Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by manguu@mail.com on Tue, 06/12/2018 - 19:03
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
  • Log in or register to post comments
  • 118034 views

प्रतिक्रिया

Submitted by manguu@mail.com on Sat, 06/16/2018 - 22:14

Permalink

छान

मी भाजपाने शस्त्र संधी करू नये या संदर्भात बोललो पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असल्याने त्याने भारतावर केलेले सर्वच हल्ले निषेधार्हच आहेत . पाकिस्तानचे हल्ले आणि भाजपाची चुपपी दोन्ही निषेधार्ह आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Sat, 06/16/2018 - 22:33

Permalink

ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा

चुकलं तर मान्य करायला पण मोठ काळीज लागत , आन चर्चा योग्य मार्गाने चालू ठेवायचं काम बी धगकर्त्याचच असतया . उगीचच म्हमदवाडी च्या सरपंचा सारख वागून काय फायदा ?. जरा बाकीच्या म्येम्बर पण ऐकाच असत .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Sat, 06/16/2018 - 22:36

In reply to ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा by सोमनाथ खांदवे

Permalink

तुमचाच धोबीपछाड झालाय

स्वतःचे भाजप सरकार युद्ध करत नाही आणि तुम्हाला पाकिस्तानचे शांत रहातात का युद्ध करतात , ह्याची चिंता लागून राहिली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Sat, 06/16/2018 - 22:51

In reply to तुमचाच धोबीपछाड झालाय by manguu@mail.com

Permalink

ऑ !

भाजप युद्धखोर नाय ह्ये मान्य करून ह्ये लै ब्येस काम क्येल बगा . म्हनजे तुमच्या वाक्याचा तसाच आर्थ निघतोय बरका .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Sat, 06/16/2018 - 22:45

In reply to ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा by सोमनाथ खांदवे

Permalink

म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का

म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का केला नाही ? मी देशाचा नागरिक आहे , तुमचा नोकर नाही , तुम्हाला सांगून निषेध करायचा का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Sat, 06/16/2018 - 22:59

In reply to म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का by manguu@mail.com

Permalink

न्हाय र बाबा

झोप !!!! आता शांत झोप !!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Sun, 06/17/2018 - 00:54

Permalink

हेचि फळ का विदेशयात्रेला ?

ब्रिटन सरकारने देशातील विद्यापीठांमधील सुलभ व्हिसा मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या यादीमधून भारतीय विद्यार्थ्यांना आश्चर्यकारकरित्या वगळले आहे. या यादीत अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडसारख्या देशांचा पूर्वीपासूनच समावेश होता. मात्र एकीकडे भारताला वगळताना आता चीन, बहरीन आणि सर्बिया सारख्या देशांचा समावेश करण्यात आला आहे. व्हिसा देण्याच्या दृष्टीने 'कमी धोका' असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या कारणामुळे भारताला यादीत स्थान मिळायला हवे होते. असे असताना भारताला वगळल्याने टीका होऊ लागली आहे. दरम्यान, हा भारताचा अपमान असल्याचे यूके काउंसिल फॉर इंटरनॅशनल स्टूडंट अफेअर्स (UKCISA) अध्यक्ष लॉर्ड करण बिलमोरिया यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या स्थलांतराबाबच्या धोरणातील बदल काल संसदेत सादर करण्यात आले. त्यावेळी ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने जवळजवळ २५ देशांच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी-४ व्हीसा श्रेणीत सूट देण्याची घोषणा केली. ब्रिटन सरकारने केलेला हा बदल जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये अभ्यास करणे सोपे व्हावे हाच या धोरणामागचा उद्देश आहे. नव्या यादीत भारताचा समावेश न केल्यामुळे आता समान अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कडक तपास आणि दस्तावेजी प्रक्रियेतून जावे लागणार आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Sun, 06/17/2018 - 17:28

Permalink

IAS ऑफिसर मारहाण प्रकरण

IAS ऑफिसर अंशु प्रकाश मारहाण प्रकरण इतक्या दूर पर्यंत जाईल याची आप च्या श्री केजरीवाल ला कल्पना नव्हती , त्या मारहाणी प्रकरणात आप चा आमदार अमानतुल्ला सुध्दा आहे . आणि हा केजरीवाल पुन्हा एकदा मोदीचें नाव घेत सुटला आहे ' दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरुन उपराज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलनाला बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरलं आहे. पंतप्रधान मोदींनी हा अधिकाऱ्यांचा संप घडवून आणल्याचा अप्रत्यक्ष आरोप केजरीवालांनी मोदींवर केला. '
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Mon, 06/18/2018 - 00:31

