चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार काथ्याकूट
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.
वर्गीकरण
वर्गीकरण

164 टिप्पण्या 46,871 दृश्ये

Comments

कंजूस नवीन

कांग्रेस का कामुनिस्ट? टाटाला विरोध केला त्यात फायदा राजकीय का आर्थिक?

श्रीगुरुजी नवीन

खरं तर १४०+ प्रतिसाद झाल्यानंतर १५० प्रतिसाद होण्यापूर्वी नवीन धागा सुरू केल्यास नवीन पानावर प्रतिसाद जाणार नाहीत.

श्रीगुरुजी नवीन

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींंच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. ती स्कॉर्पिओ चोरीची होती असे नंतरच्या तपासात निष्पन्न झाले होते. जैश उल हिंद नावाच्या संघटनेने ती गाडी ठेवल्याचे एका सामाजिक माध्यमातील पोस्टवर कोणी तरी लिहिले होते. नंतर या संघटनेने त्यात आपला हात असल्याचे नाकारले. काल रात्रीपासून गाडीचा मालक मनसुख हिरेन बेपत्ता होता व आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. एकंदरीत हे प्रकरण बरेच रहस्यमय दिसते. संजय राठोड प्रकरणातील धुरळा खाली बसण्याच्या आतच भाजपच्या हातात नवे प्रकरण आले आहे.

श्रीगुरुजी नवीन

https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis-mukesh-ambani-explosive-car-mansukh-hiren-dead-body-thane-sgy-87-2414585/

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

मुकेश अंबानी ह्यांच्या घराबाहेर स्फोटकानी भरलेली गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह ठाणे येथे रेतीबंदर खाडीत सापडला. गाडी १७ तारखेला चोरी झाली होती. 'स्टीयरिंग व्हील जॅम झाले होते म्हणून गाडी तशीच सोडुन मी दुसर्या दिवशी पाहतो तर गाडी नव्हती' असा खुलासा हिरेन ह्यांनी टी.व्हीवर दिला होता. आता स्टीयरिंग व्हील जॅम झालेली गाडी दुरुस्त केली व नंतर चोरी केली? https://www.businesstoday.in/current/economy-politics/mansukh-hiren-whose-car-was-used-to-plant-gelatin-sticks-threat-letter-outside-antilia-found-dead/story/433093.html

Rajesh188 नवीन

आणि प्रतेक जन न्यूज वाचत असतो परत त्या लिंक वाचायचा कंटाळा येतो. न्यूज chya लिंक देण्या पेक्षा स्वतःची मत काय आहेत ते मांडा ती तुमची मतं वाचायला आवडतील. मीडिया trial मध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही

सॅगी नवीन

Rate Cut प्रति युनिट सरासरी २ पैशांची दणदणीत कपात केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचे हार्दीक अभिनंदन!!!

मुक्त विहारि नवीन

In reply to by सॅगी

शेतकरी वर्गाच्या तोंडाला पाने पुसून झाली आहेत, आता सामान्य माणसासाठी, वीज दरात कपात केली आहे... शांतपणे आयुर्वेदिक कोंबडी खा आणि बरे वाटत नसेल तर,कंपाउंडर कडून औषध घ्या.करोना समोरून हल्ला करतो, त्याची काळजी घ्या...

मुक्त विहारि नवीन

आज तब्बल १० हजारावर नवीन रुग्णांची भर https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-reports-10216-new-covid19-cases-6467-discharges-and-53-deaths-in-the-last-24-hours/articleshow/81352464.cms आता जबाबदार कोण? आधी म्हणाले की, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो...

सॅगी नवीन

In reply to by मुक्त विहारि

आपली जबाबदारी आपणच घ्यायची.... . . . "ते" फक्त दसरा मेळाव्यातली भाषणे सगळीकडे देणार, "त्यांची" जबाबदारी तेवढीच...

श्रीगुरुजी नवीन

सुशांतसिंग राजपूत प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण याप्रमाणे मनसुख हिरेन या प्रकरणातूनही भाजपच्या हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही.

पिनाक नवीन

In reply to by श्रीगुरुजी

हाती लागणे वगैरे महत्वाचे नसते.सक्षम विरोधी पक्षाची भूमिका भाजप पार पाडते आहे. ते महत्वाचे आहे. शिवाय जनतेला लक्षात येते आहे की कायदा आणि सुव्यवस्था राज्यात काडीमात्र उरलेली नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by पिनाक

भाजप करतोय तो सक्षम विरोध वगैरे नसून ठाकरेंना अडचणीत आणणे व हे सरकार पाडणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. सुशांतसिंह रजपूत प्रकरणात भाजपने आदित्य ठाकरेचा संबंध जोडून आकाशपाताळ एक करून ठाकरेंना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामागे हाच एकमेव उद्देश होता. पण तो प्रयत्न पूर्ण फसला. पालघर साधू हत्याकांड, धनंजय मुंडे ही प्रकरणे सुद्धा पूर्ण फसली. संजय राठोडने चुका केल्या नसत्या तर ते प्रकरण सुद्धा फसले असते. मुळात या प्रकरणातील विरोधामागे भाजपची भूमिका प्रामाणिक विरोधाची नाही हे जनता सुद्धा ओळखून आहे. केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी भाजप फुसक्या प्रकरणात आकांडतांडव करीत आहे. मागील संपूर्ण वर्षात मुलांच्या शिक्षणाची पूर्ण वाट लागली आहे. महाविद्यालयांंच्या परीक्षा, स्पर्धापरीक्षा, महाविद्यालयातील प्रवेश हे पूर्ण ठप्प आहेत. अशा खऱ्याखुऱ्या समस्यांवर भाजपने भूमिका घेतली तर नक्कीच उपयोग होईल. परंतु भाजपला खऱ्या समस्यांंवर बोलण्याऐवजी अशा सनसनाटी प्रकरणात तेल ओतून ठाकरेंना अडचणीत आणण्यातच रस आहे. परंतु त्याच्याशी जनतेला घेणेदेणे नाही.

मुक्त विहारि नवीन

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना स्वतः होऊन आपली, मराठी आणि हिंदुत्वाची, कवचकुंडले उतरवत असतांना, कोण झाकायला जाईल? भाजप फक्त ती कवचकुंडले उतरलेली दाखवत आहे... पुढच्या प्रत्येक निवडणूकीत, शिवसेनेला कॉंग्रेस फरफटत नेणार... मुंबई महानगर पालिकेत समजेलच...

कानडाऊ योगेशु नवीन

In reply to by मुक्त विहारि

पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनाही अतिरिक्त फायदा मिळेल असे वाटते. हे म्हणजे पंचतंत्रातल्या आपल्या बेडुक जातभाईंना धडा शिकवायला सापाला बोलावणे धाडण्यासारख्या गोष्टीसारखे झालेय.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by कानडाऊ योगेशु

पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनलेला कधीही परवडले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे १५ वर्षे सरकार होते पण सरकारविरोधात बोलल्यास नेव्ही अधिकार्‍याला मारहाण होणे, जेसीबी आणणे वगैरे प्रकार कधी घडलेले नव्हते. शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. तो लवकरात लवकर मिटायला हवा. इतकी वर्षे वाजपेयी-अडवाणी शिवसेनेला महत्व देत होते म्हणून शिवसेना कधीच आवडत नसतानाही शिवसेनेचे समर्थन करावे लागत होते. नशीबाने शिवसेना उमेदवाराला मत द्यायचा प्रसंग कधी आला नाही. मला वाटते एम.आय.एम/मुस्लिम लीग/पीडीपी वगैरे पक्षच फक्त शिवसेनेपेक्षा वाईट आहेत बाकी कोणताही पक्ष शिवसेनेपेक्षा चांगलाच आहे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून राष्ट्रवादीचे सरकार आलेले कधीही परवडेल. काँग्रेसचे इतके वर्षे मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर ठाकरेंनी जे किळसवाणे भाषण करून लाज आणली तसे कधी केले नव्हते.

