Skip to main content

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 08/01/2022 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-…

वाचने 47797
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

गेल्या महिन्यात ज्या २ घटना [ १] पार्कर प्रोब ने सूर्याच्या करोना मधुन प्रवास केला. २] जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप चे अवकाशात प्रक्षपण. ] माझ्या पाहण्यात आल्या त्या संबंधी मी पाहिलेले व्हिडियो इथे देत आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप च्या प्रवासाची लाईव्ह फिड इथे पाहता येईल. :- अवांतर :- बरेच दिवस मी एका मिपाकर आयडी ची फार आठवण काढत होतो... म्हणजे त्यांचे नाव आठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही केल्या ते आठवतच नव्हते ! पण आत्ता आचनक मी स्वतःचेच मिपावरचे ग्रह तार्‍यांवर दिलेले प्रतिसाद शोधण्याच्या प्रयत्नात अचानक मला तो मिपाकर सापडला. मी सर्च केले "ग्रह misalpav मदनबाण" तेव्हा सर्च रिझल्ट मध्ये संवेदना https://savedanaa.blogspot.com/2012/04/blog-post_14.html हा ब्लॉग आलेला दिसला आणि त्या मध्ये मला माझी आयडी नमुद असलेली दिसली, सहज उत्सुकता चाळावली म्हणुन लिंक उघडली आणि भोचक मला परत जालिय स्वरुपात मिळाले. हा त्यांचा ब्लॉग :- https://bhochak.blogspot.com/ रस्त्यावरील अपघातात या मिपाकराला मिपाकर मंडळी कायमची गमावुन बसली ! दुसर्‍या दिवशी विकास काकांनी या घटनेमुळे रस्त्यावरील अपघात हा धागा लिहला होता. भोचक यांचे मिपावरील सर्व लिखाण इथे पाहता येईल :- http://www.misalpav.com/user/680/authored जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)

सहमत आहे पोटे चंपाबाई उद्दाम हे त्यापैकीच काही .... हे सगळेच, माझ्यावर चांगलेच प्रेम करायचे .... नंतर बिचारे गायब व्हायचे ...

https://www.lokmat.com/jarahatke/sun-burn-out-will-turn-frozen-sun-says… फार गंभीर बातमी आहे. सर्वानी काळजी घ्यावी. हे काय चाललंय आघाडी सरकारच्या काळात?? मला तरी भाजपशीवाय पर्याय नाही. - भक्तविहारी.

उत्तरप्रदेशातील आणि इतर राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले. करोना, ओमायक्रॉनमुळे प्रचार रॅल्यांना, संभांना बंदी असे असणार आहे, तेव्हा माध्यमं असतील ऑनलाईन आणि इतर अ‍ॅप्लीकेशन्स त्यावर प्रचाराचां भडीमार दिसणार आहे. प्रासंगिक, धार्मिक, सामाजिक, विकासाचे मुद्यांचं घमासान विविध जाल माध्यमांवर असणार आहेत, तेव्हा प्रचारात आघाडी अर्थात भाजपाची असेल आणि ते सर्वात पुढे असतील. समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, काँग्रेस यांना कंबर कसावी लागणार आहे, असे असले तरी उत्तरप्रदेशात इतर पक्षांचे सरकार येईल असे वाटत नाही, हा केवळ अंदाज. मागील निवडणुकीत बहुमताच्या आकड्यांपेक्षा शंभराने अधिक आघाडी भाजपाने घेतलेली होती. शेतकरी आंदोलन, केंद्रीय मुद्दे, राज्यसरकाराचे मुद्दे, याने तो अधिकचा आकडा कमी झाला तरी सरकार अल्पमतात येईल असे चिन्ह नाही. 'रिकाम्या खुर्च्या ते सुरक्षेतील त्रुटी' या सर्वांचा फायदा कोणाला होईल कसा होईल हे येत्या काळात दिसून येईल. भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते माध्यमांची ताकद मोठी असते, ती पुढे वाढतच जाणार आहे, या माध्यमांचा वापर उपयोग जनतेच्या हक्कांसाठी व्हायला हवा. तसा झाला नाही तर अनागोंदी माजेल आणि या माध्यमांवर गदा येईल असे वाटते, त्या सर्वच दृष्टीने ही निवडणूक वेगळी ठरेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुप्रभात सर. तुमच्या विचाराचे मोती थोडे आमच्याकडे पण टाका.
भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते
हे एकाच बाजुने होते आहे का?

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल.
मतं खेचण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीनंतर कोरोना चर्चांना बंदी असेल.

