Skip to main content

महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

लेखक स्वामि १ यांनी बुधवार, 01/05/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का? तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का? वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?

वाचने 35593
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
होय
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
होय
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
होय
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
होय

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नेमका हाच शब्द वाचून मि.पा. च्या भाषेत सांगायचे तर डोळे पाणावले. ;-) बाकी बुंदी पाडल्यासारखे धागे पाडणे सुरु आहे, ते चालु देत.

दोनोळी धागा उडवावा ही विनंती. अन त्यातही "१" असे लिहीले असल्याने स्वामींना विनंती आहे की त्यांनीच हा धागा उडवण्याची विनंती संपादकांना करावी अन या पुढे मोठा धागा काढावा. आपले या वरील प्रश्नांबाबत काय मत आहे ते लिहावे, विवेचन करावे. ट्विटर प्रमाणे धागे काढू नयेत हि अपेक्षा.

शिर्षकाचा आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांचा काय संबंध आहे? तुम्ही विचारलेले प्रश्न हे महाराष्ट्रातील चालू घडामोडी ह्या सदरात मोडतात का?

10 वर्षे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत 10 वर्षे मराठी विषय शिकून 10 पेपर दिल्यानंतरही तुम्हाला मराठी धड लिहिता येत नसेल तर तुम्ही मराठीचा अभ्यास नीट केला नाही असं सिद्ध होतं . मग इतिहास आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास त्यापेक्षा अधिक चांगला असेल अशी काही शक्यता वाटत नाही , तो असता तर मुळातच वर जे प्रश्न विचारले आहेत ते पडले नसते. एरवी लेखकाने व्यक्त होणं महत्वाचं ; भाषा शुद्ध अशुद्ध याला फार महत्व नाही असं माझं मत आहे पण मराठी भाषा , मराठी भाषिक आणि महाराष्ट्र वगैरेच्या कळवळ्याच्या पोस्टी लिहिताना भाषा प्रमाण शुद्ध अशी अपेक्षा फार गैर नसावी . पोस्ट साधी दोनदा वाचायची तसदी घेतली असतीत तर 2 - 4 चुका सहज दिसल्या असत्या ... मिपा स्वतःहून सुचवतं - पोस्ट करण्यासाठी पोस्ट पूर्ण तयार आहे का की काही दुरुस्ती करायची आहे ... पण तुम्हाला डोक्यात आलं ते भराभरा खरडून पोस्टायचीच घाई ... महाराष्ट्र सुधारणं आणि वाचवणं खूप मोठी गोष्ट आहे , स्वतःची भाषा सुधारणं ही जरा जमण्यासारखी गोष्ट आहे , थोड्या प्रयत्नांनी ... राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?

In reply to by nishapari

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या फार करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे.

In reply to by स्वामि १

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या

फार

करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.

राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ? १ नंबर

भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? ह्या para मध्ये दोन पॉइंट आहेत १) लोकशाही. ह्या मध्ये सर्वांना मतदानाचा हक्क असतो आणि तो देशाच्या कोणत्या कोण्यातील व्यक्ती देशाच्या कोणत्याही ही भागात राहत असेल तर वापरू शकतो परिणाम रोजगार असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने देशातील काही राज्यातील लोकांचे प्रमाण इथे वाढले आहे ह्या मतदानाच्या हक्का मुळे ते महाराष्ट्र मध्ये राजकीय वातावरण गढूळ करतात .आणि हे राज्य सुधा आपल्याच मालकीचे आहे असे वर्तन करतात. २)कथित कायदा म्हणजे देशाची राज्य घटना जी राज्याच्या हिताला जपत नाही उलट कुठे ही राहण्याच्या हक्क देवून राज्य हिताला नख लावते . नोकरी मिळवण्ासाठी साठी मराठी लोकांना संघर्ष करावा लागतो विशिष्ट मनोवृत्ती वले परप्रांतीय स्थानिक लोकांच्या नोकरीच्या हक्का ल बाधा पोचवतात. लोकसंख्या वाढली की शहर बकाल होतात .पाणी ,वीज,ह्या साधन संपतीवर तान येतो. शहरांच्या प्रदूषण मुळे महाराष्ट्र मध्ये नद्या न चे पाणी प्रदूषित होते. एकंदरीत पाणी प्रदूषण ,हवा प्रधूषण ,सामाजिक प्रधुषण ,भाषेचे प्रदूषण दीर्घकालीन प्रदूषणाचे प्रकार आहेत ते सर्व आणि हे सर्व लोकशाही आणि घटना ह्या मुळे महाराष्ट्राचे मध्ये होत आहे

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे. काही ही झाले तरी छत्रपती शिवबा चे मावळे शांत राहणार नाहीत.

