मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आकाशवाणीच्या आठवणी

चौकस२१२ ·

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:22
धम्माल भा..... री किस्से ! काही तर खतरनाक ! स्मृतिगंध हा दर्जदार यू ट्युब चॅनेल आहे. माझ्या आवडीचे काही कार्यक्रम पहात असतो !

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:22
धम्माल भा..... री किस्से ! काही तर खतरनाक ! स्मृतिगंध हा दर्जदार यू ट्युब चॅनेल आहे. माझ्या आवडीचे काही कार्यक्रम पहात असतो !
इये मराठीची नगरी ... मराठी आकाशवाणीच्या आठवणी नक्की बघा घोषणा करताना शब्द पुढे मागे केल्याने होणारे अनर्थ ( जसा शब्द लिहितं मुद्रा राक्षासाचा विनोद होतो तसेच काहीसे ) https://www.youtube.com/watch?v=o1oM8t5G8lk

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे भाषण.

गवि ·

In reply to by हेमंतकुमार

गवि 24/04/2022 - 13:41
हो. मिसळपाव, ऐसी, मनोगत, मायबोली अशा सर्वांचा उल्लेख केलाय आवर्जून. तेही वेळेची मर्यादा असताना. अतिरंजित वगैरेबद्दलही रोखठोक बोललेत. विशेष म्हणजे उत्स्फूर्तपणा. इतकी नावे आणि संदर्भ लागोपाठ देणे म्हणजे अभ्यास दांडगा.

मराठवाड्यातील साहित्य संमेलन आणि प्रा डॉ स्वतः साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून एखादा धागा, वृत्तांत येईल असे वाटले होते. पण त्यांनी स्वतः थेट साहित्य संमेलनात भाषण केले, ही सुखद बातमी आहे. प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!

Bhakti 24/04/2022 - 16:50
अभिनंदन! बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.

Bhakti 24/04/2022 - 16:50
अभिनंदन! बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.

सुरसंगम 24/04/2022 - 17:20
बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन! वल्लीदा यांनी वर म्हटल्याप्रमाणे मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख केल्याबद्दल खरच खूप बरं वाटलं पण त्याच बरोबर अजून एक मीपकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता असं वाटलं.

In reply to by सुरसंगम

छान संवाद ! आवडला. मिपाकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता ह्याला अनुमोदन. त्यांच्याशी इथल्या बरेच जणांचे सुर जुळले नव्हते पण त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि तळमळ होती हे जाणवायचे. अर्थात बिरुटे सरांकडून त्यांचा उल्लेख अनावधाने राहून गेला असेल त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. अवांतर : गविंचे शेतीविषयक लेखन कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलेले दिसते. कोणी दुवा देऊन दूवा घेता का ?

In reply to by धर्मराजमुटके

गवि 24/04/2022 - 19:19
नाही हो. त्यांना एकूण मराठी संकेतस्थळांवर लिहिणारे काही लोक अशा अर्थाने नावे उल्लेखायची असावीत. पण शेतकरी हा केन्द्रस्थानी विषय असल्याने बोलण्याच्या ओघात मिक्स झाले असावे. बोलण्याच्या ओघात अस्मादिकांस शेतात मुक्काम करविला असावा. उगीच लिन्का शोधत बसू नये. तसेही रामदासकाका आणि सन्जोपराव यांच्या पंगतीला शेतातही बैठक जमणे सन्मानाचेच __/\__ धन्यवाद.

In reply to by धर्मराजमुटके

गंगाधर मुटे हे शेतकरी चळवळीतलं मोठं नाव आहे. आणि नवलेखकांना घेऊन शेतीविषयकच विषय घेऊन संकेतस्थळ चालवणे, शेतीविषयक उपक्रम राबविणे, नव्या लेखकांना प्रोत्साहन देणे असे साहित्यिक उपक्रम कायमच करीत असतात. पहिले शेतकरी साहित्य संमेलन वर्ध्याला झाले तेव्हा मला त्यांनी मराठी साहित्यातले शेतकरी चित्रण असेच काही तरी विषयावर बोलावले होते. पुढे ऑनलाईन संमेलनासही मी वक्ता म्हणून उपस्थित होतो, त्यांचे आणि माझी विचारांची देवाण-घेवाण कायम असते. पण, काल गडबडीत त्यांचं नाव विसरुन गेलो. शेतकरी संघटनेचे नेते. शरद जोशीसाहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यानंतर त्यांची साहित्यविषयक चळवळ पुढे नेणारे म्हणून गंगाधर मुटे यांचे नाव घ्यायचेच होते, अनावधानाने राहूनच गेले. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 24/04/2022 - 19:52
तुम्हाला वेळ संपल्याने ज्या खाणाखुणा आणि इशारे होत होते त्यामुळे बरेच काही आवरावे लागले आणि लक्ष विचलित झाले असे जाणवले. त्या ओघात राहून गेले असू शकेल.

माहितगार 24/04/2022 - 19:05
प्राडॉ सरांच्या अभिनंदनीय सखोल भाषणातून झालेला विषय परिचय खूप भावला. मी सर्वच मंचांच्या वेळेवरील बंधने सैल असण्याच्या बाजूचा आहे प्राडॉ सरांना याच विषयावर अजून ऐकणे नक्कीच आवडले असते. सोबत मराठी आंतरजालावरील साहित्याचा साहित्य म्हणून व साहित्यिकांचा साहित्य संमेलनात आवर्जून उल्लेख उलेखनीय आहेच.

हा परिसंवाद आहे असं गृहीत धरून मला पडलेले इतर प्रश्न - १. मागच्या भल्या मोठ्या पडद्याचा वापर काही भंगार कविता आणि अ‍ॅग्रोवनछाप व्हिडिओ लूपवर प्ले करून काय फायदा? अशा स्क्रीनचा सुयोग्य (डोळ्यांना सुखकारक आणि चांगल्या ग्राफिक डिझायनरला हाताशी धरून) वापर करून आपले मुद्दे व्यवस्थित मांडता आले असते ते कोणाच्याच कसं डोक्यात येत नाही? २. समकालीन राजकीय मौखिक मराठीची सगळ्यांनाच भीषण लागण झालेली आहे. 'याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून याठिकाणी अशाप्रकारचं त्याठिकाणी त्यासंदर्भात'!! कसं सोडवायचं हे ग्रहण? दुर्गा भागवत यांनी कित्येक वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की वाणीशास्त्रावर मराठीत काहीही मेहनत घेतली जातच नाही, मौखिक मराठी पुढे जाऊन भयंकर रूप धारण करणार आहे ( उच्चारण शुद्धाशुद्ध वगैरे असं मी म्हणत नाही, बोलताना एकंदरीत कसं बोलावं, ठहराव, वाक्यांची सांधेजोड, रिपीटिशन कसं करावं इत्यादी, आपला भाषणाचा पीच, टेम्पो, नाद कसा सांभाळायचा, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फिजीकल मर्यादा काय आहेत, त्या उणिवा कशा भरून का इत्यादी. प्राध्यापकांना हे कितपत शिकवलं जातं हे माहित नाही). हे बिरुटे सरांना उद्देशून नाही, एकंदरीतच अशा परिसंवादांमध्ये हे सगळं अगदी प्राथमिक दर्जावर सुरू असतं. ३. भाषणाच्या सुरुवातीला आपण प्रत्येक वेळेस सगळ्या मान्यवरांची नावं का उगाळत बसतो? नशीबानं कमी मान्यवर आहेत हे बरं नाहीतर एरवी प्रत्येकजण तेच रिपीट करून सगळ्यांचीच किमान २० मिनिटं तरी वाया जातात. आणि ते आभार मानण्याचं दळण दळायची अजूनही काय हौस आहे लोकांना? नुसती नावं घेऊन आभार मानल्यावर काय साध्य होतं? म्हणजे आभारप्रदर्शनात सगळ्यांची नावं घेत अजूनएक पाचदहा मिनिटं टाईमपास!! ४. साहित्यसमेलनांमधली वेळापत्रकं पाहिली. दीडदीड तासांचे काटेकोर नियोजन केलेलं असतं. आणि अर्थातच हे काहीकेल्या अजिबातच पाळलं जातच नसणार!! तरीही असं वेळापत्रक का आखलं जातं? वेळेबाबत आपण इतके फाजील कसे काय असतो आपण? राजकीय सभांचं ठीक आहे. पण चांगली शिकली सवरलेली लोकं एकत्र येऊन ही उशीरांची भातुकली का खेळत बसतात? बर्‍याच ठिकाणी बफर वेळ नसतो. ज्या लोकांना आमंत्रित केलं आहे त्यांना वेळेचे अजिबातच भान नसते. बिरुटे सरांच्या भाषणाविषयी - १. सर्व प्रथम काहीप्रमाणात विद्यासहित बोलल्याने अभिनंदन. (बरेच लोक्स नुसतीच अंदाजे क्वांटिटी सांगून सामान्य विधानं करत बसतात) २. 'शेतकर्‍यांचे चित्रण' हा विषय घेतला आहे तर 'शेतकरी' या एन्टिटीची व्याख्या काय ठरविली आहे? मी ही टेक्निकली शेतकरी आहे. माझंही काही एक विकत घेतलेलं, वडिलोपार्जित, मातॄकोपार्जित शेत आहे. ते आम्ही टाइमपास म्हणून कसतो तरी आमचे शेतीविषयक प्रश्न आहेत उदा. उत्पन्न खर्चाचा मेळ नाही, कुशल मनुष्यबळ नाही, ओपन मार्केट नाही इत्यादी इत्यादी. निमशहरी भागात जवळजवळ प्रत्येकाच्या नावावर थोडीफार शेती असतेच. म्हणजेच सगळे अल्पभूधारक शेतकरी असतात. शहरी लोकांचे फार्म्स पण असतात. तर मग विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी कोण आहे? ज्याची पूर्ण उपजिविका शेतीवर अवलंबून आहे तो उत्पादक हीच भूमिका प्रामुख्याने जगणारा? भारतीय शेतकरी हा अनेकपदरी शेतकरी असतो. तंबाखूची शेती करणारा शेतकरी, ती विकत घेणारा अडत्या आणि त्याची सप्लायचेन ते संभाजी-विडीचा मालक हे सगळेच तंबाखूच्या शेतीवर अवलंबून असतात. आणि या सप्लायचेन मधल्या प्रत्येक घटकाची स्वतःची वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची शेती असते हा भाग वेगळाच! म्हणजे केवळ शेतकरी असून चालत नाही, त्याचा सप्लायचेन मधला रोल आणि त्याची फक्त उत्पादनावरती अवलंबून असलेली उपजिविका यानांच महत्त्व असलेला शेतकरी म्हणजे विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी म्हणावे लागेल. मग -
  1. शेतमजूर ज्यांची मध्यप्रदेशात स्वतःची चार गुंठे पडीक शेती आहे पण दक्षिण महाराष्ट्रात द्राक्षाच्या मळ्यावर वार्षिक बोलीवर राबतात असे ते
  2. बीएस्सी अ‍ॅग्री झालेला शेती न करणारा मिस्त्री ( शेतीविषयक सल्ला देणारा, औषधं लिहून देणारा ) असा तो
  3. अ‍ॅग्रोमार्ट चालवणारा कन्नड बोलणारा लखीमचंद किंवा दुसरा कुणी भूमिपुत्र
  4. दुधाच्या टेम्पोचा डायव्हर आणि किन्नर (ड्रायव्हर आणि क्लीनर)
  5. नुसताच गुरं चारणारा गुराखी
  6. शेततळी बांधणारे, जेसीब्यांच्या पाळ्या करणारे पंजाबी किंवा भूमिपुत्र, मासे पुरवणारा बंगाली किंवा भूमिपुत्र
  7. जंगलावर अवलंबून असलेले समाज, मत्स्यशेतीवर अवलंबून असलेले समाज म्हणजे थोडक्यात कोळी लोक्स
  8. वरील सगळ्यांच्या बायका, मुली
  9. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण शेतीवर अवलंबून आहेत उदा. गुळाचे व्यापारी
  10. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण ज्यांची शेती आहे
  11. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक ज्यांची स्वतःची शेती आहे
  12. ज्यांचे शेती केली जाते किंवा शेतीपूरक साहाय्य घेतले जाते असे समस्त मानवेतर जीवजंतू, त्यांचा विकास, उत्पादन आणि त्यायोगे शेतीवर अवलंबून असलेले समस्त मनुष्यगण
ह्या सगळ्यांना कोण विचारतो? म्हणजे विषयाला 'अभिप्रेत' असलेला शेतकरी हा किती लहान सबसेट आहे? मग त्याला का इतकं महत्त्व द्यायचं? मग 'शेतकरी' शब्दाची व्याप्ती वाढवावी लागणार! अशा सगळ्या शेतकर्‍यांना 'आडव्या रेषा' मानू ..यांना जाती-पाती, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, पर्यावरणीय स्थिती ( खोर्‍यातली, दुष्काळी, समुद्रकिनार्यावरची अशा ) या उभा रेषांनी छेद दिल्यावर जी मेश तयार होते ती खरेतर मेस आहे!! ३. अशा मेसचे खरे चित्रण काय खोटे चित्रण काय दोन्ही सारखेच!! कसला वास्तववाद आणि कसली कल्पकता!! कुणा लेखकाचे ढुंगण इतके ब्रॉड आहे जो या सगळ्या मेशवर अंडी उबवून साहित्यिक पिल्ली प्रसवेल? इतरही काही प्रश्न आहेत ते सविस्तर मांडतो > तोवर हा मेन्यू पाहून तोंडाला पाणी आणि मायमराठीच्या साहित्यिक भविष्याबद्दल विचार करून फेस सुटला आहे हे नमूद करून रजा घेतो. text

In reply to by हणमंतअण्णा शंक…

महाराष्ट्राखेरीज इतर शेतकर्‍यांचे माहित नाही पण बंगाली गरीब शेतकरी अजून आदिम काळात जगतो आहे. एक गुंठा शेत असेल तर अर्ध्या गुंठ्यात मत्स शेती आणि उरलेल्यात भात असा सरळ हिशोब असतो. (ही प्रत्यक्ष बघीतलेली परिस्थिती १० वर्षांपुर्वीची आहे. आता कदाचित बदल झालेला असू / नसू शकतो.)

एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला तो म्हणजे फक्त तुम्हालाच मिपा, मायबोली नावाचे जालावरचे साहित्य माहित होते की अन्य वक्त्यांना पण ऑनलाईन जगात काहितरी चालतं याची माहिती होती ? वक्त्यां / श्रोत्यांपैकी किती जणांना ही नावे माहिती होती याचा काही तपशील बोलण्याचालण्यातून हाती लागले काय ?

In reply to by धर्मराजमुटके

वक्त्यांशी या विषयावर बोलणे झाले नाही आणि श्रोत्यांशीही. बाकी, संकेतस्थळावील अनेक कवी, गझलकार यांचा साहित्य संमेलनात सहभाग असतो. -दिलीप बिरुटे

कंजूस 24/04/2022 - 21:17
त्यात बरीच भाषणे आहेत. डॉ प्रा बिरुटे यांचे भाषण 02:40:30 ते 02:56:16 वेळेत पाहता ऐकता येईल. ------------- विविध समारंभांचे चित्रिकरण करून देणारे व्यावसायिक लोक किंवा समारंभांतील लोकांचे नातेवाईक असाच एक भला मोठा विडिओ काढून एकच डिजिटल फाईल देतात. पण त्याचे अर्धा पाऊम तासांचे तुकडे करून दिले तर फार बरं होईल.

सुरसंगम 25/04/2022 - 07:42
हणमंत आण्णा तुम्ही लईच सगळ्या बाजूने विचार करता की राव मानलं तुम्हाला. कंकाका त्यात नि. गोऱ्हे यांचं भाषण म्हणजे चिवसेनेने असं केलं तस केल हा चिवचिवाट फुकट अर्धा तास वाया गेलाय. तेवढा एखादा वक्ता भाषण करू शकला असता.

जेम्स वांड 25/04/2022 - 08:30
अजून चित्रफीत बघितलेली नाही पण एकंदरीत जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय, थोडी उसंत मिळाली कामातून का निवांत बघणार भाषण प्राध्यापक साहेबांचे. भाषणाबद्दल प्राध्यापक साहेबांचे अभिनंदन आणि मिपा/मिपाकर/मिपाकरांचे लेखन किंवा एकंदरीत जालीय मराठी साहित्यिक घडामोडींचा उल्लेख केल्याबद्दल आभार. &#128144 &#128144 &#128144

जेम्स वांड 25/04/2022 - 08:32
मेनू लैच जोरदार आहे, किमान हा मेनू वाचून तरी मला "आपण निष्काम साहित्यसेवा धंद्यात का पडलो नाही ?" हा प्रश्न कायम पडत राहणार आता &#129315 &#129315 &#129315 &#129315

वाक्या वाक्याला त्यांची तळमळ जाणवत होती. भाषणात त्यांनी सादर केलेली शेतकरी साहित्याची जंत्री त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देते. ही जंत्री खरेतर कितीतरी मोठी असावी पण वेळे आभावी ती सगळी नावे त्यांना तिथे घेता आली नसावी. पण या विषयावर त्यांनी इथे एखादा प्रदिर्घ लेख जरुर लिहावा ही आग्रहाची विनंती. मिपाचा झेंडा साहित्यसंमेलनातही रोवला गेला याचा सार्थ अभिमान वाटला. रच्याकने :- जाता जाता त्यांनी कथा कथनाला मारलेला बाण मात्र अनावश्यक होता असे वाटले. पैजारबुवा,

कंजूस 25/04/2022 - 12:28
श्रोता म्हणून १) कोकण साहित्य संमेलन ,ठाणे येथे पूर्ण संमेलनात हजर राहण्याची संधी मिळाली आणि ते कायमचे आठवणीत राहील. २) डोंबिवली अ भा मध्ये चार पाच तास काढलेत। दोन्ही ठिकाणी जेवण अप्रतिम होते. कार्यक्रमही आवडले. कथाकथन,कवितावाचन यामध्ये दहापैकी आठ जणांचे संपू नये असे वाटणारे होते पण नियोजक घंटी वाजवून वेळ संपत आल्याची सूचना देत तेव्हा वाईट वाटायचं. वक्त्यांना वेळ अपुरी पडायची आणि महत्त्वाचे मुद्दे राहून गेल्याची रुखरुख जाणवायची. नारळीकर चांगले वक्ते आहेत. दिलेला विषय सोडून कधीच बाहेर जात नाहीत आणि मराठी भाषणात इंग्रजी शब्द आणत नाहीत. पण उगाच खटाटोपही न करता पायरीपायरीने अंतिम गाठतात. पण नशिबाने ते मागच्या संमेलनात येऊ शकले नव्हते. संमेलनाचे सूत्रधार तिकडचीच मराठी बोलत होते हे आवडले. 'पुणेकर' बिरुटे सर दिसतात कशे,बोलतात कशे हे पाहण्याची संधी मिळाली. हणमंतअण्णाही चांगले लिहितात. त्यांनी मिपावर अधिकाधिक लेखन करावे ही विनंती.

अनिंद्य 25/04/2022 - 12:44
प्रा डॉ बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन ! मराठी संस्थळांचे, डिजिटल लेखनाचे स्थान अधोरेखित केल्याबद्दल अनेक आभार. ही विधा वर्धिष्णू होतच राहणार आहे.

यंदा कुठल्याही वृत्तपत्रात्/वाहिनीवर दरवर्षी असते तशी साहित्य संमेलनाविषयी चर्चा, बातमी दिसली नाही. पहिल्या दिवशी शरद पवार यांच्या भाषणाची बातमी आली, तेव्हा कळलं की साहित्य संमेलन सुरू झालंय! सद्यस्थितीत राजकीय बातम्यांच्या धुळवडीत साहित्य संमेलन हरवलं, की उद्गीरला असल्याने बाजूला पडलं? की मध्ये दोन वर्षे खंड पडल्याने, म्हणावी तेवढी उत्सुकता नव्हती? की एकूणच जनतेचा/वाचकांचा/रसिकांचा वाचनातील/संमेलनातील रस कमी झाला असावा? (की वाचक/रसिकच कमी झालेत?)

निनाद 25/04/2022 - 14:14
मराठी संस्थळांचे आणि एकुण लेखनचा लेखाजोगा उत्तम मुद्देसूद मांडल्याबद्दल प्रा. डॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन!

sunil kachure 25/04/2022 - 14:16
महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणजे विद्वान लोकांचं विचार ऐकण्याची सुवर्ण संधी. पण भारतीय हिंदी मीडिया तर मूर्ख च आहे मराठी मीडिया नी पण त्याची दखल घेतली नाही..अतिशय फालतू विषयावर २४, तास गुऱ्हाळ चालू असते Dr बिरुटे ह्यांचे विचार खरोखर उत्तम आहेत महत्वाचे म्हणजे ते अनैसर्गिक नाहीत त्यांना समाज विषयी तळमळ आहे. अभिनंदन बिरुटे sir. आणी धन्यवाद पण . तुम्ही तळमळी ने समजतील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडले. Thanks so much.

मित्रहो 25/04/2022 - 16:02
अभिनंदन छान पद्धतीने विचार व्यक्त केले. वर उल्लेख आल्याप्रमाणे गंगाधर मुटे यांचा उल्लेख आला असता तर आणखीन छान झाले असते.

गामा पैलवान 25/04/2022 - 18:21
प्राडॉ, भाषण जाम आवडलं. साहित्य वास्तवदर्शी असून पुरस्कारार्थ नसावं, हा आग्रह मनापासून पटला. वास्तवाचं म्हणाल तर शेतकरी कोणास म्हणावं हा हणमंतअण्णांचा प्रश्नंही मनांत येतोच. अर्थात, या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी शेतकऱ्याच्या वास्तवाची प्रखरता तसूभरही कमी होत नाही. माझ्या मते सरकारी धोरणं शेतीस अनुकूल नसल्याने शेतकऱ्याच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. तुमच्या भाषणांत तुम्ही म्हणालात की १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर शेतकरी वर्गात एक समाधानाची लहर पसरली होती. याचं कारण की शासकीय धोरणं आता अनुकूल होतील हा दिलासा मिळाला होता. पण अर्थात, ते झालं नाही आणि शेतकऱ्याच्या व्यथा तशाच राहिल्या. असो. तुमच्या भाषणासहित अन्य विचारांचा एखादा लेख बनवावा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

मदनबाण 25/04/2022 - 19:04
बिरुटे सरांचे भाषण आवडले. साहित्यातील शेतकरी या विषयावर छान आढावा घेतला आहे. गाथा सप्तशती पासुन मिसळपाव डॉट कॉम पर्यंत सगळ्यांचा ढांडोळा घेतला आहे. सर्व मराठी संकेत स्थळांची भरभराट होऊन उत्तम विषयांवर भर पडत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

गामा पैलवान 26/04/2022 - 01:45
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुमचा इथला संदेश मनोमन पटला. एकंदरीत शेतकरी कोणास म्हणावं व त्या आधारावर शेतकरी साहित्याची वर्गवारी कशी करायची ही कूटं सोडवायला पाहिजेत. अर्थात, सोडवली नाहीत तरी वास्तवाचा दाह तितकाच राहतो. माझ्या मते सरकारी धोरणं कृषीची पार वाट लावताहेत. कशी ते ठाऊक नाही. मी शेतकरी नाही व शेतीतलं काही कळंत नाही. पण जे काही वाचलंय त्यावरून वाटतं की शासनाला आस्थापनी शेती ( = कॉर्पोरेट फार्मिंग ) आणायचं आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण हे जर आणायचं झालं तर स्वालंबी शेतकरी नावाची जमात नाहीशी झाली पाहिजे. शेतकरी देशोधडीस लागावा याकरताच जणू सरकारी धोरणं राबवली जातात की काय अशी शंका येते. शिवाय वैचारिक गोंधळही भरपूर आहे. कसा ते सांगतो. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? यावर कोणाकडेही कसलंही उत्तर नाही. फार काय देशपातळीवर केंद्र शासनात कृषी नावाचा विभागही नाही ( आता कदाचित असेल ). जगाच्या दृष्टीने भारतीय लोकं त्याच्यू ठरतात. कृषीप्रधान देश म्हणवतात आणि कुठल्याशा अर्थशास्त्रीय नियमानुसार कृषीची अक्षम्य हेळसांड करतात. हे कुठेतरी बदललं पाहिजे. माझ्या मते कृषीचं जे उत्पन्न नाशवंत असतं ते लगेच टिकाऊ पदार्थांत रुपांतरीत करायची सोय शेताजवळ व्हावी. त्यातून कृषीउत्पन्नाधारित उद्योगधंद्यांची साखळी निर्माण होईल. आणि यथावकाश कृषी तृतीय श्रेणीतनं मूलगामी अशा प्रथम श्रेणीत येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

श्रीगुरुजी 26/04/2022 - 07:59
प्रथम विद्यावाचस्पती प्राध्यापक श्री. बिरूटे यांचे भाषणाबद्दल अभिनंदन करतो. त्यांचे भाषण उत्कृष्ट आहे. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.

पुंबा 26/04/2022 - 03:01
हणमंतअण्णांचा प्रतिसाद खुप आवडला. विशेषत: सार्वजनिक बोली मराठीची जी अवनती झाली आहे तिसंबंधीचे त्यांचे मुद्दे चिंतनीय वाटले. बिरूटेंच्या भाषणातले मुद्दे आवडले. आसाराम लोमटे, कृष्णात खोत, रा रं बोराडे, सदानंद देशमुख असे काही मोजकेच लेखक शेतकर्‍यांचे पांग साहित्यातून थोडे तरी फेडताहेत असे वाटते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी आंतरजालाचे जुणे जाणते सदस्य आपले बिरुटे सर यांना उत्तम कामगिरी बजावताना पाहून खूप अभिमान वाटला. एखाद्या व्यक्तिचा फोटो पाहिल्यास मी मनात त्या व्यक्तिचा आवाज कसा असेल याचा अंदाज बांधत असतो. बिरुटे सरांच्या बाबतीत तो अंदाज सपशेल चुकला. सरांच्या आवाजातला गोडवा भाषणाची सुरुवात ऐकल्यावर लगेच जाणवला. भाषणातून सरांचा व्यासंग जाणवला. परिसंवादाचा विषय पाहता अन सरांनी विस्ताराने मांडलेला मराठी आंतरजालाचा उल्लेख पाहता गंगाधर मुटे यांचे नाव येईल असे मलाही वाटले होते. अर्थात स्व. शरद जोशी यांचे सहकारी कार्यकर्ते यांचा उल्लेख असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांचा उल्लेख झाला आहेच. यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात इतरही मिपाकरांनी हजेरी लावली असावी अशी अपेक्षा आहे. अवांतरः 'डिजीटल मीडिया प्रेमी मंडळी' ही संस्था ‘मराठी सोशल मिडिया संमेलन’आयोजित करत असते. दुसरं सोशल मीडिया संमेलन २९ एप्रिले ते १ मे दरम्यान सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथे होणार आहे. ज्यांना रस आहे त्यांनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रचेतस 26/04/2022 - 09:40
बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार जोरदार झाले, मुद्देही नेमकेपणाने उपस्थितांपर्यंत पोचले गेले. वास्तविक प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा चळवळ्या, प्रस्थापितविरोधी स्वभाव बघता त्यांनी खरेतर विद्रोही साहित्य संमेलनात उपस्थिती लावायला हवी होती असे वाटून गेले पण त्यांनाही ह्या प्रस्थापितांच्या संमेलनात सामिल व्हावे असे वाटले यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यश आहे असे म्हणावेसे वाटते.

टर्मीनेटर 26/04/2022 - 11:58
बिरूटे सरांचे भाषण आणि हनुमंतअण्णांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले 👍 सरांची वक्तृत्वशैली आणि भाषणात घेतलेले मुद्दे, सांख्यिकी छानच. अभिनंदन प्रा डॉ !

पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत सर !
लेखक हा आपल्या लेखनाशी प्रामाणिक असतो. साहित्यिकांचे लेखन अतिरंजित असु शकतं , वाहावत गेलेलं असु शकतं , पाल्हाळिक असु शकतं परंतु ते लेखन खोटें असु शकत नाही असे आम्ही मानतो !!
हाच तर्क मोदीसमर्थक , हिंदुहितवादी , परंपराप्रिय लेखकांच्या लेखनाबाबतही सत्य आहे हे आपल्या लक्षात येईल तो मराठी साहित्याच्या दृष्टीने सुदिन असेल , मिसळपाव दृष्टीने एक्स्ट्रा पाव असेल ! बाकी साहित्यात शेतकर्‍यांचे चित्रण तरी होते आहे पण मध्यमवर्गीय नोकरदार माणसांचे काय ? त्यांचं दु:खं कोण मांडतंय ? त्यावर कोण परिसंवाद घेतंय ? ऑफिसमधील टेंशन्स आणि स्त्रेस् , बॉसची कटकट, गळेकापु कॉर्पोरेट स्पर्धा , ऑफिसबाहेर प्रवासात होणारा मनःस्ताप , रस्त्यात थांबुन थांबुन चिरीमिरी छापणरे आ.टी.ओ. , वाढती महागाई, राज्य आणि केंद्राच्या भांडणात केंद्राने पेट्रोल वरील टॅक्स कमी केले तरी राज्याचे वाढीव टॅक्स भरत पिळवटुण निघणारा सामान्य बाईकवाला आणि मोजक्या ५-६% इतक्या अत्यल्पसंख्य टॅक्स पेयर्स ना ओरबाडुन इनकम टॅक्स वसुल करणारी अन त्याचा काडीमात्रही लाभ त्यांना उपलब्ध्द करुन न देणारी सरकारी व्यवस्था , ह्यावर कोण बोलत आहे ? कोण साहित्य लिहित आहे ? कोण कादंबर्‍या लिहित आहे ? नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे ! ५-६% अन तेही विखुरलेल्या मतदार संघात असलेल्या ह्या अतियल्पसंख्य नोकरदार लोकांच्या वेदना कोण लिहिणार ? कोणाला दिसततच नाहीत त्या . कारण ते पाहायला कोणालाच नाय डोळें ! असो. तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || अवांतर : बाकी काहीही म्हणा पण एकसुध्दा शाई फेक वगैरे न झाल्यामुळे ह्यासाहित्यसंमेलनाला काही मजा आली नाही बुवा =))))

गामा पैलवान 26/04/2022 - 17:59
श्रीगुरुजी,
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.
माझाही हाच तर्क होता. आता यातनं काय दिसतं ते बघूया. कृषिप्रधान देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेती फक्त १४% वाटा देते , याचा अर्थ शेतीचं बहुतांश उत्पादन बांधावरच फस्त केलं जातंय. हा उंबरठा शेती कधी ओलांडणार? यासाठी काही धोरणं आखली गेलेली दिसंत तरी नाहीत. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकायला हवाय. यातनं आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जर शेतीचं बरचसं उतपन्न बांधावरच फस्त होतंय, तर शहरं का फुगताहेत? शहरं कधीच आकर्षित करंत नाहीत. गावाकडची हलाखी नेहमी माणसांना गावापासनं दूर शहराकडे लोटंत आली आहे. यावर कोणी म्हणेल की भारताची लोकसंख्या सतत वाढते आहे. पण मग शहरांत बऱ्यापैकी खायला मिळतं. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायला अन्नोत्पादन पुरेसं आहे. पण ते गावाकडे शेतात मात्र होत नाही. मग नेमकं होतं कुठे? भारत खरंच कृषिप्रधान देश आहे का? भारतातली बहुतेक शेती कोरडवाहू म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला पडला तर त्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था बाळसं धरते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. याचा अर्थ भारत हा कृषिप्रधान देश धरायला हरकत नाही. पण मग उपरोक्त प्रश्नांची संगती कशी लावायची? कुठेतरी काहीतरी जबरदस्त वैचारिक गफलत आहे. आ.न., -गा.पै.

जुइ 26/04/2022 - 19:10
सरांचा दांडग्या आभ्यासाचा भाषणात प्रत्यय येतो. बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?

In reply to by जुइ

Trump 27/04/2022 - 00:29
बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?
श्रोत्यांनी वेळीच सावध होऊन मनाला लाऊन न घेण्यासाठी.

सोत्रि 27/04/2022 - 15:21
प्राडॉ, झक्क जमून आलंय भाषण, फर्मास एकदम! - (एकदा बिरूटेसरांची भेट थोडक्यात चुकलेला) सोकाजी

आदरणीय जालमित्र गविसेठ. कौतुकाबद्दल आभार. एका मोठ्या लेखकाने कौतुक धागा काढावा, याचा मोठा आनंद आहे. मिपाकरांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन बोलता आलं. विचार मांडता आले. अशा विचारपिठावर बोलतांना बरीच तयारी आणि मग बोलतांना बरंच राहुन जातं, राहुन गेलं. बरंच सुटलं. असं बोलता आलं असतं. ही भर घालता आली असती, वगैरे. अजुन परफेक्ट वगैरे. अजुन शिकतोय. शिकायचं आहे, पण एकदा विचार मांडून झालं की झालं. पण, व्यक्तिगत मला संमेलनातल्या सहभागाबद्दल स्वत:ला आनंद झाला. ते एक मोठं समाधान आहे. मिपाकरांसोबत तर मिपाच्या जन्मापासून आहे, त्यामुळे मिपाकरांच्या कौतुकाचा आनंद आहे. खरं तर, एकेकाचा नामोल्लेख करून उपप्रतिसाद वाढवता येतील. सर्वांनीच केलेले कौतुक ख़ास आहे, मनापासून आवडलं. तहेदिलसे शुक्रिया. मिपाच्या अन्य धाग्यामधे तु-तू, मै मैं असूनही कौतुक केलं त्या मिपाकर दोस्तांच्या ज़िंदादिलीबद्दलही मनापासून आभार. अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार. आपलं सर्वांचं प्रोत्साहन, प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. आपले प्रतिसाद अजुन चांगलं बोलायला, अजुन चांगली तयारी करायला. अजुन परफेक्ट व्हायला मदत करतील यात मनात शंका नाही. आभार...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 29/04/2022 - 14:50
अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार.
काय हे प्राडॉसंर, मनात ठेवून, कडु तोंड वगैरेही तुमच्या कुणा मराठी टिकाकाराच्या बाबतीत असेल तर तश्या टिकाकारांना शिंगावर जरुर घ्या. पण काही मनमोकळे टिकेचे सूर येऊनही तुमचे, तुकोबा ते तात्या संस्कृतीतील मिपाकर टिकाकार मनामनाचं ओझं वगैरे घेऊन जगत असावेत हा आरोप पुन्हा पडताळण्याची आवश्यकता असावी असे मनापासून वाटते. तुकोबा ते तात्यां शिवाय मनमोकळ्या टिकेची परंपरा तुमच्या मराठवाड्यातील कुरुंदकर ते श्रॉफ सरस्वतीभूवनवाले अशीही याही देही याही डोळा याही कान पाहिली ऐकली आहे. कोकण, मराठवाडा विदर्भ पुणेरी टिकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पुर्वीच्या पिढीतले कुरुंदकर असतील नव्या पिढीतले राजन खान वेगवेगळ्या भागतून असतील आपपर भाव न बाळगता टिका हा मराठी संस्कृतीला जागणारी मनापासून सहसा मनात न ठेवणारी असते आणि मिपाचे आपण संस्थापना पासूनचे पाईक आहाते तेव्हा हेवेसानल म्हणून तुम्हीही मनाला लावून घेऊ नये असे वाटते.

In reply to by माहितगार

अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले.
=)))) कसलं कौतुक , कसली अढी अन कसलं कडु तोंड ! सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत सर . तुमचा हा प्रतिसाद पहा : http://www.misalpav.com/comment/1135514#comment-1135514 पाच पैकी चार राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला , अन जिथे भाजपाला विजय मिळण्याची आशा खुद्द भाजपालाच नव्हती तिथेही काँग्र्समुक्त भारत ह्या भाजपाचा विचाराचा विजय झाला , असे असताना तुमची शब्द रचना पहा >>> लॉकडाऊनमुळे झालेले जनतेचे झालेले हाल, वाहती प्रेते, वाढती महागाई, याचा म्हणावा तसा तितका फटका भाजपाला बसलाच नाही,असे निकाल पाहता म्हणता येत नाही. =)))) ह्याला म्हणतात अढी अन कडु तोंड ! जे पेराल तेच उगवते , येवढं कळण्या इतपत तरी शेतीतील ज्ञान आहे आम्हाला #मीशेतकरी बाकी सर्वत्र राजकारण आणायला आम्हाला आवडत नाही पण साहित्य संमेलन हे राजकीय कुस्तीचाच आखाडा आहे हे हे आम्हाला नाशिक मध्ये काय झालं त्यावरुनच कळलेलें आहे . तस्मात , असोच . पुढील भाषणासाठी शुभेच्छा =))))

सन्जोप राव 28/04/2022 - 20:42
धागा उशीरा पाहिल्यामुळे प्रतिसादही उशीरा देतो आहे. बिरुटेसरांचे हार्दिक अभिनंदन आणि माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल आभार.

सुरिया 28/04/2022 - 21:20
अभिणंडण बिरुटे सर. सर तसे चांगलेच आहेत. आमच्या मोदीकांकांना कैतरी म्हणत असतात सारखे, नाहीतर तसे चांगलेच आहेत ते. आता गवि कौतुक करतात त्यांचे म्हणजे बघा. त्यांना तरी कोण आहे एकमेकाशिवाय. सतत मिपाध्यास घेतलेली माणसे ही. नजर लागावी अशी मैत्री खरोखर त्यांची. कीपीटप.

प्रा. डॉ. सर, अभिनंदन! कमीत कमी वेळात अतिशय मुद्देसूद भाषण केलेत. आवडले. मला एकदा या विषयावर आपणाशी चर्चा करायची आहे. ;) लोल! सं - दी - प

माहितगार 29/04/2022 - 15:00
केळीच्या सालावरून पाय घसरलेल्या मराठी लोकांवरच हसावे तसे ' मोकलाया दाही दिशा'ला क्षणा क्षणाला हसणार्‍या मिपामित्रमंडळी पैकी कुणी, वरील एका प्रतिसादात आलेल्या मेनुकार्डवर एक साधी प्रतिक्रीयाही अद्याप कशी काय दिलेली नाही .

In reply to by हेमंतकुमार

गवि 24/04/2022 - 13:41
हो. मिसळपाव, ऐसी, मनोगत, मायबोली अशा सर्वांचा उल्लेख केलाय आवर्जून. तेही वेळेची मर्यादा असताना. अतिरंजित वगैरेबद्दलही रोखठोक बोललेत. विशेष म्हणजे उत्स्फूर्तपणा. इतकी नावे आणि संदर्भ लागोपाठ देणे म्हणजे अभ्यास दांडगा.

मराठवाड्यातील साहित्य संमेलन आणि प्रा डॉ स्वतः साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून एखादा धागा, वृत्तांत येईल असे वाटले होते. पण त्यांनी स्वतः थेट साहित्य संमेलनात भाषण केले, ही सुखद बातमी आहे. प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!

Bhakti 24/04/2022 - 16:50
अभिनंदन! बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.

Bhakti 24/04/2022 - 16:50
अभिनंदन! बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.

सुरसंगम 24/04/2022 - 17:20
बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन! वल्लीदा यांनी वर म्हटल्याप्रमाणे मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख केल्याबद्दल खरच खूप बरं वाटलं पण त्याच बरोबर अजून एक मीपकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता असं वाटलं.

In reply to by सुरसंगम

छान संवाद ! आवडला. मिपाकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता ह्याला अनुमोदन. त्यांच्याशी इथल्या बरेच जणांचे सुर जुळले नव्हते पण त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि तळमळ होती हे जाणवायचे. अर्थात बिरुटे सरांकडून त्यांचा उल्लेख अनावधाने राहून गेला असेल त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. अवांतर : गविंचे शेतीविषयक लेखन कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलेले दिसते. कोणी दुवा देऊन दूवा घेता का ?

In reply to by धर्मराजमुटके

गवि 24/04/2022 - 19:19
नाही हो. त्यांना एकूण मराठी संकेतस्थळांवर लिहिणारे काही लोक अशा अर्थाने नावे उल्लेखायची असावीत. पण शेतकरी हा केन्द्रस्थानी विषय असल्याने बोलण्याच्या ओघात मिक्स झाले असावे. बोलण्याच्या ओघात अस्मादिकांस शेतात मुक्काम करविला असावा. उगीच लिन्का शोधत बसू नये. तसेही रामदासकाका आणि सन्जोपराव यांच्या पंगतीला शेतातही बैठक जमणे सन्मानाचेच __/\__ धन्यवाद.

In reply to by धर्मराजमुटके

गंगाधर मुटे हे शेतकरी चळवळीतलं मोठं नाव आहे. आणि नवलेखकांना घेऊन शेतीविषयकच विषय घेऊन संकेतस्थळ चालवणे, शेतीविषयक उपक्रम राबविणे, नव्या लेखकांना प्रोत्साहन देणे असे साहित्यिक उपक्रम कायमच करीत असतात. पहिले शेतकरी साहित्य संमेलन वर्ध्याला झाले तेव्हा मला त्यांनी मराठी साहित्यातले शेतकरी चित्रण असेच काही तरी विषयावर बोलावले होते. पुढे ऑनलाईन संमेलनासही मी वक्ता म्हणून उपस्थित होतो, त्यांचे आणि माझी विचारांची देवाण-घेवाण कायम असते. पण, काल गडबडीत त्यांचं नाव विसरुन गेलो. शेतकरी संघटनेचे नेते. शरद जोशीसाहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यानंतर त्यांची साहित्यविषयक चळवळ पुढे नेणारे म्हणून गंगाधर मुटे यांचे नाव घ्यायचेच होते, अनावधानाने राहूनच गेले. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 24/04/2022 - 19:52
तुम्हाला वेळ संपल्याने ज्या खाणाखुणा आणि इशारे होत होते त्यामुळे बरेच काही आवरावे लागले आणि लक्ष विचलित झाले असे जाणवले. त्या ओघात राहून गेले असू शकेल.

माहितगार 24/04/2022 - 19:05
प्राडॉ सरांच्या अभिनंदनीय सखोल भाषणातून झालेला विषय परिचय खूप भावला. मी सर्वच मंचांच्या वेळेवरील बंधने सैल असण्याच्या बाजूचा आहे प्राडॉ सरांना याच विषयावर अजून ऐकणे नक्कीच आवडले असते. सोबत मराठी आंतरजालावरील साहित्याचा साहित्य म्हणून व साहित्यिकांचा साहित्य संमेलनात आवर्जून उल्लेख उलेखनीय आहेच.

हा परिसंवाद आहे असं गृहीत धरून मला पडलेले इतर प्रश्न - १. मागच्या भल्या मोठ्या पडद्याचा वापर काही भंगार कविता आणि अ‍ॅग्रोवनछाप व्हिडिओ लूपवर प्ले करून काय फायदा? अशा स्क्रीनचा सुयोग्य (डोळ्यांना सुखकारक आणि चांगल्या ग्राफिक डिझायनरला हाताशी धरून) वापर करून आपले मुद्दे व्यवस्थित मांडता आले असते ते कोणाच्याच कसं डोक्यात येत नाही? २. समकालीन राजकीय मौखिक मराठीची सगळ्यांनाच भीषण लागण झालेली आहे. 'याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून याठिकाणी अशाप्रकारचं त्याठिकाणी त्यासंदर्भात'!! कसं सोडवायचं हे ग्रहण? दुर्गा भागवत यांनी कित्येक वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की वाणीशास्त्रावर मराठीत काहीही मेहनत घेतली जातच नाही, मौखिक मराठी पुढे जाऊन भयंकर रूप धारण करणार आहे ( उच्चारण शुद्धाशुद्ध वगैरे असं मी म्हणत नाही, बोलताना एकंदरीत कसं बोलावं, ठहराव, वाक्यांची सांधेजोड, रिपीटिशन कसं करावं इत्यादी, आपला भाषणाचा पीच, टेम्पो, नाद कसा सांभाळायचा, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फिजीकल मर्यादा काय आहेत, त्या उणिवा कशा भरून का इत्यादी. प्राध्यापकांना हे कितपत शिकवलं जातं हे माहित नाही). हे बिरुटे सरांना उद्देशून नाही, एकंदरीतच अशा परिसंवादांमध्ये हे सगळं अगदी प्राथमिक दर्जावर सुरू असतं. ३. भाषणाच्या सुरुवातीला आपण प्रत्येक वेळेस सगळ्या मान्यवरांची नावं का उगाळत बसतो? नशीबानं कमी मान्यवर आहेत हे बरं नाहीतर एरवी प्रत्येकजण तेच रिपीट करून सगळ्यांचीच किमान २० मिनिटं तरी वाया जातात. आणि ते आभार मानण्याचं दळण दळायची अजूनही काय हौस आहे लोकांना? नुसती नावं घेऊन आभार मानल्यावर काय साध्य होतं? म्हणजे आभारप्रदर्शनात सगळ्यांची नावं घेत अजूनएक पाचदहा मिनिटं टाईमपास!! ४. साहित्यसमेलनांमधली वेळापत्रकं पाहिली. दीडदीड तासांचे काटेकोर नियोजन केलेलं असतं. आणि अर्थातच हे काहीकेल्या अजिबातच पाळलं जातच नसणार!! तरीही असं वेळापत्रक का आखलं जातं? वेळेबाबत आपण इतके फाजील कसे काय असतो आपण? राजकीय सभांचं ठीक आहे. पण चांगली शिकली सवरलेली लोकं एकत्र येऊन ही उशीरांची भातुकली का खेळत बसतात? बर्‍याच ठिकाणी बफर वेळ नसतो. ज्या लोकांना आमंत्रित केलं आहे त्यांना वेळेचे अजिबातच भान नसते. बिरुटे सरांच्या भाषणाविषयी - १. सर्व प्रथम काहीप्रमाणात विद्यासहित बोलल्याने अभिनंदन. (बरेच लोक्स नुसतीच अंदाजे क्वांटिटी सांगून सामान्य विधानं करत बसतात) २. 'शेतकर्‍यांचे चित्रण' हा विषय घेतला आहे तर 'शेतकरी' या एन्टिटीची व्याख्या काय ठरविली आहे? मी ही टेक्निकली शेतकरी आहे. माझंही काही एक विकत घेतलेलं, वडिलोपार्जित, मातॄकोपार्जित शेत आहे. ते आम्ही टाइमपास म्हणून कसतो तरी आमचे शेतीविषयक प्रश्न आहेत उदा. उत्पन्न खर्चाचा मेळ नाही, कुशल मनुष्यबळ नाही, ओपन मार्केट नाही इत्यादी इत्यादी. निमशहरी भागात जवळजवळ प्रत्येकाच्या नावावर थोडीफार शेती असतेच. म्हणजेच सगळे अल्पभूधारक शेतकरी असतात. शहरी लोकांचे फार्म्स पण असतात. तर मग विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी कोण आहे? ज्याची पूर्ण उपजिविका शेतीवर अवलंबून आहे तो उत्पादक हीच भूमिका प्रामुख्याने जगणारा? भारतीय शेतकरी हा अनेकपदरी शेतकरी असतो. तंबाखूची शेती करणारा शेतकरी, ती विकत घेणारा अडत्या आणि त्याची सप्लायचेन ते संभाजी-विडीचा मालक हे सगळेच तंबाखूच्या शेतीवर अवलंबून असतात. आणि या सप्लायचेन मधल्या प्रत्येक घटकाची स्वतःची वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची शेती असते हा भाग वेगळाच! म्हणजे केवळ शेतकरी असून चालत नाही, त्याचा सप्लायचेन मधला रोल आणि त्याची फक्त उत्पादनावरती अवलंबून असलेली उपजिविका यानांच महत्त्व असलेला शेतकरी म्हणजे विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी म्हणावे लागेल. मग -
  1. शेतमजूर ज्यांची मध्यप्रदेशात स्वतःची चार गुंठे पडीक शेती आहे पण दक्षिण महाराष्ट्रात द्राक्षाच्या मळ्यावर वार्षिक बोलीवर राबतात असे ते
  2. बीएस्सी अ‍ॅग्री झालेला शेती न करणारा मिस्त्री ( शेतीविषयक सल्ला देणारा, औषधं लिहून देणारा ) असा तो
  3. अ‍ॅग्रोमार्ट चालवणारा कन्नड बोलणारा लखीमचंद किंवा दुसरा कुणी भूमिपुत्र
  4. दुधाच्या टेम्पोचा डायव्हर आणि किन्नर (ड्रायव्हर आणि क्लीनर)
  5. नुसताच गुरं चारणारा गुराखी
  6. शेततळी बांधणारे, जेसीब्यांच्या पाळ्या करणारे पंजाबी किंवा भूमिपुत्र, मासे पुरवणारा बंगाली किंवा भूमिपुत्र
  7. जंगलावर अवलंबून असलेले समाज, मत्स्यशेतीवर अवलंबून असलेले समाज म्हणजे थोडक्यात कोळी लोक्स
  8. वरील सगळ्यांच्या बायका, मुली
  9. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण शेतीवर अवलंबून आहेत उदा. गुळाचे व्यापारी
  10. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण ज्यांची शेती आहे
  11. वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक ज्यांची स्वतःची शेती आहे
  12. ज्यांचे शेती केली जाते किंवा शेतीपूरक साहाय्य घेतले जाते असे समस्त मानवेतर जीवजंतू, त्यांचा विकास, उत्पादन आणि त्यायोगे शेतीवर अवलंबून असलेले समस्त मनुष्यगण
ह्या सगळ्यांना कोण विचारतो? म्हणजे विषयाला 'अभिप्रेत' असलेला शेतकरी हा किती लहान सबसेट आहे? मग त्याला का इतकं महत्त्व द्यायचं? मग 'शेतकरी' शब्दाची व्याप्ती वाढवावी लागणार! अशा सगळ्या शेतकर्‍यांना 'आडव्या रेषा' मानू ..यांना जाती-पाती, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, पर्यावरणीय स्थिती ( खोर्‍यातली, दुष्काळी, समुद्रकिनार्यावरची अशा ) या उभा रेषांनी छेद दिल्यावर जी मेश तयार होते ती खरेतर मेस आहे!! ३. अशा मेसचे खरे चित्रण काय खोटे चित्रण काय दोन्ही सारखेच!! कसला वास्तववाद आणि कसली कल्पकता!! कुणा लेखकाचे ढुंगण इतके ब्रॉड आहे जो या सगळ्या मेशवर अंडी उबवून साहित्यिक पिल्ली प्रसवेल? इतरही काही प्रश्न आहेत ते सविस्तर मांडतो > तोवर हा मेन्यू पाहून तोंडाला पाणी आणि मायमराठीच्या साहित्यिक भविष्याबद्दल विचार करून फेस सुटला आहे हे नमूद करून रजा घेतो. text

In reply to by हणमंतअण्णा शंक…

महाराष्ट्राखेरीज इतर शेतकर्‍यांचे माहित नाही पण बंगाली गरीब शेतकरी अजून आदिम काळात जगतो आहे. एक गुंठा शेत असेल तर अर्ध्या गुंठ्यात मत्स शेती आणि उरलेल्यात भात असा सरळ हिशोब असतो. (ही प्रत्यक्ष बघीतलेली परिस्थिती १० वर्षांपुर्वीची आहे. आता कदाचित बदल झालेला असू / नसू शकतो.)

एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला तो म्हणजे फक्त तुम्हालाच मिपा, मायबोली नावाचे जालावरचे साहित्य माहित होते की अन्य वक्त्यांना पण ऑनलाईन जगात काहितरी चालतं याची माहिती होती ? वक्त्यां / श्रोत्यांपैकी किती जणांना ही नावे माहिती होती याचा काही तपशील बोलण्याचालण्यातून हाती लागले काय ?

In reply to by धर्मराजमुटके

वक्त्यांशी या विषयावर बोलणे झाले नाही आणि श्रोत्यांशीही. बाकी, संकेतस्थळावील अनेक कवी, गझलकार यांचा साहित्य संमेलनात सहभाग असतो. -दिलीप बिरुटे

कंजूस 24/04/2022 - 21:17
त्यात बरीच भाषणे आहेत. डॉ प्रा बिरुटे यांचे भाषण 02:40:30 ते 02:56:16 वेळेत पाहता ऐकता येईल. ------------- विविध समारंभांचे चित्रिकरण करून देणारे व्यावसायिक लोक किंवा समारंभांतील लोकांचे नातेवाईक असाच एक भला मोठा विडिओ काढून एकच डिजिटल फाईल देतात. पण त्याचे अर्धा पाऊम तासांचे तुकडे करून दिले तर फार बरं होईल.

सुरसंगम 25/04/2022 - 07:42
हणमंत आण्णा तुम्ही लईच सगळ्या बाजूने विचार करता की राव मानलं तुम्हाला. कंकाका त्यात नि. गोऱ्हे यांचं भाषण म्हणजे चिवसेनेने असं केलं तस केल हा चिवचिवाट फुकट अर्धा तास वाया गेलाय. तेवढा एखादा वक्ता भाषण करू शकला असता.

जेम्स वांड 25/04/2022 - 08:30
अजून चित्रफीत बघितलेली नाही पण एकंदरीत जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय, थोडी उसंत मिळाली कामातून का निवांत बघणार भाषण प्राध्यापक साहेबांचे. भाषणाबद्दल प्राध्यापक साहेबांचे अभिनंदन आणि मिपा/मिपाकर/मिपाकरांचे लेखन किंवा एकंदरीत जालीय मराठी साहित्यिक घडामोडींचा उल्लेख केल्याबद्दल आभार. &#128144 &#128144 &#128144

जेम्स वांड 25/04/2022 - 08:32
मेनू लैच जोरदार आहे, किमान हा मेनू वाचून तरी मला "आपण निष्काम साहित्यसेवा धंद्यात का पडलो नाही ?" हा प्रश्न कायम पडत राहणार आता &#129315 &#129315 &#129315 &#129315

वाक्या वाक्याला त्यांची तळमळ जाणवत होती. भाषणात त्यांनी सादर केलेली शेतकरी साहित्याची जंत्री त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देते. ही जंत्री खरेतर कितीतरी मोठी असावी पण वेळे आभावी ती सगळी नावे त्यांना तिथे घेता आली नसावी. पण या विषयावर त्यांनी इथे एखादा प्रदिर्घ लेख जरुर लिहावा ही आग्रहाची विनंती. मिपाचा झेंडा साहित्यसंमेलनातही रोवला गेला याचा सार्थ अभिमान वाटला. रच्याकने :- जाता जाता त्यांनी कथा कथनाला मारलेला बाण मात्र अनावश्यक होता असे वाटले. पैजारबुवा,

कंजूस 25/04/2022 - 12:28
श्रोता म्हणून १) कोकण साहित्य संमेलन ,ठाणे येथे पूर्ण संमेलनात हजर राहण्याची संधी मिळाली आणि ते कायमचे आठवणीत राहील. २) डोंबिवली अ भा मध्ये चार पाच तास काढलेत। दोन्ही ठिकाणी जेवण अप्रतिम होते. कार्यक्रमही आवडले. कथाकथन,कवितावाचन यामध्ये दहापैकी आठ जणांचे संपू नये असे वाटणारे होते पण नियोजक घंटी वाजवून वेळ संपत आल्याची सूचना देत तेव्हा वाईट वाटायचं. वक्त्यांना वेळ अपुरी पडायची आणि महत्त्वाचे मुद्दे राहून गेल्याची रुखरुख जाणवायची. नारळीकर चांगले वक्ते आहेत. दिलेला विषय सोडून कधीच बाहेर जात नाहीत आणि मराठी भाषणात इंग्रजी शब्द आणत नाहीत. पण उगाच खटाटोपही न करता पायरीपायरीने अंतिम गाठतात. पण नशिबाने ते मागच्या संमेलनात येऊ शकले नव्हते. संमेलनाचे सूत्रधार तिकडचीच मराठी बोलत होते हे आवडले. 'पुणेकर' बिरुटे सर दिसतात कशे,बोलतात कशे हे पाहण्याची संधी मिळाली. हणमंतअण्णाही चांगले लिहितात. त्यांनी मिपावर अधिकाधिक लेखन करावे ही विनंती.

अनिंद्य 25/04/2022 - 12:44
प्रा डॉ बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन ! मराठी संस्थळांचे, डिजिटल लेखनाचे स्थान अधोरेखित केल्याबद्दल अनेक आभार. ही विधा वर्धिष्णू होतच राहणार आहे.

यंदा कुठल्याही वृत्तपत्रात्/वाहिनीवर दरवर्षी असते तशी साहित्य संमेलनाविषयी चर्चा, बातमी दिसली नाही. पहिल्या दिवशी शरद पवार यांच्या भाषणाची बातमी आली, तेव्हा कळलं की साहित्य संमेलन सुरू झालंय! सद्यस्थितीत राजकीय बातम्यांच्या धुळवडीत साहित्य संमेलन हरवलं, की उद्गीरला असल्याने बाजूला पडलं? की मध्ये दोन वर्षे खंड पडल्याने, म्हणावी तेवढी उत्सुकता नव्हती? की एकूणच जनतेचा/वाचकांचा/रसिकांचा वाचनातील/संमेलनातील रस कमी झाला असावा? (की वाचक/रसिकच कमी झालेत?)

निनाद 25/04/2022 - 14:14
मराठी संस्थळांचे आणि एकुण लेखनचा लेखाजोगा उत्तम मुद्देसूद मांडल्याबद्दल प्रा. डॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन!

sunil kachure 25/04/2022 - 14:16
महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणजे विद्वान लोकांचं विचार ऐकण्याची सुवर्ण संधी. पण भारतीय हिंदी मीडिया तर मूर्ख च आहे मराठी मीडिया नी पण त्याची दखल घेतली नाही..अतिशय फालतू विषयावर २४, तास गुऱ्हाळ चालू असते Dr बिरुटे ह्यांचे विचार खरोखर उत्तम आहेत महत्वाचे म्हणजे ते अनैसर्गिक नाहीत त्यांना समाज विषयी तळमळ आहे. अभिनंदन बिरुटे sir. आणी धन्यवाद पण . तुम्ही तळमळी ने समजतील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडले. Thanks so much.

मित्रहो 25/04/2022 - 16:02
अभिनंदन छान पद्धतीने विचार व्यक्त केले. वर उल्लेख आल्याप्रमाणे गंगाधर मुटे यांचा उल्लेख आला असता तर आणखीन छान झाले असते.

