Skip to main content

आले अंबानीच्या मना

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 30/07/2025 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता. नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही. नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे. आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे. नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0 या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA

वाचने 26038
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

तरी त्यांना सुचवले होते की तुम्ही "हा हत्ती हत्तीईदला कुरबानी द्यायला पाळला आहे" असे म्हणा. कुर्बानी विरुद्ध बोलण्याच्या ना PETA मध्ये दम आहे, ना दाभोळकरमध्ये, ना अंबानी मध्ये, ना हायकोर्ट मध्ये, ना सर्वोच्च कोर्ट मध्ये. इतकी सोपी तकिया करून ते लोकं स्वतःचा हत्ती स्वतःकडे ठेऊ शकले असते ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यापेक्षा हत्तीला नाम घ्यायला लावायला पाहिजे. किंवा सर्व गावकऱ्यांनी एकेक लाख नामाची कॉन्ट्री काढली असती तरी गेलाबाजार काही अब्जात नाम कलेक्ट होऊन हत्तीला पाहिजे तिथं राहता आलं असत. कुठली कुर्बाणी आणि कुठला अंबानी . बिटकॉइनच्या तोंडांत मारल असलं चलन आहे नाम.

In reply to by अभ्या..

तुम्ही सुचवलेला उपाय एकदम 'नामी, आहे. पण नांदणीच्या गावकर्‍यांना प्रिपेड पर्याय आता नाही. पोस्टपेड चालेल का?

In reply to by अभ्या..

नाही. नामाचा सरकारी कामात इत्यादी उपयोग होत नाही. आमच्या देवस्थानात मोर पाळलेले होते. तेही फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नेले होते. नामाचा उपयोग ते मोर नेल्यानंतर " ही देखील रामाचीच इच्छा" हे कळण्यासाठी होतो. तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. ओके, तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ? सुरुवात कुणी केली?

In reply to by अभ्या..

ही बरं झालं. स्पष्ट बोलण्याचा फार फायदा होतो बघा असा ! बाकी रामाची इच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पंत, एरव्ही अध्यात्म, नाम, अभंग इ. विषय असेल तर लोकांचा बुध्दीभ्रम तुंम्हाला सहज जमतो. त्याबाबत वादच नाही. पण इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. ताबडतोब दाखवून दिले जाईल. हां, आता प्रत्यक्ष महानेते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांचेच नांव यात आले त्यामुळे तुमची घालमेल समजू शकतो, पण त्याबद्दल 'एबीपी माझा'ला मोठ्या मनाने माफ करून टाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by स्वधर्म

अहो काय बरळताय ? कसला आलाय द्वेष अन् काय ! आम्ही स्वतः अगदी चवीने बोकड , बोल्हाई मटण खातो. तेही आमच्या मुस्लिम मित्रांच्या सोबत जाऊन ! PETA किंवा तुमच्या सारखे दुतोंडी लोकं इन जनरल जो मांसाहार चालतो त्या बाबत कधीही काहीही बोलल्याचे पुरावे नाहीत. तुमच्यात स्पष्ट बोलण्याची धमक नाही , किमान हमीद मियां तरी सुस्पष्ट बोलले आहेत हे पहा बी

In reply to by स्वधर्म

हिंदू कधीही दुसर्‍या धर्माच्या लोकांचा द्वेष करत नाही. त्यामुळे देशात दुसर्‍या धर्माच्या लोकांची संख्या वाढली. द्वेष असता तर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू कमी झाले तसे आपल्या देशात झाले असते. बाकी जे त्यांच्या परमेश्वराला मानत नाही त्यांच्या विरोधात सतत जेहाद केले पाहिजे. यावर ते 100 टक्के ठाम असतात.

खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. इकडे तो मठालाही सांभाळायचा खर्च वाढत असेल. गावकऱ्यांचा विरोध झाल्यावर दुसऱ्या मालकाने इतर उपाय कामाला लावले. कोल्हापुरातले दुसरे असे एक उदाहरण म्हणजे मंगेशकर (लता) यांच्या मालकीचा स्टुडिओ विकून तिथे काही मॉल वगैरे येणार होता. कोल्हापुरातल्या लोकांनी अडसर घातला. तो हेरिटेज/ वारसा आहे इत्यादी. दोन्ही बाबतीत वस्तू तीनशे वर्षांपूर्वींच्या नाहीत. मुद्दा असा आहे की मालक आपल्या मालमत्तेचे काहीही करू शकतो कायद्याने, त्यात इतरांनी भावनावश होऊन अडथळा आणणे बरोबर आहे का?

