Skip to main content

भारताच्या तुलनेत

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 29/12/2022 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचने 50164
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

मस्त चर्चा चालु आहे. (की धुरळा उडतो आहे.) --- एक गोष्ट् कोणी लिहीली नाही, भारतामध्ये गेल्या काही वर्षात आंतरजाल खुप वेगवान झाले आहे.

In reply to by Trump

+१ इंटरनेट आणि स्मार्टफोन चा प्रसार हि मागील काही वर्षातील भारतातील जमेची बाजू आहे. सुदैवाने भारत सरकारने लुडबुड करायच्या आधीच हा प्रसार वेगाने झाल्याने लोकांच्या नशिबी जागतिक दर्जाच्या सेवा आल्या नाहीतर इथे सुद्धा अवस्था सरकार निर्मित रस्त्याप्रमाणे झाली असती. दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतात एकूण विमानतळाची संख्या वाढत आहे. मागील १० वर्षांत साधारण १०० नवीन विमान तळ पूर्ण तरी झाले आहेत किंवा बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत.

१. भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. २. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता ३. याच शिकलेलया,सुसंस्कृत लोकांनी होमी भाभा यांचा विमान अपघात घडऊन आणला. कारगील हल्लाच्यावेळी भारताला जि. पी. एस. चे इनपुट द्यायला नकार दिला. इराक देशाला बर्बाद केले. लिबियाचा गडाफीला मारले. ४. करोनाच्या काळात भारताने इतर देशांना केलेली मदतही आपण विसरलात का? इतर देशांचा नागरिकांची अफगाण, कुवेत, युक्रेनमधुन सुखरुप सुटका केली. तरीही भारतीय असंस्कृत? तूम्ही मिसळपाव वर लिहिण्यापेक्षा लोकसत्ता महाराष्ट टाइम्समधे लिहा. जास्त समर्थक मिळतील.

In reply to by अर्जुन

> याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. पाश्चात्य देशांना सद्गुणी मी म्हटले नाही. तेथील राहणीमानाचा दर्जा भारताच्या कैक पटीने चांगला आहे हे निर्विवाद सत्य मी मांडले आहे. तुम्ही सुद्धा ते मान्य करत आहात. पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ज्या प्रमाणे भारतातील मागासलेले लोक आपल्या खराब स्थितीसाठी मनुस्मुर्ती किंवा सवर्णांना आयुष्यभर दोष देत असतात त्याच प्रकारे मागासलेले देश आपल्या नालायक पणा साठी इतिहासाला दोष देत असतात. इतर देशांची समृद्धता भारताला लुटून आली नाही. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आणि अली असली तरी मागील ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. >तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता भारतीय लोक भारत सोडल्यानंतरच इतके यशस्वी बनतात. ७०% भारतीयांना अजून सुद्धा ठीक पणे लिहिता वाचता येत नाही. हे सत्य आहे. भारताची अर्थ व्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे ह्यांत छाती बडविण्यासारखे काहीही नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होता. दर माणसी दुर्ष्टीने पाहिल्यास भारत अजून जगांतील सर्वांत दरिद्री लोकांपैकी आहे आहे. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि संपत्ती जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.

In reply to by साहना

पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ब्रिटिशांनी भारतातून नेलेली संपत्ती ४५ ट्रीलीयन डालर्स इतकी आहे. भारताची अर्थव्यवस्था १९४७ मधे ३.४७ ट्रीलीयन डालर्स इतकी होती. आता जर तरीही तुम्ही पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. असे म्हणत असाल तर तुम्ही मुद्दाम गैरसमज पसरवत आहात असे नाईलाजाने म्हणावे लागेल. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आपले विचार ईंग्रजांना माहित नव्हते, म्हणून ते १५० वर्ष भारतात निचोडत होते. ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. ७० वर्षांत भारतांत दारिद्र्य पसरलं, हे तुम्हाला कोणी सांगितले? स्वातंत्राचावेळी भारतात ८०% जनता गरीब व १९६६ मधे दारिद्र्य रेषेखाली होते, ते २०२२ मधे १६.४% आहेत [ संदर्भ :Global Multidimensional Poverty Index 202] भारताब द्द्ल जर खरी माहीती नसेल तर विचारा, इथे नक्कीच मिळेल. पण कॄपया चूकीची पसरऊ नका आणि तोपर्यत भारतीयांनी काय करायला हवे? हा आपला बहु मोल सल्ला आपल्या जवळच ठेवावा. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि बारामती फवार जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे. तसेच आपण सोनिआ गांधी, बारामती फवार यांच्याप्र माणेच ट्रंप तात्यांच्या उत्पन्नाचे शोध घ्यावेत.

In reply to by अर्जुन

पुन्हा तोच मुद्दा. आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. जर भारत सामर्थ्यशाली आणि श्रीमंत विश्वगुरू होता तर मग इतक्या दूरवरून बोटीने येऊन गरीब, असुंस्कृत आणि असामर्थ्यशाली इंग्रजांनी २०० वर्षे देशाला गुलाम विश्वगू कसे बरे बनवले ? उद्या आम्ही आणि तुम्ही मिळून अंबानी आणि अडाणीला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरेल का ? आणि हे मुद्दे मान्य केले तरी मागील ७० वर्षांतील भारताची अधोगती इंग्रजांवर लादली जाऊ शकत नाही. १९४८ साली भारत विश्वगुरू नसला तरी आशियागुरु होता, भरतीय लोकांच्या नेतृत्वाखाली काही दशकांतच भारत आशियागुरु वरून आशियागु वर जाऊन पोचला. हाच दरम्यान जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, चीन इत्यादी देश युद्धांत उध्वस्त होऊन सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत झाले. २०२२ भारतांत सर्वांत मोठे डेव्हलोपमेंट चे मुद्दे आहेत रस्ते जे छोट्या पावसांत वाहून जात नाहीत, पूल जे उद्धघाटनाच्या वेळीच पडत नाहीत, संडास, वेळेवर धावणाऱ्या (संथ गतीने का असेना) ट्रेन्स, प्राथमिक शाळेंत ऍडमिशन, हे बहुतेक विषय इतर जगाने १००-१५० वर्षे आधीच सोडवले होते. भारतीय समाज माणसात साधारण १९९० च्या दशकांत आला. ह्याला मुख्य कारण होते जागतिक बँकेने भारत सरकारची मग्रुरी तोडून त्यांना जबरदस्तीने आर्थिक सुधारणा करण्यास भाग पाडले. श्रेय नरसिम्ह राव किंवा मौन सिंग घेत असले तरी ह्याचे प्रमुख कारण जागतिक बँक आणि पाश्चात्य राष्ट्रे होती. ह्या सुधारणांना आता लोक चांगले म्हणत असले तरी त्या काळी संपूर्ण समाज "देश विकायला काढला आहे" असे म्हणून शिव्या देत होता. कारण समाज आणि त्याची मानसिकताच मुळांत मागासलेली होती. मोदी सरकार कडून रिफॉर्म्स ३.० ची अपेक्षा होती पण तिथे सुद्धा तीच मागासलेली विचारसरणी नडत आहे आणि कदाचित त्याच मुळे मोदी ह्यांनी आर्थिक सुधारणांचा नाद सोडून आपली सत्ता कशी मजबूत होत राहील ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ९० मधील सुधारणा झाल्या नसत्या तर भारताची स्थिती आणखीन खराब झाली असती.

