मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुभव

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

मार्गी ·

चंद्र गहणात कसा दिसतो हे बघायचे असेल म्हणून विसर्जन होऊ देत नव्हता. शेवटी राजाने चंद्रग्रहण बघीतलेच. चंद्राने त्याच्या सर्व "कला" दाखवल्या! अगदी,अगदी. दररोज दहा वाजता झोपणारा मी काल एक वाजता झोपलो. डि एस एल आर ने चांगले फोटो आलेत. मस्त अनुभव होता. लेख आवडला.

मार्गी 18/09/2025 - 11:02
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद! @ श्वेता व्यास जी, ढग असूनही नुसत्या डोळ्यांनीही हे चंद्रग्रहण छान दिसलं.

चंद्र गहणात कसा दिसतो हे बघायचे असेल म्हणून विसर्जन होऊ देत नव्हता. शेवटी राजाने चंद्रग्रहण बघीतलेच. चंद्राने त्याच्या सर्व "कला" दाखवल्या! अगदी,अगदी. दररोज दहा वाजता झोपणारा मी काल एक वाजता झोपलो. डि एस एल आर ने चांगले फोटो आलेत. मस्त अनुभव होता. लेख आवडला.

मार्गी 18/09/2025 - 11:02
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद! @ श्वेता व्यास जी, ढग असूनही नुसत्या डोळ्यांनीही हे चंद्रग्रहण छान दिसलं.
नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 14/08/2025 - 09:37
श्री० गोडबोले, 'जन्मना जायते शूद्रः' हे स्मृतीवचन तुम्हाला ठाऊक असेलच. याचा अर्थ असा की मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो शूद्र असतो. मग त्याचे उपनयन होते तेव्हा तो पित्याच्या गोत्रात प्रवेश करतो (पहा- 'शूद्र पूर्वी कोण होते', बाबासाहेब आंबेडकर). मग तो ब्राह्मण-वैश्यादि वर्ण धारण करतो. आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे! त्यात आता गोत्र वगैरे गोष्टीची निरर्थकता पुरेशी सिद्ध केलेली असल्यामुळे त्याची आता त्याच्यावाचून उर्वरित आयुष्यात काहीही अडणार नाही. म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू! पण माझ्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता नाही, तिथेच सगळी गोची आहे. तेव्हा या संदर्भात काय करता येईल?

In reply to by युयुत्सु

तेव्हा या संदर्भात काय करता येईल?
म्हणजे ? तुमच्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता कशी मिळवून देता येईल असे विचारत आहात का ? तर माफ करा मी कायदे तज्ज्ञ नाही. ह्याबाबत मी काहीही मदत करू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे!
माझी समस्या आणखी वेगळी आहे. माझी मुंज झाली आहे पण सोडमुंज म्हणून एक प्रकार असतो तो झालेला नाही. सोडमुंज लग्नाच्या आदल्या दिवशी करतात म्हणे. माझ्या लग्नाच्या वेळेला सोडमुंज असे काही असते हे तर मी विसरूनच गेलो होतो. माझ्या आईच्या लक्षात होते (ते मला नंतर कळले) पण अशा गोष्टींवर माझा आणि आईचाही विश्वास नसल्याने तो विषय परत निघालाच नाही. दुसरे म्हणजे मुंज झाल्यापासून लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याश्रम. त्या काळात शिकून आपल्याला कमावायला आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सक्षम करायचे आणि मग लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. म्हणजेच काय की गृहस्थाश्रमात असताना शिकणे अपेक्षित नसावे. आता माझ्या बाबतीत झाले असे की मी लग्न झाल्यानंतरही शिकतच होतो. इतकेच नाही तर बायको पण शिकत होती. आम्ही दोघे त्या दोन वर्षात वेगळ्या ठिकाणी राहायचो. म्हणजे आम्ही त्या आश्रम पध्दतीच्या नियमांचा भंग केला ना? बापरे... कुठे फेडायची ही पापं?
म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू!
मी सर्टिफाईड उजवा (पण सनातनी नक्कीच नाही) आणि लिब्राण्डू तर नक्कीच नाही :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 14/08/2025 - 11:59
बापरे... कुठे फेडायची ही पापं? तुम्ही पुरुष म्हणून मोक्षाच्या रांगेत लवकर नंबर लागायची शक्यता जास्त! तुमच्या पत्नीने, शिक्षणाच्या ओढीने आश्रम व्यवस्थेचे पालन केलेले नसल्याने मोक्षप्राप्तीची शक्यता कमी वाटते.

In reply to by युयुत्सु

मला खरेच उत्सुकता आहे की तुमचे हे असे आकलन कोणत्या वाचनाने झालेले आहे ! कृपया संदर्भ द्यावा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ? 2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही. 3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा. 4.तुम्हाला पाप म्हणजे काय माहिती आहे का ? तुमची पापा पुण्य इत्यादी व्याख्या कोणत्या वाचनावर आधारित आहे ? गृहस्थाश्रमात शिकणे हे पाप आहे असे तुम्ही कोठे वाचले ? तुम्हाला कोणी सांगितले ? 5. तुम्हाला खरेच जाणून घेण्यात रस आहे का निव्वळ विषयांतर करायचे आहे अन्य लोकांच्याप्रमाणे ? तुम्ही मनापासून प्रश्न विचारत असल्यास मी मनापासून अगदी प्रांजळपणे माझ्या आकलनानुसार उत्तर देईन. शिवाय माझी मते कोणालाही पटली पाहिजेत असा माझा अभिनिवेशही नाही. हां, निव्वळ टाइमपास करायचा असल्यास, आमचा पास. त्यापेक्षा आम्ही आम्ही आमचा लाँग वीकेंड वेगळ्या चिंतनात सार्थकी लाऊ.

In reply to by प्रसाद गोडबोले

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ?
आपण असे करू शकतो असे प्रत्येकाला थोड्याबहुत प्रमाणात वाटत असावे. मात्र दुसर्‍या बाजूच्या व्यक्तीला मात्र समोरचा आपले पूर्वग्रह बाजूला करायला तयार नाही असे वाटत असावे. हे तुम्हाला किंवा अन्य कोणाला उद्देशून नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे.
2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही.
मी कधी म्हटले तो विधी आईने करायचा असतो? सोडमुंज हा प्रकार माझ्या लक्षात नव्हता पण माझ्या आईच्या लक्षात होता. मुळात माझ्या लक्षातच नसल्याने तो करावा असे मी म्हणायचा प्रश्नच नाही. आईच्या लक्षात होते पण तिचा पण अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने तिने पण तो विषय काढला नाही. पण समजा तो विषय काढला गेला असता आणि माझी सोडमुंज झाली असती तर ती आईने केली असती असे मला वाटते असे कुठे लिहिले आहे? तो केला नाही केला तरी इतर कोणाला काही फरक पडतो की नाही हा प्रश्नच माझ्यासाठी गैरलागू आहे. कारण मलाच मुळात फरक पडत नाही.
3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा.
तसे नसेल तर उत्तम. मला वाटत होते की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार 'नॉन ओव्हरलॅपिंग' आश्रम आहेत. बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही. इंटरेस्ट वाटून त्यात झोकून द्यावे असे कित्येक विषय जगात आहेत. माझ्यासाठी असले विषय त्यातील नक्कीच नाहीत. कदाचित मी खूप खालच्या पायरीवर असेन ही शक्यता आहे पण सो बी इट :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रांजळ प्रत्युत्तराबद्दल धन्यवाद !
बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही.
इतकं सरळ साधं स्पष्ट बोलणं किती सोपं असतं ना . बघा आपल्या दोघांचाही वेळ वाचला. मला काय तुमच्या किंवा कोणाच्याच मानगुटीवर बसून "शिकच आता" असे सक्तीचे करायचे नाही. ज्याला हौस आहे तो करेल, हौस नाही तो करणार नाही. ह्याही प्रतिसादात तुम्ही गडबड केली आहेच खालची पायरी वरची पायरी वगैरे ज्याला संदर्भ कोणते ग्रंथ आहेत अन् कोणते वाचन आहे की नुसतेच ऐकीव पूर्वग्रह आहेत देव जाणे ! पण सोडा . अध्यात्म ही गती नसून स्थिती आहे त्यामुळे तिथे वर खाली अशा पायऱ्याच नाहीत. ज्याला कळायचं त्याला कळतं. बाकीचे उगाच विषयांतर करत राहतात. असो. दोघांचाही वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

चुकीची दुरुस्ती वरील प्रतिसादात " समावर्तन हा संस्कार नाही." असे मी लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो आहे. ह्यात काहीतरी गडबड होत आहे असे वाटल्याने काही शोधाशोध करून पाहिल्यावर लक्षात आले की समावर्तन हा 16 संस्कारांपैकी 1 संस्कार आहे. मात्र ह्या संस्काराचा लोप झाल्याने काही पाप लागते अशा अर्थाचे मला काहीही सापडले नाही. (अजूनतरी.) आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे तुम्ही हे काही मनातच नसल्याने तुम्हाला फरक पडत नाहीच. तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
चुकीचे सांगितले तरी फार टेन्शन घेऊ नका. मला झुमरीतलय्यामध्ये फारसा रस नाही त्यामुळे झुमरीतलय्याचे महापौर बबनराव झुंझारखाडे आहेत असे तुम्ही चुकून सांगितलेत आणि प्रत्यक्षात झुमरीतलय्याचे महापौर गुलाबराव काटेवाले आहेत असे सांगितलेत तरी तुम्ही मुळात चुकीचे सांगितले आहे हे मला कळायचेच नाही आणि कळले नाही किंवा झुमरीतलय्याचे महापौर कोण हे मला माहित नाही याचे फारसे वैषम्य मला नसावे :)

युयुत्सु 14/08/2025 - 09:53
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे, या वर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by युयुत्सु

स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे
मार्ग अनेक आहेत, मार्ग महत्वाचे नाही, गंतव्य प्राप्त झाल्याशी मतलब. बाकी साधुसंतात समाजात लोक जाती पाती वरून भेदभाव करतात, तुम्ही स्त्री पुरुष असा भेदभाव करत आहात, दोन्ही वृत्ती समानच. तरीही तुकोबांनी सरळ साधा सोपा मार्ग सांगितला आहे वरच . "नामस्मरण". नामस्मरणाचा अधिकार सर्वांना. ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ नामस्मरणाला दुषणे देऊन अन्य काही साधने करीन असे म्हणणाऱ्या व्यक्तीचा मार्ग अशक्यप्राय खडतर आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो मत स्त्री असो की पुरुष, शूद्र असो की ब्राह्मण. नामस्मरणाला दुषणे देणाऱ्या , थट्टा मस्करी करणाऱ्या माणसाचे तोंड देखील पाहू नये असे खुद्द तुकोबांनी सांगून ठेवले आहे. बाकी जनाबाई, बहिणाबाई, अक्का स्वामी , वेण्णास्वामी ह्यांचे अभंग , मार्गदर्शन पाहू शकता. मी ज्या अर्थाने स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्ष म्हणालो आहे त्या अर्थाचा एक बहिणाबाई ह्यांचा अभंग आहे तो हा पहा. भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥ वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥ भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥ भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥ चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥ भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥ बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल ते वाचेल.

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling पेक्षा हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल तो वाचेल.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 14/08/2025 - 10:38
हे पहा - "आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत ."

In reply to by युयुत्सु

सोत्रि 14/08/2025 - 15:35
अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे
गंमत म्हणजे, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी साक्ष कोणाची तर तुकोबारायांची, ज्यांची गाथा सनातन धर्मविरोधी ठरवून बुडवायला लावली होती. त्या तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती. - (अधर्मी) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती.
पुरावा काय पुरावा काय पुरावा काय ??? मी फार पुर्वी २०२० मध्ये तुकोबांचे निवडक अभंग https://www.misalpav.com/node/47002 असा लेखनाचा एक धागा सुरु केला आहे . तुम्ही वरील विधानाला समरथन देणारे तुकोबांचे अभंग तिथे पुराव्यादाखल टाकावेत ही कळकळीची विनंती आहे. तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार कित्येकवर्षे चालु आहे त्याला पुराव्यादाखल असा घाणेरडा अपप्रचार करणार्‍यांनी किमान काही तरी तुकोबांचे अभंग सादर करावेत . अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥ वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ तुकोबा अतिषय स्पष्टपणे वर्णाश्रम धर्माचे आचरण करा , विधीनिषेध पाळा असे म्हणत आहेत . तुम्ही लोकं जाणीवपुर्वक तुकोबांच्या नावावर काहीही खपवता हे फार वेदनादायक आहे . माझे लेखन, आणि त्यावर येणारे तुमचे हे असले प्रतिसाद. ह्या असल्या तुमच्या अपप्रचारला मी निमित्तमात्र व्हायला नको. बास झालं .

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 14/08/2025 - 18:29
सदर धागा # सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय असल्याने प्रतिसादही स्वान्तःसुखाय आहे, सबब पुराव्याच्या उत्तरदायित्वास नकार लागू! - (स्वान्तःसुखी) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार =)) 'सनातनी' लेंड्या टाकणा-यांना सगळं जग सनातनी दिसतं. संत तुकाराम हे 'सनातनी' होते अशा अपप्रचाला कोणीही बळी पडू नये म्हणून वाचकांना विनंती की, थेट तुकोबांची गाथा वाचावी. आजच्या काळात कोणासही बदनामी करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल. वाचकांनी आ.ह.साळुंके यांचे 'विद्रोही तुकाराम' ही वाचून काढावे. संत तुकारामांना विद्रोही का म्हटल्या जाते तेही लक्षात येईल. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरापासून पासून ते संत तुकारामापर्यंत मोठा वारकरी संप्रदाय आणि थोर संत होऊन गेले. संत तुकाराम वेगळे आणि विद्रोही का वाटतात ते आजही तीनशे वर्षानंतर लक्षात येईल. समतेचा पुरस्कार करणे हा तत्कालीन व्यवस्थेने गुन्हा माणून त्यांच्या वह्या सनातन्यांनी इंद्रायनीत बुडवायला लावल्या. नशीब आपलं की त्यांच्या वह्या लोकगंगेने तारल्या. बाय द वे, 'गोबरयुगात' सनातनी सगळंच कसं श्रेष्ठ होतं, श्रेष्ठ ते आपलं म्हणनारे 'पोटूशी पुरुष' आंतरजालावर जागोजागी दिसतील त्यावर विश्वास ठेवू नका. 'बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणनिया' श्रेष्ठ संत तुकाराम आधुनिक विचारांचे श्रेष्ठ संत होते. मोठा विषय. 'चिरगुटे घालुनि वाढविले पोट, ग-हवार बोभाट जनामधे लटिके चि डोहळे दाखवी प्रकार, दुध स्तनी पोर पोटी नाही तुका म्हणे अंती वांज चि ते खरी, फजिती दुसरी जनामधे' प्रतिसाद स्वातंसुखाय आहे, 'सनातनी' लोकांनी उपप्रतिसादाच्या लेंड्या टाकू नयेत. बाय द वे, अशा 'सनातनी आणि वांज पोटूशी पुरुषां' पासून वाचकांनी दूर राहावे, एवढीच विनंती. =)) -दिलीप बिरुट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 15/08/2025 - 19:21
संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल.
मी गाथा मंदिर दोन महिन्यांपूर्वी पाहिले...नाही वाचूनच काढले.तब्बल १/२ तास शांतपणे पाहत होते (एकटीच गेली असते तर कदाचित २ तास तरी अजून निवांत वाचले असते.) तुकारामांनी तत्कालीन कित्येक ढोंगी,अघोरी प्रथांवर घणाघाती वार केले हे लगेच समजले.खरचं ते विद्रोही होते. पण सर्वच संतांमध्ये जो गुण ठासून भरलेला असतो तो म्हणजे अव्यक्ताशी एकरूप तोही त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता तोहि वेदांचा अभ्यास न करता. माऊलीही तसेच,कल्पद्रुमाचिये तळी हे ढेरे यांचे माऊलींवरचे सुंदर पुस्तक वाचत आहे.माऊली स्वतः कौलमता परंपरेतील,त्यातही काही अघोरी प्रथा असायच्या पण माऊलींनी नीरक्षीरविवेकाने यांना दूर ठेवत शुद्धीकरण केले आणि भागवत धर्म सर्वांना खुला केला. या संतांच्या बदलानेच आजचा महाराष्ट्र घडला आहे,शुद्ध हेतू असल्यास माणसाने बदलाला ,बदल घडवायला घाबरू नये.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 14/08/2025 - 19:32
तुकोबारायांनी अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती - _/\_ त्यांची साक्ष याच हेतूने कुणी काढत असेल, तर रास्त आहे. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी, जातीय द्वेष पसरवण्यासाठी करण्यासाठी किंवा झुंडशाही बळकट करण्यासाठी तुकोबारायांची साक्ष काढली जाणे दुर्दैवी आहे. एरवी तर्क, बुद्धीप्रामाण्य वगैरेचा धोशा लावणारे आणि 'सिलेक्टिव रिडींगचा" निषेध करणारे या बाबतीत चिडीचूप बसतात हे अधिकच दुर्दैवी आहे. असो.

In reply to by सोत्रि

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू । अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप । दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती. -संत तुकाराम. -दिलीप बिरुटे

भृशुंडी 14/08/2025 - 22:57
सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे !
हे परस्पर ठरवून मोकळं झाल्यावर स्त्रियांनी काय करायचं? हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? मोक्ष नको म्हणून बाजूला होईल.

In reply to by भृशुंडी

स्वधर्म 15/08/2025 - 14:45
>> हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? नुकत्याच दुसर्‍या धाग्यावर आलेल्या अनुभवानुसार हे असं नाही, एवढेच म्हणतो.

भृशुंडी 15/08/2025 - 23:28
१. "पूर्वजांनी क्षयज्ञ व्यवस्था केली आहे, म्हणून ती खरी आणि योग्य आहे."/ बाबा वाक्यं प्रमाणं - आता पुरे. हे प्रकरण थांबवा. पूर्वजांनी तेव्हाच्या काळी शक्याशक्यतेची काही बांधणी करून एक व्यवस्था निर्माण केली (करण्याचा प्रयत्न केला). तो आता १०००-२००० वर्षं किंवा आणखी जास्त कालावधीनंतर योग्य आहे - हे "पटवून" घेण्याचा आग्रहाभिनिवेश कशाला? २. संस्कृती प्रवाही असते, किंबहुना असावी. अशा प्रवाहाला पुन्हा मूळ जागी नेण्याचा उपद्व्याप कशासाठी? तेही मूळ काय- हेच ठाऊक नसताना. १०० ग्रंथ लिहिल्याने मूळ संस्कृतीचं साकल्य जपलं जाऊ शकत नाही. त्याचे थोडेफार अंश आपल्याला त्या शाब्दिक रचनेत दिसतात आणि त्यालाच प्रमाण मानून पुढे जाणं हे फारच ढोबळ आहे. ३. अध्यात्म आणि व्यवहार/कायदे ह्यातला फरक - एक तर हे अध्यात्म -म्हणजे मोक्षप्राप्ति इत्यादीपुरतं सीमित असू दे किंवा मग सरळ कायद्याची भाषा असू दे- कलम/अ‍ॅक्ट अशा तपशीलात बोला. दोहोंची सरमिसळ नको. अध्यात्मप्राप्तीसाठी जनांनी (विषेश करून ज्यांना नियम बनवण्याचा हक्क नाहे अशांनी) कसं वागावं आणि काय करावं हे सांगणं ढोंगी आहे. असो. प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, स्वांतसुखायची "आमची कुठेही शाखा नाही"वाली पाटी अगोदरच वर लावली आहे.

In reply to by भृशुंडी

कॉमी 15/08/2025 - 23:45
परफेक्ट. एकाच वेळी म्हणतात मटेरियलीस्ट जीवनात मुक्ती नाही. त्याग करा. पण स्त्रियांचा मोक्ष कशात म्हणे तर लगीन करण्यात. ख्या ख्या ख्या.

पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच ,
मागे मी मिपावरच एके ठिकाणी लिहिले होते की माझा भारतीय लेखकांविषयी एक आक्षेप असतो आणि तो म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे हे स्पष्टपणे कधीच न लिहिता ते गोलमटोल लिहितात. मोक्ष म्हणजे एखादी जागा आहे का की जिथे एकदा गेले की आपले सगळे काही झाले? आणि तिथे जायला संन्यास घेतलाच पाहिजे, संन्यास घेतला नसेल तर मुलगाच (मुलगी पण चालणार नाही) नसेल तर तुम्हाला नो एन्ट्री. ते काय दिल्लीतले रेस्टॉरंट आहे का भारतीय वेशभूषा असेल तर प्रवेश नाकारणारे? मोक्ष ही एक अवस्था आहे असे तुम्हीच लिहिले आहे ते अधिक लॉजिकल वाटते. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी इतक्या पन्नाशसे साठ अटीशर्ती असतील तर जल्ला नको तो मोक्ष असेच अनेक सामान्यांना वाटायची शक्यता आहे. निदान मला तरी वाटते. त्यापेक्षा मग परदेशी तत्वज्ञ वेन डायर म्हणतात ते अधिक पटते- Wayne Dyer आणि कोणते चॉईस करायचे? तर एकहार्ट टोलींनी म्हटल्याप्रमाणे वर्तमानात राहा Eckhart Tolle आणि मनात उठणार्‍या विचारांच्या कल्लोळापासून आपल्याला मुक्त करणे. Eckhart Tolle कदाचित तुम्ही ज्याला संन्यास म्हणत असाल ते यापेक्षा वेगळे नसेलही. वेन डायर, एकहार्ट टोली वगैरे परदेशी तत्वज्ञांचे लेखन वाचताना असे जाणवते की कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याच तत्वज्ञानात सांगितलेल्या आहेत- त्या गोष्टी कुठेतरी रिलेटेबल वाटतात पण कितीतरी अधिक सोप्या आणि अशा अटीशर्ती न लादता. तुम्ही हे सगळे लिहिले आहे- अमुक केले नाही तर मोक्ष मिळायचा नाही, मोक्ष मिळायला संन्यास घेतला पाहिजेच पण तुम्हाला मोक्ष म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय अभिप्रेत आहे हे लिहायला नको का? इथे परदेशी तत्वज्ञ अधिक भावतात. कोणतेही जडजंबाल शब्द न वापरता आपण काय करायचे ते ते लोक बरोबर सांगतात. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या तत्वज्ञानात ते सांगितलेले नाही असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा या अशा लेखांविषयी आहे.

युयुत्सु 16/08/2025 - 12:34
श्री० गोडबोले आणि भगव्या गॅंगमधील यच्चयावत् सनातनी यांचा गोग्गोड वैचारिक गैरसमज झालेला असतो, तो समजाऊन सांगण्यासाठी एका प्रसंगाची आठवण सांगणे आवश्यक आहे. छद्मविज्ञानभूषण, फेकाफेकचूडामणी डॉ० प० वि० वर्तक यांच्या अनुयायांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि सत्कार आयोजित केला होता. त्यांच्या सत्काराला करवीरपीठाचे शंकराचार्य मुख्य पाहूणे म्हणून बोलवले होते. मला त्या दिवशी प्रचंड कंटाळा आला होता, कशातही मन रमत नव्हते म्हणून जरा ऑफ-बीट करमणूक करून घेण्य़ासाठी मी वर्तकांच्या सत्काराला हजेरी लावण्य़ाचे ठरवले. मी बालगंधर्ववर पोचलो तेव्हा मला काही धक्के बसले. मला वाटले की फार गर्दी नसेल, पण अमाप गर्दी लोटली होती. माझ्या "आउटलायरत्वाची जाणीव" होऊन मी शरमिंदा झालो आणि शेवटच्या रांगेत कशीबशी जागा मिळवली आणि करमणुकी ऐवजी सहनशीलतेची परिक्षा दिली. त्या कार्यक्रमात शंकराचार्यांनी बोलता-बोलता एक वाक्य टाकले. ते म्हणाले, "परंपरेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत." माझ्या दृष्टीने यच्चयावत सनातनी लोकांच्या भाबड्या श्रद्धांना बळकटी देणारे हे वाक्य आहे. साहजिकच अशा श्रद्धांच्या मशागतीने समाजाची दोन अभेद्य गटात विभागणी होऊन एका कटु संघर्षाला तोंड फुटते, ज्याने सध्या परमोच्च बिंदू गाठला आहे. गोडबोल्यांसारखे लोक उतरंडप्रधान कुटुंब/समाजव्यवस्थेत जो त्याग सदस्यांवर लादला जातो त्याचे केवळ समर्थन करून थांबत नाहीत तर उदात्तीकरण करण्यात आपले सर्वस्व पणाला लावतात आणि हे करताना एक अक्षम्य चूक करतात. ती अशी, आपण सकाळी उठतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपले मन प्रसन्न होते. पण प्रत्यक्षात तो किलबिलाट पक्ष्यांच्या भीषण जीवनसंघर्षाची सुरुवात असते. सर्व सनातन्यांची छाती इतिहासातील सोन्याच्या पानांनी भरून येते, तेव्हा लादलेल्या त्यांगांचे (पक्षी-शोषणांचे) आक्रोश (किलबिलाट?) त्यांना कधीच ऐकू येत नाही. मग त्यांना जे परंपरा-पुरस्कृत उतरंड, तसेच परंपरेने शोधलेली उत्तरे स्वीकारू शकत नाहीत, ते धोकादायक वाटायला लागतात. मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...

In reply to by युयुत्सु

सोत्रि 16/08/2025 - 19:22
मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...
तंतोतंत! - (आउटलायर) सोकाजी

आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
म्हणजे काय? तर थोडक्यात मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय करायचे हे दुसरा कोणीतरी सांगणार. मला काय करावेसे वाटते, माझी इच्छा काय आहे, माझी आवडनिवड कशात आहे या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारायच्या. आणि परत दुसर्‍या तोंडाने हिंदू धर्म कसा सहिष्णू आणि व्यक्तीस्वातंत्र्य जपणारा म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची. बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. सगळ्यांना न्युक्लिअर फ्युजन आणि फिशन वगैरे गोष्टी कळायची गरज नाही हे नक्कीच. एखाद्याला त्या क्षेत्रात गती आहे की नाही हे तपासायचे परीक्षा वगैरे मार्ग आहेत. ते सगळे फाट्यावर मारून कोणाला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही हे दुसरा कोणीतरी सांगणार आणि सगळ्यांनी त्याप्रमाणेच वागायचे या रचनेला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 17/08/2025 - 16:21
>> बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना? ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच. मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 19/08/2025 - 18:16
वरील प्रतिसादात 'मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' या वाक्यात माझी चूक झाली आहे. स्वभाव म्हटल्यामुळे तो प्रतिसाद व्यक्तीशी जोडला जातो. चंद्रसूर्यकुमार यांच्या स्वभावाविषयी काहीच म्हणायचे नव्हते. योग्य वाक्यरचना अशी हवी होती: 'मूळ विचारसरणी तीच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' तसेच प्रतिसादाचे शीर्षक 'मूळ विचारसरणी' असेच हवे होते. त्याबद्दल दिलगिरी.

In reply to by स्वधर्म

हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना?
यात एक मोठा फरक म्हणजे डापु हा वर्ण जन्माने येत नाही आणि त्या विचारांमुळे किती नुकसान झाले आहे हे समजल्यावर माणूस त्या तथाकथित वर्णातून बाहेर पडू शकतो. म्हणजे डापु हा स्टॅटिक प्रकार नाही तर डायनॅमिक आहे तर जन्माने मिळणारे वर्ण हे स्टॅटिक आहेत.
ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच.
हे बरोबर उलटे आहे. म्हणजे एखाद्याला आधी डापु ठरवून मग ते कसे असतात, काय विचार करतात हे मनाचे श्लोक तयार करत नाही तर मला अभिप्रेत असलेली डापुपणाची लक्षणे एखाद्यात दिसली तर त्याला डापु म्हणतो. त्यातूनही वर म्हटल्याप्रमाणे काही लोक आयुष्यभर डापु असतात तर काही त्यातून बाहेर पडतातही. बाहेर पडलेल्यांमध्ये काही अंशी मी स्वतः पण आहे. म्हणजे मीच माझे पूर्वीचे विचार तपासून बघतो तेव्हा पूर्ण डापु होते असे म्हणणार नाही पण डापुपणाकडे काही अंशी झुकणारे नक्की होते. माझ्या जवळच्या अती जास्त प्रमाणावर हिंदू-हिंदू करणार्‍या नातेवाईकांविरूध्दची ती प्रतिक्रिया होती असे आता मला जाणवते. पण नंतर तटस्थपणे विचार केल्यावर इतर कोणी काही केले म्हणून त्याविरूध्द प्रतिक्रिया येणे योग्य नाही हे मला पण जाणवले. आजही- अगदी याच लेखावरील प्रतिक्रियेत लिहिले आहे की मला भारतीय लेखकांपेक्षा परदेशी लेखक अधिक आवडतात कारण भारतीय लेखक अनेकदा नक्की काय करायचे हे न सांगता गोलमटोल काहीतरी सांगतात. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या लेखकांना आमचा धर्म किती महान, आमची संस्कृती किती महान या वेदकालीन जंगलात भटकायचा इन्सेन्टिव्ह असतो आणि अनेकदा ते तसे करतातही. त्यात मुळातला मेसेज बाजूला पडतो. त्या तुलनेत मी वाचतो त्या परदेशी लेखकांना भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्म किती महान याच्या चिपळ्या वाजवत राहायचे काहीही कारण नसते. त्यामुळे ते लेखन अधिक प्रभावी वाटते (मला तरी). हे वेदकालीन जंगलात भटकणार्‍यांना मान्य होईल का? मी असे काही लिहिले की डापुवाले मला त्यांच्यातला समजतात आणि त्यांच्यावर टिका केली की एकदम सनातनी लोक मला त्यांच्यातला मानतात. पण असो. सो बी इट.

युयुत्सु 17/08/2025 - 10:48
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. या विधानाचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो. आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे. एका तरूण डॉकटरशी गप्पा नुकताच मारायचा योग आला. मग मी माझे निरीक्षण सांगितले (की डॉ०ना सजग आणि हुशार रूग्ण आवडत नाहीत). सदर डॉ०ने सांगितले की, "नव्या पिढीतले डॉ० बरेच वेगळे आहेत. त्यांना पेशंट वाचून आला असेल तर फारसे वावडे नसते. ही काळाची अपरिहार्यता आहे आणि डॉ०नी स्वीकारणे आवश्यक आहे. काय वाचायचे ते वाचा आणि विचारायचे ते विचारून घ्या. काही प्रॉब्लेम नाही". हे ऐकल्या क्षणी माझ्या मानगुटीवरचा वेताळ "उल्लसित" मनाने झाडावर जाऊन लोंबकळू लागला...

आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे.
तेच तर म्हणत आहे. हे तिर्‍हाईताने ठरवू नये. पण त्या बरोबरच ज्ञानोपासना करायची फार इच्छा आहे पण त्या विषयात गती नसेल तर अशा व्यक्तींचे काय करायचे? मला समजा न्युक्लिअर फिशन आणि फ्युजनमध्ये सखोल ज्ञान घ्यायची इच्छा फार आहे पण १२ वी च्या बेसिक कॅल्क्युलसमध्येच मी अडखळत असेन तर त्यापेक्षा कितीतरी जास्त क्लिष्ट गणिते कशी समजणार आहेत?तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. सगळे सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत कारण तितके पुढे जाण्यासाठी मुळात त्या विषयात गती असावी लागते. ती गती आहे की नाही हे कसे जोखायचे? तर प्रवेश परीक्षा किंवा अन्य जो काही मार्ग असेल तो. आता समजा एखादा सचिन तेंडुलकर बनू शकत नसेल पण रामानुजन बनू शकत असेल तर त्याला क्रिकेटऐवजी गणितात ज्ञानोपासना करायचा मार्ग मोकळा असला पाहिजे. तू रामानुजन बनू नकोस तर तू अमुक एक म्हणून जन्मलास किंवा आयुष्याच्या अमुक एक टप्प्यावर तू आहेस म्हणून कुमार सानू बन असे इतरांनी मला सांगायचे नाही. मुख्य आक्षेप त्याला आहे. बाकी वर उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे न्युक्लिअर फिशन आणि फ्युजन वगैरे विविध क्षेत्रातील क्लिष्ट संकल्पनांचा ९९.९९% लोकांना त्यांच्या त्यांच्या कामात काहीही उपयोग नसतो. त्या संकल्पना नाही समजल्या तरी हरकत नाही. मात्र एखाद्याला त्या विषयात गती असेल आणि आवड असेल तर त्याला अडवायचा अधिकार इतरांना नाही हे पण तितकेच खरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे. तुम्हाला पटत नाही तर शांत राहू शकता. मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. एका मोठ्या पुरोगामी नेत्याच्या घरात तंत्रमंत्र वाले इंद्रजालचा फोटो काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता आव्हाड साहेबांच्या घरी शंकर महाराजांचा फोटो एका पत्रकाराने फोटोत पकडला होता विश्वंभर चौधरींच्या घरी सत्यनारायण की मुंज तत्सम कोणतातरी विधी बहुधा लपून झाला होता आणि हे त्यानी स्वतः मान्य केले. प्रभू श्रीराम काल्पनिक पात्र आहे, वारकरी वैष्णव नसतात म्हणणारे लोक वारीत चिपळ्या घेऊन राम कृष्ण हरी म्हणतात. त्यांना हे सगळे विसंगत वर्तन चालते पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.

In reply to by अप्पा जोगळेकर

आग्या१९९० 19/08/2025 - 11:45
यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
बरोबर आहे. वैचारिक दिवाळखोरीने श्रीमंत असल्यास परवडू शकते.

In reply to by अप्पा जोगळेकर

युयुत्सु 19/08/2025 - 15:25
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. विज्ञाननिष्ठ म्हटल्यावर चिकित्सा ही अपरिहार्य ठरते. तीची जर अ‍ॅलर्जी असेल तर तो तुमचा पराभव आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. हे जरी नसले तरी तितकेच प्रतिगामी घातक विचार परत समाजात रूजवले जात आहेत आणि ते घातक आहे. २०२४ निवड्णूकीच्या आधी हा उन्माद पराकोटीला पोचला होता. मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून मुलींना शिकवू नका (शिकलेल्या मुलींशी कसं वागायचे याबद्दल चकार शब्द कुणी काढलेला आठवत नाही. मुलीने माहेरचे पाश तोडायचे पण मुलाने आईचा पदर सोडायचा नाही!), "कन्यादाना" सारख्या टाकाऊ आणि अपमानकारक विधींचे उदात्तीकरण, पश्चिमेकदून आलेल्या ज्ञानाबद्दल विष भिनविणे, पेटंट इकॉनॉमी ऐवजी टेंपल इकॉनॉमीला उत्तेजन, विश्वगुरु सारख्या भ्रामक कल्पना, तसेच मुक्त कलाविष्कार आणि चर्चा यावर अर्धवट डोक्याच्या लोकांकडून नियंत्रण ठेवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न केला गेला. आणि इतकं करून ही एका प्रश्नाचं उत्तर मिळालच नाही ते नाहीच - सनातन धर्माची कोर्टात/संसदेत टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही. गंमतीचा भाग असा की मंदबुद्धी लोकांचा लोकाचार जितका सनातन आहे, तितकीच विज्ञाननिष्ठांची चिकित्सकबुद्धी सनातन आहे. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. कारण साधे आहे - असे लोक नियंत्रणात ठेवायला सोपे असतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना...
हे नक्की का? वोक लोक किती प्रमाणावर आहेत हे माहित आहे ना?
उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे
मी उलट म्हणतो. डापुंना ठोकायला इतर कितीतरी जास्त व्हॅलिड मुद्दे आहेत. त्यावर त्यांना होईल तितके मी पण ठोकत असतो. पण तसे करताना उगीच काही असमर्थनीय गोष्टींचे समर्थन करायला गेल्यास आपणच उलट त्यांना हिंदूंना ठोकायची संधी देत असतो.
मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे.
मान्य. तसे असेल तर नरेटिव्ह तयार करताना आपल्या बळकट आणि डापुंच्या कमकुवत मुद्द्यावर नरेटिव्ह बनवायला हवा. ते न करता आपण आपल्याच कमकुवत बाजूचे समर्थन करत राहिलो तर आपल्याच बाजूचे नुकसान होते.
सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना.
नाहीच. पण म्हणून तमुक आश्रम पाळणे २०२५ मध्ये कसे योग्य हे पण बोलायची गरज नाही ना? असो.

