Skip to main content

अहमदनगर कट्टा!

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 12/04/2022 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच. लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल. धन्यवाद.

वाचने 36913
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

In reply to by सर टोबी

धन्यवाद सर टोबी आपण खूपच मौलिक माहिती दिलीत काहींबद्दल माहिती आहेच तर काही नवीन ज्ञान प्राप्त झाले . उण्यापुऱ्या चाळीस वयातील पहिली शालेय १५ वर्षानंतर कॉलेज व त्यानंतर व्यावसायिक तथा नोकरीनिमित्ताने या ना त्या कारणास्तव पुणे मुंबई औरंगाबाद असे विविध ठिकाणी अशी भटकंती केल्यावर आता मागील काही वर्षांपासून नगरलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय तरीही जन्मभूमी बद्दल अजूनही म्हणावी तेव्हडी माहिती नाही हे कबूल परंतु माझ्या प्रतिक्रियेमध्ये मी अगदीच दुष्काळ नव्हे तर मुं पु च्या तुलनेने थोडा कमी वर्षाव असा उल्लेख आहे तो देखील कट्ट्याच्या अनुषंगाने नगरबद्दल आणि नगरी असल्याबद्दलचा खचितच अभिमान आहेच आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे तो अजून वाढलाय हेवेसांनलगे पुनश्च धन्यवाद !

In reply to by सर टोबी

छान माहिती दिलीत सर टोबी 👍 माणिक चौकात जिथे आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या बरोब्बर समोरची मालमत्ता सुप्रसिद्ध सिने अभिनेते 'कै. सदाशिव अमरापूरकर' ह्यांची असल्याचे आणि प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते हे आलो आलो ह्यांनी परवा सांगितले होते, त्याव्यतिरिक्त आपण दिलेल्या मौलिक माहितीसाठी आभारी आहे 🙏

In reply to by कंजूस

इथे की खुलताबाद इथे? नक्की नाही, पण मला खुलताबाद येथे घालवल्याचे वाचल्यासारखे अंधुकसे आठवतंय.

In reply to by कंजूस

बरोबर कंजूस जी !

"तब्बल ४९ वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने अहमदनगर जवळील भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. १६८१ मध्ये सुरू झालेली ही मोहीम १७०७ मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं १६८३ मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी १७०६ मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी १७०७ मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत. औरंगझेबाने मृत्यूपुर्वी इच्छा व्यक्त केली होती की "आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, त्यानुसार आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्याचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.
संदर्भः आंजा

In reply to by चौथा कोनाडा

हाकेच्या अंतरावर असूनही परधर्मीय प्रार्थनास्थळ आणी औरंगजेब चे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण एवढीच माहिती आजपर्यंत दिली किंवा मिळाली ( कदाचित अनुल्लेखाने मारणे हा हेतू असावा ) असो पूर्वी तिकडे फक्त मुस्लिम वस्तीच होती परंतु आता भरपूर नव्या टाउनशिप आणि रो स्कीमा झाल्यामुळे हिंदू बहुसंख्य आहेत तरी त्या मशिदीच्या आसपास मात्र मुस्लिम एरियाच आहे आधी त्या संपूर्ण एरीयाला आलमगीर म्हणूनच संबोधले जायचे परंतु आता दत्तनगर विजयनगर मधुबन सोसायटी माधवबाग सोसायटी असे विविध नामकरण होऊन हिंदुबहुल वस्ती वाढली आहे. शिवाय मिलिटरी ट्रेनिंग एरियासुद्धा तेथून जवळच आहे तेथे रणगाड्यांचा सराव होत असतो भिंगारला देशातील सर्वात मोठे टॅंक ट्रेनिंग रेजिमेंट आहे. औरंगजेबाच्या मुक्कामाच्या काळातच मिनीनाथ महाराजांच्या समाधीला मिरावली दर्ग्यात रूपांतरित केले अशी एक कथा ऐकिवात आहे खखोदेजा .....