मुक्त विहारि नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुंबई आणि ठाणे, आणि थोड्या प्रमाणात, कोकणांत आहे.... त्यामुळे आता, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे कठीण आहे.... मुख्यमंत्री पदाची एक वेगळी भाषा आणि देहबोली असते, हे शिवसेनेला कधीच समजणार नाही...

पिनाक नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे. आता भाजप ने शिवसेनेबरोबर युती केली तर मी राष्ट्रवादी ला मत देईन. आणि जर काँग्रेस चा candidate उभा असेल तर मग नोटा.

कानडाऊ योगेशु नवीन

In reply to by मुक्त विहारि

नोटा हा कधीही उत्तम पर्याय ठरु शकत नाही कारण नियमानुसार नोटाची मते जास्त असतील तर दुसर्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजेता घोषित केले जाते.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. + ९९९९९९९९ . . . हा कलंक १९८९ पर्यंत मुंबईतील काही प्रभागांपुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by श्रीगुरुजी

संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.
नक्कीच. याबद्दल भाजप नेत्यांनी खरं तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागायला हवी.

स्वलिखित नवीन

In reply to by श्रीगुरुजी

पण ज्या लेव्हल वर जाऊन शिवसेनेला शिव्या द्यायचा कार्यक्रम या धाग्यावर चालू झालाय , जर कुण्या सेनेच्या नेत्याने पाहिले तर मिसळपाव अडचणीत येऊ नये , भलेही मिपा सर्वांसाठी खुले आहे , आपली मते मांडू शकतात , पण ते सेनेचे अक्कलशुन्य नेते आहे , ते एका ऑफिसर च्या कानफाटात देऊ शकतात तर काहीही करू शकतात , (आमची बापुडी शंका दुसरे काय )

आनन्दा नवीन

In reply to by स्वलिखित

आयला म्हणजे मोदीना जाहीर शिव्या घातल्या तेव्हा कोणी मारायला येणार नव्हते वाटते? इतक्या थराला हे प्रकरण जाईल असे वाटले नव्हते.

स्वलिखित नवीन

In reply to by आनन्दा

असांसदीय शब्दांची यादी जाहीर झालीय , पप्पू , दीदी , बालबुद्धी , कुटुंब, भैया अशा शब्दावर संसदेत बंदी घातलीय , त्यामुळे राहुल ला( राहुल्याला) कोणत्या शब्दाने संबोधित करावे हा प्रश्न गोची करतोय , मोदी गरीबय ओ , 1. हाय हाय मोदी मर जा तू म्हणले तरी तो गप्प बसतो ,

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल. मागील ३-४ वर्षात भाजपने आपले बरेच हक्काचे मतदार दुखावले आहेत. ते परत भाजपकडे आणण्यासाठी काही काळ लागेल व त्यासाठी महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by श्रीगुरुजी

सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल.
आकड्यांचा मेळ लागत नाही. समजा भाजप ६० आणि सेना २० असे धरले. तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांचे ३० आमदार धरले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळून ११० आमदार होतील. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला १७५-१८० जागा मिळतील असे म्हणायचे आहे? या दोन पक्षांना मिळून १९९९ मध्ये १३३, २००४ मध्ये १४० आणि २००९ मध्ये १४४ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला/आघाडीला १८० जागा गेल्या ४० वर्षात एकदाही मिळालेल्या नाहीत. शिवसेना-भाजप युती यापुढे होणार नाही असे गृहित धरले तरी गेल्या सव्वा वर्षात घातलेल्या नंगानाचामुळे शिवसेनेचे हक्काचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडे वळतील असे वाटते. त्याप्रमाणेच भाजपचे मतदार कितीही दुखावले असले तरी फार तर मत देणार नाहीत किंवा नोटाला मत देतील पण काहीही झाले तरी शिवसेनेला किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीला मत देणार नाहीत. तसेच अनेक वर्षे युतीमुळे शिवसेनेला दिले गेलेले कोथरूडसारखे मतदारसंघ भाजपने २०१४ मध्ये जिंकले होते. अशा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमुळे शिवसेनेला फायदा होत होता पण ती मते भाजप उमेदवारांनाच मिळतील. तेव्हा भाजप ६० मध्ये आटपेल हे मला तरी शक्य वाटत नाही. बघू काय होते ते.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सद्यस्थितीत भाजप व सेना हे दोघेही स्वबळावर लढले तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती किमान बहुमत मिळवेल हे नक्की. १७५-१८० पर्यंत जाण्याची शक्यता बरीच कमी आहे. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीला १६१ जागा होत्या. मधल्या २५-३० जागांचा फरक हा निवडणुकीच्या वेळी मनसे, सप, शेकाप सारखे लहान पक्ष कोणाशी युती करतील त्यावर ठरू शकेल. लागोपाठ २ निवडणुकीत पूर्ण वाट लागल्याने मनसे आता एकटे लढतील असे वाटत नाही. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीला १३८ तर कॉंग्रेसला ८० जागा होत्या. उर्वरीत ७० जागा या शेकाप, जनता दल, सप, अपक्ष अशा अनेकांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. पुढील निवडणुकीत लहान पक्षांचा वाटा तुलनेने बराच मोठा असू शकतो. २००९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा होत्या. पण त्यावेळी सेना व भाजप युती होती. पुढील निवडणुकीत भाजप व सेना एकटे लढतील असे आतातरी वाटत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती नक्की असणार. अशा परिस्थितीत या युतीला सर्वाधिक जागा मिळतील हे नक्की. कोणाला नक्की किती जागा मिळतील याचा अंदाज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच येईल.

बिटाकाका नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुमची काय अपेक्षा होती की मागच्या प्रत्येक प्रकारणावेळी सरकार पडेल? असं कुठं होत असतं का राव? प्रकरण फसली म्हणजे नेमकं काय झालं? थोडक्यात तुमची अपेक्षा असावी की अशाच प्रकरणात भाजप ने बोलावे ज्याने त्यांना सत्ता मिळेल नाहीतर बोलू नये आणि माझ्या मते ही विचित्र अपेक्षा आहे.

मुक्त विहारि नवीन

In reply to by बिटाकाका

सगळे पक्ष आपापली पोळी भाजून घेत आहेत 1. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने, शिवसेनेला उदारमतवादी बनवले 2. भाजप, विरोधी पक्षाची भुमिका व्यवस्थित मांडत आहे 3. 80% जनता, आपण शिवसेनेला मत दिले नाही, हे योग्यच केले, असे समजत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पण, अर्थखाते आणि गृहमंत्री खाते, ही महत्वाची खाती, शिवसेनेकडे नाहीत... आता शिवसेनेची मदार फक्त हाॅटेल्स आणि बाॅलीवूड, यांच्यावरच अवलंबून आहे.. पण तिथेही, इतर पक्षांचा सहभाग आहेच.... आता शिवसेनेची मदार आहे ती फक्त, फेरीवाले, रिक्षा संघटना आणि इतर संघटीत मतदारांवर, मराठी आणि हिंदू, असंघटीत मतदार शिवसेनेला मत देण्याची शक्यता कमीच आहे...

