Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 11/03/2021 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.

वाचने 55109
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही काही वरगाचेच हित चिंतक आहात काय. कारण. तुमच्या प्रतिसाद मध्ये. शेतकरी वर्ग विषयी तुम्हाला तिटकारा आहे. कामगार वर्ग विषयी तिटकारा आहे. मुस्लिम धर्मा विषयी तिटकारा आहे. शिवसेना ,राष्ट्रवादी,काँग्रेस आणि bjp सोडून बाकी सर्व वर्गा विषयी तिटकारा आहे. भारतीय राज्य घटना सर्व लोकांना समान समजते तुम्ही कोण आलात भेदभाव करणारे. हाच तर महत्वाचा आक्षेप आहे bjp वर. हा पक्ष ठराविक लोकांचेच हित जपणारा पक्ष आहे. सर्वांना बरोबर घेवून जाणारा हा पक्ष नाही.

In reply to by Rajesh188

1. कोकणातील शेतकरी वर्गाला, साधे घर बांधायला परवडत नाही, तिथे आंदोलन करणार्या लोकांना पक्की घरे कशी काय बांधता येतात? इतका पैसा पुरवणार्या लोकांना, पाठिंबा देणार्या विचारसरणीचा तिटकारा आहेच... 2. कामचुकार कामगार वर्गाविषयी तिटकारा आहेच... पैसे घेताय ना मग काम केलेच पाहिजे... 3. हिंदू धर्मा विषयी अभिमान आहेच.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, व्यक्तीपुजा आणि घराणेशाही, मानणार्या वर्गाविषयी तिटकारा आहेच....

In reply to by मुक्त विहारि

आणि त्यांच्या जीवावर काही जागा जिंकल्या आहेत ते सर्व घराणेशाही वालेच आहेत. त्या मुळे साळसूद पना आणू नका.. तुमच्या कोकणात bjp ची री घराणे शाही वालेचं ओढत आहेत व्यक्ती पूजा करण्यात bjp सर्वात जास्त आघाडीवर आहे. कोकणात शेतकरी उरले आहेत का. सर्व बायका पोरं घेवून मुंबई वासी झाले आहेत. आणि तेथूनच उंटावरून शेळ्या हाकत आहेत. केरळ वाले येवून कोकणात रबर लागवड करून पैसे कमावत आहेत कोकणात जे सर्वात मोठे धरण आहे त्याचे सर्व पाणी गोवा वापरत आहे कोकण तसाच उपाशी.. कर्तृत्व वान नेतृत्व कोकणात जन्माला आलेच नाही. जे काही आहेत ते मुंबई वासी . बिसलेरी घेवून कोकणात जाणारे.

In reply to by मुक्त विहारि

त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!! जिथे तिथे फक्त BJP आणि मोदीच दिसतात. प्रत्येक प्रतिसाद येन केन प्रकारे BJP सोबत जोडायचा. कदाचित रोज सकाळी पण BJP स्तोत्र म्हनल्याशिवाय पोट रिकामे होत नसेल.

In reply to by मुक्त विहारि

सतत लोकसत्तातील बातम्यांची लिंक देन्याऱ्यांनी माहाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे या बातमीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय

In reply to by Vichar Manus

सतत लोकसत्तातील बातम्यांची लिंक देन्याऱ्यांनी माहाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे या बातमीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय
बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे.. बाकी आमच्या गावी सुद्धा असा कोणताही सर्वे झालेला नाही.. मग हे मीडिया वाले सर्वे नेमके कुठे करतात?? बारामतीमध्ये फार्म हाऊस मध्ये चहा बिस्किटे खाताना का??

In reply to by श्रीगुरुजी

मध्ये, 2-3 दिवस वाचला .... पुढे स्वप्ने पडायला लागली आणि झोपेत, कोथळा, खंजीर, मावळे, इत्यादी शब्द बडबडायला लागलो.... वायफळ बडबडीला कंटाळून, घरच्यांनी तंबी दिली आणि पेपर बंदच केला... पुढे, Enron, एक रूपयांत झुणका भाकर, संजय दत्त, प्रकरणामुळे, मीच एकटा वायफळ बडबड करत न्हवतो, हे जाणवले...

In reply to by श्रीगुरुजी

मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा..समजा ते दलाल आहेत असे समजले तरी त्यांना समस्या नाहीत का? त्यांना त्यांच्या प्रश्न साठी आंदोलन करण्याचा हक्क नाही का. की हक्क फक्त पांढरपेशा लोकांना आणि bjp समर्थक लोकांनाच आहे.

