Skip to main content

ताज्या घडामोडी मार्च - भाग १

लेखक निनाद यांनी मंगळवार, 01/03/2022 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली हिंदूविरोधी दंगल - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली. फेब्रुवारी २०२० च्या हिंदू विरोधी दंगलीला भडकावणाऱ्या CAA विरुद्धच्या निदर्शनांदरम्यान त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या इतरांमध्ये आप नेते मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण आणि अकबरुद्दीन ओवेसी, मेहमूद प्राचा, वादग्रस्त डाव्या विचारसरणीचा 'कार्यकर्ता' हर्ष मंडर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समावेश आहे. माजी JNU विद्यार्थी उमर खालिद हा देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होता, ज्यावर प्रदेशात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. राजकीय-धार्मिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक गटाने हिंदू समुदायाची हत्या करण्यासाठी आयोजित केलेली हिंसा होती असा आरोप केला गेला आहे. सीएए विरोधी निदर्शनांचा एक भाग म्हणून ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या हिंसाचारात ५३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, २०० हून अधिक लोक जखमी झाले आणि ४०० लोक विस्थापित झाले. मुस्लिम जमावाने घरे, दुकाने आणि मंदिरे जाळली आणि हल्ले केले. शाहरुख नावाच्या व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकावले. नंतर त्याला यूपीच्या शामली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना जीव गमवावा लागला.

वाचने 46259
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कुठेच लिहिलेलं नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाची ५ वर्षांची मुदत पूर्ण करावी असेही कुठे म्हटलेले नाही. कृ.ह.घ्या. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शरद पवार, पहिल्यांदा मुख्यमंत्री कसे झाले? हा इतिहास नक्कीच वाचा.. छान करमणूक होईल जाताजाता, गोष्ट शरद पवार यांच्या बाबतच चालू आहे, हा एक मुद्दा लक्षांत घेतलात तर उत्तम ...

लोकांच्या समस्या,देशाच्या समस्या,ग्रामीण अर्थ व्यवस्था,शहरी अर्थ व्यवस्था,सामजिक प्रश्न,धार्मिक प्रश्न विदेशी धोरणात. मित्र कोण,मूर्ख कोण बनवत आहे ह्या बद्धल काडी ची अक्कल नसलेला पक्ष म्हणजे . आता चा bjp. Bjp आल्या पासून भारताचे एका पण शेजारी देशांशी प्रेमाचे संबंध नाहीत. ना भारताला जगातील महा सत्ता विचारत आहेत. फक्त event वर अब्ज रुपये खर्च करून जाहिरात करण्यात हा पक्ष पुढे आहे . पाढी राखे तर अशिक्षित आंधळे आहेत. त्यांना कोणत्या ही गोष्टी चे कौतुक वाटते.

In reply to by sunil kachure

बॉर. मग?

मुंबई च्या महापौर ची मुदत संपली आहे त्या मुळे पालिकेवर प्रशासक नेमला जाईल आणि तो कोण असेल ते राज्य सरकार ठरवेल. म्हणजे सेने चीच सत्ता मुंबई वर असेल. आणि त्या मध्ये काही गैर नाही केंद्र सरकार राज्यपाल मार्फत राज्यांवर सत्ता गाजवत असतेच.. आणि राष्ट्रपती राजवटी खाली लोकशाही चा खून करत असतेच केंद्र सरकार. मी तर म्हणतो कायम स्वरूप मध्ये हीच पद्धत असावी ..मुंबई वर राज्य सरकार नी सत्ता गाजवली तर ते राज्य हिताचेच आहे.

In reply to by sunil kachure

मी तर म्हणतो कायम स्वरूप मध्ये हीच पद्धत असावी ..मुंबई वर राज्य सरकार नी सत्ता गाजवली तर ते राज्य हिताचेच आहे.
बाकीचे जाऊ द्या. मतदारांना सामोरे जायला सत्ताधारी पक्ष आणि त्याचे समर्थक घाबरत आहेत हे स्वतः मान्य केलेत हे काय कमी आहे? जर का राज्यात कायमस्वरूपी अशीच पध्दत असावी असे म्हणत असाल तर मग इतर कोणी 'महाराष्ट्रावर कायमस्वरूपी केंद्रानेच राज्य करावे ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे' अशी मागणी केली तर त्याला विरोध तुम्ही कोणत्या तोंडाने करणार? की रावणाकडून एखादे तोंड उसने आणणार?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

:D

https://www.loksatta.com/desh-videsh/congress-leader-held-for-provocati… मुकर्रम खान यांचा एक चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरली असून, त्यात त्यांनी, ‘‘जो कोणी हिजाबला विरोध करेल त्याचे तुकडे तुकडे केले जातील,’’ असे प्रक्षोभक विधान केल्याचे दिसत आहे. ------- परमपूज्य राहूल गांधी, आता काय Action घेतात? हे वाचणे रोचक ठरेल .... -----

In reply to by मुक्त विहारि

असे चिथावणी देणे भयंकर आहे. आधीच एक हर्षा नावाचा तरुण याचा बळी गेलेला आहे. यांना हिंसाचार सुरू करून परत मोपला कांड करायचे आहे की काय?

फडणवीसांनी काल विधानसभेत केलेले आरोप फारच धक्कादायक आहेत. राज्य सरकारमधील मंत्री, सरकारी वकील, पोलिस, मंत्र्यांचे सचिव एकत्र येऊन भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर खोट्या केसेस कशा लावायच्या, बनावट पुरावे कसे बनवायचे, साक्षीदार, पंचांना कसे पढवायचे या सगळ्याचे १२५ तासांचे व्हिडीओ रेकोर्डिंगच सादर केले. सकृतदर्शनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा यात ठळक सहभाग दिसत आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तक्रार पोलिसात , न्यायालयात करायची असते , विधानसभेत आरोप करून काय षष्प उपयोग नाही. उगा हवा करायची. गाडीभर पुरावे सारखा आहे हे.

In reply to by कपिलमुनी

बघू पुढे काय होतय मलिकची पण अशीच केली होती नोव्हेंबर मधे वाझेची पण विधानसभेतच केली होती.

In reply to by कपिलमुनी

विधानसभेत आरोप करून काय षष्प उपयोग नाही. हायला हे तुमच्या युगपुरुषांना का समजावले नाही गेली ८ वर्षे? जे सगळे आरोप त्यांनी केले ते केवळ दिल्ली विधानसभेतच केले एक तरी एफ आय आर केला का?

In reply to by कपिलमुनी

ह्या प्रसंगांत पोलिसांत तक्रार करता येणे हास्यास्पद आहे, कारण त्यांचाही सदर कृत्यांत सहभाग आहे, असा फडणवीसांचा आरोप आहे. कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत, फडणवीसांनी हायकोर्टांत आपण दाद मागणार आहोत असे सूचित केले आहे.

राज ठाकरेंनी प्रथमच शिवसेनेवर आणि राउतांवर तोफ डागली हे विशेष आहे. राउतांना तर उत्तरही सुचलं नाही.

In reply to by मदनबाण

भाऊ पत्रकार की प्रवक्ते?? त्यांना राज्यसभेतील खासदारकी, पद्मभूषण द्यायलाच पाहीजे. नसेल दिलं तर केंद्र सरकारचा निषेध, कानामागून आलेली कंगना पद्मभूषण पटकावून गेली.

असे दिसते की हिंदुफोबिया, इस्लामी व्हाईटवॉशिंग आणि रंगीबेरंगी विविधतेचे विकृतीकरण हे खरे तर भारतातील अनेक UPSC कोचिंग संस्थांचा एक महत्त्वाचा भाग बनवले गेले आहेत. आता अवध ओझा हे पेशाने वकील वकील असलेले प्राध्यापक(!?) शिकवत आहेत की ओसामा बिन लादेन कसा ग्रेट होता! या आधी व्हिजन आयएएस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. असे दिसते आहे की डावे लोक विकृती करण चालू ठेवण्यासाठी डाव्या लोकांची भरती आता कोचिंग संस्थांमध्ये करत आहेत. हा एक वेगळाच धोकाच तयार झाला आहे.

9 मार्चला भारताकडून अनवधानाने एक मिसाईल फायर झाले आणि ते पाकिस्तान मध्ये land झाले. ह्यमध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नसली तरी काही रहिवाशी इमारतींचे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तानने भडकाऊ भाषा न वापराता भरताकडे स्पष्टीकरण मागितले. साध्यच्या बतम्यांनुसार भारताने दिलगीरी व्यक्त करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सध्या कदाचित भारत आणि पाकिस्तान मध्ये पडद्याआड चर्चा चालू असण्याची शक्यता आहे. नाहीतर एरवी ही घटना मोठी केली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

असे अनावधानाने कसे होऊ शकते पण ? चेन ऑफ कमांड असणार ना काहीतरी ? डॉक्टर स्ट्रेंजलव्ह सिनेमा आठवला.

In reply to by रात्रीचे चांदणे

एक टाईम्स नाऊ सोडले तर इतर कोणत्याच माध्यमांत याबाबतची कोणतीच बातमी दिसत नाही.

लव्ह जिहाद प्रकरणातील एका भीषण घटनेत, कर्नाटकातील मोहम्मद इजाज याने त्याची पत्नी एमबीए पदवीधर असलेल्या अपूर्वा पुराणिक उर्फ ​​अरफा भानू हिला २३ वेळा भोसकले. मोहम्मद इजाज एक रिक्षा चालक आहे. मोहम्मद इजाज आधीच विवाहित आणि तीन मुलांचा बाप असल्याचे कळल्यानंतर घटस्फोट मागितल्याबद्दल मोहम्मद ने क्रूरपणे भोसकले. इजाज घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कर्नाटकातील गदग जिल्ह्यात गुरुवारी ही घटना घडली. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती शहरातील स्थानिक रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहे. इजाजने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर हिंदू परंपरा पूर्णपणे सोडायला लावल्या होत्या. अपूर्वाच्या कुटुंबानेही मुलीशी समेट घडवून आणला आणि मुलगी आणि इजाज यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यास सुरुवात केली. या जोडप्याला एक मुलगाही झाला. काही महिन्यांनंतर, अपूर्वाला कळले की इजाजने त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवली होती. वृत्तानुसार, इजाजने अपूर्वासोबत लग्नाआधीच एका मुस्लिम महिलेशी लग्न केले होते आणि त्याला तीन मुले झाली होती. ही माहिती त्याने लपवली होती. त्याबद्दल तिने जाब विचारला होता.

In reply to by निनाद

अशा लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारातील मुलींना जगात काय चालले आहे याविषयी काहीही माहित नसते. आणि दुसर्‍या प्रकारातील मुलींना सगळे काही माहित असते पण तरीही आपण किती उदारमतवादी, आपण किती धर्मनिरपेक्ष, आपण किती अमुक, आपण किती तमुक अशी क्रेडेन्शिअल्स जगापुढे दाखवायची त्यांना अनिवार इच्छा होत असते त्यातून त्या आपण होऊन तसे करतात. त्यापैकी दुसर्‍या प्रकारातील मुलींविषयी शष्प सहानुभूती नाही. सगळे काही माहित असूनही परत तसेच करणे म्हणजे स्वतःहून संकट ओढावून घेणे. तसे त्यांनी स्वत:हून केल्यास दुसरे कोण काय करणार? पहिल्या प्रकारातील हिंदू मुली फसू नयेत म्हणून काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांचा उपयोग होईल.

गुवाहाटीमध्ये बिकी अली आणि त्याच्या मित्रांनी अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. शिवाय आरोपी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांनी गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मुलीवर बलात्काराचा व्हिडिओ बनवल्यानंतर, बिकी अलीने तिला हॉटेलमध्ये जाण्यासाठी परत ब्लॅकमेल केले. ही मुलगी घाबरलेली असल्याने ती तेथे गेली. जिथे त्याने आणि इतर ४ जणांनी फैजूर अली, पुना अली, पिंकू अली आणि राजा अली यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गुवाहाटी पोलीस अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी बिकी अली, फैजूर अली, पुना अली, पिंकू अली आणि राजा अली नावाच्या पाच तरुणांचा शोध घेत आहेत. हे सर्वजण प्रौढ वयाचे असून, फरार आहेत. मुलीने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि लगेचच तिच्या पालकांनी शहरातील पानबाजार महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पीडितेने नाव दिलेल्या पाच जणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/sand-mafia-to-crush… ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे? ठाण्यात देखील, सरकारी कर्मचार्यावर जीवघेणा हल्ला झाला होता...

https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-maharashtra-deb… असे असूनही, राज्य सरकार म्हणत आहे की.......एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ; अर्थसंकल्पातील पंचसूत्रीतून ध्येय गाठण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास.... (https://www.loksatta.com/budget/maharashtra-budget-2022-state-aims-to-b…)

https://maharashtratimes.com/maharashtra/thane/in-kalyan-a-auto-ricksha… ह्या राजवटीत, उद्या कदाचित, चालतांना हेल्मेट का नाही? ह्या उदात्त कारणाने देखील दंड होऊ शकतो....

In reply to by मुक्त विहारि

याच दिशेने मुक्त विहारीजी प्रतिसाद देत राहिले तर- पावसामुळे चिखलात एक माणूस पाय घसरुन पडला. या राजवटीत आणखी काय काय पहावे लागणार आहे देव जाणे. असा प्रतिसाद लवकरच वाचायला मिळेल.

