महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.
![]() |
बोधचिन्ह |
आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.
एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.
![]() |
आपली एसटी |
एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.
एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.
ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.
एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.
विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.
काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)
मिसळपाव


प्रतिक्रिया
कर्नाटक सरकारने चांगले माॅडेल तयार केले आहे
उपाय विलीनीकरण नव्हे !
In reply to कर्नाटक सरकारने चांगले माॅडेल तयार केले आहे by मुक्त विहारि
हम्म
In reply to उपाय विलीनीकरण नव्हे ! by सामान्यनागरिक
शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे,
माझा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संपूर्ण पाठिंबा.
In reply to शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, by प्रचेतस
+१
In reply to शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, by प्रचेतस
माननीय मुख्यमंत्री ह्यांचे
In reply to शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, by प्रचेतस
समजले
In reply to माननीय मुख्यमंत्री ह्यांचे by हस्तर
माझा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजिबात पाठिंबा नाही
In reply to शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, by प्रचेतस
मुंबई सातारा ठीक आहे ,मी
In reply to माझा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजिबात पाठिंबा नाही by प्रसाद गोडबोले
काळसर होता का? हातावर शिवाजी
In reply to मुंबई सातारा ठीक आहे ,मी by हस्तर
हातावर होता कि गाडिवर
In reply to काळसर होता का? हातावर शिवाजी by प्रसाद गोडबोले
दोन शब्द
In reply to शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, by प्रचेतस
संपाचं राजकारण हे
In reply to दोन शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकीय,सामाजिक आणि कायदेशिर असे तीन मुद्दे आहेत.
कोण जबाबदार, कर्मचारी, व्यवस्थापन ,प्रवासी अथवा नेते
बाकी सहमत आहे
In reply to कोण जबाबदार, कर्मचारी, व्यवस्थापन ,प्रवासी अथवा नेते by कर्नलतपस्वी
शिवनेरी, शिवशाही बसेस
In reply to बाकी सहमत आहे by सॅगी
शिवनेरी
In reply to बाकी सहमत आहे by सॅगी
अवघड आहे.
In reply to शिवनेरी by कर्नलतपस्वी
शिवनेरी
In reply to बाकी सहमत आहे by सॅगी
अधिक महत्वाची प्रकरणे
महाराष्ट्रात असे नाकर्ते
In reply to अधिक महत्वाची प्रकरणे by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्रात असे नाकर्ते सरकार यापूर्वी कधी बघायला मिळाले नव्हते.+ १सहमत
In reply to अधिक महत्वाची प्रकरणे by चंद्रसूर्यकुमार
नाकर्तेपणाची सुरुवात निकालानंतर सुरू झाली.
एसटीच्या सध्याच्या
खाजगीकरण करावे
ठीक आहे, पण
In reply to खाजगीकरण करावे by वामन देशमुख
शेटचा
एसटी
बोंबला
In reply to एसटी by धर्मराजमुटके
. मी तर म्हणतो त्यांना एक
In reply to एसटी by धर्मराजमुटके
आदित्य ठाकरेंना नक्की कोणी संधी द्यायला पाहिजे?
In reply to . मी तर म्हणतो त्यांना एक by रात्रीचे चांदणे
रिमोट महाराष्ट्राचे
In reply to आदित्य ठाकरेंना नक्की कोणी संधी द्यायला पाहिजे? by धर्मराजमुटके
एशियाड
In reply to एसटी by धर्मराजमुटके
एसटीचा संप : विलणीकरण एकच
तुकाराम मुंढे
श्रीकर परदेशी
हे होणे नाही
In reply to एसटीचा संप : विलणीकरण एकच by चौथा कोनाडा
पगमार्क
In reply to हे होणे नाही by कर्नलतपस्वी
सिडकोच्या ८० बसेस कुजल्या तशा
बरेच पैलू आहेत आणि माझा
+१
In reply to बरेच पैलू आहेत आणि माझा by गवि
पोच...
In reply to बरेच पैलू आहेत आणि माझा by गवि
ग वि शेठ
In reply to बरेच पैलू आहेत आणि माझा by गवि
+१
आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल
राज्याचे परिवहनमंत्री अनिल
In reply to आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल by हस्तर
सध्या तरी रिमोट कंट्रोल .....
In reply to राज्याचे परिवहनमंत्री अनिल by रावसाहेब चिंगभूतकर
आता काय?
सरकार दुसरं काय करतंय
In reply to आता काय? by कंजूस
प्रश्न न्यायालयात....
In reply to आता काय? by कंजूस
एसटीचा संप : विलणीकरण एकच
शब्दाकडे दुर्लक्ष करा हो
In reply to एसटीचा संप : विलणीकरण एकच by सुबोध खरे
गवि
In reply to शब्दाकडे दुर्लक्ष करा हो by गवि
विलीनीकरण
In reply to गवि by सुबोध खरे
नको नको..
In reply to गवि by सुबोध खरे
छे छे असं कसं?
In reply to नको नको.. by गवि
कोपिनेश्वरा, वाचव रे..
In reply to छे छे असं कसं? by गणपा
कोपिनेश्वर हा शब्द भातातल्या
In reply to कोपिनेश्वरा, वाचव रे.. by गवि
आता तो शब्द एकदा लिहीला
In reply to कोपिनेश्वर हा शब्द भातातल्या by प्रचेतस
सरांचा धागा हॅक करणाऱ्या
In reply to आता तो शब्द एकदा लिहीला by गवि
तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे
In reply to सरांचा धागा हॅक करणाऱ्या by गणपा
आता तो शब्द एकदा लिहीला
In reply to आता तो शब्द एकदा लिहीला by गवि
आता तो शब्द एकदा लिहीला म्हणजे लिहीला वल्लीशेठ.@सुबोध खरे सर, यांना खरेच जेवायला बोलवा हो.प्रा डाँनी कट्टा पार्टी
In reply to आता तो शब्द एकदा लिहीला by प्रचेतस
असं कसं हो गविशेठ दुसऱ्या
In reply to शब्दाकडे दुर्लक्ष करा हो by गवि
"विलणीकरण"
व्हिलनीकरण बसतं का बघा..
In reply to "विलणीकरण" by सुबोध खरे
त्यांनी संपकऱ्यांचा नारा/ घोष घेतलाय.
युद्ध सुरु...
In reply to त्यांनी संपकऱ्यांचा नारा/ घोष घेतलाय. by कंजूस
सर्वात मोठे औद्योगिकरण असलेले राज्य.
वेतन नको विलीनीकरण हवे ?