In reply to by स्वामि १

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत --- मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड. व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ? -- ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. -- मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ? -- तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?

In reply to by प्रसाद_१९८२

बहुतेक स्वामीजींनी राज ठाकरेंची भाषणे जास्त ऐकली असावीत... मुंबई राहुद्यात बाजूला... महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी देखील ताळमेळ नसलेली ही आकडेवारी त्यांनी कुठून मिळवली हा संशोधनाचा विषय आहे. स्वामीजी आपण महान आहात _/\_

In reply to by स्वामि १

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे.
ह्या कारणामुळे स्थलांतर कसे कय होईल?

In reply to by विजुभाऊ

असे प्रश्न धागाकर्त्यांना विचारायचे नसतात... :) ते नवीन धागा काढतील... उत्तरात नविन प्रश्न का विचारले जातात ह्या संबंधी....

In reply to by विजुभाऊ

विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे हे आपण रोजच बघतच आहात. आपण बेसावध न राहावे.

In reply to by स्वामि १

आख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटीच्या आसपास आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्यापैकी, एकट्या मुंबईत... मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. ...हे इतके सगळे आहे ! म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते. मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))

म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!


भारतातील ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत .(महाराष्ट्रात नव्हे भारतात) 400लाख बेरोजगार हा ही भारतातील आकडा आहे महाराष्ट्रातील नव्हे. Google search मधून आकडे घेतले आहेत चुकी बद्दल माफी असावी

In reply to by इरसाल

=)) =)) =)) ते जरा... चुकीsssला माsssफी नाsssही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!... असं अजून मस्तं दिसेल ! ;) =))

भावना कळली बास्स्स्स्स्स्स्स........................

काय चाललयं काय ? एकदा मराठी माणूस, मराठी रक्त, महाराजांचे मावळे लिहिल्यानंतर तूम्ही लोक टींगलटवाळी थांबवायलाच तयार नाही. कायतर म्हणे मराठी शुध्दलेखन, मुंबईची- महाराष्ट्राची लोकसंख्या. आता मराठी माणूस थांबू शकत नाही. अजून धागे काढतच राहील.

In reply to by झेन

धन्यवाद झेन, तुम्ही, राजेश 118 व इतर मराठी प्रेमी एकत्र आल्यास मराठी व महाराष्ट्रा द्वेषीचा नायनाट करू शकतो कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे.

In reply to by प्रसाद_१९८२

देवनागरी वापरलीत तरी मराठीत लिहा, स्वामी१ ना हिंदी सहन होणार नाही! काय समजलेंत!!! ( किंवा कदाचित त्यांना पाठिंबा देताय म्हणून दुर्लक्ष करतील म्हणा. काही सांगता येत नाय! )

In reply to by प्रसाद_१९८२

प्रसाद आपण एकत्र येणे गरजेचे आहे. चुका आपल्या कडून भरपूर झाल्या आहेत, मान्य आहे पण चुकीची सुधारणा होउ शकत नाही का? हार मानुन चालणार नाही. आपल्या मराठी माणसाकडे कर्तबगारी होती म्हणून १०० वर्षे भारतावर मराठ्यांनी राज्य केले पण आज मराठी माणसाची नेमकी कुचंबणा कोठे होत आहे हे शोधायला पाहिजेच.

In reply to by झेन

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे मराठी मावळ्याचे बाहू( आय मीन बोटे) स्फुरण पावू लागले आहे. आता भविष्यात मिनिटाला एक धागा या गतीने जिल्ब्या पडल्या तर पहिल्यांदा तुमचा शालश्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात येईल हलकेच घ्या

In reply to by भंकस बाबा

मराठी व महाराष्ट्राची प्रगती चा ध्यास घेतलेले मावळे आपली लेखणी कधीच थांबणार नाहीत. आपण किती ही त्रास दिला तरी मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे धागे टाकले जाणारच.

In reply to by स्वामि १

स्वामिजी साष्टांग दंडवत, तुमचा ध्यास वगैरे पाहून मी तर पुरता प्रभावित झालेलो आहे. आता माझे हात पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिवशिवत आहेत. मला मार्गदर्शन करण्याची कृपा करा. मी , एक सामान्य मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी माझं घर-दार, नोकरी वगैरे सांभाळून काय काय करू शकतो ? आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत उका.

In reply to by उगा काहितरीच

आपण नोकरी सांभाळून मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी लहान लहान सवई अमलात आणू शकतात. आपल्या घरासाठी व कुटूंबासाठी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आपण अनेक व्यहवार व खरेदी करत असतो व ह्यात बरीच लहानमोठी पैशाची उलाढालु होत असते हे पैसे किंवा व्यहवार आपल्या मराठी माणसा कडेच किंवा महाराष्ट्रातच होत राहीले तर आपल्याच माणसांची व महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारणा होत राहील. उदाहरण म्हणजे आपणास सूर्यफूलाचे (Sunflower oil) तेल विकत घ्यायचे असल्यास आपण ते मराठी दुकानदाराकडूनच घ्यायचे पुन्हा ते तेल महाराष्ट्रातील Product आहे का तपासून घ्यायचे. महाराष्ट्रातील उत्पादन घेतल्या ने महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे सूर्यफूलांची विक्री वाढेल व अर्थातच मराठी व महाराष्ट्राला आर्थिक मदत होईल. आता आपण म्हणाल मी नोकरी करतो मला काय फायदा? पण उदाहरण म्हणून महाराष्ट्रात राहात असलेले गुजराती, KGN, मुसलमान व केरळ मघिल नागरिक आपापसात संपूर्ण खरेदी व व्यहवार आपापसातच करतात व आज ते मराठी माणसा पेक्षा आर्थिक परिस्थितीत मजबूत आहेत. व त्यांना खरेदी करताना सवलत देतात व अर्थात फायदा आपणा सर्वांना होतो. सर्वत्र महाराष्ट्रात मराठी बोलायचे, जर गरज पडली तर इग्रजीत बोला. पण हिंदी ला विरोध करा. हिंदी ने मराठी वर प्रतक्षात व अप्रत्यश्यात आक्रमक केले आहे व त्यामुळे मराठी भाषा नष्ट होत आहे. आपण ही प्रगती साठी उपाय सुचवावेत. अनेक विषय अजून पुढे सांगितले जातील.

In reply to by स्वामि १

तुमची कल्पना ही मराठा उद्योजक महासंघाची ढापलेली आहे. ..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती साठी कोणाही कडून प्रेरणा घेतली तरी चालेल पण मराठी माणूस महाराष्ट्रात दिल्ली व परप्रातीयांच्या गुलामगिरीत राहीला नाही पाहिजे

In reply to by अभ्या..

कच्छ समाजातील एक जात असून ह्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या समाजातच होतात व एकमेकांना सहकार्य करतात. जैन समाजाची संपूर्ण भारत भर syndicate व्यहवार होतात व आज भारतातील तो श्रीमंत समाज आहे. ह्या दोन्हीनी समाजाचे आपापले गुप्त planning आहे.

In reply to by स्वामि १

काहीतरी बिनबुडाचे लिहू नका, KGN म्हणजे अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज सलीम चिष्टीना मानणारे मुस्लिम त्यांच्या दुकानावर आपण कसे श्री लिहितो तसे लिहितात. त्यात सिंडिकेट वगैरे काही नसते. कच्छी गुर्जर क्षत्रिय व्यवसायात असतात पण त्यांच्या फक्त आपापसात रोटीबेटी साठी केजीके समाज असतो. जरा खऱ्या व्यवसायाची अन निदान आवश्यक ज्ञानाची पूर्ण माहिती करून घ्या, स्वतः एखादा लहानसा का होईना व्यवसाय करून दाखवा अन मग मराठी लोकांनी कसे व्यवसाय करावेत ह्यावरचे दिवे पाजळा.

कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे. नक्की काय करणार आहात जरा सांगाल का म्हणजे जमलं तर आम्हीपण हातभार लावु.