चंडिगड चंडिगड महापालिकेत काल महापौर पदासाठी निवडणुक झाली. अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत ३५ पैकी आपला १४, भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि अकाली दलाला १ जागा मिळाली. महापालिकेत कोणालाही बहुमत न मिळाल्याने महापौर पद कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट नव्हते. निवडणुक झाल्यानंतर काँग्रेसच्या ८ पैकी १ नगरसेविका भाजपमध्ये सामील झाली. त्यामुळे आपला १४ आणि भाजपला १३ अशी स्थिती आली. काँग्रेस-अकाली दलाने आपला पाठिंबा दिला असता तर आपचा महापौर निवडून आला असता. पण या दोन्ही पक्षांनी मतदानात भाग घेतला नाही. कारण स्पष्ट आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि त्यात आप या दोन पक्षांचा प्रतिस्पर्धी आहे. मग ते आपल्याच प्रतिस्पर्ध्याला मदत कशी करतील? चंडिगडच्या महापालिका नियमाप्रमाणे स्थानिक खासदार महापालिकेचा पदसिध्द सदस्य असतो. भाजपच्या किरण खेर चंडिगडच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांचे मत भाजपला जाऊन १४-१४ अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात आपच्या एका नगरसेवकाचे मत अपात्र ठरले. त्याचे कारण कळले नाही. पण त्यामुळे चंडिगडमध्ये भाजपला महापौरपद मिळाले. गोवा गोव्यात ममता बॅनर्जींनी प्रचाराचा झंझावात चालवला आहे. सगळीकडे तृणमूलचे बोर्ड आणि फ्लेक्स दिसत आहेत अशा बातम्या आहेत. असे करून भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपलाच होईल अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-tmc-mamata-ba… तसेच आप हा बाहेरचा पक्षही काँग्रेसच्या वाटेत काटे पेरत आहे अशी टीकाही राऊतांनी केली. आतापर्यंत शिवसेना ममता बॅनर्जींचे कौतुक करत आली आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या तेव्हा शिवसेनेने त्यांचे स्वागत केले होते. पण आता त्याच ममता बॅनर्जींंवर टीका केली जात आहे. एक गोष्ट कळत नाही. तृणमूल बाहेरचा, आप बाहेरचा पण शिवसेना हा महाराष्ट्रातील पक्ष गोव्यात विधानसभा निवडणुक लढवायचे मनसुबे करत आहे तो पक्षही बाहेरचाच आहे की. तो कुठे गोव्यातला पक्ष आहे? पण त्याविषयी राऊत काही बोलणार नाहीत. चंडिगडच्या महापौर निवडणुकीत किंवा गोव्यात विधानसभा निवडणुकीत अशी टीका शिवसेनेने तृणमूल-आपवर केली या त्यामानाने लहान गोष्टी आहेत. पण यातून एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत आहे आणि लोकांसमोर येत आहे. एका शहराच्या महापौर निवडणुकीत म्हणजे खूपच लहान निवडणुकीतही हे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. गोवा हे राज्य असले तरी मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने खूप लहान आहे. गोव्यातील विधानसभा मतदारसंघात आहेत त्यापेक्षा मुंबई महापालिकेतील एकेका वॉर्डात अधिक मतदार आहेत. तेव्हा गोवा विधानसभा निवडणुक एकूण राष्ट्रीय पातळीचा विचार केला तर खूप लहान आहे. अशा लहान निवडणुकांमध्येही हे पक्ष एकत्र यायला तयार नाहीत तर आपापसात भांडत आहेत. मग २०२४ मध्ये हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडी उघडणार यावर लोकांचा कसा विश्वास बसणार? आणि जरी अशी आघाडी झाली तरी ती कितपत स्थिर असेल हा प्रश्न उभा राहणारच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कितपत विश्र्वासार्हता असणार? 1978 च्या वेळी, भाजप आणि शेकाप मिळून, सरकार स्थापन झाले होतेच की.... पहिल्या दिवसापासूनच, मोरारजी आणि चरणसिंग, यांच्यात पंतप्रधान पदासाठी रस्सीखेच सुरू झाली...

In reply to by Trump

मोदींची चहावाला सामान्य माणूस ही इमेज वापरून घ्यायला भाजपने ह्या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवून अतिशय कल्पक वापर केला होता, त्यावेळी रॅली उर्फ चाय पे चर्चा करायला भाजपचे बूथ कार्यकर्ते भिडले होते, ते वॉर्डनिहाय पेंडॉल सेट करत, तिथं गरम चहा आणि प्रसंगी अल्पोपहार असे बहुतकरून फक्त चहा आणि त्याच्यासोबत एकतर नेतृत्वाचे पक्षी मोदी, शहा आणि इतर गणमान्य नेत्यांचे भाषण एकतर लाईव्ह किंवा प्री रेकॉर्ड, त्याचेच विस्तारीकरण असेल डिजिटल रॅलीज असे वाटते मला.

In reply to by जेम्स वांड

ह्म्म ट्विटरवर बरेचदा मी काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत #टॅग असतात. तोही त्यातलाच प्रकार असावा. पण त्याच्या परिणामांबद्दल सांशक आहे.

शिवसेनेची फक्त 1100 मतं, भाजपची साथ मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना आमदाराचं वक्तव्य https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-sangola-shah… -------- हळूहळू वाचा फुटायला लागली...

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले, “हे सरकार गेंड्यापेक्षाही….” https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-patil-reaction-on-new-… प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं....ह्या बाबतीत सहमत आहे....

अलिबाग कुलाबा किल्ल्यावरील अनाधिकृत मदार हटवा; सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वंशजांची मागणी.... https://www.lokmat.com/raigad/remove-unauthorized-madar-alibag-colaba-f… अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सागरी राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या कुलाबा किल्ल्यावर एक नवीनच प्रार्थनास्थळ उभे राहिल्याकडे आंग्रे यांनी लक्ष वेधले आहे.. -------- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशानुसार, मलंगगडावर, शिवसैनिक गोळा झाले होते.......

हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; Video व्हायरल झाल्यावर मागितली माफी.... https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/jawed-habib-hair-s… काय बोलावं ते सुचेना ....

In reply to by मुक्त विहारि

तो भाजप पक्षात आहे सर. पुढील निवडणूकीत तुम्ही भाजपला मत न देऊन धडा शिकवू शकतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

48 घंटे में बंद करें जावेद हबीब के सभी सैलून वरना...' : BJP विधायक (https://www.google.com/amp/s/ndtv.in/india-news/bjp-mla-from-indore-aka…) ------- जावेद हबीब पार्लर के खिलाफ फिर उठी आवाज, महिला भाजपा नेता ने की सीएम से बंद करने की मांग (https://www.google.com/amp/s/www.livehindustan.com/madhya-pradesh/story…) ------- निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तेंव्हा त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काय केले? ----- असो, आपल्या घराणेशाहीच्या निष्ठेपुढे, मी कधीच नतमस्तक झालो आहे ...