गामा पैलवान 25/04/2022 - 18:21
प्राडॉ, भाषण जाम आवडलं. साहित्य वास्तवदर्शी असून पुरस्कारार्थ नसावं, हा आग्रह मनापासून पटला. वास्तवाचं म्हणाल तर शेतकरी कोणास म्हणावं हा हणमंतअण्णांचा प्रश्नंही मनांत येतोच. अर्थात, या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी शेतकऱ्याच्या वास्तवाची प्रखरता तसूभरही कमी होत नाही. माझ्या मते सरकारी धोरणं शेतीस अनुकूल नसल्याने शेतकऱ्याच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. तुमच्या भाषणांत तुम्ही म्हणालात की १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर शेतकरी वर्गात एक समाधानाची लहर पसरली होती. याचं कारण की शासकीय धोरणं आता अनुकूल होतील हा दिलासा मिळाला होता. पण अर्थात, ते झालं नाही आणि शेतकऱ्याच्या व्यथा तशाच राहिल्या. असो. तुमच्या भाषणासहित अन्य विचारांचा एखादा लेख बनवावा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

मदनबाण 25/04/2022 - 19:04
बिरुटे सरांचे भाषण आवडले. साहित्यातील शेतकरी या विषयावर छान आढावा घेतला आहे. गाथा सप्तशती पासुन मिसळपाव डॉट कॉम पर्यंत सगळ्यांचा ढांडोळा घेतला आहे. सर्व मराठी संकेत स्थळांची भरभराट होऊन उत्तम विषयांवर भर पडत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

गामा पैलवान 26/04/2022 - 01:45
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुमचा इथला संदेश मनोमन पटला. एकंदरीत शेतकरी कोणास म्हणावं व त्या आधारावर शेतकरी साहित्याची वर्गवारी कशी करायची ही कूटं सोडवायला पाहिजेत. अर्थात, सोडवली नाहीत तरी वास्तवाचा दाह तितकाच राहतो. माझ्या मते सरकारी धोरणं कृषीची पार वाट लावताहेत. कशी ते ठाऊक नाही. मी शेतकरी नाही व शेतीतलं काही कळंत नाही. पण जे काही वाचलंय त्यावरून वाटतं की शासनाला आस्थापनी शेती ( = कॉर्पोरेट फार्मिंग ) आणायचं आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण हे जर आणायचं झालं तर स्वालंबी शेतकरी नावाची जमात नाहीशी झाली पाहिजे. शेतकरी देशोधडीस लागावा याकरताच जणू सरकारी धोरणं राबवली जातात की काय अशी शंका येते. शिवाय वैचारिक गोंधळही भरपूर आहे. कसा ते सांगतो. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? यावर कोणाकडेही कसलंही उत्तर नाही. फार काय देशपातळीवर केंद्र शासनात कृषी नावाचा विभागही नाही ( आता कदाचित असेल ). जगाच्या दृष्टीने भारतीय लोकं त्याच्यू ठरतात. कृषीप्रधान देश म्हणवतात आणि कुठल्याशा अर्थशास्त्रीय नियमानुसार कृषीची अक्षम्य हेळसांड करतात. हे कुठेतरी बदललं पाहिजे. माझ्या मते कृषीचं जे उत्पन्न नाशवंत असतं ते लगेच टिकाऊ पदार्थांत रुपांतरीत करायची सोय शेताजवळ व्हावी. त्यातून कृषीउत्पन्नाधारित उद्योगधंद्यांची साखळी निर्माण होईल. आणि यथावकाश कृषी तृतीय श्रेणीतनं मूलगामी अशा प्रथम श्रेणीत येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

श्रीगुरुजी 26/04/2022 - 07:59
प्रथम विद्यावाचस्पती प्राध्यापक श्री. बिरूटे यांचे भाषणाबद्दल अभिनंदन करतो. त्यांचे भाषण उत्कृष्ट आहे. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.

पुंबा 26/04/2022 - 03:01
हणमंतअण्णांचा प्रतिसाद खुप आवडला. विशेषत: सार्वजनिक बोली मराठीची जी अवनती झाली आहे तिसंबंधीचे त्यांचे मुद्दे चिंतनीय वाटले. बिरूटेंच्या भाषणातले मुद्दे आवडले. आसाराम लोमटे, कृष्णात खोत, रा रं बोराडे, सदानंद देशमुख असे काही मोजकेच लेखक शेतकर्‍यांचे पांग साहित्यातून थोडे तरी फेडताहेत असे वाटते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी आंतरजालाचे जुणे जाणते सदस्य आपले बिरुटे सर यांना उत्तम कामगिरी बजावताना पाहून खूप अभिमान वाटला. एखाद्या व्यक्तिचा फोटो पाहिल्यास मी मनात त्या व्यक्तिचा आवाज कसा असेल याचा अंदाज बांधत असतो. बिरुटे सरांच्या बाबतीत तो अंदाज सपशेल चुकला. सरांच्या आवाजातला गोडवा भाषणाची सुरुवात ऐकल्यावर लगेच जाणवला. भाषणातून सरांचा व्यासंग जाणवला. परिसंवादाचा विषय पाहता अन सरांनी विस्ताराने मांडलेला मराठी आंतरजालाचा उल्लेख पाहता गंगाधर मुटे यांचे नाव येईल असे मलाही वाटले होते. अर्थात स्व. शरद जोशी यांचे सहकारी कार्यकर्ते यांचा उल्लेख असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांचा उल्लेख झाला आहेच. यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात इतरही मिपाकरांनी हजेरी लावली असावी अशी अपेक्षा आहे. अवांतरः 'डिजीटल मीडिया प्रेमी मंडळी' ही संस्था ‘मराठी सोशल मिडिया संमेलन’आयोजित करत असते. दुसरं सोशल मीडिया संमेलन २९ एप्रिले ते १ मे दरम्यान सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथे होणार आहे. ज्यांना रस आहे त्यांनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रचेतस 26/04/2022 - 09:40
बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार जोरदार झाले, मुद्देही नेमकेपणाने उपस्थितांपर्यंत पोचले गेले. वास्तविक प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा चळवळ्या, प्रस्थापितविरोधी स्वभाव बघता त्यांनी खरेतर विद्रोही साहित्य संमेलनात उपस्थिती लावायला हवी होती असे वाटून गेले पण त्यांनाही ह्या प्रस्थापितांच्या संमेलनात सामिल व्हावे असे वाटले यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यश आहे असे म्हणावेसे वाटते.

टर्मीनेटर 26/04/2022 - 11:58
बिरूटे सरांचे भाषण आणि हनुमंतअण्णांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले 👍 सरांची वक्तृत्वशैली आणि भाषणात घेतलेले मुद्दे, सांख्यिकी छानच. अभिनंदन प्रा डॉ !

पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत सर !
लेखक हा आपल्या लेखनाशी प्रामाणिक असतो. साहित्यिकांचे लेखन अतिरंजित असु शकतं , वाहावत गेलेलं असु शकतं , पाल्हाळिक असु शकतं परंतु ते लेखन खोटें असु शकत नाही असे आम्ही मानतो !!
हाच तर्क मोदीसमर्थक , हिंदुहितवादी , परंपराप्रिय लेखकांच्या लेखनाबाबतही सत्य आहे हे आपल्या लक्षात येईल तो मराठी साहित्याच्या दृष्टीने सुदिन असेल , मिसळपाव दृष्टीने एक्स्ट्रा पाव असेल ! बाकी साहित्यात शेतकर्‍यांचे चित्रण तरी होते आहे पण मध्यमवर्गीय नोकरदार माणसांचे काय ? त्यांचं दु:खं कोण मांडतंय ? त्यावर कोण परिसंवाद घेतंय ? ऑफिसमधील टेंशन्स आणि स्त्रेस् , बॉसची कटकट, गळेकापु कॉर्पोरेट स्पर्धा , ऑफिसबाहेर प्रवासात होणारा मनःस्ताप , रस्त्यात थांबुन थांबुन चिरीमिरी छापणरे आ.टी.ओ. , वाढती महागाई, राज्य आणि केंद्राच्या भांडणात केंद्राने पेट्रोल वरील टॅक्स कमी केले तरी राज्याचे वाढीव टॅक्स भरत पिळवटुण निघणारा सामान्य बाईकवाला आणि मोजक्या ५-६% इतक्या अत्यल्पसंख्य टॅक्स पेयर्स ना ओरबाडुन इनकम टॅक्स वसुल करणारी अन त्याचा काडीमात्रही लाभ त्यांना उपलब्ध्द करुन न देणारी सरकारी व्यवस्था , ह्यावर कोण बोलत आहे ? कोण साहित्य लिहित आहे ? कोण कादंबर्‍या लिहित आहे ? नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे ! ५-६% अन तेही विखुरलेल्या मतदार संघात असलेल्या ह्या अतियल्पसंख्य नोकरदार लोकांच्या वेदना कोण लिहिणार ? कोणाला दिसततच नाहीत त्या . कारण ते पाहायला कोणालाच नाय डोळें ! असो. तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || अवांतर : बाकी काहीही म्हणा पण एकसुध्दा शाई फेक वगैरे न झाल्यामुळे ह्यासाहित्यसंमेलनाला काही मजा आली नाही बुवा =))))

गामा पैलवान 26/04/2022 - 17:59
श्रीगुरुजी,
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.
माझाही हाच तर्क होता. आता यातनं काय दिसतं ते बघूया. कृषिप्रधान देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेती फक्त १४% वाटा देते , याचा अर्थ शेतीचं बहुतांश उत्पादन बांधावरच फस्त केलं जातंय. हा उंबरठा शेती कधी ओलांडणार? यासाठी काही धोरणं आखली गेलेली दिसंत तरी नाहीत. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकायला हवाय. यातनं आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जर शेतीचं बरचसं उतपन्न बांधावरच फस्त होतंय, तर शहरं का फुगताहेत? शहरं कधीच आकर्षित करंत नाहीत. गावाकडची हलाखी नेहमी माणसांना गावापासनं दूर शहराकडे लोटंत आली आहे. यावर कोणी म्हणेल की भारताची लोकसंख्या सतत वाढते आहे. पण मग शहरांत बऱ्यापैकी खायला मिळतं. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायला अन्नोत्पादन पुरेसं आहे. पण ते गावाकडे शेतात मात्र होत नाही. मग नेमकं होतं कुठे? भारत खरंच कृषिप्रधान देश आहे का? भारतातली बहुतेक शेती कोरडवाहू म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला पडला तर त्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था बाळसं धरते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. याचा अर्थ भारत हा कृषिप्रधान देश धरायला हरकत नाही. पण मग उपरोक्त प्रश्नांची संगती कशी लावायची? कुठेतरी काहीतरी जबरदस्त वैचारिक गफलत आहे. आ.न., -गा.पै.

जुइ 26/04/2022 - 19:10
सरांचा दांडग्या आभ्यासाचा भाषणात प्रत्यय येतो. बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?

In reply to by जुइ

Trump 27/04/2022 - 00:29
बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?
श्रोत्यांनी वेळीच सावध होऊन मनाला लाऊन न घेण्यासाठी.

सोत्रि 27/04/2022 - 15:21
प्राडॉ, झक्क जमून आलंय भाषण, फर्मास एकदम! - (एकदा बिरूटेसरांची भेट थोडक्यात चुकलेला) सोकाजी

आदरणीय जालमित्र गविसेठ. कौतुकाबद्दल आभार. एका मोठ्या लेखकाने कौतुक धागा काढावा, याचा मोठा आनंद आहे. मिपाकरांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन बोलता आलं. विचार मांडता आले. अशा विचारपिठावर बोलतांना बरीच तयारी आणि मग बोलतांना बरंच राहुन जातं, राहुन गेलं. बरंच सुटलं. असं बोलता आलं असतं. ही भर घालता आली असती, वगैरे. अजुन परफेक्ट वगैरे. अजुन शिकतोय. शिकायचं आहे, पण एकदा विचार मांडून झालं की झालं. पण, व्यक्तिगत मला संमेलनातल्या सहभागाबद्दल स्वत:ला आनंद झाला. ते एक मोठं समाधान आहे. मिपाकरांसोबत तर मिपाच्या जन्मापासून आहे, त्यामुळे मिपाकरांच्या कौतुकाचा आनंद आहे. खरं तर, एकेकाचा नामोल्लेख करून उपप्रतिसाद वाढवता येतील. सर्वांनीच केलेले कौतुक ख़ास आहे, मनापासून आवडलं. तहेदिलसे शुक्रिया. मिपाच्या अन्य धाग्यामधे तु-तू, मै मैं असूनही कौतुक केलं त्या मिपाकर दोस्तांच्या ज़िंदादिलीबद्दलही मनापासून आभार. अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार. आपलं सर्वांचं प्रोत्साहन, प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. आपले प्रतिसाद अजुन चांगलं बोलायला, अजुन चांगली तयारी करायला. अजुन परफेक्ट व्हायला मदत करतील यात मनात शंका नाही. आभार...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 29/04/2022 - 14:50
अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार.
काय हे प्राडॉसंर, मनात ठेवून, कडु तोंड वगैरेही तुमच्या कुणा मराठी टिकाकाराच्या बाबतीत असेल तर तश्या टिकाकारांना शिंगावर जरुर घ्या. पण काही मनमोकळे टिकेचे सूर येऊनही तुमचे, तुकोबा ते तात्या संस्कृतीतील मिपाकर टिकाकार मनामनाचं ओझं वगैरे घेऊन जगत असावेत हा आरोप पुन्हा पडताळण्याची आवश्यकता असावी असे मनापासून वाटते. तुकोबा ते तात्यां शिवाय मनमोकळ्या टिकेची परंपरा तुमच्या मराठवाड्यातील कुरुंदकर ते श्रॉफ सरस्वतीभूवनवाले अशीही याही देही याही डोळा याही कान पाहिली ऐकली आहे. कोकण, मराठवाडा विदर्भ पुणेरी टिकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पुर्वीच्या पिढीतले कुरुंदकर असतील नव्या पिढीतले राजन खान वेगवेगळ्या भागतून असतील आपपर भाव न बाळगता टिका हा मराठी संस्कृतीला जागणारी मनापासून सहसा मनात न ठेवणारी असते आणि मिपाचे आपण संस्थापना पासूनचे पाईक आहाते तेव्हा हेवेसानल म्हणून तुम्हीही मनाला लावून घेऊ नये असे वाटते.

In reply to by माहितगार

अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले.
=)))) कसलं कौतुक , कसली अढी अन कसलं कडु तोंड ! सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत सर . तुमचा हा प्रतिसाद पहा : http://www.misalpav.com/comment/1135514#comment-1135514 पाच पैकी चार राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला , अन जिथे भाजपाला विजय मिळण्याची आशा खुद्द भाजपालाच नव्हती तिथेही काँग्र्समुक्त भारत ह्या भाजपाचा विचाराचा विजय झाला , असे असताना तुमची शब्द रचना पहा >>> लॉकडाऊनमुळे झालेले जनतेचे झालेले हाल, वाहती प्रेते, वाढती महागाई, याचा म्हणावा तसा तितका फटका भाजपाला बसलाच नाही,असे निकाल पाहता म्हणता येत नाही. =)))) ह्याला म्हणतात अढी अन कडु तोंड ! जे पेराल तेच उगवते , येवढं कळण्या इतपत तरी शेतीतील ज्ञान आहे आम्हाला #मीशेतकरी बाकी सर्वत्र राजकारण आणायला आम्हाला आवडत नाही पण साहित्य संमेलन हे राजकीय कुस्तीचाच आखाडा आहे हे हे आम्हाला नाशिक मध्ये काय झालं त्यावरुनच कळलेलें आहे . तस्मात , असोच . पुढील भाषणासाठी शुभेच्छा =))))

सन्जोप राव 28/04/2022 - 20:42
धागा उशीरा पाहिल्यामुळे प्रतिसादही उशीरा देतो आहे. बिरुटेसरांचे हार्दिक अभिनंदन आणि माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल आभार.

सुरिया 28/04/2022 - 21:20
अभिणंडण बिरुटे सर. सर तसे चांगलेच आहेत. आमच्या मोदीकांकांना कैतरी म्हणत असतात सारखे, नाहीतर तसे चांगलेच आहेत ते. आता गवि कौतुक करतात त्यांचे म्हणजे बघा. त्यांना तरी कोण आहे एकमेकाशिवाय. सतत मिपाध्यास घेतलेली माणसे ही. नजर लागावी अशी मैत्री खरोखर त्यांची. कीपीटप.

प्रा. डॉ. सर, अभिनंदन! कमीत कमी वेळात अतिशय मुद्देसूद भाषण केलेत. आवडले. मला एकदा या विषयावर आपणाशी चर्चा करायची आहे. ;) लोल! सं - दी - प

माहितगार 29/04/2022 - 15:00
केळीच्या सालावरून पाय घसरलेल्या मराठी लोकांवरच हसावे तसे ' मोकलाया दाही दिशा'ला क्षणा क्षणाला हसणार्‍या मिपामित्रमंडळी पैकी कुणी, वरील एका प्रतिसादात आलेल्या मेनुकार्डवर एक साधी प्रतिक्रीयाही अद्याप कशी काय दिलेली नाही .
आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

कविता शोधायला मदत

आनन्दा ·

राघव 06/01/2021 - 18:20
पण एक ४ पुस्तकांचा संच आहे - "आठवणीतल्या कविता" म्हणून. लेखक/संकलकः पद्माकर महाजन. त्यात कदाचित मिळू शकेल, नक्की कल्पना नाही.

राघव 06/01/2021 - 18:20
पण एक ४ पुस्तकांचा संच आहे - "आठवणीतल्या कविता" म्हणून. लेखक/संकलकः पद्माकर महाजन. त्यात कदाचित मिळू शकेल, नक्की कल्पना नाही.
आम्ही सध्या एक जुनी कविता शोधत आहोत.. "मी बाई कोकिळ वनांची राणी गाईन सुंदर गोड गाणी" याचे कवी माहीत नाहीत, कवितासंग्रह पण माहीत नाही..

मॅजिक रियलिस्म

रोहित रामचंद्रय्या ·

आहो फार लांब कशाला जाताय? इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा, पैजारबुवा,

विजुभाऊ 05/03/2020 - 09:15
कालच एक कादंबरी वाचली वसंत वसंत लिमये यांची विश्वस्त. यात ट्रेकर्स च्या एका गटाला द्वारके च्या खजिन्या संबन्धी एक ताम्रपट सापडतो आणि एक शोधयात्रा सुरू होते . खूप सुंदर लिहीली आहे. उत्कंठा कायम ठेवणारे वेगवान कथानक आहे

आहो फार लांब कशाला जाताय? इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा, पैजारबुवा,

विजुभाऊ 05/03/2020 - 09:15
कालच एक कादंबरी वाचली वसंत वसंत लिमये यांची विश्वस्त. यात ट्रेकर्स च्या एका गटाला द्वारके च्या खजिन्या संबन्धी एक ताम्रपट सापडतो आणि एक शोधयात्रा सुरू होते . खूप सुंदर लिहीली आहे. उत्कंठा कायम ठेवणारे वेगवान कथानक आहे
नमस्कार मित्र मंडळी. मराठी मध्ये आधुनिक काळात मॅजिक रियलिस्म तंत्र वापरून लिहिलेला कोणत्याही नवीन कथा किंवा कादंबरी आहे का? प्रणाम

लिहायचे आहे, पण कसे?

अनुप देशमुख ·

अॅडमिन नव्हे हो . . . . . संपादक आणि मालक म्हणायचं इथे ! लिहायचं म्हणाल तर लिहित सुटा . . . . . आणि एकदा लिहिलं की संपलं . . . धागा प्रकाशित केला की गंगार्पण झाला समजायचं . . . . त्याचं पुढे काहीही होवो . . . आपण वळून बघायचं नाही ! मनापासून शुभेच्छा !!

अभ्या.. 19/07/2017 - 19:07
मोबाईल आणि जनरेशन ग्याप, पहिलं प्रेम, शेतकर्‍यांचे हाल अन आयटी बेहाल, मुंबईची फास्ट लोकल आणि पुण्याची मुळामुठा, इंन्ग्लिशचे नळ आणि मराठीचे छळ हे सोडून काहीही लिहा.

In reply to by अभ्या..

चिनार 20/07/2017 - 11:39
टपरीवरच्या चहासमोर मॉलच्या शीशीडीचा चहा झक मारते ना लेका.. मॉलमध्ये चक्कर मारून फुटपाथवरून बनियान घेणारे माणसं आम्ही...

मोदक 19/07/2017 - 19:34
खास कांही नाही.. आपण चार मित्रांच्यात बसून गप्पा मारतो तसे लिहा. साहित्यमूल्य वगैरे फालतू समीक्षकी गोष्टींना फाट्यावर मारा आणि बेसीक शुद्धलेखनाच्या चुका टाळा. अगदी मित्रामित्रांच्यात बसून बोललेले अभ्यासायचे असेल तर गविंचे लिखाण वाचा. त्यातही ब्राऊ सिरीज वाचा.

आदूबाळ 19/07/2017 - 19:59
शास्त्रशुद्ध पायर्‍या वगैरे सोडा हो - जे तुम्हाला वाचावंसं वाटतं ते लिहा. लिहून झालं की दोनतीन जाणत्या लोकांकडून तपासून घ्या (याला "बीटा रीडर्स" म्हणतात). मग प्रकाशित करा आणि मापं म्हणतात तसं गंगार्पण करून मोकळे व्हा. मिपावर चांगल्या लेखनाला नेहेमीच उदंड प्रतिसाद मिळतो.

पोहायचे असले तर पाण्यात शिरायलाच लागते, तसे लिहायचे असेल तर लिहायला सुरुवात करावीच लागते. कोणत्याही चौकटीत न अडकता आणि आपल्या शैलीने लिखाण करा. इथे तुम्हाला मिळणार्‍या प्रतिसादांतून मिळणार्‍या, पटणार्‍या आणि शक्य असणार्‍या सल्ल्यांचा विचार करा... पण स्वतःच्या शैलीवर उगाचच स्वतःला न पटणारी बंधने टाकू नका आणि कोणाची कॉपी तर अजिबातच करू नका. हळू हळू लिखाण करणे तुमचे तुम्हालाच आनंदाचे वाटेल, जे सर्वात महत्वाचे आहे... इतर सगळ्यांना ते सगळे लिखाण आवडेलच असे नाही, मुख्य म्हणजे त्याची गरज नाही आणि तसे नामवंत लेखकांच्या बाबतीतही होत नाही. तर, उगाच विचार करण्यात वेळ न घालवता लिहायला सुरुवात करा. हजार किलोमीटरांचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही.

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

अनुप देशमुख 20/07/2017 - 11:33
मोदक - पारायणं झालीत गविंच्या वाचनाची. कंजूस, आदूबाळ, मितान, बिरुटे सर, म्हात्रे साहेब, ऋतु हिरवा, दशाननजी, सौन्दर्य - _____/\______ इतके दिवस वाचनमात्र होतो, संवाद सुरु केल्यावर आपलेपणे वाटतोय. नक्कीच लिहितो आता.

साहित्य पाडायची जोरात खाज सुटली असेल तर एक करा. साहित्य पाडण्याची एक जागा फिक्स करा. विशिष्ठ जागेवर बसून चिंतन करुन साहित्य पाडणारे अनेक तांब्याधिपती मिपावर आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्या. नैसर्गीकरीत्त्या कळ यायची वाट बघा. उगाच साहित्य पाडायचे म्हणून कुंथत बसू नका. असे अनेक कुंथलगिरीकर मिपावर आले आणि गेले. पण त्या सोबत अजून एक लक्षात ठेवायचे म्हणजे आलेली कळ दाबून टाकू नका. उगाच चार चौघांना काय वाटेल म्हणून लाजायचे नाही. ताबडतोब कोठा मोकळा करुन टाकायचा. लाजत बसलात तर मग तुमचा साहित्यिक तुंबारा झालाच म्हणून समजा. अशा तुंबार्‍याचा परीणाम म्हणजे मग कधितरी भयंकर साहित्यिक पोटशूळ उठतो. अशा पोटदूखीमधून मग उगाचच इतरांच्या मोकळे होण्यावर पिंका टाकणे सुरु होते. असल्या पोटदुखीवर इलाज करणारे अनेक तज्ञ डॉक्टर मिपावर उपलब्ध आहेत. त्यांच्या सेवेचा आवश्य लाभ घ्यावा. म्हणजे मग संमं वर ऑपरेशन करायची वेळ येत नाही. तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी. दुसर्‍याची एखादी जिलबी गोड लागली तर तसे बिनशर्त सांगायला लाजू नये. दुसरी कडे पाडलेल्या शिळ्या किंवा दुसर्‍याने पाडलेल्या उष्ट्या जिलब्या गोळा करुन इकडे खपवायचा प्रयत्न करु नका. जगभराच्या जिलब्यांची चव माहीत असलेले अनेक दर्दी मिपावर आहेत याची जाणिव ठेवावी. पाडलेली प्रत्येक जिलबी प्रत्येक ग्राहकाला आवडलीच पाहिजे असा आग्रह धरु नका. मिपावर अनेक चितळे बंधु आहेत. त्यांची जिलेबी हातोहात विकली जाते म्हणून आपलीही गेलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या टपरीवर एक दोन गिर्‍हाइके फिरकली तरी त्यात समाधान माना. चलातर मग उचला तांब्या आणि भरभर जिलब्या पाडायला लागा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिनार 20/07/2017 - 14:14
तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी.
अगागागागागागागागा ! माउली दंडवत घ्या !!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 20/07/2017 - 14:21
हायला ड्वाले पानावले (खरच हसुन हसुन) :) पैजारबुवा रॉक्स ... वाविप्र मध्ये ठेवण्यासारखे मार्गदर्शन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विशुमित 20/07/2017 - 14:21
वाचून पोटात गडगड करायला लागलं. लोक जिलब्या टाकतात पण शेवटी नीट धूत नाहीत. (conclude करत नाहीत) यावर पण जरा मार्गदर्शन करा.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दीपक११७७ 20/07/2017 - 15:22
बरेच मोकळे झालात पैजारबुवा, जलेबी म्हणता म्हणता गु-लाब जामुन सुध्दा सोडलेत, ते ही नैसर्गीकरीत्त्या, भारीच!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनुप देशमुख 20/07/2017 - 22:58
कळेनाच काय प्रतिक्रिया देऊ. एका डोळ्यात हसू आणि आसू अशी अवस्था करू ठेवलीये. रच्याकने आमच्या पोस्टने मालकांना मोकळं केलं हि पावती समजतो आणि चपला घालतो पुढच्या प्रवासाच्या. असाच लोभ असावा!

पैसा 20/07/2017 - 14:46
भाऊ कदम ट्रिपल शेजवान राईसची पाकृ सांगतो तशी लिहिण्याची पाकृ सांगू का? =)) पैजारबुवांची पाकृ पुरेशी आहे खरं तर! =))

पुणेरी पाट्या, पुणे वि. मुंबई/नागपूर, लग्नाच्या बाजारात मुला/मुलींच्या अपेक्षा, नोटाबंदी ह्या गोष्टींवर उत्तम प्रतिची दळणे दळून झालीत. त्यामुळे हे विषय टाळलात तर उत्तम.

विजुभाऊ 20/07/2017 - 16:26
तुम्ही नवखे आहात. मार्गदर्शन हवे म्हणताय म्हनजे तुम्ही नक्की पुणेकर नाही . लिहायचे असेल तर काही हिट्ट विषय १) पुणे - रस्ते , वाडे , मिसळीची ठिकाणे,गल्ल्या , पाट्या, तर्हेवाईकपणा , किचकटपणा, अपमान करायच्या युक्त्या ( तेच ते. त्रिवार द्विरुक्ती होतेय ) , सकाळ मुपी , लुनावाले ब्रम्हे काहिही लिहा हमक्हास हिट्ट. २) मुंबई - कुठे किती साली पाणे साचले होते , भय्ये , शिवसेना , म न से, मुख्यमंत्री , बी एम सी , डोंबीवली, क्रिकेट हे नेहमीचे यशस्वी ३) महाविद्यालयीन शिक्षण. क्लासेस चे पेव, शाळेय अ‍ॅडमिशन. ४) गणीताचे सर , ** काका , ५) गरम पाण्याचे कुंड.... ५) **** गडाखाली चाखलेली मिसळ ६) उरलेल्या भाताचे काय करावे? ७) **** चे डोके ठिकाणावर आहे का?

सूड 20/07/2017 - 19:12
लोक "का लिहीता" विचारायच्या ऐवजी "कधी लिहीणार" विचारतील असं लिहा. कधी लिहीणार, अर्थातच नेहमी रतीब घालणार्‍यांना लोक विचारत नाहीत. तुम्ही आता लिहीलंय तेही छान आहे. एकदा पोस्ट केलं की चांगले आणि वाईट दोन्ही प्रतिसाद येणार ही मनाची तयारी ठेवा, मग फार त्रास होत नाही.

सुबोध खरे 21/07/2017 - 19:13
एक अनाहूत सल्ला जेंव्हा सुचेल तेंव्हा टंकून ठेवा. दोन दिवसांनी आपलेच लिखाण परत वाचून पहा. त्यात काही दम वाटला तर अजून एक दिवस थांबा आणि परत वाचून पहा शुद्धलेखनापासून इतरही काही चुका आढळतील. त्या दूरूस्त करा आणि मग लेखन मिपावर टाका. लक्षात ठेवा दुसऱ्याच्या लेखनावर प्रतिसाद देणे किंवा पिचक्या टाकणे सोपे असते पण स्वतःचे लेखन कसदार करण्यासाठी बऱ्यापैकी कष्ट लागतात( लागत असावेत). मी काही लेखक नाही फक्त अनुभव लिहितो त्यामुळे स्वानुभव नाही

अॅडमिन नव्हे हो . . . . . संपादक आणि मालक म्हणायचं इथे ! लिहायचं म्हणाल तर लिहित सुटा . . . . . आणि एकदा लिहिलं की संपलं . . . धागा प्रकाशित केला की गंगार्पण झाला समजायचं . . . . त्याचं पुढे काहीही होवो . . . आपण वळून बघायचं नाही ! मनापासून शुभेच्छा !!

अभ्या.. 19/07/2017 - 19:07
मोबाईल आणि जनरेशन ग्याप, पहिलं प्रेम, शेतकर्‍यांचे हाल अन आयटी बेहाल, मुंबईची फास्ट लोकल आणि पुण्याची मुळामुठा, इंन्ग्लिशचे नळ आणि मराठीचे छळ हे सोडून काहीही लिहा.

In reply to by अभ्या..

चिनार 20/07/2017 - 11:39
टपरीवरच्या चहासमोर मॉलच्या शीशीडीचा चहा झक मारते ना लेका.. मॉलमध्ये चक्कर मारून फुटपाथवरून बनियान घेणारे माणसं आम्ही...