इथे दुसरा मालक अंबानी कुटुंबीय आहे. त्यांचे आणि केंद्रातील वरीष्ठांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेतली की आपण भक्त ठरू शकतो याची कल्पना आहे. अंबानींच्या टेलीकंपनी जियोचे कार्ड सर्विस वापरणारे किंवा न वापरणारे भक्त/ विरोधक ठरतील का?

आपला फोन नंबर एका सर्विस प्रवाइडरकडून दुसऱ्याकडे नेणे म्हणजे 'नंबर पोर्ट'. आपण बरेच जण ' pre paid' plan घेतो. Post paid/ बिलींग प्लान घेत नाही. यात धोका असतो. आपण फोन कॉल्स करतो, डेटा इंटरनेट वापरत राहतो आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल येऊ शकते. Pre paid प्रकारात तसे होत नाही. अमर्याद इंटरनेट वापरले जात नाही. डेटा लिमीट संपल्यावर बंद पडते. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की वोडाफोन किंवा बीएसएनेल चा नंबर जियोकडे बदलल्यास pre paid नंबर मिळतो. तसं एरटेलचं नाही. एरटेलला पोर्टिंग करायचं झाल्यास चार ते सहा महिने post paid प्लान घ्यावा लागतो. तो महागडा आहे. शिवाय सहा महिन्यांनी pre paid करायला गेल्यास ते त्रास देतात.

कोर्टाने काय म्हंटले आहे? फक्त अंबानी अंबानी म्हणून रागाने नाचण्यात अर्थ नाही. But the high court cited a June 2024 report about the elephant's health, diet and nutrition, social environment, hygiene and cleanliness of shelter, veterinary care and work schedule, and said they "appear to be absolutely dismal". citing an elephant's right to quality life must take precedence over humans' right to use it for religious purposes. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/elephant-relocated-to…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

या देशात कशावरही विश्वास नाही, कोर्ट कमिटि नेमते आणि त्या अहवालावर निर्णय देते . ती कमिटी मॅनेज झाली कि जमले

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मानवाच्या धार्मिक अधिकार व इच्छांपेक्षा प्राण्याचा सुरक्षित जीवनाचा अधिकार अधिक महत्वाचा आहेच. केवळ धार्मिक आहेत, किंवा गावकर्‍यांना हत्तीण हवीशी वाटते, त्यांना तिचा लळा आहे, म्हणून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. तरीही अंबानीच्या वनतारातच हत्तीणीचे चांगले संवर्धन होईल असे मानणे, म्हणजे जरा जास्तच होतंय. तुमच्या दुव्यात म्हटले आहे: The relocation took place after the Supreme Court dismissed a petition filed by the mutt, challenging the Bombay High Court order upholding the decision of a High Powered Committee to relocate the animal to the Gujarat facility. या हाय पॉवर कमिटीत कोण कोण होते? त्यांच्याविषयी कुठेच माहिती मला तरी मिळाली नाही. त्यांचे काही हितसंबंध होते का? बरं एकदा राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने, डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत प्रमाणपत्र दिलेले होते. या हाय पॉवर कमिटीने वनतारा अधिकार्‍यांची भेट, मठाने ऑफर नाकारणे वगैरे झाल्यावर नवीन अहवाल दिलाय. हे सगळं तितकं निष्पाप सरळ दिसतंय का तुंम्हाला? राजू शेट्टी यांनी जामनगरलाच का? हा मुद्दा मांडला आहे. एक तर केरळ मध्ये हत्तींचे उत्तम संगोपन करण्याची परंपरा व क्षमता आहे. तसेच जामनगरला तापमान ४५ अंशापर्यंत जाते. हे असे असताना, 'गुजरात महाराष्ट्राला जवळ असल्याने' तिला जामनगरला हलवायचा आदेश दिला. हा न्यायालयाचा तर्क तुंम्हाला कसा वाटतो?

अंबानीने अशाप्रकारे एकल असणाऱ्या सर्व हत्तींना वनतारात घेऊन जावं.हत्तींचा कळप बनवावे.इतक्या पैशांचा कधी उपयोग होणार,तो वापर करावा.गावकऱ्यांना आनंद व्हायला पाहिजे.हत्तीला निसर्गात राहण्याची संधी आता यापुढे मिळणार,बास झाली की गावची सेवा.

