आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
प्रतिक्रिया
हो. मिसळपाव, ऐसी, मनोगत, मायबोली अशा सर्वांचा उल्लेख केलाय आवर्जून. तेही वेळेची मर्यादा असताना.
अतिरंजित वगैरेबद्दलही रोखठोक बोललेत. विशेष म्हणजे उत्स्फूर्तपणा. इतकी नावे आणि संदर्भ लागोपाठ देणे म्हणजे अभ्यास दांडगा.
मराठवाड्यातील साहित्य संमेलन आणि प्रा डॉ स्वतः साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून एखादा धागा, वृत्तांत येईल असे वाटले होते. पण त्यांनी स्वतः थेट साहित्य संमेलनात भाषण केले, ही सुखद बातमी आहे.
प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!
भाषणात मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख आल्याने भरून आले आहे.
सरांचे अभिनंदन.
धन्यवाद.
बिरुटेसरांचे थेट भाषण ऐकुन मजा आली.
--
भाषण करण्याचा आत्मविश्वास व शैली आवडली.
जाणते राजे.
अभिनंदन!
बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.
अभिनंदन!
बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.
बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन!
वल्लीदा यांनी वर म्हटल्याप्रमाणे मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख केल्याबद्दल खरच खूप बरं वाटलं पण त्याच बरोबर अजून एक मीपकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता असं वाटलं.
छान संवाद ! आवडला.
मिपाकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता ह्याला अनुमोदन. त्यांच्याशी इथल्या बरेच जणांचे सुर जुळले नव्हते पण त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि तळमळ होती हे जाणवायचे. अर्थात बिरुटे सरांकडून त्यांचा उल्लेख अनावधाने राहून गेला असेल त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
अवांतर : गविंचे शेतीविषयक लेखन कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलेले दिसते. कोणी दुवा देऊन दूवा घेता का ?
नाही हो. त्यांना एकूण मराठी संकेतस्थळांवर लिहिणारे काही लोक अशा अर्थाने नावे उल्लेखायची असावीत. पण शेतकरी हा केन्द्रस्थानी विषय असल्याने बोलण्याच्या ओघात मिक्स झाले असावे. बोलण्याच्या ओघात अस्मादिकांस शेतात मुक्काम करविला असावा. उगीच लिन्का शोधत बसू नये. तसेही रामदासकाका आणि सन्जोपराव यांच्या पंगतीला शेतातही बैठक जमणे सन्मानाचेच __/\__
धन्यवाद.
@गवि -- आता शेतीवर एक फर्मास लेख येउच द्या !!
गंगाधर मुटे हे शेतकरी चळवळीतलं मोठं नाव आहे. आणि नवलेखकांना घेऊन शेतीविषयकच विषय घेऊन संकेतस्थळ चालवणे, शेतीविषयक उपक्रम राबविणे, नव्या लेखकांना प्रोत्साहन देणे असे साहित्यिक उपक्रम कायमच करीत असतात. पहिले शेतकरी साहित्य संमेलन वर्ध्याला झाले तेव्हा मला त्यांनी मराठी साहित्यातले शेतकरी चित्रण असेच काही तरी विषयावर बोलावले होते. पुढे ऑनलाईन संमेलनासही मी वक्ता म्हणून उपस्थित होतो, त्यांचे आणि माझी विचारांची देवाण-घेवाण कायम असते. पण, काल गडबडीत त्यांचं नाव विसरुन गेलो. शेतकरी संघटनेचे नेते. शरद जोशीसाहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यानंतर त्यांची साहित्यविषयक चळवळ पुढे नेणारे म्हणून गंगाधर मुटे यांचे नाव घ्यायचेच होते, अनावधानाने राहूनच गेले. :(
-दिलीप बिरुटे
तुम्हाला वेळ संपल्याने ज्या खाणाखुणा आणि इशारे होत होते त्यामुळे बरेच काही आवरावे लागले आणि लक्ष विचलित झाले असे जाणवले. त्या ओघात राहून गेले असू शकेल.
प्राडॉ सरांच्या अभिनंदनीय सखोल भाषणातून झालेला विषय परिचय खूप भावला. मी सर्वच मंचांच्या वेळेवरील बंधने सैल असण्याच्या बाजूचा आहे प्राडॉ सरांना याच विषयावर अजून ऐकणे नक्कीच आवडले असते. सोबत मराठी आंतरजालावरील साहित्याचा साहित्य म्हणून व साहित्यिकांचा साहित्य संमेलनात आवर्जून उल्लेख उलेखनीय आहेच.
सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
हा परिसंवाद आहे असं गृहीत धरून मला पडलेले इतर प्रश्न -
१. मागच्या भल्या मोठ्या पडद्याचा वापर काही भंगार कविता आणि अॅग्रोवनछाप व्हिडिओ लूपवर प्ले करून काय फायदा? अशा स्क्रीनचा सुयोग्य (डोळ्यांना सुखकारक आणि चांगल्या ग्राफिक डिझायनरला हाताशी धरून) वापर करून आपले मुद्दे व्यवस्थित मांडता आले असते ते कोणाच्याच कसं डोक्यात येत नाही?
२. समकालीन राजकीय मौखिक मराठीची सगळ्यांनाच भीषण लागण झालेली आहे. 'याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून याठिकाणी अशाप्रकारचं त्याठिकाणी त्यासंदर्भात'!! कसं सोडवायचं हे ग्रहण? दुर्गा भागवत यांनी कित्येक वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की वाणीशास्त्रावर मराठीत काहीही मेहनत घेतली जातच नाही, मौखिक मराठी पुढे जाऊन भयंकर रूप धारण करणार आहे ( उच्चारण शुद्धाशुद्ध वगैरे असं मी म्हणत नाही, बोलताना एकंदरीत कसं बोलावं, ठहराव, वाक्यांची सांधेजोड, रिपीटिशन कसं करावं इत्यादी, आपला भाषणाचा पीच, टेम्पो, नाद कसा सांभाळायचा, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फिजीकल मर्यादा काय आहेत, त्या उणिवा कशा भरून का इत्यादी. प्राध्यापकांना हे कितपत शिकवलं जातं हे माहित नाही). हे बिरुटे सरांना उद्देशून नाही, एकंदरीतच अशा परिसंवादांमध्ये हे सगळं अगदी प्राथमिक दर्जावर सुरू असतं.
३. भाषणाच्या सुरुवातीला आपण प्रत्येक वेळेस सगळ्या मान्यवरांची नावं का उगाळत बसतो? नशीबानं कमी मान्यवर आहेत हे बरं नाहीतर एरवी प्रत्येकजण तेच रिपीट करून सगळ्यांचीच किमान २० मिनिटं तरी वाया जातात. आणि ते आभार मानण्याचं दळण दळायची अजूनही काय हौस आहे लोकांना? नुसती नावं घेऊन आभार मानल्यावर काय साध्य होतं? म्हणजे आभारप्रदर्शनात सगळ्यांची नावं घेत अजूनएक पाचदहा मिनिटं टाईमपास!!
४. साहित्यसमेलनांमधली वेळापत्रकं पाहिली. दीडदीड तासांचे काटेकोर नियोजन केलेलं असतं. आणि अर्थातच हे काहीकेल्या अजिबातच पाळलं जातच नसणार!! तरीही असं वेळापत्रक का आखलं जातं? वेळेबाबत आपण इतके फाजील कसे काय असतो आपण? राजकीय सभांचं ठीक आहे. पण चांगली शिकली सवरलेली लोकं एकत्र येऊन ही उशीरांची भातुकली का खेळत बसतात? बर्याच ठिकाणी बफर वेळ नसतो. ज्या लोकांना आमंत्रित केलं आहे त्यांना वेळेचे अजिबातच भान नसते.
बिरुटे सरांच्या भाषणाविषयी -
१. सर्व प्रथम काहीप्रमाणात विद्यासहित बोलल्याने अभिनंदन. (बरेच लोक्स नुसतीच अंदाजे क्वांटिटी सांगून सामान्य विधानं करत बसतात)
२. 'शेतकर्यांचे चित्रण' हा विषय घेतला आहे तर 'शेतकरी' या एन्टिटीची व्याख्या काय ठरविली आहे?
मी ही टेक्निकली शेतकरी आहे. माझंही काही एक विकत घेतलेलं, वडिलोपार्जित, मातॄकोपार्जित शेत आहे. ते आम्ही टाइमपास म्हणून कसतो तरी आमचे शेतीविषयक प्रश्न आहेत उदा. उत्पन्न खर्चाचा मेळ नाही, कुशल मनुष्यबळ नाही, ओपन मार्केट नाही इत्यादी इत्यादी. निमशहरी भागात जवळजवळ प्रत्येकाच्या नावावर थोडीफार शेती असतेच. म्हणजेच सगळे अल्पभूधारक शेतकरी असतात. शहरी लोकांचे फार्म्स पण असतात. तर मग विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी कोण आहे?