मोदक 19/07/2017 - 19:34
खास कांही नाही.. आपण चार मित्रांच्यात बसून गप्पा मारतो तसे लिहा. साहित्यमूल्य वगैरे फालतू समीक्षकी गोष्टींना फाट्यावर मारा आणि बेसीक शुद्धलेखनाच्या चुका टाळा. अगदी मित्रामित्रांच्यात बसून बोललेले अभ्यासायचे असेल तर गविंचे लिखाण वाचा. त्यातही ब्राऊ सिरीज वाचा.

आदूबाळ 19/07/2017 - 19:59
शास्त्रशुद्ध पायर्‍या वगैरे सोडा हो - जे तुम्हाला वाचावंसं वाटतं ते लिहा. लिहून झालं की दोनतीन जाणत्या लोकांकडून तपासून घ्या (याला "बीटा रीडर्स" म्हणतात). मग प्रकाशित करा आणि मापं म्हणतात तसं गंगार्पण करून मोकळे व्हा. मिपावर चांगल्या लेखनाला नेहेमीच उदंड प्रतिसाद मिळतो.

पोहायचे असले तर पाण्यात शिरायलाच लागते, तसे लिहायचे असेल तर लिहायला सुरुवात करावीच लागते. कोणत्याही चौकटीत न अडकता आणि आपल्या शैलीने लिखाण करा. इथे तुम्हाला मिळणार्‍या प्रतिसादांतून मिळणार्‍या, पटणार्‍या आणि शक्य असणार्‍या सल्ल्यांचा विचार करा... पण स्वतःच्या शैलीवर उगाचच स्वतःला न पटणारी बंधने टाकू नका आणि कोणाची कॉपी तर अजिबातच करू नका. हळू हळू लिखाण करणे तुमचे तुम्हालाच आनंदाचे वाटेल, जे सर्वात महत्वाचे आहे... इतर सगळ्यांना ते सगळे लिखाण आवडेलच असे नाही, मुख्य म्हणजे त्याची गरज नाही आणि तसे नामवंत लेखकांच्या बाबतीतही होत नाही. तर, उगाच विचार करण्यात वेळ न घालवता लिहायला सुरुवात करा. हजार किलोमीटरांचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही.

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

अनुप देशमुख 20/07/2017 - 11:33
मोदक - पारायणं झालीत गविंच्या वाचनाची. कंजूस, आदूबाळ, मितान, बिरुटे सर, म्हात्रे साहेब, ऋतु हिरवा, दशाननजी, सौन्दर्य - _____/\______ इतके दिवस वाचनमात्र होतो, संवाद सुरु केल्यावर आपलेपणे वाटतोय. नक्कीच लिहितो आता.

साहित्य पाडायची जोरात खाज सुटली असेल तर एक करा. साहित्य पाडण्याची एक जागा फिक्स करा. विशिष्ठ जागेवर बसून चिंतन करुन साहित्य पाडणारे अनेक तांब्याधिपती मिपावर आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्या. नैसर्गीकरीत्त्या कळ यायची वाट बघा. उगाच साहित्य पाडायचे म्हणून कुंथत बसू नका. असे अनेक कुंथलगिरीकर मिपावर आले आणि गेले. पण त्या सोबत अजून एक लक्षात ठेवायचे म्हणजे आलेली कळ दाबून टाकू नका. उगाच चार चौघांना काय वाटेल म्हणून लाजायचे नाही. ताबडतोब कोठा मोकळा करुन टाकायचा. लाजत बसलात तर मग तुमचा साहित्यिक तुंबारा झालाच म्हणून समजा. अशा तुंबार्‍याचा परीणाम म्हणजे मग कधितरी भयंकर साहित्यिक पोटशूळ उठतो. अशा पोटदूखीमधून मग उगाचच इतरांच्या मोकळे होण्यावर पिंका टाकणे सुरु होते. असल्या पोटदुखीवर इलाज करणारे अनेक तज्ञ डॉक्टर मिपावर उपलब्ध आहेत. त्यांच्या सेवेचा आवश्य लाभ घ्यावा. म्हणजे मग संमं वर ऑपरेशन करायची वेळ येत नाही. तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी. दुसर्‍याची एखादी जिलबी गोड लागली तर तसे बिनशर्त सांगायला लाजू नये. दुसरी कडे पाडलेल्या शिळ्या किंवा दुसर्‍याने पाडलेल्या उष्ट्या जिलब्या गोळा करुन इकडे खपवायचा प्रयत्न करु नका. जगभराच्या जिलब्यांची चव माहीत असलेले अनेक दर्दी मिपावर आहेत याची जाणिव ठेवावी. पाडलेली प्रत्येक जिलबी प्रत्येक ग्राहकाला आवडलीच पाहिजे असा आग्रह धरु नका. मिपावर अनेक चितळे बंधु आहेत. त्यांची जिलेबी हातोहात विकली जाते म्हणून आपलीही गेलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या टपरीवर एक दोन गिर्‍हाइके फिरकली तरी त्यात समाधान माना. चलातर मग उचला तांब्या आणि भरभर जिलब्या पाडायला लागा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिनार 20/07/2017 - 14:14
तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी.
अगागागागागागागागा ! माउली दंडवत घ्या !!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 20/07/2017 - 14:21
हायला ड्वाले पानावले (खरच हसुन हसुन) :) पैजारबुवा रॉक्स ... वाविप्र मध्ये ठेवण्यासारखे मार्गदर्शन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विशुमित 20/07/2017 - 14:21
वाचून पोटात गडगड करायला लागलं. लोक जिलब्या टाकतात पण शेवटी नीट धूत नाहीत. (conclude करत नाहीत) यावर पण जरा मार्गदर्शन करा.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दीपक११७७ 20/07/2017 - 15:22
बरेच मोकळे झालात पैजारबुवा, जलेबी म्हणता म्हणता गु-लाब जामुन सुध्दा सोडलेत, ते ही नैसर्गीकरीत्त्या, भारीच!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनुप देशमुख 20/07/2017 - 22:58
कळेनाच काय प्रतिक्रिया देऊ. एका डोळ्यात हसू आणि आसू अशी अवस्था करू ठेवलीये. रच्याकने आमच्या पोस्टने मालकांना मोकळं केलं हि पावती समजतो आणि चपला घालतो पुढच्या प्रवासाच्या. असाच लोभ असावा!

पैसा 20/07/2017 - 14:46
भाऊ कदम ट्रिपल शेजवान राईसची पाकृ सांगतो तशी लिहिण्याची पाकृ सांगू का? =)) पैजारबुवांची पाकृ पुरेशी आहे खरं तर! =))

पुणेरी पाट्या, पुणे वि. मुंबई/नागपूर, लग्नाच्या बाजारात मुला/मुलींच्या अपेक्षा, नोटाबंदी ह्या गोष्टींवर उत्तम प्रतिची दळणे दळून झालीत. त्यामुळे हे विषय टाळलात तर उत्तम.

विजुभाऊ 20/07/2017 - 16:26
तुम्ही नवखे आहात. मार्गदर्शन हवे म्हणताय म्हनजे तुम्ही नक्की पुणेकर नाही . लिहायचे असेल तर काही हिट्ट विषय १) पुणे - रस्ते , वाडे , मिसळीची ठिकाणे,गल्ल्या , पाट्या, तर्हेवाईकपणा , किचकटपणा, अपमान करायच्या युक्त्या ( तेच ते. त्रिवार द्विरुक्ती होतेय ) , सकाळ मुपी , लुनावाले ब्रम्हे काहिही लिहा हमक्हास हिट्ट. २) मुंबई - कुठे किती साली पाणे साचले होते , भय्ये , शिवसेना , म न से, मुख्यमंत्री , बी एम सी , डोंबीवली, क्रिकेट हे नेहमीचे यशस्वी ३) महाविद्यालयीन शिक्षण. क्लासेस चे पेव, शाळेय अ‍ॅडमिशन. ४) गणीताचे सर , ** काका , ५) गरम पाण्याचे कुंड.... ५) **** गडाखाली चाखलेली मिसळ ६) उरलेल्या भाताचे काय करावे? ७) **** चे डोके ठिकाणावर आहे का?

सूड 20/07/2017 - 19:12
लोक "का लिहीता" विचारायच्या ऐवजी "कधी लिहीणार" विचारतील असं लिहा. कधी लिहीणार, अर्थातच नेहमी रतीब घालणार्‍यांना लोक विचारत नाहीत. तुम्ही आता लिहीलंय तेही छान आहे. एकदा पोस्ट केलं की चांगले आणि वाईट दोन्ही प्रतिसाद येणार ही मनाची तयारी ठेवा, मग फार त्रास होत नाही.

सुबोध खरे 21/07/2017 - 19:13
एक अनाहूत सल्ला जेंव्हा सुचेल तेंव्हा टंकून ठेवा. दोन दिवसांनी आपलेच लिखाण परत वाचून पहा. त्यात काही दम वाटला तर अजून एक दिवस थांबा आणि परत वाचून पहा शुद्धलेखनापासून इतरही काही चुका आढळतील. त्या दूरूस्त करा आणि मग लेखन मिपावर टाका. लक्षात ठेवा दुसऱ्याच्या लेखनावर प्रतिसाद देणे किंवा पिचक्या टाकणे सोपे असते पण स्वतःचे लेखन कसदार करण्यासाठी बऱ्यापैकी कष्ट लागतात( लागत असावेत). मी काही लेखक नाही फक्त अनुभव लिहितो त्यामुळे स्वानुभव नाही
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे. लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला.

साहित्यातील survival of the fittest म्हणजे काय ?

जयंत कुलकर्णी ·

संदीप डांगे 26/02/2017 - 00:03
जयंत काका, जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती... त्यास मुद्दामहून मार्केटींग, डिफेन्स करायची गरज पडत नाही असे मला वैयक्तिक वाटते. आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता. तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल.

//जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती.//// "तरते" ही संकल्पनाच मला मान्य नाही. तरते म्हणजे काय ? यात किती काळ हा प्रश्न महत्वाचा आहे. श्री. ह. ना आपट्यांची पुस्तके आता कोणी वाचेल का ? म्हणून मी "काळाचा महिमा" हा एक मुद्दा अंतर्भूत केला होता. //आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता...//// मला नुसता लेखक एवढेच अभिप्रेत नाही. एकंदरीत साहित्यविश्र्वात काय होत असावे याचा आढावा घेतला जावा.. //तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल. //// जरुर विचार करा. . मला वाटते survival of fittest असे साहित्यात काही नसावे... अर्थात हा माझा विचार झाला. चुकिचा असेल....

साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ? साहित्य तगेल का नाही हा मूळ प्रश्न आहे, साहित्यिकाच्या सर्वायवलचा प्रश्न नाही, आणि असला तरी तो साहित्य तरण्यावरच अवलंबून आहे. साहित्य तरायला एकमेव क्रायटेरिया वाचक त्याच्याशी रिलेट होऊ शकणं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात -आर्थिक दृष्ट्या : साहित्य तरलं तरच आर्थिक संभावना निर्माण होणार. - वाचकांच्या संख्येचा विचार करता : प्रसिद्धी वाढेल तशी वाचक संख्या वाढणार. - का लिखाणातील सातत्याचा विचार करता : हे लेखकाच्या अनुभवविश्वावर अवलंबूने. - का लोकप्रियतेचा विचार करता : मूळात लेखकाला स्वतःचं साहित्य आवडायला हवं ! - का सरकार मान्यता मिळाली म्हणून.. : छे, असले लेखक फारच तद्दन असतील. - जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ? : ज्याला वाचक नाहीत त्या लेखनाचा काय उपयोग ? लेखन हे अनुभवाचं शेअरींग नाही काय ? - जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस. - समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ? : ते लेखकाचा स्वतःच्या लेखनावर किती विश्वास आहे त्यावर अवलंबून आहे. ओशो म्हणाले होते `माझं साहित्य काळाच्या किमान ५० वर्ष पुढे आहे !' - याच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ? मूळात सांप्रत काळात ते तरायला हवं. - किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते. उत्तम साहित्य निर्मितीसाठी फक्त दोनच गोष्टी लागतात. एक, अनुभवाची उत्कटता आणि दोन, तो मांडण्याची शैली

In reply to by संजय क्षीरसागर

:-) //जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस///// पण एखाद्याला ते समजण्याची कुवत नसेल तर ? पण मी यावर चर्चा करणे इष्ट नाही आणि तुमच्याशी चर्चा करण्याची माझी पात्रताही नाही. असो. पण मी विनंती करुनही तुम्ही करायचा तो ...... केलात त्याबद्दल धन्यवाद ! ता.क. तुमच्या माहितीकरता येथे आणि इतरत्र ही कादंबरी जगात अगणित (म्हणजे खरंच अगणित) लोकांना आवडली आहे. माझ्याकडून पूर्णविराम.

In reply to by पैसा

साधारण हेच नियम लागू होतात. संकेतस्थळावरचं लेखन इंटर अ‍ॅक्टीव असतं हा प्रिंट मेडियापेक्षा वेगळा आणि ठळक फरक आहे.

अभ्या.. 26/02/2017 - 19:52
नमस्कार जयंतकाका, माझ्या मते लेखन म्हणजे काय? तर जे दुसर्‍या कुणाला वाचावेसे वाटते ते. मग हा सेट कीतीही अन कसाही असेल. ह्या सेटमधल्या वाचकांच्या भावना कशाही असू देत. वाचले जाते ते लेखन. पत्र असो की कथा, अनुभव असो की अहवाल, प्रत्येक टाईपच्या लेखणाला वाचकवर्ग असतोच. तो त्यातून काय घेतो हा त्याचा प्रश्न. अ‍ॅक्चुअल जीवसृष्टीतल्या फिट जीवाला वेगळे काही पोषण मिळालेले नसते. सर्वांसारखेच पोषण त्याचे होते. मग त्यात अधिक फिट, अनफिट अशा संकल्पना कधी तयार होतात? की जेम्व्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो. मग लेखकाला अन लेखनाला तोच रुल लागेल बहुधा.

In reply to by अभ्या..

जेव्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो. लेखनाच्याबाबतीत `आलेल्या अनुभवांचा' वापर तो `अभिव्यक्तीच्या उर्मीसाठी' इतरांपेक्षा किती सक्षमतेनं आणि अधिक क्रियेटिव्हली करतो यावर `लेखन' तगेल की नाही हे ठरतं.

In reply to by अभ्या..

नमस्कार ! या येथेच आपल्यात मतभेद आहेत. माझ्या मते लेखन म्हणजे आपल्या भावभावना कागदावर उतरवणे हेच. कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही. लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही. उदा. तुम्ही जेव्हा एखादे चित्र रेखाटता तेव्हा ते कोणीतरी पहावे असाच हेतू असतो का ? एखाद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या भावनांना स्केच बूकवर मोकळे करत नाही का ? उघडून बघा. अशी अनेक स्केचेस तुम्हाला आढळतील... :-) तसेच लिखाणाचे असावे..

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 20:46
कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही.
माझ्या म्हणण्यात हाच अर्थ होता काका!

In reply to by संदीप डांगे

डांगेसाहेब, पहिल्या प्रकारात फिटेस्टचा प्रश्र्न उदभवत नाही तर दुसर्‍या प्रकारात ते तगले असे म्हणायला लागेल...म्हणजे साहित्य लेखकाने लेखन कागदावर उतरविले की ते वाचले गेले काय नि वाचले न गेले काय फरक पडतो ? हे जर खरे असेल तर फिटेस्टला काय अर्थ उरतो ? :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 21:15
मी प्रकाशित साहित्याबद्दल बोलत आहे. मूळ मुद्दा लिहिलं ते वाचलं की नाही हा नसून प्रसिद्ध झालं ते वाचलं आणि आवडलं की नाही हा आहे. आता ह्यात दर्जाचा संबंध नाहीच. दर्जा हा सब्जेक्टिव विषय आहे. इथे थोडं अजून स्पेसिफिक लिहायचं तर... प्रत्येक ठिकाणाचे आपले एक वलय असते, स्वभाव असतो, त्या स्वभावाशी जुळणारे एकत्र येतात.. त्यात त्यांच्या स्वभावाशी आवडीनिवडीशी रिलेट होईल अशाच कलाकृती सादर झाल्यात तर उचलून धरल्या जातात... एक उदाहरण म्हणजे, सवाई गंधर्व मध्ये द्वयर्थी लोकगीतांचा कार्यक्रम तगणार नाही, व जिथे हा द्वयर्थी कार्यक्रम होतो तिथे शास्त्रिय संगीत तगणार नाही... 'फिट' चा अर्थ असाच आहे ना? फिट म्हणजे सशक्त, सबळ, सर्वोत्तम असा नसतो. सर्वावयल ऑफ द फिटेस्ट चा मूळ अर्थ हा बळी तो कान पिळी हा नसून जो प्राप्त परिस्थितीला जुळवून घेतो तो तगतो असा आहे. फिटेस्ट म्हणजे जुळवून घेण्यात सर्वोत्तम. काही कलाकृती बर्‍याच काळाने हिट होतात कारण त्यांना जुळवून घेईल असा काळ तेव्हा येतो, तर काही लगेच मृत होतात कारण तशी परिस्थिती राहत नाही. परिस्थिती म्हणजे कलाकॄतीच्या समकक्ष आवड असणारे रसिक.... तुम्ही वर एक प्रश्न विचारलाय की लेखकाला एक वाचक मिळाला तर काय म्हणता येईल..? मला असं वाटतं की लिहिणार्‍याला रसिक किती मिळतात त्यावर लिहिणार्‍यास फरक पडू नये. एक जर समकक्ष रसिक मिळाला तरी पुरे... माझ्या एका पेन्टींग ला थेट मुकेश अंबानीनेच दहा करोडला विकत घेतले तर मला इतर लोक काय म्हणतात याच्याशी काय घेणेदेणे..? किंवा एखाद्या मध्यमवर्गीय माणसाने हजार ररुपयाला घेतले तरी मला इतरांशी काय घेणेदेणे? मोबियस कदाचित चारच लोक वाचणार, आणि राजू पवारची कविता लाखो कॉलेजियन फॉरवर्ड करणार... यात तुलना कशी करणार हाच प्रश्न आहे ना? त्यावर थोड्यावेळाने टंकतो...

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 21:35
सॉरी सॉरी... तुम्हाला जे अभिप्रेतही नाही तेच परत परत होतंय... मनापासून सॉरी! संपादक महोदय, कृपया माझ्या प्रतिसादात मोबियसचा उल्लेख काढून टाकावा अशी विनंती करतो.... तसेही त्याबद्दल नंतरच लिहायचे आहे..

In reply to by जयंत कुलकर्णी

लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही. मग त्याला `डायरी' म्हणतात .

चॅट्सवूड 27/02/2017 - 19:40
खूप छान प्रश्न! त्यासाठी अभिनंदन! माझ्या मते लेखकाने लिहीत राहावे, 'बलिष्ठ अतिजीविता' (survival of the fittest) विचार न करता! लेखन ही स्पर्धा नाही, तो एक अनुभव आहे, जो लेखकाला आणि वाचकाला समृद्ध करत असतो आणि अनुभवांना मोजता येत नाही, त्यामुळे स्पर्धा होणे शक्य नाही. तुमचं लेखन लोंकाना किती समृद्ध करतंय हे बघणं आवश्यक आहे, पण बऱ्याच वेळा, तुमच्या लेखनामुळे झालेले बदल तुमच्या पर्यंत पोहचतीलच असे मात्र नाही, कदाचित बदल शेवटपर्यंत कळणार नाहीत, पण यामुळे वाचकाच्या प्रतिक्रियेचे महत्त्व कमी होत नाही! कधीतरी, ती प्रतिक्रिया लेखकाच्या मनासारखी असणार नाही, पण त्यामुळे समृद्ध होण्याच्या प्रक्रियेला वाव मिळू शकतो.

मितान 27/02/2017 - 19:59
कोणतंही साहित्य आयुष्मंत व्हायला हजारो प्रकारचे निकष कारणीभूत ठरतात. त्यामुळे साहित्यासारख्या अशारीर संकल्पनेला 'बलिष्ठ अतिजीविता' हा शारीर निकष लागू पडत नसावा असे मला वाटते. या विषयावर उत्तम चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा !

अभिदेश 28/02/2017 - 01:40
लेखक केवळ आपल्या भावभावना कागदावर उतरवन्यासाठीच लिहितो असे नाही. त्यामागे एक प्रकारची अमरत्वाची देखील भावना अथवा सुप्त इच्छा असते. आपले लेखन लोकप्रिय व्हावे , लोकांच्या पसंतीस उतरावे ह्यामागे हीच भावना असावी.

वरुण मोहिते 28/02/2017 - 08:56
आणि काळ ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत .अनेक लेखक काळ तसा होता म्हणून प्रसिद्ध झाले आणि अनेक लेखक केवळ चांगलं लिहून प्रसिद्ध झाले .जे आजपर्यंत वाचलं जातं. उदाहरण म्हणजे आताची पिढी ८-१० वर्षाची किंवा त्याहून जास्त ती लोकं पु ल देशपांडे वाचत नाहीत . कारण रिलेटच होता येत नाहीत्या काळाशी . ऐकून माहिती असत पण वाचायला बोर होत त्यांना उदाहरण दुसरं शाम मनोहर म्हणून एक लेखक आहेत त्यांची पुस्तकं ५० वर्षानेपण वाचली जातील . क्लिष्ट लिहितात पण संदर्भ लागू होतो जगण्यातला . अशी इंग्लिश मध्ये तर खोऱ्याने उदाहरण आहेत . सकस लिहिलेलं केव्हाही टिकतं

मोदक 28/02/2017 - 13:45
विचार करायला लावणारा धागा आणि प्रतिसाद. धन्यवाद काका. साहित्यातील "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" शोधणे म्हणजे थोडेसे सरसकटीकरण होईल कारण साहित्याला अनेक आयाम असतात. आपण साहित्य आणि जीवसृष्टी अशी तुलना केली तर जीवसॄष्टीतील प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणेच साहित्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते आपल्या जातकुळीसोबत आपल्यासारख्याच बाह्य जाती/प्रजातींसोबतही अस्तित्वाचा लढा देत असतात. विनोद, काव्य, कथा, इतिहास, सत्यकथा असे साहित्याला अनेक आयाम आहेत यामुळे यांना एकच पातळीवर आणून तुलना करणे अवघड जाईल किंवा अनेकदा चुकीचे निष्कर्ष निघतील. तसेच ही तुलना करताना प्रत्येक वाचक स्वतःच्या वकुबाने तुलना करणार असल्याने एकाच कलाकृतीच्या संदर्भात तुमचे आणि माझे निष्कर्षही वेगळे असतील. तरीही माझ्या मते, साहित्यातील सर्वाईव्ह होणारे फिटेस्ट साहित्य म्हणजे त्याच प्रकारचे एखादे साहित्य वाचल्यानंतर मूळ साहित्याची आठवण होणे. उदाहरण - होलोकॉस्ट आणि जर्मनीचे दुसर्‍या महायुद्धातले प्रताप यांवर तुम्ही लिहिलेल्या प्रभावी लेख मालिका किंवा अल्बर्ट स्पीअरचा लेख हे मी संदर्भ म्हणून जपून ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी या विषयावरचे वेगळेच पुस्तक वाचताना माझा रेफरन्स हा तुमचाच लेख असतो. माझ्या दृष्टीने हे "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" असेल.

संदीप डांगे 26/02/2017 - 00:03
जयंत काका, जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती... त्यास मुद्दामहून मार्केटींग, डिफेन्स करायची गरज पडत नाही असे मला वैयक्तिक वाटते. आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता. तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल.

//जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती.//// "तरते" ही संकल्पनाच मला मान्य नाही. तरते म्हणजे काय ? यात किती काळ हा प्रश्न महत्वाचा आहे. श्री. ह. ना आपट्यांची पुस्तके आता कोणी वाचेल का ? म्हणून मी "काळाचा महिमा" हा एक मुद्दा अंतर्भूत केला होता. //आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता...//// मला नुसता लेखक एवढेच अभिप्रेत नाही. एकंदरीत साहित्यविश्र्वात काय होत असावे याचा आढावा घेतला जावा.. //तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल. //// जरुर विचार करा. . मला वाटते survival of fittest असे साहित्यात काही नसावे... अर्थात हा माझा विचार झाला. चुकिचा असेल....

साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ? साहित्य तगेल का नाही हा मूळ प्रश्न आहे, साहित्यिकाच्या सर्वायवलचा प्रश्न नाही, आणि असला तरी तो साहित्य तरण्यावरच अवलंबून आहे. साहित्य तरायला एकमेव क्रायटेरिया वाचक त्याच्याशी रिलेट होऊ शकणं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात -आर्थिक दृष्ट्या : साहित्य तरलं तरच आर्थिक संभावना निर्माण होणार. - वाचकांच्या संख्येचा विचार करता : प्रसिद्धी वाढेल तशी वाचक संख्या वाढणार. - का लिखाणातील सातत्याचा विचार करता : हे लेखकाच्या अनुभवविश्वावर अवलंबूने. - का लोकप्रियतेचा विचार करता : मूळात लेखकाला स्वतःचं साहित्य आवडायला हवं ! - का सरकार मान्यता मिळाली म्हणून.. : छे, असले लेखक फारच तद्दन असतील. - जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ? : ज्याला वाचक नाहीत त्या लेखनाचा काय उपयोग ? लेखन हे अनुभवाचं शेअरींग नाही काय ? - जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस. - समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ? : ते लेखकाचा स्वतःच्या लेखनावर किती विश्वास आहे त्यावर अवलंबून आहे. ओशो म्हणाले होते `माझं साहित्य काळाच्या किमान ५० वर्ष पुढे आहे !' - याच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ? मूळात सांप्रत काळात ते तरायला हवं. - किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते. उत्तम साहित्य निर्मितीसाठी फक्त दोनच गोष्टी लागतात. एक, अनुभवाची उत्कटता आणि दोन, तो मांडण्याची शैली

In reply to by संजय क्षीरसागर

:-) //जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस///// पण एखाद्याला ते समजण्याची कुवत नसेल तर ? पण मी यावर चर्चा करणे इष्ट नाही आणि तुमच्याशी चर्चा करण्याची माझी पात्रताही नाही. असो. पण मी विनंती करुनही तुम्ही करायचा तो ...... केलात त्याबद्दल धन्यवाद ! ता.क. तुमच्या माहितीकरता येथे आणि इतरत्र ही कादंबरी जगात अगणित (म्हणजे खरंच अगणित) लोकांना आवडली आहे. माझ्याकडून पूर्णविराम.

In reply to by पैसा

साधारण हेच नियम लागू होतात. संकेतस्थळावरचं लेखन इंटर अ‍ॅक्टीव असतं हा प्रिंट मेडियापेक्षा वेगळा आणि ठळक फरक आहे.

अभ्या.. 26/02/2017 - 19:52
नमस्कार जयंतकाका, माझ्या मते लेखन म्हणजे काय? तर जे दुसर्‍या कुणाला वाचावेसे वाटते ते. मग हा सेट कीतीही अन कसाही असेल. ह्या सेटमधल्या वाचकांच्या भावना कशाही असू देत. वाचले जाते ते लेखन. पत्र असो की कथा, अनुभव असो की अहवाल, प्रत्येक टाईपच्या लेखणाला वाचकवर्ग असतोच. तो त्यातून काय घेतो हा त्याचा प्रश्न. अ‍ॅक्चुअल जीवसृष्टीतल्या फिट जीवाला वेगळे काही पोषण मिळालेले नसते. सर्वांसारखेच पोषण त्याचे होते. मग त्यात अधिक फिट, अनफिट अशा संकल्पना कधी तयार होतात? की जेम्व्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो. मग लेखकाला अन लेखनाला तोच रुल लागेल बहुधा.

In reply to by अभ्या..

जेव्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो. लेखनाच्याबाबतीत `आलेल्या अनुभवांचा' वापर तो `अभिव्यक्तीच्या उर्मीसाठी' इतरांपेक्षा किती सक्षमतेनं आणि अधिक क्रियेटिव्हली करतो यावर `लेखन' तगेल की नाही हे ठरतं.

In reply to by अभ्या..

नमस्कार ! या येथेच आपल्यात मतभेद आहेत. माझ्या मते लेखन म्हणजे आपल्या भावभावना कागदावर उतरवणे हेच. कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही. लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही. उदा. तुम्ही जेव्हा एखादे चित्र रेखाटता तेव्हा ते कोणीतरी पहावे असाच हेतू असतो का ? एखाद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या भावनांना स्केच बूकवर मोकळे करत नाही का ? उघडून बघा. अशी अनेक स्केचेस तुम्हाला आढळतील... :-) तसेच लिखाणाचे असावे..

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 20:46
कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही.
माझ्या म्हणण्यात हाच अर्थ होता काका!