In reply to by इरसाल

धन्यवाद इरसाल, आपण सकारात्मक प्रतिसाद दिलात. मराठी माणसे हुषार, कर्तबगार व जाणकार आहेत, होती व भविष्यात ही ती कर्तबगार राहणारच. पण आजची मराठी माणसाची स्थिती पाहून वाइट वाटते. आज महाराष्ट्रातच मोठ मोठय़ा पदावर सदनी अधिकारी मराठी नाहीत. मग हे असे का? महाराष्ट्रात मराठी अधिकारी मिळत नसतील तर ते निर्माण झाले पाहिजेत ही तळमळ व तरतूद सरकार व घटणेत पाहिजे. मराठी माणूस माघे पडत असेल किंवा चुकत असेल किंवा आळशी होत असेल तर त्याला समज व शिक्षणाची तरतूद महाराष्ट्राच्या घटणेत नाही आहे. दिल्लीतील राज्यकर्ते व परप्रातीय महाराष्ट्रातून भरपूर पैसा कमावतात पर मराठी माणूस पोरका आहे. मुंबईत व महाराष्ट्रात भरपूर पैसा आहे पण मराठी माणसा कडे नाही आहे. आपण काय करायचे विचारलेत, आपले स्वगत. प्रथम आपण एकमेकांशी कधीच भांडयचे नाही, मतभेद चर्चेने सोडले जातात लोकजागृती करणे हा ही प्रथम कारेक्रम होउ शकतो मराठी संस्कृती जपली पाहिजे अजून ही बरेच आहे. आपण प्रतिसाद दिला बरे वाटले एक एक ऊपाय व मात्रा हळूहळू पुठे येत जातील व आपणही मार्ग सुचवू शकता धन्यवाद

In reply to by इरसाल

१)सर्व मराठी माणसांनी एकत्र या. २)आपापसात वैर ठेवू नका व भांडू नका. काही वेळेस आपल्या मघे मुद्दामहून भांडणे लावली जातात ३)सर्वत्र मराठीतूनच बोला, गरज पडल्यास इंग्रजीतून संवाद करा. इंग्रजी ही अंतरराष्टीय भाषा आहे व ती शिकलीच पाहिजे. हिंदी ला विरोध करा हिंदी भाषा हळूहळू मराठी भाषेवर आक्रमक करीत आहे. ४)महाराष्ट्रातील उत्पादने खरेदी करा त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व महाराष्ट्राची अर्थ वेवस्था सुधारेल. ५)आपली खरेदी व आर्थिक व्यवहार मराठी दुकानदार /ठेकेदार कडून करा अजून अनेक मार्ग सांगला येतील. आपणही मराठी च्या प्रगती चे मार्ग सुचवू शकता. परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन सावध राहा

In reply to by स्वामि १

एक छोटीशी शंका मांजराच्या (आय मीन राजसाहेब, बारामतीचे काका-पुतणे, झालेच तर आपले वंचित आंबेडकर) गळ्यात घण्टा कोण बांधणार? हे सर्व तयार झाले तर मराठीचे झेंडे अटकेपार लावले जातील याची खात्री बाळगा. स्वामी तुम्ही या लोकांना भेटण्याचे कष्ट घ्याच. तुमच्यातली तळमळ का मळमळ या लोकांना दाखवून द्याच. करणार ना तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी ?

ते एकाच विषयावर निरनिराळे धागे काढत राहतील तुम्ही (शक्य झाल्यास टिंगलटवाळी न करता) प्रतिसाद देत राहा. ;D:D:D

In reply to by श्वेता२४

कोणीही कितीही अडचणी आणल्या, शुद्ध लेखनाच्या चुका काढल्या, कितीही टिंगलटवाळी केली तरी मराठी माणसाचा प्रगती चा ध्यास घेतलेले मराठी केव्हाच थांबणार नाहीत.