In reply to by चौथा कोनाडा

चांगली माहिती चौ. को. 🙏 मायला हल्ली शाळेत शिकलेला इतिहास विसरत चाललो आहे 😀

In reply to by सर टोबी

पुण्याची प्रगती होण्याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणाच्या उत्तम सोयी. आमच्या काळात नगरमध्ये विळद घाटात एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज होते, आणि पुण्यात १२/१४ पर्याय होते. तीच बाब इतर कॉलेजची, सप, फर्ग्युसनच्या तुलनेचे नगरमध्ये काय आहे? शिक्षणातूनच पुढे कंपन्या वाढल्या, आणि त्यातून अर्थकारण. नगर तसेच मोठे खेडे राहिलेले आहे.

In reply to by आलो आलो

बजाज उद्योग समूहात सामिल असलेला फिरोदिया उद्योग समूह मूळचा नगरचा. याच उद्योग समूहाने पुढे दुचाकी क्षेत्रातील क्रांती ठरलेली लुना मोपेड बाजारात आणली जिला नंतर टीव्हीस आणि हिरो उद्योग समूहाकडून स्पर्धा निर्माण झाली. गुटखा किंग धारिवाल उद्योग समूह पण नगरचा. पूर्वी त्यांची ऑइल मिल स्टेशन रोडवर होती. धूतपापेश्वर यांची पनवेल नंतरची फॅक्टरी नगरला होती. त्याच बरोबर वैद्य नानल यांचा आफाली हा आयुर्वेदिक औषधांचा कारखानापण नगरला होता. व्हिडीओकॉनचे धूत नगरचे. त्याच बरोबर पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा फक्त नगरला होती. व्हीआरडीई हे नवीन वाहनांची चाचणी घेणारे केंद्र चेन्नई नंतर फक्त नगर येथे आहे. लखनौला असलेला बडा इमामचे एक पिठ नगरला आहे त्याला स्थानिक भाषेत बारा इमाम म्हटले जाते. तसेच बुर्हाण नगर येथील मंदिर हे तुळजापूरचे पिठ समजले जाते. नगरचा रामप्रसाद चिवडा हा पुण्यातील लक्ष्मीनारायण चिवड्याइतकाच जुना आणि दर्जाने काकणभर जास्तच चांगला असा चिवडा आहे.

In reply to by सर टोबी

ही माहिती देखील आवडली.
पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा
'हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी' विषयी म्हणताय का तुम्ही? एकंदरीत नगरला एवढी औद्योगिक, सांस्कृतिक परंपरा लाभली असूनही हे शहर/ हा प्रदेश खरोखर दुर्लक्षित राहिला आहे हे खरेच! अर्थात त्याचे कारणही तुम्ही आधीच्या प्रतिसादात दिले आहेच. 'गाय छाप' वाले मालपाणी हे आत्याच्या मिस्टरांचे अतिशय जवळचे मित्र होते त्यामुळे नगर जिल्ह्यातील हे एकमेव प्रस्थ मला माहित होते. पण इथे तुम्ही अनेक प्रस्थांची मंदियाळीच सादर केली आहे!

In reply to by सर टोबी

+१ सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी Masters in Mass Communication न्यू आर्ट या महाविद्यालयातून पूर्ण केले आणि त्या दरम्यान इथेच प्रोजेक्ट म्हणून केलेला 'पिस्तुल्या' या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.नागराज यांना नगरबद्दल कायम आस्था आहे.

In reply to by चौथा कोनाडा

ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !
सहमत! नगर कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही तुमच्या हटके लेखनशैलीत लिहावा अशी आग्रहाची विनंती 🙏

बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा पुण्यात .... भेटू कि सगळे आलो आलो नक्कीच प्रयत्न करिन मंडळी कळवा

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

आमी बी पुण्यात, येऊ की वाड्यावर म्हणजे शनिवार वाड्यावर.बक्कळ जागा हाय.

In reply to by टर्मीनेटर

अहो मी इथे कधीचा कॉलींग करतोय, पण कुणी मनावर घेईल तर शपथ! सं - दी - प

In reply to by कंजूस

आठवड्यातून एक दोन तरी असतात, फक्त जाहीर होत नाहीत इतकेच. इकडील स्थानिक मिपाकर वरचेवर भेटत असतात.

In reply to by प्रचेतस

आणि मग मिपाकर. कट्ट्याची जागा अशी असावी की तिथे काही पाहण्यासारखे असावे. जसे अगोदरचे घारापुरी,नेरळ वनविहार,माथेरान ( मिनी झाला). म्हणून एक कर्नाळा युसुफ मेहरल्ली सेंटर'चा सुचवला टर्मिनेटरना.

In reply to by कंजूस

पिंचिंवाडीतील मिपा कट्टा पिंचिं नवनगर प्राधिकरणात गणेश तलाव, वीर सावरकर उद्यान येथे ७ वर्षांपुर्वी झाला होता, त्याला सपत्निक उपस्थित राहण्याचा सुंदर योग आला होता ! प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५ धाग्यात डॉ. सुहास म्हात्रे उर्फ (इस्पिक एक्का अर्थात एक्काकाका ) यांनी काढलेले सुंदर फोटो चुकवू नका !

In reply to by चौथा कोनाडा

भारीच झाला होता हो 'प्राधिकरण कट्टा'. फोटोही मस्तच 👍

In reply to by प्रचेतस

भक्ती सध्या व्यस्त आहेत त्यामुळे 'आलो आलो' ह्यांनी (त्यांच्या व्यस्त दैनंदिन वेळापत्रकातून थोडा वेळ काढून) कट्टा वृत्तांत लिहिण्याचे मनावर घ्यावे अशी आग्रहाची विनंती मी पुन्हा एकदा करत आहे!

आपल्या कट्टा भेटीत मी सांगितल्याप्रमाणे कट्ट्याच्या दुसऱ्याच दिवशी मी व्यावसायिक व खाजगी कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....

In reply to by आलो आलो

कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....
हरकत नाही! धंदा पहले भाया....

वा... कट्टा छान झालेला दिसतोय... वरती गणपती बाप्पाचा फोटो पाहुन क्षणभर उगाच इंदुर च्या बडा गणपतीची आठवण आली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)

In reply to by मदनबाण

बऱ्याच वर्षांपूर्वी इंदूरला गेलोय पण 'बडा गणपती' पहिल्याचे आठवत नाही!

पायाच्या ठेवणीत जाणावणारा फरक सोडला तर आठवण येण्याईतपत साम्य आहे नक्किच

In reply to by आलो आलो

माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नगरचे आयुष्य पूर्वीतरी बरेच संथ होते, त्यामुळं भरपूर वेळ हाताशी आणि करण्यासारखे फार थोडं असायचं. गाव इतकं लहान की सायकलवर कुठेही सहज जाता येत असे. एका दिशेला चांदबीबी महाल ते दुसऱ्या दिशेला डोंगरगणपर्यंत सायकलवर निवांत जात येत असे. मित्र घरून कुठे गेला ते माहीत नसले तरी तो कोणत्या दिशेला गेला त्यावरून आम्ही मग काढत त्याचा शोध लावत असू. आता नुसत्या दुचाकी गाड्या इतक्या झाल्या आहेत की पार्किंगला जागा पुरत नाही. त्या काळात अशोकभाऊ फिरोदिया सोसायटीचे अध्यक्ष होते आणि शहराच्या आर्थिक नाड्या आणि बाजार इत्यादी मारवाडी समाजाच्या हातात होते. आजची परिस्थिती माहीत नाही.

In reply to by मनो

आजची परिस्थिती माहीत नाही
अजूनही मारवाडी समाजामार्फत व्यापार वाढतोय.फिरोदिया कुटुंबातील नरेंद्र फिरोदिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम​ आयोजित करण्यात आघाडीवर आहेत.सावेडी(नगरच कोथरूड) हे उपनगर जोमात प्रगतीशील झाले आहे.उद्योग क्षेत्रात अजूनही पिछेहाट होत आहे.एका बाजूला औरंगाबाद आणि एका बाजूला पुणे अशी मोठी शहरे असूनही फायदा करून घेता आला नाही.फ्लाय ओव्हरमुळे जरा चांगला लूक आलाय.सध्या यास वृद्ध शहर म्हणतात,६०-७० दशकातील पिढीने मोठमोठाली मालमत्ता येथे घेतली परंतु त्यांची तरुण मुले इतरत्र पोटापाण्यासाठी स्थायिक झाली.एकंदरीत अजूनही संथ वाहते सीना नदी ;)

In reply to by Bhakti

भक्ती ताई मागील ५-७ वर्षांपासून सकारात्मक बदल होतोय अगदी जाणवण्याइतपत माझ्याच माहितीतील १०-१२ जण (माझ्यासह) गड्या आपुला गाव बरा असे म्हणत परत नगरला येऊन इथेच स्थायिक होत आहेत म्हणजे तिकडील बाजू कमकुवत झाली किंवा नाईलाज आहे म्हणून नाही तर चॉईस करून ठरवून प्लॅन करून बिझनेस स्वयंरोजगार व औद्योगिक क्षेत्रात देखील आपले पाय स्थिरावत आहे याला आश्वासक बदल किंवा बदलाची सुरुवात म्हणू शकतो (का ?)