In reply to by संदीप डांगे

डांगेसाहेब, पहिल्या प्रकारात फिटेस्टचा प्रश्र्न उदभवत नाही तर दुसर्‍या प्रकारात ते तगले असे म्हणायला लागेल...म्हणजे साहित्य लेखकाने लेखन कागदावर उतरविले की ते वाचले गेले काय नि वाचले न गेले काय फरक पडतो ? हे जर खरे असेल तर फिटेस्टला काय अर्थ उरतो ? :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 21:15
मी प्रकाशित साहित्याबद्दल बोलत आहे. मूळ मुद्दा लिहिलं ते वाचलं की नाही हा नसून प्रसिद्ध झालं ते वाचलं आणि आवडलं की नाही हा आहे. आता ह्यात दर्जाचा संबंध नाहीच. दर्जा हा सब्जेक्टिव विषय आहे. इथे थोडं अजून स्पेसिफिक लिहायचं तर... प्रत्येक ठिकाणाचे आपले एक वलय असते, स्वभाव असतो, त्या स्वभावाशी जुळणारे एकत्र येतात.. त्यात त्यांच्या स्वभावाशी आवडीनिवडीशी रिलेट होईल अशाच कलाकृती सादर झाल्यात तर उचलून धरल्या जातात... एक उदाहरण म्हणजे, सवाई गंधर्व मध्ये द्वयर्थी लोकगीतांचा कार्यक्रम तगणार नाही, व जिथे हा द्वयर्थी कार्यक्रम होतो तिथे शास्त्रिय संगीत तगणार नाही... 'फिट' चा अर्थ असाच आहे ना? फिट म्हणजे सशक्त, सबळ, सर्वोत्तम असा नसतो. सर्वावयल ऑफ द फिटेस्ट चा मूळ अर्थ हा बळी तो कान पिळी हा नसून जो प्राप्त परिस्थितीला जुळवून घेतो तो तगतो असा आहे. फिटेस्ट म्हणजे जुळवून घेण्यात सर्वोत्तम. काही कलाकृती बर्‍याच काळाने हिट होतात कारण त्यांना जुळवून घेईल असा काळ तेव्हा येतो, तर काही लगेच मृत होतात कारण तशी परिस्थिती राहत नाही. परिस्थिती म्हणजे कलाकॄतीच्या समकक्ष आवड असणारे रसिक.... तुम्ही वर एक प्रश्न विचारलाय की लेखकाला एक वाचक मिळाला तर काय म्हणता येईल..? मला असं वाटतं की लिहिणार्‍याला रसिक किती मिळतात त्यावर लिहिणार्‍यास फरक पडू नये. एक जर समकक्ष रसिक मिळाला तरी पुरे... माझ्या एका पेन्टींग ला थेट मुकेश अंबानीनेच दहा करोडला विकत घेतले तर मला इतर लोक काय म्हणतात याच्याशी काय घेणेदेणे..? किंवा एखाद्या मध्यमवर्गीय माणसाने हजार ररुपयाला घेतले तरी मला इतरांशी काय घेणेदेणे? मोबियस कदाचित चारच लोक वाचणार, आणि राजू पवारची कविता लाखो कॉलेजियन फॉरवर्ड करणार... यात तुलना कशी करणार हाच प्रश्न आहे ना? त्यावर थोड्यावेळाने टंकतो...

In reply to by जयंत कुलकर्णी

संदीप डांगे 26/02/2017 - 21:35
सॉरी सॉरी... तुम्हाला जे अभिप्रेतही नाही तेच परत परत होतंय... मनापासून सॉरी! संपादक महोदय, कृपया माझ्या प्रतिसादात मोबियसचा उल्लेख काढून टाकावा अशी विनंती करतो.... तसेही त्याबद्दल नंतरच लिहायचे आहे..

In reply to by जयंत कुलकर्णी

लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही. मग त्याला `डायरी' म्हणतात .

चॅट्सवूड 27/02/2017 - 19:40
खूप छान प्रश्न! त्यासाठी अभिनंदन! माझ्या मते लेखकाने लिहीत राहावे, 'बलिष्ठ अतिजीविता' (survival of the fittest) विचार न करता! लेखन ही स्पर्धा नाही, तो एक अनुभव आहे, जो लेखकाला आणि वाचकाला समृद्ध करत असतो आणि अनुभवांना मोजता येत नाही, त्यामुळे स्पर्धा होणे शक्य नाही. तुमचं लेखन लोंकाना किती समृद्ध करतंय हे बघणं आवश्यक आहे, पण बऱ्याच वेळा, तुमच्या लेखनामुळे झालेले बदल तुमच्या पर्यंत पोहचतीलच असे मात्र नाही, कदाचित बदल शेवटपर्यंत कळणार नाहीत, पण यामुळे वाचकाच्या प्रतिक्रियेचे महत्त्व कमी होत नाही! कधीतरी, ती प्रतिक्रिया लेखकाच्या मनासारखी असणार नाही, पण त्यामुळे समृद्ध होण्याच्या प्रक्रियेला वाव मिळू शकतो.

मितान 27/02/2017 - 19:59
कोणतंही साहित्य आयुष्मंत व्हायला हजारो प्रकारचे निकष कारणीभूत ठरतात. त्यामुळे साहित्यासारख्या अशारीर संकल्पनेला 'बलिष्ठ अतिजीविता' हा शारीर निकष लागू पडत नसावा असे मला वाटते. या विषयावर उत्तम चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा !

अभिदेश 28/02/2017 - 01:40
लेखक केवळ आपल्या भावभावना कागदावर उतरवन्यासाठीच लिहितो असे नाही. त्यामागे एक प्रकारची अमरत्वाची देखील भावना अथवा सुप्त इच्छा असते. आपले लेखन लोकप्रिय व्हावे , लोकांच्या पसंतीस उतरावे ह्यामागे हीच भावना असावी.

वरुण मोहिते 28/02/2017 - 08:56
आणि काळ ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत .अनेक लेखक काळ तसा होता म्हणून प्रसिद्ध झाले आणि अनेक लेखक केवळ चांगलं लिहून प्रसिद्ध झाले .जे आजपर्यंत वाचलं जातं. उदाहरण म्हणजे आताची पिढी ८-१० वर्षाची किंवा त्याहून जास्त ती लोकं पु ल देशपांडे वाचत नाहीत . कारण रिलेटच होता येत नाहीत्या काळाशी . ऐकून माहिती असत पण वाचायला बोर होत त्यांना उदाहरण दुसरं शाम मनोहर म्हणून एक लेखक आहेत त्यांची पुस्तकं ५० वर्षानेपण वाचली जातील . क्लिष्ट लिहितात पण संदर्भ लागू होतो जगण्यातला . अशी इंग्लिश मध्ये तर खोऱ्याने उदाहरण आहेत . सकस लिहिलेलं केव्हाही टिकतं

मोदक 28/02/2017 - 13:45
विचार करायला लावणारा धागा आणि प्रतिसाद. धन्यवाद काका. साहित्यातील "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" शोधणे म्हणजे थोडेसे सरसकटीकरण होईल कारण साहित्याला अनेक आयाम असतात. आपण साहित्य आणि जीवसृष्टी अशी तुलना केली तर जीवसॄष्टीतील प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणेच साहित्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते आपल्या जातकुळीसोबत आपल्यासारख्याच बाह्य जाती/प्रजातींसोबतही अस्तित्वाचा लढा देत असतात. विनोद, काव्य, कथा, इतिहास, सत्यकथा असे साहित्याला अनेक आयाम आहेत यामुळे यांना एकच पातळीवर आणून तुलना करणे अवघड जाईल किंवा अनेकदा चुकीचे निष्कर्ष निघतील. तसेच ही तुलना करताना प्रत्येक वाचक स्वतःच्या वकुबाने तुलना करणार असल्याने एकाच कलाकृतीच्या संदर्भात तुमचे आणि माझे निष्कर्षही वेगळे असतील. तरीही माझ्या मते, साहित्यातील सर्वाईव्ह होणारे फिटेस्ट साहित्य म्हणजे त्याच प्रकारचे एखादे साहित्य वाचल्यानंतर मूळ साहित्याची आठवण होणे. उदाहरण - होलोकॉस्ट आणि जर्मनीचे दुसर्‍या महायुद्धातले प्रताप यांवर तुम्ही लिहिलेल्या प्रभावी लेख मालिका किंवा अल्बर्ट स्पीअरचा लेख हे मी संदर्भ म्हणून जपून ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी या विषयावरचे वेगळेच पुस्तक वाचताना माझा रेफरन्स हा तुमचाच लेख असतो. माझ्या दृष्टीने हे "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" असेल.
श्री. माहितगार यांच्या लेखकास/लेखनास वाचवावे की नाही या लेखावर एक मजेदार संकल्पना आढळली ती म्हणजे "survival of the fittest'' मला साहित्यातील फिटेस्ट याचा अर्थ न कळल्यामुळे किंवा जरा गोंधळून गेल्यामुळे हा विषय चर्चेला घेतला आहे.

"कुत्र्याला खीर पचली नाही"

चलत मुसाफिर ·

असंका 19/01/2016 - 08:48
भ्रमणध्वनी हस्तसंच
चांगला शब्दय. नुस्तं हस्तसंच म्हणलं तरी कळेल इतकं याला पॉप्युलर किंवा लोकप्रिय व्हायला हवं.. धन्यवाद!

प्रचेतस 19/01/2016 - 10:36
लेख अजिबातच पटला नाही. हे घनश्याम पाटिल कोण? चपराक मासिक पूर्वी मचाक स्टाइल लेखांसाठी प्रसिद्ध होते असे ऐकिवात आहे. खरेखोटे माहीत नाही. लेखात किती सत्य / असत्य हे माहीत नाही पण पाटलांनी तितक्याच खालच्या पातळीवर जाऊन सबनीसांचं चारित्र्यहनन केलेलं आहे. सगळेच एका माळेचे मणी.

In reply to by प्रचेतस

शब्दबम्बाळ 19/01/2016 - 14:34
चलत मुसाफिर यांनी सबनीसांचे नाव देखील आधी ऐकले नव्हते म्हटले आहे. परंतु कोणीतरी हीन दर्जाच्या भाषेमध्ये त्यांची टीका केली म्हणून सबनीस लगेच खालच्या दर्जाचे राजकारण करणारे कसे झाले? एखाद्या व्यक्तीचा राग येत आहे म्हणून त्याची अब्रू काढणे आजिबात योग्य नाही. हीच गोष्ट त्या लोकसत्तेमधल्या लेखाबद्दल!

In reply to by शब्दबम्बाळ

चलत मुसाफिर 19/01/2016 - 15:29
जे लिहिले आहे, त्यावर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे. ते सर्व खरे आहे की खोटे, यावर मतप्रदर्शन करण्याइतके विषयाचे ज्ञान मजपाशी नाही. अर्ज मागवून घेतलेली संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक हा साहित्यशारदेचा अपमान आहे असे माझे स्पष्ट मत आहे, मग कुणीही निवडून येवो. या गचाळ प्रक्रियेला पर्याय शोधणे आवश्यक आहे. कदाचित, काही नावाजलेल्या पुरस्कारांची यादी बनवून (साहित्य अकादमी, राज्य शासन पुरस्कार, ज्ञानपीठ इ.), त्यांचे एकदोन वर्षातील जे कुणी मराठी विजेते असतील, त्यांची नावे या पदासाठी आपोआप विचारात घेतली जावीत व त्यातून निवड व्हावी अशी एक सूचना करता येईल.

विश्वास पाटील यांच्यावर चिखलफेक करणारा लेख त्यांचे (सख्खे) धाकटे बंधू सुरेश पाटील यांनी नुकताच लिहलाय. सभ्यतेचे पुरेसे निकष न पाळता लिहलेला हा लेह लोकसत्ताने रविवार-लोकरंग पुरवणीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलाय !! (लोकसत्ताला वाद आणि वादळांची तशी आवड आहेच) लेखातले किती खरे आणि किती खोटे माहित नाही..पण वाचायला मजा आली. आता लोकरंगचा पुढचा अंक तुफान रंगणार अशी आशा आहे. स्वतः विश्वास पाटील पण मैदानात उतरतीलच बहुधा...

In reply to by प्रसाद१९७१

मलाही असेच वाटले...काही हजार तरी प्रती केवळ या वादामूळेच विकल्या जातील. झालेच तर लोकसत्ताचाही खप जास्त झाला असेलच रविवारी. आता येणार्‍या रविवारची आतुरतेने वाट पाहतोय :!!

In reply to by मराठी कथालेखक

साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादात विश्वास पाटील यांच्याबद्दल असं काही तरी बोलल्या गेलं होतं म्हणजे त्यांच्या लेखनाच्या कौतुकासाठी कशाकशाचा वापर करतात असं काही तरी. जाऊ द्या आपल्याला काय... लेखन वाचत राहु. दुव्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 22/01/2016 - 20:40
आज चिंतामण विनायक जोशी (चिं.वि. जोशी) यांची 'चार दिवस सुनेचे' कादंबरी वाचनात आली त्यातही एक खाणावळ चालवणार्‍या आजीबाई आहेत, वाचताना पाटीलबंधूंच्या वृत्तपत्रीय खाणावळ वादाची आठवण आली, (पाटीलबंधूंच्या कादंबर्‍या मी वाचलेल्या नाहीत) (अवांतराबद्दल क्षमस्व)

नया है वह 19/01/2016 - 14:12
साहित्य संमेलनाध्यक्ष कोण आहे याने सामान्य साहित्य वाचकांना काही फरक पडत नाही.आणि त्यामुळे संमेलनालाही काही फरक पडत असेल असे वाटत नाही.

म्हणजे प्रकाशकांनी पुस्तकांचा खप वाढवण्यासाठी स्वतः पैसे पुरवुन सुरु ठेवलेला धंदा आहे . या संमेलनात म्हणे ४ कोटींच्या पेक्षा जास्त किमतीची पुस्तके खपली. कोण म्हणते पुस्तक प्रकाशन तोट्यात आहे म्हणुन? आणि मराठी टिकायची/ टिकवायचीच असेल तर ईतर अनेक मार्ग आहेत की. मिसळपाव सारखी मराठी संस्थळेही त्यात आलीच. त्यासाठी या भिकारड्या साहित्य संमेलनांची गरजच काय? अशा संमेलनामुळे मराठी भाषेचा फायदा होणे हा मुळ उद्देश कधीच बाजुला पडलाय असे वाटते.

बोका-ए-आझम 19/01/2016 - 18:34
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे इतकं आटापिटा करुन मिळवण्यासारखं पद आहे का? एवढं काय सोनं लागलेलं आहे त्या पदाला की लोकांनी एवढा अट्टाहास करावा अध्यक्षपदासाठी?

मारवा 19/01/2016 - 23:14
चपराक नावातुनच एक विकृत दृष्टीकोण दिसतो. म्हणजे चपराक एक फार संतापातुन सात्विक संतापातुन रागातुन अपवादात्मकरीत्या कोणीही एरवी नॉर्मल माणुस सहज संवेदना असलेला माणुस लगावु शकतो. इथपर्यंत समजत. मात्र चपराक लगावण ( भले वैचारीक तथाकथित वैचारीक का असेना ) हाच आमचा धंदा हेच आमच ब्रीद किती चीप विचार आहे. दुसर अस की जे गलिच्छ राजकारण ज्याच वर्णन पाटील करतात ते कोणी दुरुन पाहणारे तटस्थ नव्हे तर पुर्णपणे त्यात सक्रीय लिप्त असे दिसतात. हे म्हणजे शेवटी काहीतरी यांचा स्वार्थ हेतु जो साध्य झाला नसावा त्यानंतर झालेली आगपाखड दिसतेय. इतका इनोसंट आहे हा माणुस जो स्वत: या डर्टी गेम चा एक हिस्सा आहे. जो स्वत: पुर्णपणे त्यात गुंतलेला आहे. ते जेव्हा क्लेम करतात की त्यांना उशीरा कळल ते अत्यंत हास्यास्पदरीत्या अविश्वसनीय अगदी प्राथमिक तर्कानेही दिसुन येत. ते ज्या चीप शैलीत चिखलफेक करत आहेत ती तर अजुनच बकवास. म्हणजे ठीक आहे सबनीस हे अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत की नाहीत हे बाजुला ठेवतो कारण माहीतच नाही तर त्यावर काय मत देणार. मात्र पाटील जी मांडणी करत आहेत ती अजिबात विश्वसनीय नाही. जी शैली ज्या गोष्टी जी सायकॉलॉजी यातुन ध्वनित होते ती सुस्पष्ट आहे. हे काहीतरी सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते. अस होत कधी कधी एखादा दरोडेखोर जणु टोळीतुन बाहेर पडुन पोलिसांच्या बाजुचा व्हावा आणि मग मारे कोणी संताच्या शैलीत ते अस करत होते ते अस करत होते इ. वल्गना कराव्या तसल काहीतरी अरे बाबा तु स्वत" उघड उघड त्या डर्टी गेम चाच एक भाग होता, सक्रिय सहभाग होता ते तु कीतीही लपवलस तरी उघड पडुन दिसत आहे. पुन्हा सबनीसांची बाजु घेण्याचा प्रश्न नाहीये कारण काही माहीतीच नाही जास्त म्हणुन मतच नाही त्यांच्याविषयी मात्र या लेखकात व याच्या दाव्यात फारसा अर्थ नाही. यापेक्षा तर कैक पट अधिक संतुलित मार्मिक दर्जेदार विश्लेषण श्रावण मोडक यांनी जे सबनीसाच केलेल आहे ते आहे. म्हणजे अधिक तार्किक अधिक कन्विन्सींग अस आहे.

In reply to by मारवा

संदीप डांगे 20/01/2016 - 00:08
बाडीस. मनातल्या भावना मांडल्यात. हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....

In reply to by संदीप डांगे

नाखु 20/01/2016 - 08:52
हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची.... थोडी दुरुस्ती
हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा हिस्सा/वाटा कमी देण्याचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....
मुकाट वाचक नाखु (संमेलनाला हजेरी लावलेला)

In reply to by मारवा

पगला गजोधर 20/01/2016 - 09:06
सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते.
१००%

माहितगार 20/01/2016 - 00:07
अवघड आहे ! (सगळे वाचून का कोण जाणे 'माणंसांना गरज असलेल्या बर्‍याच गोष्टी जगातल्या कोणत्याही दुकानात मिळत नाहीत.' या वाक्याची आठवण झाली)

सुबोध खरे 20/01/2016 - 09:26
श्री व्यंकटेश माडगूळकारणी १९४६ साली लिहिलेले आठवले साहेब, आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. साहित्य संमेलनातील लाथाळ्या, प्रथितयश लेखक कवींचे रुसवे फुगवे पाहिलेले आहेत. यामुळे त्या लेखक किंवा कवीची मनातील प्रतिमा मलिन होते असे जाणवले. त्यामुळे साहित्य संमेलनाला न जायचा निर्णय फार पूर्वी घेतला आहे. पैशापरी पैसे खर्च करून गैर सोय सहन करून तेथे असे उद्विग्न करणारे राजकारण पाहण्यात कोणताही रस राहिला नाही. राहिली गोष्ट पुस्तक प्रदर्शनाची - आमचे वडील ग्रंथाली, मेहता ग्रंथजगत आणि मैजेस्टिक ग्रंथालय यांचे सदस्य आहेत. त्यांची वेळोवेळी पत्रके, सवलतीची कुपने येतात त्यातून खरेदी करणे जास्त चांगले आणि स्वस्त आहे असे जाणवले.

असंका 19/01/2016 - 08:48
भ्रमणध्वनी हस्तसंच
चांगला शब्दय. नुस्तं हस्तसंच म्हणलं तरी कळेल इतकं याला पॉप्युलर किंवा लोकप्रिय व्हायला हवं.. धन्यवाद!

प्रचेतस 19/01/2016 - 10:36
लेख अजिबातच पटला नाही. हे घनश्याम पाटिल कोण? चपराक मासिक पूर्वी मचाक स्टाइल लेखांसाठी प्रसिद्ध होते असे ऐकिवात आहे. खरेखोटे माहीत नाही. लेखात किती सत्य / असत्य हे माहीत नाही पण पाटलांनी तितक्याच खालच्या पातळीवर जाऊन सबनीसांचं चारित्र्यहनन केलेलं आहे. सगळेच एका माळेचे मणी.

In reply to by प्रचेतस

शब्दबम्बाळ 19/01/2016 - 14:34
चलत मुसाफिर यांनी सबनीसांचे नाव देखील आधी ऐकले नव्हते म्हटले आहे. परंतु कोणीतरी हीन दर्जाच्या भाषेमध्ये त्यांची टीका केली म्हणून सबनीस लगेच खालच्या दर्जाचे राजकारण करणारे कसे झाले? एखाद्या व्यक्तीचा राग येत आहे म्हणून त्याची अब्रू काढणे आजिबात योग्य नाही. हीच गोष्ट त्या लोकसत्तेमधल्या लेखाबद्दल!

In reply to by शब्दबम्बाळ

चलत मुसाफिर 19/01/2016 - 15:29
जे लिहिले आहे, त्यावर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे. ते सर्व खरे आहे की खोटे, यावर मतप्रदर्शन करण्याइतके विषयाचे ज्ञान मजपाशी नाही. अर्ज मागवून घेतलेली संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक हा साहित्यशारदेचा अपमान आहे असे माझे स्पष्ट मत आहे, मग कुणीही निवडून येवो. या गचाळ प्रक्रियेला पर्याय शोधणे आवश्यक आहे. कदाचित, काही नावाजलेल्या पुरस्कारांची यादी बनवून (साहित्य अकादमी, राज्य शासन पुरस्कार, ज्ञानपीठ इ.), त्यांचे एकदोन वर्षातील जे कुणी मराठी विजेते असतील, त्यांची नावे या पदासाठी आपोआप विचारात घेतली जावीत व त्यातून निवड व्हावी अशी एक सूचना करता येईल.

विश्वास पाटील यांच्यावर चिखलफेक करणारा लेख त्यांचे (सख्खे) धाकटे बंधू सुरेश पाटील यांनी नुकताच लिहलाय. सभ्यतेचे पुरेसे निकष न पाळता लिहलेला हा लेह लोकसत्ताने रविवार-लोकरंग पुरवणीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलाय !! (लोकसत्ताला वाद आणि वादळांची तशी आवड आहेच) लेखातले किती खरे आणि किती खोटे माहित नाही..पण वाचायला मजा आली. आता लोकरंगचा पुढचा अंक तुफान रंगणार अशी आशा आहे. स्वतः विश्वास पाटील पण मैदानात उतरतीलच बहुधा...

In reply to by प्रसाद१९७१

मलाही असेच वाटले...काही हजार तरी प्रती केवळ या वादामूळेच विकल्या जातील. झालेच तर लोकसत्ताचाही खप जास्त झाला असेलच रविवारी. आता येणार्‍या रविवारची आतुरतेने वाट पाहतोय :!!

In reply to by मराठी कथालेखक

साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादात विश्वास पाटील यांच्याबद्दल असं काही तरी बोलल्या गेलं होतं म्हणजे त्यांच्या लेखनाच्या कौतुकासाठी कशाकशाचा वापर करतात असं काही तरी. जाऊ द्या आपल्याला काय... लेखन वाचत राहु. दुव्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 22/01/2016 - 20:40
आज चिंतामण विनायक जोशी (चिं.वि. जोशी) यांची 'चार दिवस सुनेचे' कादंबरी वाचनात आली त्यातही एक खाणावळ चालवणार्‍या आजीबाई आहेत, वाचताना पाटीलबंधूंच्या वृत्तपत्रीय खाणावळ वादाची आठवण आली, (पाटीलबंधूंच्या कादंबर्‍या मी वाचलेल्या नाहीत) (अवांतराबद्दल क्षमस्व)

नया है वह 19/01/2016 - 14:12
साहित्य संमेलनाध्यक्ष कोण आहे याने सामान्य साहित्य वाचकांना काही फरक पडत नाही.आणि त्यामुळे संमेलनालाही काही फरक पडत असेल असे वाटत नाही.

म्हणजे प्रकाशकांनी पुस्तकांचा खप वाढवण्यासाठी स्वतः पैसे पुरवुन सुरु ठेवलेला धंदा आहे . या संमेलनात म्हणे ४ कोटींच्या पेक्षा जास्त किमतीची पुस्तके खपली. कोण म्हणते पुस्तक प्रकाशन तोट्यात आहे म्हणुन? आणि मराठी टिकायची/ टिकवायचीच असेल तर ईतर अनेक मार्ग आहेत की. मिसळपाव सारखी मराठी संस्थळेही त्यात आलीच. त्यासाठी या भिकारड्या साहित्य संमेलनांची गरजच काय? अशा संमेलनामुळे मराठी भाषेचा फायदा होणे हा मुळ उद्देश कधीच बाजुला पडलाय असे वाटते.

बोका-ए-आझम 19/01/2016 - 18:34
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे इतकं आटापिटा करुन मिळवण्यासारखं पद आहे का? एवढं काय सोनं लागलेलं आहे त्या पदाला की लोकांनी एवढा अट्टाहास करावा अध्यक्षपदासाठी?

मारवा 19/01/2016 - 23:14
चपराक नावातुनच एक विकृत दृष्टीकोण दिसतो. म्हणजे चपराक एक फार संतापातुन सात्विक संतापातुन रागातुन अपवादात्मकरीत्या कोणीही एरवी नॉर्मल माणुस सहज संवेदना असलेला माणुस लगावु शकतो. इथपर्यंत समजत. मात्र चपराक लगावण ( भले वैचारीक तथाकथित वैचारीक का असेना ) हाच आमचा धंदा हेच आमच ब्रीद किती चीप विचार आहे. दुसर अस की जे गलिच्छ राजकारण ज्याच वर्णन पाटील करतात ते कोणी दुरुन पाहणारे तटस्थ नव्हे तर पुर्णपणे त्यात सक्रीय लिप्त असे दिसतात. हे म्हणजे शेवटी काहीतरी यांचा स्वार्थ हेतु जो साध्य झाला नसावा त्यानंतर झालेली आगपाखड दिसतेय. इतका इनोसंट आहे हा माणुस जो स्वत: या डर्टी गेम चा एक हिस्सा आहे. जो स्वत: पुर्णपणे त्यात गुंतलेला आहे. ते जेव्हा क्लेम करतात की त्यांना उशीरा कळल ते अत्यंत हास्यास्पदरीत्या अविश्वसनीय अगदी प्राथमिक तर्कानेही दिसुन येत. ते ज्या चीप शैलीत चिखलफेक करत आहेत ती तर अजुनच बकवास. म्हणजे ठीक आहे सबनीस हे अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत की नाहीत हे बाजुला ठेवतो कारण माहीतच नाही तर त्यावर काय मत देणार. मात्र पाटील जी मांडणी करत आहेत ती अजिबात विश्वसनीय नाही. जी शैली ज्या गोष्टी जी सायकॉलॉजी यातुन ध्वनित होते ती सुस्पष्ट आहे. हे काहीतरी सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते. अस होत कधी कधी एखादा दरोडेखोर जणु टोळीतुन बाहेर पडुन पोलिसांच्या बाजुचा व्हावा आणि मग मारे कोणी संताच्या शैलीत ते अस करत होते ते अस करत होते इ. वल्गना कराव्या तसल काहीतरी अरे बाबा तु स्वत" उघड उघड त्या डर्टी गेम चाच एक भाग होता, सक्रिय सहभाग होता ते तु कीतीही लपवलस तरी उघड पडुन दिसत आहे. पुन्हा सबनीसांची बाजु घेण्याचा प्रश्न नाहीये कारण काही माहीतीच नाही जास्त म्हणुन मतच नाही त्यांच्याविषयी मात्र या लेखकात व याच्या दाव्यात फारसा अर्थ नाही. यापेक्षा तर कैक पट अधिक संतुलित मार्मिक दर्जेदार विश्लेषण श्रावण मोडक यांनी जे सबनीसाच केलेल आहे ते आहे. म्हणजे अधिक तार्किक अधिक कन्विन्सींग अस आहे.

In reply to by मारवा

संदीप डांगे 20/01/2016 - 00:08
बाडीस. मनातल्या भावना मांडल्यात. हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....

In reply to by संदीप डांगे

नाखु 20/01/2016 - 08:52
हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची.... थोडी दुरुस्ती
हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा हिस्सा/वाटा कमी देण्याचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....
मुकाट वाचक नाखु (संमेलनाला हजेरी लावलेला)

In reply to by मारवा

पगला गजोधर 20/01/2016 - 09:06
सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते.
१००%

माहितगार 20/01/2016 - 00:07
अवघड आहे ! (सगळे वाचून का कोण जाणे 'माणंसांना गरज असलेल्या बर्‍याच गोष्टी जगातल्या कोणत्याही दुकानात मिळत नाहीत.' या वाक्याची आठवण झाली)

सुबोध खरे 20/01/2016 - 09:26
श्री व्यंकटेश माडगूळकारणी १९४६ साली लिहिलेले आठवले साहेब, आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. साहित्य संमेलनातील लाथाळ्या, प्रथितयश लेखक कवींचे रुसवे फुगवे पाहिलेले आहेत. यामुळे त्या लेखक किंवा कवीची मनातील प्रतिमा मलिन होते असे जाणवले. त्यामुळे साहित्य संमेलनाला न जायचा निर्णय फार पूर्वी घेतला आहे. पैशापरी पैसे खर्च करून गैर सोय सहन करून तेथे असे उद्विग्न करणारे राजकारण पाहण्यात कोणताही रस राहिला नाही. राहिली गोष्ट पुस्तक प्रदर्शनाची - आमचे वडील ग्रंथाली, मेहता ग्रंथजगत आणि मैजेस्टिक ग्रंथालय यांचे सदस्य आहेत. त्यांची वेळोवेळी पत्रके, सवलतीची कुपने येतात त्यातून खरेदी करणे जास्त चांगले आणि स्वस्त आहे असे जाणवले.
श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला. श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही. सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.

इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे ?