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त ----- https://www.lokmat.com/national/shocking-modis-boat-stopped-pakistani-b… ------- विशेष म्हणजे, जेथून ही पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तेथूनच सतलुज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. अनेकदा येथूनच तस्करी करणाऱ्यांना अमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. तर, या प्रदेशात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येते. फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील प्रदेश आहे....

In reply to by मुक्त विहारि

ज्या रस्त्याने मोदी जाणार हे नक्की झाले तो अकस्मात निर्णय होता. मोदी अमक्या रस्त्याने जाणार हे समजल्याबरोबर पाकिस्तान सिमेतून बोट घुसली? आणि मग सीमा सुरक्षा दल काय पाकिस्तानी बोटीला वाजत गाजत आणायला ठेवलं आहे का?

In reply to by सर टोबी

अकस्मात निर्णय त्या लेव्हल ला घेतले जात नाहीत. SPG ने आधी जी पत्रे पोलिसांना पाठवली होती त्यात पाऊस असण्याबद्दल आणि alternate रूट तयार ठेवण्याबद्दल उल्लेख होता. An important disclosure has been made in the ASL report regarding the lapse in security of PM Modi in Punjab. The ASL report states that on January 1, when the talks between the SPG and Punjab Police took place, all the options were considered. On January 3, a letter was also sent by the SPG to the Punjab Police, in which information about all alternate routes was shared due to bad weather. At the same time, the Punjab government had said that the PM had suddenly made a plan to go by road, but everything had already been discussed. This information has been given in page 23 of the ASL report prepared by the SPG after the detailed ASL meeting. ADGP Punjab Police Incharge of Security Arrangement, IG CI Punjab, IGP Ludhiana Range, DIG Ferozepur, DC Ferozepur, SSP Ferozepur and other officers participated in the ASL meeting. VVIP was a part of the contingency route security arrangement and it was discussed in the ASL meeting. Detailed instructions are listed in the ASL report on how to secure a VVIP emergency route. Page 24 of the SL report also mentions that ‘alternate routes will also be identified and rehearsed’. Page 24 further mentions that ‘there are also some villages on the way’. There is a possibility of congestion on the route, so proper measures should be taken to control the crowd. Police personnel with ropes can also be deployed at sensitive places to control the crowd. It is again mentioned at the bottom of page 24 that there is a possibility of road movement from Bathinda to Firozpur due to bad weather conditions. Therefore, all the police stations coming in the middle of the way should be alerted.

In reply to by सर टोबी

अर्थात पाकिस्तानी बोट वगैरे प्रकार निरर्थकच असावेत याबद्दल सहमत. माझे उत्तर फक्त अकस्मात निर्णयाबद्दल होते.

आंध्र प्रदेश: कुर्नूलमध्ये मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाला विरोध केल्यानंतर इस्लामवाद्यांनी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मुस्लिम गटाने पोलिस ठाण्याचा घेराव करून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारात श्रीकांत रेड्डी यांच्या कारचे नुकसान झाले. मुस्लिम जमावाने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवरही दगडफेक केली. आत्मकूर येथील पद्मावती शाळेच्या मागे मशीद बांधण्यावरून वाद सुरू आहे. बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.

In reply to by निनाद

ह्यासाठीच, आमच्या सारख्या अशिक्षित पण हिंदू हितवादी लोकांना, भाजप शिवाय पर्याय नाही...

जागतिक रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजना तयार केली आहे. रोबोटिक्ससाठी जागतिक केंद्र बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजनेचे अनावरण केले आहे. सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल पॅनेल सारख्या प्रमुख घटकांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. स्पीड रिड्यूसर, सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल्स यांसारख्या मुख्य रोबोट घटकांमध्ये यश मिळविण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील

In reply to by निनाद

ह्या असल्या बातम्या पाहिल्या की आपण किती वर्षे मागे आहोत त्याची जाणीव होते.