In reply to by कॉमी

कर घेऊनही, महाराष्ट्र राज्यात ह्या राजवटीत , रस्ते खड्डेमय होत राहिले तर, चुकी कुणाची? आमच्या डोंबोलीतलाच एक किस्सा आहे. मोटरसायकल चालवतांना, मागच्या सिटवरील व्यक्ती पडली तर, गुन्हा दाखल केला गेला तो, मोटरसायकल चालवणार्यावर .... अर्थात, तेंव्हा भाजप सरकार असल्याने, योग्य तो न्याय, मोटरसायकल चालवणार्याला मिळाला....गुन्हा काढून घेतला.... बाय द वे, घडामोडी मी घडवत नाही आणि छापील बातमीच देतो ... आपण टेंशन घेऊ नका ...

In reply to by कॉमी

खीक्क. मुलीकाकानी रशिया- युक्रेन युध्दाबाबत आघाडी सरकारला जबाबदार धरलं नाहीये ह्या बद्दल त्यांचे मिपाप्रशासनाने आभार मानायला हवेत.

'जब तक जिंदा हुं, आप के घर को आंच नही आने दूंगा'; जितेंद्र आव्हाडांचे आश्वासन https://maharashtratimes.com/maharashtra/thane/minister-jitendra-awhad-… जागा कुणाची? अतिक्रमण कुणाचे?

राज्य सरकारनं अकार्यक्षम कंत्राटदार नेमून पैशांची नासाडी करू नये; मुंबई न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/mumbai-high-c… ह्या राजवटीत, हे देखील कोर्टाने सांगायची वेळ झाली आहे ...

नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाला ब्रेक https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/uddhav-thackeray-government… घातला खोडा.... मेट्रोच्या कारशेडचे काम अजूनही रेंगाळलेच आहे .... चांगले काम स्वतः काही करणार नाहीत आणि केंद्र सरकारला करू देणार नाहीत ...

“देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार,” रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा https://www.loksatta.com/maharashtra/raosaheb-danve-announced-that-gove… अतिशय उत्तम निर्णय ..... केंद्र सरकार जनतेसाठी चांगले काम करत आहे ...

In reply to by मुक्त विहारि

आमदार बिजू जनता दलाचा, घटना ओरीसातील ह्यात राहूल गांधी कुठून आले?? आणी समजा आले तरी ते काय प्रतिसाद देणार? काका तुम्हाला ताप वगैरे आला असेल तर वेळेवर गोळ्या घेत चला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरेच काही प्रतिसाद देत होते... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, काही घटना मुद्दामच नजरेआड करतात, तर काही घटना मुद्दामच नजरेसमोर आणतात .... बाय द वे, आमच्या तब्येतीची काळजी करण्याची, तुम्हाला काहीही गरज नाही. मी तुमचा आश्रित नाही किंवा गुलामपण नाही.... तुमचा हा प्रतिसाद व्यक्तीगत पातळीवर येत असल्याने, ह्यापुढे, मी अशा व्यक्तीगत पातळीवर आलेल्या प्रतिसादांना उत्तर देत बसणार नाही ...

ह्याविषयी, कालच्या 'द प्रिंट'मधे ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता ह्यांनी एक प्रदीर्घ लेख लिहीला आहे. थोडक्यात, त्यांची उपाययोजना अशी:
Three lessons then. To beat the BJP, you either deny it the critical mass of the Hindu vote, or build a regional leader and party strong enough to protect their turf. And third, the best of all, have a regional, ethnic and linguistic fortress so strong that the Hindus vote primarily as Tamils or Malayalis or Telugus. This will be put to test in the next Telangana elections. But, in the big picture, here is evidence to show how the BJP can be beaten if you get your politics right.
ह्यांतील तिसरा उपाय पहावा: प्रादेशिक, वर्णवादी, व भाषिक पायांवर पुढील वेळी मतदान घडवता आले पाहिजे. म्हणजे, दे॑शांतील फुटीरता अजून वाढो, हरकत नाही. पण भाजप हरली पाहिजे ! ह्या त्यांच्या आवाहनाबद्दल, उदारमतवादी काय म्हणतील, हे पहाणे रोचक ठरावे.

In reply to by प्रदीप

प्रादेशिक, वर्णवादी, व भाषिक पायांवर पुढील वेळी मतदान घडवता आले पाहिजे. हेच त्यांचे मुख्य स्जस्त्र आहे. फोडा आणि राज्य करा. आणि काहीही झाले तरी हिंदू एकत्र नाही आला पाहिजे! शेखर गुप्ता हा भयानक माणूस आहे हे मी वारंवार सांगतो आहे आणि ते यामधून सिद्ध होते.

