ही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?

In reply to by सस्नेह

नाखु 27/05/2016 - 14:37
है देनेवाले है, इसलीये तो लेनेवाले है!! पी एम्टी बशीतला प्रवाशी नाखु

In reply to by नाखु

सस्नेह 27/05/2016 - 15:04
पी एम्टी बशीतला
अगदी कोंडुसकरच्या बशीची फीसुद्धा कमी आसल. माझा मुलगा सीबीएसई स्कूलला होता त्याची दहावीची फी ४५ ह. होती. यात युनिफॉर्म, पुस्तके वह्या, स्पोर्ट्स ड्रेस, जेवण आणि ट्रान्सपोर्ट हे सगळं अंतर्भूत होतं.

In reply to by सस्नेह

मोजून १० वर्षांपूर्वी मी इंजिनियरींगला वर्षाला मोजून १५००० भरायचो. सहा वर्षात (२ वाय्डी ;) ) / खरंतर आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही कसलाही क्लास/शिकवणी/ट्युशन नाही. माझा इंजिनियरींगचा एकूण खर्च २००१-२००७ एक लाखापेक्षा जास्त नसावा.

इरसाल 27/05/2016 - 10:52
परत (इथे तोंड वेंगा-डुन डोळे उर्ध्व अशी स्मायली)..... टाकलीस काडी..........!!!

चिंटु 13/06/2016 - 15:44
सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. अखेर पवार इन्टरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळाला आहे. शिवाय डोनेशन लाग॑ले नाही काहीही.तुम्ही सगळ्यान्नी दिलेल्या माहितीचा पण उपयोग झाला. चार नवी नावे समजली. निवडताना काय व कसा विचार करावा हेसुद्धा समजले.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:15
इतक्या फिया ऐकल्या की मुलीला साध्याशा मराठी येस्सेस्सी शाळेत घातल्याबद्दल समाधान वाटते. वेळ पडली तर उरलेल्या पैशात तिच्याचसाठी कितीतरी गोष्टी करू शकेन!
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत.