Skip to main content

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/04/2024 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

वाचने 50987
प्रतिक्रिया 250

प्रतिक्रिया



गेल्या ५ वर्षात भाजपाने एव्हढी फोडाफोडी केली आहे की बऱ्याच लोकांना राजकारण आणि राजकारणी लोकांचा तिटकारा आलेला आहे. हे पण एक कमी मतदान होण्याचं कारण आहे.ED, CBI आणि फोडाफोडी करून भजपाच सत्तेत येणार हे भरपूर भजपा समर्थकांचा म्हणणं आहे त्यामुळे मतदानासाठी उत्साह नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

ED, CBI आणि फोडाफोडी करून भजपाच सत्तेत येणार का लोकं काय मूर्ख आहेत का? आणि असतील तर मग भोगा .. इंदिरा अम्मा गेल्यानंतर राजीव बाबूंना ४००+शीटा दिलाय ना लोकांनी ते चालतं

जर्क जिंकणारा चोरच असेल नी सरकार बदलले तरी तो भाजप मध्ये जाऊन तोडीपानी करुन क्लिनचीट करवुंक घेतोय. भाजपप्रवेश झाला की भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आयोप लावले होते त्यांच्या फायली इड़ीला सापडत नाहीत किंवा पुरावे अचानक गायब होतात. ज्यांच्यावर मोदीनी आरोप लावेलेल असतात त्यांच्याच साठी मोदी मते मागत फिरतात. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर मोदी बोलतात नी चार दिवसाने त्याना मंत्रिमंडळात घेतात. कुणाचीही चाड नाही. शेफाली वैद्य वगैरेसारखे लोक बोलतात की भाजप ४०० पार साठी आम्हि भ्रष्टाचार खपवून घेऊ. निवडणूक आयोग खुलेआम भाजपसाठी काम करत. मग निवडणुका घेण्याचं नाटक तरी का केलं जातं?? लोक मूर्ख आहेत का मतदान करायला? मला तर वाटतं जे लोक मतदानाच्या सुटी वर मस्त चील मारायला शहराबाहेर जातात ते खरे हुशार. शहरात थांबून उन्हात मतदान करनारे नी स्वतःला लोकशाहीचा आधारस्तंभ समजणारे पारकोटिचे मूर्ख आहेत.

तर हे आता नवे टुलकीट आहे. इव्हीएम ला दोष देता येत नाही... लोकांमधे अनास्था आहे म्हणून मतदान झाले नाही म्हणून आम्ही हरलो नाहीतर बीजेपीची पुरी वाताहात केली असते. - बिगुल दारुवाला

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाहुबली नामक सदस्य सगळिकडे बिनडोकासारखे आरोप करत असतांना संपादक मंडळ काय झोप काढत आहे का? उठा संपादकांनो जागे व्हा आणि सदर सदस्याला समज द्या.

In reply to by अहिरावण

आणि त्यांच्याकडे मीच जेम्स वांड नामक जुना आयडी असल्याचे पुरावे असतील तर माझा आयडी जाहीररित्या ब्लॉक करा... नसेल तर त्यांना जाहीर समज द्या. त्यांना ब्लॉक करु नका... मिपावरचे फुकट मनोरंजन बंद पडेल... =))

In reply to by अहिरावण

कंट्रोल वांड साहेब, तुमचा आयडी उणापुरा ११ महिन्यांचा. (नेमका त्याच वेळी जेम्स वांड नावाचा आयडी बॅन मारला गेला होता :) ) पण तुम्हाला मिपाचा १५ ते २० वर्षाचा इतिहास पाठ आहे. मी हे पकडल्यावर तुम्ही पुन्हा मीपाचा इतिहास उगाळला नाही. ह्यावरून सिद्ध होते की तुम्ही डू आय डी आहात. आता कुणाचे हा प्रश्न निराळा. पण लेखन शैली वांड साहेबांशी हुबेहूब जुळते नाही? :)

वर्किंग डेला मतदान ठेवून मग त्या दिवशी मतदानाची सुट्टी देण्याऐवजी अधिकाधिक जागी मतदान रविवारीच का ठेवत नाहीत? संबंधित कर्मचाऱ्यांना नंतर कंपेन्सेटरी ऑफ देता येईल. मतदानाला रविवार जोडून सुट्टी येणे किंवा घेणे आणि बाहेर फिरायला जाणे हे यामुळे कमी होऊ शकेल. आणि असंख्य आस्थापनांना एक दिवस काम बंद ठेवायला लागल्याने होणारे नुकसान टळेल. हा प्रश्न बाळबोध असू शकतो हे मान्यच. यावर विचारच झाला नसेल असेही नाही.