श्रीगुरुजी नवीन

In reply to by बिटाकाका

प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड जोर लावूनही प्रकरणातून काहीही निष्पन्न झाले नाही. भाजपने खऱ्याखुऱ्या समस्यांवर बोलावे. अशा फालतू प्रकरणात ताकद वाया घालवू नये, अशी माझी अपेक्षा आहे.

बिटाकाका नवीन

In reply to by श्रीगुरुजी

भाजप खऱ्याखुऱ्या समस्यांवर तर बोलतच आहे त्याव्यतिरिक्त ही अशी एरवी सहज दडपली गेली असती अशी प्रकरणे उचलून धरून जो द्यायचा तो योग्य संदेश देत आहे असे मला वाटते. विरोधी पक्षाचे ते कामच आहे. युसलेस मीडिया ने घातलेला गोंधळ आणि भाजप ने अधिकृत रित्या लावून धरलेले मुद्दे यात गल्लत करू नये असे मला वाटते. फडणवीस हे दुसऱ्यांदा अतिशय उत्तमपणे विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहे असे माझे मत आहे.

Rajesh188 नवीन

Corona च्या नावाखाली प्लॅटफॉर्म तिकीट दर प्रचंड वाढवले आहेत आता प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये केला आहे. खासगी रेल्वे सारखे exp train मधील ज्येष्ठ नागरिक किंवा बाकी लोकांना मिळणाऱ्या तिकीट दरातील सुविधा बंद केल्या आहेत. गुपचूप रेल्वे चे खासगीकरण तर करण्याचा सरकार चा डाव नाही ना.

Rajesh188 नवीन

In reply to by आग्या१९९०

काही रेल्वे मार्गावर खासगी रेल्वे गाड्या धावायला पण लागल्या. एकदम केले की विरोध होईल म्हणून हळू हळू चालू आहे. लोक covid मध्ये अडकली आहेत त्याचा फायदा घेणे चालू आहे

सुक्या नवीन

In reply to by Rajesh188

मला खात्री आहे .. तुम्ही .. प्रायवेट चानेल न बघता दुरदर्शन बघत असाल. प्रायवेट कंपणीची गाडी न वापरता आंबेसिडर वापरत असाल प्रायवेट बँके ऐवजी एस बी आइ मधे बन्किन्ग करत असाल प्रायवेट नेट ऐवजी एम्टीएनेल / बीएसएनएल वापरत असाल प्रायवेट होस्पिटल ऐवजी सरकारी दवाखाना वापरत असाल ... रामदास स्वामींची ती गोष्ट माहीत आहे ना ज्यात एक माता आपला मुलगा खुप गूळ खातो असे सांगत होती ? तेव्हा आधी प्रायवेट जे काही असेल ते वापरणे सोडा. . . .मग बोला ...

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

सचिन वाझे नामक अधिकारी अम्बानी प्रकरणात तपास करत होता. हा सचिन वाझे कोण? ६०-६५ एन्काऊन्टरमध्ये सहभागी असलेला हा गृहस्थ 'एन्काउन्टर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखला जायचा. २००२ साली घाटकोपर येथे बेस्ट बस स्फोटात 'ख्वाजा युनुस' ह्या संगणक अभियंत्याला अटक करण्यात आली होती. तपासात त्याला थर्ड डिग्री देउन नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे 'शौर्य' ज्यानी दाखवले त्यात सचिन वाझे होता. न्यायालयाने मग त्यांच्यावर कारवाई केली होती. २००८ साली रामदास कदम ह्या शिवसेना नेत्याचा ड्रायव्हर बनण्याचे कामही ह्या वाझेसाहेबानी केले होते. २०१९ मध्ये नविन सरकार आल्यावर ह्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. असो. तर असा हा 'कर्तबगार' अधिकारी हिरेन मनसुख ह्यांच्याबरोबर बराच काळ संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. हिरेन मनसुख काही दिवसापुर्वी क्रॉफर्ड मार्केट येथे एका व्यक्तीला भेटला. त्या व्यक्तीचे नाव जाहीर करा अशी मागणी फडणवीस ह्यानी केली आहे. क्रॉफर्ड मार्केट येथे हिरेन मनसुख कशासाठी गेले? क्रॉफर्ड मार्केट येथे पोलिस मुख्यालय आहे! https://www.indiatoday.in/india/story/khwaja-yunus-murder-case-encounter-specialist-sachin-vaze-reinstated-1686351-2020-06-07

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

मनसुख हिरेन प्रकरण गुंतागुंतीचे दिसतय. हिरेन मनसुख ह्यांचा गाडी-डेकॉरचा धंदा होता. नेमकी ह्यांची गाडी चोरीला जावी हा योगायोग समजायचा का? हे सचिन वझे मुंबईतील अधिकारी पण हिरेन ह्यांचा मृत्यु झाल्यावर हे अधिकारी मुंबईतून ठाण्यात गेले व ह्या प्रकरणात रस घेउ लागले. आता हे प्रकरण ए.टी.एस.कडे गेले आहे.

Rajesh188 नवीन

The फ्रीडम हाऊस च्या अहवालात भारताला स्वतंत्र देशाच्या यादीत खाली आणून 'आंशिक स्वतंत्र ' देशाच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. शेवटी भारताचे जगात नाव करून दाखवले च. 'मोदी हे तो मुणकिन hai'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