In reply to by Rajesh188

वाह.. काय प्रतिसाद आहे..
मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा
. मस्तच.. उद्या आतंकवादी बॉम्ब फोडायला आले किंवा ISI वाले देश तोडायला आले तरी पण खात्री आहे कि तुम्ही हेच वाक्य बोलणार.. मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा..??
समजा ते दलाल आहेत असे समजले तरी त्यांना समस्या नाहीत का? त्यांना त्यांच्या प्रश्न साठी आंदोलन करण्याचा हक्क नाही का.
म्हणजे आता मान्य करताय का कि ते दलालच आहेत शेतकरी नाहीत.. हे ही नसे थोडके. कारण आजवर तुम्ही आंदोलन करणारे हे कसे शेतकरीच आहेत असं पटवून देत होता.. आज ते दलाल आहेत हे मान्य करताय.. माझी खात्री आहे अजुन थोडा काळ जाऊद्या.. ते खलिस्तानी आहेत हे पण मान्य कराल.
की हक्क फक्त पांढरपेशा लोकांना आणि bjp समर्थक लोकांनाच आहे.
असे काही नाही. पण आंदोलन करताना मागण्या स्पष्ट असाव्यात. देशहिताच्या असाव्यात. उगाच आंदोलन च्या नावाखाली काहीही चाळे करून आपला देशविरोधी छुपा अजेंडा रेटू नये.

In reply to by बापूसाहेब

तर काहींना, भाजपचे कट्टर हिंदूत्व मान्य नसते... अशा लोकांच्या प्रतिसादांना जास्त मनावर घेण्यात अर्थ नाही... व्यक्तीपूजा आणि घराणेशाहीच्या उमेदवारांना, पाठिंबा देणार्या, सुशिक्षित लोकांना, समजवायला जाऊ नये... हा प्रतिसाद बापूसाहेब, यांनाच आहे, कृपया इतर लोकांनी, प्रतिसाद देऊ नये....

अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक बादवे :- मनसुख हिरेंन की मनसुख हिरण ? एबीपी वाले हिरण असा उलेख करत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )

In reply to by मदनबाण

कुठे एबीपी बघण्यात वेळ घालवताय, सावरकर नायक की खलनायक कार्यक्रम केला तेंव्हाच एबीपी बंद करून टाकला.

मुक्तविहारी, एकाच वेळी सगळे देश बुरखा विरोधी कसे काय झाले? Clash of Civilisations ही युरोपीय विचारवंतांत एक लोकप्रिय कल्पना आहे. ती मूर्तावस्थेत यावी म्हणून इस्लाम व ख्रिस्ती देशांत लढाई व्हायला पाहिजे. ती नुसती लढाई नसून क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध असायला हवं. म्हणून हे प्रयत्न चाललेत. आ.न., -गा.पै.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/central-government… सामान्य माणसाला, गुन्हा उघडकीस आला पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे, ह्यातच रस असतो....

सचिन वाझे ह्यांना एन आय ए तर्फे अटक. २५ मार्च पर्यंत कोठडी. सत्य बाहेर येइल अशी अपेक्षा. दहशतवादी जिलेटीनने भरलेली गाडी कशाला ठेवतील? धम्की देउन पैसे तरी उकळतील नाहीतर त्या व्यक्तीला मारतील तरी.. तेव्हा दहशतवादी नाहीत हे उघड होते.

ह्या संस्थेची स्थापना अतिरेकी ,आणि दहशतवादी ह्यांच्या वर कारवाई करण्यासाठी २००८ मध्ये स्थापना. कार्यक्षेत्र पण अतिरेकी आणि दहशतवादी कार्य पुरतेच मर्यादित आहे. ह्या संस्थेला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही. गाडी मध्ये जिलेटीन च्य कांड्या सापडल्या म्हणूनच ह्यांची entry झाली आहे. बाकी कोणत्याच प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार ह्या संस्थेला नाही. त्या साठी सीबीआय आणि राज्यातील तपास यंत्रणा आहेत Cbi ल राज्याची परवानगी ची गरज असते. ह्याचा अर्थ साफ आहे बाकी जो काही तपास आहे तो राज्य पोलिस च करणार. म्हणजे सत्य नक्की बाहेर येईल.. नक्की जिलेटीन गाडीत कोणी ठेवलं हा कळीचा मुद्धा आहे ते nia शोधेल. खुनाचा तपास करण्याचा त्यांना अधिकार नाही. काँग्रेस नी कायदा करून ती संस्था स्थापन केलेली आहे पुढे सरकार गेले केंद्रातील तर त्रास देण्यासाठी त्याचा वापर व्हायला नको ह्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे Nia ल मर्यादा आहे.

https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/shiv-sena-enters-into-all… स्वतः अजान पढून झाली.. अजान स्पर्धा करून झाली. बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट सोडून जनाब म्हणून झाले. आणि आता डायरेक्ट MIM ला पाठिंबा.. आता फक्त लादेन आणि कसाब जयंती साजरी करायची राहिलीये.. म्हणे हिंदुत्ववादी पक्ष.. हिंदुत्वाचा बुरखा ओढलेला लांडगा जणू ...!!

In reply to by बापूसाहेब

व्यक्तीपुजा आणि घराणेशाही, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा शाप आहे..... हिंदू झोपलेलेच राहणार....