In reply to by गवि

सरकारि आस्थापना आणि आयटी सोडल्यास शनीवार रविवार सुट्टी असते असे नाही. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यानुसार वेगबेगळ्या वारी उद्योग बंद असतात. इतरत्र सुद्धा तसेच असावे. नक्की कल्पना नाही. लोकशाहीसाठी एक दिवस काम बंद ठेवल्याने फारसे नुकसान होत नाही. करोनामधे जितका काळ बंद ठेवावे लागले होते त्यापेक्षा बराच कमी काळ १९५२ पासून आजवर बंद राहिले असेल. काम काम काम पैसा पैसा पैसा एवढंच जीवन नसते.

In reply to by अहिरावण

तांत्रिक दृष्ट्या योग्यच आहे हे तुम्ही म्हटलेले. "शनिवार रविवार आयटी पांढरपेशे" हा मुद्दा ध्यानात घेऊनच शनिवार टाळून फक्त रविवारचा उल्लेख केला होता. अनेक आस्थापने 24*7 चालू असतात हे खरेच. पण तरीही इतर कोणत्या तरी दिवसापेक्षा रविवारी मतदान असल्यास खूप जास्त लोकांना आपसूक साप्ताहिक सुट्टी जुळून येईल हा मुद्दा अगदीच अप्रस्तुत आहे का? Reasonably common holiday is Sunday असे नाहीये का?

आधीच काहीशी परिस्थिती विरोधकांची झालीये. म्हणे,"सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा', कुणाचा कुणाला मेळ नाही. सगळेच म्हणतात," टेरीवर हाणा पण बाजीराव म्हणा". पंतप्रधान कोण विचारलं तर यांची आवस्था,"वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव", आशी म्हणून गाणे म्हणावेसे वाटते "मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे". विरोधकांची एव्हढी भंबेरी उडाली आहे तरी म्हणतात "भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा". इ व्ही एम ला पूर्णविराम लागल्यानंतर आता मतदार उदासीन हा नवीन जुमला चार जुन नंतर कामाला येईल. एव्हढं वाटतं तर बाहेर काढा समर्थकांना आणी करायला लावा मतदान. आडवा चारशे पार लक्ष ठेवणाऱ्यांना. मतदानाची सुट्टी घेणार,कोकण,कोडाई कॅनॉल उटी जाणार..... वाह रे वाहा. मी व माझे कुटुंब मतदान करणार.

In reply to by कर्नलतपस्वी

भारतीयक लोकशाहीत पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावाच असक दंडक नाही. तसेच विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार “नकली डिग्रिवाला” नसेल एवढ्क निश्चित आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

मी मित्रांसोबत लोणावळा किंवक dusaryaq कुठल्यातरी धबधब्यावर जाणार आहे. मी बाहेर असल्याने घरातलेही जाऊ शकणार नाहीत. पाच मित्रांच्याही कुटुंबाची हीच अवस्था असेल. निवडणुका आयोगाला सांगा पुढल्या वेळी मोदीना मदत करण्यापेक्षा सरल्क विजयिक घोषित करा. म्हणजे निवडणूक घेण्याचाक जो देखावा केला जातो त्याचा खर्च आहेच. कुणी बोंबलला ह्याविरुध्द तर त्याला केजरीवाल ह्याच्यासारख जेल मध्ये टाका.

In reply to by कर्नलतपस्वी

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करता येतो याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या वृत्तीबद्दल! पण अशक्त, केविलवाण्या सरकारांनी जे काम केलं त्याच्या जवळपास देखील कामगीरी नाही. आणि असेल कशी? छान छोकीनं रहायचं आणि बेताल भाषणं करायची यापेक्षा जास्त वकुबही नाही.

In reply to by सर टोबी

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करता येतो याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या वृत्तीबद्दल!
कुणी दिलं, कुठं दिलं?