स्वधर्म 17/08/2025 - 16:06
गोडबोले यांनी हा लेख लिहून फारच उपकार केले आहेत. आणखी असे लेख लिहून प्रबोधन करावे अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्या सांगलीचे प्रा. जगदीश काबरे म्हणतात की आपल्या मुलांना, खास करून मुलींना आपले धर्मग्रंथ वाचायला जरूर प्रोत्साहन दिले पाहिजे. मग त्यांना कळेल की ते किती विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर आहेत. अशा लेखाने गोडबोले यांनी ते साध्य केले आहे.

In reply to by स्वधर्म

नक्की लिहित राहीन. मला जे जसे समजते तसे मनापासून मी लिहितो. कोणाला पटो अथवा न पटो. धर्मग्रंथात जसे लिहिलं आहे तसे मी लिहितो, चुका झाल्यास प्रांजळपणे कबूलही करतो. ज्यांना माझे निष्कर्ष चुकीचे वाटतात ते मला अधिक माहिती संदर्भासहित देतात तेव्हा ते वाचून मी माझे आकलन बदलतो किंवा सुदृढ करतो. ज्यांना धर्मग्रंथ विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर वाटतात त्यांना हिंदू धर्माचा त्याग करायची संपूर्ण मुभा, स्वातंत्र्य आहेच ! त्यांना प्रोत्साहनच आहे माझे. सुखाने निश्चिंत होऊन धर्मांतर करा ! खुश राहा. सनातन धर्म व्यवस्था ... आहे हे असे आहे ... Take it or leave it. मी नक्की लिहित राहीन !! धन्यवाद

अर्धवटराव 18/08/2025 - 23:56
एक उणीव जाणवली.. धर्मशास्त्राची उकल करताना नाममार्गाचा उहापोह सुरु झाला त्यावेळी हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीट ला घातल्या सारखी वाटली.. अपघाताची शक्यता…

In reply to by अर्धवटराव

सोत्रि 19/08/2025 - 13:58
अर्धवटराव,
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
खरतर इथून हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीटला गेली आणि खाचखळग्यांचा प्रवास सुरु झाला. नाममार्गाचा उहापोह झाला तेव्हा गाडी पंक्चर झाली होती. - (खाचखळग्यांचा प्रवास आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव 19/08/2025 - 20:29
गाडी बहुतेक इन्डी़केटर वापरतच नाहिए :) स्वान्तसुखाय लेखन असल्यामुळे लेखकाला ति लिबर्टी आहे म्हणा. उपोत्घाताशिवाय कादन्बरी प्रकाशीत व्हावी तसे काहिसे झाले आहे.

युयुत्सु 14/08/2025 - 09:37
श्री० गोडबोले, 'जन्मना जायते शूद्रः' हे स्मृतीवचन तुम्हाला ठाऊक असेलच. याचा अर्थ असा की मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो शूद्र असतो. मग त्याचे उपनयन होते तेव्हा तो पित्याच्या गोत्रात प्रवेश करतो (पहा- 'शूद्र पूर्वी कोण होते', बाबासाहेब आंबेडकर). मग तो ब्राह्मण-वैश्यादि वर्ण धारण करतो. आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे! त्यात आता गोत्र वगैरे गोष्टीची निरर्थकता पुरेशी सिद्ध केलेली असल्यामुळे त्याची आता त्याच्यावाचून उर्वरित आयुष्यात काहीही अडणार नाही. म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू! पण माझ्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता नाही, तिथेच सगळी गोची आहे. तेव्हा या संदर्भात काय करता येईल?

In reply to by युयुत्सु

तेव्हा या संदर्भात काय करता येईल?
म्हणजे ? तुमच्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता कशी मिळवून देता येईल असे विचारत आहात का ? तर माफ करा मी कायदे तज्ज्ञ नाही. ह्याबाबत मी काहीही मदत करू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे!
माझी समस्या आणखी वेगळी आहे. माझी मुंज झाली आहे पण सोडमुंज म्हणून एक प्रकार असतो तो झालेला नाही. सोडमुंज लग्नाच्या आदल्या दिवशी करतात म्हणे. माझ्या लग्नाच्या वेळेला सोडमुंज असे काही असते हे तर मी विसरूनच गेलो होतो. माझ्या आईच्या लक्षात होते (ते मला नंतर कळले) पण अशा गोष्टींवर माझा आणि आईचाही विश्वास नसल्याने तो विषय परत निघालाच नाही. दुसरे म्हणजे मुंज झाल्यापासून लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याश्रम. त्या काळात शिकून आपल्याला कमावायला आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सक्षम करायचे आणि मग लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. म्हणजेच काय की गृहस्थाश्रमात असताना शिकणे अपेक्षित नसावे. आता माझ्या बाबतीत झाले असे की मी लग्न झाल्यानंतरही शिकतच होतो. इतकेच नाही तर बायको पण शिकत होती. आम्ही दोघे त्या दोन वर्षात वेगळ्या ठिकाणी राहायचो. म्हणजे आम्ही त्या आश्रम पध्दतीच्या नियमांचा भंग केला ना? बापरे... कुठे फेडायची ही पापं?
म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू!
मी सर्टिफाईड उजवा (पण सनातनी नक्कीच नाही) आणि लिब्राण्डू तर नक्कीच नाही :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 14/08/2025 - 11:59
बापरे... कुठे फेडायची ही पापं? तुम्ही पुरुष म्हणून मोक्षाच्या रांगेत लवकर नंबर लागायची शक्यता जास्त! तुमच्या पत्नीने, शिक्षणाच्या ओढीने आश्रम व्यवस्थेचे पालन केलेले नसल्याने मोक्षप्राप्तीची शक्यता कमी वाटते.

In reply to by युयुत्सु

मला खरेच उत्सुकता आहे की तुमचे हे असे आकलन कोणत्या वाचनाने झालेले आहे ! कृपया संदर्भ द्यावा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ? 2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही. 3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा. 4.तुम्हाला पाप म्हणजे काय माहिती आहे का ? तुमची पापा पुण्य इत्यादी व्याख्या कोणत्या वाचनावर आधारित आहे ? गृहस्थाश्रमात शिकणे हे पाप आहे असे तुम्ही कोठे वाचले ? तुम्हाला कोणी सांगितले ? 5. तुम्हाला खरेच जाणून घेण्यात रस आहे का निव्वळ विषयांतर करायचे आहे अन्य लोकांच्याप्रमाणे ? तुम्ही मनापासून प्रश्न विचारत असल्यास मी मनापासून अगदी प्रांजळपणे माझ्या आकलनानुसार उत्तर देईन. शिवाय माझी मते कोणालाही पटली पाहिजेत असा माझा अभिनिवेशही नाही. हां, निव्वळ टाइमपास करायचा असल्यास, आमचा पास. त्यापेक्षा आम्ही आम्ही आमचा लाँग वीकेंड वेगळ्या चिंतनात सार्थकी लाऊ.

In reply to by प्रसाद गोडबोले

1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ?
आपण असे करू शकतो असे प्रत्येकाला थोड्याबहुत प्रमाणात वाटत असावे. मात्र दुसर्‍या बाजूच्या व्यक्तीला मात्र समोरचा आपले पूर्वग्रह बाजूला करायला तयार नाही असे वाटत असावे. हे तुम्हाला किंवा अन्य कोणाला उद्देशून नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे.
2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी. हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही.
मी कधी म्हटले तो विधी आईने करायचा असतो? सोडमुंज हा प्रकार माझ्या लक्षात नव्हता पण माझ्या आईच्या लक्षात होता. मुळात माझ्या लक्षातच नसल्याने तो करावा असे मी म्हणायचा प्रश्नच नाही. आईच्या लक्षात होते पण तिचा पण अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने तिने पण तो विषय काढला नाही. पण समजा तो विषय काढला गेला असता आणि माझी सोडमुंज झाली असती तर ती आईने केली असती असे मला वाटते असे कुठे लिहिले आहे? तो केला नाही केला तरी इतर कोणाला काही फरक पडतो की नाही हा प्रश्नच माझ्यासाठी गैरलागू आहे. कारण मलाच मुळात फरक पडत नाही.
3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा.
तसे नसेल तर उत्तम. मला वाटत होते की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार 'नॉन ओव्हरलॅपिंग' आश्रम आहेत. बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही. इंटरेस्ट वाटून त्यात झोकून द्यावे असे कित्येक विषय जगात आहेत. माझ्यासाठी असले विषय त्यातील नक्कीच नाहीत. कदाचित मी खूप खालच्या पायरीवर असेन ही शक्यता आहे पण सो बी इट :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रांजळ प्रत्युत्तराबद्दल धन्यवाद !
बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही.
इतकं सरळ साधं स्पष्ट बोलणं किती सोपं असतं ना . बघा आपल्या दोघांचाही वेळ वाचला. मला काय तुमच्या किंवा कोणाच्याच मानगुटीवर बसून "शिकच आता" असे सक्तीचे करायचे नाही. ज्याला हौस आहे तो करेल, हौस नाही तो करणार नाही. ह्याही प्रतिसादात तुम्ही गडबड केली आहेच खालची पायरी वरची पायरी वगैरे ज्याला संदर्भ कोणते ग्रंथ आहेत अन् कोणते वाचन आहे की नुसतेच ऐकीव पूर्वग्रह आहेत देव जाणे ! पण सोडा . अध्यात्म ही गती नसून स्थिती आहे त्यामुळे तिथे वर खाली अशा पायऱ्याच नाहीत. ज्याला कळायचं त्याला कळतं. बाकीचे उगाच विषयांतर करत राहतात. असो. दोघांचाही वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

चुकीची दुरुस्ती वरील प्रतिसादात " समावर्तन हा संस्कार नाही." असे मी लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो आहे. ह्यात काहीतरी गडबड होत आहे असे वाटल्याने काही शोधाशोध करून पाहिल्यावर लक्षात आले की समावर्तन हा 16 संस्कारांपैकी 1 संस्कार आहे. मात्र ह्या संस्काराचा लोप झाल्याने काही पाप लागते अशा अर्थाचे मला काहीही सापडले नाही. (अजूनतरी.) आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे तुम्ही हे काही मनातच नसल्याने तुम्हाला फरक पडत नाहीच. तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
चुकीचे सांगितले तरी फार टेन्शन घेऊ नका. मला झुमरीतलय्यामध्ये फारसा रस नाही त्यामुळे झुमरीतलय्याचे महापौर बबनराव झुंझारखाडे आहेत असे तुम्ही चुकून सांगितलेत आणि प्रत्यक्षात झुमरीतलय्याचे महापौर गुलाबराव काटेवाले आहेत असे सांगितलेत तरी तुम्ही मुळात चुकीचे सांगितले आहे हे मला कळायचेच नाही आणि कळले नाही किंवा झुमरीतलय्याचे महापौर कोण हे मला माहित नाही याचे फारसे वैषम्य मला नसावे :)

युयुत्सु 14/08/2025 - 09:53
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे, या वर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by युयुत्सु

स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे
मार्ग अनेक आहेत, मार्ग महत्वाचे नाही, गंतव्य प्राप्त झाल्याशी मतलब. बाकी साधुसंतात समाजात लोक जाती पाती वरून भेदभाव करतात, तुम्ही स्त्री पुरुष असा भेदभाव करत आहात, दोन्ही वृत्ती समानच. तरीही तुकोबांनी सरळ साधा सोपा मार्ग सांगितला आहे वरच . "नामस्मरण". नामस्मरणाचा अधिकार सर्वांना. ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ नामस्मरणाला दुषणे देऊन अन्य काही साधने करीन असे म्हणणाऱ्या व्यक्तीचा मार्ग अशक्यप्राय खडतर आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो मत स्त्री असो की पुरुष, शूद्र असो की ब्राह्मण. नामस्मरणाला दुषणे देणाऱ्या , थट्टा मस्करी करणाऱ्या माणसाचे तोंड देखील पाहू नये असे खुद्द तुकोबांनी सांगून ठेवले आहे. बाकी जनाबाई, बहिणाबाई, अक्का स्वामी , वेण्णास्वामी ह्यांचे अभंग , मार्गदर्शन पाहू शकता. मी ज्या अर्थाने स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्ष म्हणालो आहे त्या अर्थाचा एक बहिणाबाई ह्यांचा अभंग आहे तो हा पहा. भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥ वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥ भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥ भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥ चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥ भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥ बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल ते वाचेल.

In reply to by युयुत्सु

मस्तच ! जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling पेक्षा हे असे वाचन कधीही उत्तम ! आजचा सुविचार : वाचेल तो वाचेल.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 14/08/2025 - 10:38
हे पहा - "आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत ."

In reply to by युयुत्सु

सोत्रि 14/08/2025 - 15:35
अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे
गंमत म्हणजे, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी साक्ष कोणाची तर तुकोबारायांची, ज्यांची गाथा सनातन धर्मविरोधी ठरवून बुडवायला लावली होती. त्या तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती. - (अधर्मी) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती.
पुरावा काय पुरावा काय पुरावा काय ??? मी फार पुर्वी २०२० मध्ये तुकोबांचे निवडक अभंग https://www.misalpav.com/node/47002 असा लेखनाचा एक धागा सुरु केला आहे . तुम्ही वरील विधानाला समरथन देणारे तुकोबांचे अभंग तिथे पुराव्यादाखल टाकावेत ही कळकळीची विनंती आहे. तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार कित्येकवर्षे चालु आहे त्याला पुराव्यादाखल असा घाणेरडा अपप्रचार करणार्‍यांनी किमान काही तरी तुकोबांचे अभंग सादर करावेत . अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥ वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ तुकोबा अतिषय स्पष्टपणे वर्णाश्रम धर्माचे आचरण करा , विधीनिषेध पाळा असे म्हणत आहेत . तुम्ही लोकं जाणीवपुर्वक तुकोबांच्या नावावर काहीही खपवता हे फार वेदनादायक आहे . माझे लेखन, आणि त्यावर येणारे तुमचे हे असले प्रतिसाद. ह्या असल्या तुमच्या अपप्रचारला मी निमित्तमात्र व्हायला नको. बास झालं .

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 14/08/2025 - 18:29
सदर धागा # सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय असल्याने प्रतिसादही स्वान्तःसुखाय आहे, सबब पुराव्याच्या उत्तरदायित्वास नकार लागू! - (स्वान्तःसुखी) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार =)) 'सनातनी' लेंड्या टाकणा-यांना सगळं जग सनातनी दिसतं. संत तुकाराम हे 'सनातनी' होते अशा अपप्रचाला कोणीही बळी पडू नये म्हणून वाचकांना विनंती की, थेट तुकोबांची गाथा वाचावी. आजच्या काळात कोणासही बदनामी करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल. वाचकांनी आ.ह.साळुंके यांचे 'विद्रोही तुकाराम' ही वाचून काढावे. संत तुकारामांना विद्रोही का म्हटल्या जाते तेही लक्षात येईल. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरापासून पासून ते संत तुकारामापर्यंत मोठा वारकरी संप्रदाय आणि थोर संत होऊन गेले. संत तुकाराम वेगळे आणि विद्रोही का वाटतात ते आजही तीनशे वर्षानंतर लक्षात येईल. समतेचा पुरस्कार करणे हा तत्कालीन व्यवस्थेने गुन्हा माणून त्यांच्या वह्या सनातन्यांनी इंद्रायनीत बुडवायला लावल्या. नशीब आपलं की त्यांच्या वह्या लोकगंगेने तारल्या. बाय द वे, 'गोबरयुगात' सनातनी सगळंच कसं श्रेष्ठ होतं, श्रेष्ठ ते आपलं म्हणनारे 'पोटूशी पुरुष' आंतरजालावर जागोजागी दिसतील त्यावर विश्वास ठेवू नका. 'बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणनिया' श्रेष्ठ संत तुकाराम आधुनिक विचारांचे श्रेष्ठ संत होते. मोठा विषय. 'चिरगुटे घालुनि वाढविले पोट, ग-हवार बोभाट जनामधे लटिके चि डोहळे दाखवी प्रकार, दुध स्तनी पोर पोटी नाही तुका म्हणे अंती वांज चि ते खरी, फजिती दुसरी जनामधे' प्रतिसाद स्वातंसुखाय आहे, 'सनातनी' लोकांनी उपप्रतिसादाच्या लेंड्या टाकू नयेत. बाय द वे, अशा 'सनातनी आणि वांज पोटूशी पुरुषां' पासून वाचकांनी दूर राहावे, एवढीच विनंती. =)) -दिलीप बिरुट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 15/08/2025 - 19:21
संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल.
मी गाथा मंदिर दोन महिन्यांपूर्वी पाहिले...नाही वाचूनच काढले.तब्बल १/२ तास शांतपणे पाहत होते (एकटीच गेली असते तर कदाचित २ तास तरी अजून निवांत वाचले असते.) तुकारामांनी तत्कालीन कित्येक ढोंगी,अघोरी प्रथांवर घणाघाती वार केले हे लगेच समजले.खरचं ते विद्रोही होते. पण सर्वच संतांमध्ये जो गुण ठासून भरलेला असतो तो म्हणजे अव्यक्ताशी एकरूप तोही त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता तोहि वेदांचा अभ्यास न करता. माऊलीही तसेच,कल्पद्रुमाचिये तळी हे ढेरे यांचे माऊलींवरचे सुंदर पुस्तक वाचत आहे.माऊली स्वतः कौलमता परंपरेतील,त्यातही काही अघोरी प्रथा असायच्या पण माऊलींनी नीरक्षीरविवेकाने यांना दूर ठेवत शुद्धीकरण केले आणि भागवत धर्म सर्वांना खुला केला. या संतांच्या बदलानेच आजचा महाराष्ट्र घडला आहे,शुद्ध हेतू असल्यास माणसाने बदलाला ,बदल घडवायला घाबरू नये.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 14/08/2025 - 19:32
तुकोबारायांनी अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती - _/\_ त्यांची साक्ष याच हेतूने कुणी काढत असेल, तर रास्त आहे. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी, जातीय द्वेष पसरवण्यासाठी करण्यासाठी किंवा झुंडशाही बळकट करण्यासाठी तुकोबारायांची साक्ष काढली जाणे दुर्दैवी आहे. एरवी तर्क, बुद्धीप्रामाण्य वगैरेचा धोशा लावणारे आणि 'सिलेक्टिव रिडींगचा" निषेध करणारे या बाबतीत चिडीचूप बसतात हे अधिकच दुर्दैवी आहे. असो.