Permalink

6 पासपोर्ट

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा महाघोटाळा करून विदेशात पसार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीकडे अर्धा डझन पासपोर्ट असल्याची नवी माहिती समोर आली असून या माहितीच्या आधारे नीरव मोदीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नीरव मोदी बेल्जियममध्ये असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली असून पासपोर्ट रद्द करण्यात आला असतानाही तो तिथे कसा पोहोचला आणि त्याचा विमानप्रवास अद्याप सुरू कसा आहे, याची चौकशी केली असता महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. नीरवकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत आणि २ पासपोर्ट अजून वैध आहेत, असे आढळून आले आहे.  ...... 2014 पूर्वीचे किती आणि नंतरचे किती ?
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Mon, 06/18/2018 - 06:36

In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com

Permalink

2014 च्या आदीचेच , या

2014 च्या आदीचेच , या काँग्रीस वाल्यानी देशाचा किती खूळखुळा क्येलाय , सगळी सिस्टीम करपटेड करून ठेवली .
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Mon, 06/18/2018 - 20:27

In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे

Permalink

गायब,

मंगुशेठ गायब
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 07:51

In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे

Permalink

कोंग्रेस ?

नीरव मोदी गुजरातचा ना ? पोलीस व्हेरिफिकेशन गुजरात पोलीसने केले असेल ना ? आणि पासपोर्टही गुजरातमधून दिले असतील ना ? तिथे गेली 20 वर्ष कोण आहे सत्तेत ?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 06/22/2018 - 00:05

In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे

Permalink

नीरव मोदिला एक पासपोर्ट

नीरव मोदिला एक पासपोर्ट असताना दुसरा पासपोर्ट 2017 साली दिला आहे म्हणे . ( म्हणजे 2014 नंतर बरं का ) अरेरे , किती हे करप्शन भाजपाच्या काळात ! https://www.news18.com/news/india/how-nirav-modi-was-issued-second-passport-a-year-before-expiry-of-first-one-1783881.html
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 06/22/2018 - 12:57

In reply to नीरव मोदिला एक पासपोर्ट by manguu@mail.com

Permalink

आमच्या मागच्या बिल्डिंग मध्ये

आमच्या मागच्या बिल्डिंग मध्ये काळ्या कुत्रीने चार पिल्लाना जन्म दिला आहे. त्यातील तीन काळी आहेत आणि एक ब्राऊन आहे. आणि हे संपूर्ण भाजपच्या काळातच झालंय? मग राजीनामा कुणा कुणाकडे मागायचा आता?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Mon, 06/18/2018 - 22:49

In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com

Permalink

आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे

आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे मोदीजींच्या नावाने बोंब मारायला मोकळे !! वर ह्यांना १५ लाख पाहीजेत म्हणे ( लो, और ईनको कश्मिर चाहीये ह्या धर्तीवर ) !!
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Mon, 06/18/2018 - 23:14

In reply to आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे by डँबिस००७

Permalink

काय चुकले विचारले तर ?

?
  • Log in or register to post comments

Submitted by हरवलेला on Tue, 06/19/2018 - 05:16

In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com

Permalink

१३ हजार कोटींच्या

१३ हजार कोटींच्या महाघोटाळयातील २०१४ पूर्वीचे किती आणि नंतरचे किती ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Mon, 06/18/2018 - 17:46

Permalink

कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं

आठवडाभरापासून नायब राज्यपालांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना उच्च न्यायालयानं कठोर शब्दांत झापलं आहे. धरणे धरण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी का घेतली नाही, असा सवाल करत न्यायालयानं त्यांचे कान उपटले. --- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/who-authorized-them-to-sit-on-a-dharna-like-this-dehi-hc-asks-to-kejriwals-lawyer/articleshow/64632269.cms --- गेले काही महिने निद्रिस्त असलेले व उठसुट नौटंकी करणारे, केजरिवाल मधील "मर्कट" या आयएएस अधिकार्‍यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागे झाले असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Mon, 06/18/2018 - 20:46