१० वर्ष म्हणजे एक दशक ! एक पिढी या काळात पुढे सरकते. मोदी सरकारला याच मध्यम वर्गाने सलग दोनदा प्रचंड बहुमत दिले, याचे मुख्य कारण म्हणजे हा पिचलेला मध्यम वर्ग भ्रष्टाचार, अनाचार याला कंटाळला होता. त्यांना मोदींनी सांगितले ना खाऊंगा ना खाने दुंगा. सबका साथ सबका विकास ! पण प्रत्यक्षात या दशकात हे स्वप्न दाखवणार्‍या मोदींनी मुस्ल्मिम तुष्टीकरणाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले ! त्यांनी ३०० योजना राबवल्या ज्याचे मुख्य लाभार्थी मुस्लिम समाजच ठरला ! इकडे हिंदू मुली ३५ तुकड्यात कापल्या जात होत्या आणि तिकडे तुष्टीकरणात मग्न असलेले मोदी याच मध्यम वर्गाच्या कष्ट करुन कमावलेल्या रक्ताचा घामाचा पैसा प्रातिकरच्या माध्यमातुन ओरबाडुन काढुन फक्त मुस्लिम समाजातील मुलींसाठीच राबवल्या जाणार्‍या शादी शगुन योजनेत वाटत बसले होते, प्रत्येक मुलीला ५१००० असे है पैसे वाटले गेले.१० वर्ष मोदी आत्ममग्न राहुन मन की बात करत बसले पण जन की बात ऐकायला मात्र पूर्णपणे विसरले. ज्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान १५ ऑगस्टला भाषण देतात त्यावर खलिस्तानी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातुन चालुन गेले आणि त्यांनी झेंडा खाली उतरवला, पण सरकार फक्त बघ्याच्या भूमिकेत राहिले. हेच लोकांनी शाहीन बाग आंदोलनाच्या वेळी देखील पाहिले आणि अनुभवले ! मणिपूर तर आजही जळते आहे यात सरकारचे मोठे अपयशच दिसुन आले. वक्फ बोर्ड ही समांतर न्याय प्रणाली जी घटनाबाह्य असुन राष्ट्राच्या आणि हिंदू जनतेच्या मूळावर उठलेली आहे त्याला या सरकारला १० वर्षात बरखास्त केले नाही ! का ? उलट शहरी वक्फ संपत्त्ती विकास योजना मोदींनी राबवली आणि लाखो कोट्यावधी चे अर्थ सहाय्य दिले ! हे असे राष्ट आणि हिंदू हित साध्य केले जाते ? मुसलमाना तुष्टीकरणाची मोदींना इतकी झिंग चढली की त्यांनी त्यांना फ्री युपीएसी कोचींग देखील दिले.युपीएसी जिहाद नावाचा प्रकार घडत असल्याचे सुदर्शन न्यूज़ ने सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकार त्यांच्या विरोधात न्यायालयात गेले. या दशकात सगळ्यात भयानक काळा होता तो म्हणजे करोना काळ. या कालावधीत अनेक लोकांचे उध्योग धंदे / व्यवसाय ठप्प झाले, काही कायमचे बसले तर अनेकांच्या नोकर्‍या देखील गेल्या. यात प्रामुख्याने गरीब, मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गातील लोक अधिक होते.या वर्गासाठी सरकारच्या मनात कोणतीही दया निर्माण झाली नाही ना त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार ने प्रयत्न केला. सगळं राम भरोसे ! हाच मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आयकर नावाच्या लुटीत पिचला गेलेला आहे, हा वर्ग आयकर भरण्या बरोबरच इतर सर्व प्रकारचे कर भरत असल्याने आता हा वर्ग आर्थिक दृष्ट्या विकलांग झालेला आहे.