मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?

चित्रगुप्त ·

पहले रचा प्रारब्ध, पिछे रचा शरीर तुलसी क्यूं चिंता करे भज ले श्री रघुवीर || विषय गहन आहे. पक्षीदर्शन करता निघालोय,रुमाल टाकून ठेवतो. मी पयला.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 12/02/2024 - 22:50
पहले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर ... म्हणजे मनुष्य (देह) जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या जीवनात क्षणोक्षणी काय घडणार, हे 'लिहून' ठेवले आहे ... असे आहे तर मग कशाबद्दलच कोणताही प्रश्नच उरत नाही. -- मला स्वतःला हे मान्य करण्याइतपत अनुभव आलेले आहेत.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 06/03/2024 - 14:58
नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते.
मानवी बुद्धीच्या पलिकडे जाऊन जेव्हा भारतीय प्रज्ञालोकातील माहिती ज्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर आणि अनेक विचारक ज्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात ते वाचून व्यक्तिच्या जन्माच्या आधीच त्याचे, माता पिता, पत्नी /पतीची नावे जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे तमिळ भाषेतील ताडपट्ट्यावरील नोंद करण्याची त्यांची क्षमता याचा अभ्यास केला की देवाची लीला, करणी ही अगाध आहे. याचा प्रत्यय येतो.

In reply to by स्वधर्म

शशिकांत ओक 06/03/2024 - 20:06
नाडी ग्रंथ भविष्य - चक्रावून टाकणारा चमत्कार पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यातील मला आणि इतरांना आलेले अनुभव आणि घटना काही वर्षांपूर्वी मिपावर सादर केलेल्या होत्या. आहेत. शिवाय इथे https://alkaoaksebookshoppy.online/ आता यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मराठीत ई बुक्स उपलब्ध आहेत.

आपल्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात म्हणून 'याच जन्मात चुकांचे फळ मिळते' असं मानणे सोयीस्कर आहे, आणि आयुष्यात काही संकट आले, कसलीतरी शिक्षा भोगतोय असे वाटले आणि काय चुका केल्या ते आठवत नसेल तर 'मागच्या जन्मीच्या चुकांचे फळ' आहे असं मानणे सोयीस्कर आहे :)

In reply to by श्वेता व्यास

चित्रगुप्त 12/02/2024 - 22:58
तुम्ही प्रतिसादात मांडलेला विचार एकदम सोयिस्कर आहे. 'आपल्या बर्‍या-वाईट कर्मांची फळं आपल्याला याच जन्मी मिळणार' हा विचार (आणि धाक सुद्धा) मनुष्याला औचित्यपूर्ण कर्मे करण्यासाठी आणि अनुचित कर्मे करण्यापासून रोखण्यासाठी प्रेरित करणारा ठरतो, हे खरे.

गवि 12/02/2024 - 10:27
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते. किमान तेवढे टाळले तरी इतरांवर उपकार होतील. तशी तर आपल्या अनेक चुकांची फळेही आपल्याला बहुतांश वेळा लवकरच मिळत असतातच, पण आपल्याला ती कळतच नाहीत. आपले मन आपल्याला खाते, त्यापासून सुटका कधीच नसते. कारण आपल्या आतच तो न्यायाधीश असतो.. त्याला आपण किती काळ दाबून ठेवू शकता यावर आपले पॅरोलचे दिवस ठरतात. पुढचा जन्म, मागचा जन्म याबद्दल काय बोलावे? ..दिल के खुश रहेने के लिये ए गालिब...

In reply to by गवि

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:02
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते.
-- या प्रश्नाबद्दलचा एक वेगळाच आयाम या प्रतिसादातून व्यक्त झाला आहे. झकास.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:07
म्हणून लोक महाराजांच्या मागे लागतात
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे .. -- (श्री दासबोधः करंटलक्षणनिरूपण)

कॉमी 12/02/2024 - 10:51
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या हाताबाहेर असतात. माणसा माणसात न्याय ही कल्पना असते, मानवी विश्र्वासाबाहेर न्याय नावाचे काही अस्तित्वात नसते. कोणतीही कॉस्मिक स्केल अस्तित्वात नाही. पापपुण्याचा हिशोब ठेवणारा कोणताही चित्रगुप्त अस्तित्वात नाही. आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही. दरड कोसळून पूर्ण गाव बेचिराख होते, ह्यात माणसांच्या कर्मफलाचा दुरान्वये संबंध येत नाही. दरड कोसळली फिजिक्स मुळे. त्या दर्डिखली माणसे नसती तरी ती कोसळली अस्तीच. अश्या कितीतरी पॉसिबल दुर्घटना घडत असतील जिथे माणूस असता तर जीवितहानी झाली असती. खाली पापी माणूस असल्याने दरड स्वतःहून कोसळणार नाही की पुण्यवान माणूस आहे म्हणून कोसळायला थांबणार नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी दुर्घटनेमुळे जीवित हानी होते तिकडे बघून माणसाच्या कर्माचा त्या घटनांशी संबंध जोडणे हा माणसाचा ego झाला, की आपल्याभोवती जगाच्या घटना घडतात, त्यासाठी माझ्या कर्म परिपाकापुढे दुसरे काही कॉज आणि इफेक्ट नाहीच. थोडक्यात, ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही. तुमच्या वाईट कृतीचे परिणाम कदाचित तुम्हाला चावायला येतील, पण येतीलच असे नाही. तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही.

In reply to by कॉमी

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:13
आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही...... ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही...... तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही...
... अगदी. मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा यातून स्पष्ट होतात.

In reply to by कॉमी

बाजीगर 21/02/2024 - 07:48
पूर्वजन्म, पूर्वसंचित, कर्म, पापपुण्य हे सर्व माणसाच मॅन्यूपुलेटींग वाटतं मला.एखादी गोष्टं का झाली याचा तर्क देता आला नाही की द्या ठोकून मागच्या जन्मातील भोग वगैरे. दोन दिवसापूर्वी वाचले, पंढरपूरला चालले होते, गाडीचा अपघात झाला.3 मेवे.इथं सरळसरळ वाहनचालन, झोप,वेग,रस्तापरीस्थिती,वाहन परिस्थिती ही कारणं असतात.पण देवाला जातानाही त्यांचच काही चूकलं असं विचार करणारी मंडळी भेटतील. काही लोक सर्व दुराचार,अन्याय करुनही काही वाईट न होता सुखाने जगून गेली अशी ही उदाहरणे दिसतात. जगात न्याय नाही.

In reply to by बाजीगर

मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब धर्माधिकार्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना वीसेक लाख लोक जमवले होते, हा संपुर्ण राजकीय खेळ होता, मंडप टाकू शकत असूनही फक्त ज्रोन कॅमेराने गर्दीचे फोटो घेता यावेत म्हणून मंडप टाकला गेला नाही. भर एप्रीलच्या ऊन्हात लाखो लोक दुपारच्या रनरनत्या ऊन्हात एका पक्षाच्या प्रचारासाठी बसवले गेले. तिथे १०० ते १५० लोक मेलो, सरकारी आकडा नेहमीप्रमाणे कमी दाखवला गेला. पण मेलेले लोक हे नशिबवान होते कारण त्यांना अश्या महान कार्यक्रमात मृत्यू आला अश्या गोष्टी पसरवल्या गेल्या. घटनेचे दुःखं म्हणून नानासाहब धर्माधिकारी ह्या माणसाने दारापुढची रांगोळी पूसली. (किती मोठा त्याग करावा एखाद्याने)) मुर्ख लोकांना अक्कल येईल तो सुदीन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भर उन्हा़ळ्यात पुण्य संचय करणा-या लोकांची कीव आली होती. हेच म्हणुन नव्हे, अशा कितीतरी ठिकाणी मेंदू नावाच्या गोष्टींचा किंचितही वापर न करता आपलं भलं होईल या आशेने अशा मेंदुत भुसा भरलेल्या लोकांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सुदीन यावा इतकेच अपेक्षित. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे तर काहीचनाही, त्या अप्पांच्या शेतात फूकट कामाला जातात, पुण्य जमवण्यासाठी इतके भयानक मेंदू गहाण ठेवलेले लोक आहेत. अप्पांच्या दृष्टाने त्या भक्तांची किंमत किती तर मेलेल्यांना एक रूपडाडी दिला नाही किंवा सरकारलाही द्यायला नाही लावला, फक्त रांगोळी पूसून दुःखं व्यक्त केले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/02/2024 - 11:21
कोणत्याहि धाग्यात आपले पूर्वग्रह आणि राजकारण आणून धाग्याचा विचका कसा करावा हे वरील दोन्ही आय डी परत परत सिद्ध करून दाखवत असतात. का? कशासाठी ?

In reply to by सुबोध खरे

लोक कसे फसतात हे दाखवले होते. वर कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तिचा ऊल्लेख नाही. मरनार्या लोकांपेक्षा पक्षाची काळजी वाटणे चिंताजनक आहे. आणी अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 21/02/2024 - 12:11
>>>अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो. म्हणजेच ते सर्व पक्षात आहेत.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 21/02/2024 - 12:13
>>>का? कशासाठी ? असते काही जणांना समाजसेवेची आवड. शे दोनशे वर्षानि आपली आठवण काढावी लोकांनी म्हणून जसे देशमुखरानडे खस्ता खात होते त्याच पठडीतले. त्यांना प्रोत्साहन देणे सोडा... तुम्ही त्यांचे पाय ओढताय... कुठे फेडाल या कर्माची पापे.... !!!!

In reply to by सुबोध खरे

>>> का? कशासाठी ? डॉक्टर साहेब, आपला कटाक्ष आमच्या कड़े असेल तर, आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छितो की, महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. आपण जमेल तसं लोकांचे प्रबोधन केले पाहिजे, यात काही चूक आहे असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/02/2024 - 10:25
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. हो पण आपण कीर्तनाला जाऊन तमाशातील शृंगारिक लावणी कशाला बेसुरात गाताय. फडावर उभे राहा आणि गाजवा की! कर्म आणि त्याचे फळ इ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय?

In reply to by सुबोध खरे

अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या विचारसरणीला, तुमच्या आवडत्या पक्षाच्या विचारसरणीला विरोध म्हणजे खांद्याखाली बळकट असणे असते व्हय. छान छान.

In reply to by सुबोध खरे

कर्म आणि त्याचे फळ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय? कर्म आणि फळ केवळ अध्यात्मातच नसतं, आता ते तुम्हाला कळत नाही. समजत नाही त्याला आम्ही काही करू शकत नाही. कारण मेंदुत भुसा भरलेल्या टोळ्यांचा परिणाम केवळ अशिक्षित लोकांवर होत नाही तर, सुशिक्षितावरही व्हायला लागतात तेव्हा असे विचार थोपवणे हे प्रबोधानाचे कार्यआहे. भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते....' चा विचार केवळ अध्यात्मिक लोकांसाठी नाही तर, सकल मानवासाठी आलेला विचार आहे. 'अध्यात्म असो की राजकारण' फळाची अपेक्षा न करता काम करीत राहा हा संदेश अधिक महत्वाचा आहे. आता कोणते कर्म केले पाहिजेत. त्यावर कधीतरी पुढे सांगेन. आत्ता इतकं पुरे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 24/02/2024 - 10:42
सहमत आहे. आता आपणच हा प्रबोधनाचा वारसा आणि वसा पुढे चालवावा आणि चुकलेल्या मेंढरांना योग्य दिशा देऊन कळपात आणावे. सर्व मिपा, नव्हे महराष्ट नव्हे भारत नाही नाही अखिल विश्व आपल्याकडे आस लावून पहात आहे. बोला गु रुदेव प्राडॉ की जै.... आता सगळ्यांनी उभे राहून आरती म्हणावी. जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट दावू योग्य मार्ग मेंढरे हाकलती कर्माचे फळ याच जन्मी म्हणती दिसेल कुणी अभिजन चुकार वाह्यात हाणती लाथा आणि बुक्की पेकाटात जनहो तुम्ही स्विकारा हाच मार्ग तत्काळ मिळेल तुम्हा इथेच स्वर्ग जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट गुरुदेवांच्या पाया पडून देणगी माझ्याकडेच द्यावी... गुरुदेवांना जड उचलायची मनाई आहे आणि जडावर त्यांचा लोभ सुद्धा नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 21/02/2024 - 12:10
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित. तुमच्या आमच्या हयातीत येईल असे वाटत नाही. मला वाटते आता तुम्हीच पुढाकार घेऊन प्राडॉ ची झूल काढा आणि तुमची ती फेमस डबल बॅरल घेऊन फायर करा तर काही होईल. फक्त जरा भगवी कापडं अंगावर घेतलीत तर इफेक्ट फास्ट होईल... कसे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाजीगर 24/02/2024 - 06:35
त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार, पैसे (त्यांच्या भाषेत हजेरी) सभा संपल्यावर मिळणार असेल. उन लागतय हे कळतय पण हजेरी / काम न करता बसून पैसे मिळताहेत हे त्यांना इझीमनी वाटतं असणार. सनस्ट्रोक झाला, रक्तातील प्रथीन उकडून शिजलं,पण हजेरी पाहीजे म्हणून बसून राहीले, मेले. सभा न सोडण्याची चूक याच जन्मातली, शिक्षा याच जन्मात.

In reply to by बाजीगर

नाही. माझी आईपण गेली होती त्या खारघरच्या कार्यक्रमाला. तिने आपबीता सांगातली. खरं तर त्या सेकंदापर्यंत मलाही हे लोक चांगले वाटायचे. त्या दिवसानंतर अप्पांचा खरा चेहरा समोर आला, हे सर्व बंदं करायला सांगीतलं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 24/02/2024 - 10:56
तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात असा डंका सर्वत्र आहे. मग ही घटना घडायची का वाट पाहिली? आईला आधीच योग्य मार्गावर का आणले नाही? एक कुतूहल.

Bhakti 12/02/2024 - 11:32
मी आधी असाच विचार करायचे.आपल्यावर संस्कार आहेत आपण चूका करायच्या नाहीत, समजून घ्यायचं.पण हे जग इतकं प्रक्टिकल आहे की खुप थोडे बोटावर मोजता येतील एवढेच तुमच्या चुका पोटात घेतात.बाकी जग चुका न करताही किडकं फळं देऊ शकतं...मग त्यांच्याशी कसं वागायचं? एखाद्याला गंभीर काही तरी रोग होतो,ते आरोग्य हे जेनेटिक,डिसिप्लिनड असतं त्यात चुका झाल्याने. नातेसंबंध रूक्षपणाने बिघडतात.आर्थिक संकट लोभीपणा,बावळटपणा,आळशीपणा मुळं येतं.इत्यादी इत्यादी तेव्हा या जन्मात फळं वगैरे कसं काही असतं,असं वाटतं नाही. पण संस्कारांच म्हणाल तर मात्र खुप matar करतात.काही गोष्टी विसाव्या वर्षी कान पकडून सांगता येत नाही.

पाप पुण्य देखील समजावर अवलंबून असते. ऊदा. एका धर्माच्या दृष्टीने कुठलाही माणूस मारणे पाप तर दुसर्या धर्माच्या दृष्टीने आपल्या देवाला न माननारा माणूस मारला तर ते पुण्य ठरते.

प्यारे बहनो और भाईयो, आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागतात. >>>का ? कारण आपण चुका केलेल्या असतात म्हणुन. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 12/02/2024 - 15:08
लग्न झालेल्या व्यक्तीला चांगले माहीत असते या जन्माच्या कर्माचे फळे या जन्मीस भोगावे लागतात. बाकी जे आपल्या दृष्टीने ठीक, दुसऱ्याच्या दृष्टीने चूक आणि जे आपल्या दृष्टीने चूक, दुसऱ्याच्या दृष्टीने ठीक होऊ शकते.

तिमा 12/02/2024 - 16:32
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?

In reply to by तिमा

चौथा कोनाडा 12/02/2024 - 22:20
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?
पुर्वसंचित किंवा मागच्या जन्मीचं पाप. भारतीय संस्कृती फार थोर आहे .... त्यात इतक्या भन्नाट कल्पना इतकी बस ! कधी कधी वेडगळ वाटतात पण नीट तर्क लावून तपासल्या तर्क लावून तर एकदम ओके. त्यामुळे हेच लईच बेस्ट ! उगाच कारण बिरण शोधायला जात नाहीत ... डायरेक्ट "मागच्या जन्मीचं पाप / पूर्वसंचित / पत्रिकेत खोट / पत्रिकाच वाईट / वेळच वाईट / ग्रहमानच वाईट" असली शेकडो कारणं दिली की कुठल्याही सायकॉलॉजिस्टकडे जावं लागत नाही ! आहे ना भन्नाट !

In reply to by तिमा

सुबोध खरे 21/02/2024 - 12:55
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही. सोनोग्राफी करताना जन्माला न आलेल्या अर्भकाच्या पोटात असलेला कर्करोग पाहून असा विचा र येतो कि ज्या बाळाचा जन्मही झालेला नाही त्याने असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे जन्माचं अगोदरच त्याला असा भयंकर रोग झाला असावा? आणि दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत. यात कुणाचे पूर्वजन्मीचे/ या जन्मीचे पुण्य जास्त कि पाप जास्त याचा हिशेब कसा देणार? या दोन्ही टोकाच्या उदाहरणावरून असे वाटू लागते कि जर पुनर्जन्म असला तर पूर्वजन्मीचे पाप किंवा पुण्य या जन्मात आपल्याला फळ देत असावे. अर्थात गदिमा यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" म्हणजेच मृत्यू नंतर काय पुनर्जन्म आहे का याचे उत्तर संत महात्म्याना सुद्धा देता येत नाही. तेंव्हा आपण काय सांगणार? I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD, I AM JUST AWKWARD. सत्कृत्य आणि दुष्कृत्य याची व्याख्या सुद्धा नक्की करता येणार नाही. पाप आणि पुण्याचे फळ मिळेल का याच जन्मात मिळेल का ? किंवा पुनर्जन्म आहे का आणि ते फळ पुढच्या जन्मात मिळेल का? याचे कोणतेही उत्तर मला माहिती नाही. पण अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकार: पुण्य: पापाय: परपीडनं,-- महर्षी व्यास अठरा पुराणांचे सार दोन वाक्यात सांगतात -- दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे. याप्रमाणे आपला व्यवहार ठेवला कि निदान आपल्याला मानसिक शांती मिळते असा माझा अनुभव आहे. शेवटी आयुष्य म्हणजे काय? ज्याचा त्याचा अनुभवच आहे.

In reply to by सुबोध खरे

दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 22/02/2024 - 10:30
भुजबळ बुवा कुठल्याही गोष्टीत राजकारण आणून विचका करायची आपण शपथच घेतली आहे का? तसंही तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाहीच. फक्त तुम्ही अट्टाहासाने ते सिद्ध करताय एवढंच. बघा विचार करून जमतंय का? नाही तर द्या सोडून

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 10:48
बाकी काही म्हणणे नाही, पण इथे राजकारण तुम्ही आणले आहे. तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:44
कॉमी बुवा जरा प्रतिसादांच्या कालावधी कडे लक्ष दिलं असतं तर कुणाचे प्रतिसाद पहिले आलेले आपल्याला समजले असते. पण आपली कट्टर डावी विचारसरणी तसे करायला प्रतिबंध करत असावी असे वाटते. मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब 21 Feb 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली हं. 21 Feb 2024 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे कोणत्याहि धाग्यात आपले 21 Feb 2024 - 11:21 am | सुबोध खरे कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण 21 Feb 2024 - 12:55 pm | सुबोध खरे

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 11:54
इतरांनी काय लिहिले आणि कधी लिहिले ह्याचा काय संबंध ? तुम्ही एक अत्यंत प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद दिला. त्याला राजकीय उत्तर आले. मग त्यावर तुम्ही "राजकीय विचका करू नका" म्हणून तक्रार करू लागलात तर तो तुमचा दुटप्पीपणा आहे. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे किंवा बाहुबली ह्यांनी राजकीय विचका केला असा आरोप कोणावर केला नाही, तो तुम्हीच केला. तुम्हाला जर राजकीय लिहू नये असे मांडायचे होते तर तुम्ही स्वतः न लिहायचे भान ठेवायचे. ते तर तुम्हाला ठेवायचे नाही, अगदी प्रक्षोभक लिहायचे आणि वर तक्रार करायची ! बाकी काही बोलायला सुचत नसले की कडवी डावी विचारसरणी इत्यादी निरर्थक रडगाणे चालू द्या. तुमची साफ सरळ हीपॉक्रसी दाखवणे ह्यात कसलीही कडवी डावी विचारसरणी नाही.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:57
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली. कुणी पहिले लिहिलं आहे हे मी सप्रमाण दाखवलं आहे तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 12:02
धर्माधिकारी ह्यांच्या सत्काराच्या घटनेचा आणि तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही पूर्णपणे वेगळा प्रतिसाद दिला. कोण थुंकी इकडची तिकडे करते आहे सरळ दिसते आहे.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 10:55
समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात
इतके प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद लिहून वर दुसऱ्याकडे "राजकारण आणून विचका केला" म्हणून बोटे दाखवत आहात !

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:52
तुमची डावी विचारसरणी एका विशिष्ट एकांगी तर्हेने चालते म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरते ते सुद्धा श्री शरद पवार यांच्याबद्दल विचार करत आहात. ( त्यांच्या बद्दल वेगळा प्रतिसाद मी लिहिलेला असला तरीही) श्री विप्र सिंह, मुलायम सिंह,चंद्रशेखर, चरण सिंह, प्रकाश सिंह बादल, एम करुणानिधी, मणिशंकर अय्यर असे असंख्य राजकारणी भारतात आहेत त्यांनी विशिष्ट जातीची आणि धर्माची मते मिळ्वण्यासाठी काय काय केले हे जगजाहीर आहे. त्यात प्रक्षोभक काहीच नाही. त्याबद्दल लिहिले असताना केवळ द्वेषमूलक प्रतिसाद देण्यासाठी आपली संकुचित वृत्ती आपण सिद्ध करून दाखवलीत. असो बाकी भुजबळ बुवांबद्दल काही लिहिण्यात हशील नाहीच. ते अगोदर लिहितात आणि मग कधी कधी विचार करतात. त्यामुळे त्यांना बरेच मिपाकर सिरियसली घेत नाहीतच. तुम्ही पण त्यांच्या नादाला लागलात?

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 11:57
काय हास्यास्पद बचाव आहे. "माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही, कारण मी केवळ एका नेत्याला हरामखोर असा शब्द वापरला नाहीये, तर त्यासकट इतर अनेक लोकांना मी हरामखोर म्हणले आहे ! मी अनेकांना शिवी दिली असल्यामुळे, मिलोर्ड, माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही."

In reply to by कॉमी

काॅमी जाऊद्या. त्यांची चूक दाखवली की तुन्ही डावे विचारवादी (ज्याचा वास्तवीक इथे चाललेल्या चर्चेशी काहीही संबंधं नाही) अशी वयक्तिक टिका होते, ना माझ्यावरही डाॅ साहेब वयक्तिक ऊतरलेत. वास्तविक मी पवारांचा ऊल्लेख कुठेहा केला नव्हता. तरीही त्यांनी पवारांचे नाव घेतले. पण इथे लाॅजीकला तिलांजली दिली जातेय.

In reply to by सुबोध खरे

व्वा. मानलं तुम्हाला वर एका ८० वर्षीय राजकारण्यावर प्रक्षोभक लिहून आपला द्वेष प्रकट केलात ह्यावर मी ऊलटही असू शकतं इतकं लिहीलं तर मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतोय?? व्वाह. तुम्ही हुशार आहात पण मिपावरील ईतर लोक मुर्ख नाहीत.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 21/02/2024 - 17:32
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत
हे दु:खदायकच म्हणायचे !

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 20/04/2025 - 18:52
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही.
हे विधान खालीलपैकी कसे इंटरप्रीट करायचे? १. कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही पण अथक प्रयत्न केल्यावर सापडू शकतो २. हे विधान फक्त पाप पुण्य ह्या परिप्रेक्षात वाचावे, त्यापलीकडे अर्थ शोधू नये PS : कार्यकारण भाव = cause and effect ह्यावरून वरील प्रश्न पडला आहे. - (प्रश्नांकित) सोकाजी

लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
समजा एका मुलावर असे आईवडिलांनी लहानपणापासून संस्कार केले, की चोरी करणे पाप आहे. त्याने चोरी केली तर ते त्याच्यासाठी पाप असेल. समजा दुसऱ्या घरातील आईवडिलांनी मुलाला चोरी करायला शिकवलं, दरोडा टाकायला शिकवलं. हे आपण आपलं पोट भरण्यासाठी करत आहोत, आपलं पोट भरण्यासाठी आपण जे काम करतो त्यामध्ये कोणी आडवा आल्यास त्याला इजा करणे अथवा मारून टाकणे यात चुकीचं काही नाही, असे संस्कार केले. आणि त्या मुलाने चोरी अथवा खून केला, तर त्याने पाप केले का? आपण करत आहोत, ते चुकीचे आहे, हेच त्याला माहिती नाही. असा दरोडा घालून आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहोत, त्यांना सांभाळत आहोत, त्यांना सुख समाधान देत आहोत, या विचारांनी तो चोरी, दरोडे, खून करत राहिला, तर ते पुण्य आहे का? आपण कर्म करत राहायचं, ते आपलं काम आहे. ते पाप आहे की पुण्य, त्याचे काय फळ मिळेल, याचा विचार आपण नाही करायचा. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नये.

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 13/02/2024 - 21:43
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना. निसर्गचक्रात त्यांचे काहीही स्थान नाही. ब्रम्हांडाचा गाडा नियत निसर्गनियमांप्रमाणे अव्याहत चालत रहातो, त्यानुसारच मानवी जीवनातल्याही सगळ्या घटना घडत असतात . यालाच 'नियति' म्हणता येईल.

रामचंद्र 13/02/2024 - 00:07
खरं तर या जन्मात आठवूनही न सापडणारी कुठलीही दुष्कर्मे न करूनही अमर्याद दु:ख ज्यांच्या वाट्याला आलं आहे अशा कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. मग हे या जन्मीचं नाही तर मागच्या जन्मीचं पाप एवढाच तर्क लागू होतो. पण जसं चांगल्या कृत्याची अनुभूती येईलच असं नाही पण वाइटाची मात्र लगेच प्रचिती येते हा मात्र बहुतेकदा अनुभव येतोच. एकूण काय, तर कर्म आणि भोग यांची संगती लावता येत नसली तरी त्या भीतीने का होईना सरळ मार्ग अवलंबणेच इष्ट.

प्रारब्ध आणी कर्म हा लेख लिहीलाय https://misalpav.com/node/48505 कार्यकारणभाव न समजणार्‍या घटनांबद्दल गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता. झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती, स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती; सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते, एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

अहिरावण 13/02/2024 - 19:45
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का? जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का? कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 13/02/2024 - 21:59
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का?
आपले एकादे कृत्य हे काहीएक विशिष्ट संदर्भात आपण 'चूक' केली असे स्वतःला/ इतरांना वाटत असते. संदर्भ बदलले की तीच गोष्ट 'बरोबर' वाटू शकते.
जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का?
'योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याच मुळात मानवी कल्पना आहेत. (असे आम्हास वाटते)
कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?
- कोणतेही 'कर्म' घडून आले, की आणि त्याचा कोणता ना कोणता, (कधी ना कधी) 'परिणाम' हाही घडून येतच असतो. अर्थात या दोन्ही गोष्टींचा संबंध असल्याचेच दिसून येते.

टर्मीनेटर 14/02/2024 - 17:58
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
+१००० मौत को तो युहीं बदनाम करतें हैं लोग... तकलीफ तो जिंदगी देती हैं! - संत आयुषमान ठाकुर (रोनीत रॉय) चित्रपट 'बॉस'

In reply to by टर्मीनेटर

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी नुसतेच शब्दांचे बहर उधळले होते.....

राघव 22/02/2024 - 21:28
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा मला तरी बुवा काही अधिकार नाही असं वाटतं. बाकी कर्मसिद्धांता बद्दल हरिभाई ठक्कर यांचे विचार गहन आणि तर्कपूर्ण वाटले. इच्छुकांनी जरूर वाचून बघावे - लिंक

कॉमी 24/02/2024 - 11:28
कर्म आणि फळ अनेकदा ही विचारसरणी किती घातक आहे, हे लोकांच्या रडार खालून जाते. कर्मविपाक विचारसरणी अतिशय घातक आहे आणि अनेक रिग्रेसिव विचारांचा मुळाशी आहे. त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे. समजून घ्या -
  • फायनान्स मध्ये थियरी आहे, effecient market theory. तिचे तत्व आहे market discounts everything. तशीच आहे ही विचारसरणी. जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
  • तुम्ही काही त्रासातून जाताय, किंवा जन्मतः काही समजनिर्मित किंवा शारीरिक अडथळे तुमच्या मार्गात आहेत, तर ह्या गोष्टींना कारणीभूत ठरणारे संचित खरंच होते की नाही हे बघण्याची गरजच नाही, कारण की तुम्ही त्रास भोगताय ह्याचाच अर्थ तुमचे पूर्वसंचित तश्या प्रकारचे होते असा आहे.
  • Effecient market थियरी नुसार ओव्हर व्हॅल्यूड आणि अंडर व्हॅल्युड ह्या भ्रामक कल्पना आहेत. कारण जी काही व्हॅल्यूएशनशी संबंधित माहिती आहे ती "मार्केट"ने आलरेडी विचारत घेतली आहे, आणि ती माहिती चालू दरात आधीच प्रतिबिंबित होत आहे, त्यामुळे उगाच तुम्ही माथाफोडी करून fair value काढणे मूर्खपणाचे आहे, असे ही थियरी म्हणते. त्यामुळे किमतीचे बुडबुडे वैगरे काही नसतात, सगळे आलबेलच असते, असे ही थियरी म्हणते.
  • कर्मविपाक सुद्धा तसेच. तुम्हाला दिसणारे जग हे न्याय्यच आहे, कारण हे सगळे काल्पनिक संचिताचे परिणाम झालेले जग आहे.
  • जाती असोत, वर्ग असोत, सो कॉल्ड वर्ण असोत, सगळे ह्या कर्म आणि संचिताच्या मुळांवर उभे आहेत. त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.

राघव 27/02/2024 - 08:02
त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे.
हे म्हणणं जरा धारिष्ट्याचं आहे. कर्मविपाकामागील हेतू बघणे महत्त्वाचे आहे. कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल. आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.
हे पटत नाही. माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय? तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.

In reply to by राघव

कॉमी 27/02/2024 - 09:23
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल.
फक्त स्वीकृती नाही, जस्टिफिकेशन सुद्धा. तुम्ही गरीब घरात जन्माला आला. ह्यात चिडचिड करून हातात काही लागणार नाही, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत इतपर्यंत ठीक आहे. पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या काल्पनिक. एखादी गोष्ट नसल्याचा पुरावा नाही म्हणून त्या गोष्टी आहेत असे होत नाही. जोवर पुरावा मिळत नाही तोवर पूर्वसंचित काल्पनिक आहे. तुम्ही जो बेसिस मांडत आहात त्याच्यात काय खरे काय खोटे तपासण्याची काहीही सोय नाही. काहीही खरे असू शकते, पुरावा गरजेचा नाही.
माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय?
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.
द्वेष आणि तेढ कशी काय ? एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.

In reply to by कॉमी

राघव 27/02/2024 - 17:40
पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
बरं. पुर्वी लोकं असंच धरुन चालत असं गृहित धरू. ते चूक आहे असं सरळ सरळ दिसतं. मग आताही तेच करणार काय? वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना? माझं इतकंच म्हणणं आहे की कर्मविपाक बरोबर का चूक या वादात न पडता, आहे त्यातून चांगलं घडवण्याचं कर्म करणं जास्त गरजेचं आहे.
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
इतके ते सोपे नाही. पण त्यावर वाद घालून उपयोगच नाही कारण पुर्वसुकृत शोधत बसणे हेच मुळात चूक आहे.
एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.
एखाद्याचं आयुष्य चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट याचं कारण जर सांगताच येणार नसेल, तर मग ज्याच्या आयुष्य वाईट तो दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघेल तेव्हा असूया (आणि त्यातूनच पुढे उत्पन्न होऊ शकणारी तेढ) कशी येणार नाही? पुन्हा सांगतो, कोणताही सिद्धांत चूक वा बरोबर हे मांडत बसल्यानं अडचणी सुटत नाहीत. आधीच्या चुका ओळखण्यापुरतीच त्यांची गरज खरेतर, पण ते तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाहीत. भविष्य नीट होण्यासाठी भूतकाळातून शिकून वर्तमानात चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करणं हे ठीक. यापलिकडे यावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्यामुळे आता थांबतो.

In reply to by राघव

कॉमी 27/02/2024 - 21:18
वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना?
बरोबर, परिस्थिती अशी काही बदलणार नाही. पण ही थियरी कशी चुकीची आहे हे लक्षात आल्यावर जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगलाच बदलेल.

नठ्यारा 27/02/2024 - 19:58
कॉमी,
काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले.
या विधानाशी पार असहमत आहे. हे परिस्थितीचं समर्थन नाही. होऊही शकंत नाही. ते केवळ स्पष्टीकरण आहे. माझ्यावर झालेला अन्याय हा इतरांवर अन्याय करायचा परवाना नव्हे, याचं भान राखण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे. ती सोय केवळ त्याच कामासाठी वापरायला हवी. परिस्थितीच्या समर्थनासाठी तिचा वापर वर्ज्य आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 27/02/2024 - 20:18
एखादा माणूस तुरुंगात आहे. तो त्याच्या पूर्व गुन्ह्यांमुळे तुरुंगात आहे - हे विधान तो माणूस तुरुंगात असण्याला जस्टिफाय करत आहे. त्याने गुन्हा केला म्हणून तो तुरुंगात आहे हे त्या व्यक्तीच्या तुरुंगात असण्याचे समर्थन आहे. फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे. हे लॉजिक जेल बाबत चालू शकेल कारण की गुन्हा घडला आहे का, तो त्यानेच केला आहे का हे बघण्यासाठी एक व्यवस्था आपण तयार केली आहे. जर नवीन पुरावे मिळाले तर माणूस जेल मधून बाहेर पण येतो. कर्मविपाक पूर्णपणे काल्पनिक आधारावर आहे. पूर्वसंचित कर्म हेच मुळात काल्पनिक आहे त्यामुळे ते तपासण्यासाठी असलेली यंत्रणा वैगरे तर आणखी दूर.

नठ्यारा 27/02/2024 - 22:35
कॉमी,
फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे.
रोचक विधान आहे. समजा पोलिसी तपास झाल्याखेरीज न्यायालयात गुन्हा शाबीत होणारा नसेल. तर पोलिसी तपासातही संशयित गुन्हेगार आहे हे गृहीत धरूनंच तपास करावा लागतो. त्याच न्यायाने कोण्या माणसाने त्याच्यावरील ओढवलेला अनावस्था प्रसंगासाठी कर्मविपाकास गृहीत धरलं तर काय बिघडलं? कर्मविपाकास गृहीत धरून स्वस्थ बसायचं नाहीये. परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतातच. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 28/02/2024 - 06:57
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे. तुमच्या कर्मविपाक थियरी मध्ये आधी परिस्थिती येते (जजमेंट) आणि मग परिस्थिती अनुकूल संचित असणार असा उलटा निष्कर्ष काढला जातो.

In reply to by कॉमी

नठ्यारा 28/02/2024 - 19:03
अंदाज ( जजमेंट ) बांधल्याशिवाय तपास पुढे सरकू शकंत नाही. आज असंख्य लोकांना देवतांचा जप केल्याने व्यावहारिक अडचणी दूर झाल्याचे अनुभव आले आहेत. कर्मसिद्धांताशिवाय त्यांचं स्पष्टीकरण अशक्य आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 28/02/2024 - 19:24
अंदाज बांधणे वेगळे. कर्मविपाकात अंदाज बांधला जात नाही, तर जी परिस्थिती आहे तो निवाडा आहे, पूर्व कर्मांचा. बास. शब्द छळ करण्यात रस नाही. माझा मुद्दा पुरेसा क्लियर आहे. तुमची पेटंट स्टाईल आहे वाचून मनाजोगता अर्थ काढण्याची, पुढच्याला अर्थ काय अभिप्रेत आहे ह्याकडे साफ दुर्लक्ष करून.

In reply to by कॉमी

नठ्यारा 28/02/2024 - 20:36
तुम्हांस जो अर्थ अभिप्रेत आहे तो मला अभिप्रेत नाही. त्यामुळे मी देखील थांबतो. तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आभार ! :-) -ना.न.

In reply to by अहिरावण

अगदी अगदी... काल आमच्या बाबा महाराज डोंबोलीकर यांना हाच प्रश्न विचारला. बाबा महाराज म्हणाले की, उत्तम कार्य केले की उत्तम पेय मिळते. 'मुखी कुणाच्या सिंगल माल्ट.. कुणा मुखी पहिली धार." त्यामुळे हातात आलेले पेय, मुकाट प्यायचे. हाती कुठलेही पेय असो, स्वर्गसुख हे ठरलेलेच. तस्मात्, जास्त विचार न करता, आलेला क्षण आनंदाने जगा. ------ त्यामुळे आम्ही पण मध्यमवर्गीय असल्याने, बार्ली वॉटर पितो...

स्वधर्म 28/02/2024 - 17:47
धार्मिक ग्रंथातील कर्मविपाक सिध्दांत हा मानवी ज्ञानाची व आयुर्ष्याची मर्यादा लक्षात घेता पडताळून पाहता येत नाही. सबब त्याविषयी आज रोजी कोणीही काहीही बोलले तरी त्यावर ठाम विश्वास ठेवणे शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे, की त्यावरील विश्वासामुळे समाजात काय घडले व घडत आहे. वर्णाश्रम व्यवस्था टिकून रहावी, लोकांनी आपआपली विहित कर्मेच करत रहावीत व उतरंडीच्या अन्यायकारक समाजव्यवस्थेशी लढण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊच नये, यासाठी कर्मविपाक सिध्दांताचा प्रचंड उपयोग झाला. त्यामुळे हिंदू समाजाची प्रचंड हानी झाली, हे मात्र स्पष्ट आहे.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 28/02/2024 - 20:35
अन्यायकारक उतरंड हा काय प्रकार आहे ? आणि तिचा वर्णाश्रमाशी काय संबंध ? विहित कर्मे म्हणजे ज्यातून आत्म्याचं हित होतं अशी कर्मे. ती करायलाच हवीत. ती करायची नसतील तर आळशीपणा गळ्यांत पडेल. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 29/02/2024 - 21:26
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते आणि विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची आणि मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही? हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना! ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले. हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती. परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय! म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.

गवि 29/02/2024 - 08:14
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म यांनुसार प्रत्येक व्यक्तीला फळ मिळणारच असेल तर मग पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग, अटक, फाशी असल्या भानगडी निर्माण करून मनुष्य त्यात ढवळाढवळ कशाला करतोय ? ;-) कॉमी यांची मांडणी अगदी योग्य आहे. आपण जे काही करतो त्याचे शास्त्रीय परिणाम (भौतिक, रासायनिक, जैविक इ) वगळता नैतिक परिणाम किंवा दीर्घकाळ हिशोब ठेवून कोण्या नियतीने त्याचे बक्षीस अथवा शिक्षा, चालू अथवा पुढील जन्मात बहाल करणे .. हे सर्व तर्कदुष्ट असण्याचे मुख्य कारण म्हणजे.. जगाचे (विश्वाचे) रहाट गाडगे चालू ठेवण्यासाठी हे सर्व सव्यापसव्य करण्याची निसर्गाला काही गरज असल्याचे दिसत नाही. कोणी ईश्वर, नियती, निसर्ग किंवा शक्ती असेलच तर तिला काय पडलीय ? नोंदवही ठेवा, फळ द्या. काय फरक पडतो ? कोणी कशाला असला उपद्व्याप करेल? आपण चांगले काही केले की समाधान देणारा, आणि वाईट काही केले की मनाला कुरतडणारा जो कोणी असतो तो म्हणजे आपणच. आपल्याच आत असतो तो. मानो या न मानो.

In reply to by गवि

नठ्यारा 29/02/2024 - 20:37
गवि, विनोदाचा भाग सोडला तर हा बळी तो कान पिळी या नियमास उत्तेजन देणारा संदेश वाटतो. तुम्ही उपरोधाने लिहिलंय ते कळतंय. पण नेमक्या याच युक्तिवादाचा आधार घेऊन अनेक नरपशूंनी असंख्य निरपराध्यांवर क्रूर अत्याचार केले आहेत. द्वेष्टे या कथेतला उमराव दु:खाच्या भरात अशीच काहीशी मांडणी करतो आहे. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 29/02/2024 - 11:56
हे सर्व सिद्धांत आणि काथ्याकूट मला समजत नाही आणि त्याच्यात फारसा रस ही नाही. पण सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो हा कार्यकारण भाव सोपा आहे पण "जीवनभर मैने एक भी सिगरेट नही पिया ना कभी तंबाखू का सेवन किया फार मुझे ये कॅन्सर क्यूँ हुआ हे प्रश्न विचारणाऱ्या रुग्णाला समर्पक उत्तर देणे कठीण आहे. स्तनाच्या कर्करोगाने नुकतीच माझी पुतणी २५ व्या वर्षी निवर्तली. पैसा असूनही आणि जगातील उत्तमात उत्तम उपचार करूनही काहीही उपयोग झाला नाही. अशा वेळेस प्राक्तन,दुर्दैव सोडून काय सांगणार? कालच चार वेळेस गर्भपात झाल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीला पाचव्यांदा गर्भ आतच दगावला आहे हे सांगणे आणि तिला ते स्वीकारणे किती कठीण आहे हे दुरून पाहणाऱ्याला समजत नाही. तिच्यात आणि नवर्यात काहीही दोष सकृतदर्शनी दिसत नाही( सर्व उपलब्ध तपासण्या केल्यावरही). random bad luck सोडल्यास कोणतेही कारण देता येत नाही. असं माझ्याच बाबतीत का घडतंय? आमचं पुण्य कुठे कमी पडतंय? असा टाहो फोडणाऱ्या मुलीला कसं समजवायचं. प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 29/02/2024 - 13:32
ज्यांना नाही होत जखमा कधी त्यांच्याच कडून दुस-यच्या दु:खाला दिलासा देणा-या गोष्टींची खिल्ली उडवली जाते. प्रत्येक गोष्ट तरतमभावात बसवण्याचा अट्टाहास असलेल्या लोकांना समजावणे गैर असते. आपण फुंकर घालून दिलासा द्यावा जसे जमेल तसे.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 29/02/2024 - 14:36
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.
यू सेड इट ! १०१% सहमत !

कॉमी 29/02/2024 - 19:34
पाचव्यांदा गर्भपात झालेल्या मुलीला असे सांगणे कितपत योग्य,की हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ आहे म्हणून ? तात्पुरते "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पण नंतर दुःखातून बाहेर आल्यावर पुन्हा तोच विचार केल्यावर मनावर काय ओरखडा उमटेल ? दोन पर्याय दिले आहेत वरील प्रतिसादात :
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही.
१. ईश्वरी इच्छा - ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का ? त्यामुळे ईश्वराबाबत प्रचंड कडवट होण्याची शक्यता नाही का ? आणि, इश्वरेच्छा हे सुद्धा "अज्ञात" म्हणण्याचा दुसरा मार्ग आहे. ईश्वराची अशी इच्छा का झाली ह्याला तरी कुठे उत्तर आहे ? मग वैद्यकीय गुंतागुंत जी समजावून सांगता येत नाही, ते एक अज्ञात आणि ईश्वर इच्छा हे दुसरे एक अज्ञात. निर्मळ अज्ञाताऐवजी कोणावर तरी दोष टाकणारे अज्ञात मानसिकदृष्ट्या मदत करणारे ठरेल काय ? २. पूर्वकर्म - आपल्या काही कृती मुळेच आपले गर्भ गेले हे खरोखरी त्या व्यक्तीने मान्य केले तर त्याचे काय मानसिक परिणाम होतील ह्याचा प्रत्येकाने विचार करून पहावा. ह्याबाबत एक अत्यंत भयाण बंगाली लघुकथा आठवते. सारांश लिहिलेला आत्ताच्या चर्चेच्या तुलनेसाठी पण खोडून टाकला. त्यामानाने सौम्य उदाहरण अमीर खानचा तलाश सिनेमा. अमीर खानचा मुलगा बोटिंग अपघातात बुडून मरतो. अमीर खान रात्रभर आपल्या हालचालींमध्ये कुठे उशीर झाला ह्याचा विचार करत असतो. तर असेच कोणाला तुमच्या पूर्व कर्मांची चूक आहे असे सांगणे long term मध्ये कितपत सांत्वनकारी ठरेल ? ह्यातून फुकाचा अपराधबोध तयार होईल त्याचे काय ? अर्थात, डॉक्टर साहेब त्यांच्या प्रोफेशनल अनुभवातून बोलत आहेत. माझ्यासारख्या अज्ञानी लोकांनी ह्याबाबत प्रश्न करणे चुकीचे होईल. हे फक्त माझे विचार मांडले आहेत.

In reply to by कॉमी

गवि 29/02/2024 - 19:52
+१ मुळात पराकोटीच्या दुःखाच्या क्षणी कोणी ही तात्विक चर्चा करतच नाही. विचारपद्धती ही सतत विकसित होत जाणारी एक learning method आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती ही देखील एक जीवन पद्धती असू शकते, आणि पराकोटीच्या दुःखद प्रसंगी देखील त्यातून तरून जाण्यास ती सहाय्यभूत होऊ शकते, किमान अधिक त्रासदायक किंवा वंचना करणारी ठरत नाही अशी कदाचित, ..कदाचित .. शक्यता काही जणांच्या बाबतीत असू शकेल हे साधारणतः अमान्य का ठरावे हे कोडे आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती बाळगणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात विदीर्ण करू पाहणारे दुःख बघितलेच नाही, तो कोरडा पाषाण जणू, असेच जगाला वाटत असावे का?

In reply to by गवि

चित्रगुप्त 29/02/2024 - 23:05
कोणताही 'विचार' ( - विचारपद्धती) मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ? -- मज निरोपावे. 'विचार' म्हटला की 'मन' आलेच, आणि मन हे 'संस्कारित'(च) असते.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 01/03/2024 - 11:46
ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का आपण म्हणत आहात त्यातील अनेक गोष्टींचे माझ्या कडे उत्तर नाही. सामान्य माणसाला टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी होणे मानसिक दृष्ट्या झेपणारे नसते. माझ्याच वाट्याला हे RANDOM BADLUCK का आले याचे उत्तर डॉक्टरांकडेच कशाला शास्त्रज्ञ बुद्धिवंत कुणाकडे नसतेच. अनेक टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःचा मृत्यू समोर आल्यावर भीतीने आस्तिक होताना पाहिलेले आहेत. हृदयाच्या बायपासचा शल्यक्रिया झाल्यावर छातीत पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर एक टोकाचे नास्तिक असणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व तर्हेचे भस्म उदि अंगारा लावून घेत होते आणि कालपर्यंत आमच्यासारख्या डॉक्टरांना कस्पटासमान लेखत होते ते आमच्या पुढे हात जोडून विनवणी करत होते. नाही देखील पंचानना तोंवरि जंबुक करी गर्जना. मृत्यू समोर ठाकल्यावर माणसांचा सर्व आवेश गळून पडतो. विकोपाला गेलेल्या कर्करोगी माणसाला आपला आजार शल्यक्रिया करण्याच्या पलीकडे गेलेला आहे असे सांगण्यापेक्षा आपल्याला शल्यक्रियेची गरज नाही, औषधी उपचार करू( केमोथेरपी) हे सांगणे जास्त सोपे असते. मग ते संपूर्ण सत्य नसले तरी. हातपाय गाळून बसलेल्या माणसाचे शरीर सुद्धा उपचारांना नीट साथ देत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. परमेश्वरावर आणि डॉक्टरांवर भरोसा ठेवा, तुमचा सगळं नीट होईल हे माणसाला दिलासा देऊन उपचाराला तयार करते मग ते असत्य असले तरी ही उपयुक्त असू शकते. तुमचा रुग्ण बरा होईल कि नाही हे मला माहिती नाही ते अज्ञात आहे हे उत्तर कितीही सत्य असले तरी रुग्णाला किंवा जवळच्या नातेवाईकाला पचणारे असेल का? रोज मृत्यूला सामोरे जाणारे रुग्ण पाहणारे डॉक्टर आस्तिक नसतील पण नास्तिकही नसतात. याचे कारण श्रद्धा (अंधश्रद्धा) माणसाला बळ देते हे त्यांनी पाहिलेले असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 06/03/2024 - 11:09
मानवी जीवनातली, किंबहुना अखिल विश्वातली प्रत्येक लहानमोठी घटना ही असंख्य निसर्गनियम-निसर्गचक्रांच्या परिणामी घडून येत असते. (अमूक एका स्थळी-क्षणी, हे नियम एकत्रितपणे येणे यालाच 'योगायोग' असेही म्हणता येईल) -- या नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते. -- अर्थात हा 'देव' म्हणजे राम, कृष्ण, महादेव, खुदा, गॉड, वेताळ, खंडोबा, बहिरोबा .... वगैरेपैकी नाही, तसेच त्याचा विविध कर्मकांडे, उपासना, श्रद्धा, प्रार्थना, बाप्तिस्मा, व्रतवैकल्ये, नमाज, स्तोत्रे, आरत्या, पूजा इत्यादिकांशीही काहीही संबंध नाही. 'देव' या शब्दाऐवजी 'नियती' 'कपाळावर लिहीलेले' वगैरे शब्दप्रयोगही प्रचलित आहेत. या अर्थाने बघता डॉक्टर किंवा कोणीही आस्तिक-नास्तिक व्यक्ती सुद्धा 'देवाळु' असू शकते. असो.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 06/03/2024 - 12:55
@ सुबोध खरे, अगदी यथोचित लिहिले आहे ! १०१+ तंतोतंत सहमत ! या वरून एक कविता आठवली : (या चर्चेशी संबधित असावी अ थ वा नसावीही : एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते कि कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्यायीची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा.. कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लागते देवालाच म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर तात्कळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून मधून.. तुमचा विश्वास नसेल आमच्यावर पण आमचा तर आहे ना!’ देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे! - कवि तुम्ही ओळखालच या कवितेचे प्रत्यक्ष सादरीकरण बहारदार असते.

नठ्यारा 29/02/2024 - 23:26
स्वधर्म, तुमचा इथला संदेश वाचला. एकेक विधानं पाहूया. १.
परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय!
हे कुठेही लिहिलेलं वा सिद्ध केलेलं नाही. जुलुमी परकीय राजवटींच्या विरुद्ध सतत उठाव होत आलेले आहेत. बंदा बैरागी तर संन्याशी असूनही हाती शस्त्र धरता झाला. २.
म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.
परकीयांनी अनेक शतके भारतावर राज्य केले, हा निव्वळ गैरसमज आहे. संपूर्ण भारत कधीही कुणाच्याही एक्छात्री अंमलाखाली नव्हता. अगदी सर्वोच्च केंद्रीभूत इंग्रजी सत्तेच्या उत्कर्षकाळातही असंख्य संस्थाने अस्तित्वात होती. त्यांच्यात १/४ जनता व १/३ प्रदेश समाविष्ट होता. बाकी, कर्मसिद्धांतात ढवळाढवळ करता येत नसते. आणि धर्मव्यवस्था म्हणजे कर्मसिद्धांत नव्हे. हा सिद्धांत अधर्माने वागणाऱ्यासही लागू पडतो. आपल्या समाजाचं नुकसान झालं ते धर्म न पाळल्याने. ३.
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते
वर्ण म्हणजे कल. एखाद्याला ज्या कामाची आवड असेल तो त्याचा वर्ण होय. आवडतं काम करायला मिळणं ही चैन आहे. हिचा अन्यायाशी कसलाही संबंध नाही. वर्णव्यवस्था अन्यायकारक आहे ही इंग्रजी भूलथाप आहे. ४.
विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची
वैदिक धर्मानुसार कोणतंही काम हीन नाही. अमुकेक काम हीन आहे हे तुम्ही स्वत:च ठरवलं आहे. याबाबत भंगी समाजाचं उदाहरण ठाशीव आहे. हिंदू राजपुतांचा मानभंग करण्यासाठी म्हणून जेत्या परकीयांनी त्यांना डोक्यावरून मैला वाहून न्यायचं काम करायला लावलं. अशा रीतीने त्या क्षत्रियांचा मानभंग झाला म्हणून त्यांना जुलुमी परकीयांनी भंगी अशी संज्ञा दिली. तरीही त्या शूर राजपुतांनी हिंदू धर्म सोडला नाही. त्यांची धर्माप्रती निष्ठा अभंग व अविचल राहिली म्हणून मी त्यांना अभंगी म्हणतो. वास्तविक सफाई कामगारांना भंगी म्हणायची काहीच गरज नाहीये. ५.
मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही?
करा की हवा तेव्हढा व्यापार आणि मिळवा की हवं तेव्हढं ज्ञान. कोणी अडवलंय? असं कोणी कोणाला अडवल्याचं काहीतरी उदाहरण आहे का? ६.
हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना!
शूद्र वर्ण आहे. जन्म नाही. ७.
ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले.
या अर्थाचा हिंदू धर्मग्रंथात वा इतर पुस्तकांत स्पष्ट उल्लेख आहे का? याउलट महाभारतात युधिष्ठिरास धर्मव्याध या खाटीकाकडून धर्मरहस्य जाणून घ्यायचा उपदेश कोण्या एका ऋषींनी केला. त्याप्रमाणे युधिष्ठिराने खाटकाकडून धर्माची शिकवण घेतली. ८.
हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती.
असे कितीतरी पोटार्थी जन्मब्राह्मण युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या काळी होते. त्यांना शेतकीचे ब्राह्मण म्हणंत. अशांना त्याने मुख्य वेदीच्या जवळपासही फिरकू दिलं नाही. आणि हेच योग्य आहे. असो. धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयी गैरसमज जास्त आणि ठोस माहिती कमी आहे. प्रत्यक्षांत परिस्थिती फार वेगळी आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 01/03/2024 - 19:09
नठ्यारा, असल्या चर्चांमधून मला कळलं ते असं की धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयीची व्यक्तीची मते ही ती व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीतून आली आहे, यावर बव्हंशी अवलंबून असतात. ती सहसा बदलू शकत नाहीत व पुढे जाऊन चर्चेत थांबावे लागते. सहसा व्यक्तीस आहे तीच मते आजूबाजूचा विदा घेऊन बळकट करण्याचा कल असतो. पूर्ण वस्तुनिष्ठ दृष्टीकोन बहुधा कोणालाच घेता येत नाही, असे चित्रगुप्त यांनी वर म्हटले आहेच. पण नविन माहिती आली तर आपले आजवरचे मत दुरूस्त करण्याचा लवचिकपण फार फार थोडे लोक दाखवतात, असा अनुभव आहे. मी गीता वाचणे, समजून घेणे, चिंतन करणे व आचरणात आणण्णाचा प्रयत्न करणे, हे केले आहे. गीतेच्या सरांना खूप प्रश्न विचारायचो. शेवटी काही कल्पना (उदा. पुनर्जन्म) ‘सबजेक्ट थू व्हेरिफिकेशन’ मान्य केल्याशिवाय कर्मसिध्दांत पटू शकत नाही आणि आपण तो व्हेरिफाय करू शकत नाही. इथे मला थांबावे लागले. त्यानंतरही डॉ. आंबेडकर यांचे अनहिलेशन ऑफ कास्ट वाचण्याएवढे मनाचे दार किलकिले राहिले. त्यांनी वर्णाबद्दल लिहिले असून ते समाजात असू का शकत नाहीत याचे बिनतोड उत्तर दिले आहे. लोक काय मानतात यापेक्षा कसे जगतात हे जास्त महत्वाचे आणि आपण समाज म्हणून कसे जगलो हे आपल्या समोर आहेच. मग काय, सुटलो तावडीतून धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था यांच्या. पण तुमचे मत मात्र असेच राहिल असे वाटते. त्याचा आदर आहे.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 01/03/2024 - 19:56
स्वधर्म, तुम्हांस एक थेट प्रश्न विचारतो. जर पुनर्जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही कर्मसिद्धांत मानाल काय? हो म्हणायची सक्ती नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 01/03/2024 - 20:32
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो. समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल. कुठलातरी ग्रंथ, कुणाचा तरी यू ट्यूब व्हिडिओ ह्याला पुरावा मानता येणार नाही.

In reply to by स्वधर्म

कॉमी 01/03/2024 - 20:43
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 01/03/2024 - 21:55
स्वधर्म,
समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल.
तुम्ही म्हणता की तुम्हाला मागील जन्म आठवले तर विश्वास ठेवता येईल. तसे कोणालाच आठवंत नसतात. तरीपण काही विशिष्ट व्यक्तींना ते आठवतात. त्यांचा पुनर्जन्म झाला आहे यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 02/03/2024 - 19:52
>> अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? ते सांगा ना आधी. असो. मी आधी म्हटल्याप्रमाणे पुनर्जन्म ही संकल्पना 'अनव्हेरिफाएबल' न पडताळता येणार्या आहेत. तुंम्ही जर अशा लोकांचे केवळ 'सांगणे' हा पुरावा मानत असाल, तर नाही. त्याची पडताळणी कशी करायची याची व्यक्तीनिरपेक्ष, सर्वांना अवलंबून बघता येणारी पध्दत तुंम्हालाच सुचवावी लागेल. असे करून जर एकच निष्कर्ष आला, तर मग विश्वास ठेवण्याचा विचार करता येईल. पण ते पुढे, आधी वरील प्रश्नाचे उत्तर द्या.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 03/03/2024 - 19:51
स्वधर्म, जर पुरावा नसेल तर मी माझ्या श्रद्धांचा त्याग करायला तयार आहे. पण ती वेळ येणार नाही कारण की पुरावा सज्जड आहे. तुम्ही पुनर्जन्म अपडताळणीय म्हणता हे पार चुकीचं आहे. पुनर्जन्माच्या अनेक घटना डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी आपल्या पुस्तकांत चर्चिल्या आहेत. पुस्तकाविषयी माहिती इथे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation-ebook/dp/B004EYSWWG पडताळणी करूनंच पुनर्जन्म आहे हे सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रसंगांत सदर बालकाच्या कथनावरून पूर्वजन्मीचे नातेवाईकही शोधण्यांत आले आहेत. आणि त्यांनी पूर्वजन्मीच्या व्यक्तीच्या विदांची पुष्टी केलेली आहे. काही प्रसंगांत पूर्वजन्म हिंसक पद्धतीने संपुष्टात आल्याच्या खुणाही बालकाच्या अंगावर आढळल्या आहेत. इतका भरभक्कम पुरावा असल्यावर कोण पुनर्जन्म नाकारेल? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Interestingly, and contrary to most religious notions of reincarnation, there was zero evidence of karma. On the whole, it appeared to be a fairly mechanical soul-rebirthing process, not a moralistic one. What those mechanisms involve, exactly, is anyone’s guess—even Stevenson’s.
ही पुनर्जन्माची प्रक्रिया मेकॅनिकल दिसते थोडी. म्हणजे, पुनर्जन्माचे पुरावे ग्राह्य धरले तरी कर्मसिद्धांत सिद्ध होत नाही आणि इयन स्टेव्हनसन यांच्या विद्यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही जो कर्मसिद्धांत सिद्ध करेल. यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे. पुनर्जन्म आणि एकंदरित कॉस्मिक गोष्टी एकमेकांना पूरकच आहेत. गमंत म्हणजे चरकसंहितेत एकंदरीत सेंटिनेल जीव कोण यावर बराच खल केला आहे. या मध्ये मानस, शरीर आणि आत्मा/पुरुष या तीनही वेगवेगळ्या गोष्टी मानल्या आहेत. विषेशतः मानवी जन्माची प्रोसेस वाचताना हे लक्षात आले की पुरुष हा गर्भात मिसळतो. (का मिसळला जातो?) नुकतेच विश्व हे लोकल आणि रियल एकाच वेळेस असू शकत नाहीत या संशोधनाच्या कर्त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यावरून आपल्याला एकंदरीतच काहीही झ्याटभर सुद्धा माहित नाही असे वाटते इतके सगळे बिझार आहे. कुछ तो गडबड है दया!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सतिश गावडे 05/03/2024 - 09:53
यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे.
या पुस्तकाचा संदर्भ/दुवा देता का?

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 05/03/2024 - 16:30
तुंम्ही दिलेल्या दुव्यावरून पुस्तकाची माहिती व परिक्षणे वाचली. पुस्तक चांगली भरपूर माहिती गोळा करूनच लिहिले आहे, पण परिक्षणे मात्र संमिश्र आहेत. काही लोकांना हे पुस्तक ‘रोचक’ वाटलेले आहे. काहिंनी त्याला अपूर्व योगायोगांची जंत्री म्हटले आहे तर काहिंनी सदर लेखक हे वैद्यकिय विषयातले एम. डी. आहेत का असा संशय व्यक्त केला आहे. एकूणात, हे पुस्तक हा पुनर्जन्माचा ठोस पुरावा आहे, असे मात्र मानता येणार नाही, असे वाटते. त्याचे कारण म्हणजे या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही. तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल. अर्थात, मी पुस्तक वाचले नाही, पण पुस्तकातील विभाग व परिक्षणे वाचून असे जाणवते. समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते. तुंम्ही आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे. सयामी जुळे का होतात अशासारख्या संख्याशास्त्रीय दृष्ट्या अगदी कमी आढळणार्या गोष्टीसुध्दा सिध्द करता येतात. पण ते असते हे प्रत्यक्ष दिसते, व का व कसे होते हे कुणालाही पडताळून पाहता येते. तसा काही पुरावा या पुस्तकात असल्याचे वाचक म्हणत नाहीत. कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला. कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता, असे ववाते.