In reply to by प्रदीप

Bjp च विजय हा हिंदू एकवटल्या मुळे होतो. आणि bjp चे प्रचार तंत्र तेच आहे हे उघड सत्य आहे . BJP च पराजय करायचा असेल तर हिंदू मध्ये फूट पाडणे आवशकय आहे. त्या साठी योग्य भूमी प्रादेशिक अस्मिता मध्ये तयार आहे उत्तरेतील राज्यातून अनियंत्रित स्थलांतरित लोक दक्षिण भारत आणि पश्चिम भारतात होत आहे त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की दक्षिण भारत आणि महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे संस्कृती चे अस्तित्व,भाषेचे अस्तित्व, परंपरेचे अस्तित्व,रोजगार चे अस्तित्व हे सर्व धोक्यात आल्याची भावना ह्या राज्यात सुप्त स्थीती मध्ये आहे. केंद्रीय स्तरावर हा प्रश्न सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. मागास उत्तरेतील राज्यात रोजगार निर्मिती चे प्रयत्न पण होत नाहीत. उलट प्रगत राज्यांना मीडिया टार्गेट करत असते. अशा ह्या सुप्त ज्वलंत विषयाला फक्त काडी लावण्याचा अवकाश ते राष्ट्रीय पक्षा पासून लांब जातील. आणि हिंदुत्व पण हे लांब जाणे थांबवू शकणार नाही. Bjp च सहज पराभव होइल

अलाहाबाद उच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी मथुरा येथील शाही इदगाह मशिदीला कृष्ण जन्मभूमी – हिंदू देवता कृष्णाचे जन्मस्थान म्हणून मान्यता देण्याच्या मागणीसाठी वकील महेक माहेश्वरी यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे. वकील महेक माहेश्वरी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात कृष्ण जन्मभूमीवर बांधलेली शाही इदगाह मशीद हटवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. ही जागा हिंदूंच्या ताब्यात देण्यात यावी, तर पवित्र स्थळाच्या देखभालीसाठी योग्य ट्रस्ट तयार करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, याचिकेत हिंदूंना आठवड्यातून काही दिवस आणि दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला येथे पूजा करण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. १६६९ मध्ये क्रूर इस्लामिक आक्रमक हल्लेखोर औरंगजेबाने मंदिर उध्वस्त करून मशीद बांधली होती पण ती वापरात नाही. मथुरा जिल्ह्याच्या सरकारी अधिकृत संकेतस्थळावरही शाही इदगाह मशीद कृष्णजन्मभूमीच्या विध्वंसानंतर बांधण्यात आल्याचे नमूद केले आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या प्रांगणात कोरीव खांब आणि पुरातन वास्तू यांसारखे काही वास्तुशास्त्रीय पुरावे सापडले होते. अखिल भारत हिंदू महासभेने शाही ईदगाहमधील जागेवर भगवान कृष्णाची मूर्ती बसवण्याची घोषणा केली आहे. येथील खासदार हेमा मालिनी आहेत त्या म्हणाल्या आहेत - राम जन्मभूमी झाली आहे. श्री काशीचा विकास अशा अप्रतिम पद्धतीने होत आहे. साहजिकच मथुराही महत्त्वाची आहे.

मेट्रो आता पुढची पाच वर्षे होऊ शकत नाही”; कारशेडच्या जागेवरुन देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका https://www.loksatta.com/mumbai/devendra-fadnavis-criticizes-the-govern… हा अंदाज काही लोकांनी आधीच वर्तवला होता....

“…पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल”; नाना पटोलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण! https://www.loksatta.com/maharashtra/the-next-chief-minister-will-be-fr… आणि नंतर देखील ..... हिंदू हितवादी भाजपला, सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच, सध्या मुख्यमंत्री कॉंग्रेसचा आहे... हिंदू एकजूट होऊ नयेत, ह्यासाठी कॉंग्रेस जीवापाड मेहनत घेते....

In reply to by मुक्त विहारि

इथे, बिगर कॉंग्रेसी आहे, असा बदल करून हवा आहे

https://www.tv9marathi.com/national/congress-executive-meeting-held-on-… जनतेवर, आणीबाणी लादलेला पक्ष, आता स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे...

मतदारांना धमकावण्यासाठी काही नेते विभागातील पाणी बंद करतात; मी त्यांची हाडं मोडून टाकेन: जितेंद्र आव्हाड https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/i-will-break-your-… महिलांना त्रास देण्याचं काम जे करतात त्यांची हाडे मी तोडून टाकेल अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.... --------- ह्यालाच, अहिंसक भाषा म्हणायचे का? जनतेने निवडून दिलेला नेता, अशी भाषा कशी काय बोलू शकतो? इथे प्रश्र्न कुठल्याही पक्षा बाबतीत नाही ... भाजपचा नेता असता तरी, माझी भूमिका हीच असती... सार्वजनिक ठिकाणी बोलतांना भाषेवर संयम हवा... सार्वजनिक ठिकाणी बोलतांना कसे बोलावे? ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, माननीय शरद पवार...शरद पवार यांची धोरणे पटत नसली तरी, ह्या बाबतीत, ते खरेच आदर्श नक्कीच आहेत ...

भारताने पर्वतीय युद्धात वापरता येतील असे भारतात बनवले जाणारे आणि हलके रणगाडे विकसित करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. याचे आरेखनही भारतीय असणार आहे. लार्सन अँड टुब्रो ने १५५ मिमी हॉवित्झर तोफ बनवली आहे. कल्याणी स्टीलने ही लष्करासाठी भारतीय तोफ बनवली आहे. लार्सन अँड टुब्रो ची तोफ वज्र नावाने वितरीत केली जाते आहे. सैन्याने लार्सन अँड टुब्रो सोबत २०१७ मध्ये वज्र तोफ पुरवण्याचा करार केला होता. यावर वेगवान गतिने काम करून २०२१ पर्यंत, लार्सन अँड टुब्रो शेवटचे शंभर K९ वज्र हॉवित्झर मुदतीच्या आधीच वितरीत केले आहेत. आता या वज्र तोफेला हलक्या रणगाड्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी डीआरडीओसोबत काम चालले आहे. यासाठी कदाचित तोफ बदलून १०५ मिमी किंवा १२० मिमी तोफा वापरण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने चीनी सीमा विवाद नंतर हलके रणगाडे विकसित करण्याची गरज जास्त भासली आहे. पर्वतीय युद्धासाठी लष्कराला किमान ३५० हलके रणगाडे हवे आहेत. यामध्ये विमानविरोधी आणि जमिनीवरील भूमिकेसाठी अनेक शस्त्रे, प्रगत बहुउद्देशीय स्मार्ट युद्धसामग्री आणि गन ट्यूब प्रक्षेपित अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे असणार आहेत. याशिवाय थर्मल नाईट फायटिंग क्षमता आणि व्हिज्युअल, ऑडिओ/अकॉस्टिक, थर्मल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वाक्षरी दाबण्याची क्षमता यासारख्या गुप्त वैशिष्ट्यांचा समावेश केलेला असणार आहे. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये सध्याचे वजनदार टि-९० आणि टी-७२ रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहने तैनात केली होती. लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्सच्या रशियन रणगाड्यांचे वजन ५० टन इतके असते. नवीन भारतीय बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांचे वजन ६८.५ टन आहे. तोफखान्याचे माजी महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल पीआर शंकर यांनी भारतीय वज्र या तोफेला हलक्या रणगाड्यात रूपांतरित करण्याची सूचना केली होती. ही सूचना स्विकारली गेली.

In reply to by निनाद

तुम्ही हे हलके रणगाडे म्हणताय ते विकसित करण्यास तत्वतः मान्यता ही २०२१ मधेच मिळाली आहे की डीआरडीओला सरकारकडून. मुळात के-९ टी (थंडर) हे "सेल्फ प्रोपेल्ड होवित्झर" श्रेणीतील शस्त्र-वाहन आहे, थोडक्यात बोफोर्स सारखी तोफ स्वतःच फिरू शकेल अशी डिझाईन कन्सेप्ट आहे ती. के-९ टी हे दक्षिण कोरियन प्रॉडक्ट असून तिचा विकास सॅमसंग ऐरोस्पेस ह्या दक्षिण कोरियन कंपनीने १९९९-२००० साली केला, नंतर ह्या कंपनीचे नाव अनुक्रमे हान-वा टेकविन अन हान-वा लँड फोर्सेस करत करत आता हान-वा डिफेन्स असे असून त्यांच्याकडे ह्या तोफ/ रणगाड्याचे पेटंट आहे. २०१२ साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष ली म्युन्ग बाक ह्यांच्या उपस्थितीत तांत्रिक आणि सामरिक सहकार्य वाढीस लावण्याचा करारमदार झाला होता भारत आणि दक्षिण कोरिया मध्ये, त्या करारानंतर चार दिवसांनीच लार्सन अँड टूब्रो -सॅमसंग टेकविन ह्यांचं ह्या तोफा निर्माण करण्याचा करार पक्का झाला होता, कराराच्या कलमानुसार नुसार ५०% सामुग्री भारतीय असणार (त्यात फायर कंट्रोल सिस्टम उर्फ एफसीएस पण अंतर्भूत) आणि सॅमसंग टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार असे ठरले होते, त्यानंतर २०१५ पर्यंत ह्या तोफेच्या विविध चाचण्या पुणे, राजस्थान, बंगलोर इथं होऊन ती तोफ भारतीय थलसेनेच्या ऑपरेशनल रिकवायरमेंट्सच्या स्टँडर्डवर खरी उतरते का नाही ते तपासले गेले होते. ह्याच्यानंतर २०१५ सप्टेंबरमध्ये सरकारने हान-व्हा टेकविन आणि लार्सन अँड टूब्रोला बिडींग मध्ये निवडून अश्या शंभर तोफा पुरवण्याचे $७५० मिलियनचे कंत्राट दिले ज्यांची बांधणी एल अँड टी अंडर लायसन्स करणार होती. तुम्ही वर म्हणाला तसे त्यानंतर ह्या तोफांचे प्रॉडक्शन सुरू होऊन २०२१ मध्ये ह्या सिरीज मधली शंभरावी तोफ थलसेनेला सुपूर्द करण्यात आली होती.