मोठ्या मोठ्या बाता मारणार्‍या मोदींनी आयकर प्रणाली बलण्याची बडबड केली होती पण केले काहीच नाही ! उलट जमेल तिथे लोकांची आयकर विभागाचा उल्लेख करुन विनोद निर्मीती करण्याचा प्रयत्न मात्र करताना ते सातत्याने दिसले ! देशातील ९७% लोक आयकर भरत नाहीत म्हणजेच ३% आयकर भरणार्‍या मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाची आर्थिक पिळवणूक या सरकारने देखील १० वर्ष सुरुच ठेवली.आयकर समाप्त करुन या वर्गाचे जो त्यांचा प्रमुख मतदाता आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या बळ देणे मोदींना सहज शक्य होते पण त्यांनी ते केले नाही, डॉ सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी या विषयावर एका मुलाखतीत भाष्य देखील केलेले आहे त्यात ते म्हणतात की ते हा आयकर कायमचा रद्द करण्या बद्धल ते मोदींना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत्,तसे केल्यास या देशातील जनता रस्त्यावर आनंदाने नाचेल पण मोदींनी काही त्यांचे ऐकलेले दिसत नाही ! पार्टी विथ डिफरन्स असे म्हणणारी भाजपा आता पार्टी विथ नो डिफरन्स झाली हे सामान्य जनतेला दिसते आहे. ज्यांनी मोदींना शिव्या-शाप दिले ते आणि मोदींनी / भाजपाने ज्यांना नावे ठेवली, फार मोठ्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गैरवर्तनाचे आरोप केले ते सर्वच आता भाजपात आहेत. सत्ता टिकवण्यासाठी कोणात्याही थराला जाण्याच्या स्थितीत भाजपा आता आलेली आहे हे उघडपणे दिसते. ना खाऊंगा ना खाने दुंगा फक्त घोषणाच होती आणि सबका साथ सबका विकास ! हा जुमला हिंदूंसाठी ठरला विकास मात्र मुस्लिम समाजाचाच केला गेला हे उघड झाले. खरं वाटत नाही ना ? मग एक उदा. देतो :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात के मुसलमानों को एक बेशकीमती तौफा दिया हैं। मोदी की अध्यक्षता में कल सरकार ने गुजरात के सपाई और पतनी जमात या तुर्क जमात के मुसलमानों को भी अन्य पिछड़ी जाति यानी ओबीसी की सूचि में शामिल किया हैं। अब इस जाती के अंतर्गत आने वाले लोगो को केंद्र सरकार की नौकरियों और संस्थानों में ओबीसी कोटे के तहत आरक्षण का लाभ मिलेगा। निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे 'मोदीगेट' हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे सध्याचे अर्थमंत्री असलेल्या निर्मला सितारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी उघडपणे सांगितले आहे. हे संपूर्ण प्रकरणच तर आता पूर्णपणे दाबले गेल्याचेच भासत आहे. भाजपाने नक्कीच इतर अनेक चांगली कामे केली आहेत आणि त्याचे त्यांना श्रेय द्यायलाच हवे परंतु मोदींच्या अतिरेकी मुस्लिम तुष्टीकरण्याच्या नितीने त्यावर पुरता बोळा फिरवला आहे इतके मात्र नक्की ! जाता जाता :- आता मला सांगा हे सर्व अनुभवल्यावर मध्यम वर्ग कोणत्या अपेक्षेने मतदानास जाईल ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HD