In reply to by स्वधर्म

राघव 04/03/2024 - 23:20
पुरावे कदाचित ढीगभर दिले जातील आणि सरळ नाकारलेही जातील. कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवाला आली नाही/येत नाही म्हणून ती नसतेच ही मानसिकता चुकीची आहे इतकंच. पुनर्जन्माबद्दल मांडणारी दोन पुस्तकं आहेत. दोन्ही जबरदस्त आहेत. अर्थात् हे कर्मविपाकाबद्दल बोलत नाहीत पण कर्मफला बद्दल बोलतात. मननीय आहेत. मेनी मॅन्शन्स - लिंक मेनी लाईव्ज, मेनी मास्टर्स - लिंक नाकारायला काहीच लागत नाही. पण पटलं तर मान्य करायला खूप काही लागतं. असो.

In reply to by स्वधर्म

Bhakti 01/03/2024 - 20:12
चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय तत्वज्ञान समजून घ्यायला खुप आवडतं.पण कर्मविकाप सिद्धांत आणि पुनर्जन्म आले की बुद्धीभेद होतो.सुवर्णमध्य म्हणतात तो तरी कुठवर साथ देणार?शेवटी मनाशी प्रामाणिक राहत पुढे जायला आवडतं, अवलंबले जाते.

चित्रगुप्त 01/03/2024 - 23:01
बहुतांश लोकांना - अगदी लहान मुलांसकट - कुणी उपदेश केलेला सहसा आवडत नाही (अपवादः एकाद्याला अतिशय आदरणीय असलेल्या व्यक्तिकडे मुद्दाम उपदेश ग्रहण करायला म्हणून गेल्यावर लाभणारा उपदेश) परंतु तोच उपदेश अप्रत्यक्ष रीत्या, गोष्टींच्या स्वरूपात सांगितला गेला तर तो भावतो. उदा. इसापनीति, कथासरित्सागर, जातककथा, रामायण, महाभारत वगैरेतील कथांमधून होणारा बोध. --- याबद्दल माझे अनुभवः माझी सुमारे चार वर्षांची नात कारमधून बाहेर जाताना पट्टा लावणे, रात्री दात घासणे वगैरे अजिबात करायला तयार नसायची. मग मी तिला अमूक नावाची एक मुलगी होती, ती पट्टा लावायची नाही, मग एक दिवस ती गाडीतून पडली, आणि तिला खायला वाघ, सिंह, मगर, कोल्हा, अजगर...... ( लांबलचक यादी) प्राणी जमा झाले आणि तिला चावू लागले, मग बाबांनी येऊन त्या प्राण्यांना हाकलून लावले, दवाखान्यात जाऊन कडू औषध घ्यावे लागले..... मग ती पट्टा लावू लागली... वगैरे लांबलचक गोष्ट सांगायचो. मग तीच गोष्ट अगदी रोज सांगावी लागायची, आणि त्यात माझी जराशी चूक झाली, की ती मला थांबवून आबा, कोल्हा राहिला.. वगैरे दुरुस्ती करायची. मात्र याचा परिणाम म्हणून ती न चुकता पट्टा लावू लागली. -- मग दात घासण्याबदल आणखी वेगळी गोष्ट (यात दातात अडकलेले अन्न खायला रात्री खूप किडे तोंडात यायचे, आणि ते खाऊन तिथेच शी-सू करायचे त्यामुळे तोंडातून खूप घाणेरडा वास यायचा वगैरे...) रात्री लवकर झोपण्याबद्दल, पौष्टिक खाण्याबद्दल, छोट्या बहिणीला त्रास न देण्याबद्दल अश्या अनेक त्याच त्याच गोष्टी रोज सांगाव्या लागायच्या पण त्या सर्वांचा यथायोग्य परिणाम झाला. माझ्या कल्पकतेलाही अफाट कुरण लाभले. ..... अमूक एक सत्य त्याच्या निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा विविध काल्पनिक गोष्टींच्या स्वरूपात रंगवून सांगितले, तर ते अधिक परिणामकारक ठरते, या अनुभवातूनच जगभरातल्या सर्व संस्कृतींमधे विविध पौराणिक/धार्मिक कथा जन्माला आल्या असाव्यात, असे मला माझ्या अनुभवावरून तरी वाटते. काल्पनिक साहित्य, चित्रे, गाणी वगैरेंचा जनमानसावर किती घट्ट परिणाम होत असतो याचे एक उदाहरण: माझे लग्न झाले, तेंव्हा माझ्या सुशिक्षित बायकोची अशी समजूत होती, की राम, सीता, कृष्ण, शंकर, लक्ष्मी, सरस्वती वगैरे देव खरोखर अस्तित्वात असून ते कॅलेंडरात वगैरे दाखवतात, हुबेहूब तसेच दिसतात. मग मी सांगितले की ही सगळी चित्रकारांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली चित्रे असून ती प्रिंटिंग प्रेस मधे छापली जातात. या गोष्टीचे तिला खूप आश्चर्य वाटले होते. 'रामायण' सिरीयलमधील अरूण गोविल वगैरे अभिनेत्यांना लोक देव का मानायचे याचा उलगडा यातून होतो. माझ्या ओळखीच्या एका सुशिक्षित ख्रिस्ती माणसाची 'गॉड' हा एक पांढरी, भव्य दाढी असलेला वृद्ध असून तो आकाशात खूप उंचावर रहातो, अशी पक्की समजूत अजूनही आहे. थोडक्यात काय, तर काल्पनिक गोष्टींना सत्य मानणारे लक्षावधी लोक सर्व काळात असतात, आणि त्यांना त्याच स्वरूपात सांगितलेले पटत असते. त्यांना कितीही समजावले तरी उपयोग होत नसतो म्हणून त्यांना पटेल, अशा स्वरूपातच सांगणे आवश्यक ठरते.

वामन देशमुख 02/03/2024 - 19:55
सुविचार "जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते."* - फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअर "जग हे तर्काच्या कर्कश्यतेवर चालत नसून ते व्यवहाराच्या लवचिकतेवर चालत असते." - किरकोळ मिपाखरू वामन देशमुख बोधकथा "आई, मी बाहेर खेळायला जाऊ?" "नको बाळा, बाहेर किती ऊन आहे!" "आई, जाऊ दे नं, मला खेळायचं आहे" "नको रे बाळा, तुला ऊन लागेल!" "तू सारखं असंच म्हणतेस, मला खेळूच देत नाहीस! जाऊ दे नं मला." "जा मर, पुन्हा सांगू नको मला!" वरील "जा मर" या या शब्दप्रयोगातून, आईला आपले मूल उन्हामुळे मरून जावे असे वाटत असेल का? शब्दकोशाधारित व्याकरण तर तसे सांगते. तुम्हाला काय वाटते? तत्वविवेचन ईश्वर आहे की नाही, कर्मविपाक सिद्धांत खरा की खोटा, पुनर्जन्म असतो की नसतो, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सर्व बाबी सुजाण-अजाण विद्वानांच्या चर्चेचा भाग आहेत. जगाचे व्यवहार त्यावर चालत नाहीत. जगाचे व्यवहार लवचिक, वाजवी, मानवी संवादाधारित देवाणघेवाणीवर चालतात. युक्तिवाद तर्काच्या फूटपट्टीवरच राहून जातो, जगरहाटी मानवी भावनेला धरून पुढे चालत राहते. ईश्वरअस्तित्वाची असत्यता कदाचित तर्क सिद्ध करून दाखवेल, मानवी भावना ते मानेलच याची खात्री नाही. एखाद्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता, संबंधित औषधोपचाराइतकीच त्या रुग्णाच्या मनाच्या उभारीवरदेखील अवलंबून असते. ती मनाची उभारी येण्यासाठी विज्ञानाकडे ज्ञात उपाय नाही; अध्यात्माकडे अनेक ज्ञात उपाय आहेत. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे असे विज्ञान म्हणते, "बाबा मी तुला रोज दारू आणून देतो, पण तू आईला मारू नकोस" असे "वास्तव"मधील डेढफुट्या म्हणतो! हे ज्याला उमगले तो नक्कीच शहाणा, ज्याला उमगले नाही तो कदाचित विद्वान किंवा अविद्वान! संदर्भ स्पष्टीकरण *"जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते" हे फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअरचे वाक्य आहे. "सामाजिक व्यवस्था सुसंस्कृतपणे चालण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे" या त्यांच्या व्यापक भूमिकेचा हा सार आहे. व्हॉल्टेअर हे भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य यांचे पुरस्कर्ते होते व धर्मकारण-राजकारण वेगवेगळे असावे या मताचे होते!

नठ्यारा 06/03/2024 - 20:32
स्वधर्म, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. तुमची एकेक विधानं पाहूया. १.
.... या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही.
यांत अनैसर्गिक काय आहे? २.
तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल.
पूर्वजन्मीच्या आघाताची खूण बालकाच्या चालू जन्मातील शरीरावर उमटणे हा समज नव्हे. ते मानसशास्त्रीय घटीतही नव्हे. हे पुनर्जन्माकडे अंगुलीनिर्देश करणारं वास्तव आहे. पुनर्जन्म माना वा ना माना. ३.
समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते.
नेमक्या अशाच शक्यतांचा मागोवा घेऊन शास्त्रज्ञांनी अनेक रहस्ये उलगडली आहेत. त्यांच्या यादीत पुनर्जन्म का नको? निदान यादीत सामील करायला काय हरकत आहे? ४.
आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे.
मलातरी कन्फर्मेशन बायसची गरज नाही. कोण्या बालकाच्या मनांत पूर्वजन्मीच्या स्मृती अचानक का जागृत होतात, यावर संशोधन व्हायला हवं. बस इतकंच मला वाटतं. पुनर्जन्म असो वा नसो. ५.
कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर आक्षेप असणे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीवर आक्षेप घेणे नव्हे. न्यूटनचा सिद्धांत अमान्य असला तरी डोंगरावरून दरीत कोणी उडी मारीत नाही. वस्तू खाली पडतात ही सार्वत्रिक अनुभूती आहे. तद्वत कर्मविपाक ही सार्वत्रिक अनुभूती आहे. ६.
कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता,
तसा झालाय. म्हणूनंच कर्मसिद्धांत विकसित झाला आहे. केवळ हिंदूंतच नाही तर जगातल्या इतर पंथोपपंथांतही कर्मविपाक आहेच. असो. या घडीला पुनर्जन्म ही अमन्य वा अमान्य करायची गोष्ट नसून अधिक संशोधन करायचा विषय आहे. बाकी, भूक तहान वगैरे बाबी दिसंत नसल्या तरी अस्तित्वात असतात. तसाच कर्मविपाकही अस्तित्वात आहे. पुनर्जन्म ही त्याची पडछाया आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 08/03/2024 - 20:16
आपण म्हणता तसे, पुनर्जन्म ही मान्य किंवा अमान्य करण्याचा विषय नसून अधिक संशोधन करण्याचा विषय आहे. असो बापडा, आमच्यासारख्यांची काहीही हरकत नाही. ज्यांना त्यात रस असेल ते करोत की संशोधन त्यात. आमच्यासारख्यांसाठी महत्वाचं हे की त्याचा आंम्हाला (किंवा तुंम्हाला) काही पडताळा येतो का, काही उपयोग होतो का? हे तुमच्या बाबतीत तर तुंम्ही काही सांगितले नाही. पडताळणी शक्य नसल्याने त्यावर घातलेला वाद हा निव्वळ बौध्दिक करमणूक आहे. फक्त कुणी त्याचा आधार घेऊन चुकीच्या समजूतीपायी आपल्या अन्यायकारक परिस्थितीचा दोष मागील जन्मातील कर्मावर ढकलून अन्याय, शोषण याविरूध्द काही करण्याचे टाळू नये. बाकी सकाळी भरपूर नाष्टा केल्यामुळे दुपारी कडकडून भूक लागणार नाही, इतपत कर्मविपाकावर विश्वास आहेच मुळी. फक्त ते आधीच्या जन्मातलं आहे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे बघा. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर, गणितात तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल आले, तरी ते सोडवणं किती अवघड बनतं. आपण राहतो त्या जगात तर अनंत चल घटक आहेत आणि ते सतत परस्परांवर परिणाम करत राहतात. यामुळे एखादी भाग्य व दुर्भाग्यकारक घटना घडली तर कोणतेतरी अत्यंत गुंतागुंतीचे आपल्या मानवी क्षमतेने उलगडा न होऊ शकणारे कारण असणार, हा विचार पुरेसा आहे. यावर आपल्या मागील जन्मातल्या कर्माचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्यावर फोकस करून चालणंच महत्वाचं आहे.

पहले रचा प्रारब्ध, पिछे रचा शरीर तुलसी क्यूं चिंता करे भज ले श्री रघुवीर || विषय गहन आहे. पक्षीदर्शन करता निघालोय,रुमाल टाकून ठेवतो. मी पयला.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 12/02/2024 - 22:50
पहले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर ... म्हणजे मनुष्य (देह) जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या जीवनात क्षणोक्षणी काय घडणार, हे 'लिहून' ठेवले आहे ... असे आहे तर मग कशाबद्दलच कोणताही प्रश्नच उरत नाही. -- मला स्वतःला हे मान्य करण्याइतपत अनुभव आलेले आहेत.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 06/03/2024 - 14:58
नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते.
मानवी बुद्धीच्या पलिकडे जाऊन जेव्हा भारतीय प्रज्ञालोकातील माहिती ज्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर आणि अनेक विचारक ज्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात ते वाचून व्यक्तिच्या जन्माच्या आधीच त्याचे, माता पिता, पत्नी /पतीची नावे जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे तमिळ भाषेतील ताडपट्ट्यावरील नोंद करण्याची त्यांची क्षमता याचा अभ्यास केला की देवाची लीला, करणी ही अगाध आहे. याचा प्रत्यय येतो.

In reply to by स्वधर्म

शशिकांत ओक 06/03/2024 - 20:06
नाडी ग्रंथ भविष्य - चक्रावून टाकणारा चमत्कार पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यातील मला आणि इतरांना आलेले अनुभव आणि घटना काही वर्षांपूर्वी मिपावर सादर केलेल्या होत्या. आहेत. शिवाय इथे https://alkaoaksebookshoppy.online/ आता यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मराठीत ई बुक्स उपलब्ध आहेत.

आपल्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात म्हणून 'याच जन्मात चुकांचे फळ मिळते' असं मानणे सोयीस्कर आहे, आणि आयुष्यात काही संकट आले, कसलीतरी शिक्षा भोगतोय असे वाटले आणि काय चुका केल्या ते आठवत नसेल तर 'मागच्या जन्मीच्या चुकांचे फळ' आहे असं मानणे सोयीस्कर आहे :)

In reply to by श्वेता व्यास

चित्रगुप्त 12/02/2024 - 22:58
तुम्ही प्रतिसादात मांडलेला विचार एकदम सोयिस्कर आहे. 'आपल्या बर्‍या-वाईट कर्मांची फळं आपल्याला याच जन्मी मिळणार' हा विचार (आणि धाक सुद्धा) मनुष्याला औचित्यपूर्ण कर्मे करण्यासाठी आणि अनुचित कर्मे करण्यापासून रोखण्यासाठी प्रेरित करणारा ठरतो, हे खरे.

गवि 12/02/2024 - 10:27
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते. किमान तेवढे टाळले तरी इतरांवर उपकार होतील. तशी तर आपल्या अनेक चुकांची फळेही आपल्याला बहुतांश वेळा लवकरच मिळत असतातच, पण आपल्याला ती कळतच नाहीत. आपले मन आपल्याला खाते, त्यापासून सुटका कधीच नसते. कारण आपल्या आतच तो न्यायाधीश असतो.. त्याला आपण किती काळ दाबून ठेवू शकता यावर आपले पॅरोलचे दिवस ठरतात. पुढचा जन्म, मागचा जन्म याबद्दल काय बोलावे? ..दिल के खुश रहेने के लिये ए गालिब...

In reply to by गवि

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:02
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते.
-- या प्रश्नाबद्दलचा एक वेगळाच आयाम या प्रतिसादातून व्यक्त झाला आहे. झकास.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:07
म्हणून लोक महाराजांच्या मागे लागतात
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे .. -- (श्री दासबोधः करंटलक्षणनिरूपण)

कॉमी 12/02/2024 - 10:51
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या हाताबाहेर असतात. माणसा माणसात न्याय ही कल्पना असते, मानवी विश्र्वासाबाहेर न्याय नावाचे काही अस्तित्वात नसते. कोणतीही कॉस्मिक स्केल अस्तित्वात नाही. पापपुण्याचा हिशोब ठेवणारा कोणताही चित्रगुप्त अस्तित्वात नाही. आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही. दरड कोसळून पूर्ण गाव बेचिराख होते, ह्यात माणसांच्या कर्मफलाचा दुरान्वये संबंध येत नाही. दरड कोसळली फिजिक्स मुळे. त्या दर्डिखली माणसे नसती तरी ती कोसळली अस्तीच. अश्या कितीतरी पॉसिबल दुर्घटना घडत असतील जिथे माणूस असता तर जीवितहानी झाली असती. खाली पापी माणूस असल्याने दरड स्वतःहून कोसळणार नाही की पुण्यवान माणूस आहे म्हणून कोसळायला थांबणार नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी दुर्घटनेमुळे जीवित हानी होते तिकडे बघून माणसाच्या कर्माचा त्या घटनांशी संबंध जोडणे हा माणसाचा ego झाला, की आपल्याभोवती जगाच्या घटना घडतात, त्यासाठी माझ्या कर्म परिपाकापुढे दुसरे काही कॉज आणि इफेक्ट नाहीच. थोडक्यात, ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही. तुमच्या वाईट कृतीचे परिणाम कदाचित तुम्हाला चावायला येतील, पण येतीलच असे नाही. तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही.

In reply to by कॉमी

चित्रगुप्त 12/02/2024 - 23:13
आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही...... ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही...... तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही...
... अगदी. मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा यातून स्पष्ट होतात.

In reply to by कॉमी

बाजीगर 21/02/2024 - 07:48
पूर्वजन्म, पूर्वसंचित, कर्म, पापपुण्य हे सर्व माणसाच मॅन्यूपुलेटींग वाटतं मला.एखादी गोष्टं का झाली याचा तर्क देता आला नाही की द्या ठोकून मागच्या जन्मातील भोग वगैरे. दोन दिवसापूर्वी वाचले, पंढरपूरला चालले होते, गाडीचा अपघात झाला.3 मेवे.इथं सरळसरळ वाहनचालन, झोप,वेग,रस्तापरीस्थिती,वाहन परिस्थिती ही कारणं असतात.पण देवाला जातानाही त्यांचच काही चूकलं असं विचार करणारी मंडळी भेटतील. काही लोक सर्व दुराचार,अन्याय करुनही काही वाईट न होता सुखाने जगून गेली अशी ही उदाहरणे दिसतात. जगात न्याय नाही.

In reply to by बाजीगर

मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब धर्माधिकार्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना वीसेक लाख लोक जमवले होते, हा संपुर्ण राजकीय खेळ होता, मंडप टाकू शकत असूनही फक्त ज्रोन कॅमेराने गर्दीचे फोटो घेता यावेत म्हणून मंडप टाकला गेला नाही. भर एप्रीलच्या ऊन्हात लाखो लोक दुपारच्या रनरनत्या ऊन्हात एका पक्षाच्या प्रचारासाठी बसवले गेले. तिथे १०० ते १५० लोक मेलो, सरकारी आकडा नेहमीप्रमाणे कमी दाखवला गेला. पण मेलेले लोक हे नशिबवान होते कारण त्यांना अश्या महान कार्यक्रमात मृत्यू आला अश्या गोष्टी पसरवल्या गेल्या. घटनेचे दुःखं म्हणून नानासाहब धर्माधिकारी ह्या माणसाने दारापुढची रांगोळी पूसली. (किती मोठा त्याग करावा एखाद्याने)) मुर्ख लोकांना अक्कल येईल तो सुदीन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भर उन्हा़ळ्यात पुण्य संचय करणा-या लोकांची कीव आली होती. हेच म्हणुन नव्हे, अशा कितीतरी ठिकाणी मेंदू नावाच्या गोष्टींचा किंचितही वापर न करता आपलं भलं होईल या आशेने अशा मेंदुत भुसा भरलेल्या लोकांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सुदीन यावा इतकेच अपेक्षित. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे तर काहीचनाही, त्या अप्पांच्या शेतात फूकट कामाला जातात, पुण्य जमवण्यासाठी इतके भयानक मेंदू गहाण ठेवलेले लोक आहेत. अप्पांच्या दृष्टाने त्या भक्तांची किंमत किती तर मेलेल्यांना एक रूपडाडी दिला नाही किंवा सरकारलाही द्यायला नाही लावला, फक्त रांगोळी पूसून दुःखं व्यक्त केले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/02/2024 - 11:21
कोणत्याहि धाग्यात आपले पूर्वग्रह आणि राजकारण आणून धाग्याचा विचका कसा करावा हे वरील दोन्ही आय डी परत परत सिद्ध करून दाखवत असतात. का? कशासाठी ?

In reply to by सुबोध खरे

लोक कसे फसतात हे दाखवले होते. वर कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तिचा ऊल्लेख नाही. मरनार्या लोकांपेक्षा पक्षाची काळजी वाटणे चिंताजनक आहे. आणी अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 21/02/2024 - 12:11
>>>अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो. म्हणजेच ते सर्व पक्षात आहेत.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 21/02/2024 - 12:13
>>>का? कशासाठी ? असते काही जणांना समाजसेवेची आवड. शे दोनशे वर्षानि आपली आठवण काढावी लोकांनी म्हणून जसे देशमुखरानडे खस्ता खात होते त्याच पठडीतले. त्यांना प्रोत्साहन देणे सोडा... तुम्ही त्यांचे पाय ओढताय... कुठे फेडाल या कर्माची पापे.... !!!!

In reply to by सुबोध खरे

>>> का? कशासाठी ? डॉक्टर साहेब, आपला कटाक्ष आमच्या कड़े असेल तर, आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छितो की, महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. आपण जमेल तसं लोकांचे प्रबोधन केले पाहिजे, यात काही चूक आहे असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/02/2024 - 10:25
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. हो पण आपण कीर्तनाला जाऊन तमाशातील शृंगारिक लावणी कशाला बेसुरात गाताय. फडावर उभे राहा आणि गाजवा की! कर्म आणि त्याचे फळ इ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय?

In reply to by सुबोध खरे

अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या विचारसरणीला, तुमच्या आवडत्या पक्षाच्या विचारसरणीला विरोध म्हणजे खांद्याखाली बळकट असणे असते व्हय. छान छान.

In reply to by सुबोध खरे

कर्म आणि त्याचे फळ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय? कर्म आणि फळ केवळ अध्यात्मातच नसतं, आता ते तुम्हाला कळत नाही. समजत नाही त्याला आम्ही काही करू शकत नाही. कारण मेंदुत भुसा भरलेल्या टोळ्यांचा परिणाम केवळ अशिक्षित लोकांवर होत नाही तर, सुशिक्षितावरही व्हायला लागतात तेव्हा असे विचार थोपवणे हे प्रबोधानाचे कार्यआहे. भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते....' चा विचार केवळ अध्यात्मिक लोकांसाठी नाही तर, सकल मानवासाठी आलेला विचार आहे. 'अध्यात्म असो की राजकारण' फळाची अपेक्षा न करता काम करीत राहा हा संदेश अधिक महत्वाचा आहे. आता कोणते कर्म केले पाहिजेत. त्यावर कधीतरी पुढे सांगेन. आत्ता इतकं पुरे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 24/02/2024 - 10:42
सहमत आहे. आता आपणच हा प्रबोधनाचा वारसा आणि वसा पुढे चालवावा आणि चुकलेल्या मेंढरांना योग्य दिशा देऊन कळपात आणावे. सर्व मिपा, नव्हे महराष्ट नव्हे भारत नाही नाही अखिल विश्व आपल्याकडे आस लावून पहात आहे. बोला गु रुदेव प्राडॉ की जै.... आता सगळ्यांनी उभे राहून आरती म्हणावी. जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट दावू योग्य मार्ग मेंढरे हाकलती कर्माचे फळ याच जन्मी म्हणती दिसेल कुणी अभिजन चुकार वाह्यात हाणती लाथा आणि बुक्की पेकाटात जनहो तुम्ही स्विकारा हाच मार्ग तत्काळ मिळेल तुम्हा इथेच स्वर्ग जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट गुरुदेवांच्या पाया पडून देणगी माझ्याकडेच द्यावी... गुरुदेवांना जड उचलायची मनाई आहे आणि जडावर त्यांचा लोभ सुद्धा नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 21/02/2024 - 12:10
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित. तुमच्या आमच्या हयातीत येईल असे वाटत नाही. मला वाटते आता तुम्हीच पुढाकार घेऊन प्राडॉ ची झूल काढा आणि तुमची ती फेमस डबल बॅरल घेऊन फायर करा तर काही होईल. फक्त जरा भगवी कापडं अंगावर घेतलीत तर इफेक्ट फास्ट होईल... कसे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाजीगर 24/02/2024 - 06:35
त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार, पैसे (त्यांच्या भाषेत हजेरी) सभा संपल्यावर मिळणार असेल. उन लागतय हे कळतय पण हजेरी / काम न करता बसून पैसे मिळताहेत हे त्यांना इझीमनी वाटतं असणार. सनस्ट्रोक झाला, रक्तातील प्रथीन उकडून शिजलं,पण हजेरी पाहीजे म्हणून बसून राहीले, मेले. सभा न सोडण्याची चूक याच जन्मातली, शिक्षा याच जन्मात.

In reply to by बाजीगर

नाही. माझी आईपण गेली होती त्या खारघरच्या कार्यक्रमाला. तिने आपबीता सांगातली. खरं तर त्या सेकंदापर्यंत मलाही हे लोक चांगले वाटायचे. त्या दिवसानंतर अप्पांचा खरा चेहरा समोर आला, हे सर्व बंदं करायला सांगीतलं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 24/02/2024 - 10:56
तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात असा डंका सर्वत्र आहे. मग ही घटना घडायची का वाट पाहिली? आईला आधीच योग्य मार्गावर का आणले नाही? एक कुतूहल.

Bhakti 12/02/2024 - 11:32
मी आधी असाच विचार करायचे.आपल्यावर संस्कार आहेत आपण चूका करायच्या नाहीत, समजून घ्यायचं.पण हे जग इतकं प्रक्टिकल आहे की खुप थोडे बोटावर मोजता येतील एवढेच तुमच्या चुका पोटात घेतात.बाकी जग चुका न करताही किडकं फळं देऊ शकतं...मग त्यांच्याशी कसं वागायचं? एखाद्याला गंभीर काही तरी रोग होतो,ते आरोग्य हे जेनेटिक,डिसिप्लिनड असतं त्यात चुका झाल्याने. नातेसंबंध रूक्षपणाने बिघडतात.आर्थिक संकट लोभीपणा,बावळटपणा,आळशीपणा मुळं येतं.इत्यादी इत्यादी तेव्हा या जन्मात फळं वगैरे कसं काही असतं,असं वाटतं नाही. पण संस्कारांच म्हणाल तर मात्र खुप matar करतात.काही गोष्टी विसाव्या वर्षी कान पकडून सांगता येत नाही.

पाप पुण्य देखील समजावर अवलंबून असते. ऊदा. एका धर्माच्या दृष्टीने कुठलाही माणूस मारणे पाप तर दुसर्या धर्माच्या दृष्टीने आपल्या देवाला न माननारा माणूस मारला तर ते पुण्य ठरते.

प्यारे बहनो और भाईयो, आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागतात. >>>का ? कारण आपण चुका केलेल्या असतात म्हणुन. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 12/02/2024 - 15:08
लग्न झालेल्या व्यक्तीला चांगले माहीत असते या जन्माच्या कर्माचे फळे या जन्मीस भोगावे लागतात. बाकी जे आपल्या दृष्टीने ठीक, दुसऱ्याच्या दृष्टीने चूक आणि जे आपल्या दृष्टीने चूक, दुसऱ्याच्या दृष्टीने ठीक होऊ शकते.

तिमा 12/02/2024 - 16:32
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?

In reply to by तिमा

चौथा कोनाडा 12/02/2024 - 22:20
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?
पुर्वसंचित किंवा मागच्या जन्मीचं पाप. भारतीय संस्कृती फार थोर आहे .... त्यात इतक्या भन्नाट कल्पना इतकी बस ! कधी कधी वेडगळ वाटतात पण नीट तर्क लावून तपासल्या तर्क लावून तर एकदम ओके. त्यामुळे हेच लईच बेस्ट ! उगाच कारण बिरण शोधायला जात नाहीत ... डायरेक्ट "मागच्या जन्मीचं पाप / पूर्वसंचित / पत्रिकेत खोट / पत्रिकाच वाईट / वेळच वाईट / ग्रहमानच वाईट" असली शेकडो कारणं दिली की कुठल्याही सायकॉलॉजिस्टकडे जावं लागत नाही ! आहे ना भन्नाट !

In reply to by तिमा

सुबोध खरे 21/02/2024 - 12:55
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही. सोनोग्राफी करताना जन्माला न आलेल्या अर्भकाच्या पोटात असलेला कर्करोग पाहून असा विचा र येतो कि ज्या बाळाचा जन्मही झालेला नाही त्याने असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे जन्माचं अगोदरच त्याला असा भयंकर रोग झाला असावा? आणि दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत. यात कुणाचे पूर्वजन्मीचे/ या जन्मीचे पुण्य जास्त कि पाप जास्त याचा हिशेब कसा देणार? या दोन्ही टोकाच्या उदाहरणावरून असे वाटू लागते कि जर पुनर्जन्म असला तर पूर्वजन्मीचे पाप किंवा पुण्य या जन्मात आपल्याला फळ देत असावे. अर्थात गदिमा यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" म्हणजेच मृत्यू नंतर काय पुनर्जन्म आहे का याचे उत्तर संत महात्म्याना सुद्धा देता येत नाही. तेंव्हा आपण काय सांगणार? I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD, I AM JUST AWKWARD. सत्कृत्य आणि दुष्कृत्य याची व्याख्या सुद्धा नक्की करता येणार नाही. पाप आणि पुण्याचे फळ मिळेल का याच जन्मात मिळेल का ? किंवा पुनर्जन्म आहे का आणि ते फळ पुढच्या जन्मात मिळेल का? याचे कोणतेही उत्तर मला माहिती नाही. पण अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकार: पुण्य: पापाय: परपीडनं,-- महर्षी व्यास अठरा पुराणांचे सार दोन वाक्यात सांगतात -- दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे. याप्रमाणे आपला व्यवहार ठेवला कि निदान आपल्याला मानसिक शांती मिळते असा माझा अनुभव आहे. शेवटी आयुष्य म्हणजे काय? ज्याचा त्याचा अनुभवच आहे.

In reply to by सुबोध खरे

दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 22/02/2024 - 10:30
भुजबळ बुवा कुठल्याही गोष्टीत राजकारण आणून विचका करायची आपण शपथच घेतली आहे का? तसंही तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाहीच. फक्त तुम्ही अट्टाहासाने ते सिद्ध करताय एवढंच. बघा विचार करून जमतंय का? नाही तर द्या सोडून

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 10:48
बाकी काही म्हणणे नाही, पण इथे राजकारण तुम्ही आणले आहे. तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:44
कॉमी बुवा जरा प्रतिसादांच्या कालावधी कडे लक्ष दिलं असतं तर कुणाचे प्रतिसाद पहिले आलेले आपल्याला समजले असते. पण आपली कट्टर डावी विचारसरणी तसे करायला प्रतिबंध करत असावी असे वाटते. मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब 21 Feb 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली हं. 21 Feb 2024 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे कोणत्याहि धाग्यात आपले 21 Feb 2024 - 11:21 am | सुबोध खरे कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण 21 Feb 2024 - 12:55 pm | सुबोध खरे

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 11:54
इतरांनी काय लिहिले आणि कधी लिहिले ह्याचा काय संबंध ? तुम्ही एक अत्यंत प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद दिला. त्याला राजकीय उत्तर आले. मग त्यावर तुम्ही "राजकीय विचका करू नका" म्हणून तक्रार करू लागलात तर तो तुमचा दुटप्पीपणा आहे. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे किंवा बाहुबली ह्यांनी राजकीय विचका केला असा आरोप कोणावर केला नाही, तो तुम्हीच केला. तुम्हाला जर राजकीय लिहू नये असे मांडायचे होते तर तुम्ही स्वतः न लिहायचे भान ठेवायचे. ते तर तुम्हाला ठेवायचे नाही, अगदी प्रक्षोभक लिहायचे आणि वर तक्रार करायची ! बाकी काही बोलायला सुचत नसले की कडवी डावी विचारसरणी इत्यादी निरर्थक रडगाणे चालू द्या. तुमची साफ सरळ हीपॉक्रसी दाखवणे ह्यात कसलीही कडवी डावी विचारसरणी नाही.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:57
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली. कुणी पहिले लिहिलं आहे हे मी सप्रमाण दाखवलं आहे तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 12:02
धर्माधिकारी ह्यांच्या सत्काराच्या घटनेचा आणि तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही पूर्णपणे वेगळा प्रतिसाद दिला. कोण थुंकी इकडची तिकडे करते आहे सरळ दिसते आहे.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 10:55
समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात
इतके प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद लिहून वर दुसऱ्याकडे "राजकारण आणून विचका केला" म्हणून बोटे दाखवत आहात !

In reply to by कॉमी

सुबोध खरे 22/02/2024 - 11:52
तुमची डावी विचारसरणी एका विशिष्ट एकांगी तर्हेने चालते म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरते ते सुद्धा श्री शरद पवार यांच्याबद्दल विचार करत आहात. ( त्यांच्या बद्दल वेगळा प्रतिसाद मी लिहिलेला असला तरीही) श्री विप्र सिंह, मुलायम सिंह,चंद्रशेखर, चरण सिंह, प्रकाश सिंह बादल, एम करुणानिधी, मणिशंकर अय्यर असे असंख्य राजकारणी भारतात आहेत त्यांनी विशिष्ट जातीची आणि धर्माची मते मिळ्वण्यासाठी काय काय केले हे जगजाहीर आहे. त्यात प्रक्षोभक काहीच नाही. त्याबद्दल लिहिले असताना केवळ द्वेषमूलक प्रतिसाद देण्यासाठी आपली संकुचित वृत्ती आपण सिद्ध करून दाखवलीत. असो बाकी भुजबळ बुवांबद्दल काही लिहिण्यात हशील नाहीच. ते अगोदर लिहितात आणि मग कधी कधी विचार करतात. त्यामुळे त्यांना बरेच मिपाकर सिरियसली घेत नाहीतच. तुम्ही पण त्यांच्या नादाला लागलात?

In reply to by सुबोध खरे

कॉमी 22/02/2024 - 11:57
काय हास्यास्पद बचाव आहे. "माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही, कारण मी केवळ एका नेत्याला हरामखोर असा शब्द वापरला नाहीये, तर त्यासकट इतर अनेक लोकांना मी हरामखोर म्हणले आहे ! मी अनेकांना शिवी दिली असल्यामुळे, मिलोर्ड, माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही."

In reply to by कॉमी

काॅमी जाऊद्या. त्यांची चूक दाखवली की तुन्ही डावे विचारवादी (ज्याचा वास्तवीक इथे चाललेल्या चर्चेशी काहीही संबंधं नाही) अशी वयक्तिक टिका होते, ना माझ्यावरही डाॅ साहेब वयक्तिक ऊतरलेत. वास्तविक मी पवारांचा ऊल्लेख कुठेहा केला नव्हता. तरीही त्यांनी पवारांचे नाव घेतले. पण इथे लाॅजीकला तिलांजली दिली जातेय.

In reply to by सुबोध खरे

व्वा. मानलं तुम्हाला वर एका ८० वर्षीय राजकारण्यावर प्रक्षोभक लिहून आपला द्वेष प्रकट केलात ह्यावर मी ऊलटही असू शकतं इतकं लिहीलं तर मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतोय?? व्वाह. तुम्ही हुशार आहात पण मिपावरील ईतर लोक मुर्ख नाहीत.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 21/02/2024 - 17:32
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत
हे दु:खदायकच म्हणायचे !

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 20/04/2025 - 18:52
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही.
हे विधान खालीलपैकी कसे इंटरप्रीट करायचे? १. कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही पण अथक प्रयत्न केल्यावर सापडू शकतो २. हे विधान फक्त पाप पुण्य ह्या परिप्रेक्षात वाचावे, त्यापलीकडे अर्थ शोधू नये PS : कार्यकारण भाव = cause and effect ह्यावरून वरील प्रश्न पडला आहे. - (प्रश्नांकित) सोकाजी

लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
समजा एका मुलावर असे आईवडिलांनी लहानपणापासून संस्कार केले, की चोरी करणे पाप आहे. त्याने चोरी केली तर ते त्याच्यासाठी पाप असेल. समजा दुसऱ्या घरातील आईवडिलांनी मुलाला चोरी करायला शिकवलं, दरोडा टाकायला शिकवलं. हे आपण आपलं पोट भरण्यासाठी करत आहोत, आपलं पोट भरण्यासाठी आपण जे काम करतो त्यामध्ये कोणी आडवा आल्यास त्याला इजा करणे अथवा मारून टाकणे यात चुकीचं काही नाही, असे संस्कार केले. आणि त्या मुलाने चोरी अथवा खून केला, तर त्याने पाप केले का? आपण करत आहोत, ते चुकीचे आहे, हेच त्याला माहिती नाही. असा दरोडा घालून आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहोत, त्यांना सांभाळत आहोत, त्यांना सुख समाधान देत आहोत, या विचारांनी तो चोरी, दरोडे, खून करत राहिला, तर ते पुण्य आहे का? आपण कर्म करत राहायचं, ते आपलं काम आहे. ते पाप आहे की पुण्य, त्याचे काय फळ मिळेल, याचा विचार आपण नाही करायचा. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नये.

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 13/02/2024 - 21:43
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना. निसर्गचक्रात त्यांचे काहीही स्थान नाही. ब्रम्हांडाचा गाडा नियत निसर्गनियमांप्रमाणे अव्याहत चालत रहातो, त्यानुसारच मानवी जीवनातल्याही सगळ्या घटना घडत असतात . यालाच 'नियति' म्हणता येईल.

रामचंद्र 13/02/2024 - 00:07
खरं तर या जन्मात आठवूनही न सापडणारी कुठलीही दुष्कर्मे न करूनही अमर्याद दु:ख ज्यांच्या वाट्याला आलं आहे अशा कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. मग हे या जन्मीचं नाही तर मागच्या जन्मीचं पाप एवढाच तर्क लागू होतो. पण जसं चांगल्या कृत्याची अनुभूती येईलच असं नाही पण वाइटाची मात्र लगेच प्रचिती येते हा मात्र बहुतेकदा अनुभव येतोच. एकूण काय, तर कर्म आणि भोग यांची संगती लावता येत नसली तरी त्या भीतीने का होईना सरळ मार्ग अवलंबणेच इष्ट.

प्रारब्ध आणी कर्म हा लेख लिहीलाय https://misalpav.com/node/48505 कार्यकारणभाव न समजणार्‍या घटनांबद्दल गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता. झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती, स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती; सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते, एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

अहिरावण 13/02/2024 - 19:45
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का? जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का? कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 13/02/2024 - 21:59
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का?
आपले एकादे कृत्य हे काहीएक विशिष्ट संदर्भात आपण 'चूक' केली असे स्वतःला/ इतरांना वाटत असते. संदर्भ बदलले की तीच गोष्ट 'बरोबर' वाटू शकते.
जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का?
'योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याच मुळात मानवी कल्पना आहेत. (असे आम्हास वाटते)
कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?
- कोणतेही 'कर्म' घडून आले, की आणि त्याचा कोणता ना कोणता, (कधी ना कधी) 'परिणाम' हाही घडून येतच असतो. अर्थात या दोन्ही गोष्टींचा संबंध असल्याचेच दिसून येते.

टर्मीनेटर 14/02/2024 - 17:58
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
+१००० मौत को तो युहीं बदनाम करतें हैं लोग... तकलीफ तो जिंदगी देती हैं! - संत आयुषमान ठाकुर (रोनीत रॉय) चित्रपट 'बॉस'

In reply to by टर्मीनेटर

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी नुसतेच शब्दांचे बहर उधळले होते.....

राघव 22/02/2024 - 21:28
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा मला तरी बुवा काही अधिकार नाही असं वाटतं. बाकी कर्मसिद्धांता बद्दल हरिभाई ठक्कर यांचे विचार गहन आणि तर्कपूर्ण वाटले. इच्छुकांनी जरूर वाचून बघावे - लिंक

कॉमी 24/02/2024 - 11:28
कर्म आणि फळ अनेकदा ही विचारसरणी किती घातक आहे, हे लोकांच्या रडार खालून जाते. कर्मविपाक विचारसरणी अतिशय घातक आहे आणि अनेक रिग्रेसिव विचारांचा मुळाशी आहे. त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे. समजून घ्या -
  • फायनान्स मध्ये थियरी आहे, effecient market theory. तिचे तत्व आहे market discounts everything. तशीच आहे ही विचारसरणी. जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
  • तुम्ही काही त्रासातून जाताय, किंवा जन्मतः काही समजनिर्मित किंवा शारीरिक अडथळे तुमच्या मार्गात आहेत, तर ह्या गोष्टींना कारणीभूत ठरणारे संचित खरंच होते की नाही हे बघण्याची गरजच नाही, कारण की तुम्ही त्रास भोगताय ह्याचाच अर्थ तुमचे पूर्वसंचित तश्या प्रकारचे होते असा आहे.
  • Effecient market थियरी नुसार ओव्हर व्हॅल्यूड आणि अंडर व्हॅल्युड ह्या भ्रामक कल्पना आहेत. कारण जी काही व्हॅल्यूएशनशी संबंधित माहिती आहे ती "मार्केट"ने आलरेडी विचारत घेतली आहे, आणि ती माहिती चालू दरात आधीच प्रतिबिंबित होत आहे, त्यामुळे उगाच तुम्ही माथाफोडी करून fair value काढणे मूर्खपणाचे आहे, असे ही थियरी म्हणते. त्यामुळे किमतीचे बुडबुडे वैगरे काही नसतात, सगळे आलबेलच असते, असे ही थियरी म्हणते.
  • कर्मविपाक सुद्धा तसेच. तुम्हाला दिसणारे जग हे न्याय्यच आहे, कारण हे सगळे काल्पनिक संचिताचे परिणाम झालेले जग आहे.
  • जाती असोत, वर्ग असोत, सो कॉल्ड वर्ण असोत, सगळे ह्या कर्म आणि संचिताच्या मुळांवर उभे आहेत. त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.

राघव 27/02/2024 - 08:02
त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे.
हे म्हणणं जरा धारिष्ट्याचं आहे. कर्मविपाकामागील हेतू बघणे महत्त्वाचे आहे. कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल. आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.
हे पटत नाही. माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय? तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.

In reply to by राघव

कॉमी 27/02/2024 - 09:23
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल.
फक्त स्वीकृती नाही, जस्टिफिकेशन सुद्धा. तुम्ही गरीब घरात जन्माला आला. ह्यात चिडचिड करून हातात काही लागणार नाही, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत इतपर्यंत ठीक आहे. पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या काल्पनिक. एखादी गोष्ट नसल्याचा पुरावा नाही म्हणून त्या गोष्टी आहेत असे होत नाही. जोवर पुरावा मिळत नाही तोवर पूर्वसंचित काल्पनिक आहे. तुम्ही जो बेसिस मांडत आहात त्याच्यात काय खरे काय खोटे तपासण्याची काहीही सोय नाही. काहीही खरे असू शकते, पुरावा गरजेचा नाही.
माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय?
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.
द्वेष आणि तेढ कशी काय ? एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.

In reply to by कॉमी

राघव 27/02/2024 - 17:40
पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
बरं. पुर्वी लोकं असंच धरुन चालत असं गृहित धरू. ते चूक आहे असं सरळ सरळ दिसतं. मग आताही तेच करणार काय? वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना? माझं इतकंच म्हणणं आहे की कर्मविपाक बरोबर का चूक या वादात न पडता, आहे त्यातून चांगलं घडवण्याचं कर्म करणं जास्त गरजेचं आहे.
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
इतके ते सोपे नाही. पण त्यावर वाद घालून उपयोगच नाही कारण पुर्वसुकृत शोधत बसणे हेच मुळात चूक आहे.
एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.
एखाद्याचं आयुष्य चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट याचं कारण जर सांगताच येणार नसेल, तर मग ज्याच्या आयुष्य वाईट तो दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघेल तेव्हा असूया (आणि त्यातूनच पुढे उत्पन्न होऊ शकणारी तेढ) कशी येणार नाही? पुन्हा सांगतो, कोणताही सिद्धांत चूक वा बरोबर हे मांडत बसल्यानं अडचणी सुटत नाहीत. आधीच्या चुका ओळखण्यापुरतीच त्यांची गरज खरेतर, पण ते तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाहीत. भविष्य नीट होण्यासाठी भूतकाळातून शिकून वर्तमानात चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करणं हे ठीक. यापलिकडे यावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्यामुळे आता थांबतो.

In reply to by राघव

कॉमी 27/02/2024 - 21:18
वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना?
बरोबर, परिस्थिती अशी काही बदलणार नाही. पण ही थियरी कशी चुकीची आहे हे लक्षात आल्यावर जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगलाच बदलेल.

नठ्यारा 27/02/2024 - 19:58
कॉमी,
काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले.
या विधानाशी पार असहमत आहे. हे परिस्थितीचं समर्थन नाही. होऊही शकंत नाही. ते केवळ स्पष्टीकरण आहे. माझ्यावर झालेला अन्याय हा इतरांवर अन्याय करायचा परवाना नव्हे, याचं भान राखण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे. ती सोय केवळ त्याच कामासाठी वापरायला हवी. परिस्थितीच्या समर्थनासाठी तिचा वापर वर्ज्य आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 27/02/2024 - 20:18
एखादा माणूस तुरुंगात आहे. तो त्याच्या पूर्व गुन्ह्यांमुळे तुरुंगात आहे - हे विधान तो माणूस तुरुंगात असण्याला जस्टिफाय करत आहे. त्याने गुन्हा केला म्हणून तो तुरुंगात आहे हे त्या व्यक्तीच्या तुरुंगात असण्याचे समर्थन आहे. फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे. हे लॉजिक जेल बाबत चालू शकेल कारण की गुन्हा घडला आहे का, तो त्यानेच केला आहे का हे बघण्यासाठी एक व्यवस्था आपण तयार केली आहे. जर नवीन पुरावे मिळाले तर माणूस जेल मधून बाहेर पण येतो. कर्मविपाक पूर्णपणे काल्पनिक आधारावर आहे. पूर्वसंचित कर्म हेच मुळात काल्पनिक आहे त्यामुळे ते तपासण्यासाठी असलेली यंत्रणा वैगरे तर आणखी दूर.

नठ्यारा 27/02/2024 - 22:35
कॉमी,
फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे.
रोचक विधान आहे. समजा पोलिसी तपास झाल्याखेरीज न्यायालयात गुन्हा शाबीत होणारा नसेल. तर पोलिसी तपासातही संशयित गुन्हेगार आहे हे गृहीत धरूनंच तपास करावा लागतो. त्याच न्यायाने कोण्या माणसाने त्याच्यावरील ओढवलेला अनावस्था प्रसंगासाठी कर्मविपाकास गृहीत धरलं तर काय बिघडलं? कर्मविपाकास गृहीत धरून स्वस्थ बसायचं नाहीये. परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतातच. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 28/02/2024 - 06:57
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे. तुमच्या कर्मविपाक थियरी मध्ये आधी परिस्थिती येते (जजमेंट) आणि मग परिस्थिती अनुकूल संचित असणार असा उलटा निष्कर्ष काढला जातो.

In reply to by कॉमी

नठ्यारा 28/02/2024 - 19:03
अंदाज ( जजमेंट ) बांधल्याशिवाय तपास पुढे सरकू शकंत नाही. आज असंख्य लोकांना देवतांचा जप केल्याने व्यावहारिक अडचणी दूर झाल्याचे अनुभव आले आहेत. कर्मसिद्धांताशिवाय त्यांचं स्पष्टीकरण अशक्य आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कॉमी 28/02/2024 - 19:24
अंदाज बांधणे वेगळे. कर्मविपाकात अंदाज बांधला जात नाही, तर जी परिस्थिती आहे तो निवाडा आहे, पूर्व कर्मांचा. बास. शब्द छळ करण्यात रस नाही. माझा मुद्दा पुरेसा क्लियर आहे. तुमची पेटंट स्टाईल आहे वाचून मनाजोगता अर्थ काढण्याची, पुढच्याला अर्थ काय अभिप्रेत आहे ह्याकडे साफ दुर्लक्ष करून.

In reply to by कॉमी

नठ्यारा 28/02/2024 - 20:36
तुम्हांस जो अर्थ अभिप्रेत आहे तो मला अभिप्रेत नाही. त्यामुळे मी देखील थांबतो. तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आभार ! :-) -ना.न.

In reply to by अहिरावण

अगदी अगदी... काल आमच्या बाबा महाराज डोंबोलीकर यांना हाच प्रश्न विचारला. बाबा महाराज म्हणाले की, उत्तम कार्य केले की उत्तम पेय मिळते. 'मुखी कुणाच्या सिंगल माल्ट.. कुणा मुखी पहिली धार." त्यामुळे हातात आलेले पेय, मुकाट प्यायचे. हाती कुठलेही पेय असो, स्वर्गसुख हे ठरलेलेच. तस्मात्, जास्त विचार न करता, आलेला क्षण आनंदाने जगा. ------ त्यामुळे आम्ही पण मध्यमवर्गीय असल्याने, बार्ली वॉटर पितो...

स्वधर्म 28/02/2024 - 17:47
धार्मिक ग्रंथातील कर्मविपाक सिध्दांत हा मानवी ज्ञानाची व आयुर्ष्याची मर्यादा लक्षात घेता पडताळून पाहता येत नाही. सबब त्याविषयी आज रोजी कोणीही काहीही बोलले तरी त्यावर ठाम विश्वास ठेवणे शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे, की त्यावरील विश्वासामुळे समाजात काय घडले व घडत आहे. वर्णाश्रम व्यवस्था टिकून रहावी, लोकांनी आपआपली विहित कर्मेच करत रहावीत व उतरंडीच्या अन्यायकारक समाजव्यवस्थेशी लढण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊच नये, यासाठी कर्मविपाक सिध्दांताचा प्रचंड उपयोग झाला. त्यामुळे हिंदू समाजाची प्रचंड हानी झाली, हे मात्र स्पष्ट आहे.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 28/02/2024 - 20:35
अन्यायकारक उतरंड हा काय प्रकार आहे ? आणि तिचा वर्णाश्रमाशी काय संबंध ? विहित कर्मे म्हणजे ज्यातून आत्म्याचं हित होतं अशी कर्मे. ती करायलाच हवीत. ती करायची नसतील तर आळशीपणा गळ्यांत पडेल. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 29/02/2024 - 21:26
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते आणि विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची आणि मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही? हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना! ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले. हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती. परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय! म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.

गवि 29/02/2024 - 08:14
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म यांनुसार प्रत्येक व्यक्तीला फळ मिळणारच असेल तर मग पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग, अटक, फाशी असल्या भानगडी निर्माण करून मनुष्य त्यात ढवळाढवळ कशाला करतोय ? ;-) कॉमी यांची मांडणी अगदी योग्य आहे. आपण जे काही करतो त्याचे शास्त्रीय परिणाम (भौतिक, रासायनिक, जैविक इ) वगळता नैतिक परिणाम किंवा दीर्घकाळ हिशोब ठेवून कोण्या नियतीने त्याचे बक्षीस अथवा शिक्षा, चालू अथवा पुढील जन्मात बहाल करणे .. हे सर्व तर्कदुष्ट असण्याचे मुख्य कारण म्हणजे.. जगाचे (विश्वाचे) रहाट गाडगे चालू ठेवण्यासाठी हे सर्व सव्यापसव्य करण्याची निसर्गाला काही गरज असल्याचे दिसत नाही. कोणी ईश्वर, नियती, निसर्ग किंवा शक्ती असेलच तर तिला काय पडलीय ? नोंदवही ठेवा, फळ द्या. काय फरक पडतो ? कोणी कशाला असला उपद्व्याप करेल? आपण चांगले काही केले की समाधान देणारा, आणि वाईट काही केले की मनाला कुरतडणारा जो कोणी असतो तो म्हणजे आपणच. आपल्याच आत असतो तो. मानो या न मानो.

In reply to by गवि

नठ्यारा 29/02/2024 - 20:37
गवि, विनोदाचा भाग सोडला तर हा बळी तो कान पिळी या नियमास उत्तेजन देणारा संदेश वाटतो. तुम्ही उपरोधाने लिहिलंय ते कळतंय. पण नेमक्या याच युक्तिवादाचा आधार घेऊन अनेक नरपशूंनी असंख्य निरपराध्यांवर क्रूर अत्याचार केले आहेत. द्वेष्टे या कथेतला उमराव दु:खाच्या भरात अशीच काहीशी मांडणी करतो आहे. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 29/02/2024 - 11:56
हे सर्व सिद्धांत आणि काथ्याकूट मला समजत नाही आणि त्याच्यात फारसा रस ही नाही. पण सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो हा कार्यकारण भाव सोपा आहे पण "जीवनभर मैने एक भी सिगरेट नही पिया ना कभी तंबाखू का सेवन किया फार मुझे ये कॅन्सर क्यूँ हुआ हे प्रश्न विचारणाऱ्या रुग्णाला समर्पक उत्तर देणे कठीण आहे. स्तनाच्या कर्करोगाने नुकतीच माझी पुतणी २५ व्या वर्षी निवर्तली. पैसा असूनही आणि जगातील उत्तमात उत्तम उपचार करूनही काहीही उपयोग झाला नाही. अशा वेळेस प्राक्तन,दुर्दैव सोडून काय सांगणार? कालच चार वेळेस गर्भपात झाल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीला पाचव्यांदा गर्भ आतच दगावला आहे हे सांगणे आणि तिला ते स्वीकारणे किती कठीण आहे हे दुरून पाहणाऱ्याला समजत नाही. तिच्यात आणि नवर्यात काहीही दोष सकृतदर्शनी दिसत नाही( सर्व उपलब्ध तपासण्या केल्यावरही). random bad luck सोडल्यास कोणतेही कारण देता येत नाही. असं माझ्याच बाबतीत का घडतंय? आमचं पुण्य कुठे कमी पडतंय? असा टाहो फोडणाऱ्या मुलीला कसं समजवायचं. प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 29/02/2024 - 13:32
ज्यांना नाही होत जखमा कधी त्यांच्याच कडून दुस-यच्या दु:खाला दिलासा देणा-या गोष्टींची खिल्ली उडवली जाते. प्रत्येक गोष्ट तरतमभावात बसवण्याचा अट्टाहास असलेल्या लोकांना समजावणे गैर असते. आपण फुंकर घालून दिलासा द्यावा जसे जमेल तसे.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 29/02/2024 - 14:36
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.
यू सेड इट ! १०१% सहमत !

कॉमी 29/02/2024 - 19:34
पाचव्यांदा गर्भपात झालेल्या मुलीला असे सांगणे कितपत योग्य,की हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ आहे म्हणून ? तात्पुरते "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पण नंतर दुःखातून बाहेर आल्यावर पुन्हा तोच विचार केल्यावर मनावर काय ओरखडा उमटेल ? दोन पर्याय दिले आहेत वरील प्रतिसादात :
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही.
१. ईश्वरी इच्छा - ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का ? त्यामुळे ईश्वराबाबत प्रचंड कडवट होण्याची शक्यता नाही का ? आणि, इश्वरेच्छा हे सुद्धा "अज्ञात" म्हणण्याचा दुसरा मार्ग आहे. ईश्वराची अशी इच्छा का झाली ह्याला तरी कुठे उत्तर आहे ? मग वैद्यकीय गुंतागुंत जी समजावून सांगता येत नाही, ते एक अज्ञात आणि ईश्वर इच्छा हे दुसरे एक अज्ञात. निर्मळ अज्ञाताऐवजी कोणावर तरी दोष टाकणारे अज्ञात मानसिकदृष्ट्या मदत करणारे ठरेल काय ? २. पूर्वकर्म - आपल्या काही कृती मुळेच आपले गर्भ गेले हे खरोखरी त्या व्यक्तीने मान्य केले तर त्याचे काय मानसिक परिणाम होतील ह्याचा प्रत्येकाने विचार करून पहावा. ह्याबाबत एक अत्यंत भयाण बंगाली लघुकथा आठवते. सारांश लिहिलेला आत्ताच्या चर्चेच्या तुलनेसाठी पण खोडून टाकला. त्यामानाने सौम्य उदाहरण अमीर खानचा तलाश सिनेमा. अमीर खानचा मुलगा बोटिंग अपघातात बुडून मरतो. अमीर खान रात्रभर आपल्या हालचालींमध्ये कुठे उशीर झाला ह्याचा विचार करत असतो. तर असेच कोणाला तुमच्या पूर्व कर्मांची चूक आहे असे सांगणे long term मध्ये कितपत सांत्वनकारी ठरेल ? ह्यातून फुकाचा अपराधबोध तयार होईल त्याचे काय ? अर्थात, डॉक्टर साहेब त्यांच्या प्रोफेशनल अनुभवातून बोलत आहेत. माझ्यासारख्या अज्ञानी लोकांनी ह्याबाबत प्रश्न करणे चुकीचे होईल. हे फक्त माझे विचार मांडले आहेत.

In reply to by कॉमी

गवि 29/02/2024 - 19:52
+१ मुळात पराकोटीच्या दुःखाच्या क्षणी कोणी ही तात्विक चर्चा करतच नाही. विचारपद्धती ही सतत विकसित होत जाणारी एक learning method आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती ही देखील एक जीवन पद्धती असू शकते, आणि पराकोटीच्या दुःखद प्रसंगी देखील त्यातून तरून जाण्यास ती सहाय्यभूत होऊ शकते, किमान अधिक त्रासदायक किंवा वंचना करणारी ठरत नाही अशी कदाचित, ..कदाचित .. शक्यता काही जणांच्या बाबतीत असू शकेल हे साधारणतः अमान्य का ठरावे हे कोडे आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती बाळगणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात विदीर्ण करू पाहणारे दुःख बघितलेच नाही, तो कोरडा पाषाण जणू, असेच जगाला वाटत असावे का?

In reply to by गवि

चित्रगुप्त 29/02/2024 - 23:05
कोणताही 'विचार' ( - विचारपद्धती) मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ? -- मज निरोपावे. 'विचार' म्हटला की 'मन' आलेच, आणि मन हे 'संस्कारित'(च) असते.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 01/03/2024 - 11:46
ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का आपण म्हणत आहात त्यातील अनेक गोष्टींचे माझ्या कडे उत्तर नाही. सामान्य माणसाला टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी होणे मानसिक दृष्ट्या झेपणारे नसते. माझ्याच वाट्याला हे RANDOM BADLUCK का आले याचे उत्तर डॉक्टरांकडेच कशाला शास्त्रज्ञ बुद्धिवंत कुणाकडे नसतेच. अनेक टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःचा मृत्यू समोर आल्यावर भीतीने आस्तिक होताना पाहिलेले आहेत. हृदयाच्या बायपासचा शल्यक्रिया झाल्यावर छातीत पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर एक टोकाचे नास्तिक असणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व तर्हेचे भस्म उदि अंगारा लावून घेत होते आणि कालपर्यंत आमच्यासारख्या डॉक्टरांना कस्पटासमान लेखत होते ते आमच्या पुढे हात जोडून विनवणी करत होते. नाही देखील पंचानना तोंवरि जंबुक करी गर्जना. मृत्यू समोर ठाकल्यावर माणसांचा सर्व आवेश गळून पडतो. विकोपाला गेलेल्या कर्करोगी माणसाला आपला आजार शल्यक्रिया करण्याच्या पलीकडे गेलेला आहे असे सांगण्यापेक्षा आपल्याला शल्यक्रियेची गरज नाही, औषधी उपचार करू( केमोथेरपी) हे सांगणे जास्त सोपे असते. मग ते संपूर्ण सत्य नसले तरी. हातपाय गाळून बसलेल्या माणसाचे शरीर सुद्धा उपचारांना नीट साथ देत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. परमेश्वरावर आणि डॉक्टरांवर भरोसा ठेवा, तुमचा सगळं नीट होईल हे माणसाला दिलासा देऊन उपचाराला तयार करते मग ते असत्य असले तरी ही उपयुक्त असू शकते. तुमचा रुग्ण बरा होईल कि नाही हे मला माहिती नाही ते अज्ञात आहे हे उत्तर कितीही सत्य असले तरी रुग्णाला किंवा जवळच्या नातेवाईकाला पचणारे असेल का? रोज मृत्यूला सामोरे जाणारे रुग्ण पाहणारे डॉक्टर आस्तिक नसतील पण नास्तिकही नसतात. याचे कारण श्रद्धा (अंधश्रद्धा) माणसाला बळ देते हे त्यांनी पाहिलेले असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 06/03/2024 - 11:09
मानवी जीवनातली, किंबहुना अखिल विश्वातली प्रत्येक लहानमोठी घटना ही असंख्य निसर्गनियम-निसर्गचक्रांच्या परिणामी घडून येत असते. (अमूक एका स्थळी-क्षणी, हे नियम एकत्रितपणे येणे यालाच 'योगायोग' असेही म्हणता येईल) -- या नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते. -- अर्थात हा 'देव' म्हणजे राम, कृष्ण, महादेव, खुदा, गॉड, वेताळ, खंडोबा, बहिरोबा .... वगैरेपैकी नाही, तसेच त्याचा विविध कर्मकांडे, उपासना, श्रद्धा, प्रार्थना, बाप्तिस्मा, व्रतवैकल्ये, नमाज, स्तोत्रे, आरत्या, पूजा इत्यादिकांशीही काहीही संबंध नाही. 'देव' या शब्दाऐवजी 'नियती' 'कपाळावर लिहीलेले' वगैरे शब्दप्रयोगही प्रचलित आहेत. या अर्थाने बघता डॉक्टर किंवा कोणीही आस्तिक-नास्तिक व्यक्ती सुद्धा 'देवाळु' असू शकते. असो.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 06/03/2024 - 12:55
@ सुबोध खरे, अगदी यथोचित लिहिले आहे ! १०१+ तंतोतंत सहमत ! या वरून एक कविता आठवली : (या चर्चेशी संबधित असावी अ थ वा नसावीही : एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते कि कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्यायीची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा.. कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लागते देवालाच म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर तात्कळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून मधून.. तुमचा विश्वास नसेल आमच्यावर पण आमचा तर आहे ना!’ देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे! - कवि तुम्ही ओळखालच या कवितेचे प्रत्यक्ष सादरीकरण बहारदार असते.