In reply to by जेम्स वांड

हलके रणगाडे म्हणताय ते विकसित करण्यास तत्वतः मान्यता ही २०२१ मधेच मिळाली आहे की डीआरडीओला सरकारकडून. होय खरे आहे. अधिक माहिती पण चांगली आहे - धन्यवाद! घडामोड अगदी ताजी नसली तरी लक्ष्यवेधी आहे असे वाटले. आपल्याकडे साधारणपणे टाका बाँब करा आक्रमण अशी चर्चा असते. त्या ऐवजी धोरणात्मक आणि संसाधणे संपादीत करायला किती वेळ लागतो, किती मेहेनत असते यावरही प्रकाश पडावा ही धारणा होती. खाजगीकरणातून कंपनीने चांगले काम केले असेल तर ते ही दिसून यावे. फार चर्चा झाली नाही तरी तुम्ही योग्य प्रतिसाद दिला आहे. त्या निमित्ताने मराठी भाषेत या संरक्षण विषयाची एक नोंद होते हे ही कमी नसे असे वाटते.

बेंगलोर कोर्टाने शिक्षण संस्थेतील बंदीला आव्हान देणाऱ्या विविधयाचिका फेटाळली आहेत, कोर्टा नुसार हिजाब हा इस्लाम चा अत्यावश्यक भाग नाही. कोर्टाने पुढे असेही म्हटले आहे की गणवेशावरील निर्बंधावर शालेय विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत. हे एक बरे झाले नाहीतर आज हिजाब उद्या बुरखा शाळेत आला असता आणि त्याला उत्तर म्हणून भगवं/निळं/पिवळं उपरणी शाळेत आली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

शाळेत शिक्षणाला महत्व आणि धार्मिक शिक्षण हवे असेल तर, त्या ठिकाणी शिक्षण घेणे उत्तम ... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, वेदपाठ शाळेत धोतर आणि शेंडी तर शाळेत, शाळा ठरवेल तो यूनिफार्म....

मुंबई हायकोर्टाने सुनावणी करताना
ई डी ने केलेली कारवाई ही कायदेसंमत कायदेशीर रित्या केलेली असून सदरहू केसमध्ये इंटरीम रिलीफ दिला जाणार नाही व न्यायालयीन कोठडी सुरूच राहील असा निर्वाळा दिला आहे

फेब्रुवारीच्या महिन्यात, केरळचे राज्यपाल, श्री. अरीफ महमद खान ह्यांच्या लक्षांत आले की तेथे सरकारांत, प्रत्येक मंत्र्याकडे २० पेक्षाही जास्त 'वैयक्तिक कर्मचारी' आहेत. त्याहून पुढचे, त्यांच्या हेही लक्षांत आले की अशा वैयक्तिक कर्मचार्‍यांना केवळ २ वर्षे त्या स्थानावर काम केल्यावर आयुष्य्भर पेन्शन सरकारतर्फे देण्यात येते ! खानसाहेबांनी ह्यावर असाही आरोप केला की, अशा तर्‍हेने, स्वतःच्या राजकीय पक्षांत भरती करण्यात येत आहे. ते म्हणाले की हा मंत्र्यांचा वैयक्तिक कर्मचार्‍यांचा जथा, मुख्यत्वे राजकीय पक्षांसाठी काम करणारा असून, त्यांना अशा तर्‍हेने, सरकारी तिजोरीतून आयुष्यभराची पेन्शन देण्यात येते. हा अर्थात सरकारी खजिन्यावर अनावश्यक, व अभूतपूर्व ताण असल्याने, त्यांनी तेथील सरकारास हे थांबवण्याची सूचना केली आहे. ह्यासंबंधीची बातमी इन्डियन एक्स्प्रेस्मधे वाचून, एका वेगळ्याच केसमधे--जिथे केरळ राज्य परिवहन निगमने, डिझेल विकणार्‍या सरकारी कंपन्यांवर, जास्त भाव आकारणीच्या संदर्भांत सर्वोच्च न्यायलयापुढे याचिका दाखल केली होती-- त्या न्यायलयाच्या जजेसनी, सदर गैरव्यवहाराविषयी कडक भाष्य केले. 'तुमच्या सरकाराकडे असल्या उधळपट्टीसाठी पैसा आहे, तर मग तुम्ही इथे आमच्यापुढे ही याचिक घेऊन का आला आहात?' असे त्यांनी सांगून ही याचिका फेटाळून लावली.