आमच्या भागात, म्हणजे जिथे मी सध्या राहतो तिथे, साधारण दुर्लक्ष करण्यासाठीचे इक्सप्रेशन असे आहे, "याssडंय ते!" =)) Sandy

In reply to by चांदणे संदीप

अगदी दिवसाच चांदण्या दाखविल्यास रे,बाकी असे धागे वाचल्याने खोटं खोटं हसायला हास्यक्लबात जायची गरज पडत नाही,असे आमच्या ह्यांचे मत... मिपा सार्वकालीन माई

मागे आहेत हेच सत्य तुम्ही दाखविलेत. परवाच बसमध्ये कंडक्टर ओरडला मागे कोण राहलयं,तर सात आठ जण म्हणाले आम्ही राहलोयत तिकिट काढायचे. मी अंदाज काढला की त्या आठांपैकी पाच जण मराठी होते. अशा मागे राहणार्या लोकांमुळे महाराष्ट्राची प्रगती होत नाही.मी गर्दी असल्याने त्यांचे संपर्क क्रमांक घेउ शकलो नाही,अन्यथा तुमच्या पर्यंत पोहोचवले असतेच. मागच्याच गल्लीत राहणारा खालमान नाखु

बरेच दिवस चाललेल्या राजकिय रणधुमाळीच्या धाग्यांच्या भडीमारामुळे, मिपाकर हसायचे पार विसरून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर, असले धागे व त्यावरचे प्रतिसाद, मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात गार हवेच्या झुळूका आहेत ! याबद्दल संबंधिताचे आभार मानावे तितके कमीच ! ;) :)

खऱ्या आयुष्यात एकदा वेडा लोकांवर दगड मारत असेल तर लोक shahnya सारखी काही प्रतिसाद न देता बाजूने जातात . पण mipa वर उलट दिसतेय ज्यांना वेडा ठरवले जाते आहे तो दगड मारत नाहीत तर कथित हुशार ठरवलेल्या वेड्या वर दगड मारत आहेत गंगा उलटी वाहते आहे

सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणी सगळे चांगले कारागीरच आहेत. *उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात. सिंगल हजेरी .... म्हणजे सकाळी नऊ ते पाच पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा *ड़बल हजेरी* .... म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार. या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. *विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो. ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात..... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते. तेव्हा प्रश्न पडतो... *मराठी सूतार गेले कुठे सगळे?* समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात. उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात *राबत* असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते. तेव्हा मला प्रश्न पडतो... *मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?* कारण *मेहनतीची तयारी* नाही आणी हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले. वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियनवाला म्हणाला की मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय *कौशल्य* ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे. मला प्रश्न पडला *मराठी तरूण गेले कुठे..?* माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते. इकडे मला प्रश्न पडतो.. *मराठी तरूण काय करतो...?* परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही..दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही..पानवाला हजाम बाहेरचा.(हे भाईंदर /वसई /विरार/ पालघर सारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती) माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे......चोरापोरापायी जातात. पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही... मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं *भाडेपट्ट्यावर* घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात. अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते. आहे आणि पुढेही लागणार आहे. *तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे...??* तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की... *मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात* *सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात.* *राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.* *नाचायचे, मारामारी , फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि "मी कुठला धंदा करु याचा विचार" यातच दिवस काढ़तो* ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ?. पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, *पंधरा सोळा तास* राब राब राबतात ... माझ्या मराठी बंधूनो खर सांगा ... विचार करून सांगा *आपल्याला ....आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??* मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे।पण कुठे *गल्ली बोळात* टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात. गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात. वाढदिवसाला *फ्लेक्स लावून भावी* आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात. मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात. सणावाराला *दादागिरी करून* वर्गणी जमा करायला आपलेच असतात. शाळा, कॉलेज, मध्ये तोढफोड करायला आपलेच असतात। कोण म्हणतं मराठी माणसाचा अस्तित्व नाही???????? *बघा अजूनही वेळ गेली नाही* विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा. फक्त बार रेस्टऔरंट मध्ये *संध्याकाळी बसून* गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या *नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाही* सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित. उघडा डोळे वाचा नीट !