In reply to by साहना

आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. हे आकडे माझे नाही आहेत. हे आंतरराष्टीय आकडेवारीतून घेतले आहेत. आता ती आकडेवारी निरर्थक वाटत असेल तर तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. ईस्रो, रेल्वे , आय टी. मधे भारताने केलेली प्रगती व भारताच्या प्रगतीमधे पाश्चमाश्त देशांनी आणलेली विघ्न(उदा. क्रायोजेनिक ईंजिन मिळू न देणे, पाकिस्तानला शस्त्र देणे, शास्त्रन्यांचा हत्या, देशविरोधी आंदोलनाना आर्थिक व नैतिक पाठींबा ईत्यादी) दिसत नाहीत.

In reply to by अर्जुन

श्री साहना यांनी अतिशय सरसटीकरण चालु केले आहे. :(
तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते.
बर्‍याच अंशी नक्कीच

In reply to by अर्जुन

तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. डिजीटायझेशन. भाजी विकणारा,गाडी धुणारा,पान विकणारा असे छोटे व्यवसायीक सुद्धा गुगल पे अथवा अन्य कॅशलेस ट्रॅजेक्शन करता आहेत. सारथी सारख्या संकेतस्थळावर जाऊन आर टी ओ ची कित्येक, किंबहुना सर्वच कामे दलाला शिवाय व भ्रष्टाचारा शिवाय करू शकतो. पत्ता. झोमॅटो,स्वीगी,आमेझाॅन सारख्या होम डिलीव्हरी देणाऱ्या, कमी शिक्षण घेतलेल्या मुलांना बरोबर घरचे पत्ते कसे सापडतात हो याचा कुणी विचार केलाय का! अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे देऊ शकतो. डिजीटायझेशन प्रगतीपथावर आहे, विकासातले अडथळे दुर होतायतं. समाज बदलतोय यात शंकाच नाही. कितीही प्रगतीपथावर समाज असला तरी तो परिपूर्ण कधीच होत नसतो. या देशात काय चांगले काय वाईट,काय कमी काय जास्त,काय चुक काय बरोबर याची माहीती इथल्या जनतेला आहे व त्यावर विचार करण्यास इथले लोक समर्थ आहेत. हे कसं, आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !

In reply to by कर्नलतपस्वी

धाग्याचा मूळ विषय हा लोक देश का सोडून जात आहेत हा होता. त्यामुळे देशांतील कमतरता ह्या स्वाभाविक पणे चर्चिल्या जाणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर देश सोडून जाण्यांत भारतीय लोक नंबर एक आहेत. भारताचे जवळ जवळ १% लोक देशाच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा अत्यंत अवाढव्य आहे. त्याशिवाय देश सोडून जाणे हि गोष्ट फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही. बहुतेक श्रीमंत लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहेच (अंबानी परिवाराचा नातू अमेरिकेत जन्माला येऊन तिथला नागरिक झाला आहे) पण मध्यमवर्गीय आणि गरीब लोक सुद्धा विविध देशांत वेगाने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे देशांतील कमतरता हि छोटी नसून खूप मोठी आहे आहे संपूर्ण समाजाला भेडसावणारी आहे हे लक्षांत येते. कमतरता मान्य केल्याशिवाय त्यांत सुधारणा शक्य नाही. देशांत काहीच चांगल्या गोष्टी नाहीत असे म्हटले नाही. असतील, अनेक असतील पण त्या पुरेश्या नाहीत लोक लोकांचा जो लोंढा बाहेर जात आहे त्यावरून सिद्ध होते. अजून सुद्धा साधारण माध्यम उत्पन देशांचा राहणीमानाचा स्तर भारतीय राहणीमानाच्या स्तरापेक्षा चांगला आहे.

बाकी सर्वांचे जे ओळखीचे  लोक अमेरिकेत/  विदेशात जातात ते सर्व देशप्रेमी / सरळ साधे / गोड गोड / संसारी  सतत देशाच्या नावे उमाळे काढणारे कसे असतात? भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?   माझे कोण ना कोणी ओळखीचे  अमेरिकेत गेली 30-32 वर्षे जातोय  यातले काही थोडे जण अमेरिकन अय्याश झाले आहेत म्हंजे सुपर बाईक , बोटी , गाड्या , बंदूक , जुगार , गांजा ( मारणे आणि उगवणे), फिरणे, लिव्ह इन असले भारतात न परवडणारे किंवा मान्यता नसलेले छंद असलेले आहेत . बहुतेक मराठी आहेत खास करून सुपर बाईक / हाय परफॉर्मन्स गाड्या तिकडे थोड्या चांगल्या पगारात परवडतात. आणि त्या चालवायला चांगले रस्ते पण आहेत . डूकाटी  आणि हार्ले ठेवणारे लोक आहेत . मस्टँग अमेरिकेत किती ला आहे ? भारतात ती एखाद करोड ला होती  पिस्तूल / बंदूक भारतात छंद  म्हणून ठेवणे अशक्य आहे. आणि त्याचा दारुगोळा सहज मिळत नाही . भारतात  ३-४ गन  / पिस्तूल लायसन्स वर ठेवणे  अशक्य आहे . आणि त्याची किंमत पण फार होईल .  अमेरिकेत जॅक डॅनिअल किंवा जिम बीम ची बाटली किती ला मिळते ? तेथील पगाराच्या मानाने ? भारतात किती सहजपणे त्या लेव्हल ची बाटली परवडते ? नेहमी चांगल्या पब मध्ये जाणे कितीसे परवडते ? जुगार हा भारतात accepted छंद आहे का ? गांजा भारतात बंदी घातली आहे . अमेरिकेत काही स्टेट मध्ये कायदेशीर रित्या मर्यादेत गांजा उगवू हि शकतो . बाकी भारतात सामान्य executive  पगारात घड्याळे , लक्झरी  किती परवडते ? म्हणजे मी भारतात काय लाखांची घड्याळे असतात त्या बद्दल विचारतोय  बहुतेक सर्व व्यवस्थित पैसा कमावणारे बरेचसे संसारी , मुले बाळे असलेले आहेत,काहींनी मुले न होण्याचा कॉल घेतला आहे.   विदेशात व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे  आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात -  घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही  तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही. ओळखीच्या मुली घटस्फोट होऊन परत लग्न केलेल्या आहेत. एकीचे दोन होऊन, बराच काळ लिव्ह इन मध्ये राहून ती त्या बरोबर संसारात आहे - किती जणांसाठी हे सहज शक्य आहे ? याची पण तरुण पिढीला भुरळ पडत नसेल ?