https://mpcnews.in/attempt-to-commit-suicide-by-fb-live-of-a-girl-accus… आता, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, ह्या प्रकरणात काय Action घेतात? हे बघणे रोचक ठरेल ....

काँग्रेस नेते कपिल सिब्बल ह्यांचा गांधी घराण्यावर थेट हल्ला
गांधी घराण्याने पायउतार होऊन आता इतरांना चान्स द्यावा असे त्यांचे म्हणणे आहे

In reply to by जेम्स वांड

इतकी वर्षे हे स्वतः गांधी घराण्याची इमानेइतबारे सेवा करत होते तेव्हा त्यातून आपल्या पक्षाचे नुकसान होत आहे हे त्यांना समजले नव्हते का? इतकी वर्षे गांधी घराण्याच्या पालख्या वाहिल्या आणि आता अचानक टीका करायला लागले याची प्रेरणा काय असावी हे समजत नाही. ही पश्चातबुध्दी समजावी का? काहीही असले तरी काँग्रेस ही एक गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता असल्यासारखे झाले आहे आणि इतर कोणतेही नेतृत्व गांधी घराण्याने उभे राहू दिलेले नाही. इतकी वर्षे त्या घराण्यातील लोक मते घेऊ शकत होते त्यामुळे चालून गेले. पण आता बोंब नेमकी तिथे झाली आहे. सर्वोच्च पदावरील गांधी मते मिळवायला अक्षम आहेत आणि मते खेचू शकणारा इतर नेता नाही. त्यामुळे वाटचाल जरा कठीण दिसते. तसा भाजपही २००९ च्या (खरं तर २००४ च्याच) पराभवानंतर भरकटला होता पण संघाच्या कार्यकर्त्यांचे दिमतीला असलेले जाळे कुठेच गेले नव्हते आणि कोणा घराण्याचे/व्यक्तीचे स्तोम पक्षाने वाढू दिले नव्हते. त्यामुळे २०१३ मध्ये मोदी हा नेता राष्ट्रीय पातळीवर पुढे आल्यावर अक्षरशः कायापालट घडला. अगदी जनसंघाच्या दिवसांपासून हजारो-लाखो कार्यकर्ते राबले आणि पाया तयार केला त्या पायावर मोदींनी पक्षाला दोनदा बहुमत मिळवून दिले. काँग्रेसकडे या सगळ्या गोष्टींची वानवाच आहे. त्यामुळे कायापालट व्हायचा असेल तर होणार कसा आणि करणार कोण हा प्रश्नच आहे. तरीही कॉंग्रेस पक्ष लगेच संपणार्‍यातला नाही. इतकी पडझड झाली असली तरी पक्षाला २०१९ मध्ये जवळपास १२ कोटी मते पूर्ण देशात मिळाली होती. भले त्यातील काही तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या कृपेने मिळाली असतील तरीही १० कोटींपेक्षा जास्त मते स्वतःची मते आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. त्यातील अगदी अर्धी मते जरी कमी झाली तरी २०२४ मते प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसकडे सरासरी एक लाख मते असतील. आणि अर्थात ही सरासरी असल्याने काही मतदारसंघांत त्याहून कमी असतील तर काही मतदारसंघात त्याहून जास्त असतील. म्हणजेच काँग्रेसची स्वतःची दोन अडीच लाख मते असणारे अनेक मतदारसंघ देशात असतील. आताच इंडियाव्होट्सवर बघितले त्याप्रमाणे २०१९ मध्ये देशातील ३०५ मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवाराची आघाडी २ लाखांपेक्षा कमी होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की काँग्रेस लगेच काही संपत नाही आणि अजूनही आपल्याला विरोधी आघाडीत न घेतल्यास त्या आघाडीला नुकसान पोचविण्याइतकी पक्षाची क्षमता आहे.