नठ्यारा 29/02/2024 - 23:26
स्वधर्म, तुमचा इथला संदेश वाचला. एकेक विधानं पाहूया. १.
परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय!
हे कुठेही लिहिलेलं वा सिद्ध केलेलं नाही. जुलुमी परकीय राजवटींच्या विरुद्ध सतत उठाव होत आलेले आहेत. बंदा बैरागी तर संन्याशी असूनही हाती शस्त्र धरता झाला. २.
म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.
परकीयांनी अनेक शतके भारतावर राज्य केले, हा निव्वळ गैरसमज आहे. संपूर्ण भारत कधीही कुणाच्याही एक्छात्री अंमलाखाली नव्हता. अगदी सर्वोच्च केंद्रीभूत इंग्रजी सत्तेच्या उत्कर्षकाळातही असंख्य संस्थाने अस्तित्वात होती. त्यांच्यात १/४ जनता व १/३ प्रदेश समाविष्ट होता. बाकी, कर्मसिद्धांतात ढवळाढवळ करता येत नसते. आणि धर्मव्यवस्था म्हणजे कर्मसिद्धांत नव्हे. हा सिद्धांत अधर्माने वागणाऱ्यासही लागू पडतो. आपल्या समाजाचं नुकसान झालं ते धर्म न पाळल्याने. ३.
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते
वर्ण म्हणजे कल. एखाद्याला ज्या कामाची आवड असेल तो त्याचा वर्ण होय. आवडतं काम करायला मिळणं ही चैन आहे. हिचा अन्यायाशी कसलाही संबंध नाही. वर्णव्यवस्था अन्यायकारक आहे ही इंग्रजी भूलथाप आहे. ४.
विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची
वैदिक धर्मानुसार कोणतंही काम हीन नाही. अमुकेक काम हीन आहे हे तुम्ही स्वत:च ठरवलं आहे. याबाबत भंगी समाजाचं उदाहरण ठाशीव आहे. हिंदू राजपुतांचा मानभंग करण्यासाठी म्हणून जेत्या परकीयांनी त्यांना डोक्यावरून मैला वाहून न्यायचं काम करायला लावलं. अशा रीतीने त्या क्षत्रियांचा मानभंग झाला म्हणून त्यांना जुलुमी परकीयांनी भंगी अशी संज्ञा दिली. तरीही त्या शूर राजपुतांनी हिंदू धर्म सोडला नाही. त्यांची धर्माप्रती निष्ठा अभंग व अविचल राहिली म्हणून मी त्यांना अभंगी म्हणतो. वास्तविक सफाई कामगारांना भंगी म्हणायची काहीच गरज नाहीये. ५.
मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही?
करा की हवा तेव्हढा व्यापार आणि मिळवा की हवं तेव्हढं ज्ञान. कोणी अडवलंय? असं कोणी कोणाला अडवल्याचं काहीतरी उदाहरण आहे का? ६.
हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना!
शूद्र वर्ण आहे. जन्म नाही. ७.
ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले.
या अर्थाचा हिंदू धर्मग्रंथात वा इतर पुस्तकांत स्पष्ट उल्लेख आहे का? याउलट महाभारतात युधिष्ठिरास धर्मव्याध या खाटीकाकडून धर्मरहस्य जाणून घ्यायचा उपदेश कोण्या एका ऋषींनी केला. त्याप्रमाणे युधिष्ठिराने खाटकाकडून धर्माची शिकवण घेतली. ८.
हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती.
असे कितीतरी पोटार्थी जन्मब्राह्मण युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या काळी होते. त्यांना शेतकीचे ब्राह्मण म्हणंत. अशांना त्याने मुख्य वेदीच्या जवळपासही फिरकू दिलं नाही. आणि हेच योग्य आहे. असो. धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयी गैरसमज जास्त आणि ठोस माहिती कमी आहे. प्रत्यक्षांत परिस्थिती फार वेगळी आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 01/03/2024 - 19:09
नठ्यारा, असल्या चर्चांमधून मला कळलं ते असं की धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयीची व्यक्तीची मते ही ती व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीतून आली आहे, यावर बव्हंशी अवलंबून असतात. ती सहसा बदलू शकत नाहीत व पुढे जाऊन चर्चेत थांबावे लागते. सहसा व्यक्तीस आहे तीच मते आजूबाजूचा विदा घेऊन बळकट करण्याचा कल असतो. पूर्ण वस्तुनिष्ठ दृष्टीकोन बहुधा कोणालाच घेता येत नाही, असे चित्रगुप्त यांनी वर म्हटले आहेच. पण नविन माहिती आली तर आपले आजवरचे मत दुरूस्त करण्याचा लवचिकपण फार फार थोडे लोक दाखवतात, असा अनुभव आहे. मी गीता वाचणे, समजून घेणे, चिंतन करणे व आचरणात आणण्णाचा प्रयत्न करणे, हे केले आहे. गीतेच्या सरांना खूप प्रश्न विचारायचो. शेवटी काही कल्पना (उदा. पुनर्जन्म) ‘सबजेक्ट थू व्हेरिफिकेशन’ मान्य केल्याशिवाय कर्मसिध्दांत पटू शकत नाही आणि आपण तो व्हेरिफाय करू शकत नाही. इथे मला थांबावे लागले. त्यानंतरही डॉ. आंबेडकर यांचे अनहिलेशन ऑफ कास्ट वाचण्याएवढे मनाचे दार किलकिले राहिले. त्यांनी वर्णाबद्दल लिहिले असून ते समाजात असू का शकत नाहीत याचे बिनतोड उत्तर दिले आहे. लोक काय मानतात यापेक्षा कसे जगतात हे जास्त महत्वाचे आणि आपण समाज म्हणून कसे जगलो हे आपल्या समोर आहेच. मग काय, सुटलो तावडीतून धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था यांच्या. पण तुमचे मत मात्र असेच राहिल असे वाटते. त्याचा आदर आहे.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 01/03/2024 - 19:56
स्वधर्म, तुम्हांस एक थेट प्रश्न विचारतो. जर पुनर्जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही कर्मसिद्धांत मानाल काय? हो म्हणायची सक्ती नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 01/03/2024 - 20:32
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो. समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल. कुठलातरी ग्रंथ, कुणाचा तरी यू ट्यूब व्हिडिओ ह्याला पुरावा मानता येणार नाही.

In reply to by स्वधर्म

कॉमी 01/03/2024 - 20:43
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 01/03/2024 - 21:55
स्वधर्म,
समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल.
तुम्ही म्हणता की तुम्हाला मागील जन्म आठवले तर विश्वास ठेवता येईल. तसे कोणालाच आठवंत नसतात. तरीपण काही विशिष्ट व्यक्तींना ते आठवतात. त्यांचा पुनर्जन्म झाला आहे यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 02/03/2024 - 19:52
>> अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? ते सांगा ना आधी. असो. मी आधी म्हटल्याप्रमाणे पुनर्जन्म ही संकल्पना 'अनव्हेरिफाएबल' न पडताळता येणार्या आहेत. तुंम्ही जर अशा लोकांचे केवळ 'सांगणे' हा पुरावा मानत असाल, तर नाही. त्याची पडताळणी कशी करायची याची व्यक्तीनिरपेक्ष, सर्वांना अवलंबून बघता येणारी पध्दत तुंम्हालाच सुचवावी लागेल. असे करून जर एकच निष्कर्ष आला, तर मग विश्वास ठेवण्याचा विचार करता येईल. पण ते पुढे, आधी वरील प्रश्नाचे उत्तर द्या.

In reply to by स्वधर्म

नठ्यारा 03/03/2024 - 19:51
स्वधर्म, जर पुरावा नसेल तर मी माझ्या श्रद्धांचा त्याग करायला तयार आहे. पण ती वेळ येणार नाही कारण की पुरावा सज्जड आहे. तुम्ही पुनर्जन्म अपडताळणीय म्हणता हे पार चुकीचं आहे. पुनर्जन्माच्या अनेक घटना डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी आपल्या पुस्तकांत चर्चिल्या आहेत. पुस्तकाविषयी माहिती इथे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation-ebook/dp/B004EYSWWG पडताळणी करूनंच पुनर्जन्म आहे हे सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रसंगांत सदर बालकाच्या कथनावरून पूर्वजन्मीचे नातेवाईकही शोधण्यांत आले आहेत. आणि त्यांनी पूर्वजन्मीच्या व्यक्तीच्या विदांची पुष्टी केलेली आहे. काही प्रसंगांत पूर्वजन्म हिंसक पद्धतीने संपुष्टात आल्याच्या खुणाही बालकाच्या अंगावर आढळल्या आहेत. इतका भरभक्कम पुरावा असल्यावर कोण पुनर्जन्म नाकारेल? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Interestingly, and contrary to most religious notions of reincarnation, there was zero evidence of karma. On the whole, it appeared to be a fairly mechanical soul-rebirthing process, not a moralistic one. What those mechanisms involve, exactly, is anyone’s guess—even Stevenson’s.
ही पुनर्जन्माची प्रक्रिया मेकॅनिकल दिसते थोडी. म्हणजे, पुनर्जन्माचे पुरावे ग्राह्य धरले तरी कर्मसिद्धांत सिद्ध होत नाही आणि इयन स्टेव्हनसन यांच्या विद्यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही जो कर्मसिद्धांत सिद्ध करेल. यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे. पुनर्जन्म आणि एकंदरित कॉस्मिक गोष्टी एकमेकांना पूरकच आहेत. गमंत म्हणजे चरकसंहितेत एकंदरीत सेंटिनेल जीव कोण यावर बराच खल केला आहे. या मध्ये मानस, शरीर आणि आत्मा/पुरुष या तीनही वेगवेगळ्या गोष्टी मानल्या आहेत. विषेशतः मानवी जन्माची प्रोसेस वाचताना हे लक्षात आले की पुरुष हा गर्भात मिसळतो. (का मिसळला जातो?) नुकतेच विश्व हे लोकल आणि रियल एकाच वेळेस असू शकत नाहीत या संशोधनाच्या कर्त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यावरून आपल्याला एकंदरीतच काहीही झ्याटभर सुद्धा माहित नाही असे वाटते इतके सगळे बिझार आहे. कुछ तो गडबड है दया!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सतिश गावडे 05/03/2024 - 09:53
यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे.
या पुस्तकाचा संदर्भ/दुवा देता का?

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 05/03/2024 - 16:30
तुंम्ही दिलेल्या दुव्यावरून पुस्तकाची माहिती व परिक्षणे वाचली. पुस्तक चांगली भरपूर माहिती गोळा करूनच लिहिले आहे, पण परिक्षणे मात्र संमिश्र आहेत. काही लोकांना हे पुस्तक ‘रोचक’ वाटलेले आहे. काहिंनी त्याला अपूर्व योगायोगांची जंत्री म्हटले आहे तर काहिंनी सदर लेखक हे वैद्यकिय विषयातले एम. डी. आहेत का असा संशय व्यक्त केला आहे. एकूणात, हे पुस्तक हा पुनर्जन्माचा ठोस पुरावा आहे, असे मात्र मानता येणार नाही, असे वाटते. त्याचे कारण म्हणजे या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही. तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल. अर्थात, मी पुस्तक वाचले नाही, पण पुस्तकातील विभाग व परिक्षणे वाचून असे जाणवते. समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते. तुंम्ही आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे. सयामी जुळे का होतात अशासारख्या संख्याशास्त्रीय दृष्ट्या अगदी कमी आढळणार्या गोष्टीसुध्दा सिध्द करता येतात. पण ते असते हे प्रत्यक्ष दिसते, व का व कसे होते हे कुणालाही पडताळून पाहता येते. तसा काही पुरावा या पुस्तकात असल्याचे वाचक म्हणत नाहीत. कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला. कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता, असे ववाते.

In reply to by स्वधर्म

राघव 04/03/2024 - 23:20
पुरावे कदाचित ढीगभर दिले जातील आणि सरळ नाकारलेही जातील. कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवाला आली नाही/येत नाही म्हणून ती नसतेच ही मानसिकता चुकीची आहे इतकंच. पुनर्जन्माबद्दल मांडणारी दोन पुस्तकं आहेत. दोन्ही जबरदस्त आहेत. अर्थात् हे कर्मविपाकाबद्दल बोलत नाहीत पण कर्मफला बद्दल बोलतात. मननीय आहेत. मेनी मॅन्शन्स - लिंक मेनी लाईव्ज, मेनी मास्टर्स - लिंक नाकारायला काहीच लागत नाही. पण पटलं तर मान्य करायला खूप काही लागतं. असो.

In reply to by स्वधर्म

Bhakti 01/03/2024 - 20:12
चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय तत्वज्ञान समजून घ्यायला खुप आवडतं.पण कर्मविकाप सिद्धांत आणि पुनर्जन्म आले की बुद्धीभेद होतो.सुवर्णमध्य म्हणतात तो तरी कुठवर साथ देणार?शेवटी मनाशी प्रामाणिक राहत पुढे जायला आवडतं, अवलंबले जाते.

चित्रगुप्त 01/03/2024 - 23:01
बहुतांश लोकांना - अगदी लहान मुलांसकट - कुणी उपदेश केलेला सहसा आवडत नाही (अपवादः एकाद्याला अतिशय आदरणीय असलेल्या व्यक्तिकडे मुद्दाम उपदेश ग्रहण करायला म्हणून गेल्यावर लाभणारा उपदेश) परंतु तोच उपदेश अप्रत्यक्ष रीत्या, गोष्टींच्या स्वरूपात सांगितला गेला तर तो भावतो. उदा. इसापनीति, कथासरित्सागर, जातककथा, रामायण, महाभारत वगैरेतील कथांमधून होणारा बोध. --- याबद्दल माझे अनुभवः माझी सुमारे चार वर्षांची नात कारमधून बाहेर जाताना पट्टा लावणे, रात्री दात घासणे वगैरे अजिबात करायला तयार नसायची. मग मी तिला अमूक नावाची एक मुलगी होती, ती पट्टा लावायची नाही, मग एक दिवस ती गाडीतून पडली, आणि तिला खायला वाघ, सिंह, मगर, कोल्हा, अजगर...... ( लांबलचक यादी) प्राणी जमा झाले आणि तिला चावू लागले, मग बाबांनी येऊन त्या प्राण्यांना हाकलून लावले, दवाखान्यात जाऊन कडू औषध घ्यावे लागले..... मग ती पट्टा लावू लागली... वगैरे लांबलचक गोष्ट सांगायचो. मग तीच गोष्ट अगदी रोज सांगावी लागायची, आणि त्यात माझी जराशी चूक झाली, की ती मला थांबवून आबा, कोल्हा राहिला.. वगैरे दुरुस्ती करायची. मात्र याचा परिणाम म्हणून ती न चुकता पट्टा लावू लागली. -- मग दात घासण्याबदल आणखी वेगळी गोष्ट (यात दातात अडकलेले अन्न खायला रात्री खूप किडे तोंडात यायचे, आणि ते खाऊन तिथेच शी-सू करायचे त्यामुळे तोंडातून खूप घाणेरडा वास यायचा वगैरे...) रात्री लवकर झोपण्याबद्दल, पौष्टिक खाण्याबद्दल, छोट्या बहिणीला त्रास न देण्याबद्दल अश्या अनेक त्याच त्याच गोष्टी रोज सांगाव्या लागायच्या पण त्या सर्वांचा यथायोग्य परिणाम झाला. माझ्या कल्पकतेलाही अफाट कुरण लाभले. ..... अमूक एक सत्य त्याच्या निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा विविध काल्पनिक गोष्टींच्या स्वरूपात रंगवून सांगितले, तर ते अधिक परिणामकारक ठरते, या अनुभवातूनच जगभरातल्या सर्व संस्कृतींमधे विविध पौराणिक/धार्मिक कथा जन्माला आल्या असाव्यात, असे मला माझ्या अनुभवावरून तरी वाटते. काल्पनिक साहित्य, चित्रे, गाणी वगैरेंचा जनमानसावर किती घट्ट परिणाम होत असतो याचे एक उदाहरण: माझे लग्न झाले, तेंव्हा माझ्या सुशिक्षित बायकोची अशी समजूत होती, की राम, सीता, कृष्ण, शंकर, लक्ष्मी, सरस्वती वगैरे देव खरोखर अस्तित्वात असून ते कॅलेंडरात वगैरे दाखवतात, हुबेहूब तसेच दिसतात. मग मी सांगितले की ही सगळी चित्रकारांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली चित्रे असून ती प्रिंटिंग प्रेस मधे छापली जातात. या गोष्टीचे तिला खूप आश्चर्य वाटले होते. 'रामायण' सिरीयलमधील अरूण गोविल वगैरे अभिनेत्यांना लोक देव का मानायचे याचा उलगडा यातून होतो. माझ्या ओळखीच्या एका सुशिक्षित ख्रिस्ती माणसाची 'गॉड' हा एक पांढरी, भव्य दाढी असलेला वृद्ध असून तो आकाशात खूप उंचावर रहातो, अशी पक्की समजूत अजूनही आहे. थोडक्यात काय, तर काल्पनिक गोष्टींना सत्य मानणारे लक्षावधी लोक सर्व काळात असतात, आणि त्यांना त्याच स्वरूपात सांगितलेले पटत असते. त्यांना कितीही समजावले तरी उपयोग होत नसतो म्हणून त्यांना पटेल, अशा स्वरूपातच सांगणे आवश्यक ठरते.

वामन देशमुख 02/03/2024 - 19:55
सुविचार "जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते."* - फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअर "जग हे तर्काच्या कर्कश्यतेवर चालत नसून ते व्यवहाराच्या लवचिकतेवर चालत असते." - किरकोळ मिपाखरू वामन देशमुख बोधकथा "आई, मी बाहेर खेळायला जाऊ?" "नको बाळा, बाहेर किती ऊन आहे!" "आई, जाऊ दे नं, मला खेळायचं आहे" "नको रे बाळा, तुला ऊन लागेल!" "तू सारखं असंच म्हणतेस, मला खेळूच देत नाहीस! जाऊ दे नं मला." "जा मर, पुन्हा सांगू नको मला!" वरील "जा मर" या या शब्दप्रयोगातून, आईला आपले मूल उन्हामुळे मरून जावे असे वाटत असेल का? शब्दकोशाधारित व्याकरण तर तसे सांगते. तुम्हाला काय वाटते? तत्वविवेचन ईश्वर आहे की नाही, कर्मविपाक सिद्धांत खरा की खोटा, पुनर्जन्म असतो की नसतो, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सर्व बाबी सुजाण-अजाण विद्वानांच्या चर्चेचा भाग आहेत. जगाचे व्यवहार त्यावर चालत नाहीत. जगाचे व्यवहार लवचिक, वाजवी, मानवी संवादाधारित देवाणघेवाणीवर चालतात. युक्तिवाद तर्काच्या फूटपट्टीवरच राहून जातो, जगरहाटी मानवी भावनेला धरून पुढे चालत राहते. ईश्वरअस्तित्वाची असत्यता कदाचित तर्क सिद्ध करून दाखवेल, मानवी भावना ते मानेलच याची खात्री नाही. एखाद्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता, संबंधित औषधोपचाराइतकीच त्या रुग्णाच्या मनाच्या उभारीवरदेखील अवलंबून असते. ती मनाची उभारी येण्यासाठी विज्ञानाकडे ज्ञात उपाय नाही; अध्यात्माकडे अनेक ज्ञात उपाय आहेत. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे असे विज्ञान म्हणते, "बाबा मी तुला रोज दारू आणून देतो, पण तू आईला मारू नकोस" असे "वास्तव"मधील डेढफुट्या म्हणतो! हे ज्याला उमगले तो नक्कीच शहाणा, ज्याला उमगले नाही तो कदाचित विद्वान किंवा अविद्वान! संदर्भ स्पष्टीकरण *"जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते" हे फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअरचे वाक्य आहे. "सामाजिक व्यवस्था सुसंस्कृतपणे चालण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे" या त्यांच्या व्यापक भूमिकेचा हा सार आहे. व्हॉल्टेअर हे भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य यांचे पुरस्कर्ते होते व धर्मकारण-राजकारण वेगवेगळे असावे या मताचे होते!

नठ्यारा 06/03/2024 - 20:32
स्वधर्म, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. तुमची एकेक विधानं पाहूया. १.
.... या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही.
यांत अनैसर्गिक काय आहे? २.
तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल.
पूर्वजन्मीच्या आघाताची खूण बालकाच्या चालू जन्मातील शरीरावर उमटणे हा समज नव्हे. ते मानसशास्त्रीय घटीतही नव्हे. हे पुनर्जन्माकडे अंगुलीनिर्देश करणारं वास्तव आहे. पुनर्जन्म माना वा ना माना. ३.
समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते.
नेमक्या अशाच शक्यतांचा मागोवा घेऊन शास्त्रज्ञांनी अनेक रहस्ये उलगडली आहेत. त्यांच्या यादीत पुनर्जन्म का नको? निदान यादीत सामील करायला काय हरकत आहे? ४.
आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे.
मलातरी कन्फर्मेशन बायसची गरज नाही. कोण्या बालकाच्या मनांत पूर्वजन्मीच्या स्मृती अचानक का जागृत होतात, यावर संशोधन व्हायला हवं. बस इतकंच मला वाटतं. पुनर्जन्म असो वा नसो. ५.
कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर आक्षेप असणे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीवर आक्षेप घेणे नव्हे. न्यूटनचा सिद्धांत अमान्य असला तरी डोंगरावरून दरीत कोणी उडी मारीत नाही. वस्तू खाली पडतात ही सार्वत्रिक अनुभूती आहे. तद्वत कर्मविपाक ही सार्वत्रिक अनुभूती आहे. ६.
कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता,
तसा झालाय. म्हणूनंच कर्मसिद्धांत विकसित झाला आहे. केवळ हिंदूंतच नाही तर जगातल्या इतर पंथोपपंथांतही कर्मविपाक आहेच. असो. या घडीला पुनर्जन्म ही अमन्य वा अमान्य करायची गोष्ट नसून अधिक संशोधन करायचा विषय आहे. बाकी, भूक तहान वगैरे बाबी दिसंत नसल्या तरी अस्तित्वात असतात. तसाच कर्मविपाकही अस्तित्वात आहे. पुनर्जन्म ही त्याची पडछाया आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 08/03/2024 - 20:16
आपण म्हणता तसे, पुनर्जन्म ही मान्य किंवा अमान्य करण्याचा विषय नसून अधिक संशोधन करण्याचा विषय आहे. असो बापडा, आमच्यासारख्यांची काहीही हरकत नाही. ज्यांना त्यात रस असेल ते करोत की संशोधन त्यात. आमच्यासारख्यांसाठी महत्वाचं हे की त्याचा आंम्हाला (किंवा तुंम्हाला) काही पडताळा येतो का, काही उपयोग होतो का? हे तुमच्या बाबतीत तर तुंम्ही काही सांगितले नाही. पडताळणी शक्य नसल्याने त्यावर घातलेला वाद हा निव्वळ बौध्दिक करमणूक आहे. फक्त कुणी त्याचा आधार घेऊन चुकीच्या समजूतीपायी आपल्या अन्यायकारक परिस्थितीचा दोष मागील जन्मातील कर्मावर ढकलून अन्याय, शोषण याविरूध्द काही करण्याचे टाळू नये. बाकी सकाळी भरपूर नाष्टा केल्यामुळे दुपारी कडकडून भूक लागणार नाही, इतपत कर्मविपाकावर विश्वास आहेच मुळी. फक्त ते आधीच्या जन्मातलं आहे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे बघा. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर, गणितात तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल आले, तरी ते सोडवणं किती अवघड बनतं. आपण राहतो त्या जगात तर अनंत चल घटक आहेत आणि ते सतत परस्परांवर परिणाम करत राहतात. यामुळे एखादी भाग्य व दुर्भाग्यकारक घटना घडली तर कोणतेतरी अत्यंत गुंतागुंतीचे आपल्या मानवी क्षमतेने उलगडा न होऊ शकणारे कारण असणार, हा विचार पुरेसा आहे. यावर आपल्या मागील जन्मातल्या कर्माचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्यावर फोकस करून चालणंच महत्वाचं आहे.
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते. तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.

भारताच्या तुलनेत

उपयोजक ·

कंजूस 03/01/2023 - 05:45
१)भारतातील सुस्तपणा. एखादी गोष्ट चोख व्हावी याचा आग्रह नसतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीला एक गुप्तपणे/उघड राजकीय विरोध असतो. २)गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांची सांगड घातली जात नाही. विद्यालये, महाविद्यालये इथे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ तयार होतात. पण त्याची गती मंद आहे किंवा आव्हानं स्विकारण्यात वेळ घालवतात. मग तज्ज्ञ लोक ठामपणे उद्योगांना आपल्या इथे बनवलेले शोधलेले तंत्रज्ञान देण्यात मागे पडतात. ३)वचनाला जागणे याचा अभाव. या तीन गोष्टी प्रगतीला मारक आहेत.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 08:23
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 08:23
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

नेत्रेश 03/01/2023 - 10:33
भारतात १४०० कोटी लोक रहातात. त्यातले १ - २ कोटी लोक बाहेरच्या देशांत गेले तर असा काय फरक पडणार आहे? झाला तर थोडाफार देशाला व बाहेर जाउ ईच्छीणार्‍या पुढच्या पीढीला फायदाच होईल. बरेचसे दुसर्‍या देशांत गेलेले लोक जास्त पैसे कमवायलाच गेलेले असतात. तीथे बहुतेकवेळा भारतापेक्षा कितीतरी जास्त संधी आणी कमी स्पर्धा असते. परदेशातील चांगल्या सुखसोईंची व आरामशीर जीवनाची सवय होउन त्याची परीणीती तीथेच स्थायिक होण्यात होते.

In reply to by नेत्रेश

साहना 06/01/2023 - 06:07
Quality ओव्हर Quantity ! कुठल्याही समाजांत बहुतेक प्रगती हि फक्त १०-२०% लोकपासूनच होते. ह्याला Pareto तत्व म्हणतात. त्यामुळे हे लोक गेल्यास समाजाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे देशांत खूप लोक आहेत १-२ कोटी गेल्यास फरक पडत नाही हे नेहमीच बरोबर नाही. युगांडा मधील शेती व्यवस्था आपले गुज्जू लोक सांभाळत होते आणि ते चांगले श्रीमंत होते. ईडी अमीन सत्तेवर आल्यानंतर त्याने रातोरात ह्यांना हाकलून लावले. युगांडा ची शेती व्यवस्था युगांडा मधील कृष्णवर्णीय लोक चालवू शकले नाहीत आणि अर्थव्यवस्था कोलमडली. गुज्जू मंडळी लंडन मध्ये निर्वासित म्हणून गेली आणि काही दशकांत ती मंडळी आता लंडन मधील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. पण भारताच्या बाबतीत आपले म्हणणे बरोबर आहे. भारत बऱ्यापैकी मागासलेला असल्याने भारतातील उच्चशिक्षित मंडळीच नाही तर अगदी साधारण शिक्षित मंडळी सुद्धा विकसित देशांत जाऊन कैक पटीने पैसे कमावू शकते. आणि ह्या पैश्यांतील १०% जरी त्यांनी भारतात पाठवले तर भारतात राहून त्यांनी जितका पैसा कमावला असता त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त पैसे असतात. साधा ट्रक ड्राइवर वर्षाला भारतांत फार तर २ लाख कमावू शकतो. तोच माणूस कॅनडात गाडी धुण्याचे काम करत २ लाख रुपये सेविंग्स म्हणून भारतात पाठवू शकतो. त्यामुळे मागासलेल्या देशांतील लोक विकसित देशांत गेल्यास मागासलेल्या देशाला जास्त फायदा होतो. हळू हळू मागासलेला देश प्रगत होत जातो आणि हा फरक कमी होत जातो. चीन आणि कोरिया ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

काही मुद्दे १. भारतातील बेशिस्त-- कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे, जागा बळकावणे, बेकायदा बांधकामे आणि त्याला असलेले राजकीय पाठबळ, रस्त्यात हिंडणारे प्राणी, भिकारी, सिग्नल न पाळणारे, राँग साईडने गाड्या चालवणारे लोक २.प्रदूषण,घाण आणि कचरा- कुठेही कचरा टाकणे,थुंकणे,विधी उरकणे,पाळीव प्राण्यांची जिन्यात्,रस्त्यात घाण, हायवेच्या बाजुला कचरा जाळणे ३. बेकारी- तुलनेने महाग होत चाललेले शिक्षण आणि नंतर मिळणार्‍या संधीचा/नोकर्‍यांचा अभाव, सगळीकडे वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यामुळे कमी पैशात जास्त श्रम करायला भाग पडणे ४. कौटुंबिक कलह,हेवेदावे- कुटंबापासुन दूर राहुन कोणाची ढवळा ढवळ सहन न करता शांतपणे जगण्याची इच्छा, फॉरेन स्टाईल जीवनशैलीचे आकर्षण दुसर्‍या बाजुने बघितल्यास १.रशिया युक्रेन युद्ध, कोव्हिड, ब्रेक्झिट, वाढती महागाई यामुळे कुठल्यही देशात नवरा बायको दोघांना नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात निदान आपल्याला दरवर्षी ७ टक्के माहागाई वाढण्याची सवय आहे, पण सध्या परदेशात ईंधनाचे दर दुप्पट झाल्याने भयंकर परीस्थिती आहे. माझे कॅनडातील मित्र जे महिना ४०-५० डॉलरचे पेट्रोल आणि ७००-८०० मध्ये महिन्याचा किराणा घेत होते ते आता त्यासाठी २०० डॉलर आणि १५०० डॉलर पर्यंंत खर्च करत आहेत. अमेरिकेत आणि ईंग्लंड्मध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. २. भारतात अजुनही काही प्रमाणात सपोर्ट सिस्टीम टिकुन आहे. नातेवाईक, शेजारी पाजारी मदत करतात. वेळ पडल्यास पैसे टाकुन कामवाल्या बायका,ड्राय्व्हर, पाळणाघरे, नर्सेस, स्विगी,झोमॅटो,ओला/उबेर्,बिग बास्केट सगळे घरपोच मिळते. ३. वर्ण द्वेष- काही दिवसांपुर्वी कायप्पावर एक व्हिडिओ बघितला. फ्रान्समधील कुठल्याशा शहरात स्थलांतरीत मुस्लिम लोक रस्त्यात नमाज पढत आहेत आणि वैतागलेले खोळंबलेले कार वाले लोक त्यांना शेवटी ओढुन रस्त्यातुन हटवत आहेत. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्लेही काही नवीन नाहीत. थोड्याफार फरकाने सर्वच देशात ही अवस्था आहे कारण बाहेरचे लोक येउन आपली नोकरी घालवत आहेत हे कोणालाच आवडणार नाही. त्यात ते स्थानिक कायदे पाळत नसतील तर अजुनच. परदेशात स्थायिक झालेले मिपाकर सध्याच्या परीस्थितीवर जास्त चांगला प्रकाश टाकु शकतील.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नेत्रेश 03/01/2023 - 14:00
कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे - अमेरीकेत तरी सर्वत्र बेघर लोक कुठेही तंबु ठोकुन खुशाल राहु शकतात. कायद्याचे संपुर्ण संरक्षण त्यांना आहे. लॉस एंजलिस व सॅन फ्रांसिस्को सारखी शहरे या बेकायदा झोपडयांनी बकाल केली आहेत. काही ठिकाणी तर भर दिवसा जायला भीती वाटते. ते लोक रस्त्यावरच सर्व वीधी उरकतात व दीवसभर नशेत पडुन असतात. पालिकेचे कचरेवाले तीथे साफसफाई करायला जात नाहीत. लै बेकार परिथिती आहे. पेट्रोलचे दर जरी डबल झाले तरी फारसा फरक पडत नाही. काही काळाने कमी होतात. १५०० डॉलर किराणाव कुणी खर्च करत नाहीत. ५०० डॉलर्सच्या आसपास महीन्याचा किराणा आरामात भागतो. पगार मजबुत असतो. नवीन कॉलेज ग्रॅज्युएट मुलांना आरामात दीड ते दोन लाख डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. तेव्हा लोकांना फारसा फरक पडत नाही. आपल्या भारतीय लोकांनातर अजीबातच नाही.

In reply to by नेत्रेश

फ्रेशर पास आउट मुलांना १.५-२ लाख डॉलर पगार? तोही आरामात? आणि महिन्याचा कुटुंबाचा किराणा ५०० डॉलर्समध्ये? डिटेल्स द्या की राव, लगेच माझ्या मुलाला तिकडेच पाठवतो पुढे शिकायला. जमल्यास फॅमिली रि युनियन वगैरे करुन मी पण येतो की तिकडेच, हा का ना का.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नेत्रेश 03/01/2023 - 21:33
जरुर पाठवा. हल्ली बरेच भारतीय आपल्या मुलांना १२ वे नंतर अमेरीकेतल्या स्टेट कॉलेजेसमध्ये पाठवतात. फी थोडी कमी असते.

In reply to by नेत्रेश

उपयोजक 09/01/2023 - 19:26
बेघर लोकांनी 'अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान देशात' ही अशी बकाल परिस्थिती निर्माण करुनही त्यांना कायद्याचे इतके संरक्षण का? अमेरिका धनाढ्य नि प्रगत देश असूनही या लोकांना साधी मोफत घरे बांधून देण्यात अमेरिकेला अडचण काय असावी?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 03/01/2023 - 17:33
@ राजेन्द्र मेहेंदळे: सगळे मुद्दे यथोचित मांडलेले आहेत. सहमत आहे. अमेरिकेत मी मुलाबरोबर दर शनिवारी बाजाराला जायचो. गेल्या वर्षीपर्यंत दरमहा भाजीपाला, फळे आणि दूध यालाच ५०० डॉलर्स लागत होते. हल्लीचे माहीत नाही. पॅरिसमधे महागाई खूपच वाढलेली आहे आणि आणखीही वाढतच आहे. १९९१ पासून आम्ही रहात असलेले दिल्लीजवळचे फरिदाबाद शहर आता इतके घाणेरडे झालेले आहे की घराबाहेर पडणेही नकोसे वाटू लागले होते, त्यामुळे तिथे बांधलेले घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 17:52
सध्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे, जनतेच्या हिताचे प्रश्न व समस्या खालीलप्रमाणे - १) संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक २) महाराष्ट्र धर्म की हिंदू धर्म ३) औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला की हत्या केली ४) औरंगजेब हिंदूद्वेष्टा होता की नव्हता? ५) महापुरूषांचा अपमान राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष करताहेत की सत्ताधारी भाजप? ६) महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचे पुतळे जाळायचे की त्यांच्या तोंडावर शाई फेकायची? ७) शिवाजी महाराजांचे खरे समर्थक राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष की सत्ताधारी भाजप? ८) खरे कडवे हिंदुत्ववादी शिल्लक सेनावाले की मनसेवाले की भाजप? ९) सावरकर माफीवीर की स्वातंत्र्यवीर? १०) बाळ ठाकरेंच्या धगधगत्या हिंदुत्ववादी विचारांचे (!) खरे वारसदार बा. शिवसेना की शिवसेना (उबाठा)? ११) उर्फी जावेद असभ्य वेशभूषा करते की सभ्य वेशभूषा करते? १२) नागपुरातील संघ कार्यालयात एकनाथ शिंदेंनी गुलाल लावलेली लिंबे ठेवली की उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी गुलाल लावलेली लिंबे ठेवली? १३) उठांच्या सभेला जास्त गर्दी होती की एकनाथ शिंदें च्या सभेला? १४) भगव्या बिकिनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाला की नाही झाला? १७) महापुरूषांच्या तथाकथित अपमानाविरूद्ध आवाहन केलेला महाराष्ट्र बंद यशस्वी की अयशस्वी? १८) मुंबईतील महामोर्चा यशस्वी की अयशस्वी? १९) जात्याधारीत जनगणना हवी की नको? २०) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ न ठेवता निवडणूक घ्यावी की न घ्यावी? या अत्यंत गंभीर समस्या व प्रश्नांवर विचार करून योग्य उत्तर शोधण्याऐवजी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित युवक-युवती परदेशी जाण्याचा पलायनवादी मार्ग स्वीकारत आहेत, यासाठी त्यांचा जाहीर निषेध करतो.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरूजी एक महत्वाचा मुद्दा विसरलात,आरक्षण. बाकी अमरिकेत थोडे दिवस राहीलो आहे. आमच्या सारख्या वरीष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुखसोई नाहीत. महागाई जरी वाटत आसली तरी पगार सुद्धा तसेच आहेत. पेट्रोल चे भाव सारखेच वाटले. १०० डालरात बर्‍यापैकी सामान येते. गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. खोबरं तीकडे चांगभल नाहीतर काय उपाशी मरायचं. बरेच काही लिहीता येईल. १४० कोटीतली काही बाहेर गेल्याने फरक पडतो हे जोपर्यंत सरकारला कळत नाही तोपर्यंत असेच रहाणार. कुसुमाग्रज यांची पाच पुतळ्याची कवीता आजही तेवढीच लागू पडते. प्रत्येकजण आपापले पुतळे पकडून बसलेत. इतीहासचा उपयोग तुंबडी भरण्या साठीच होताना दिसतोय. दर एक जानेवारीला मन उदास होते.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगुरुजी 03/01/2023 - 20:48
गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. २००% सहमत. मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत किळसवाणे व रसातळाला पोहोचले आहे व यासाठी महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष समान प्रमाणात कारणीभूत आहेत. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ, दुसऱ्याच्या बोलण्यातून एखाद्या वाक्याचा सोयिस्कर अर्धवट भाग उचलून त्यामुळे महापुरूषांचा अपमान झालाय अशी बोंब मारणे, आपल्याविरूद्ध कोणी टीका केली तर लगेच त्याच्या/तिच्या विरूद्ध ३०-४० पोलिस ठाण्यात तक्रार करून त्याला/तिला आत टाकणे, पराकोटीचा जातीयवाद, टीकाकारांना बेदम मारहाण, प्रचंड भ्रष्टाचार, मुख्य प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष, अत्यंत नालायक लोकांना आपल्या गटात ओढून सत्ता मिळविणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे . . . या सर्व प्रकाराचा किळसवाणा अतिरेक झालाय. दुर्दैवाने बहुतेक सर्व माध्यमे केवळ सुपारीबाज बनली असून खोट्या कहाण्या बनवून आगीत तेल ओतून आग भडकविण्यात व्यग्र आहेत. अश्या भीषण परिस्थितीत आपल्याला काहीही भवितव्य नाही व देशाबाहेर जाणे हाच युवक-युवतींना एकमेव योग्य मार्ग वाटल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

Trump 13/01/2023 - 20:04
महाराष्ट्राचे राजकारण शिसारी येण्याएवढे घाण झाले आहे. गेल्या २० वर्षातील घसरण बघुन लाज वाटते.

In reply to by Trump

श्रीगुरुजी 13/01/2023 - 21:52
दुर्दैवाने खरे आहे. यासाठी सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष व त्यांचे नेते समप्रमाणात कारणीभूत आहेत.

Nitin Palkar 03/01/2023 - 18:23
जिथे अधिक संधी तिथे स्थलांतर हे नैसर्गिकच आहे. भारतातून अनेकजण वैध मार्गाने आणि काहीजण अवैध मार्गाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत जातात तसेच त्याच्या कित्येकपटीने अधिक बांगलादेशी अवैधपणे भारतात येतात, राहतात. जो पर्यंत "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती 'विश्वमान्य' होणार नाही तो पर्यंत हे चालूच राहणार.

साहना 04/01/2023 - 13:21
भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. इतर देश का चांगले आहेत हे मिपा वर लिहून काही साध्य नाही. भारत देश खूप म्हणजे खूपच गरीब आहे. आम्ही तुम्ही सहज पणे भारतातील टॉप १०% लोकां पैकी आहोत. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. भ्रष्टाचार हि मोठी गोष्ट नाही. पोर्तुगाल आणि स्पेन मध्ये असंख्य भारतीय जातात. ह्या दोन्ही देशांत भरपूर भ्रष्टाचार आहे. युक्रेन, पोलंड इत्यादी देश जास्त श्रीमंत नसले आणि बऱ्यापैकी भ्रष्ट असले तरी भारत पेक्षा कित्येक पटींनी जास्त राहण्या योग्य आहेत. भारत सरकार हे ब्रिटिश सरकार २.० आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याच नागरिकांना चोरा प्रमाणे वागवणे, प्रत्येक गोष्टीसाठी भीक मागण्यास लावणे आणि आपल्या जवळच्या काही लोकांच्या हाती देशाची संपत्ती सोपवणे हे काम ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकार आणि त्यांचे हस्तक करत होते त्याच प्रमाणे भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे करत आहेत. हिंदूंच्या देवळांवर डल्ला, शिक्षण क्षेत्रावर आपला लोखंडी पंजा आणि इतर प्रत्त्येक ठिकाणी सरकारी बाबुंचे तळवे चाटल्याशिवाय काहीही देशांत घडू नये ह्याची खबरदारी. हे काम भारत सरकार करत आहे आणि त्याच साठी विविध लोक शेवटी कंटाळून देश सोडून इतर ठिकाणी जातात. जिला शक्य आहे आणि आवड आहे तिने नक्कीच जावे. कुठल्या देशांत आपला जन्म व्हावा हा निर्णय आम्ही घेत नाही पण कुठे आपण राहू शकतो हा निर्णय आम्ही नक्कीच घेऊ शकतो. HNW हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती : pajeet

In reply to by साहना

भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. इतर देशात बेघर,बेकार लोकांची काय परीस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? त्यांचे रहाणीमान पंचतारांकित आहे का?. क्रिमिनल, काॅमप्रमाइज्ड एरीया का काय म्हणतात तो नाही का?. इतर देशात सर्वांची संपत्ती एकसारखी आहे काय? बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. इतर देशात काय सगळेच आईनस्टाईन चे वंशज आहेत का? State of mental illness मधे कुठले देश अग्रणी आहेत व तुलनात्मक भारतातली परिस्थीती लक्षात घेता कुठला देशात बेकार व कुठला चांगला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. कतार सारख्या देशात काय फक्त भारतीयच आहेत काय? आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. सर्व चमकदार गोष्टी सोन्याच्या नसतात. भारत व भारतीय लोकांबद्दल आपले मत पूर्वग्रहदूषित आहे असे वाटते. किंवा आपण फुल्स पॅरडाईज मधे राहातायं. उघडा डोळे बघा निट. कितीतरी गोष्टीत भारत अत्मनिर्भर आहे. आपण या देशात रहात नाहीत असे वाटते नाहीतर असे अपशब्द लिहीले नसते.

In reply to by कर्नलतपस्वी

कै च्या कै!! परदेशात बसुन भारतावर थुंकायचे ते पण कुठल्यातरी वेबसाईटवरचा डेटा गुगलुन. त्या डेटाची सत्यता पडताळुन पाहिली आहे का? किती ऑथेंटिक आहे? काही पत्ता नाही. कॅनडामध्ये अबोरिजिनल लोकांना सरकार भत्ता देते, दिवसभर ते लोक नशा करुन ते पैसे उडवतात आणि मग रस्त्यात भीक मागत फिरतात. अमेरिकेत न्युयॉर्क आणि एल ए मध्ये तंबु टाकुन रस्त्याकडेला राहणार्‍यांचा उल्लेख वर आलाच आहे. युरोपमध्ये स्थलांतरीत लोकांचीही स्थिती वेगळी नाही. भारतात निदान शेती भरपुर टिकुन असल्याने गरीबातील गरीब माणुसही थोडेफार अन्न मिळवु शकतोच. शिवाय उन्हाळा/पावसाळा/हिवाळ्यातील हवामानात प्रचंड फरक (हे मी +३० ते -३० च्या तुलनेत म्हणतोय) नसल्याने कपडे वगैरे फारसे न बदलता माणुस बाहेर हिंडु शकतो. ठिकठिकाणी कट्ट्यावर्,देवळात्,बागेत चकटफु हिंडु शकतो,सामाजिक जीवन्,शेजार पाजार अजुन टिकुन आहे. परदेशात माणुस आजारी पडला तर शेजारी नाही मदत करणार. दारात मेडिकल सर्विस बोलावण्याशिवाय पर्याय नाही. आणि वयस्क एकट्या माण्सांना वृद्धाश्रमात (मग नाव कितीही गोंडस द्या) रहाण्याला पर्याय नाही. वयाच्या सोळाव्या वर्षापासुन बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंड बरोबर राहण्यासाठी घर सोडण्याची पद्धत असल्याने शिक्षण थांबते आणि पैसे कमवायला लहान मोठे जॉब करावे लागतात. यामुळेच परदेशाचे गोडवे गाणारे भारतीय बाप , मुलगी वयात आली की अचानक आपली संस्कृती वगैरे आठवुन गळे काढु लागतात आणि भारतात परत यायला बघतात. अजुन बरेच लिहिता येईल पण इत्यलम.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

राजूभौ एकदम सहमत आहे. आजही मुलं आईबापाचे पाय शिवतात. तीकडे मुलांना वाचायला यायला लागले की ९११ ची धमकी देतात. नाॅर्वे कर तर मुलाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून आई बापाला हाकलून देऊन तान्ह्या बाळाला सुद्धा ठेवून घेतात. एक L S CS झाले तर बहात्तर लाखाचे बिल बनवले. दात दुखतोय तीन महिन्यानंतर आपाइन्टमेन्ट. असे ऐकण्यात आले की अमरिकेत जर अर्थिक इमर्जन्सी आली तर कमरेचे सोडून द्यावे लागते कारण विकांताला खिसा खाली होतो. तसे सुद्धा हुच्च शिक्षण परवडत नाही त्यामुळे ड्रापआऊट भरपुर एखादाच बिल गेट्स बनतो बाकीच्यांना स्वीगी झोमॅटोने घेतले तर घेतले. उच्च शिक्षित कुठून आणणार? होय, भारतात गरीबी आहे बरोबर माणूसकीपण आहे. आता लोक संख्याच भरपुर म्हणून त्याच प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. स्वराज्य मिळून फक्त पंच्याहत्तर वर्ष झालीयं. थोडा वेळ लागेल पण विश्वगुरू नक्कीच होणार. माझ्या देशात घर जमीन जरी नसली तरी आधार आहे, हाकलून देणार नाही एवढा विश्वास जरूर आहे. जे परदेशी गेले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत.

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 05/01/2023 - 02:03
> आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. गरीब श्रीमंत सर्व देशांत आहेत हा मुद्धा बरोबर असला तरी भारतीय गरिबी हि अतुलनीय आहे. भारतांत बहुसंख्य लोक गरीब आहेत आणि इतर देशांतील तुलने खूपच म्हणजे अकल्पनीय गरीब आहेत. मेक्सिको, ब्राझील सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आहेत. भारताची परिस्थिती सुधारायची असेल तर, हि गोष्ट मान्य करणे स्टेप १ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

कॉमी 07/01/2023 - 09:38
पुरेपूर सहमत. साहना बाई कोलोनियल मनोवृत्ती वैगरे टाईप बाता मारणाऱ्या पैकी आहेत. पण खरा inferiority complex दाखवतात. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. स्वतच्या लोकांबद्दल इतका वंशव्देश्टा विश्वास कसा आहे समजत नाही.

In reply to by कॉमी

बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. हे त्यांच्याच एका प्रतिसादातले वाक्य आहे. त्यावरून अंदाज घ्या. हे वाक्य वाचून मी तर माघार घेतली

In reply to by साहना

कॉमी 07/01/2023 - 09:34
भिकार ऑप इंडिया. आजपर्यंत पूर्णपणे खरी अशी बातमी ह्यांनी कधी दिलीये का अशी शंका येते. तुम्ही दिलेली पंत बद्दलची बातमी सुध्दा शुद्ध असत्य आहे. कोणीही पंतच्या वस्तू चोरल्या नाहीत.

In reply to by साहना

चित्रगुप्त 08/01/2023 - 02:15
@ साहना: तुमच्या प्रतिसादातील 'फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही'. हे वाक्य माझ्या यापूर्वीच्या वाचनातून सूटून गेले होते. आज पुन्हा वाचताना हे वाक्य वाचून मी अंतर्मुख झालो, आणि माझ्यापुरते तरी ते मला पूर्णपणे पटले. का आणि कसे, हे थोडेसे स्पष्ट करतो: माझी जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे इन्दौरमधे गेली, तेंव्हा तिथे मला आवडायचे. बाहेरचे जग तोपर्यंत बघितले नव्हते. अधून मधून मुंबई पुणे वगैरेला जाणे व्हायचे, परंतु मला त्यापेक्षा इन्दौरच चांगले वाटायचे. दिल्लीला एकदोनदा गेलो, तेंव्हा नव्या दिल्लीतले प्रशस्त रस्ते, हिरवळी आणि मोठमोठी झाडे, लोदी गार्डन वगैरे सुंदर आणि विस्तीर्ण उद्याने, जुन्या इमारती, संग्रहालये, उतम पुस्तकालये, कला विथिका वगैरे मला आवडले आणि आपण तिथे स्थानांतरित व्हावे असे वाटू लागले. योगायोग आणि थोडे प्रयत्न यातून ती इच्छा पूर्ण झाली आणि इ.स. १९७७ ते २०२२ आम्ही दिल्ली परिसरात राहिलो. मात्र या ४५ वर्षात दिल्लीत खूप बदल घडून आले आणि नंतरच्या काळात तिथे रहाणे नकोसे वाटून अलिकडे पुन्हा इन्दौरला स्थानांतरित झालो. (गेल्या सहा वर्षांपासून इंदौर हे भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेलेले आहे) गेल्या काही वर्षांपासून वर्षातले अनेक महिने आम्ही उभयता परदेशात स्थायिक झालेल्या मुलांबरोबर रहातो. त्यामुळे भारतात 'कुटुंब' असे नाही. समवयस्क नातेवाईकांपैकी काही परलोकवासी झाले, काही परदेशी गेले, काही खूपच वृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या मुला-नातवंडांना आमच्यात स्वारस्थ्य न वाटणे स्वाभाविकच आहे. 'प्रिय व्यक्ती' म्हणजे लहानपणापासूनचे थोडेसे जे मित्र भारतात आहेत, ते आपापली कौटुंबिक कामे, आरोग्यविषयक समस्या वगैरेत गुंतलेले असल्याने भेट झाली तर काही तास गप्पा करणे, यापलिकडे फारसे काही नाही, आणि त्यांचेशी फोनवर बोलणे भारतातून काय वा परदेशातून काय, सारखेच आहे, ते मी पुष्कळदा करत असतो. तथाकथित 'धर्म' या गोष्टीशी मला लहानपणापासूनच काही सोयरेसुतक नसल्याने तोही प्रश्न नाही. अर्थात भटकंतीत आढळणारी मंदिरे, लेणी, वा चर्च वगैरेंमधे मी जरूर जातो ते तिथली वास्तुकला, मूर्तीकला वगैरे बघण्यासाठी. इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मला सर्वप्रकारच्या प्राचीन गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने 'प्राचीन शिव मंदिर' वा तत्सम पाटी दिसली, तर मी आवर्जून तिथे जातो. परंतु तिथे (अद्याप टिकून असलेच तर) एकादे मोठे जुने झाड वा दूर कोपर्‍यातली एकादी पडकी भिंत, याव्यतिरिक्त 'प्राचीन' असे काहीही दिसत नाही. उलट म्युन्सीपाल्टीच्या मुतारीत लावतात तसल्या ओंगळ टाईल्स, भडक रंगरंगोटी आणि ठिकठिकाणी लोंबत असलेल्या चुन्न्या (हे कशासाठी असते कुणास ठाऊक) खरकट्या पत्रावळी आणि अन्य घाण वगैरेच बहुतेक जागी आढळते. याउलट युरोपमधील आठशे-हजार वर्ष जुन्या एकाद्या चर्चमधील लाकडी जमीन वा छत दुरुस्त करताना लावली जाणारी नवीन लाकडे भवतालच्या जुन्या लाकडांमधे बेमालूम मिसळून जातील, असे त्यांना पॉलिश वगैरे केले जाते. (सुतारकामाची आवड असल्याने असे काम मी बघत उभा रहातो). उदाहरणार्थ नुक्तेच मी फ्रान्समधील एक प्राचीन स्थळ बघून आलो. अकराव्या शतकातील फ्रेंच 'क्रुसेडर्स' जेरुसेलमला धर्मयुद्धासाठी जाण्यापूर्वी जिथे काही काळ राहून आवश्यक प्रशिक्षण घेणे, सामानाची जुळवाजुळव वगैरे करायचे, ते हे ठिकाण. इथल्या प्राचीन इमारती आवश्यक ती डागडुजी करून अजून उभ्या आहेत आणि तिथे त्यांची साद्यंत माहिती देणारे एक संग्रहालय अल्प तिकीट दर लावून चालवले जात आहे. या संपूर्ण परिसरात तिथले प्राचीन वातावरण भंग होईल असे काही दिसत नाही. मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: . . . . . . तात्पर्य, माझ्या युरोप- अमेरिकेतील मुक्कामात भरपूर भटकंती, मोठमोठी संग्रहालये आणि कला-प्रदर्शने बघणे, प्रदूषणमुक्त स्वच्छ वातावरण, शेकडो वर्षांपासून जपलेल्या, खरोखरच्या 'प्राचीन' वास्तु, उत्तम साहित्य आणि अवजारे घेऊन कलानिर्मिती- सुतारकाम, लेखन - वाचन, वाद्ये वाजवणे वगैरे करणे तिथे जसे शक्य होते, तसे माझे भारतात होत नाही. अर्थात हे सगळे माझ्यापुरते सांगितले आहे. इतरांचे अनुभव अर्थातच अगदी वेगळे असू शकतात.

In reply to by चित्रगुप्त

साहना 08/01/2023 - 11:21
होय. विविध विकसित देशांत आपल्या इतिहासासह रक्षण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केले आहे. भारतांत अनेक प्रचिंन वास्तु असल्या तरी तुलनेने त्याची देखभाल करण्यात आम्ही मागे पडलो आहोत. कला, संस्कृती इतिहास ह्या गोष्टी आणि समाजाची समृद्धी ह्यांचा फार खोल संबंध आहे. समृद्ध समाजांत अनेक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य कला किंवा इतिहासाच्या अभ्यासांत घालवू शकतात. त्या अभ्यासातुन थेट वित्त निर्मिती होत नसली तरी इतर श्रीमंत लोक त्यांना मदत करतात. त्याच मुळे पाश्चात्य देशांत किंवा जपान मध्ये तुम्हाला हर प्रकारचं विषयावर आयुष्य वेचलेले लोक पाहायला मिळतील. भारतांत अश्या लोकांचे फार हाल होतात. तरी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे, राम स्वरूप, सीताराम गोयल, विविध शास्त्रीय संगीतातील पंडित आणि विदुषी ह्या देशांत निर्माण होतात हि आपली पूर्वपुण्याई आहे. आमच्या इथे गड किल्यांची अवस्था दयनीय आहे. हेच किल्ले जर फ्रांस मध्ये असते तर तेथील सर्वांत महत्वाची आकर्षणे झाले असते आणि जागतिक पर्यटक स्थानांपैकी एक झाले असते. अमेरिकेत तर विविध ठिकाणी गरज नसताना किल्ले सदृश्य इमारती बांधून त्यांना पर्यटन स्थळे बनवली गेली आहेत. > मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. न्यू यॉर्क मधील सार्वजनिक वाचनालय हि एक महत्वाची अमेरिकन संस्था आहे. पण प्रत्यक्षांत हि संस्था सरकारी नाही आणि नव्हती. पाश्चात्य देशांत अनेक वस्तू संग्रहालये, आर्ट गॅलरी इत्यादी आहेत त्या बहुतांशी लोकांचं पुढाकाराने निर्माण झालेल्या आहेत. अमेरिकेत एकूणच शासन व्यवस्था हि शहरांना केंद्र बिंदू मानून निर्माण झालेली असल्याने न्यू यॉर्क मधील सेंट्रल पार्क इत्यादी कागदो पत्री सरकारी मालकीचे असले तरी जेंव्हा त्याची निर्मिती होत होत तेंव्हा स्थानिक रहिवाश्यानीच त्याचे नियोजन केले होते आणि मालकी हक्क स्थानिक संस्थेकडे दिला होता. भारतीय शासन व्यवस्था सुद्धा एके काळी ह्याच तत्वावर चालत होती. पण ब्रिटिश व्यवस्था हि ब्रिटिश सरकारच्या फायद्यासाठी असल्याने त्यानी त्याचे केंद्री करण केले आणि तथाकथित स्वातंत्र्यानंतर तीच पद्धती भारतीय सरकारने राबवली आहे. त्यामुळे शहरे, पंचायती ह्यांची स्वायत्तता कमी आहे आणि कुठल्याही नागरिकांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या संस्थेला हर प्रकारे अडथळा निर्माण करणे हि भारत सरकारची पॉलिसी आहे. मी माझ्या लेखांत मंदिरावरील सरकारी नियंत्रण हे भारतीय समाजाच्या निकृष्टपणाचे उदाहरण म्हणून दिले होते. ह्याचे कारण सुद्धा तेच आहे. एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती. ह्यांत सरकारी लुडबुड निर्माण झाली आणि हे निर्भेळ दूध नासवले गेलॆ. महाराष्ट्रातील गांवा गांवात आपण जातो तेंव्हा कुणी तरी अवलिया मास्तराने आपला संसार उध्वस्त करून गांवात शाळा निर्माण केली अशी कथा ऐकायला मिळते. हि शाळा मागील ५० वर्षे चालत असून हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असे ऐकू येते. समाज गरीब असल्याने फक्त शाळा निर्माण करणे ह्या सारखी ध्येये ह्यांनी ठेवली. हीच मंडळी जर एखाद्या समृद्ध समाजांत जन्माला अली असती तरी त्यांनी युरोपच्या तोंडात मारतील अश्या संस्था उभ्या केल्या असत्या. भारतीय विद्या भवन, बनारस हिंदू विशवविद्यालय, भांडारकर इन्स्टिटयूट, गीता प्रेस सारख्या संस्थांना पाहावे. TIFR, IISC इत्यादी संस्थांना पाहावे (ज्यांना सरकारने शेवटी बळजबरीने ताब्यांत घेतले), ह्या संस्था बहुतांशी ब्रिटिश कालीन आहेत. एअर इंडिया हि १९३२ साली सुरु झाली होती. युरोपियन संस्थांशी टक्कर देतील अश्या प्रकारच्या संस्था भारतीय आणि हिंदू लोक ब्रिटिश काळांत निर्माण करत होते. बँकिंग किंवा विमा क्षेत्रांत असंख्य खाजगी संस्था ब्रिटिश काळांत अस्तित्वांत होत्या. स्वतंयंत्रानंतर एन केन कारणाने त्या सर्व कोलमडल्या. हल्ली काही लोक नेहरू नि IIT निर्माण केली असल्या बतावण्या करतात पण सोयीस्कर पणे विसरतात कि त्याच भारतात नेहरूंच्या आधी किती तरी चांगल्या संस्था भारतीयांनी विना सरकारी मदत निर्माण केल्या होत्या ह्या शेवटी सरकारी हस्तक्षेपाने खराब झाल्या. दुर्दैवाने हि अधोगती लोक पाहत नाहीत. व्यक्तीपूजा आणि अंध राजकीय निष्ठा ह्यांच्या नादी लागून लोकांनी भारत विश्वगुरू आहे वगैरे थापा आत्मसात केल्या आहेत. जो पर्यंत आपली कमजोरी आम्ही ओळखत नाहीत तो पर्यंत त्यांत बदल घडवून आणणे शक्य नाही.