In reply to by मदनबाण

मदनबाण, दुर्दैवाने तुमच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे. --- हिंदूंना भारत नामक भूभागावर किमान सन्मानाने शिल्लक राहता यावे म्हणून मोदींनी हिंदूंनी मते दिली. तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी सरकारने मागच्या दहा वर्षांत हिंदूंच्या हिताचे एकही काम केलेले नाही. त्यापेक्षा त्याआधीचे सरकार किमान आपल्या मुख्य मतदारांशी प्रामाणिक होते. "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" असे ठणकावून सांगण्याची त्यांच्यात धमक होती आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांच्यात हिंमत होती. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात तशी धमक कधीही दिसली नाही. --- तीस्ता सेटलवाड आणि नुपूर शर्मा किंवा मोहम्मद जुबैर आणि टी राजा सिंह यांची तुलना नेमके हेच अधोरेखित करते.

In reply to by वामन देशमुख

तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी सरकारने मागच्या दहा वर्षांत हिंदूंच्या हिताचे एकही काम केलेले नाही. मी स्वतः माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत जात असे. परंतु आत्ताचा संघ हा मुस्लिम चाटुकारिता करणारा आहे असे माझे मत बनले आहे. मोहन भागवतांनी केलेली अनेक विधाने ही मुस्लिम तुष्टीकरणारी आहेत आणि हे हिंदू विरोधी धोरण आहे. १० वर्षात हजारो हिंदू मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या, अनेक बलात्कारीत झाल्या, अनेक पळवुन धर्मांतरीत केल्या गेल्या, अनेकांवर सामुहिक बलात्कार केले गेले, अनेक मुलींना लग्न करुन वारंवार त्यांचे गर्भपात केले गेले, अनेक मुलींचे लग्न केल्या नंतर त्याच कुटुंबातील इतर मुस्लिम पुरुषांनी शरीराचे लचके तोडले. पुण्याच्या मंचर मधील हिंदू मुलीचा व्हिडियो पाहुन मी ढसा ढसा रडलो होतो, तिची जेव्हा सुटका केली गेली तेव्हा ती काळ्या बुरख्यात सापडली. तिला पळवुन तिचे वारंवार लचके तोडले गेले एका वेश्ये सारखे तिला विकले गेले आणि खरेदी केले गेले. तिच्या अंगभर सिगरेटचे डाग देण्यात आले. कोणत्या तरी गोळ्या देऊन तिला दिवसभर नशेत ठेवले जायचे आणि दिवसाला ३-४ वेगवेगळे जिहादी येऊन तिचा बलात्कार करायचे ! गोमास खाऊ घालायचे आणि जबरदस्तीने नमाज पढायला लावायचे. असा अत्याचार तब्बल ४ वर्ष तिच्यावर झाला ! ती इतकी मानसिक धक्यात होती की सोडवल्या समोर दिसणार्‍या प्रत्येक पुरुषाला ती पाहुनच घाबरत होती, ज्यात तीचे वडिल देखील होते. :( [ इतक सगळं समोर दिसत असताना न्यूज चॅनलचा संवादात विचारतो , हे प्रकरण लव्ह जिहादच म्हणायचं का ? अश्या प्रकारे बातमी देणारा इतका *डू व्यक्ती मी याधी कधीच ऐकलाच नव्हता. ] https://www.youtube.com/watch?v=09rIclOac-4 [मी मूळ व्हिडियो पाहिलेला आहे इथे दिलेले व्हिडियो त्याच घटनेचे आहेत पण ते संपूर्ण नाहीत. ] ४ वर्षाच्या हिंदू मुलीला देखील जिहादी हैवान आता सोडत नाहीत आणि हिंदू मुलींचे तुकडे असलेल्या सुटकेस देशभर सापडत आहेत ! हा कोणता विकास ? आता मतदानाची वेळ आल्यावर मोदींना हिंदू मुलींची आठवण येऊ लागली आहे. नुपूर शर्मा तर भाजपाचीच होती ना ? काय चूक बोलली होती ती ? तिच्या विधानाशी नुसती सहमती दर्शवणार्‍यांचे गळे चिरले गेल्याची तुम्ही पाहिले ना ? पण सत्तेत असलेल्या तिच्याच पक्षाने आणि मोदींनी तिची साथ सोडली, तिला पक्षातुन काढुन टाकले आणि जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिले. सगळ्या जगाने हे पाहिले, जो मोदी स्वतःच्या पक्षातील नुपूर शर्माला वाचवु शकत नाही, तीची साथ देऊ शकत नाही तोच मोदी तुमच्या स्त्रियांची कसली घंट्याची रक्षा करणार ? हिंदू संवेदनाहीन झाले आहेत इतक मात्र मला स्पस्ट दिसतय ! त्यांना स्व्तःला आई आहे, बहिण आहे, बायको आहे , मुलगी आहे याचे भान राहिले आहे का ? तेच मला समजेनासे झाले आहे,कारण आज त्यांच्या घरातील स्त्री ची भयानक अवस्था झालेली नाही,पण उद्याचे काय ? जाता जाता :- जगात सगळ्यात जास्त विटंबना ही हिंदू स्त्रियांची झालेली आहे, अनेक शतके बदलली पण त्यांच्या वाटेला मात्र केवळ विटंबनाच आली आणि आजही ही परिस्थीती बदलत नाही हे अधिक वेदनादायी आहे. जो पर्यंत मुस्लिम तुष्टीकरण करणार्‍या कोणत्याही पक्षाला हिंदू मत देणे बंद करणार नाहीत तो पर्यंत हिंदू स्त्रियांची ही विटंबना थांबणार नाही, याला हिंदूच जवाबदार आहेत आणि स्वतःच्या स्त्रियांची सुरक्षा करण्यात आणि विटंबना थांबण्यात ते भयानक पद्धतीने अपयशी ठरले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HD