अंबानीला एवढा पुळका असेल तर त्यांनी भटकी कुत्री वनतारामध्ये नेउन पाळावीत

In reply to by कपिलमुनी

फक्त अंबानी नाही, अंबानी + PETA + हाय कोर्ट + सुप्रीम कोर्ट हे सगळेच समान दोषी आहेत. नीच लोकं. जो समाज जाहीरपणे मुक्या जनावरांची हिंसा करतो त्याला पाठीशी घालतात, अन् जो टोकाचा अहिंसक समाज मुक्या जनावराला देवासारखे प्रेमाने वागवत आहे त्याच्याकडून तो प्राणी हिसकावून घेतात. असला हा नीच समाज. ही ह्या नीच लोकांची धर्मनिरपेक्षता आणि ही ह्याचे सेक्युलॅरिझम. जे लोकं एकट्या अंबानीचे नाव घेऊन टार्गेट करत आहेत ते स्वतःचे पूर्वग्रह बायस दाखवून देत आहेत बस.

मी माझा पाळीव घोडा किवा गाय किवा तत्सम प्राणी विकायचे नाही किवा उलट ठरवले तर पेटा हरकत घेउ शकते? किवा गेलाबाजार एखाद्या शेजार्‍याने आकसाने पेटाकडे तक्रार केली की मी माझ्या कुत्र्याचा छळ करतो तर पेटा कारवाई करु शकते?

भरपूर हसलो लेख वाचून ... वनतारा मध्ये २०० हत्ती आहेत ... तरी अंबानी आपले सर्व उद्योग सोडून जयसिंगपूर मधल्या हत्तीच्या मागे लागला ... भारी लॉजिक आहे

In reply to by अमर विश्वास

त्यांच्याकडे पॉलिमर, फोन नेटवर्क, पेट्रोकेमिकल, देशातील बहुसंख्य माध्यमे, आणि काय काय एवढे उद्योग आहेत. तरी पण किराणा दुकानं काढली... खूपच हसण्यासारखे आहे हे.

In reply to by स्वधर्म

अजून भारी लॉजिक ... किराणा दुकान ... रिटेल हा उत्तम व्यवसाय आहे ... पण जाऊदे ... असेच मस्त विनोदी लेख लिहीत राहा

In reply to by कर्नलतपस्वी

तुमचा काय आकस आहे, कल्पना नाही. पण हे सगळे खोटे वाटत असेल, तर हे घ्या दुसऱ्या माध्यमांतील दुवे सकाळने या घटनेचे सखोल वृत्तांकन केले आहे: https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mahadevi-elephant-f… टी व्ही ९ मराठी https://www.tv9marathi.com/trending/will-mahadevi-the-elephant-return-t…

In reply to by स्वधर्म

नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. अमेरीकेत एक प्राणीसंग्रहालया बघीतले. सरकारने बरेच खुले,मोकळे ढाकळे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलायं पण खाणे पिणे आणी सतत माणसांचा संपर्क टाळता आला नाही. त्यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक स्वभाव बदलले असल्यास नवल नाही. जनुकीय बदल घडतो का यावरही कदाचित संशोधन झाले असावे. माणसाला जर जंगलात डांबून ठेवले तर कसे वाटेल? माझे मत कुणालाच पटणार नाही. जाऊ द्यात. मराठी माध्यमांतून निष्पक्ष पत्रकारिता होत नाही असे माझे मत आहे आणी लोकशाहीत मतस्वातंत्र्य आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलमानुसार मी मत व्यक्त करत आहे. नाही पटलं तर सोडून द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

>> नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. हत्तींसाठी निसर्गातील रहिवासच सर्वोत्तम, हे मत मला पटते. हत्तीणीची मठात काळजी घेतली जात असेल पण तरीही ते हत्तीसाठी नैसर्गिक नाहीच. जामनगरला तापमान ४० च्या वर जाते. धागा काढण्याचे कारण हे की सगळी चक्रे हलून, जुने रिपोर्ट असताना हाय पॉवर कमिटी नेमून, ना ना प्रकार करून नेमके तिला कुणाकडे पाठवण्यात आले, ते तितके सरळ दिसले नाही.

In reply to by स्वधर्म

आयुष्यभर मानवी सहवासात राहिलेले प्राणी नैसर्गिक सहवासात जगू शकत नाही. त्यांची स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याची क्षमता संपलेली असते.