गोव्यात आम्ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले पण काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-sanjay-raut-reaction-befo… आता गोव्यात राष्ट्रवादीबरोबर युती करून शिवसेना निवडणुक लढवणार आहे. शिवसेनेची गोव्यात ताकद शून्य आहे. आतापर्यंत एकदाही स्वबळावर एकही जागा जिंकणे तर सोडूनच द्या इतर कोणाबरोबर युती करूनही शिवसेनेने कधी विधानसभेची जागा जिंकलेली नाही. शिवसेनेने स्वबळावर एकदाही आपल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवलेले नाही. तर राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर युती करून २००७ मध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून गेले होते. पण हे गृहस्थ स्वयंभू आहेत. त्यांना जिंकायला राष्ट्रवादी पक्षाचा उपयोग शून्य झाला होता असे म्हटले तरी चालेल. आता तेच तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. पूर्वी एकदा माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. पण त्यांचे निधन होऊनही सहा-सात वर्षे उलटली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडेही नाव घेण्याजोगा एकही नेता राज्यात राहिलेला नाही. अशा दोन पक्षांबरोबर राज्यात बर्‍यापैकी जनाधार असलेल्या काँग्रेसने का युती करावी? त्या युतीतून काँग्रेसला काय मिळणार होते? आणि संजय राऊत यांची परवाची भाषा होती- आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करत आहोत, काँग्रेसने आमच्याबरोबर यावे. एखाद्याला आपल्याविषयी किती अवास्तव कल्पना अशाव्यात?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर पणजीमधून निवडणुक लढवायला उत्सुक आहेत. पणजीमधून मनोहर पर्रीकर १९९४ पासून सहावेळा निवडून गेले होते. उत्पल पर्रीकरांनी पक्षासाठी काही काम केल्याचे निदान मला तरी माहित नाही. केवळ मनोहर पर्रीकरांचा मुलगा या एका क्वालिफिकेशनवर त्यांना उमेदवारी दिली जायला नको असे वाटते. पण मागे म्हटल्याप्रमाणे भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे. बहुदा त्याला उमेदवारी दिली जाईल ही शक्यता आहे. त्याने तरी पक्षासाठी नक्की कोणते काम केले आहे? असल्या घाणेरड्या माणसाला उमेदवारी देण्यापेक्षा उत्पल पर्रीकर कधीही परवडले. त्यांनी पक्षासाठी फार काही केले नसले तरी त्यांची पाटी कोरी आहे. या बाबूश मोन्सेराटप्रमाणे घाणेरड्या आरोपांनी भरलेली नाही. तेव्हा बाबूशपेक्षा उत्पल पर्रीकर उमेदवार म्हणून नक्कीच चांगले. हे टाईप करता करताच एक बातमी वाचली की बाबूश मोन्सेराट आज संध्याकाळी महालक्ष्मी मंदिरापासून आपला प्रचार सुरू करणार होता पण त्याने तो बेत रद्द केला आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/goa/babush-calls-off-campaign-… . म्हणजे त्याला उमेदवारी मिळणार नाही ही पण शक्यता दिसते. तसे असेल तर फारच उत्तम. जर उत्पल पर्रीकरांना भाजपने उमेदवारी दिली नाही शिवसेना उमेदवारी देईल असे म्हटले जात आहे. तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत असे आंतरजालावर वाचले पण ती लिंक या क्षणी सहजासहजी मिळाली नाही. जसा आदर मनोहर पर्रीकरांविषयी वाटायचा तो आदर मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव या एकाच क्वालिफिकेशनमुळे या उत्पल पर्रीकरांविषयी नक्कीच वाटत नाही/वाटणार नाही. पण ते शिवसेनेत गेल्यास मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही संपून जाईल हे नक्की. त्याच शिवसेनेच्या त्याच संजय राऊत यांनी आपल्या वडिलांविषयी नक्की काय गटारगंगा वाहिली होती याची आठवण सगळ्यांनाच करून द्यायला हवी. मनोहर पर्रीकरांनी ऑगस्ट २०१७ मध्ये पणजीमधून पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की केला गेला होता. त्या व्हिडिओत 'जर पणजीमधून पराभव झाला तर आपण केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून परत जाऊ' असे पर्रीकरांनी म्हटले होते असे त्या व्हिडिओत सांगितले गेले. खखोदेजा. बाकी कोणा भाजप उमेदवाराचा पणजीमधून पराभव होऊ शकेल ही शक्यता मान्य केली तरी खुद्द पर्रीकरांचा पराभव पणजीमधून होईल ही शक्यता जवळपास शून्य होती. तेव्हा या व्हिडिओत तथ्य नसावे असे वाटते. तेव्हा हा व्हिडिओ आल्यावर संजय राऊत काय म्हणाले होते? मनोहर पर्रीकर हे एक अपयशी संरक्षणमंत्री होते. https://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-says-parrikar-was-a-fai… . पर्रीकर अपयशी संरक्षणमंत्री असतील तर मग व्ही.के.कृष्णमेनन एकदम यशस्वी संरक्षणमंत्री होते नाही का? तसेच २०१८ मध्ये पर्रीकर कर्करोगाने आजारी असताना ते उपचारासाठी परदेशी गेले होते. तेव्हा राज्याला सेनापती नसल्याने प्रशासन कोलमडले आहे इतकेच नाही तर गोव्याला 'आजारी राज्य' म्हणून जाहीर करावे असली गटारगंगा त्याच संजय राऊतांनी वाहिली होती. https://www.lokmat.com/goa/announce-state-ill-health-goa-sanjay-raut/?f… . आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते त्यांना हे सगळे बरळलेले चालले होते. हे इतरांविषयी असले काही बरळत असतील तर मग हे स्वतः आजारी पडल्यावर लोक त्यांच्याविषयीही बोलणारच. त्याला इलाज नाही. असो. सगळ्यांनाच ज्यांच्याविषयी आदर होता अशा आपल्या वडिलांविषयी असले बरळणार्‍या पक्षात उत्पल पर्रीकर गेले तर मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही पूर्ण संपून जाईल. याची जाण उत्पलना असावी ही अपेक्षा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर ------ https://pudhari.news/maharashtra/mumbai/99185/shivsena-leader-sanjay-ra… ----- पर्रीकरांच्या कुटुंबानं शिवसेनेशी संबध जोडला तर शिवसेना ताकद पणाला लावायला तयार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. -------- गोव्या बाबतीत, सध्या तरी इतकेच.... -----भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे.... ह्या आपल्या मताशी सहमत आहे...