ज्याची पूर्ण उपजिविका शेतीवर अवलंबून आहे तो उत्पादक हीच भूमिका प्रामुख्याने जगणारा? भारतीय शेतकरी हा अनेकपदरी शेतकरी असतो. तंबाखूची शेती करणारा शेतकरी, ती विकत घेणारा अडत्या आणि त्याची सप्लायचेन ते संभाजी-विडीचा मालक हे सगळेच तंबाखूच्या शेतीवर अवलंबून असतात. आणि या सप्लायचेन मधल्या प्रत्येक घटकाची स्वतःची वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची शेती असते हा भाग वेगळाच! म्हणजे केवळ शेतकरी असून चालत नाही, त्याचा सप्लायचेन मधला रोल आणि त्याची फक्त उत्पादनावरती अवलंबून असलेली उपजिविका यानांच महत्त्व असलेला शेतकरी म्हणजे विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी म्हणावे लागेल.
मग -

- शेतमजूर ज्यांची मध्यप्रदेशात स्वतःची चार गुंठे पडीक शेती आहे पण दक्षिण महाराष्ट्रात द्राक्षाच्या मळ्यावर वार्षिक बोलीवर राबतात असे ते
- बीएस्सी अॅग्री झालेला शेती न करणारा मिस्त्री ( शेतीविषयक सल्ला देणारा, औषधं लिहून देणारा ) असा तो
- अॅग्रोमार्ट चालवणारा कन्नड बोलणारा लखीमचंद किंवा दुसरा कुणी भूमिपुत्र
- दुधाच्या टेम्पोचा डायव्हर आणि किन्नर (ड्रायव्हर आणि क्लीनर)
- नुसताच गुरं चारणारा गुराखी
- शेततळी बांधणारे, जेसीब्यांच्या पाळ्या करणारे पंजाबी किंवा भूमिपुत्र, मासे पुरवणारा बंगाली किंवा भूमिपुत्र
- जंगलावर अवलंबून असलेले समाज, मत्स्यशेतीवर अवलंबून असलेले समाज म्हणजे थोडक्यात कोळी लोक्स
- वरील सगळ्यांच्या बायका, मुली
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण शेतीवर अवलंबून आहेत उदा. गुळाचे व्यापारी
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण ज्यांची शेती आहे
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक ज्यांची स्वतःची शेती आहे
- ज्यांचे शेती केली जाते किंवा शेतीपूरक साहाय्य घेतले जाते असे समस्त मानवेतर जीवजंतू, त्यांचा विकास, उत्पादन आणि त्यायोगे शेतीवर अवलंबून असलेले समस्त मनुष्यगण
महाराष्ट्राखेरीज इतर शेतकर्यांचे माहित नाही पण बंगाली गरीब शेतकरी अजून आदिम काळात जगतो आहे. एक गुंठा शेत असेल तर अर्ध्या गुंठ्यात मत्स शेती आणि उरलेल्यात भात असा सरळ हिशोब असतो. (ही प्रत्यक्ष बघीतलेली परिस्थिती १० वर्षांपुर्वीची आहे. आता कदाचित बदल झालेला असू / नसू शकतो.)
एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला तो म्हणजे फक्त तुम्हालाच मिपा, मायबोली नावाचे जालावरचे साहित्य माहित होते की अन्य वक्त्यांना पण ऑनलाईन जगात काहितरी चालतं याची माहिती होती ? वक्त्यां / श्रोत्यांपैकी किती जणांना ही नावे माहिती होती याचा काही तपशील बोलण्याचालण्यातून हाती लागले काय ?
वक्त्यांशी या विषयावर बोलणे झाले नाही आणि श्रोत्यांशीही. बाकी, संकेतस्थळावील अनेक कवी, गझलकार यांचा साहित्य संमेलनात सहभाग असतो.
-दिलीप बिरुटे
अभिनंदन सर.
त्यात बरीच भाषणे आहेत.
डॉ प्रा बिरुटे यांचे भाषण 02:40:30 ते 02:56:16 वेळेत पाहता ऐकता येईल.