दादरला काही टॉप स्वस्तात मिळाले म्हणून 5 टॉप खरेदी केले. जवळच एक नवीन टेलरचे दुकान निघालेले म्हणून गेले त्याच्याकडे. आमच्याकडचे इतर प्रस्थापित (सगळे मराठी आहेत)टेलरलोक शक्यतो टिपा मारणे, बाह्या लावून देणे अशी 'फडतूस' कामे करत नाहीत. पण हा नवखा होता म्हणलं बघू विचारुन. तर म्हणाला एका टॉपला टिपा मारणे व बाह्या लावणे याचे 80 रु. होतील. तेही 4 दिवस लागतील. मी त्याला म्हणलं 200 रु. च्या एका टॉपला 40 ऐवजी 80 रु. ? काहीच कमी करायला तयार नाही. शेवटी नाईलाजाने एक टेलर जी लांब राहते तिथे गेले. नेमके ते दुकान बंद पडले होते. पण जवळच दुसरे दुकान कोणीतरी तुरु केले होतेे. बाई हिंदी होती. मराठी समजत नव्हते. तिला काय करायचे ते समजावून सांगितले. एका टॉपचे 30 रु. घेतले आणि सगळं काम संध्याकाळीच करुन दिलं. आमच्या इथे मराठी सुतार, इलेक्ट्रीशिअन, प्लंबर. अशा कामांना कोणी ओळखीचे मराठी लोक येत नाहीत. एखादेवेळेस आला तर नंतर कारणे सांगतात. पण आता याच कामांसाठी हिंदिवाले ओळखिचे झालेत. ते फोन केला की त्याच दिवशी येतातही आणि कमी किमतीत कामे करुन देतातही. मराठी लोकांनी आपल्याला निर्माण झालेले हे आव्हान ओळखून धंदा करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. मोडेन पण वाकणार नाही चे दिवस गेले आता. मुळात मराठी माणसाला रोजगार मिळवणे आणि तो टिकवणे (धंद्याच्या बाबतीत) हे फारसं कळलेलं नाही. ज्याला कळलं ती मराठी माणसे व्यावसायात यशस्वी झाली व टिकून राहीली. नुसतंच मराठी माणूस वाकणार नाही, अन्याय सहन करणार नाही असल्या भंपक घोषणा देण्यापेक्षा ही मानसिकता मराठी माणसाच्या अवनतीला कारणीभूत आहे हे मान्य करावे व या मानसिकतेतच बदल करायची गरज आहे हेही मान्य करावे. आणि जर तसे होणार नसेल तर हिंदि भाषिकांच्या महाराष्ट्रात सामावून जाण्याला ही असली मराठी माणसेच जबाबदार असतील.

तूमचं बरोबर आहे पण हे सगळं ज्यांना खरंच कळकळ आहे त्यांच्यासाठी. आवेश आणि आस्मिता फुलवून खेळ करणारे दरवेशच आवडतात त्यांना काय सांगणार. मराठी माणूस, महाराजांचा मावळा, रमाबाईंची लेकरं, जगाचा पोशिंदा, जातधर्म ह्या गोष्टी, कुठे आर्ची मिळते का बघणे हे सोडून कुठे त्या परप्रांतीयांसारखी लोकांसारखी मेहनत करायला सांगता मराठी माणसांना. कधी अनवाणी ऊन्हातून ज्योत घेवून पळणाऱ्या, टिनपाट भाई-दादांसाठी मारामारी करणाऱ्या, केसेस अंगावर घेणाऱ्या बेकार मुलांना सांगायचा प्रयत्न सुध्दा करू शकत नाही. मी पदवीधर आहे मला सरकारने नोकरी दीलीच पाहीजे असली दीवास्वप्न घेवुन जगणारे मराठी तरुण बघितले कि आपणच गल्ली चुकलो असे वाटते.

हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही जी कारण दिली आहेत . मराठी तरी काम करत नाही आळशी,दारुडा,आहे. अभ्यास काय आहे तुमचा महाराष्ट्र विषयी.आज अमेरिकेत सुधा मराठी तरुण विजयाची पताका उंच फडकवत आहेत. क्रिकेट,संगीत,राजकारण,संरक्षण क्षेत्र,सर्वच ठिकाणी मराठी लोकांनी ठसा उमटवला आहे उत्तम डॉक्टर्स,इंजिनिअर,मराठी तरुण आहे आणि त्या मराठी तरुणांना तुम्ही दारुडे म्हणताय आपल्या अल्प अभ्यासावर . पहिले शीख लोकं मुंबई मध्ये टॅक्सी चालवायचे त्यांची जागा up ,Bihari I घेतली ती काय शीख लोक कष्टाळू नव्हते, महणून जरा अभ्यास करा

In reply to by Rajesh188

अमेरिकेतून त्या मराठी तरुणांना हाकलले नाही अजून अमेरिकन लोकांनी आणि सरकारने? महाराष्ट्रातून परप्रांतीयांना हाकलून द्यायचंय, त्याप्रमाणे?