In reply to by रानरेडा

> भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ? भरपूर आहेत. ज्यांना छंदासाठी वेळ सुद्धा भारतात मिळाला नसता अश्या लोकांना इतर देशांत छंदासाठी वेळ मिळतो. बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. त्याशिवाय मी इथे शिकार आणि मासे पकडायला सुद्धा जाते. धनुष्यबाणाने नि बंदुकीने आम्ही इथे शिकार करू शकतो. पण ह्या शिवाय असंख्य छंद जोपासले जाऊ शकतात. वाईन टेस्टिंग हा एक छान छंद आहे $३ पासून $३००० पर्यंत च्या अनेक आंतराष्ट्रीय वाईन्स आपण इथे पिऊ शकतो. ज्यांना इतर दारूची आवड आहेत त्यांना सुद्धा हजारो प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इथे लोव किंवा होम डीपोट मध्ये प्रत्येक प्रकारचे घर निर्मितीचे सामान मिळते. त्यामुळे अनेक लोक लाकूड काम, लेसर कटिंग, इपॉक्सी , ३D प्रिंटिंग हे छंद जोपासतात. जगांतील कुठल्याही प्रकारची कुसिन्स इथे मिळतात. बलोच, चिनी उईघुर, नेपाळी, इथिओपियन इत्यादी देशांची रेस्टोरंटस मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला मिळतात. काही लोकांना भटकंती हवी असते. गाडीच्या फक्त एक टॅंक पेट्रोल वर तुम्ही खूप काही पाहू शकतात, ५० पेक्षा महा मोठे नॅशनल पार्क्स, लक्षावधी छोटे पार्क्स किमान अमेरिकेत उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारच्या संधी उपलबध आहेत. हे सर्व छंद इथे साध्या पगारावर सहज जोपासले जाऊ शकतात. तुम्हाला एखादा छंद असला कि ताबतोब तुम्ही समविचारी लोकांशी मैत्री सुद्धा करू शकता. त्यामुळे आपोआप आपले नेटवर्क सुद्धा बनते. ह्याच व्यक्ती देशांत असत्या तर संपूर्ण दिवस ट्राफिक मध्ये आणि सुट्ट्या नको त्या चिंता काढण्यात गेल्या असतंया. छंदाशी निगडित कुठलीही गोष्ट १००% टॅक्स भरल्याशिवाय मिळाली नसती.

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? असे होते का ? कि हे मूळ लेखकाचे तर्कट ? असे कितीसे लोक आहेत जे रिटायर झाल्यावर भारतात आलेत ? साधारण ६० -६५ वय पकडले तर ते लोक १९६३ - १९५८ साली जन्मले असतील . साधारण पंचविशीत १९८८ - १९८३ ला असतील त्या काळात कितीसे भारतीय विदेशात जात होते ? त्यातले किती परत आलेत ? का आलेत ? काही माहिती नसताना मूळ धागाकर्त्याने पुडी सोडली आहे असे मला वाटते

In reply to by रानरेडा

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
ते जेव्हा भारतात येतात तेव्हा भरपुर पैसे घेउन येतात. शिवाय तिकडे कमवत असताना पैसे पाठवतात ते वरती दिलेलेच आहे.

In reply to by रानरेडा

म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
आखाती देशात गेलेले बहुतांशी सगळे परत आलेत. पाशात्य देशातील साधारतः २० टक्के लोक परत आलेत. (अनुभवावरुन, कृपया विदा मागु नये.)

In reply to by रानरेडा

असे म्हातारपणी परत येणारे लोक 5 टक्के तरी असतील का याबद्दल शंका आहे. यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही.

In reply to by रानरेडा

माझ्या माहितीची एक श्रीमंत अमेरिकन व्यक्ती डिमेन्शिया झाल्याने भारतांत परत आली. दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक होती आणि त्यांनी वडिलांची जबाबदारी घ्यायची पूर्ण इच्छा दाखवली होती पण वडिलांचा इगो मोठा होता. त्यामुळे ते साधारण ५० वर्षे अमेरिकेत घालविल्या नंतर भारतांत परत आले. हल्लीच त्यांच्या बँकेने मुलांना पात्र पाठवले कि ह्यांचे चेक्स बाऊन्स होत आहेत, काही तरी करा. तेंव्हा मुलांनी बँक स्टेटमेंट पहिले तर बहुतेक पैसा गायब. तर काय स्थानिक काही संस्था आणि बँक मॅनेजर ह्यांनी साटेलोटे करून व्यक्तीच्या कमकुवत मनाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे विविध संघटनांना डोनेशन म्हणून उकळले.

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते? भारतातले राहणीमान दरिद्री आहे, भारतात दरिद्री लोक राहतात, भारतातल्या लोकांची लायकी नाही वगैरे विधानांबद्दल वाद होता. शिवाय आपण कुठे जन्माला आलो यावर आपले नियंत्रण नसते वगैरे विधानांमध्ये उगाचच अहंकाराचा दर्प दिसला. म्हणून माझा आक्षेप होता पण आता वरचे प्रतिसाद वाचल्यानंतर माझे काहीच म्हणणे नाही.

संपादित.  व्यक्तिगत टीका टाळावी.
-व्यवस्थापन


In reply to by अप्पा जोगळेकर

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?
अगदी बरोबर. पाशात्य लोक कितीही एकमेकांबरोबर भाडले तरी ते नेहमी अपाशात्याविरोधात एकमेकांना मदत करतात.

लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरमसाठ भरकटली आहे आणि काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी परत ट्रॅकवर आणू इच्छितो. या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे. १. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण बर्‍याच लोकांना हे काहीतर क्षुल्लक आणि फुटकळ फॅड वाटू शकते. परंतु हा प्रॉब्लेम भारताने सोडवल्यास तो हजारो/लाखो कोटी रुपये वाचवू शकतो. काही तज्ञांच्या मते हा प्रॉब्लेम बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा मोठा आहे. युरोपियनराष्ट्रांनी हा प्रश्न केव्हास धसास लावला आहे. आणि त्याचे फायदे प्रगत युरोपात प्रत्यक्ष राहिलेल्या लोकांना सहज लक्षात येऊ शकतील. कोणत्याही घराचा/वास्तूचा पत्ता हा तीन गोष्टींनी अचूक सांगता येतो. प्रशासनाच्या कोणत्याही पातळीवर हा पत्ता बदलत नाही. म्हणजे गावपातळीवर, जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर. १. रस्त्याचे नाव २. घराचा नंबर ३. पिन कोड भारतात पत्ता हा प्रकार केवळ मूर्खपणा आहे इतके आपण मागास आहोत. उदाहरणार्थ - मला जर एखाद्या कंपनीचा पत्ता सांगायचा असेल तर जवळच्या चौकाचे नाव, कॉलनीचे नाव, अमुक झाड, तमुक ओढा, पेट्रोलपंप, हागणदार्‍या मुतार्‍या, समोर, उभे, आडवे, सेक्टर, गल्ल्या, ब्लॉक, टेकड्या, चतुर्थीचा चंद्र अगदी वाट्टेल ते सांगावे किंवा लिहावे लागते. ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले. नाहीतर आपली मजाच होती. काही लोक महसूलविभागांचे सर्वे नंबर्स सुद्धा पत्त्यात टाकतात. शिवाय बेंगलोर मध्ये क्रॉस आणि लेन्स अस्तात, पुण्यात रोड आणि रस्ते नाहीतर संकल्पना असे लिहिलेले चु*या नगरसेवकांचे बोर्ड, रोज बदलणारी चौकांची नावे म्हणजे काहीही प्रमाणीकरण नाही. विशेषम्हणजे हे सिस्टीममध्ये मोजमापात नाही असे नाही. सर्वे नंबर, गावाच्या हद्दी, जमिनींचे प्रकार आणि झोन्स हे सगळे ठरलेले आणि व्यवस्थित रुजलेले आहे. महसूलीरचना मला वाटते राज्य आणि राष्ट्र या दोन्ही सूचींत येते. तरीही आपण याचा गांभीर्याने विचार करत नाही. आता प्रत्येक नगरपालिकांनी घरांना नंबर्स दिलेले आहेत, घरपट्टीचा नंबरही रंगवलेला असतो. तरीही आपल्याला ही व्यवस्था बसवता आली नाही हे आपले खूप मोठे अपयश आहे. याचे फायदे अनेक आणि काहीवेळा तर मुलभूत आहेत. उदा. युरोपियन राष्ट्रांत प्रत्येक घरकुलाला टीव्ही/रेडिओ टॅक्स द्यावा(च) लागतो. तो थोडा थोडका नसतो. काही राष्ट्रांत यातून फारशी सुटका नसते. घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, खाजगी खर्च, युटीलिटी, सगळे सगळे काही पत्त्याशी गुंतलेले असते. आप्ल्या आधारकार्डावर एक पत्ता, मतदानकार्डावर तिसराच, पॅनकार्डावर चौथाच, आणि बँकेत आठवाच असला गाढवपणा सर्रास दिसतो. यातून सार्वजनिक पैशाचा किती अपव्यय होतो हे कुणीतरी शोधायला पाहिजे. (सर्व आजीमाजी नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, 'इथे हे या चु*याचे घर आहे' असे सार्वजनिक पैशातून चांगले लोखंडी बोर्डस लावलेले आहेत. प्रत्येक सरकारी गोष्टीच्या नावाखाली 'संकल्पना - अमुक चु*या' असे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या पैशातून लिहिले जाते. याचा हिशोब काढला तर तोच कोट्यवधी रुपयांचा असेल. याचा फायदा शून्य.) असो. २. फ्लेक्सबंदी - भारतातून सक्तीची फ्लेक्सबंदी करायला हवी. कुठल्याही संस्थेला यातून मिळणार्‍या उत्त्पन्नाची गरज नाहीए. त्याऐवजी उत्पन्नाचे दुसरे चांगले मार्ग शोधावेत. बिलबोर्डासाठी मोठ्या रस्त्यांशिवाय कुठेही परवानगी मिळायला नको. ३. भाषाविषयक धोरणे - भारताने त्रिभाषा सूत्र नावाचा जो अडाणीपणा चालवला आहे तो ताबडतोब बंद करायला हवा. राज्यभाषा आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा. इतर राज्यभाषा, परदेशी भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असायला पाहिजेत. ज्या राज्यांची राज्यभाषा प्रमाण हिंदी असेल ते शिकवतील हिंदी तिथल्या मुलांना. बाकीच्या मुलांना, त्यांच्या पालकांना इच्छा असेल तर हिंदी/इंडोनेशियन/थाई ऐच्छिक म्हणून शिकतील. शिवाय आजकाल बोलीभाषांना एक उगीचच अवास्तव महत्त्व आले आहे त्याचे कौतुक तेवढ्यापुरते तेव्हढे ठेवावे. राज्यभाषांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे. मुलांवर भाषांचा मारा जितका कमी करता येईल तितका तो केला पाहिजे. प्रत्येक महत्वाचा सरकारी कागद उदा. जन्म दाखला हे कमीतकमी दोन भाषांत (राज्यभाषा आणि इंग्रजी) दिला गेलाच पाहिजे. भाषाशिक्षणाचे प्रमाणीकरण केले पाहिजे. ४. कागदपत्रांचे प्रमाणीकरण - वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांचे देशपातळीवर प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. जन्मदाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, लग्नाची नोंद, प्रॉपर्टीची कागदपत्रे इत्यादी इत्यादी.. आधी प्रमाणीकरण, मग आपसूक येते ते डिजीट्लीकरण.. ती कमीतकमी दोन भाषांमध्ये एकाचवेळी देणे बंधनकारक केले पाहिजे. ५. भारतीय पर्यटनस्थळे : भारत पर्यटनात खूप मोठी मजल मारू शकतो आणि भरपूर कमवूदेखील शकतो. काही पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची असावित. म्हणजे तिथली पायाभूत सुविधांची कलाकुसर, सोयी, ट्रान्स्पोर्ट हे परदेशी नागरिकांना मानवेल असे ठेवावे. उदा. अजिंठा वेरुळ लेणी, बदामीचा परिसर. काही पर्यटनस्थळे ही देशी-परदेशी दोन्ही लोकांच्या दृष्टीने विकसित करावीत. उदा. रायगड. दुसर्‍या प्रकारची भारतीय पर्यटनस्थळे भारतीय पुरातत्व विभाग नावाच्या तुरुंगातून ताबडतोब मोकळी करून राज्यांना विकसित करायला द्यायला हवीत. तिथे नाममात्र फी न ठेवता भरपूर फी ठेवावी. उदा. बदामी लेणी आणि किल्यांसाठी किमान ५०० रुपये आणि १० डॉलर्स प्रतिमाणशी इतका तरी दर पाहिजे. पन्नास भंगार लोक तिथे जाण्याऐवजी दहा शहाणी माणसे पैसे मोजून जातील. सर्वसामान्यांना परवडत नाही वगैरे गळे काढू नयेत. सर्वसामान्य माणूस खंडोबाला जाऊन हजारेक रुपये सहज उधळून येतो. ६. आधार सगळीकडे - सर्व ठिकाणी आधार सक्तीचे करावे. लग्नाच्या नोंदी, कुटुंबाच्या नोंदी, इत्यादी इत्यादी सगळीकडे. सरकारने कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाला न जुमानता आधार लिंकिंग राबवले पाहिजे. स्वस्त धान्य वगैरे आधार शिवाय अजिबात मिळाले नाही पाहिजे. त्यासाठी दर किमान ५००० लोकसंख्येमागे एक या हिशोबाने सरकारी आधार केंद्रे सुरु करायला पाहिजेत. मतदान, बँक, इतर सरकारी आस्थापने, दवाखाने इथे सगळीकडे आधार सक्तीचेच पाहिजे. भ्रष्टाचाराची खूप मोठी कुरणे आधारसक्तीने बंद होतील. ७. महत्त्वाच्या संस्थांचे 'आयआय'करण/ नवीन क्षेत्रांमध्ये अशा संस्था स्थापणे - सरकारने काही महत्त्वाच्या संस्थांना 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स' चा दर्जा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तर अशा दर्जाची संस्था हवी आहे. काही उत्तम संस्थांचे सरकारने आय. आय. करण करून त्यांचा दर्जा किमान एखाद्या आयायटी इतका केला पाहिजे. शिवाय त्यांची स्वायत्तता अबाधित ठेवून किमान दर्जा राखण्यासाठी काहीतरी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवून दिला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये सरकारने अशा संस्था काढून भरपूर आर्थिक अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. उदा. प्रत्येक राज्यात एकतरी एफटीआयआय च्या दर्जाची संस्था हवी. प्रत्येक दहा जिल्ह्यांमागे एक आय आय टी, प्रत्येक जिल्ह्यात एक एन आय टी, प्रत्येक राज्यात किमान तीन स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सारखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अशा प्रकारची काहीतरी योजना करावी. मला खालील प्रकारच्या संस्था/संस्थांचे प्रमाणीकरण पाहायला खूप म्हणजे खूप आवडेल - १. इंडियन इन्टिट्यूट्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस/म्युझिक/फिल्म/मेडिया २. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लॉ ३. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिसिन ४. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉमर्स/इकॉनॉमिक्स/ट्रेड ५. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ फॅशन ६. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्सेस/हुमॅनिटिज ७. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर ८. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लँग्वेजेस/आर्ट्स/लिटरेचर ९. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्पोर्ट्स १०. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ पॉलिसी/गव्हर्नन्स ११. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ डिफेन्स १२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ बेसिक अँड नॅचरल सायन्सेस इत्यादी इत्यादी व इतर विवक्षित संस्था उदा. बँकिंग व इन्शुरन्स ८. रेल्वे सामायिक सूचीत - रेल्वे ही केंद्रीय सूचीतून काढून ती सामायिक करावी. प्रत्येक राज्याला रेल्वेमार्ग बांधण्याचा, रेल्वेसेवा चालवण्याचा पुरेपूर हक्क पाहिजे. १०. पब्लिक हेल्थ इन्शुरन्स - ना नफा ना तोटा तत्वावर एल आय सी सारख्या पब्लिक हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या सरकारने काढाव्यात. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा केला पाहिजे. तो सावर्जनिक असो वा खाजगी. कदाचित हे अवघड जाईल सुरुवातीला, पण या अंगाने कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ११. धार्मिक स्थळांवर कर - सगळ्या सार्वजनिक आणि खाजगी धार्मिक स्थळांवर वेगळी कर आकारणी झाली पाहिजे. ट्रस्ट शिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाला मंजूरी मिळाली नाही पाहिजे. प्रत्येक ट्रस्टचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक केले पाहिजे. मग ते मंदीर असो, नाहीतर गुरुद्वारा, नाहीतर एखादा मठ, नाहीतर चर्च असो वा मशीद/मदरसा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नेहमीप्रमाणे मुद्देसूद प्रतिसाद आणि मांडणी. धन्यवाद. एक बारीकसे मत.
ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले.
काहीशी असहमती. पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत (सहा आकडी पिन कोड नव्हे)