-------------
विविध समारंभांचे चित्रिकरण करून देणारे व्यावसायिक लोक किंवा समारंभांतील लोकांचे नातेवाईक असाच एक भला मोठा विडिओ काढून एकच डिजिटल फाईल देतात. पण त्याचे अर्धा पाऊम तासांचे तुकडे करून दिले तर फार बरं होईल.
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची लिंक मिळेल का
हणमंत आण्णा तुम्ही लईच सगळ्या बाजूने विचार करता की राव मानलं तुम्हाला.
कंकाका त्यात नि. गोऱ्हे यांचं भाषण म्हणजे चिवसेनेने असं केलं तस केल हा चिवचिवाट फुकट अर्धा तास वाया गेलाय.
तेवढा एखादा वक्ता भाषण करू शकला असता.
अजून चित्रफीत बघितलेली नाही पण एकंदरीत जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय, थोडी उसंत मिळाली कामातून का निवांत बघणार भाषण प्राध्यापक साहेबांचे.
भाषणाबद्दल प्राध्यापक साहेबांचे अभिनंदन आणि मिपा/मिपाकर/मिपाकरांचे लेखन किंवा एकंदरीत जालीय मराठी साहित्यिक घडामोडींचा उल्लेख केल्याबद्दल आभार.
💐 💐 💐
मेनू लैच जोरदार आहे, किमान हा मेनू वाचून तरी मला
"आपण निष्काम साहित्यसेवा धंद्यात का पडलो नाही ?"
हा प्रश्न कायम पडत राहणार आता
🤣 🤣 🤣 🤣
वाक्या वाक्याला त्यांची तळमळ जाणवत होती. भाषणात त्यांनी सादर केलेली शेतकरी साहित्याची जंत्री त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देते. ही जंत्री खरेतर कितीतरी मोठी असावी पण वेळे आभावी ती सगळी नावे त्यांना तिथे घेता आली नसावी. पण या विषयावर त्यांनी इथे एखादा प्रदिर्घ लेख जरुर लिहावा ही आग्रहाची विनंती.
मिपाचा झेंडा साहित्यसंमेलनातही रोवला गेला याचा सार्थ अभिमान वाटला.
रच्याकने :- जाता जाता त्यांनी कथा कथनाला मारलेला बाण मात्र अनावश्यक होता असे वाटले.
पैजारबुवा,
बिरुटे सर छानच बोलला आहात.
हणमंतअण्णा यांचा प्रतिसाद पण आवडला.
श्रोता म्हणून १) कोकण साहित्य संमेलन ,ठाणे येथे पूर्ण संमेलनात हजर राहण्याची संधी मिळाली आणि ते कायमचे आठवणीत राहील. २) डोंबिवली अ भा मध्ये चार पाच तास काढलेत।
दोन्ही ठिकाणी जेवण अप्रतिम होते. कार्यक्रमही आवडले.
कथाकथन,कवितावाचन यामध्ये दहापैकी आठ जणांचे संपू नये असे वाटणारे होते पण नियोजक घंटी वाजवून वेळ संपत आल्याची सूचना देत तेव्हा वाईट वाटायचं. वक्त्यांना वेळ अपुरी पडायची आणि महत्त्वाचे मुद्दे राहून गेल्याची रुखरुख जाणवायची.
नारळीकर चांगले वक्ते आहेत. दिलेला विषय सोडून कधीच बाहेर जात नाहीत आणि मराठी भाषणात इंग्रजी शब्द आणत नाहीत. पण उगाच खटाटोपही न करता पायरीपायरीने अंतिम गाठतात. पण नशिबाने ते मागच्या संमेलनात येऊ शकले नव्हते.
संमेलनाचे सूत्रधार तिकडचीच मराठी बोलत होते हे आवडले.
'पुणेकर' बिरुटे सर दिसतात कशे,बोलतात कशे हे पाहण्याची संधी मिळाली.
हणमंतअण्णाही चांगले लिहितात. त्यांनी मिपावर अधिकाधिक लेखन करावे ही विनंती.
व्वा, प्राडॉ सर, मिपाकर म्हणुन एकदम भारी वाटलं !
प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!
प्रा डॉ बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन !
मराठी संस्थळांचे, डिजिटल लेखनाचे स्थान अधोरेखित केल्याबद्दल अनेक आभार.
ही विधा वर्धिष्णू होतच राहणार आहे.
अभिनंदन.