धर्मराजमुटके ·

आदूबाळ 15/01/2016 - 00:00
मीही आठवी-नववीपर्यंत मराठीच वाचत असे. वडिलांना हे आवडत नसे. पण मी इंग्रजी पुस्तक हातात धरेचना. मग त्यांनी मी कोणती पुस्तकं वाचतो याचं निरीक्षण केलं. मला रहस्यकथा आवडतात हे लक्षात आल्यावर "पेरी मेसन" आणून दिलं. त्याकाळी एकएक पुस्तक मिळवण्यासाठी बरीच मनधरणी करावी लागत असे, आणि अचानक पाचसहा पेरी मेसनांचा अनपेक्षित लाभ झाल्यावर एकदमच खूश झालो. तरी चालढकल होतीच. शेवटी त्यातल्यात्यात हॉट मुखपृष्ठ बघून एक उचललं. अर्धंमुर्धंच कळलं, पण त्यातलं रहस्य कळण्याइतपत इंग्रजी येत होतं. मग पेरी मेसन संपल्यावर सिडने शेल्डन, लुडलम, आर्चर अशी प्रगती सुरू राहिली. त्यात अगाथा ख्रिस्तीवर जरा स्थिर झालो, पण रहस्यकथा, थ्रिलर्सपलिकडे प्रगती होईना. माझ्या आजोबांनी त्यांच्या एका वकील मित्राकरवी फाऊंटनच्या फुटपाथवरून मिळतील तेवढी वुडहाऊसची पुस्तकं मागवली. त्यातलं सर्वात पातळ पुस्तक "द हेड ऑफ केज" उचललं. त्यात क्रिकेटचं वर्णन निघाल्यामुळे (आणि कथानायक माझ्याच वयाचा मुलगा असल्यामुळे) एकदम आवडलं. हळुहळू ती वुडहाऊसची पुस्तकंही संपली. मग वाटलं, आपल्याला इंग्रजी वाचायला लावणार्‍या आपल्या वडिलांची आणि आजोबांची काय पसंद आहे ते बघू. पुस्तकांच्या कपाटातल्या त्या फळीवर मी कधी गेलो नव्हतो. त्यात पाहिलं तर "डिफेन्स अकौंट्स म्यानुअल", "प्रॅक्टिकल टेलिकम्युनिकेशन्स" वगैरे रोमहर्षक ठोकळ्यांच्या बाजूला डोरिस लेसिंग नावाच्या बाईंची बरीच पुस्तकं होती. आणखीही बरंच होतं. त्यात "हात लावाल तर तुकडा" स्थितीला पोचलेलं मनोहर माळगांवकर नावाच्या लेखकाचं "अ बेंड इन द गँजेस" नावाचं पुस्तक होतं. एकदोन पानांतच त्या पुस्तकाने घट्ट पकडून ठेवलं. हलक्या हाताने पानं उलटत ताठच्या ताठ बसून ते पुस्तक वाचलं. (अजूनही मूड लागला तर वाचतो. आता रोली बुक्सने नवी आवृत्तीपण काढली आहे, त्यामुळे लोळत वाचता येतं.) या पुस्तकाने "भारतीय इंग्रजी लेखन" हा एक नवाच कप्पा उघडून दिला. अरविंद अडिगा वगैरे रत्नं सोडली तर सहसा यात निराशा पदरी येत नाही. इंग्रजीव्यतिरिक्त तिसरी भाषा येत नाही याचं कधीकधी वाईट वाटतं. बॅटमॅनसारख्या बहुभाषिकाला वाचनाचे किती पर्याय उपलब्ध आहेत याचा हेवा वाटतो. तर धर्मराजभाऊ - तुम्हाला आवडेल तो प्रकार दुसर्‍या भाषेतून वाचा. म्हणजे भाषेचा अडसर असला तरी आवडीचा वाङ्मयप्रकार तुम्हाला पुस्तक खाली ठेवू देणार नाही. (डायरेक वॉर अँड पीस काढलं तर त्वरित झोप येईल.)

In reply to by आदूबाळ

बोका-ए-आझम 15/01/2016 - 17:33
थ्रिलर्सचं दालन एकदम समृद्ध आहे. विज्ञानकथा आणि थ्रिलर्स मूळ इंग्लिशमध्ये वाचायची मजा वेगळीच. डोस्टोव्हस्की आणि टाॅलस्टाॅय मूळ रशियनमध्ये अफाट आहेत असं एका रशियन शिकणाऱ्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं. ते इंग्लिशमध्येही अफाट आहेत. बी आणि सी ग्रेडचे थ्रिलर्सही इंग्लिशमध्ये वाचायला मजा येते. हिंदीमध्ये रेल्वे स्टेशन्सच्या स्टाॅलवर मिळणारं वाङ्मय भारीच!प्रेमचंद, मंटो ते सुरेंद्र मोहन पाठक आणि राज काॅमिक्स का सुपरहीरो नागराज हे सगळे तिथे वाचले. शरदबाबूंच्या कादंबऱ्या बंगालीतून वाचायची इच्छा आहे.

इतर भाषेतील साहित्य वाचण्यासाठी, प्रथम तुम्हाला आवडणार्‍या साहित्याची निवड करावी लागेल. उदाहरणार्थ कथा,नाटके, कादंबरी,ललित लेख, वैचारिक लेख, काव्य, कविता, गझल्,विनोदी लेखन. चुटके / किस्से इत्यादी . त्यानंतर कुठली भाषा सहजपणे आत्मसात करता येईल हे ठरवावे लागेल.माझ्या अनुभवावरुन , जी भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता, बोलता येते, तिच्या जवळपास जाणारी व आपल्या कानावर सतत येणारी असते, ती भाषा लवकर आत्मसात होते. आता माझा अनुभव सांगतो. मराठी तर मुळची भाषा होतीच, पण हिंदी सिनेसंगीत ऐकुन ऐकुन , गझल व शेरोशायरी वाचण्यात आनंद वाटू लागला. त्यासाठी उर्दूभाषा यायला हवी असे मनोमन ठरविले. मराठी व हिंदी भाषेच्या जवळपास जाणारी उर्दू भाषा म्हणजे लिपी शिकणे आवश्यक वाटले. त्यासाठी " हिंदी उर्दू टीचर " हे अवघ्या अडीच रुपयांचे पुस्तक आणले.स्वयं-अध्ययन सुरु केले. त्यातुन सराव करता करता , आज उर्दू पेपर वा पुस्तक ९० % वाचु शकतो. काही काही फारसी शब्द वाचता येत नाही, मग त्यासाठी एखाद्या जाणकाराची मदत मिळुन जाते. हीच गोष्ट गुजराथी साहित्याबाबत. गुजराथी लिपी ही देवनागरी लिपीच्या बर्‍याच जवळची असल्याने ( जवळची याचा अर्थ बरचसे शब्द दोन्ही भाषेत सारखेच वा किंचित फरक असलेले असतात.) ती सुध्दा सहज वाचता येवू लागली. गुजरात समाचार, चित्रलेखा गुजराथी मासिक, समकालीन पेपर सहाय्यभूत ठरले.आता मोडी लिपी व पाली भाषेचा अभ्यास सुरु केला आहे. इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम लेखकांच्या कादंबर्‍या फार पुर्वीपासुनच वाचत आलो आहे .

कंजूस 15/01/2016 - 06:49
आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं. गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

कंजूस 15/01/2016 - 06:49
आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं. गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

"हॅरी पॉटर आणि टॉम सॉयर" इतपतच सीमीत. शिवाय आजकाल, बर्‍याच इंग्रजी कादंबर्‍या मराठीत पण प्रकाशित होत असल्याने, आमच्यासारख्या इंग्रजी न समजणार्‍या मराठी माणसांची बर्‍यापैकी सोय झाली आहे.

अजया 15/01/2016 - 19:54
आपल्याला आवडणारा साहित्य प्रकार घेऊन त्यावर ज्या भाषेत आपल्याला वाचायची इच्छा आहे त्यातली साधी सरळ सोपी पुस्तकं घेऊन सुरुवात केल्यास हळूहळू भाषेची सवय होत जाते. अनेक पुस्तकांनी भरलेल्या घरात इंग्रजी वाचायची सुरूवात जेम्स हॅडली चेसच्या कादंबऱ्यांनी झालेली! हाॅस्टेलात एम अॅंड बीचा धुमाकूळ होता! दुय्यम दर्जाची ती पुस्तकं वाचत इंग्रजी वाचन कधी फक्त इंग्रजीच वाचते आहे हे कळले नाही.नंतर कोमा ,फायनल डायग्नाॅसिसने मेडिकल विषयक कादंबर्या वाचायचा चस्काच लागला.एक काळ तर सतत इंग्रजी वाचून विचारदेखील इंग्रजी यायचे डोक्यात.मग परत जाणीवपूर्वक मराठी वाचायला लागले!

रुपी 16/01/2016 - 01:33
चांगला धागा आहे. अगदी माझेच विचार कुणीतरी लिहिले आहेत असं वाटलं. ("कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे." हे वाक्य सोडून.) मी काही महिने टोरंटोमध्ये होते तेव्हा तिथल्या समृद्ध वाचनालयांमुळे बरेच इंग्रजी साहित्य उपलब्ध झाले, पण कोणती पुस्तके वाचावीत हे माहीत नव्हते, त्यामुळे म्हणावा तितका फायदा मी करुन घेतला नाही. सध्या वास्तव्य आहे तिथेही पुस्तके मिळू शकतात पण हाताशी वेळ नाही. म्हणजे अगदी पाच पाच मिनिटे वेळ मिळेल तेव्हा वाचू शकते, पण अशा गडबडीत उपलब्ध असेल तर मराठी वाचायलाच माझी पसंती असते. इंग्रजी येत असूनही त्या साहित्यात रमायला थोडी जास्त एकाग्रता असावी लागते, तेवढी मराठी वाचण्यासाठी नसली तरी मी त्याचा आनंद घेऊ शकते. त्यातल्या त्यात डॅन ब्राउनची पुस्तके वाचताना पुढे काय असेल याची सतत उत्सुकता असल्यामुळे जरा वेळ मिळाला की वाच, असं करुन वाचली, पण मग नंतर त्याची शैली तीचतीच वाटून कंटाळले. आता थोडेफार मी इंग्रजी छोट्या कथा वगैरे ब्लॉगमधून वाचते, पण पुस्तके वाचण्यात अजून फारच मागे आहे. वरच्या काही प्रतिसादांप्रमाणे गुजराती लिपी वाचायला खरंच सोपी आहे, पण मेहेंदी लावण्याच्या पुस्तकातली गुजरातीतली माहिती किंवा एखादी आरती यांच्या पलीकडे फार काही वाचले नाही.

आदूबाळ 15/01/2016 - 00:00
मीही आठवी-नववीपर्यंत मराठीच वाचत असे. वडिलांना हे आवडत नसे. पण मी इंग्रजी पुस्तक हातात धरेचना. मग त्यांनी मी कोणती पुस्तकं वाचतो याचं निरीक्षण केलं. मला रहस्यकथा आवडतात हे लक्षात आल्यावर "पेरी मेसन" आणून दिलं. त्याकाळी एकएक पुस्तक मिळवण्यासाठी बरीच मनधरणी करावी लागत असे, आणि अचानक पाचसहा पेरी मेसनांचा अनपेक्षित लाभ झाल्यावर एकदमच खूश झालो. तरी चालढकल होतीच. शेवटी त्यातल्यात्यात हॉट मुखपृष्ठ बघून एक उचललं. अर्धंमुर्धंच कळलं, पण त्यातलं रहस्य कळण्याइतपत इंग्रजी येत होतं. मग पेरी मेसन संपल्यावर सिडने शेल्डन, लुडलम, आर्चर अशी प्रगती सुरू राहिली. त्यात अगाथा ख्रिस्तीवर जरा स्थिर झालो, पण रहस्यकथा, थ्रिलर्सपलिकडे प्रगती होईना. माझ्या आजोबांनी त्यांच्या एका वकील मित्राकरवी फाऊंटनच्या फुटपाथवरून मिळतील तेवढी वुडहाऊसची पुस्तकं मागवली. त्यातलं सर्वात पातळ पुस्तक "द हेड ऑफ केज" उचललं. त्यात क्रिकेटचं वर्णन निघाल्यामुळे (आणि कथानायक माझ्याच वयाचा मुलगा असल्यामुळे) एकदम आवडलं. हळुहळू ती वुडहाऊसची पुस्तकंही संपली. मग वाटलं, आपल्याला इंग्रजी वाचायला लावणार्‍या आपल्या वडिलांची आणि आजोबांची काय पसंद आहे ते बघू. पुस्तकांच्या कपाटातल्या त्या फळीवर मी कधी गेलो नव्हतो. त्यात पाहिलं तर "डिफेन्स अकौंट्स म्यानुअल", "प्रॅक्टिकल टेलिकम्युनिकेशन्स" वगैरे रोमहर्षक ठोकळ्यांच्या बाजूला डोरिस लेसिंग नावाच्या बाईंची बरीच पुस्तकं होती. आणखीही बरंच होतं. त्यात "हात लावाल तर तुकडा" स्थितीला पोचलेलं मनोहर माळगांवकर नावाच्या लेखकाचं "अ बेंड इन द गँजेस" नावाचं पुस्तक होतं. एकदोन पानांतच त्या पुस्तकाने घट्ट पकडून ठेवलं. हलक्या हाताने पानं उलटत ताठच्या ताठ बसून ते पुस्तक वाचलं. (अजूनही मूड लागला तर वाचतो. आता रोली बुक्सने नवी आवृत्तीपण काढली आहे, त्यामुळे लोळत वाचता येतं.) या पुस्तकाने "भारतीय इंग्रजी लेखन" हा एक नवाच कप्पा उघडून दिला. अरविंद अडिगा वगैरे रत्नं सोडली तर सहसा यात निराशा पदरी येत नाही. इंग्रजीव्यतिरिक्त तिसरी भाषा येत नाही याचं कधीकधी वाईट वाटतं. बॅटमॅनसारख्या बहुभाषिकाला वाचनाचे किती पर्याय उपलब्ध आहेत याचा हेवा वाटतो. तर धर्मराजभाऊ - तुम्हाला आवडेल तो प्रकार दुसर्‍या भाषेतून वाचा. म्हणजे भाषेचा अडसर असला तरी आवडीचा वाङ्मयप्रकार तुम्हाला पुस्तक खाली ठेवू देणार नाही. (डायरेक वॉर अँड पीस काढलं तर त्वरित झोप येईल.)

In reply to by आदूबाळ

बोका-ए-आझम 15/01/2016 - 17:33
थ्रिलर्सचं दालन एकदम समृद्ध आहे. विज्ञानकथा आणि थ्रिलर्स मूळ इंग्लिशमध्ये वाचायची मजा वेगळीच. डोस्टोव्हस्की आणि टाॅलस्टाॅय मूळ रशियनमध्ये अफाट आहेत असं एका रशियन शिकणाऱ्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं. ते इंग्लिशमध्येही अफाट आहेत. बी आणि सी ग्रेडचे थ्रिलर्सही इंग्लिशमध्ये वाचायला मजा येते. हिंदीमध्ये रेल्वे स्टेशन्सच्या स्टाॅलवर मिळणारं वाङ्मय भारीच!प्रेमचंद, मंटो ते सुरेंद्र मोहन पाठक आणि राज काॅमिक्स का सुपरहीरो नागराज हे सगळे तिथे वाचले. शरदबाबूंच्या कादंबऱ्या बंगालीतून वाचायची इच्छा आहे.

इतर भाषेतील साहित्य वाचण्यासाठी, प्रथम तुम्हाला आवडणार्‍या साहित्याची निवड करावी लागेल. उदाहरणार्थ कथा,नाटके, कादंबरी,ललित लेख, वैचारिक लेख, काव्य, कविता, गझल्,विनोदी लेखन. चुटके / किस्से इत्यादी . त्यानंतर कुठली भाषा सहजपणे आत्मसात करता येईल हे ठरवावे लागेल.माझ्या अनुभवावरुन , जी भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता, बोलता येते, तिच्या जवळपास जाणारी व आपल्या कानावर सतत येणारी असते, ती भाषा लवकर आत्मसात होते. आता माझा अनुभव सांगतो. मराठी तर मुळची भाषा होतीच, पण हिंदी सिनेसंगीत ऐकुन ऐकुन , गझल व शेरोशायरी वाचण्यात आनंद वाटू लागला. त्यासाठी उर्दूभाषा यायला हवी असे मनोमन ठरविले. मराठी व हिंदी भाषेच्या जवळपास जाणारी उर्दू भाषा म्हणजे लिपी शिकणे आवश्यक वाटले. त्यासाठी " हिंदी उर्दू टीचर " हे अवघ्या अडीच रुपयांचे पुस्तक आणले.स्वयं-अध्ययन सुरु केले. त्यातुन सराव करता करता , आज उर्दू पेपर वा पुस्तक ९० % वाचु शकतो. काही काही फारसी शब्द वाचता येत नाही, मग त्यासाठी एखाद्या जाणकाराची मदत मिळुन जाते. हीच गोष्ट गुजराथी साहित्याबाबत. गुजराथी लिपी ही देवनागरी लिपीच्या बर्‍याच जवळची असल्याने ( जवळची याचा अर्थ बरचसे शब्द दोन्ही भाषेत सारखेच वा किंचित फरक असलेले असतात.) ती सुध्दा सहज वाचता येवू लागली. गुजरात समाचार, चित्रलेखा गुजराथी मासिक, समकालीन पेपर सहाय्यभूत ठरले.आता मोडी लिपी व पाली भाषेचा अभ्यास सुरु केला आहे. इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम लेखकांच्या कादंबर्‍या फार पुर्वीपासुनच वाचत आलो आहे .

कंजूस 15/01/2016 - 06:49
आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं. गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

कंजूस 15/01/2016 - 06:49
आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं. गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

"हॅरी पॉटर आणि टॉम सॉयर" इतपतच सीमीत. शिवाय आजकाल, बर्‍याच इंग्रजी कादंबर्‍या मराठीत पण प्रकाशित होत असल्याने, आमच्यासारख्या इंग्रजी न समजणार्‍या मराठी माणसांची बर्‍यापैकी सोय झाली आहे.

अजया 15/01/2016 - 19:54
आपल्याला आवडणारा साहित्य प्रकार घेऊन त्यावर ज्या भाषेत आपल्याला वाचायची इच्छा आहे त्यातली साधी सरळ सोपी पुस्तकं घेऊन सुरुवात केल्यास हळूहळू भाषेची सवय होत जाते. अनेक पुस्तकांनी भरलेल्या घरात इंग्रजी वाचायची सुरूवात जेम्स हॅडली चेसच्या कादंबऱ्यांनी झालेली! हाॅस्टेलात एम अॅंड बीचा धुमाकूळ होता! दुय्यम दर्जाची ती पुस्तकं वाचत इंग्रजी वाचन कधी फक्त इंग्रजीच वाचते आहे हे कळले नाही.नंतर कोमा ,फायनल डायग्नाॅसिसने मेडिकल विषयक कादंबर्या वाचायचा चस्काच लागला.एक काळ तर सतत इंग्रजी वाचून विचारदेखील इंग्रजी यायचे डोक्यात.मग परत जाणीवपूर्वक मराठी वाचायला लागले!

रुपी 16/01/2016 - 01:33
चांगला धागा आहे. अगदी माझेच विचार कुणीतरी लिहिले आहेत असं वाटलं. ("कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे." हे वाक्य सोडून.) मी काही महिने टोरंटोमध्ये होते तेव्हा तिथल्या समृद्ध वाचनालयांमुळे बरेच इंग्रजी साहित्य उपलब्ध झाले, पण कोणती पुस्तके वाचावीत हे माहीत नव्हते, त्यामुळे म्हणावा तितका फायदा मी करुन घेतला नाही. सध्या वास्तव्य आहे तिथेही पुस्तके मिळू शकतात पण हाताशी वेळ नाही. म्हणजे अगदी पाच पाच मिनिटे वेळ मिळेल तेव्हा वाचू शकते, पण अशा गडबडीत उपलब्ध असेल तर मराठी वाचायलाच माझी पसंती असते. इंग्रजी येत असूनही त्या साहित्यात रमायला थोडी जास्त एकाग्रता असावी लागते, तेवढी मराठी वाचण्यासाठी नसली तरी मी त्याचा आनंद घेऊ शकते. त्यातल्या त्यात डॅन ब्राउनची पुस्तके वाचताना पुढे काय असेल याची सतत उत्सुकता असल्यामुळे जरा वेळ मिळाला की वाच, असं करुन वाचली, पण मग नंतर त्याची शैली तीचतीच वाटून कंटाळले. आता थोडेफार मी इंग्रजी छोट्या कथा वगैरे ब्लॉगमधून वाचते, पण पुस्तके वाचण्यात अजून फारच मागे आहे. वरच्या काही प्रतिसादांप्रमाणे गुजराती लिपी वाचायला खरंच सोपी आहे, पण मेहेंदी लावण्याच्या पुस्तकातली गुजरातीतली माहिती किंवा एखादी आरती यांच्या पलीकडे फार काही वाचले नाही.
नमस्कार मंडळी, मी मराठी साहित्याचे वाचन बरेच केले आहे. अजूनही करत आहे. अर्थात येथील वाचनसम्राटांच्या तुलनेत आम्ही मांडलिक राजेच म्हणा. सुरुवातीला घरापासून वाचनालय लांब असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पैसे वसुल व्हावेत असा साधासरळ हिशेब असल्यामुळे मी जास्त पाने असलेले पुस्तकच घेत असे. यातुनच कादंबर्‍या वाचण्याची आवड वाढत गेली. कादंबर्‍या, कथा, संकीर्ण, प्रवासवर्णने, आत्मचरीत्र (चरीत्र नव्हे) अशा प्रकारच्या वाचनाची आवड जास्त प्रमाणात आहे. कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे.

आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध

माहितगार ·

राही 08/09/2015 - 12:56
मराठीतल्या जुन्या-नव्या लेखकांची त्यांच्या अल्प माहितीसह सूचि पॉप्युलर प्रकाशनने दोन किंवा तीन खंडांत प्रकाशित केली आहे आणि ती बरीचशी समावेशक आहे. हा एक कोशच म्हणावा इतके हे कार्य मोठे आहे.

सुनील 08/09/2015 - 13:48
लेखक: तलवलकर गोपीनाथ, पुस्तकः अनुराधा, प्रकाशन वर्ष: १९४६ प्रकाशक: विद्वांस गो
गोपीनाथराव स्वतःचे आडनाव तलवलकर असे लावीत की तळवलकर? मला तरी तळवलकर असे वाचल्याचे आठवते आहे. खेरीज, त्यांचे इतर नातेवाईक - अभिनेते शरद आणि संपादक गोविंद हे देखिल तळवलकर असेच आडनाव लावीत/लावतात.

In reply to by सुनील

माहितगार 08/09/2015 - 14:16
टायपो ! तुमचे बरोबर आहे. मी या ऑनलाईन यादीतून नाव उचलले त्यात टायपो होता. त्यांची पुस्तके उस्मानीयाच्या विद्यापीठाच्या ऑनलाईन संग्रहालयात आहेत. अनुराधा पुस्तक या दुव्यावर तपासले नाव श्री. गोपीनाथ तळवलकर असे आहे. गोपीनाथ तळवलकरांचे पूर्ण नाव आणि जन्म आणि हयात किंवा कसे या बाबत आणि इतर अधिक माहिती मिळाल्यास जरूर कळवावे. आपण त्यांच्या आप्तांबाबत दिलेल्या माहितीसाठी आभार. (हे उस्मानीयाचे वेबसाईट तपासण्यास बर्‍याचदा उघडत नाही. आज सकाळी उघडले नव्हते. तुमचा हा संदेश वाचल्यावर पुन्हा आत्ता ट्राय केले असता उघडले. :) असेच प्रतिसाद देत राहा तुमचा प्रतिसाद आला की उस्मानीयाचे वेबसाईट असेच विनासायास उघडत राहीले तर छानच :) ) (उस्मानीयाचे वेबसाइट नियमीतपणे न उघडण्यामुळे डिटेस्ल तपासावयाचे राहीले असू शकतात. लेखकांची यादी सध्या मुख्यत्वे तेथून घेत असल्यामुळे अशी अडचण पुढेही उद्भवत राहण्याची अल्पशी शक्यता आहे)

माहितगार 13/09/2015 - 09:15
आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे च्या माजी प्राचार्या आणि प्रभाकर रामचंद्र दामले यांच्या पत्नी माहेरच्या कृष्णा देसाई यांच्या बद्दल खालील माहिती हवी आहे १) त्यांची जन्म तारीख २) त्यांचे मृत्यू वर्ष ०२ जानेवारी १९८९ असे मिळाले आहे. दुजोरा हवा आहे. ३) कॉम्रेड कृष्णा देसाई म्हणजे कमलिनी देसाई नव्हेत यास दुजोरा हवा आहे. २) त्यांचा विवाह मिश्र विवाह होता यास दुजोरा हवा आहे. ३) त्यांनी केलेले लेखन, पुस्तके या बद्दल अधिक माहिती असल्यास हवी आहेत ४) Three Leaders: Tilak-Gokhale-Gandhi ग्रंथाचे लेखक कोण प्रभाकर रामचंद्र दामले की कमलिनी प्रभाकर दामले की संयुक्त लेखन ? ५) प्रभाकर रामचंद्र दामले आणि कमलिनी प्रभाकर दामले यांची जमल्यास प्रताधिकारमुक्त छायाचित्रे हवी आहेत.

माहितगार 17/09/2015 - 08:12
खालील टिळक आडनावीय व्यक्तीं पूर्ण नावे आणि अधिक माहिती हवी आहे * कमलाबाई टिळक * इंदूताई टिळक * आदिती टिळक * सुयश टिळक * चंद्रशेखर टिळक १) स्त्रीयांचे आडनाव टिळक असल्यास ते सासरचे आहे का माहेरचे ? २) यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द ३) साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती ४) जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) ५) विषीष्ट टिळक घराण्याशी संबंध असल्यास (जसे की बाळ गंगाधर टिळक घराणे अथवा नारायण वामन टिळक घराणे तर त्या विषयी माहिती)

माहितगार 17/09/2015 - 08:22
खालील काही प्रश्नातून माझे अज्ञान प्रगट होण्याची शक्यता आहे अ‍ॅडव्हान्समध्ये क्षमस्व. १) बाळ गंगाधर टिळक घराणे आणि नारायण वामन टिळक घराणे शिवाय इतर काही टिळक आडनावी व्यक्ती अथवा घराणी आहेत का ? २) नारायण वामन टिळक घराण्यातील अशोक देवदत्त टिळक आणि मुक्ता टिळक-लॉरेन्स - अशोक देवदत्त टिळक यांची मुलगी यांची खाली माहिती हवी आहे. * जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) * यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द * साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती) * मुक्ता टिळक-लॉरेन्स यांचे सासरचे पूर्ण नाव ३) बाळ गंगाधर टिळक घराण्यातील खालील व्यक्तींची माहिती हवी * गंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील * जयंत श्रीधर टिळक * दीपक जयंत टिळक * गौरी दीपक टिळक * रोहित दीपक टिळक * मुक्ता शैलेश टिळक * जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) * यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द * साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती) * शैलेश टिळक यांचे पूर्ण नाव * मुक्ता शैलेश टिळक यांचे शैलेश टिळकांशी नाते

माहितगार 17/09/2015 - 11:21
* विजय केळकर - अभियंता आणि अर्थतज्ज्ञ. * एच. एस. केळकर (भाऊसाहेब) - अत्तर उद्योग [१] * गिरिजाबाई केळकर - लेखिका आणि मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार [ संदर्भ हवा ] * मंजिरी केळकर * कमलाकांत वामन केळकर - भारतीय भूवैज्ञानिक * के. एन्. केळकर * ल.भ. केळकर * विजय केळकर पूर्ण नाव, जन्म-(हयात स्थिती/ मृत्यू दिनांक); कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास

In reply to by माहितगार

माहितगार 17/09/2015 - 11:22
उत्तरा केळकरांची सुद्धा पूर्ण नाव, जन्म- हयात स्थिती; कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास माहिती हवी.

In reply to by माहितगार

आदूबाळ 17/09/2015 - 14:43
अर्थतज्ज्ञ विजय केळकरांचे पीएचडी गाईड अजून एक मराठी अर्थतज्ज्ञ अविनाश दीक्षित होते. केळकरांनी बर्कली विद्यापीठातून पीएचडी मिळवली. (उगाचच रँडम माहितीचा हा तुकडा डोक्यात अडकून बसला होता.)

माहितगार 17/09/2015 - 14:30
मनोरंजन या पहिल्या मराठी दिवाळी अंक काढण्याचा मान मिळणारे काशीनाथ रघुनाथ मित्र यांचे मूळ आडनाव आजगावकर होते. १) काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) यांचे मृत्यूवर्ष काय ? त्यांचा मृत्यू कुठे झाला ? २) केनीया देशाच्या न्यायिक विभागात कुणी काशीनाथ रघुनाथ मित्र होऊन गेले, ती व्यक्ती आणि काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) या दोन व्यक्ती वेगवेगळ्या असल्यास तसा दुजोरा हवा आहे. ३) काशीनाथ रघुनाथ मित्र हे जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (ज्ञानांजन मासिक संपादक) यांच्या प्रमाणे कोकणातले आणि समकालीन संदर्भ दिसतात. या दोघांचे परस्परात काही नाते होते का ? या दोघांचे मूळगाव आजगाव एकच का की नाव एकच असलेली हि वेगवेगळी गावे आहेत ? ४) जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे जन्मवर्ष काय ?

वाचक्नवी 01/01/2016 - 23:07
गोपीनाथ तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर इ.स. १९०७; मृत्यू : ७ जून, इ.स. २००० हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक होते. अधिक माहितीसाठी https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit पहा

राही 08/09/2015 - 12:56
मराठीतल्या जुन्या-नव्या लेखकांची त्यांच्या अल्प माहितीसह सूचि पॉप्युलर प्रकाशनने दोन किंवा तीन खंडांत प्रकाशित केली आहे आणि ती बरीचशी समावेशक आहे. हा एक कोशच म्हणावा इतके हे कार्य मोठे आहे.

सुनील 08/09/2015 - 13:48
लेखक: तलवलकर गोपीनाथ, पुस्तकः अनुराधा, प्रकाशन वर्ष: १९४६ प्रकाशक: विद्वांस गो
गोपीनाथराव स्वतःचे आडनाव तलवलकर असे लावीत की तळवलकर? मला तरी तळवलकर असे वाचल्याचे आठवते आहे. खेरीज, त्यांचे इतर नातेवाईक - अभिनेते शरद आणि संपादक गोविंद हे देखिल तळवलकर असेच आडनाव लावीत/लावतात.