In reply to by गवि

पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत
संदर्भ...? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे.. घ्या https://en.m.wikipedia.org/wiki/Postal_Index_Number The PIN system was introduced on 15 August 1972 by Shriram Bhikaji Velankar, an additional secretary in the Government of India's Ministry of Communications.

In reply to by गवि

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..
तसदीबद्दल क्षमस्व सर. आणि माहितीबद्दल आभारी आहे. आपलं मत गुगलल्याशिवाय मान्य करणार होतो. पण, दोन हजार चौदापासून 'विश्वासराव' खपले आहेत. पडताळणी करायची आणि मग मान्य करायचं. असं धोरण आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ असण्याविषयी विश्वास्राव काय म्हणतात?

In reply to by साहना

हा मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच आहे. तसेच थेट लाभार्थ बँकेत जमा होण्याची सुविधा यांचेदेखील श्रेय मनमोहन सरकारला आहे. माझ्या मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरापेक्षा ज्याचे श्रेय त्याला मिळावे या आग्रहाखातर हा प्रतिसाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खरंय. माझ्या प्रत्येक कागदावर पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आधार, वाहन परवाना, बँक खाते१, बँक खाते२ प्रत्येक ठिकाणी एकच पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. + डिलीव्हरीसाठी कितीही व्यवस्थित पत्ता लिहिला, तरी प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं. शेवटी तो चुकीच्या जागी पोचतो, मग तिथे जाऊन घ्यावं लागतं. याचा उपमुद्दा - पत्ता बदलल्यास तो एका कागदावर (उदा. आधार) बदलल्यास सगळीकडे आपोआप जायला हवा. आधारवर बदला, मग निवडणूक पत्र बदला, मग दोन तीन बँकांत आणि इतर दोन खात्यात बदला, मग गॅस कंपनीत बदला.

In reply to by तुषार काळभोर

मी IIT मुंबईत होते तेंव्हा कुणालाही पत्ता द्यायचा म्हणजे दिव्य होते. अगदी फ्लिपकार्ट सुद्दा "लँडमार्क" सांगा म्हणायचे. वोडाफोन ने "लँडमार्क" नाही म्हणून दोन वेळा माझे पोस्टपेड कनेक्शन कापले. मग कुणीतरी लँडमार्क मध्ये JVLR असे लिहा असे सांगितले. (IIT बाहेरच्या रोड चे नाव आदी शंकराचार्य मार्ग आहे पण बहुतेक लोकांना ह्याची माहिती अजिबात नाही), JVLR ह्या चा अर्थ मला आजतागायत ठाऊक नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे अरे देवा, वरील काही ओळी वाचून हर्ट झालो. बाकी विचार मुद्दे महत्वाचे आहेत. सहमती आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद.
१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण
घरात राहणार्‍या लोकांना ज्या ठिकाणी राहतो त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्याची सक्ती असावी. सध्या कोण कोठे रहातो त्याची पडताळणी कशी करावी ह्यासाठी कंपनीचे पत्र पासुन आधार कार्ड काहीही चालते. खोटा पत्ता देणे सहज शक्य आहे, त्यामुळे दिलेल्या पत्यावर विश्वास ठेवणे मुश्कील आहे. अजुन काही माझ्यातर्फे
  1. कंत्राट, दायित्व (liability): जेव्हा कोणी व्यवसायिक सल्ला देतो तेव्हा त्या व्यवसायिकाला सल्ल्याचे दायित्व असावे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
  2. सरकारी कामे वेळेत व्हावीत, दिलेल्या अर्जाची पोच मिळावी, कायदे सर्वासाठी समान असावेत. लाचखोरी बंद व्हावी. सर्वसामान्य माणासांना त्याबद्दल तक्रार करायची सोय असावी, आणि त्यांचे निवारण व्हावे.
  3. छोट्या छोट्या कंत्राटांसाठी महसुल खात्याच्या मुंद्राकाची गरज नसावी.
  4. कोणाला दिलेले पैसे सहज वसुल करता यावेत. छोट्या छोट्या कामासाठी वकील, न्यायालयाची गरज नसावी.
  5. मुलांना लहान पणापासुन शिस्त पालन महत्व असावे.
  6. छोटे कायदेभंग करणार्‍या आणि अट्टल न झालेल्या लोकासाठी आर्थिक दंडाबरोबर, सक्तीची समाजसेवा (उ. मंदीरापुढे चपला साफ करणे, संडास साफ करणे, रस्ते साफ करणे इ.) असावी.
  7. मोठे तुरुंग बांधावेत. बरेचदा रस्त्यावर मुले, माणसे कायद्याचे पालन करत नाहीत. जेव्हा त्यांना योग्य त्या संधी देऊन त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना तुरुंगात ठेवावे. त्यांच्या कडुन शारिरीक श्रम करुन ठेऊन रस्ते तयार करणे, तलाव बांधणे अशी समाजउपयोगी कामे करुन घ्यावीत (मला माहिती आहे की हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो.)
  8. समाज, छपाई, दुरचित्रवाणी माध्यमावर दायित्व कायदा असावा. विनाकारण चरित्रहनन करणार्‍याविरोधात कडक कायदे असावेत.
  9. कोणत्याही कामासाठी राज्याच्या राजधानीत जायची गरज पडु नये, कामे तालुक्यात, कमीत कमी जिल्ह्यातच व्हावीत.
  10. ग्रामिण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारावे. काच, धातु, प्लॅस्टीक, ओला कचरा, इतर कचरा वेगवेगळा व्हावा.
  11. ध्वनीप्रदुषण थांबावे. धर्म, जात, पंथ, जयंत्या, पुण्यतिथ्या इ. खाजगी गोष्टी व्हाव्यात. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते अडवणुक बंद व्हावी
  12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
  13. बास आता. :)

In reply to by Trump

12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
100% agreement

In reply to by Trump

भारतातील प्रदुषणाबद्दल अजुन कोणी लिहीले नाही. -उत्तर भारतातील बहुतेक भुभागावर आणि इतर भारतातील मोठ्या शहरामध्ये वायुप्रदुषण भयंकर आहे.

In reply to by Trump

ऑस्टेलियात पंतप्रधानाला घरच्या हिरवळीवरुन बाजुला जायला सांगितले. असे कधी भारतात दिसु शकेल का? साधा नगरसेवक झाला की लोकांना इतका रुबाब वाटतो की बघायला नको. तसेही भारतातील मंत्री, अधिकारी जनतेचे सेवक कमी आणि मालक जास्तच वाटतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

पत्त्यासंबंधी थोडी जाहिरात धागा. आता तर हे पद्धत वापरणे खूप सोपे झाले आहे. गुगल मॅप वर पण प्लस कोड दिसतो

सर्वसामान्य लोकांना अजुन एक भेडसवणारी अडचण -- रस्तोरस्ती असलेले भटकी कुत्री, गुरे, पक्षी इत्यादी. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

देशांतील लोकांवर प्रेम नसते तर विषयावर लिहून मी वेळ वाया घालविला नसता. मी भारत देशाला घाणेरडा, भिकार आणि मागासलेला असे जे म्हटले आहे ते देशाचा किंवा तेथील लोकांचा अपमान करायच्या हेतून म्हटले नाही. फक्त वस्तुस्थिती विशद केली आहे. लठ्ठ महिलेला तुम्ही सडपातळ म्हटले म्हणून तिचे ४ पौंड वजन कमी होत नाही. देशांत कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे ह्यांत अजिबात शंका नाही आणि त्याला जोड म्हणजे लोकांत स्वच्छते विषयी नसलेले प्रेम. सर्व भारतीय सार्वजनिक ठिकाणे अत्यंत घाण आहेत ह्यांत शंका नाही. विविध समुद्र किनारे, चित्रपट गृहे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी कचरा आहेच पण गांवात सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो, ऐपत असलेले लोक सुद्धा मुद्दाम उघड्यावर शौच करतात आणि सर्व ठिकाणी पण खाऊन थुंकून ठेवतात. देशावर प्रचंड प्रेम असलेला माणूस सुद्धा ह्या गोष्ट नाकारू शकत नाही. ह्याला घाणेरडा म्हटले तर त्यांत चुकले काय ? भिकार शब्द प्रयोग सुद्धा वस्तुस्थिती विशद करण्यासाठीच वापरला आहे. देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते. हि भीक नाही तर काय आहे ? आणि मागासलेला हे विशेषण तर जवळजवळ ऑफिशिअल आहे. ह्यासाठी वेगळे पुरावे देण्याची सुद्धा गरज नाही. विकसित देशांत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या इथे आम्हाला धडपडून सुद्धा मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मूळ मुद्दा म्हणजे जो पर्यंत देशांत काय कमी आहे ह्या गोष्टी लोक प्रांजळ पणे मान्य करत नाहीत तो पर्यंत त्यांत सुधारणा होणे शक्य नाही. मोदी ह्यांनी संडास ह्या विषयवार इतकी भाषणे दिली कि त्याच्यावर टीका झाली होती कि पंतप्रधानांनी अश्या विषयवार बोलणे योग्य आहे का ? पण ते बोलले म्हणून थोडाफार तरी बदल आला कि नाही ? स्वच्छ भारत स्कीम बहुतांशी फोटो=ओप म्हणू न वापरली गेली तरी थोडा बदल तरी समाजांत दिसून येतो कि नाही ?

In reply to by साहना

देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते.
कुठ्ल्या काळातले सांगताय तुम्ही? आज भारतातली १००% जनता GST च्या रुपाने कर भरत आहे. ह्याला रस्त्यावरचा भिकारीही अपवाद नाहीये! हा पण सर्वसामान्य जनतेकडुन गोळा होणारा कराचा पैसा जेव्हा सरकार नको त्या ठिकाणी खर्च करते ते मात्र नक्कीच खटकते, जसे कि युक्रेन युद्धामुळे तिथे स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना फुकटात देशात परत आणणे वगैरे वगैरे...

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत. याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो? गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.

In reply to by श्वेता२४

होय पण धाग्याचा मूळ विषय लोक सोडून का जात आहेत हा आहे. सोडून जाण्यात काय धोके असतील हा नाही.

In reply to by श्वेता२४

तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे वाट्टेल ते ??? हा तुमचा ( कदाचित भारतातील रहिवासी आणि तेथील या संदर्भात ) विचार पाश्चिमात्य देशात बरीच कामे हलकी समजली जात नाहीत ... त्यामुळे वाट्टेल ते वैगरे फक्त तुमच्या पुरते उलट मी अ रे म्हणेन कि भारतातात हि "वाट्टेल ती कामे " लोक करायला लागली तर बरेच, विशेष करून विद्यार्थी असताना कमवणे / बचत करणे ,,, इत्यादी असो मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे हो करू शकतात ना नाही कोण म्हणतंय ? पण "चांगलं" म्हणजे नक्की काय .. कार्यालयात भारतात काय आणि पाश्चिमात्य देशात काय संख्याच दर्जाचे काम कराल हो पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मग हे तत्व वापरलं तर शहरातून खेड्यातच राह्यला पाहिजे ! जमेल ???

In reply to by चौकस२१२

पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते. माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?

मुळात भारताची तुलना लगेच अमेरिकेशी किंवा युरोपियन राष्ट्रांशी करणे चुकीचे आहे. हा आपले ध्येय मात्र त्यांच्यासारखे पुढारलेले बनणे असले पाहिजे. फार फारतर आपण दहा वर्षां पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्यांची तुलना करायला पाहिजे.खरतरं एखाद्या देशासाठी १० वर्षं हा काळ सुद्धा अतिशय कमी आहे. पण एका दशकात आपली दिशातरी योग्य आहे का याचे निपक्ष विश्लेषण तज्ज्ञांकडून व्हायला पाहिजे.

ज्याप्रमाणे भारतीय लोक भारताबाहेर दीर्घ मुदतीच्या वास्तव्यास सर्रास जातात तसे भारतात दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यास लोक येत असतील का ? असल्यास कोणत्या देशातून (नेपाळ व बांग्लादेशातून येतात, पण त्या खेरीज ) ? त्यांचे भारतात स्थायिक होण्याचे कारण / प्रेरणा काय असाव्यात ?