दुसरी बाजू कळायला मार्ग नाही. म्हणजे खरंच पेटा वाल्याना हत्तीणीची दया आली म्हणून हे सर्व झालं हे माहिती नाही. पण अशी कोर्टाच्या निगराणीत हाय पॉवर कमिटी नेमून तपासणी केली तर पाळीव प्राणीच कांय खुद्द माणसांना पण असंच कुठं तरी सोडावं लागेल. धाग्यात लिहिल्या प्रमाणे वनतारा चे अधिकारी आधी पाहणी करून गेले नंतर त्यांनी मठाला ऑफरही दिली. ऑफर नाकारल्यावर परत पेटा वाले येऊन कोर्टात गेल्यावर हत्तीण वनतारातच जात असेल तर नक्कीच काळबोर आहे असं वाटतंय. आणि हत्तीण जर वनतारात जात असेल तर राज्य सरकार कडून मदतीची अपेक्षा ठेवणाही चुकीचं होत.

एका शेतकर्‍याने 10 किलो वजनी लाल भोपळा राजाला अर्पण केला. त्याच वेळी एका श्रेष्ठी ने एक हत्ती राजाला नजराणा म्हणून दिला. राजाने हत्तीच्या बदल्यात भोपळा श्रेष्ठीला दिला. राजा शेतकर्‍याला श्रेष्ठी ने दिलेला हत्ती देऊ लागला. तर शेतकरी म्हणाला, मला हत्ती नको. मला माझा भोपळाच परत द्या. हत्ती पाळण्याचा खर्च शेतकरी उचलू शकत नव्हता. अंबानीला हत्ती पाळण्याचा खर्च उचलू द्या. बाकी पेटा ही हिंदू विरोधी संस्था आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.

ह्या हत्तीणीला अझीम प्रेमजी किंवा आनंद महिंद्र ह्यांनी आपल्या घरी नेले असते तर हा धागाच निघाला नसता असा ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! K "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.

In reply to by प्रसाद गोडबोले

या विशिष्ट प्रकरणात मालकांच्या मालकांवरून रोख हटवण्यासाठी विशिष्ट धर्माच्या द्वेषाची मात्रा चालत नसल्याने आता दुसर्‍यांना सेक्युलर म्हणून जुन्या घटना काढल्यावर तरी चालतंय का, याची चाचपणी सुरू आहे का? एवढ्यावर थांबू नका, नेहरू + हत्ती असं काही मिळतंय का बघा. बाकी सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला होता त्यात सेक्युलर व धर्मांध असा भेद करणे तुंम्हालाच जमते.

In reply to by स्वधर्म

कसला रोख हटवणे अन् कसलं काय ! आम्ही तुमच्या एकांगी सिक्युलारिझम आणि भूतदया वगैरे चा बुरखा फाडत आहोत बस. ह्या प्रकरणात अंबानी चे नाव नसते तर तुम्ही चकार शब्द काढला नसता . तुम्हाला हत्तीशी अन् जैन धर्मियांच्या भावनांशी काहीही घेणे देणे नाहीये. पर्युषण पर्वात हिंसा करू नका असे जैन धर्मीय म्हणतात तेव्हा त्याला विरोध करायला तुमच्या सारखी च माणसे आघाडीवर असतात. आणि नेहरू + हत्ती काय शोधायचं ! नेहरू अन् त्यांच्या बाष्कळ धोरणांमुळे 1965 च्या युद्धात चारीमुंड्या चित हार अन् झालेली मनुष्यहानी सर्वांना माहीत आहे . आणि तरीही अजून एका - नेहरूने 1949 मध्ये इंदिरा नावाची हत्तीण जपान मधील एका zoo ला गिफ्ट केली होती ! तेव्हा "आले नेहरूंच्या मना" असा लेख लिहा आता. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे घ्या तुमच्या लाडक्या NDTV ची लिंक आहे ! https://www.ndtv.com/offbeat/jawaharlal-nehru-death-anniversary-when-pa… Ele आता खरेच जर तुम्ही " आले नेहरूंच्या मना" असा नेहरूंवर टीका करणारा लेख लिहिलात तर मानलं की तुमचं सिक्युलरिझम खरं ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो, नेहरूंनी हत्ती 'दिलाय' **** यांच्यासारखा 'काढून' घेतला नाहीये. कशाला वाढवताय?

