Skip to main content

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/04/2024 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

वाचने 50987
प्रतिक्रिया 250

प्रतिक्रिया

In reply to by भागो

भागो आपण म्हणता ते बरोबर आहे , बहुतेक नु झीलंड मध्ये आहे तसे ( पण तिथे २ संसद सभागृहे नाहीत ) पण त्याही पद्धतीत काहीतरी दोष आहेतच असो प्रश्न येथे हा कि नाआवड्ता पक्ष जिकायला लागलं कीच मग लोकांना "निवडणूक पद्धत" का आठवते आवडत पाकसह आलं जिकून तर विचारला जातो का हा प्रश्न ? दुसरो पद्धत म्हणजे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडलं जाणे पण त्यात हि धोके आहेत भारत , कानडा , ऑस्ट्रेल्या, बहुतेक पाकिस्तान पण येथे ब्रिटीश पद्धतीचे वेस्टमिनिस्टर पद्धत आहे

In reply to by चौकस२१२

https://en.wikipedia.org/wiki/Proportional_representation हे पहा विकीचे पान. सखोल चर्चा आहे इथे. आणि ही पहा देशांची यादी. थोड्या जास्त प्रमाणात हीच पद्धत फालो करत आहेत. https://worldpopulationreview.com/country-rankings/countries-with-propo… सर, तुम्ही ओपन माइंड ठेवून लिहित आहात म्हणून मी रीस्पोंस देत आहे. ८०% हिंदू समाजाला १४% मुस्लीम समाजाची भीति वाटावी?

In reply to by भागो

८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान करतात. - ४० टक्के १४ टक्के मुस्लिम १०० टक्के मतदान करतात - १४ टक्के एकूण ५४ टक्के. (आकडेवारी कमी जास्त) साधारण तीस टक्के मते मिळतात तो उमेदवार विजयी होतो ५४ च्या तीस टक्के १५-१८ टक्के म्हणजेच काही भागात मुस्लिम येनकेन प्रकारेण कोण निवडून यावा हे ठरवतात आणि मग तिथे हिंदूंची ससेहोलपट आणि मुस्लिमांचा वरचष्मा.. मुस्लिम मतदान करतात पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास नाही हिंदू मतदान करत नाहीत पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास त्रांगडं मोठं कठिण आहे.. आता कॉंगेस सत्तेवर आली तर हिंदूंची अवस्था जर्मनीतील ज्युंसारखी होईल

In reply to by सुरिया

मतदान पद्धतीमुळे वोटबँक निर्माण झाली वोटबँक मुळे त्याचे लाड पुरविणे सुरु झाले, खैराती वाटणे सुरु झाले शहराशहरात अनधिकृत झोपडपट्या निमार्ण झाल्या, अनधिकृत घुसखोर वसवून वोटबँक निर्माण केल्या प्रत्येक धर्मासाठी इथं एक राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षात प्रत्येक जातीचा नेता.

In reply to by भागो

बाकीच्या चाळीस ना कोणी घरात बसायला सांगीतल. बाहेर पडा सत्तर वाला प्रधान मंत्री निवडा. नाही तर पस्तीस वाला झेलावा.

संघप्रणीत भाजपला मोदींना पुन्हा पुन्हा सत्तेत बसविण्यामागे काय उद्देश आहे हे खरंच कळत नाही. म्हणजे सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? उदा. एका भ्रष्टवादी पक्षाला सत्ता हवी असते ती लहानमोठे घोटाळे, भ्रष्टाचार करून आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांना पैसे मिळवून देणे यासाठी. येनकेनप्रकारेण ते बऱ्याचदा त्यात यशस्वी ठरत आलेले आहेत. त्या पक्षाचे ते उघड ध्येय आहे आणि ते त्या ध्येयाशी प्रामाणिक आहेत. काळ्या विनोदाची झालर चढवून असे म्हणता येईल की त्या पक्षाच्या मंत्र्यांचा सकाळी दहा वाजता शपथविधी झाला तर मंत्रालयात जाऊन किमान काही कोटींचा एखादा घोटाळा करूनच ते दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतील. सत्ता कधीही जाऊ शकते हे समजून घेऊन ते लोक पहिल्या दिवसापासून कामाला लागतात! याउलट, केंद्रात व अनेक राज्यांत भाजप वर्षानुवर्षे सत्तेत आहे. पण अजून त्यांना हिंदूंचे शिर्डी साईबाबा मंदिर (आणि देशभरातील इतरही अनेक श्रीमंत मंदिरे) सरकारी तावडीतून सोडवून हिंदूंच्या स्वाधीन करता आलेली नाहीत. --- सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे लव जिहादला आळा घालणे शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे परदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे ... यादी मोठी आहे. अशा करण्यासारख्या असंख्य बाबी होत्या. संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार? हिंदू नागरिकांच्या मतदानाप्रती अनास्थेमागील मुख्य कारण हे असेल.