In reply to कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं by प्रसाद_१९८२

Permalink

त्या दिल्ली मदी प्रॉपर तिथली

त्या दिल्ली मदी प्रॉपर तिथली लोक कमी आणि हरयाणा , यू पी , बिहार मधल्या बावळटांचा भरणा ज्यास्त असल्यामुळ च केजरी शेठ निवडून आले व्हते . पंजाब सुदा अतिहुशार लोकांसाठी फेमस हाये म्हणून तिथे पण थोडी सीट आली . गम्मत तर पुढे हाये , पाच मुख्यमंत्री नीं केजरीला सपोर्ट क्येल आणि स्पेशली हिंदुत्ववादी ममता नीं काँग्रीस ला झापल की ' तुम्ही का नाही केजरीला सपोर्ट करत ? . त्यामुळ काय झालय की अजय माकन आणि शीला दीक्षित तोंडाला कुलूप लावून बसल्यात . काँग्रीस च्या आदरणीय रागा न सांगितल असल मोदीला हारवुन मला पंतप्रधान बनायचय आणि त्या मुळ केजरी ला तर्रास नका देवु .
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 06/19/2018 - 03:36

In reply to कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं by प्रसाद_१९८२

Permalink

यापेक्षा महत्वाचं म्हणजे

ठिय्या कशासाठी देत आहेत? काही महिन्यांपूर्वी एका मीटिंग मध्ये केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी अंशू प्रकाश नावाच्या मुख्य सचिवाला मारहाण केली होती. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात IAS अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव केजरीवालांच्या मीटिंगला उपस्थित राहणे टाळले आहे. नौटंकीची सवय असलेल्या केजरींनी लगेच याचे भांडवल करून मोदींना लक्ष्य केले. वास्तविक केजरींनी (सवयीप्रमाणे) माफीनामा दिला असता आणि परत असा प्रकार घडणार नाही याचीही ग्वाही दिली असती तर प्रकरण शांत झाले असते. पण मग मोदींना लक्ष्य कसे करता आले असते? पण IAS अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. आणि आता फक्त केजरीच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे ४ मुख्यमंत्रीही तोंडघशी पडले.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 06/19/2018 - 03:04

Permalink

पर्दाफाश

रोहित वेमुलाच्या आईने शेवटी पैसे मिळाले नाही म्हणून का होईना सत्य सांगितले. राजकीय फायदा मिळवण्यासाठी मुस्लिम लीगच्या लोकांनी २० लाख रुपये देण्याचे आणि घर बांधून देण्याचे मान्य केले होते. बहुतेक ३ लाख रुपयाचे चेक देण्यात आले ते सुद्धा बँकेकडून परत आहे. मुस्लिम लीगने तो चेक चुकीने परत गेला असं सांगितलंय, म्हणजेच आपण चेक दिला हे मान्य केलं आहे. हळूहळू कुठल्या का मार्गाने होईना या लोकांचा पर्दाफाश होत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 07:46

In reply to पर्दाफाश by ट्रेड मार्क

Permalink

त्यांनी मदत म्हणून दिले आहेत

भाजपयांनी करोडो रु मिळवून स्वतःचे office बांधले, ह्या राजकीय पक्षांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला . जेवणावळी घालुन समरसतेचि नाटके करण्यापेक्षा हे उदात्त नाही का ? मदतीचे चेक तर योगींचेही बाऊन्स झालेत. https://www.ndtv.com/india-news/yogi-adityanaths-rs-1-lakh-cheque-to-up-board-topper-bounces-1865064 Barabanki: A topper of Uttar Pradesh board exams was elated when he received a cheque from chief minister Yogi Adityanath. Soon, it turned into disappointment when the cheque bounced. Not only that, he had to pay a penalty for it.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 08:09

In reply to त्यांनी मदत म्हणून दिले आहेत by manguu@mail.com

Permalink

गोंधळ होतोय का माझा कुठे ?

समरसता म्हणजे नाटक, नाटक म्हणजे समरसता ! समरसतेच्या बदली पैसेवाटप अधिक योग्य ! गोंधळ होतोय का माझा कुठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 08:23

In reply to गोंधळ होतोय का माझा कुठे ? by माहितगार

Permalink

छान

नुसती जेवणावळी म्हणजे निर्जीव देवाला ताट दाखवण्यासारखे किंवा फारफार तर गोमातेला एखादे ताट देण्यागत झाले की हो. अगदी गरजू , त्यात वृद्ध आहे , तर तिला आर्थिक मदत , घर दिले तर बिघडले कुठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 08:43

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

तेच म्हणतोय की माझा गोंधळ

तेच म्हणतोय की माझा गोंधळ होतोय सजीव निर्जीव भासताहेत, मांडीला मांडी लावून बसण्याच्या अधिकारापेक्षा मोफत दिलेली ताट आणि झोपडीच मुल्य अधिक होतय. आंबेडकरांना असेच होणे अपेक्षित होते का? मलातरी आंबेडकर (आंबेडकरांच्या नंतरचे आंबेडकर) समजणे अवघड जातात तसे दोन्ही कृतीत राजकीय लाभ अपेक्षित असणा;र पण सामंजस्याकडे नेणारी पेक्षा सामंजस्यापासून दूर रहाण्यास प्रवृत्त करू इच्छित कृती श्रेयस्कर अस काही होतया का ? माझा तरी भारी गोंधळ होतोय अमुकच राजकीय भूमिका लावून धरण्याच्या आग्रहात .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 08:49

In reply to तेच म्हणतोय की माझा गोंधळ by माहितगार

Permalink

छान

मी 24 वर्षाच्या तरुणाला फुकट घर द्या , असे लिहिलेले नाही. गरजू , त्यात वृद्ध आहे , तर तिला आर्थिक मदत , घर दिले तर बिघडले कुठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 08:49

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

आणि जेवायलाही द्या की

नको म्हटले का मी ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 11:42

In reply to आणि जेवायलाही द्या की by manguu@mail.com

Permalink

राजे अभ्यास वाढवावा लागेल,

राजे अभ्यास वाढवावा लागेल, आम्ही मागे हा धागा काढला होता तेव्हा पासून हेच सांगतोय. खरे म्हणजे ऊत्तर प्रदेशात अशात जी चर्चीत भोजने झाली, ती संघाची पारंपारीक सार्वजनिक ठिकाणी केलेली समरसता भोजने नव्हती तर काँग्रेसच्या गांधी नेहरुंनी आणि थोडी सावरकरांनी अस्पृश्यता निर्मुलनार्थ आणि त्यांना आपल्या सोबत खरी समानता देण्याच्या उद्देश्याने दलितांच्या घरचा त्यांच्या हातचा पाहुणचार घेणे होते. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे प्रतिकात्मक समानता. नाटकाचे अंक तर गांधी नेहरुंच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनीही अनेक पार पाडले. तसे नसते तर ७० वर्षांनी जातीयता शिल्लक रहाण्याचा प्रश्न नव्हता. जातीयता कदाचित जसे बरेच कथित पुरोगामी क्लेम करतात तसे राजकीय स्पेक्ट्रमच्या दुसर्‍या म्हणजे संघाच्या बाजू कडून शिल्लक राहिली असेल तर त्या बाबत जातीयता निर्मुलनात स्वतः सरसंघचालकांनी रस दाखवला आहे त्यामुळे घरोघर जाऊन रसपान चालू आहे. त्यातही नाटकाचे अंक होतील नाही असे नाही. पण १) उशिराने आणि पायाखालची राज्यसतेची वाळू सरकण्याच्या भितीने का होईना जातीयता निर्मुलनाची गरज किमान त्यांच्या वरीष्ठ नेतृत्वास जाणवते आहे हे कमी महत्वाचे नाही २) भाजप आणि काँग्रेस दोन्ही राजकीय स्पर्धेतून जातीयता निर्मुलनाची एकमेकापेक्षा अधिक सकारात्मक/रचनात्मक पाऊले उचलतील तर त्यात वावगे काही नाही. राजे, इथे प्रश्न सामाजिक समता निर्माण करण्याचा असावा, घरे आणि जेवणाची ताटे वाटण्याचा नाही हे ध्यानी घेण्याचे टाळण्याच्या हट्टा मागेही काही कारणे असतील नाही का ? ती कारणे कळाल्यास (हे कळणे मोठे दुरापास्त असते) ज्याची त्याने दुरुस्त करावीत, त्यात आम्ही बापडे काय करणार ? असो.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 13:14

In reply to राजे अभ्यास वाढवावा लागेल, by माहितगार

Permalink

आम्ही अभ्यास करतो

तुम्हीही जरा अभ्यास वाढवा. समाजातील तरुण लोकांनी एकत्र यावे , जेवावे , एकत्र कष्ट करावेत , ते तुमच्या पुस्तकात लिहिले आहे - ओम सहनाववतु ..... तसे करावे पण यांखेरीजही आजारी व्यक्ती , लहान मुले , प्रेग्ननट स्त्रिया , निराधार व्यक्ती , सिनियर सिटीझन इ ना काही विशेष मदतही द्यावी लागेल. बाकी , जातीयतेचे 'खाप' र काँग्रेसवर किंवा भाजपावर फोडायचे कारण नाही , त्या गोष्टी पूर्वीपासून आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 13:41

In reply to आम्ही अभ्यास करतो by manguu@mail.com

Permalink

राजे अभ्यास वाढवा

....बाकी , जातीयतेचे 'खाप' र काँग्रेसवर किंवा भाजपावर फोडायचे कारण नाही , त्या गोष्टी पूर्वीपासून आहेत.
जे मतांचे राजकारण करुन सत्तेत आहेत / होते त्यांच्यावर खापर का फोडू नये ? यातल्या एकाने तरी गेल्या ७० वर्षात अद्याप दलित पंतप्रधान घडवून दाखवला आहे का ? भारतातली अर्धी मुख्यमंत्रीपदे दलितांना दिली असे काही करून दाखवले आहे का ? कॉर्पोरेट शेअर होल्डींगमधले ५-१० टक्के दलितांना राखीव ठेवले असे काही केले आहे का ? वेमुला आणि दलिताम्ची समस्या सामाजिक समतेची आहे स्मान वागणुक देण्याबद्दलची आहे . सामाजिक समतेशी तडजोड करुन घरे आणि जेवणे देण्याची अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती असे माझ्या ऐकण्यात नाही. जेवणे आणि घरे अजून काही देऊन माणसाची निष्ठा अंशतः विकत घेतल्या जाऊ शकतात पण त्याने सामाजिक प्रतिष्ठा समानता प्रस्थापनास हातभार लागतो असे नसावे. गरीब दलितातही आहेत आणि मुस्लिमातही, मुस्लिमलीगने भारतातील सगळ्या मुस्लिम आणि दलितांना मोफत घरे देऊ केले आहे का ? कि केवळ राजकीय सोईच्या लोकांना ? ज्यांची मुले आत्महत्या करतात अशा दलितांची संख्यापण भारतात बरीच असेल त्या सर्वांना मुस्लिम लीगने घरे देऊ केलीत का ? की जिथे रोहीत वेमुलांच्या नातेवाईकांना विवीध राजकिय सभातून एक्झिबीट करण्यास ते ऊपलब्ध असावेत असा उद्देश आहे ? विवीध राजकिय सभातून एक्झिबीट करण्यात आणि त्यासाठी घरे वाटण्यात राजकीय दृष्ट्या चुकीचे काही नाही पण त्याने व्हिलन अजून कसा व्हिलन आहे ह्याचीच जाहीरात होते . सामाजिक सामंजस्यास हातभार लागतो का ? सामाजिक सामंजस्यास समरसता भोजनाने हातभार लागतो की एक्झिबीशन्स भरवल्याने लागतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 13:46

In reply to राजे अभ्यास वाढवा by माहितगार

Permalink

हे राहीलेच

मुस्लिम राजकीय पक्ष केरळात राजकीय तडजोडीने सत्तेत होते तेव्हा किती मंत्रीपदे दलितांना दिली ? काश्मिरात किती मंत्रिपदे दलितांना मिळवून दिली ? किंवा मतपेटीचा काँग्रेसवर प्रभाव आहे आमची मते घेता तेव्हा दलितांचे आरक्षन २० टक्क्यावरून ५० टक्क्यावर वाढवावे अशी काही मागणी त्यांनी केल्याचे ऐकिवात आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 14:11