In reply to by सर टोबी

साहना 09/01/2023 - 09:51
२०१४ ला स्वातंत्र्य नाही तर मुक्ती मिळाली. तर्क, वस्तुस्थिती, न्याय, विवेक बुद्धी ह्या सर्वापासून देशाला मुक्ती मिळाली. निष्काम भक्ती म्हणजे काय हे आता रॅली नंतर सतरंज्या उचलताना सर्वाना मिळते.

In reply to by साहना

एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती.
आपणास खालील गोष्टींमधला सहसंबंध आठवतो का? १. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, पंढरपूर २. साने गुरुजी कोणत्या भारतीय युटोपियाबद्दल आपण बोलत असता? कधी होता हा अस्तित्त्वात?

In reply to by साहना

हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती :
२००५ मध्ये न्यू ऑरलींस मध्ये कतरीना वादळाने धुमाकूळ घातला होता. कतरीना वादळानंतर शहरात काही दिवस अंधाधुंदीची स्थिती होती. तेव्हा त्या शहरात डिपार्टमेंटल स्टोअर्स फोडणे, जाळपोळ वगैरे प्रकार झालेच होते. इतकेच नाही तर स्त्रियांवर बलात्कारही झाले होते. त्या शहरातील परिस्थितीमुळे काही लोक मिसिसिपी नदीवरील पूल चालत ओलांडत ग्रेटना या शहरात जात होते तिथे त्या शहरातील पोलिसांनी त्यांना बंदुकांचा धाक दाखवून हाकलून दिले होते. या अमेरिकेतील महान संस्कृतीला नक्की काय म्हणावे? अमेरिकेत कतरीना वादळ आले त्याच्या एक महिना आधीच मुंबईत २६ जुलैचा महापूर आला होता. दोन्ही शहरांवर आलेले पुराचे संकट मोठे होते - कारणे वेगळी असतील कदाचित पण संकट मोठेच आले होते. त्यावेळी कधी आयुष्यात परत तोंड बघायची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांनी एकमेकांना मदत केली होती. इतर वेळेस स्त्रियांवर अचकट विचकट कमेंट्स करणाऱ्या लोकांनीही अडकलेल्या स्त्रिया आणि मुलींनाही मदतीचा हात दिला होता. मुंबईत त्यावेळी जाळपोळ, लुटालूट, बलात्कार याच्या किती घटना घडल्या होत्या? आश्चर्य वाटेल पण २६ जुलै नंतर दोन तीन दिवस मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी होते. या संस्कृतीला काय म्हणावे? भारत देश वाईटच आणि इतर देश चांगलेच अशी sweeping statements करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या हाच अनाहुत सल्ला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

साहना 18/01/2023 - 06:05
प्रॉपर्टी अधिकारांच्या बाबतीत आम्ही भारतीयांनी गप्प राहिलेलेच बरे. वर्षाला अनेकवेळा गुंड मंडळी भारत बंद, मुंबई बंद इत्यादी करत असतात. मुस्लिम बहुल भागांतून हिंदूंची हकालपट्टी हि नेहमीची बाब आहे. शेतीविषयक कायद्यांच्या आंदोलनात अनेक रस्ते महिनाभर बंद ठेवले, त्यांत बलात्कार, खून इत्यादी अनेक गुन्हे सुद्धा घडले. आणि हे नेहमीच घडत आले आहे, त्यासाठी वादळ वगैरे येण्याची गरज नाही. जिथे ह्या गोष्टी अपेक्षित नसतील तिथे अचानक काही मोठ्या आपत्तीने ह्या गोष्टी घडाव्यांत ह्यांत आश्चर्य नाही (विशेषतः जिथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या संख्येने आहेत तिथे) पण लूटमार आणि बलात्कार हि नेहमीची बाब इथे आहे. बहुतेक दुकाने, घरें इथे खाजगी सिक्योरिटी ठेवतात कारण पोलीस व्यवस्था योग्यवेळी पोचेल ह्याची शाश्वती नाही.

In reply to by साहना

म्हणजेच काय तर अमेरिकेतही अनेक वाईट गोष्टी आहेत हे तुम्हीही मान्य करत आहात. मुद्दा तोच आहे. भारत म्हणजे सर्वकाही वाईट आणि अमेरिका म्हटले की सर्वकाही चांगले असे अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तर्कवादी 18/01/2023 - 11:02
आणि धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल.. पण त्यापेक्षा काही सदस्य फक्त भारतात सगळेच कसे वाईट आहे एवढा एकच सूर फक्त लावून बसलेत

साहना 05/01/2023 - 04:39
शेवटी एकाच सत्य, रांगा अमेरिका, कॅनडा, uk, इत्यादी देशांच्या दूतावासापुढे लागलेल्या असतात भारतीय दूतावासा पुढे नाहीत. एकदा विदेशांत जाऊन आले कि समजते कि भारताची दुर्दशा किती खालच्या स्तराची आहे. आणि ह्या साठी फक्त अमेरिका दुबईत जाण्याची गरज नाही तर कतार, स्पेन, पोर्तुगाल सुद्धा चालतील. आमची शेती आहे, इकडे मुलांना संस्कार असतात असल्या हास्यास्पद गोष्टींत सुद्धा काही तथ्य नाही. भारतीय शेतकरी जगांत सर्वांत मागे आहे, जवळ जवळ प्रत्येक पिकाच्या बाबतीत जगांतील सर्वांत कामचुकार आणि अकार्यक्षम शेतकरी आहे. ह्यावर मी आधी लिहिले आहे. देशांत हिंदू लोकांची मंदिरे सरकारने ताब्यांत घेतली आहेत आणि त्याच्यावर ख्रिस्ती अधिकारी नेमले आहेत. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. शहरांत सुद्धा ज्यांच्या मुली तरुण आहेत त्यांच्या जीवाची घालमेल दररोज पाहावी. आपण पूर्णपणे अपयशी ठरलो कि नंतर मग आपल्यात माणुसकी आहे, अध्यात्म आहे, असल्या थातुर मातुर गोष्टी बोलून आपल्या मनाची समजूत काढायची. धर्मादायी खर्च, माणुसकी ह्या बाबतीत सुद्धा देश खूपच मागे आहे. अपघात होतांच जखमीला आधार देण्याऐवजी त्याचिया खिशातील पैसे चोरण्यात आपण पुढे. अपघात झालेल्या मैत्रिणीला सोडून पळ काढण्यात पुढेच. श्रीमंत मंदिरांचे पैसे सरकार चोरून नेते. सरकारी जमिनीवर गुंड लोक बळजबरीने कब्जा करतात. नवीन शाळा सुरु करणे कायद्याने गुन्हा आणि चुकून कोणी केलीच तर त्याच्या मागे सरकारी हापिसरांचा ससेमिरा. आज भारतीय तत्वज्ञानाचे व्हिडीओ पाहायचे असतील तर नंबर १ न्यूयॉर्क मधील स्वामी सर्वप्रियानंद आहेत. आपले अध्यात्म परमबिंदू शंकराचार्य हे "निगेटिव्ह नंबर्स खोटे आहेत" असली पुस्तके लिहीत आहेत. शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत.

In reply to by साहना

श्रीगुरुजी 05/01/2023 - 08:15
बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारी तरूण पाहण्याची आवश्यकता नाही. ट्विटर, फेसबुक इ. समाजमाध्यमातील अनेक मराठी तरूणांच्या प्रतिक्रिया वाचले की यांच्यावरील संस्कार लक्षात येतात.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरूजी, व्यक्ती तीतक्या प्रकृती हा नियम सर्वत्र एक सारखाच. चांगले वाईट संस्कार सगळीकडेच पहायला मिळतील. मुद्दा हा आहे भारत खुपच मागासलेला, गरीब, घाणेरडा देश आहे असे दाखवून परदेश किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवण्याची एतद्देशीय परदेश धार्जीणी मनोवृत्ती यावर आक्षेप आहे. परदेशातील असलेले आवगुण, शार्टकमिंग्ज झाकून ठेवून आपल्याच देशाचे वाभाडे काढायचे हे पटत नाही. नशेडी,गंजेडी,चोर,बलात्कार, डोमेस्टिक व्हायलन्स काय फक्त भारतातच आहेत का? परदेशात जाणारी मुलं पोटासाठी नोकरीच करतात फार काही वेगळे करत नाहीत. सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. कोव्हीड वर उपाय व सुयोग्य व्यवस्थापन हे एक चांगले उदाहरण नाही काय. कितीतरी गरीब देशांना भारताने लस दिली याबद्दल काय म्हणायचे आहे? इतर देशांच्या तुलनेत भारतातील परीस्थीती काय होती हे जगजाहीर नाही काय? माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. ज्या गोष्टी भारतात घडतात त्याच प्रकारच्या गोष्टी परदेशात ही घडतात हे विसरून चालणार नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 05/01/2023 - 14:45
> सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही. पावसांत भिजत दुचाकी घेऊन कामाला जायचे. मृत्यूचे सापळे असलेल्या रस्त्यावर दिव्य करत पोटाची खळगी भरण्यासाठी कसला तरी उद्योग व्यवसाय करायचा, मग बहुतेक पैसे GST वर घालवायचे, राहिलेले आरोग्य, मुलांचे शिक्षण, आणि विविध कारणासाठी लाँच देत घालवायचे. काही वाचलेच तर मग कुठल्या तरी कंपनीत गुंतवायचे ज्याचा CEO मग तुमच्याच पैश्यांची चालविलेल्या सरकारी बँक ला गंडा घालून जातो आणि ते पैसे मग पेट्रोल वरील करणे तुम्हीच पुन्हा भरता. दुर्दैवाने तुमचा जन्म तथाकथित सवर्ण जातीत झाला तर विचारूच नका. साधी प्राथमिक शाळा पासून नंतर नोकरी मिळवण्यापर्यंत तुम्ही सर्वांत शेवटी राहाल. अपार कष्ट करून म्हाताऱ्या आईवडिलांना गावी ठेवून शहरांत यायचे. २० वर्षे लोन भरत छोटासा फ्लॅट घ्यायचा जयंत साधा सेंट्रल ac सुद्धा नसतो. शनिवारी रविवारी फारतर मॉल मध्ये अवाजवी पैसे भरून चित्रपट पाहायचा आणि आणखीन पैसे देऊन तो थंडगार सामोसा आणि गरम गरम कोक प्यायचा. वर्षातून काही वेळा गावी जायचे तीच काय ती सुट्टी. आणि हे आयुष्य फक्त तुम्ही शिकले असाल तरच तुमच्या नशिबी. तुम्ही अडाणी असाल तर कुठे तरी गुरा ढोरा प्रमाणे कुणी तरी तुम्हाला वागवून फार तर दोन दिवस जिवंत राहण्यापुरता पगार देईल. माझी कॅलिफोर्निया मधील कुक पंजाबी स्त्री आहे. वयाच्या ५५ वर्षी ती इथे आली. घरी तिला डोळे वर काढून पाहायची सोय नव्हती. पंचक्रोशीत म्हणे ती एकटीच ८वि पास होती. इथे येऊन तो गाडी चालवायला शिकली (कॅलिफोर्निआ मध्ये ड्रायविंग टेस्ट पंजाबी भाषेतून उपलब्ध आहे). सध्या ती निव्वळ जेवण बनवून साधारण ४००० डॉलर्स कमवते. मी म्हटले तुला पैसे केश देऊ का ? तर म्हणते नाही दीदी, इथे टॅक्स भरावासा वाटतो. मागील दोन वर्षांत तिने पंजाबी ड्रेस सोडून पंत शर्ट घालायला सुरुवात केली. आपले सेविंग मग ती पंजाबात जमीन घेण्यावर खर्च करते. तिची मुलगी पंजाब मध्ये होती, ती गरोदर होताच तिने धडपड करून तिला कानडा मध्ये विद्यार्थी म्हणून आणले आणि नातवाला कॅनेडियन सिटीझन बनवले. काही महिन्यात तिची इतर मुले आणि बहीण सुद्धा इथे येईल. हिचे आयुष्य सर्व सामान्य म्हणून जरी जात असले तरी ते सामान्य आयुष्य तिच्या नशिबी पंजाब मध्ये नव्हते. तिथे शेणी थापत आणि सासूचे पाय दाबत तिचे आयुष्य गेले असते. इथे ती जास्त खुश आहे. > माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. भिकार आणि घाणेरडा हि दोन्ही विशेषणे भारताला १००% लागू आहेत आणि त्या तुलनेत जवळ जवळ प्रत्येक देश भारता पेक्षा खूप पटीने चांगला आहे. हे शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत. मी भारताला शिवी देत आहे किंवा अशी शिवी देऊन मला आनंद वाटत आहे असे अजिबात नाही. जी गोष्ट वाईट आहे ती मान्य केल्याशिवाय आपण त्यांत सुधारणा घडवून आणू शकत नाही. "स्वच्छ भारत" स्कीम ची गरज का भासली ? कारण सार्वजनिक ठिकाणी आम्ही प्रचंड कचरा निर्माण करतो. आपले सार्वजनिक प्रसाधनगृहे सामान्य स्त्री ने वापरण्यासारखी नाहीत. शहरच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा खरोखर प्रचंड घाणेरडा आहे. हगंदारी मुळे अनेक गांवांत सकाळी नाक बंद ठेवावे लागते. मी मेक्सिको, ब्राझील, स्पेन आणि इंडोनेशिया मध्ये प्रवास केला आहे. येथील ग्रामीण भाग सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आणि जास्त स्वच्छ आहेत. IIT मुंबई हि तथाकथित मोठी शिक्षण संस्था आहे. त्यांना पैश्यांची कमी नाही. तेथील हे प्रसाधनगृह पहा . हा लेख एका प्राध्यापकाने लीहिला आहे. https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html टीप: माझ्या कोकणातील शेतजमिनीवरील पम्प चा फ्यूस वारंवार उडत होता म्हणून मी गांवातील एका इलेक्ट्रिसिटी वाल्याला पाहायला सांगितले. जमिनीची जो देखभाल करतो त्याला ह्या विषयातील काहीच समजत नाही त्यामुळे मलाच फोन वरून बोलावे लागले. तर हा इलेक्ट्रिसिटी वाला मला सांगतो. काही नाही मॅडम सोप्प आहे, थोडा जास्त अँपिअर चा फ्यूस घालायचा, तो मग उडत नाही ! दुसरी टीप : भारतात उणिवा आहेत ह्याचा अर्थ इतर देश १००% चांगले आहेत असे नाही. पण सर्वसामान्य शिकलेल्या मध्यमवर्गीय भारतीयाला जी अवहेलना भारतात सहन करावी लागते तशी अवहेलना अगदी मजूर म्हणून काम करताना सुद्धा इतर देशांत भोगावी लागत नाही. रस्ते तुम्हाला ठार मारत नाहीत, वाहन परवडते, पिण्याचे पाणी पण्यासारखे असते, हवा फुफुफ्सांत घेतली असता दोन सिगारेटी पिल्या प्रमाणे वाटत नाही, शाळेत जाताना रस्ता क्रॉस करताना आपल्या मुलांना कुठली तरी बस किंवा ट्रक चिरडून जाणार नाही हि खात्री, कधी कधी फिरायला चांगले पार्क, विविध प्रकारचे अन्न, रात्री फिरताना कुणी तरी आपला बलात्कार करणार नाही हि खात्री, अश्या छोट्या छोट्या गोष्टीच आपले जीवन जगण्यासारखे बनवतात. आणि ह्याच अत्यंत सध्या गोष्टीसाठी लोक भारत सोडून इतरत्र जातात. इतर देशांत समस्या अनेक आहेत पण त्या भारतीय समस्यांच्या मानाने कमी आहेत. सर्वसाधारण भारतीयाला विनाकारण देशांत अवहेलना सहन करावी लागते हे १००% सत्य आहे.

In reply to by साहना

Trump 06/01/2023 - 15:14
बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही.
श्री साहना, तुमचे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे. परदेशात गेलेले सगळे भारतीय सीईओ आणि तत्सम पदावर जात नाहीत. बहुतेकांचे जीवन सर्वसामान्यपणेच जाते. --- सर्वसामान्य लोकांना जास्त काही नको असते, शाश्वत उत्पन्न (याचा अर्थ नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या संधी असा होता), आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये (नोकरी जाणे, आजारी पडणे, कोणी त्रास दिला इ.इ) न्याय्य मदत, डोक्याला त्रास न होता सरकारी कामे होणे, तोंड बघुन नियम न बदलणे, दिलेया वचनाला जागणे अश्याच गोष्टी हव्या असतात. आणि त्याच सहजपणे मिळत नाहीत.

सर टोबी 05/01/2023 - 09:14
तुमची अतिरेकी ऊजवी विचारसरणी, जी वारंवार भात खातांना गारेच्या खड्यासारखी मध्ये मध्ये येते, ती सोडली तर प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे.

In reply to by सर टोबी

@सर टोबी जी, आमच्या भातातले खडे दिसले पण @सहाना जींची भाषा नाही दिसली. प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे. यातच सर्व आले नाही का? अतिरेकी उजवी वगैरे काही नाही,देशातील घडामोडींवर लक्ष असते सर्वांचेच समर्थन करत नाही. असभ्य भाषा प्रयोग, तो सुद्धा देशाबद्दल आणी पोटार्थी,देशोधडीला लागलेल्या कडून, ना मंजूर. लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम मला जास्त माहीती नाही पण त्यांचा जन्म याच देशातला आयुष्यातली आठरा विस वर्ष याच देशाच्या अन्नावर वाढल्या असतील. या देशात काहीच चांगले दिसले नाही! देशाला भिकार,घाणेरडा,मागासलेला, आशी विषेशणे लावतात याबद्दल काहीच म्हणायचे नाही! आम्ही तर मागासलेले पण तुम्ही तर शिकलेले,सुसंस्कृत ना?भाषा उपरोधिक पण सभ्य, संयमित नको? एक गोष्ट चांगली म्हणताना दुसरी घाणेरडी,भिकार म्हणले म्हणजे ते खरे ठरत नसते. त्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा. किती खोटारडी विधाने आहेत. कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय, सरकार देवळात हस्तक्षेप करत आहे याचा व परदेशी जाण्याचा काय संबध? इतकापण काही वाईट नाहीये भारत. आजही कित्येक विदेशी इथली संस्कृती,शिल्प,नृत्य कला,साहित्य हे शिकण्यास भारतात येतात तुलनात्मक कमी पण येतात हे सत्य आहे. बरोबरच आहे म्हणा, ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे. शेवटी एक स्पष्ट करावेसे वाटते, प्रतिसाद देणे म्हणजे फटकावणे वगैरे काही नाही. भाषेवर आक्षेप म्हणून खटाटोप एवढेच.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 06/01/2023 - 15:01
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
श्री कर्नलतपस्वी, तुम्ही सैन्यात होता. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात किती संघर्ष करायला लागला आहे त्याबद्दल शंका आहे. (सैन्यातील नोकरीतील काम म्हणजे संघर्ष होत नाही.) सैनिकांना कामादरम्यान आणि निवृत्तीनंतर मिळण्यार्‍या सुविधांचा हेवा वाटतो. ही कथा सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचार्यांची असते. माझ्या व्यक्तीगत अनुभवानुसार भारतातील बहुतांशी सरकारी कर्मचारी मुजोर, कामचोर आणि सरकारी पदाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करायला पुढे मागे बघत नाहीत. त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसतो. लोकांना चकरा मारायला लावणे, कोणतीही गोष्ट लिखित न देणे, जबाबदारी न स्वीकारणे, आज उद्या करत काम टाळणे. अश्या किती तरी उदाहरणे देता येतील. (आणि कृपया सैन्याचा अपमान झाला अशी ओरड करु नका. तुम्ही पुर्वी सैन्यात होता म्हणुन जास्त अधिकार मागु नका येथे.)
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
असली वक्तव्य म्हणजे राणा भीमदेवी थाटात केलेली वक्तव्ये आहे. जर तुम्ही सैन्यात नसता आणि सर्वसामान्य माणसांचा संघर्ष केला असता तर असली आंधळी विधाने केली नसती. भारत आमच्यासाठी सुध्दा प्रथम आहे, पण काही ठराविक वर्गासाठी इतर लोक राबत आहेत आणि आपले आयुष्य घालवत आहेत असे दिसते. --
ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे.
पुर्णपणे चुकीचे विधान. परदेशात राहिलेले (अनिवासी आणि पुर्व) भारतीय, भारत आणि भारता विषयी आत्ममियता आणि देशप्रेम बाळगुन असतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 06/01/2023 - 22:43
परदेशी भारतीयांनी पाठवलेले पैसे: $१०० billion भारतीय माहीती तंत्रज्ञान क्षेत्राने कमावलेले पैसे: $१७८ billion भारताच्या संरक्षण खर्चः $७३.८६ billion संदर्भ: https://www.meity.gov.in/it-export https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/us-replaces-uae-to-become-top-source-of-remittance-flow-to-india-report/articleshow/96025878.cms https://en.wikipedia.org/wiki/Military_budget_of_India#2022-23

In reply to by कर्नलतपस्वी

उपयोजक 09/01/2023 - 19:57
कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय तिरुपतीच्या बालाजी मंदिरसंस्थेवर एक ट्रस्टी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे मामा आहेत. जगनमोहन हे ख्रिश्चन आहेत. मामा कागदोपत्री हिंदू आहेत. याच मंदिरात अनेक ख्रिश्चन धर्मोपासक शिरु पाहत असतात. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिेराच्या ट्रस्टींपैकी एकजण मुस्लिम आहे म्हणे. खखोदेजा!

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 21:48
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 21:59
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 22:13
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 22:18
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

एक भारतून परदेशात जाणारी व स्थानिक होण्यासाठी धडपडणारी मुलं आणी दुसरा बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? काही लोकांना परदेशी गेल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटते,आपण काहीतरी इतरांपासून वेगळे आहोत आसा स्वतःबद्दल गोड गैरसमज होतो व सर्वज्ञ असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडू लागतात. भारत गरीब आहे विकसनशील देश आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना आहे तेव्हा त्यांच्या गरिबीची काळजी न करता स्वतःचे दारिद्र्य कमी कसे होईल या कडे वरील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांनी करावी. लेखनाचा मुळ उद्देश प्रतिसादा मुळे भरकटू नये या करता भारतद्वेषी , पूर्वग्रहदूषित प्रतिसादाला प्रती-प्रतिसाद देणे बंद करत आहे.

In reply to by उपाशी बोका

वाचला. बरेच प्रतिसाद सभ्य,संयमित व समर्पक,पटले. परदेशी जा,जीथे अर्थिक,वैचारीक उन्नती होईल तीकडे जा तुलना करा पण सुसंस्कृत झालात तर सुसंस्कृत पणेच वागा,बोला. संदीप डांगे याच्या प्रतिसादातला काही भाग, >> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो. १००%सहमत

भारत का सोडावासा वाटतो? १. साध्या साध्या गोष्टीसुद्धा टोकाच्या करून सोडणारी प्रत्यक्षातली संस्कृती- संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरी वैचारिकदृष्ट्या भारतीय लोक प्रचंड प्रतिगामी, मागास आहेत. सासुरवासासारख्या गोष्टी घराघरांत चालतात. प्रत्येक साध्या गोष्टीला उगीचच काहीतर संस्कृतीचा मुलामा द्यायचा आणि पुरुषी/सामाजिक अहंकार जपायचा. उदा. बायकांनी पुरुषांची ताटं उचलणे. अमुक एक हजार वर्षांपूर्वी युनिवर्सल विचार मांडणे वेगळे आणि ते समाजाच्या अंगाअंगात मुरलेले असणे वेगळे. २. सामान्य भ्रष्टाचार - जगभरात सगळीकडे चालतोच, परंतु भारतात तो प्रत्येकपातळीवर आहे. केवळ सरकारीच नव्हे तर सगळीकडे. मला तलाठ्याला साहेब म्हणून गयावया करून आणि लाच देऊनच पुढे जावे लागते नाहीतर माझी जिरवली जाते. इतकेच नव्हे, खाजगीतही हा बोकाळलेला आहे. मी सीईटीसाठी चाटे कोचिंग क्लासमध्ये होतो तेव्हा माझी मेस बदलण्यासाठी तिथल्या एका क्लार्कने मला ९०० रुपये मागितले होते. ३. छुप्या हुकुमशाहीकडे वाटचाल - गेल्या दशकभरात भारताच्या सार्वजनिक आणि सरकारी, राजकारणी डिस्कोर्समध्ये जर 'हिंदुत्व' वगैरे शब्द तपासले तर भारताची वाटचाल हिंदू तालिबान होण्याकडे होत आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. माझे वय फार नाही परंतु माझ्या लहानपणी, पौगंडात हे विषय इतके ऐरणीवर कधीच आले नाहीत. हे म्हण्जे पूर्णपणे भुरटे न्युसेन्स विषय. आता मात्र अत्यंत फालतू गोष्टींवरूनसुद्धा टोकाचे राजकारण केले जाते. सगळीकडून मूलतत्त्ववाद्यांना डोक्यावर घेण्याचे प्रकार सुरु झालेत. उदा. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरसारख्या ठिकाणी महिलांनी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे वगैरे म्हणून मोर्चे काढलेत, घरांवर "इथे हिंदू राहतात" वगैरे स्टीकर्स लावणे, बिर्याणी हॉटेलांची तोडफोड केली. कुठल्याही गोष्टीमध्ये 'ही आपली संस्कृती नाही' अशी दमदाटी करणे वगैरे प्रकार इतके वाढत आहेत की उद्या परत सकच्छ की विकच्छ, स्त्रियांनी अमुकच कपडे घातले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची फारशी गरज नाही, चूल मूल असे विचार हळू हळू पुढे येतील आणि त्या कल्पनेनेसुद्धा थरकाप उडतो. "स्त्रीला पायातली चप्पल मानावे, तिला जाता येता कानफाडली पाहिजे" इत्यादी मुक्ताफळे उधळणार्‍या इंदुरीकरासारख्या कीर्तनकारांना डोक्यावर घेतले जाते आणि त्यांच्या कार्यक्रमांना अफाट गर्दी होते. स्त्रियाही एका बाजूला बसून या गोष्टींना मान डोलवत असतात हे दृष्य जर कुणाला आशादायक वाटत असेल तर वाटो. मला मात्र वाटत नाही. इन्क्रिमेंटल, छोटे छोटे बदल केले की ते नजरेत अजिबात येत नाहीत पण काही वर्षांनी आपण कुठवर आलो हे पाहिले की भस्कन मागासपणाची आणि आपल्या चुकांची जाणीव होईल, अर्थात तोवर वेळ निघून गेलेली असेल. उदाहरण द्यायचे तर - मागच्या वर्षी अनेक व्हीपीएन कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. कारण नव्या सरकारी नियमांनुसार सर्वर लॉग्ज साठवून ठेवणे, सरकारला ते विनाशर्त विनाअट पुरव्णे बंधनकारक केले गेले आहे. यावर कुणीही जनजागॄती केली नाही की विरोध केलेला नाही. गोष्ट छोटी, पण लांबून डोंगराएवढी. असं हुकुमशाही राजवटीत होतं. ४. अकार्यक्षमता - मला लोक अकार्यक्षम वाटत नाहीत पण व्यवस्था वाटते. विखंडित शेतीचा प्रश्न धोरणीपणाने सोडवला नाही तर हवामानबदलाच्या पडत्या काळात भारताचे प्रचंड नुकसान होणार. प्रचंड कमी सूर्यप्रकाश असूनही जर्मनीसारखी राष्ट्रे सोलार पॉवर इत्यादी गोष्टींमध्ये भारताहून अनेक दशके पुढे आहेत. ५. अर्धवट इन्फ्रा - एखादी गोष्ट 'का' करायची याचा साधा कॉमन सेन्ससुद्धा नसतो. उदाहरण, मेट्रो सारख्या गोष्टींवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु जगातील प्रत्येक पुढारलेल्या शहरात मेट्रो हे एका मोठ्या पब्लिक ट्रानस्पोर्ट सिस्टिमचा केवळ एक भाग असतो. बसेस, इतर मोठ्या पल्ल्याची रेल्वे सिस्टिम एकात एक गुंतवून प्रचंड कार्यक्षण यंत्रणा उभी केलेली असते. ती कार्यक्षम असतेच शिवाय रोबस्टही असते आणि समाजातल्या सर्व स्तरांना जास्तीत जास्त फायदा मिळावा अशा या योजना आखलेल्या अस्तात. बी आर टी नावाचा हास्यास्पद प्रकार खेळून झाल्यावर आपले मूर्ख लोक लगेच मेट्रोच्या नादी लागले. विकासाची ही अर्धवट कल्पना झाली. ६. इनोव्हेशन/सृजन आणि जुगाड यांच्यातली गल्लत - भारतीय लोक जुगाडालाच सृजन समजात. तसे करायला हरकत नाही पण सृजन करण्याची आपली क्षमता तरी आपण विकसित करतोय का हे ही महत्त्वाचं आहे. भारतीय शिक्षणव्यवस्था नावाचा एक मोठा विनोद याला कारणीभूत आहे. ती धड रोजगाराला सक्षम करणारीही नाही किंवा लोकांना शहाणी समजूतदार करणारीही नाही. ८. नैसर्गिक स्त्रोतांची हेळसांड - इतक्या वेळा बोंबलूनही भारतीय लोकांना सुका कचरा आणि ओला कचरा यांच्यातला फरक कळत नाही. भारतातल्या सर्वच नद्या टोकाच्या प्रदूषित आहेत आणि त्या त्यांच्या ७० वर्षांपूर्वीच्या स्थितीत जरी आणायच्या म्हंटल्या तर सगळा देश उल्टा पालटा करावा लागेल. एसटी मधून नदीला पाया पडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकणारे महाभाग मी पाहिले आहेत. प्रचंड लोक आहेत त्यामुळे उडदामाजी काळे-गोरे या न्यायाने चांगली माणसेही भरपूर आहेत म्हणून इथवर वाटचाल झाली. भारत का सोडावासा वाटत नाही? १. हवामान - रोज सूर्य दिसणे ही खूप मोठी बाब आहे. २. कुटुंब - बहुतेक कुटुंब हे भारतातच आहे. ३. नैसर्गिक आरोग्य - शरीराला इतर प्रदेश मानवतीलच असे नाही. शेवटी फिजिकल मर्यादा असतातच. ४. वैविध्य - खूप मोठी अ‍ॅसेट आहे. ( जरी हिंदूराष्ट्राच्या नावाखाली वैविध्य नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम होत असला तरी भारतीय पुरुन उरतील ही आशा कुठेतरी वाटते.) ५. जुळवून घेणे - एका बाबतीत भारतीय पुढे आहेत. (नाईलाजाने ) परिस्थितीशरणता आहे की जुळवून घेणे आहे यातला फरक लगेच कळत नाही, पण ही एक गोष्ट आवडते. एकंदरीत भारत सोडावा वाटणे याला सांस्कृतिक कारणे आहेत, आणि न सोडावा वाटणे याला नैसर्गिक (फिजिकल) कारणे आहेत.

बरेच काही बदलले आहे, बदलत आहे. काही काही घरांमध्ये कटकट करणारे म्हातारे लोक असतात त्यांना स्वतः:च्या आयुष्यात काही करता आलेले नसते मग ते आजूबाजूच्या लोकांवर राग काढत राहतात. इथेही तसेच आहे काही जणांना स्वतः:च्या आयुष्यात अपयश येते, लायकी नसते किंवा आळशीपणा असतो अंगात मग ते आजूबाजूच्या लोकांवर, सरकारवर, देशातल्या व्यवस्थेवर राग काढत राहतात. भारतात २२ कोटीच्या आसपास दुचाकी आहेत, ७ कोटी चारचाकी आहेत म्हणजे अंदाजे प्रत्येक घरात एक वाहन आहे. उगाच एखाद्या आदिवासी वस्तीचे उदाहरण देऊ नये अपवाद सगळीकडे असतो. तसाच हा नियम सरसकट लागू होणार नाही. याशिवाय आयुष्मान भारत सारख्या योजना मुले अति गरीब माणसे सुद्धा आरोग्य विमाचा लाभ घेतात. सिक्युरिटी गार्ड वगैरे लोकसुद्धा अति गरीब कॅटेगरीत येत नाहीत त्यांना सुद्धा १५ हजार किंवा जास्तच पगार असतो. म्हण्जे जिवन्मान किती उण्चावले आहे बघा. खेड्यांमध्ये मजुरीसाठी लोक मिळत नाहीत कारण गहू २ रुपये किलो आणि तांदूळ ४ रुपये किलो ने मिळत होता रेषन वर. आता हे बंद झाले आहे बहुधा कारण आता धान्य फुकट मिळते रेशन कार्ड पांढरे वर. बरेच जण फक्त फक्त क्वार्टरचे पैसे मिळेपर्यंत मजुरी करतात. ह्याला गरिबी म्हणायचे का? नोव्हेंबर महिन्यात चार चाकी गाड्यांची विक्रमी विक्री झाली, सुट्ट्या आल्या कि पर्यटन स्थळे फुल्ल असतात , कामवाल्या बायका त्यांच्या नवऱ्याला, मुलांना घेऊन हॉटेलात जेवतात बऱ्याचदा काही जण पार्सलहि मागवतात हे मी कनिष्ठमध्यमवर्गाबद्दल सांगत आहे. India's air traffic touches 1.29 crore passengers in Dec 2022, crosses pre-COVID levels हि बातमी वाचली का कोणी. हे सगळे जण नक्कीच अतिशय गरीब असणार ना? २७ डिसेंबर ला ४ लाख एअर तिकीटे बुक झाली हि विक्रमि विक्रि होती. प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे, वैनगंगा ते नळगंगा सिंचन , समृद्धी महामार्ग, ऍक्सेस controlled एक्क्सस्प्रेस वे, बुलेट ट्रेन सारखे अति महत्वाकांक्षी प्रोजेक्त होत आहेत, ह्यातून प्रवास करणारे गरीब आहेत का? मुळात ब्रेन ड्रेन या शब्दाला काही अर्थच नाहीये. काही ठराविक शिक्षणसंस्था यातले पास औट परदेशात जातत. त्यात काही चूक नाही. प्रत्येक जण अधिक चांगले प्रोस्पेक्ट्स पाहतो पण त्याला ब्रेन ड्रेन म्हणायचे म्हणजे फक्त त्यांनाच बुद्धी आहे इतरांना नाही असा अर्थ होतो. ह्यात काहीच चुकीचे नाहीये का? याशिवाय डिजिलॉकर, UIDAI, online सातबारा, डायरेक्ट बेनिफिट to अकाउंट अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे बाबूशाही थोडीतरी कमी झाली. स्वतः ला काही चांगले, भरीव करता येत नाही म्हणून सगळा देश वाईट हा तर्क मात्र अजब आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

सर टोबी 06/01/2023 - 09:26
भारतात कुटुंबांची एकूण संख्या आहे २९ कोटी आणि सरासरी ४.८ एवढी कुटुंबागणिक सदस्यांची संख्या आहे. २२ कोटी वाहनं असतांना देखील ७ कोटी घरांमध्ये वाहन नाही. म्हणजे सुमारे ३४ कोटी लोकांकडे वाहतुकीचे साधन नाही. २२ कोटी दुचाक्यांपैकी पाच टक्के दुचाक्या या माणशी एक याप्रमाणे ऐपत असणाऱ्या कुटुंबात असतील तर अजून पाच कोटी लोकसंख्या वाहतुकीच्या साधनांपासून वंचित असते. आता या ३९ कोटी लोकांमध्ये किमान १४ कोटी लोक मिळवते असतील तर ते सर्वस्वी वडाप, बसेस यांचा वापर करीत असतील. आणि लोकसंख्येच्या १० टक्के लोकांची “एवढी तफावत तर कुठेही असतेच” अशी आपण संभावना करणार असाल तर अशी देशभक्ती तुम्हालाच लाभो. हि फक्त एका आकडेवारीची चिरफाड आहे.

In reply to by सर टोबी

एका आकडेवारीची चिरफाड करतानासुद्धा इतक्या चुका आहेत आता आणखीन चुका टाळाव्यात. माणशी एक दुचाकी वाली 5 टक्के कुटुंब हे assume केले आहे. मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत. शिवाय वृद्ध माणसे सुद्धा सहसा वाहन चालवणे टाळतात. एखादा मेट्रोने किंवा बसने किंवा वडाप ने प्रवास करत असेल तर तो अतिशय गरीबच असेल असे गृहीत धरले आहे. आणि 22 कोटी दुचाकी आहेत फक्त. 7 कोटी चारचाकी आहेत त्या वेगळ्या. यामध्ये रिक्षा, टमटम वगैरे धरलेल्या नाहीत. तसा युक्तिवाद करायला काहीही करता येईल. फक्त 100 लोकांकडे मिळून 7 कोटी चारचाकी असतील असेही assume करता येईल. त्याला काही अर्थ नाही

In reply to by अप्पा जोगळेकर

साहना 06/01/2023 - 12:54
शिकागो १९०० असे गुगल इमेजीस मध्ये टाकून पहा. भारतीतील कुठलेही शहर आज सुद्धा त्याची बरोबरी करू शकत नाही. वाहनांची गोष्ट सांगायची झाली तर दुचाकी आणि ४ चाकी माध्यम वर्गीयांना परवडायला साधारण २००० साल उजाडावे लागले. त्याआधी भारत सरकारने जवळ जवळ सर्व वाहन उद्योगावर बंदी घातली होती. काँग्रेसी मित्र बजाज हे अत्यंत भिकार दर्जाची स्कुटर लोकांच्या माथी मारत असत. आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ? ९०% भारतीय जनता $३०० सुद्धा महिन्याला कमवत नाही ह्या लोकांना दुचाकी कशी परवडेल? हे आकडे पहा बिहार सारख्या गरीब राज्यांत फक्त ३०% घरांत दुचाकी आहे. चार चाकीची परिस्थिती आणखीन खराब आहे. महाराष्ट्रांत फक्त ८% घरांत तर बिहार मध्ये फक्त २% घरांत चारचाकी आहे. हे आकडे पाकिस्तान किंवा व्हिएतनाम च्या तुलनेत खराब नसले तरी जागतिक स्तराचं दृष्टीने अत्यंत खराब आहेत.

In reply to by साहना

Trump 06/01/2023 - 13:25
आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ?
श्री साहना, हे तुमचे म्हणणे बरोबर असले तरी पुर्ण दोष सरकारला देता येणार नाही. लोकांना कितीही सांगितले तरी ते कायदे पाळायला तयार नसतात. तुम्हाला येथे झालेल्या काही चर्चांचे दुवे देतो. हेल्मेटसक्ती - प्रकाश घाटपांडे https://www.misalpav.com/node/29420 चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ - मनिषशिल्पाअनुसे https://www.misalpav.com/node/36728 नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा - उगा काहितरीच https://www.misalpav.com/node/50575 ही काही साधी उदाहरणे आहेत, अशी बरीच देता येतील. भारतातील किती प्रवासी उपलब्ध असलेली खुर्ची पट्टी वापरतात ? श्री सायरस मिस्त्री अश्याच एका अपघात मरण पावले. ते गरीब, अज्ञानी होते असे कोणी म्हणु शकत नाही.

Trump 05/01/2023 - 19:17
मस्त चर्चा चालु आहे. (की धुरळा उडतो आहे.) --- एक गोष्ट् कोणी लिहीली नाही, भारतामध्ये गेल्या काही वर्षात आंतरजाल खुप वेगवान झाले आहे.

In reply to by Trump

साहना 07/01/2023 - 02:15
+१ इंटरनेट आणि स्मार्टफोन चा प्रसार हि मागील काही वर्षातील भारतातील जमेची बाजू आहे. सुदैवाने भारत सरकारने लुडबुड करायच्या आधीच हा प्रसार वेगाने झाल्याने लोकांच्या नशिबी जागतिक दर्जाच्या सेवा आल्या नाहीतर इथे सुद्धा अवस्था सरकार निर्मित रस्त्याप्रमाणे झाली असती. दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतात एकूण विमानतळाची संख्या वाढत आहे. मागील १० वर्षांत साधारण १०० नवीन विमान तळ पूर्ण तरी झाले आहेत किंवा बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत.

अर्जुन 06/01/2023 - 12:45
१. भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. २. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता ३. याच शिकलेलया,सुसंस्कृत लोकांनी होमी भाभा यांचा विमान अपघात घडऊन आणला. कारगील हल्लाच्यावेळी भारताला जि. पी. एस. चे इनपुट द्यायला नकार दिला. इराक देशाला बर्बाद केले. लिबियाचा गडाफीला मारले. ४. करोनाच्या काळात भारताने इतर देशांना केलेली मदतही आपण विसरलात का? इतर देशांचा नागरिकांची अफगाण, कुवेत, युक्रेनमधुन सुखरुप सुटका केली. तरीही भारतीय असंस्कृत? तूम्ही मिसळपाव वर लिहिण्यापेक्षा लोकसत्ता महाराष्ट टाइम्समधे लिहा. जास्त समर्थक मिळतील.

In reply to by अर्जुन

साहना 07/01/2023 - 01:46
> याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. पाश्चात्य देशांना सद्गुणी मी म्हटले नाही. तेथील राहणीमानाचा दर्जा भारताच्या कैक पटीने चांगला आहे हे निर्विवाद सत्य मी मांडले आहे. तुम्ही सुद्धा ते मान्य करत आहात. पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ज्या प्रमाणे भारतातील मागासलेले लोक आपल्या खराब स्थितीसाठी मनुस्मुर्ती किंवा सवर्णांना आयुष्यभर दोष देत असतात त्याच प्रकारे मागासलेले देश आपल्या नालायक पणा साठी इतिहासाला दोष देत असतात. इतर देशांची समृद्धता भारताला लुटून आली नाही. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आणि अली असली तरी मागील ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. >तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता भारतीय लोक भारत सोडल्यानंतरच इतके यशस्वी बनतात. ७०% भारतीयांना अजून सुद्धा ठीक पणे लिहिता वाचता येत नाही. हे सत्य आहे. भारताची अर्थ व्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे ह्यांत छाती बडविण्यासारखे काहीही नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होता. दर माणसी दुर्ष्टीने पाहिल्यास भारत अजून जगांतील सर्वांत दरिद्री लोकांपैकी आहे आहे. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि संपत्ती जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.

In reply to by साहना

अर्जुन 07/01/2023 - 15:48
पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ब्रिटिशांनी भारतातून नेलेली संपत्ती ४५ ट्रीलीयन डालर्स इतकी आहे. भारताची अर्थव्यवस्था १९४७ मधे ३.४७ ट्रीलीयन डालर्स इतकी होती. आता जर तरीही तुम्ही पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. असे म्हणत असाल तर तुम्ही मुद्दाम गैरसमज पसरवत आहात असे नाईलाजाने म्हणावे लागेल. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आपले विचार ईंग्रजांना माहित नव्हते, म्हणून ते १५० वर्ष भारतात निचोडत होते. ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. ७० वर्षांत भारतांत दारिद्र्य पसरलं, हे तुम्हाला कोणी सांगितले? स्वातंत्राचावेळी भारतात ८०% जनता गरीब व १९६६ मधे दारिद्र्य रेषेखाली होते, ते २०२२ मधे १६.४% आहेत [ संदर्भ :Global Multidimensional Poverty Index 202] भारताब द्द्ल जर खरी माहीती नसेल तर विचारा, इथे नक्कीच मिळेल. पण कॄपया चूकीची पसरऊ नका आणि तोपर्यत भारतीयांनी काय करायला हवे? हा आपला बहु मोल सल्ला आपल्या जवळच ठेवावा. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि बारामती फवार जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे. तसेच आपण सोनिआ गांधी, बारामती फवार यांच्याप्र माणेच ट्रंप तात्यांच्या उत्पन्नाचे शोध घ्यावेत.

In reply to by अर्जुन

साहना 09/01/2023 - 09:48
पुन्हा तोच मुद्दा. आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. जर भारत सामर्थ्यशाली आणि श्रीमंत विश्वगुरू होता तर मग इतक्या दूरवरून बोटीने येऊन गरीब, असुंस्कृत आणि असामर्थ्यशाली इंग्रजांनी २०० वर्षे देशाला गुलाम विश्वगू कसे बरे बनवले ? उद्या आम्ही आणि तुम्ही मिळून अंबानी आणि अडाणीला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरेल का ? आणि हे मुद्दे मान्य केले तरी मागील ७० वर्षांतील भारताची अधोगती इंग्रजांवर लादली जाऊ शकत नाही. १९४८ साली भारत विश्वगुरू नसला तरी आशियागुरु होता, भरतीय लोकांच्या नेतृत्वाखाली काही दशकांतच भारत आशियागुरु वरून आशियागु वर जाऊन पोचला. हाच दरम्यान जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, चीन इत्यादी देश युद्धांत उध्वस्त होऊन सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत झाले. २०२२ भारतांत सर्वांत मोठे डेव्हलोपमेंट चे मुद्दे आहेत रस्ते जे छोट्या पावसांत वाहून जात नाहीत, पूल जे उद्धघाटनाच्या वेळीच पडत नाहीत, संडास, वेळेवर धावणाऱ्या (संथ गतीने का असेना) ट्रेन्स, प्राथमिक शाळेंत ऍडमिशन, हे बहुतेक विषय इतर जगाने १००-१५० वर्षे आधीच सोडवले होते. भारतीय समाज माणसात साधारण १९९० च्या दशकांत आला. ह्याला मुख्य कारण होते जागतिक बँकेने भारत सरकारची मग्रुरी तोडून त्यांना जबरदस्तीने आर्थिक सुधारणा करण्यास भाग पाडले. श्रेय नरसिम्ह राव किंवा मौन सिंग घेत असले तरी ह्याचे प्रमुख कारण जागतिक बँक आणि पाश्चात्य राष्ट्रे होती. ह्या सुधारणांना आता लोक चांगले म्हणत असले तरी त्या काळी संपूर्ण समाज "देश विकायला काढला आहे" असे म्हणून शिव्या देत होता. कारण समाज आणि त्याची मानसिकताच मुळांत मागासलेली होती. मोदी सरकार कडून रिफॉर्म्स ३.० ची अपेक्षा होती पण तिथे सुद्धा तीच मागासलेली विचारसरणी नडत आहे आणि कदाचित त्याच मुळे मोदी ह्यांनी आर्थिक सुधारणांचा नाद सोडून आपली सत्ता कशी मजबूत होत राहील ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ९० मधील सुधारणा झाल्या नसत्या तर भारताची स्थिती आणखीन खराब झाली असती.

In reply to by साहना

अर्जुन 09/01/2023 - 13:03
आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. हे आकडे माझे नाही आहेत. हे आंतरराष्टीय आकडेवारीतून घेतले आहेत. आता ती आकडेवारी निरर्थक वाटत असेल तर तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. ईस्रो, रेल्वे , आय टी. मधे भारताने केलेली प्रगती व भारताच्या प्रगतीमधे पाश्चमाश्त देशांनी आणलेली विघ्न(उदा. क्रायोजेनिक ईंजिन मिळू न देणे, पाकिस्तानला शस्त्र देणे, शास्त्रन्यांचा हत्या, देशविरोधी आंदोलनाना आर्थिक व नैतिक पाठींबा ईत्यादी) दिसत नाहीत.

In reply to by अर्जुन

Trump 09/01/2023 - 13:35
श्री साहना यांनी अतिशय सरसटीकरण चालु केले आहे. :(
तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते.
बर्‍याच अंशी नक्कीच

In reply to by अर्जुन

तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. डिजीटायझेशन. भाजी विकणारा,गाडी धुणारा,पान विकणारा असे छोटे व्यवसायीक सुद्धा गुगल पे अथवा अन्य कॅशलेस ट्रॅजेक्शन करता आहेत. सारथी सारख्या संकेतस्थळावर जाऊन आर टी ओ ची कित्येक, किंबहुना सर्वच कामे दलाला शिवाय व भ्रष्टाचारा शिवाय करू शकतो. पत्ता. झोमॅटो,स्वीगी,आमेझाॅन सारख्या होम डिलीव्हरी देणाऱ्या, कमी शिक्षण घेतलेल्या मुलांना बरोबर घरचे पत्ते कसे सापडतात हो याचा कुणी विचार केलाय का! अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे देऊ शकतो. डिजीटायझेशन प्रगतीपथावर आहे, विकासातले अडथळे दुर होतायतं. समाज बदलतोय यात शंकाच नाही. कितीही प्रगतीपथावर समाज असला तरी तो परिपूर्ण कधीच होत नसतो. या देशात काय चांगले काय वाईट,काय कमी काय जास्त,काय चुक काय बरोबर याची माहीती इथल्या जनतेला आहे व त्यावर विचार करण्यास इथले लोक समर्थ आहेत. हे कसं, आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 10/01/2023 - 03:19
धाग्याचा मूळ विषय हा लोक देश का सोडून जात आहेत हा होता. त्यामुळे देशांतील कमतरता ह्या स्वाभाविक पणे चर्चिल्या जाणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर देश सोडून जाण्यांत भारतीय लोक नंबर एक आहेत. भारताचे जवळ जवळ १% लोक देशाच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा अत्यंत अवाढव्य आहे. त्याशिवाय देश सोडून जाणे हि गोष्ट फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही. बहुतेक श्रीमंत लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहेच (अंबानी परिवाराचा नातू अमेरिकेत जन्माला येऊन तिथला नागरिक झाला आहे) पण मध्यमवर्गीय आणि गरीब लोक सुद्धा विविध देशांत वेगाने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे देशांतील कमतरता हि छोटी नसून खूप मोठी आहे आहे संपूर्ण समाजाला भेडसावणारी आहे हे लक्षांत येते. कमतरता मान्य केल्याशिवाय त्यांत सुधारणा शक्य नाही. देशांत काहीच चांगल्या गोष्टी नाहीत असे म्हटले नाही. असतील, अनेक असतील पण त्या पुरेश्या नाहीत लोक लोकांचा जो लोंढा बाहेर जात आहे त्यावरून सिद्ध होते. अजून सुद्धा साधारण माध्यम उत्पन देशांचा राहणीमानाचा स्तर भारतीय राहणीमानाच्या स्तरापेक्षा चांगला आहे.

रानरेडा 07/01/2023 - 00:29
बाकी सर्वांचे जे ओळखीचे  लोक अमेरिकेत/  विदेशात जातात ते सर्व देशप्रेमी / सरळ साधे / गोड गोड / संसारी  सतत देशाच्या नावे उमाळे काढणारे कसे असतात? भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?   माझे कोण ना कोणी ओळखीचे  अमेरिकेत गेली 30-32 वर्षे जातोय  यातले काही थोडे जण अमेरिकन अय्याश झाले आहेत म्हंजे सुपर बाईक , बोटी , गाड्या , बंदूक , जुगार , गांजा ( मारणे आणि उगवणे), फिरणे, लिव्ह इन असले भारतात न परवडणारे किंवा मान्यता नसलेले छंद असलेले आहेत . बहुतेक मराठी आहेत खास करून सुपर बाईक / हाय परफॉर्मन्स गाड्या तिकडे थोड्या चांगल्या पगारात परवडतात. आणि त्या चालवायला चांगले रस्ते पण आहेत . डूकाटी  आणि हार्ले ठेवणारे लोक आहेत . मस्टँग अमेरिकेत किती ला आहे ? भारतात ती एखाद करोड ला होती  पिस्तूल / बंदूक भारतात छंद  म्हणून ठेवणे अशक्य आहे. आणि त्याचा दारुगोळा सहज मिळत नाही . भारतात  ३-४ गन  / पिस्तूल लायसन्स वर ठेवणे  अशक्य आहे . आणि त्याची किंमत पण फार होईल .  अमेरिकेत जॅक डॅनिअल किंवा जिम बीम ची बाटली किती ला मिळते ? तेथील पगाराच्या मानाने ? भारतात किती सहजपणे त्या लेव्हल ची बाटली परवडते ? नेहमी चांगल्या पब मध्ये जाणे कितीसे परवडते ? जुगार हा भारतात accepted छंद आहे का ? गांजा भारतात बंदी घातली आहे . अमेरिकेत काही स्टेट मध्ये कायदेशीर रित्या मर्यादेत गांजा उगवू हि शकतो . बाकी भारतात सामान्य executive  पगारात घड्याळे , लक्झरी  किती परवडते ? म्हणजे मी भारतात काय लाखांची घड्याळे असतात त्या बद्दल विचारतोय  बहुतेक सर्व व्यवस्थित पैसा कमावणारे बरेचसे संसारी , मुले बाळे असलेले आहेत,काहींनी मुले न होण्याचा कॉल घेतला आहे.   विदेशात व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे  आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात -  घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही  तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही. ओळखीच्या मुली घटस्फोट होऊन परत लग्न केलेल्या आहेत. एकीचे दोन होऊन, बराच काळ लिव्ह इन मध्ये राहून ती त्या बरोबर संसारात आहे - किती जणांसाठी हे सहज शक्य आहे ? याची पण तरुण पिढीला भुरळ पडत नसेल ?

In reply to by रानरेडा

साहना 07/01/2023 - 01:36
> भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ? भरपूर आहेत. ज्यांना छंदासाठी वेळ सुद्धा भारतात मिळाला नसता अश्या लोकांना इतर देशांत छंदासाठी वेळ मिळतो. बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. त्याशिवाय मी इथे शिकार आणि मासे पकडायला सुद्धा जाते. धनुष्यबाणाने नि बंदुकीने आम्ही इथे शिकार करू शकतो. पण ह्या शिवाय असंख्य छंद जोपासले जाऊ शकतात. वाईन टेस्टिंग हा एक छान छंद आहे $३ पासून $३००० पर्यंत च्या अनेक आंतराष्ट्रीय वाईन्स आपण इथे पिऊ शकतो. ज्यांना इतर दारूची आवड आहेत त्यांना सुद्धा हजारो प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इथे लोव किंवा होम डीपोट मध्ये प्रत्येक प्रकारचे घर निर्मितीचे सामान मिळते. त्यामुळे अनेक लोक लाकूड काम, लेसर कटिंग, इपॉक्सी , ३D प्रिंटिंग हे छंद जोपासतात. जगांतील कुठल्याही प्रकारची कुसिन्स इथे मिळतात. बलोच, चिनी उईघुर, नेपाळी, इथिओपियन इत्यादी देशांची रेस्टोरंटस मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला मिळतात. काही लोकांना भटकंती हवी असते. गाडीच्या फक्त एक टॅंक पेट्रोल वर तुम्ही खूप काही पाहू शकतात, ५० पेक्षा महा मोठे नॅशनल पार्क्स, लक्षावधी छोटे पार्क्स किमान अमेरिकेत उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारच्या संधी उपलबध आहेत. हे सर्व छंद इथे साध्या पगारावर सहज जोपासले जाऊ शकतात. तुम्हाला एखादा छंद असला कि ताबतोब तुम्ही समविचारी लोकांशी मैत्री सुद्धा करू शकता. त्यामुळे आपोआप आपले नेटवर्क सुद्धा बनते. ह्याच व्यक्ती देशांत असत्या तर संपूर्ण दिवस ट्राफिक मध्ये आणि सुट्ट्या नको त्या चिंता काढण्यात गेल्या असतंया. छंदाशी निगडित कुठलीही गोष्ट १००% टॅक्स भरल्याशिवाय मिळाली नसती.

रानरेडा 07/01/2023 - 13:53
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? असे होते का ? कि हे मूळ लेखकाचे तर्कट ? असे कितीसे लोक आहेत जे रिटायर झाल्यावर भारतात आलेत ? साधारण ६० -६५ वय पकडले तर ते लोक १९६३ - १९५८ साली जन्मले असतील . साधारण पंचविशीत १९८८ - १९८३ ला असतील त्या काळात कितीसे भारतीय विदेशात जात होते ? त्यातले किती परत आलेत ? का आलेत ? काही माहिती नसताना मूळ धागाकर्त्याने पुडी सोडली आहे असे मला वाटते

In reply to by रानरेडा

Trump 07/01/2023 - 14:04
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
ते जेव्हा भारतात येतात तेव्हा भरपुर पैसे घेउन येतात. शिवाय तिकडे कमवत असताना पैसे पाठवतात ते वरती दिलेलेच आहे.

In reply to by रानरेडा

Trump 07/01/2023 - 14:48
म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
आखाती देशात गेलेले बहुतांशी सगळे परत आलेत. पाशात्य देशातील साधारतः २० टक्के लोक परत आलेत. (अनुभवावरुन, कृपया विदा मागु नये.)

In reply to by रानरेडा

असे म्हातारपणी परत येणारे लोक 5 टक्के तरी असतील का याबद्दल शंका आहे. यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही.

In reply to by रानरेडा

साहना 10/01/2023 - 03:25
माझ्या माहितीची एक श्रीमंत अमेरिकन व्यक्ती डिमेन्शिया झाल्याने भारतांत परत आली. दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक होती आणि त्यांनी वडिलांची जबाबदारी घ्यायची पूर्ण इच्छा दाखवली होती पण वडिलांचा इगो मोठा होता. त्यामुळे ते साधारण ५० वर्षे अमेरिकेत घालविल्या नंतर भारतांत परत आले. हल्लीच त्यांच्या बँकेने मुलांना पात्र पाठवले कि ह्यांचे चेक्स बाऊन्स होत आहेत, काही तरी करा. तेंव्हा मुलांनी बँक स्टेटमेंट पहिले तर बहुतेक पैसा गायब. तर काय स्थानिक काही संस्था आणि बँक मॅनेजर ह्यांनी साटेलोटे करून व्यक्तीच्या कमकुवत मनाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे विविध संघटनांना डोनेशन म्हणून उकळले.

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते? भारतातले राहणीमान दरिद्री आहे, भारतात दरिद्री लोक राहतात, भारतातल्या लोकांची लायकी नाही वगैरे विधानांबद्दल वाद होता. शिवाय आपण कुठे जन्माला आलो यावर आपले नियंत्रण नसते वगैरे विधानांमध्ये उगाचच अहंकाराचा दर्प दिसला. म्हणून माझा आक्षेप होता पण आता वरचे प्रतिसाद वाचल्यानंतर माझे काहीच म्हणणे नाही.

संपादित.  व्यक्तिगत टीका टाळावी.
-व्यवस्थापन

In reply to by अप्पा जोगळेकर

Trump 07/01/2023 - 16:54
आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?
अगदी बरोबर. पाशात्य लोक कितीही एकमेकांबरोबर भाडले तरी ते नेहमी अपाशात्याविरोधात एकमेकांना मदत करतात.

लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरमसाठ भरकटली आहे आणि काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी परत ट्रॅकवर आणू इच्छितो. या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे. १. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण बर्‍याच लोकांना हे काहीतर क्षुल्लक आणि फुटकळ फॅड वाटू शकते. परंतु हा प्रॉब्लेम भारताने सोडवल्यास तो हजारो/लाखो कोटी रुपये वाचवू शकतो. काही तज्ञांच्या मते हा प्रॉब्लेम बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा मोठा आहे. युरोपियनराष्ट्रांनी हा प्रश्न केव्हास धसास लावला आहे. आणि त्याचे फायदे प्रगत युरोपात प्रत्यक्ष राहिलेल्या लोकांना सहज लक्षात येऊ शकतील. कोणत्याही घराचा/वास्तूचा पत्ता हा तीन गोष्टींनी अचूक सांगता येतो. प्रशासनाच्या कोणत्याही पातळीवर हा पत्ता बदलत नाही. म्हणजे गावपातळीवर, जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर. १. रस्त्याचे नाव २. घराचा नंबर ३. पिन कोड भारतात पत्ता हा प्रकार केवळ मूर्खपणा आहे इतके आपण मागास आहोत. उदाहरणार्थ - मला जर एखाद्या कंपनीचा पत्ता सांगायचा असेल तर जवळच्या चौकाचे नाव, कॉलनीचे नाव, अमुक झाड, तमुक ओढा, पेट्रोलपंप, हागणदार्‍या मुतार्‍या, समोर, उभे, आडवे, सेक्टर, गल्ल्या, ब्लॉक, टेकड्या, चतुर्थीचा चंद्र अगदी वाट्टेल ते सांगावे किंवा लिहावे लागते. ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले. नाहीतर आपली मजाच होती. काही लोक महसूलविभागांचे सर्वे नंबर्स सुद्धा पत्त्यात टाकतात. शिवाय बेंगलोर मध्ये क्रॉस आणि लेन्स अस्तात, पुण्यात रोड आणि रस्ते नाहीतर संकल्पना असे लिहिलेले चु*या नगरसेवकांचे बोर्ड, रोज बदलणारी चौकांची नावे म्हणजे काहीही प्रमाणीकरण नाही. विशेषम्हणजे हे सिस्टीममध्ये मोजमापात नाही असे नाही. सर्वे नंबर, गावाच्या हद्दी, जमिनींचे प्रकार आणि झोन्स हे सगळे ठरलेले आणि व्यवस्थित रुजलेले आहे. महसूलीरचना मला वाटते राज्य आणि राष्ट्र या दोन्ही सूचींत येते. तरीही आपण याचा गांभीर्याने विचार करत नाही. आता प्रत्येक नगरपालिकांनी घरांना नंबर्स दिलेले आहेत, घरपट्टीचा नंबरही रंगवलेला असतो. तरीही आपल्याला ही व्यवस्था बसवता आली नाही हे आपले खूप मोठे अपयश आहे. याचे फायदे अनेक आणि काहीवेळा तर मुलभूत आहेत. उदा. युरोपियन राष्ट्रांत प्रत्येक घरकुलाला टीव्ही/रेडिओ टॅक्स द्यावा(च) लागतो. तो थोडा थोडका नसतो. काही राष्ट्रांत यातून फारशी सुटका नसते. घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, खाजगी खर्च, युटीलिटी, सगळे सगळे काही पत्त्याशी गुंतलेले असते. आप्ल्या आधारकार्डावर एक पत्ता, मतदानकार्डावर तिसराच, पॅनकार्डावर चौथाच, आणि बँकेत आठवाच असला गाढवपणा सर्रास दिसतो. यातून सार्वजनिक पैशाचा किती अपव्यय होतो हे कुणीतरी शोधायला पाहिजे. (सर्व आजीमाजी नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, 'इथे हे या चु*याचे घर आहे' असे सार्वजनिक पैशातून चांगले लोखंडी बोर्डस लावलेले आहेत. प्रत्येक सरकारी गोष्टीच्या नावाखाली 'संकल्पना - अमुक चु*या' असे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या पैशातून लिहिले जाते. याचा हिशोब काढला तर तोच कोट्यवधी रुपयांचा असेल. याचा फायदा शून्य.) असो. २. फ्लेक्सबंदी - भारतातून सक्तीची फ्लेक्सबंदी करायला हवी. कुठल्याही संस्थेला यातून मिळणार्‍या उत्त्पन्नाची गरज नाहीए. त्याऐवजी उत्पन्नाचे दुसरे चांगले मार्ग शोधावेत. बिलबोर्डासाठी मोठ्या रस्त्यांशिवाय कुठेही परवानगी मिळायला नको. ३. भाषाविषयक धोरणे - भारताने त्रिभाषा सूत्र नावाचा जो अडाणीपणा चालवला आहे तो ताबडतोब बंद करायला हवा. राज्यभाषा आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा. इतर राज्यभाषा, परदेशी भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असायला पाहिजेत. ज्या राज्यांची राज्यभाषा प्रमाण हिंदी असेल ते शिकवतील हिंदी तिथल्या मुलांना. बाकीच्या मुलांना, त्यांच्या पालकांना इच्छा असेल तर हिंदी/इंडोनेशियन/थाई ऐच्छिक म्हणून शिकतील. शिवाय आजकाल बोलीभाषांना एक उगीचच अवास्तव महत्त्व आले आहे त्याचे कौतुक तेवढ्यापुरते तेव्हढे ठेवावे. राज्यभाषांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे. मुलांवर भाषांचा मारा जितका कमी करता येईल तितका तो केला पाहिजे. प्रत्येक महत्वाचा सरकारी कागद उदा. जन्म दाखला हे कमीतकमी दोन भाषांत (राज्यभाषा आणि इंग्रजी) दिला गेलाच पाहिजे. भाषाशिक्षणाचे प्रमाणीकरण केले पाहिजे. ४. कागदपत्रांचे प्रमाणीकरण - वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांचे देशपातळीवर प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. जन्मदाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, लग्नाची नोंद, प्रॉपर्टीची कागदपत्रे इत्यादी इत्यादी.. आधी प्रमाणीकरण, मग आपसूक येते ते डिजीट्लीकरण.. ती कमीतकमी दोन भाषांमध्ये एकाचवेळी देणे बंधनकारक केले पाहिजे. ५. भारतीय पर्यटनस्थळे : भारत पर्यटनात खूप मोठी मजल मारू शकतो आणि भरपूर कमवूदेखील शकतो. काही पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची असावित. म्हणजे तिथली पायाभूत सुविधांची कलाकुसर, सोयी, ट्रान्स्पोर्ट हे परदेशी नागरिकांना मानवेल असे ठेवावे. उदा. अजिंठा वेरुळ लेणी, बदामीचा परिसर. काही पर्यटनस्थळे ही देशी-परदेशी दोन्ही लोकांच्या दृष्टीने विकसित करावीत. उदा. रायगड. दुसर्‍या प्रकारची भारतीय पर्यटनस्थळे भारतीय पुरातत्व विभाग नावाच्या तुरुंगातून ताबडतोब मोकळी करून राज्यांना विकसित करायला द्यायला हवीत. तिथे नाममात्र फी न ठेवता भरपूर फी ठेवावी. उदा. बदामी लेणी आणि किल्यांसाठी किमान ५०० रुपये आणि १० डॉलर्स प्रतिमाणशी इतका तरी दर पाहिजे. पन्नास भंगार लोक तिथे जाण्याऐवजी दहा शहाणी माणसे पैसे मोजून जातील. सर्वसामान्यांना परवडत नाही वगैरे गळे काढू नयेत. सर्वसामान्य माणूस खंडोबाला जाऊन हजारेक रुपये सहज उधळून येतो. ६. आधार सगळीकडे - सर्व ठिकाणी आधार सक्तीचे करावे. लग्नाच्या नोंदी, कुटुंबाच्या नोंदी, इत्यादी इत्यादी सगळीकडे. सरकारने कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाला न जुमानता आधार लिंकिंग राबवले पाहिजे. स्वस्त धान्य वगैरे आधार शिवाय अजिबात मिळाले नाही पाहिजे. त्यासाठी दर किमान ५००० लोकसंख्येमागे एक या हिशोबाने सरकारी आधार केंद्रे सुरु करायला पाहिजेत. मतदान, बँक, इतर सरकारी आस्थापने, दवाखाने इथे सगळीकडे आधार सक्तीचेच पाहिजे. भ्रष्टाचाराची खूप मोठी कुरणे आधारसक्तीने बंद होतील. ७. महत्त्वाच्या संस्थांचे 'आयआय'करण/ नवीन क्षेत्रांमध्ये अशा संस्था स्थापणे - सरकारने काही महत्त्वाच्या संस्थांना 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स' चा दर्जा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तर अशा दर्जाची संस्था हवी आहे. काही उत्तम संस्थांचे सरकारने आय. आय. करण करून त्यांचा दर्जा किमान एखाद्या आयायटी इतका केला पाहिजे. शिवाय त्यांची स्वायत्तता अबाधित ठेवून किमान दर्जा राखण्यासाठी काहीतरी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवून दिला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये सरकारने अशा संस्था काढून भरपूर आर्थिक अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. उदा. प्रत्येक राज्यात एकतरी एफटीआयआय च्या दर्जाची संस्था हवी. प्रत्येक दहा जिल्ह्यांमागे एक आय आय टी, प्रत्येक जिल्ह्यात एक एन आय टी, प्रत्येक राज्यात किमान तीन स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सारखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अशा प्रकारची काहीतरी योजना करावी. मला खालील प्रकारच्या संस्था/संस्थांचे प्रमाणीकरण पाहायला खूप म्हणजे खूप आवडेल - १. इंडियन इन्टिट्यूट्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस/म्युझिक/फिल्म/मेडिया २. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लॉ ३. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिसिन ४. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉमर्स/इकॉनॉमिक्स/ट्रेड ५. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ फॅशन ६. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्सेस/हुमॅनिटिज ७. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर ८. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लँग्वेजेस/आर्ट्स/लिटरेचर ९. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्पोर्ट्स १०. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ पॉलिसी/गव्हर्नन्स ११. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ डिफेन्स १२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ बेसिक अँड नॅचरल सायन्सेस इत्यादी इत्यादी व इतर विवक्षित संस्था उदा. बँकिंग व इन्शुरन्स ८. रेल्वे सामायिक सूचीत - रेल्वे ही केंद्रीय सूचीतून काढून ती सामायिक करावी. प्रत्येक राज्याला रेल्वेमार्ग बांधण्याचा, रेल्वेसेवा चालवण्याचा पुरेपूर हक्क पाहिजे. १०. पब्लिक हेल्थ इन्शुरन्स - ना नफा ना तोटा तत्वावर एल आय सी सारख्या पब्लिक हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या सरकारने काढाव्यात. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा केला पाहिजे. तो सावर्जनिक असो वा खाजगी. कदाचित हे अवघड जाईल सुरुवातीला, पण या अंगाने कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ११. धार्मिक स्थळांवर कर - सगळ्या सार्वजनिक आणि खाजगी धार्मिक स्थळांवर वेगळी कर आकारणी झाली पाहिजे. ट्रस्ट शिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाला मंजूरी मिळाली नाही पाहिजे. प्रत्येक ट्रस्टचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक केले पाहिजे. मग ते मंदीर असो, नाहीतर गुरुद्वारा, नाहीतर एखादा मठ, नाहीतर चर्च असो वा मशीद/मदरसा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 08/01/2023 - 07:08
नेहमीप्रमाणे मुद्देसूद प्रतिसाद आणि मांडणी. धन्यवाद. एक बारीकसे मत.
ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले.
काहीशी असहमती. पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत (सहा आकडी पिन कोड नव्हे)

In reply to by गवि

पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत
संदर्भ...? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/01/2023 - 12:49
तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे.. घ्या https://en.m.wikipedia.org/wiki/Postal_Index_Number The PIN system was introduced on 15 August 1972 by Shriram Bhikaji Velankar, an additional secretary in the Government of India's Ministry of Communications.

In reply to by गवि

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..
तसदीबद्दल क्षमस्व सर. आणि माहितीबद्दल आभारी आहे. आपलं मत गुगलल्याशिवाय मान्य करणार होतो. पण, दोन हजार चौदापासून 'विश्वासराव' खपले आहेत. पडताळणी करायची आणि मग मान्य करायचं. असं धोरण आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

mayu4u 13/01/2023 - 16:03
प्रा डॉ असण्याविषयी विश्वास्राव काय म्हणतात?

In reply to by साहना

सर टोबी 08/01/2023 - 12:17
हा मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच आहे. तसेच थेट लाभार्थ बँकेत जमा होण्याची सुविधा यांचेदेखील श्रेय मनमोहन सरकारला आहे. माझ्या मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरापेक्षा ज्याचे श्रेय त्याला मिळावे या आग्रहाखातर हा प्रतिसाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खरंय. माझ्या प्रत्येक कागदावर पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आधार, वाहन परवाना, बँक खाते१, बँक खाते२ प्रत्येक ठिकाणी एकच पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. + डिलीव्हरीसाठी कितीही व्यवस्थित पत्ता लिहिला, तरी प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं. शेवटी तो चुकीच्या जागी पोचतो, मग तिथे जाऊन घ्यावं लागतं. याचा उपमुद्दा - पत्ता बदलल्यास तो एका कागदावर (उदा. आधार) बदलल्यास सगळीकडे आपोआप जायला हवा. आधारवर बदला, मग निवडणूक पत्र बदला, मग दोन तीन बँकांत आणि इतर दोन खात्यात बदला, मग गॅस कंपनीत बदला.

In reply to by तुषार काळभोर

साहना 09/01/2023 - 11:30
मी IIT मुंबईत होते तेंव्हा कुणालाही पत्ता द्यायचा म्हणजे दिव्य होते. अगदी फ्लिपकार्ट सुद्दा "लँडमार्क" सांगा म्हणायचे. वोडाफोन ने "लँडमार्क" नाही म्हणून दोन वेळा माझे पोस्टपेड कनेक्शन कापले. मग कुणीतरी लँडमार्क मध्ये JVLR असे लिहा असे सांगितले. (IIT बाहेरच्या रोड चे नाव आदी शंकराचार्य मार्ग आहे पण बहुतेक लोकांना ह्याची माहिती अजिबात नाही), JVLR ह्या चा अर्थ मला आजतागायत ठाऊक नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे अरे देवा, वरील काही ओळी वाचून हर्ट झालो. बाकी विचार मुद्दे महत्वाचे आहेत. सहमती आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Trump 08/01/2023 - 13:17
धन्यवाद.
१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण
घरात राहणार्‍या लोकांना ज्या ठिकाणी राहतो त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्याची सक्ती असावी. सध्या कोण कोठे रहातो त्याची पडताळणी कशी करावी ह्यासाठी कंपनीचे पत्र पासुन आधार कार्ड काहीही चालते. खोटा पत्ता देणे सहज शक्य आहे, त्यामुळे दिलेल्या पत्यावर विश्वास ठेवणे मुश्कील आहे. अजुन काही माझ्यातर्फे
  1. कंत्राट, दायित्व (liability): जेव्हा कोणी व्यवसायिक सल्ला देतो तेव्हा त्या व्यवसायिकाला सल्ल्याचे दायित्व असावे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
  2. सरकारी कामे वेळेत व्हावीत, दिलेल्या अर्जाची पोच मिळावी, कायदे सर्वासाठी समान असावेत. लाचखोरी बंद व्हावी. सर्वसामान्य माणासांना त्याबद्दल तक्रार करायची सोय असावी, आणि त्यांचे निवारण व्हावे.
  3. छोट्या छोट्या कंत्राटांसाठी महसुल खात्याच्या मुंद्राकाची गरज नसावी.
  4. कोणाला दिलेले पैसे सहज वसुल करता यावेत. छोट्या छोट्या कामासाठी वकील, न्यायालयाची गरज नसावी.
  5. मुलांना लहान पणापासुन शिस्त पालन महत्व असावे.
  6. छोटे कायदेभंग करणार्‍या आणि अट्टल न झालेल्या लोकासाठी आर्थिक दंडाबरोबर, सक्तीची समाजसेवा (उ. मंदीरापुढे चपला साफ करणे, संडास साफ करणे, रस्ते साफ करणे इ.) असावी.
  7. मोठे तुरुंग बांधावेत. बरेचदा रस्त्यावर मुले, माणसे कायद्याचे पालन करत नाहीत. जेव्हा त्यांना योग्य त्या संधी देऊन त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना तुरुंगात ठेवावे. त्यांच्या कडुन शारिरीक श्रम करुन ठेऊन रस्ते तयार करणे, तलाव बांधणे अशी समाजउपयोगी कामे करुन घ्यावीत (मला माहिती आहे की हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो.)
  8. समाज, छपाई, दुरचित्रवाणी माध्यमावर दायित्व कायदा असावा. विनाकारण चरित्रहनन करणार्‍याविरोधात कडक कायदे असावेत.
  9. कोणत्याही कामासाठी राज्याच्या राजधानीत जायची गरज पडु नये, कामे तालुक्यात, कमीत कमी जिल्ह्यातच व्हावीत.
  10. ग्रामिण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारावे. काच, धातु, प्लॅस्टीक, ओला कचरा, इतर कचरा वेगवेगळा व्हावा.
  11. ध्वनीप्रदुषण थांबावे. धर्म, जात, पंथ, जयंत्या, पुण्यतिथ्या इ. खाजगी गोष्टी व्हाव्यात. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते अडवणुक बंद व्हावी
  12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
  13. बास आता. :)

In reply to by Trump

Trump 21/01/2023 - 00:28
भारतातील प्रदुषणाबद्दल अजुन कोणी लिहीले नाही. -उत्तर भारतातील बहुतेक भुभागावर आणि इतर भारतातील मोठ्या शहरामध्ये वायुप्रदुषण भयंकर आहे.

In reply to by Trump

Trump 25/01/2023 - 00:08
ऑस्टेलियात पंतप्रधानाला घरच्या हिरवळीवरुन बाजुला जायला सांगितले. असे कधी भारतात दिसु शकेल का? साधा नगरसेवक झाला की लोकांना इतका रुबाब वाटतो की बघायला नको. तसेही भारतातील मंत्री, अधिकारी जनतेचे सेवक कमी आणि मालक जास्तच वाटतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टीपीके 14/01/2023 - 11:19
पत्त्यासंबंधी थोडी जाहिरात धागा. आता तर हे पद्धत वापरणे खूप सोपे झाले आहे. गुगल मॅप वर पण प्लस कोड दिसतो

Trump 08/01/2023 - 12:28
सर्वसामान्य लोकांना अजुन एक भेडसवणारी अडचण -- रस्तोरस्ती असलेले भटकी कुत्री, गुरे, पक्षी इत्यादी. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

साहना 09/01/2023 - 11:22
देशांतील लोकांवर प्रेम नसते तर विषयावर लिहून मी वेळ वाया घालविला नसता. मी भारत देशाला घाणेरडा, भिकार आणि मागासलेला असे जे म्हटले आहे ते देशाचा किंवा तेथील लोकांचा अपमान करायच्या हेतून म्हटले नाही. फक्त वस्तुस्थिती विशद केली आहे. लठ्ठ महिलेला तुम्ही सडपातळ म्हटले म्हणून तिचे ४ पौंड वजन कमी होत नाही. देशांत कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे ह्यांत अजिबात शंका नाही आणि त्याला जोड म्हणजे लोकांत स्वच्छते विषयी नसलेले प्रेम. सर्व भारतीय सार्वजनिक ठिकाणे अत्यंत घाण आहेत ह्यांत शंका नाही. विविध समुद्र किनारे, चित्रपट गृहे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी कचरा आहेच पण गांवात सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो, ऐपत असलेले लोक सुद्धा मुद्दाम उघड्यावर शौच करतात आणि सर्व ठिकाणी पण खाऊन थुंकून ठेवतात. देशावर प्रचंड प्रेम असलेला माणूस सुद्धा ह्या गोष्ट नाकारू शकत नाही. ह्याला घाणेरडा म्हटले तर त्यांत चुकले काय ? भिकार शब्द प्रयोग सुद्धा वस्तुस्थिती विशद करण्यासाठीच वापरला आहे. देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते. हि भीक नाही तर काय आहे ? आणि मागासलेला हे विशेषण तर जवळजवळ ऑफिशिअल आहे. ह्यासाठी वेगळे पुरावे देण्याची सुद्धा गरज नाही. विकसित देशांत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या इथे आम्हाला धडपडून सुद्धा मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मूळ मुद्दा म्हणजे जो पर्यंत देशांत काय कमी आहे ह्या गोष्टी लोक प्रांजळ पणे मान्य करत नाहीत तो पर्यंत त्यांत सुधारणा होणे शक्य नाही. मोदी ह्यांनी संडास ह्या विषयवार इतकी भाषणे दिली कि त्याच्यावर टीका झाली होती कि पंतप्रधानांनी अश्या विषयवार बोलणे योग्य आहे का ? पण ते बोलले म्हणून थोडाफार तरी बदल आला कि नाही ? स्वच्छ भारत स्कीम बहुतांशी फोटो=ओप म्हणू न वापरली गेली तरी थोडा बदल तरी समाजांत दिसून येतो कि नाही ?

In reply to by साहना

टर्मीनेटर 09/01/2023 - 11:38
देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते.
कुठ्ल्या काळातले सांगताय तुम्ही? आज भारतातली १००% जनता GST च्या रुपाने कर भरत आहे. ह्याला रस्त्यावरचा भिकारीही अपवाद नाहीये! हा पण सर्वसामान्य जनतेकडुन गोळा होणारा कराचा पैसा जेव्हा सरकार नको त्या ठिकाणी खर्च करते ते मात्र नक्कीच खटकते, जसे कि युक्रेन युद्धामुळे तिथे स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना फुकटात देशात परत आणणे वगैरे वगैरे...

श्वेता२४ 09/01/2023 - 16:58
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत. याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो? गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.

In reply to by श्वेता२४

चौकस२१२ 10/01/2023 - 09:39
तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे वाट्टेल ते ??? हा तुमचा ( कदाचित भारतातील रहिवासी आणि तेथील या संदर्भात ) विचार पाश्चिमात्य देशात बरीच कामे हलकी समजली जात नाहीत ... त्यामुळे वाट्टेल ते वैगरे फक्त तुमच्या पुरते उलट मी अ रे म्हणेन कि भारतातात हि "वाट्टेल ती कामे " लोक करायला लागली तर बरेच, विशेष करून विद्यार्थी असताना कमवणे / बचत करणे ,,, इत्यादी असो मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे हो करू शकतात ना नाही कोण म्हणतंय ? पण "चांगलं" म्हणजे नक्की काय .. कार्यालयात भारतात काय आणि पाश्चिमात्य देशात काय संख्याच दर्जाचे काम कराल हो पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मग हे तत्व वापरलं तर शहरातून खेड्यातच राह्यला पाहिजे ! जमेल ???

In reply to by चौकस२१२

सुक्या 10/01/2023 - 23:32
पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते. माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?

मुळात भारताची तुलना लगेच अमेरिकेशी किंवा युरोपियन राष्ट्रांशी करणे चुकीचे आहे. हा आपले ध्येय मात्र त्यांच्यासारखे पुढारलेले बनणे असले पाहिजे. फार फारतर आपण दहा वर्षां पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्यांची तुलना करायला पाहिजे.खरतरं एखाद्या देशासाठी १० वर्षं हा काळ सुद्धा अतिशय कमी आहे. पण एका दशकात आपली दिशातरी योग्य आहे का याचे निपक्ष विश्लेषण तज्ज्ञांकडून व्हायला पाहिजे.

तर्कवादी 10/01/2023 - 00:27
ज्याप्रमाणे भारतीय लोक भारताबाहेर दीर्घ मुदतीच्या वास्तव्यास सर्रास जातात तसे भारतात दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यास लोक येत असतील का ? असल्यास कोणत्या देशातून (नेपाळ व बांग्लादेशातून येतात, पण त्या खेरीज ) ? त्यांचे भारतात स्थायिक होण्याचे कारण / प्रेरणा काय असाव्यात ?

In reply to by तर्कवादी

साहना 10/01/2023 - 02:46
बांगलादेशी, नेपाळ, भूतान, श्री लंका, नायजेरिया काही अरब राष्ट्रे इत्यादी देशांतून लोक कायदेशीर किंवा बेकायदेशीर पणे भारतांत वास्तव्य करतात. अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत. स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम हि तीन राष्ट्रे सध्या पाश्चात्य देशांत देश सोडून जाण्यासाठी महत्वाची आहेत. व्हिएतनाम मध्ये तुम्हाला खूप कमी पैश्यांच्या गेटेड अमेरिकन कम्युनिटी मिळते. पोर्तुगाल अँड स्पेन चे हवामान खूप चांगले आहे आणि राहणीमान उच्च असल्याने अनेक लोक तिथे निवृत्त होऊन जातात.

In reply to by साहना

श्रीगुरुजी 10/01/2023 - 08:22
नायजेरियन, अफगाणी, बांगडे, पाकडे वास्तव्य संपल्यानंतरही परत जात नाहीत व भारत सरकार काहीही करत नाही. अनेक नायजेरियन, अफगाणी अंमली पदार्थ विकतात. वास्तव्य किंवा अंमली पदार्थ व्यापारावरून त्यांना पोलिस पकडायला गेले की ते झुंडीने हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात. २०१० च्या दशकात अदनान सामीने बराच आयकर भरला नव्हता व वास्तव्य परवाना संपल्यानंतरही आरामात मुंबईत रहात होता. इतर देशात अश्या व्यक्तीला तुरुंगात टाकून नंतर हाकलून दिले असते व नंतर भारताबाहेर हाकलून परत कधीही भारतात येण्यासाठी आयुष्यभराची बंदी घातली असती. परंतु भारत सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तश्या परिस्थितीतही त्याच्या वास्तव्य परवान्याची मुदत वाढवून दिली व नंतर या गुन्हेगाराला काहीही शिक्षा न करता चक्क नागरिकत्व देऊन टाकले. Nigerian mob attack cops बनाना रिपब्लिक ही संज्ञा भारतावरूनच निर्माण झाली असावी.

In reply to by श्रीगुरुजी

सुरिया 10/01/2023 - 13:54
चक्क नागरिकत्व
नुसते नागरिकत्व नाही. २०१६ ला त्याला नागरिकत्व दिले गेले आणि २०२० ला तर चक्क पदमश्री बहाल करण्यात आली. हे खरे बनाना(और लोगोंको बनाना भी) रिपब्लिक. त्याचे वडील अर्शद सामीखान जे मुळचे काश्मीरी आणि पख्तू सांगतात ते पाकिस्तानी एअरफोर्समध्ये पायलट आणि नंतर राजदूत वगौइरे असले तरी अदनान चा जन्म, शिक्शण ब्रिटिश होते. नंतर तो कॅनडा स्थायीक होता.

In reply to by सुरिया

श्रीगुरुजी 10/01/2023 - 14:13
भारत २०१४ पूर्वी बनाना रिपब्लिक होता व २०१४ नंतरही बऱ्याच प्रमाणात तसाच आहे. मुख्य फरक पडलाय तो परराष्ट्र संबंध आणि लष्करी प्रतिसादात. पाकिस्तान किंवा चीनने आगळीक केली तर भारत फक्त तोंडी निषेध करायचा. आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. तसेच मलेशिया, टर्की वगैरेंनी भारताविरुद्ध काहीही केले तरी भारत लगेच त्यांच्या नाड्या आवळतो. परंतु इतर विषयात अजूनही सुधारणा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शाम भागवत 15/01/2023 - 10:52
२०१४ नंतर आणखी एक फरक पडलाय. २०१४ पूर्वी कल्याणकारी योजनांवर सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातील फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहचायचे. २०१४ नंतर लाभार्थींपर्यंत जास्त पैसे पोहोचायला लागले आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे मी भारताच्या भविष्याबाबत आशावादी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 24/01/2023 - 04:34
> आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. हे सुद्धा फक्त प्रसिद्धी मिळवण्याची थोतांड असू शकते. लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. भारताने कतार पुढे जे लोटांगण घातले आणि एका तथाकथित गुअस्वलाने हिंदू महिला नुपूर शर्मा हिचे आयुष्य सरेआम उध्वस्त केले त्यावरून परराष्ट्र धोरण ह्यांत सुद्धा बोलबच्चन पणा जास्त आहे असे वाटते. सत्य कळायला अजून अवकाश आहे.

In reply to by साहना

अर्जुन 25/01/2023 - 12:47
लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. तुमचा भारतातील लष्करा वर विश्वास नसेल आणि परराष्ट्र धोरणा विषयी संशय वाटत असेल तर तूम्ही भारत आणि भारतीयांना दोष देण्यासाठीच मिपावर येता असे वाटते. क्रुपया आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यात [नावे ठेवण्या त ] आपण आपला[व आमचा] बहूमुल्य वेळ वाया घालवू नये ही मनापासुन विनंती.

In reply to by साहना

तर्कवादी 10/01/2023 - 16:02
अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.
धन्यवाद. पण नोकरी/व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशी नागरिक भारतात किती प्रमाणात वास्तव्यास असतील ? जसे अमेरिकेतील गुगल, मायक्रोसॉफ्ट , नासा ई मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वा इतर देशांतले परदेशी (अमेरिकन नसलेले) नागरिक नोकरीस आहेत त्याप्रमाणे भारतात अशी कुठली आस्थापने आहेत का जिथे परदेशी लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत ? भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ? म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?

In reply to by तर्कवादी

Trump 10/01/2023 - 16:35
भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?
शिक्षणव्यवस्थेपेक्षा यशस्वी व्हायला कायदे व्यवस्था सक्षम लागते. उदा. कोणत्याही गोष्टीसाठी अनुत्पादक वेळ/खर्च आणि उत्पादक खर्च्/वेळ अश्या दोन गोष्टी लागतात. अनुत्पादक वेळ/खर्च वाढल्याने उत्पादन वाढत नाही, पण तो न केल्यास उत्पादन करतायेत नाही, उदा. सरकारी परवानग्या, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, मालवाहतुकीला केलेला खर्च, व्याजाचा दर, कर्जाची सहज उपलब्धता, मनुष्यबळ, निकोप स्पर्धा इ.इ. भारतामध्ये ह्या कामाचा खर्च खुप आहे. शिक्षण घेताना ह्या गोष्टी फार आड येत नाहीत, आणि भारतातुन परदेशात गेलेल्या लोकांना कष्ट करण्याशिवाय कोणताय पर्याय नसतो, आणि परत जाउन भारतात करायचे काय हा प्रश्न असतो.

In reply to by तर्कवादी

साहना 11/01/2023 - 12:36
ह्याचे उत्तर जास्त खोलांत जाऊन द्यावे लागेल पण सध्या थोडक्यांत सांगते. लोकांचे यशस्वी होणे शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. इतरांनी नोंद केल्या प्रमाणे कायद्याचे राज्य, योग्य प्रकारे काम करणारी कोर्ट व्यवस्था, सुधृढ फायनान्स व्यवस्था, आपल्या मालमत्तेचे रक्षण व्यवस्थित होणे, सरकार दरबारी कामे व्यवस्थित आणि वेळेत होणे इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागासलेल्या देशांत ह्या मूलभूत कमतरता असल्याने सर्वच लोकांना संधी कमी उपलब्ध असतात. शिक्षण (आणि व्यवसाय अनुभव, स्किल इत्यादी) एखाद्या multiplier प्रमाणे काम करतात. आता एखादी मुलगी समाजा काहीही ट्रेनिंग नसतात भारतात सलून मध्ये थ्रेडींग चे काम करते तर कदाचित ती महिन्याला ५००० कमावते तीच मुलगी प्रगत देशांत घेतल्यास साधारण $३००० डॉलर्स कमावेल. त्याच मुलीने समजा ब्युटिशियन कोर्स वगैरे केला तर भारतातील सलून मध्ये ती २०,००० कमावेल तर इतर देशांत कदाचित $५०००. भारत देशांत राहून जर पत उंचावण्याची असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण उच्च शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही विदेशांत जाऊन जास्त कमावू शकता (शिक्षण नसले तरी). हे वाचा https://deeshaa.org/2016/04/05/a-misplaced-sense-of-pride/

In reply to by तर्कवादी

साहना 11/01/2023 - 12:48
> म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ? पाश्चात्य जगाची प्रमुख समस्या म्हणजे एकूण सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अमेरिकेत सध्या दर वर्षी १० - २५ लाख लोक कायदेशीर मार्गाने येतात तर १०-३० लाख लोक बेकायदेशीर मार्गाने येतात आणि इतके असून सुद्धा देशांत प्रचंड प्रमाणात नोकर्या खाली आहेत. कानडा, फ्रांस आणि जर्मनी ह्यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. कॅनडा ने तर मागील वर्षी रिकॉर्ड नंबरच्या विदेशी लोकांना आपले नागरिकत्व दिले. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेने कितीही सुशिक्षित लोक निर्माण केले तरी अर्थव्यवस्था वाढून त्या सर्व लोकांना कवेंत घेते. ह्यांत आश्चर्य नाही आणि ह्या विषयावर मी मिसळ पाव वर खूप विस्ताराने लिहिले होते असे आठवते. लोक आणि अर्थव्यवस्था ह्यांचे फीडबॅक लूप असते. जगांत जितके जास्त लोक तितक्याच वेगाने समाज प्रगती करतो आणि जितक्या वेगाने समाज प्रगती करतो तितक्याच वेगाने आणखीन लोकांची गरज भासू लागते. पण त्या लेव्हल ला पोचायला समाजाच्या काही मूलभूत समस्या सोडवाव्या लागतात. भारत अजून त्या स्तराला पोचला नाही. पण काही क्षेत्रांत उदाहरणार्थ IT मध्ये हा इफेक्त्त तुम्ही पाहू शकता.

वामन देशमुख 10/01/2023 - 07:18
एखादे मूल अमेरिकन भूमीवर जन्माला आले तर त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते का? म्हणजे, एक भारतीय गरोदर स्त्री आठव्या महिन्यात अमेरिकेला गेली आणि तिथे महिना-दोन महिने राहून तिने आपल्या बाळाला जन्म दिला तर त्या नवजात अर्भकाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते का?

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी 10/01/2023 - 08:07
हो. पण भारताबाहेर गर्भधारणा झाल्याने व ती महिला अमेरिकन नागरिक नसल्याने विमा कंपन्या बाळंतपणाचा, औषधांचा, उपचारांचा, बाळंतपणानंतर लागणाऱ्या उपचार व औषधांचा खर्च देणार नाही. तो संपूर्ण खर्च स्वतःलाच करावा लागेल व तो खर्च प्रचंड असेल.

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 11/01/2023 - 00:30
श्रीगुरुजी - विमा कंपन्यांनी कव्हर करण्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. व्हिसावर आले असतील आणि अशा स्त्रीचा किंवा तिच्या नवर्‍याच्या नोकरीतून विमा असेल (सहसा असतोच) तर त्यातून कव्हरेज मिळेल. एखादी स्त्री फिरायला म्हणून आली, विमा नाही आणि परतही गेली नाही तर तुम्ही म्हणता तसे स्वखर्चाने करावे लागेल. पण त्यातही "ड्यू" असलेल्या स्त्रीला कोणी इमरजन्सी सर्व्हिस नाकारेल असे वाटत नाही. एरव्ही रीतसर डिलीव्हरीकरता कोणत्या रूग्णालयात नाव नोंदवायला गेली तर तेथे हा खर्च कोण करणार हे नक्की विचारतील. त्याशिवाय बहुधा नोंद करू देणार नाही. इमर्जन्सी वगळता.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 11/01/2023 - 04:04
हे विमा करारावर अवलंबून आहे. बर्थ पर्यटन हि एक गोष्ट असून साधारण १५,००० मध्ये C सेक्शन करून दिले जाते.

In reply to by वामन देशमुख

सुक्या 10/01/2023 - 08:09
कायदेशीर किचकट कीती आहे ते माहीत नाही. परंतु अमेरिकन भुमी वर जन्म झाला तर आपोआप नागरीकत्व भेटते.

In reply to by वामन देशमुख

गवि 10/01/2023 - 09:04
अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन पासपोर्ट बनतो. पूर्ण नागरिकत्व. इतकेच नव्हे तर नाममात्र तिकडे जन्म झालेल्या आणि लहानपणापासून भारतात परत येऊन इथेच वाढलेल्या लोकांना मोठे झाल्यावरही अमेरिकन एम्बसीचे फोन येताना पाहिले आहेत. म्हणजे भारतात काहीतरी unrest किंवा तंग परिस्थिती झाली होती, तेव्हा तुम्ही ताबडतोब सुखरूप अमेरिकेत परत या,. आणि अमेरिकन नागरिकांसाठी खबरदारीच्या गाईडलाईन्स वगैरे. माझ्या मते १८ वर्षे वय झाल्यावर मनुष्य याबाबत फायनल ठरवू शकतो. पण कोणीही ते नागरिकत्व रद्द केल्याचे ऐकिवात नाही, अपेक्षित देखील नाही.

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 10/01/2023 - 10:09
पूर्वीच्या अनुभवांवरून त्यासंदर्भातले बरेच नियम आता बदलण्यात आल्याचे मागे वाचले होते. गरोदर स्त्रीचा गर्भधारणाकाळ आणि अंदाजित प्रसूतीची वेळ (EDD) विषयक प्रसूतीतज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र व्हिसा आणि विमानप्रवास अशा दोन्ही गोष्टींसाठी अनिवार्य आहे (त्या आधारे व्हिसा आणि विमानप्रवास पैकि एक किंवा दोन्ही नाकरले जाउ शकते) तसेच आणखिनही काही तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

In reply to by टर्मीनेटर

साहना 11/01/2023 - 12:41
> मुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. किमान अमेरिकेच्या बाबतीत हे पूर्णतः खोटे आहे असे सांगू शकते. birth सिटिझनशिप हा अमेरिकेत घटनात्मक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट्स च्याखूप जुन्या निवाड्याप्रमाणे आई देशांत कशी आली ह्यावर अवलंबून नाही. माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही विजा किंवा विमान तिकीटा साठी आपण गरोदर आहोत किंवा नाहीत हे सांगण्याची गरज नाही. विमान कंपन्या बहुतेक करून ८+ महिन्याच्या गरोदर स्त्रियांना विमानांत प्रवेश देत नाहीत पण ते सुद्धा स्टाफ वर अवलंबून आहे. कॅनडा मध्ये तर भारतीय विद्यार्थी मुलींना गरोदर असल्यास भत्ता सुद्धा मिळतो त्यामुळे अनेक पंजाबी मुली गरोदर होतंच कॅनडात विद्यार्थी म्हणून जातात.

In reply to by वामन देशमुख

साहना 11/01/2023 - 04:06
हो. आई अमेरिकेत का होती, कायद्याने अली होती कि नाही इत्यादी गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणूनच तर चिनी आणि रशियन लोकांनी बर्थ टुरिझम हा प्रकार आणला.

चौकस२१२ 10/01/2023 - 09:21
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? सध्याचे माहित नाही पूर्वीची काही करणे = १) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे २) जिन्यासा/ क्षेत्रातील पुढील शिक्षण ३) बचत ( ती होतेच असे नाही कारण खर्च हि त्ववढेच असतात + शिवाय आयकर ) साधय यातील काही करणे बाद असतील परंतु साधय सुद्धा बाहेर कायमचे का लोकांना जावे वटतटे हे स्थानिक भारतीय जास्त चांगले सांगू शकतील हि करणे असू शकतात १) स्पर्धा २) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? काहींना तसे वाटत असेल पण म्हणून ते लगेच देशद्रोही वगैरे ठरत नाहीत... एवढेच नमूद करू इच्छितो भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? म्हणजे स्पर्धा या दृष्टीने हो असावे किंवा अजूनही भारतातील वेगवेगळ्या ष्ट्रातील अर्थाजनाची तफावत या शिवाय महागाई हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? भारतात भरपूर हुशार लोक आहेत त्यामुळे हि चिंता नसावी गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? पदोपदी भ्रष्टचार फारसा नाहीये... करणे काहीही असोत पण जगभरचे तत्व हे कि "पोट भरलेले असले" कि मग भ्रष्टचाराची गरज पडत नाही पाश्चिमात्य देशात हे त्यांनी बऱयापैकी जुळवले आहे म्हणून केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? कमी लोकसंख्येचं उपयोग होतो नक्की ,, अर्थवयवस्थेवरील ताण कमी होतो अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? हे फार थोड्यानं जमते ... कारण तो पर्यंत नातवंडे तिकडे आणि आपण इकडे असे होते... पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. हो मान्य देशादेशाप्रमाणे होऊ शकते ( वेगळे लिहीन वेळ मिळाला कि ) साधारण कानडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड हे एका समूहात अमेरिका जरा वेगळी असावी पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? बर्यापैकी .. कारण परत तेच खाऊन पिऊन सुखी मग बाकी गोष्टींकडे वेळ देत येतो अर्थात " सुखी " हा वेगळा विषय आहे ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? एकतर स्वतः बचत करून मग किंवा सरकारी मदत ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ) यात आयकर भरणे हे गृहीत आहे अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा

In reply to by चौकस२१२

Trump 10/01/2023 - 16:43
अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा
कर्ज परत देण्याची क्षमता, शिक्षण, इतरांना ज्याप्रकारे कर्ज मिळते त्याच प्रकारे सगळ्यांना मिळते. -- भारतामध्ये बरेचदा आज या, उद्या या करत करत जी मेटाकुटीला आणतात. जर कोणत्या अ वर्गाच्या भारतीय नागरीकाकडुन फोन आला (सरकारी नोकर, मोठे अधिकारी, राजकारणी) तर कामे लगेच होतात. मागासवर्गीय, अल्पसंख्याक असेल मग मज्जाच मजा.

In reply to by Trump

उपयोजक 10/01/2023 - 19:09
एक म्हणजे तिकडे व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात - घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही अनेक अमेरिकन / विदेशी लोकांचा बचत ( saving ) , कर्ज , assets building / holding या बद्दल फार वेगळा विचार असतो बेसुमार कर्ज मिळते आणि घेण्याकडे प्रवृत्ती असते बरे मागील economic crisis वेळी एक चमत्कारिक गोष्ट कळली - जरी लायकी नसेल तरी कर्ज दिले जाते - अगदी घराचे पण ! ( भारतात घर / गाडी घेणाऱ्या ना माहीत असेल की क्रेडिट लायकी ( worthiness) साठी किती scrutiny केली जाते ) हे जर अशक्य वाटले तर मी Ninja loans बद्दल लिंक टाकतोय ती पाहा ( A NINJA Loan (No Income, No Job, and No Assets Loan) आणि त्या crisis वेळी / बहुदा आता पण अनेक लोकांनी घरे / गाड्या surrender केली / जप्त केली गेली - लोक मजेत अजून थोडी खालची लाईफस्टाईल जगत राहिले भारतात हप्ते न भरल्या मुळे घर जप्त होत असेल तर ते फार वाईट मानले जाते , लोक आटा पिटा करतात , काहींना depression / attack आले आहे. https://corporatefinanceinstitute.com/resources/knowledge/credit/ninja-loan/

तर्कवादी 11/01/2023 - 23:56
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
भारतातील परिस्थिती चांगली, की वाईट यावर वाद करण्यापेक्षा या मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याने स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत (ज्याचे जीवन तुम्ही जवळून पाहिले आहे वा त्याचे अनुभव वा विचार त्याने तुम्हाला तपशीलाने सांगितले आहेत) उत्तर द्यावे असे मला वाटते सर्व सदस्यांनी या प्रकारे उत्तर दिल्यास चर्चा आपसूकच पुर्ण होईल. उगाच कुणातरी "क्ष" व्यक्तीची अर्धवट माहित असलेली जीवन गाथा लिहून त्या अनुषंगाने काहितरी निष्कर्ष काढण्यात फारसा अर्थ नाही असे मला वाटते. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता ते नमूद करुन तुमचे विचार विस्ताराने लिहा असे मी सुचवेन १) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे- आणि मला दीर्घकाळ (अगदी निवृत्तीनंतरही) भारताबाहेरच रहावेसे वाटते अ) या निर्णयामागचे माझे कारण असे आहे - ब) तसेच भारतातल्या "या" गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या इथे मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते २) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- पण मला काही काळाने - (खास करुन निवृत्तीनंतर) भारतात परत जायचे आहे (किंवा परत आलेलो आहे) - अ) भारत सोडण्यामागचे माझे कारण ब) भारतात परत जाण्यामागचे कारण ? क) परदेशातील या गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या भारतात मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते ३) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- आणि भारतात परत जायचे की नाही याबाबत मी अजून ठरवू शकलेलो नाहीये ४) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही आणि तशी फारशी इच्छाही नाही- याकरिता माझी कारणे भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते. तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे ५) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही पण "या अमुक" काही देशांत मला जायला आवडेल पण तशी संधी न मिळाल्यासही मला खंत नाही. भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते.तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे - आता माझ्या पुरतं मी ४ वा ५ या प्रकारात मोडतो. म्हणजे मी कधीच भारताबाहेर गेलो नाही. यापुर्वी भारताबाहेर जावे असे प्रकर्षाने वाटले नाही. फार प्रतिभावान नसलो तरी अगदीच मठठ प्रकारतला मी नक्कीच नाही त्यामुळे संधी मिळाल्याही असत्या पण मी अशा संधींच्या शोधात फारसा नव्हतोच. आता वाटते न्युझीलंड या देशात जायला आवडेल - पण माझ्या क्षेत्रात तिकडे संधी फारशा नाहीत त्यामुळे संधी नाही मिळाली तरी खंत नाही. परदेशात न जाण्यामागची कारणे - दुसर्‍या देशात जावून तिथल्या चालिरीती, तिथले कायदे, नियम समजून घेणे त्याप्रमाणे जगायला शिकणे, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणे ई ई मला बरेच आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटले. झालेच तर परदेशात अनेक कामे स्वतःच करावी लागतात घरगुती कामांना नोकर मिळत नाही किंवा तिथल्या पगारात ते परवडत नाहीत. त्याउलट भारतात दरमहा लाखभर पगार असणारी व्यक्ती देखील नोकरांंच्या पगारावर फारतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करुन जवळपास अजिबात घरकाम न करता आरामात जगू शकते. दुसरे असे की मला भारतात - ते ही पुण्यात म्हणजे ज्या शहरात मी मोठा झालो त्याच ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी मिळत गेल्या मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मला वाटते की परदेशी जाण्याचे कारण म्हणजे तिथल्या चलनात मिळणार्‍या पगारातुन चांगल्यापैकी बचत कमी कालावधीत होते पण मला तशी गरज वाटली नाही. तिशीच्या आत मी स्वतःचा फ्लॅट घेतला, चाळीशी ओलांडताना पुर्ण कर्जही फेडले. माझ्या भारतातील आवर्जुन बदलल्या जाव्यात या गोष्टी - वाहतुक कोंडी, खराब रस्ते (खासकरुन शहरातले - महामार्ग आता सुधारलेत बहुधा), बेशिस्त वाहतुक , भटके कुत्रे , रस्ते अडवून होणारे उत्सव, मिरवणूका, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी (अचानक रात्री १२ वाजता फटाके वाजू लागले की डोकं फिरतं) , ध्वनी प्रदूषण ई भारताबाहेर न जाण्याने झालेले नुकसान - आय टी क्षेत्रात करिअरमध्ये ऑनसाईट जाण्याने पुढेही अधिल चांगल्या संधी मिळतात. अर्थात मी फार जास्त महत्वाकांक्षी नाही, आहे त्या करिअर मध्ये समाधानी आहे.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 12/01/2023 - 12:55
आता माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल लिहितो. बी ई मेकॅनिकल असलेला हा माझा पुण्यातला मित्र - २००१ पासून आमची मैत्री आहे. २००४ ला तो "रोबोटीक्स , ऑटोमेशन" या विषयातले एम एस करण्यासाठी जर्मनीला गेला. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिथे त्याला नोकरी मिळाली. काही वर्षानंतर पुण्यातीलच एका मुलीशी त्याने लग्न केले व पत्नीलाही जर्मनीला घेवून गेला. पुढे त्याच्या पत्नीनेही कधी पुर्ण वेळ तर कधी अर्धवेळ व्वगैरे नोकर्या केल्यात. एक मुलगा व एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये झालीत. या काळात तो दरवर्षी एकदा तरी पुण्याला येत असे. पण आता साधारण वर्ष-दीडवर्षापुर्वी तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला.. अलीकडे माझी त्याच्याशी भेट होवू शकली नाही परंतु फोनवर बोलणे झाले तेव्हा मी त्याला भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने जी कारणे सांगितले ती साधारण अशी १) त्याला भारतातले कौटुंबिक आयुष्य आणि अनुषंगाने मुलांवर होणारे कौटुंबिक संस्कार हवेसे वाटत आहेत. पुण्यात आता त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडीलही आहेत. त्याच्या पत्नीचे माहेरही पुण्यातच आहे २) जर्मनीतील तरुण पिढीतील मुले फारशी महत्वाकांक्षी नाहीत. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. साधारण शिक्षण घेवून कोणतीही नोकरी केली तरी चांगल्यापैकी पगार मिळत असल्याने इंजिनिअरिंग वा तत्सम व्यावसायिक शिक्षण मेहनतीने घ्यावे अशी इच्छाशक्ती मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मित्राला त्याच्या मुलांच्याबाबतीत असा धोका पत्करायचा नाहीये.

In reply to by तर्कवादी

माझ्या मित्राचेही असेच आहे. अनेक वर्षे जर्मनीला राहून तो परत आला. तथापि, मुलांच्या शिक्षणासाठी तो पुन्हा जर्मनी गाठायचा विचार करतोय. हा वेगळाच प्रकार आहे. त्याचे प्रमुख कारण अर्थातच कुटुंब हे होते. जर्मनीत किंवा युरोपियन देशांत गेलेल्या पहिल्या पिढीचा सर्वात मोठा पुल हा पालकांचाच असतो.. कारण शक्यतो ही पिढी मध्यमवर्गीय सधन लहान कुटुंबांतून आलेली असते आणि आई-वडिलांशी खूप गुंतलेली असते. परदेशात गेलेल्या पिढीला त्यामुळे एकटेपणा खायला उठतो. त्यांच्या पुढच्या पिढीला कुटुंबात रमवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. काही मंडळी पुन्हा मायदेशी परततात. आता या परतीच्या वेळेस मात्र पूर्वीचे मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय झालेले असते. काही पैसा गाठीशी असतो.. इतर भारतीय समाजापासून त्यांची मुले मात्र पूर्णपणे तुटलेली असतात. श्रीमंत शाळांमध्ये शिकतात. ती मातृभाषा क्रियापदापुरती वापरतात. त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आय आय एम चे क्लासेस घेतले जातात.. ते इयत्ता बालवाडीलाच फ्रेंच, जर्मन नाहीतर जपानी शिकू लागतात कारण त्या मुलांची मुख्य भाषा भारतीय इंग्रजी झालेली असते. मिंग्लीशसारखी क्रियोल भाषा ते घरी वापरतात आणि ती जगण्यासाठी अगदीच निरुपयोगी आहे हे त्यांना न सांगताच उमजेले असते. हे लोक गेटेड कम्युनिटिज मध्ये राहतात. त्यांच्याकडे ल्यूसी, जॉन किंवा तत्सम नावांची अर्धवट परदेशी कुत्री असतात. त्यांचे म्हातारे आई आजोबा सुद्धा जमेल त्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधतात. गणपतीला वगैरे उकडीचे मोदक खाऊन, कधीतरी कृषिपर्यटन करून संस्कृती जपतात. बरं त्यांचे वर्तन वैज्ञानिक असते का तर तेही नाही. त्याची सुरवात तर ते अगदी सुवर्णप्राशन वगैरे असल्या गोष्टींपासूनच होते. तुम्ही दिलेले दुसरे कारण अगदी इथेच आकाराला येते. पहिली पिढी एसबीआय बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाली. दुसरी पिढी समजा डॉएच्च बँकेत आयटी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर या दुसर्‍या पिढीला आपल्या मुलांनी किमान दोन स्टार्टप काढाव्यात असे वाटू लागते. काही लोकांच्या यशाच्या आणि कौटुंबिक आनंदाच्या व्याख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना बेस्ट ऑफ बोथ हवे वाटू लागते. जर्मनीसारखे देश शिक्षणामध्ये रॅट रेसला प्राधान्य देत नाहीत. सगळ्या राहणार्‍या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्स हा अनिवार्य असतो. जवळ्पास ८५ टक्के हेल्थ इन्शुरन्स हा पब्लिक कंपन्यांचा असतो ज्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवलेल्या असतात. आर्थिक उत्त्पन्न जितके जास्त तितका प्रिमियम जास्त. कमी उत्पन्न असेल तर प्रिमियमही कमी असतो आणि उपचार मात्र त्याच दर्जाचे मिळणार ही हमी असते. हा थोडक्यात समाजवादी प्रकार आहे. सर्वच लोक ठराविक रक्कम भरून सर्व लोकांना त्याच दर्जाची आरोग्यव्यवस्था मिळेल अशी तजवीज करतात. जर्मनीतल्या प्रत्येक मुलाला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत/काहींना पंचवीस वर्षांपर्यंत एक रक्कम मिळते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्चशिक्षण पूर्णपणे फुकट आहे. वरखर्च उचलावा लागतो पण त्या वरखर्चातली अर्धी रक्कम तर सरकारच देते. खाण्यापिण्यात कन्सेशन असते. विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक फु़कट वापरता येते. त्यामुळे सगळीकडे सारख्याच दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षणाचा दर्जा समान राखण्यात या समाजवादी बाबी कारणीभूत आहेत. संधींची त्यातल्या त्यात समानता, रोजगाराला असलेले सरकारी कवच, व्यवस्थेमध्ये रुजलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त या सगळ्या बाबींमुळे व्यक्ती ही आनंदी राहण्यासाठी धडपड करते, दोन वेळच्या अन्नाची चिंता तितकीशी करत नाही. जिथे सुबत्तेने या बाबी सोडवेल्या आहेत. आपल्या ध्यानीमनीही नसणारे विषय त्यांच्या ऐरणीवर असतात. स्पर्धा असते पण बर्‍याचदा ती स्वतःशी असते. म्हणजे बॉडी बिल्डिंग करणे, सर्फिंग, वेकबोर्डिंग, पॅराग्लाईडींगसारखे धाडसी खेळ खेळून त्यांच्यात प्रावीण्य मिळवणे, इत्यादी इत्यादी..कुठल्याही अडचणीला जवळचे पोलिस स्टेशन गाठायला त्यांची भारतीयांसारखी प्रचंड फाटत नाही. काही जर्मन म्हातार्‍या पोलिसांना दरडावताना मी पाहिल्या आहेत. कधीकधी प्रत्येक गोष्ट झगडून आणि नाका तोंडावर आपटून मिळवलेल्या पहिल्या दुसर्‍या पिढीला हे कळले तरी पचनी पडत नाही असे वाटते. खूप भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित काही दशकांची सामाजिक सुरक्षितता जशी परदेशस्थांना आंदण म्हणून मिळाली आहे तशी भारतीयांना मिळाली नाही आणि दुसर्‍या पिढीने प्रचंड स्पर्धात्मक राहून, भारतात बोर्डाबिर्डात येऊन झगडून मिळव्ली आहे ती सामुहिक असुरक्षिता सतत कुठेतरी पार्श्वभागाला असावी असे वाटते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तर्कवादी 15/01/2023 - 20:01
हणमंतअण्णाजी विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा मुद्दा समजला.
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे
शक्य आहे. कारण त्यांची आताची सुस्थिती त्यांनी भरपूर परिश्रम करुन , अतिशय महत्वाकांक्षेने मिळवली आहे. ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. झालेच तर ते स्वतः उच्चपदांवर काम करत असल्याने श्रमप्रतिष्ठाही मनात रुजलेली नाही. माझा रोबोटीक्स -ऑटोमेशन क्षेत्रात काम करणारा मित्र आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही. पण मी वर म्हंटले तसे - माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही .. फार काय तर , माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार या ज्येष्ठ जर्मन लोकांची तक्रार अगदी टिपीकल भारतीय पालकांसारखीच आहे म्हणजे "आम्ही आमच्या आई-वडीलांच ऐकलं, चांगलं शिक्षण घेतलं, मेहनत घेतली आणि करिअर घडवलं.. पण पुढच्या पिढीतली मुलं आमचं ऐकत नाहीत, मिळालेल्या स्वातंत्र्याचा नाहक फायदा घेतात.. वगैरे"

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/01/2023 - 09:11
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे ".....ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. " तर्कवादी, आपल्या या उप प्रतिसादाशी सहमत विशेष करून पहिल्या पिढीचे स्थलांतरित असे का वागतात या बद्दल २ पैसे माझे पण ..... पहिली पिढी हि बहुतेक फक्त शिक्षण बळावर येथे आलेली असते त्यामुळे आपण म्हणता तसे " आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही." असे घडते जरी येथे आल्यावर पाश्चिमात्य देशात "सर्व कामांना प्रतिष्ठां असते " हे माहिती असून सुद्धा आणि असे भांडी घासण्याची श्रम स्वतः विद्यार्थी दशेत केलेले असले तरी २-३ ऱ्या पिढीत मग बदल होत जातो .. साहजिक आहे .. तेव्हा हे "नाहक" असते असे मी पण १००% म्हणणार नाही ...

कंजूस 03/01/2023 - 05:45
१)भारतातील सुस्तपणा. एखादी गोष्ट चोख व्हावी याचा आग्रह नसतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीला एक गुप्तपणे/उघड राजकीय विरोध असतो. २)गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांची सांगड घातली जात नाही. विद्यालये, महाविद्यालये इथे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ तयार होतात. पण त्याची गती मंद आहे किंवा आव्हानं स्विकारण्यात वेळ घालवतात. मग तज्ज्ञ लोक ठामपणे उद्योगांना आपल्या इथे बनवलेले शोधलेले तंत्रज्ञान देण्यात मागे पडतात. ३)वचनाला जागणे याचा अभाव. या तीन गोष्टी प्रगतीला मारक आहेत.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 08:23
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 08:23
इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

नेत्रेश 03/01/2023 - 10:33
भारतात १४०० कोटी लोक रहातात. त्यातले १ - २ कोटी लोक बाहेरच्या देशांत गेले तर असा काय फरक पडणार आहे? झाला तर थोडाफार देशाला व बाहेर जाउ ईच्छीणार्‍या पुढच्या पीढीला फायदाच होईल. बरेचसे दुसर्‍या देशांत गेलेले लोक जास्त पैसे कमवायलाच गेलेले असतात. तीथे बहुतेकवेळा भारतापेक्षा कितीतरी जास्त संधी आणी कमी स्पर्धा असते. परदेशातील चांगल्या सुखसोईंची व आरामशीर जीवनाची सवय होउन त्याची परीणीती तीथेच स्थायिक होण्यात होते.

In reply to by नेत्रेश

साहना 06/01/2023 - 06:07
Quality ओव्हर Quantity ! कुठल्याही समाजांत बहुतेक प्रगती हि फक्त १०-२०% लोकपासूनच होते. ह्याला Pareto तत्व म्हणतात. त्यामुळे हे लोक गेल्यास समाजाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे देशांत खूप लोक आहेत १-२ कोटी गेल्यास फरक पडत नाही हे नेहमीच बरोबर नाही. युगांडा मधील शेती व्यवस्था आपले गुज्जू लोक सांभाळत होते आणि ते चांगले श्रीमंत होते. ईडी अमीन सत्तेवर आल्यानंतर त्याने रातोरात ह्यांना हाकलून लावले. युगांडा ची शेती व्यवस्था युगांडा मधील कृष्णवर्णीय लोक चालवू शकले नाहीत आणि अर्थव्यवस्था कोलमडली. गुज्जू मंडळी लंडन मध्ये निर्वासित म्हणून गेली आणि काही दशकांत ती मंडळी आता लंडन मधील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. पण भारताच्या बाबतीत आपले म्हणणे बरोबर आहे. भारत बऱ्यापैकी मागासलेला असल्याने भारतातील उच्चशिक्षित मंडळीच नाही तर अगदी साधारण शिक्षित मंडळी सुद्धा विकसित देशांत जाऊन कैक पटीने पैसे कमावू शकते. आणि ह्या पैश्यांतील १०% जरी त्यांनी भारतात पाठवले तर भारतात राहून त्यांनी जितका पैसा कमावला असता त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त पैसे असतात. साधा ट्रक ड्राइवर वर्षाला भारतांत फार तर २ लाख कमावू शकतो. तोच माणूस कॅनडात गाडी धुण्याचे काम करत २ लाख रुपये सेविंग्स म्हणून भारतात पाठवू शकतो. त्यामुळे मागासलेल्या देशांतील लोक विकसित देशांत गेल्यास मागासलेल्या देशाला जास्त फायदा होतो. हळू हळू मागासलेला देश प्रगत होत जातो आणि हा फरक कमी होत जातो. चीन आणि कोरिया ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

काही मुद्दे १. भारतातील बेशिस्त-- कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे, जागा बळकावणे, बेकायदा बांधकामे आणि त्याला असलेले राजकीय पाठबळ, रस्त्यात हिंडणारे प्राणी, भिकारी, सिग्नल न पाळणारे, राँग साईडने गाड्या चालवणारे लोक २.प्रदूषण,घाण आणि कचरा- कुठेही कचरा टाकणे,थुंकणे,विधी उरकणे,पाळीव प्राण्यांची जिन्यात्,रस्त्यात घाण, हायवेच्या बाजुला कचरा जाळणे ३. बेकारी- तुलनेने महाग होत चाललेले शिक्षण आणि नंतर मिळणार्‍या संधीचा/नोकर्‍यांचा अभाव, सगळीकडे वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यामुळे कमी पैशात जास्त श्रम करायला भाग पडणे ४. कौटुंबिक कलह,हेवेदावे- कुटंबापासुन दूर राहुन कोणाची ढवळा ढवळ सहन न करता शांतपणे जगण्याची इच्छा, फॉरेन स्टाईल जीवनशैलीचे आकर्षण दुसर्‍या बाजुने बघितल्यास १.रशिया युक्रेन युद्ध, कोव्हिड, ब्रेक्झिट, वाढती महागाई यामुळे कुठल्यही देशात नवरा बायको दोघांना नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात निदान आपल्याला दरवर्षी ७ टक्के माहागाई वाढण्याची सवय आहे, पण सध्या परदेशात ईंधनाचे दर दुप्पट झाल्याने भयंकर परीस्थिती आहे. माझे कॅनडातील मित्र जे महिना ४०-५० डॉलरचे पेट्रोल आणि ७००-८०० मध्ये महिन्याचा किराणा घेत होते ते आता त्यासाठी २०० डॉलर आणि १५०० डॉलर पर्यंंत खर्च करत आहेत. अमेरिकेत आणि ईंग्लंड्मध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. २. भारतात अजुनही काही प्रमाणात सपोर्ट सिस्टीम टिकुन आहे. नातेवाईक, शेजारी पाजारी मदत करतात. वेळ पडल्यास पैसे टाकुन कामवाल्या बायका,ड्राय्व्हर, पाळणाघरे, नर्सेस, स्विगी,झोमॅटो,ओला/उबेर्,बिग बास्केट सगळे घरपोच मिळते. ३. वर्ण द्वेष- काही दिवसांपुर्वी कायप्पावर एक व्हिडिओ बघितला. फ्रान्समधील कुठल्याशा शहरात स्थलांतरीत मुस्लिम लोक रस्त्यात नमाज पढत आहेत आणि वैतागलेले खोळंबलेले कार वाले लोक त्यांना शेवटी ओढुन रस्त्यातुन हटवत आहेत. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्लेही काही नवीन नाहीत. थोड्याफार फरकाने सर्वच देशात ही अवस्था आहे कारण बाहेरचे लोक येउन आपली नोकरी घालवत आहेत हे कोणालाच आवडणार नाही. त्यात ते स्थानिक कायदे पाळत नसतील तर अजुनच. परदेशात स्थायिक झालेले मिपाकर सध्याच्या परीस्थितीवर जास्त चांगला प्रकाश टाकु शकतील.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नेत्रेश 03/01/2023 - 14:00
कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे - अमेरीकेत तरी सर्वत्र बेघर लोक कुठेही तंबु ठोकुन खुशाल राहु शकतात. कायद्याचे संपुर्ण संरक्षण त्यांना आहे. लॉस एंजलिस व सॅन फ्रांसिस्को सारखी शहरे या बेकायदा झोपडयांनी बकाल केली आहेत. काही ठिकाणी तर भर दिवसा जायला भीती वाटते. ते लोक रस्त्यावरच सर्व वीधी उरकतात व दीवसभर नशेत पडुन असतात. पालिकेचे कचरेवाले तीथे साफसफाई करायला जात नाहीत. लै बेकार परिथिती आहे. पेट्रोलचे दर जरी डबल झाले तरी फारसा फरक पडत नाही. काही काळाने कमी होतात. १५०० डॉलर किराणाव कुणी खर्च करत नाहीत. ५०० डॉलर्सच्या आसपास महीन्याचा किराणा आरामात भागतो. पगार मजबुत असतो. नवीन कॉलेज ग्रॅज्युएट मुलांना आरामात दीड ते दोन लाख डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. तेव्हा लोकांना फारसा फरक पडत नाही. आपल्या भारतीय लोकांनातर अजीबातच नाही.