In reply to by तर्कवादी

बांगलादेशी, नेपाळ, भूतान, श्री लंका, नायजेरिया काही अरब राष्ट्रे इत्यादी देशांतून लोक कायदेशीर किंवा बेकायदेशीर पणे भारतांत वास्तव्य करतात. अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत. स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम हि तीन राष्ट्रे सध्या पाश्चात्य देशांत देश सोडून जाण्यासाठी महत्वाची आहेत. व्हिएतनाम मध्ये तुम्हाला खूप कमी पैश्यांच्या गेटेड अमेरिकन कम्युनिटी मिळते. पोर्तुगाल अँड स्पेन चे हवामान खूप चांगले आहे आणि राहणीमान उच्च असल्याने अनेक लोक तिथे निवृत्त होऊन जातात.

In reply to by साहना

नायजेरियन, अफगाणी, बांगडे, पाकडे वास्तव्य संपल्यानंतरही परत जात नाहीत व भारत सरकार काहीही करत नाही. अनेक नायजेरियन, अफगाणी अंमली पदार्थ विकतात. वास्तव्य किंवा अंमली पदार्थ व्यापारावरून त्यांना पोलिस पकडायला गेले की ते झुंडीने हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात. २०१० च्या दशकात अदनान सामीने बराच आयकर भरला नव्हता व वास्तव्य परवाना संपल्यानंतरही आरामात मुंबईत रहात होता. इतर देशात अश्या व्यक्तीला तुरुंगात टाकून नंतर हाकलून दिले असते व नंतर भारताबाहेर हाकलून परत कधीही भारतात येण्यासाठी आयुष्यभराची बंदी घातली असती. परंतु भारत सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तश्या परिस्थितीतही त्याच्या वास्तव्य परवान्याची मुदत वाढवून दिली व नंतर या गुन्हेगाराला काहीही शिक्षा न करता चक्क नागरिकत्व देऊन टाकले. Nigerian mob attack cops बनाना रिपब्लिक ही संज्ञा भारतावरूनच निर्माण झाली असावी.

In reply to by श्रीगुरुजी

चक्क नागरिकत्व
नुसते नागरिकत्व नाही. २०१६ ला त्याला नागरिकत्व दिले गेले आणि २०२० ला तर चक्क पदमश्री बहाल करण्यात आली. हे खरे बनाना(और लोगोंको बनाना भी) रिपब्लिक. त्याचे वडील अर्शद सामीखान जे मुळचे काश्मीरी आणि पख्तू सांगतात ते पाकिस्तानी एअरफोर्समध्ये पायलट आणि नंतर राजदूत वगौइरे असले तरी अदनान चा जन्म, शिक्शण ब्रिटिश होते. नंतर तो कॅनडा स्थायीक होता.

In reply to by सुरिया

भारत २०१४ पूर्वी बनाना रिपब्लिक होता व २०१४ नंतरही बऱ्याच प्रमाणात तसाच आहे. मुख्य फरक पडलाय तो परराष्ट्र संबंध आणि लष्करी प्रतिसादात. पाकिस्तान किंवा चीनने आगळीक केली तर भारत फक्त तोंडी निषेध करायचा. आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. तसेच मलेशिया, टर्की वगैरेंनी भारताविरुद्ध काहीही केले तरी भारत लगेच त्यांच्या नाड्या आवळतो. परंतु इतर विषयात अजूनही सुधारणा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२०१४ नंतर आणखी एक फरक पडलाय. २०१४ पूर्वी कल्याणकारी योजनांवर सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातील फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहचायचे. २०१४ नंतर लाभार्थींपर्यंत जास्त पैसे पोहोचायला लागले आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे मी भारताच्या भविष्याबाबत आशावादी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

> आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. हे सुद्धा फक्त प्रसिद्धी मिळवण्याची थोतांड असू शकते. लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. भारताने कतार पुढे जे लोटांगण घातले आणि एका तथाकथित गुअस्वलाने हिंदू महिला नुपूर शर्मा हिचे आयुष्य सरेआम उध्वस्त केले त्यावरून परराष्ट्र धोरण ह्यांत सुद्धा बोलबच्चन पणा जास्त आहे असे वाटते. सत्य कळायला अजून अवकाश आहे.

In reply to by साहना

लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. तुमचा भारतातील लष्करा वर विश्वास नसेल आणि परराष्ट्र धोरणा विषयी संशय वाटत असेल तर तूम्ही भारत आणि भारतीयांना दोष देण्यासाठीच मिपावर येता असे वाटते. क्रुपया आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यात [नावे ठेवण्या त ] आपण आपला[व आमचा] बहूमुल्य वेळ वाया घालवू नये ही मनापासुन विनंती.

In reply to by साहना

अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.
धन्यवाद. पण नोकरी/व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशी नागरिक भारतात किती प्रमाणात वास्तव्यास असतील ? जसे अमेरिकेतील गुगल, मायक्रोसॉफ्ट , नासा ई मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वा इतर देशांतले परदेशी (अमेरिकन नसलेले) नागरिक नोकरीस आहेत त्याप्रमाणे भारतात अशी कुठली आस्थापने आहेत का जिथे परदेशी लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत ? भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ? म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?

In reply to by तर्कवादी

भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?
शिक्षणव्यवस्थेपेक्षा यशस्वी व्हायला कायदे व्यवस्था सक्षम लागते. उदा. कोणत्याही गोष्टीसाठी अनुत्पादक वेळ/खर्च आणि उत्पादक खर्च्/वेळ अश्या दोन गोष्टी लागतात. अनुत्पादक वेळ/खर्च वाढल्याने उत्पादन वाढत नाही, पण तो न केल्यास उत्पादन करतायेत नाही, उदा. सरकारी परवानग्या, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, मालवाहतुकीला केलेला खर्च, व्याजाचा दर, कर्जाची सहज उपलब्धता, मनुष्यबळ, निकोप स्पर्धा इ.इ. भारतामध्ये ह्या कामाचा खर्च खुप आहे. शिक्षण घेताना ह्या गोष्टी फार आड येत नाहीत, आणि भारतातुन परदेशात गेलेल्या लोकांना कष्ट करण्याशिवाय कोणताय पर्याय नसतो, आणि परत जाउन भारतात करायचे काय हा प्रश्न असतो.