In reply to by मदनबाण

पुण्याच्या मंचर मधील हिंदू मुलीचा व्हिडियो पाहुन मी ढसा ढसा रडलो होतो, मदनबाण मंचरचा व्हिडीओ पाहून रडलेला मला वाटलं होतं मी एकटाच आहे. मीही प्रचंड अस्वस्थ झालो होतो तो व्हिडीओ पाहून. भयानक मानसिक अवस्था झाली होती माझी, महिनाभर मला काही सुचत नव्हते. ती मुलगी कुणीही संकर आलं की डोळ्यापुढे हात धरायची. फार भयानक होतक तो व्हिडीओ. ह्यावर मात्रा म्हणून पुढील महिनाभर भगवा जिहाद वर जे काही सापडेल ते वाचले. आताही लव्ह जिहाद वर काहीही वाचायची माझी हिंमत होत नाही. विचित्र मानसिक अवस्थेत जातो मी. हिंदू संवेदनाहीन झाले आहेत इतकं मात्र मला स्पस्ट दिसतय खरं आहे. आणी ह्यामुळे माझा भाजप पक्षावरचा राग अजून वाढला आहे अरे ज्या हिंदू मतांवर तुम्ही निवडून आलात त्यांच्यासाठी एक टक्कर तर काम करा. ह्याना फक्त निवडणूकवेळीच हिंदू आठवतो. नुपूर शर्माबद्दल काय बोलावे. बिचाऱ्या त्या स्त्रीच्या मागे कुणीही उभे राहिले नाही. इतक्या मोठ्या पदावरच्या स्त्री मागे कुणीही नाही तर उद्या एखाद्या जिहादी लांडग्याशी लढणाऱ्या मुलीमागे कोण उभे राहिल?? नुपूर शर्मा शी जो मुस्लिम व्यक्ती डिबेट करत होता तो मात्र देवांना शिव्यादेऊनही सुरक्षित आहे. नुपूर शर्माला सपोर्ट करूनही काही लोकांचे गळे कापले गेले. त्याना न्याय मिळेल ह्याची शक्यता कमीच. बिचारा तो राजस्थानातला टेलर. कसा गळा चिरला गेला त्याचा??… लिहिलं जात नाही. काही मूर्ख लोकं वाटतं की ह्यावर भाजप हे सोल्यूशन आहे. पण त्या मूर्खाना मागच्या १० वर्षात हिंदूंसाठी भाजपने काहीहि केले नाही हे दिसत नाही.

In reply to by चौकस२१२

सर मी आधीपासूनच हिंदुत्व आहे. बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात आहात म्हणे. तुम्हाला हिंदूंचा कळवळा न येणं साहजिक आहे. साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात आहात म्हणे. तुम्हाला हिंदूंचा कळवळा न येणं साहजिक आहे. काढलं परत मी कुठे राहतो ते ! एकीकडे मला हिंदूवादी भक्त गणात मोजता आणि दुसरीकडे म्हणत बाहेरदेशी राहतोय म्हणून हिंदूंबद्दल कळवलं नसणार? आ? साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो. काय वाटेल ते सावरकरांचा बुडला ? गांधींचा बुडला ? डॉक्टर आंनदीदीबाईंचा बुडला ?

In reply to by चौकस२१२

हिंदूवादी भक्त गणात मोजता कशाला खोटे लेबल लाऊन घेताय?? मी अंधभक्त ह्या गणात मोजतो. अंधभक्त नी हिंदुवादी ह्यांचा काहीहि संबंध नाही. शंकराचार्यांची आई बहीण काढणारे हिंदुवादी कसे होऊ शकतील? (तूम्ही नाही. जनरल इतर अंधभक्तानी काढलि होती) काय वाटेल ते सावरकरांचा बुडला ? गांधींचा बुडला ? सावरकरांनी खुलेआम सांगितल गोमांस खा. मानतक का सावरकरणा?? मग तिकडे चंगळ असेल. बाकी तुम्ही मला विचारलकी कधीपासून हिंदुत्ववादी झालात? सांगू इच्छितो की हिंदूंमध्ये राहून हिंदूंसाठी जे जे करता येईल ते मी करत असतो. ख्रिस्ती देशात राहून ख्रिस्तींची सेवा करुन स्वतःला हिंदुत्ववादी नाही म्हणवून घेत. थोडक्यात उंटावरून शेळ्या नाही हाकत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सावरकरांनी खुलेआम सांगितल गोमांस खा. मानतक का सावरकरणा?? हो मानतो कारण तर्क शुद्ध आहे ते याचा अर्थ केवळ ख्रस्ती बहुल देशात राहतो म्हणजे गोमास काय मास खातोच हे कसे गृहीत धरता ? तुमहाला काय प्रदेशात राहणार्यांबद्दल राग आहे कोण जाणे ख्रिस्ती देशात राहून ख्रिस्तींची सेवा करुन स्वतःला हिंदुत्ववादी नाही म्हणवून घेत. असे असतंय का मग तुम्ही जिथे नोकरी करता त्या कंपनीला ख्रिस्ती लोकनकडून पैसे मिळत असेल ना तर घेऊ नका तेवडः पगार काय वाटेल ते ... हा देश सर्वधर्म संभावी आहे याचा अर्थ काय वाटेल ते नाही तर एक देश एक कायदा पंचतंय का ?