In reply to by वामन देशमुख

आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचणं, आपल्याच समर्थकांना तोंडघशी पाडणं!

In reply to by रामचंद्र

एकच वंश गादीवर, ते काय सरळ मार्गाने आलेत, अशा भ्रमात नका राहू. बाजपेयी सरकार एक मताने तडकाफडकी पाडले. तेव्हां कुणाला नाही पान्हा फुटला. घड्याळ रितसर फुटले धनुष्यातून बाण रितसर सुटले त्यात कुणाचे काय चुकले आता फक्त लक्षप्राप्ती कडे लक्ष.

In reply to by वामन देशमुख

संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार? भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ... अहो जरा परस्थिती समजवून घ्या कि -एक तर पहिली काही वर्षे प्रथम मिळालेली निर्विवाद द सत्ता स्थापित करण्यात गेली -फक्त हिंदूंचं हितासाठी असे उघडपणे करण्यापेक्षा देशाचे हित ज्यात हिंदूंचे हित आहे असे काही कायदे करणे जास्त योग्य भाजप ला वाटले आणि ते योग्य वाटते - देशा ची प्रतिमां जगात उभी करणे ( पाठीला कणा आहे हे दाखवून देणे या अर्थी ) , आर्थिक उलढाल वाढवणे, रस्ते रेल्वे सारखे उपक्रम आधुनिक करणे, बुडीत असलेली सरकारी संस्था सुधरवणे काश्मीर प्रश्न मिटवण्यासातिची काही पावले सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे आधीच भाजप ला शत्रू काही कमी आहेत का त्यात हिंदू हिंदू करणारेच जर भाजपचं जीवावर उठले तर असे होणार विचार करा

In reply to by चौकस२१२

भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ...
१. "जादूची कांडी फिरवून हिंदूराष्ट्र केले कसे नाही" असे इथे कुणी म्हटले आहे? मी जे लिहिले आहे ते अगदी व्यावहारिक आहे. २. तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश, शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र आणि इतर श्रीमंत हिंदू मंदिरे सरकारी कचाट्यातून सोडवण्यासाठी जादूची कांडी लागते का? हे पहा - आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत! asdf

In reply to by वामन देशमुख

सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे, तसे काही उघड केले तर "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकारांना व्यक्त होण्यावर बंदी आणली" म्हणून तुम्ही पण ओरडणार आणि डावखुरे पण त्यापेक्सह ज्या विषयांवर आता पर्यंत कलाकृती निर्माण करणे हे "टाबू / निषेधार्थ" समजले जायचे( किस कुर्सी का , आधी ) त्यावर चित्रपट तरी निघाले ( काश्मीर फाईल , स्वरकार इत्यादी ) हे हि नसे थोडके प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे ... नाहीये का? उलट विरोधक तरबोंबलतात कि गोदी मीडिया म्हणून परत चाणक्य नीती हि कि एकीकडे एन डी ती व्ही सारख्यांचा चेहरा बदलायचा आणि दुसरी कडे बरखा ते वागळेंना तुरंगात वैगरे टाकण्याकॅरीकेच १९७५ सारखा मुर्ख ना करणे ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे कसे करणार ? त्यासाठी हुकुमशाही यावी लागेल खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे काहीच प्रयत्न नाही केले? बार यात केवॉक भारतातील हुकेलेल शीख नाहीत तर त्यात पाकिस्तान आणि इतर देशातील हुकले शीख ( स्वात येथे ऑस्ट्रेल्यात याची उघड प्रचिती घेऊन हे बोलतोय ) आणि भारतविरोधी डावे आहेत .. दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे परत तेच जादूची कांडी कुठून अण्णांर हो? प्रयत्न नाही का चालू? तामिळनाडू, केरळ आणि नुसतेच दक्षिण नाही तर बंगाल आणि पूर्वे कंडील ७ राज्ये अहो अगदी "काऊ बेल्ट " असलेल्या उतार आणि मध्य भारतात भाजप ला सत्तेत यायला ४० हुन अधिक वर्षे लागली! लांबे रेस की घोडा ... लव जिहादला आळा घालणे तसा कायदा आहे ना ? आणि लव्ह जिहाद होते हे तरी उघडपणे बाहेर आलं पुर्वी "ठरविक समाजाच्या भावना दुखावतील" म्हणून सगळं गुपचूप शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे फक्त हिंदुहिता पेक्षा "जे सत्य आहे ते जास्त ठाम पाने मांडणे योग्य नाही का : खोटे हिंदू हित जर उर बडवून केले तर तालिबान आणि संघात फरक तो काय लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे हे काही कळले नाही नक्की काय ? हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे तसा कायदा आहे ना ? इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे हे थोडेफार पटले पण परत अप्रत्यक्ष रित्या आणि प्रत्यक्ष रित्या ( अंदमान विमानतळाला सावरकरांचे नाव देणं) यातून चालू आह ए, औरंगजेब मार्गाचे नाव बदलणे इत्यादी अगदीच काही नाही असे कसे? परदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे सी ए ए आहे ना? का माझी काहीतरी गैरसमजूत होतीय ? ... यादी मोठी आहे.