मध्यंतरी गलवानमध्ये चीनी सैनिकांनी त्यांचा झेंडा फडकावला अशी बातमी आली. त्यानंतर समस्त विरोधी पक्षांनी 'त्यावर मोदी बोलत का नाहीत' हे आकांडतांडव करून झाले. त्यात बेगानी शादी मध्ये दिवाना झालेले राऊतब्दुल्ला सगळ्यात पुढे. इथेही नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी ते पोस्ट केले असले तरी आश्चर्य वाटू नये. त्यानंतर आपल्या सैन्याने आपले सैनिक गलवानमध्ये तिरंगा घेऊन आहेत हा फोटो पोस्ट केला तिथेच या प्रोपोगांडाची हवा काढून घेतली गेली. त्यानंतर आता पुढे आले आहे की चीनमधून आलेल्या त्या तथाकथित फोटोत सैनिक म्हणून असलेले लोक सैनिक नव्हतेच तर चिनी कलावंत होते आणि त्यांना चिकपने (चिनी कम्युनिस्ट पक्ष) हा 'इव्हेंट' करण्यासाठी मुद्दामून बोलावून घेतले होते. आणि हा प्रकार चीनच्या सोशल मिडिया साईट विबो (weibo) वर चिनी सदस्यांनीच उघडकीस आणला. https://www.newsx.com/world/china-used-actors-to-stage-flag-hoisting-vi… असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयाँगमधील लोकांचे हस्ताक्षराचे नमुने सरकारने मागवायला सुरवात केली आहे. त्याचे कारण आहे हुकुमशहा किम जोंग उनविषयी अपशब्द वापरला गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई निर्माण झाली आहे. अशावेळेस अन्नटंचाईवर उपाय शोधायचा सोडून लोकांनी खाणे कमी करावे हा सल्ला किम जोंग उनने दिला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेची राणी मेरीने 'ब्रेड नसेल तर केक खा' असे म्हटले होते त्यापेक्षा हे थोडेसे सौम्य धोरण म्हणायचे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे या अन्नटंचाईमुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. किमच्या पक्षाची बैठक चालू होती त्या इमारतीच्या बाहेर कोणीतरी 'किम जोंग उनमुळे लोक उपाशी मरत आहेत. He is a son of a *****' अशाप्रकारचे अपशब्द असलेली ग्राफिटी चिकटवली. झालं. आता हे नक्की कोणी केले आहे हे शोधून काढायला सीसीटिव्ही फुटेज तपासून बघितले जात आहेच पण त्याबरोबर लोकांच्या हस्ताक्षराचे नमुनेही गोळा करायला सुरवात केली आहे. ज्याने कोणी हा प्रकार केला आहे तो माणूस सापडला तर त्याची खैर नाही हे नक्की. एक प्रश्न पडतोच. उत्तर कोरियात किमच्या पक्षाकडे सर्वाधिकार असतील आणि किम म्हणेल तो कायदा असेल तर हे पक्षाचे लोक कोणावर तरी सूड उगवायला 'त्याचे हस्ताक्षर त्या ग्राफिटीमधील अक्षराप्रमाणे आहे' या नावावर एखाद्याला गायब करू शकत असतील का? हे सगळे पाहता भगवंताने आपल्याला अशा कोणत्या देशात जन्माला आणले नाही याबद्दल शतशः आभार मानावेसे वाटतात. आपण असे काही केले तर त्याचे नक्की परिणाम काय होणार याची पूर्ण कल्पना त्या माणसाला असूनही त्याने हे धाडस केले. म्हणजे किम जोंग उनच्या कम्युनिस्ट हुकुमशाहीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले परवडले असेच त्याला वाटत असणार ना? उत्तर कोरियातून बाहेर पडता येणे फार म्हणजे फारच कठिण आहे इतका कडक बंदोबस्त तिथल्या लष्कराने केला आहे. तरीही तिथून सीमेवरून दक्षिण कोरियात निसटायचा प्रयत्न करणारे आणि त्यात मरणारे लोक असतात. तीच गोष्ट बर्लिनची भिंत असतानाची. लोक आपला जीव धोक्यात घालून परिणामांची तमा न बाळगता कम्युनिस्ट राजवटींमधून निसटायचा प्रयत्न करत असतात आणि सामान्यांचे हे स्थलांतर नेहमी एकाच दिशेने होत असते. मानवी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा कम्युनिझमइतका मोठा शत्रू मिळणे कठिण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१) दक्षिण कोरियातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून उत्तर कोरियात स्थलांतर का होत नाही? २) अमेरिकेतील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून व्हेनेझुएला/क्युबामध्ये स्थलांतर का होत नाही? ३) जपानमधील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून चीनमध्ये स्थलांतर का होत नाही? ४) मध्य व पश्चिम युरोपातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून रशियात स्थलांतर का होत नाही? ५) साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते? हुकुमशाहीशिवाय साम्यवाद असं एखादं उदाहरण आहे का?

In reply to by तुषार काळभोर

capitalism
साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते?
त्याचे कारण साम्यवाद हा मानवी स्वभावाला अनुसरून नसल्याने जर कोणत्याही बंधन-जबरदस्तीशिवाय साम्यवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही. याविषयी मागे कधीतरी मिपावर लिहिले होते. पण ती लिंक आता मिळत नाही.

जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली पण २० कोटी…” https://www.loksatta.com/desh-videsh/javed-akhtar-calls-prime-minister-… ----- त्या प्रकरणा बाबत, कोर्टात केस सुरू आहे... पण, काही मुलभूत प्रश्र्न ... 1. काश्मीरी पंडितांना, जबरदस्तीने हुसकावून लावले, त्या बद्दल, हे कधी बोलले आहेत का? 2. अमरावती दंगली बाबत काही बोलले आहेत का? 3. गेला बाजार, ओवेसीने जेंव्हा, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी दिली, तेंव्हा हे काही बोलले आहेत का? 4. नुकतेच, रायगडावर, मजारीचा मामला झाला, त्या बद्दल हे काही बोलले आहेत का? ------ डाॅन मधला एक उत्तम डायलाॅग आहे, त्याच धर्तीवर मनांत विचार येतो की, हिंदू लोकांना भाजप शिवाय पर्याय नाही हे पटेल तेंव्हा पटेल, पण भाजप आला तर हिंदू लोकं उपेक्षित राहणार नाहीत, हे काही अशिक्षित हिंदू हितवादी लोकांना नक्कीच पटलेले आहे... भाजपात, मोदी, योगी, तेजस्वी सुर्या, अशी खरोखरच बाहुबली मंडळी नक्कीच आहेत...

भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी... https://www.loksatta.com/mumbai/cm-uddhav-thackeray-on-excavation-of-th… ----- अतिशय उत्तम काम ....

उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार, शेवटची तीन असणार आणखी अत्याधुनिक https://www.loksatta.com/desh-videsh/the-last-three-rafale-that-will-jo… ------ संरक्षणा बाबतीत, भाजप सरकार, योग्य तेच करत आहे... J 10C आणि राफेल, यांच्यातील, फरक आणि साम्ये, कुणी सांगीतले तर उत्तम...

In reply to by मुक्त विहारि

https://www.esakal.com/desh/big-success-for-navy-successful-test-of-sup… ------ भाजप सरकारच्या काळांत, संरक्षणदल अधिकाधिक सक्षम होत चालले आहे...

In reply to by मुक्त विहारि

  1. हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय,
  2. फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार,
  3. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा,
  4. जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर,
  5. जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक,
  6. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा
हे भारतीय वायूदलाने मागितले आहेत.

In reply to by मुक्त विहारि

तेजस मार्क २ एचएएल तेजस मार्क २ वैशिष्ट्ये
  • क्रू: एक किंवा दोन
  • लांबी: १४.६० मीटर (४७ फूट १ १ इंच)
  • विंगस्पॅन: ८.५० मी (२७ फूट १ १ इंच)
  • उंची: ४.८६ मीटर ( १५ फूट १ १ इंच)
  • विंग क्षेत्र: ४४ मी २ (४७० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ७,८५० kg ( १७,३०६ lb) (अपेक्षित)
  • एकूण वजन: १ १,३०० kg (२४,९ १२ lb) (अपेक्षित)
  • कमाल टेकऑफ वजन: १७,५०० kg (३८,५८ १ lb) (अपेक्षित)
  • इंधन क्षमता: ३,३०० kg (७,३०० lb) अंतर्गत; ड्रॉप टाकीसह ३,५०० kg (७,७०० lb)
  • पेलोड : ६,५०० kg ( १४,३०० lb) बाह्य स्टोअर्स
  • पॉवरप्लांट: १ × जनरल इलेक्ट्रिक F४ १४ आफ्टरबर्निंग टर्बोफॅन. (स्वदेशी १ १०KN इंजिन भविष्यात वापरले जाणार आहे) , ५८.५ kN (१३,२०० एलबीएफ) थ्रस्ट ड्राय, ९८ केएन (२२,००० एलबीएफ) आफ्टरबर्नरसह
कामगिरी
  • कमाल वेग: २,३८५.३६ किमी/ता ( १,४८२. १९ mph, १,२८७.९९ kn)
  • कमाल वेग: मॅच १.८
  • श्रेणी: २,५०० किमी ( १,६०० मैल, १,३०० nmi)
  • लढाऊ श्रेणी: १,५०० किमी (९३० मैल, ८ १० एनएमआय)
  • फेरी श्रेणी: ३ बाह्य इंधन टाक्यांसह ३,५०० किमी (२,२०० mi, १,९०० nmi)
  • सेवा कमाल मर्यादा: १७,३०० मी (५६,७५८ फूट)
  • g मर्यादा: +९/−३.५
  • थ्रस्ट/वजन : ०.८९ (७००० lb इंधनासह, २ SRAAMs आणि जनरल इलेक्ट्रिक F४ १४), १.०० (नियोजित) १ १० KNथ्रस्टच्या स्वदेशी इंजिनसह
शस्त्रास्त्र
  • गन: १ x ३० मिमी ( १.२ इंच) GSh-३०- १ [३७]
  • हार्डपॉईंट्स : सुमारे ६.५ टन क्षमतेचे १३ हार्डपॉइंट्स (अपेक्षित), तरतुदींसह:
  • हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • एमआयसीए (नियोजित)
  • उल्का (नियोजित)
  • अस्त्र (नियोजित)
  • एनजी-सीसीएम (नियोजित)
  • हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • ब्रह्मोस-एनजी एएलसीएम
  • निर्भय (नियोजित)
  • वादळाची सावली (नियोजित)
  • क्रिस्टल भूलभुलैया
  • रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रे:
  • रुद्रम (नियोजित)
मार्गदर्शित युद्धसामग्री
  • HSLD- १००/२५०/४५०/५००
  • DRDO ग्लाइड बॉम्ब
  • डीआरडीओ लेझर-मार्गदर्शित बॉम्ब
  • सुदर्शन
  • क्लस्टर दारूगोळा
  • लॉइटरिंग दारूगोळा
  • कॅट्स अल्फा
एव्हियोनिक्स
  • एलआरडीई एईएसए रडार
  • DARE युनिफाइड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (UEWS)
  • DARE ड्युअल कलर मिसाइल अॅप्रोच वॉर्निंग सिस्टम (DCMAWS)
  • डेअर टार्गेटिंग पॉड
आता चेंगदू जे१० वैशिष्ट्ये
  • क्रू: १
  • लांबी: १६.०३ मीटर (५२ फूट ७ इंच)
  • विंगस्पॅन: ९.२५ मी (३० फूट ४ इंच)
  • उंची: ५.४३ मीटर ( १७ फूट १० इंच)