In reply to by स्वधर्म

दिलाय म्हणजे काय ? नेहरूंनी जन्माला घातला होता का हत्ती ? कोठून तरी काढूनच दिला ना !

In reply to by स्वधर्म

कशाला वाढवताय?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्या लेखणीतून एक तरी खऱ्या अर्थाने सेक्युलर वाक्य लिहिले जाते काय ते ! उदाहरणार्थ, माझं उपहासमुक्त, सरळ स्पष्ट मत मांडून मी थांबतो : PETA चे लोकं हरामखोर आहे. जैन सारख्या अत्यंत अहिंसक धर्माच्या लोकांकडून श्रद्धेने पूजिला जाणारा हत्ती काढून घेण्याचे कारस्थान पाताळयंत्री आहे. त्याला बळ देणारे अंबानी अन् त्यांची कमिटी की काय हेही त्या पापात तितकेच भागीदार आहेत . मुळात धर्माच्या प्रश्नात सरकार ने ढवळाढवळ करणे अक्षम्य चूक आहे. इथे हाय कोर्ट चुकले अन् सुप्रीम कोर्ट ही चुकले. तेही ह्या पापाचे भागीदार आहेत. आणि सर्वात शेवटी एन सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे लोकोत्तर बहुमताने निवडून आलेले नेते म्हणून आदरणीय मोदी आणि सन्माननीय महामहीम राष्ट्रपती ह्यांच्या डोळ्यादेखत हा अन्याय झाला असल्याने तेही ह्या पापात भागीदार ठरतात. आता जैन धर्मात ढवळाढवळ करून दाखवली तितकीच अन्य धर्मात ढवळाढवळ करून त्यांनी मुक्या जनावरांचा जीव वाचवून दाखवावा . आमचे लोकमान्य टिळक म्हणाले होते तसे म्हणून मी माझे 4 शब्द संपवतो - ह्या न्यायासनाच्या वर एक उच्च न्यायासन आहे, तिथे ईश्वर साक्ष आहे . तिथे नक्की न्याय होईल, सदर पापातील सर्वांभागीदारांना एकुणएक हिशेब चुकता करायला लागेल ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे ! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

तुंम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळेच या प्रकरणात चुकले आहेत हेच मत, 'हे सगळं सरळपणे घडलं नाहीये' या स्वरुपात या धाग्यात मांडले होते. माझा तुमच्या या आणि आधीच्या प्रतिसादांबद्दल हाच मुद्दा आहे की तुंम्ही या प्रकरणाला इतर असंबध्द विषय चिकटवत आहात. या धाग्यात सेक्युलर वाक्य लिहीले का नाही याचा मूळ मुद्द्याशी कसलाही संबंध नाही. सेक्युलरिझम हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर वेगळा धागा काढावा, ही विनंती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रेमजी, महिंद्रा सोडा, हत्तीण तुंम्ही घरी नेली असती तरी धागा निघाला नसता. फक्त ज्या पध्दतीने घटना घडत किंवा घडवून आणल्या गेल्या, त्यामुळे कोणालाही यात सगळं कसं साधं सरळ घडत गेलं असं वाटणार नाही.

In reply to by कपिलमुनी

अरे वाह ! तुम्ही pattern detection करायला लागला आहात हे पाहून आनंद झाला. :) इतरही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जानारे pattern लवकरच तुमच्या लक्षात येतील अशी आशा आहे.

In reply to by कपिलमुनी

एखादी कमिटी नेमून तिच्या कडून फक्त हवा तसा अहवाल आणला की झाले. यात आपले राज्य आणि केंद्र सरकार एकदम निष्णात आहे.

बंधयुक्त मालकी हक्कातून नैसर्गिक अधिवासातल्या मालकी हक्काकडील हे बळजबरीचे हस्तांतरण आहे, गडचिरोलीचे हत्ती गुजराथला नेले तसे. मग त्यातल्या त्यात पैसा घालून अंबानींनी किमान केरळमध्ये आपले केंद्र उघडावे म्हणजे किमान हत्तीला तरी बरे वाटेल. नाही तरी वनतारात प्राणी आनंदाने रहावेत अशीच अंबानींची इच्छा असणार. तर त्या त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवावे हे योग्य. म्हणजे हत्ती केरळात, पेंग्विन अंटार्क्टिकावर आणि सिंह गीरमध्ये याप्रमाणे. प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य असा बदल व्हायला हवा. आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, पक्षीविक्रीची दुकाने हे प्रकार पूर्णपणे आणि स्वयंस्फूर्तीने बंद व्हायला हवेत.