In reply to by सोत्रि

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू । अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप । दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती. -संत तुकाराम. -दिलीप बिरुटे

भृशुंडी 14/08/2025 - 22:57
सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे !
हे परस्पर ठरवून मोकळं झाल्यावर स्त्रियांनी काय करायचं? हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? मोक्ष नको म्हणून बाजूला होईल.

In reply to by भृशुंडी

स्वधर्म 15/08/2025 - 14:45
>> हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल? नुकत्याच दुसर्‍या धाग्यावर आलेल्या अनुभवानुसार हे असं नाही, एवढेच म्हणतो.

भृशुंडी 15/08/2025 - 23:28
१. "पूर्वजांनी क्षयज्ञ व्यवस्था केली आहे, म्हणून ती खरी आणि योग्य आहे."/ बाबा वाक्यं प्रमाणं - आता पुरे. हे प्रकरण थांबवा. पूर्वजांनी तेव्हाच्या काळी शक्याशक्यतेची काही बांधणी करून एक व्यवस्था निर्माण केली (करण्याचा प्रयत्न केला). तो आता १०००-२००० वर्षं किंवा आणखी जास्त कालावधीनंतर योग्य आहे - हे "पटवून" घेण्याचा आग्रहाभिनिवेश कशाला? २. संस्कृती प्रवाही असते, किंबहुना असावी. अशा प्रवाहाला पुन्हा मूळ जागी नेण्याचा उपद्व्याप कशासाठी? तेही मूळ काय- हेच ठाऊक नसताना. १०० ग्रंथ लिहिल्याने मूळ संस्कृतीचं साकल्य जपलं जाऊ शकत नाही. त्याचे थोडेफार अंश आपल्याला त्या शाब्दिक रचनेत दिसतात आणि त्यालाच प्रमाण मानून पुढे जाणं हे फारच ढोबळ आहे. ३. अध्यात्म आणि व्यवहार/कायदे ह्यातला फरक - एक तर हे अध्यात्म -म्हणजे मोक्षप्राप्ति इत्यादीपुरतं सीमित असू दे किंवा मग सरळ कायद्याची भाषा असू दे- कलम/अ‍ॅक्ट अशा तपशीलात बोला. दोहोंची सरमिसळ नको. अध्यात्मप्राप्तीसाठी जनांनी (विषेश करून ज्यांना नियम बनवण्याचा हक्क नाहे अशांनी) कसं वागावं आणि काय करावं हे सांगणं ढोंगी आहे. असो. प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, स्वांतसुखायची "आमची कुठेही शाखा नाही"वाली पाटी अगोदरच वर लावली आहे.

In reply to by भृशुंडी

कॉमी 15/08/2025 - 23:45
परफेक्ट. एकाच वेळी म्हणतात मटेरियलीस्ट जीवनात मुक्ती नाही. त्याग करा. पण स्त्रियांचा मोक्ष कशात म्हणे तर लगीन करण्यात. ख्या ख्या ख्या.

पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच ,
मागे मी मिपावरच एके ठिकाणी लिहिले होते की माझा भारतीय लेखकांविषयी एक आक्षेप असतो आणि तो म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे हे स्पष्टपणे कधीच न लिहिता ते गोलमटोल लिहितात. मोक्ष म्हणजे एखादी जागा आहे का की जिथे एकदा गेले की आपले सगळे काही झाले? आणि तिथे जायला संन्यास घेतलाच पाहिजे, संन्यास घेतला नसेल तर मुलगाच (मुलगी पण चालणार नाही) नसेल तर तुम्हाला नो एन्ट्री. ते काय दिल्लीतले रेस्टॉरंट आहे का भारतीय वेशभूषा असेल तर प्रवेश नाकारणारे? मोक्ष ही एक अवस्था आहे असे तुम्हीच लिहिले आहे ते अधिक लॉजिकल वाटते. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी इतक्या पन्नाशसे साठ अटीशर्ती असतील तर जल्ला नको तो मोक्ष असेच अनेक सामान्यांना वाटायची शक्यता आहे. निदान मला तरी वाटते. त्यापेक्षा मग परदेशी तत्वज्ञ वेन डायर म्हणतात ते अधिक पटते- Wayne Dyer आणि कोणते चॉईस करायचे? तर एकहार्ट टोलींनी म्हटल्याप्रमाणे वर्तमानात राहा Eckhart Tolle आणि मनात उठणार्‍या विचारांच्या कल्लोळापासून आपल्याला मुक्त करणे. Eckhart Tolle कदाचित तुम्ही ज्याला संन्यास म्हणत असाल ते यापेक्षा वेगळे नसेलही. वेन डायर, एकहार्ट टोली वगैरे परदेशी तत्वज्ञांचे लेखन वाचताना असे जाणवते की कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याच तत्वज्ञानात सांगितलेल्या आहेत- त्या गोष्टी कुठेतरी रिलेटेबल वाटतात पण कितीतरी अधिक सोप्या आणि अशा अटीशर्ती न लादता. तुम्ही हे सगळे लिहिले आहे- अमुक केले नाही तर मोक्ष मिळायचा नाही, मोक्ष मिळायला संन्यास घेतला पाहिजेच पण तुम्हाला मोक्ष म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय अभिप्रेत आहे हे लिहायला नको का? इथे परदेशी तत्वज्ञ अधिक भावतात. कोणतेही जडजंबाल शब्द न वापरता आपण काय करायचे ते ते लोक बरोबर सांगतात. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या तत्वज्ञानात ते सांगितलेले नाही असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा या अशा लेखांविषयी आहे.

युयुत्सु 16/08/2025 - 12:34
श्री० गोडबोले आणि भगव्या गॅंगमधील यच्चयावत् सनातनी यांचा गोग्गोड वैचारिक गैरसमज झालेला असतो, तो समजाऊन सांगण्यासाठी एका प्रसंगाची आठवण सांगणे आवश्यक आहे. छद्मविज्ञानभूषण, फेकाफेकचूडामणी डॉ० प० वि० वर्तक यांच्या अनुयायांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि सत्कार आयोजित केला होता. त्यांच्या सत्काराला करवीरपीठाचे शंकराचार्य मुख्य पाहूणे म्हणून बोलवले होते. मला त्या दिवशी प्रचंड कंटाळा आला होता, कशातही मन रमत नव्हते म्हणून जरा ऑफ-बीट करमणूक करून घेण्य़ासाठी मी वर्तकांच्या सत्काराला हजेरी लावण्य़ाचे ठरवले. मी बालगंधर्ववर पोचलो तेव्हा मला काही धक्के बसले. मला वाटले की फार गर्दी नसेल, पण अमाप गर्दी लोटली होती. माझ्या "आउटलायरत्वाची जाणीव" होऊन मी शरमिंदा झालो आणि शेवटच्या रांगेत कशीबशी जागा मिळवली आणि करमणुकी ऐवजी सहनशीलतेची परिक्षा दिली. त्या कार्यक्रमात शंकराचार्यांनी बोलता-बोलता एक वाक्य टाकले. ते म्हणाले, "परंपरेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत." माझ्या दृष्टीने यच्चयावत सनातनी लोकांच्या भाबड्या श्रद्धांना बळकटी देणारे हे वाक्य आहे. साहजिकच अशा श्रद्धांच्या मशागतीने समाजाची दोन अभेद्य गटात विभागणी होऊन एका कटु संघर्षाला तोंड फुटते, ज्याने सध्या परमोच्च बिंदू गाठला आहे. गोडबोल्यांसारखे लोक उतरंडप्रधान कुटुंब/समाजव्यवस्थेत जो त्याग सदस्यांवर लादला जातो त्याचे केवळ समर्थन करून थांबत नाहीत तर उदात्तीकरण करण्यात आपले सर्वस्व पणाला लावतात आणि हे करताना एक अक्षम्य चूक करतात. ती अशी, आपण सकाळी उठतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपले मन प्रसन्न होते. पण प्रत्यक्षात तो किलबिलाट पक्ष्यांच्या भीषण जीवनसंघर्षाची सुरुवात असते. सर्व सनातन्यांची छाती इतिहासातील सोन्याच्या पानांनी भरून येते, तेव्हा लादलेल्या त्यांगांचे (पक्षी-शोषणांचे) आक्रोश (किलबिलाट?) त्यांना कधीच ऐकू येत नाही. मग त्यांना जे परंपरा-पुरस्कृत उतरंड, तसेच परंपरेने शोधलेली उत्तरे स्वीकारू शकत नाहीत, ते धोकादायक वाटायला लागतात. मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...

In reply to by युयुत्सु

सोत्रि 16/08/2025 - 19:22
मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...
तंतोतंत! - (आउटलायर) सोकाजी

आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
म्हणजे काय? तर थोडक्यात मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय करायचे हे दुसरा कोणीतरी सांगणार. मला काय करावेसे वाटते, माझी इच्छा काय आहे, माझी आवडनिवड कशात आहे या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारायच्या. आणि परत दुसर्‍या तोंडाने हिंदू धर्म कसा सहिष्णू आणि व्यक्तीस्वातंत्र्य जपणारा म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची. बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. सगळ्यांना न्युक्लिअर फ्युजन आणि फिशन वगैरे गोष्टी कळायची गरज नाही हे नक्कीच. एखाद्याला त्या क्षेत्रात गती आहे की नाही हे तपासायचे परीक्षा वगैरे मार्ग आहेत. ते सगळे फाट्यावर मारून कोणाला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही हे दुसरा कोणीतरी सांगणार आणि सगळ्यांनी त्याप्रमाणेच वागायचे या रचनेला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 17/08/2025 - 16:21
>> बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना? ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच. मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 19/08/2025 - 18:16
वरील प्रतिसादात 'मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' या वाक्यात माझी चूक झाली आहे. स्वभाव म्हटल्यामुळे तो प्रतिसाद व्यक्तीशी जोडला जातो. चंद्रसूर्यकुमार यांच्या स्वभावाविषयी काहीच म्हणायचे नव्हते. योग्य वाक्यरचना अशी हवी होती: 'मूळ विचारसरणी तीच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' तसेच प्रतिसादाचे शीर्षक 'मूळ विचारसरणी' असेच हवे होते. त्याबद्दल दिलगिरी.

In reply to by स्वधर्म

हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना?
यात एक मोठा फरक म्हणजे डापु हा वर्ण जन्माने येत नाही आणि त्या विचारांमुळे किती नुकसान झाले आहे हे समजल्यावर माणूस त्या तथाकथित वर्णातून बाहेर पडू शकतो. म्हणजे डापु हा स्टॅटिक प्रकार नाही तर डायनॅमिक आहे तर जन्माने मिळणारे वर्ण हे स्टॅटिक आहेत.
ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच.
हे बरोबर उलटे आहे. म्हणजे एखाद्याला आधी डापु ठरवून मग ते कसे असतात, काय विचार करतात हे मनाचे श्लोक तयार करत नाही तर मला अभिप्रेत असलेली डापुपणाची लक्षणे एखाद्यात दिसली तर त्याला डापु म्हणतो. त्यातूनही वर म्हटल्याप्रमाणे काही लोक आयुष्यभर डापु असतात तर काही त्यातून बाहेर पडतातही. बाहेर पडलेल्यांमध्ये काही अंशी मी स्वतः पण आहे. म्हणजे मीच माझे पूर्वीचे विचार तपासून बघतो तेव्हा पूर्ण डापु होते असे म्हणणार नाही पण डापुपणाकडे काही अंशी झुकणारे नक्की होते. माझ्या जवळच्या अती जास्त प्रमाणावर हिंदू-हिंदू करणार्‍या नातेवाईकांविरूध्दची ती प्रतिक्रिया होती असे आता मला जाणवते. पण नंतर तटस्थपणे विचार केल्यावर इतर कोणी काही केले म्हणून त्याविरूध्द प्रतिक्रिया येणे योग्य नाही हे मला पण जाणवले. आजही- अगदी याच लेखावरील प्रतिक्रियेत लिहिले आहे की मला भारतीय लेखकांपेक्षा परदेशी लेखक अधिक आवडतात कारण भारतीय लेखक अनेकदा नक्की काय करायचे हे न सांगता गोलमटोल काहीतरी सांगतात. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या लेखकांना आमचा धर्म किती महान, आमची संस्कृती किती महान या वेदकालीन जंगलात भटकायचा इन्सेन्टिव्ह असतो आणि अनेकदा ते तसे करतातही. त्यात मुळातला मेसेज बाजूला पडतो. त्या तुलनेत मी वाचतो त्या परदेशी लेखकांना भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्म किती महान याच्या चिपळ्या वाजवत राहायचे काहीही कारण नसते. त्यामुळे ते लेखन अधिक प्रभावी वाटते (मला तरी). हे वेदकालीन जंगलात भटकणार्‍यांना मान्य होईल का? मी असे काही लिहिले की डापुवाले मला त्यांच्यातला समजतात आणि त्यांच्यावर टिका केली की एकदम सनातनी लोक मला त्यांच्यातला मानतात. पण असो. सो बी इट.

युयुत्सु 17/08/2025 - 10:48
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. या विधानाचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो. आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे. एका तरूण डॉकटरशी गप्पा नुकताच मारायचा योग आला. मग मी माझे निरीक्षण सांगितले (की डॉ०ना सजग आणि हुशार रूग्ण आवडत नाहीत). सदर डॉ०ने सांगितले की, "नव्या पिढीतले डॉ० बरेच वेगळे आहेत. त्यांना पेशंट वाचून आला असेल तर फारसे वावडे नसते. ही काळाची अपरिहार्यता आहे आणि डॉ०नी स्वीकारणे आवश्यक आहे. काय वाचायचे ते वाचा आणि विचारायचे ते विचारून घ्या. काही प्रॉब्लेम नाही". हे ऐकल्या क्षणी माझ्या मानगुटीवरचा वेताळ "उल्लसित" मनाने झाडावर जाऊन लोंबकळू लागला...

आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्‍हाईताने ठरवणे चुकीचे आहे.
तेच तर म्हणत आहे. हे तिर्‍हाईताने ठरवू नये. पण त्या बरोबरच ज्ञानोपासना करायची फार इच्छा आहे पण त्या विषयात गती नसेल तर अशा व्यक्तींचे काय करायचे? मला समजा न्युक्लिअर फिशन आणि फ्युजनमध्ये सखोल ज्ञान घ्यायची इच्छा फार आहे पण १२ वी च्या बेसिक कॅल्क्युलसमध्येच मी अडखळत असेन तर त्यापेक्षा कितीतरी जास्त क्लिष्ट गणिते कशी समजणार आहेत?तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. सगळे सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत कारण तितके पुढे जाण्यासाठी मुळात त्या विषयात गती असावी लागते. ती गती आहे की नाही हे कसे जोखायचे? तर प्रवेश परीक्षा किंवा अन्य जो काही मार्ग असेल तो. आता समजा एखादा सचिन तेंडुलकर बनू शकत नसेल पण रामानुजन बनू शकत असेल तर त्याला क्रिकेटऐवजी गणितात ज्ञानोपासना करायचा मार्ग मोकळा असला पाहिजे. तू रामानुजन बनू नकोस तर तू अमुक एक म्हणून जन्मलास किंवा आयुष्याच्या अमुक एक टप्प्यावर तू आहेस म्हणून कुमार सानू बन असे इतरांनी मला सांगायचे नाही. मुख्य आक्षेप त्याला आहे. बाकी वर उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे न्युक्लिअर फिशन आणि फ्युजन वगैरे विविध क्षेत्रातील क्लिष्ट संकल्पनांचा ९९.९९% लोकांना त्यांच्या त्यांच्या कामात काहीही उपयोग नसतो. त्या संकल्पना नाही समजल्या तरी हरकत नाही. मात्र एखाद्याला त्या विषयात गती असेल आणि आवड असेल तर त्याला अडवायचा अधिकार इतरांना नाही हे पण तितकेच खरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे. तुम्हाला पटत नाही तर शांत राहू शकता. मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. एका मोठ्या पुरोगामी नेत्याच्या घरात तंत्रमंत्र वाले इंद्रजालचा फोटो काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता आव्हाड साहेबांच्या घरी शंकर महाराजांचा फोटो एका पत्रकाराने फोटोत पकडला होता विश्वंभर चौधरींच्या घरी सत्यनारायण की मुंज तत्सम कोणतातरी विधी बहुधा लपून झाला होता आणि हे त्यानी स्वतः मान्य केले. प्रभू श्रीराम काल्पनिक पात्र आहे, वारकरी वैष्णव नसतात म्हणणारे लोक वारीत चिपळ्या घेऊन राम कृष्ण हरी म्हणतात. त्यांना हे सगळे विसंगत वर्तन चालते पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.