In reply to by चौकस२१२

प्रतिसादाचा आशय समजला. मोदींनी त्यांच्या समर्थकांवर खरंच जादू केलीय! --- आज जसे मोदी करतात नेमके तसेच १०० वर्षांपूर्वी गांधी करायचे.
  • गांधींनी शहीद सुऱ्हावर्दीला माझा भाऊ म्हणून गौरविले, मोदींनी मुलायम सिंघांना पद्मश्री देऊन गौरविले.
  • गांधींनी भारतीयांपुढे स्वतंत्र भारताचे स्वप्न ठेवले, मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले.
  • गांधींनी भगतसिंगांना वाचविले नाही, मोदींनी राजा सिंहांना वाचविले नाही.
  • १९२१ मध्ये केरळात मोपल्यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले,
  • २०२० मध्ये बंगाली मुस्लिमांनी शेकडो हिंदूंवर अत्याचार केले मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
  • गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला.
  • शंभर वर्षांपूर्वी मुस्लिमांनी पाकिस्तानची तयारी सुरु केली आणि १९४७ मध्ये पाकिस्तान घेतला.
  • आज मुस्लिमांनी गझवा-ए-हिंद ची तयारी सुरु आहे आणि २०४७ मध्ये ते पूर्णच हिंदुस्थान घेणार आहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी गांधींनी हिंदूंना गुंगीत ठेवले आज मोदी ठेवताहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे,
  • नेमके तसेच ते आज मोदींचा उदोउदो करत आहेत.

In reply to by अहिरावण

आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे. काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहे
LOL --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

In reply to by वामन देशमुख

मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले. हे काही फक्त हिंदूंसाठी नाही ठेवले सगळ्या नागरिकांसाठी ठेवले.. आहे का असा नवीन कायदा कि ज्यात "फक्त हिंदूंसाठी विकास" अशी सोयाआहे ? गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला. दोन्हीत एक महत्वाचाच फरक आहे, खिलाफत चळवल हि भारताबाहेर होती भारतातील मुस्लिमांपैकी ९९ काय ९९. ९% टक्के हे मूळ भारतीय हिंदू आहेत आणि आज १४% + अधिक आहेत त्यामुळे संघाला त्यांना पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाहीच संघाची मूळ भावनाच अशी आहे कि देश आधी मग ते काँग्रेस ने केले तरी त्याला संघ पॅथीमबा देईल , कडवे हिंदुत्वचाय पेक्सह स्वरकरवाडी हिंदू व्याख्या संघाला साधय तरी अपेक्षित दिसतीय , या शिवाय वर्षानुवर्षे संघ म्हणजे मुस्लिम विरोधी हे चित्र बदलले तर बिघडले कुठे? परत एकदा इथंही स्वरकरांची हिंदू कोण हि व्याख्या डोळ्यसमोर ठेवता येईल आणि मग विचार करता त येईल कि संघ असे का करीत आहे शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे, असो पण तुम्ही म्हणत आहात तसे समाज फक्त व्यक्तिपूजा करीत असेल तर गांधी काय मोदी काय गावस्कर काय कि तेंडुलकर काय .. व्यक्तिपूजा हा आपल्या समाजचा डी एन या आहे असे समजूयात मग तक्रार का? चुपचाप भोगने भाग आहे , गांधींची व्यक्तिपूजा चालते पण मोदींची नाही ! हा कुठला न्याय ( अर्थात व्यक्तिपूजेचा समर्थक नाही, हे विधान फक्त जशास तसे हे दाखवण्यासारखे )

In reply to by वामन देशमुख

स्टालिन च्या राज्यात झालाय ना तिथे भाजप आहे का सत्तेत ? मग त्यांची कशी चूक

In reply to by चौकस२१२

सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे
कसली सामाजिक उन्नती? इस्लाममध्ये ट्रिपल तलाकला, हलाला निकाह, मुत्ताह निकाह यांना मान्यता आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे हा इस्लामच्या धार्मिक बाबीत सरकारी हस्तक्षेप आहे. त्याऐवजी जन्माने मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकच्या भीतीपोटी इस्लाम त्यागून सेक्युलर बनण्यासाठी प्रवृत्त करणे हे खरी सामाजिक उन्नती ठरली असती.

In reply to by वामन देशमुख

१) काँग्रेस ने शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांवर मुल्ला लोकांचं दबावामुळे शेपूट घालून अन्याय केला २) भाजप ने ट्रिपल तलाक रद्द केला एक भारतीय नागरिक म्हणून ( हिंदू म्हणून नव्हे ) तुम्हीच सांगा समाजहिताच झाले नहि का हे काम? ( २)

सारे अनुमान, भाकीते फेल होतात का काय? काही भक्त कनफ्युजीया गेलेत. काही दुख्खी. चौथा का पाचवा स्तंभ सुद्धा विभाजीत झालायं. चार जुन लाच कळेल जेव्हां मतदाराने इ व्ही एम च्या कानात कय सांगीतले ते उघड होईल तेव्हां.

पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ लेख !
जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
ख्या ख्या ख्या . मी मतदान करत नाही ( किमान गेले काही वर्षे तरी केले नाहीये) कारण मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की १. सर्वच्यासर्व मंदिरे हिंदु संस्थांच्या अखत्यारित देणे अन सरकार्ने पुजारी वगैरे नेमण्याच्या ट्रस्टी वगैरे नेमण्याच्या भानगडीत न पडणे. २. जिथे जिथे पुराव्याने शाबित करता येईल ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदुंच्या ताब्यात देणे अन त्यांचा जीर्णोर्ध्दार करणे. + त्या बदल्यात कोणालाही पर्यायी जमीन वगैरे न देणे. ३. इन्डिव्हिजुअल इनकम टॅक्स पुर्णपणे अ‍ॅबोलिश करणे. ह्या मुळे निर्माण होणारा डीफिसिट हा जी.एस.टी. वाढवुन वसुल करणे. पेट्रोल आणि अल्कोहोल जी.एस.टी.च्या कक्षेत आणणे. वाहन खरेदी करताना वसुल केलेल्या रोड टॅक्स मधुन वापरानुसार टोलचे पैसे वसुल करणे. जिथे जिथे डबल टॅक्सेशन असेल तिथे तिथे ते ठरवुन संपवणे. ४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे. ५. पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर आपण गमावलेला असुन तिथे हिंदुंना जगणे आता अन भविष्यत अशक्य प्राय आहे हे मान्य करणे अन तिकडे अन डिफेन्स वर होणारा खर्च अत्यल्प करणे. ६. बेसिक हेल्थकेअर आणि १२ पर्यंतचे शिक्षण ह्या व्यतिरिक्त सरकारने कोणतेही वेल्फेअर स्टेटचे काम न करणे. कोणत्याही विशिष्ठ समुदायांसाठी विशेष सरकारी संस्था न चालवणे. ७. शेतीला बिजनेस टॅक्स च्या कक्षेत आणणे आणि ज्या शेतकर्‍यांनी मागील वर्षी रीतसर बिजनेस टॅक्स फाईल केला असेल त्यांनाच शेती विषयक सबसीडी आणि कर्जमाफी देणे. ८. पोलीस आणि आर.टी.ओ आणि तत्सम सरकारी कर्मचार्‍यांना दंड रक्कम वसुल करण्याचा हक्क पुर्णपणे काढुन घेणे. कार्ड स्वाईप मशीन हातात घेऊन उभा असलेला सरकारी वर्दीतील माणुस हाच भ्रष्टाचाराचा पुरावा मानुन त्याला ताबडतोब सेवा मुक्त करणे. ९. mpsc upsc वगैरे सरकारी परीक्षांची कमाल वयोमर्यादा २५ करणे. सर्वच सरकारी सेंवांमध्ये लॅटरल इन्ट्री सुरु करणे. १०. इन जनरल , - सरकार चालवणे - देश चालवणे हा एक प्रकारचा बिजनेस चालवणे आहे असे समजुन , जसे कोणत्याही खाजगी कंपन्यांचा सी.ई.ओ आणि डायरेक्टर हे त्या कंपनीच्या शेयर होल्डर्स ना आन्सरेबल असतात तसेच पंतप्रधान अन मुख्यमंत्री अन सर्वच मंत्र्यांबाबत करणे. असो. ह्या सार्‍या स्वप्नवत अपेक्षा आहेत हे मान्य . म्हणुनच आम्ही मतदान करत नाही. पण त्यातल्यात्यात न्याय्य योजना अन मनरेगा सदृष समाजवादी प्रकल्प राबवणार्‍या काँग्रेस , आत्मघातकी कम्युनिस्ट , संधीसाधु स्थानिक राजकीय पक्षांच्या पेक्षा बरं म्हणुन आम्ही बीजेपी ला चीअर्स करतो बस इतकेच =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे.
चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!!

In reply to by Trump

>>>जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!! आहेत? अरेच्या हे काय नवीन... ब्रिगेडी पवाराव्हाडइत्य्तादी वेग्ळेच सांगतात ब्राह्मणांनीच उर्वरित समाजाला पिडले आहे म्हणून... =))

In reply to by चौकस२१२

ह्या देशात अजूनही लोकशाही आहे. मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. अजून नॉर्थ कोरीया, चायना, रशिया, इराण स्टाईल लोकशाही यायला वेळ आहे. ४ जून पर्यंत तरी थांबा. नंतर सुप्रीम लीडरला ९९% मते मिळतील.

In reply to by भागो

मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. ? मतदान करणे हि जबाबदारी आहे जबाबदार नागरिकांची

जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही.
सहमत

मतदान कमी झाले की सत्ताधारीच सत्तेवर येतात हा इतिहास आहे. सध्या सत्ताधारी एनडीए आहे.. तेव्हा विरोधकांनी २०३४ च्या तयारीला लागावे.

वामन देशमुख,
आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!
मोदी तामिळनाडूत सत्तेत नाहीत. बाकी, प्रचंड बहुमतासह राजीव गांधीही सत्तेत होते. काय केलं त्यांनी? मोदींच्या शतांशाने तरी काम केलं का? बरं ते जाऊ द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. हिंदूंच्या जिवाची काय किंमत आहे ते माहितीये ना ? मग मोदींना दोष कशासाठी ? -नाठाळ नठ्या

जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो. १ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने? २ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे. ३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत. ४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत. ५ रुपयाची घसरण चालू आहे. ६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. ७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया. ८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...? प्रश्न खूप आहेत. पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत. बजाव रे. और जोरसे बजाव.

जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो. १ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने? काँग्रेस असते तर काय फरक पडलला असता? महागाई जगभर वाढली आहे, फक्त भारतात नाही , उलट मेक इन इंडिया सारखया उपक्रमांमुळे नोकऱ्या वाढल्या परकीय चलन मिळते २ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे. नोकरी हा काही हकक नाही ,अर्थ व्यस्था वाढत आहे त्यात नोकऱ्या वाढतच आहेत कि उद्धरण देतो तुम्हला भारत स्वतः किती गोष्टी बनवतो याचे कौतिक नाही .. नुकतेच आमच्या देशातील एकमेव पॉलिएथिलिन उत्पादक बंद पडला , आणि हा छोटा देश असून जगातील १० वि मोठी अर्थव्यस्था असून दरडोई उत्तप्प्न अंदाजे ६०,००० डॉलर प्रति व्यक्ती असून ,, भारतात काही वर्षांपूर्वी किती तरी गोष्टीत नोकऱ्या अस्तित्वात नवहत्या ( सपलाय चेन / रिटेल , फिनतेक इत्यादी आज आहेत ! वाहन उत्पादन ! ( अर्हताःत याचे श्रेय फ्क्त मोदींना नाही राव आणि मनमोहन सिंग यानं पण आहे ) ३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत. श्रीलंकणकेच मध्ये आर्थिक अराजक नुकतेच झाले ते विसरलात का बांगलादेशने प्रगती केली आहे पण त्यात भाग स्वस्त मजुरी जास्त आहे , एकूण देश गरीबच आहे पाकिस्तान आणि प्रगती???? ४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत. हे म्हणजे राष्टपतीने देश गरीब आह तम्हणून झोपडीत राहिले पाहिजे असे म्हण्यासारखे आहे , अंतरिक्ष उड्डाण हा उद्योग हाड लांब पाल्याचाच उपक्रम आहे त्याकडे तसेच बघितले पाहिजे ५ रुपयाची घसरण चालू आहे. ती अनेक वर्षे चालू आहे त्याबरोबर उत्पन्न हि वाढत आहे , लोकांचे आणि देशाचे हि ६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. याबाबत मला माहिती नाही तुमचे म्हणणे कदाचित बरोबर असेल हि पण चीन ला भूभाग किंवा पाकिस्तान सारखे धार्मिक युद्ध भारताबरोअबर खेळापेक्षा आर्थिक व्यापारी युद्ध चढाओढ खेळण्यात जास्त रस आहे असे वाटते ७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया. हे म्हणायची मानसिकता तरी आली? "डाव्या गालावर मारल्यावर उजवा गाळ पूढे करा शेवटी मारणारा थकेल आणि निघून जाईल" या वृत्ती पेक्षा बरे कि इस्राईल हे छोटुसे असून कितीतरी दशके "घुसेगें भी और मारेगें भी करीत आहे," अमेरिका करते इतर राष्ट्रांना एक सावधानतेचा इशारा म्हणून आशय गोष्टी सरकार करत असेल ,, असते ८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...? प्रश्न खूप आहेत. पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत. गेली ६० वर्षे हा ढोल कोणी बजावत आहे ? मान्य देशाचे / समाजाचे धर्म हेच फक्त प्रश्न नाहीत पण म्हणून ८०% च्या भावनाना मुद्डमून डावललं गेलं तो तराजू परत मध्ये आणला तर काय बिघडले आणि १० वर्षे भाजप सरकार जे करते ते फक्त हिंडून साठी हा खोटा प्रचार आहे ... कोणता कायदा आहे कि ज्यात तुम्ही अल्पसंख्यांक म्हणून तुम्हाला एखादी सरकारी ओशट मिळणार नाही पण तो गोष्ट ८०% न्या सहज देऊ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ए भौ अमरेंद्र बाहुबली लै झाला तुझा बाष्कळपणा ऑस्ट्रेल्यात खड्डे आहेत छान छान हॅगिंदाऱ्या आहेत .. यायचं बघायला ?

