ही कथा दुर्दैवाने काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा वास्तवाशी बराच संबंध आहे. तो लागल्यास निव्वळ योगायोग समजू नये.
आनंदनगरात क्रिकेटची मॅच रंगात आली होती. गणेश ,सुर्याजी विरुद्ध अहमद , सिद्धार्थ असे गट पडले होते.
अहमदची विकेट आधीच पडली होती. बॅटिंग करायला सिद्दार्थ उभा होता. या पठ्याला बॅटिंग जमायचीच नाही. या चौघात तो लहान होता. जी अवजड बॅट त्याला उचलायचाच कष्ट पडायचे त्याने खेळणे खुपच लांबची गोष्ट !
गोलंदाजीसाठी सुर्याजी उभा होता. आपल्या खेळीतून त्याने अहमदच्या टिमसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले होते.