यंदा कुठल्याही वृत्तपत्रात्/वाहिनीवर दरवर्षी असते तशी साहित्य संमेलनाविषयी चर्चा, बातमी दिसली नाही. पहिल्या दिवशी शरद पवार यांच्या भाषणाची बातमी आली, तेव्हा कळलं की साहित्य संमेलन सुरू झालंय!
सद्यस्थितीत राजकीय बातम्यांच्या धुळवडीत साहित्य संमेलन हरवलं, की उद्गीरला असल्याने बाजूला पडलं? की मध्ये दोन वर्षे खंड पडल्याने, म्हणावी तेवढी उत्सुकता नव्हती?
की एकूणच जनतेचा/वाचकांचा/रसिकांचा वाचनातील/संमेलनातील रस कमी झाला असावा? (की वाचक/रसिकच कमी झालेत?)
मराठी संस्थळांचे आणि एकुण लेखनचा लेखाजोगा उत्तम मुद्देसूद मांडल्याबद्दल प्रा. डॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणजे विद्वान लोकांचं विचार ऐकण्याची सुवर्ण संधी.
पण भारतीय हिंदी मीडिया तर मूर्ख च आहे मराठी मीडिया नी पण त्याची दखल घेतली नाही..अतिशय फालतू विषयावर २४, तास गुऱ्हाळ चालू असते
Dr बिरुटे ह्यांचे विचार खरोखर उत्तम आहेत
महत्वाचे म्हणजे ते अनैसर्गिक नाहीत त्यांना समाज विषयी तळमळ आहे.
अभिनंदन बिरुटे sir.
आणी धन्यवाद पण .
तुम्ही तळमळी ने समजतील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडले.
Thanks so much.
अभिनंदन प्रा. डॉ. दिलीप बिरुटे.
अभिनंदन
छान पद्धतीने विचार व्यक्त केले. वर उल्लेख आल्याप्रमाणे गंगाधर मुटे यांचा उल्लेख आला असता तर आणखीन छान झाले असते.
प्राडॉ,
भाषण जाम आवडलं. साहित्य वास्तवदर्शी असून पुरस्कारार्थ नसावं, हा आग्रह मनापासून पटला. वास्तवाचं म्हणाल तर शेतकरी कोणास म्हणावं हा हणमंतअण्णांचा प्रश्नंही मनांत येतोच.
अर्थात, या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी शेतकऱ्याच्या वास्तवाची प्रखरता तसूभरही कमी होत नाही. माझ्या मते सरकारी धोरणं शेतीस अनुकूल नसल्याने शेतकऱ्याच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. तुमच्या भाषणांत तुम्ही म्हणालात की १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर शेतकरी वर्गात एक समाधानाची लहर पसरली होती. याचं कारण की शासकीय धोरणं आता अनुकूल होतील हा दिलासा मिळाला होता. पण अर्थात, ते झालं नाही आणि शेतकऱ्याच्या व्यथा तशाच राहिल्या.
असो. तुमच्या भाषणासहित अन्य विचारांचा एखादा लेख बनवावा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
बिरुटे सरांचे भाषण आवडले. साहित्यातील शेतकरी या विषयावर छान आढावा घेतला आहे. गाथा सप्तशती पासुन मिसळपाव डॉट कॉम पर्यंत सगळ्यांचा ढांडोळा घेतला आहे. सर्व मराठी संकेत स्थळांची भरभराट होऊन उत्तम विषयांवर भर पडत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodiesहणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,
तुमचा इथला संदेश मनोमन पटला. एकंदरीत शेतकरी कोणास म्हणावं व त्या आधारावर शेतकरी साहित्याची वर्गवारी कशी करायची ही कूटं सोडवायला पाहिजेत.
अर्थात, सोडवली नाहीत तरी वास्तवाचा दाह तितकाच राहतो. माझ्या मते सरकारी धोरणं कृषीची पार वाट लावताहेत. कशी ते ठाऊक नाही. मी शेतकरी नाही व शेतीतलं काही कळंत नाही. पण जे काही वाचलंय त्यावरून वाटतं की शासनाला आस्थापनी शेती ( = कॉर्पोरेट फार्मिंग ) आणायचं आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण हे जर आणायचं झालं तर स्वालंबी शेतकरी नावाची जमात नाहीशी झाली पाहिजे.
शेतकरी देशोधडीस लागावा याकरताच जणू सरकारी धोरणं राबवली जातात की काय अशी शंका येते. शिवाय वैचारिक गोंधळही भरपूर आहे. कसा ते सांगतो. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? यावर कोणाकडेही कसलंही उत्तर नाही. फार काय देशपातळीवर केंद्र शासनात कृषी नावाचा विभागही नाही ( आता कदाचित असेल ). जगाच्या दृष्टीने भारतीय लोकं त्याच्यू ठरतात. कृषीप्रधान देश म्हणवतात आणि कुठल्याशा अर्थशास्त्रीय नियमानुसार कृषीची अक्षम्य हेळसांड करतात.
हे कुठेतरी बदललं पाहिजे. माझ्या मते कृषीचं जे उत्पन्न नाशवंत असतं ते लगेच टिकाऊ पदार्थांत रुपांतरीत करायची सोय शेताजवळ व्हावी. त्यातून कृषीउत्पन्नाधारित उद्योगधंद्यांची साखळी निर्माण होईल. आणि यथावकाश कृषी तृतीय श्रेणीतनं मूलगामी अशा प्रथम श्रेणीत येईल.
आ.न.,
-गा.पै.
प्रथम विद्यावाचस्पती प्राध्यापक श्री. बिरूटे यांचे भाषणाबद्दल अभिनंदन करतो. त्यांचे भाषण उत्कृष्ट आहे.
एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून?
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.हणमंतअण्णांचा प्रतिसाद खुप आवडला. विशेषत: सार्वजनिक बोली मराठीची जी अवनती झाली आहे तिसंबंधीचे त्यांचे मुद्दे चिंतनीय वाटले. बिरूटेंच्या भाषणातले मुद्दे आवडले. आसाराम लोमटे, कृष्णात खोत, रा रं बोराडे, सदानंद देशमुख असे काही मोजकेच लेखक शेतकर्यांचे पांग साहित्यातून थोडे तरी फेडताहेत असे वाटते.
बिरुटे सर,
आपली वक्तृत्वशैली आवडली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी आंतरजालाचे जुणे जाणते सदस्य आपले बिरुटे सर यांना उत्तम कामगिरी बजावताना पाहून खूप अभिमान वाटला. एखाद्या व्यक्तिचा फोटो पाहिल्यास मी मनात त्या व्यक्तिचा आवाज कसा असेल याचा अंदाज बांधत असतो. बिरुटे सरांच्या बाबतीत तो अंदाज सपशेल चुकला. सरांच्या आवाजातला गोडवा भाषणाची सुरुवात ऐकल्यावर लगेच जाणवला.
भाषणातून सरांचा व्यासंग जाणवला. परिसंवादाचा विषय पाहता अन सरांनी विस्ताराने मांडलेला मराठी आंतरजालाचा उल्लेख पाहता गंगाधर मुटे यांचे नाव येईल असे मलाही वाटले होते. अर्थात स्व. शरद जोशी यांचे सहकारी कार्यकर्ते यांचा उल्लेख असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांचा उल्लेख झाला आहेच.
यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात इतरही मिपाकरांनी हजेरी लावली असावी अशी अपेक्षा आहे.
अवांतरः 'डिजीटल मीडिया प्रेमी मंडळी' ही संस्था ‘मराठी सोशल मिडिया संमेलन’आयोजित करत असते. दुसरं सोशल मीडिया संमेलन २९ एप्रिले ते १ मे दरम्यान सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथे होणार आहे. ज्यांना रस आहे त्यांनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.
बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार जोरदार झाले, मुद्देही नेमकेपणाने उपस्थितांपर्यंत पोचले गेले.
वास्तविक प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा चळवळ्या, प्रस्थापितविरोधी स्वभाव बघता त्यांनी खरेतर विद्रोही साहित्य संमेलनात उपस्थिती लावायला हवी होती असे वाटून गेले पण त्यांनाही ह्या प्रस्थापितांच्या संमेलनात सामिल व्हावे असे वाटले यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यश आहे असे म्हणावेसे वाटते.
आँ?
मिपाकर प्रस्थापितच असतात ना?
बिरूटे सरांचे भाषण आणि हनुमंतअण्णांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले 👍
सरांची वक्तृत्वशैली आणि भाषणात घेतलेले मुद्दे, सांख्यिकी छानच.
अभिनंदन प्रा डॉ !
बिरुटे सर ,
अतिशय उत्तम , दमदार , जोरदार भाषण , देहबोली न मुद्दे ,
खूप खूप अभिनंदन !
श्रीरंग
उत्तम पोस्ट
आभार
वा, मस्त !