शेतकरी आंदोलकांच्या आंदोलनाचा आज शंभरावा दिवस. प्रसिद्धी माध्यमांमधे शेतकरी आंदोलनाची धग कुठेच दिसणार याची पुरेपुर काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे केवळ युट्यूब आणि सोशियल मिडियाद्वारे या आंदोलनाची माहिती येत असते. सत्य लपवून ठेवता येत नाही. भविष्याचा अंदाज येत नसतांनाही संघर्षाच्या निर्धारावर ठाम असल्याचे दिल्लीच्या पाच सीमांवर सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाचे हे चित्र आहे. शंभराव्या दिवसापर्यंत मोदीसरकार हलले नसले तरी, शेतक-यांचा निर्धारही ढळलेला नाही. कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणखी किती दिवस आंदोलन करावे लागेल याचा कोणताही अंदाज आंदोलकांना नसेल, एकदा असे आंदोलन मोडून काढल्या गेले, त्याकडे दुर्लक्ष झाले तर येत्या काळात कोणतेही आंदोलन असेच सरकार दडपून टाकेल, २८७ च्या जवळपास शेतक-यांना आपल्या जीवाला गमवावे लागले (संख्या संदर्भ दै. लोकसत्त्ता) आणि अशा वेळी आंदोलन थांबले तर, देशात असे आंदोलन पुन्हा कधीच उभे राहणार नाही, ही जाणीव शेतकरी आंदोलकांना असल्यामुळे ते सहजासहजी मागे हटणार नाहीत असे चिन्ह आहेत, एक भारतीय म्हणून त्याच्या लढ्याला-संघर्षाला आपला कडक सॅल्यूट आहे. २६ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या आंदोलनात अनेक वळणे आली. सरकारसोबत ११ पेक्षा अधिक चर्चेच्या फे-या झाल्या. कडाक्याची थंडी, पाण्याचे फवारे, रस्त्यात रोवलेले खिळे, प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न, त्यामुळे तर आंदोलनाचे कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झाले होते, पोलिसांनी घेराव घालून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतक-यांवर गुन्हे दाखल केले. तंबु उखडून फेकले, लंगर बंद केले. वीज बंद केली, पाणी बंद केले. शौचालये हटवली. मारहाण केली. खोटे समर्थक आणून आम्हाला शेतक-यांच्या आंदोलनाचा त्रास होत आहे, त्यांना हटवावे असे खोटे बोलणारे लोक उभे केले. तरीही आंदोलकांनी हळुहळु आपला जम बसवला. सरकारने साम-दाम-दंड भेद नितीचा वापर केला पण दिल्लीच्या सीमेवर सिंधु-गाझीपूर-टीकरी, शाहाजनपूर, ढासा सीमेवर बसलेले शेतकरी हलले नाहीत. चाळीसपेक्षा अधिक संघटनामधे फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेतकरी समर्थक अजून एकजूट झाले, शक्ती वाढली, सरकारने शेतकरी आंदोलकांवर केलेला अन्याय लाखो लोकांनी पाहिला तीच शक्ती या आंदोलकांची झाली. आता आंदोलकांनी आपल्या आंदोलनाचे डावपेचही बदलत असल्याचे लक्षात येत आहे. सरकारने शेतकरी आंदोलकांशी २२ जानेवारीपासून संवाद बंद केल्यानंतर, एक कॉल की दुरी या निव्वळ सरकारच्या बाता आहेत हे आंदोलकांना माहिती आहे, तेव्हा सरकारवर दबाव आणन्यासाठी जेलभरो आंदोलन, संसदेस घेराव, पाकच्या अटारीसीमेपासून ते सिंधु सीमेपर्यंत मानवी साखळी उभारणे, आमरण उपोषण करणे यासारखा उपायांवर आंदोलन अधिक तीव्र करण्यावर किसान मोर्चा विचार करणार आहे. आंदोलनात २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे आंदोलनाने सहानुभूती गमावली असे चित्र निर्माण केले गेले पण टीकैत यांचा अश्रुंचा बांध फुटला आणि पुन्हा आंदोलनात जान भरल्या गेली. पंजाबच्या शेतक-या नंतर जाट आणि गुजर समुदायाचा सहभाग वाढला. आज शेतक-यांची संख्या रोडावली असली तरी आंदोलनाच्या भविष्यावर फरक पडणार नाही. शेतकरी कापणी करुन पुन्हा मोठ्या संखेने आंदोलनात पुन्हा सहभागी होतील. आंदोलकांनी आंदोलनाचे स्वरुप बदलले आहे, दिवसभर भाषणे चालू असतात. आंदोलनाला देशातील ४४ गुरुद्वाराच्या प्रबंधन समित्यांकडून पूर्ण पाठबळ लाभलेले आहे. गुरुद्वारांच्या लंगरच्या माध्यमातून नाश्ता, भोजनाची व्यवस्था होत आहे. तंबूंची काळजी, वीजेची सोय, स्वच्छ स्नानगृहे, या सर्वांची व्यवस्था गुरुद्वारा प्रबंधन समितीकडून केली जात आहे. आंदोलकांची संख्या वाढली की व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत होते आणि पुन्हा एक दोन दिवसानंतर ती व्यवस्था पूर्वपदावर येते. मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो. तिन्ही कायदे रद्द करण्यासोबत किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा रद्द करण्याची मागणी मान्य झाल्याशिवाय परत जायचेच नाही या निर्धाराने दिल्लीच्या सीमा बाधित करणारे आंदोलन सहजासहजी गुंडाळले जाईल असे चिन्ह आज तरी दिसत नाही. जाता जाता : टाइमच्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी '' आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करु शकत नाही'' या ओळींसह जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाच्या मुखपृष्ठांवर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतक-यांना स्थान मिळाले आहे. प्रतिसाद माहिती संदर्भ : दै. सकाळ, लोकमत, लोकसत्ता आणि टाइम. -दिलीप बिरुटे

मुक्त विहारि नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतकरी तर नक्कीच नाहीत... कायदा हातात घेणारा, अस्सल शेतकरी असूच शकत नाही... जो जनावरांसाठी डोळ्यातून पाणी काढतो, तो मानवहत्या कशी करेल?

पिनाक नवीन

In reply to by मुक्त विहारि

फारच अपेक्षा करता तुम्ही. शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by पिनाक

शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.
मोदींनी ते कायदे केले आहेत हेच अशा लोकांच्या मते चुकीचे आहे. असल्या लोकांच्या रोमारोमात मोदीद्वेष इतका भिनला आहे की समजा मोदींनी म्हटले की दररोज सकाळी तिकडे (म्हणजे कुठे ते विचारू नका) जावे तर ते लोक मरायला टेकले तरी तिकडे जायचे नाहीत.

सुक्या नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न" प्रतीवाद करण्याची ईच्छा नाहीये .. पण प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाज वाटावी असेच होते ... त्यामुळे चालु द्या. वर्गणी दिली तरी चालेल ...

सुक्या नवीन

In reply to by मुक्त विहारि

सहमत ... रिकामटेकडे लोक असले धंदे करतात. सगळे फुकट मिळते आहे तर गजाली करायला काय जाते ... "मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो." असले प्रकार आम्ही ग्लँपिंग ला करतो ... च्यायला आंदोलन आहे की टाइमपास?

मुक्त विहारि नवीन

In reply to by सुक्या

नाहीतर, ह्या आंदोलनाच्या निमित्ताने, ऐश करायला गेलो असतो... ऑगस्ट ते ऑक्टोबर, हा तसा फ्री काळ असतो, तितके दिवस चालले तर, जाऊन यायचा विचार आहे...

श्रीगुरुजी नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेलेल्या म्हशीला मणभर दूध अशी या दलालांच्या आंदोलनाची अवस्था आहे. ते केव्हाच संपले आहे. परंतु बिरबलाच्या मेलेल्या पोपटासारखी यांची अवस्था आहे.

Rajesh188 नवीन

शेतकरी कायदे कसे शेतकऱ्यांचे अहित करतील ह्याची कारणं खूप वेळा सांगून झाली आहेत. तीच परत वाचावीत. ज्यांच्या साठी कायदे करत आहात त्यांनाच ते nako आहेत. जबरदस्ती नी कशाला भले करताय

आनन्दा नवीन

In reply to by Rajesh188

तुम्हाला कितीतरी वेळा तुम्ही किंवा प्राडॉ नी लेख लिहून सविस्तर उहापोह करा म्हणून सांगितले. पण तुम्ही मुद्देसूद चर्चा करायला कधी येतच नाही. अजूनही सांगतो, आंदोलन आहे आंदोलन आहे म्हणून ओरडण्याचा अगोदर त्या कायद्यात नेमक्या काय चुका आहेत, आणि त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत का, असतील तर कश्या, नसतील तर का नाहीत याचा एक सविस्तर लेख लिहा. उगीच प्रच्छन्नपणे बिनबुडाचे आरोप करत फिरू नका.. उगीच नसलेली अजून जाते.

अमर विश्वास नवीन

In reply to by Rajesh188

राजेश १८८ शेतकरी कायद्यात काय चुकीचे आहे हे तुम्ही कधीच सांगितलेले नाही .. उगाच गळा मात्र काढताय

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by मुक्त विहारि

तसा तृणमूलमध्ये कोणी चांगला माणूस असेल असे वाटत नाही. बरेचसे सारदा-नारदा चिट फंड घोटाळ्यात गुंतलेले आहेत. त्यातील मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांनी भाजपत प्रवेश केला पण आहे. तरीही दिनेश त्रिवेदी हा त्यातल्या त्यात बरा माणूस आहे असे दिसते. २०१२ मध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेची तिकिटे एक रूपयाने वाढवल्यावर ममतांनी थयथयाट केला होता आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. तेव्हा रेल्वेला दुसरी एअर इंडिया बनू द्यायची नाही ही रेल्वेमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे असे बरेच सेन्सिबल विधान त्यांनी केले होते. तसेच ममतांच्या आक्रस्ताळेपणात आणि इतर थयथयाटात डेरेक ओ ब्रायन सारखे सहभागी असतात त्याप्रमाणे दिनेश त्रिवेदी कधी सहभागी असल्याचे वाचल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.