In reply to by तर्कवादी

ह्याचे उत्तर जास्त खोलांत जाऊन द्यावे लागेल पण सध्या थोडक्यांत सांगते. लोकांचे यशस्वी होणे शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. इतरांनी नोंद केल्या प्रमाणे कायद्याचे राज्य, योग्य प्रकारे काम करणारी कोर्ट व्यवस्था, सुधृढ फायनान्स व्यवस्था, आपल्या मालमत्तेचे रक्षण व्यवस्थित होणे, सरकार दरबारी कामे व्यवस्थित आणि वेळेत होणे इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागासलेल्या देशांत ह्या मूलभूत कमतरता असल्याने सर्वच लोकांना संधी कमी उपलब्ध असतात. शिक्षण (आणि व्यवसाय अनुभव, स्किल इत्यादी) एखाद्या multiplier प्रमाणे काम करतात. आता एखादी मुलगी समाजा काहीही ट्रेनिंग नसतात भारतात सलून मध्ये थ्रेडींग चे काम करते तर कदाचित ती महिन्याला ५००० कमावते तीच मुलगी प्रगत देशांत घेतल्यास साधारण $३००० डॉलर्स कमावेल. त्याच मुलीने समजा ब्युटिशियन कोर्स वगैरे केला तर भारतातील सलून मध्ये ती २०,००० कमावेल तर इतर देशांत कदाचित $५०००. भारत देशांत राहून जर पत उंचावण्याची असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण उच्च शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही विदेशांत जाऊन जास्त कमावू शकता (शिक्षण नसले तरी). हे वाचा https://deeshaa.org/2016/04/05/a-misplaced-sense-of-pride/

In reply to by तर्कवादी

> म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ? पाश्चात्य जगाची प्रमुख समस्या म्हणजे एकूण सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अमेरिकेत सध्या दर वर्षी १० - २५ लाख लोक कायदेशीर मार्गाने येतात तर १०-३० लाख लोक बेकायदेशीर मार्गाने येतात आणि इतके असून सुद्धा देशांत प्रचंड प्रमाणात नोकर्या खाली आहेत. कानडा, फ्रांस आणि जर्मनी ह्यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. कॅनडा ने तर मागील वर्षी रिकॉर्ड नंबरच्या विदेशी लोकांना आपले नागरिकत्व दिले. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेने कितीही सुशिक्षित लोक निर्माण केले तरी अर्थव्यवस्था वाढून त्या सर्व लोकांना कवेंत घेते. ह्यांत आश्चर्य नाही आणि ह्या विषयावर मी मिसळ पाव वर खूप विस्ताराने लिहिले होते असे आठवते. लोक आणि अर्थव्यवस्था ह्यांचे फीडबॅक लूप असते. जगांत जितके जास्त लोक तितक्याच वेगाने समाज प्रगती करतो आणि जितक्या वेगाने समाज प्रगती करतो तितक्याच वेगाने आणखीन लोकांची गरज भासू लागते. पण त्या लेव्हल ला पोचायला समाजाच्या काही मूलभूत समस्या सोडवाव्या लागतात. भारत अजून त्या स्तराला पोचला नाही. पण काही क्षेत्रांत उदाहरणार्थ IT मध्ये हा इफेक्त्त तुम्ही पाहू शकता.

एखादे मूल अमेरिकन भूमीवर जन्माला आले तर त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते का? म्हणजे, एक भारतीय गरोदर स्त्री आठव्या महिन्यात अमेरिकेला गेली आणि तिथे महिना-दोन महिने राहून तिने आपल्या बाळाला जन्म दिला तर त्या नवजात अर्भकाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते का?

In reply to by वामन देशमुख

हो. पण भारताबाहेर गर्भधारणा झाल्याने व ती महिला अमेरिकन नागरिक नसल्याने विमा कंपन्या बाळंतपणाचा, औषधांचा, उपचारांचा, बाळंतपणानंतर लागणाऱ्या उपचार व औषधांचा खर्च देणार नाही. तो संपूर्ण खर्च स्वतःलाच करावा लागेल व तो खर्च प्रचंड असेल.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी - विमा कंपन्यांनी कव्हर करण्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. व्हिसावर आले असतील आणि अशा स्त्रीचा किंवा तिच्या नवर्‍याच्या नोकरीतून विमा असेल (सहसा असतोच) तर त्यातून कव्हरेज मिळेल. एखादी स्त्री फिरायला म्हणून आली, विमा नाही आणि परतही गेली नाही तर तुम्ही म्हणता तसे स्वखर्चाने करावे लागेल. पण त्यातही "ड्यू" असलेल्या स्त्रीला कोणी इमरजन्सी सर्व्हिस नाकारेल असे वाटत नाही. एरव्ही रीतसर डिलीव्हरीकरता कोणत्या रूग्णालयात नाव नोंदवायला गेली तर तेथे हा खर्च कोण करणार हे नक्की विचारतील. त्याशिवाय बहुधा नोंद करू देणार नाही. इमर्जन्सी वगळता.

In reply to by श्रीगुरुजी

हे विमा करारावर अवलंबून आहे. बर्थ पर्यटन हि एक गोष्ट असून साधारण १५,००० मध्ये C सेक्शन करून दिले जाते.

In reply to by वामन देशमुख

कायदेशीर किचकट कीती आहे ते माहीत नाही. परंतु अमेरिकन भुमी वर जन्म झाला तर आपोआप नागरीकत्व भेटते.

In reply to by वामन देशमुख

अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन पासपोर्ट बनतो. पूर्ण नागरिकत्व. इतकेच नव्हे तर नाममात्र तिकडे जन्म झालेल्या आणि लहानपणापासून भारतात परत येऊन इथेच वाढलेल्या लोकांना मोठे झाल्यावरही अमेरिकन एम्बसीचे फोन येताना पाहिले आहेत. म्हणजे भारतात काहीतरी unrest किंवा तंग परिस्थिती झाली होती, तेव्हा तुम्ही ताबडतोब सुखरूप अमेरिकेत परत या,. आणि अमेरिकन नागरिकांसाठी खबरदारीच्या गाईडलाईन्स वगैरे. माझ्या मते १८ वर्षे वय झाल्यावर मनुष्य याबाबत फायनल ठरवू शकतो. पण कोणीही ते नागरिकत्व रद्द केल्याचे ऐकिवात नाही, अपेक्षित देखील नाही.

In reply to by वामन देशमुख

पूर्वीच्या अनुभवांवरून त्यासंदर्भातले बरेच नियम आता बदलण्यात आल्याचे मागे वाचले होते. गरोदर स्त्रीचा गर्भधारणाकाळ आणि अंदाजित प्रसूतीची वेळ (EDD) विषयक प्रसूतीतज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र व्हिसा आणि विमानप्रवास अशा दोन्ही गोष्टींसाठी अनिवार्य आहे (त्या आधारे व्हिसा आणि विमानप्रवास पैकि एक किंवा दोन्ही नाकरले जाउ शकते) तसेच आणखिनही काही तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

In reply to by टर्मीनेटर

> मुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. किमान अमेरिकेच्या बाबतीत हे पूर्णतः खोटे आहे असे सांगू शकते. birth सिटिझनशिप हा अमेरिकेत घटनात्मक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट्स च्याखूप जुन्या निवाड्याप्रमाणे आई देशांत कशी आली ह्यावर अवलंबून नाही. माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही विजा किंवा विमान तिकीटा साठी आपण गरोदर आहोत किंवा नाहीत हे सांगण्याची गरज नाही. विमान कंपन्या बहुतेक करून ८+ महिन्याच्या गरोदर स्त्रियांना विमानांत प्रवेश देत नाहीत पण ते सुद्धा स्टाफ वर अवलंबून आहे. कॅनडा मध्ये तर भारतीय विद्यार्थी मुलींना गरोदर असल्यास भत्ता सुद्धा मिळतो त्यामुळे अनेक पंजाबी मुली गरोदर होतंच कॅनडात विद्यार्थी म्हणून जातात.