In reply to by रामचंद्र

प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य इथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अ‍ॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.

आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सदर मठ त्या हत्तिणीला मोहरम मधील उरूस साठी भाड्याने देत असे . बेकार हसतोय =))))) Joke सेक्युलॅरिझम च्या मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट मौन पालुयात=)))) अर्थस्य पुरुषो दास:

In reply to by प्रसाद गोडबोले

मुळात पाळीव नसलेले जंगली प्राणी पाळणे हेच प्राण्यांवर अन्यायकारक आहे. मग ते नांदणी मठ असो वा इस्कॉन वा वनतारा. प्राणी भाड्याने देणारे व घेणारे दोघेही दोषीच आहेत. एकदा प्राणी पाळला, की त्याला नियंत्रणात ठेवणं आलं, मग माहूत आला व अंकुशही आलाच. त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)

In reply to by स्वधर्म

त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-) त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.

In reply to by अभ्या..

अभ्या, तुंम्ही अत्यंत रोचक माहिती बाहेर काढली आहे. दुवा द्याल तर फारच सोईचे होईल. मिरवणुकीत हत्ती भाड्याने देणे यात बराच पैशाचा व्यवहारही आहेच. विषय डायव्हर्ट करणे हे अफलातून कौशल्य असले आणि बहुतांश लोकांच्या लक्षात येत नसले, तरी त्याचा न्याय व नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by स्वधर्म

पेटाच्याच साईटवर आहे. माधुरी स्टोरी केलीय त्यांनी. अगदी स्क्रीन शॉट्स आहेत. एकाखाली एक अशा दोन इमेजेस आहेत. वरची इमेज गणेशोत्सवांच्या भाड्यांची लिस्ट, खालची एक इमेज मोहरम मिरवणुकीची. अगदी धर्मच काढायचा तर मठ जैन आहे, गिर्‍हाईके हिंदू बहुसंख्य आहेत, एक मुस्लीम आहे. सेक्युलॅरिझम अजून काय वेगळा असतो. सिलेक्टेड हवी तीच इमेज टाकण्यातला हेतू नीच असतो. माहीती आहे तर सगळीच द्यावी. . पहा... सगळेच कळेल.

In reply to by अभ्या..

तेलंगणा सांगलीचा हती एव्ढ्या लांब मिरवणुकीला ? इकडे हत्ति नाहीत?

In reply to by स्वधर्म

माझ्या वरील प्रतिसादात माहुताच्या धर्माचा काडीमात्र उल्लेख नाही. आणि तुम्हाला कळत नसलं तरी माझ्यालेखी हत्तीची देव स्वरूपात पूजा करणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमाला हत्ती पाठवणे आणि मुक्या जनावराला देवाच्यानावाने बळी देणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमात पाठवणे ह्यात जमीन आसमान च फरक आहे. आणि तसाच फरक नांदणी मठ , इस्कॉन आणि वनातारा ह्यातही आहे. तुम्हाला फक्त त्या वणतारा त अंबानी अन् पर्यायाने मोदी दिसत असल्याने हत्तीचे स्थलांतर सहन झाले नाहीये इतकेच सत्य आहे ! आणि बरं झालं की तुम्हीच अंकुशाचा उल्लेख केलात. त्यावरून हेच सिद्ध होते की हत्तीला त्रास दिला जात होता आणि म्हणूनच हत्तीचे स्थलांतर करणे हाच निर्णय योग्य होता , आहे ! तुम्हाला वनतारा आवडत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र टूतारा वन्यजीव रेस्सुक्यू सेंटर सुरू करा आणि आणि घेऊन जा हत्तीला. फडणवीसांनी असे वन्यजीव रेस्सुक्यू अभियान सुरू केले तर त्यातही तुम्ही खोटंच काढणार आहात !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ते अभ्या यांनी बाकीच्या १४ वेळा ज्या धर्मांच्या मिरवणूकीत पाठवल्याची माहिती दिली आहे. तर जाता जाता तुमचं त्याबाबतही मत देऊनच टाका. का एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे? बाकी ते मोहरमचा उल्लेख करणं, नेमका माहूताचा व अंकुशाचा फोटो त्यासोबत डकवणं परंतु यात विशिष्ट धर्माचा 'काडीमात्र' उल्लेख नाही आणि त्यावर रोख नाही असं म्हणणं यामुळे मला ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण आठवली. पण ते असो.