In reply to हे राहीलेच by माहितगार

Permalink

अब्यास वाढवायचं बघा

मी अमुक एक हॉस्पिटलात डॉक्टर म्हणून काम करतो - नोकरी , तिथे मी गरिबाला फुकट मदत देऊ शकत नाही , स्वतःच्या खिशातून 100 रु देऊ शकतो , पण हॉस्पिटलचे रिसोर्सेस फुकट नाही देऊ शकणार राजकीय पक्षाने आरक्षण वाढवणे वगैरे कायदेशीर प्रक्रिया आहे , ती एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही . कदाचित शासकीय नियमात नसेल बसत तर ती मागणी पूर्णही होणार नाही. पण राजकीय पक्ष स्वतःच्या अकौंटमधून हव्या त्या गरजू दलिताला मदत देऊ शकतो, इथे त्या राजकीय पक्षाने स्वतः:च्या अकौंटमधून मदत दिली आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे हास्यअस्पद comparisn करू नये
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 14:41

In reply to अब्यास वाढवायचं बघा by manguu@mail.com

Permalink

ठिके, गंभीर गोष्टींशी तुलना करूया !

ठिके हास्यास्पद न वाटणार्‍या गंभीर गोष्टींशी तुलना करूया (तुमच्या या उत्तराचीच अपेक्षा करत होतो) ! मुस्लीम लीग ने किती तलाक पिडीत महिलांना घरे बांधून दिली ? किती तलाक पिडीत महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचे खर्च ऊचलले ? मुस्लिम लिगने किती हलाला सारखे प्रकार बेकायदेशीर ठरवण्या साठी नेमकी कोणती राजकीय पाऊले उचलली ? मुस्लीम महिलांना काझी आणि मौलवीपदे मिळावी म्हणून काय पाऊले उचलली ? पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समितिच्या अर्ध्या जागा मुस्लीम महिलांना मिळाव्यात म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीमांनी चालवलेल्या व्यवसाआत मुस्लिम महिलांना अर्धी पार्टनरशीप आणि वाढीव प्रॉपर्टी शेअर मिळावा म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीम लिग आणि मुस्लिम राजकिय पक्षांचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समितीवर अर्ध्या जागा मिळाव्यात म्हणुन कोणती पाऊले उचलली ? मुस्लिम राजकीय पक्षांची अर्धी निवडणूक तिकिटे मुस्लिम महिलांना मिळावीत म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीम समाज त्यात्या राज्यातील भाषा बोलून तिथल्या तिथल्या समाजात मिसळावा म्हणून कोणती पाऊले उचलली ? लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण वाढवून मिळावे या मागणीसाठी काय हालचाली केल्या ? वैचारीक दृष्ट्या प्रामाणिक असाल तर प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र उत्तर द्यावे . एका प्रश्नाचे काहीतरी उत्तर द्यायचे आणि बाकी प्रश्न अनुत्तरीत ठेवायचे अशी चलाखी नको !
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 17:58

In reply to ठिके, गंभीर गोष्टींशी तुलना करूया ! by माहितगार

Permalink

पुन्हा तीच तुलना

पुन्हा तीच तुलना
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 18:14

In reply to पुन्हा तीच तुलना by manguu@mail.com

Permalink

कारण तुलना रास्त आहे !

हो अगदी, कारण तुलना रास्त आहे ! कारण जेवढी नाटकीयता शोबाजी इतर राजकीय पक्ष करतात तेवढीच मुस्लिम लीग करते आहे, त्यात वेमुला कुटूंबास मदतीपेक्शा राजकीय फायद्याचे तूप आपत्या पेक्षा पोळीवर कसे ओढता येईल या चढाओढीपेक्षा अधिक काही नाही. रोहीत वेमुलाच्या आधी सुद्धा त्याच विद्यपीठातील दलित विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी आत्महत्या झालेल्या आहेत , वेमुला प्रकरणाच्या आधी मुस्लिम लीगला कदाचित सुचले नसेल पण वेमुला प्रकरणा सोबत नाही म्हटले तरीही त्यांचीही चर्चा झालीच त्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबांना मुस्लिम लीगने नेमकी कोणती मदत पोहोचवली ? खरे तर आता पावेतो सोपेच प्रश्न विचारले , माझ्या कडे आणखी कठीण प्रश्नांची यादी आहे. पण एवढे आधी झेपू द्यात. ऊत्तरे देण्यास अवघड असली की प्रश्नांना अयोग्य जाहीर करणे सोपे असते . पण उत्तरे टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रश्नचिन्हे संपत नाहीत हे उत्तरे टाळणारे विसरत असतात. जेव्हा जेव्हा पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस ग्लानी येईल तेव्हा तेव्हा पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 18:49

In reply to कारण तुलना रास्त आहे ! by माहितगार

Permalink

पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस

पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस ग्लानी पुरोगामींची निरपेक्षता केंव्हाच हुतात्मा होऊन तिची पुण्यतिथी हि साजरी होते दरवर्षी. तुम्ही कशाची वाट पाहता आहात
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 18:55

In reply to पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस by सुबोध खरे

Permalink

अवतार घेण्याची

..तुम्ही कशाची वाट पाहता आहात
कदाचित स्वतः अवतार घेण्याची (जाहीर करण्याची) :)
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 09:24

Permalink

https://m.maharashtratimes

https://m.maharashtratimes.com/india-news/bhayyu-maharaj-was-under-pressure-of-the-government-says-karani-senna-asking-for-cbi-probe/articleshow/64642595.cms इंदूर: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत असतानाच भय्यू महाराजांवर सरकारचा दबाव होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे. 'भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता, परिणामी भय्यूजींनी आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी हा दावा केला. भय्यूजींकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे उघड करू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता. तशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळत असल्याचं गोगामेडी यांनी सांगितलं. मात्र गोगामेडी यांनी यावेळी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. 'सरकार खरोखरच प्रामाणिक असेल तर त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. त्यामुळे सत्यबाहेर पडेल. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेन,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भय्यू महाराज यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबियांचा, शिष्यांचा किंवा सरकारशी संबंधित व्यक्तिचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त करतानाच भय्यूजींच्या अंतिमसंस्काराला कुठलाही मोठा नेता किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 11:59

In reply to https://m.maharashtratimes by manguu@mail.com

Permalink

आपले जेष्ट कवी माहितगार

यांच्या कवितेच्या काही वळी त्यांची माफी मागून चिकटवत आहे पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? सूचना :- आता या कवितेचा भावार्थ आणी मंगुशेठच वागणं जर सेम वाटत आसल तर तो निव्वळ योगायोग समजावा .
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 15:23

In reply to आपले जेष्ट कवी माहितगार by सोमनाथ खांदवे

Permalink

कवितेच्या मर्यादीत ओळी

कवितेच्या मर्यादीत ओळी वापरण्यास हरकत नाही पण शक्यतो सुयोग्य संदर्भ अबाधीत रहावे म्हणून पूर्ण कवितेचा मिपा दुवा सोबत जोडत जावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे. आ.न. माहितगार
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 15:37

In reply to कवितेच्या मर्यादीत ओळी by माहितगार

Permalink

पुढच्या वक्ताला नक्की लक्षात

पुढच्या वक्ताला नक्की लक्षात ठेवीन ,
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 16:09

In reply to पुढच्या वक्ताला नक्की लक्षात by सोमनाथ खांदवे

Permalink

अनेक आभार

__/\__ अनेक आभार
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 13:39

Permalink

राजकीय घराणेशाहीचा मुद्दा

राजकीय घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपा खासदार वरून गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घरचा अहेर दिला आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे त्यांचे भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना टोला लगावला आहे. राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य माणसासाठी राजकारणाचे दरवाजे बंद होत चालले आहेत ही बाब खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी टीका वरूण गांधी यांनी केली आहे. आपण असे राजकारण केले पाहिजे ज्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. मात्र प्रत्यक्षात राजकारण असे केले जाते आहे ज्यात घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते. वरूण गांधी यांनी टीका करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. एखाद्या छोट्या गावात राहणारा तरूण ज्याच्याकडे ज्ञान आहे, प्रतिभा आहे अशा युवकाचे ज्ञान वाया जाते. मी राजकीय परिवाराचा भाग नसतो तर राजकारणात आलोच नसतो असेही वक्तव्य वरूण गांधी यांनी केले. ------- किती ही विनोदबुद्धी !
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 06/19/2018 - 15:39

Permalink

काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा

काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा काढला ओ. ==== भाजपच्या संगतीत राहून वाल्याचा वाल्मिकी होतो हे ब्रीद वाक्य हवेतच विरलं म्हणायचं. ==== "Terrorism, violence and radicalisation have risen and fundamental rights of the citizens are under danger in the Valley. -राम माधव नोटबंदी ने तर हे सगळं बंद पडले होते ना ? ==== विकास का काय जन्मायचा होता काय होणार पुढे आता ? ==== http://zeenews.india.com/jammu-and-kashmir/bjp-pulls-out-of-alliance-with-pdp-in-jammu-kashmir-mehbooba-likely-to-resign-as-cm-2118039.html
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 17:48

In reply to काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा by विशुमित

Permalink

11 महिने राहिले

धीर सुटल्याची लक्षणे दिसत आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 17:30

Permalink

काश्मीर शांत राहाव ,तुमच्या

काश्मीर शांत राहाव ,तुमच्या सारख्या भटक्या पर्यटकांना काश्मीर ला जाता यावं म्हणून भाजप न पी डी पी ला सपोर्ट देऊन सत्तेत सामील झाले होते .
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 06/19/2018 - 17:47

In reply to काश्मीर शांत राहाव ,तुमच्या by सोमनाथ खांदवे

Permalink

खांदवे साहेब भाषेवर तेवढे

खांदवे साहेब भाषेवर तेवढे थोडे नियंत्रण ठेवा. गावठी बोलण्याच्या स्टाईल मध्ये सगळेच खपवून घेतले जाणार नाही, हे आधीच नमूद करतो. ==== फक्त पर्यटन करता यावे हा भाजपचा एकमेव उदात्त हेतू होता म्हणायचं. ==== बाय द वे काश्मीरला मी भटकंती करायला गेलो होतो हे तुम्हाला कसे समजले ?
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 18:21

In reply to खांदवे साहेब भाषेवर तेवढे by विशुमित

Permalink

विषुमीत साहेब , तुमच्या भावना हेतुपुरस्सर दुखावल्या नाहीत

ज्याला भटकण्याची आवड असते तोच खरा पर्यटक बाकी सगळे ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा बाटली घेऊन बसणारे असा मला म्हणायचे होते . काश्मीर चा प्रश्न राजकारण करण्याच्या पलीकडे गेलेला आहे व त्या परिस्थितीत पी डी पी आणि भाजप ला ज्यास्त सीट भेटले म्हणून त्यांनी राज्यात शांतता रहावी , काश्मिरी जनतेला उर्वरीत भारताशी जोडता यावे या कारणास्तव त्यांनी सरकार स्थापन केले असेल . पी डी पी बरोबर सत्तेत राहून केंद्र सरकार ला 'ऑपरेशन ऑल आऊट ' करताना अडचणी येत असणार म्हणून भाजप ने पाठिंबा काढला असावा , आता इथून पुढच्या काळात शिपाई औरंगजेब चे मारेकरी किती दिवसात टिपले जाईल हे कळेलच . मला वाटतंय पंजाब मध्ये सुद्धा फ्री हँड दिल्या नंतरच आतेरिकी कारवाया बंद झाल्या होत्या . पाठिंबा काढल्यानं काय व्हईल , तुम्हाला काय वाटल त्ये बी सांगा .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 18:26

In reply to खांदवे साहेब भाषेवर तेवढे by विशुमित

Permalink

छान

अशा सोम(रस)नाथांचे जास्त मनावर घेऊ नये. स्वतः कधी पाकचा निषेध करणार नाहीत , इतरांना 50 दा विचारतील , तू पाकचा का निषेध केला नाहीस ? कुणा निराधार हिंदू म्हातारीला मुस्लिम लीगने मदत केली तर 50 दा विचारतील - तुम्ही ह्यांना मदत का नाही केली अन त्यांना मदत का नाही केली ? पण हिंदू संघटनांना नाही विचारणार की ती जर हिंदू होती तर तुम्ही कुणी का मदत केली नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 18:43

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

फॉल्ट दाखवल्याने कमी होत नाही.

...कुणा निराधार हिंदू म्हातारीला मुस्लिम लीगने मदत केली तर 50 दा विचारतील - तुम्ही ह्यांना मदत का नाही केली अन त्यांना मदत का नाही केली ? पण हिंदू संघटनांना नाही विचारणार की ती जर हिंदू होती तर तुम्ही कुणी का मदत केली नाही ?...
याची फॉल्ट दाखवल्याने त्याची आणि त्याची फॉल्ट दाखवल्याने याची कमी होत नाही. आणि प्रश्न अनुत्तरीत ठेवल्याने उत्तर दिल्यासारखे होत नाही
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com