In reply to by अप्पा जोगळेकर

आग्या१९९० 19/08/2025 - 11:45
यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
बरोबर आहे. वैचारिक दिवाळखोरीने श्रीमंत असल्यास परवडू शकते.

In reply to by अप्पा जोगळेकर

युयुत्सु 19/08/2025 - 15:25
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. विज्ञाननिष्ठ म्हटल्यावर चिकित्सा ही अपरिहार्य ठरते. तीची जर अ‍ॅलर्जी असेल तर तो तुमचा पराभव आहे. सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना. हे जरी नसले तरी तितकेच प्रतिगामी घातक विचार परत समाजात रूजवले जात आहेत आणि ते घातक आहे. २०२४ निवड्णूकीच्या आधी हा उन्माद पराकोटीला पोचला होता. मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून मुलींना शिकवू नका (शिकलेल्या मुलींशी कसं वागायचे याबद्दल चकार शब्द कुणी काढलेला आठवत नाही. मुलीने माहेरचे पाश तोडायचे पण मुलाने आईचा पदर सोडायचा नाही!), "कन्यादाना" सारख्या टाकाऊ आणि अपमानकारक विधींचे उदात्तीकरण, पश्चिमेकदून आलेल्या ज्ञानाबद्दल विष भिनविणे, पेटंट इकॉनॉमी ऐवजी टेंपल इकॉनॉमीला उत्तेजन, विश्वगुरु सारख्या भ्रामक कल्पना, तसेच मुक्त कलाविष्कार आणि चर्चा यावर अर्धवट डोक्याच्या लोकांकडून नियंत्रण ठेवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न केला गेला. आणि इतकं करून ही एका प्रश्नाचं उत्तर मिळालच नाही ते नाहीच - सनातन धर्माची कोर्टात/संसदेत टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही. गंमतीचा भाग असा की मंदबुद्धी लोकांचा लोकाचार जितका सनातन आहे, तितकीच विज्ञाननिष्ठांची चिकित्सकबुद्धी सनातन आहे. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले. कारण साधे आहे - असे लोक नियंत्रणात ठेवायला सोपे असतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना...
हे नक्की का? वोक लोक किती प्रमाणावर आहेत हे माहित आहे ना?
उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे
मी उलट म्हणतो. डापुंना ठोकायला इतर कितीतरी जास्त व्हॅलिड मुद्दे आहेत. त्यावर त्यांना होईल तितके मी पण ठोकत असतो. पण तसे करताना उगीच काही असमर्थनीय गोष्टींचे समर्थन करायला गेल्यास आपणच उलट त्यांना हिंदूंना ठोकायची संधी देत असतो.
मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे.
मान्य. तसे असेल तर नरेटिव्ह तयार करताना आपल्या बळकट आणि डापुंच्या कमकुवत मुद्द्यावर नरेटिव्ह बनवायला हवा. ते न करता आपण आपल्याच कमकुवत बाजूचे समर्थन करत राहिलो तर आपल्याच बाजूचे नुकसान होते.
सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना.
नाहीच. पण म्हणून तमुक आश्रम पाळणे २०२५ मध्ये कसे योग्य हे पण बोलायची गरज नाही ना? असो.

स्वधर्म 17/08/2025 - 16:06
गोडबोले यांनी हा लेख लिहून फारच उपकार केले आहेत. आणखी असे लेख लिहून प्रबोधन करावे अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्या सांगलीचे प्रा. जगदीश काबरे म्हणतात की आपल्या मुलांना, खास करून मुलींना आपले धर्मग्रंथ वाचायला जरूर प्रोत्साहन दिले पाहिजे. मग त्यांना कळेल की ते किती विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर आहेत. अशा लेखाने गोडबोले यांनी ते साध्य केले आहे.

In reply to by स्वधर्म

नक्की लिहित राहीन. मला जे जसे समजते तसे मनापासून मी लिहितो. कोणाला पटो अथवा न पटो. धर्मग्रंथात जसे लिहिलं आहे तसे मी लिहितो, चुका झाल्यास प्रांजळपणे कबूलही करतो. ज्यांना माझे निष्कर्ष चुकीचे वाटतात ते मला अधिक माहिती संदर्भासहित देतात तेव्हा ते वाचून मी माझे आकलन बदलतो किंवा सुदृढ करतो. ज्यांना धर्मग्रंथ विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर वाटतात त्यांना हिंदू धर्माचा त्याग करायची संपूर्ण मुभा, स्वातंत्र्य आहेच ! त्यांना प्रोत्साहनच आहे माझे. सुखाने निश्चिंत होऊन धर्मांतर करा ! खुश राहा. सनातन धर्म व्यवस्था ... आहे हे असे आहे ... Take it or leave it. मी नक्की लिहित राहीन !! धन्यवाद

अर्धवटराव 18/08/2025 - 23:56
एक उणीव जाणवली.. धर्मशास्त्राची उकल करताना नाममार्गाचा उहापोह सुरु झाला त्यावेळी हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीट ला घातल्या सारखी वाटली.. अपघाताची शक्यता…

In reply to by अर्धवटराव

सोत्रि 19/08/2025 - 13:58
अर्धवटराव,
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
खरतर इथून हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीटला गेली आणि खाचखळग्यांचा प्रवास सुरु झाला. नाममार्गाचा उहापोह झाला तेव्हा गाडी पंक्चर झाली होती. - (खाचखळग्यांचा प्रवास आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अर्धवटराव 19/08/2025 - 20:29
गाडी बहुतेक इन्डी़केटर वापरतच नाहिए :) स्वान्तसुखाय लेखन असल्यामुळे लेखकाला ति लिबर्टी आहे म्हणा. उपोत्घाताशिवाय कादन्बरी प्रकाशीत व्हावी तसे काहिसे झाले आहे.
# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय __________________________________________ "प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?" "भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !" "ख्या ख्या ख्या " "ख्या ख्या ख्या " गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा ! तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच !

षड्रिपु - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

गामा पैलवान 10/08/2025 - 21:15
प्रगो, जबराट चिंतन आहे. ऐसेचि लिहिते राहो. मला वाटतं की मत्सर सर्वात छुपा म्हणूनंच सर्वात प्रबळ शत्रू आहे. कामापासनं सगळ्यांची सुरुवात जरी होत असली तरी तरी लक्ष्य ( फोकस ) मीच असतो. पण मत्सराच्या बाबतीत फोकस माझ्यावरून उडून इतरांवर जातो. तोही नकळत. लै ड्यांजर भौ ! आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:21
उत्तम लेख आहे. षड्रिपुंपासून मुक्ती, म्हणजे एकाअर्थी सर्व सिद्धी मिळवणे. त्यासाठी सदा 'प्रसन्न' असणे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" तर मन सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रत्यक्ष-प्रायोगिक-व्यवहार्य उपाय सांगणारे ( - ज्यांना 'नामस्मरण' पटत/जमत/आवडत/शक्य नसेल, आणि मानसशास्त्रात रुची असेल, त्यांचासाठी-) एक अत्यंत उपयोगी पुस्तक हे आहे: . अ‍ॅमेझॉनवर सुमारे ३८० रुपयात उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

युयुत्सु 11/08/2025 - 08:49
"आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !! "आता बास. पुरेसे आहे इतके" हा विचार मी वयाच्या ~२५ वर्षापूर्वी स्वीकारला तेव्हा मला समाजाने खूप मनःस्ताप दिला (तसा तो या ना त्या स्वरूपात अजुन ही चालू असतो). शेपूट तुटलेल्या कोल्ह्यांना शेपूट असलेल्या कोल्ह्यांचा राग येतो. त्यांना सर्वांनीच शेपूट तोडून टाकावे असे वाटते. ज्यांना थांबता येत नाही, त्यांना "आता बास. पुरेसे आहे इतके" असा विचार करणार्‍यांचा राग येतो.

In reply to by चित्रगुप्त

नका आठवण करून देऊ काका. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी न्यू यॉर्क मध्ये होतो. माझा अक्षरश: दिनक्रम होता हा ! इथं भारतात किमान मी जे लिहितोय ते मला तरी शक्य आहे अशी आशा आहे. अमेरिकेत शक्यच नाही ह्या rat race मधून बाहेर पडणे. तिथं षड्रिपुंचे जाळे इतके स्ट्राँग आहे की त्यातून बाहेर पडणे निव्वळ अशक्य आहे. आणि त्यात जे अडकले आहेत ते "हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग" आहे हे स्वतःचेच स्वतःला समजून सांगत आहेत. Consumerism can never lead to a content life. Most of the luxuries, and many of the so called comforts of life, are not only indispensable, but positive hinderances to the elevation of mankind. With respect to luxuries and comforts, the wisest have ever lived a more simple and meagre life than the poor. - Henry David Thoreau

Bhakti 12/08/2025 - 10:49
प्रगो चांगलं विवेचन केले आहे. पण सर्वच रिपुंमध्ये स्त्रीयांना खुपच स्वार्थी वर्णन केल्या सारखं वाटतं.तुम्ही वर्णन केलेल्या स्त्रीया १८००-१९०० मध्ये सापडत असतील.आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही. आणि मला तुमचे दुसऱ्या धाग्यावरचे मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. अहो तुमच्यासारख्या हुशार लोकांनी बदलत्या काळानुसार बदल मान्य केले पाहिजे.(माफ करा मला खूप खेद वाटलं वाचून) ज्ञान,कर्म,भक्ति,योग हे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत,यात स्त्री पुरुष दोघेही आचरण करून शांती घेऊ शकतात.

In reply to by Bhakti

ठीक आहे भक्ती. सर्वच विचार पटले पाहिजेत असा माझा अट्टाहास नाही.
आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही.
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे. अनेक पराकोटीच्या स्वार्थी स्त्रिया मला माहिती आहेत. उदाहरणे लिहित बसलो तर विषयांतर होईल. तरीही एक उदाहरण लिहितो जे अत्यंत जवळच्या मित्रासोबत झाले आहे , होत आहे - त्याच्या पत्नीने डिव्होर्स साठी अर्ज केला, 6-8 लाख रुपये "सेटलमेंट" म्हणून मागितले , तेही द्यायला तो तयार झाला तेव्हा अचानक कोर्टात फिरली अन् म्हणाली की मी मानसिक दृष्ट्या तयार नाहीये. मी मित्राला विचारलं की बाबारे, पण तू कशाला डिव्होर्स वगैरे भानगडीत पडतो, तो म्हणाला - तीने लग्नाआधी तिच्या प्रियकरासाठी कर्ज काढले होते , लग्नानंतर देखील ती त्याचे हप्ते भरत आहे. मी म्हणाली बरं ठीक आहे पण किमान मुलाच्या कस्टडी साठी तरी प्रयत्न कर , आपल्या संस्कृतीनुसार मुलं ही पूर्णपणे बापाची असतात. बापाचाच अधिकार असतो. त्यावर तो काही बोलला नाही. ( आता तुम्हाला समजायचं ते तुम्ही समजून घ्या.) आणि ही एक गोष्ट नाहीये अशी किमान अजून 3 -4 उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. जास्त लिहू शकत नाही कारण ह्या अत्यंत खाजगी गोष्टी असतात, बोलून पुरुषांचीच बदनामी होते आणि बायका ह्याचाच गैरफायदा उचलतात. बाकी दुसऱ्या धाग्यावरील चर्चा तिथे केल्यास उत्तम. इथे विषयांतर होणार नाही. मी उदासीन अवस्थेत रहात असल्याने हे सगळं फार "वरून" पहात असतो. 18 व्या वर्षी मातृत्व हा विचार तुम्हाला सहन होत नाही ह्या बद्दल खंत वाटते. 18व्या वर्षी मातृत्व हे निसर्गाचे डिझाइन आहे, निसर्गाची तशी इच्छा नसती तर मुली 24 व्या वयात आल्या असत्या , 14व्या नाही. आणि जग फार बदललं आहे ताई. बाहेर अशा अशा घटना घडत आहेत की तुमचा विश्वास बसणार नाही. माझे घर एका शाळेजवळ आहे. मी घरी जात असताना मला 2 मुली दिसल्या , युनिफॉर्म वरून 8वी 9वी मधील असाव्यात असा अंदाज बांधला मी. एकदम गालातल्या गालात हसत लाजत बघत होत्या. मी चकित होऊन विचार केला हे काहीतरी भलतं चालू आहे म्हणून मी इकडं तिकडे पाहिलं तर , माझ्या मागून 2 छपरी पोरं, मिसरूड देखील न फुटलेली , एक्टिवा वर आली, पोरी पटकन त्यांच्या मागे बसल्या, अन् माझ्या कडे पाहून हसत हसत सुसाट निघून गेले. मी आवाक होऊन पाहत राहिलो . हे असं जग बदललेले आहे. 18 व्या वर्षी असं casual sexploration करण्यापेक्षा रीतसर लग्न करून गृहस्थाश्रम करणे हे कधीही उत्तम असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात जे असे sexploration करत आहेत त्यांना माझा मुळीच विरोध नाही. समाजात अशा मुलींची गरज आहेच . ;) बाकी बरेच आहे बोलण्यासारखे. बोलू एकेक करून.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/08/2025 - 18:44
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे.
आधी होते कोशात,बायकांनी असंच वागायचं, असं नाही,ढिमकं फलानं आता तर कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आहे तेही खुप सुंदर, खुप मोठं ;) ;) वाईट उदाहरणे मलाही माहिती आहे पण दुरुक्ती कशाला करायची.सगळीकडे स्त्रिया वगैरे कशाला सरसकटीकरण कशाला??असो. छान , नेहमीप्रमाणे अद्भुत लिहा!

In reply to by Bhakti

सरसकटीकरण ह्या लेखाच्या संदर्भाने , षड् रिपु आणि त्यांच्या स्त्री आणि पुरुषांमधील भिन्न भिन्न अभिव्यक्ती मधून प्रकट होणे हे मी माझ्या निरीक्षणावरून मांडलेले आहे. मी ह्याला जनरलायझेशन न म्हणता on an average असे म्हणेन. आणि हो मला फुलपाखरे मनापासून आवडतात. आमची अवस्था "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नहाने" अशीच आहे ;) त्यामुळे माझा फुलपाखरांना विरोध नाहीच. ( असो. जाऊ दे, जास्त लिहू शकत नाही. )

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 15:48
>> मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. वरील प्रतिसादात तुंम्ही स्त्रियांची बाजू अगदी नेमकेपणाने मांडली आहे. सनातनींना अर्थातच स्त्र्यियांना देवी मानून, मखरात बसवून त्यांचे संरक्षण करायचे असते. असं वागवलेलं सनातनी स्त्र्यियांना आवडतं व त्यांना त्याचा गौरवही वाटत असतो. परंतु तुंम्ही इथे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या स्वयंनिर्णयाबद्द्ल जरी थेट बोलला नसला तरी स्त्रिया आता बदलल्या आहेत व लवकर लग्न करणे, मातृत्व वगैरे आपणांस सहन होत नाही असे म्हटले आहे. सनातनी पुरुष मुलींकडे एक संपत्ती, जिच्यातून लवकरात लवकर सुटायचे आहे अशी जोखीम म्हणून पाहतात हे धाग्यातील विचारांमधून स्पष्टच आहे. मुलीला जगात स्वतः चं स्थान निर्माण करणं व त्यासाठी तिला लग्नाच्या आधी हवा तेवढा वेळ देणं हे सनातनी विचारात बसत नाही. टिळकांचाही मुलींचे संमतीवय ९ वरून १३ करायला विरोध होता. तसेच त्यांनी 'कुणब्यांना व स्त्रियांना राष्ट्रीय सभेत पाठवून तिथे काय नांगर चालवायचा आहे का पोळ्या लाटायच्या आहेत?' असे उद्गार काढले होते हे आपणांस माहितच असेल. बाकी तुंम्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 13/08/2025 - 15:58
म्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते. परफेक्ट.. म्हणून तर सनातन्यांचा महात्मा फुल्यांना विरोध. त्यांनी वृत्तीचा उल्लेख केला की सन्यातन्यांनी जातीवर घ्यायचे आणि त्यांच्यामुळे मिळालेले फायदे चोखत वरुन जातीयवादी म्हणत झोडपायचे हे वारंवार दिसत आले आहे.

In reply to by स्वधर्म

धन्यवाद स्वधर्म ! तुमच्याकडून टीका करणारा प्रतिसाद दिसला की मला शाब्बासकी मिळाल्याचा आनंद होतो ! No sarcasm intended. खरंच धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 16:39
मी धाग्यात काय लिहिलंय ते बघतो, तुंम्ही 'कुणी' लिहिलंय ते बघता. माझा फोकस मुद्द्यावर असतो. तुम्ही शक्यतो व्यक्तींवर रोख ठेवता, त्यांना गटात टाकता, त्यांना काय काय म्हणत असता. तुम्ही लिहिलेलं कुणाला समजलं नाही म्हटलं की तुंम्हाला ग्रेट वाटतं, म्हणून तुंम्ही मग त्यांची प्रशंसा सुरू करता. मी लिहिलेलं कुणाला समजलं नाही तर मला तो गौरव न वाटता उणीव वाटते. फर्क साफ है| असो.