In reply to by नेत्रेश

फ्रेशर पास आउट मुलांना १.५-२ लाख डॉलर पगार? तोही आरामात? आणि महिन्याचा कुटुंबाचा किराणा ५०० डॉलर्समध्ये? डिटेल्स द्या की राव, लगेच माझ्या मुलाला तिकडेच पाठवतो पुढे शिकायला. जमल्यास फॅमिली रि युनियन वगैरे करुन मी पण येतो की तिकडेच, हा का ना का.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नेत्रेश 03/01/2023 - 21:33
जरुर पाठवा. हल्ली बरेच भारतीय आपल्या मुलांना १२ वे नंतर अमेरीकेतल्या स्टेट कॉलेजेसमध्ये पाठवतात. फी थोडी कमी असते.

In reply to by नेत्रेश

उपयोजक 09/01/2023 - 19:26
बेघर लोकांनी 'अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान देशात' ही अशी बकाल परिस्थिती निर्माण करुनही त्यांना कायद्याचे इतके संरक्षण का? अमेरिका धनाढ्य नि प्रगत देश असूनही या लोकांना साधी मोफत घरे बांधून देण्यात अमेरिकेला अडचण काय असावी?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 03/01/2023 - 17:33
@ राजेन्द्र मेहेंदळे: सगळे मुद्दे यथोचित मांडलेले आहेत. सहमत आहे. अमेरिकेत मी मुलाबरोबर दर शनिवारी बाजाराला जायचो. गेल्या वर्षीपर्यंत दरमहा भाजीपाला, फळे आणि दूध यालाच ५०० डॉलर्स लागत होते. हल्लीचे माहीत नाही. पॅरिसमधे महागाई खूपच वाढलेली आहे आणि आणखीही वाढतच आहे. १९९१ पासून आम्ही रहात असलेले दिल्लीजवळचे फरिदाबाद शहर आता इतके घाणेरडे झालेले आहे की घराबाहेर पडणेही नकोसे वाटू लागले होते, त्यामुळे तिथे बांधलेले घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.

श्रीगुरुजी 03/01/2023 - 17:52
सध्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे, जनतेच्या हिताचे प्रश्न व समस्या खालीलप्रमाणे - १) संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक २) महाराष्ट्र धर्म की हिंदू धर्म ३) औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला की हत्या केली ४) औरंगजेब हिंदूद्वेष्टा होता की नव्हता? ५) महापुरूषांचा अपमान राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष करताहेत की सत्ताधारी भाजप? ६) महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचे पुतळे जाळायचे की त्यांच्या तोंडावर शाई फेकायची? ७) शिवाजी महाराजांचे खरे समर्थक राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष की सत्ताधारी भाजप? ८) खरे कडवे हिंदुत्ववादी शिल्लक सेनावाले की मनसेवाले की भाजप? ९) सावरकर माफीवीर की स्वातंत्र्यवीर? १०) बाळ ठाकरेंच्या धगधगत्या हिंदुत्ववादी विचारांचे (!) खरे वारसदार बा. शिवसेना की शिवसेना (उबाठा)? ११) उर्फी जावेद असभ्य वेशभूषा करते की सभ्य वेशभूषा करते? १२) नागपुरातील संघ कार्यालयात एकनाथ शिंदेंनी गुलाल लावलेली लिंबे ठेवली की उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी गुलाल लावलेली लिंबे ठेवली? १३) उठांच्या सभेला जास्त गर्दी होती की एकनाथ शिंदें च्या सभेला? १४) भगव्या बिकिनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाला की नाही झाला? १७) महापुरूषांच्या तथाकथित अपमानाविरूद्ध आवाहन केलेला महाराष्ट्र बंद यशस्वी की अयशस्वी? १८) मुंबईतील महामोर्चा यशस्वी की अयशस्वी? १९) जात्याधारीत जनगणना हवी की नको? २०) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ न ठेवता निवडणूक घ्यावी की न घ्यावी? या अत्यंत गंभीर समस्या व प्रश्नांवर विचार करून योग्य उत्तर शोधण्याऐवजी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित युवक-युवती परदेशी जाण्याचा पलायनवादी मार्ग स्वीकारत आहेत, यासाठी त्यांचा जाहीर निषेध करतो.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरूजी एक महत्वाचा मुद्दा विसरलात,आरक्षण. बाकी अमरिकेत थोडे दिवस राहीलो आहे. आमच्या सारख्या वरीष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुखसोई नाहीत. महागाई जरी वाटत आसली तरी पगार सुद्धा तसेच आहेत. पेट्रोल चे भाव सारखेच वाटले. १०० डालरात बर्‍यापैकी सामान येते. गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. खोबरं तीकडे चांगभल नाहीतर काय उपाशी मरायचं. बरेच काही लिहीता येईल. १४० कोटीतली काही बाहेर गेल्याने फरक पडतो हे जोपर्यंत सरकारला कळत नाही तोपर्यंत असेच रहाणार. कुसुमाग्रज यांची पाच पुतळ्याची कवीता आजही तेवढीच लागू पडते. प्रत्येकजण आपापले पुतळे पकडून बसलेत. इतीहासचा उपयोग तुंबडी भरण्या साठीच होताना दिसतोय. दर एक जानेवारीला मन उदास होते.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगुरुजी 03/01/2023 - 20:48
गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे. २००% सहमत. मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत किळसवाणे व रसातळाला पोहोचले आहे व यासाठी महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष समान प्रमाणात कारणीभूत आहेत. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ, दुसऱ्याच्या बोलण्यातून एखाद्या वाक्याचा सोयिस्कर अर्धवट भाग उचलून त्यामुळे महापुरूषांचा अपमान झालाय अशी बोंब मारणे, आपल्याविरूद्ध कोणी टीका केली तर लगेच त्याच्या/तिच्या विरूद्ध ३०-४० पोलिस ठाण्यात तक्रार करून त्याला/तिला आत टाकणे, पराकोटीचा जातीयवाद, टीकाकारांना बेदम मारहाण, प्रचंड भ्रष्टाचार, मुख्य प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष, अत्यंत नालायक लोकांना आपल्या गटात ओढून सत्ता मिळविणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे . . . या सर्व प्रकाराचा किळसवाणा अतिरेक झालाय. दुर्दैवाने बहुतेक सर्व माध्यमे केवळ सुपारीबाज बनली असून खोट्या कहाण्या बनवून आगीत तेल ओतून आग भडकविण्यात व्यग्र आहेत. अश्या भीषण परिस्थितीत आपल्याला काहीही भवितव्य नाही व देशाबाहेर जाणे हाच युवक-युवतींना एकमेव योग्य मार्ग वाटल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

Trump 13/01/2023 - 20:04
महाराष्ट्राचे राजकारण शिसारी येण्याएवढे घाण झाले आहे. गेल्या २० वर्षातील घसरण बघुन लाज वाटते.

In reply to by Trump

श्रीगुरुजी 13/01/2023 - 21:52
दुर्दैवाने खरे आहे. यासाठी सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष व त्यांचे नेते समप्रमाणात कारणीभूत आहेत.

Nitin Palkar 03/01/2023 - 18:23
जिथे अधिक संधी तिथे स्थलांतर हे नैसर्गिकच आहे. भारतातून अनेकजण वैध मार्गाने आणि काहीजण अवैध मार्गाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत जातात तसेच त्याच्या कित्येकपटीने अधिक बांगलादेशी अवैधपणे भारतात येतात, राहतात. जो पर्यंत "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती 'विश्वमान्य' होणार नाही तो पर्यंत हे चालूच राहणार.

साहना 04/01/2023 - 13:21
भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. इतर देश का चांगले आहेत हे मिपा वर लिहून काही साध्य नाही. भारत देश खूप म्हणजे खूपच गरीब आहे. आम्ही तुम्ही सहज पणे भारतातील टॉप १०% लोकां पैकी आहोत. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. भ्रष्टाचार हि मोठी गोष्ट नाही. पोर्तुगाल आणि स्पेन मध्ये असंख्य भारतीय जातात. ह्या दोन्ही देशांत भरपूर भ्रष्टाचार आहे. युक्रेन, पोलंड इत्यादी देश जास्त श्रीमंत नसले आणि बऱ्यापैकी भ्रष्ट असले तरी भारत पेक्षा कित्येक पटींनी जास्त राहण्या योग्य आहेत. भारत सरकार हे ब्रिटिश सरकार २.० आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याच नागरिकांना चोरा प्रमाणे वागवणे, प्रत्येक गोष्टीसाठी भीक मागण्यास लावणे आणि आपल्या जवळच्या काही लोकांच्या हाती देशाची संपत्ती सोपवणे हे काम ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकार आणि त्यांचे हस्तक करत होते त्याच प्रमाणे भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे करत आहेत. हिंदूंच्या देवळांवर डल्ला, शिक्षण क्षेत्रावर आपला लोखंडी पंजा आणि इतर प्रत्त्येक ठिकाणी सरकारी बाबुंचे तळवे चाटल्याशिवाय काहीही देशांत घडू नये ह्याची खबरदारी. हे काम भारत सरकार करत आहे आणि त्याच साठी विविध लोक शेवटी कंटाळून देश सोडून इतर ठिकाणी जातात. जिला शक्य आहे आणि आवड आहे तिने नक्कीच जावे. कुठल्या देशांत आपला जन्म व्हावा हा निर्णय आम्ही घेत नाही पण कुठे आपण राहू शकतो हा निर्णय आम्ही नक्कीच घेऊ शकतो. HNW हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती : pajeet

In reply to by साहना

भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. इतर देशात बेघर,बेकार लोकांची काय परीस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? त्यांचे रहाणीमान पंचतारांकित आहे का?. क्रिमिनल, काॅमप्रमाइज्ड एरीया का काय म्हणतात तो नाही का?. इतर देशात सर्वांची संपत्ती एकसारखी आहे काय? बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. इतर देशात काय सगळेच आईनस्टाईन चे वंशज आहेत का? State of mental illness मधे कुठले देश अग्रणी आहेत व तुलनात्मक भारतातली परिस्थीती लक्षात घेता कुठला देशात बेकार व कुठला चांगला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. कतार सारख्या देशात काय फक्त भारतीयच आहेत काय? आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. सर्व चमकदार गोष्टी सोन्याच्या नसतात. भारत व भारतीय लोकांबद्दल आपले मत पूर्वग्रहदूषित आहे असे वाटते. किंवा आपण फुल्स पॅरडाईज मधे राहातायं. उघडा डोळे बघा निट. कितीतरी गोष्टीत भारत अत्मनिर्भर आहे. आपण या देशात रहात नाहीत असे वाटते नाहीतर असे अपशब्द लिहीले नसते.

In reply to by कर्नलतपस्वी

कै च्या कै!! परदेशात बसुन भारतावर थुंकायचे ते पण कुठल्यातरी वेबसाईटवरचा डेटा गुगलुन. त्या डेटाची सत्यता पडताळुन पाहिली आहे का? किती ऑथेंटिक आहे? काही पत्ता नाही. कॅनडामध्ये अबोरिजिनल लोकांना सरकार भत्ता देते, दिवसभर ते लोक नशा करुन ते पैसे उडवतात आणि मग रस्त्यात भीक मागत फिरतात. अमेरिकेत न्युयॉर्क आणि एल ए मध्ये तंबु टाकुन रस्त्याकडेला राहणार्‍यांचा उल्लेख वर आलाच आहे. युरोपमध्ये स्थलांतरीत लोकांचीही स्थिती वेगळी नाही. भारतात निदान शेती भरपुर टिकुन असल्याने गरीबातील गरीब माणुसही थोडेफार अन्न मिळवु शकतोच. शिवाय उन्हाळा/पावसाळा/हिवाळ्यातील हवामानात प्रचंड फरक (हे मी +३० ते -३० च्या तुलनेत म्हणतोय) नसल्याने कपडे वगैरे फारसे न बदलता माणुस बाहेर हिंडु शकतो. ठिकठिकाणी कट्ट्यावर्,देवळात्,बागेत चकटफु हिंडु शकतो,सामाजिक जीवन्,शेजार पाजार अजुन टिकुन आहे. परदेशात माणुस आजारी पडला तर शेजारी नाही मदत करणार. दारात मेडिकल सर्विस बोलावण्याशिवाय पर्याय नाही. आणि वयस्क एकट्या माण्सांना वृद्धाश्रमात (मग नाव कितीही गोंडस द्या) रहाण्याला पर्याय नाही. वयाच्या सोळाव्या वर्षापासुन बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंड बरोबर राहण्यासाठी घर सोडण्याची पद्धत असल्याने शिक्षण थांबते आणि पैसे कमवायला लहान मोठे जॉब करावे लागतात. यामुळेच परदेशाचे गोडवे गाणारे भारतीय बाप , मुलगी वयात आली की अचानक आपली संस्कृती वगैरे आठवुन गळे काढु लागतात आणि भारतात परत यायला बघतात. अजुन बरेच लिहिता येईल पण इत्यलम.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

राजूभौ एकदम सहमत आहे. आजही मुलं आईबापाचे पाय शिवतात. तीकडे मुलांना वाचायला यायला लागले की ९११ ची धमकी देतात. नाॅर्वे कर तर मुलाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून आई बापाला हाकलून देऊन तान्ह्या बाळाला सुद्धा ठेवून घेतात. एक L S CS झाले तर बहात्तर लाखाचे बिल बनवले. दात दुखतोय तीन महिन्यानंतर आपाइन्टमेन्ट. असे ऐकण्यात आले की अमरिकेत जर अर्थिक इमर्जन्सी आली तर कमरेचे सोडून द्यावे लागते कारण विकांताला खिसा खाली होतो. तसे सुद्धा हुच्च शिक्षण परवडत नाही त्यामुळे ड्रापआऊट भरपुर एखादाच बिल गेट्स बनतो बाकीच्यांना स्वीगी झोमॅटोने घेतले तर घेतले. उच्च शिक्षित कुठून आणणार? होय, भारतात गरीबी आहे बरोबर माणूसकीपण आहे. आता लोक संख्याच भरपुर म्हणून त्याच प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. स्वराज्य मिळून फक्त पंच्याहत्तर वर्ष झालीयं. थोडा वेळ लागेल पण विश्वगुरू नक्कीच होणार. माझ्या देशात घर जमीन जरी नसली तरी आधार आहे, हाकलून देणार नाही एवढा विश्वास जरूर आहे. जे परदेशी गेले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत.

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 05/01/2023 - 02:03
> आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. गरीब श्रीमंत सर्व देशांत आहेत हा मुद्धा बरोबर असला तरी भारतीय गरिबी हि अतुलनीय आहे. भारतांत बहुसंख्य लोक गरीब आहेत आणि इतर देशांतील तुलने खूपच म्हणजे अकल्पनीय गरीब आहेत. मेक्सिको, ब्राझील सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आहेत. भारताची परिस्थिती सुधारायची असेल तर, हि गोष्ट मान्य करणे स्टेप १ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

कॉमी 07/01/2023 - 09:38
पुरेपूर सहमत. साहना बाई कोलोनियल मनोवृत्ती वैगरे टाईप बाता मारणाऱ्या पैकी आहेत. पण खरा inferiority complex दाखवतात. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. स्वतच्या लोकांबद्दल इतका वंशव्देश्टा विश्वास कसा आहे समजत नाही.

In reply to by कॉमी

बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. हे त्यांच्याच एका प्रतिसादातले वाक्य आहे. त्यावरून अंदाज घ्या. हे वाक्य वाचून मी तर माघार घेतली

In reply to by साहना

कॉमी 07/01/2023 - 09:34
भिकार ऑप इंडिया. आजपर्यंत पूर्णपणे खरी अशी बातमी ह्यांनी कधी दिलीये का अशी शंका येते. तुम्ही दिलेली पंत बद्दलची बातमी सुध्दा शुद्ध असत्य आहे. कोणीही पंतच्या वस्तू चोरल्या नाहीत.

In reply to by साहना

चित्रगुप्त 08/01/2023 - 02:15
@ साहना: तुमच्या प्रतिसादातील 'फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही'. हे वाक्य माझ्या यापूर्वीच्या वाचनातून सूटून गेले होते. आज पुन्हा वाचताना हे वाक्य वाचून मी अंतर्मुख झालो, आणि माझ्यापुरते तरी ते मला पूर्णपणे पटले. का आणि कसे, हे थोडेसे स्पष्ट करतो: माझी जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे इन्दौरमधे गेली, तेंव्हा तिथे मला आवडायचे. बाहेरचे जग तोपर्यंत बघितले नव्हते. अधून मधून मुंबई पुणे वगैरेला जाणे व्हायचे, परंतु मला त्यापेक्षा इन्दौरच चांगले वाटायचे. दिल्लीला एकदोनदा गेलो, तेंव्हा नव्या दिल्लीतले प्रशस्त रस्ते, हिरवळी आणि मोठमोठी झाडे, लोदी गार्डन वगैरे सुंदर आणि विस्तीर्ण उद्याने, जुन्या इमारती, संग्रहालये, उतम पुस्तकालये, कला विथिका वगैरे मला आवडले आणि आपण तिथे स्थानांतरित व्हावे असे वाटू लागले. योगायोग आणि थोडे प्रयत्न यातून ती इच्छा पूर्ण झाली आणि इ.स. १९७७ ते २०२२ आम्ही दिल्ली परिसरात राहिलो. मात्र या ४५ वर्षात दिल्लीत खूप बदल घडून आले आणि नंतरच्या काळात तिथे रहाणे नकोसे वाटून अलिकडे पुन्हा इन्दौरला स्थानांतरित झालो. (गेल्या सहा वर्षांपासून इंदौर हे भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेलेले आहे) गेल्या काही वर्षांपासून वर्षातले अनेक महिने आम्ही उभयता परदेशात स्थायिक झालेल्या मुलांबरोबर रहातो. त्यामुळे भारतात 'कुटुंब' असे नाही. समवयस्क नातेवाईकांपैकी काही परलोकवासी झाले, काही परदेशी गेले, काही खूपच वृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या मुला-नातवंडांना आमच्यात स्वारस्थ्य न वाटणे स्वाभाविकच आहे. 'प्रिय व्यक्ती' म्हणजे लहानपणापासूनचे थोडेसे जे मित्र भारतात आहेत, ते आपापली कौटुंबिक कामे, आरोग्यविषयक समस्या वगैरेत गुंतलेले असल्याने भेट झाली तर काही तास गप्पा करणे, यापलिकडे फारसे काही नाही, आणि त्यांचेशी फोनवर बोलणे भारतातून काय वा परदेशातून काय, सारखेच आहे, ते मी पुष्कळदा करत असतो. तथाकथित 'धर्म' या गोष्टीशी मला लहानपणापासूनच काही सोयरेसुतक नसल्याने तोही प्रश्न नाही. अर्थात भटकंतीत आढळणारी मंदिरे, लेणी, वा चर्च वगैरेंमधे मी जरूर जातो ते तिथली वास्तुकला, मूर्तीकला वगैरे बघण्यासाठी. इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मला सर्वप्रकारच्या प्राचीन गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने 'प्राचीन शिव मंदिर' वा तत्सम पाटी दिसली, तर मी आवर्जून तिथे जातो. परंतु तिथे (अद्याप टिकून असलेच तर) एकादे मोठे जुने झाड वा दूर कोपर्‍यातली एकादी पडकी भिंत, याव्यतिरिक्त 'प्राचीन' असे काहीही दिसत नाही. उलट म्युन्सीपाल्टीच्या मुतारीत लावतात तसल्या ओंगळ टाईल्स, भडक रंगरंगोटी आणि ठिकठिकाणी लोंबत असलेल्या चुन्न्या (हे कशासाठी असते कुणास ठाऊक) खरकट्या पत्रावळी आणि अन्य घाण वगैरेच बहुतेक जागी आढळते. याउलट युरोपमधील आठशे-हजार वर्ष जुन्या एकाद्या चर्चमधील लाकडी जमीन वा छत दुरुस्त करताना लावली जाणारी नवीन लाकडे भवतालच्या जुन्या लाकडांमधे बेमालूम मिसळून जातील, असे त्यांना पॉलिश वगैरे केले जाते. (सुतारकामाची आवड असल्याने असे काम मी बघत उभा रहातो). उदाहरणार्थ नुक्तेच मी फ्रान्समधील एक प्राचीन स्थळ बघून आलो. अकराव्या शतकातील फ्रेंच 'क्रुसेडर्स' जेरुसेलमला धर्मयुद्धासाठी जाण्यापूर्वी जिथे काही काळ राहून आवश्यक प्रशिक्षण घेणे, सामानाची जुळवाजुळव वगैरे करायचे, ते हे ठिकाण. इथल्या प्राचीन इमारती आवश्यक ती डागडुजी करून अजून उभ्या आहेत आणि तिथे त्यांची साद्यंत माहिती देणारे एक संग्रहालय अल्प तिकीट दर लावून चालवले जात आहे. या संपूर्ण परिसरात तिथले प्राचीन वातावरण भंग होईल असे काही दिसत नाही. मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: . . . . . . तात्पर्य, माझ्या युरोप- अमेरिकेतील मुक्कामात भरपूर भटकंती, मोठमोठी संग्रहालये आणि कला-प्रदर्शने बघणे, प्रदूषणमुक्त स्वच्छ वातावरण, शेकडो वर्षांपासून जपलेल्या, खरोखरच्या 'प्राचीन' वास्तु, उत्तम साहित्य आणि अवजारे घेऊन कलानिर्मिती- सुतारकाम, लेखन - वाचन, वाद्ये वाजवणे वगैरे करणे तिथे जसे शक्य होते, तसे माझे भारतात होत नाही. अर्थात हे सगळे माझ्यापुरते सांगितले आहे. इतरांचे अनुभव अर्थातच अगदी वेगळे असू शकतात.

In reply to by चित्रगुप्त

साहना 08/01/2023 - 11:21
होय. विविध विकसित देशांत आपल्या इतिहासासह रक्षण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केले आहे. भारतांत अनेक प्रचिंन वास्तु असल्या तरी तुलनेने त्याची देखभाल करण्यात आम्ही मागे पडलो आहोत. कला, संस्कृती इतिहास ह्या गोष्टी आणि समाजाची समृद्धी ह्यांचा फार खोल संबंध आहे. समृद्ध समाजांत अनेक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य कला किंवा इतिहासाच्या अभ्यासांत घालवू शकतात. त्या अभ्यासातुन थेट वित्त निर्मिती होत नसली तरी इतर श्रीमंत लोक त्यांना मदत करतात. त्याच मुळे पाश्चात्य देशांत किंवा जपान मध्ये तुम्हाला हर प्रकारचं विषयावर आयुष्य वेचलेले लोक पाहायला मिळतील. भारतांत अश्या लोकांचे फार हाल होतात. तरी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे, राम स्वरूप, सीताराम गोयल, विविध शास्त्रीय संगीतातील पंडित आणि विदुषी ह्या देशांत निर्माण होतात हि आपली पूर्वपुण्याई आहे. आमच्या इथे गड किल्यांची अवस्था दयनीय आहे. हेच किल्ले जर फ्रांस मध्ये असते तर तेथील सर्वांत महत्वाची आकर्षणे झाले असते आणि जागतिक पर्यटक स्थानांपैकी एक झाले असते. अमेरिकेत तर विविध ठिकाणी गरज नसताना किल्ले सदृश्य इमारती बांधून त्यांना पर्यटन स्थळे बनवली गेली आहेत. > मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे: हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. न्यू यॉर्क मधील सार्वजनिक वाचनालय हि एक महत्वाची अमेरिकन संस्था आहे. पण प्रत्यक्षांत हि संस्था सरकारी नाही आणि नव्हती. पाश्चात्य देशांत अनेक वस्तू संग्रहालये, आर्ट गॅलरी इत्यादी आहेत त्या बहुतांशी लोकांचं पुढाकाराने निर्माण झालेल्या आहेत. अमेरिकेत एकूणच शासन व्यवस्था हि शहरांना केंद्र बिंदू मानून निर्माण झालेली असल्याने न्यू यॉर्क मधील सेंट्रल पार्क इत्यादी कागदो पत्री सरकारी मालकीचे असले तरी जेंव्हा त्याची निर्मिती होत होत तेंव्हा स्थानिक रहिवाश्यानीच त्याचे नियोजन केले होते आणि मालकी हक्क स्थानिक संस्थेकडे दिला होता. भारतीय शासन व्यवस्था सुद्धा एके काळी ह्याच तत्वावर चालत होती. पण ब्रिटिश व्यवस्था हि ब्रिटिश सरकारच्या फायद्यासाठी असल्याने त्यानी त्याचे केंद्री करण केले आणि तथाकथित स्वातंत्र्यानंतर तीच पद्धती भारतीय सरकारने राबवली आहे. त्यामुळे शहरे, पंचायती ह्यांची स्वायत्तता कमी आहे आणि कुठल्याही नागरिकांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या संस्थेला हर प्रकारे अडथळा निर्माण करणे हि भारत सरकारची पॉलिसी आहे. मी माझ्या लेखांत मंदिरावरील सरकारी नियंत्रण हे भारतीय समाजाच्या निकृष्टपणाचे उदाहरण म्हणून दिले होते. ह्याचे कारण सुद्धा तेच आहे. एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती. ह्यांत सरकारी लुडबुड निर्माण झाली आणि हे निर्भेळ दूध नासवले गेलॆ. महाराष्ट्रातील गांवा गांवात आपण जातो तेंव्हा कुणी तरी अवलिया मास्तराने आपला संसार उध्वस्त करून गांवात शाळा निर्माण केली अशी कथा ऐकायला मिळते. हि शाळा मागील ५० वर्षे चालत असून हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असे ऐकू येते. समाज गरीब असल्याने फक्त शाळा निर्माण करणे ह्या सारखी ध्येये ह्यांनी ठेवली. हीच मंडळी जर एखाद्या समृद्ध समाजांत जन्माला अली असती तरी त्यांनी युरोपच्या तोंडात मारतील अश्या संस्था उभ्या केल्या असत्या. भारतीय विद्या भवन, बनारस हिंदू विशवविद्यालय, भांडारकर इन्स्टिटयूट, गीता प्रेस सारख्या संस्थांना पाहावे. TIFR, IISC इत्यादी संस्थांना पाहावे (ज्यांना सरकारने शेवटी बळजबरीने ताब्यांत घेतले), ह्या संस्था बहुतांशी ब्रिटिश कालीन आहेत. एअर इंडिया हि १९३२ साली सुरु झाली होती. युरोपियन संस्थांशी टक्कर देतील अश्या प्रकारच्या संस्था भारतीय आणि हिंदू लोक ब्रिटिश काळांत निर्माण करत होते. बँकिंग किंवा विमा क्षेत्रांत असंख्य खाजगी संस्था ब्रिटिश काळांत अस्तित्वांत होत्या. स्वतंयंत्रानंतर एन केन कारणाने त्या सर्व कोलमडल्या. हल्ली काही लोक नेहरू नि IIT निर्माण केली असल्या बतावण्या करतात पण सोयीस्कर पणे विसरतात कि त्याच भारतात नेहरूंच्या आधी किती तरी चांगल्या संस्था भारतीयांनी विना सरकारी मदत निर्माण केल्या होत्या ह्या शेवटी सरकारी हस्तक्षेपाने खराब झाल्या. दुर्दैवाने हि अधोगती लोक पाहत नाहीत. व्यक्तीपूजा आणि अंध राजकीय निष्ठा ह्यांच्या नादी लागून लोकांनी भारत विश्वगुरू आहे वगैरे थापा आत्मसात केल्या आहेत. जो पर्यंत आपली कमजोरी आम्ही ओळखत नाहीत तो पर्यंत त्यांत बदल घडवून आणणे शक्य नाही.

In reply to by सर टोबी

साहना 09/01/2023 - 09:51
२०१४ ला स्वातंत्र्य नाही तर मुक्ती मिळाली. तर्क, वस्तुस्थिती, न्याय, विवेक बुद्धी ह्या सर्वापासून देशाला मुक्ती मिळाली. निष्काम भक्ती म्हणजे काय हे आता रॅली नंतर सतरंज्या उचलताना सर्वाना मिळते.

In reply to by साहना

एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती.
आपणास खालील गोष्टींमधला सहसंबंध आठवतो का? १. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, पंढरपूर २. साने गुरुजी कोणत्या भारतीय युटोपियाबद्दल आपण बोलत असता? कधी होता हा अस्तित्त्वात?

In reply to by साहना

हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती :
२००५ मध्ये न्यू ऑरलींस मध्ये कतरीना वादळाने धुमाकूळ घातला होता. कतरीना वादळानंतर शहरात काही दिवस अंधाधुंदीची स्थिती होती. तेव्हा त्या शहरात डिपार्टमेंटल स्टोअर्स फोडणे, जाळपोळ वगैरे प्रकार झालेच होते. इतकेच नाही तर स्त्रियांवर बलात्कारही झाले होते. त्या शहरातील परिस्थितीमुळे काही लोक मिसिसिपी नदीवरील पूल चालत ओलांडत ग्रेटना या शहरात जात होते तिथे त्या शहरातील पोलिसांनी त्यांना बंदुकांचा धाक दाखवून हाकलून दिले होते. या अमेरिकेतील महान संस्कृतीला नक्की काय म्हणावे? अमेरिकेत कतरीना वादळ आले त्याच्या एक महिना आधीच मुंबईत २६ जुलैचा महापूर आला होता. दोन्ही शहरांवर आलेले पुराचे संकट मोठे होते - कारणे वेगळी असतील कदाचित पण संकट मोठेच आले होते. त्यावेळी कधी आयुष्यात परत तोंड बघायची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांनी एकमेकांना मदत केली होती. इतर वेळेस स्त्रियांवर अचकट विचकट कमेंट्स करणाऱ्या लोकांनीही अडकलेल्या स्त्रिया आणि मुलींनाही मदतीचा हात दिला होता. मुंबईत त्यावेळी जाळपोळ, लुटालूट, बलात्कार याच्या किती घटना घडल्या होत्या? आश्चर्य वाटेल पण २६ जुलै नंतर दोन तीन दिवस मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी होते. या संस्कृतीला काय म्हणावे? भारत देश वाईटच आणि इतर देश चांगलेच अशी sweeping statements करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या हाच अनाहुत सल्ला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

साहना 18/01/2023 - 06:05
प्रॉपर्टी अधिकारांच्या बाबतीत आम्ही भारतीयांनी गप्प राहिलेलेच बरे. वर्षाला अनेकवेळा गुंड मंडळी भारत बंद, मुंबई बंद इत्यादी करत असतात. मुस्लिम बहुल भागांतून हिंदूंची हकालपट्टी हि नेहमीची बाब आहे. शेतीविषयक कायद्यांच्या आंदोलनात अनेक रस्ते महिनाभर बंद ठेवले, त्यांत बलात्कार, खून इत्यादी अनेक गुन्हे सुद्धा घडले. आणि हे नेहमीच घडत आले आहे, त्यासाठी वादळ वगैरे येण्याची गरज नाही. जिथे ह्या गोष्टी अपेक्षित नसतील तिथे अचानक काही मोठ्या आपत्तीने ह्या गोष्टी घडाव्यांत ह्यांत आश्चर्य नाही (विशेषतः जिथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या संख्येने आहेत तिथे) पण लूटमार आणि बलात्कार हि नेहमीची बाब इथे आहे. बहुतेक दुकाने, घरें इथे खाजगी सिक्योरिटी ठेवतात कारण पोलीस व्यवस्था योग्यवेळी पोचेल ह्याची शाश्वती नाही.

In reply to by साहना

म्हणजेच काय तर अमेरिकेतही अनेक वाईट गोष्टी आहेत हे तुम्हीही मान्य करत आहात. मुद्दा तोच आहे. भारत म्हणजे सर्वकाही वाईट आणि अमेरिका म्हटले की सर्वकाही चांगले असे अजिबात नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तर्कवादी 18/01/2023 - 11:02
आणि धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल.. पण त्यापेक्षा काही सदस्य फक्त भारतात सगळेच कसे वाईट आहे एवढा एकच सूर फक्त लावून बसलेत

साहना 05/01/2023 - 04:39
शेवटी एकाच सत्य, रांगा अमेरिका, कॅनडा, uk, इत्यादी देशांच्या दूतावासापुढे लागलेल्या असतात भारतीय दूतावासा पुढे नाहीत. एकदा विदेशांत जाऊन आले कि समजते कि भारताची दुर्दशा किती खालच्या स्तराची आहे. आणि ह्या साठी फक्त अमेरिका दुबईत जाण्याची गरज नाही तर कतार, स्पेन, पोर्तुगाल सुद्धा चालतील. आमची शेती आहे, इकडे मुलांना संस्कार असतात असल्या हास्यास्पद गोष्टींत सुद्धा काही तथ्य नाही. भारतीय शेतकरी जगांत सर्वांत मागे आहे, जवळ जवळ प्रत्येक पिकाच्या बाबतीत जगांतील सर्वांत कामचुकार आणि अकार्यक्षम शेतकरी आहे. ह्यावर मी आधी लिहिले आहे. देशांत हिंदू लोकांची मंदिरे सरकारने ताब्यांत घेतली आहेत आणि त्याच्यावर ख्रिस्ती अधिकारी नेमले आहेत. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. शहरांत सुद्धा ज्यांच्या मुली तरुण आहेत त्यांच्या जीवाची घालमेल दररोज पाहावी. आपण पूर्णपणे अपयशी ठरलो कि नंतर मग आपल्यात माणुसकी आहे, अध्यात्म आहे, असल्या थातुर मातुर गोष्टी बोलून आपल्या मनाची समजूत काढायची. धर्मादायी खर्च, माणुसकी ह्या बाबतीत सुद्धा देश खूपच मागे आहे. अपघात होतांच जखमीला आधार देण्याऐवजी त्याचिया खिशातील पैसे चोरण्यात आपण पुढे. अपघात झालेल्या मैत्रिणीला सोडून पळ काढण्यात पुढेच. श्रीमंत मंदिरांचे पैसे सरकार चोरून नेते. सरकारी जमिनीवर गुंड लोक बळजबरीने कब्जा करतात. नवीन शाळा सुरु करणे कायद्याने गुन्हा आणि चुकून कोणी केलीच तर त्याच्या मागे सरकारी हापिसरांचा ससेमिरा. आज भारतीय तत्वज्ञानाचे व्हिडीओ पाहायचे असतील तर नंबर १ न्यूयॉर्क मधील स्वामी सर्वप्रियानंद आहेत. आपले अध्यात्म परमबिंदू शंकराचार्य हे "निगेटिव्ह नंबर्स खोटे आहेत" असली पुस्तके लिहीत आहेत. शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत.

In reply to by साहना

श्रीगुरुजी 05/01/2023 - 08:15
बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे. मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारी तरूण पाहण्याची आवश्यकता नाही. ट्विटर, फेसबुक इ. समाजमाध्यमातील अनेक मराठी तरूणांच्या प्रतिक्रिया वाचले की यांच्यावरील संस्कार लक्षात येतात.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरूजी, व्यक्ती तीतक्या प्रकृती हा नियम सर्वत्र एक सारखाच. चांगले वाईट संस्कार सगळीकडेच पहायला मिळतील. मुद्दा हा आहे भारत खुपच मागासलेला, गरीब, घाणेरडा देश आहे असे दाखवून परदेश किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवण्याची एतद्देशीय परदेश धार्जीणी मनोवृत्ती यावर आक्षेप आहे. परदेशातील असलेले आवगुण, शार्टकमिंग्ज झाकून ठेवून आपल्याच देशाचे वाभाडे काढायचे हे पटत नाही. नशेडी,गंजेडी,चोर,बलात्कार, डोमेस्टिक व्हायलन्स काय फक्त भारतातच आहेत का? परदेशात जाणारी मुलं पोटासाठी नोकरीच करतात फार काही वेगळे करत नाहीत. सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. कोव्हीड वर उपाय व सुयोग्य व्यवस्थापन हे एक चांगले उदाहरण नाही काय. कितीतरी गरीब देशांना भारताने लस दिली याबद्दल काय म्हणायचे आहे? इतर देशांच्या तुलनेत भारतातील परीस्थीती काय होती हे जगजाहीर नाही काय? माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. ज्या गोष्टी भारतात घडतात त्याच प्रकारच्या गोष्टी परदेशात ही घडतात हे विसरून चालणार नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 05/01/2023 - 14:45
> सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात. बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही. पावसांत भिजत दुचाकी घेऊन कामाला जायचे. मृत्यूचे सापळे असलेल्या रस्त्यावर दिव्य करत पोटाची खळगी भरण्यासाठी कसला तरी उद्योग व्यवसाय करायचा, मग बहुतेक पैसे GST वर घालवायचे, राहिलेले आरोग्य, मुलांचे शिक्षण, आणि विविध कारणासाठी लाँच देत घालवायचे. काही वाचलेच तर मग कुठल्या तरी कंपनीत गुंतवायचे ज्याचा CEO मग तुमच्याच पैश्यांची चालविलेल्या सरकारी बँक ला गंडा घालून जातो आणि ते पैसे मग पेट्रोल वरील करणे तुम्हीच पुन्हा भरता. दुर्दैवाने तुमचा जन्म तथाकथित सवर्ण जातीत झाला तर विचारूच नका. साधी प्राथमिक शाळा पासून नंतर नोकरी मिळवण्यापर्यंत तुम्ही सर्वांत शेवटी राहाल. अपार कष्ट करून म्हाताऱ्या आईवडिलांना गावी ठेवून शहरांत यायचे. २० वर्षे लोन भरत छोटासा फ्लॅट घ्यायचा जयंत साधा सेंट्रल ac सुद्धा नसतो. शनिवारी रविवारी फारतर मॉल मध्ये अवाजवी पैसे भरून चित्रपट पाहायचा आणि आणखीन पैसे देऊन तो थंडगार सामोसा आणि गरम गरम कोक प्यायचा. वर्षातून काही वेळा गावी जायचे तीच काय ती सुट्टी. आणि हे आयुष्य फक्त तुम्ही शिकले असाल तरच तुमच्या नशिबी. तुम्ही अडाणी असाल तर कुठे तरी गुरा ढोरा प्रमाणे कुणी तरी तुम्हाला वागवून फार तर दोन दिवस जिवंत राहण्यापुरता पगार देईल. माझी कॅलिफोर्निया मधील कुक पंजाबी स्त्री आहे. वयाच्या ५५ वर्षी ती इथे आली. घरी तिला डोळे वर काढून पाहायची सोय नव्हती. पंचक्रोशीत म्हणे ती एकटीच ८वि पास होती. इथे येऊन तो गाडी चालवायला शिकली (कॅलिफोर्निआ मध्ये ड्रायविंग टेस्ट पंजाबी भाषेतून उपलब्ध आहे). सध्या ती निव्वळ जेवण बनवून साधारण ४००० डॉलर्स कमवते. मी म्हटले तुला पैसे केश देऊ का ? तर म्हणते नाही दीदी, इथे टॅक्स भरावासा वाटतो. मागील दोन वर्षांत तिने पंजाबी ड्रेस सोडून पंत शर्ट घालायला सुरुवात केली. आपले सेविंग मग ती पंजाबात जमीन घेण्यावर खर्च करते. तिची मुलगी पंजाब मध्ये होती, ती गरोदर होताच तिने धडपड करून तिला कानडा मध्ये विद्यार्थी म्हणून आणले आणि नातवाला कॅनेडियन सिटीझन बनवले. काही महिन्यात तिची इतर मुले आणि बहीण सुद्धा इथे येईल. हिचे आयुष्य सर्व सामान्य म्हणून जरी जात असले तरी ते सामान्य आयुष्य तिच्या नशिबी पंजाब मध्ये नव्हते. तिथे शेणी थापत आणि सासूचे पाय दाबत तिचे आयुष्य गेले असते. इथे ती जास्त खुश आहे. > माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही. भिकार आणि घाणेरडा हि दोन्ही विशेषणे भारताला १००% लागू आहेत आणि त्या तुलनेत जवळ जवळ प्रत्येक देश भारता पेक्षा खूप पटीने चांगला आहे. हे शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत. मी भारताला शिवी देत आहे किंवा अशी शिवी देऊन मला आनंद वाटत आहे असे अजिबात नाही. जी गोष्ट वाईट आहे ती मान्य केल्याशिवाय आपण त्यांत सुधारणा घडवून आणू शकत नाही. "स्वच्छ भारत" स्कीम ची गरज का भासली ? कारण सार्वजनिक ठिकाणी आम्ही प्रचंड कचरा निर्माण करतो. आपले सार्वजनिक प्रसाधनगृहे सामान्य स्त्री ने वापरण्यासारखी नाहीत. शहरच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा खरोखर प्रचंड घाणेरडा आहे. हगंदारी मुळे अनेक गांवांत सकाळी नाक बंद ठेवावे लागते. मी मेक्सिको, ब्राझील, स्पेन आणि इंडोनेशिया मध्ये प्रवास केला आहे. येथील ग्रामीण भाग सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आणि जास्त स्वच्छ आहेत. IIT मुंबई हि तथाकथित मोठी शिक्षण संस्था आहे. त्यांना पैश्यांची कमी नाही. तेथील हे प्रसाधनगृह पहा . हा लेख एका प्राध्यापकाने लीहिला आहे. https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html टीप: माझ्या कोकणातील शेतजमिनीवरील पम्प चा फ्यूस वारंवार उडत होता म्हणून मी गांवातील एका इलेक्ट्रिसिटी वाल्याला पाहायला सांगितले. जमिनीची जो देखभाल करतो त्याला ह्या विषयातील काहीच समजत नाही त्यामुळे मलाच फोन वरून बोलावे लागले. तर हा इलेक्ट्रिसिटी वाला मला सांगतो. काही नाही मॅडम सोप्प आहे, थोडा जास्त अँपिअर चा फ्यूस घालायचा, तो मग उडत नाही ! दुसरी टीप : भारतात उणिवा आहेत ह्याचा अर्थ इतर देश १००% चांगले आहेत असे नाही. पण सर्वसामान्य शिकलेल्या मध्यमवर्गीय भारतीयाला जी अवहेलना भारतात सहन करावी लागते तशी अवहेलना अगदी मजूर म्हणून काम करताना सुद्धा इतर देशांत भोगावी लागत नाही. रस्ते तुम्हाला ठार मारत नाहीत, वाहन परवडते, पिण्याचे पाणी पण्यासारखे असते, हवा फुफुफ्सांत घेतली असता दोन सिगारेटी पिल्या प्रमाणे वाटत नाही, शाळेत जाताना रस्ता क्रॉस करताना आपल्या मुलांना कुठली तरी बस किंवा ट्रक चिरडून जाणार नाही हि खात्री, कधी कधी फिरायला चांगले पार्क, विविध प्रकारचे अन्न, रात्री फिरताना कुणी तरी आपला बलात्कार करणार नाही हि खात्री, अश्या छोट्या छोट्या गोष्टीच आपले जीवन जगण्यासारखे बनवतात. आणि ह्याच अत्यंत सध्या गोष्टीसाठी लोक भारत सोडून इतरत्र जातात. इतर देशांत समस्या अनेक आहेत पण त्या भारतीय समस्यांच्या मानाने कमी आहेत. सर्वसाधारण भारतीयाला विनाकारण देशांत अवहेलना सहन करावी लागते हे १००% सत्य आहे.

In reply to by साहना

Trump 06/01/2023 - 15:14
बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही.
श्री साहना, तुमचे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे. परदेशात गेलेले सगळे भारतीय सीईओ आणि तत्सम पदावर जात नाहीत. बहुतेकांचे जीवन सर्वसामान्यपणेच जाते. --- सर्वसामान्य लोकांना जास्त काही नको असते, शाश्वत उत्पन्न (याचा अर्थ नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या संधी असा होता), आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये (नोकरी जाणे, आजारी पडणे, कोणी त्रास दिला इ.इ) न्याय्य मदत, डोक्याला त्रास न होता सरकारी कामे होणे, तोंड बघुन नियम न बदलणे, दिलेया वचनाला जागणे अश्याच गोष्टी हव्या असतात. आणि त्याच सहजपणे मिळत नाहीत.

सर टोबी 05/01/2023 - 09:14
तुमची अतिरेकी ऊजवी विचारसरणी, जी वारंवार भात खातांना गारेच्या खड्यासारखी मध्ये मध्ये येते, ती सोडली तर प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे.

In reply to by सर टोबी

@सर टोबी जी, आमच्या भातातले खडे दिसले पण @सहाना जींची भाषा नाही दिसली. प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे. यातच सर्व आले नाही का? अतिरेकी उजवी वगैरे काही नाही,देशातील घडामोडींवर लक्ष असते सर्वांचेच समर्थन करत नाही. असभ्य भाषा प्रयोग, तो सुद्धा देशाबद्दल आणी पोटार्थी,देशोधडीला लागलेल्या कडून, ना मंजूर. लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम मला जास्त माहीती नाही पण त्यांचा जन्म याच देशातला आयुष्यातली आठरा विस वर्ष याच देशाच्या अन्नावर वाढल्या असतील. या देशात काहीच चांगले दिसले नाही! देशाला भिकार,घाणेरडा,मागासलेला, आशी विषेशणे लावतात याबद्दल काहीच म्हणायचे नाही! आम्ही तर मागासलेले पण तुम्ही तर शिकलेले,सुसंस्कृत ना?भाषा उपरोधिक पण सभ्य, संयमित नको? एक गोष्ट चांगली म्हणताना दुसरी घाणेरडी,भिकार म्हणले म्हणजे ते खरे ठरत नसते. त्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा. किती खोटारडी विधाने आहेत. कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय, सरकार देवळात हस्तक्षेप करत आहे याचा व परदेशी जाण्याचा काय संबध? इतकापण काही वाईट नाहीये भारत. आजही कित्येक विदेशी इथली संस्कृती,शिल्प,नृत्य कला,साहित्य हे शिकण्यास भारतात येतात तुलनात्मक कमी पण येतात हे सत्य आहे. बरोबरच आहे म्हणा, ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे. शेवटी एक स्पष्ट करावेसे वाटते, प्रतिसाद देणे म्हणजे फटकावणे वगैरे काही नाही. भाषेवर आक्षेप म्हणून खटाटोप एवढेच.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 06/01/2023 - 15:01
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
श्री कर्नलतपस्वी, तुम्ही सैन्यात होता. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात किती संघर्ष करायला लागला आहे त्याबद्दल शंका आहे. (सैन्यातील नोकरीतील काम म्हणजे संघर्ष होत नाही.) सैनिकांना कामादरम्यान आणि निवृत्तीनंतर मिळण्यार्‍या सुविधांचा हेवा वाटतो. ही कथा सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचार्यांची असते. माझ्या व्यक्तीगत अनुभवानुसार भारतातील बहुतांशी सरकारी कर्मचारी मुजोर, कामचोर आणि सरकारी पदाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करायला पुढे मागे बघत नाहीत. त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसतो. लोकांना चकरा मारायला लावणे, कोणतीही गोष्ट लिखित न देणे, जबाबदारी न स्वीकारणे, आज उद्या करत काम टाळणे. अश्या किती तरी उदाहरणे देता येतील. (आणि कृपया सैन्याचा अपमान झाला अशी ओरड करु नका. तुम्ही पुर्वी सैन्यात होता म्हणुन जास्त अधिकार मागु नका येथे.)
लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम
असली वक्तव्य म्हणजे राणा भीमदेवी थाटात केलेली वक्तव्ये आहे. जर तुम्ही सैन्यात नसता आणि सर्वसामान्य माणसांचा संघर्ष केला असता तर असली आंधळी विधाने केली नसती. भारत आमच्यासाठी सुध्दा प्रथम आहे, पण काही ठराविक वर्गासाठी इतर लोक राबत आहेत आणि आपले आयुष्य घालवत आहेत असे दिसते. --
ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे.
पुर्णपणे चुकीचे विधान. परदेशात राहिलेले (अनिवासी आणि पुर्व) भारतीय, भारत आणि भारता विषयी आत्ममियता आणि देशप्रेम बाळगुन असतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 06/01/2023 - 22:43
परदेशी भारतीयांनी पाठवलेले पैसे: $१०० billion भारतीय माहीती तंत्रज्ञान क्षेत्राने कमावलेले पैसे: $१७८ billion भारताच्या संरक्षण खर्चः $७३.८६ billion संदर्भ: https://www.meity.gov.in/it-export https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/us-replaces-uae-to-become-top-source-of-remittance-flow-to-india-report/articleshow/96025878.cms https://en.wikipedia.org/wiki/Military_budget_of_India#2022-23

In reply to by कर्नलतपस्वी

उपयोजक 09/01/2023 - 19:57
कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय तिरुपतीच्या बालाजी मंदिरसंस्थेवर एक ट्रस्टी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे मामा आहेत. जगनमोहन हे ख्रिश्चन आहेत. मामा कागदोपत्री हिंदू आहेत. याच मंदिरात अनेक ख्रिश्चन धर्मोपासक शिरु पाहत असतात. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिेराच्या ट्रस्टींपैकी एकजण मुस्लिम आहे म्हणे. खखोदेजा!

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 21:48
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 21:59
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 22:13
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

In reply to by उपयोजक

श्रीगुरुजी 09/01/2023 - 22:18
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

एक भारतून परदेशात जाणारी व स्थानिक होण्यासाठी धडपडणारी मुलं आणी दुसरा बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? काही लोकांना परदेशी गेल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटते,आपण काहीतरी इतरांपासून वेगळे आहोत आसा स्वतःबद्दल गोड गैरसमज होतो व सर्वज्ञ असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडू लागतात. भारत गरीब आहे विकसनशील देश आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना आहे तेव्हा त्यांच्या गरिबीची काळजी न करता स्वतःचे दारिद्र्य कमी कसे होईल या कडे वरील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांनी करावी. लेखनाचा मुळ उद्देश प्रतिसादा मुळे भरकटू नये या करता भारतद्वेषी , पूर्वग्रहदूषित प्रतिसादाला प्रती-प्रतिसाद देणे बंद करत आहे.

In reply to by उपाशी बोका

वाचला. बरेच प्रतिसाद सभ्य,संयमित व समर्पक,पटले. परदेशी जा,जीथे अर्थिक,वैचारीक उन्नती होईल तीकडे जा तुलना करा पण सुसंस्कृत झालात तर सुसंस्कृत पणेच वागा,बोला. संदीप डांगे याच्या प्रतिसादातला काही भाग, >> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो. १००%सहमत

भारत का सोडावासा वाटतो? १. साध्या साध्या गोष्टीसुद्धा टोकाच्या करून सोडणारी प्रत्यक्षातली संस्कृती- संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरी वैचारिकदृष्ट्या भारतीय लोक प्रचंड प्रतिगामी, मागास आहेत. सासुरवासासारख्या गोष्टी घराघरांत चालतात. प्रत्येक साध्या गोष्टीला उगीचच काहीतर संस्कृतीचा मुलामा द्यायचा आणि पुरुषी/सामाजिक अहंकार जपायचा. उदा. बायकांनी पुरुषांची ताटं उचलणे. अमुक एक हजार वर्षांपूर्वी युनिवर्सल विचार मांडणे वेगळे आणि ते समाजाच्या अंगाअंगात मुरलेले असणे वेगळे. २. सामान्य भ्रष्टाचार - जगभरात सगळीकडे चालतोच, परंतु भारतात तो प्रत्येकपातळीवर आहे. केवळ सरकारीच नव्हे तर सगळीकडे. मला तलाठ्याला साहेब म्हणून गयावया करून आणि लाच देऊनच पुढे जावे लागते नाहीतर माझी जिरवली जाते. इतकेच नव्हे, खाजगीतही हा बोकाळलेला आहे. मी सीईटीसाठी चाटे कोचिंग क्लासमध्ये होतो तेव्हा माझी मेस बदलण्यासाठी तिथल्या एका क्लार्कने मला ९०० रुपये मागितले होते. ३. छुप्या हुकुमशाहीकडे वाटचाल - गेल्या दशकभरात भारताच्या सार्वजनिक आणि सरकारी, राजकारणी डिस्कोर्समध्ये जर 'हिंदुत्व' वगैरे शब्द तपासले तर भारताची वाटचाल हिंदू तालिबान होण्याकडे होत आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. माझे वय फार नाही परंतु माझ्या लहानपणी, पौगंडात हे विषय इतके ऐरणीवर कधीच आले नाहीत. हे म्हण्जे पूर्णपणे भुरटे न्युसेन्स विषय. आता मात्र अत्यंत फालतू गोष्टींवरूनसुद्धा टोकाचे राजकारण केले जाते. सगळीकडून मूलतत्त्ववाद्यांना डोक्यावर घेण्याचे प्रकार सुरु झालेत. उदा. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरसारख्या ठिकाणी महिलांनी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे वगैरे म्हणून मोर्चे काढलेत, घरांवर "इथे हिंदू राहतात" वगैरे स्टीकर्स लावणे, बिर्याणी हॉटेलांची तोडफोड केली. कुठल्याही गोष्टीमध्ये 'ही आपली संस्कृती नाही' अशी दमदाटी करणे वगैरे प्रकार इतके वाढत आहेत की उद्या परत सकच्छ की विकच्छ, स्त्रियांनी अमुकच कपडे घातले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची फारशी गरज नाही, चूल मूल असे विचार हळू हळू पुढे येतील आणि त्या कल्पनेनेसुद्धा थरकाप उडतो. "स्त्रीला पायातली चप्पल मानावे, तिला जाता येता कानफाडली पाहिजे" इत्यादी मुक्ताफळे उधळणार्‍या इंदुरीकरासारख्या कीर्तनकारांना डोक्यावर घेतले जाते आणि त्यांच्या कार्यक्रमांना अफाट गर्दी होते. स्त्रियाही एका बाजूला बसून या गोष्टींना मान डोलवत असतात हे दृष्य जर कुणाला आशादायक वाटत असेल तर वाटो. मला मात्र वाटत नाही. इन्क्रिमेंटल, छोटे छोटे बदल केले की ते नजरेत अजिबात येत नाहीत पण काही वर्षांनी आपण कुठवर आलो हे पाहिले की भस्कन मागासपणाची आणि आपल्या चुकांची जाणीव होईल, अर्थात तोवर वेळ निघून गेलेली असेल. उदाहरण द्यायचे तर - मागच्या वर्षी अनेक व्हीपीएन कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. कारण नव्या सरकारी नियमांनुसार सर्वर लॉग्ज साठवून ठेवणे, सरकारला ते विनाशर्त विनाअट पुरव्णे बंधनकारक केले गेले आहे. यावर कुणीही जनजागॄती केली नाही की विरोध केलेला नाही. गोष्ट छोटी, पण लांबून डोंगराएवढी. असं हुकुमशाही राजवटीत होतं. ४. अकार्यक्षमता - मला लोक अकार्यक्षम वाटत नाहीत पण व्यवस्था वाटते. विखंडित शेतीचा प्रश्न धोरणीपणाने सोडवला नाही तर हवामानबदलाच्या पडत्या काळात भारताचे प्रचंड नुकसान होणार. प्रचंड कमी सूर्यप्रकाश असूनही जर्मनीसारखी राष्ट्रे सोलार पॉवर इत्यादी गोष्टींमध्ये भारताहून अनेक दशके पुढे आहेत. ५. अर्धवट इन्फ्रा - एखादी गोष्ट 'का' करायची याचा साधा कॉमन सेन्ससुद्धा नसतो. उदाहरण, मेट्रो सारख्या गोष्टींवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु जगातील प्रत्येक पुढारलेल्या शहरात मेट्रो हे एका मोठ्या पब्लिक ट्रानस्पोर्ट सिस्टिमचा केवळ एक भाग असतो. बसेस, इतर मोठ्या पल्ल्याची रेल्वे सिस्टिम एकात एक गुंतवून प्रचंड कार्यक्षण यंत्रणा उभी केलेली असते. ती कार्यक्षम असतेच शिवाय रोबस्टही असते आणि समाजातल्या सर्व स्तरांना जास्तीत जास्त फायदा मिळावा अशा या योजना आखलेल्या अस्तात. बी आर टी नावाचा हास्यास्पद प्रकार खेळून झाल्यावर आपले मूर्ख लोक लगेच मेट्रोच्या नादी लागले. विकासाची ही अर्धवट कल्पना झाली. ६. इनोव्हेशन/सृजन आणि जुगाड यांच्यातली गल्लत - भारतीय लोक जुगाडालाच सृजन समजात. तसे करायला हरकत नाही पण सृजन करण्याची आपली क्षमता तरी आपण विकसित करतोय का हे ही महत्त्वाचं आहे. भारतीय शिक्षणव्यवस्था नावाचा एक मोठा विनोद याला कारणीभूत आहे. ती धड रोजगाराला सक्षम करणारीही नाही किंवा लोकांना शहाणी समजूतदार करणारीही नाही. ८. नैसर्गिक स्त्रोतांची हेळसांड - इतक्या वेळा बोंबलूनही भारतीय लोकांना सुका कचरा आणि ओला कचरा यांच्यातला फरक कळत नाही. भारतातल्या सर्वच नद्या टोकाच्या प्रदूषित आहेत आणि त्या त्यांच्या ७० वर्षांपूर्वीच्या स्थितीत जरी आणायच्या म्हंटल्या तर सगळा देश उल्टा पालटा करावा लागेल. एसटी मधून नदीला पाया पडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकणारे महाभाग मी पाहिले आहेत. प्रचंड लोक आहेत त्यामुळे उडदामाजी काळे-गोरे या न्यायाने चांगली माणसेही भरपूर आहेत म्हणून इथवर वाटचाल झाली. भारत का सोडावासा वाटत नाही? १. हवामान - रोज सूर्य दिसणे ही खूप मोठी बाब आहे. २. कुटुंब - बहुतेक कुटुंब हे भारतातच आहे. ३. नैसर्गिक आरोग्य - शरीराला इतर प्रदेश मानवतीलच असे नाही. शेवटी फिजिकल मर्यादा असतातच. ४. वैविध्य - खूप मोठी अ‍ॅसेट आहे. ( जरी हिंदूराष्ट्राच्या नावाखाली वैविध्य नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम होत असला तरी भारतीय पुरुन उरतील ही आशा कुठेतरी वाटते.) ५. जुळवून घेणे - एका बाबतीत भारतीय पुढे आहेत. (नाईलाजाने ) परिस्थितीशरणता आहे की जुळवून घेणे आहे यातला फरक लगेच कळत नाही, पण ही एक गोष्ट आवडते. एकंदरीत भारत सोडावा वाटणे याला सांस्कृतिक कारणे आहेत, आणि न सोडावा वाटणे याला नैसर्गिक (फिजिकल) कारणे आहेत.

बरेच काही बदलले आहे, बदलत आहे. काही काही घरांमध्ये कटकट करणारे म्हातारे लोक असतात त्यांना स्वतः:च्या आयुष्यात काही करता आलेले नसते मग ते आजूबाजूच्या लोकांवर राग काढत राहतात. इथेही तसेच आहे काही जणांना स्वतः:च्या आयुष्यात अपयश येते, लायकी नसते किंवा आळशीपणा असतो अंगात मग ते आजूबाजूच्या लोकांवर, सरकारवर, देशातल्या व्यवस्थेवर राग काढत राहतात. भारतात २२ कोटीच्या आसपास दुचाकी आहेत, ७ कोटी चारचाकी आहेत म्हणजे अंदाजे प्रत्येक घरात एक वाहन आहे. उगाच एखाद्या आदिवासी वस्तीचे उदाहरण देऊ नये अपवाद सगळीकडे असतो. तसाच हा नियम सरसकट लागू होणार नाही. याशिवाय आयुष्मान भारत सारख्या योजना मुले अति गरीब माणसे सुद्धा आरोग्य विमाचा लाभ घेतात. सिक्युरिटी गार्ड वगैरे लोकसुद्धा अति गरीब कॅटेगरीत येत नाहीत त्यांना सुद्धा १५ हजार किंवा जास्तच पगार असतो. म्हण्जे जिवन्मान किती उण्चावले आहे बघा. खेड्यांमध्ये मजुरीसाठी लोक मिळत नाहीत कारण गहू २ रुपये किलो आणि तांदूळ ४ रुपये किलो ने मिळत होता रेषन वर. आता हे बंद झाले आहे बहुधा कारण आता धान्य फुकट मिळते रेशन कार्ड पांढरे वर. बरेच जण फक्त फक्त क्वार्टरचे पैसे मिळेपर्यंत मजुरी करतात. ह्याला गरिबी म्हणायचे का? नोव्हेंबर महिन्यात चार चाकी गाड्यांची विक्रमी विक्री झाली, सुट्ट्या आल्या कि पर्यटन स्थळे फुल्ल असतात , कामवाल्या बायका त्यांच्या नवऱ्याला, मुलांना घेऊन हॉटेलात जेवतात बऱ्याचदा काही जण पार्सलहि मागवतात हे मी कनिष्ठमध्यमवर्गाबद्दल सांगत आहे. India's air traffic touches 1.29 crore passengers in Dec 2022, crosses pre-COVID levels हि बातमी वाचली का कोणी. हे सगळे जण नक्कीच अतिशय गरीब असणार ना? २७ डिसेंबर ला ४ लाख एअर तिकीटे बुक झाली हि विक्रमि विक्रि होती. प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे, वैनगंगा ते नळगंगा सिंचन , समृद्धी महामार्ग, ऍक्सेस controlled एक्क्सस्प्रेस वे, बुलेट ट्रेन सारखे अति महत्वाकांक्षी प्रोजेक्त होत आहेत, ह्यातून प्रवास करणारे गरीब आहेत का? मुळात ब्रेन ड्रेन या शब्दाला काही अर्थच नाहीये. काही ठराविक शिक्षणसंस्था यातले पास औट परदेशात जातत. त्यात काही चूक नाही. प्रत्येक जण अधिक चांगले प्रोस्पेक्ट्स पाहतो पण त्याला ब्रेन ड्रेन म्हणायचे म्हणजे फक्त त्यांनाच बुद्धी आहे इतरांना नाही असा अर्थ होतो. ह्यात काहीच चुकीचे नाहीये का? याशिवाय डिजिलॉकर, UIDAI, online सातबारा, डायरेक्ट बेनिफिट to अकाउंट अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे बाबूशाही थोडीतरी कमी झाली. स्वतः ला काही चांगले, भरीव करता येत नाही म्हणून सगळा देश वाईट हा तर्क मात्र अजब आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

सर टोबी 06/01/2023 - 09:26
भारतात कुटुंबांची एकूण संख्या आहे २९ कोटी आणि सरासरी ४.८ एवढी कुटुंबागणिक सदस्यांची संख्या आहे. २२ कोटी वाहनं असतांना देखील ७ कोटी घरांमध्ये वाहन नाही. म्हणजे सुमारे ३४ कोटी लोकांकडे वाहतुकीचे साधन नाही. २२ कोटी दुचाक्यांपैकी पाच टक्के दुचाक्या या माणशी एक याप्रमाणे ऐपत असणाऱ्या कुटुंबात असतील तर अजून पाच कोटी लोकसंख्या वाहतुकीच्या साधनांपासून वंचित असते. आता या ३९ कोटी लोकांमध्ये किमान १४ कोटी लोक मिळवते असतील तर ते सर्वस्वी वडाप, बसेस यांचा वापर करीत असतील. आणि लोकसंख्येच्या १० टक्के लोकांची “एवढी तफावत तर कुठेही असतेच” अशी आपण संभावना करणार असाल तर अशी देशभक्ती तुम्हालाच लाभो. हि फक्त एका आकडेवारीची चिरफाड आहे.