In reply to by मनो

माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे.
म्हणजे हेच आताचे 'विशाल गणपती' मंदिर आहे का? तसे असेल तर नव्याने बांधलेले हे मंदिर छानच आहे, अर्थात जुने लाकडी मंदिर पाहिले नसल्याने तुलना करता येत नाहीये! तुमच्याही आठवणी आणि शहर आवडले 👍

अहमदनगरचा कट्टा जोरदार झालेला दिसतोय. सर्व उपस्थितांचे अभिनंदन. या धाग्यावर अहमदनगरबाबत उत्तम माहिती वाचायला मिळाली. अहमदनगर शहराबाबत श्री आनंद शितोळे यांचा वाचनीय लेख - काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर.

In reply to by श्रीरंग_जोशी

टर्मिनेटर यांची भटकंती आणि कट्टा उत्तम झाला आहे. इतर प्रतिसादातून नगरविषयी भरपूर माहिती मिळत आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

छान संदर्भ. धन्यवाद ! लेख वाचून गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! स्थानिकांनी कोर्टात जाऊन वेशी वाचवल्या हे खरंच कौतुकास्पद. माझ्या गावतली महत्वाची वेस तातडीने निर्णय घेऊन १९८२ मध्ये पाडली गेली होती. स्थानिकांना काहीच करता आले नव्हते. एक महत्वाचा वारसा अस्तंगत झाल्याबद्द्ल नागरिक हळहळले !

छान भटकंटी, कट्टा आणि वृत्तांत! मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो पण सध्या फारच बिझी आहे त्यामुळे नाही जमले. असो, या नगर कट्ट्याच्या धाग्याच्या निमीत्ताने नगर बद्दल बरीच माहीती कळाली. कधीतरी निवांत एकदोन दिवस भटकंती नक्की होईल नगरला. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो
तो विचार प्रत्यक्षात आणला असतात तर मजा आली असती, द्वारकासिंगच्या लस्सीला मुकलात 😀 मिपाकर 'नगरी' ह्यांचाही व्यनी कट्टा सुरु होण्याच्या थोडा आधी आला होता पण दुर्दैवाने तो उशिरा वाचला गेला त्यामुळे त्यांना कट्ट्याची वेळ आणि ठिकाण कळवता नाही आले ह्यची खंत वाटते आहे.

कट्टा उत्तमच झालेला दिसतो, लवकर वृत्तांत लिहा आणि रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर

In reply to by जेम्स वांड

रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा
येस सर!
तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर
पाचवा भाग अर्धा लिहून झालाय पण पूर्ण करण्यास मुहूर्त लागत नाहीये अजून 😔

आमच्या शहराविषयी बरिच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अहमदनगर मिपाकरांचे आभार. शहराच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल असे औरंगाबाद ते अहमदनगर आणी नगर ते कल्याण असे विलंबित रेल्वे मार्ग मंजुर होऊन प्रत्यक्षात यायला हवेत. सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे साठी गडकरी यांचे आभार त्याचबरोबर कल्याण ते नांदेड असाच हायवे मंजुर करण्यात यावा अशा गडकरी यांच्या कडे अपेक्षा आहेत.दौंढ ते मनमाड दरम्यान रेल्वे चे इलेक्ट्रिफिकेशन झाले त्याचबरोबर दुहेरीकरण चालु आहे. गडकरी यांनी वाघोली ते शिरूर असा जो मेगाप्रोजेक्ट घोषणा केली आहे त्याला भविष्यात अहमदनगर पर्यंत वाढविण्यात यावे. शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा. अहमदनगर मधिल बरीच कुशल, अकुशल कामगार जनता पुणे येथील चाकण, रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत आपली रोजीरोटी ,भाकरीचा चंद्र मिळवत आहेत. अहमदनगर चे मध्यवर्ती लोकेशन या जमेची बाजू असलेल्या गोष्टीचा हवा तितका उपयोग स्थानिक नेत्रुत्वाला करता आला नाही असे वाटते. मुळात आजुबाजुच्या लोकसभा खासदार यांनी मिळुन परिसरात केंद्राकडून मोठे मोठे प्रकल्प या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. पक्षिय राजकारण बाजूला ठेवून शिरूर,नगर दक्षिण,शिर्डी,बीड, औरंगाबाद,कल्याण , नाशिक, सोलापूर या मतदारसंघांतील खासदारांनी सतत संघटीत प्रयत्न करणे सामान्य नागरिकांना अपेक्षित .