In reply to by स्वधर्म

फर्क साफ है| >>> अगदी अगदी. म्हणूनच तर म्हणालो की मला तुमचा प्रतिसाद शाब्बासकी वाटतो ! अवांतर: बाकी ह्या लेखनात संमती वय हा मुद्दाच नव्हतो. ते भक्तीताईंनी केलेलं विषयांतर होते. तो मूळ धागा युयुत्सु ह्यांचा असून अन् त्यावरील माझा प्रतिसाद ह्या इथे आहे - http://misalpav.com/comment/1196962#comment-1196962

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/08/2025 - 18:14
होय होय आत्मभान जागृत झाली आहे.आणि अक्षरशः सनातनी पुरुषांची मानसिकताही पाहिली,अनुभवली आहे.मला एकच मुलगी म्हणून सनातनींनी एकटी मुलगी हट्टी होईल वगैरे म्हणून अजून अपत्य पाहिजे अस टोमण्याने सांगायचा प्रयत्न केला ,अरे तुम्ही सांभाळायला येणार का नंतर (असं मनातच हसून म्हटलं)(प्रगोने तिकडे ४ अपत्य पाहिजे असं लिहिलंय ..हे राम ;)) नोकरी सोड इ.अजून खुप किस्से आहेत ;)But I am daughter of strong mother!!! नाही बधणार या भुलभुलैय्याला! खरंय अशा पुरूषांनी बायकांनी कर्मकांडातच गुरफटून राहायला पाहिजे,ती त्यातच गेली तर फरक पडणार नाही तिला 'देवी' करतील. आता टिळकांनी बद्दल, भारतीय अध्यात्माचा अभ्यास हा मला लहानपणापासून करायचा होता.गीतारहस्यापर्यंत शुद्ध बुद्धीने पोहचायला प्रगोमुळेच जमलं.अध्यात्मात रूची असल्याने त्याचे लेख आवडायचे.एका ठिकाणी त्याने नमूद केले होते,"गीतारहस्य" वाचले पाहिजे. जानेवारी वाचायला सुरुवात केली,अहाहा! 'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश!" अशी अवस्था झाली.सारे सारे प्रश्न मिटले. मग टिळकांविषयी उत्सुकता जागृत झाली.भारतभूमी धन्य झाली आहे अशा महान रत्नामुळे!!दोन मासिकं त्यांच्या कार्याविषयी घेतली आहेत.त्यांच्यावरचा 'होमरूलचा' लेख तुम्ही वाचला असेलच. आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.माझी तर लायकीच नाही अशा नेत्यांबद्दल असं काही लिहायची. महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. एकंदरीत मला ठोकळ्यासारखे /पूर्वग्रहदूषित विचार कधीच करता येत नाही.

In reply to by Bhakti

अभ्या.. 13/08/2025 - 18:31
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. वाहवा.... आणि हे मनापासून आहे. वाचलेच पाहिजे. वाचले, समजून घेतले/नाही समजले आणि आवडले/न आवडले हे टप्पे पाहिजेतच. संविधान लिहिणार्‍या आंबेडकरांना हेच तर अपेक्षित होते. छोट्या मुलीलाही शुभेच्छा

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 18:38
>> आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते. ठीक आहे, त्यांनी स्त्रियांविषयी आणखी काय लिहिलंय ते तुंम्ही दुसरी बाजू म्हणून सांगा. समजून घ्यायचा प्रयत्न राहील. पण ठोक स्वरुपात कोणतीही व्यक्ती पूज्य किंवा तिरस्करणीय नसते असे मत आहे. त्यामुळे टिळकांच्या इंग्रजांविरूध्द केलेल्या असंतोषाच्या कार्याचा आदर आहे. महात्मा फुले यांनी त्यांना देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती. महात्मा फुले जेंव्हा गेले, तेंव्हा केसरीने त्यांची बातमी मात्र छापली नाही. कितीही अध्यात्मावर पकड असली तरी मनाचा उमदेपणा नाही. तोच प्रकार वेदोक्त प्रकरणात, पंचहौद प्रकरणात. टिळकांच्या बाबत या सगळ्या बाजूसुध्दा माहित असल्याने, तसा भक्तीरस पाझरू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. बाकी प्रगो अनेकदा अभिमानाने स्वतःला सनातनी म्हणवून घेतात. तुंम्हाला सनातनी पुरूषांची चीड आहे असे तुंम्ही लिहिता. बुध्दी मात्र आमची शुध्द नाही म्हणता. त्याचा आदर करून थांबतो.

In reply to by स्वधर्म

आता एवढे विषयांतर झाले आहे त्यात अजून थोडी भर म्हणून ही विनंती करतो की वेदोक्त प्रकरण, पंचहौद प्रकरण ह्या दोन्ही विषयांवर आपण दोन स्वतंत्र , छोटेखानी का होईना लेख लिहावेत. मला उत्सुकता आहे तुमचे ह्या प्रकरणाचे आकलन आणि अभ्यास समजून घेण्याची . कारण माझ्या अल्पशा अभ्यासानुसार ह्या दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. आणि तिसरा स्वतंत्र लेख ताई महाराज बलात्कार प्रकरण ह्यावर लिहिल्यास मी आपल्या धाडसाचे कौतुक करेन. कारण टिळकांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर बलात्कार सारखा नीच आरोप करणाऱ्या स्त्रीला कोणाचे पाठबळ होते हे देखील समाजापुढे येणे तितकेच गरजेचे आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 22:02
>> दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. हे आधीच ठरलेले आहे, त्यामुळे काहीही लिहिले तरी फरक पडणार नाही हे स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आपली विनंती मान्य करू शकणार नाही. कारण मत आधीच ठरवले गेलेले असेल तर चर्चेत कितीही मुद्दे आले तरी त्याचा उपयोग नसतो. उदा. वरती भक्ती यांनी स्वतः च सनातनी पुरुषांची मानसिकता अनुभवून त्यांना भान आले आहे, त्यांनी बंडही केले आहे असे लिहिले. पण तशीच मानसिकता टिळक यांची दाखवून दिली, तर माझी बुध्दी अशुध्द असे म्हटले. हे माझ्यासाठी अतिशय खेदकारक व अनाकलनीय आहे. जर माझी माहिती खोटी दाखवून दिली असती, तर मी माझे मत नक्कीच दुरूस्त केले असते. शिवाय टिळक त्यांच्या काही प्रतिगामी मतांमुळे लहान ठरत नाहीत की त्यांचे योगदान कमी होत नाही. तेवढी परिपक्वता मला अपेक्षित होती. पण आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. दे जस्ट शूट द मेसेंजर, मग सत्य किंवा वस्तुस्थिती काहीही असो. माझी या चर्चेतून निवृत्ती _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 14/08/2025 - 09:46
आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. बाडीस अशी स्थिती लोकमान्य टिळकांबदलच नव्हे तर सुभाष बोस, भागात सिंह, गांधीजी पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांबद्दल दिसून येते. यामुळे कोणत्याही नेत्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसलेले आहे.

In reply to by स्वधर्म

https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf - हे पुस्तक प्रताधिकार मुक्त आहे. आपापल्या कुवतीनुसार योग्य अयोग्य ठरवावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 13/08/2025 - 17:40
सेम पिंच,आणि तुझ्या या धाग्याने माझ्या गीतारहस्य धाग्याची जाहिरात केली आहे :) वाह =)))) धागा धागा खेळायला आवडतं नाही.आपण काय रोबोट आहोत का? एका धाग्यापुरते स्वीट ऑन/ ऑफ व्हायला. समग्र आक्षेप/कौतुक आवडतं.मला असंच आवडतं. सॉरी युयुत्स काका ;) ;)

छळताना कोणालाच सोडत नाहीत. वाईट चांगले सगळीकडेच, भेदाभेद करणे वादाचा विषय होऊ शकतो. बाकी काळानुसार जगरहाटी बदलणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

थोडा कळला, थोडा डोक्यावरुन गेला. पण नेहमीच "अरे हा तर माझ्याही पुढे गेलाय" असे अनुभव येत असल्याने फार मनाला लावुन घेतले नाही. कुठेतरी थांबायला हवे हे मात्र खरे. नाहीतर ती सुर्यास्तापर्यंत जमिनीसाठी धावणार्‍या माणसा सारखी अवस्था व्हायची. नीमकरोली बाबांच्या डायरीतील पान आवडले. जाताजाता--एकदा त्यांचा एक भक्त त्यांना भेटायला आला. त्याच्याकडे आर्सेनिक या विषाची बाटली होती. बाबांनी त्याला विचारले की काय आणले आहे? त्याने बाटली दाखवली. त्यावर बाबांनी त्यातील मूठभर तोंडात टाकले. सगळे लोक घाबरुन रडु लागले की हे आता मरणार. त्यावर बाबांनी एक ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले काही होत नाही. बोलो राम राम. पुढे ते वाचले.

विजुभाऊ 13/08/2025 - 17:11
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपु जिवंत मानवाला आवश्यक आहेत. काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार ( ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे) क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते. वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते. मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल. मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल. त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी. अर्थात त्यांचा अतिरेक वाईटच. तसा पाणी पिण्याचा अतिरेकही वाईट जीवघेणा ठरू शकतो

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 13/08/2025 - 17:26
मी पण हेच लिहीणार होतो. पण टंकायचा कंटाळा आला. या भावनांवर मेंदूतील उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. तो विकसि त नसेल तर प्रश्न निर्माण होतात. उपाग्रखण्डाचा विकास ताण, आहार, ध्यान, कौशल्य विकास इ० वर अवलंबून असतो. ताणाचा उपाग्रखण्डावर घातक परिणाम होतो आणि भावनिक नियंत्रण अवघड बनते.

In reply to by विजुभाऊ

निदान सांसारीक मानवासाठी
+१ हे अगदी बरोबर आहेच . संसाराचा निषेध कोणत्याही सनातनी साहित्यात मला तरी आढळलेला नाही आजवरच्या वाचनात. अर्जुनाला 4 पत्नी होत्या, कृष्णाला किमान 8. क्रोधाच्या आवेशात कृष्णाने भीष्म पितामहांच्यावर चक्र उगारल्याच्या प्रसंग सुप्रसिद्ध आहेच. आणि लोभाच्या बाबतीत बोलायचे झाले तर खांडव वन दहन प्रकरणात दोघांनी मिळून नागांचा संहार केलेला स्पष्ट दिसून येतो तोही इंद्रप्रस्थ आणि त्या जमिनी करिता! कृष्णार्जुनाची उदाहरणे दिली कारण ती पटकन सुचली म्हणून , एरव्ही जवळपास सर्वच सनातनी हिंदू साहित्यातील राजांची उदाहरणे थोड्याफार फरकाने देता येतील. शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” (रघुवंशम्–1.6) आणि इथेच खरे गमक आहे. संसार, प्रपंच कोठवर करत रहायचे ? ह्या सहा रिपूंच्या चक्रात किती आणि कसे खेळत रहायचे ह्याची नियम रीतसर घालून दिलेले आहेत ज्याला वर्णाश्रम व्यवस्था म्हणाले आहे. These people have made frameworks for everything. सुचत जाईल तसे लिहित जाईन . प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 14/08/2025 - 16:14
त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी.
सांसारिक मानव षडरिपुनी ग्रासलेला असतो. पण ते अगदी आवश्यक नाहीत, सांसारीक मानवासाठीसुद्धा आणि मुमुक्षुसाठीही.
काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार
संसारात (जन्मृत्युच्या जंजाळात) अडकून राहण्यासाठी पुनरुत्पादन कारणीभूत आहे, पर्यायाने काम, त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी काम ह्या रिपूवर विजय मिळवावा लागेल. (तसंही, फक्त वंश पुढे चालवायचा म्हणून एका अपत्याला जन्माला घालून थांबल पाहिजे, तसं न होता आमोदासाठी कामाच्या आहारी जाण होत)
क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते.
बरोबर उलट आहे, क्रोधामुळे निर्णय क्षमता हरवून बसते, क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय रियॅक्शन असते रिस्पॉन्स नसतो.
वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
वैयक्तिक मोह स्वार्थाला जन्म देतो त्यामुळे योग्य आणि यथार्थ प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल.
मत्सर ( ईर्ष्या) ह्यामुळे घेतलेला ध्यास उत्तमतेचा ध्यास नसतो, दुसऱ्याच्या आनंदाकडे किंवा क्षमतेकडे बघून येणाऱ्या नकारात्मकतेने घेतलेला ध्यास असतो.
मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल.
मदमस्त लीडरशीपमुळे अनागोंदी होईल. (उदा. विजय माल्या). - (मुमुक्षू) सोकाजी

कॉमी 13/08/2025 - 22:14
लेखातले स्त्रियांविषयक विचार निव्वळ TRP साठी लिहिलेले वाटले. उगी ओढून ताणून. तसा फारसा लेखाच्या मूळ विषयाशी संबंध नाही. आता स्त्रीला कामेच्छा जास्त का पुरुषाला ह्यावर परिच्छेद पाडण्याचे प्रयोजन समजले नाही. त्यामुळे इंटरनेट वर ज्याला रेजबेट म्हणतात तसले लिखाण वाटले. एक उदाहरण बघू-
१. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! (...)अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही. असो.
ह्या असो नंतर वरचा स्त्री का पुरुष जास्त कोण कामुक हा थ्रेड पूर्णपणे फेकून दिला आहे आणि मूळ टायटल वाला रिपू खाली काही वाक्यात संपवला. बरेचसे विचार हास्यास्पद आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात हे उदाहरण म्हणून घ्या.

विंजिनेर 13/08/2025 - 22:55
काय रे गोडबोल्या, स्त्री-पुरूषांच्या कामेच्छांची मोजणी करायला तू काय तिथे कंदील पकडून उभा होतास की काय? झालंच तर मत्सर - दोन-चार सासु-सुनेचे पिक्चर पाहून आणि चार दिवस न्युयॉर्क मध्ये राहुन हिरवा माज दाखवला की "मत्सराची भावना पुरूषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते" अश्या पिंका टाकायला मोकळा झालास वाट्टं? तीच गोष्ट लोभाची - तूला तुझ्या आयुष्यात असलेल्या (किंवा येतील अशी लोभी आशा असलेल्या) स्त्रियांची हवी ती हौस-मौज पुरवता पुरवता जेरीस आल्यानंतर इथे येऊन त्यांच्या नावाने खडे फोडतोस होय? शिवाय मत्सराचा संबंध कामुक समाधानाशी जोडतोयस - तुझं बोळा तुंबलेला दिसतोय - चिल मार, अंमळ प्रतिसाद आणि ट्यर्र्पीसाठी उगाच प्रक्षोभक आचरट लेख पाडायचा अन् काय. उगीच मिपावर लेख लिहून आपण योगी महर्षि असल्याचा आव आणू नकोस.

In reply to by विंजिनेर

धाग्यातील विषयांवर स्वतःची मते मांडायचे सोडुन , वैयक्तिक टिप्पणी , तीही खालच्या थराला जाऊन केलेली आहे स्पष्ट . हे मिसळपावच्या धोरणात बसत नाही. बाकी संपादक कारवाई करतील योग्य ती. तुम्ही तुमची संस्कृती दाखवुन दिलीत हे मात्र एक झाले ! २

In reply to by प्रसाद गोडबोले

विंजिनेर 13/08/2025 - 23:44
स्वतःची मते मांडायचे स्वतःची मते मांडायचे
प्रतिसादात वैयक्तिक सोडून इतरांची मतं मांडत नाही मी
खालच्या थराला जाऊन केलेली आहे
लेखाच्या थराला जाऊन टिप्प्णी केली असं म्हणायचंय का? माझ्या संस्कृती मिपावरच्या सवंग लेखाला शाब्दिक चपराक देऊन ठरण्याइतकी उथळ नाही रे....

सुबोध खरे 14/08/2025 - 10:08
विंजिनेर साहेब पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते मग कर्कश्य बोलावे काय निमित्य? वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही. षड्रिपू नसलेली माणसं एक तर संत असतात किंवा मनोरुग्ण. सामान्य माणूस नव्हे. आपण या दोन्हीत नाही तेंव्हा हा विषय काथ्याकुटासाठी उत्तम आहे. प्रगो यांची बरीचशी मते मला सुद्धा पटत नाहीत. त्यात अध्यात्म जास्त आहे आणि सत्य कमी आहे. त्याचे खंडन सहज करता येईल. पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरणे बरोबर नाही

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 14/08/2025 - 15:49
वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही.
डॉक, नक्की ना? - (युयुत्सूंच्या धाग्यांवरील प्रतिसादात सभ्यपणा शोधणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 14/08/2025 - 19:45
माझा असभ्य खालच्या पातळीचा प्रतिसाद ससंदर्भ दाखवून द्या हि नम्र विनंती आहे. याउलट त्यांनी अनेक वेळेस पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे तरी मी संयम च बाळगलेला आहे.

मारवा 17/08/2025 - 20:00
लोभ आणि मोह हे एकच आहेत त्यात धर्मशास्त्र लिहिणारे जे कोणी होते त्यांची पुनरुक्ती झालेली आहे असे नेहमी वाटते. फरक स्पष्ट स्वच्छ काटेकोर नाही. अर्थात काही फरक त्याने पडत नाही अजून एक विरोधाभास एकीकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे असा ही गौरव आहे. हाच काम रिपु म्हणजे शत्रू पण आहे आणि पुरुषार्थ ही आहे. एकूण धार्मिक साहित्यात विसंगती आणि पुनरुक्ती अतार्किकता असल्याशिवाय ते धर्मग्रंथ या पदाला प्राप्त होत नाही. दुसरे टिळक हे अत्यंत सनातनी मागास विचार करणारे होते हे त्यांनी त्यांच्या काळाच्या आसपास जगलेल्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरून घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्याहून रोचक.म्हणजे टिळक स्वतः खोत होते खोती संदर्भातील टिळकांची भूमिका तर चक्क स्वार्थी म्हणावी इतकी संकुचित होती. पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत असो अजून एक क्रोध काम यांना एक मोठे उत्क्रांतीमूल्य आहे. अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. सदरील काम क्रोध या मानवी नॉर्मल भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि नकारात्मक आहे . स्वधर्म यांनी टिळकांचा दाखवलेला दाखला अचूक आहे .