In reply to by स्वधर्म

एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे?
होय. मी तर स्पष्टच लिहिले आहे की माझ्या प्रतीसादात . माहूत एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी काहीही विरोध नाही. पण हेच लोकं देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात ही त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा लोकांना अहिंसा परमो धर्म: मानणाऱ्या जैन धर्मियांनी हत्ती भाड्याने देणे हेच पाप मानले गेले पाहिजे. बाकी मलाही "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नाहाने" ही म्हण आठवली. :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा आक्षेप 'मुक्या जनावरांचा जीव घेतात ' याला असेल तर हा शाकाहार विरूध्द मांसाहार मुद्दा होईल, जो या धाग्यात पूर्णतः गैरलागू आहे. तो वाद वेगळा धागा काढून घाला. तुमचा आक्षेप 'देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात' याला असेल, तर अशी प्रथा आजही हिंदू धर्मातही आहे. (मांढरदेवी, कालीमाता, बिरोबाची जत्रा' इ. मग एकाच विशिष्ट धर्मावर रोख का? बाकी तुमच्याबरोबर भेंड्या खेळायला मजा येत आहे तोपर्यंत खेळाव्यात असा विचार आहे.

In reply to by स्वधर्म

हो मग ! आहेच की. त्या हत्तीचा माहूत कोणी कालिमाता बिरोबा येथे बळी देणारा असता तरीही मी हेच म्हणेन. ( मांढरदेवीला बळी देण्याची प्रथा माझ्या माहिती नुसार बंद झाली आहे.) आणि शाकाहार विरुद्ध मांसाहार हा मुद्दा कसा नसू शकतो ! हत्ती जैनांचा आहे . जैन धर्माचा पायाच अहिंसा आणि शाकाहार हा आहे. अहो जे जैन संत चुकून देखील नजरेला न दिसणाऱ्या मुक्या जीवांची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतात ते जैन लोकं पराकोटीच्या हिंसक लोकांना स्वतःचा देवस्थान च हत्ती कोणत्या भरोशावर पाठवतात ! हे असं ते न कळत पणे करत असतील तर मूर्खपणा आहे आहे कळून देखील करत असतील तर दांभिकपणा आहे. दोन्हीही परिस्थितीत बिचाऱ्या मुक्या हत्तीचे आयुष्य क्लेशकारक होत आहे. ह्या असल्या क्रूर व्यवस्थेपेक्षा वनतारा हजारपतीने उत्तम !

वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. तिथलं वातावरण, तापमान , खाद्य हत्तीना अनुकूल नाहीये.. कर्नाटक केरळ असता तर ठीक.. तिथे हत्तींचा वावर आहे.. केवळ पैसे आहेत म्हणून माज..त्यात चौकीदार ही चोर है

In reply to by कपिलमुनी

वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. +१ -दिलीप बिरुटे

दुवा हाडांचे आजार असल्याने गौरी नावाची हत्तीण "रेस्क्यू" करण्यात आले होती.. तिला ३ दिवस लग्नाच्या दारात शोभेसाठी उभे केले होते.. आता ३ दिवस असे उभे करणे यावर सरकार न्यायालय आणि. पेटा आवाज काढणार नाहीत

In reply to by कपिलमुनी

सुखद बदल ! ह्या हत्तीच्या निमित्ताने अंबानी आणि त्या आडून मोदींना शिव्या घालायचा जो एकांगी प्रकार चालला आहे त्यात सहभागी न होता तुम्ही PETA, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट , आणि एकूणच सरकार ह्या सर्वांवर समान तीव्रतेने टीका करत आहात हा बदल अत्यंत सुखावह आहे !

हत्ती. एक लघु निबंध हत्ती हा largest land mamal आहे. त्याच्या African अणि Asian ह्या दोन प्रजाती आहेत. हत्ती हा एक pack animal आहे. पण natural setting मध्ये तो त्याच्या species मध्ये रहाणे पसंद करतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. पण अहिंसा परम धर्म वगैरे मानत नाही. Male elephants aggressive असतात. विशेषत: मदमस्त असताना. Females त्या मानाने docile असतात. हत्ती हा प्रचंड intelligent अणि emotional प्राणी आहे. पण त्याच्या भावना अणि बुद्धी primarily survival instincts अणि primordial behavior वर चालते. हत्ती महाकाय असून relatively weak eyesight, sharp hearing and sense of smell plus ability to sense vibrations are their physical traits. माणसाने हत्तीला godlike status दिले असले तरी हस्तिदंत करता शिकार करणे. युद्धात वापरणे. ओझी वाहाणे, Circus मध्ये खेळवणे. Zoo मध्ये ठेवणे. मिरवणुकीत फिरकणे असे abusive प्रकार हत्तीवर लादले जातात. हत्तीला विचाराल तर ह्यातील एकही गोष्ट तो स्वतःहून करणार नाही. त्याला ईतर हत्ती बरोबर चरत उंडारत फिरायला आवडत. त्याकरता तो आपल्या शेतात बागेत येतो. पण हत्ती हा pet नाही. पाळीव प्राणी नाही. Domesticated नाही. तो trained and conditioned आहे बस्स. ही so called माणसाबरोबर Co exist होण्याची प्रक्रिया खूप क्रूर असते. विशेषत एव्हड्या अवाढव्य प्राण्याला हाताळायला अंकुश वापरावा लागतो. आणि आयुष्याचा बराच काळ captivity मध्ये घालवावा लागतो. साखळदंड सकट. नाहीतर पिंजरा किवा enclosure मध्ये. त्यांचे प्रजनन वगैरेही ईतर पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसाना परवडत नाही. हत्ती पोसणे अफाट काम आहे हे खरंय. Circus वाईट आहे. आता तिथे प्राणी वापरत नाहीत. Zoo पण बंद व्हायला पाहिजेत. Peting zoo आणि resorts वर पण नियंत्रण हवे. एव्हडच काय forest reserve वर पण बंदी यावी. हत्ती असो किवा वाघ तुमच्याबरोबर selfie काढायला आतुर नसतो. पण माणूस प्राण्याच्या हौसेला मोल नाही. ताब्याती एक हौस म्हणजे गणपती उत्सव. पण त्याने हत्तीला थेट त्रास होत नाही किवा कामाला लावल जात नाही. पण temple elephant किवा मठाची हत्तीण हे एक occupation आहे. Petting zoo मधला हत्ती हेही एक occupation च आहे. Quality of life and conditions may differ. Bonded labour. Loosely put. हत्तीला काय समजत नाही? आणि काय समजत? कोल्हापूर की जामनगर ही नावे समजत नाहीत. Habitat समजते. हत्तीला अम्बानी समजत नाही ना जिओ एयरटेल मधला फरक. हत्तीला नाव समजत नाही. Positive negative reinforcement , association, conditioning and response behavior समजतो. हत्ती court ची पायरी चढत नाही. त्याला पेटा माहिती नाही. पण वन तारा मधला हिरवे पण जाणवेल ईतर हत्ती दिसतील. मिळणारे जेवण उमजेल. हत्तीला attachment असते. पण ती Co dependency नसते. हत्ती माहूत मानतो आणि primary caregiver वर depend करतो. पण प्रत्येक केळी भरवून photo काढणारे आणि ह्या विषयावर reel बनवणारे त्याच्या गिनती ahet का? किंबहुना हत्ती ही post वाचेल का हा प्रश्न मला पडत नाही. हत्तीला परंपरा धर्म आण बाण शान वगैर संकल्पना कळतात का हो? महादेवी aka माधुरी is a working elephant who is close to her retirement. तिला आराम, योग्य आहार, विहार, आरोग्य सेवा आणि काळजी घेणारी ( नुसती काळजी करणारी तेही social media वर नव्हे) माणस आजूबाजूला हवीत. आपल्यालाही तेच हव असत नाही retirement ला? बघा तिच्या बुद्धीने विचार करून. #meateatingmonk

In reply to by Bhakti

प्रत्येक हत्तीला स्वतःच्या सवयींनुसार, नैसर्गिक वृत्तीने जगायचा हक्क आहे. कोणाच्या सांगण्यानुसार नाही. आता तेच आयुष्य माधुरीला वनतारामध्ये मिळतंय. ती केव्हा खाणार, कुठे फिरणार, विश्रांती कधी घ्यायची हे सगळं ती स्वतः ठरवते, आपल्या गतीने .. https://www.facebook.com/share/r/16wJLCZfWi/