In reply to by सुनील

माहितगार 08/09/2015 - 14:16
टायपो ! तुमचे बरोबर आहे. मी या ऑनलाईन यादीतून नाव उचलले त्यात टायपो होता. त्यांची पुस्तके उस्मानीयाच्या विद्यापीठाच्या ऑनलाईन संग्रहालयात आहेत. अनुराधा पुस्तक या दुव्यावर तपासले नाव श्री. गोपीनाथ तळवलकर असे आहे. गोपीनाथ तळवलकरांचे पूर्ण नाव आणि जन्म आणि हयात किंवा कसे या बाबत आणि इतर अधिक माहिती मिळाल्यास जरूर कळवावे. आपण त्यांच्या आप्तांबाबत दिलेल्या माहितीसाठी आभार. (हे उस्मानीयाचे वेबसाईट तपासण्यास बर्‍याचदा उघडत नाही. आज सकाळी उघडले नव्हते. तुमचा हा संदेश वाचल्यावर पुन्हा आत्ता ट्राय केले असता उघडले. :) असेच प्रतिसाद देत राहा तुमचा प्रतिसाद आला की उस्मानीयाचे वेबसाईट असेच विनासायास उघडत राहीले तर छानच :) ) (उस्मानीयाचे वेबसाइट नियमीतपणे न उघडण्यामुळे डिटेस्ल तपासावयाचे राहीले असू शकतात. लेखकांची यादी सध्या मुख्यत्वे तेथून घेत असल्यामुळे अशी अडचण पुढेही उद्भवत राहण्याची अल्पशी शक्यता आहे)

माहितगार 13/09/2015 - 09:15
आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे च्या माजी प्राचार्या आणि प्रभाकर रामचंद्र दामले यांच्या पत्नी माहेरच्या कृष्णा देसाई यांच्या बद्दल खालील माहिती हवी आहे १) त्यांची जन्म तारीख २) त्यांचे मृत्यू वर्ष ०२ जानेवारी १९८९ असे मिळाले आहे. दुजोरा हवा आहे. ३) कॉम्रेड कृष्णा देसाई म्हणजे कमलिनी देसाई नव्हेत यास दुजोरा हवा आहे. २) त्यांचा विवाह मिश्र विवाह होता यास दुजोरा हवा आहे. ३) त्यांनी केलेले लेखन, पुस्तके या बद्दल अधिक माहिती असल्यास हवी आहेत ४) Three Leaders: Tilak-Gokhale-Gandhi ग्रंथाचे लेखक कोण प्रभाकर रामचंद्र दामले की कमलिनी प्रभाकर दामले की संयुक्त लेखन ? ५) प्रभाकर रामचंद्र दामले आणि कमलिनी प्रभाकर दामले यांची जमल्यास प्रताधिकारमुक्त छायाचित्रे हवी आहेत.

माहितगार 17/09/2015 - 08:12
खालील टिळक आडनावीय व्यक्तीं पूर्ण नावे आणि अधिक माहिती हवी आहे * कमलाबाई टिळक * इंदूताई टिळक * आदिती टिळक * सुयश टिळक * चंद्रशेखर टिळक १) स्त्रीयांचे आडनाव टिळक असल्यास ते सासरचे आहे का माहेरचे ? २) यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द ३) साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती ४) जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) ५) विषीष्ट टिळक घराण्याशी संबंध असल्यास (जसे की बाळ गंगाधर टिळक घराणे अथवा नारायण वामन टिळक घराणे तर त्या विषयी माहिती)

माहितगार 17/09/2015 - 08:22
खालील काही प्रश्नातून माझे अज्ञान प्रगट होण्याची शक्यता आहे अ‍ॅडव्हान्समध्ये क्षमस्व. १) बाळ गंगाधर टिळक घराणे आणि नारायण वामन टिळक घराणे शिवाय इतर काही टिळक आडनावी व्यक्ती अथवा घराणी आहेत का ? २) नारायण वामन टिळक घराण्यातील अशोक देवदत्त टिळक आणि मुक्ता टिळक-लॉरेन्स - अशोक देवदत्त टिळक यांची मुलगी यांची खाली माहिती हवी आहे. * जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) * यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द * साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती) * मुक्ता टिळक-लॉरेन्स यांचे सासरचे पूर्ण नाव ३) बाळ गंगाधर टिळक घराण्यातील खालील व्यक्तींची माहिती हवी * गंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील * जयंत श्रीधर टिळक * दीपक जयंत टिळक * गौरी दीपक टिळक * रोहित दीपक टिळक * मुक्ता शैलेश टिळक * जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष) * यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द * साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती) * शैलेश टिळक यांचे पूर्ण नाव * मुक्ता शैलेश टिळक यांचे शैलेश टिळकांशी नाते

माहितगार 17/09/2015 - 11:21
* विजय केळकर - अभियंता आणि अर्थतज्ज्ञ. * एच. एस. केळकर (भाऊसाहेब) - अत्तर उद्योग [१] * गिरिजाबाई केळकर - लेखिका आणि मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार [ संदर्भ हवा ] * मंजिरी केळकर * कमलाकांत वामन केळकर - भारतीय भूवैज्ञानिक * के. एन्. केळकर * ल.भ. केळकर * विजय केळकर पूर्ण नाव, जन्म-(हयात स्थिती/ मृत्यू दिनांक); कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास

In reply to by माहितगार

माहितगार 17/09/2015 - 11:22
उत्तरा केळकरांची सुद्धा पूर्ण नाव, जन्म- हयात स्थिती; कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास माहिती हवी.

In reply to by माहितगार

आदूबाळ 17/09/2015 - 14:43
अर्थतज्ज्ञ विजय केळकरांचे पीएचडी गाईड अजून एक मराठी अर्थतज्ज्ञ अविनाश दीक्षित होते. केळकरांनी बर्कली विद्यापीठातून पीएचडी मिळवली. (उगाचच रँडम माहितीचा हा तुकडा डोक्यात अडकून बसला होता.)

माहितगार 17/09/2015 - 14:30
मनोरंजन या पहिल्या मराठी दिवाळी अंक काढण्याचा मान मिळणारे काशीनाथ रघुनाथ मित्र यांचे मूळ आडनाव आजगावकर होते. १) काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) यांचे मृत्यूवर्ष काय ? त्यांचा मृत्यू कुठे झाला ? २) केनीया देशाच्या न्यायिक विभागात कुणी काशीनाथ रघुनाथ मित्र होऊन गेले, ती व्यक्ती आणि काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) या दोन व्यक्ती वेगवेगळ्या असल्यास तसा दुजोरा हवा आहे. ३) काशीनाथ रघुनाथ मित्र हे जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (ज्ञानांजन मासिक संपादक) यांच्या प्रमाणे कोकणातले आणि समकालीन संदर्भ दिसतात. या दोघांचे परस्परात काही नाते होते का ? या दोघांचे मूळगाव आजगाव एकच का की नाव एकच असलेली हि वेगवेगळी गावे आहेत ? ४) जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे जन्मवर्ष काय ?

वाचक्नवी 01/01/2016 - 23:07
गोपीनाथ तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर इ.स. १९०७; मृत्यू : ७ जून, इ.स. २००० हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक होते. अधिक माहितीसाठी https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit पहा
तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ? १) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[वर्ग:मराठी आडनावे]] या वर्गाने वर्गीकरण केले जाते.

समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी

माहितगार ·

जडभरत 12/07/2015 - 15:46
माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही. पण मी वरील लिंकवर जाउन मूळ काव्य वाचलं. अतिशय छान आहे मूळ काव्य. तुमच्यामुळे एक अतिशय दुर्मिळ साहित्य प्रकार पहावयास मिळाला. समर्थांची शब्दरच्ना पण काय प्रभावी आहे. मस्तच.

In reply to by जडभरत

माहितगार 12/07/2015 - 16:19
माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही.
बरोबर मूळ लिंकवर जा, वाचा तुम्हाला समजलेला अर्थ आम्हालाही सांगा.

जडभरत 12/07/2015 - 16:32
नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची चूक नाही. मलाच आकलन झालेलं नाही. काव्याचा गूढार्थ सांगणे फार मुश्किल आहे. मी मला काव्य समजलं असं म्हटलेलं नाही. मी फक्त शब्दरचना आणि लय या अर्थी रचना चांगली आहे असं म्हणतोय.

विवाहाच्या प्रसंगी गायली जाणारी गीतं म्हणजे धवळे महधंबा हीचं नाव धवळ्याशी जोडलं गेलं आहे तिची गीतं शोधली पाहिजेत. म्हाहिम भट आणि लक्ष्मीधरभट यांनी पदे लिहिली आणि महदाइसा (महधंबा) यांनी ती गीतं गायली. बाकी, धवळे आडनावांचीच लोक ही गीतं म्हणतात असं काही माहिती नाही. बाकी, कालच कोणीतरी ’वि्हिणी” ची आठवण काढली होती. लग्नात जवळ जवळ सर्वच समाजात अशी गीतं असावी पण तुम्ही म्हणता तसं विवाहाच्या प्रसंगी ढोलगीतं म्हणजे महिला ढोल वाजवितात आणि गाणी म्हणतात पण ते धवळे आडनावाची लोक आहेत हे माहिती नाही. :( आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला । पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥ महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जडभरत 12/07/2015 - 16:41
महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. हं बिरुटे साहेब. मला पण हेच म्हणायचे आहे. जो प्रत्यक्ष अर्थ, म्हणजे ज्याला फेस व्हैल्यू म्हणतो आपण, तो मजेशीर आहे छान आहे. पण जो गूढार्थ आहे. तो समजणे मला तरी मुश्किल आहे. असो, कुणि लपलेला अर्थ समजावून सांगू शकत असेल तर मला खूप आवडेल समजून घ्यायला. हे नक्कीच कशाचे तरी रूपक आहे.

In reply to by जडभरत

मला तरी त्यात गुढ अर्थ असा काही वाटला नाही. अर्थात असेल आणि कोणी समजुन सांगत असेल तर वाचायला मजा येईलच. पण उगाच ओढून अर्थ काढण्यात काही मजा नाही असे वाटते. नवरी हंसरुप चाले तीवरी भुजंग फुंपाले लोक म्हणती भुजंग आले, धावा धावा. नवरी हंसासारखी डौलदारपणे चालत आली आणि महादेवाच्या गळ्यातील सर्प फुत्कार टाकू लागले आणि लोक भुजंग आले धावा धावा म्हणुन मंडपातून पळु लागले यात काय गुढ अर्थ दडलेला असेल ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 18:16
मोल्सवर्थात आणि आंतरजालावर काही शब्दांचे अर्थ लावत पुन्हा एक दोनदा वाचली. बहुधा शंकर पार्वती विवाहाचे (?) आपण म्हणतातसे मनोरंजक वर्णन असाचे असे वाटते. विनोदावर टिका करणार्‍या समर्थ रामदासांच्या काव्याच हे वेगळ रुप म्हणता येईल का ?

In reply to by प्यारे१

माहितगार 12/07/2015 - 18:31
आपण म्हणता तसे काँटेक्स्ट पाहीला पाहीजे हे खरे. ते तीन शब्द आणि समर्थांचे नाव लक्षात राहते काँटेक्स्ट विसरला जातो. तरीही सर्वसाधारणपणे समर्थ साहित्य तत्वज्ञानाने ओतप्रोत भरले आहे. समर्थांच ह्या काव्यात केवळ महादेवाच्या विवाहाचे चित्तवेधक वर्णन दिसते म्हणून वेगळे वाटते आहे.

In reply to by माहितगार

प्यारे१ 12/07/2015 - 19:04
समर्थांना भारत भ्रमणामुळे अनेक भाषा अवगत होत्या. तसेच त्यांनी दासबोधातल्या एका समासात वर्णमाला घेऊन एकेका अक्षरावर एक एक ओवी रचली आहे. अशा प्रकारच्या संतसाहित्याला थोडंसं हलक्या स्वरुपात घ्यायची गरज आहे. सातत्यानं शास्त्रीय गायन करणारानं एखादं लोकगीत गावं असा प्रकार आहे. यात उच्चनीच भेद करावा की नाही हा वेगळा विषय!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 17:32
सर, मराठीची शब्द संपत्ती खालावलेल्या मला यातील बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नाहीत. आपण ज्या 'विवाह प्रसंगी उडालेली गम्मत'चा उल्लेख करता आहात, ती गंमत समजून घेता येण्यासाठी आपल्या साहाय्याची विनंती आहे.

जडभरत 12/07/2015 - 17:09
बिरुटे साहेब संत वचनांचा काहीतरी लपलेला अर्थ बहुतेक असतोच! "वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले" याचा खरा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? एका सत्पुरुषांनी मला ह्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला होता.

In reply to by जडभरत

देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत असा आशय असलेली गवळण आहे इतकेच माहिती आहे. राधा पाहून भुलले हरी बैल दुभवी नंदाघरी कृष्ण राधेच्या प्रेमात इतका वेडा होऊन गेला होता की ''बैल दुभवी नंदाघरी'' आणि राधाचं हरीच्या नादात कुठे कामात लक्ष होतं. ''रिकामा डेरा घुसळत'' होती. हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत एक झाले की असंच होणार. ''ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा'' शरद सरांनी मिपावर या गवळणी विषयी लिहिलं होतं. नाथांची छान गवळण आहे. -दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 17:24
* वैश्वानर (कडवे ३), सीसाळे (कडवे ४), व्याळ वळवळिती (कडवे ४), पिनाक (कडवे ७) या शब्दाम्चे अर्थ काय ? * कडवे ८ : हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? या ओळीतून समर्थ काय सांगत आहेत ?) *कडवे ९: ढोर लाताड चूकले | गाते बाजेचे घेतले (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे ११: नवरी सुंदर रुपड | नवरा आणिल तो कोड || वोले हात्तीचे कातड | आंगावरी ( यात 'नवरा आणिल तो कोड' म्हणजे काय ? 'वोले हात्तीचे कातड' याचा संदर्भ अथवा अर्थ काय ?) *कडवे १२ : बैल बहुता दिवसांचा | मोटा साटा गोमाशांचा (म्हणजे काय ?) || :लोक मिळाला नगरीचा (म्हणजे काय ?) *कडवे १४: "बैले लाविल्या गोमाशा' (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे १७: 'एकवीस सर्वांगावरुता दूरी' (म्हणजे काय ?) *कडवे १९: भुजंग फुंपाले (म्हणजे काय ?) *कडवे २०: उटणे घेऊनी बाळ ( या ओळीत निर्देशीलेले बाळ कोण आहे ?) जळे बिजले दुकुळ (म्हणजे काय ?) *कडवे २१: धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली (म्हणजे काय ?) साडी अवघी नासली | रक्तबिंदी (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २२: व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || ( वर्‍हाड्यांचे मन का कंटाळले आहे ?) *कडवे २३: तेल घालू गेली सिरी | तेथे देखिली सुंदरी || सवती आहे इयेवरी | (यात डोक्यावर तेल कोण घालते आहे ? सुंदरी कोण आहे ? सवत कोण आहे ? हे उल्लेख कुणाबद्दल आहेत ? *कडवे २४: 'तेथे नामनाम आले' म्हणजे काय ? 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || (या ओळीचा अर्थ काय, कोण कुणावर प्रेम करत आहे ? अश्रू कुणास येत आहेत ? आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २५ आणि २६ : यात आगीचा संदर्भ काय आहे ? पंचाक्षर म्हणजे कोण ? *कडवे २७ आणि २८: जोगी जोगीणी वोहर | (यात 'वोहर' आणि 'सरपाडे' म्हणजे काय ?) *कडवे ३१: दास म्हणे दाता थोर | (या कडव्यातील दाता कोण ? देवभक्तास कुणकुणात अंतर दिसत नाही ?)

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 19:20
वैश्वानर = अग्नि व्याळ हा शब्द नागाला उद्देशून वापरतात सीसाळे हे बहुधा मुंडक्यांची माळ याला उद्देशून असावे. पिनाक = शंकराचे धनुष्य हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी नरमुंड (कवटी)चे खापर हातात धरलेला शंकर हा बैरागी आहे. तो दारोदार भिक्षा मागतो. वोले हात्तीचे कातड शंकराने गजचर्म पांघरले आहे असे म्हणतात. म्हणून ओले हत्तीचे कातडे. "कोड" याचा अर्थ कौतुक असा असावा. ढोर आणि बैल बहुता दिवसांचा | इथे नंदीचा संदर्भ आहे लोक मिळाला नगरीचा = नगरातले लोक एका जागी होऊन मजा बघत आहेत. बैले गोमाशा लाविल्या म्हणजे नंदीने मान हलवून गोमाशा लोकांच्या दिशेने हाकलून लावल्या एकवीस सर्वांगावरुता दूरी हे शंकराने अंतरपाट धरताच महाप्रचंड रूप धारण केले, इतके की नवरीला वर उचलले तरी मस्तक दूरच राहिले असे अर्थाने दिसते. भुजंग फुंपाले हे नाग (भुजंग) फूत्कार टाकत आला अशा अर्थाने आहे. सवती आहे इयेवरी हे गंगेला उद्देशून आहे. तेथे नामनाम आले म्हणजे तिथे शंकराच्या नामाचा उल्लेख झाला. 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || पार्वती नवर्‍याकडे निघाली आहे. त्याच्या प्रेमामुळे त्याचे नाव ऐकताच तिच्या डोळ्यात प्रेमाश्रू उभे राहिले. यात आगीचा संदर्भ काय आहे ? शंकराच्या तिसर्‍या डोळ्यात अग्नि आहे असे म्हणतात. त्या अग्निच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक वोहर म्हणजे वधूवर, नवदांपत्य. जोगी जोगिणी म्हणजे शंकर हा जोगी आहे, पार्वतीने त्याला शोभेल असे जोगिणीचे रूप घेतले. दाता थोर हा दाता (देणारा) शंकर आहे. रामेश्वर असा त्याचा उल्लेख पुढच्या ओळीत आहे. देवभक्तासी अंतर आडळेना म्हणजे देव आणि भक्तात अंतर आढळत नाही. हा देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.

In reply to by पैसा

प्यारे१ 12/07/2015 - 19:58
+1 शंकराचे चित्रदर्शी वर्णन समर्थांनी केलेले आहे. पुराणात अशा प्रकारचे उल्लेख असावेत.

In reply to by माहितगार

प्यारे१ 12/07/2015 - 21:15
आतापर्यंत रामदासस्वामींच्या रचना मराठीत आहेत असंच वाटत होतं त्यामुळं अनुवाद कशासाठी असं वाटत होतं. बरेचसे शब्द समजतात खरंतर. त्या तुलनेत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतलया ओव्या फारच अवघड आहेत

In reply to by प्यारे१

माहितगार 12/07/2015 - 22:04
समर्थांचीही मराठी चार शतकांपुर्वीची आहे. थोडे शब्द समजले नाहीत अथवा बरेच वेळा शब्द समजताहेत वाटले तरीही तत्कालीन शब्द-संदर्भ वेगळे असू शकतात. चुकीचा अथवा गैर अर्थ होण्यापेक्षा सुस्पष्ट अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न नेहमीच चांगला असे वाटते.

In reply to by पैसा

माहितगार 12/07/2015 - 21:59
'एकाचे एकविस होऊ दे पाचा चे पंचविस होऊ दे' अशा प्रकारचा आशिर्वादाची काही म्हण असल्याचे दिसते. एकविस या शब्दास २१ स्वर्ग या संकल्पनेचा काही आधार असू शकेल ?

In reply to by पैसा

अप्रतिम प्रतिसाद पैसा तै मन:पूर्वक धन्यवाद । इतके सुन्दर लेखन शेयर केल्या बद्दल माहीतागार ह्यांचे आभार ! अवांतर : पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक >> ॐ नम:शिवाय हां पंचाक्षरी मन्त्र । त्याचा जप करणारे सारेच पंचाक्षरी । देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.>> देवाभक्तात अन्तरच नाही । देव आणि भक्त एकच आहे । विभक्त नाही तोच भक्त। जिथे द्वैतच नाही तिथे जवळ दूर असेल काही संभवत नाही । देवाभक्तात अन्तरच नाही । हे आपल्या शिवाशंकरांचे अप्रतिम वर्णन आहे । वल्ल्या बरोबर वेरुळ आणि घारापुरी लेण्या मधे पाहिले आहे, गजचर्म, हातात कवटी किन्व्वा पार्वतीचा सवति मत्सर वगैरे वगैरे । अतिअवान्तर : एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको) पुनश्च एकवार धन्यवाद ।

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 13/07/2015 - 09:33
+१ पैसा तैंच्या मदतीने एका चांगल्या काव्याचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले. * 'पंचाक्षर' म्हणजे (ॐ) 'नमः शिवाय' सुद्धा असू शकेल. * 'देवभक्तासी आंतर | आडळेना ||' : अद्वैतवादी सर्वत्र अद्वैत पाहतो तेव्हा यात आपण म्हणता तसे देव आणि भक्त यांच अद्वैत असू शकेलच. सांख्य तत्वज्ञानात प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांचा उल्लेख येतो, या काव्यात पार्वती आणि शंकर त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्यास त्याचे वर्णन करून, पार्वती हि शंकराची भक्त आहे तेथेही देव आणि भक्त असे नाते आहे आणि त्यांच्याती अद्वैत दाखवण्याचा संत कवीचा मानस असण्याची शक्यता असू शकेल का असा एक विचार मनात येऊन गेला. अजून एक शक्यता कवी स्वतःस रामाचा दास म्हणवतो आणि महादेव आणि राम या दोहोंमधील अद्वैताचा उल्लेख संतकवी या ओळीतून करून देऊ इच्छित असू शकतील अशी पण एक शक्यता वाटते.
एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको)
भक्तांसाठी अद्वैतच अंतीम सत्य आहे, हे मान्य. परंतु हा धागा ज्ञानकोशीय अभ्यासाच्यादृष्टीने असल्यामुळे परमेश्वराच्या प्रतीबिंबांचे नि:संदिग्धीकरणाचा प्रयत्न करणे प्राप्त आहे म्हणून ह्या काव्याचे लेखक समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असण्याची शक्यतेचा आपला निर्देश अभ्यासूंनी तपासून पाहण्यासाठी महत्वाचा वाटतो. या काव्यातील शब्दांचे अर्थ शोधताना काही शब्दांचा उपयोग बंधू द्वयांनी लिहिलेल्या काव्यांमध्ये ओघाने दिसून येतो. 'बहुसाल' हा शब्द दोन्हीही कवी वापरू शकतील पण 'रक्तबिंदी' या शब्दात इतर कवींनी कमी वापरलेल्या विशीष्ट नवीन रुपकाची उपयोजन दिसते आहे आणि रामायणातील युद्धकांडातही 'रक्तबिंदी' हे रूपक येताना दिसते आहे. शब्दसंग्रहांचा अभ्यास करून जिज्ञासूंना दोन्ही कवींची काव्ये वेगवेगळी शोधणे शक्य असावे असे वाटते. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 12/07/2015 - 22:30
'लवथव' हा शब्द समर्थांच्याच ५व्य गणपती गाथेच्या ४थ्या कडव्यात, ...'लवथव दोंद कट्ट नागबंद...' असा आला आहे. संदर्भ

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 23:52
व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || खडबड आवाज करणारे व्याघ्रचर्म आणि ओले लोंबणारे (लवथवते) गजचर्म बघून वर्‍हाड्यांना वीट आला (किळस आली).

माहितगार 12/07/2015 - 21:28
'बहुसाल' आणि 'रक्तबिंदी' हे या धवळे समर्थ लिखीत रचनेतील दोन शब्द समर्थांनीच लिहिलेल्या रामायणाच्या युद्धकांडवर्णनात दिसताहेत. 'बहुसाल' (धवळे कडवे १३वे आणि युद्धकांड कडवे २७वे) शब्दाचा नेमका अर्थ अद्यापी मला लागलेला नाही. 'रक्तबिंदी' (धवळे कडवे ३१वे आणि युद्धकांड कडवे ७७वे) शब्दाचा युद्धकांडातील अर्थ नेमका अद्याप उमगला नाही पण 'जणू (रक्ताच्या रंगाचा म्हणजे) लालरंगाचा शिंपण(सडा?)' असा असावा का ? http://www.transliteral.org/pages/z140412060953/view *धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| धवळे ज्या प्रसंगी गायले जात त्यात चूना दळण्याचे गीत असाही काही प्रकार दिसतोय. (संदर्भ) समर्थ लिखीत धवळे गीताच्या २१ व्या कडव्यात विभूती अवघी उकरंबिली यात उल्लेखिलीली विभूती चुन्याची असू शकेल की हळद लागल्यामुळे त्यास लालरंग आला तो उटणे लावताना साडीवर उडाला आणि त्याचे वर्णन 'रक्तबिंदी' असे असेल ? (माझा जुजबी तर्क आहे, चुभूदेघे सुधारणा सुचवणे)

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 23:34
बहुसाल याचा अर्थ बरीच वर्षे असा होतो. इथे बराच वेळ असा घ्यावा लागेल. धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| शंकराला हळद लावताना स्त्रियांनी विभूती उकरून, खरडून काढली. तेव्हा गजचर्मातून गळणार्‍या रक्तबिंदूंनी त्यांच्या साड्या खराब झाल्या असे मला वाटते. (संदर्भ: वोले हत्तीचे कातडे)

In reply to by पैसा

माहितगार 13/07/2015 - 09:52
प्रथम दर्शनीतरी हे एक हलकेफुलके काव्यच वाटते आहे. आणि तुमच्या मदतीने ह्या काव्याचा आस्वाद घेणे खुपच सुलभ झाले. या सरळ हलक्या फुलक्या काव्यात गहन गूढ अर्थ शोधण्याबद्दल बिरुटेसरांची साशंकता पटत असली तरीही अधीक काल्पनिक विश्लेषणाचा मोह आवरता येत नाही. संतकवीला प्रकृती आणि पुरुष हे द्वैत दाखवून नंतर अद्वैत स्पष्ट करणे असे तर नसेल ना असा एक विचार मनात येऊन गेला. शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे.

In reply to by माहितगार

पैसा 13/07/2015 - 10:10
द्वैतातील अद्वैत दाखवणे हे असू शकेलच. बहुतेक भारुडे, कूटे, आर्या, धवळे अशा वरकरणी साध्या दिसणार्‍या काव्यांमधे अनेकदा खूप गहन अर्थ दडलेला असतो. किंवा तसा लावता येतो. मात्र मी त्या अर्थात न शिरता वरकरणी दिसणारा अर्थ वाच्यार्थ घेतला आहे. यात रक्तबिंदी हे रक्तबिंदू शब्दाचे तृतीयेचे बहुवचनी रूप आहे. "ने ए शी - नी ई शी" यातला ई प्रत्यय लावला आहे.

In reply to by माहितगार

जडभरत 13/07/2015 - 10:53
शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे. :- हं मुद्दा पटला.

पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद.... गजासूराच्या वधाचा मला वाटते यात संधर्भ असावा.... खाली गजासूरवधाच्या शिल्पाचे छायाचित्र दिले आहे... त्यात खाली हत्तीचे मस्तक व हाताने ताणलेले कातडे स्पस्ट दिसत आहे.... रामदासांनी केलेले शंकराचे वर्णन या मुर्तीचेच आहे की काय अशी शंका येते... इतके ते जुळते... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माहितगार 13/07/2015 - 10:03
बाल-जरठ विवाहाबद्दल खरी सामाजीक क्रांती २०व्या शतकात घडून आली परंतु समर्थांच्या काळातही, "...नवरा पाहता म्हातारा चुरचुर लागली नगरा,.." "..लोकी हासेवया केल्या..तेणे कासावीस जाल्या नगरनारी.." यातून बाल-जरठ विवाहांची तत्कालीन अपरिहार्यता आणि तरीही सामाज्मनाची अस्वस्थता या ओळींमधून दिसते का ? हे काव्य वरून हलके फुलके दिसत असले, (विवाहाच्या गाठी स्वर्गात बांढल्या जातात ही समाज मान्यता) असा विवाह परमेश्वरी स्वरुप म्हणून समर्थ स्विकारताना दिसत असले तरीही विवाहेत्सुकांच्या वयांमधील अंतराबद्दल अल्पशी का होईना थट्टा या काव्यात दिसते का ? ,की मी या काव्यातील सरलार्थापेक्षा माझ्या मनातील कल्पना अधिक शोधू पहातो आहे अशी शंका वाटते ?