In reply to by सर टोबी

एका आकडेवारीची चिरफाड करतानासुद्धा इतक्या चुका आहेत आता आणखीन चुका टाळाव्यात. माणशी एक दुचाकी वाली 5 टक्के कुटुंब हे assume केले आहे. मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत. शिवाय वृद्ध माणसे सुद्धा सहसा वाहन चालवणे टाळतात. एखादा मेट्रोने किंवा बसने किंवा वडाप ने प्रवास करत असेल तर तो अतिशय गरीबच असेल असे गृहीत धरले आहे. आणि 22 कोटी दुचाकी आहेत फक्त. 7 कोटी चारचाकी आहेत त्या वेगळ्या. यामध्ये रिक्षा, टमटम वगैरे धरलेल्या नाहीत. तसा युक्तिवाद करायला काहीही करता येईल. फक्त 100 लोकांकडे मिळून 7 कोटी चारचाकी असतील असेही assume करता येईल. त्याला काही अर्थ नाही

In reply to by अप्पा जोगळेकर

साहना 06/01/2023 - 12:54
शिकागो १९०० असे गुगल इमेजीस मध्ये टाकून पहा. भारतीतील कुठलेही शहर आज सुद्धा त्याची बरोबरी करू शकत नाही. वाहनांची गोष्ट सांगायची झाली तर दुचाकी आणि ४ चाकी माध्यम वर्गीयांना परवडायला साधारण २००० साल उजाडावे लागले. त्याआधी भारत सरकारने जवळ जवळ सर्व वाहन उद्योगावर बंदी घातली होती. काँग्रेसी मित्र बजाज हे अत्यंत भिकार दर्जाची स्कुटर लोकांच्या माथी मारत असत. आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ? ९०% भारतीय जनता $३०० सुद्धा महिन्याला कमवत नाही ह्या लोकांना दुचाकी कशी परवडेल? हे आकडे पहा बिहार सारख्या गरीब राज्यांत फक्त ३०% घरांत दुचाकी आहे. चार चाकीची परिस्थिती आणखीन खराब आहे. महाराष्ट्रांत फक्त ८% घरांत तर बिहार मध्ये फक्त २% घरांत चारचाकी आहे. हे आकडे पाकिस्तान किंवा व्हिएतनाम च्या तुलनेत खराब नसले तरी जागतिक स्तराचं दृष्टीने अत्यंत खराब आहेत.

In reply to by साहना

Trump 06/01/2023 - 13:25
आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ?
श्री साहना, हे तुमचे म्हणणे बरोबर असले तरी पुर्ण दोष सरकारला देता येणार नाही. लोकांना कितीही सांगितले तरी ते कायदे पाळायला तयार नसतात. तुम्हाला येथे झालेल्या काही चर्चांचे दुवे देतो. हेल्मेटसक्ती - प्रकाश घाटपांडे https://www.misalpav.com/node/29420 चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ - मनिषशिल्पाअनुसे https://www.misalpav.com/node/36728 नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा - उगा काहितरीच https://www.misalpav.com/node/50575 ही काही साधी उदाहरणे आहेत, अशी बरीच देता येतील. भारतातील किती प्रवासी उपलब्ध असलेली खुर्ची पट्टी वापरतात ? श्री सायरस मिस्त्री अश्याच एका अपघात मरण पावले. ते गरीब, अज्ञानी होते असे कोणी म्हणु शकत नाही.

Trump 05/01/2023 - 19:17
मस्त चर्चा चालु आहे. (की धुरळा उडतो आहे.) --- एक गोष्ट् कोणी लिहीली नाही, भारतामध्ये गेल्या काही वर्षात आंतरजाल खुप वेगवान झाले आहे.

In reply to by Trump

साहना 07/01/2023 - 02:15
+१ इंटरनेट आणि स्मार्टफोन चा प्रसार हि मागील काही वर्षातील भारतातील जमेची बाजू आहे. सुदैवाने भारत सरकारने लुडबुड करायच्या आधीच हा प्रसार वेगाने झाल्याने लोकांच्या नशिबी जागतिक दर्जाच्या सेवा आल्या नाहीतर इथे सुद्धा अवस्था सरकार निर्मित रस्त्याप्रमाणे झाली असती. दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतात एकूण विमानतळाची संख्या वाढत आहे. मागील १० वर्षांत साधारण १०० नवीन विमान तळ पूर्ण तरी झाले आहेत किंवा बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत.

अर्जुन 06/01/2023 - 12:45
१. भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. २. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता ३. याच शिकलेलया,सुसंस्कृत लोकांनी होमी भाभा यांचा विमान अपघात घडऊन आणला. कारगील हल्लाच्यावेळी भारताला जि. पी. एस. चे इनपुट द्यायला नकार दिला. इराक देशाला बर्बाद केले. लिबियाचा गडाफीला मारले. ४. करोनाच्या काळात भारताने इतर देशांना केलेली मदतही आपण विसरलात का? इतर देशांचा नागरिकांची अफगाण, कुवेत, युक्रेनमधुन सुखरुप सुटका केली. तरीही भारतीय असंस्कृत? तूम्ही मिसळपाव वर लिहिण्यापेक्षा लोकसत्ता महाराष्ट टाइम्समधे लिहा. जास्त समर्थक मिळतील.

In reply to by अर्जुन

साहना 07/01/2023 - 01:46
> याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते. पाश्चात्य देशांना सद्गुणी मी म्हटले नाही. तेथील राहणीमानाचा दर्जा भारताच्या कैक पटीने चांगला आहे हे निर्विवाद सत्य मी मांडले आहे. तुम्ही सुद्धा ते मान्य करत आहात. पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ज्या प्रमाणे भारतातील मागासलेले लोक आपल्या खराब स्थितीसाठी मनुस्मुर्ती किंवा सवर्णांना आयुष्यभर दोष देत असतात त्याच प्रकारे मागासलेले देश आपल्या नालायक पणा साठी इतिहासाला दोष देत असतात. इतर देशांची समृद्धता भारताला लुटून आली नाही. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आणि अली असली तरी मागील ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. >तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता भारतीय लोक भारत सोडल्यानंतरच इतके यशस्वी बनतात. ७०% भारतीयांना अजून सुद्धा ठीक पणे लिहिता वाचता येत नाही. हे सत्य आहे. भारताची अर्थ व्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे ह्यांत छाती बडविण्यासारखे काहीही नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होता. दर माणसी दुर्ष्टीने पाहिल्यास भारत अजून जगांतील सर्वांत दरिद्री लोकांपैकी आहे आहे. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि संपत्ती जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.

In reply to by साहना

अर्जुन 07/01/2023 - 15:48
पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ब्रिटिशांनी भारतातून नेलेली संपत्ती ४५ ट्रीलीयन डालर्स इतकी आहे. भारताची अर्थव्यवस्था १९४७ मधे ३.४७ ट्रीलीयन डालर्स इतकी होती. आता जर तरीही तुम्ही पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. असे म्हणत असाल तर तुम्ही मुद्दाम गैरसमज पसरवत आहात असे नाईलाजाने म्हणावे लागेल. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आपले विचार ईंग्रजांना माहित नव्हते, म्हणून ते १५० वर्ष भारतात निचोडत होते. ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल. ७० वर्षांत भारतांत दारिद्र्य पसरलं, हे तुम्हाला कोणी सांगितले? स्वातंत्राचावेळी भारतात ८०% जनता गरीब व १९६६ मधे दारिद्र्य रेषेखाली होते, ते २०२२ मधे १६.४% आहेत [ संदर्भ :Global Multidimensional Poverty Index 202] भारताब द्द्ल जर खरी माहीती नसेल तर विचारा, इथे नक्कीच मिळेल. पण कॄपया चूकीची पसरऊ नका आणि तोपर्यत भारतीयांनी काय करायला हवे? हा आपला बहु मोल सल्ला आपल्या जवळच ठेवावा. भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि बारामती फवार जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे. तसेच आपण सोनिआ गांधी, बारामती फवार यांच्याप्र माणेच ट्रंप तात्यांच्या उत्पन्नाचे शोध घ्यावेत.

In reply to by अर्जुन

साहना 09/01/2023 - 09:48
पुन्हा तोच मुद्दा. आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. जर भारत सामर्थ्यशाली आणि श्रीमंत विश्वगुरू होता तर मग इतक्या दूरवरून बोटीने येऊन गरीब, असुंस्कृत आणि असामर्थ्यशाली इंग्रजांनी २०० वर्षे देशाला गुलाम विश्वगू कसे बरे बनवले ? उद्या आम्ही आणि तुम्ही मिळून अंबानी आणि अडाणीला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरेल का ? आणि हे मुद्दे मान्य केले तरी मागील ७० वर्षांतील भारताची अधोगती इंग्रजांवर लादली जाऊ शकत नाही. १९४८ साली भारत विश्वगुरू नसला तरी आशियागुरु होता, भरतीय लोकांच्या नेतृत्वाखाली काही दशकांतच भारत आशियागुरु वरून आशियागु वर जाऊन पोचला. हाच दरम्यान जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, चीन इत्यादी देश युद्धांत उध्वस्त होऊन सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत झाले. २०२२ भारतांत सर्वांत मोठे डेव्हलोपमेंट चे मुद्दे आहेत रस्ते जे छोट्या पावसांत वाहून जात नाहीत, पूल जे उद्धघाटनाच्या वेळीच पडत नाहीत, संडास, वेळेवर धावणाऱ्या (संथ गतीने का असेना) ट्रेन्स, प्राथमिक शाळेंत ऍडमिशन, हे बहुतेक विषय इतर जगाने १००-१५० वर्षे आधीच सोडवले होते. भारतीय समाज माणसात साधारण १९९० च्या दशकांत आला. ह्याला मुख्य कारण होते जागतिक बँकेने भारत सरकारची मग्रुरी तोडून त्यांना जबरदस्तीने आर्थिक सुधारणा करण्यास भाग पाडले. श्रेय नरसिम्ह राव किंवा मौन सिंग घेत असले तरी ह्याचे प्रमुख कारण जागतिक बँक आणि पाश्चात्य राष्ट्रे होती. ह्या सुधारणांना आता लोक चांगले म्हणत असले तरी त्या काळी संपूर्ण समाज "देश विकायला काढला आहे" असे म्हणून शिव्या देत होता. कारण समाज आणि त्याची मानसिकताच मुळांत मागासलेली होती. मोदी सरकार कडून रिफॉर्म्स ३.० ची अपेक्षा होती पण तिथे सुद्धा तीच मागासलेली विचारसरणी नडत आहे आणि कदाचित त्याच मुळे मोदी ह्यांनी आर्थिक सुधारणांचा नाद सोडून आपली सत्ता कशी मजबूत होत राहील ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ९० मधील सुधारणा झाल्या नसत्या तर भारताची स्थिती आणखीन खराब झाली असती.

In reply to by साहना

अर्जुन 09/01/2023 - 13:03
आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे. हे आकडे माझे नाही आहेत. हे आंतरराष्टीय आकडेवारीतून घेतले आहेत. आता ती आकडेवारी निरर्थक वाटत असेल तर तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. ईस्रो, रेल्वे , आय टी. मधे भारताने केलेली प्रगती व भारताच्या प्रगतीमधे पाश्चमाश्त देशांनी आणलेली विघ्न(उदा. क्रायोजेनिक ईंजिन मिळू न देणे, पाकिस्तानला शस्त्र देणे, शास्त्रन्यांचा हत्या, देशविरोधी आंदोलनाना आर्थिक व नैतिक पाठींबा ईत्यादी) दिसत नाहीत.

In reply to by अर्जुन

Trump 09/01/2023 - 13:35
श्री साहना यांनी अतिशय सरसटीकरण चालु केले आहे. :(
तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते.
बर्‍याच अंशी नक्कीच

In reply to by अर्जुन

तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. डिजीटायझेशन. भाजी विकणारा,गाडी धुणारा,पान विकणारा असे छोटे व्यवसायीक सुद्धा गुगल पे अथवा अन्य कॅशलेस ट्रॅजेक्शन करता आहेत. सारथी सारख्या संकेतस्थळावर जाऊन आर टी ओ ची कित्येक, किंबहुना सर्वच कामे दलाला शिवाय व भ्रष्टाचारा शिवाय करू शकतो. पत्ता. झोमॅटो,स्वीगी,आमेझाॅन सारख्या होम डिलीव्हरी देणाऱ्या, कमी शिक्षण घेतलेल्या मुलांना बरोबर घरचे पत्ते कसे सापडतात हो याचा कुणी विचार केलाय का! अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे देऊ शकतो. डिजीटायझेशन प्रगतीपथावर आहे, विकासातले अडथळे दुर होतायतं. समाज बदलतोय यात शंकाच नाही. कितीही प्रगतीपथावर समाज असला तरी तो परिपूर्ण कधीच होत नसतो. या देशात काय चांगले काय वाईट,काय कमी काय जास्त,काय चुक काय बरोबर याची माहीती इथल्या जनतेला आहे व त्यावर विचार करण्यास इथले लोक समर्थ आहेत. हे कसं, आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !

In reply to by कर्नलतपस्वी

साहना 10/01/2023 - 03:19
धाग्याचा मूळ विषय हा लोक देश का सोडून जात आहेत हा होता. त्यामुळे देशांतील कमतरता ह्या स्वाभाविक पणे चर्चिल्या जाणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर देश सोडून जाण्यांत भारतीय लोक नंबर एक आहेत. भारताचे जवळ जवळ १% लोक देशाच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा अत्यंत अवाढव्य आहे. त्याशिवाय देश सोडून जाणे हि गोष्ट फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही. बहुतेक श्रीमंत लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहेच (अंबानी परिवाराचा नातू अमेरिकेत जन्माला येऊन तिथला नागरिक झाला आहे) पण मध्यमवर्गीय आणि गरीब लोक सुद्धा विविध देशांत वेगाने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे देशांतील कमतरता हि छोटी नसून खूप मोठी आहे आहे संपूर्ण समाजाला भेडसावणारी आहे हे लक्षांत येते. कमतरता मान्य केल्याशिवाय त्यांत सुधारणा शक्य नाही. देशांत काहीच चांगल्या गोष्टी नाहीत असे म्हटले नाही. असतील, अनेक असतील पण त्या पुरेश्या नाहीत लोक लोकांचा जो लोंढा बाहेर जात आहे त्यावरून सिद्ध होते. अजून सुद्धा साधारण माध्यम उत्पन देशांचा राहणीमानाचा स्तर भारतीय राहणीमानाच्या स्तरापेक्षा चांगला आहे.

रानरेडा 07/01/2023 - 00:29
बाकी सर्वांचे जे ओळखीचे  लोक अमेरिकेत/  विदेशात जातात ते सर्व देशप्रेमी / सरळ साधे / गोड गोड / संसारी  सतत देशाच्या नावे उमाळे काढणारे कसे असतात? भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?   माझे कोण ना कोणी ओळखीचे  अमेरिकेत गेली 30-32 वर्षे जातोय  यातले काही थोडे जण अमेरिकन अय्याश झाले आहेत म्हंजे सुपर बाईक , बोटी , गाड्या , बंदूक , जुगार , गांजा ( मारणे आणि उगवणे), फिरणे, लिव्ह इन असले भारतात न परवडणारे किंवा मान्यता नसलेले छंद असलेले आहेत . बहुतेक मराठी आहेत खास करून सुपर बाईक / हाय परफॉर्मन्स गाड्या तिकडे थोड्या चांगल्या पगारात परवडतात. आणि त्या चालवायला चांगले रस्ते पण आहेत . डूकाटी  आणि हार्ले ठेवणारे लोक आहेत . मस्टँग अमेरिकेत किती ला आहे ? भारतात ती एखाद करोड ला होती  पिस्तूल / बंदूक भारतात छंद  म्हणून ठेवणे अशक्य आहे. आणि त्याचा दारुगोळा सहज मिळत नाही . भारतात  ३-४ गन  / पिस्तूल लायसन्स वर ठेवणे  अशक्य आहे . आणि त्याची किंमत पण फार होईल .  अमेरिकेत जॅक डॅनिअल किंवा जिम बीम ची बाटली किती ला मिळते ? तेथील पगाराच्या मानाने ? भारतात किती सहजपणे त्या लेव्हल ची बाटली परवडते ? नेहमी चांगल्या पब मध्ये जाणे कितीसे परवडते ? जुगार हा भारतात accepted छंद आहे का ? गांजा भारतात बंदी घातली आहे . अमेरिकेत काही स्टेट मध्ये कायदेशीर रित्या मर्यादेत गांजा उगवू हि शकतो . बाकी भारतात सामान्य executive  पगारात घड्याळे , लक्झरी  किती परवडते ? म्हणजे मी भारतात काय लाखांची घड्याळे असतात त्या बद्दल विचारतोय  बहुतेक सर्व व्यवस्थित पैसा कमावणारे बरेचसे संसारी , मुले बाळे असलेले आहेत,काहींनी मुले न होण्याचा कॉल घेतला आहे.   विदेशात व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे  आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात -  घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही  तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही. ओळखीच्या मुली घटस्फोट होऊन परत लग्न केलेल्या आहेत. एकीचे दोन होऊन, बराच काळ लिव्ह इन मध्ये राहून ती त्या बरोबर संसारात आहे - किती जणांसाठी हे सहज शक्य आहे ? याची पण तरुण पिढीला भुरळ पडत नसेल ?

In reply to by रानरेडा

साहना 07/01/2023 - 01:36
> भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ? भरपूर आहेत. ज्यांना छंदासाठी वेळ सुद्धा भारतात मिळाला नसता अश्या लोकांना इतर देशांत छंदासाठी वेळ मिळतो. बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. त्याशिवाय मी इथे शिकार आणि मासे पकडायला सुद्धा जाते. धनुष्यबाणाने नि बंदुकीने आम्ही इथे शिकार करू शकतो. पण ह्या शिवाय असंख्य छंद जोपासले जाऊ शकतात. वाईन टेस्टिंग हा एक छान छंद आहे $३ पासून $३००० पर्यंत च्या अनेक आंतराष्ट्रीय वाईन्स आपण इथे पिऊ शकतो. ज्यांना इतर दारूची आवड आहेत त्यांना सुद्धा हजारो प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इथे लोव किंवा होम डीपोट मध्ये प्रत्येक प्रकारचे घर निर्मितीचे सामान मिळते. त्यामुळे अनेक लोक लाकूड काम, लेसर कटिंग, इपॉक्सी , ३D प्रिंटिंग हे छंद जोपासतात. जगांतील कुठल्याही प्रकारची कुसिन्स इथे मिळतात. बलोच, चिनी उईघुर, नेपाळी, इथिओपियन इत्यादी देशांची रेस्टोरंटस मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला मिळतात. काही लोकांना भटकंती हवी असते. गाडीच्या फक्त एक टॅंक पेट्रोल वर तुम्ही खूप काही पाहू शकतात, ५० पेक्षा महा मोठे नॅशनल पार्क्स, लक्षावधी छोटे पार्क्स किमान अमेरिकेत उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारच्या संधी उपलबध आहेत. हे सर्व छंद इथे साध्या पगारावर सहज जोपासले जाऊ शकतात. तुम्हाला एखादा छंद असला कि ताबतोब तुम्ही समविचारी लोकांशी मैत्री सुद्धा करू शकता. त्यामुळे आपोआप आपले नेटवर्क सुद्धा बनते. ह्याच व्यक्ती देशांत असत्या तर संपूर्ण दिवस ट्राफिक मध्ये आणि सुट्ट्या नको त्या चिंता काढण्यात गेल्या असतंया. छंदाशी निगडित कुठलीही गोष्ट १००% टॅक्स भरल्याशिवाय मिळाली नसती.

रानरेडा 07/01/2023 - 13:53
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? असे होते का ? कि हे मूळ लेखकाचे तर्कट ? असे कितीसे लोक आहेत जे रिटायर झाल्यावर भारतात आलेत ? साधारण ६० -६५ वय पकडले तर ते लोक १९६३ - १९५८ साली जन्मले असतील . साधारण पंचविशीत १९८८ - १९८३ ला असतील त्या काळात कितीसे भारतीय विदेशात जात होते ? त्यातले किती परत आलेत ? का आलेत ? काही माहिती नसताना मूळ धागाकर्त्याने पुडी सोडली आहे असे मला वाटते

In reply to by रानरेडा

Trump 07/01/2023 - 14:04
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
ते जेव्हा भारतात येतात तेव्हा भरपुर पैसे घेउन येतात. शिवाय तिकडे कमवत असताना पैसे पाठवतात ते वरती दिलेलेच आहे.

In reply to by रानरेडा

Trump 07/01/2023 - 14:48
म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?
आखाती देशात गेलेले बहुतांशी सगळे परत आलेत. पाशात्य देशातील साधारतः २० टक्के लोक परत आलेत. (अनुभवावरुन, कृपया विदा मागु नये.)

In reply to by रानरेडा

असे म्हातारपणी परत येणारे लोक 5 टक्के तरी असतील का याबद्दल शंका आहे. यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही.

In reply to by रानरेडा

साहना 10/01/2023 - 03:25
माझ्या माहितीची एक श्रीमंत अमेरिकन व्यक्ती डिमेन्शिया झाल्याने भारतांत परत आली. दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक होती आणि त्यांनी वडिलांची जबाबदारी घ्यायची पूर्ण इच्छा दाखवली होती पण वडिलांचा इगो मोठा होता. त्यामुळे ते साधारण ५० वर्षे अमेरिकेत घालविल्या नंतर भारतांत परत आले. हल्लीच त्यांच्या बँकेने मुलांना पात्र पाठवले कि ह्यांचे चेक्स बाऊन्स होत आहेत, काही तरी करा. तेंव्हा मुलांनी बँक स्टेटमेंट पहिले तर बहुतेक पैसा गायब. तर काय स्थानिक काही संस्था आणि बँक मॅनेजर ह्यांनी साटेलोटे करून व्यक्तीच्या कमकुवत मनाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे विविध संघटनांना डोनेशन म्हणून उकळले.

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते? भारतातले राहणीमान दरिद्री आहे, भारतात दरिद्री लोक राहतात, भारतातल्या लोकांची लायकी नाही वगैरे विधानांबद्दल वाद होता. शिवाय आपण कुठे जन्माला आलो यावर आपले नियंत्रण नसते वगैरे विधानांमध्ये उगाचच अहंकाराचा दर्प दिसला. म्हणून माझा आक्षेप होता पण आता वरचे प्रतिसाद वाचल्यानंतर माझे काहीच म्हणणे नाही.

संपादित.  व्यक्तिगत टीका टाळावी.
-व्यवस्थापन

In reply to by अप्पा जोगळेकर

Trump 07/01/2023 - 16:54
आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत. अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?
अगदी बरोबर. पाशात्य लोक कितीही एकमेकांबरोबर भाडले तरी ते नेहमी अपाशात्याविरोधात एकमेकांना मदत करतात.

लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरमसाठ भरकटली आहे आणि काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी परत ट्रॅकवर आणू इच्छितो. या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे. १. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण बर्‍याच लोकांना हे काहीतर क्षुल्लक आणि फुटकळ फॅड वाटू शकते. परंतु हा प्रॉब्लेम भारताने सोडवल्यास तो हजारो/लाखो कोटी रुपये वाचवू शकतो. काही तज्ञांच्या मते हा प्रॉब्लेम बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा मोठा आहे. युरोपियनराष्ट्रांनी हा प्रश्न केव्हास धसास लावला आहे. आणि त्याचे फायदे प्रगत युरोपात प्रत्यक्ष राहिलेल्या लोकांना सहज लक्षात येऊ शकतील. कोणत्याही घराचा/वास्तूचा पत्ता हा तीन गोष्टींनी अचूक सांगता येतो. प्रशासनाच्या कोणत्याही पातळीवर हा पत्ता बदलत नाही. म्हणजे गावपातळीवर, जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर. १. रस्त्याचे नाव २. घराचा नंबर ३. पिन कोड भारतात पत्ता हा प्रकार केवळ मूर्खपणा आहे इतके आपण मागास आहोत. उदाहरणार्थ - मला जर एखाद्या कंपनीचा पत्ता सांगायचा असेल तर जवळच्या चौकाचे नाव, कॉलनीचे नाव, अमुक झाड, तमुक ओढा, पेट्रोलपंप, हागणदार्‍या मुतार्‍या, समोर, उभे, आडवे, सेक्टर, गल्ल्या, ब्लॉक, टेकड्या, चतुर्थीचा चंद्र अगदी वाट्टेल ते सांगावे किंवा लिहावे लागते. ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले. नाहीतर आपली मजाच होती. काही लोक महसूलविभागांचे सर्वे नंबर्स सुद्धा पत्त्यात टाकतात. शिवाय बेंगलोर मध्ये क्रॉस आणि लेन्स अस्तात, पुण्यात रोड आणि रस्ते नाहीतर संकल्पना असे लिहिलेले चु*या नगरसेवकांचे बोर्ड, रोज बदलणारी चौकांची नावे म्हणजे काहीही प्रमाणीकरण नाही. विशेषम्हणजे हे सिस्टीममध्ये मोजमापात नाही असे नाही. सर्वे नंबर, गावाच्या हद्दी, जमिनींचे प्रकार आणि झोन्स हे सगळे ठरलेले आणि व्यवस्थित रुजलेले आहे. महसूलीरचना मला वाटते राज्य आणि राष्ट्र या दोन्ही सूचींत येते. तरीही आपण याचा गांभीर्याने विचार करत नाही. आता प्रत्येक नगरपालिकांनी घरांना नंबर्स दिलेले आहेत, घरपट्टीचा नंबरही रंगवलेला असतो. तरीही आपल्याला ही व्यवस्था बसवता आली नाही हे आपले खूप मोठे अपयश आहे. याचे फायदे अनेक आणि काहीवेळा तर मुलभूत आहेत. उदा. युरोपियन राष्ट्रांत प्रत्येक घरकुलाला टीव्ही/रेडिओ टॅक्स द्यावा(च) लागतो. तो थोडा थोडका नसतो. काही राष्ट्रांत यातून फारशी सुटका नसते. घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, खाजगी खर्च, युटीलिटी, सगळे सगळे काही पत्त्याशी गुंतलेले असते. आप्ल्या आधारकार्डावर एक पत्ता, मतदानकार्डावर तिसराच, पॅनकार्डावर चौथाच, आणि बँकेत आठवाच असला गाढवपणा सर्रास दिसतो. यातून सार्वजनिक पैशाचा किती अपव्यय होतो हे कुणीतरी शोधायला पाहिजे. (सर्व आजीमाजी नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, 'इथे हे या चु*याचे घर आहे' असे सार्वजनिक पैशातून चांगले लोखंडी बोर्डस लावलेले आहेत. प्रत्येक सरकारी गोष्टीच्या नावाखाली 'संकल्पना - अमुक चु*या' असे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या पैशातून लिहिले जाते. याचा हिशोब काढला तर तोच कोट्यवधी रुपयांचा असेल. याचा फायदा शून्य.) असो. २. फ्लेक्सबंदी - भारतातून सक्तीची फ्लेक्सबंदी करायला हवी. कुठल्याही संस्थेला यातून मिळणार्‍या उत्त्पन्नाची गरज नाहीए. त्याऐवजी उत्पन्नाचे दुसरे चांगले मार्ग शोधावेत. बिलबोर्डासाठी मोठ्या रस्त्यांशिवाय कुठेही परवानगी मिळायला नको. ३. भाषाविषयक धोरणे - भारताने त्रिभाषा सूत्र नावाचा जो अडाणीपणा चालवला आहे तो ताबडतोब बंद करायला हवा. राज्यभाषा आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा. इतर राज्यभाषा, परदेशी भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असायला पाहिजेत. ज्या राज्यांची राज्यभाषा प्रमाण हिंदी असेल ते शिकवतील हिंदी तिथल्या मुलांना. बाकीच्या मुलांना, त्यांच्या पालकांना इच्छा असेल तर हिंदी/इंडोनेशियन/थाई ऐच्छिक म्हणून शिकतील. शिवाय आजकाल बोलीभाषांना एक उगीचच अवास्तव महत्त्व आले आहे त्याचे कौतुक तेवढ्यापुरते तेव्हढे ठेवावे. राज्यभाषांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे. मुलांवर भाषांचा मारा जितका कमी करता येईल तितका तो केला पाहिजे. प्रत्येक महत्वाचा सरकारी कागद उदा. जन्म दाखला हे कमीतकमी दोन भाषांत (राज्यभाषा आणि इंग्रजी) दिला गेलाच पाहिजे. भाषाशिक्षणाचे प्रमाणीकरण केले पाहिजे. ४. कागदपत्रांचे प्रमाणीकरण - वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांचे देशपातळीवर प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. जन्मदाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, लग्नाची नोंद, प्रॉपर्टीची कागदपत्रे इत्यादी इत्यादी.. आधी प्रमाणीकरण, मग आपसूक येते ते डिजीट्लीकरण.. ती कमीतकमी दोन भाषांमध्ये एकाचवेळी देणे बंधनकारक केले पाहिजे. ५. भारतीय पर्यटनस्थळे : भारत पर्यटनात खूप मोठी मजल मारू शकतो आणि भरपूर कमवूदेखील शकतो. काही पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची असावित. म्हणजे तिथली पायाभूत सुविधांची कलाकुसर, सोयी, ट्रान्स्पोर्ट हे परदेशी नागरिकांना मानवेल असे ठेवावे. उदा. अजिंठा वेरुळ लेणी, बदामीचा परिसर. काही पर्यटनस्थळे ही देशी-परदेशी दोन्ही लोकांच्या दृष्टीने विकसित करावीत. उदा. रायगड. दुसर्‍या प्रकारची भारतीय पर्यटनस्थळे भारतीय पुरातत्व विभाग नावाच्या तुरुंगातून ताबडतोब मोकळी करून राज्यांना विकसित करायला द्यायला हवीत. तिथे नाममात्र फी न ठेवता भरपूर फी ठेवावी. उदा. बदामी लेणी आणि किल्यांसाठी किमान ५०० रुपये आणि १० डॉलर्स प्रतिमाणशी इतका तरी दर पाहिजे. पन्नास भंगार लोक तिथे जाण्याऐवजी दहा शहाणी माणसे पैसे मोजून जातील. सर्वसामान्यांना परवडत नाही वगैरे गळे काढू नयेत. सर्वसामान्य माणूस खंडोबाला जाऊन हजारेक रुपये सहज उधळून येतो. ६. आधार सगळीकडे - सर्व ठिकाणी आधार सक्तीचे करावे. लग्नाच्या नोंदी, कुटुंबाच्या नोंदी, इत्यादी इत्यादी सगळीकडे. सरकारने कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाला न जुमानता आधार लिंकिंग राबवले पाहिजे. स्वस्त धान्य वगैरे आधार शिवाय अजिबात मिळाले नाही पाहिजे. त्यासाठी दर किमान ५००० लोकसंख्येमागे एक या हिशोबाने सरकारी आधार केंद्रे सुरु करायला पाहिजेत. मतदान, बँक, इतर सरकारी आस्थापने, दवाखाने इथे सगळीकडे आधार सक्तीचेच पाहिजे. भ्रष्टाचाराची खूप मोठी कुरणे आधारसक्तीने बंद होतील. ७. महत्त्वाच्या संस्थांचे 'आयआय'करण/ नवीन क्षेत्रांमध्ये अशा संस्था स्थापणे - सरकारने काही महत्त्वाच्या संस्थांना 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स' चा दर्जा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तर अशा दर्जाची संस्था हवी आहे. काही उत्तम संस्थांचे सरकारने आय. आय. करण करून त्यांचा दर्जा किमान एखाद्या आयायटी इतका केला पाहिजे. शिवाय त्यांची स्वायत्तता अबाधित ठेवून किमान दर्जा राखण्यासाठी काहीतरी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवून दिला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये सरकारने अशा संस्था काढून भरपूर आर्थिक अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. उदा. प्रत्येक राज्यात एकतरी एफटीआयआय च्या दर्जाची संस्था हवी. प्रत्येक दहा जिल्ह्यांमागे एक आय आय टी, प्रत्येक जिल्ह्यात एक एन आय टी, प्रत्येक राज्यात किमान तीन स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सारखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अशा प्रकारची काहीतरी योजना करावी. मला खालील प्रकारच्या संस्था/संस्थांचे प्रमाणीकरण पाहायला खूप म्हणजे खूप आवडेल - १. इंडियन इन्टिट्यूट्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस/म्युझिक/फिल्म/मेडिया २. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लॉ ३. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिसिन ४. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉमर्स/इकॉनॉमिक्स/ट्रेड ५. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ फॅशन ६. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्सेस/हुमॅनिटिज ७. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर ८. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लँग्वेजेस/आर्ट्स/लिटरेचर ९. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्पोर्ट्स १०. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ पॉलिसी/गव्हर्नन्स ११. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ डिफेन्स १२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ बेसिक अँड नॅचरल सायन्सेस इत्यादी इत्यादी व इतर विवक्षित संस्था उदा. बँकिंग व इन्शुरन्स ८. रेल्वे सामायिक सूचीत - रेल्वे ही केंद्रीय सूचीतून काढून ती सामायिक करावी. प्रत्येक राज्याला रेल्वेमार्ग बांधण्याचा, रेल्वेसेवा चालवण्याचा पुरेपूर हक्क पाहिजे. १०. पब्लिक हेल्थ इन्शुरन्स - ना नफा ना तोटा तत्वावर एल आय सी सारख्या पब्लिक हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या सरकारने काढाव्यात. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा केला पाहिजे. तो सावर्जनिक असो वा खाजगी. कदाचित हे अवघड जाईल सुरुवातीला, पण या अंगाने कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ११. धार्मिक स्थळांवर कर - सगळ्या सार्वजनिक आणि खाजगी धार्मिक स्थळांवर वेगळी कर आकारणी झाली पाहिजे. ट्रस्ट शिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाला मंजूरी मिळाली नाही पाहिजे. प्रत्येक ट्रस्टचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक केले पाहिजे. मग ते मंदीर असो, नाहीतर गुरुद्वारा, नाहीतर एखादा मठ, नाहीतर चर्च असो वा मशीद/मदरसा.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 08/01/2023 - 07:08
नेहमीप्रमाणे मुद्देसूद प्रतिसाद आणि मांडणी. धन्यवाद. एक बारीकसे मत.
ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले.
काहीशी असहमती. पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत (सहा आकडी पिन कोड नव्हे)

In reply to by गवि

पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत
संदर्भ...? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/01/2023 - 12:49
तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे.. घ्या https://en.m.wikipedia.org/wiki/Postal_Index_Number The PIN system was introduced on 15 August 1972 by Shriram Bhikaji Velankar, an additional secretary in the Government of India's Ministry of Communications.

In reply to by गवि

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..
तसदीबद्दल क्षमस्व सर. आणि माहितीबद्दल आभारी आहे. आपलं मत गुगलल्याशिवाय मान्य करणार होतो. पण, दोन हजार चौदापासून 'विश्वासराव' खपले आहेत. पडताळणी करायची आणि मग मान्य करायचं. असं धोरण आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

mayu4u 13/01/2023 - 16:03
प्रा डॉ असण्याविषयी विश्वास्राव काय म्हणतात?

In reply to by साहना

सर टोबी 08/01/2023 - 12:17
हा मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच आहे. तसेच थेट लाभार्थ बँकेत जमा होण्याची सुविधा यांचेदेखील श्रेय मनमोहन सरकारला आहे. माझ्या मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरापेक्षा ज्याचे श्रेय त्याला मिळावे या आग्रहाखातर हा प्रतिसाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खरंय. माझ्या प्रत्येक कागदावर पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आधार, वाहन परवाना, बँक खाते१, बँक खाते२ प्रत्येक ठिकाणी एकच पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. + डिलीव्हरीसाठी कितीही व्यवस्थित पत्ता लिहिला, तरी प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं. शेवटी तो चुकीच्या जागी पोचतो, मग तिथे जाऊन घ्यावं लागतं. याचा उपमुद्दा - पत्ता बदलल्यास तो एका कागदावर (उदा. आधार) बदलल्यास सगळीकडे आपोआप जायला हवा. आधारवर बदला, मग निवडणूक पत्र बदला, मग दोन तीन बँकांत आणि इतर दोन खात्यात बदला, मग गॅस कंपनीत बदला.

In reply to by तुषार काळभोर

साहना 09/01/2023 - 11:30
मी IIT मुंबईत होते तेंव्हा कुणालाही पत्ता द्यायचा म्हणजे दिव्य होते. अगदी फ्लिपकार्ट सुद्दा "लँडमार्क" सांगा म्हणायचे. वोडाफोन ने "लँडमार्क" नाही म्हणून दोन वेळा माझे पोस्टपेड कनेक्शन कापले. मग कुणीतरी लँडमार्क मध्ये JVLR असे लिहा असे सांगितले. (IIT बाहेरच्या रोड चे नाव आदी शंकराचार्य मार्ग आहे पण बहुतेक लोकांना ह्याची माहिती अजिबात नाही), JVLR ह्या चा अर्थ मला आजतागायत ठाऊक नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे अरे देवा, वरील काही ओळी वाचून हर्ट झालो. बाकी विचार मुद्दे महत्वाचे आहेत. सहमती आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Trump 08/01/2023 - 13:17
धन्यवाद.
१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण
घरात राहणार्‍या लोकांना ज्या ठिकाणी राहतो त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्याची सक्ती असावी. सध्या कोण कोठे रहातो त्याची पडताळणी कशी करावी ह्यासाठी कंपनीचे पत्र पासुन आधार कार्ड काहीही चालते. खोटा पत्ता देणे सहज शक्य आहे, त्यामुळे दिलेल्या पत्यावर विश्वास ठेवणे मुश्कील आहे. अजुन काही माझ्यातर्फे
  1. कंत्राट, दायित्व (liability): जेव्हा कोणी व्यवसायिक सल्ला देतो तेव्हा त्या व्यवसायिकाला सल्ल्याचे दायित्व असावे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
  2. सरकारी कामे वेळेत व्हावीत, दिलेल्या अर्जाची पोच मिळावी, कायदे सर्वासाठी समान असावेत. लाचखोरी बंद व्हावी. सर्वसामान्य माणासांना त्याबद्दल तक्रार करायची सोय असावी, आणि त्यांचे निवारण व्हावे.
  3. छोट्या छोट्या कंत्राटांसाठी महसुल खात्याच्या मुंद्राकाची गरज नसावी.
  4. कोणाला दिलेले पैसे सहज वसुल करता यावेत. छोट्या छोट्या कामासाठी वकील, न्यायालयाची गरज नसावी.
  5. मुलांना लहान पणापासुन शिस्त पालन महत्व असावे.
  6. छोटे कायदेभंग करणार्‍या आणि अट्टल न झालेल्या लोकासाठी आर्थिक दंडाबरोबर, सक्तीची समाजसेवा (उ. मंदीरापुढे चपला साफ करणे, संडास साफ करणे, रस्ते साफ करणे इ.) असावी.
  7. मोठे तुरुंग बांधावेत. बरेचदा रस्त्यावर मुले, माणसे कायद्याचे पालन करत नाहीत. जेव्हा त्यांना योग्य त्या संधी देऊन त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना तुरुंगात ठेवावे. त्यांच्या कडुन शारिरीक श्रम करुन ठेऊन रस्ते तयार करणे, तलाव बांधणे अशी समाजउपयोगी कामे करुन घ्यावीत (मला माहिती आहे की हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो.)
  8. समाज, छपाई, दुरचित्रवाणी माध्यमावर दायित्व कायदा असावा. विनाकारण चरित्रहनन करणार्‍याविरोधात कडक कायदे असावेत.
  9. कोणत्याही कामासाठी राज्याच्या राजधानीत जायची गरज पडु नये, कामे तालुक्यात, कमीत कमी जिल्ह्यातच व्हावीत.
  10. ग्रामिण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारावे. काच, धातु, प्लॅस्टीक, ओला कचरा, इतर कचरा वेगवेगळा व्हावा.
  11. ध्वनीप्रदुषण थांबावे. धर्म, जात, पंथ, जयंत्या, पुण्यतिथ्या इ. खाजगी गोष्टी व्हाव्यात. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते अडवणुक बंद व्हावी
  12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
  13. बास आता. :)

In reply to by Trump

Trump 21/01/2023 - 00:28
भारतातील प्रदुषणाबद्दल अजुन कोणी लिहीले नाही. -उत्तर भारतातील बहुतेक भुभागावर आणि इतर भारतातील मोठ्या शहरामध्ये वायुप्रदुषण भयंकर आहे.

In reply to by Trump

Trump 25/01/2023 - 00:08
ऑस्टेलियात पंतप्रधानाला घरच्या हिरवळीवरुन बाजुला जायला सांगितले. असे कधी भारतात दिसु शकेल का? साधा नगरसेवक झाला की लोकांना इतका रुबाब वाटतो की बघायला नको. तसेही भारतातील मंत्री, अधिकारी जनतेचे सेवक कमी आणि मालक जास्तच वाटतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टीपीके 14/01/2023 - 11:19
पत्त्यासंबंधी थोडी जाहिरात धागा. आता तर हे पद्धत वापरणे खूप सोपे झाले आहे. गुगल मॅप वर पण प्लस कोड दिसतो

Trump 08/01/2023 - 12:28
सर्वसामान्य लोकांना अजुन एक भेडसवणारी अडचण -- रस्तोरस्ती असलेले भटकी कुत्री, गुरे, पक्षी इत्यादी. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

साहना 09/01/2023 - 11:22
देशांतील लोकांवर प्रेम नसते तर विषयावर लिहून मी वेळ वाया घालविला नसता. मी भारत देशाला घाणेरडा, भिकार आणि मागासलेला असे जे म्हटले आहे ते देशाचा किंवा तेथील लोकांचा अपमान करायच्या हेतून म्हटले नाही. फक्त वस्तुस्थिती विशद केली आहे. लठ्ठ महिलेला तुम्ही सडपातळ म्हटले म्हणून तिचे ४ पौंड वजन कमी होत नाही. देशांत कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे ह्यांत अजिबात शंका नाही आणि त्याला जोड म्हणजे लोकांत स्वच्छते विषयी नसलेले प्रेम. सर्व भारतीय सार्वजनिक ठिकाणे अत्यंत घाण आहेत ह्यांत शंका नाही. विविध समुद्र किनारे, चित्रपट गृहे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी कचरा आहेच पण गांवात सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो, ऐपत असलेले लोक सुद्धा मुद्दाम उघड्यावर शौच करतात आणि सर्व ठिकाणी पण खाऊन थुंकून ठेवतात. देशावर प्रचंड प्रेम असलेला माणूस सुद्धा ह्या गोष्ट नाकारू शकत नाही. ह्याला घाणेरडा म्हटले तर त्यांत चुकले काय ? भिकार शब्द प्रयोग सुद्धा वस्तुस्थिती विशद करण्यासाठीच वापरला आहे. देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते. हि भीक नाही तर काय आहे ? आणि मागासलेला हे विशेषण तर जवळजवळ ऑफिशिअल आहे. ह्यासाठी वेगळे पुरावे देण्याची सुद्धा गरज नाही. विकसित देशांत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या इथे आम्हाला धडपडून सुद्धा मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मूळ मुद्दा म्हणजे जो पर्यंत देशांत काय कमी आहे ह्या गोष्टी लोक प्रांजळ पणे मान्य करत नाहीत तो पर्यंत त्यांत सुधारणा होणे शक्य नाही. मोदी ह्यांनी संडास ह्या विषयवार इतकी भाषणे दिली कि त्याच्यावर टीका झाली होती कि पंतप्रधानांनी अश्या विषयवार बोलणे योग्य आहे का ? पण ते बोलले म्हणून थोडाफार तरी बदल आला कि नाही ? स्वच्छ भारत स्कीम बहुतांशी फोटो=ओप म्हणू न वापरली गेली तरी थोडा बदल तरी समाजांत दिसून येतो कि नाही ?

In reply to by साहना

टर्मीनेटर 09/01/2023 - 11:38
देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते.
कुठ्ल्या काळातले सांगताय तुम्ही? आज भारतातली १००% जनता GST च्या रुपाने कर भरत आहे. ह्याला रस्त्यावरचा भिकारीही अपवाद नाहीये! हा पण सर्वसामान्य जनतेकडुन गोळा होणारा कराचा पैसा जेव्हा सरकार नको त्या ठिकाणी खर्च करते ते मात्र नक्कीच खटकते, जसे कि युक्रेन युद्धामुळे तिथे स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना फुकटात देशात परत आणणे वगैरे वगैरे...

श्वेता२४ 09/01/2023 - 16:58
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत. याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो? गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.

In reply to by श्वेता२४

चौकस२१२ 10/01/2023 - 09:39
तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे वाट्टेल ते ??? हा तुमचा ( कदाचित भारतातील रहिवासी आणि तेथील या संदर्भात ) विचार पाश्चिमात्य देशात बरीच कामे हलकी समजली जात नाहीत ... त्यामुळे वाट्टेल ते वैगरे फक्त तुमच्या पुरते उलट मी अ रे म्हणेन कि भारतातात हि "वाट्टेल ती कामे " लोक करायला लागली तर बरेच, विशेष करून विद्यार्थी असताना कमवणे / बचत करणे ,,, इत्यादी असो मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे हो करू शकतात ना नाही कोण म्हणतंय ? पण "चांगलं" म्हणजे नक्की काय .. कार्यालयात भारतात काय आणि पाश्चिमात्य देशात काय संख्याच दर्जाचे काम कराल हो पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मग हे तत्व वापरलं तर शहरातून खेड्यातच राह्यला पाहिजे ! जमेल ???

In reply to by चौकस२१२

सुक्या 10/01/2023 - 23:32
पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"? मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते. माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?

मुळात भारताची तुलना लगेच अमेरिकेशी किंवा युरोपियन राष्ट्रांशी करणे चुकीचे आहे. हा आपले ध्येय मात्र त्यांच्यासारखे पुढारलेले बनणे असले पाहिजे. फार फारतर आपण दहा वर्षां पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्यांची तुलना करायला पाहिजे.खरतरं एखाद्या देशासाठी १० वर्षं हा काळ सुद्धा अतिशय कमी आहे. पण एका दशकात आपली दिशातरी योग्य आहे का याचे निपक्ष विश्लेषण तज्ज्ञांकडून व्हायला पाहिजे.

तर्कवादी 10/01/2023 - 00:27
ज्याप्रमाणे भारतीय लोक भारताबाहेर दीर्घ मुदतीच्या वास्तव्यास सर्रास जातात तसे भारतात दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यास लोक येत असतील का ? असल्यास कोणत्या देशातून (नेपाळ व बांग्लादेशातून येतात, पण त्या खेरीज ) ? त्यांचे भारतात स्थायिक होण्याचे कारण / प्रेरणा काय असाव्यात ?

In reply to by तर्कवादी

साहना 10/01/2023 - 02:46
बांगलादेशी, नेपाळ, भूतान, श्री लंका, नायजेरिया काही अरब राष्ट्रे इत्यादी देशांतून लोक कायदेशीर किंवा बेकायदेशीर पणे भारतांत वास्तव्य करतात. अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत. स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम हि तीन राष्ट्रे सध्या पाश्चात्य देशांत देश सोडून जाण्यासाठी महत्वाची आहेत. व्हिएतनाम मध्ये तुम्हाला खूप कमी पैश्यांच्या गेटेड अमेरिकन कम्युनिटी मिळते. पोर्तुगाल अँड स्पेन चे हवामान खूप चांगले आहे आणि राहणीमान उच्च असल्याने अनेक लोक तिथे निवृत्त होऊन जातात.

In reply to by साहना

श्रीगुरुजी 10/01/2023 - 08:22
नायजेरियन, अफगाणी, बांगडे, पाकडे वास्तव्य संपल्यानंतरही परत जात नाहीत व भारत सरकार काहीही करत नाही. अनेक नायजेरियन, अफगाणी अंमली पदार्थ विकतात. वास्तव्य किंवा अंमली पदार्थ व्यापारावरून त्यांना पोलिस पकडायला गेले की ते झुंडीने हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात. २०१० च्या दशकात अदनान सामीने बराच आयकर भरला नव्हता व वास्तव्य परवाना संपल्यानंतरही आरामात मुंबईत रहात होता. इतर देशात अश्या व्यक्तीला तुरुंगात टाकून नंतर हाकलून दिले असते व नंतर भारताबाहेर हाकलून परत कधीही भारतात येण्यासाठी आयुष्यभराची बंदी घातली असती. परंतु भारत सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तश्या परिस्थितीतही त्याच्या वास्तव्य परवान्याची मुदत वाढवून दिली व नंतर या गुन्हेगाराला काहीही शिक्षा न करता चक्क नागरिकत्व देऊन टाकले. Nigerian mob attack cops बनाना रिपब्लिक ही संज्ञा भारतावरूनच निर्माण झाली असावी.

In reply to by श्रीगुरुजी

सुरिया 10/01/2023 - 13:54
चक्क नागरिकत्व
नुसते नागरिकत्व नाही. २०१६ ला त्याला नागरिकत्व दिले गेले आणि २०२० ला तर चक्क पदमश्री बहाल करण्यात आली. हे खरे बनाना(और लोगोंको बनाना भी) रिपब्लिक. त्याचे वडील अर्शद सामीखान जे मुळचे काश्मीरी आणि पख्तू सांगतात ते पाकिस्तानी एअरफोर्समध्ये पायलट आणि नंतर राजदूत वगौइरे असले तरी अदनान चा जन्म, शिक्शण ब्रिटिश होते. नंतर तो कॅनडा स्थायीक होता.

In reply to by सुरिया

श्रीगुरुजी 10/01/2023 - 14:13
भारत २०१४ पूर्वी बनाना रिपब्लिक होता व २०१४ नंतरही बऱ्याच प्रमाणात तसाच आहे. मुख्य फरक पडलाय तो परराष्ट्र संबंध आणि लष्करी प्रतिसादात. पाकिस्तान किंवा चीनने आगळीक केली तर भारत फक्त तोंडी निषेध करायचा. आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. तसेच मलेशिया, टर्की वगैरेंनी भारताविरुद्ध काहीही केले तरी भारत लगेच त्यांच्या नाड्या आवळतो. परंतु इतर विषयात अजूनही सुधारणा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शाम भागवत 15/01/2023 - 10:52
२०१४ नंतर आणखी एक फरक पडलाय. २०१४ पूर्वी कल्याणकारी योजनांवर सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातील फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहचायचे. २०१४ नंतर लाभार्थींपर्यंत जास्त पैसे पोहोचायला लागले आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे मी भारताच्या भविष्याबाबत आशावादी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 24/01/2023 - 04:34
> आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. हे सुद्धा फक्त प्रसिद्धी मिळवण्याची थोतांड असू शकते. लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. भारताने कतार पुढे जे लोटांगण घातले आणि एका तथाकथित गुअस्वलाने हिंदू महिला नुपूर शर्मा हिचे आयुष्य सरेआम उध्वस्त केले त्यावरून परराष्ट्र धोरण ह्यांत सुद्धा बोलबच्चन पणा जास्त आहे असे वाटते. सत्य कळायला अजून अवकाश आहे.

In reply to by साहना

अर्जुन 25/01/2023 - 12:47
लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. तुमचा भारतातील लष्करा वर विश्वास नसेल आणि परराष्ट्र धोरणा विषयी संशय वाटत असेल तर तूम्ही भारत आणि भारतीयांना दोष देण्यासाठीच मिपावर येता असे वाटते. क्रुपया आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यात [नावे ठेवण्या त ] आपण आपला[व आमचा] बहूमुल्य वेळ वाया घालवू नये ही मनापासुन विनंती.

In reply to by साहना

तर्कवादी 10/01/2023 - 16:02
अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.
धन्यवाद. पण नोकरी/व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशी नागरिक भारतात किती प्रमाणात वास्तव्यास असतील ? जसे अमेरिकेतील गुगल, मायक्रोसॉफ्ट , नासा ई मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वा इतर देशांतले परदेशी (अमेरिकन नसलेले) नागरिक नोकरीस आहेत त्याप्रमाणे भारतात अशी कुठली आस्थापने आहेत का जिथे परदेशी लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत ? भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ? म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?

In reply to by तर्कवादी

Trump 10/01/2023 - 16:35
भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?
शिक्षणव्यवस्थेपेक्षा यशस्वी व्हायला कायदे व्यवस्था सक्षम लागते. उदा. कोणत्याही गोष्टीसाठी अनुत्पादक वेळ/खर्च आणि उत्पादक खर्च्/वेळ अश्या दोन गोष्टी लागतात. अनुत्पादक वेळ/खर्च वाढल्याने उत्पादन वाढत नाही, पण तो न केल्यास उत्पादन करतायेत नाही, उदा. सरकारी परवानग्या, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, मालवाहतुकीला केलेला खर्च, व्याजाचा दर, कर्जाची सहज उपलब्धता, मनुष्यबळ, निकोप स्पर्धा इ.इ. भारतामध्ये ह्या कामाचा खर्च खुप आहे. शिक्षण घेताना ह्या गोष्टी फार आड येत नाहीत, आणि भारतातुन परदेशात गेलेल्या लोकांना कष्ट करण्याशिवाय कोणताय पर्याय नसतो, आणि परत जाउन भारतात करायचे काय हा प्रश्न असतो.

In reply to by तर्कवादी

साहना 11/01/2023 - 12:36
ह्याचे उत्तर जास्त खोलांत जाऊन द्यावे लागेल पण सध्या थोडक्यांत सांगते. लोकांचे यशस्वी होणे शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. इतरांनी नोंद केल्या प्रमाणे कायद्याचे राज्य, योग्य प्रकारे काम करणारी कोर्ट व्यवस्था, सुधृढ फायनान्स व्यवस्था, आपल्या मालमत्तेचे रक्षण व्यवस्थित होणे, सरकार दरबारी कामे व्यवस्थित आणि वेळेत होणे इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागासलेल्या देशांत ह्या मूलभूत कमतरता असल्याने सर्वच लोकांना संधी कमी उपलब्ध असतात. शिक्षण (आणि व्यवसाय अनुभव, स्किल इत्यादी) एखाद्या multiplier प्रमाणे काम करतात. आता एखादी मुलगी समाजा काहीही ट्रेनिंग नसतात भारतात सलून मध्ये थ्रेडींग चे काम करते तर कदाचित ती महिन्याला ५००० कमावते तीच मुलगी प्रगत देशांत घेतल्यास साधारण $३००० डॉलर्स कमावेल. त्याच मुलीने समजा ब्युटिशियन कोर्स वगैरे केला तर भारतातील सलून मध्ये ती २०,००० कमावेल तर इतर देशांत कदाचित $५०००. भारत देशांत राहून जर पत उंचावण्याची असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण उच्च शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही विदेशांत जाऊन जास्त कमावू शकता (शिक्षण नसले तरी). हे वाचा https://deeshaa.org/2016/04/05/a-misplaced-sense-of-pride/

In reply to by तर्कवादी

साहना 11/01/2023 - 12:48
> म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ? पाश्चात्य जगाची प्रमुख समस्या म्हणजे एकूण सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अमेरिकेत सध्या दर वर्षी १० - २५ लाख लोक कायदेशीर मार्गाने येतात तर १०-३० लाख लोक बेकायदेशीर मार्गाने येतात आणि इतके असून सुद्धा देशांत प्रचंड प्रमाणात नोकर्या खाली आहेत. कानडा, फ्रांस आणि जर्मनी ह्यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. कॅनडा ने तर मागील वर्षी रिकॉर्ड नंबरच्या विदेशी लोकांना आपले नागरिकत्व दिले. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेने कितीही सुशिक्षित लोक निर्माण केले तरी अर्थव्यवस्था वाढून त्या सर्व लोकांना कवेंत घेते. ह्यांत आश्चर्य नाही आणि ह्या विषयावर मी मिसळ पाव वर खूप विस्ताराने लिहिले होते असे आठवते. लोक आणि अर्थव्यवस्था ह्यांचे फीडबॅक लूप असते. जगांत जितके जास्त लोक तितक्याच वेगाने समाज प्रगती करतो आणि जितक्या वेगाने समाज प्रगती करतो तितक्याच वेगाने आणखीन लोकांची गरज भासू लागते. पण त्या लेव्हल ला पोचायला समाजाच्या काही मूलभूत समस्या सोडवाव्या लागतात. भारत अजून त्या स्तराला पोचला नाही. पण काही क्षेत्रांत उदाहरणार्थ IT मध्ये हा इफेक्त्त तुम्ही पाहू शकता.

वामन देशमुख 10/01/2023 - 07:18
एखादे मूल अमेरिकन भूमीवर जन्माला आले तर त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते का? म्हणजे, एक भारतीय गरोदर स्त्री आठव्या महिन्यात अमेरिकेला गेली आणि तिथे महिना-दोन महिने राहून तिने आपल्या बाळाला जन्म दिला तर त्या नवजात अर्भकाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते का?

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी 10/01/2023 - 08:07
हो. पण भारताबाहेर गर्भधारणा झाल्याने व ती महिला अमेरिकन नागरिक नसल्याने विमा कंपन्या बाळंतपणाचा, औषधांचा, उपचारांचा, बाळंतपणानंतर लागणाऱ्या उपचार व औषधांचा खर्च देणार नाही. तो संपूर्ण खर्च स्वतःलाच करावा लागेल व तो खर्च प्रचंड असेल.

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 11/01/2023 - 00:30
श्रीगुरुजी - विमा कंपन्यांनी कव्हर करण्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. व्हिसावर आले असतील आणि अशा स्त्रीचा किंवा तिच्या नवर्‍याच्या नोकरीतून विमा असेल (सहसा असतोच) तर त्यातून कव्हरेज मिळेल. एखादी स्त्री फिरायला म्हणून आली, विमा नाही आणि परतही गेली नाही तर तुम्ही म्हणता तसे स्वखर्चाने करावे लागेल. पण त्यातही "ड्यू" असलेल्या स्त्रीला कोणी इमरजन्सी सर्व्हिस नाकारेल असे वाटत नाही. एरव्ही रीतसर डिलीव्हरीकरता कोणत्या रूग्णालयात नाव नोंदवायला गेली तर तेथे हा खर्च कोण करणार हे नक्की विचारतील. त्याशिवाय बहुधा नोंद करू देणार नाही. इमर्जन्सी वगळता.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 11/01/2023 - 04:04
हे विमा करारावर अवलंबून आहे. बर्थ पर्यटन हि एक गोष्ट असून साधारण १५,००० मध्ये C सेक्शन करून दिले जाते.

In reply to by वामन देशमुख

सुक्या 10/01/2023 - 08:09
कायदेशीर किचकट कीती आहे ते माहीत नाही. परंतु अमेरिकन भुमी वर जन्म झाला तर आपोआप नागरीकत्व भेटते.