शाम भागवत नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by शाम भागवत

पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?
तसे होईलच. शुभेंदू अधिकारी तरूण आहे आणि नंदीग्रामसारख्या चळवळीची पार्श्वभूमी असल्याने जास्त ग्लॅमरस आहेत. तसेच त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सगळ्यात पहिल्यांदा १९८२ मध्ये बंगाल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते म्हणजे ती राजकीय पार्श्वभूमी त्यांना आहे. त्यामानाने दिनेश त्रिवेदी वयाच्या सत्तरीत आहेत आणि फार कधी मिडियामध्ये येत नाहीत. लेनिन म्हणायचा तसे हे सगळे लोक युजफूल इडियट्स आहेत. ममताच्या साम्राज्याला धक्का लावायचा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यांना लवकरात लवकर फेकून द्यायला हवे. अर्थात तसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

Rajesh188 नवीन

Bjp ल बंगाल मध्ये चांगले यश मिळाले असेल पण त्या वरून विधान सभेच्या निवडणुकी मध्ये तसेच मतदान होईल हे नक्की नसते. लोकसभेच्या निवडणुकीत लोक विचार करताना देश पातळीवर चा विचार करतात. बांगलादेश ची सीमा बंगाल ला लागून आहे त्या मुळे घुसघोरी चा प्रश्न bjp सोडवेल अशी भावना असू शकते.मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्या मुळे हिंदू card चालले असेल.किंवा देशभर पसरलेल्या बंगाली लोकांचे हित bjp जपेल अशी भावना असेल. पण विधान सभेच्या निवडणुकीत भाषिक अस्मिता जोरात असते.अमित शाह,आणि मोदी जी दोघे ही गैर बंगाली ,राज्य स्तरावर च राज्यभर प्रभाव असणारा नेता bjp कडे असलाच पाहिजे.तर च त्याच्या जोरावर मत मागता येतील. भाषिक अस्मिता ही अतिशय तीव्र असते आणि गैर हिंदी राज्यात त्या अस्मितेचा जोर असतो. परत पेट्रोल चे वाढलेले दर,वाढती महागाई,शेती विषयक कायदे, रेल्वे चे खासगीकरण हे मुद्दे लोकांची मत फिरवू शकतात.बंगाल मधून सुद्धा देशभर प्रचंड स्थलांतर होत आहे.त्या मुळे रेल्वे हा त्यांच्या दृष्टी नी महत्वाचा विषय आहे.

श्रीगुरुजी नवीन

https://www.loksatta.com/pune-news/veteran-actor-shrikant-moghe-passes-away-msr-87-svk-88-2415432/ जेष्ठ मराठी अभिनेता श्रीकांत मोघे यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

श्रीगुरुजी नवीन

https://m.rediff.com/news/column/aakar-patel-does-modi-really-care-about-indians/20210306.htm The rights to - freedom of speech and expression - practice any profession or occupation - peaceful assembly - form associations - freely practice and propagate religion - to be deprived of life and liberty do not exist in India today. These rights are Fundamental, which enjoy a high degree of protection from encroachment by the State. But they are not available to Indians today despite what the Constituent Assembly wanted. The State has taken them away and many never existed in the first place.

धनावडे नवीन

In reply to by Vichar Manus

कसला विरोध? माझे निम्मे नातेवाईक शेती करतात, त्यांच्या तोंडून या कायद्याबद्दल काहीच ऐकलं नाही, ज्यांना कायद्याबद्दल माहित आहे त्यांना काहीच समस्या नाही.

मुक्त विहारि नवीन

In reply to by धनावडे

https://www.loksatta.com/maharashtra-news/82-point-2-per-cent-farmers-oppose-agricultural-laws-abn-97-2415497/ ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे, तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे सांगितले...

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/desh-videsh-news/ram-mandir-teerth-kshetra-trust-receives-2-5-thousand-crore-donation-for-the-temple-pmw-88-2415403/ शिवसेनेचे दुःख इथे आहे, ही देणगी, सामान्य माणसांनी गोळा केलेली आहे....

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/desh-videsh-news/tmc-leader-threatens-voters-about-post-poll-consequences-sbi-84-2415609/ टीएमसीचे उमेदवार तपन दासगुप्ता यांनी मतदारांना सांगितले की ज्या भागात त्यांना मत मिळणार नाहीत त्या भागातील लोकांना “वीज आणि पाणी मिळणार नाही”. हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by मुक्त विहारि

हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.
यावर पुरोगामी विचारवंतांची आणि शिवसेना समर्थकांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे बघायचे. ते सोयीस्कर मौन पाळतील ही शक्यता सर्वात जास्त.

मुक्त विहारि नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कधीच जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत... तृणमुल कॉंग्रेस पण अशीच आहे... भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, तृणमुल कॉंग्रेसने पण गठबंधनात भुमिका घेतली होतीच... अशा पक्षाबरोबर, शिवसेना, हात मिळवत आहे.... दिवसेंदिवस शिवसेना मनांतून उतरत चालली आहे..

राघव नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

फारतर "ममताद्रोही" किंवा "तृणमूलद्रोही" म्हणायला हरकत नाही. तृणमूलला विरोध म्हणजे देशाला विरोध असे म्हणायचे आहे असे दिसते, किंवा या बातमीच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारला हाणायचा बेत दिसतोय! :-)

सॅगी नवीन

बातमी गँग्ज ऑफ वासेपुर मधल्या एका वाक्याची आठवण झाली..."मजदूर पैदा हुये थे...मजदूर ही मरोगे......वोट ना दिया हमे...तो जिंदा जलोगे" इथे जिवंत जाळणार नाहीत, पण जिवंतपणीच नरकयातना भोगायला नक्की लावतील हे लोकं.

मुक्त विहारि नवीन

In reply to by सॅगी

मराठी माणसांचे दुर्दैव असे आहे की, शिवसेने सारखा मराठी पक्ष, अशा वृत्तीच्या माणसांबरोबर युती करतो.... निवडणूकीत हारजीत ही व्हायचीच, पण सामान्य माणसावर सूड उगवणे ही पाशवी वृत्ती मराठी माणसांत नाही...

Rajesh188 नवीन

In reply to by मुक्त विहारि

शिवसेनेने bjp ची झोप उडवली आहे एक महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात ह्यांना सत्ता मिळू दिली नाही. आणि भविष्यात अजुन किती वर्ष महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही ह्याची शाश्वती नाही. कसा भागवायच पक्षाचा खर्च निवडणूक फंड कोण देणार ह्यांना. बिहार ,यूपी हातात आहे तिथे फक्त आंधळे भक्त मिळतात निवडणूक फंड मिळत नाही. सेने नी अवघड करून ठेवलं आहे. झोप लागणं कोणालाच.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सॅगी

२०१४ मधील निवडणुकीच्या प्रचारात अजितदादांनी एका बारामती परिसरातील एका गावातील सभेत अगदी अशीच धमकी दिल्याची ध्वनीफीत प्रसिद्ध झाली होती. तेच अजितदादा नंतर फडणवीसांचे बडी झाले होते आणि आता ते उद्धव ठाकरेंचे बडी आहेत. हा त्या विषयावर निघालेला मिपावरील धागा https://www.misalpav.com/node/27632 हीच ती धमकीची चित्रफीत https://youtu.be/ZToKF05aTHY

उपयोजक नवीन

मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमधे प्रवेश!

Rajesh188 नवीन

जन्म बांगला देशात 1950 ला. Nexal movement मध्ये पण सुरुवातीला नाव जोडले होते. नंतर सिनेमे,नाटक केली की नाही माहीत नाही. तृणमूल काँग्रेस नी ह्यांना राज्यसभेवर पाठवला(तेव्हा ममता पूजनीय होत्या,वंदनीय होत्या मिथुन साठी) श्रद्धा स्कॅम ह्यांच्या पर्यंत पोचले म्हणून राज्यसभेचा राजीनामा. राज्यसभेत हे महाशय ह्यांच्या कार्यकाळात फक्त तीन दिवस हजर होते. आता हे सत्तर वर्षाचे आहेत आणि निवडुंग सारखे निवडणूक पूर्ण bjp मध्ये गेले. हे सत्तर वर्षाचे ह्यांचे शरीर च सांभाळणे ह्यांना भारी पडत आहे आता बंगाल सांभाळणार. आणि ह्यांच्या वर bjp ची भिस्त. पाच वर्षांपूर्वी पूजनीय,वंदनीय असलेल्या ममता जी ह्यांना आता आदरणीय वाटत नाहीत. किती नाटक करणार.

Rajesh188 नवीन

2019/20 वर्षाचा सर्वोत्तम शुध्द पाणी पुरवठा करणारी महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेला पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबई मधील पिण्याचे पाणी 99.34टक्के शुद्ध आहे.योगीच्या रामराज्य मध्ये असे शुद्ध पाणी नाही.

स्वलिखित नवीन

In reply to by Rajesh188

केंद्रात भाजप असल्यामुळे छोट्या मोठ्या संस्था स्वायत्त काम करत आहेत , सत्यापन आणि सत्य यावर आधारित रिपोर्ट सादर करत आहेत आणि करू दिले जात आहेत , नाहीतर स्वतः अवॉर्ड तयार करून स्वतःला अर्पण करणाऱ्याची संख्या कमी नव्हती ,

मुक्त विहारि नवीन

In reply to by स्वलिखित

महानगर पालिकेचा 12 व्वा नंबर आला... जबरदस्त प्रदूषण असतानांही, 12 व्वा नंबर आहे, त्यातच सगळे काही आले... अर्थात, ह्या नंबरमुळे, जागांचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही...

श्रीगुरुजी नवीन

मोदी प्रचारात DNA हा शब्द काही वेळा वापरतात. पूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत विनाकारण DNA शब्द वापरून काहीतरी चुकीची वाक्ये वापरली होती. त्यावेळी नीतीशकुमारांनी या संदर्भाचा वापर करून मोदींवर जोरदार हल्ला चढविला होता. आता पुन्हा एकदा मोदींनी DNA शब्दाचा वापर प्रचारात केला आहे. https://www.indiatoday.in/elections/west-bengal-assembly-polls-2021/story/pm-modi-bjp-bengal-kolkata-rally-brigadechalo-tmc-trinamool-mamata-didi-sonar-bangla-asol-poribortan-1776619-2021-03-07

मुक्त विहारि नवीन

आम्ही मुस्लिम मतांमुळे निवडून आलो, असे सांगतात आणि नंतर म्हणतात की..... https://maharashtratimes.com/india-news/bjp-spreading-communal-poison-in-country-says-sharad-pawar/articleshow/81377279.cms शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by मुक्त विहारि

शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...
माझा तरी विश्वास नाही म्हणजे? खरं तर कोणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही :)

श्रीगुरुजी नवीन

In reply to by मुक्त विहारि

ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी प्रचार केला, तेच आज भाजपवर जातीयवादाचा आरोप करीत आहेत. ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर हेच दिल्लीला जाऊन भाजपबरोबर सरकारस्थापनेची चर्चा मोदी-शहांबरोबर करीत होते.

उपयोजक नवीन

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awhad-misuse-power-to-take-revenge-of-fb-post-by-anant-karmuse.html

उपयोजक नवीन

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awhad-misuse-power-to-take-revenge-of-fb-post-by-anant-karmuse.html

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/2411680/atum-1-0-cafe-racer-style-electric-motorcycle-commences-its-deliveries-check-price-and-other-details-sas-89/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-files-rape-case-against-2-after-son-asks-father-name-sgy-87-2415201/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS आता, महाराष्ट्र राज्यात पण, काही केसेस परत ओपन होऊ शकतात....

शलभ नवीन

In reply to by मुक्त विहारि

आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि उत्पन्न वाढीची चिंता अशी न्यूज आहे लोकसत्ता ला. ही खूप चांगली आयडिया आहे. सगळ्या दारू दुकानाचे परवाने रद्द करा आणि लिलाव करा. पण राजकारणी लोकांचीच दुकानं असतील ही सगळी..सो हे होणं अवघड आहे.

मुक्त विहारि नवीन

In reply to by शलभ

दारूच्या नादात, यादव बुडाले... ह्या धंद्यात राजकारणी मिलीभगत करू शकणार नाहीत... आपली पोळी कुणीच दुसर्याला देणार नाही...

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/maharashtra-news/minister-sanjay-rathod-sent-5-crore-rupees-to-pooja-chavans-mother-and-father-thats-why-they-are-silent-on-the-murder-allegations-by-shantabai-rathod-svk-88-sas-89-2410977/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS

मुक्त विहारि नवीन

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nanar-refinery-opposing-leaders-reaction-after-raj-thackeray-writes-open-letter-to-cm-thackeray-in-the-support-of-refinery-project/articleshow/81384969.cms हे असेच काहीसे, Enron च्या वेळी घडले होते... मातोश्री वर बैठक झाली आणि समुद्रात बुडलेली Enron बाहेर निघाली... इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते....

आनन्दा नवीन

In reply to by मुक्त विहारि

नाणार होणारच हे भविष्य मी 2 वर्षांपूर्वी वर्तवले होते. का ते मला माहीत आहे, पण उगाच पब्लिक फोरम वरती त्याची चर्चा नको.. नाणारची अधिसूचना रद्द करणे आणि तो प्रकल्प पुनर्जीवित करणे यात एक मोठे अर्थकारण दडलेले आहे. त्याचा साक्षात्कार मला MIDC आणि अधिग्रहण याचा एकंदर अभ्यास करताना माझ्या सरकारी कर्मचारी असलेल्या भावाने जेव्हा अधिग्रहण कायद्यातील एक क्लॉज सांगितला तेव्हा झाला.. याच कारणामुळे आपल्याकडे बरेच प्रकल्प आले की त्यांना विरोध होतो, मग ते रद्द होतात आणि पुन्हा जिवंत पण होतात :)

मुक्त विहारि नवीन

In reply to by आनन्दा

आधी एक बोलतात आणि नंतर शब्द फिरवतात... संजय दत्त, Enron, एक रूपयांत झुणका भाकर, ही काही उदाहरणे...

नगरीनिरंजन नवीन

श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा उघडा पडत चाललाय तसतशी त्यांच्या भज्तांची हेटाळणी वाढत चाललीय. मोठमोठ्या गप्पा मारणारे हे सुशिक्षित मूर्ख भक्त वेळ-काळ-स्थळ किंवा सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ सत्य किंवा वाढता जनारोष न पाहता मोदींच्या व्यक्तिपूजेत आपले भान हरपताना दिसतात. नुकतीच एअर फ्रान्सच्या पॅरिस ते दिल्ली विमानात घडलेली घटना खूप बोलकी आहे. आपल्या पूर्वजांनी बहुसंख्य भारतीयांचे दमन करणारी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेचे पुनरुज्जीवन मोदी करतील असे ह्या हिंदू उच्चवर्णीय भक्तांना वाटते आणि त्याला कोणी विरोध करताना दिसला की त्यांचे पित्त खवळते. असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत. https://scroll.in/latest/988894/air-france-flight-makes-emergency-landing-after-indian-passengers-disruptive-behaviour?fbclid=IwAR3PVUVAdD3_EjU7-I2M7sjLcvTXmyML6gaZr-Pw1zuuARLjkaC9GTVxKQU

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by नगरीनिरंजन

असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत.
मोदी याविषयी काही करू शकणार नाहीत , त्यांनी काही करूही नये आणि ते काही करणारही नाहीत. तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? बादवे, भक्त वगैरे गरळ ओकून झाल्यानंतर मन थार्‍यावर आले (आलेच तर) की मग असे करणारा माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो या शक्यतेचाही विचार करता आला तर करा.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by मुक्त विहारि

नुसते रामराव आदिक नाही राजीव गांधी पण आठवायला हवेत. भोपाळ वायुगळतीप्रकरणी युनियन कार्बाईडचे सीईओ वॉरन अ‍ॅन्डरसनना भारतीय कायद्याने अटक केली होती. ती अटक करणे कितपत समर्थनीय होते वगैरे प्रश्न आहेतच आणि दोनेक महिन्यांपूर्वी मिपावर साहनांनी त्यावर एक लेखही लिहिला होता. काहीही असले तरी भारतीय कायदेशीर प्रक्रीयेप्रमाणे वॉरन अ‍ॅन्डरसनला पकडले होते. तेव्हा भारतीय कायदाच त्यांना सोडेल असे राजीव गांधी म्हणाले का? छे भलतेच काही. आम्ही वॉरन अ‍ॅन्डरसनला सोडतो आणि तुम्ही आमचा एक माणूस सोडा असे डील राजीव गांधींनी अमेरिकेबरोबर केले होते. आणि तो सोडलेला माणूस कोण होता? तर फ्लॉरीडात ट्रक जाळल्याचा गुन्हा केल्यामुळे तुरूंगात असलेला राजीव गांधींचा मित्र आदिल शहरयार. वॉरन अ‍ॅन्डरसनला डिसेंबर १९८४ मध्ये सोडले आणि आदिल शहरयारला अमेरिकेने लगेच सोडले असते तर ते अगदीच डोळ्यात आले असते म्हणून राजीव गांधींनी जून १९८५ मध्ये पंतप्रधान म्हणून अमेरिकेला पहिली भेट दिली तेव्हा त्यांचे विमान अमेरिकेत पोचतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी आदिल शहरयारला माफी देऊन सोडले. म्हणजे ट्रक जाळणे या त्यामानाने कितीतरी किरकोळ गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकाला सोडून कितीतरी मोठ्या गुन्ह्यासाठी भारतीय कायद्याच्या कचाट्यात अडकू शकणार्‍या अमेरिकन नागरिकाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी सोडवले म्हणजे त्यांच्यासाठी ते कितीतरी चांगले डील झाले. खरं तर मोदींनी युरोपातल्या देशांबरोबर असेच काहीतरी डील केले पाहिजे. तुम्ही आमच्या भक्ताला सोडा आणि आम्ही कितीतरी मोठ्या गुन्ह्याबद्दल चौकशी चालू असलेल्या कोणा युरोपियनाला सोडतो अशाप्रकारचे.

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुमचे मोदी किती कार्यक्षम पंतप्रधान आहेत ते सांगा . तुमचे कर्तृत्व सांगा . आत्ता पर्यंत जेवढे कर्तृत्व भारताच्या सर्व पंत प्रधान असलेल्या लोकांनी केले आहे ह्याचा हिशोब मांडला तर मोदी चे देशाच्या भल्यासाठी काहीच कर्तृत्व नाही. शून्य च्या खाली किती तरी वजा शून्य असलेले आकडे वापरावे लागतील.

बिटाकाका नवीन

In reply to by Rajesh188

मोदींनी काय केले ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरच हवं असेल तर उगाच लोकांना विचारत कशाला फिरायचे? बरेच मोदींविरोधी लोकं असले बालिश प्रश्न विचारत फिरताना दिसतात. त्याऐवजी साधं सरळ गुगल करायचं. पण खात्री आहे मोदीद्वेषाचा ज्वर असं काही करू देत नाही.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by बिटाकाका

दंगलीमध्ये पोलिसांना काही ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश दिलेले असतात. त्याप्रमाणे मी माझ्या सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?) आदेश दिला आहे की प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. या आयडीचे प्रतिसाद वाचून त्याला उत्तरे द्यायचा संयम तुमच्याकडे आहे यामुळे प्रचंड आदर वाटायला लागला आहे :)

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मोदी चे उच्च विद्या विभूषित भक्त आहेत त्यांनाच ते स्वतः अयशस्वी मोदी ना का आपण का पाठिंबा देत आहोत हेच माहित नाही माझा प्रतिसाद दुर्लक्षित केला तरी सत्य स्थिती बदलत नाही .. उच्च विद्या विभूषित भक्त(हा शब्द नी ठरवून वापरत आहे बिनडोक ,अशिक्षित ,भक्त ह्यांना काहीच समजत नसते ते कधी ही विचार बदलतात बिचारे ) ह्यांना सर्व माहीत आहे पण तरी ते आंधळे झाले आहेत . पण बाकी लोक थोडी आंधळे आहेतं

बिटाकाका नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

लेकी बोले सुने लगे करायचा प्रयत्न करून बघितला, एवढा बावळट प्रश्न पडणारे बरेच असतात. ****** दारू पिऊन किंवा पॅनिक अटॅक मध्ये कुणीतरी विमानात दहा विचित्र गोष्टी करतो, त्यातली एक मोदींचे नाव घेणे असते, त्यातही मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक दिसतात. अवघड दुखणं आहे हे मोदीद्वेषज्वर :):).

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. + १ मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

आनन्दा नवीन

In reply to by नगरीनिरंजन

तो उच्चवर्णीय आहे याला काही आधार? की विमानप्रवास आणि परदेशगमन ही उचचवर्णीयांची मक्तेदारी आहे असे म्हणायचे आहे तुम्हाला? त्याचे नाव कळलेले नसून सुद्धा तुम्ही असे म्हणताय म्हणून विचारतोय. बाकी हाच न्याय लावायचा म्हटलं तर अल्ला हु अकबर म्हणून डांगे करण्याऱ्या लोकांचा अल्ला म्हणजे मोठेच failure मानले पाहिजे. कारण त्यांनी तर महाभयंकर उपद्व्याप केले आहेत. असो, मी यातले दोन्ही मानत नाही, पण तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय होतो ते दाखवावे म्हणून लिहिले.

पिनाक नवीन

In reply to by आनन्दा

नगरकरांना तेवढा विचार करायची शुद्ध आहे असा तुम्ही विचार करता म्हणजे नवल आहे. काहीही बरळून लिहिलेला प्रतिसाद आहे तो त्यांचा.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by पिनाक

खरं सांगायचं तर विमानात गोंधळ घातलेल्या प्रवाशापेक्षा त्याचा बादरायण संबंध मोदींशी जोडून आपली मोदीद्वेषाची खाज भागवून घेणारेच कायम नशेत असतात.

नगरीनिरंजन नवीन

In reply to by आनन्दा

प्रश्न सांख्यिकीचा आहे. फक्त उच्चवर्णीयच विमानप्रवास करतात असे मी म्हणतच नाहीय. मोदी भक्ती करणारे व काहीही झालं तरी मोदींची बाजू घेणारे कोण आहेत ते मी लिहीलंय फक्त. स्वत:ला काहीही फायदा नसूनही मोदी-मोदी करणारे निम्नवर्णीय/अवर्णीय मूर्खही असतातच; पण तुलनेने फारच कमी. बाकी मुस्लिमांतही जाती आहेतच. तसा फारसा फरक नाही

Rajesh188 नवीन

हे खरोखर उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्या क्षेत्रात प्रगती केलेली लोक आहेत पण मोदी हे पूर्णतः अयशस्वी पंतप्रधान आहेत हे त्यांच्या मेंदूत घुसत नाही. सर्व क्षेत्रात भारत मागे पडत आहे हे त्यांना दिसत नाही. समजा समाजात द्वेष वाढत आहे हे त्यांना दिसत नाही , देशाच्या इतिहासातील सर्वात नालायक पंतप्रधान ही त्यांची खरी प्रतिमा आहे. पण हे उच्च शिक्षित भक्त आंधळे झाले आहेत. नक्की ह्यांनी डिग्री अभ्यास करून घेतली आहे की कॉपी करून अशीच शंका येते.

श्रीगुरुजी नवीन

यात मोदींचा काय संबंध आहे? हा प्रवासी नशेत असण्याची शक्यता असू शकते. विमानात असा गोंधळ घालणारे दरवर्षी पाचसात प्रवासी सापडतात. त्यांचा मोदी किंवा इतरांशी संबंध काय? एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात. काही लोकांना ढाळ लागले किंवा खडा झाला तरी त्यासाठी ते मोदींनाच जबाबदार धरतात. वरील पोस्ट त्याच प्रकारातील आहे.

मुक्त विहारि नवीन

In reply to by श्रीगुरुजी

.... प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात.... असेही, असू शकते.... काही लोकांना घराणेशाहीची नशा चढते, तसेच असेल...

Rajesh188 नवीन

देश हितासाठी घेतलेले निर्णय ह्याची माहिती उच्च विभूषित भक्तांनी द्यावी आणि ते भक्त सांगतील ते थापा नाही खरे आहे हे बाकी लोकांनी मना पासून सांगावे. करा चालू उच्च शिक्षित मोदी भक्त.

नगरीनिरंजन नवीन

नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. सरकारी खर्चाने इतका प्रचंड प्रोपागांडा केला आहे की ज्यांच्याशी मोदींचा काही संबंध नाही तेही मोदी मोदी ओरडायला लागले आहेत असा त्याचा अर्थ होतो. बाकी विमानात गैरवर्तणूक करणारे बरेच असतात; परंतु विद्यमान पंतप्रधानाचे नाव घेऊन आरडाओरडा करण्याची व गोंधळ घालून विमानाचे इमर्जन्सी लेंडिंग करायला लावण्याची पहिलीच वेळ. विमानात हवाईसुंदरींशी गैरवर्तणूक करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे मग आदिक असो की आणखी कोणी. परंतु, ह्या नाकर्त्या सरकारला तेही जमलेले नाही. उलट तोंडाने बेटी बचाओ म्हणणार्‍या ह्या मनुवादी लोकांनी कठुआ, ऊन्नाव आणि हाथरसमध्ये बलात्कार्‍यांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by नगरीनिरंजन

नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर. मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

मोदी ह्यांचा फक्त एकच निर्णय आणि त्याची अंमलबजावणी सांगा . त्या मुळे सर्व स्तरातील हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली. मुकेश ,अदानी हे हिंदू नाहीत व्यापारी आहेत उद्या इम्रान नी जरी ह्यांचा फायदा केला तर तिकडे जावून हिंदू ना शिव्या देतील.

नगरीनिरंजन नवीन

In reply to by श्रीगुरुजी

किती निरागस आहात तुम्ही! मोदींनी द्वेषाला अधिकृतताच नव्हे तर राजमान्यता दिली आहे. ट्वीटरवर गरळ ओकणार्‍या आयडींना स्वतः मोदी फॉलो करतात. कोणत्याही समुदायाला सरसकट शिव्या घालणे, गौरी लंकेश सारख्या पत्रकारांच्या मृत्युवर हत्येवर अत्यंत हीणकस भाषेत शेरेबाजी करणे असल्या उद्योगांना शिक्षा करायची सोडून मोदी त्यांना फॉलो करतात. हा विद्वेष आता अधिकृतच नव्हे तर विभूषण ठरायला लागला आहे. ह्य विद्वेषाने लोकांची मानसिकता बदलते आहे. बाबू बजरंगी व साध्वी प्रज्ञांची उदाहरणे पाहून लोकांना त्यात वावगं वाटतच नाही. पोलिसांच्या देखत आंदोलकांवर बंदूक चालवणार्‍या उच्चवर्णीय हिंदू मुलाला काहीच होत नाही; जेएनयुमध्ये जाऊन झोडपलं विद्यार्थ्यांना तरी काहीही होत नाही हे कोणी दाखवून दिलं? हे कोणी घडवलं? विद्वेषाला खतपाणी घालून असे रेबीड लोक तयार करण्याचे काम कोण करतंय हे सगळ्या जगाला कळतंय; परंतु उच्चवर्णीय हिंदूंचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ते डिनायल मध्ये आहेत.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by नगरीनिरंजन

कसली द्वेषाला मान्यता? द्वेषभावना काय असते ते मी सांगतो. ज्याला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, मौत का सौदागर, सैनिकांच्या रक्ताचा दलाल, नीच माणूस, नरराक्षस, हिटलर, चहावाला, फेकू, शेठ, क्रूरकर्मा अशी खास विशेषणे ज्याच्या संदर्भात वारंवार वापरली जातात त्याला द्वेषभावना म्हणतात. असे म्हणणाऱ्यांचे कौतुक करणारेही द्वेष्टेच असतात. द्वेषाचा चष्मा सतत डोळ्यांंवर ठेवलेल्यांना यात द्वेषभावना दिसतच नाही.

स्वलिखित नवीन

सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही. ◆◆आता इथून सुरुवात करायची का ?? ■■ मुस्लिम हिताचा तर विषय सुद्धा नसेल , नाही का

Rajesh188 नवीन

In reply to by स्वलिखित

तेवढे कमजोर,असमर्थ मोदी काळात झाले. आर्थिक विवंचनेत हिंदू मोदी ह्यांच्या काळात च राहू लागले. बहुसंख्य हिंदू परावलंबी झाले कृषी कायद्यांनी अजुन हिंदू अशक्त होतील. हा कसला हिंदू हित वादी पंतप्रधान .. त्या पेक्षा औरंगजेब उत्तम होता.

राघव नवीन

In reply to by Rajesh188

आपला औरंगजेबाबद्दलचा अभ्यास बराच [कमी] आहे असं दिसतं. आपण काय लिहिता आहात याचं काही भान? अवांतरः मालक, केवळ धागा भरकटवण्यासाठी जरी आपण काही[बा]ही लिहित असलात तरी एक ताळतंत्र असावा. आपल्याला जरा आरामाची गरज आहे. काही दिवस वाचनमात्र राहावे अशी आपणांस सूचना कराविशी वाटते. कृपया जरा मनावर घ्यावे.

नगरीनिरंजन नवीन

In reply to by स्वलिखित

अर्थातच. बीजेपीला पूर्वापार स्वच्छपणे “बामन-बनियोंकी पार्टी” असेच म्हटले जातेय हे आपल्याला विदीत असेल वा नसेलही. पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. नवीन “टेकसॅव्ही” पिढीला तंत्रज्ञान कळत असेल; परंतु स्वतःचा इतिहास माहित असेलच असे नाही. अन्यथा “हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाहीय हे त्यांना कळले असते.

श्रीगुरुजी नवीन

पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की. आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.