In reply to by मारवा

अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. - उत्क्रांतीवाद हि थिअरी (मराठी शब्द?)आहे, सिद्धांत नाही. अशा बऱ्याच वेगवेगळ्या थिअरीज आहेत. शेतीचा शोध ८००० वर्षाम्पूर्वी लागला अशीसुद्धा एक थिअरी आहे. मास्क लावला कि कोविड पासून बचाव होतो अशीसुद्धा एक थिअरी सांगितली गेली होती. सिद्धांत proven असतो. उदा - पृथ्वी सुर्याभोवती फिरते.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/08/2025 - 19:35
"पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत" आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते. आणि तसे केल्यास आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात. मामला दंगलीपर्यंत जाऊ शकतो यातून लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंह, गांधीजी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून श्रीमती इंदिरा गांधी, श्री नरसिम्ह राव, अटळ श्री बिहारी वाजपेयी डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरेंद्र मोदी यांचीही सुटका झालेली नाही. आणि आपली रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष लहान आहे दाखवण्यातही अहमहमिका असते. आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. - श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 20/08/2025 - 20:43
हा खरा खरे डॉक्टरांचा प्रतिसाद. उमदा, अनुभवी, सर्वांगिण आणि लॉजिकल. आम्हाला हेच डॉक्टर चांगले माहितेत. . डॉक्टरसाहेब नका ते बरनॉल आणि इनो वाटप केंद्र चालवू. प्रतिसादातूनही उगा वस्सकन अंगावर आल्यासारखे वाटता. ;)

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 23/08/2025 - 09:52
मला असे प्रतिसाद देण्याची अजिबात हौस नाही. परंतु मिपावर तीन चार व्यक्तिमत्वे अशी आहेत कि ज्यांना कोणत्याही गोष्टीत मोदीद्वेष आणल्याशिवाय जेवण जात नाही. अशा लोकांना केवळ अशीच भाषा समजते. क्लिंटन हे फार सहनशीलतेने अशा लोकांच्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तरे देत असतात. पण हे लोक सुधारण्यातले नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण people will accept what they want to accept. कालच एक बाई आल्या होत्या ज्यांना पाळीचा त्रास होता. मागच्या डिसेंबर मध्ये आपल्याला कर्करोग होण्याची बरीच शक्यता आहे असे जीव तोडून सांगितले असताना सुद्धा त्या गेले ८ महिने होमिओपॅथीची औषधे घेत होत्या त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून काल परत आल्या. आता जी शक्यता होती ती वस्तुस्थितीत रूपांतरित झालेली आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. कालही त्यांना परत स्त्रीरोगतज्ञाकडे जायला सांगितले आहे. पुढचे त्यांच्या नशिबावर ! इतके स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगूनही लोक ऐकत नाहीत याची आता सवय झाली आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते.
आयडी हॅक झाला की काय.. =)) -दिलीप बिरुटे

गामा पैलवान 10/08/2025 - 21:15
प्रगो, जबराट चिंतन आहे. ऐसेचि लिहिते राहो. मला वाटतं की मत्सर सर्वात छुपा म्हणूनंच सर्वात प्रबळ शत्रू आहे. कामापासनं सगळ्यांची सुरुवात जरी होत असली तरी तरी लक्ष्य ( फोकस ) मीच असतो. पण मत्सराच्या बाबतीत फोकस माझ्यावरून उडून इतरांवर जातो. तोही नकळत. लै ड्यांजर भौ ! आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:21
उत्तम लेख आहे. षड्रिपुंपासून मुक्ती, म्हणजे एकाअर्थी सर्व सिद्धी मिळवणे. त्यासाठी सदा 'प्रसन्न' असणे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" तर मन सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रत्यक्ष-प्रायोगिक-व्यवहार्य उपाय सांगणारे ( - ज्यांना 'नामस्मरण' पटत/जमत/आवडत/शक्य नसेल, आणि मानसशास्त्रात रुची असेल, त्यांचासाठी-) एक अत्यंत उपयोगी पुस्तक हे आहे: . अ‍ॅमेझॉनवर सुमारे ३८० रुपयात उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

युयुत्सु 11/08/2025 - 08:49
"आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !! "आता बास. पुरेसे आहे इतके" हा विचार मी वयाच्या ~२५ वर्षापूर्वी स्वीकारला तेव्हा मला समाजाने खूप मनःस्ताप दिला (तसा तो या ना त्या स्वरूपात अजुन ही चालू असतो). शेपूट तुटलेल्या कोल्ह्यांना शेपूट असलेल्या कोल्ह्यांचा राग येतो. त्यांना सर्वांनीच शेपूट तोडून टाकावे असे वाटते. ज्यांना थांबता येत नाही, त्यांना "आता बास. पुरेसे आहे इतके" असा विचार करणार्‍यांचा राग येतो.

In reply to by चित्रगुप्त

नका आठवण करून देऊ काका. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी न्यू यॉर्क मध्ये होतो. माझा अक्षरश: दिनक्रम होता हा ! इथं भारतात किमान मी जे लिहितोय ते मला तरी शक्य आहे अशी आशा आहे. अमेरिकेत शक्यच नाही ह्या rat race मधून बाहेर पडणे. तिथं षड्रिपुंचे जाळे इतके स्ट्राँग आहे की त्यातून बाहेर पडणे निव्वळ अशक्य आहे. आणि त्यात जे अडकले आहेत ते "हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग" आहे हे स्वतःचेच स्वतःला समजून सांगत आहेत. Consumerism can never lead to a content life. Most of the luxuries, and many of the so called comforts of life, are not only indispensable, but positive hinderances to the elevation of mankind. With respect to luxuries and comforts, the wisest have ever lived a more simple and meagre life than the poor. - Henry David Thoreau

Bhakti 12/08/2025 - 10:49
प्रगो चांगलं विवेचन केले आहे. पण सर्वच रिपुंमध्ये स्त्रीयांना खुपच स्वार्थी वर्णन केल्या सारखं वाटतं.तुम्ही वर्णन केलेल्या स्त्रीया १८००-१९०० मध्ये सापडत असतील.आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही. आणि मला तुमचे दुसऱ्या धाग्यावरचे मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. अहो तुमच्यासारख्या हुशार लोकांनी बदलत्या काळानुसार बदल मान्य केले पाहिजे.(माफ करा मला खूप खेद वाटलं वाचून) ज्ञान,कर्म,भक्ति,योग हे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत,यात स्त्री पुरुष दोघेही आचरण करून शांती घेऊ शकतात.

In reply to by Bhakti

ठीक आहे भक्ती. सर्वच विचार पटले पाहिजेत असा माझा अट्टाहास नाही.
आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही.
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे. अनेक पराकोटीच्या स्वार्थी स्त्रिया मला माहिती आहेत. उदाहरणे लिहित बसलो तर विषयांतर होईल. तरीही एक उदाहरण लिहितो जे अत्यंत जवळच्या मित्रासोबत झाले आहे , होत आहे - त्याच्या पत्नीने डिव्होर्स साठी अर्ज केला, 6-8 लाख रुपये "सेटलमेंट" म्हणून मागितले , तेही द्यायला तो तयार झाला तेव्हा अचानक कोर्टात फिरली अन् म्हणाली की मी मानसिक दृष्ट्या तयार नाहीये. मी मित्राला विचारलं की बाबारे, पण तू कशाला डिव्होर्स वगैरे भानगडीत पडतो, तो म्हणाला - तीने लग्नाआधी तिच्या प्रियकरासाठी कर्ज काढले होते , लग्नानंतर देखील ती त्याचे हप्ते भरत आहे. मी म्हणाली बरं ठीक आहे पण किमान मुलाच्या कस्टडी साठी तरी प्रयत्न कर , आपल्या संस्कृतीनुसार मुलं ही पूर्णपणे बापाची असतात. बापाचाच अधिकार असतो. त्यावर तो काही बोलला नाही. ( आता तुम्हाला समजायचं ते तुम्ही समजून घ्या.) आणि ही एक गोष्ट नाहीये अशी किमान अजून 3 -4 उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. जास्त लिहू शकत नाही कारण ह्या अत्यंत खाजगी गोष्टी असतात, बोलून पुरुषांचीच बदनामी होते आणि बायका ह्याचाच गैरफायदा उचलतात. बाकी दुसऱ्या धाग्यावरील चर्चा तिथे केल्यास उत्तम. इथे विषयांतर होणार नाही. मी उदासीन अवस्थेत रहात असल्याने हे सगळं फार "वरून" पहात असतो. 18 व्या वर्षी मातृत्व हा विचार तुम्हाला सहन होत नाही ह्या बद्दल खंत वाटते. 18व्या वर्षी मातृत्व हे निसर्गाचे डिझाइन आहे, निसर्गाची तशी इच्छा नसती तर मुली 24 व्या वयात आल्या असत्या , 14व्या नाही. आणि जग फार बदललं आहे ताई. बाहेर अशा अशा घटना घडत आहेत की तुमचा विश्वास बसणार नाही. माझे घर एका शाळेजवळ आहे. मी घरी जात असताना मला 2 मुली दिसल्या , युनिफॉर्म वरून 8वी 9वी मधील असाव्यात असा अंदाज बांधला मी. एकदम गालातल्या गालात हसत लाजत बघत होत्या. मी चकित होऊन विचार केला हे काहीतरी भलतं चालू आहे म्हणून मी इकडं तिकडे पाहिलं तर , माझ्या मागून 2 छपरी पोरं, मिसरूड देखील न फुटलेली , एक्टिवा वर आली, पोरी पटकन त्यांच्या मागे बसल्या, अन् माझ्या कडे पाहून हसत हसत सुसाट निघून गेले. मी आवाक होऊन पाहत राहिलो . हे असं जग बदललेले आहे. 18 व्या वर्षी असं casual sexploration करण्यापेक्षा रीतसर लग्न करून गृहस्थाश्रम करणे हे कधीही उत्तम असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात जे असे sexploration करत आहेत त्यांना माझा मुळीच विरोध नाही. समाजात अशा मुलींची गरज आहेच . ;) बाकी बरेच आहे बोलण्यासारखे. बोलू एकेक करून.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/08/2025 - 18:44
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे.
आधी होते कोशात,बायकांनी असंच वागायचं, असं नाही,ढिमकं फलानं आता तर कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आहे तेही खुप सुंदर, खुप मोठं ;) ;) वाईट उदाहरणे मलाही माहिती आहे पण दुरुक्ती कशाला करायची.सगळीकडे स्त्रिया वगैरे कशाला सरसकटीकरण कशाला??असो. छान , नेहमीप्रमाणे अद्भुत लिहा!

In reply to by Bhakti

सरसकटीकरण ह्या लेखाच्या संदर्भाने , षड् रिपु आणि त्यांच्या स्त्री आणि पुरुषांमधील भिन्न भिन्न अभिव्यक्ती मधून प्रकट होणे हे मी माझ्या निरीक्षणावरून मांडलेले आहे. मी ह्याला जनरलायझेशन न म्हणता on an average असे म्हणेन. आणि हो मला फुलपाखरे मनापासून आवडतात. आमची अवस्था "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नहाने" अशीच आहे ;) त्यामुळे माझा फुलपाखरांना विरोध नाहीच. ( असो. जाऊ दे, जास्त लिहू शकत नाही. )

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 15:48
>> मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं‌ हे विचार अजिबात नाही आवडले. मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही. वरील प्रतिसादात तुंम्ही स्त्रियांची बाजू अगदी नेमकेपणाने मांडली आहे. सनातनींना अर्थातच स्त्र्यियांना देवी मानून, मखरात बसवून त्यांचे संरक्षण करायचे असते. असं वागवलेलं सनातनी स्त्र्यियांना आवडतं व त्यांना त्याचा गौरवही वाटत असतो. परंतु तुंम्ही इथे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या स्वयंनिर्णयाबद्द्ल जरी थेट बोलला नसला तरी स्त्रिया आता बदलल्या आहेत व लवकर लग्न करणे, मातृत्व वगैरे आपणांस सहन होत नाही असे म्हटले आहे. सनातनी पुरुष मुलींकडे एक संपत्ती, जिच्यातून लवकरात लवकर सुटायचे आहे अशी जोखीम म्हणून पाहतात हे धाग्यातील विचारांमधून स्पष्टच आहे. मुलीला जगात स्वतः चं स्थान निर्माण करणं व त्यासाठी तिला लग्नाच्या आधी हवा तेवढा वेळ देणं हे सनातनी विचारात बसत नाही. टिळकांचाही मुलींचे संमतीवय ९ वरून १३ करायला विरोध होता. तसेच त्यांनी 'कुणब्यांना व स्त्रियांना राष्ट्रीय सभेत पाठवून तिथे काय नांगर चालवायचा आहे का पोळ्या लाटायच्या आहेत?' असे उद्गार काढले होते हे आपणांस माहितच असेल. बाकी तुंम्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 13/08/2025 - 15:58
म्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते. परफेक्ट.. म्हणून तर सनातन्यांचा महात्मा फुल्यांना विरोध. त्यांनी वृत्तीचा उल्लेख केला की सन्यातन्यांनी जातीवर घ्यायचे आणि त्यांच्यामुळे मिळालेले फायदे चोखत वरुन जातीयवादी म्हणत झोडपायचे हे वारंवार दिसत आले आहे.

In reply to by स्वधर्म

धन्यवाद स्वधर्म ! तुमच्याकडून टीका करणारा प्रतिसाद दिसला की मला शाब्बासकी मिळाल्याचा आनंद होतो ! No sarcasm intended. खरंच धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 16:39
मी धाग्यात काय लिहिलंय ते बघतो, तुंम्ही 'कुणी' लिहिलंय ते बघता. माझा फोकस मुद्द्यावर असतो. तुम्ही शक्यतो व्यक्तींवर रोख ठेवता, त्यांना गटात टाकता, त्यांना काय काय म्हणत असता. तुम्ही लिहिलेलं कुणाला समजलं नाही म्हटलं की तुंम्हाला ग्रेट वाटतं, म्हणून तुंम्ही मग त्यांची प्रशंसा सुरू करता. मी लिहिलेलं कुणाला समजलं नाही तर मला तो गौरव न वाटता उणीव वाटते. फर्क साफ है| असो.

In reply to by स्वधर्म

फर्क साफ है| >>> अगदी अगदी. म्हणूनच तर म्हणालो की मला तुमचा प्रतिसाद शाब्बासकी वाटतो ! अवांतर: बाकी ह्या लेखनात संमती वय हा मुद्दाच नव्हतो. ते भक्तीताईंनी केलेलं विषयांतर होते. तो मूळ धागा युयुत्सु ह्यांचा असून अन् त्यावरील माझा प्रतिसाद ह्या इथे आहे - http://misalpav.com/comment/1196962#comment-1196962

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/08/2025 - 18:14
होय होय आत्मभान जागृत झाली आहे.आणि अक्षरशः सनातनी पुरुषांची मानसिकताही पाहिली,अनुभवली आहे.मला एकच मुलगी म्हणून सनातनींनी एकटी मुलगी हट्टी होईल वगैरे म्हणून अजून अपत्य पाहिजे अस टोमण्याने सांगायचा प्रयत्न केला ,अरे तुम्ही सांभाळायला येणार का नंतर (असं मनातच हसून म्हटलं)(प्रगोने तिकडे ४ अपत्य पाहिजे असं लिहिलंय ..हे राम ;)) नोकरी सोड इ.अजून खुप किस्से आहेत ;)But I am daughter of strong mother!!! नाही बधणार या भुलभुलैय्याला! खरंय अशा पुरूषांनी बायकांनी कर्मकांडातच गुरफटून राहायला पाहिजे,ती त्यातच गेली तर फरक पडणार नाही तिला 'देवी' करतील. आता टिळकांनी बद्दल, भारतीय अध्यात्माचा अभ्यास हा मला लहानपणापासून करायचा होता.गीतारहस्यापर्यंत शुद्ध बुद्धीने पोहचायला प्रगोमुळेच जमलं.अध्यात्मात रूची असल्याने त्याचे लेख आवडायचे.एका ठिकाणी त्याने नमूद केले होते,"गीतारहस्य" वाचले पाहिजे. जानेवारी वाचायला सुरुवात केली,अहाहा! 'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश!" अशी अवस्था झाली.सारे सारे प्रश्न मिटले. मग टिळकांविषयी उत्सुकता जागृत झाली.भारतभूमी धन्य झाली आहे अशा महान रत्नामुळे!!दोन मासिकं त्यांच्या कार्याविषयी घेतली आहेत.त्यांच्यावरचा 'होमरूलचा' लेख तुम्ही वाचला असेलच. आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.माझी तर लायकीच नाही अशा नेत्यांबद्दल असं काही लिहायची. महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. एकंदरीत मला ठोकळ्यासारखे /पूर्वग्रहदूषित विचार कधीच करता येत नाही.

In reply to by Bhakti

अभ्या.. 13/08/2025 - 18:31
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे. त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले. संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत. वाहवा.... आणि हे मनापासून आहे. वाचलेच पाहिजे. वाचले, समजून घेतले/नाही समजले आणि आवडले/न आवडले हे टप्पे पाहिजेतच. संविधान लिहिणार्‍या आंबेडकरांना हेच तर अपेक्षित होते. छोट्या मुलीलाही शुभेच्छा

In reply to by Bhakti

स्वधर्म 13/08/2025 - 18:38
>> आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते. ठीक आहे, त्यांनी स्त्रियांविषयी आणखी काय लिहिलंय ते तुंम्ही दुसरी बाजू म्हणून सांगा. समजून घ्यायचा प्रयत्न राहील. पण ठोक स्वरुपात कोणतीही व्यक्ती पूज्य किंवा तिरस्करणीय नसते असे मत आहे. त्यामुळे टिळकांच्या इंग्रजांविरूध्द केलेल्या असंतोषाच्या कार्याचा आदर आहे. महात्मा फुले यांनी त्यांना देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती. महात्मा फुले जेंव्हा गेले, तेंव्हा केसरीने त्यांची बातमी मात्र छापली नाही. कितीही अध्यात्मावर पकड असली तरी मनाचा उमदेपणा नाही. तोच प्रकार वेदोक्त प्रकरणात, पंचहौद प्रकरणात. टिळकांच्या बाबत या सगळ्या बाजूसुध्दा माहित असल्याने, तसा भक्तीरस पाझरू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. बाकी प्रगो अनेकदा अभिमानाने स्वतःला सनातनी म्हणवून घेतात. तुंम्हाला सनातनी पुरूषांची चीड आहे असे तुंम्ही लिहिता. बुध्दी मात्र आमची शुध्द नाही म्हणता. त्याचा आदर करून थांबतो.

In reply to by स्वधर्म

आता एवढे विषयांतर झाले आहे त्यात अजून थोडी भर म्हणून ही विनंती करतो की वेदोक्त प्रकरण, पंचहौद प्रकरण ह्या दोन्ही विषयांवर आपण दोन स्वतंत्र , छोटेखानी का होईना लेख लिहावेत. मला उत्सुकता आहे तुमचे ह्या प्रकरणाचे आकलन आणि अभ्यास समजून घेण्याची . कारण माझ्या अल्पशा अभ्यासानुसार ह्या दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. आणि तिसरा स्वतंत्र लेख ताई महाराज बलात्कार प्रकरण ह्यावर लिहिल्यास मी आपल्या धाडसाचे कौतुक करेन. कारण टिळकांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर बलात्कार सारखा नीच आरोप करणाऱ्या स्त्रीला कोणाचे पाठबळ होते हे देखील समाजापुढे येणे तितकेच गरजेचे आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/08/2025 - 22:02
>> दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते. हे आधीच ठरलेले आहे, त्यामुळे काहीही लिहिले तरी फरक पडणार नाही हे स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आपली विनंती मान्य करू शकणार नाही. कारण मत आधीच ठरवले गेलेले असेल तर चर्चेत कितीही मुद्दे आले तरी त्याचा उपयोग नसतो. उदा. वरती भक्ती यांनी स्वतः च सनातनी पुरुषांची मानसिकता अनुभवून त्यांना भान आले आहे, त्यांनी बंडही केले आहे असे लिहिले. पण तशीच मानसिकता टिळक यांची दाखवून दिली, तर माझी बुध्दी अशुध्द असे म्हटले. हे माझ्यासाठी अतिशय खेदकारक व अनाकलनीय आहे. जर माझी माहिती खोटी दाखवून दिली असती, तर मी माझे मत नक्कीच दुरूस्त केले असते. शिवाय टिळक त्यांच्या काही प्रतिगामी मतांमुळे लहान ठरत नाहीत की त्यांचे योगदान कमी होत नाही. तेवढी परिपक्वता मला अपेक्षित होती. पण आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. दे जस्ट शूट द मेसेंजर, मग सत्य किंवा वस्तुस्थिती काहीही असो. माझी या चर्चेतून निवृत्ती _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 14/08/2025 - 09:46
आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. बाडीस अशी स्थिती लोकमान्य टिळकांबदलच नव्हे तर सुभाष बोस, भागात सिंह, गांधीजी पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांबद्दल दिसून येते. यामुळे कोणत्याही नेत्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसलेले आहे.

In reply to by स्वधर्म

https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf - हे पुस्तक प्रताधिकार मुक्त आहे. आपापल्या कुवतीनुसार योग्य अयोग्य ठरवावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 13/08/2025 - 17:40
सेम पिंच,आणि तुझ्या या धाग्याने माझ्या गीतारहस्य धाग्याची जाहिरात केली आहे :) वाह =)))) धागा धागा खेळायला आवडतं नाही.आपण काय रोबोट आहोत का? एका धाग्यापुरते स्वीट ऑन/ ऑफ व्हायला. समग्र आक्षेप/कौतुक आवडतं.मला असंच आवडतं. सॉरी युयुत्स काका ;) ;)

छळताना कोणालाच सोडत नाहीत. वाईट चांगले सगळीकडेच, भेदाभेद करणे वादाचा विषय होऊ शकतो. बाकी काळानुसार जगरहाटी बदलणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

थोडा कळला, थोडा डोक्यावरुन गेला. पण नेहमीच "अरे हा तर माझ्याही पुढे गेलाय" असे अनुभव येत असल्याने फार मनाला लावुन घेतले नाही. कुठेतरी थांबायला हवे हे मात्र खरे. नाहीतर ती सुर्यास्तापर्यंत जमिनीसाठी धावणार्‍या माणसा सारखी अवस्था व्हायची. नीमकरोली बाबांच्या डायरीतील पान आवडले. जाताजाता--एकदा त्यांचा एक भक्त त्यांना भेटायला आला. त्याच्याकडे आर्सेनिक या विषाची बाटली होती. बाबांनी त्याला विचारले की काय आणले आहे? त्याने बाटली दाखवली. त्यावर बाबांनी त्यातील मूठभर तोंडात टाकले. सगळे लोक घाबरुन रडु लागले की हे आता मरणार. त्यावर बाबांनी एक ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले काही होत नाही. बोलो राम राम. पुढे ते वाचले.

विजुभाऊ 13/08/2025 - 17:11
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपु जिवंत मानवाला आवश्यक आहेत. काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार ( ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे) क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते. वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते. मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल. मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल. त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी. अर्थात त्यांचा अतिरेक वाईटच. तसा पाणी पिण्याचा अतिरेकही वाईट जीवघेणा ठरू शकतो

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 13/08/2025 - 17:26
मी पण हेच लिहीणार होतो. पण टंकायचा कंटाळा आला. या भावनांवर मेंदूतील उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. तो विकसि त नसेल तर प्रश्न निर्माण होतात. उपाग्रखण्डाचा विकास ताण, आहार, ध्यान, कौशल्य विकास इ० वर अवलंबून असतो. ताणाचा उपाग्रखण्डावर घातक परिणाम होतो आणि भावनिक नियंत्रण अवघड बनते.

In reply to by विजुभाऊ

निदान सांसारीक मानवासाठी
+१ हे अगदी बरोबर आहेच . संसाराचा निषेध कोणत्याही सनातनी साहित्यात मला तरी आढळलेला नाही आजवरच्या वाचनात. अर्जुनाला 4 पत्नी होत्या, कृष्णाला किमान 8. क्रोधाच्या आवेशात कृष्णाने भीष्म पितामहांच्यावर चक्र उगारल्याच्या प्रसंग सुप्रसिद्ध आहेच. आणि लोभाच्या बाबतीत बोलायचे झाले तर खांडव वन दहन प्रकरणात दोघांनी मिळून नागांचा संहार केलेला स्पष्ट दिसून येतो तोही इंद्रप्रस्थ आणि त्या जमिनी करिता! कृष्णार्जुनाची उदाहरणे दिली कारण ती पटकन सुचली म्हणून , एरव्ही जवळपास सर्वच सनातनी हिंदू साहित्यातील राजांची उदाहरणे थोड्याफार फरकाने देता येतील. शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” (रघुवंशम्–1.6) आणि इथेच खरे गमक आहे. संसार, प्रपंच कोठवर करत रहायचे ? ह्या सहा रिपूंच्या चक्रात किती आणि कसे खेळत रहायचे ह्याची नियम रीतसर घालून दिलेले आहेत ज्याला वर्णाश्रम व्यवस्था म्हणाले आहे. These people have made frameworks for everything. सुचत जाईल तसे लिहित जाईन . प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 14/08/2025 - 16:14
त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी.
सांसारिक मानव षडरिपुनी ग्रासलेला असतो. पण ते अगदी आवश्यक नाहीत, सांसारीक मानवासाठीसुद्धा आणि मुमुक्षुसाठीही.
काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार
संसारात (जन्मृत्युच्या जंजाळात) अडकून राहण्यासाठी पुनरुत्पादन कारणीभूत आहे, पर्यायाने काम, त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी काम ह्या रिपूवर विजय मिळवावा लागेल. (तसंही, फक्त वंश पुढे चालवायचा म्हणून एका अपत्याला जन्माला घालून थांबल पाहिजे, तसं न होता आमोदासाठी कामाच्या आहारी जाण होत)
क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते.
बरोबर उलट आहे, क्रोधामुळे निर्णय क्षमता हरवून बसते, क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय रियॅक्शन असते रिस्पॉन्स नसतो.
वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
वैयक्तिक मोह स्वार्थाला जन्म देतो त्यामुळे योग्य आणि यथार्थ प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल.
मत्सर ( ईर्ष्या) ह्यामुळे घेतलेला ध्यास उत्तमतेचा ध्यास नसतो, दुसऱ्याच्या आनंदाकडे किंवा क्षमतेकडे बघून येणाऱ्या नकारात्मकतेने घेतलेला ध्यास असतो.
मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल.
मदमस्त लीडरशीपमुळे अनागोंदी होईल. (उदा. विजय माल्या). - (मुमुक्षू) सोकाजी

कॉमी 13/08/2025 - 22:14
लेखातले स्त्रियांविषयक विचार निव्वळ TRP साठी लिहिलेले वाटले. उगी ओढून ताणून. तसा फारसा लेखाच्या मूळ विषयाशी संबंध नाही. आता स्त्रीला कामेच्छा जास्त का पुरुषाला ह्यावर परिच्छेद पाडण्याचे प्रयोजन समजले नाही. त्यामुळे इंटरनेट वर ज्याला रेजबेट म्हणतात तसले लिखाण वाटले. एक उदाहरण बघू-
१. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! (...)अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही. असो.
ह्या असो नंतर वरचा स्त्री का पुरुष जास्त कोण कामुक हा थ्रेड पूर्णपणे फेकून दिला आहे आणि मूळ टायटल वाला रिपू खाली काही वाक्यात संपवला. बरेचसे विचार हास्यास्पद आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात हे उदाहरण म्हणून घ्या.

विंजिनेर 13/08/2025 - 22:55
काय रे गोडबोल्या, स्त्री-पुरूषांच्या कामेच्छांची मोजणी करायला तू काय तिथे कंदील पकडून उभा होतास की काय? झालंच तर मत्सर - दोन-चार सासु-सुनेचे पिक्चर पाहून आणि चार दिवस न्युयॉर्क मध्ये राहुन हिरवा माज दाखवला की "मत्सराची भावना पुरूषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते" अश्या पिंका टाकायला मोकळा झालास वाट्टं? तीच गोष्ट लोभाची - तूला तुझ्या आयुष्यात असलेल्या (किंवा येतील अशी लोभी आशा असलेल्या) स्त्रियांची हवी ती हौस-मौज पुरवता पुरवता जेरीस आल्यानंतर इथे येऊन त्यांच्या नावाने खडे फोडतोस होय? शिवाय मत्सराचा संबंध कामुक समाधानाशी जोडतोयस - तुझं बोळा तुंबलेला दिसतोय - चिल मार, अंमळ प्रतिसाद आणि ट्यर्र्पीसाठी उगाच प्रक्षोभक आचरट लेख पाडायचा अन् काय. उगीच मिपावर लेख लिहून आपण योगी महर्षि असल्याचा आव आणू नकोस.

In reply to by विंजिनेर

धाग्यातील विषयांवर स्वतःची मते मांडायचे सोडुन , वैयक्तिक टिप्पणी , तीही खालच्या थराला जाऊन केलेली आहे स्पष्ट . हे मिसळपावच्या धोरणात बसत नाही. बाकी संपादक कारवाई करतील योग्य ती. तुम्ही तुमची संस्कृती दाखवुन दिलीत हे मात्र एक झाले ! २

In reply to by प्रसाद गोडबोले

विंजिनेर 13/08/2025 - 23:44
स्वतःची मते मांडायचे स्वतःची मते मांडायचे
प्रतिसादात वैयक्तिक सोडून इतरांची मतं मांडत नाही मी
खालच्या थराला जाऊन केलेली आहे
लेखाच्या थराला जाऊन टिप्प्णी केली असं म्हणायचंय का? माझ्या संस्कृती मिपावरच्या सवंग लेखाला शाब्दिक चपराक देऊन ठरण्याइतकी उथळ नाही रे....

सुबोध खरे 14/08/2025 - 10:08
विंजिनेर साहेब पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते मग कर्कश्य बोलावे काय निमित्य? वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही. षड्रिपू नसलेली माणसं एक तर संत असतात किंवा मनोरुग्ण. सामान्य माणूस नव्हे. आपण या दोन्हीत नाही तेंव्हा हा विषय काथ्याकुटासाठी उत्तम आहे. प्रगो यांची बरीचशी मते मला सुद्धा पटत नाहीत. त्यात अध्यात्म जास्त आहे आणि सत्य कमी आहे. त्याचे खंडन सहज करता येईल. पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरणे बरोबर नाही

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 14/08/2025 - 15:49
वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही.
डॉक, नक्की ना? - (युयुत्सूंच्या धाग्यांवरील प्रतिसादात सभ्यपणा शोधणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 14/08/2025 - 19:45
माझा असभ्य खालच्या पातळीचा प्रतिसाद ससंदर्भ दाखवून द्या हि नम्र विनंती आहे. याउलट त्यांनी अनेक वेळेस पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे तरी मी संयम च बाळगलेला आहे.

मारवा 17/08/2025 - 20:00
लोभ आणि मोह हे एकच आहेत त्यात धर्मशास्त्र लिहिणारे जे कोणी होते त्यांची पुनरुक्ती झालेली आहे असे नेहमी वाटते. फरक स्पष्ट स्वच्छ काटेकोर नाही. अर्थात काही फरक त्याने पडत नाही अजून एक विरोधाभास एकीकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे असा ही गौरव आहे. हाच काम रिपु म्हणजे शत्रू पण आहे आणि पुरुषार्थ ही आहे. एकूण धार्मिक साहित्यात विसंगती आणि पुनरुक्ती अतार्किकता असल्याशिवाय ते धर्मग्रंथ या पदाला प्राप्त होत नाही. दुसरे टिळक हे अत्यंत सनातनी मागास विचार करणारे होते हे त्यांनी त्यांच्या काळाच्या आसपास जगलेल्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरून घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्याहून रोचक.म्हणजे टिळक स्वतः खोत होते खोती संदर्भातील टिळकांची भूमिका तर चक्क स्वार्थी म्हणावी इतकी संकुचित होती. पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत असो अजून एक क्रोध काम यांना एक मोठे उत्क्रांतीमूल्य आहे. अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. सदरील काम क्रोध या मानवी नॉर्मल भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि नकारात्मक आहे . स्वधर्म यांनी टिळकांचा दाखवलेला दाखला अचूक आहे .

In reply to by मारवा

अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले. - उत्क्रांतीवाद हि थिअरी (मराठी शब्द?)आहे, सिद्धांत नाही. अशा बऱ्याच वेगवेगळ्या थिअरीज आहेत. शेतीचा शोध ८००० वर्षाम्पूर्वी लागला अशीसुद्धा एक थिअरी आहे. मास्क लावला कि कोविड पासून बचाव होतो अशीसुद्धा एक थिअरी सांगितली गेली होती. सिद्धांत proven असतो. उदा - पृथ्वी सुर्याभोवती फिरते.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/08/2025 - 19:35
"पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत" आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते. आणि तसे केल्यास आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात. मामला दंगलीपर्यंत जाऊ शकतो यातून लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंह, गांधीजी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून श्रीमती इंदिरा गांधी, श्री नरसिम्ह राव, अटळ श्री बिहारी वाजपेयी डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरेंद्र मोदी यांचीही सुटका झालेली नाही. आणि आपली रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष लहान आहे दाखवण्यातही अहमहमिका असते. आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. - श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 20/08/2025 - 20:43
हा खरा खरे डॉक्टरांचा प्रतिसाद. उमदा, अनुभवी, सर्वांगिण आणि लॉजिकल. आम्हाला हेच डॉक्टर चांगले माहितेत. . डॉक्टरसाहेब नका ते बरनॉल आणि इनो वाटप केंद्र चालवू. प्रतिसादातूनही उगा वस्सकन अंगावर आल्यासारखे वाटता. ;)

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 23/08/2025 - 09:52
मला असे प्रतिसाद देण्याची अजिबात हौस नाही. परंतु मिपावर तीन चार व्यक्तिमत्वे अशी आहेत कि ज्यांना कोणत्याही गोष्टीत मोदीद्वेष आणल्याशिवाय जेवण जात नाही. अशा लोकांना केवळ अशीच भाषा समजते. क्लिंटन हे फार सहनशीलतेने अशा लोकांच्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तरे देत असतात. पण हे लोक सुधारण्यातले नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण people will accept what they want to accept. कालच एक बाई आल्या होत्या ज्यांना पाळीचा त्रास होता. मागच्या डिसेंबर मध्ये आपल्याला कर्करोग होण्याची बरीच शक्यता आहे असे जीव तोडून सांगितले असताना सुद्धा त्या गेले ८ महिने होमिओपॅथीची औषधे घेत होत्या त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून काल परत आल्या. आता जी शक्यता होती ती वस्तुस्थितीत रूपांतरित झालेली आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. कालही त्यांना परत स्त्रीरोगतज्ञाकडे जायला सांगितले आहे. पुढचे त्यांच्या नशिबावर ! इतके स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगूनही लोक ऐकत नाहीत याची आता सवय झाली आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते. यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते.
आयडी हॅक झाला की काय.. =)) -दिलीप बिरुटे
# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु. आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. १. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो.

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

मन ·

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

मार्गी ·

ramjya 31/07/2025 - 11:40
मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे. दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

मार्गी 02/08/2025 - 11:43
सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.

ramjya 31/07/2025 - 11:40
मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे. दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

मार्गी 02/08/2025 - 11:43
सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

लालची कावळा आणी नाचण

कर्नलतपस्वी ·
लालची कावळा आणी नाचण ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते. "कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था" मनोहर कविश्वर यांच्या गीता प्रमाणे, सैन्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नाव मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर बापाचे कर्तव्य पुर्ण करत मुलींची लग्ने केली.जगरहाटी,नातवंड झाली.

भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0

प्रसाद गोडबोले ·

पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. 21/07/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti 21/07/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 22/07/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी 21/07/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw

पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. 21/07/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti 21/07/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 22/07/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी 21/07/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0 ______ #स्वांत:सुखाय् #मनुवादी सनातनी लेखन ________ काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो. बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे. हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक.

माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

माहितगार ·

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.