आता वाजवा रे वाजवा । महादेव लग्नाला चालला । पार्वतीचा विवाह झाला । कसा, पाहू ॥ उमा सुंदर सुकुमार । सुलक्षण मनोहर । तिला पाहिला भ्रतार । महादेव ॥ मस्तकी त्याच्या जटाभार । देही विषारी फुत्कारती नाग । तिसरे नेत्री वैश्वानर । भगभगीत ॥ गळा शोभे रुंडमाळ । त्यातुनी ओघळे रुधीर । शंखपाळे धवळे । नाग वळवळत ॥ सदा स्मशानी राहणे । ते राखेचे ऊधळणे । भोंवती कोणती भूते । कोण जाणे ॥ जुना कधीचा पुरातन । भुतेखेते संग अचाट । रूप हे सर्व अफाट । वर्णवेना ॥ हाती त्रिशूल डमरू । काखेस भयंकर व्याघ्र्यांबर । मोठे पिनाक सरळ । शोभतसे ॥ हाती धरून नरवंटी । भिक्षा मागे दारोदारी । गळा रुद्राक्षांच्या माळा । इथे तिथे ॥ ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । दंड कमंडलु शोभले । भस्म पोते ॥ सुंदर गंध रेखले ललाटी । गंगा धबधबा वाहती । लाळ सर्वांगी गळती । भुजंगाची ॥ नवरीचे सुंदर रूप । नवर्‍याने शृंगारले कवतूक । सजवले पांघरून गजचर्म । अंगावर ॥ नंदी शोभला कधीचा । संगती गोमाशांचा थवा । लोक लोटले पहाया । शहरभरचे ॥ नवरी नीटस सुंदरी । नवरा पाहता दिसे थोर । चुटपुट लागे अंतरी । बहुतांच्या ॥ लोक हसाया लागता । नंदीने गोमाशा पळवल्या । त्यामुळे कासावीस झाल्या । नगरनारी ॥ लोक ते पळू पाहती । पाठलाग माशा करती । डंख शमवू पाहती । अंगभर ॥ नवरा मंडपी आला । मग अंतरपाट धरला । नवरा क्षणी उंच झाला । वरून पाहे ॥ अक्षता टाकण्या वरी । भट्टी उचलती नवरी । उंच उंच उन्नत होई । माथा त्याचा ॥ कसेबसे लग्न झाले । लोक उदंड ते आले । पुढे उटणे आरंभले । कौतुकाने ॥ नवरी हंसगती चाले । तीवर भुजंग फुत्कारले । लोक म्हणती भुजंग आले । धांवा धांवा ॥ सर्प आवरिले सकळ । ऊटणे घेउनि बाळ । जळे भीजले दुकुळ । गंगा वाहे ॥ धर्मा हळद लागली । विभूति काढून टाकली । साडी सर्व डागाळली । रक्तवर्णे ॥ व्याघ्रांबर अस्ताव्यस्त झाले । गजचर्म ते लवथवलेले । त्यामुळे अंतर कंटाळले । वर्‍हाड्यांचे ॥ तेल घालूं पाहे शिरी । तेथे पाहिली सुंदरी । सवत आहे इयेवरी । म्हणती लोक ॥ पुढे ढवळे गाईले । तेथे नामनाम आले । प्रेम नवर्‍यास दाटून आले । गळती अश्रू ॥ म्हणती बाधा झाली वरा । कोणी आणा पंचाक्षरा । रक्षा करितां संसारा । निघती ज्वाळा ॥ पळा पळा आग लागली । नगरामध्ये बोंब जाली । परंतु लवकर विझली । आनंद झाला ॥ नवरीला अलंकार । शंखमण्यांचा श्रृंगार । जोगी जोगीणी युगुल । पाहती लोक ॥ देवे रुप पालटीले । अंगी सौंदर्य बाणले । युगुल तळपते देखिले । सकळांनी ॥ धन्य धन्य ती दंपती । उमा महेश्वर शोभती। नाना रत्नांचे श्रृंगार । चमचमती ॥ दंपती सुंदर शोभती । नंदी दीसे जसा हत्ती । जिकडे तिकडे लखलखती । दिव्यांबरे ॥ दास म्हणे दाता थोर । आमुचा देव रामेश्वर । देवभक्तांस अंतर । आढळेना ॥ वोहर = दंपती, मेहूण काही ओळींचा अर्थ स्पष्टपणे न कळल्याने त्या तशाच राहिल्या आहेत...

In reply to by नरेंद्र गोळे

पैसा 13/07/2015 - 10:18
सुरेख लिहिलंय! ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । या ओळीत नंदीने लाथ मारली ती चुकली, एवढे कळले. बाज शब्द "बाजले" यासाठी वापरला असावा. मात्र गाते म्हणजे काय ते कळले नाही.

जडभरत 13/07/2015 - 10:59
तेथे नामनाम आले
येथे रामनाम म्हणायचे असेल का? कारण अनेक ठिकाणी शिवशंकर रामनाम प्रेमाने स्मरतात असा उल्लेख आहे. नामनामचा अर्थ तर काहीच लागत नाही.

जडभरत 12/07/2015 - 15:46
माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही. पण मी वरील लिंकवर जाउन मूळ काव्य वाचलं. अतिशय छान आहे मूळ काव्य. तुमच्यामुळे एक अतिशय दुर्मिळ साहित्य प्रकार पहावयास मिळाला. समर्थांची शब्दरच्ना पण काय प्रभावी आहे. मस्तच.

In reply to by जडभरत

माहितगार 12/07/2015 - 16:19
माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही.
बरोबर मूळ लिंकवर जा, वाचा तुम्हाला समजलेला अर्थ आम्हालाही सांगा.

जडभरत 12/07/2015 - 16:32
नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची चूक नाही. मलाच आकलन झालेलं नाही. काव्याचा गूढार्थ सांगणे फार मुश्किल आहे. मी मला काव्य समजलं असं म्हटलेलं नाही. मी फक्त शब्दरचना आणि लय या अर्थी रचना चांगली आहे असं म्हणतोय.

विवाहाच्या प्रसंगी गायली जाणारी गीतं म्हणजे धवळे महधंबा हीचं नाव धवळ्याशी जोडलं गेलं आहे तिची गीतं शोधली पाहिजेत. म्हाहिम भट आणि लक्ष्मीधरभट यांनी पदे लिहिली आणि महदाइसा (महधंबा) यांनी ती गीतं गायली. बाकी, धवळे आडनावांचीच लोक ही गीतं म्हणतात असं काही माहिती नाही. बाकी, कालच कोणीतरी ’वि्हिणी” ची आठवण काढली होती. लग्नात जवळ जवळ सर्वच समाजात अशी गीतं असावी पण तुम्ही म्हणता तसं विवाहाच्या प्रसंगी ढोलगीतं म्हणजे महिला ढोल वाजवितात आणि गाणी म्हणतात पण ते धवळे आडनावाची लोक आहेत हे माहिती नाही. :( आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला । पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥ महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जडभरत 12/07/2015 - 16:41
महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. हं बिरुटे साहेब. मला पण हेच म्हणायचे आहे. जो प्रत्यक्ष अर्थ, म्हणजे ज्याला फेस व्हैल्यू म्हणतो आपण, तो मजेशीर आहे छान आहे. पण जो गूढार्थ आहे. तो समजणे मला तरी मुश्किल आहे. असो, कुणि लपलेला अर्थ समजावून सांगू शकत असेल तर मला खूप आवडेल समजून घ्यायला. हे नक्कीच कशाचे तरी रूपक आहे.

In reply to by जडभरत

मला तरी त्यात गुढ अर्थ असा काही वाटला नाही. अर्थात असेल आणि कोणी समजुन सांगत असेल तर वाचायला मजा येईलच. पण उगाच ओढून अर्थ काढण्यात काही मजा नाही असे वाटते. नवरी हंसरुप चाले तीवरी भुजंग फुंपाले लोक म्हणती भुजंग आले, धावा धावा. नवरी हंसासारखी डौलदारपणे चालत आली आणि महादेवाच्या गळ्यातील सर्प फुत्कार टाकू लागले आणि लोक भुजंग आले धावा धावा म्हणुन मंडपातून पळु लागले यात काय गुढ अर्थ दडलेला असेल ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 18:16
मोल्सवर्थात आणि आंतरजालावर काही शब्दांचे अर्थ लावत पुन्हा एक दोनदा वाचली. बहुधा शंकर पार्वती विवाहाचे (?) आपण म्हणतातसे मनोरंजक वर्णन असाचे असे वाटते. विनोदावर टिका करणार्‍या समर्थ रामदासांच्या काव्याच हे वेगळ रुप म्हणता येईल का ?

In reply to by प्यारे१

माहितगार 12/07/2015 - 18:31
आपण म्हणता तसे काँटेक्स्ट पाहीला पाहीजे हे खरे. ते तीन शब्द आणि समर्थांचे नाव लक्षात राहते काँटेक्स्ट विसरला जातो. तरीही सर्वसाधारणपणे समर्थ साहित्य तत्वज्ञानाने ओतप्रोत भरले आहे. समर्थांच ह्या काव्यात केवळ महादेवाच्या विवाहाचे चित्तवेधक वर्णन दिसते म्हणून वेगळे वाटते आहे.

In reply to by माहितगार

प्यारे१ 12/07/2015 - 19:04
समर्थांना भारत भ्रमणामुळे अनेक भाषा अवगत होत्या. तसेच त्यांनी दासबोधातल्या एका समासात वर्णमाला घेऊन एकेका अक्षरावर एक एक ओवी रचली आहे. अशा प्रकारच्या संतसाहित्याला थोडंसं हलक्या स्वरुपात घ्यायची गरज आहे. सातत्यानं शास्त्रीय गायन करणारानं एखादं लोकगीत गावं असा प्रकार आहे. यात उच्चनीच भेद करावा की नाही हा वेगळा विषय!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 17:32
सर, मराठीची शब्द संपत्ती खालावलेल्या मला यातील बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नाहीत. आपण ज्या 'विवाह प्रसंगी उडालेली गम्मत'चा उल्लेख करता आहात, ती गंमत समजून घेता येण्यासाठी आपल्या साहाय्याची विनंती आहे.

जडभरत 12/07/2015 - 17:09
बिरुटे साहेब संत वचनांचा काहीतरी लपलेला अर्थ बहुतेक असतोच! "वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले" याचा खरा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? एका सत्पुरुषांनी मला ह्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला होता.

In reply to by जडभरत

देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत असा आशय असलेली गवळण आहे इतकेच माहिती आहे. राधा पाहून भुलले हरी बैल दुभवी नंदाघरी कृष्ण राधेच्या प्रेमात इतका वेडा होऊन गेला होता की ''बैल दुभवी नंदाघरी'' आणि राधाचं हरीच्या नादात कुठे कामात लक्ष होतं. ''रिकामा डेरा घुसळत'' होती. हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत एक झाले की असंच होणार. ''ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा'' शरद सरांनी मिपावर या गवळणी विषयी लिहिलं होतं. नाथांची छान गवळण आहे. -दिलीप बिरुटे

माहितगार 12/07/2015 - 17:24
* वैश्वानर (कडवे ३), सीसाळे (कडवे ४), व्याळ वळवळिती (कडवे ४), पिनाक (कडवे ७) या शब्दाम्चे अर्थ काय ? * कडवे ८ : हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? या ओळीतून समर्थ काय सांगत आहेत ?) *कडवे ९: ढोर लाताड चूकले | गाते बाजेचे घेतले (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे ११: नवरी सुंदर रुपड | नवरा आणिल तो कोड || वोले हात्तीचे कातड | आंगावरी ( यात 'नवरा आणिल तो कोड' म्हणजे काय ? 'वोले हात्तीचे कातड' याचा संदर्भ अथवा अर्थ काय ?) *कडवे १२ : बैल बहुता दिवसांचा | मोटा साटा गोमाशांचा (म्हणजे काय ?) || :लोक मिळाला नगरीचा (म्हणजे काय ?) *कडवे १४: "बैले लाविल्या गोमाशा' (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे १७: 'एकवीस सर्वांगावरुता दूरी' (म्हणजे काय ?) *कडवे १९: भुजंग फुंपाले (म्हणजे काय ?) *कडवे २०: उटणे घेऊनी बाळ ( या ओळीत निर्देशीलेले बाळ कोण आहे ?) जळे बिजले दुकुळ (म्हणजे काय ?) *कडवे २१: धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली (म्हणजे काय ?) साडी अवघी नासली | रक्तबिंदी (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २२: व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || ( वर्‍हाड्यांचे मन का कंटाळले आहे ?) *कडवे २३: तेल घालू गेली सिरी | तेथे देखिली सुंदरी || सवती आहे इयेवरी | (यात डोक्यावर तेल कोण घालते आहे ? सुंदरी कोण आहे ? सवत कोण आहे ? हे उल्लेख कुणाबद्दल आहेत ? *कडवे २४: 'तेथे नामनाम आले' म्हणजे काय ? 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || (या ओळीचा अर्थ काय, कोण कुणावर प्रेम करत आहे ? अश्रू कुणास येत आहेत ? आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २५ आणि २६ : यात आगीचा संदर्भ काय आहे ? पंचाक्षर म्हणजे कोण ? *कडवे २७ आणि २८: जोगी जोगीणी वोहर | (यात 'वोहर' आणि 'सरपाडे' म्हणजे काय ?) *कडवे ३१: दास म्हणे दाता थोर | (या कडव्यातील दाता कोण ? देवभक्तास कुणकुणात अंतर दिसत नाही ?)

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 19:20
वैश्वानर = अग्नि व्याळ हा शब्द नागाला उद्देशून वापरतात सीसाळे हे बहुधा मुंडक्यांची माळ याला उद्देशून असावे. पिनाक = शंकराचे धनुष्य हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी नरमुंड (कवटी)चे खापर हातात धरलेला शंकर हा बैरागी आहे. तो दारोदार भिक्षा मागतो. वोले हात्तीचे कातड शंकराने गजचर्म पांघरले आहे असे म्हणतात. म्हणून ओले हत्तीचे कातडे. "कोड" याचा अर्थ कौतुक असा असावा. ढोर आणि बैल बहुता दिवसांचा | इथे नंदीचा संदर्भ आहे लोक मिळाला नगरीचा = नगरातले लोक एका जागी होऊन मजा बघत आहेत. बैले गोमाशा लाविल्या म्हणजे नंदीने मान हलवून गोमाशा लोकांच्या दिशेने हाकलून लावल्या एकवीस सर्वांगावरुता दूरी हे शंकराने अंतरपाट धरताच महाप्रचंड रूप धारण केले, इतके की नवरीला वर उचलले तरी मस्तक दूरच राहिले असे अर्थाने दिसते. भुजंग फुंपाले हे नाग (भुजंग) फूत्कार टाकत आला अशा अर्थाने आहे. सवती आहे इयेवरी हे गंगेला उद्देशून आहे. तेथे नामनाम आले म्हणजे तिथे शंकराच्या नामाचा उल्लेख झाला. 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || पार्वती नवर्‍याकडे निघाली आहे. त्याच्या प्रेमामुळे त्याचे नाव ऐकताच तिच्या डोळ्यात प्रेमाश्रू उभे राहिले. यात आगीचा संदर्भ काय आहे ? शंकराच्या तिसर्‍या डोळ्यात अग्नि आहे असे म्हणतात. त्या अग्निच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक वोहर म्हणजे वधूवर, नवदांपत्य. जोगी जोगिणी म्हणजे शंकर हा जोगी आहे, पार्वतीने त्याला शोभेल असे जोगिणीचे रूप घेतले. दाता थोर हा दाता (देणारा) शंकर आहे. रामेश्वर असा त्याचा उल्लेख पुढच्या ओळीत आहे. देवभक्तासी अंतर आडळेना म्हणजे देव आणि भक्तात अंतर आढळत नाही. हा देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.

In reply to by पैसा

प्यारे१ 12/07/2015 - 19:58
+1 शंकराचे चित्रदर्शी वर्णन समर्थांनी केलेले आहे. पुराणात अशा प्रकारचे उल्लेख असावेत.

In reply to by माहितगार

प्यारे१ 12/07/2015 - 21:15
आतापर्यंत रामदासस्वामींच्या रचना मराठीत आहेत असंच वाटत होतं त्यामुळं अनुवाद कशासाठी असं वाटत होतं. बरेचसे शब्द समजतात खरंतर. त्या तुलनेत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतलया ओव्या फारच अवघड आहेत

In reply to by प्यारे१

माहितगार 12/07/2015 - 22:04
समर्थांचीही मराठी चार शतकांपुर्वीची आहे. थोडे शब्द समजले नाहीत अथवा बरेच वेळा शब्द समजताहेत वाटले तरीही तत्कालीन शब्द-संदर्भ वेगळे असू शकतात. चुकीचा अथवा गैर अर्थ होण्यापेक्षा सुस्पष्ट अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न नेहमीच चांगला असे वाटते.

In reply to by पैसा

माहितगार 12/07/2015 - 21:59
'एकाचे एकविस होऊ दे पाचा चे पंचविस होऊ दे' अशा प्रकारचा आशिर्वादाची काही म्हण असल्याचे दिसते. एकविस या शब्दास २१ स्वर्ग या संकल्पनेचा काही आधार असू शकेल ?

In reply to by पैसा

अप्रतिम प्रतिसाद पैसा तै मन:पूर्वक धन्यवाद । इतके सुन्दर लेखन शेयर केल्या बद्दल माहीतागार ह्यांचे आभार ! अवांतर : पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक >> ॐ नम:शिवाय हां पंचाक्षरी मन्त्र । त्याचा जप करणारे सारेच पंचाक्षरी । देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.>> देवाभक्तात अन्तरच नाही । देव आणि भक्त एकच आहे । विभक्त नाही तोच भक्त। जिथे द्वैतच नाही तिथे जवळ दूर असेल काही संभवत नाही । देवाभक्तात अन्तरच नाही । हे आपल्या शिवाशंकरांचे अप्रतिम वर्णन आहे । वल्ल्या बरोबर वेरुळ आणि घारापुरी लेण्या मधे पाहिले आहे, गजचर्म, हातात कवटी किन्व्वा पार्वतीचा सवति मत्सर वगैरे वगैरे । अतिअवान्तर : एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको) पुनश्च एकवार धन्यवाद ।

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 13/07/2015 - 09:33
+१ पैसा तैंच्या मदतीने एका चांगल्या काव्याचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले. * 'पंचाक्षर' म्हणजे (ॐ) 'नमः शिवाय' सुद्धा असू शकेल. * 'देवभक्तासी आंतर | आडळेना ||' : अद्वैतवादी सर्वत्र अद्वैत पाहतो तेव्हा यात आपण म्हणता तसे देव आणि भक्त यांच अद्वैत असू शकेलच. सांख्य तत्वज्ञानात प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांचा उल्लेख येतो, या काव्यात पार्वती आणि शंकर त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्यास त्याचे वर्णन करून, पार्वती हि शंकराची भक्त आहे तेथेही देव आणि भक्त असे नाते आहे आणि त्यांच्याती अद्वैत दाखवण्याचा संत कवीचा मानस असण्याची शक्यता असू शकेल का असा एक विचार मनात येऊन गेला. अजून एक शक्यता कवी स्वतःस रामाचा दास म्हणवतो आणि महादेव आणि राम या दोहोंमधील अद्वैताचा उल्लेख संतकवी या ओळीतून करून देऊ इच्छित असू शकतील अशी पण एक शक्यता वाटते.
एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको)
भक्तांसाठी अद्वैतच अंतीम सत्य आहे, हे मान्य. परंतु हा धागा ज्ञानकोशीय अभ्यासाच्यादृष्टीने असल्यामुळे परमेश्वराच्या प्रतीबिंबांचे नि:संदिग्धीकरणाचा प्रयत्न करणे प्राप्त आहे म्हणून ह्या काव्याचे लेखक समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असण्याची शक्यतेचा आपला निर्देश अभ्यासूंनी तपासून पाहण्यासाठी महत्वाचा वाटतो. या काव्यातील शब्दांचे अर्थ शोधताना काही शब्दांचा उपयोग बंधू द्वयांनी लिहिलेल्या काव्यांमध्ये ओघाने दिसून येतो. 'बहुसाल' हा शब्द दोन्हीही कवी वापरू शकतील पण 'रक्तबिंदी' या शब्दात इतर कवींनी कमी वापरलेल्या विशीष्ट नवीन रुपकाची उपयोजन दिसते आहे आणि रामायणातील युद्धकांडातही 'रक्तबिंदी' हे रूपक येताना दिसते आहे. शब्दसंग्रहांचा अभ्यास करून जिज्ञासूंना दोन्ही कवींची काव्ये वेगवेगळी शोधणे शक्य असावे असे वाटते. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 12/07/2015 - 22:30
'लवथव' हा शब्द समर्थांच्याच ५व्य गणपती गाथेच्या ४थ्या कडव्यात, ...'लवथव दोंद कट्ट नागबंद...' असा आला आहे. संदर्भ

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 23:52
व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || खडबड आवाज करणारे व्याघ्रचर्म आणि ओले लोंबणारे (लवथवते) गजचर्म बघून वर्‍हाड्यांना वीट आला (किळस आली).

माहितगार 12/07/2015 - 21:28
'बहुसाल' आणि 'रक्तबिंदी' हे या धवळे समर्थ लिखीत रचनेतील दोन शब्द समर्थांनीच लिहिलेल्या रामायणाच्या युद्धकांडवर्णनात दिसताहेत. 'बहुसाल' (धवळे कडवे १३वे आणि युद्धकांड कडवे २७वे) शब्दाचा नेमका अर्थ अद्यापी मला लागलेला नाही. 'रक्तबिंदी' (धवळे कडवे ३१वे आणि युद्धकांड कडवे ७७वे) शब्दाचा युद्धकांडातील अर्थ नेमका अद्याप उमगला नाही पण 'जणू (रक्ताच्या रंगाचा म्हणजे) लालरंगाचा शिंपण(सडा?)' असा असावा का ? http://www.transliteral.org/pages/z140412060953/view *धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| धवळे ज्या प्रसंगी गायले जात त्यात चूना दळण्याचे गीत असाही काही प्रकार दिसतोय. (संदर्भ) समर्थ लिखीत धवळे गीताच्या २१ व्या कडव्यात विभूती अवघी उकरंबिली यात उल्लेखिलीली विभूती चुन्याची असू शकेल की हळद लागल्यामुळे त्यास लालरंग आला तो उटणे लावताना साडीवर उडाला आणि त्याचे वर्णन 'रक्तबिंदी' असे असेल ? (माझा जुजबी तर्क आहे, चुभूदेघे सुधारणा सुचवणे)

In reply to by माहितगार

पैसा 12/07/2015 - 23:34
बहुसाल याचा अर्थ बरीच वर्षे असा होतो. इथे बराच वेळ असा घ्यावा लागेल. धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| शंकराला हळद लावताना स्त्रियांनी विभूती उकरून, खरडून काढली. तेव्हा गजचर्मातून गळणार्‍या रक्तबिंदूंनी त्यांच्या साड्या खराब झाल्या असे मला वाटते. (संदर्भ: वोले हत्तीचे कातडे)

In reply to by पैसा

माहितगार 13/07/2015 - 09:52
प्रथम दर्शनीतरी हे एक हलकेफुलके काव्यच वाटते आहे. आणि तुमच्या मदतीने ह्या काव्याचा आस्वाद घेणे खुपच सुलभ झाले. या सरळ हलक्या फुलक्या काव्यात गहन गूढ अर्थ शोधण्याबद्दल बिरुटेसरांची साशंकता पटत असली तरीही अधीक काल्पनिक विश्लेषणाचा मोह आवरता येत नाही. संतकवीला प्रकृती आणि पुरुष हे द्वैत दाखवून नंतर अद्वैत स्पष्ट करणे असे तर नसेल ना असा एक विचार मनात येऊन गेला. शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे.

In reply to by माहितगार

पैसा 13/07/2015 - 10:10
द्वैतातील अद्वैत दाखवणे हे असू शकेलच. बहुतेक भारुडे, कूटे, आर्या, धवळे अशा वरकरणी साध्या दिसणार्‍या काव्यांमधे अनेकदा खूप गहन अर्थ दडलेला असतो. किंवा तसा लावता येतो. मात्र मी त्या अर्थात न शिरता वरकरणी दिसणारा अर्थ वाच्यार्थ घेतला आहे. यात रक्तबिंदी हे रक्तबिंदू शब्दाचे तृतीयेचे बहुवचनी रूप आहे. "ने ए शी - नी ई शी" यातला ई प्रत्यय लावला आहे.

In reply to by माहितगार

जडभरत 13/07/2015 - 10:53
शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे. :- हं मुद्दा पटला.

पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद.... गजासूराच्या वधाचा मला वाटते यात संधर्भ असावा.... खाली गजासूरवधाच्या शिल्पाचे छायाचित्र दिले आहे... त्यात खाली हत्तीचे मस्तक व हाताने ताणलेले कातडे स्पस्ट दिसत आहे.... रामदासांनी केलेले शंकराचे वर्णन या मुर्तीचेच आहे की काय अशी शंका येते... इतके ते जुळते... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माहितगार 13/07/2015 - 10:03
बाल-जरठ विवाहाबद्दल खरी सामाजीक क्रांती २०व्या शतकात घडून आली परंतु समर्थांच्या काळातही, "...नवरा पाहता म्हातारा चुरचुर लागली नगरा,.." "..लोकी हासेवया केल्या..तेणे कासावीस जाल्या नगरनारी.." यातून बाल-जरठ विवाहांची तत्कालीन अपरिहार्यता आणि तरीही सामाज्मनाची अस्वस्थता या ओळींमधून दिसते का ? हे काव्य वरून हलके फुलके दिसत असले, (विवाहाच्या गाठी स्वर्गात बांढल्या जातात ही समाज मान्यता) असा विवाह परमेश्वरी स्वरुप म्हणून समर्थ स्विकारताना दिसत असले तरीही विवाहेत्सुकांच्या वयांमधील अंतराबद्दल अल्पशी का होईना थट्टा या काव्यात दिसते का ? ,की मी या काव्यातील सरलार्थापेक्षा माझ्या मनातील कल्पना अधिक शोधू पहातो आहे अशी शंका वाटते ?

आता वाजवा रे वाजवा । महादेव लग्नाला चालला । पार्वतीचा विवाह झाला । कसा, पाहू ॥ उमा सुंदर सुकुमार । सुलक्षण मनोहर । तिला पाहिला भ्रतार । महादेव ॥ मस्तकी त्याच्या जटाभार । देही विषारी फुत्कारती नाग । तिसरे नेत्री वैश्वानर । भगभगीत ॥ गळा शोभे रुंडमाळ । त्यातुनी ओघळे रुधीर । शंखपाळे धवळे । नाग वळवळत ॥ सदा स्मशानी राहणे । ते राखेचे ऊधळणे । भोंवती कोणती भूते । कोण जाणे ॥ जुना कधीचा पुरातन । भुतेखेते संग अचाट । रूप हे सर्व अफाट । वर्णवेना ॥ हाती त्रिशूल डमरू । काखेस भयंकर व्याघ्र्यांबर । मोठे पिनाक सरळ । शोभतसे ॥ हाती धरून नरवंटी । भिक्षा मागे दारोदारी । गळा रुद्राक्षांच्या माळा । इथे तिथे ॥ ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । दंड कमंडलु शोभले । भस्म पोते ॥ सुंदर गंध रेखले ललाटी । गंगा धबधबा वाहती । लाळ सर्वांगी गळती । भुजंगाची ॥ नवरीचे सुंदर रूप । नवर्‍याने शृंगारले कवतूक । सजवले पांघरून गजचर्म । अंगावर ॥ नंदी शोभला कधीचा । संगती गोमाशांचा थवा । लोक लोटले पहाया । शहरभरचे ॥ नवरी नीटस सुंदरी । नवरा पाहता दिसे थोर । चुटपुट लागे अंतरी । बहुतांच्या ॥ लोक हसाया लागता । नंदीने गोमाशा पळवल्या । त्यामुळे कासावीस झाल्या । नगरनारी ॥ लोक ते पळू पाहती । पाठलाग माशा करती । डंख शमवू पाहती । अंगभर ॥ नवरा मंडपी आला । मग अंतरपाट धरला । नवरा क्षणी उंच झाला । वरून पाहे ॥ अक्षता टाकण्या वरी । भट्टी उचलती नवरी । उंच उंच उन्नत होई । माथा त्याचा ॥ कसेबसे लग्न झाले । लोक उदंड ते आले । पुढे उटणे आरंभले । कौतुकाने ॥ नवरी हंसगती चाले । तीवर भुजंग फुत्कारले । लोक म्हणती भुजंग आले । धांवा धांवा ॥ सर्प आवरिले सकळ । ऊटणे घेउनि बाळ । जळे भीजले दुकुळ । गंगा वाहे ॥ धर्मा हळद लागली । विभूति काढून टाकली । साडी सर्व डागाळली । रक्तवर्णे ॥ व्याघ्रांबर अस्ताव्यस्त झाले । गजचर्म ते लवथवलेले । त्यामुळे अंतर कंटाळले । वर्‍हाड्यांचे ॥ तेल घालूं पाहे शिरी । तेथे पाहिली सुंदरी । सवत आहे इयेवरी । म्हणती लोक ॥ पुढे ढवळे गाईले । तेथे नामनाम आले । प्रेम नवर्‍यास दाटून आले । गळती अश्रू ॥ म्हणती बाधा झाली वरा । कोणी आणा पंचाक्षरा । रक्षा करितां संसारा । निघती ज्वाळा ॥ पळा पळा आग लागली । नगरामध्ये बोंब जाली । परंतु लवकर विझली । आनंद झाला ॥ नवरीला अलंकार । शंखमण्यांचा श्रृंगार । जोगी जोगीणी युगुल । पाहती लोक ॥ देवे रुप पालटीले । अंगी सौंदर्य बाणले । युगुल तळपते देखिले । सकळांनी ॥ धन्य धन्य ती दंपती । उमा महेश्वर शोभती। नाना रत्नांचे श्रृंगार । चमचमती ॥ दंपती सुंदर शोभती । नंदी दीसे जसा हत्ती । जिकडे तिकडे लखलखती । दिव्यांबरे ॥ दास म्हणे दाता थोर । आमुचा देव रामेश्वर । देवभक्तांस अंतर । आढळेना ॥ वोहर = दंपती, मेहूण काही ओळींचा अर्थ स्पष्टपणे न कळल्याने त्या तशाच राहिल्या आहेत...

In reply to by नरेंद्र गोळे

पैसा 13/07/2015 - 10:18
सुरेख लिहिलंय! ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । या ओळीत नंदीने लाथ मारली ती चुकली, एवढे कळले. बाज शब्द "बाजले" यासाठी वापरला असावा. मात्र गाते म्हणजे काय ते कळले नाही.

जडभरत 13/07/2015 - 10:59
तेथे नामनाम आले
येथे रामनाम म्हणायचे असेल का? कारण अनेक ठिकाणी शिवशंकर रामनाम प्रेमाने स्मरतात असा उल्लेख आहे. नामनामचा अर्थ तर काहीच लागत नाही.
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत. धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे.