आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल.
या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल.
तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे.
अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे.
वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही.
बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.
वर्गीकरण
वाचने
46920
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश
In reply to त्यातल्या त्यात बरा माणूस by चंद्रसूर्यकुमार
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश
हो
In reply to पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश by शाम भागवत
युती मोडल्याची किंमत
लोकसभेच्या निवडणुकीत
माझं तर म्हणणं आहे कृषी
https://www.loksatta.com/pune
https://m.rediff.com/news
https://www.loksatta.com
महाराष्ट्रातील 82 टक्के
कसला विरोध? माझे निम्मे
In reply to महाराष्ट्रातील 82 टक्के by Vichar Manus
सहमत आहे
In reply to कसला विरोध? माझे निम्मे by धनावडे
राम मंदिर देणगी
पाकिस्तान मध्ये हिंदू हत्याकांड
बोगस सरकारी कर्मचारी स्कॅन्डल
मते द्या नाहीतर, वीज आणि पाणी मिळणार नाहीत
पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया?
In reply to मते द्या नाहीतर, वीज आणि पाणी मिळणार नाहीत by मुक्त विहारि
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष,
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
फारतर "ममताद्रोही" किंवा
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
दीदी आणि त्यांचे शासन
मी हीच बातमी दिली आहे ....
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
झोपेत स्वप्न
In reply to मी हीच बातमी दिली आहे .... by मुक्त विहारि
२०१४ मधील निवडणुकीच्या
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
अभिनेता
रामा रामा.
In reply to अभिनेता by उपयोजक
मिथुन
सेने विषयी चांगलीच बातमी येते आहे नशीब खराब आहे bjp च
अच्छी बात है
In reply to सेने विषयी चांगलीच बातमी येते आहे नशीब खराब आहे bjp च by Rajesh188
कल्याण-डोंबिवली
In reply to अच्छी बात है by स्वलिखित
मोदी प्रचारात DNA हा शब्द
हे कोण बोलले, बोला ....
नक्की कोणाचा आहे?
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
तुम्हाला आणि काही लोकांना समजते ते
In reply to ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी by श्रीगुरुजी
कृपया पवारांना काही बोलू नये. दीर्घायुषी व्हावे.
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
कृपया पवारांना काही बोलू नये. दीर्घायुषी व्हावे.
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
सलमान खानच्या कारचा अपघात आठवला...
आत्मनिर्भर
शिवसेनेचे मुख्यमंत्री होताच वाझे पुन्हा सेवेत कसे रूजू झाले?
देर है लेकिन अंधेर नहीं
दारूच्या धंद्यात किती पैसा मिळतो?
आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि
In reply to दारूच्या धंद्यात किती पैसा मिळतो? by मुक्त विहारि
असू देत .....
In reply to आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि by शलभ
पुजा राठोड आत्महत्या
नाणार, मनसे आणि ग्रामस्थ
नाणार होणारच हे भविष्य मी 2
In reply to नाणार, मनसे आणि ग्रामस्थ by मुक्त विहारि
शिवसेना नेहमीच असे करते
In reply to नाणार होणारच हे भविष्य मी 2 by आनन्दा
श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा
दोन गोष्टी
In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
रामराव आदिक आठवले
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
राजीव गांधी पण आठवायला हवेत
In reply to रामराव आदिक आठवले by मुक्त विहारि
जुने विसरा
In reply to राजीव गांधी पण आठवायला हवेत by चंद्रसूर्यकुमार
मोदींनी काय केले ह्या
In reply to जुने विसरा by Rajesh188
आदर
In reply to मोदींनी काय केले ह्या by बिटाकाका
खरे सांगायचे तर
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
लेकी बोले सुने लगे करायचा
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही.+ १ मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.त्यांनी काय होते
In reply to प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव by श्रीगुरुजी
रेटून बोलले
In reply to त्यांनी काय होते by Rajesh188
तसेही आपल्यासाठी विमानात
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत?इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.तो उच्चवर्णीय आहे याला काही
In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
नगरकरांना तेवढा विचार करायची
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
खरं सांगायचं तर विमानात गोंधळ
In reply to नगरकरांना तेवढा विचार करायची by पिनाक
प्रश्न सांख्यिकीचा आहे. फक्त
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
BJP चे चमचे
यात मोदींचा काय संबंध आहे? हा
एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी....
In reply to यात मोदींचा काय संबंध आहे? हा by श्रीगुरुजी
ते सर्व
In reply to एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी.... by मुक्त विहारि
गुलामगिरी करणारे अडाणी असतात
In reply to ते सर्व by Rajesh188
मोदी नी