MEDICAL DIALOGUES HomepageProfession Md Team 10.41 lakh Registered Doctors in India, Maximum in Maharashtra: Health Minister It is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service giving an approx doctor-population ratio of 1:1596 much below the WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000 New Delhi: Recently, through a written reply to a question in Rajya Sabha, Minister of State ( Independent Charge) Smt Anupriya Patel informed about the Registration of Allopathic Doctors with various medical councils across the country. The minister informed that as per information provided by Medical Council of India, there are a total 10,41,395 allopathic doctors registered with the State Medical Councils/Medical Council of India as on 30th September, 2017. Assuming 80% availability, it is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service. It gives a doctor-population ratio of 1:1596 as per current population estimate of 1.33 billion. However, WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000. As per records, Maximum number of registered medical practitioners have their registrations in Maharashtra with 153513 registered doctors. This is followed by Tamil Nadu and Karnataka who also account for more than 1 lakh registered doctors each.

माझे गावचे पोलिस फोजदार आहेत मुंबई मध्ये पण जेव्हा ते गावी सुट्टीवर येतात तेव्हा मी त्यांना अगदी घरच्या गुरांचे शेन काढण्या पासून सर्व काम करताना bagto माझे मित्र आहेत बालपणीचे सैन्यात ते जेव्हा सुट्टीवर असतात तेव्हा सुट्टी संपेपर्यंत शेतातील आणि घरातील कामे करताना बघतो माझे मित्र,नातेवाईक,जी काही मी मराठी माणसं बागितली त्यात कोणीच दारुडे,kamchor, उगाचच नेत्या chya पाठीमागे पळणारे नाहीत. उलट,प्रामाणिक,मेहनती,आणि सज्जन आहेत. मग ठराविक लोकांनाच Maharashtra मधील तरुण कामाचा नाही असा साक्षात्कार होतो हे काही समजत नाही. मुंबई मध्ये मराठी माणूस कमी नाही झाला बाकी लोकांची संख्या वाढली आहे . ते कष्टाळू मेहनती आहेत म्हणून संख्या वाढली नाही तर त्यांच्या राज्यात रोज १०० रुपये सुधा कमवण्याचे साधन नाही म्हणून त्यांची संख्या इथे वाढली आहे हे सत्य नाकारून मराठी तरुण कसे कामाचे नाहीत हे सांगण्या पाठीमागे कोणती. मनोवृत्ती आहे .

In reply to by Rajesh188

आपल्या मुंबईत किती मराठी लोक गाड्या लावून मसाला डोसा , पानीपुरी, दाबेली असे पदार्थ विकतात? बिर्यानी हा पदार्थ फक्त मुसलमान लोकांनी बनवायचा आहे असा गैरसमज मराठी माणूस का बाळगतो? मी काही वर्षासाठी कर्जतजवळील एका गावात राहिलो होतो. तिथे घराघरातून म्हशी पाळल्या जात होत्या. पण हे लोक त्यांचे दूध उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी जाऊन मोठ्या तबेलेवाल्याला देत. आता तुम्ही अनुभव घेतला आहे ना? मग मुंबईत किती मराठी लोक तबेल्याच्या दुधाचा धंदा करतात? चहाची टपरी, पानवाला मराठी बघितला आहे का हो? एक वेळ अशी होती कि कोळीनी घरोघर जाऊन मासे विकत, तिथे आता भय्ये व मुसलमान का झाले? या मुसलमानानी तर मराठी लोकांना पळवून नाही लावले? रोजगार म्हणजे सरकारी नोकरी या मांनसिकतेतून बाहेर पड़ा. मी मुंबईत ज्या ऑफिसमधे काम करतो तिथे एक शेट्टी मसाला डोस्याचा धंदा लावतो. त्याच्या हाताखाली मराठी पोरे काम करतात. त्यातल्या एकाही पोराने हिमंत करून दुसरीकडे गाडी टाकन्याचे साहस केले नाही. कारण ती मानसिकता नाही हो आपल्या मराठी मुलांकडे!