In reply to by मदनबाण

अगदी आत्तापर्यंत कडवे मोदी-भाजपसमर्थक असलेल्या अशा लोकांचे असे मतपरिवर्तन आश्चर्यकारक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात के मुसलमानों... को भी अन्य पिछड़ी जाति यानी ओबीसी की सूचि में शामिल किया हैं> मग कॉन्ग्रेसने कर्नाटकात काय वेगळे केले?

In reply to by रामचंद्र

मग कॉन्ग्रेसने कर्नाटकात काय वेगळे केले?
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे काँग्रेसने जाहीर केले आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्नाटकात मुसलमानांना आरक्षण दिले. ते त्यांच्या घोषित उद्दिष्टांशी किमान प्रामाणिक आहेत. संघप्रणीत भाजप त्यांच्या घोषित-अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का?

In reply to by वामन देशमुख

मोदींनी आपल्या सत्तेसाठी पक्षाला आणि संघाला आपल्या दावणीला बांधले आहे असे दिसते. संघाच्या शंभर वर्षांच्या मेहनतीची फळे खाऊन, पक्षसंघटन आणि मोदींच्या धडाडी-डावपेचांमुळे सत्ता आली आहे, हे मोदींचे एकट्याचे कर्तृत्व नाही. रामभाऊ म्हाळगींसारखे लोक आता (कुठल्याही) पक्षात नाहीत हे दुर्दैव.

In reply to by वामन देशमुख

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही " देशाच्या विकासाची फळं एकसमान पद्धतीने अल्पसंख्यकांना, विशेषत: मुस्लिमांनाही मिळावीत यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या संसाधनावर त्यांचा पहिला अधिकार असायला हवा'' असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. विद्यमान पंतप्रधान सत्ता निसटून जाते की काय भितीने वाटेल तसं बोलत आहेत. भक्तांनी तरी विवेक बाळगला पाहिजे.

In reply to by बाबुराव

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही
असे नाही. मोदी काय प्रचार करत आहेत याच्याशी संबंध नाही. यावर मिपावर आधीही चर्चा झालेली आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने केलेले वक्तव्य - "I believe our collective priorities are clear: agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure, and the essential public investment needs of general infrastructure, along with programmes for the upliftment of SC/STs, other backward classes, minorities and women and children. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. The Centre has a myriad other responsibilities whose demands will have to be fitted within the over-all resource availability." "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे त्याचे सार आहे. अर्थात काँग्रेस त्यांच्या घोषित / अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे आणि त्यांची प्रत्यक्ष कृतीही तशीच आहे. संघप्रणीत भाजप मात्र हिंदूहितवादी असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात मात्र नेमके उलटे वागते! --- अवांतर: जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २०११ प्रस्ताव पहा.

In reply to by वामन देशमुख

https://thewirehindi.com/272820/loksabha-polls-manmohan-singh-modi-musl… वाचा. जेव्हा ट्रंप अशाच प्रकारच्या फेका फेकी करत होता तेव्हा अमेरिकेत एकाने एक वेबसाईट उघडली होती. रोजच्या फेका काऊंट मोजण्यासाठी. मला वाटतंय आता इकडे पण अशी वेबसाईटची गरज आहे.

In reply to by मदनबाण

मतदान न करणे हा काही उपयाय नाही मग तो श्रीमंत असो वा मध्यम वर्गीय कि गरीब काही देशात मतदान ना केलं तर दंड आहे ( खरंच हे पहा https://www.aec.gov.au/Elections/non-voters.htm अनि भाजप ने तुमच्या सर्व पेक्षा पूर्ण केली नाहीत म्हणून मग काय काँग्रेस वर्षूनवर्षे सत्ता द्यायची का?

In reply to by मदनबाण

मदनबाण +१, तुमच मतपरिवर्तन झाल ही आनंदाची गोष्ट आहे. मीपावरील अंधभक्तांचे डोळे उघडतील तो सुदीन.

लोक मूर्ख आहेत का मतदान करायला? मला तर वाटतं जे लोक मतदानाच्या सुटी वर मस्त चील मारायला शहराबाहेर जातात ते खरे हुशार. शहरात थांबून उन्हात मतदान करनारे नी स्वतःला लोकशाहीचा आधारस्तंभ समजणारे पारकोटिचे मूर्ख आहेत. अबा भाषा सांभाळा. या देशात साठ सत्तर टक्के लोक मतदान करतात. एव्हढ्या लोकांना मुर्ख म्हणणे कितपत शहाणपणाचे आहे.....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेब, मी देखील त्या सत्तर टक्क्यात होतो. पण आताची परिस्थिती पाहा. देशात लोकशाही राहिली आहे का?? निवडणूक आयोग उघडपणे मोदीसाठी काम करतोय. मग अश्या वेळी मतदान घेण्याची तरी औपचारिकता निवडणूक आयोग का करतोय?? अश्या वेळी मतदान करणारे मूर्ख नाहीतर आणखी काय ठरतात?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ठीक आहे, मोदींविरोधात योग्य वाटेल त्या उमेदवाराला आपले मत देऊन कर्तव्य पार पाडा आणि मग छानपैकी पिकनिकला जा!

In reply to by रामचंद्र

सहमत. मतदान टक्का वाढेल तर काही फरक पडू शकेल. जशी सत्ताधाऱ्यांची संख्या वाढेल तशीच विरोधकांची पण वाढेल. कदाचित Law of Satiety च्या अनुसार केवळ विरोधकांच्या सदस्य संख्येत वाढ होईल व सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवता येईल. पण इथे "सब घोडे बाराटक्के ", कौनसे घोडेपर दांव लगाये. तरीसुद्धा मतदान टक्का वाढायला हवा.

In reply to by रामचंद्र

त्या उमेदवारामागे ईडी लावुंक त्रास देऊन त्याला त्याच्या मनाविरुद्ध भाजपात घेतलं तर? त्यापेक्षा नकोच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

देशात लोकशाही राहिली आहे का?? तुम्ही कोणत्या ग्रहावरून बोलताय? ९७० का काय मिलियन लोक मतदानास पात्र आहेत आणि त्याप्रमाणे मतदान होत आहे आणि म्हणे लोकशाही उरली आहे का जा मतदान करा आणि हाकलून द्या चड्डीवाल्यांना हाय काय आणि नाही काय?

In reply to by कर्नलतपस्वी

समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त असणे ह्यात काही नवल नाही. काटजुन्च्या मते ९० टक्के. ऐसा है म्हणून तर दुनिया झुकती है. आणि वर बहुमताची लोकशाही. म्हणजे ६० टक्यातले ३५ टक्के मिळाले तरी पंतप्रधान होऊ शकतो. First person to touch the pole! राग माणू नका. ही सत्य परिस्थिती आहे.

In reply to by भागो

मग त्यावर उत्तर काय? अशी पद्धत अनेक देशात आहे फक्त भारतीय पद्धत चुकीची आहे असे का? हे म्हणजे काहीसे असे झाले कि जर २०१६ साली ऑलिम्पिक मध्ये ज्याने १०० मीटर धावण्याचं शर्यतीत १० सेकंदात पळून सुवर्ण पदक मिळवले तर ते सुवर्ण पदक नाही कारण २०१२ साली सुवर्ण पदक ९ सेकंदात पळून मिळवले गेले होते?

In reply to by चौकस२१२

ज्या पक्षाला जितकी मते मिळाली आहेत त्या प्रमाणात त्या पक्षाने आपले सुयोग्य प्रतिनिधी लोकसभेत पाठवावे. ती लोकसभा देशाची खरीखुरी प्रतिनिधिक लोकसभा असेल. मला वाटत ही पद्धत ही काही देशात आहे.