In reply to by चौकस२१२

जर थोडी बहुत गुगल करून माहिती घेतली असती तर असला बिनबुडाचा प्रतिसाद दिला नसता. दहा वर्षात त्यापूर्वीच्या तीस-पस्तीस वर्षात जेवढ्या नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत त्यापेक्षा जास्त दहा वर्षात निर्मित झाल्या आहेत १ . रेल्वे कोच निर्मिती 2004 ते 14 फक्त 7000. 2014 ते 23 - 40000. साडे पाच पट. २. नवीन रेल्वे लाईन पूर्वीच्या३० वर्षांपेक्षा जास्त. ३. दोन्ही डीएफसी 90% पूर्ण झाले आणि इथे किमान एक लक्ष पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे पॅसेंजर गाड्या मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. ४. पूर्वीच्या 23 हजार किमी विद्युतीकरण जागे 26000 किमी विद्युतीकरण दहा वर्षात. ५. शेकडो रेल्वे स्थानकाचे नवीन करण झाले साफसफाईसाठी लाखाच्या वर व्यक्तींची नियुक्ती केल्या केली सर्व कोचेस बाय टॉयलेट झाले घाण रूळवर पडणे बंद झाले आज एकही बिना मनुष्याचे रेल्वे क्रॉसिंग नाही. ६. आज दरवर्षी चार हजार जास्त किसान रेल्वे चालतात त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतो. फक्त रेल्वेने लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वीज उत्पादन. १७० टक्के वाढले. आज गावात अकरा तास ऐवजी वीस तासांच्या वरती उपलब्ध आहे. गावांमध्ये रोजगार वाढला. वीज निर्मितीत ही रोजगार दीडपट वाढला असेल. ७. मोबाईल उत्पादन 18 कोटींपासून चार लक्ष कोटींच्या वर केले अर्थात वीस पट रोजगार इथेच निर्मित झाला. ७. महामार्गांची निर्मिती पूर्वीच्या 70 वर्षांपेक्षा जास्त झाली. ८. वाढत्या मेट्रो नेटवर्क ने २ लाखाच्या वर ई रिक्षा फक्त दिल्लीत चालतात. ९. फायबर केबल अडीच हजार किलोमीटर जागी पाच लक्ष किलोमीटरच्या वर टाकल्या गेले ज्यामुळे कारोना काळात भारतात उत्तराखंडच्या दुर्गंध भागातूनही वर्क फॉर होम होताना मी स्वतः डोळ्याने बघितले आहे. जगातील अधिकांश नेटवर्क बेस रोजगार भारताकडे वळला. ९. अधिक लिहीत नाही गुगल करून आकडे पहा तर तुम्हाला कळेल मध उत्पादन असो की मत्स्य उत्पादन दूध उत्पादन असो की अन्न उत्पादन सर्व क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त प्रगती झाली आहे. मेडिकल कॉलेज AIIMS सर्वांची संख्या वाढली. एवढे असूनही तुम्हाला नोकऱ्या दिसत नाही हे आश्चर्य आहे. देशातील सर्वोच्च स्तरांच्या सुरक्षा अधिकारी सोबत काम केल्यामुळे एवढे निश्चित सांगू शकतो २०१४ पूर्वी चीनने आपल्या भूभागावर कब्जे केले आहे त्यानंतर एक इंच ही कब्जा केला नाही. काही परत मिळवली असेल हे वेगळे. ६० कोटी नवीन बँक खाते, खात्यात सब्सिडी upi, त्यामूळे मुद्रा लोन सहित विभिन्न स्कीम मध्ये २० कोटींच्या वर छोट्या लोकांना कर्ज मिळाले. कोट्यावधी रोजगार निर्मित झाला. उत्तर देत गेलो तर एक मोठा लेख होईल. स्वतः ल शिक्षित म्हणाविणार्यानी प्रतिसाद देण्यापूर्वी तथ्य तपासावे पाहिजे.बाकी तुमच्या प्रतिसादाचा धग्याशी संबंध नाही.

In reply to by विवेकपटाईत

धन्यवाद विवेक. प्रश्न पडतो की ही एवढे काम झाले आहे तर 'घटना बदलणे/हिंदु मुस्लिम वाद्/मंगळ्सूत्रे' ह्या विषयावर निवडणुकीत चर्चा का? ते सॅम पित्रोदा काहीतरी वाह्यात बोलले की त्याची एवढी चर्चा? नितिन गडकरी/अश्विनी वैष्ण्व/जयशंकर अशा अनेक मंत्र्यांच्या खात्यांनी चांगली कामे केली आहेत. हे नेते ह्यावर बोलत का नाहीत? गडकरी गेले ५ वर्षे अनेक परिषदांमध्ये दिसायचे."भारतात सर्वात जास्त सिमेंट माझे मंत्रालय विकत घेते. अमुक लाख लोकांना रोजगार मिळालाय.." वगैरे सांगायचे. हे सर्व आता सांगत का नाहीत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

या मंत्रालयांच्या कामाची लिटमस चाचणी आपोआप होतीय. बेतालपणे भांडवली गुंतवणूक करुन नेत्रदिपक प्रगती तर कोणत्याही सरकारांना करता आली असती. पण भांडवली गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी जर प्रमाणबाहेरचा दीर्घ असेल तर सरकारच्या इतर योजनांवर त्याचा वाईट परिणाम दिसायला लागतो. आरोग्य आणि शिक्षणावरील किरकोळ तरतूद आणि कर्जाचा वाढता बोजा या गोष्टी आताच दिसायला लागल्या आहेत. संरक्षणाच्या बाबतीत प्रदीर्घ युद्ध छेडण्याची क्षमता नसल्यामुळे केवळ पाकिस्तानला बेटकुळी दाखवण्यापलीकडे भारत काही करू शकत नाही असे दिसतंय. वंदे भारतच्या चाहत्यांची फेसबुकवर तुफान धुलाई होतीय. सामान्य वेगाने जाणारी वंदे भारत दिसते आणि नया भारतवाल्यांचा बीपी इकडे वाढतोय असे मिम्स फिरतायत. पण सामान्य रेल्वे प्रवास अतिशय उबग येईल इतका घाणेरडा आणि त्रासदायक झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या कुठल्यातरी भारतातीलच परिषदांमधल्या डरकाळ्या ऐकून भक्तांना हर्षवायू होत असतो. अशी मग्रूरीची भाषा ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वापरू शकत नाहीत आणि महुआ मोईतरा तसेच राहुल गांधींची बडतर्फी, महाराष्ट्रातील सरकार पडतांना न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे. बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का ते.

In reply to by सर टोबी

न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने भीक घालणं कधीच सोडून दिलंय. त्रुदो सारख्या भिकारड्या ला भीक घालत नाहीच. अमेरिकेने पनून बद्दल भरपूर आरडाओरडा केलाय पण पुढे काय झालं? काही नाही त्यांनी आपण S -४०० क्षेपणास्त्र प्रणाली घेऊ नये म्हणून catsaa ची धमकी दिली त्यांना भीक न घालता भारताने दोन बॅटरी (एक अपकिस्तान आणि एक चीनविरुद्ध) उभ्या केल्या सुद्धा रशिया कडून तेल घ्यायचं नाही म्हणून युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने सांगितलं त्यांना भारताने फाटा मारला यानि आज आपल्या गरजेच्या ४० % तेल आपण रशिया कडून घेतोय. युरोपीय देशांना स्वच्छ शब्दात सांगितलं तुम्ही आपलं तेल आणि नैसर्गिक वायू रशिया कडून घेणं बंद करा आणि मग आम्हाला सांगा. चीनच्या नाकावर टिच्चून फिलिपाइन्स ला ब्राह्मोस क्षेपणास्त्रे विकत दिली. व्हिएतनामशी बोलणी चालू आहेत. पाकिस्तानला तर असंच कुणीही विचारत नाही. अरब देशांना फाट्यावर मारून भारताने इस्रायल ला दारुगोळा विकला आहे. https://thewire.in/government/govt-owned-munitions-india-ltd-exported-o… दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका त्यांना फुकट कोव्हीड लशी देऊन त्यांच्यवर उपकार करुन ठेवला आहे . आता कुठला आंतरराष्ट्रीय समुदाय राहिला फुकटचा बागुलबुवा कसला उभा करताय?

In reply to by सर टोबी

बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम मि आज पर्यंत पाहिला नाही! कोणि कितिहि पुरावे दिले तरि तुम्हि मोदिद्वेश आणि नेहरु गांधी घराण्याची चाटुगिरि करणे सोडनार नाही!! त्यामुळे राहुदे!!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

. लोल! कंट्रोल आणि सभ्यतेच्या बाता तुम्हि मारताय?? उठाले रे बाबा,, मेरेको नही रे इस.... :)

प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद.मुद्दा मध्यम वर्ग कमी मतदान करतो हा आहे. कुणाला करतो हा नाही. राजनीतिक प्रतिसाद देण्याची गरज नव्हती. कारण हा धागा राजनीतिक नाही.

अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय. डू आय डी असल्याने सन्माननीय सदस्यांनी ह्या आयडी कडे दुर्लक्ष करावे.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे?
२०१४ साली स्मार्ट सिटीज, २०१४ साली सर्वात जास्त ६६% मतदान झाले होते. मीडिया/विश्लेषक ह्यांना मध्यमवर्गाला ठोकुन काढायची जुनी सवय आहे.श्रीमंत लोक सरकार/मीडिया सर्वानाच फाट्यावर मारतात तर गरीब वर्ग कधी जातीचा आधार तर कधी रोकड्/बीयर/बिरियाणीचा आधार घेउन मतदान करतो. त्यामुळे संपादकीय/विशेष लेख वाचणे हे सुशि़क्षित मध्यमवर्ग करत असल्याने त्यालाच ठोकुन काढतात. वीशीतील्/तीशीतील अनेकानी ह्यावेळी उत्साहाने मतदान केले आहे असे ऐकले.

सुशिक्षीत/उत्तम आर्थीक स्थितीतले लोकं मतदानाबद्दल उदासीन का असतात हा मूळ प्रश्न मोदि हिंदुविरोधी कसे आहेत या प्रश्नावर येऊन ठेपला. बाकी काहि बदल झाला असेल नसेल.. मिपा ने आपला स्वभाव काहि सोडला नाहि :) चांगलं आहे. वेगाने बदलणार्‍या जगात एकतरी व्यवस्था आपलं स्वत्व टिकवुन आहे.

गेल्यावेळपेक्षा मतदानाची टक्केवारी थोडी घसरल्याने अनेक 'सेक्युलर' पत्रकारांना आनंद झालेला दिसतोय. कारण मतदान जास्त झाले तर भाजपा सत्तेवर येणार असा हिशोब अनेक तज्ञांनी हयाआधी वर्तवला होता. दुसरीकडे भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाउंचे विश्लेषण मलाही आवडते पण त्यांचे विश्लेषण हे दिवाणखान्यातले विश्लेषण वाटते. कपट्,कारस्थान्,टोला, त्या टोल्याचा अन्वयार्थ.. असे विश्लेषण असते. भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते. अर्थात सेक्युलर पत्रकारांचे विश्लेषण फार वेगळे नसते. भारतातील प्रत्येक समस्येला मोदी/शहाच जबाब्दार असतात. २ कोटी नोकर्या द्या.. म्हणणार्याना पानाची टपरीपण चालवता येइल की नाही ह्याची शंका आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अधिक वैचारिक आणि तात्विक वगैरे कधी वाटला नव्हताच. पण चुकून माकून सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही दहा वर्षाच्या अनागोंदी नंतरही कट्टर भाजपेयी असाल असं वाटलं नव्हतं. असो. अजून एका आयडीकडे दुर्लक्ष करायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाऊ तोसरेकर आणी पत्रकार?? खो खो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>>भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते. सामान्य मतदार अपेक्षा, होणारी कामे यासाठी नगरसेवक, ग्रामसेवक, जीपसदस्य यांच्याकडे जातो. सामान्य मतदाराला अर्थव्यवस्था कशाशी खातात याचे काही देणे घेणे नसते नोक-यांसाठी आमदार जवळचा वाटतो. खासदार नक्की काय करतो हे बहुतांश खासदारांनाच माहित नसते तर सामान्य मतदारांची काय कथा !! तरीही लोकशाही झिंदाबाद !! चेहरा यासाठीच लागतो. मुद्दे निष्प्रभ असतात. चेहरा चालत असतो. मोदींचा चेहरा जनतेला आश्वासक का वाटतो याचा विरोधकांनी विचार करावा. पण विचार करता येणे ही एक अवघड कला आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर,
त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.
नेमक्या याच कारणामुळे ते मर्मग्राही असते. उगीच फापटपसारा नसतो. थेट मतदाराच्या डोक्यात काय चाललंय याची झलक असते. -नाठाळ नठ्या