  • विंग क्षेत्र: ३३ मीटर २ (३६० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ९,७५० kg (२ १,४९५ lb)
  • एकूण वजन: १४,००० kg (३०,८६५ lb)
  • कमाल टेकऑफ वजन: १९, २७७ किलो (४२,४९९ पौंड)
  • इंधन क्षमता: ४९५० L (३८६० Kg) अंतर्गत. ४००० एल (३१२० किलो) बाह्य ३ ड्रॉप टाक्यांसह (२x१६०० एल + १x८०० एल)
  • पॉवरप्लांट: १ × Saturn-Lyulka AL-३ १FN आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन, ७९.४३ kN ( १७,८६० lbf) थ्रस्ट ड्राय, १२५ kN (२८,००० lbf) आफ्टरबर्नरसह
कामगिरी
  • कमाल वेग: मॅच १.८
  • स्टॉल गती: २०० किमी/ता ( १२० mph, १ १० kn)
  • श्रेणी: २,२५० किमी ( १,४०० मैल, १,२ १० nmi)
  • लढाऊ श्रेणी: ९०० किमी (५६० मैल, ४९० nmi)
  • फेरी श्रेणी: ३,२०० किमी (२,००० मैल, १,७०० nmi)
  • सेवा मर्यादा: १७,००० मी (५६,००० फूट)
  • g मर्यादा: +९/-३
  • चढाईचा दर: ३०० मी/से (५९,००० फूट/मिनिट)
  • विंग लोडिंग: ३८ १ kg/m २ (७८ lb/sq ft)
  • जोर/वजन : १.०५ ( शनि AL-३ १FN३ सह); १. १० ( WS- १०A सह)
  • तात्काळ वळण दर: ३० अंश प्रति सेकंद
  • रोल रेट: ३०० + अंश प्रति सेकंद
शस्त्रास्त्र
  • गन: १× ग्र्याझेव-शिपुनोव GSh-२३
  • हार्डपॉइंट्स: एकूण १ १ (६× अंडर-विंग, २× अंडर-इनटेक आणि ३× अंडर-फ्यूजलेज) ५६०० किलो बाह्य इंधन आणि शस्त्रास्त्रांच्या क्षमतेसह
  • रॉकेट: ९० मिमी अनगाइडेड रॉकेट पॉड्स
क्षेपणास्त्रे: हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे :
  • PL-८
  • PL- १० (J- १०C)
  • PL- १२
  • PL- १५ (J- १०C)
हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे :
  • KD-८८
  • YJ-९ १
बॉम्ब:
  • लेझर-गाइडेड बॉम्ब: ( LT-२ )
  • ग्लाइड बॉम्ब: ( LS-६ , GB३ , GB२A , GB३A )
  • उपग्रह-मार्गदर्शित बॉम्ब: ( FT- १ )
  • अनगाइड बॉम्ब: २५० किलो, ५०० किलो
इतर:
  • विस्तारित श्रेणी आणि लोइटिंग वेळेसाठी ३ पर्यंत बाह्य इंधन ड्रॉप-टँक ( १× अंडर-फ्यूजलेज, २× अंडर-विंग)
एव्हियोनिक्स
  • १४७३H पल्स-डॉपलर फायर कंट्रोल रडार (J- १०A)
  • बाहेरून आरोहित एव्हियोनिक्स पॉड्स:
  • K/JDC० १A लक्ष्यीकरण पॉड (J- १०A वर)
  • Hongguang-I इन्फ्रा-रेड शोध आणि ट्रॅक पॉड टाइप करा (J- १०A वर)
  • KD-८८ आणि YJ-९ १ साठी CM-८०२AKG लक्ष्यीकरण पॉड (J- १०C वर)
  • KG६०० इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर पॉड
  • ब्लू स्काय नेव्हिगेशन/अटॅक पॉड
वरील माहितीमध्ये चूक भूल देणे घेणे मी यातला तज्ञ नाही! मी फक्त विकीवरून येथे देण्याची हमाली केली आहे. अधिक माहिती त्या त्या विकी पानावर वाचावी.

बिहार मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी मौलानाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, माहिती मिळताच मौलवी फरार झाला! पाटणामध्ये एका मदरशाच्या मौलवीने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत. अशाच गुन्ह्यांमध्ये मौलवींचा सहभाग असल्याची अनेक प्रकरणे उप्र ते केरळ पर्यंत झालेली दिसून येत आहेत.

In reply to by निनाद

पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत
. हं...

महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर सिंह यांचा पोलीस दलावर विश्वास नाही- सुप्रीम कोर्ट ------ https://www.loksatta.com/maharashtra/ex-police-commissioner-has-no-fait… ------- सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी आहे.... -------

In reply to by मुक्त विहारि

"नॉटी" संपादकांना सगळे समजते.. (असा त्यांचा समज असतो)

आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-big-decision-i… ----- निवडणूका जवळ आल्या वाटतं...

In reply to by मुक्त विहारि

हा कायदा / नियम अगोदरपासूनच आहे. अंमलबजावणी होत नाही त्याचे काही करता आले तर पहावे सरकारने.
मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
बहुधा हाच नवीन भाग असावा.

मागच्या महिन्यात माझ्या वाचनात आलेली बातमी म्हणजे इस्रो आणि चायनीज मोबाईल कंपनी ओप्पो यांच्यात झालेला करार. ! ISRO ties up with Chinese tech giant Oppo for R&D of NavIC messaging service ISRO-Oppo India deal: Row erupts over Chinese firm's collaboration with Indian space organisation

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |

https://www.loksatta.com/thane/unauthorized-construction-by-shiv-sena-m… मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा एक वादग्रस्त निर्णय ठाकरे सरकार ने घेतला आहे. शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे बील कमी न करण्यासाठी महसुलाचे कारण देणार्‍या सरकारणे तब्बल २१ कोटी चा मलीदा एका अवैध बांधकाम करणार्‍या आपल्या सहकार्‍याला वाटला. आजवर कधीही न झालेली बाब. अजुन किती खालची पातळी गाठणार आहेत कोण जाणे. विशेष म्हणजे लोकायुक्तांना मात्र वेगळे आश्वासन दिले होते. ह्या सरकारचे खंदे समर्थक आता याचे कसे समर्थन करतील ते पहायचे आहे. नॉटी साले . . .

In reply to by सुक्या

कुठल्याच सरकारची पापे माफ करू नये,त्यांना योग्य पद्धतीने विरोध करावा हे माझे वैयक्तिक मत. आणि असे चुकीचे पायंडे पाडत असतील तर त्यांना विरोध केलाच पाहिजे. उगीच लंगडे समर्थन करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नये. माझा गेले वर्षभर कायदेशीर लढा चालू आहे. https://www.misalpav.com/comment/1098316#comment-1098316 नियमाप्रमाणे योग्य बिल येईपर्यंत बिल भरणार नाही आणि कृषिवीजबिल माफी नको असेही तक्रारीत नमूद केले आहे. महामंडळाच्या प्रोसेजरप्रमाणे तक्रार केल्यामुळे वीजजोडणी तोडू शकत नाहीत. सगळ्यात कहर म्हणजे पावसाळ्यानंतर वीज वापरत असूनही वापर शून्य दाखवत आहेत. त्याचीही तक्रार केली आहे.

लडाख महसूल विभागाने सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द केली आहे! लडाखच्या प्रशासनाने मंगळवारी केंद्रशासित प्रदेशातील विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी उर्दू ज्ञानाची अनिवार्य आवश्यकता काढून टाकली. सरकारने काढलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार महसूल विभागातील अनेक पदांसाठी 'पदवीसह उर्दूचे ज्ञान' ऐवजी 'कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी' अनिवार्य केली आहे. सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते. परंतु बदललेल्या नियमांनुसार, या पदांसाठी केवळ पदवी पुरेसे असेल आणि उर्दूचे ज्ञान आवश्यक नसेल. काश्मिरी राज्यकर्त्यांनी लडाखवर लादलेल्या परकीय उर्दू भाषेपासून मुक्ती दिल्यामुळे लदाख ला आता खरे स्वातंत्र्य मिळाले आहे - असे येथील खासदार नामग्याल म्हणाले आहेत.

In reply to by निनाद

छान!!
सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते.
हे माहीतीच नव्हते.

In reply to by निनाद

अतिशय उत्तम निर्णय भाषा हा संस्कृतीचा गाभा असतो. ब्रिटिशांनी हेच ओळखून, इंग्रजी लादली.

यूपीचे आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. अखिलेश यादव यांनी त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत केले आहे. समाजवादी पक्षाची ताकद उ प्र मध्ये वाढते आहे असे दिसते आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल. यादव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकल्यास घरोघरी ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. या फुकट खेळीमुळे दिल्ली प्रमाणे उत्तर प्रदेशात सत्ता पालटू शकेल.

In reply to by निनाद

उत्तर प्रदेशात अमुक एक होईल किंवा होणार नाही असे बोलणे याक्षणी धाडसाचे होऊ शकेल. स्वामीप्रसाद मौर्य आणि आता हे दारासिंग चौहान हे मंत्री राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडले ही खरी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. असे म्हटले जात आहे की अजून काही आमदार पक्ष सोडून समाजवादी पक्षात जातील. पण भाऊ तोरसेकर म्हणत आहेत त्याप्रमाणे कशावरून हे सगळे लोक आपल्याला उमेदवारी नाकारली जाईल याची कुणकुण लागली म्हणून पक्ष सोडून जात नसावेत? अनेकदा केंद्र-राज्य सरकारविरोधात वातावरण नसेल पण स्थानिक आमदाराविरोधात लोकांच्या मनात असंतोष असेल आणि परत त्याच आमदाराला उमेदवारी दिल्यास स्थानिक पातळीवरील रोषाचा फटका बसून ती जागा गमावावी लागू शकते. असे बर्‍याच ठिकाणी झाले तर तितक्या जागा हातच्या जाऊ शकतात. अशा ठिकाणी उमेदवार बदलल्यास विजय मिळायची शक्यता वाढते. हे गणित लक्षात घेऊन भाजप ४५ ते ५० आमदारांना उमेदवारी नाकारणार आहे असे म्हटले जात आहे. त्या ४५-५० आमदारांमध्ये आपले नाव असेल ही कुणकुण लागली तर हे लोक पक्ष सोडून दुसरीकडे जाऊ शकतात. बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी हा ममतांचा एकेकाळचा उजवा हात तृणमूल सोडून भाजपमध्ये गेल्यावरही असेच वातावरण उभे केले गेले होते. नंतर काय झाले हे आपल्याला माहित आहेच.
अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल.
२०१२ मध्येही ते आश्वासन त्यांनी दिले होते ना? २०१४ मध्ये लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाल्यावर मुलायमसिंग यादव म्हणाले होते की लोकांनी अखिलेशने दिलेल्या लॅपटॉपवर मोदींची भाषणे बघितली आणि मत मोदींना दिले.