✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

T
Trump यांनी
Wed, 06/29/2022 - 23:04  ·  लेख
लेख
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38732 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

नाही

क्लिंटन
Wed, 07/06/2022 - 21:17 नवीन
नाही. १. कारशेड मेट्रो मार्गाच्या दोन पैकी एका टोकाच्या पलीकडे असायला पाहिजे. मेट्रो गाड्यांच्या देखभाल / दुरुस्तीसाठी त्या गाड्या कारशेड नेतात. तसेच रात्री त्या गाड्या कुठेतरी ठेवायला लागतात त्या तिथे नेतात. तिथून त्या गाड्या सकाळी मेट्रो मार्गावर आणतात. इंदू मिल या मार्गाच्या मधेच आहे. ती पण खुद्द मार्गावर नाही तर एक मेट्रो स्टेशन असलेल्या सिद्धीविनायक मंदिरापासून एखाद किलोमीटरवर आहे. २. समजा कारण १ हे इतके महत्त्वाचे नाही असे गृहीत धरले तरी कांजूरमार्ग येथे कारशेड साठी १०२ एकर जागा दिली होती तर डॉ. आंबेडकरांच्या इंदू मिलमध्ये स्मारकांसाठी १२ एकर जागा दिली गेली होती. इंदू मिलमध्ये पुरेशी जागा आहे असे वाटत नाही. बाकी इंदू मिलच्या आजूबाजूला भरपूर इमारती आणि लोकवस्ती आहे. तिथे कार शेड करता येईल का याविषयी कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अच्छा, असे असते का. छान छान.

कॉमी
Wed, 07/06/2022 - 18:34 नवीन
अच्छा, असे असते का. छान छान.
4. केंद्रीय मदत ही जास्त मिळेल हा ही फायदा होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मविआचे सरकार गेले. पण नक्की

शाम भागवत
Fri, 07/08/2022 - 06:30 नवीन
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मग काय मंडळी, शेवटी काय ठरलं? नक्की कोण जिंकलं? . मला वाटतंय की सरतेशेवटी हिंदूत्व जिंकलं. :)
  • Log in or register to post comments

अर्थातच भाजपवाले जिंकले.

श्रीगुरुजी
Fri, 07/08/2022 - 07:49 नवीन
अर्थातच भाजपवाले जिंकले. भाजपचा टिळा लावलेले १५-२० जण मंत्री होणार, उपमुख्यमंत्रीपद व.सभापतीपद ही अत्यंत महत्त्वाची मंत्रीपदे भाजपला मिळाली. १२ नियुक्त आमदारांपैकी ८ भाजपचे असणार. प्रताप सरनाईक, भावना गवळी, संजय राठोड वगैरे सुद्धा जिंकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचे कट्टर समर्थक सुद्धा जिंकले कारण त्यांचे आवडते नेते सत्तेत आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत

शाम भागवत
Fri, 07/08/2022 - 09:20 नवीन
कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत उत्तर झाले. जिंकले ते हिंदुत्व. जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असे ढोंग करायला लागावे हा

श्रीगुरुजी
Fri, 07/08/2022 - 10:06 नवीन
असे ढोंग करायला लागावे हा हिंदुत्वाचा विजय? अत्यंत भ्रष्ट व हिंदुत्वद्वेष्ट्यांना अभय मिळणे हा हिंदुत्वाचा विजय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

नास्तीक वाले आस्तिक असल्याचे

श्रीगुरुजी
Fri, 07/08/2022 - 10:37 नवीन
नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत. याच निकषानुसार इस्लामचा विजय झाला असेही म्हणता येईल कारण हिंदुत्ववादी पक्षाच्या फडणवीसांनी दर्ग्यावर चढवून आणलेली चादर कपाळाला लावून नमस्कार केला, डोक्यावर जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी दिली, कोणत्या तरी दर्ग्यासमोर झुकते, सेनेचे सुद्धा धर्मांध टिपूचे नाव मैदानाला दिले, जनाब ठाकरे असा उल्लेख सुरू केला, अजान स्पर्धा भरविली . . . हा तर इस्लामचा विजय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बर.

शाम भागवत
Fri, 07/08/2022 - 13:23 नवीन
बर. फडणीसांपेक्षा तुम्हीच हुषार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ठाकरे सरकार जाणे हा

श्रीगुरुजी
Fri, 07/08/2022 - 13:40 नवीन
ठाकरे सरकार जाणे हा हिंदुत्वाचा विजय असलं काही तरी भंपक लिहायचं आणि ते सप्रमाण खोडून काढल्यावर त्यावर उत्तर देता आलं नाही की असे टोमणे येतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बर.

शाम भागवत
Fri, 07/08/2022 - 15:20 नवीन
बर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष

कॉमी
Sun, 07/10/2022 - 19:13 नवीन
अगदी जेन्यूईन प्रश्न. जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत. ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे

श्रीगुरुजी
Sun, 07/10/2022 - 19:37 नवीन
हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे केले तरी कोणाला काहीही फायदा नाही. मग असल्या प्रकारांचे ढोंग करून तर अजिबातच फायदा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

कॉमी
Sun, 07/10/2022 - 22:03 नवीन
हेच म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्याचा तुम्हाला, मला किंवा

चौकस२१२
Tue, 07/12/2022 - 07:25 नवीन
ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ? माझे २ पैश्याचे नास्तिक उत्तर - प्रत्यक्ष आणि ताबडतोब जरी फायदा नसाल हे मान्य केले तरी लांब पल्याचाच फायदा आहे ते असे जसे ख्रिस्ती धर्मप्रचारक कष्ट करून लांब पल्य्याच्या दृष्टितीने आपलं धर्म वाढवतात तसेच काहीसे ( यात धर्माची पकड = आर्थिक साम्राज्य हे गृहीत धरावे ) १) जे काही उरले सुरले हिंदूं आहेत त्यावर जगातील २ बलाढय धर्म आपल्या कडे खेचू पाहत आहेत त्यावर थोडा आळा बसेल २) हिंदू काहीही खपवून घेतो या पारंपरिक समजुतीला तडा जायला मदत ३) आपलं ब्रँड ( येथे हिंदू धर्म = भारत = तेथील संस्कृती - योगापासून ते खाण्यापर्यंत सर्व आले ) वाढायला मदत एकूण काय भारत या देशात ( तरी) हिंदू या बहुसंख्य धर्माचं लोकशी कारण नसताना धवलढवळ करू नका हा संदेश जाईल गेली अनेक वर्षे हिंदूताला " ह" जरी उच्चारला तरी महापाप समजले जायचे ते आता उघडपणे बोलणे/ कला यातून हिंदू संस्कृती ची उजळं आणि प्रसार होत असेल तर काय वाईट आहे ! ( मध्यंतरी मिपावर सध्याचे चित्रपट कसे खते हिंदुत्व पसरवत आहते वैगरे आज जगातील विविध संस्कृती / धर्म सामावून घेणारे धर्म फार कमी आहेत त्यात हिंदू धर्माचा क्रमांक खूप वरती लागतो .. पण त्याची अशी हेळसांड एका ठराविक वृत्ती मुले एवढी झाली ती गाडी परत फिरत असेल तर चांगलेच आहे असे एक जन्माने हिंदू पण कर्माने अधार्मिक असलेलया माझे मत आहे आता मी अग्नोस्टिक का काय ते असल्यामुळे जरी भारतात हिंदूंचे प्रभुत्व वाढले कि नाही याने मला फरक पडला नाही पाहिजे तरी पण जर मला विचारले कि कोणाचा प्रभाव तुला वाढलेला आवडेल तर खालील प्रमाणे १) हिंदू ( पण हिंदुराष्ट्र्र नको ) २) बुद्ध ३) जैन ४) झोरॅष्ट्रियन ५) ख्रिस्ती असो तर हे झाले हिंदुत्वाच्या बाजूने आता " समविचारी " हिंदुत्ववाद्यांशी " देऊळ नको शाळा बांधा " वैगरे विषयवार भांडायला मी मोकळा "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

<strong> शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले </strong>

डँबिस००७
Sun, 07/10/2022 - 13:05 नवीन
शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले तर बाकिच्यांनी कोणाकडे बघायच. लक्षात घ्या रात्र वैर्याची आहे. सर तन से जुदा च्या काळात आप आपल्यात नुसताच सद्भावना असुन चालणार नाही तर पुढे योग्य योजना असणे गरजेच आहे. कोणीतरी नेता येऊन काही तरी करेल अशी अपेक्षा ठेवुन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवुन घेण्यापेक्षा आपल्या परीने काय करता येईल हे पहाणे जास्त चांगले आहे, त्यासाठीच ब्रेन स्टॉर्मींग व्हायला पाहीजे. आता भजपा प्रणित केंद्र सरकार मुस्लिम तुस्टीकरणापासुन त्यांच्या तृप्तीकरणा पर्यंत पोहोचला आहे. जागतीक राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर अश्या तात्पुरत्या जुमल्याची गरज असेल तर माहिती नाही पण ह्यातुन हिंदु स माजाला वाईट संदेश जात आहे. त्या पेक्षा वाईट मेसेज खुद्द मु समाजाला जात आहे की त्यांनी काही केले तरीही माफ आहे. उ प्र मधल्या निवडणुकां मध्ये स्पष्ट दिसले आहे की मुस्लिम बहुल भागात उ प्र सरकारच्या योजनांचा चांगला लाभ उचलणारे मुस्ल्मिम लोक शेवटी आपल मत मुस्लिम नेत्यांनाच देतात भले ते जेल मध्ये पडलेले असु देत. अजुनही जेल मधुन निवडणुक लढवता येते ? श्रीलंकेच्या परिस्थितीची समिक्षा हिंदु समाजा कडुन होणे गरजेच आहे. कदाचीत भारताने श्रीलंकेला आपल्यात समावुन घेतल तर चिनच्या एका डावाचा खातमा होईल. पण असे बोलणे हे आजच्या बुद्धिवाद्यांच्या गळी उतरणार नाही. मिपावर तरी तुम्ही हिंदु आ हात म्हणुन बोलु शकता, तिथे म बो वर तर वारच करायला बसलेले आहेत. मि पा चा चांगला उपयोग करत आपापसातले मतभेद विसरुन कामाला लागा. आपल्या परिने परिस्थितीच आकलन करा व समाजाला मार्गदर्शन करा. आता त्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments

भागवतराव व माझ्यात तसे भांडण

श्रीगुरुजी
Sun, 07/10/2022 - 13:27 नवीन
भागवतराव व माझ्यात तसे भांडण नाही. ते फडणवीस समर्थक आहेत व मी फडणवीस विरोधक आहे, हाच बहुतेक एकमेव मतभेदाचा मुद्दा आहे. बाकी पवार, मविआ, सेना, कॉंग्रेस वगैरे बाबतीत आमच्या मतांमध्ये फार फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

श्रीगुरुजी : भागवतराव व

डँबिस००७
Sun, 07/10/2022 - 13:30 नवीन
श्रीगुरुजी : भागवतराव व माझ्यात तसे भांडण नाही. शाम तुमच्या कडुन ही येऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भांडण?

शाम भागवत
Sun, 07/10/2022 - 22:01 नवीन
भांडण? माझं? काहीही. माझं लक्ष फक्त मतदान टक्केवारी वरून हिंदूत्व वाढतंय की कमी होईल होतंय यावर असतं. त्या जनरल ट्रेंडला मी महत्व देतो. कारण विवेकानंद व गुरूदेव रानडे यांनी हिंदुत्वाचे महत्व वाढत जाईल असं सांगितलेलं आहे. शिवसेना व फडणवीस हे आपलं गुरूंजीना चिडवण्यासाठी असतं. कोणि आलं गेलं तरी मला फरक पडत नाही. मी मायबोलीवरची चर्चाही आरामात वाचू शकतो. बिलकूल त्रास वगैरे काही होत नाही. अगदी कागलकरचं पण वाचू शकतो. ;) पण मग व्यग्रता वाढायला लागली की काही दिवस युट्यूबसकट सगळं बंद करून टाकतो. अजिबात चुकल्या चुकल्यासारखं होतं नाही. असो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

आजही कोर्टात निर्णय होणार का?

कंजूस
Mon, 07/11/2022 - 08:01 नवीन
सुनावणी चालूच राहणार. कारण एकाच वेळी बरेच अर्ज आहेत. नाना पटोळेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन रिकामी झालेली जागा लगेच भरायला हवी होती. ते नव्या सरकारने भरली.
  • Log in or register to post comments

उद्धव ठाकरेंचे ११ खासदार

प्रसाद_१९८२
Mon, 07/11/2022 - 15:01 नवीन
उद्धव ठाकरेंचे ११ खासदार शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीसाठी १८ पैकी फक्त ७ खासदार उपस्थित होते.
  • Log in or register to post comments

काकांचं काय ?

गामा पैलवान
Tue, 07/12/2022 - 02:10 नवीन
उद्या काका पवारांवर हीच वेळ आली तर? एक आपली शंका. जाम धमाल येईल. -गा.पै.
  • Log in or register to post comments

२००४ मध्ये संगमा यांनी

एकुलता एक डॉन
Tue, 07/12/2022 - 02:23 नवीन
२००४ मध्ये संगमा यांनी राष्ट्रवादी वर आपला हक्क सांगितलं होता ,पवार साहेब हाय कोर्टात वाट बघत बसले ,शेवटी संगमा तृणमूल मध्ये विलीन झाले
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा