ताज्या घडामोडी मे २०२२

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
1 May 2022 - 5:32 pm

गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.

निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.

https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor-...

प्रतिक्रिया

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या "कविता बितान" आणि 'अथक साहित्यिक शोध' या पुस्तकासाठी नव्याने स्थापन केलेला राज्य पुरस्कार जिंकला आहे.

ह्या पुरस्कारामुळे साहित्यीक जगतात सर्वांना ममता बॅनर्जी ची दखल घ्यावी लागत आहे.

Author Returns Award, Another Quits Post After Bangla Academy Honours WB CM's Poetry https://thewire.in/books/mamata-award-ratna-rashid-banerjee-anadiranjan-...

Literary award for Mamata begins to draw protests
https://www.thehindu.com/news/national/other-states/literary-award-for-m...

काड्यासारू आगलावे's picture

15 May 2022 - 7:09 pm | काड्यासारू आगलावे

केतकीबाई चितळे ह्यांनी मोदींचे गुरू शरदचंद्रजी पवार ह्यांच्या विरूध्द काहीतरी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली म्हणे. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ह्या केतकीबाई चितळे बंधूं मिठआईवाल्यांच्या कुणीतरी लागतात (?). नाव काढलं पोरीने हो!

काड्यासारू आगलावे's picture

15 May 2022 - 7:09 pm | काड्यासारू आगलावे

केतकीबाई चितळे ह्यांनी मोदींचे गुरू शरदचंद्रजी पवार ह्यांच्या विरूध्द काहीतरी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली म्हणे. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ह्या केतकीबाई चितळे बंधूं मिठआईवाल्यांच्या कुणीतरी लागतात (?). नाव काढलं पोरीने हो!

डँबिस००७'s picture

15 May 2022 - 9:55 pm | डँबिस००७

केतकी चितळे वर गुन्हा दाखल करुन पोलिस जेल मध्ये टाकलय !!
"Fredom of Expression" की जय !!

कॉमी's picture

15 May 2022 - 10:17 pm | कॉमी

सहमत.
मोदींवर ट्विट केले म्हणून जिग्नेश मेवाणीला अटक, भिकार कविता शेअर केली म्हणून अटक

दोन्ही आणि अश्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी निषेधार्ह आहेत.

श्रीगुरुजी's picture

15 May 2022 - 10:49 pm | श्रीगुरुजी

+ १

महाराष्ट्रात हे प्रकार बऱ्याच जास्त प्रमाणात आहेत.

टीका केली म्हणून कुरमेसेला घरात उचलून आणून बेदम मारहाण, व्यंगचित्र पुढे पाठविले म्हणून ६२ वर्षीय नौसैनिक मदन शर्मांना बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने कंगना राणावतचे कार्यालय पाडणे, मी असतो तर मुख्यमंत्र्यांना कानफटात मारली असती असे नुसते म्हटल्याने नारायण राणेंच्या मागे पोलिसांची फौज पाठवून अटक करणे, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणणार असे नुसते म्हटल्याने राणा दांपत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याची कलमे लावून अटक आणि आता फक्त पवार एवढेच नाव असलेल्या कोणी तरी लिहिलेल्या ओव्या केतकी चितळेंनी पुढे ढकलल्याने तातडीने अटक.

परंतु,

मी मोदीला मारू शकतो, मी मोदीला शिव्या देऊ शकतो असे जाहीर बोलूनही पटोलेंवर कोणतीही कायदेशीर कारवाई नाही, त्या गाडीत मोदी असते तरीही ती गाडी शिवसैनिकांनी फोडली असती असे बोलूनही दीपाली सय्यदवर कोणतीही कारवाई नाही, आम्ही राणा दांपत्याला २० फूट जमिनीत गाडू असे जाहीर बोलूनही राऊतवर कारवाई नाही.

सहमत आहे. महाराष्ट्र सरकारची दडपशाही आणि गुंडगिरी चालली आहे.

डँबिस००७'s picture

15 May 2022 - 11:47 pm | डँबिस००७

श्रीगुरुजी,

सहमत , केंद्र सरकारच फॅसीस्ट असहीष्णु आहे, लोकांना उठसुठ तुरुंगात डांबतात.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 12:02 am | काड्यासारू आगलावे

पवारांच्या कार्यावर किंवा धोरणावर जरूर टिका करावी पण फक्त विद्वेषातून शारीरीक व्यंग, वयावरून बोलणे ( जसे केतकीच्या खानदानात कुणी म्हातारे झाले नाही/होनार नाही), चेहर्यावरून बोलणे हे फक्त द्वेषातून लिहीलेय ह्यावरून पवार समर्थक भडकू शकतात. तयकायदा व सुव्यवस्था नीट रहावी मिहणून अश्या लोकांवर कायदेशीर कारवाई करने योग्य आहे.बाकी राजकीय धोरणांवर टिका नी व्यंगावर टिका ह्यातील फरक समजून घ्यावा.
१०६ घरी बसवले पवारांनी म्हणूव ईतकाही राग धरू नयें. :)
फारच सलतंय असं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 8:23 am | श्रीगुरुजी

हे प्रकार खूप वाढलेत. किरीट सोमय्याच्या बोलण्यावरेन अनेक वर्षे टिंगलटवाळी सुरू आहे. फडणवीसांच्या वजनावरूनही अनेक वर्षे टिंगलटवाळी सुरू आहे. पवारांवर बहुतेक पहिल्यांदाच अशी जाहीर टवाळी झाली असावी. जेव्हा सोमय्या व फडणवीसांची टिंगलटवाळी होत होती तेव्हा पवार व त्यांचा पक्ष गप्प होते. मग आता तक्रार का करता?

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 8:49 am | काड्यासारू आगलावे

लोक फडणवीस किंवा सोमय्यांची टिंगल टवाळी नाव न घेता करतात. लोक काय ते समजून जातात. पण ईथे थेट पवार, ८० वय, त्यांचा चेहरा ह्याचा नाव घेऊन द्वेष दिसलाय.

आमच्या गावात आहेत एक पवार .. "रावसाहेब पवार" ८० वर्षाचे आहेत .. तोंडातुन बोलताना फवारा उड्तो. त्यांनी पण केस टाकावी काय ?
पवार आहेत म्हणुन म्हटलं.

आता आख्या महाराष्ट्रात एकमेव पवार असतील तर तो भाग वेगळा ... :-)

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 9:06 am | श्रीगुरुजी

तिलीत तोमय्या असे नाव घेऊन टिंगलटवाळी करताना किरीट सोमय्या डोळ्यासमोर असतात की हा कोणी वेगळा माणूस आहे?

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 9:09 am | श्रीगुरुजी

त्या ओव्यांमध्ये फक्त पवार एवढेच नाव होते. या आडनावाचे हजारो नागरिक सापडतील.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 9:15 am | काड्यासारू आगलावे

कोर्टात जाऊन युक्तिवाद करा, किंवा ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करा त्यांच्या विरूध्द खटला भरा.

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 9:34 am | श्रीगुरुजी

मुद्द्यावर उत्तर नसल्याने अपेक्षित प्रतिसाद.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 9:51 am | सुबोध खरे

@ काड्यासारू आगलावे
ईथे थेट पवार, ८० वय, त्यांचा चेहरा ह्याचा नाव घेऊन द्वेष दिसलाय.

कुणीतरी त्यांचं नाव घेऊन त्यांना "मैद्याचं पोतं" म्हणलं होतं त्यावेळेस हि सगळे गप्पच होते.

बाकी टरबूज्या, खून की दलाली, नीच इ विशेषणे आपण विसरलात काय ?
कि निवडक विस्मरण होतंय

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 10:07 am | श्रीगुरुजी

"वाकड्या तोंडाचा गांधी", "पांढरी पाल" ही मल्लीनाथी विसरलात का?

विशेषतः नारायण राणेंना स्वत:हून पक्षातून काढल्यानंतर पुढील काही दिवस सामनातून त्यांच्याबद्दल जे अत्यंत असभ्य व विखारी लिहिले जात होते तितके असभ्य व विखारी लेखन मी आजतागायत वाचले किंवा ऐकले नाही. त्या लेखनावर आजतागायत कोणीही टीका केल्याचे मी वाचले किंवा ऐकले नाही. उलट ठाकरी भाषा असे विशेषण लावून अशा अर्वाच्य शिव्यांचे आजतागायत कौतुकच सुरू आहे. या कौतुकात भाजपसहीत सर्व पक्ष, तथाकथित बुद्धीवादी विचारवंत, पुरोगामी वगैरे सामील आहेत.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 10:34 am | काड्यासारू आगलावे

मग करायची होती की ठाकरेंना अटक. कुणी अडवलं होतं??

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 10:33 am | काड्यासारू आगलावे

मान्य. पण त्यात पवार मरावे, नरक वाट पाहतय, तोंड वाकडं झालं ईतकी खालची पातळी गाठली नव्हती.

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 11:02 am | श्रीगुरुजी

बरोबर आहे.

२० फूट खोल मातीत गाडू, औरंगजेबाच्या कबरीशेजारी तुमची कबर बांधू, मोदींचा बाप आला तरी तुम्ही महाराष्ट्रात आमचं वाकडं करू शकणार नाही ही भाषा फारच सौम्य म्हणायची.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:29 pm | सुबोध खरे

तोंड वाकडं झालं ईतकी खालची पातळी गाठली नव्हती

कशाला उगाच सारवा सारव करताय?

हरामखोर म्हणायचे आणि त्याचा अर्थ नॉटी आहे अशी मल्लिनाथी करायची.

हरामखोर म्हणणे हि तर अत्यंत खालच्या दर्जाची शिवी आहे आणि ती त्या व्यक्तीला नसून त्या व्यक्तीच्या मात्यापित्यांना दिलेली शिवी आहे.

त्यांना अटक करणार का हे कल्याणकारी सरकार?

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 2:07 pm | श्रीगुरुजी

गां*, भ**, च्यु*, यड** हे सभ्य शब्द विसरलात का?

पवारांनी सुद्धा प्रचारात "कुस्ती पैलवानांशी खेळतात. (उजवा हात आडवा करून) यांच्याशी खेळत नाहीत." असे अत्यंत असभ्य उद्गार काढले होते. अजून एका सभेत "आंधळ्याचा हात कुठेतरी . . ." असे अत्यंत असभ्य वाक्य अर्धवट उच्चारले होते.

अगदी हेच लिहायला आलो होतो. दुसर्‍याची वेळ आली की मजा घ्यायची .. आपल्यावर आले की थयथयाट ..

पवारांच्या कार्यावर किंवा धोरणावर जरूर टिका करावी पण फक्त विद्वेषातून शारीरीक व्यंग, वयावरून बोलणे ( जसे केतकीच्या खानदानात कुणी म्हातारे झाले नाही/होनार नाही), चेहर्यावरून बोलणे हे फक्त द्वेषातून लिहीलेय ह्यावरून पवार समर्थक भडकू शकतात.

जे भडकतील त्यांना आवरा मग. उद्या अमुक तमुक बोलल्यावर अमके ढमके भडकणार म्हणून आम्ही बोलायचे नाही असे चालणार नाही. थेट हिंसेला प्रवृत्त करणारे बोलले तरच कायद्याने लक्ष द्यावे. हे "अमुक बोलला तर आम्ही भडकून दंगा करू" हे संपूर्ण समाजाला वेठीला धरण्याचा प्रकार आहे, आजिबात खपवून घेतला जाऊ नये.

बाकी राजकीय धोरणांवर टिका नी व्यंगावर टिका ह्यातील फरक समजून घ्यावा.

फरक आहे हे माहिती आहे. शारीरिक व्यंगावर बोलणे चुकीचे असले तरी कायद्याने दखल घेण्यासारखी गोष्ट नाहीये हे उलटे तुम्ही समजून घ्या.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 10:30 am | काड्यासारू आगलावे

असं म्हणता? मग मागे ह्याच चितळे बाईंना “मराठीची फडफड करू नका“ वगैरे बोलून मराठीचा अपमान केला होता तेव्हा अनेकांनी तिला जाब विचारला होता. त्यावर तिची तकिरार घएयेऊन फडणवीसांनी तात्काळ अटकसत्र राबवलं होतं. त्यावेळेस तुम्ही नी आतर भाजपेयी काय करत होतात?

कॉमी's picture

16 May 2022 - 10:34 am | कॉमी

तेव्हा ही बातमी बहुतेक माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती किंवा मिसळपाव वर चर्चा झाली नव्हती. मला ते सुद्धा आवडले नसतेच. हि गोष्ट मी पहिल्यांदा ऐकतोय.

पण तुम्हाला चालू घडामोडींवर बोलता येईना म्हणून मागे मागे पळत आहात. व्हॉटअबौट्री करत.

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 10:46 am | श्रीगुरुजी

याची लिंक द्या.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 11:32 am | काड्यासारू आगलावे

सध्या पवार प्रकरण वर असल्याने अनेक लिंकांचं ऊत्खनन करावं लागेल. तोपर्यंत ही पहा.
हिंदा राष्ट्रभाषा
मराठीचे झेंडे फडफडवू नका.
शिवाजी महाराजांचा एकेरी ऊल्लेख
६ डिसेंबर ला फूकट प्रवास वगैरे अनेक पराक्रम गाजवलेत ह्या बाईंनी.

https://www.timesnowmarathi.com/amp/maharashtra-news/mumbai-news/article...

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 1:58 pm | श्रीगुरुजी

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे सांगणारी केतकी चितळेंची चित्रफीत आहे का?

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत, अने मराठी नेते सातत्याने हिंदीत बोलतात, संसदेत अनेक मराठी नेते हिंदीत शपथ घेतात. त्यामुळे याबाबतीत केतकी चितळे काही वेगळे वागलेल्या नाहीत. मी केतकींच्या ज्या चित्रफिती पाहिल्यात त्यात हिंदी, मराठी व इंग्लिश या तीनही भाषा वापरल्या होत्या.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत. "शिवाजी कोण होता" या नावाचे गोविंद पानसरेंनी पुस्तक लिहिले आहे. पूर्वी काही इतिहासकारांनी सुद्धा असाच एकेरी उल्लेख केला आहे (बहुतेक नरहर कुरूंदकर असावे).

६ डिसेंबर बदल दरवर्षी वाचकांच्या पत्रात असेच छापून येते. केतकी काही वेगळे बोललेल्या नाही.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 2:44 pm | काड्यासारू आगलावे

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत, तुमचे लाडके फडणवीसच बोललेले की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्याला देशाची राष्ट्रभाषा नाहीत नाही त्याला मूख्यमंत्री बनवनार्यांची दया येते. मतं देणार्यांची तर जास्त.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत. ईतरांनी केला म्हणून केतकीचा समर्थनीय ठरतो का? जगात अनेक लोक खून करतात मग मी केला तर बिघडले कुठे ह्या छापाचे बोलणे झाले हे.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 2:44 pm | काड्यासारू आगलावे

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत, तुमचे लाडके फडणवीसच बोललेले की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्याला देशाची राष्ट्रभाषा नाहीत नाही त्याला मूख्यमंत्री बनवनार्यांची दया येते. मतं देणार्यांची तर जास्त.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत. ईतरांनी केला म्हणून केतकीचा समर्थनीय ठरतो का? जगात अनेक लोक खून करतात मग मी केला तर बिघडले कुठे ह्या छापाचे बोलणे झाले हे.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 2:44 pm | काड्यासारू आगलावे

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत, तुमचे लाडके फडणवीसच बोललेले की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्याला देशाची राष्ट्रभाषा नाहीत नाही त्याला मूख्यमंत्री बनवनार्यांची दया येते. मतं देणार्यांची तर जास्त.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत. ईतरांनी केला म्हणून केतकीचा समर्थनीय ठरतो का? जगात अनेक लोक खून करतात मग मी केला तर बिघडले कुठे ह्या छापाचे बोलणे झाले हे.

श्रीगुरुजी's picture

16 May 2022 - 2:55 pm | श्रीगुरुजी

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून कॉंग्रेसनेच महाराष्ट्रात हिंदी शिकणे सक्तीने केले होते व महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू केले होते. त्यांना मुख्यमंत्री करणाऱ्यांची आणि त्यांना मत देणाऱ्यांची सुद्धा कीव येते का?

कोणाचाच समर्थनीय ठरत नाही. पण सिलेक्टिव्ह विरोधाला माझा विरोध आहे.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 11:32 am | काड्यासारू आगलावे

सध्या पवार प्रकरण वर असल्याने अनेक लिंकांचं ऊत्खनन करावं लागेल. तोपर्यंत ही पहा.
हिंदा राष्ट्रभाषा
मराठीचे झेंडे फडफडवू नका.
शिवाजी महाराजांचा एकेरी ऊल्लेख
६ डिसेंबर ला फूकट प्रवास वगैरे अनेक पराक्रम गाजवलेत ह्या बाईंनी.

https://www.timesnowmarathi.com/amp/maharashtra-news/mumbai-news/article...

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 9:46 am | सुबोध खरे

हे केंव्हा झाले?

त्यांना दलित आंदोलनात रेल रोको बद्दल अटक झाल्याचे वाचले होते.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 9:51 am | सुबोध खरे

हा प्रश्न श्री कॉमी याना जिग्नेश मेवानी बद्दल आहे

कॉमी's picture

16 May 2022 - 10:13 am | कॉमी

इथे वाचु शकता. आसाम पोलिसांनी अटक केलेली.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:35 pm | सुबोध खरे

ट्विट मध्ये काय म्हटलंय ते यात नाही

कॉमी's picture

16 May 2022 - 12:55 pm | कॉमी

He has tweeted that Prime Minister Modi "considered Godse as God". Twitter has since deleted his tweets.

डँबिस००७'s picture

15 May 2022 - 10:09 pm | डँबिस००७

" श्री शरद पवारांनी पाकिस्तानची तारीफ केलेली आहे. पाकीस्तानातील आम जनता शांतीपुर्ण वातावरण मागत आहे पण तेथील काही लोक द्वेष पसरवत आहेत. "

पाकीस्तानी लोकांच मन फक्त पवार साहेबांनाच कळलय !

पाकीस्तान कंगाल होण्याच्या पातळीवर पोहोचला आहे. अश्या परिस्थीतीत पाकिस्तानातील जनता कस व किती धैर्य दाखवते ते येणारा काळच सांगेल !

https://youtu.be/NPjjM_XtV8U

sunil kachure's picture

16 May 2022 - 8:40 am | sunil kachure

श्री राम चे नाव घेवून राजकारण करणाऱ्या लोकात किती नम्र पना हवा,संयम हवा,नीतिमत्ता हवी.
१) जागतिक स्तरावर दिसणाऱ्या हिंदी न्यूज चॅनेल वर उघड उघड भारताच्या च एका राज्याच्या मुख्यमंत्री असलेला व्यक्ती च एकेरी उल्लेख केला जातो ,अर्वाच्य भाषा वापरली जाते.
जग हसत ह्यांच्यावर पण ह्यानाच स्वतःची चूक दिसत नाही.
२)एक अभिनेत्री पण राज्याच्या सीएम चा एकेरी उल्लेख करते ते पण टीव्ही वर जाहीर रित्या.
हे नक्की श्री राम ना आदर्श मानतात का?असा मोठा प्रश्न आहे.
कोण तो navy officer तो पण निवृत्त त्यांनी कोणती पोस्ट केली होती ती पण इथे ध्या म्हणजे म्हणजे ते ध्यान काय लायकीचे आहे ते पण माहीत पडेल.
आज पर्यंत राज्यात तरी bjp नेते किंवा समर्थक ह्यांनी राज्यसरकार च्या कामावर टीका केली नाही.
पण अर्वाच्य भाषेत सीएम असतील किंवा बाकी नेते त्यांच्या वर शिवराळ भाषा मात्र वापरली आहे.
ह्याला विचार स्वतंत्र किंवा अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 9:53 am | सुबोध खरे

आज पर्यंत राज्यात तरी bjp नेते किंवा समर्थक ह्यांनी राज्यसरकार च्या कामावर टीका केली नाही.

कचरे बुवा

आपला लिहिणारा डावा मेंदू आणि विचार करणारा उजवा मेंदू यात सामंजस्य आणि संवाद नाही हे आपण परत परत का सिद्ध करताय?

sunil kachure's picture

16 May 2022 - 12:07 pm | sunil kachure

राज्याच्या कोणत्या प्रश्नावर bjp चे नेते बोलतात.
तुम्ही च काही उदाहरणे ध्या.उगाच परंपरा दाखवून हस करून घेवू नका.
Bjp फक्त.
राम मंदिर,हनुमान चालीसा,चीन,पाकिस्तान,मुस्लिम ह्या असल्या बेकार भावनिक मुध्यावर च बोलते.
महागाई,बेरोजगारी,सिंचन व्यवस्था, कोळसा पुरवठा,वाढलेले व्याज फार, खडयात जात असलेली अर्थ व्यवस्था.प्रचंड महाग इंधन0 अशा विषयावर bjp चे नेते आणि कार्यकर्ते काही बोलत नाहीत.
हनुमान चालीसा ह्यांना महत्वाची वाटते.भोंगे महत्वाचे वाटतात
सर्व भावनिक ब्लॅक मेलिंग आणि त्या आडून देशाची लूट.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:36 pm | सुबोध खरे

कचरे बुवा

आपला लिहिणारा डावा मेंदू आणि विचार करणारा उजवा मेंदू यात सामंजस्य आणि संवाद नाही हे आपण परत परत का सिद्ध करताय?

sunil kachure's picture

16 May 2022 - 1:30 pm | sunil kachure

काँग्रेस सरकार नी सशस्त्र दलातील लोकांना मरे पर्यंत निवृत्त वेतन देण्याची पद्धत चालू केली आहे त्याचा dr खरे तुम्ही फायदा घ्या आणि त्यांच्यावर च टीका करा.
खरेच तुम्ही खरे असाल तर भावनिक मुध्ये सोडून देशाच्या आर्थिक स्थिती विषयी लिहीत जा,भ्रष्ट prashasan विषयी लिहीत जा.महागाई विषयी लिहीत जा. बेरोजगारी विषयी लिहीत जा ,शेतकरी ,कामगार अशा गरीब वर्गविषयी लिहीत जा.
माझ्या पूर्ण आयुष्यात खाद्य तेल 200 पार गेलेले फक्त मोदी सरकार च्या काळात बघितले.
पेट्रोल 100 पर पहिल्यांदाच बघितले.
आणि धार्मिक उन्माद पहिल्यांदाच बघत आहे.

वामन देशमुख's picture

16 May 2022 - 2:05 pm | वामन देशमुख

काँग्रेस सरकार नी सशस्त्र दलातील लोकांना मरे पर्यंत निवृत्त वेतन देण्याची पद्धत चालू केली आहे

अरे देवा!
मिपानं अधोगतीचा रसातळ गाठलाय.

सशस्त्र दलातील लोकांना मरे पर्यंत निवृत्ती वेतन देणे हा निर्णय bjp सारख्या मित्र प्रेमी पक्षाचा नाही.
110000%
काँग्रेस शिवाय हा निर्णय कोणी घेणे शक्य नाही.जास्त च मागे गेले तर ब्रिटिश .
पण bjp हा पक्ष नक्कीच नाही .ते सत्तेवर असते तर निवृत्ती वेतन सोडा जेवण पण सशस्त्र दलाना दिले नसते.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 2:46 pm | काड्यासारू आगलावे

कंट्रोल डाॅक्टर कंट्रोल

डँबिस००७'s picture

16 May 2022 - 3:41 pm | डँबिस००७

सध्या भारत व ओमान दरम्यान द्विपक्षीय मीटींग सुरु आहेत. ह्या मिटींग मध्ये सैन्य सुरक्षा सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु आहे.

ह्या चर्चैत Free Trade Agreement साठी ओमान ने भारताच्या केंद्र सरकारला गळ घातलेली आहे . त्या साठी ओमान सरकारच्या अधिकारी आपल्या देशातील बिझीनेस प्रमुखांच्या टीमला बरोबर घेउनच पोहचले होते.
Free Trade Agreement ईतक्या त्वरेने करता येणार नाही अशी स्पष्ट भुमिका
भारत सरकारने घेतलेली आहे. FTA साठी भारताने आपल्या अटी ओमान समोर ठेवल्या आहे.
सध्या भारतीय निर्मीत ओषधाला ओमानमध्ये मान्यता नाही. भारतीय निर्मीत ओषधाला युरोप, अमेरीका सारख्या प्रगत देशात सुद्धा मान्यता मिळालेली आहे.

ओमानने भारतीय निर्मीत ओषधाला ओमानमध्ये मान्यता त्वरीत द्यावी.

तसेच ओमान मध्ये "रुपये कार्ड" स्वीकार्ह व्हाव अशी दुसरी अट भारत सरकारने ओमान समोर ठेवलेली आहे.

ओमान दोन्ही अटी मान्य करायला तयार झालेला आहे.

भारत सरकारची यशोगाथा !!