In reply to by वामन देशमुख

गवि 10/01/2023 - 09:04
अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन पासपोर्ट बनतो. पूर्ण नागरिकत्व. इतकेच नव्हे तर नाममात्र तिकडे जन्म झालेल्या आणि लहानपणापासून भारतात परत येऊन इथेच वाढलेल्या लोकांना मोठे झाल्यावरही अमेरिकन एम्बसीचे फोन येताना पाहिले आहेत. म्हणजे भारतात काहीतरी unrest किंवा तंग परिस्थिती झाली होती, तेव्हा तुम्ही ताबडतोब सुखरूप अमेरिकेत परत या,. आणि अमेरिकन नागरिकांसाठी खबरदारीच्या गाईडलाईन्स वगैरे. माझ्या मते १८ वर्षे वय झाल्यावर मनुष्य याबाबत फायनल ठरवू शकतो. पण कोणीही ते नागरिकत्व रद्द केल्याचे ऐकिवात नाही, अपेक्षित देखील नाही.

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 10/01/2023 - 10:09
पूर्वीच्या अनुभवांवरून त्यासंदर्भातले बरेच नियम आता बदलण्यात आल्याचे मागे वाचले होते. गरोदर स्त्रीचा गर्भधारणाकाळ आणि अंदाजित प्रसूतीची वेळ (EDD) विषयक प्रसूतीतज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र व्हिसा आणि विमानप्रवास अशा दोन्ही गोष्टींसाठी अनिवार्य आहे (त्या आधारे व्हिसा आणि विमानप्रवास पैकि एक किंवा दोन्ही नाकरले जाउ शकते) तसेच आणखिनही काही तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

In reply to by टर्मीनेटर

साहना 11/01/2023 - 12:41
> मुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. किमान अमेरिकेच्या बाबतीत हे पूर्णतः खोटे आहे असे सांगू शकते. birth सिटिझनशिप हा अमेरिकेत घटनात्मक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट्स च्याखूप जुन्या निवाड्याप्रमाणे आई देशांत कशी आली ह्यावर अवलंबून नाही. माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही विजा किंवा विमान तिकीटा साठी आपण गरोदर आहोत किंवा नाहीत हे सांगण्याची गरज नाही. विमान कंपन्या बहुतेक करून ८+ महिन्याच्या गरोदर स्त्रियांना विमानांत प्रवेश देत नाहीत पण ते सुद्धा स्टाफ वर अवलंबून आहे. कॅनडा मध्ये तर भारतीय विद्यार्थी मुलींना गरोदर असल्यास भत्ता सुद्धा मिळतो त्यामुळे अनेक पंजाबी मुली गरोदर होतंच कॅनडात विद्यार्थी म्हणून जातात.

In reply to by वामन देशमुख

साहना 11/01/2023 - 04:06
हो. आई अमेरिकेत का होती, कायद्याने अली होती कि नाही इत्यादी गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणूनच तर चिनी आणि रशियन लोकांनी बर्थ टुरिझम हा प्रकार आणला.

चौकस२१२ 10/01/2023 - 09:21
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? सध्याचे माहित नाही पूर्वीची काही करणे = १) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे २) जिन्यासा/ क्षेत्रातील पुढील शिक्षण ३) बचत ( ती होतेच असे नाही कारण खर्च हि त्ववढेच असतात + शिवाय आयकर ) साधय यातील काही करणे बाद असतील परंतु साधय सुद्धा बाहेर कायमचे का लोकांना जावे वटतटे हे स्थानिक भारतीय जास्त चांगले सांगू शकतील हि करणे असू शकतात १) स्पर्धा २) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? काहींना तसे वाटत असेल पण म्हणून ते लगेच देशद्रोही वगैरे ठरत नाहीत... एवढेच नमूद करू इच्छितो भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? म्हणजे स्पर्धा या दृष्टीने हो असावे किंवा अजूनही भारतातील वेगवेगळ्या ष्ट्रातील अर्थाजनाची तफावत या शिवाय महागाई हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? भारतात भरपूर हुशार लोक आहेत त्यामुळे हि चिंता नसावी गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? पदोपदी भ्रष्टचार फारसा नाहीये... करणे काहीही असोत पण जगभरचे तत्व हे कि "पोट भरलेले असले" कि मग भ्रष्टचाराची गरज पडत नाही पाश्चिमात्य देशात हे त्यांनी बऱयापैकी जुळवले आहे म्हणून केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? कमी लोकसंख्येचं उपयोग होतो नक्की ,, अर्थवयवस्थेवरील ताण कमी होतो अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? हे फार थोड्यानं जमते ... कारण तो पर्यंत नातवंडे तिकडे आणि आपण इकडे असे होते... पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. हो मान्य देशादेशाप्रमाणे होऊ शकते ( वेगळे लिहीन वेळ मिळाला कि ) साधारण कानडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड हे एका समूहात अमेरिका जरा वेगळी असावी पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? बर्यापैकी .. कारण परत तेच खाऊन पिऊन सुखी मग बाकी गोष्टींकडे वेळ देत येतो अर्थात " सुखी " हा वेगळा विषय आहे ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? एकतर स्वतः बचत करून मग किंवा सरकारी मदत ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ) यात आयकर भरणे हे गृहीत आहे अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा

In reply to by चौकस२१२

Trump 10/01/2023 - 16:43
अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा
कर्ज परत देण्याची क्षमता, शिक्षण, इतरांना ज्याप्रकारे कर्ज मिळते त्याच प्रकारे सगळ्यांना मिळते. -- भारतामध्ये बरेचदा आज या, उद्या या करत करत जी मेटाकुटीला आणतात. जर कोणत्या अ वर्गाच्या भारतीय नागरीकाकडुन फोन आला (सरकारी नोकर, मोठे अधिकारी, राजकारणी) तर कामे लगेच होतात. मागासवर्गीय, अल्पसंख्याक असेल मग मज्जाच मजा.

In reply to by Trump

उपयोजक 10/01/2023 - 19:09
एक म्हणजे तिकडे व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात - घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही अनेक अमेरिकन / विदेशी लोकांचा बचत ( saving ) , कर्ज , assets building / holding या बद्दल फार वेगळा विचार असतो बेसुमार कर्ज मिळते आणि घेण्याकडे प्रवृत्ती असते बरे मागील economic crisis वेळी एक चमत्कारिक गोष्ट कळली - जरी लायकी नसेल तरी कर्ज दिले जाते - अगदी घराचे पण ! ( भारतात घर / गाडी घेणाऱ्या ना माहीत असेल की क्रेडिट लायकी ( worthiness) साठी किती scrutiny केली जाते ) हे जर अशक्य वाटले तर मी Ninja loans बद्दल लिंक टाकतोय ती पाहा ( A NINJA Loan (No Income, No Job, and No Assets Loan) आणि त्या crisis वेळी / बहुदा आता पण अनेक लोकांनी घरे / गाड्या surrender केली / जप्त केली गेली - लोक मजेत अजून थोडी खालची लाईफस्टाईल जगत राहिले भारतात हप्ते न भरल्या मुळे घर जप्त होत असेल तर ते फार वाईट मानले जाते , लोक आटा पिटा करतात , काहींना depression / attack आले आहे. https://corporatefinanceinstitute.com/resources/knowledge/credit/ninja-loan/

तर्कवादी 11/01/2023 - 23:56
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
भारतातील परिस्थिती चांगली, की वाईट यावर वाद करण्यापेक्षा या मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याने स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत (ज्याचे जीवन तुम्ही जवळून पाहिले आहे वा त्याचे अनुभव वा विचार त्याने तुम्हाला तपशीलाने सांगितले आहेत) उत्तर द्यावे असे मला वाटते सर्व सदस्यांनी या प्रकारे उत्तर दिल्यास चर्चा आपसूकच पुर्ण होईल. उगाच कुणातरी "क्ष" व्यक्तीची अर्धवट माहित असलेली जीवन गाथा लिहून त्या अनुषंगाने काहितरी निष्कर्ष काढण्यात फारसा अर्थ नाही असे मला वाटते. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता ते नमूद करुन तुमचे विचार विस्ताराने लिहा असे मी सुचवेन १) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे- आणि मला दीर्घकाळ (अगदी निवृत्तीनंतरही) भारताबाहेरच रहावेसे वाटते अ) या निर्णयामागचे माझे कारण असे आहे - ब) तसेच भारतातल्या "या" गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या इथे मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते २) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- पण मला काही काळाने - (खास करुन निवृत्तीनंतर) भारतात परत जायचे आहे (किंवा परत आलेलो आहे) - अ) भारत सोडण्यामागचे माझे कारण ब) भारतात परत जाण्यामागचे कारण ? क) परदेशातील या गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या भारतात मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते ३) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- आणि भारतात परत जायचे की नाही याबाबत मी अजून ठरवू शकलेलो नाहीये ४) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही आणि तशी फारशी इच्छाही नाही- याकरिता माझी कारणे भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते. तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे ५) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही पण "या अमुक" काही देशांत मला जायला आवडेल पण तशी संधी न मिळाल्यासही मला खंत नाही. भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते.तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे - आता माझ्या पुरतं मी ४ वा ५ या प्रकारात मोडतो. म्हणजे मी कधीच भारताबाहेर गेलो नाही. यापुर्वी भारताबाहेर जावे असे प्रकर्षाने वाटले नाही. फार प्रतिभावान नसलो तरी अगदीच मठठ प्रकारतला मी नक्कीच नाही त्यामुळे संधी मिळाल्याही असत्या पण मी अशा संधींच्या शोधात फारसा नव्हतोच. आता वाटते न्युझीलंड या देशात जायला आवडेल - पण माझ्या क्षेत्रात तिकडे संधी फारशा नाहीत त्यामुळे संधी नाही मिळाली तरी खंत नाही. परदेशात न जाण्यामागची कारणे - दुसर्‍या देशात जावून तिथल्या चालिरीती, तिथले कायदे, नियम समजून घेणे त्याप्रमाणे जगायला शिकणे, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणे ई ई मला बरेच आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटले. झालेच तर परदेशात अनेक कामे स्वतःच करावी लागतात घरगुती कामांना नोकर मिळत नाही किंवा तिथल्या पगारात ते परवडत नाहीत. त्याउलट भारतात दरमहा लाखभर पगार असणारी व्यक्ती देखील नोकरांंच्या पगारावर फारतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करुन जवळपास अजिबात घरकाम न करता आरामात जगू शकते. दुसरे असे की मला भारतात - ते ही पुण्यात म्हणजे ज्या शहरात मी मोठा झालो त्याच ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी मिळत गेल्या मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मला वाटते की परदेशी जाण्याचे कारण म्हणजे तिथल्या चलनात मिळणार्‍या पगारातुन चांगल्यापैकी बचत कमी कालावधीत होते पण मला तशी गरज वाटली नाही. तिशीच्या आत मी स्वतःचा फ्लॅट घेतला, चाळीशी ओलांडताना पुर्ण कर्जही फेडले. माझ्या भारतातील आवर्जुन बदलल्या जाव्यात या गोष्टी - वाहतुक कोंडी, खराब रस्ते (खासकरुन शहरातले - महामार्ग आता सुधारलेत बहुधा), बेशिस्त वाहतुक , भटके कुत्रे , रस्ते अडवून होणारे उत्सव, मिरवणूका, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी (अचानक रात्री १२ वाजता फटाके वाजू लागले की डोकं फिरतं) , ध्वनी प्रदूषण ई भारताबाहेर न जाण्याने झालेले नुकसान - आय टी क्षेत्रात करिअरमध्ये ऑनसाईट जाण्याने पुढेही अधिल चांगल्या संधी मिळतात. अर्थात मी फार जास्त महत्वाकांक्षी नाही, आहे त्या करिअर मध्ये समाधानी आहे.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 12/01/2023 - 12:55
आता माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल लिहितो. बी ई मेकॅनिकल असलेला हा माझा पुण्यातला मित्र - २००१ पासून आमची मैत्री आहे. २००४ ला तो "रोबोटीक्स , ऑटोमेशन" या विषयातले एम एस करण्यासाठी जर्मनीला गेला. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिथे त्याला नोकरी मिळाली. काही वर्षानंतर पुण्यातीलच एका मुलीशी त्याने लग्न केले व पत्नीलाही जर्मनीला घेवून गेला. पुढे त्याच्या पत्नीनेही कधी पुर्ण वेळ तर कधी अर्धवेळ व्वगैरे नोकर्या केल्यात. एक मुलगा व एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये झालीत. या काळात तो दरवर्षी एकदा तरी पुण्याला येत असे. पण आता साधारण वर्ष-दीडवर्षापुर्वी तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला.. अलीकडे माझी त्याच्याशी भेट होवू शकली नाही परंतु फोनवर बोलणे झाले तेव्हा मी त्याला भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने जी कारणे सांगितले ती साधारण अशी १) त्याला भारतातले कौटुंबिक आयुष्य आणि अनुषंगाने मुलांवर होणारे कौटुंबिक संस्कार हवेसे वाटत आहेत. पुण्यात आता त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडीलही आहेत. त्याच्या पत्नीचे माहेरही पुण्यातच आहे २) जर्मनीतील तरुण पिढीतील मुले फारशी महत्वाकांक्षी नाहीत. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. साधारण शिक्षण घेवून कोणतीही नोकरी केली तरी चांगल्यापैकी पगार मिळत असल्याने इंजिनिअरिंग वा तत्सम व्यावसायिक शिक्षण मेहनतीने घ्यावे अशी इच्छाशक्ती मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मित्राला त्याच्या मुलांच्याबाबतीत असा धोका पत्करायचा नाहीये.

In reply to by तर्कवादी

माझ्या मित्राचेही असेच आहे. अनेक वर्षे जर्मनीला राहून तो परत आला. तथापि, मुलांच्या शिक्षणासाठी तो पुन्हा जर्मनी गाठायचा विचार करतोय. हा वेगळाच प्रकार आहे. त्याचे प्रमुख कारण अर्थातच कुटुंब हे होते. जर्मनीत किंवा युरोपियन देशांत गेलेल्या पहिल्या पिढीचा सर्वात मोठा पुल हा पालकांचाच असतो.. कारण शक्यतो ही पिढी मध्यमवर्गीय सधन लहान कुटुंबांतून आलेली असते आणि आई-वडिलांशी खूप गुंतलेली असते. परदेशात गेलेल्या पिढीला त्यामुळे एकटेपणा खायला उठतो. त्यांच्या पुढच्या पिढीला कुटुंबात रमवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. काही मंडळी पुन्हा मायदेशी परततात. आता या परतीच्या वेळेस मात्र पूर्वीचे मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय झालेले असते. काही पैसा गाठीशी असतो.. इतर भारतीय समाजापासून त्यांची मुले मात्र पूर्णपणे तुटलेली असतात. श्रीमंत शाळांमध्ये शिकतात. ती मातृभाषा क्रियापदापुरती वापरतात. त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आय आय एम चे क्लासेस घेतले जातात.. ते इयत्ता बालवाडीलाच फ्रेंच, जर्मन नाहीतर जपानी शिकू लागतात कारण त्या मुलांची मुख्य भाषा भारतीय इंग्रजी झालेली असते. मिंग्लीशसारखी क्रियोल भाषा ते घरी वापरतात आणि ती जगण्यासाठी अगदीच निरुपयोगी आहे हे त्यांना न सांगताच उमजेले असते. हे लोक गेटेड कम्युनिटिज मध्ये राहतात. त्यांच्याकडे ल्यूसी, जॉन किंवा तत्सम नावांची अर्धवट परदेशी कुत्री असतात. त्यांचे म्हातारे आई आजोबा सुद्धा जमेल त्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधतात. गणपतीला वगैरे उकडीचे मोदक खाऊन, कधीतरी कृषिपर्यटन करून संस्कृती जपतात. बरं त्यांचे वर्तन वैज्ञानिक असते का तर तेही नाही. त्याची सुरवात तर ते अगदी सुवर्णप्राशन वगैरे असल्या गोष्टींपासूनच होते. तुम्ही दिलेले दुसरे कारण अगदी इथेच आकाराला येते. पहिली पिढी एसबीआय बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाली. दुसरी पिढी समजा डॉएच्च बँकेत आयटी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर या दुसर्‍या पिढीला आपल्या मुलांनी किमान दोन स्टार्टप काढाव्यात असे वाटू लागते. काही लोकांच्या यशाच्या आणि कौटुंबिक आनंदाच्या व्याख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना बेस्ट ऑफ बोथ हवे वाटू लागते. जर्मनीसारखे देश शिक्षणामध्ये रॅट रेसला प्राधान्य देत नाहीत. सगळ्या राहणार्‍या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्स हा अनिवार्य असतो. जवळ्पास ८५ टक्के हेल्थ इन्शुरन्स हा पब्लिक कंपन्यांचा असतो ज्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवलेल्या असतात. आर्थिक उत्त्पन्न जितके जास्त तितका प्रिमियम जास्त. कमी उत्पन्न असेल तर प्रिमियमही कमी असतो आणि उपचार मात्र त्याच दर्जाचे मिळणार ही हमी असते. हा थोडक्यात समाजवादी प्रकार आहे. सर्वच लोक ठराविक रक्कम भरून सर्व लोकांना त्याच दर्जाची आरोग्यव्यवस्था मिळेल अशी तजवीज करतात. जर्मनीतल्या प्रत्येक मुलाला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत/काहींना पंचवीस वर्षांपर्यंत एक रक्कम मिळते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्चशिक्षण पूर्णपणे फुकट आहे. वरखर्च उचलावा लागतो पण त्या वरखर्चातली अर्धी रक्कम तर सरकारच देते. खाण्यापिण्यात कन्सेशन असते. विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक फु़कट वापरता येते. त्यामुळे सगळीकडे सारख्याच दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षणाचा दर्जा समान राखण्यात या समाजवादी बाबी कारणीभूत आहेत. संधींची त्यातल्या त्यात समानता, रोजगाराला असलेले सरकारी कवच, व्यवस्थेमध्ये रुजलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त या सगळ्या बाबींमुळे व्यक्ती ही आनंदी राहण्यासाठी धडपड करते, दोन वेळच्या अन्नाची चिंता तितकीशी करत नाही. जिथे सुबत्तेने या बाबी सोडवेल्या आहेत. आपल्या ध्यानीमनीही नसणारे विषय त्यांच्या ऐरणीवर असतात. स्पर्धा असते पण बर्‍याचदा ती स्वतःशी असते. म्हणजे बॉडी बिल्डिंग करणे, सर्फिंग, वेकबोर्डिंग, पॅराग्लाईडींगसारखे धाडसी खेळ खेळून त्यांच्यात प्रावीण्य मिळवणे, इत्यादी इत्यादी..कुठल्याही अडचणीला जवळचे पोलिस स्टेशन गाठायला त्यांची भारतीयांसारखी प्रचंड फाटत नाही. काही जर्मन म्हातार्‍या पोलिसांना दरडावताना मी पाहिल्या आहेत. कधीकधी प्रत्येक गोष्ट झगडून आणि नाका तोंडावर आपटून मिळवलेल्या पहिल्या दुसर्‍या पिढीला हे कळले तरी पचनी पडत नाही असे वाटते. खूप भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित काही दशकांची सामाजिक सुरक्षितता जशी परदेशस्थांना आंदण म्हणून मिळाली आहे तशी भारतीयांना मिळाली नाही आणि दुसर्‍या पिढीने प्रचंड स्पर्धात्मक राहून, भारतात बोर्डाबिर्डात येऊन झगडून मिळव्ली आहे ती सामुहिक असुरक्षिता सतत कुठेतरी पार्श्वभागाला असावी असे वाटते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तर्कवादी 15/01/2023 - 20:01
हणमंतअण्णाजी विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा मुद्दा समजला.
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे
शक्य आहे. कारण त्यांची आताची सुस्थिती त्यांनी भरपूर परिश्रम करुन , अतिशय महत्वाकांक्षेने मिळवली आहे. ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. झालेच तर ते स्वतः उच्चपदांवर काम करत असल्याने श्रमप्रतिष्ठाही मनात रुजलेली नाही. माझा रोबोटीक्स -ऑटोमेशन क्षेत्रात काम करणारा मित्र आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही. पण मी वर म्हंटले तसे - माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही .. फार काय तर , माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार या ज्येष्ठ जर्मन लोकांची तक्रार अगदी टिपीकल भारतीय पालकांसारखीच आहे म्हणजे "आम्ही आमच्या आई-वडीलांच ऐकलं, चांगलं शिक्षण घेतलं, मेहनत घेतली आणि करिअर घडवलं.. पण पुढच्या पिढीतली मुलं आमचं ऐकत नाहीत, मिळालेल्या स्वातंत्र्याचा नाहक फायदा घेतात.. वगैरे"

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/01/2023 - 09:11
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे ".....ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. " तर्कवादी, आपल्या या उप प्रतिसादाशी सहमत विशेष करून पहिल्या पिढीचे स्थलांतरित असे का वागतात या बद्दल २ पैसे माझे पण ..... पहिली पिढी हि बहुतेक फक्त शिक्षण बळावर येथे आलेली असते त्यामुळे आपण म्हणता तसे " आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही." असे घडते जरी येथे आल्यावर पाश्चिमात्य देशात "सर्व कामांना प्रतिष्ठां असते " हे माहिती असून सुद्धा आणि असे भांडी घासण्याची श्रम स्वतः विद्यार्थी दशेत केलेले असले तरी २-३ ऱ्या पिढीत मग बदल होत जातो .. साहजिक आहे .. तेव्हा हे "नाहक" असते असे मी पण १००% म्हणणार नाही ...
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का?

योजना ब / क / ड ....

Trump ·

3. वृद्धाश्रम 2. गर्दीची ठिकाणे टाळणे 1. जितक्या पैशांची आवश्यकता आहे, तितकेच पैसे खिशात ठेवणे, पाकिटात ATM असतेच शक्यतो लोकलचा प्रवास टाळतोच. शिवाय, फिरण्याचा परीघ कमी ठेवला आहे.

3. वृद्धाश्रम 2. गर्दीची ठिकाणे टाळणे 1. जितक्या पैशांची आवश्यकता आहे, तितकेच पैसे खिशात ठेवणे, पाकिटात ATM असतेच शक्यतो लोकलचा प्रवास टाळतोच. शिवाय, फिरण्याचा परीघ कमी ठेवला आहे.
योजना ब / क / ड .... नैसगिक आपत्ती, अपघात, विसळभोळेपणा, कोणचा तरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा, चोरी, अवक्तशीरपणा इत्यादी संकटातुन कोणी चुकलेली नाही. हि संकटे एक - एक आली तर थोडे स्वता:ला संभाळण्यासाठी वेळ आणि संधी मिळते. पण जर ती एकत्र आली तर मग मात्र खरे नाही. १. साधारणतः जुन २०१४ मध्ये मला मुलाखतीला जायचे होते. ज्या ठिकाणी मी राहयला होतो ते घर बंद होते आणि माझ्याकडे किल्ली नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा बोर्‍या उडला. २. २०२१ मध्ये मी विंडोसमध्ये मायक्रोसॉफ्ट्चे खाते जोडले, पण मला परवलीचा शब्द ( पासवर्ड ) त्या खात्याचा आठवत नव्हता. संगणकने स्वतः मला न विचारता संकेताक्षर बदलले.

ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने!

उपयोजक ·

मंगळही थोडं बारिक निरिक्षण केलं असता दिसू शकेल पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत. कोण म्हणतं?शुक्र तर कधीकधी संध्याकाळी सुध्दा स्पष्ट दिसतो. रात्रीच्या आकाशात बुध, गुरु, शनीही दिसतात, फक्त त्यांचे स्थान आणि उगवण्याची वेळ माहीत असणे गरजेचे आहे. ग्रहांचे खडे घातल्याने फायदा होतो की नाही ह्याचा अनुभव नाही, परंतू काही खडे काढल्याने नक्कीच फायदा होतो. उदा: पित्त खडे , मूतखडे .

कंजूस 28/04/2018 - 21:20
१) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व&१ संशोधन (म्हणा) खालडिअन&२ लोकांनी केलय. ते ग्रीकांनी इथे इपू दुसय्रा शतकात आणलं. हे राशीस्वामी इत्यादींंसह आपल्याकडचे चांद्रनक्षत्रफल आणि साडेसाती यास पारंपरिक म्हटलं जातं. &१ - ग्रह काय करतात याची गृहितकं. &२ - आताचा सिरिया, इराकचा भाग. २) खडे आणि रत्ने हे तोडगे आहेत. ते ठरवणं हेसुद्धा समजुतींवरच आधारीत आहेत. त्याचा कीस पाडण्यात अर्थ नाही. भांडखोर बायकोस पाचू ठीक असला तरी सैनिकास काय उपयोग? वेडसराला पुष्कराज वापरून पाहायला हवा. वाण्याला मोती लाभू शकतो.

In reply to by कंजूस

उपयोजक 28/04/2018 - 22:29
१. याचा अर्थ ज्योतिष मूळचं खाल्डीयन/ग्रीक आहे? २. तसं असेल तर त्यांनी हे संशोधन का केलं असावं? ३. या संशोधनासाठी दुर्बिणी किंवा आवश्यक साधनं कशी बनवली? दुर्बिणी इतक्या प्राचीन आहेत का? ४. ही निरीक्षणं फायनलाईज्ड करण्यापूर्वी किती काळ ती केली गेली असावीत?

कंजूस 29/04/2018 - 09:01
>>ग्रहांची कार्यतत्वे दिली आहेत.ती आजही उपयुक्त आहेत.मग ती कोणत्या साधनाद्वारा शोधली गेली असावीत? >> कार्यतत्वे आणि कार्यकत्व या शब्दांमध्ये गल्लत होतेय का? ज्योतिषात कार्यकत्व हा शब्द आहे तो अमुक एक ग्रह जातकाच्या कोणत्या गुणांवर प्रभाव टाकतो ही गृहितककं ठरवण्यासाठी साधनं,दुर्बिणी नाही लागत. क्र २) - हे लोक व्यापार करत ,वाळवंट आणि समुद्रात रात्रीही प्रवास करत. तेव्हा ग्रह तारे दिशा दाखवत. ( यास निरयन निरीक्षणं म्हणतात) आयुष्यातल्या घटनांशी संबंध जोडायचा हळूहळू प्रयत्न झाला असणार. फाइनलाइझ्ड झाली असं कोणीच म्हणत नाही.

Nitin Palkar 29/04/2018 - 11:49
'सामान्य विज्ञाना'चे सामान्य ज्ञान असले तर गुरु, शुक्र हे ग्रह सहज ओळखता येतात, किंबहुना मंगळापेक्षाही सहज. बुध, शनी यांचे मात्र नक्की स्थान माहित असावे लागते.

दीपक११७७ 30/04/2018 - 13:05
ग्रहांच नक्षत्रांच मानवावर परिणाम होत असावा एक अनुभव सांगतो. एका मुस्लीम व्यक्ती शी नातेवाईक सोबत भेट घेतली तो व्यक्ती चेह-यावरुन जन्म वार सांगायचा त्याने माझा जन्मवार, माझ्या भावजीचा, पुतण्याचा तसेच एका मित्राचा , वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटीत अचुक जन्मवार सांगीतला होता. तो चेह-याच निरीक्षण करायचा व सांगाच्या ही घटना एकदम सत्य आहे. साधारण १६-१७ वर्षा पूर्वीची. यावरून जन्मावेळी ग्रहांचा व नक्षत्रांचा परिणाम शरिरावर होतो या दाव्याला पुष्टी मिळते (किमान माझ्या पुरते तरी). सध्या एवढेच.

In reply to by दीपक११७७

चौकटराजा 02/05/2018 - 16:04
त्या माणसाने तुमचा चेहरा पाहिला जन्मवार सांगितला इथपर्यंत चेहरा हे इनपुट व जन्मवार हे आउट पुट हा परस्पर संबंध प्रस्तापित होतो . यात ग्रहः नक्षत्रे ही संप्रेरक म्हणून आली की काय ?

ज्योतिष खरे की थोतांड यासाठी धागा काढलेला नाही. छ्या, मला या विषयावर धागा काढायचा होता, याला काय अर्थ आहे. बो़लू दिलं पाहिजे लोकांना. :) बाय द वे, कोणतेच दगड गोटे कोणाच्या आयुष्यात कोणतीच उलथापालथ करु शकत नाही, कोणत्याच दगड गोट्यांचा म्हणजे ग्रहांचा आणि बोटातील खड्यांचा माणसावर कोणताच परिणाम होत नाही. ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने यांच्या नादी लागू नका. हाती काहीही येत नाही. पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे. आयुष्याचा मौल्यवान वेळ या दगड गोट्यांसाठी घालवू नका. मस्त बियरच्या पॅक भरा. हॉट घेत असाल तर ९० एमएल आठवड्यात एकदा घेत चला. चांगला चखना घ्या, संपवा. भांडन करु नका. कुंटुंबाशी बोला. फिरवून आणा. विषय संपला. एवढे दोन शब्द बोलून या धाग्यावरुन रजा घेतो. बाकी चर्चा चालू ठेवा. सालं लै मनोरंजन होतं. आयुष्यात मनोरंजन लागतं. -दिलीप बिरुटे (ब्लाइंडर ग्रहावर बसलेला) ;)

कंजूस 03/05/2018 - 07:11
महत्वाकांक्षा नसलेली माणसं निरनिराळे उपाय करून पाहात नाहीत. आहे ते प्राक्तन पत्करून एकाच धोंड्यामागच्या सावलीत पडून राहतात. उगाच कशाला ठेचकाळत दुसरे धोंडे शोधत फिरायचं? कुठेही बसायचंच आहे ना?

मंगळही थोडं बारिक निरिक्षण केलं असता दिसू शकेल पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत. कोण म्हणतं?शुक्र तर कधीकधी संध्याकाळी सुध्दा स्पष्ट दिसतो. रात्रीच्या आकाशात बुध, गुरु, शनीही दिसतात, फक्त त्यांचे स्थान आणि उगवण्याची वेळ माहीत असणे गरजेचे आहे. ग्रहांचे खडे घातल्याने फायदा होतो की नाही ह्याचा अनुभव नाही, परंतू काही खडे काढल्याने नक्कीच फायदा होतो. उदा: पित्त खडे , मूतखडे .

कंजूस 28/04/2018 - 21:20
१) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व&१ संशोधन (म्हणा) खालडिअन&२ लोकांनी केलय. ते ग्रीकांनी इथे इपू दुसय्रा शतकात आणलं. हे राशीस्वामी इत्यादींंसह आपल्याकडचे चांद्रनक्षत्रफल आणि साडेसाती यास पारंपरिक म्हटलं जातं. &१ - ग्रह काय करतात याची गृहितकं. &२ - आताचा सिरिया, इराकचा भाग. २) खडे आणि रत्ने हे तोडगे आहेत. ते ठरवणं हेसुद्धा समजुतींवरच आधारीत आहेत. त्याचा कीस पाडण्यात अर्थ नाही. भांडखोर बायकोस पाचू ठीक असला तरी सैनिकास काय उपयोग? वेडसराला पुष्कराज वापरून पाहायला हवा. वाण्याला मोती लाभू शकतो.

In reply to by कंजूस

उपयोजक 28/04/2018 - 22:29
१. याचा अर्थ ज्योतिष मूळचं खाल्डीयन/ग्रीक आहे? २. तसं असेल तर त्यांनी हे संशोधन का केलं असावं? ३. या संशोधनासाठी दुर्बिणी किंवा आवश्यक साधनं कशी बनवली? दुर्बिणी इतक्या प्राचीन आहेत का? ४. ही निरीक्षणं फायनलाईज्ड करण्यापूर्वी किती काळ ती केली गेली असावीत?

कंजूस 29/04/2018 - 09:01
>>ग्रहांची कार्यतत्वे दिली आहेत.ती आजही उपयुक्त आहेत.मग ती कोणत्या साधनाद्वारा शोधली गेली असावीत? >> कार्यतत्वे आणि कार्यकत्व या शब्दांमध्ये गल्लत होतेय का? ज्योतिषात कार्यकत्व हा शब्द आहे तो अमुक एक ग्रह जातकाच्या कोणत्या गुणांवर प्रभाव टाकतो ही गृहितककं ठरवण्यासाठी साधनं,दुर्बिणी नाही लागत. क्र २) - हे लोक व्यापार करत ,वाळवंट आणि समुद्रात रात्रीही प्रवास करत. तेव्हा ग्रह तारे दिशा दाखवत. ( यास निरयन निरीक्षणं म्हणतात) आयुष्यातल्या घटनांशी संबंध जोडायचा हळूहळू प्रयत्न झाला असणार. फाइनलाइझ्ड झाली असं कोणीच म्हणत नाही.

Nitin Palkar 29/04/2018 - 11:49
'सामान्य विज्ञाना'चे सामान्य ज्ञान असले तर गुरु, शुक्र हे ग्रह सहज ओळखता येतात, किंबहुना मंगळापेक्षाही सहज. बुध, शनी यांचे मात्र नक्की स्थान माहित असावे लागते.

दीपक११७७ 30/04/2018 - 13:05
ग्रहांच नक्षत्रांच मानवावर परिणाम होत असावा एक अनुभव सांगतो. एका मुस्लीम व्यक्ती शी नातेवाईक सोबत भेट घेतली तो व्यक्ती चेह-यावरुन जन्म वार सांगायचा त्याने माझा जन्मवार, माझ्या भावजीचा, पुतण्याचा तसेच एका मित्राचा , वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटीत अचुक जन्मवार सांगीतला होता. तो चेह-याच निरीक्षण करायचा व सांगाच्या ही घटना एकदम सत्य आहे. साधारण १६-१७ वर्षा पूर्वीची. यावरून जन्मावेळी ग्रहांचा व नक्षत्रांचा परिणाम शरिरावर होतो या दाव्याला पुष्टी मिळते (किमान माझ्या पुरते तरी). सध्या एवढेच.

In reply to by दीपक११७७

चौकटराजा 02/05/2018 - 16:04
त्या माणसाने तुमचा चेहरा पाहिला जन्मवार सांगितला इथपर्यंत चेहरा हे इनपुट व जन्मवार हे आउट पुट हा परस्पर संबंध प्रस्तापित होतो . यात ग्रहः नक्षत्रे ही संप्रेरक म्हणून आली की काय ?

ज्योतिष खरे की थोतांड यासाठी धागा काढलेला नाही. छ्या, मला या विषयावर धागा काढायचा होता, याला काय अर्थ आहे. बो़लू दिलं पाहिजे लोकांना. :) बाय द वे, कोणतेच दगड गोटे कोणाच्या आयुष्यात कोणतीच उलथापालथ करु शकत नाही, कोणत्याच दगड गोट्यांचा म्हणजे ग्रहांचा आणि बोटातील खड्यांचा माणसावर कोणताच परिणाम होत नाही. ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने यांच्या नादी लागू नका. हाती काहीही येत नाही. पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे. आयुष्याचा मौल्यवान वेळ या दगड गोट्यांसाठी घालवू नका. मस्त बियरच्या पॅक भरा. हॉट घेत असाल तर ९० एमएल आठवड्यात एकदा घेत चला. चांगला चखना घ्या, संपवा. भांडन करु नका. कुंटुंबाशी बोला. फिरवून आणा. विषय संपला. एवढे दोन शब्द बोलून या धाग्यावरुन रजा घेतो. बाकी चर्चा चालू ठेवा. सालं लै मनोरंजन होतं. आयुष्यात मनोरंजन लागतं. -दिलीप बिरुटे (ब्लाइंडर ग्रहावर बसलेला) ;)

कंजूस 03/05/2018 - 07:11
महत्वाकांक्षा नसलेली माणसं निरनिराळे उपाय करून पाहात नाहीत. आहे ते प्राक्तन पत्करून एकाच धोंड्यामागच्या सावलीत पडून राहतात. उगाच कशाला ठेचकाळत दुसरे धोंडे शोधत फिरायचं? कुठेही बसायचंच आहे ना?
ग्रह/नक्षत्रे १.

कायदे पाळणे हा मूर्खपणा आहे का ?

माम्लेदारचा पन्खा ·

कंजूस 29/07/2016 - 14:16
अगोदर पाडलेल्या सहा इमारती या निर्णायप्रमाणे पाडल्या असल्याने त्याची भरपाई सरकार बहुतेक देणार नाही. जेव्हा रहिवाशांना पंधरा वर्षांपुर्वी नोटिस आली होती की "तुमची इमारत स्थानिक सिडकोच्या परवानगीशिवाय आहे" तेव्हाच सरकारकडे एक रीतसर अर्ज करून ठेवायला हवा होता की आमचा विचार करा आणि मार्ग काढा.प्रकरण सरकारकडे गेले असते आणि कोर्टात न गेल्यामुळे काहीच निर्णय झाला नसता.

जगप्रवासी 29/07/2016 - 14:23
पण एक कळत नाही की जर अनधिकृत जागेवर बांधकाम केलेली इमारत आहे तर त्यावर स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात. आणि बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत. हे अनधिकृत जागेवर बिनधास्त राहणार आणि आपण अधिकृत जागेवर टीचभर घर घेण्यासाठी आयुष्यभर राबणार.

In reply to by जगप्रवासी

पैसा 29/07/2016 - 14:27
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सुद्धा नसते. बँकेच्या ऑफिसरला गोडाऊनमधे कोंडून घालून सँक्शनवर सह्या घेतात. हे बिहारमधे नव्हे तर माझ्या वर्गमित्राच्या बाबत मुंबईत झाले आहे.

In reply to by जगप्रवासी

संदीप डांगे 29/07/2016 - 15:06
महसूल विभागाच्या अखत्यारीत जमिनीची वैधता तपासणे येत नाही, ते फक्त नोंदणी करतात, पुढे काहीही झोल झाले तर हात वर करतात असा अनुभव आहे,

In reply to by संदीप डांगे

अमितदादा 29/07/2016 - 15:17
बरोबर..आणि हेच लोकांना माहित नसते...आज ही माज्या माहितीतले लोक आस बोलतात कि सरकार ने फी घेतलीय नोंद करून घेतलीय म्हणजे कायदेशीर असणारच...

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

संदीप डांगे 29/07/2016 - 15:31
गावातल्या सगळ्या जमिनीच्या कुंडल्या ज्याच्या हातात तो तलाठी!!! शहरात कोण ते माहिती नाही, पण रीतसर इतिहास काढता येतो, अगदी दोनशे तीनशे वर्ष जुन्या नोंदीही तपासून बघता येतात, सामान्यपणे मोठ्या बॅंक्स यासाठी मदत करतात

In reply to by जगप्रवासी

NiluMP 30/07/2016 - 15:05
हि बांधकामे स्थानिक नेते, पोलिस, प्रशासन यांच्या आशिर्वादाने झालेली आहेत

पैसा 29/07/2016 - 14:25
कायदे पाळणे हा कुठेही शुद्ध मूर्खपणा असतो. तुम्ही जर कायदे मोडणार्‍यांकडे दुर्लक्ष केले तर तो तुमचा दुबळेपणा समजला जातो. एव्हाना आदर्श सुद्धा नियमित झाले असेल. सलमानच्या पोलीस अंगरक्षकाचे काय झाले आठवा. पण तरीही कायदे पाळणे रक्तात भिनले आहे. ते झटकून टाकता येत नाही. याबद्दल स्वतःचाच भयंकर राग येतो.

अमितदादा 29/07/2016 - 14:38
लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा कठोरपणे आणि सगळ्यांना समान राबावाय हवा। पण कधी कधी अनधिकृत बांधकामाचा विचार केल्यास त्यातील एक अगतिक बाजू दिसून येते. काही लोकांना इमारत अधिकृत आहे की नाही हेच मुळात माहित नसते, हि जरी त्यांची चुकी असली तरी फक्त बिल्डर च्या चुकीची किमंत ह्या लोकांच्या आयुष्याची पुंजी नष्ट करून कशी चुकवायची. ग्रामीण भागात घर शेतजमिनीवर बांधताना NA कॉलेक्टर ऑफिस मध्ये करून घ्यावा लागतो, पण आपण कलेक्टर ऑफिस मध्ये सामान्य लोकांना काय किंमत दिली जाते हे जाणतोच, तसेच गावातून कचेरी मध्ये चकरा मारून लोक वैतागून जातात आणि घर बांधून टाकतात. हि घर फक्त आधी परवानगी घेतली नाही म्हणून बेकायदेशीर ठरतात. सरकार ने पहिली व्यवस्था सुधारली पाहिजे आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे, तसेच लोकांना समजेल उमजेल अशी कायदेशीर प्रक्रिया कराय हवी. अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रात आज अशी. काही चुकले असल्यास दाखवून कृपया सांगावे.

In reply to by टवाळ कार्टा

संदीप डांगे 29/07/2016 - 22:15
एवढ्यातच एका महान माणसाबद्दल कळले होते, पठ्ठ्याने एकाच फ्लॅटवर दोन ब्यान्केकडून एकाच वेळी कर्ज काढले, नंतर तोच फ्ल्याट एकाच वेळी तीन जणांना विकलाही. हा पैसे घेऊन फरार आणि ते 'पाच मालक' आपसात भांडत आहेत की मालकी नक्की कोणाची. ही आत्ता आत्ताची गोष्ट आहे गेल्या तीनेक वर्षातली. कायदे-बॅकग्राउंड चेक कडक असूनही...

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 29/07/2016 - 22:28
माझे एक बाॅस होते असे. त्यांनी एक इक्विपमेंट ३ बँकांकडे गहाण ठेवली होती. नंतर स्वतः अ शिवाजी पार्क भागातला Flat ही तशाच पद्धतीने गहाण ठेवायचा प्रयत्न केला. ते अंगाशी आलं.सध्या साहेब कोर्टाकडून absconder म्हणून घोषित झालेले आहेत.

In reply to by संदीप डांगे

अंतु बर्वा 30/07/2016 - 01:46
अशा केसेस बद्दल एक शंका आहे. ब्यांक ओरिजिनल अ‍ॅग्रीमेंट घेतल्याशिवाय लोन डिसबर्स करत नाहीत. मग ही लोकं बाकीच्या दोन ब्यांकांना तारण म्हणुन काय देत असतील? जनरल मोडस ऑपरेंडी समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.

In reply to by अंतु बर्वा

एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य असेल. शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत असे प्रकार ऐकले आहेत. एवीतेवी कर्ज माफ होणारच आहेत म्हणुन बँकेतला एखादा करप्ट अधिकारी डमी शेतकरी उभे करुन कर्ज लाटतात. ख.खो.दे.जा.

झेन 29/07/2016 - 16:00
पाळणा-याची आजकाल किव करतात. नो एनट्री/राँग साईड नी दूचाकी वरून तीघे जण गेल्यावर चौकातल्या पोलीसांच्या नजरेत वेगळाच आदर दीसतो(काही दिवसांनी सँल्यूटपण मारतिल). कुठल्याही कर विभागात कर बुडवणा-या लोकांना सन्मान देण्यासाठी दर काही वर्षांनी एखादी योजना निघतेच, सध्या आयकर विभागाची चालू आहेच. मानव अधिकार सुध्दा जेवढा गून्हा मोठ्ठा तेवढे जास्त. उगीच नाही कुणी शिलाई यंत्र वाटंत. साहेब तूमच आपलं काही तरीच हां.

अर्धवटराव 30/07/2016 - 02:25
पण कायद्याची ताकत ऑव्हरएस्टेमेट करणं हा गुन्हा आहे. शेवटी कायदा हा इंटरप्रिटर आणि अंमलदारांच्या मर्जीवर अवलंबून असतो, व ते आम आदमीच्या मतदानावर.

In reply to by एकुलता एक डॉन

NiluMP 30/07/2016 - 15:09
हि बातमी वाचल्यावर मी ठरवले आहे आपणही झोपडपटटीत घर घ्यावे कारण कोणतेही सरकार येउन देत त्यांना हात लावण्याची कोणाचीच हिंमत नाही

In reply to by NiluMP

चलत मुसाफिर 31/07/2016 - 08:52
काही वर्षांपूर्वी मी ठाण्यातील एका पांढरपेशा भागात गुंतवणुकीसाठी फ्लॅट शोधत होतो तेव्हा एका एजंटने मला हा "पर्याय" सुचवला होता. म्हणतो कसा, "साहेब, पन्नास लाखाचा फ्लॅट घेण्याऐवजी पंधरा लाखाची खोली घ्या अमक्या झोपडपट्टीत. रेशनकार्ड बनवून घ्या. ती पुनर्विकासाला येणार आहे लवकरच. मग तिथे फ्लॅट मिळेल, तो विका पाचपटीने". आम्ही हात जोडून बाहेरचा रस्ता पकडला.

In reply to by एकुलता एक डॉन

चंपाबाई 31/07/2016 - 18:23
लोकानी झोपडप्टीएत ५ वर्षापुर्वी पत्र्याच्या खोल्या घेतल्या होत्या तीन लाखाला. आता त्या १५ लाखाला विकून पनवेलात फ्लॅट घेतलेत.

विवेकपटाईत 30/07/2016 - 15:29
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.

विवेकपटाईत 30/07/2016 - 15:29
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.

चंपाबाई 31/07/2016 - 05:25
हेच काँग्रेसने केले असते तर मिसळपाववर प्रचंड गदारोळ झाला असता... काँग्रेस भ्रष्ट आहे ते आमच्यासारख्या ट्याक्स पेयरचे पैसे पाणी वीज हे लोक पळवतात इ सगळे मुद्दे इथे डिस्कस झाले असते... पण हे चर्चिष्ट लोक आता गायब झालेत.

हे थांबायला हवं,कडक कायदे असल्याशिवाय व त्या कायद्यांची अंमलबजावनी झाल्याशिवाय हे थांबणार नाही.अश्या केसेससाठीसुद्धा जलदगती दिवाणी न्यायालये असायला हवीत.

साधा मुलगा 01/08/2016 - 23:10
लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे. कायद्याने चालणाऱ्या माणसांची आज काळ थट्टाही केली जाते, पण हि थट्टा करत असताना आपण लॉंग टर्म मध्ये काय गमावून बसणार आहोत याचे कुणाला भान नसते. कायदा मोडणारी बिनदिक्कतपणे कायदा मोडतात पण आपण मात्र काही करू शकत नाही. मी जे काही पेपरात वाचले आहे आणि लोकांकडून ऐकले आहे त्यातून आपण अधिकृतपणे राहतो याची कीव वाटायला लागली आहे. अधिकृत इमारत असेल धोकादायक इमारतच्या नावाखाली नवा छळ मांडला आहे. नको त्या अनेक इमारतींना गरज नसताना धोकादायक बनवून २४ तासात इमारत खाली करण्याचे आदेश देणे वगैरे चालते, यात बिल्डर, राजकारणी, महानगर पालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश असतो. मागच्या वर्षी ठाण्यात जी बिल्डिंग पडली ती महानगर पालिकेने धोकादायक म्हणून खरेतर जाहीर केलीच नव्हती. त्यानानातर जागे झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक अश्या सो called धोकादायक इमारती खाली करून तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांना निवासी शिबिरात हलविले पण तिथे गेल्यावर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले. तिथे न धड पाण्याची सोय, आजूबाजूच्या खोल्यांमध्ये दारुडे आणि त्यांची सगळी घाण असा सगळा मामला होता. यात एकटे राहणाऱ्या वयस्कर लोकांचे फार हाल झाले. बाकी जागा जाईल म्हणून कोणी राहती जागा सोडायलाहि तयार नवते. मालकाला आणि डेवलोप करणाऱ्या बिल्डरला तर असे भाडेकरू नकोच असतात. खरोखर कठीण आहे परिस्थिती. दिघ्याच्या बाबतीत तरी अनधिकृत/ अधिकृत पेक्षा मला हि केस फसवणुकीची वाटते. एका अर्थाने हा निर्णय दिघावासायांसाठी वरदान आहे, लोक रस्त्यावर यावीत यासारखी वाईट गोष्ट नाही, पण यामुळे कायदा मोडणाऱ्यांना अधिक बळ मिळेल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यासारख्यांना directly/indirectly भोगावे लागतील.

NiluMP 01/08/2016 - 23:51
My Dear Friend, There are other way to give justice to victims, like catch the builder, who have build these building, Municipal officer who supplied water, recover the money from them & give back to victims. Make a law that the electricity supplying company wont provide electricity to such building. Make accountable to ward officer, ward police officer and corporator if illegal construction & encroachment happen in their ward the will loose their jobs. Finally i don't understand why only government land are grabbed for encroachment and none of the mastermind get punished for this. And the Biggest joke, government is going to legalize all illegal construction till 2015 without giving guarantee that there will be no illegal construction & encroachment going to happen moving ahead.

कंजूस 29/07/2016 - 14:16
अगोदर पाडलेल्या सहा इमारती या निर्णायप्रमाणे पाडल्या असल्याने त्याची भरपाई सरकार बहुतेक देणार नाही. जेव्हा रहिवाशांना पंधरा वर्षांपुर्वी नोटिस आली होती की "तुमची इमारत स्थानिक सिडकोच्या परवानगीशिवाय आहे" तेव्हाच सरकारकडे एक रीतसर अर्ज करून ठेवायला हवा होता की आमचा विचार करा आणि मार्ग काढा.प्रकरण सरकारकडे गेले असते आणि कोर्टात न गेल्यामुळे काहीच निर्णय झाला नसता.

जगप्रवासी 29/07/2016 - 14:23
पण एक कळत नाही की जर अनधिकृत जागेवर बांधकाम केलेली इमारत आहे तर त्यावर स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात. आणि बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत. हे अनधिकृत जागेवर बिनधास्त राहणार आणि आपण अधिकृत जागेवर टीचभर घर घेण्यासाठी आयुष्यभर राबणार.

In reply to by जगप्रवासी

पैसा 29/07/2016 - 14:27
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सुद्धा नसते. बँकेच्या ऑफिसरला गोडाऊनमधे कोंडून घालून सँक्शनवर सह्या घेतात. हे बिहारमधे नव्हे तर माझ्या वर्गमित्राच्या बाबत मुंबईत झाले आहे.

In reply to by जगप्रवासी

संदीप डांगे 29/07/2016 - 15:06
महसूल विभागाच्या अखत्यारीत जमिनीची वैधता तपासणे येत नाही, ते फक्त नोंदणी करतात, पुढे काहीही झोल झाले तर हात वर करतात असा अनुभव आहे,

In reply to by संदीप डांगे

अमितदादा 29/07/2016 - 15:17
बरोबर..आणि हेच लोकांना माहित नसते...आज ही माज्या माहितीतले लोक आस बोलतात कि सरकार ने फी घेतलीय नोंद करून घेतलीय म्हणजे कायदेशीर असणारच...

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

संदीप डांगे 29/07/2016 - 15:31
गावातल्या सगळ्या जमिनीच्या कुंडल्या ज्याच्या हातात तो तलाठी!!! शहरात कोण ते माहिती नाही, पण रीतसर इतिहास काढता येतो, अगदी दोनशे तीनशे वर्ष जुन्या नोंदीही तपासून बघता येतात, सामान्यपणे मोठ्या बॅंक्स यासाठी मदत करतात

In reply to by जगप्रवासी

NiluMP 30/07/2016 - 15:05
हि बांधकामे स्थानिक नेते, पोलिस, प्रशासन यांच्या आशिर्वादाने झालेली आहेत

पैसा 29/07/2016 - 14:25
कायदे पाळणे हा कुठेही शुद्ध मूर्खपणा असतो. तुम्ही जर कायदे मोडणार्‍यांकडे दुर्लक्ष केले तर तो तुमचा दुबळेपणा समजला जातो. एव्हाना आदर्श सुद्धा नियमित झाले असेल. सलमानच्या पोलीस अंगरक्षकाचे काय झाले आठवा. पण तरीही कायदे पाळणे रक्तात भिनले आहे. ते झटकून टाकता येत नाही. याबद्दल स्वतःचाच भयंकर राग येतो.

अमितदादा 29/07/2016 - 14:38
लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा कठोरपणे आणि सगळ्यांना समान राबावाय हवा। पण कधी कधी अनधिकृत बांधकामाचा विचार केल्यास त्यातील एक अगतिक बाजू दिसून येते. काही लोकांना इमारत अधिकृत आहे की नाही हेच मुळात माहित नसते, हि जरी त्यांची चुकी असली तरी फक्त बिल्डर च्या चुकीची किमंत ह्या लोकांच्या आयुष्याची पुंजी नष्ट करून कशी चुकवायची. ग्रामीण भागात घर शेतजमिनीवर बांधताना NA कॉलेक्टर ऑफिस मध्ये करून घ्यावा लागतो, पण आपण कलेक्टर ऑफिस मध्ये सामान्य लोकांना काय किंमत दिली जाते हे जाणतोच, तसेच गावातून कचेरी मध्ये चकरा मारून लोक वैतागून जातात आणि घर बांधून टाकतात. हि घर फक्त आधी परवानगी घेतली नाही म्हणून बेकायदेशीर ठरतात. सरकार ने पहिली व्यवस्था सुधारली पाहिजे आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे, तसेच लोकांना समजेल उमजेल अशी कायदेशीर प्रक्रिया कराय हवी. अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रात आज अशी. काही चुकले असल्यास दाखवून कृपया सांगावे.

In reply to by टवाळ कार्टा

संदीप डांगे 29/07/2016 - 22:15
एवढ्यातच एका महान माणसाबद्दल कळले होते, पठ्ठ्याने एकाच फ्लॅटवर दोन ब्यान्केकडून एकाच वेळी कर्ज काढले, नंतर तोच फ्ल्याट एकाच वेळी तीन जणांना विकलाही. हा पैसे घेऊन फरार आणि ते 'पाच मालक' आपसात भांडत आहेत की मालकी नक्की कोणाची. ही आत्ता आत्ताची गोष्ट आहे गेल्या तीनेक वर्षातली. कायदे-बॅकग्राउंड चेक कडक असूनही...

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 29/07/2016 - 22:28
माझे एक बाॅस होते असे. त्यांनी एक इक्विपमेंट ३ बँकांकडे गहाण ठेवली होती. नंतर स्वतः अ शिवाजी पार्क भागातला Flat ही तशाच पद्धतीने गहाण ठेवायचा प्रयत्न केला. ते अंगाशी आलं.सध्या साहेब कोर्टाकडून absconder म्हणून घोषित झालेले आहेत.

In reply to by संदीप डांगे

अंतु बर्वा 30/07/2016 - 01:46
अशा केसेस बद्दल एक शंका आहे. ब्यांक ओरिजिनल अ‍ॅग्रीमेंट घेतल्याशिवाय लोन डिसबर्स करत नाहीत. मग ही लोकं बाकीच्या दोन ब्यांकांना तारण म्हणुन काय देत असतील? जनरल मोडस ऑपरेंडी समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.

In reply to by अंतु बर्वा

एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य असेल. शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत असे प्रकार ऐकले आहेत. एवीतेवी कर्ज माफ होणारच आहेत म्हणुन बँकेतला एखादा करप्ट अधिकारी डमी शेतकरी उभे करुन कर्ज लाटतात. ख.खो.दे.जा.

झेन 29/07/2016 - 16:00
पाळणा-याची आजकाल किव करतात. नो एनट्री/राँग साईड नी दूचाकी वरून तीघे जण गेल्यावर चौकातल्या पोलीसांच्या नजरेत वेगळाच आदर दीसतो(काही दिवसांनी सँल्यूटपण मारतिल). कुठल्याही कर विभागात कर बुडवणा-या लोकांना सन्मान देण्यासाठी दर काही वर्षांनी एखादी योजना निघतेच, सध्या आयकर विभागाची चालू आहेच. मानव अधिकार सुध्दा जेवढा गून्हा मोठ्ठा तेवढे जास्त. उगीच नाही कुणी शिलाई यंत्र वाटंत. साहेब तूमच आपलं काही तरीच हां.

अर्धवटराव 30/07/2016 - 02:25
पण कायद्याची ताकत ऑव्हरएस्टेमेट करणं हा गुन्हा आहे. शेवटी कायदा हा इंटरप्रिटर आणि अंमलदारांच्या मर्जीवर अवलंबून असतो, व ते आम आदमीच्या मतदानावर.

In reply to by एकुलता एक डॉन

NiluMP 30/07/2016 - 15:09
हि बातमी वाचल्यावर मी ठरवले आहे आपणही झोपडपटटीत घर घ्यावे कारण कोणतेही सरकार येउन देत त्यांना हात लावण्याची कोणाचीच हिंमत नाही

In reply to by NiluMP

चलत मुसाफिर 31/07/2016 - 08:52
काही वर्षांपूर्वी मी ठाण्यातील एका पांढरपेशा भागात गुंतवणुकीसाठी फ्लॅट शोधत होतो तेव्हा एका एजंटने मला हा "पर्याय" सुचवला होता. म्हणतो कसा, "साहेब, पन्नास लाखाचा फ्लॅट घेण्याऐवजी पंधरा लाखाची खोली घ्या अमक्या झोपडपट्टीत. रेशनकार्ड बनवून घ्या. ती पुनर्विकासाला येणार आहे लवकरच. मग तिथे फ्लॅट मिळेल, तो विका पाचपटीने". आम्ही हात जोडून बाहेरचा रस्ता पकडला.

In reply to by एकुलता एक डॉन

चंपाबाई 31/07/2016 - 18:23
लोकानी झोपडप्टीएत ५ वर्षापुर्वी पत्र्याच्या खोल्या घेतल्या होत्या तीन लाखाला. आता त्या १५ लाखाला विकून पनवेलात फ्लॅट घेतलेत.

विवेकपटाईत 30/07/2016 - 15:29
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.

विवेकपटाईत 30/07/2016 - 15:29
एकदा दिल्लीला या. इथल्या ७० टक्के वासाहिती बेकायदेशीर आहेत. लोकांकडे रजिस्ट्री सुद्धा नसते. तरीहि जमीन किंवा घरे कित्येकदा विकली जातात. बाकी हम करे सो कायदा हीच दिल्लीकरांची वृत्ती आहे.

चंपाबाई 31/07/2016 - 05:25
हेच काँग्रेसने केले असते तर मिसळपाववर प्रचंड गदारोळ झाला असता... काँग्रेस भ्रष्ट आहे ते आमच्यासारख्या ट्याक्स पेयरचे पैसे पाणी वीज हे लोक पळवतात इ सगळे मुद्दे इथे डिस्कस झाले असते... पण हे चर्चिष्ट लोक आता गायब झालेत.

हे थांबायला हवं,कडक कायदे असल्याशिवाय व त्या कायद्यांची अंमलबजावनी झाल्याशिवाय हे थांबणार नाही.अश्या केसेससाठीसुद्धा जलदगती दिवाणी न्यायालये असायला हवीत.

साधा मुलगा 01/08/2016 - 23:10
लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे. कायद्याने चालणाऱ्या माणसांची आज काळ थट्टाही केली जाते, पण हि थट्टा करत असताना आपण लॉंग टर्म मध्ये काय गमावून बसणार आहोत याचे कुणाला भान नसते. कायदा मोडणारी बिनदिक्कतपणे कायदा मोडतात पण आपण मात्र काही करू शकत नाही. मी जे काही पेपरात वाचले आहे आणि लोकांकडून ऐकले आहे त्यातून आपण अधिकृतपणे राहतो याची कीव वाटायला लागली आहे. अधिकृत इमारत असेल धोकादायक इमारतच्या नावाखाली नवा छळ मांडला आहे. नको त्या अनेक इमारतींना गरज नसताना धोकादायक बनवून २४ तासात इमारत खाली करण्याचे आदेश देणे वगैरे चालते, यात बिल्डर, राजकारणी, महानगर पालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश असतो. मागच्या वर्षी ठाण्यात जी बिल्डिंग पडली ती महानगर पालिकेने धोकादायक म्हणून खरेतर जाहीर केलीच नव्हती. त्यानानातर जागे झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक अश्या सो called धोकादायक इमारती खाली करून तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांना निवासी शिबिरात हलविले पण तिथे गेल्यावर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले. तिथे न धड पाण्याची सोय, आजूबाजूच्या खोल्यांमध्ये दारुडे आणि त्यांची सगळी घाण असा सगळा मामला होता. यात एकटे राहणाऱ्या वयस्कर लोकांचे फार हाल झाले. बाकी जागा जाईल म्हणून कोणी राहती जागा सोडायलाहि तयार नवते. मालकाला आणि डेवलोप करणाऱ्या बिल्डरला तर असे भाडेकरू नकोच असतात. खरोखर कठीण आहे परिस्थिती. दिघ्याच्या बाबतीत तरी अनधिकृत/ अधिकृत पेक्षा मला हि केस फसवणुकीची वाटते. एका अर्थाने हा निर्णय दिघावासायांसाठी वरदान आहे, लोक रस्त्यावर यावीत यासारखी वाईट गोष्ट नाही, पण यामुळे कायदा मोडणाऱ्यांना अधिक बळ मिळेल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यासारख्यांना directly/indirectly भोगावे लागतील.

NiluMP 01/08/2016 - 23:51
My Dear Friend, There are other way to give justice to victims, like catch the builder, who have build these building, Municipal officer who supplied water, recover the money from them & give back to victims. Make a law that the electricity supplying company wont provide electricity to such building. Make accountable to ward officer, ward police officer and corporator if illegal construction & encroachment happen in their ward the will loose their jobs. Finally i don't understand why only government land are grabbed for encroachment and none of the mastermind get punished for this. And the Biggest joke, government is going to legalize all illegal construction till 2015 without giving guarantee that there will be no illegal construction & encroachment going to happen moving ahead.
http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-illegal-buildings-before-2015-to-be-regularised/articleshow/53440561.cms आज ही बातमी वाचून हसावं की रडावं तेच कळेना राव ! आयुष्यभर झगडून एक एक पै जोडून घर विकत घेण्यासाठी १७६० कायदे पाळणारा माणूस मूर्ख असतो काय ? हे कुठंतरी थांबायला हवं.... हेच करायचं होतं तर इतका आटापिटा का केला आधी ? लोकांचा अजून किती अंत पाहणार ? नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

नीलमोहर ·

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर 18/01/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा 19/01/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर 20/01/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर 18/01/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा 19/01/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर 20/01/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.