In reply to by चिक्कु

शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा.
हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही. पुण्यात, बेंगलोर मध्ये जी काही हिरवळ आज टिकून आहे, ती केवळ आणि केवळ लष्कर, मोठ्या संस्थांच्या जमिनी आणि त्यांच्यावरचे वृक्षारोपण यांच्यामुळेच. पुण्याचा, बेंगलोरचा नकाशा उघडा. त्यातला लष्कराचा, कॅम्पांचा एरिया पाहा. तो वगळून शहर कसे असेल याची कल्पना करा. वनराई ही श्रीमंत वस्त्यांमध्ये, लष्करी एरियांमध्येच टिकून आहे. बाकी शहर हे भेसूर आणि विद्रूपच आहे. मला भारतीय सैन्यदलं हवीहवीशी वाटतात कारण त्यांच्या जागांमुळेच मोठ्या शहरांमधे थोडीफार झाडं शिल्लक आहेत.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

लष्कर शहरात असणं भाग्यांच नाही असा आमच्या प्रतिसादाचा अर्थ इथे अभिप्रेत नाही आणि तसा जर अर्थ वरील प्रतिसादातून अधोरेखित होत असेल तर आम्ही आमची प्रतिक्रिया उडवण्याची संपादक मंडळींना विनंती करतो. आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे आहे की लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल. याच समस्येला उपाय म्हणून प्रधानमंत्री गतीशक्ती योजना राबविण्यात येत आहे असे ऐकिवात आहे. अहमदनगर शहरात तीन बाजूंनी लष्कर आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान असतो इतकेच नव्हे तर अहमदनगर मधे भारतातील सर्वात जास्त गुप्त दारूगोळा चा साठा आहे असे ऐकिवात आहे. खरं काय?खोटं काय? माहित नाही .

In reply to by चिक्कु

लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल.......
या मुद्द्याशी सहमत चिक्कु.

नगर शहराबाहेरच्या सारोळा येथील टेकडीवरील देवळाला भेट दिली असता काढलेले दोन फोटोज (जानेवारी २०१८).

In reply to by श्रीरंग_जोशी

छान आहेत फोटोज! पहिल्या फोटोत बऱ्यापैकी झाडे-झुडपे दिसत आहेत. खाली नगर जवळच्या मांजरसुंभा परिसरातील (डोंगरगण) गोरक्षगडावरून परवा काढलेला फोटो देत आहे. त्यात बराचसा परिसर रखरखीत दिसत आहे. तापमान ४१°C होते पण घाम मात्र येत नव्हता! 1 ह्या गडावरील शिव-गोरक्ष मंदिर देखील छान आहे. 2

In reply to by टर्मीनेटर

डोंगरगण ला आमच्या जेष्ठ भगिनीचे २००१ साली लग्न करण्यात आले होते. आमच्या गावापासून अंदाजे ७० किलोमीटरवर लग्न ठेवले होते. वर आणि वधू एकाच गावातील असल्यामुळे गावातील सर्व वर्हाडी मंडळींना डोंगरगण येथिल सिताची न्हानी इत्यादी इत्यादी देवस्थानच्या परिसरात दर्शन घडले होते.२००१ साली मी इयत्ता पहिली मधे असताना हे पाहिलेले आहे. एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.

In reply to by चिक्कु

एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.
एखाद्या दिवशी अचानक तिथे भेट देऊन या.

In reply to by टर्मीनेटर

डोंगरगण गोरक्षगडावरून काढलेला शिव-गोरक्ष मंदिराच फोटो आवडला. पहिला फोटो पुन्हा पावसाळ्यात काढल्यास हिरवा गालिचा आंथरलेला आहे असं दृश्य टिपता येईल.