मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

राजाराम सीताराम..... आयएमएतले दिवस भाग २ - मसुरी नाइट

रणजित चितळे ·

शिल्पा ब 01/09/2011 - 12:01
छान वर्णन आहे. इतके रॅगिंग होत असेल असे वाटले नव्हते. सहज मनात आले - मुली कीती होत्या तुमच्या बॅचमधे? त्यांच्यावर पण असे रॅगिंग होते का? सिनीयर मुली करतात की मुले पण?

In reply to by शिल्पा ब

रणजित चितळे 02/09/2011 - 09:12
आय एम ए मुलीं साठी खुले नाही. ज्या मुली सैन्यात येतात त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी चेन्नाइ मधून पास आऊट होतात. तेथले शिक्षणाचे (रॅगिंग वगैरे मुलीं साठी शिथिल आहे).

सहज 01/09/2011 - 12:21
युद्धसरावाचे वर्णन, मसुरी नाईट सगळे चित्र डोळ्यासमोर उभे केलेत. उत्तम लेखमाला.

In reply to by सहज

हेच म्हणतो... शिवाय पळून जाणार्‍या कॅडेट्सच्या मनस्थितीचे वर्णन आवडले... मी गेलोच नसतो पण समजा गेलो असतो तर किती दिवसांत पळून आलो असतो याचा विचार करतोय... :)

स्मिता. 01/09/2011 - 17:06
हा भाग बर्‍याच दिवसांनी आला. हा ही छानच. पुढचा भाग लवकर येवू द्या.

रेवती 01/09/2011 - 19:56
बरेच दिवसांनी लेखन आले. खूप छान साधं लिहिता तुम्ही! पाहिल्या काही दिवसातच आपला आत्मविश्वास साफ मोडून काढला जातो एकदम ओळखीचं वाटलं...........हा हा हा.......माझ्या वडिलांचा आवडता प्रकार आहे हा.

Dhananjay Borgaonkar 02/09/2011 - 16:29
सर हा भाग देखील नेहमीप्रमाणेच भारी झाला आहे. मजा येत आहे वाचायला. मसुरी नाईटच चित्र डोळ्यासमोर उभ केलत. विनंती - सर ही लेखमाला झाली की कारगिलची लेखमाला घ्या लिहायला. नक्की आवडेल वाचायला.

जाई. 02/09/2011 - 23:03
आयएमएचे वर्णन वाचताना एकदम त्या वातावरणात गेल्यासारखे वाटले. अतिशय ताकदपूर्ण लेखन. शाळेतल्या MCCच्या तासांची आठवण झाली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

शिल्पा ब 01/09/2011 - 12:01
छान वर्णन आहे. इतके रॅगिंग होत असेल असे वाटले नव्हते. सहज मनात आले - मुली कीती होत्या तुमच्या बॅचमधे? त्यांच्यावर पण असे रॅगिंग होते का? सिनीयर मुली करतात की मुले पण?

In reply to by शिल्पा ब

रणजित चितळे 02/09/2011 - 09:12
आय एम ए मुलीं साठी खुले नाही. ज्या मुली सैन्यात येतात त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी चेन्नाइ मधून पास आऊट होतात. तेथले शिक्षणाचे (रॅगिंग वगैरे मुलीं साठी शिथिल आहे).

सहज 01/09/2011 - 12:21
युद्धसरावाचे वर्णन, मसुरी नाईट सगळे चित्र डोळ्यासमोर उभे केलेत. उत्तम लेखमाला.

In reply to by सहज

हेच म्हणतो... शिवाय पळून जाणार्‍या कॅडेट्सच्या मनस्थितीचे वर्णन आवडले... मी गेलोच नसतो पण समजा गेलो असतो तर किती दिवसांत पळून आलो असतो याचा विचार करतोय... :)

स्मिता. 01/09/2011 - 17:06
हा भाग बर्‍याच दिवसांनी आला. हा ही छानच. पुढचा भाग लवकर येवू द्या.

रेवती 01/09/2011 - 19:56
बरेच दिवसांनी लेखन आले. खूप छान साधं लिहिता तुम्ही! पाहिल्या काही दिवसातच आपला आत्मविश्वास साफ मोडून काढला जातो एकदम ओळखीचं वाटलं...........हा हा हा.......माझ्या वडिलांचा आवडता प्रकार आहे हा.

Dhananjay Borgaonkar 02/09/2011 - 16:29
सर हा भाग देखील नेहमीप्रमाणेच भारी झाला आहे. मजा येत आहे वाचायला. मसुरी नाईटच चित्र डोळ्यासमोर उभ केलत. विनंती - सर ही लेखमाला झाली की कारगिलची लेखमाला घ्या लिहायला. नक्की आवडेल वाचायला.

जाई. 02/09/2011 - 23:03
आयएमएचे वर्णन वाचताना एकदम त्या वातावरणात गेल्यासारखे वाटले. अतिशय ताकदपूर्ण लेखन. शाळेतल्या MCCच्या तासांची आठवण झाली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
3

फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी

शुचि ·

प्रास 30/08/2011 - 21:10
मैत्रीणीबरोबर झालेल्या डायरेक्ट टॉकच्या अनुभवाचं प्रकटन आवडलं. समजून उमजून "फेसबूक" खातं सुरू न केल्याने बाकी गोष्टींबद्दल काही लिहू शकत नाही. फेसबूकात नसलेला :-)

शुचि, फेसबुकावर खातं असावं का नसावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला फेसबुकावरून मिळालेली ही विनोदी लेखाची लिंक पहा. npr ची वेबसाईट मी इतःपर पाहिली नसती.

पैसा 30/08/2011 - 21:56
फेसबुकवर खतं असावं की नाही हा प्रत्येकाचा निर्णय आहे. पण फेसबुक नाही तर गुगल प्लस, ते नाही तर ऑर्कुट, फार काय मिसळपाव हे सुद्धा त्यांचंच भावंड आहे ना! आता घरबसल्या अनेक वेबसाईट्स उपलब्ध असतात म्हणून आपल्याला व्यसन लागलंय असं लक्षात येऊ शकतं. पण ज्या क्षणी व्यसन आहे हे लक्षात येईल, तेव्हाच त्यापासून लांब कसं रहावं हेही लक्षात येऊ लागेल. खूप लांब अंतरावर रहाणार्‍या सुहृदांच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडी कळतात, हा फेसबुकचा फायदाच आहे. जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही! फेसबुकवर वेळ घालवला म्हणून गिल्टी वाटायचं कारण नाही, (कारण घरची टेन्शन्स विसरून इतरांबरोबर टाईमपास करणे ही पण प्रत्येकाची गरज आहेच!) थोडं सीरीयसली सांगायचं तर घरातल्या प्रत्येकाला एक आपली स्वतःची अशी "स्पेस" असणं आवश्यकच आहे. ती नसेल तर नात्यातली गुंतागुंत वाढू शकते. तू घरात अजून लाडू करतेयस ना? म्हणजे तुझं घराकडे पण लक्ष आहेच! अगदीच काही तू समांतर जगात गेलेली नाहीस. झालं तर! थोडे लाडू इकडे पाठव बघू! (फोटो अपलोड केलेस तरी पुरे, आम्हाला कळेल कसे झालेत ते!)

In reply to by पैसा

जाई. 31/08/2011 - 00:00
+१ फेसबुकमुळे ज्या मित्रमैत्रिणीशी नियमित संपर्क साधता येत नाही वा रोज भेटणे शक्य नसते त्यांच्या टचमध्ये राहणे शक्य होते. फेसबुकच कितपत व्यसन लावून घ्यायच हा ज्याचा त्याचा प्रश्न. अति झालच तर a/c deactivate करायचा पर्याय असतोच.

In reply to by आत्मशून्य

शुचि 30/08/2011 - 22:46
आत्मशून्य आपल्याला काय आवडले नाही ते मनमोकळेपणाने लिहावे. आपल्या सूचवण्या योग्य रीतीने घेतल्या जातील याची खात्री असावी.

चित्रा 30/08/2011 - 22:53
"शुचि, फेसबुक हे भावनिक गरजा अप्रत्यक्षरीतीने पूर्ण करण्याचे साधन आहे/असावे याच्याशी मी तरी असहमत आहे. कारण हे म्हणजे तुम्ही एक समांतर आयुष्य जगू लागता असे मला दुर्दैवाने म्हणावे लागेल." समांतर आयुष्य कसे? प्रत्यक्ष आयुष्यात हे एक विश्व छेदून जाणारे. एवढेच म्हणता येईल. कधी ते प्रत्यक्ष भेट होते, कधी होत नाही. नीलूच्या गरजा काही दहा-पंधरा लोकांकडून पूर्ण होतात तर 'मी' च्या गरजा काही शेकडा लोकांनी पूर्ण होतात हा फरक आहे. कदाचित मी ला लोकांबद्दल 'क्युरिऑसिटी' असेल, नीलूला त्याची गरजच वाटत नसेल. मुळातच असलेला हा फरक प्रत्यक्ष आयुष्यातच आहे. प्रत्यक्ष आयुष्य नसले तर समांतर किंवा छेद देणारी कितीही विश्वे असली तरी काय फरक पडतो?! तेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात काय घडते आहे हे महत्त्वाचे. याच्याशी संबंध नाही, किंवा असला तरी लांबूनच, पण यावरून दिवंगत गुणी अभिनेत्री रसिका जोशी यांचे गेल्या वर्षी पाहिलेले 'व्हाईट लिली आणि नाईट रायडर' आठवले.

मुक्तसुनीत 30/08/2011 - 23:31
हा मला (पुन्हा एकदा) व्यक्तीगत निवडीचा मामला वाटतो. माझ्या ओळखीच्या काही व्यक्तींना ब्लॉगिंग पासून सोशल नेटवर्किंगपर्यंत आणि डिस्कशन फोरमपासून ऑनलाईन कॉन्व्हरसेशन्स पर्यंत सर्व काही अनावश्यक वाटते. काही लोकांना ते ठराविक लोक आणि विषया पुरते मर्यादित ठेवावेसे वाटते. काहीना ते अतिशय महत्त्वाचे वाटते. काहीना ते रंजक वाटते परंतु सहभागी व्हावेसे वाटत नाही. यापैकी कुणी इतरांच्या सहभागाबद्दल किंवा सहभागाच्या अभावाबद्दल , गरज वाटण्याबद्दल किंवा गरज न वाटण्याबद्दल कमेंट्स करणं मला मजेशीर वाटतं. हे म्हणजे तुला अमुक भाजी अमुक इतकीच का आवडते किंवा तू शाकाहारीच का आहेस किंवा का नाहीस असं म्हण्टल्यासारखं आहे.

धनंजय 30/08/2011 - 23:32
चांगले ललित लिखाण आहे. त्यातील मुद्देही विचार करण्यासारखे.
नीलूने तिचा मोर्चा आता चहाकडून लाडवाकडे वळवला होता.
मुद्दा बदलण्याकरिता आणि भावना बदलण्याकरिता चांगले तंत्र! - - - (प्रतिक्रियांपैकी "अमुकतमुक व्यक्तिगत मामला आहे" हे समजले नाही. व्यक्ती खाद्य म्हणून तोंडात काय टाकते, हासुद्धा व्यक्तिगत मामला आहे. तरी खाद्यपदार्थांबाबत कितीतरी गमतीदार गप्पागोष्टी मी ऐकलेल्या आहेत. मिसळपावावर पाककृतींचा विभाग तर मला फार आवडतो. "मी अमुक प्रकारे कोलंबी शिजवतो", "त्यापेक्षा तमुक प्रकारे शिजवलेस, तर स्वाद छान येईल..." वगैरे चर्चा तर अगदी मस्त चालतात. फेसबुकवर खाते असणे हा व्यक्तिगत मामला असण्याचेही पूर्णपणे मान्य. पण या तथ्याचा या चर्चेत संदर्भ समजला नाही. "मी" पात्राशी "नीलिमा" पात्राने याविषयी बोलायलाच नको होते, असा संदर्भ आहे काय? पण मग व्यक्तिगत->->पासून->->बोलायला नको येथपर्यंत साखळी नीट जोडायला हवी.)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 30/08/2011 - 23:39
नीलूचे पात्र फेसबुकबद्दल मतभिन्नताच व्यक्त करत नाही तर निवेदिकेच्या निवडीवर चांगलेच खमंग असे जज्जमेंट देते. ही गरज कशी लेजिटिमेट गरजच नाही असंही ती वारंवार सांगते. जेव्हा असं वर्तन दिसतं तेव्हा आपापल्या निवडीचं सार्वभौमत्व अधोरेखित करणं गरजेचं बनतं. म्हणूनच वैयक्तिक आवडीचा उल्लेख.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 31/08/2011 - 00:36
म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय? पण खमंग जज्जमेंटांविरोधात वाद घालणे, आणि वारंवार "गप्प बस" म्हणण्याऐवजी वाद घालणे, हा निवेदिकेचा व्यक्तिगत स्वभाव असू शकेल. तिच्या व्यक्तिगत पातळीपेक्षा जज्जमेंटची वारंवारिता फार झाल्यानंतर निवेदिका शेवटी म्हणते :
मी देखील या न संपणार्‍या वादसत्राला कंटाळले होते. "बरं समांतर आयुष्य तर समांतर आयुष्य. एकटेपणापेक्षा ते बरे." म्हणून मी आमची भेट आवरती घेतली.
म्हणजे बघा. वाद आवरता घेतला पण सपशेल पराभव वगैरे नाही. आत्मसन्मान राखून वाद संपवला, असे मला वाटते. निवेदिका नीलिमाबरोबर पुन्हा चहाफराळ करेल, किंवा तेव्हा कुठल्या विषयांबाबत बोलेल, त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. (कथन संपल्यामुळे.) निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय? सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे. माझ्या दृष्टीने हे ठीक आहे. निवेदिकेने निवेदन केले, तर वाचकाने जज्जमेंट करून "नीलिमेशी वागणे बदल" असा सल्ला देण्याबाबत माझी कुठलीच आडकाठी नाही :-)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 31/08/2011 - 00:48
म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय? प्रतिसादक कुणालाही कुठलाही मुद्दा बोलू नकोस असा सल्ला देत नाहीत. प्रतिसादकांचे म्हणणे इतकेच की ज्याला त्याला आपापली पर्सनल स्पेस मिळण्याचा हक्क आहे. निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला. निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय? कुणीही कुणाला "हाताळावे" यांप्रती प्रतिसादक काही म्हणतो आहे असे प्रतिसादकाला स्मरत नाही. काही मुद्द्यांचा प्रतिवाद कसा केला जाऊ शकेल याबाबते प्रतिसादकाने आपले चिमूटभर म्हणणे मांडले. ते काय होते ते उपरोक्त विवेचनात आले असे प्रतिसादकाला वाटते. सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे. प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.

In reply to by मुक्तसुनीत

या सगळ्याबरोबरच, प्रतिसादकांनी दिलेले सल्ले, नीलू-निवेदिकेच्या वादातले इतर काही मुद्दे जे निवेदिकेला तेव्हा महत्त्वाचे वाटले नाहीत/सुचले नाहीत ही सुद्धा त्यांची व्यक्तिगत मतंच आहेत. कुणी फार ठामपणे मांडत असेल तरीही निवेदिकेने तिचे निर्णय स्वतःच्या मनानुसार घ्यावेत ही एक सूचना त्यात आहे.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 31/08/2011 - 02:05
(माझ्या मूळ प्रश्नात "प्रतिसादक" अनेकवचनात आहे, कारण अनेक प्रतिसादकांनी "व्यक्तिगत" मामला सांगितला आहे. एकाच प्रतिसादकाला छद्मीपणे त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता. खरेच.) - - - "हक्क" म्हणजे काय? बहुधा बजावता येतात, अशाच गोष्टींना "हक्क" संबोधण्यात काही हशील आहे. "बजावणे" म्हणजे हक्काचे उल्लंघन झाल्यास ते उल्लंघन निस्तरणे, होय. नाहीतर "अमुकतमुक हक्क आहे" असे म्हणण्याचे प्रयोजनच नसते. (It is not a right if there is no redress.) - - -
निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला.
कुठल्याही वैयक्तिक आवडीनिवडीबाबत गप्पा झाल्या म्हणजे पर्सनल स्पेसच्या हक्कांचे उल्लंघन होत नसावे. कारण प्रत्येक आवडीनिवडीबाबत चर्चेत अशी शंका उपस्थित करण्याचा व्यवहार समाजात दिसत नाही. मिसळपावावरील पाककृती विभागाचे उदाहरण दिलेलेच आहे. तुमचा प्रथम प्रतिसाद अधिक समर्पक स्पष्टीकरण देतो : "खरमरीत.. वारंवार... जज्जमेंट." अशा प्रसंगीच समाजात काही चुकल्याबद्दल बोलणे होते. "खरमरीत... वारंवार... आवडीनिवडीबाबत जज्जमेंट म्हणजे हक्कांचा भंग आहे काय?" असा तुमचा पूर्ण प्रश्न असावा. या प्रश्नाची ढोबळमानाने दोन उत्तरे संभवतात. आणि नेमके काय ते उत्तर निवेदिकाच देऊ शकेल. (अ) "होय, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत आहे." (आ) "नाही, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत नाही." या दोन उत्तरांपैकी जर पहिले उत्तर निवेदिका देईल, तर निवेदिकेच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. निवेदिकाच्या हक्काचे उल्लंघन होऊ नये, असे मला तरी वाटते. तुम्हालाही वाटते. तर हक्कभंग निस्तरण्याबद्दल कारवाई व्हावी. कोणीतरी करावी. कोणी करावी? (मी असे मानले, की निवेदिकेने कारवाई करावी. मला वाटले, की तुम्हीसुद्धा तेच म्हणत होता. पण निवेदिकेला सल्ला दिलेला नाही, असे वर म्हटलेले आहे. पण मग हक्काच्या भंगाबद्दल शंकानिरसन झाल्यावर नेमके काय करावे, हे कोडे आहे. हक्काच्या भंगाबद्दल काही करायचेच नसेल, तर शंका काय कामाची?)
प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.
निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंके...
एक मैत्रीण दुसर्‍या मैत्रिणीच्या हक्कांचे उल्लंघन करते, ही शंका हे त्यांच्या मैत्रीविषयी (शंकेसह) जज्जमेंट आहे, असे मी ढोबळपणे मानले. मैत्री आणि एकमेकांच्या हक्कांची चाड असणे या गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्याचा व्यवहार खूपदा दिसतो. हक्कासह हित बघणारे ते मित्र असा व्यवहार करून मला आजवर फारच सोय झालेली आहे. पण कदाचित या ठिकाणी असा संबंध अध्याहृत धरणे योग्य नव्हे. तुम्ही स्पष्टच म्हणता, तर या प्रसंगी ते अध्याहृत टाळतो, आणि मानतो, की येथे निलू आणि निवेदिका यांच्या मैत्रीबाबत जज्जमेंट नाही. परंतु हे अध्याहृत कधी टाळायचे, कधी घ्यायचे, त्याबद्दल मला समाजातील वावरातून नीट कल्पना येत नाही, अशी कबुली देतो. - - - पुन्हा शंका : व्यक्तिगत नेमके काय आहे? (अ) फेसबुकवर खाते असणे/नसणे, (आ) त्याविषयी मैत्रिणी-मैत्रिणींनी एकमेकांच्या उदाहरणातून साधकबाधक गप्पाही न मारणे, की (इ) गप्पा मारता-मारता अति-वारंवार वादविवादाने पर्सनल स्पेसचे त्रासदायक उल्लंघन न करणे? पर्सनल स्पेसचा मुद्दा (काही स्पष्टीकरणांसकट*) समजला, मान्य आहे. आधीपासून मान्य होता. पण तो सुरुवातीच्या संक्षित "व्यक्तिगत" प्रतिसादांत उल्लेखलेलाच नव्हता. उलट संक्षिप्त प्रतिसादांत फेसबुक खाते असणे/नसणे हेच व्यक्तिगत म्हणून सांगितलेले आहे. ते अजूनही समजले नाही. - - - *(उगीच विस्तार नको. पण हस्तांदोलन करणे, सलामीचे उद्गार उगाचच नव्हे तर प्रामाणिकपणे बोलणे, कुणी घसरून पडल्यास त्यांना हात धरून उठण्यास मदत करणे, आपण पडल्यास दुसर्‍याला मदतीला बोलावणे... वगैरे प्रकार म्हणजे लोकांच्या पर्सनल स्पेसच्या आत शिरत असूनही त्यांच्या हक्काचे उल्लंघन मानत नाही.)

In reply to by धनंजय

शुचि 31/08/2011 - 02:11
मी धनंजय यांच्याशी सहमत आहे - माझ्या पर्सनल स्पेस चे उल्लंघन झालेले नाही कारण निलूशी माझे लग्न झालेले नाही की ती माझ्यावर दबाव आणू शकेल. मी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे - आपले फेसबुक इंटरॅक्शन ही वैयक्तीक आवडीनिवडीचीच गोष्ट आहे.

प्रियाली 30/08/2011 - 23:34
सर्वप्रथम वादसत्र सुरू का व्हावे असा प्रश्न पडतो. नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो. व्यसनी लोक व्यसनांच्या मागची अनेक कारणे देतात. दारू पिऊन दु:ख हलकं होते, सिग्रेट ओढून डोकं हलकं होतं, ड्रग्ज घेतल्यावर कूल वाटतं इ. इ. फेबु हे एकदा व्यसन आहे हे मान्य केले की त्याचे वरवरचे फायदे सोडले तर खोलवरचे दुष्परिणाम गर्तेत नेण्यास कारणही ठरू शकतात हे ही मान्य करावे लागेल. सोशल गॅदरिंगला एखादा ग्लास हातात घेऊन फिरणारे आणि रोज संध्याकाळी ग्लास रिचवल्याशिवाय राहू न शकणारे यांत फरक आहे.
"शुचि खरं सांग दिवसांतले किती तास तू फेसबुकवर पडीक असतेस? रात्री मधेच उठलीस तर तू फेसबुक रिफ्रेश करतेस असं तूच म्हणतेस मग हे बरोबर का?" नीलू न्यायाधीशी भूमिकेत शिरल्याने मीदेखील आता डिवचले गेले होते - "वेल तुझे म्हणणे खरे आहे. माझ्याकरता फेसबुक हे व्यसन होऊन बसले आहे पण त्यामागचं कारण तर समजाऊन घे"
प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनांची कारणे देऊन सहानुभूती मिळवण्यास उत्सुक असतो आणि आपण जी कारणे देतो ती सर्व वॅलिड कारणे आहेत असा समजही असतो. व्यसनात बुडून राहायचे आहे असेच ठरवले असेल तर अशा व्यक्तींना पुढे सांगण्यात काही फायदा नसतो कारण त्यांच्याकडे कारणांची यादी तयार असते. शेवटी नीलूची मैत्री महत्त्वाची की फेबु हे ठरवणे निवेदिकेवर आहे. असो. वर पैसा यांची एक प्रतिक्रिया आहे त्याबद्दल दोन पैशे ;)
जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही!
फरक आहे आणि हा फरक नवरा आपल्या गैरहजेरीत ऑफिसातल्या बाईबरोबर फिरतो किंवा आपला टीनेजर मुलगा अचानक २५-३५ च्या बाईचा घनिष्ठ मित्र बनतो या प्रकारचा आहे. या प्रकारांचा जोडीदारांना किंवा पालकांना त्रास होऊ शकणे शक्य आहे. फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या घरातील संख्या पाहिली की एखाद्या व्यक्तीला इतके मित्र मैत्रिणी कशा असू शकतील असा प्रश्न पडतो. बरे असतील तर यांच्याशी मैत्री करण्यास वेळ आणि एनर्जी कशी मिळते असा पुढला प्रश्न पडतो. याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही. मित्रांचे मित्र किंवा मित्रांच्या मित्रांचे मित्र वगैरे वगैरे करत तुम्ही अनोळखी लोकांशी संबंध वाढवून घेत असाल आणि कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही हे घडूच शकते पण फेबुचा स्कोप फार मोठा वाटतो.

In reply to by प्रियाली

शुचि 31/08/2011 - 01:05
>> फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या ....... याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही.>> हा लेख जरूर वाचावा. लिंकड इन या साईट्बद्दल हा लेख असून यात हे म्हटले आहे की लिंकड इन वर ५०० किंवा अधिक कॉन्टॅक्ट असणे म्हणजे तुमचे काहीतरी चुकते आहे. The perception that having 500+ connections on LinkedIn means that you are well connected is false. In fact, it hurts your credibility factor. अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे. >> कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे >> ही काळजी समजण्यासारखीच आहे. >> नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो. >> प्रियाली, आपले नीरीक्षण आचूक आहे.

In reply to by शुचि

प्रियाली 31/08/2011 - 01:31
अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे.
हाच न्याय फेबुवरही लावावा लागतो. इंटरव्यूला येणार्‍या कँडिडेटची छाननी फेबुवर जाऊन करणारा सुपरवायजर मला ठाऊक आहे. ;) ५००-१००० मित्र मैत्रिणी असणारे महाभाग कामं कधी करणार असा निरागस प्रश्न त्याला पडत असे.

मला लेख आवडला आणि लेखाचा विषयही आवडता. बर्‍याच महिन्यांपुर्वी मी माझ्या ब्लॉग वर याविषयी माझे मत मांडले होते ते इथे देत आहे. ================================================================== ""मी येत्या ३ ते ४ महिन्यांमधे Facebook, Orkut यावरिल माझे account बंद करणार आहे", असे मी जेंव्हा म्हणालो, तेंव्हा माझे मित्र "काय गावंढळ आहे" अशा चेहर्‍याने माझ्याकडे पाहु लागले. पण आपण कधी खरच विचार केला आहे का, कि आपण Facebook आणि Orkut किंवा कुठलीही Social Networking ची Site वापरुन आपल्या मित्राबरोबर खरोखर संवाद होतो का? Facebook Orkut वरुन आपल्याला मित्रांच्या बित्तबातम्या कळतात पण संवाद होत नाही. आधी आधी Orkut खुप छान वाटले होते, तेंव्हा Facebook भारतात एवढे प्रचलित नव्हते. सध्या एक दोन वर्षापासुन भारतात Facebook प्रचलित होत आहे. भारतात म्हणजे भारताच्या मुख्य शहरात. एकदा आमच्या ओळखीच्या एका घरी गेलो असता तिथे एक लहान मुलगी आपल्या बाबाला संगणक Login करुन द्यायचा हट्ट करत होती, मला वाटल काही गेम वैगरे खेळायची असेल, पण तिला तिचे Orkut पहायचे होते. वय १२ ते १४ वर्षे. हा Social Networking चालु करण्याचा प्रवाशी interesting असतो. मी Orkut आजपासुन ६ वर्षापुर्वी वापरायला सुरु केले. तेंव्हा ते नवीन आले होते. आणि Google ची मोहिनी होतिच. पण मी Social Networking का वापरायला सुरु केले याचे उत्तर अजुनही माझ्या जवळ नाही. उत्सुकता हे उत्तर असु शकते. नंतर कॉलेज मधिल सर्वच Orkut वर आल्यावर "Scrap" टाक हा परवलीचा शब्द बनला. जर आपण Orkut वर नाही म्हणजे काही तरी चुकते आहे असे काहीसे Peer Pressure वाढिला लागते. आणि मग एकदा Orkut वर आलो की जुने मित्र शोधण्याची मोहिम सुरु होते. त्यातुनच कोणाचे किति मित्र आहेत यावर शर्यत सुरु होते. भले ३ वर्षे एखाद्या मित्राला भेटले नसाल पण Orkut वर त्याला Add करुन ठेवणार. मग वेगवेगळ्या राजकिय, बौद्धिक, सामाजिक, साहित्यिक community join करणे हेही सुरु होते. असे होता होता यासर्वांचा पसारा एवढा वाढतो की कधी कधी ज्याचे updates कळायला पाहिजे ते कळतच नाही. नुसता गोंधळ. नीट समजाऊन, वेळ देऊन काळजीपुर्वक पाहिले तर सर्व updates कळु शकतात पण मग तेवढा वेळ देवा लागतो. त्यात लोकांना Social Networking Site वर कसे वागावे याचेही भान नसते, आपली व्यक्तिगत माहिती बिंधास्तपणे site टाकतात. खासगी निरोप सार्वजनिक फोरम मधे टाकतात. कधी कधी ते वाचुन फार अवघडल्यासारखे वाटते. हे सर्व काही कमी होते म्हणुन आता Mafia आणि फार्मविले सारखे online गेम आले आहेत. त्यात किती वेळ जातो याची तर गणतीच नाही. मला माहित आहे कि फार नकारार्थी बोलतो आहे, पण सकारात्मक बाजु तर बहुतेक लोकांना माहित आहे म्हणुनच तर दिवसेंदिवस Social Networking Sites चे मेंबर्स वाढत आहेत. शेवटी "सौ बातों की एक बात". "अति तेथे माती"

स्पंदना 31/08/2011 - 06:56
चर्चा अतिशय सुरेख, अन माहिती पुर्ण. शेवटी ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज नाही का? मी तरी निलु होउन दुसर्‍याला जाब ही नाही विचारणार, अन आली एखादी निलु विचाराय्ला अन जर तिला माझ्या लेव्हलन विचार नाही करता आला, तर चर्चा ही नाही वाढवणार.

नितिन थत्ते 31/08/2011 - 07:49
५०० फ्रेंड्सबद्दल सहमत. अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो. श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही. फेबु/ऑर्कुटवर फ्रेण्ड लिस्ट मुळे सुरक्षा यंत्रणांच्या दुर्बिणीखाली येण्याची शक्यताही लक्षात घ्यायला हवी.

In reply to by नितिन थत्ते

अर्धवट 31/08/2011 - 10:24
>>श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही. केवळ तुम्ही मानव आहात ही समानता तुम्ही मानत नाही का. ;)

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 31/08/2011 - 15:02
अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो.
हम्म! फेबुवर माझे अकाउंट हे माझे मोठ्ठे कुटुंब (माहेर-सासर), माझे शाळामित्र, लहानपणीचे सवंगडी आणि कॉलेज मित्रमैत्रिणी यांना बांधून ठेवण्यासाठी आहे. या खेरीज काही मोजकी मिपा-उपक्रमी मंडळी आहेत. त्यांची निवड कशी करायची हे मी ठरवते. मला फेबुवर जाऊन काहीतरी कॉमेंट्स लिहिण्यापेक्षा "लाइक"चे बटण दाबणे आवडते. त्यामुळे आपण संवादात खेचले जात नाही आणि संपर्कही राहतो. मी कोणाही नेटकराला आतापर्यंत फ्रेंडरिक्वेस्ट पाठवलेली नाही पण अनेकांच्या रिक्वेस्ट्स नाकारल्या आहेत कारण नाकारून त्यांचा अपमान करायचा नाही तर त्यासाठी मी माझे खाते तयार केलेले नाही. ओळखदेख नसताना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार्‍या मंडळींचे मला आश्चर्य वाटते. मिपावरील एका काकांनी (जे मला ओळखत नाहीत) मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती की "मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही काही मिपाकरांच्या फ्रेंडलिस्टमध्ये दिसलात म्हणून मीही रिक्वेस्ट पाठवली." मी इमाने इतबारे ती डिनाय केली. :) दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता. परंतु अशा लोकांची मानसिकता मला कळत नाही हे खरे.
श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही.
श्याम मानव हे पब्लिक फिगर आहेत त्यांना आपले किती फॅन फॉलोइंग आहे हे दाखवण्यात रुची असावी. अशाच प्रकारची गर्दी मी कविता महाजन वगैरेंच्या खात्यावर पाहिली आहे. असो, खाली परा म्हणतो
सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही.
याच्याशी १००% सहमत आहे. मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.

In reply to by प्रियाली

मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.
हे मी सांगायला विसरलो. तुमचे खाते असो वा नसो त्याचे जाहिरातीकरण करणे टाळा. मिपावरील एक जेष्ट सदस्यांना नुकताच फेसबुकवर असा अनुभव आला आहे. त्यांच्या नावाने खाते उघडून काही विचित्र टिपण्या करणे, अश्लाघ्य मजकूर लिहीणे असे प्रकार झाले. तेंव्हा प्रियालीतै म्हणते तशी थोडी सावधगिरी बाळगाच बाळगा.
दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता.
ह्यात विनोद नाहीचे तै. ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते ;) अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच. अनक्नोन पर्सनला अ‍ॅड करण्यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुमच्या खाजगी फोटोंचा त्याला मिळणार अ‍ॅसेस. ह्यातून पुढे बर्‍याचदा नको ते प्रसंग घडतात आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते. शक्यतो (निदान स्त्रीयांनी तरी) आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देणे टाळावेच. मधे फेसबुक वरती फ्रेंडस कॉन्टेक्ट बुकच्या नावाखाली आपण अ‍ॅड केलेल्या सर्वच फ्रेंडसचे फोन नंबर आपण सहजपणे बघू शकत होतो, त्यांनी ते पर्सनल ठेवलेले असले तरी. अजुनही हा बग अध्ये मध्ये कार्यरत होतोच. म्हणूनच योग्य ती काळजी घ्यायलाच हवी हे नक्की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रियाली 31/08/2011 - 17:11
ह्यात विनोद नाहीचे तै. ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच.
अगदी अगदी! १०००% बरोब्बर! विनोद असा की मला या गोष्टी म्हैतीच नाहीत असा या गृहस्थांचा ग्रह झाला असेल काय या कल्पनेने हसू आले. ;)

In reply to by प्रियाली

अशा लोकांना इग्नोर फिल्टरला टाकायचे. त्यांनी कितीही प्रयत्न केले, सर्च केले तरी त्यांना ना तुझे प्रोफाईल दिसते ना तुझी अपडेटस. तुमच्या कॉमन फ्रेंडसच्या लिस्ट मध्ये सुद्धा त्यांना तुझे प्रोफाईल दिसत नाही. बरं त्यांनी तुला रिक्वेस्ट पाठवलेली असल्याने तुला मात्र बसल्याजागी त्यांची अपडेटस दिसत असतात ;) असा मस्त तडफडाट होतो ना समोरच्या माणसाचा.

शिल्पा ब 31/08/2011 - 10:14
खरं सांगू का... माझे आधी ओर्कुट किंवा फेसबुक किंवा माय स्पेस वगैरे अकौंट नव्हते. माय स्पेसवर अजूनही नाही. ओर्कुटवर एकदोन ओळखीच्या लोकांनी फारच request पाठवल्या म्हणून अकौंट बनवले तेच फेसबुकाच्याबाबतीत. दोन चार सोडले तर सगळे मिपावरचे लोक आहेत फेस्बुकाच्या अकौंटमध्ये. तेवढाच टाईमपास. शिवाय लोकं काही व्हीडीओ, लिंका देतात त्याही बरेचदा मजेदार, ज्ञानवर्धक वगैरे असतात.

गवि 31/08/2011 - 10:38
असंख्य जुने शाळेतले शाळूसोबती, चाळीतले चाळूसोबती आणि हरवलेली अगणित माणसं मला ज्या फेसबुकमुळे परत मिळाली त्या फेसबुकचा मी आजन्म ऋणी राहीन. व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.

In reply to by गवि

स्वानन्द 31/08/2011 - 13:04
व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.
सहमत

सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही. बाकी फेसबुक आणि तत्सम सोशल नेटवर्कसचा उपयोग 'गझाली करणे' ह्यापेक्षा कित्येक पटींनी वेगळा आणि उपयुक्त आहे असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. फेसबुकवरती तुम्ही फेसबुक कंपनी साठी टेस्टर म्हणून काम करु शकता, विविध संस्था, उद्योग ह्यांना योग्य मोबदल्यात त्यांची इन्फो पेजेस बनवून देऊ शकता, नवोदित कलाकारांना (सर्वच क्षेत्रातील) त्यांची पेजेस बनवणे, ग्रुप सुरू करून देणे, त्यांच्या प्रोफाइलचा सेटअप बनवून देणे ह्यासाठी देखील मोबदला घेऊन मदत करू शकता. बरं ही सगळी खूप कष्टाची आणि वेळखाऊ कामे आहेत असेही नाही. ह्याला प्रचंड तांत्रिक ज्ञानाची आवश्यकत आहे असे देखील नाही. उलट ह्या कामांमुळे तुमच्या ज्ञानात अजून भर पडते, चार ओळखी होतात, लोकांच्या सोशल नेटवर्क कडून नक्की काय अपेक्षा आहेत त्या कळतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज फेसबुक किंवा तत्सम साइटचा उपयोग किती चांगल्या कार्यासाठी करू शकतात ह्याचे मौलिक ज्ञान मिळते. इच्छा असणार्‍यांनी श्री. पांडुरंग तावरे (अ‍ॅग्रो टूरिझमचे प्रणेते) , श्री. अनिकेत आमटे ह्यांची प्रोफाईल नक्की बघावीत. शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्या 31/08/2011 - 13:29
शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.
झक्कास !!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 31/08/2011 - 15:16
सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही. आणि शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन. याच्याशी १००% सहमत. इतक्या नेमक्या शब्दात लिहिलंय की आणखी काही बोलायची गरजच नाही.

विजुभाऊ 31/08/2011 - 17:07
आपल्याला अनोळखी व फारशी गती नसलेल्या विषयात काम करणारांची फ्रेन्ड रीक्वेस्ट स्वीकारून अथवा त्याना तशी रीक्वेस्ट पाठवण्यात तरी काय मतीतार्थ आहे कोण जाणे. फेसबुक काय किंवा मिपा काय यांचे अ‍ॅडिक्षन होते. सोशल नेटवर्किंग साइट्स या ठराविक व्यवसाय वा॑ढीसाठी किंवा मित्र परीवार वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. पण त्यांचे व्यसन हा चिंतेचा विषय आहे. या साईट्स वर अनेक लोक भेटत असतात. त्यांच्याशी मैत्री क्वचित दुश्मनी देखेले होत असते. अर्थात जालावरील मैत्री ही काही मुद्द्यांवर आधारीत मैत्री असते तशीच दुश्मनी देखील. मराठी आंतार्जालावर एखाद्या मुद्द्यावर एकमेकांचे कधीनाकधी खटके उडतातच पण म्हणून ज्यांच्याशी खटके उडालेत त्यांच्याशी मी सदोदीत सर्वत्र वैरच पत्करायचे हा मूर्खपणा झाला. फेसबुक हा टाईमपास म्हणून बरा आहे.

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:13
सद्यकाळात घडून गेलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने "सोशल मिडिया"ने निभावलेल्या भूमिकेबद्दलचे विवेचन : http://moklik.blogspot.com/2011/08/blog-post_31.html

विशाखा राऊत 31/08/2011 - 18:33
फेसबुक चांगले की वाईट हा खर तर वादाचा मुद्दा आहे. आपले मित्र, नातेवाईक भेटतात पण त्यातले कितीजणां सोबत आपण बोलतो किंवा संपर्क असतो हे महत्वाचे. संख्या कीती आहे ते महत्वाचे नसावे तर खरच आपल्याला भेटुन त्यांना आनंद होतो की नाही हे असावे. उगा आपले हा माझ्या लिस्ट मध्ये आहे सांगायला हवे मग तुम्ही ऑर्कुट, फेसबुक, गुगल+, मिसळपाव काहीही वापरा पण त्याचा काहीच उपयोग नाही. एक विरंगुळा, सर्वांशी जोडले जाण्याचा सोप्पा मार्ग म्हणुन सोशल नेटवर्किंग साईट्स कधीही उपयोगी आहेत. पण बसा शेती करत (farmville) तर काय उपयोग :)... ती सगळी शेती खरच कोणी प्रत्यक्षात केली तर काय फायदा होईल :) बाकी ज्याला जसे आवडते तसे फेसबुक समजुन घ्यावे

शिल्पा ब 31/08/2011 - 22:28
बरेचदा लोक ओळख नसताना रीक्वेस्ट पाठवतात आणि आपण रेफरन्स मागितला की गायब...खासकरुन मिपा वगैरे सायटींवरच्या लोकांनी एकमेकांना रीक्वेस्टी पाठवताना रेफरन्स दिला पाहीजे नाहीतर कळणार कसे?

In reply to by शिल्पा ब

आणि कळलं तरीसुद्धा ज्यांच्याशी आपण काहीही बोलत नाही त्यांच्याशी फेसबुकावर मैत्री काय करायची? फक्त हाय-हॅलो करायला?? असो. प्रभ्या, तू एकदम लैच बेक्कार टाकला आहेस रे! आणि सहजमामांची प्रोफाईल भयंकर से***** आहे राव!

पक्या 31/08/2011 - 23:16
मला फेसबुक एका मर्यादेपर्यंत आवडते. अर्थात व्यसन नाहीच लागलेले.( मिपाचे ही नाहिच) मला माझे अनेक शाळकरी सोबती फेबुमुळे परत भेटले. ..संपर्कात आले. इतकेच काय माझ्या वयस्कर वडिलांना त्यांचा बालमित्र फेबु मुळे भेटला. ..ज्याच्या ते अनेक वर्षे शोधात होते. हा मित्र परदेशी रहात असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही पण फोनवर मात्र बोलणे झाले. त्यांना बराच काळ रुखरूख लागून राहिलेला शोध संपला. फेबु कसे वापरायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. उदा. फोटो , विडीओ वगैरे आपण अपलोड केले तरी ते कोणाला दाखवायचे कोणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. आपल्या लिस्ट मधील सर्वच मित्रांना नसले दाखवायचे, काही ठराविक लोकांनाच दाखवायचे असतील तर 'hide from these people' , 'Show only to these people' , 'only me' असे पर्याय त्यात आहेत. शिवाय इतरही बरीच प्रायव्हसी सेटींग्ज त्यात आहेत. ती सर्व व्यवस्थित वापरली तर फेबू अजिबात धोकादायक नाही. पब्लिक फिगर असलेले लोक प्रायव्हसी सेटींग्ज पब्लिक ठेवतात ..आपल्यासारखे प्रायव्हसी जपणारे लोक त्यांना पटेल तेवढीच माहिती प्रकाशित करतात. दुसरे असे की मला माझ्या मित्रांमधे एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर प्रत्येकवेळी फोन करून सांगायला वेळ नसतो आणि फोन करुन सागण्याएवढी ती गोष्ट तेवढी महत्वाची ही नसते. उदा. आमच्याइथे १५ ऑगस्टला एक छान कार्यक्रम झाला. मला वाटले की मित्रमंडळींना त्याबद्दल सांगावे पण सर्वांना फोन करून सांगण्यासारखी ती काही महत्वाची बातमी नव्हती. फेबु वर त्या कार्यक्रमाविषयी लिहिताना मला त्या कार्यक्रमाचे फोटोज ही टाकता आले. जे एरवी मुद्दाम कोणाला दाखवले नसते. @ शुचि , लेख छान जमला आहे.

मागे विकासने लिहिलेली एक ओळ आठवली.... "मेरे पास फेसबुक है, माय स्पेस है, ओर्कुट है, तुम्हारे पास क्या है?" "मेरे पास काम-धंदा है!!!!!" :) असो. बाकी तुमच्याशी जर वितंडवाद घातला तर लाडू-चहा मिळतो इतकेच उमजले. वाचून उत्साह वाटला!!!! ;)

प्रभो 31/08/2011 - 23:15
फेसबूक कसे वापरावे यावर सहज रावांनी एक लेख लिहावा अशी मी विनंती करतो. :)

In reply to by मुक्तसुनीत

प्रभो 31/08/2011 - 23:27
मग काय? सहजराव हे चेपू वरचे अण्णा आहेत ;) स्वच्छ + कोरे करकरीत... * सहजमामा, ह घ्या हो...सुपारी द्याल माझी नाहीतर कुणालातरी :)

In reply to by मुक्तसुनीत

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतरः यालाच अप अगेन्स्ट द वॉल असे म्हणत असावेत काय? ;)

In reply to by मुक्तसुनीत

सन्जोप राव 01/09/2011 - 16:36
म्हणजे हे काय? बाकी मगरीप्रमाणे पाण्यातून उसळी मारुन काठावर मजा बघत उभ्या असलेल्या गरीब बिचार्‍या हरीणांना पाण्यात खेचण्याच्या कृतीचा निषेध! लोक वाचनमात्र आहेत ही श्री गणरायाची कृपा मानावी!

In reply to by शुचि

तरीच ती नीलू वैतागली!!! तुम्ही भाजणी, भाजणी म्हटल्यामुळे तिला वाटलं असेल की तुम्ही छान गरमागरम थालिपीठ वगैरे करून द्याल म्हणून!!!! तुम्ही दिलंच नाहीत, मग कोण नाही वैतागणार? :)

प्रास 30/08/2011 - 21:10
मैत्रीणीबरोबर झालेल्या डायरेक्ट टॉकच्या अनुभवाचं प्रकटन आवडलं. समजून उमजून "फेसबूक" खातं सुरू न केल्याने बाकी गोष्टींबद्दल काही लिहू शकत नाही. फेसबूकात नसलेला :-)

शुचि, फेसबुकावर खातं असावं का नसावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला फेसबुकावरून मिळालेली ही विनोदी लेखाची लिंक पहा. npr ची वेबसाईट मी इतःपर पाहिली नसती.

पैसा 30/08/2011 - 21:56
फेसबुकवर खतं असावं की नाही हा प्रत्येकाचा निर्णय आहे. पण फेसबुक नाही तर गुगल प्लस, ते नाही तर ऑर्कुट, फार काय मिसळपाव हे सुद्धा त्यांचंच भावंड आहे ना! आता घरबसल्या अनेक वेबसाईट्स उपलब्ध असतात म्हणून आपल्याला व्यसन लागलंय असं लक्षात येऊ शकतं. पण ज्या क्षणी व्यसन आहे हे लक्षात येईल, तेव्हाच त्यापासून लांब कसं रहावं हेही लक्षात येऊ लागेल. खूप लांब अंतरावर रहाणार्‍या सुहृदांच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडी कळतात, हा फेसबुकचा फायदाच आहे. जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही! फेसबुकवर वेळ घालवला म्हणून गिल्टी वाटायचं कारण नाही, (कारण घरची टेन्शन्स विसरून इतरांबरोबर टाईमपास करणे ही पण प्रत्येकाची गरज आहेच!) थोडं सीरीयसली सांगायचं तर घरातल्या प्रत्येकाला एक आपली स्वतःची अशी "स्पेस" असणं आवश्यकच आहे. ती नसेल तर नात्यातली गुंतागुंत वाढू शकते. तू घरात अजून लाडू करतेयस ना? म्हणजे तुझं घराकडे पण लक्ष आहेच! अगदीच काही तू समांतर जगात गेलेली नाहीस. झालं तर! थोडे लाडू इकडे पाठव बघू! (फोटो अपलोड केलेस तरी पुरे, आम्हाला कळेल कसे झालेत ते!)

In reply to by पैसा

जाई. 31/08/2011 - 00:00
+१ फेसबुकमुळे ज्या मित्रमैत्रिणीशी नियमित संपर्क साधता येत नाही वा रोज भेटणे शक्य नसते त्यांच्या टचमध्ये राहणे शक्य होते. फेसबुकच कितपत व्यसन लावून घ्यायच हा ज्याचा त्याचा प्रश्न. अति झालच तर a/c deactivate करायचा पर्याय असतोच.

In reply to by आत्मशून्य

शुचि 30/08/2011 - 22:46
आत्मशून्य आपल्याला काय आवडले नाही ते मनमोकळेपणाने लिहावे. आपल्या सूचवण्या योग्य रीतीने घेतल्या जातील याची खात्री असावी.

चित्रा 30/08/2011 - 22:53
"शुचि, फेसबुक हे भावनिक गरजा अप्रत्यक्षरीतीने पूर्ण करण्याचे साधन आहे/असावे याच्याशी मी तरी असहमत आहे. कारण हे म्हणजे तुम्ही एक समांतर आयुष्य जगू लागता असे मला दुर्दैवाने म्हणावे लागेल." समांतर आयुष्य कसे? प्रत्यक्ष आयुष्यात हे एक विश्व छेदून जाणारे. एवढेच म्हणता येईल. कधी ते प्रत्यक्ष भेट होते, कधी होत नाही. नीलूच्या गरजा काही दहा-पंधरा लोकांकडून पूर्ण होतात तर 'मी' च्या गरजा काही शेकडा लोकांनी पूर्ण होतात हा फरक आहे. कदाचित मी ला लोकांबद्दल 'क्युरिऑसिटी' असेल, नीलूला त्याची गरजच वाटत नसेल. मुळातच असलेला हा फरक प्रत्यक्ष आयुष्यातच आहे. प्रत्यक्ष आयुष्य नसले तर समांतर किंवा छेद देणारी कितीही विश्वे असली तरी काय फरक पडतो?! तेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात काय घडते आहे हे महत्त्वाचे. याच्याशी संबंध नाही, किंवा असला तरी लांबूनच, पण यावरून दिवंगत गुणी अभिनेत्री रसिका जोशी यांचे गेल्या वर्षी पाहिलेले 'व्हाईट लिली आणि नाईट रायडर' आठवले.

मुक्तसुनीत 30/08/2011 - 23:31
हा मला (पुन्हा एकदा) व्यक्तीगत निवडीचा मामला वाटतो. माझ्या ओळखीच्या काही व्यक्तींना ब्लॉगिंग पासून सोशल नेटवर्किंगपर्यंत आणि डिस्कशन फोरमपासून ऑनलाईन कॉन्व्हरसेशन्स पर्यंत सर्व काही अनावश्यक वाटते. काही लोकांना ते ठराविक लोक आणि विषया पुरते मर्यादित ठेवावेसे वाटते. काहीना ते अतिशय महत्त्वाचे वाटते. काहीना ते रंजक वाटते परंतु सहभागी व्हावेसे वाटत नाही. यापैकी कुणी इतरांच्या सहभागाबद्दल किंवा सहभागाच्या अभावाबद्दल , गरज वाटण्याबद्दल किंवा गरज न वाटण्याबद्दल कमेंट्स करणं मला मजेशीर वाटतं. हे म्हणजे तुला अमुक भाजी अमुक इतकीच का आवडते किंवा तू शाकाहारीच का आहेस किंवा का नाहीस असं म्हण्टल्यासारखं आहे.

धनंजय 30/08/2011 - 23:32
चांगले ललित लिखाण आहे. त्यातील मुद्देही विचार करण्यासारखे.
नीलूने तिचा मोर्चा आता चहाकडून लाडवाकडे वळवला होता.
मुद्दा बदलण्याकरिता आणि भावना बदलण्याकरिता चांगले तंत्र! - - - (प्रतिक्रियांपैकी "अमुकतमुक व्यक्तिगत मामला आहे" हे समजले नाही. व्यक्ती खाद्य म्हणून तोंडात काय टाकते, हासुद्धा व्यक्तिगत मामला आहे. तरी खाद्यपदार्थांबाबत कितीतरी गमतीदार गप्पागोष्टी मी ऐकलेल्या आहेत. मिसळपावावर पाककृतींचा विभाग तर मला फार आवडतो. "मी अमुक प्रकारे कोलंबी शिजवतो", "त्यापेक्षा तमुक प्रकारे शिजवलेस, तर स्वाद छान येईल..." वगैरे चर्चा तर अगदी मस्त चालतात. फेसबुकवर खाते असणे हा व्यक्तिगत मामला असण्याचेही पूर्णपणे मान्य. पण या तथ्याचा या चर्चेत संदर्भ समजला नाही. "मी" पात्राशी "नीलिमा" पात्राने याविषयी बोलायलाच नको होते, असा संदर्भ आहे काय? पण मग व्यक्तिगत->->पासून->->बोलायला नको येथपर्यंत साखळी नीट जोडायला हवी.)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 30/08/2011 - 23:39
नीलूचे पात्र फेसबुकबद्दल मतभिन्नताच व्यक्त करत नाही तर निवेदिकेच्या निवडीवर चांगलेच खमंग असे जज्जमेंट देते. ही गरज कशी लेजिटिमेट गरजच नाही असंही ती वारंवार सांगते. जेव्हा असं वर्तन दिसतं तेव्हा आपापल्या निवडीचं सार्वभौमत्व अधोरेखित करणं गरजेचं बनतं. म्हणूनच वैयक्तिक आवडीचा उल्लेख.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 31/08/2011 - 00:36
म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय? पण खमंग जज्जमेंटांविरोधात वाद घालणे, आणि वारंवार "गप्प बस" म्हणण्याऐवजी वाद घालणे, हा निवेदिकेचा व्यक्तिगत स्वभाव असू शकेल. तिच्या व्यक्तिगत पातळीपेक्षा जज्जमेंटची वारंवारिता फार झाल्यानंतर निवेदिका शेवटी म्हणते :
मी देखील या न संपणार्‍या वादसत्राला कंटाळले होते. "बरं समांतर आयुष्य तर समांतर आयुष्य. एकटेपणापेक्षा ते बरे." म्हणून मी आमची भेट आवरती घेतली.
म्हणजे बघा. वाद आवरता घेतला पण सपशेल पराभव वगैरे नाही. आत्मसन्मान राखून वाद संपवला, असे मला वाटते. निवेदिका नीलिमाबरोबर पुन्हा चहाफराळ करेल, किंवा तेव्हा कुठल्या विषयांबाबत बोलेल, त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. (कथन संपल्यामुळे.) निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय? सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे. माझ्या दृष्टीने हे ठीक आहे. निवेदिकेने निवेदन केले, तर वाचकाने जज्जमेंट करून "नीलिमेशी वागणे बदल" असा सल्ला देण्याबाबत माझी कुठलीच आडकाठी नाही :-)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 31/08/2011 - 00:48
म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय? प्रतिसादक कुणालाही कुठलाही मुद्दा बोलू नकोस असा सल्ला देत नाहीत. प्रतिसादकांचे म्हणणे इतकेच की ज्याला त्याला आपापली पर्सनल स्पेस मिळण्याचा हक्क आहे. निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला. निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय? कुणीही कुणाला "हाताळावे" यांप्रती प्रतिसादक काही म्हणतो आहे असे प्रतिसादकाला स्मरत नाही. काही मुद्द्यांचा प्रतिवाद कसा केला जाऊ शकेल याबाबते प्रतिसादकाने आपले चिमूटभर म्हणणे मांडले. ते काय होते ते उपरोक्त विवेचनात आले असे प्रतिसादकाला वाटते. सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे. प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.

In reply to by मुक्तसुनीत

या सगळ्याबरोबरच, प्रतिसादकांनी दिलेले सल्ले, नीलू-निवेदिकेच्या वादातले इतर काही मुद्दे जे निवेदिकेला तेव्हा महत्त्वाचे वाटले नाहीत/सुचले नाहीत ही सुद्धा त्यांची व्यक्तिगत मतंच आहेत. कुणी फार ठामपणे मांडत असेल तरीही निवेदिकेने तिचे निर्णय स्वतःच्या मनानुसार घ्यावेत ही एक सूचना त्यात आहे.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 31/08/2011 - 02:05
(माझ्या मूळ प्रश्नात "प्रतिसादक" अनेकवचनात आहे, कारण अनेक प्रतिसादकांनी "व्यक्तिगत" मामला सांगितला आहे. एकाच प्रतिसादकाला छद्मीपणे त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता. खरेच.) - - - "हक्क" म्हणजे काय? बहुधा बजावता येतात, अशाच गोष्टींना "हक्क" संबोधण्यात काही हशील आहे. "बजावणे" म्हणजे हक्काचे उल्लंघन झाल्यास ते उल्लंघन निस्तरणे, होय. नाहीतर "अमुकतमुक हक्क आहे" असे म्हणण्याचे प्रयोजनच नसते. (It is not a right if there is no redress.) - - -
निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला.
कुठल्याही वैयक्तिक आवडीनिवडीबाबत गप्पा झाल्या म्हणजे पर्सनल स्पेसच्या हक्कांचे उल्लंघन होत नसावे. कारण प्रत्येक आवडीनिवडीबाबत चर्चेत अशी शंका उपस्थित करण्याचा व्यवहार समाजात दिसत नाही. मिसळपावावरील पाककृती विभागाचे उदाहरण दिलेलेच आहे. तुमचा प्रथम प्रतिसाद अधिक समर्पक स्पष्टीकरण देतो : "खरमरीत.. वारंवार... जज्जमेंट." अशा प्रसंगीच समाजात काही चुकल्याबद्दल बोलणे होते. "खरमरीत... वारंवार... आवडीनिवडीबाबत जज्जमेंट म्हणजे हक्कांचा भंग आहे काय?" असा तुमचा पूर्ण प्रश्न असावा. या प्रश्नाची ढोबळमानाने दोन उत्तरे संभवतात. आणि नेमके काय ते उत्तर निवेदिकाच देऊ शकेल. (अ) "होय, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत आहे." (आ) "नाही, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत नाही." या दोन उत्तरांपैकी जर पहिले उत्तर निवेदिका देईल, तर निवेदिकेच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. निवेदिकाच्या हक्काचे उल्लंघन होऊ नये, असे मला तरी वाटते. तुम्हालाही वाटते. तर हक्कभंग निस्तरण्याबद्दल कारवाई व्हावी. कोणीतरी करावी. कोणी करावी? (मी असे मानले, की निवेदिकेने कारवाई करावी. मला वाटले, की तुम्हीसुद्धा तेच म्हणत होता. पण निवेदिकेला सल्ला दिलेला नाही, असे वर म्हटलेले आहे. पण मग हक्काच्या भंगाबद्दल शंकानिरसन झाल्यावर नेमके काय करावे, हे कोडे आहे. हक्काच्या भंगाबद्दल काही करायचेच नसेल, तर शंका काय कामाची?)
प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.
निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंके...
एक मैत्रीण दुसर्‍या मैत्रिणीच्या हक्कांचे उल्लंघन करते, ही शंका हे त्यांच्या मैत्रीविषयी (शंकेसह) जज्जमेंट आहे, असे मी ढोबळपणे मानले. मैत्री आणि एकमेकांच्या हक्कांची चाड असणे या गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्याचा व्यवहार खूपदा दिसतो. हक्कासह हित बघणारे ते मित्र असा व्यवहार करून मला आजवर फारच सोय झालेली आहे. पण कदाचित या ठिकाणी असा संबंध अध्याहृत धरणे योग्य नव्हे. तुम्ही स्पष्टच म्हणता, तर या प्रसंगी ते अध्याहृत टाळतो, आणि मानतो, की येथे निलू आणि निवेदिका यांच्या मैत्रीबाबत जज्जमेंट नाही. परंतु हे अध्याहृत कधी टाळायचे, कधी घ्यायचे, त्याबद्दल मला समाजातील वावरातून नीट कल्पना येत नाही, अशी कबुली देतो. - - - पुन्हा शंका : व्यक्तिगत नेमके काय आहे? (अ) फेसबुकवर खाते असणे/नसणे, (आ) त्याविषयी मैत्रिणी-मैत्रिणींनी एकमेकांच्या उदाहरणातून साधकबाधक गप्पाही न मारणे, की (इ) गप्पा मारता-मारता अति-वारंवार वादविवादाने पर्सनल स्पेसचे त्रासदायक उल्लंघन न करणे? पर्सनल स्पेसचा मुद्दा (काही स्पष्टीकरणांसकट*) समजला, मान्य आहे. आधीपासून मान्य होता. पण तो सुरुवातीच्या संक्षित "व्यक्तिगत" प्रतिसादांत उल्लेखलेलाच नव्हता. उलट संक्षिप्त प्रतिसादांत फेसबुक खाते असणे/नसणे हेच व्यक्तिगत म्हणून सांगितलेले आहे. ते अजूनही समजले नाही. - - - *(उगीच विस्तार नको. पण हस्तांदोलन करणे, सलामीचे उद्गार उगाचच नव्हे तर प्रामाणिकपणे बोलणे, कुणी घसरून पडल्यास त्यांना हात धरून उठण्यास मदत करणे, आपण पडल्यास दुसर्‍याला मदतीला बोलावणे... वगैरे प्रकार म्हणजे लोकांच्या पर्सनल स्पेसच्या आत शिरत असूनही त्यांच्या हक्काचे उल्लंघन मानत नाही.)

In reply to by धनंजय

शुचि 31/08/2011 - 02:11
मी धनंजय यांच्याशी सहमत आहे - माझ्या पर्सनल स्पेस चे उल्लंघन झालेले नाही कारण निलूशी माझे लग्न झालेले नाही की ती माझ्यावर दबाव आणू शकेल. मी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे - आपले फेसबुक इंटरॅक्शन ही वैयक्तीक आवडीनिवडीचीच गोष्ट आहे.

प्रियाली 30/08/2011 - 23:34
सर्वप्रथम वादसत्र सुरू का व्हावे असा प्रश्न पडतो. नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो. व्यसनी लोक व्यसनांच्या मागची अनेक कारणे देतात. दारू पिऊन दु:ख हलकं होते, सिग्रेट ओढून डोकं हलकं होतं, ड्रग्ज घेतल्यावर कूल वाटतं इ. इ. फेबु हे एकदा व्यसन आहे हे मान्य केले की त्याचे वरवरचे फायदे सोडले तर खोलवरचे दुष्परिणाम गर्तेत नेण्यास कारणही ठरू शकतात हे ही मान्य करावे लागेल. सोशल गॅदरिंगला एखादा ग्लास हातात घेऊन फिरणारे आणि रोज संध्याकाळी ग्लास रिचवल्याशिवाय राहू न शकणारे यांत फरक आहे.
"शुचि खरं सांग दिवसांतले किती तास तू फेसबुकवर पडीक असतेस? रात्री मधेच उठलीस तर तू फेसबुक रिफ्रेश करतेस असं तूच म्हणतेस मग हे बरोबर का?" नीलू न्यायाधीशी भूमिकेत शिरल्याने मीदेखील आता डिवचले गेले होते - "वेल तुझे म्हणणे खरे आहे. माझ्याकरता फेसबुक हे व्यसन होऊन बसले आहे पण त्यामागचं कारण तर समजाऊन घे"
प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनांची कारणे देऊन सहानुभूती मिळवण्यास उत्सुक असतो आणि आपण जी कारणे देतो ती सर्व वॅलिड कारणे आहेत असा समजही असतो. व्यसनात बुडून राहायचे आहे असेच ठरवले असेल तर अशा व्यक्तींना पुढे सांगण्यात काही फायदा नसतो कारण त्यांच्याकडे कारणांची यादी तयार असते. शेवटी नीलूची मैत्री महत्त्वाची की फेबु हे ठरवणे निवेदिकेवर आहे. असो. वर पैसा यांची एक प्रतिक्रिया आहे त्याबद्दल दोन पैशे ;)
जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही!
फरक आहे आणि हा फरक नवरा आपल्या गैरहजेरीत ऑफिसातल्या बाईबरोबर फिरतो किंवा आपला टीनेजर मुलगा अचानक २५-३५ च्या बाईचा घनिष्ठ मित्र बनतो या प्रकारचा आहे. या प्रकारांचा जोडीदारांना किंवा पालकांना त्रास होऊ शकणे शक्य आहे. फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या घरातील संख्या पाहिली की एखाद्या व्यक्तीला इतके मित्र मैत्रिणी कशा असू शकतील असा प्रश्न पडतो. बरे असतील तर यांच्याशी मैत्री करण्यास वेळ आणि एनर्जी कशी मिळते असा पुढला प्रश्न पडतो. याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही. मित्रांचे मित्र किंवा मित्रांच्या मित्रांचे मित्र वगैरे वगैरे करत तुम्ही अनोळखी लोकांशी संबंध वाढवून घेत असाल आणि कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही हे घडूच शकते पण फेबुचा स्कोप फार मोठा वाटतो.

In reply to by प्रियाली

शुचि 31/08/2011 - 01:05
>> फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या ....... याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही.>> हा लेख जरूर वाचावा. लिंकड इन या साईट्बद्दल हा लेख असून यात हे म्हटले आहे की लिंकड इन वर ५०० किंवा अधिक कॉन्टॅक्ट असणे म्हणजे तुमचे काहीतरी चुकते आहे. The perception that having 500+ connections on LinkedIn means that you are well connected is false. In fact, it hurts your credibility factor. अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे. >> कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे >> ही काळजी समजण्यासारखीच आहे. >> नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो. >> प्रियाली, आपले नीरीक्षण आचूक आहे.

In reply to by शुचि

प्रियाली 31/08/2011 - 01:31
अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे.
हाच न्याय फेबुवरही लावावा लागतो. इंटरव्यूला येणार्‍या कँडिडेटची छाननी फेबुवर जाऊन करणारा सुपरवायजर मला ठाऊक आहे. ;) ५००-१००० मित्र मैत्रिणी असणारे महाभाग कामं कधी करणार असा निरागस प्रश्न त्याला पडत असे.

मला लेख आवडला आणि लेखाचा विषयही आवडता. बर्‍याच महिन्यांपुर्वी मी माझ्या ब्लॉग वर याविषयी माझे मत मांडले होते ते इथे देत आहे. ================================================================== ""मी येत्या ३ ते ४ महिन्यांमधे Facebook, Orkut यावरिल माझे account बंद करणार आहे", असे मी जेंव्हा म्हणालो, तेंव्हा माझे मित्र "काय गावंढळ आहे" अशा चेहर्‍याने माझ्याकडे पाहु लागले. पण आपण कधी खरच विचार केला आहे का, कि आपण Facebook आणि Orkut किंवा कुठलीही Social Networking ची Site वापरुन आपल्या मित्राबरोबर खरोखर संवाद होतो का? Facebook Orkut वरुन आपल्याला मित्रांच्या बित्तबातम्या कळतात पण संवाद होत नाही. आधी आधी Orkut खुप छान वाटले होते, तेंव्हा Facebook भारतात एवढे प्रचलित नव्हते. सध्या एक दोन वर्षापासुन भारतात Facebook प्रचलित होत आहे. भारतात म्हणजे भारताच्या मुख्य शहरात. एकदा आमच्या ओळखीच्या एका घरी गेलो असता तिथे एक लहान मुलगी आपल्या बाबाला संगणक Login करुन द्यायचा हट्ट करत होती, मला वाटल काही गेम वैगरे खेळायची असेल, पण तिला तिचे Orkut पहायचे होते. वय १२ ते १४ वर्षे. हा Social Networking चालु करण्याचा प्रवाशी interesting असतो. मी Orkut आजपासुन ६ वर्षापुर्वी वापरायला सुरु केले. तेंव्हा ते नवीन आले होते. आणि Google ची मोहिनी होतिच. पण मी Social Networking का वापरायला सुरु केले याचे उत्तर अजुनही माझ्या जवळ नाही. उत्सुकता हे उत्तर असु शकते. नंतर कॉलेज मधिल सर्वच Orkut वर आल्यावर "Scrap" टाक हा परवलीचा शब्द बनला. जर आपण Orkut वर नाही म्हणजे काही तरी चुकते आहे असे काहीसे Peer Pressure वाढिला लागते. आणि मग एकदा Orkut वर आलो की जुने मित्र शोधण्याची मोहिम सुरु होते. त्यातुनच कोणाचे किति मित्र आहेत यावर शर्यत सुरु होते. भले ३ वर्षे एखाद्या मित्राला भेटले नसाल पण Orkut वर त्याला Add करुन ठेवणार. मग वेगवेगळ्या राजकिय, बौद्धिक, सामाजिक, साहित्यिक community join करणे हेही सुरु होते. असे होता होता यासर्वांचा पसारा एवढा वाढतो की कधी कधी ज्याचे updates कळायला पाहिजे ते कळतच नाही. नुसता गोंधळ. नीट समजाऊन, वेळ देऊन काळजीपुर्वक पाहिले तर सर्व updates कळु शकतात पण मग तेवढा वेळ देवा लागतो. त्यात लोकांना Social Networking Site वर कसे वागावे याचेही भान नसते, आपली व्यक्तिगत माहिती बिंधास्तपणे site टाकतात. खासगी निरोप सार्वजनिक फोरम मधे टाकतात. कधी कधी ते वाचुन फार अवघडल्यासारखे वाटते. हे सर्व काही कमी होते म्हणुन आता Mafia आणि फार्मविले सारखे online गेम आले आहेत. त्यात किती वेळ जातो याची तर गणतीच नाही. मला माहित आहे कि फार नकारार्थी बोलतो आहे, पण सकारात्मक बाजु तर बहुतेक लोकांना माहित आहे म्हणुनच तर दिवसेंदिवस Social Networking Sites चे मेंबर्स वाढत आहेत. शेवटी "सौ बातों की एक बात". "अति तेथे माती"

स्पंदना 31/08/2011 - 06:56
चर्चा अतिशय सुरेख, अन माहिती पुर्ण. शेवटी ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज नाही का? मी तरी निलु होउन दुसर्‍याला जाब ही नाही विचारणार, अन आली एखादी निलु विचाराय्ला अन जर तिला माझ्या लेव्हलन विचार नाही करता आला, तर चर्चा ही नाही वाढवणार.

नितिन थत्ते 31/08/2011 - 07:49
५०० फ्रेंड्सबद्दल सहमत. अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो. श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही. फेबु/ऑर्कुटवर फ्रेण्ड लिस्ट मुळे सुरक्षा यंत्रणांच्या दुर्बिणीखाली येण्याची शक्यताही लक्षात घ्यायला हवी.

In reply to by नितिन थत्ते

अर्धवट 31/08/2011 - 10:24
>>श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही. केवळ तुम्ही मानव आहात ही समानता तुम्ही मानत नाही का. ;)

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 31/08/2011 - 15:02
अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो.
हम्म! फेबुवर माझे अकाउंट हे माझे मोठ्ठे कुटुंब (माहेर-सासर), माझे शाळामित्र, लहानपणीचे सवंगडी आणि कॉलेज मित्रमैत्रिणी यांना बांधून ठेवण्यासाठी आहे. या खेरीज काही मोजकी मिपा-उपक्रमी मंडळी आहेत. त्यांची निवड कशी करायची हे मी ठरवते. मला फेबुवर जाऊन काहीतरी कॉमेंट्स लिहिण्यापेक्षा "लाइक"चे बटण दाबणे आवडते. त्यामुळे आपण संवादात खेचले जात नाही आणि संपर्कही राहतो. मी कोणाही नेटकराला आतापर्यंत फ्रेंडरिक्वेस्ट पाठवलेली नाही पण अनेकांच्या रिक्वेस्ट्स नाकारल्या आहेत कारण नाकारून त्यांचा अपमान करायचा नाही तर त्यासाठी मी माझे खाते तयार केलेले नाही. ओळखदेख नसताना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार्‍या मंडळींचे मला आश्चर्य वाटते. मिपावरील एका काकांनी (जे मला ओळखत नाहीत) मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती की "मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही काही मिपाकरांच्या फ्रेंडलिस्टमध्ये दिसलात म्हणून मीही रिक्वेस्ट पाठवली." मी इमाने इतबारे ती डिनाय केली. :) दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता. परंतु अशा लोकांची मानसिकता मला कळत नाही हे खरे.
श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही.
श्याम मानव हे पब्लिक फिगर आहेत त्यांना आपले किती फॅन फॉलोइंग आहे हे दाखवण्यात रुची असावी. अशाच प्रकारची गर्दी मी कविता महाजन वगैरेंच्या खात्यावर पाहिली आहे. असो, खाली परा म्हणतो
सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही.
याच्याशी १००% सहमत आहे. मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.

In reply to by प्रियाली

मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.
हे मी सांगायला विसरलो. तुमचे खाते असो वा नसो त्याचे जाहिरातीकरण करणे टाळा. मिपावरील एक जेष्ट सदस्यांना नुकताच फेसबुकवर असा अनुभव आला आहे. त्यांच्या नावाने खाते उघडून काही विचित्र टिपण्या करणे, अश्लाघ्य मजकूर लिहीणे असे प्रकार झाले. तेंव्हा प्रियालीतै म्हणते तशी थोडी सावधगिरी बाळगाच बाळगा.
दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता.
ह्यात विनोद नाहीचे तै. ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते ;) अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच. अनक्नोन पर्सनला अ‍ॅड करण्यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुमच्या खाजगी फोटोंचा त्याला मिळणार अ‍ॅसेस. ह्यातून पुढे बर्‍याचदा नको ते प्रसंग घडतात आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते. शक्यतो (निदान स्त्रीयांनी तरी) आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देणे टाळावेच. मधे फेसबुक वरती फ्रेंडस कॉन्टेक्ट बुकच्या नावाखाली आपण अ‍ॅड केलेल्या सर्वच फ्रेंडसचे फोन नंबर आपण सहजपणे बघू शकत होतो, त्यांनी ते पर्सनल ठेवलेले असले तरी. अजुनही हा बग अध्ये मध्ये कार्यरत होतोच. म्हणूनच योग्य ती काळजी घ्यायलाच हवी हे नक्की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रियाली 31/08/2011 - 17:11
ह्यात विनोद नाहीचे तै. ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच.
अगदी अगदी! १०००% बरोब्बर! विनोद असा की मला या गोष्टी म्हैतीच नाहीत असा या गृहस्थांचा ग्रह झाला असेल काय या कल्पनेने हसू आले. ;)

In reply to by प्रियाली

अशा लोकांना इग्नोर फिल्टरला टाकायचे. त्यांनी कितीही प्रयत्न केले, सर्च केले तरी त्यांना ना तुझे प्रोफाईल दिसते ना तुझी अपडेटस. तुमच्या कॉमन फ्रेंडसच्या लिस्ट मध्ये सुद्धा त्यांना तुझे प्रोफाईल दिसत नाही. बरं त्यांनी तुला रिक्वेस्ट पाठवलेली असल्याने तुला मात्र बसल्याजागी त्यांची अपडेटस दिसत असतात ;) असा मस्त तडफडाट होतो ना समोरच्या माणसाचा.

शिल्पा ब 31/08/2011 - 10:14
खरं सांगू का... माझे आधी ओर्कुट किंवा फेसबुक किंवा माय स्पेस वगैरे अकौंट नव्हते. माय स्पेसवर अजूनही नाही. ओर्कुटवर एकदोन ओळखीच्या लोकांनी फारच request पाठवल्या म्हणून अकौंट बनवले तेच फेसबुकाच्याबाबतीत. दोन चार सोडले तर सगळे मिपावरचे लोक आहेत फेस्बुकाच्या अकौंटमध्ये. तेवढाच टाईमपास. शिवाय लोकं काही व्हीडीओ, लिंका देतात त्याही बरेचदा मजेदार, ज्ञानवर्धक वगैरे असतात.

गवि 31/08/2011 - 10:38
असंख्य जुने शाळेतले शाळूसोबती, चाळीतले चाळूसोबती आणि हरवलेली अगणित माणसं मला ज्या फेसबुकमुळे परत मिळाली त्या फेसबुकचा मी आजन्म ऋणी राहीन. व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.

In reply to by गवि

स्वानन्द 31/08/2011 - 13:04
व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.
सहमत

सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही. बाकी फेसबुक आणि तत्सम सोशल नेटवर्कसचा उपयोग 'गझाली करणे' ह्यापेक्षा कित्येक पटींनी वेगळा आणि उपयुक्त आहे असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. फेसबुकवरती तुम्ही फेसबुक कंपनी साठी टेस्टर म्हणून काम करु शकता, विविध संस्था, उद्योग ह्यांना योग्य मोबदल्यात त्यांची इन्फो पेजेस बनवून देऊ शकता, नवोदित कलाकारांना (सर्वच क्षेत्रातील) त्यांची पेजेस बनवणे, ग्रुप सुरू करून देणे, त्यांच्या प्रोफाइलचा सेटअप बनवून देणे ह्यासाठी देखील मोबदला घेऊन मदत करू शकता. बरं ही सगळी खूप कष्टाची आणि वेळखाऊ कामे आहेत असेही नाही. ह्याला प्रचंड तांत्रिक ज्ञानाची आवश्यकत आहे असे देखील नाही. उलट ह्या कामांमुळे तुमच्या ज्ञानात अजून भर पडते, चार ओळखी होतात, लोकांच्या सोशल नेटवर्क कडून नक्की काय अपेक्षा आहेत त्या कळतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज फेसबुक किंवा तत्सम साइटचा उपयोग किती चांगल्या कार्यासाठी करू शकतात ह्याचे मौलिक ज्ञान मिळते. इच्छा असणार्‍यांनी श्री. पांडुरंग तावरे (अ‍ॅग्रो टूरिझमचे प्रणेते) , श्री. अनिकेत आमटे ह्यांची प्रोफाईल नक्की बघावीत. शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्या 31/08/2011 - 13:29
शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.
झक्कास !!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 31/08/2011 - 15:16
सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही. आणि शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन. याच्याशी १००% सहमत. इतक्या नेमक्या शब्दात लिहिलंय की आणखी काही बोलायची गरजच नाही.

विजुभाऊ 31/08/2011 - 17:07
आपल्याला अनोळखी व फारशी गती नसलेल्या विषयात काम करणारांची फ्रेन्ड रीक्वेस्ट स्वीकारून अथवा त्याना तशी रीक्वेस्ट पाठवण्यात तरी काय मतीतार्थ आहे कोण जाणे. फेसबुक काय किंवा मिपा काय यांचे अ‍ॅडिक्षन होते. सोशल नेटवर्किंग साइट्स या ठराविक व्यवसाय वा॑ढीसाठी किंवा मित्र परीवार वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. पण त्यांचे व्यसन हा चिंतेचा विषय आहे. या साईट्स वर अनेक लोक भेटत असतात. त्यांच्याशी मैत्री क्वचित दुश्मनी देखेले होत असते. अर्थात जालावरील मैत्री ही काही मुद्द्यांवर आधारीत मैत्री असते तशीच दुश्मनी देखील. मराठी आंतार्जालावर एखाद्या मुद्द्यावर एकमेकांचे कधीनाकधी खटके उडतातच पण म्हणून ज्यांच्याशी खटके उडालेत त्यांच्याशी मी सदोदीत सर्वत्र वैरच पत्करायचे हा मूर्खपणा झाला. फेसबुक हा टाईमपास म्हणून बरा आहे.

मुक्तसुनीत 31/08/2011 - 18:13
सद्यकाळात घडून गेलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने "सोशल मिडिया"ने निभावलेल्या भूमिकेबद्दलचे विवेचन : http://moklik.blogspot.com/2011/08/blog-post_31.html

विशाखा राऊत 31/08/2011 - 18:33
फेसबुक चांगले की वाईट हा खर तर वादाचा मुद्दा आहे. आपले मित्र, नातेवाईक भेटतात पण त्यातले कितीजणां सोबत आपण बोलतो किंवा संपर्क असतो हे महत्वाचे. संख्या कीती आहे ते महत्वाचे नसावे तर खरच आपल्याला भेटुन त्यांना आनंद होतो की नाही हे असावे. उगा आपले हा माझ्या लिस्ट मध्ये आहे सांगायला हवे मग तुम्ही ऑर्कुट, फेसबुक, गुगल+, मिसळपाव काहीही वापरा पण त्याचा काहीच उपयोग नाही. एक विरंगुळा, सर्वांशी जोडले जाण्याचा सोप्पा मार्ग म्हणुन सोशल नेटवर्किंग साईट्स कधीही उपयोगी आहेत. पण बसा शेती करत (farmville) तर काय उपयोग :)... ती सगळी शेती खरच कोणी प्रत्यक्षात केली तर काय फायदा होईल :) बाकी ज्याला जसे आवडते तसे फेसबुक समजुन घ्यावे

शिल्पा ब 31/08/2011 - 22:28
बरेचदा लोक ओळख नसताना रीक्वेस्ट पाठवतात आणि आपण रेफरन्स मागितला की गायब...खासकरुन मिपा वगैरे सायटींवरच्या लोकांनी एकमेकांना रीक्वेस्टी पाठवताना रेफरन्स दिला पाहीजे नाहीतर कळणार कसे?

In reply to by शिल्पा ब

आणि कळलं तरीसुद्धा ज्यांच्याशी आपण काहीही बोलत नाही त्यांच्याशी फेसबुकावर मैत्री काय करायची? फक्त हाय-हॅलो करायला?? असो. प्रभ्या, तू एकदम लैच बेक्कार टाकला आहेस रे! आणि सहजमामांची प्रोफाईल भयंकर से***** आहे राव!

पक्या 31/08/2011 - 23:16
मला फेसबुक एका मर्यादेपर्यंत आवडते. अर्थात व्यसन नाहीच लागलेले.( मिपाचे ही नाहिच) मला माझे अनेक शाळकरी सोबती फेबुमुळे परत भेटले. ..संपर्कात आले. इतकेच काय माझ्या वयस्कर वडिलांना त्यांचा बालमित्र फेबु मुळे भेटला. ..ज्याच्या ते अनेक वर्षे शोधात होते. हा मित्र परदेशी रहात असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही पण फोनवर मात्र बोलणे झाले. त्यांना बराच काळ रुखरूख लागून राहिलेला शोध संपला. फेबु कसे वापरायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. उदा. फोटो , विडीओ वगैरे आपण अपलोड केले तरी ते कोणाला दाखवायचे कोणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. आपल्या लिस्ट मधील सर्वच मित्रांना नसले दाखवायचे, काही ठराविक लोकांनाच दाखवायचे असतील तर 'hide from these people' , 'Show only to these people' , 'only me' असे पर्याय त्यात आहेत. शिवाय इतरही बरीच प्रायव्हसी सेटींग्ज त्यात आहेत. ती सर्व व्यवस्थित वापरली तर फेबू अजिबात धोकादायक नाही. पब्लिक फिगर असलेले लोक प्रायव्हसी सेटींग्ज पब्लिक ठेवतात ..आपल्यासारखे प्रायव्हसी जपणारे लोक त्यांना पटेल तेवढीच माहिती प्रकाशित करतात. दुसरे असे की मला माझ्या मित्रांमधे एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर प्रत्येकवेळी फोन करून सांगायला वेळ नसतो आणि फोन करुन सागण्याएवढी ती गोष्ट तेवढी महत्वाची ही नसते. उदा. आमच्याइथे १५ ऑगस्टला एक छान कार्यक्रम झाला. मला वाटले की मित्रमंडळींना त्याबद्दल सांगावे पण सर्वांना फोन करून सांगण्यासारखी ती काही महत्वाची बातमी नव्हती. फेबु वर त्या कार्यक्रमाविषयी लिहिताना मला त्या कार्यक्रमाचे फोटोज ही टाकता आले. जे एरवी मुद्दाम कोणाला दाखवले नसते. @ शुचि , लेख छान जमला आहे.

मागे विकासने लिहिलेली एक ओळ आठवली.... "मेरे पास फेसबुक है, माय स्पेस है, ओर्कुट है, तुम्हारे पास क्या है?" "मेरे पास काम-धंदा है!!!!!" :) असो. बाकी तुमच्याशी जर वितंडवाद घातला तर लाडू-चहा मिळतो इतकेच उमजले. वाचून उत्साह वाटला!!!! ;)

प्रभो 31/08/2011 - 23:15
फेसबूक कसे वापरावे यावर सहज रावांनी एक लेख लिहावा अशी मी विनंती करतो. :)

In reply to by मुक्तसुनीत

प्रभो 31/08/2011 - 23:27
मग काय? सहजराव हे चेपू वरचे अण्णा आहेत ;) स्वच्छ + कोरे करकरीत... * सहजमामा, ह घ्या हो...सुपारी द्याल माझी नाहीतर कुणालातरी :)

In reply to by मुक्तसुनीत

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतरः यालाच अप अगेन्स्ट द वॉल असे म्हणत असावेत काय? ;)

In reply to by मुक्तसुनीत

सन्जोप राव 01/09/2011 - 16:36
म्हणजे हे काय? बाकी मगरीप्रमाणे पाण्यातून उसळी मारुन काठावर मजा बघत उभ्या असलेल्या गरीब बिचार्‍या हरीणांना पाण्यात खेचण्याच्या कृतीचा निषेध! लोक वाचनमात्र आहेत ही श्री गणरायाची कृपा मानावी!

In reply to by शुचि

तरीच ती नीलू वैतागली!!! तुम्ही भाजणी, भाजणी म्हटल्यामुळे तिला वाटलं असेल की तुम्ही छान गरमागरम थालिपीठ वगैरे करून द्याल म्हणून!!!! तुम्ही दिलंच नाहीत, मग कोण नाही वैतागणार? :)
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?" माझ्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम." यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते.

होड्या सोडणे

डॉ.श्रीराम दिवटे ·
hodi होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत.

ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)

चेतन सुभाष गुगळे ·

शाहिर 25/08/2011 - 18:23
अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे .. ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा...

In reply to by शाहिर

अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे >> धन्यवाद. शास्त्रीय संगीत, नृत्य, खेळ व किचकट अर्थशास्त्रीय आकडेमोड सोडल्यास इतर सर्व विषयातील ज्ञान मिळविण्याचा माझा सदैव प्रयत्न चालु असतो. त्या दृष्टीने वाचन, चिंतन, चर्चा, तज्ज्ञांकडून सल्ले मिळविणे हेही घडत असतेच. हा वैयक्तिक विकासाकरिता गरजेचा एक भाग आहे असे मी मानतो. ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा >> पुरूषांना देखील उपयोगी ठरावी. नात्यातल्या, परिचित अशा महिलांची त्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे. त्यांच्यापर्यंत ते ही माहिती पोचवू शकतात.

ऋषिकेश 26/08/2011 - 10:21
छे छे.. कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे).. खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते..

In reply to by ऋषिकेश

कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे) >> ही माहिती डॉक्टरांना पर्याय नाहीच. सध्या इतक्या प्रकारचे डॉक्टर झालेत (आणि त्यामुळे तितक्याच प्रकारचे विकारही उजेडात येऊ लागले आहेत) की कुठल्या डॉक्टर कडे कशा साठी जावे हे ही काहींना ठाऊक नसते. तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे. खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते.. >> शक्य तितके मराठी प्रतिशब्द योजले आहेतच. जिथे मी योजले नसतील परंतू वाचकांपैकी कुणाला ठाऊक असतील त्यांनी जरूर सूचवावेत, समाविष्ट केले जातील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अन्या दातार 26/08/2011 - 15:50
>>तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे. छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे?? बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! ;)

In reply to by अन्या दातार

छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे?? >> त्याविषयीची माहिती लेखात दिली आहे, वाचल्यास कळेल. बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! >> ही हसण्यासारखी बाब नाही. या आजारांकरिता अनेक जण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांकडे जात नाही म्हणूनच अशा जाहिराती लावणार्‍या भोंदुंचे फावते. तुमचा फार वेळ न घालवता याबाबत कल्पना यावी असे वाटत असेल प्रकरण क्रमांक अठरा : पॅप स्मिअर चाचणी हे तीन पानांचे प्रकरण वाचा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ही हसण्यासारखी बाब नाही. या आजारांकरिता अनेक जण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांकडे जात नाही म्हणूनच अशा जाहिराती लावणार्‍या भोंदुंचे फावते.
सहमत आहे. संकोचापोटी अंगावरच आजार काढणार्‍यांमधे स्त्रियांची संख्या जास्त आहे

In reply to by अन्या दातार

गवि 26/08/2011 - 16:03
इथल्याच दुसर्‍या लेखाचीसुद्धा लिंक सहसा देत नाही. पण इथे मोह आवरेना.. हे वाचा प्लीज प्लीजः http://www.misalpav.com/node/16782

गवि 26/08/2011 - 11:00
मराठीत या विषयांवर विकीपीडियावर पेजेस बनवली आहेत का? बनवली नसतील तर कृपया बनवावीत ही विनंती. विकिपीडियावर मराठी माहितीची कमतरता आहे. तिथे याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.

गणपा 26/08/2011 - 17:21
कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत. मिपाने एखादा लेख उघडण्या पुर्वी लेखाच आणि लेखकाच नाव दिसेल अशी सोयही दिली आहेच. माउसच बटण तुमच्याच हातात आहे. तेव्हा तुम्हाला काय आणि कुणाचे लेख वाचायचेत त्यावरच क्लीक करा की लेको. का उगा एखाद्यचा जीव खाता. त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. :) एक विसु : गणपा आणि चेतन सुभाष गुगळे हे आयडी एकाच व्यक्तीचे नाहीत. एथे या धाग्यावर जरी चेतन सुभाष गुगळे यांना समर्थन असल तरी ते केवळ याच धाग्या पुरता मर्यादित आहे. अन्य धाग्यांवरच्या शिमग्याशी संबंध जोडु नये.

In reply to by गणपा

गवि 26/08/2011 - 17:22
हेच म्हणतो. मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.

In reply to by गणपा

गवि 26/08/2011 - 17:22
हेच म्हणतो. मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.

In reply to by गवि

मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. >> होय तुमची सूचना व त्यामागचा उद्देश नक्कीच चांगला आहे, पण हे किरण फॉन्ट मधलं लेखन तिथे चिटकविता येईल का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 17:46
पीडीएफ टू युनिकोड करुन देणारे परिवर्तन म्हणून सॉफ्टवेअर मला वाटते सीडॅकच्या साईटवर फ्री आहे. त्यातून पीडीएफचे कन्वर्ट करुन घेतलेले युनिकोड ९९.९ टक्के शुद्ध आणि एरर फ्री असते असा अनुभव आहे. माझ्या बाबतीतही असेच मोठे लिखाण जे तुम्ही म्हणता तशा फाँटमधे टाईप केले होते आणि पीडीएफ मधे होते. ते सर्व युनिकोड मधे टाईप करत बसणे अशक्यच होते. तेव्हा एका मित्राने असे परिवर्तन मधून कन्वर्ट करुन दिले. तीच चाळीस पानांत फक्त एका ठिकाणी एक कॅरेक्टर बदलावे लागले.

In reply to by गवि

http://www.ildc.in/Marathi/tools/5.htm या इथून मी परिवर्तन कन्वर्टर घेतला. तो पीडीएफ़ चं कन्वर्जन करीत नाही. वर्ड फाईलच करतो. तेही करून पाहिलं पण माझा kf kiran font त्याच्या कडून unicode मध्ये परावर्तित होऊ शकला नाही. अजून एखादा पर्याय सुचवू शकाल काय?

In reply to by अर्धवट

शुचि 26/08/2011 - 23:20
गणपा यांच्याशी विसूसकट सहमत. खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते. मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी.

In reply to by शुचि

खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते. >> धन्यवाद. आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी. >> अगदी सहमत. मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? >> हेही बरोबरच आहे. पण मी हा लढा फक्त स्वत:करिता दिलेला नाही इतकेच सांगतो. या त्रासाने पीडलेले इतरही काही सदस्य होते, ज्यांच्या कडे ही लढाई लढण्याची ऊर्जा नव्हती. मी ही लढाई त्यांच्या वतीने लढावी असा त्यांचा आग्रह होता. वास्तविक, त्यांच्याच आग्रहाखातर मी अनेक महिन्यानंतर या संकेत स्थळावर पुन्हा सक्रिय झालो आहे. आजच्या घडामोडीनंतर समाधान व्यक्त करणारे अनेक प्रतिसाद मला वैयक्तिक रीत्या संपर्क साधून देण्यात आले आहे. या लोकांच्या समाधानाने मी भरून पावलो.

In reply to by गणपा

कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. >> धन्यवाद. बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत. >> मलाही हेच म्हणायचंच, माझ्या बाकी धाग्यांवर काही खट्याळ प्रतिक्रिया दिल्यात त्याविषयी माझी काही तक्रार नाही पण इथे या धाग्यावर हे अपेक्षित नव्हतंच. हा पूर्णत: गंभीर वैद्यकीय विषयावरचा महत्वाची माहिती देणारा धागा आहे. त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. >> तेच करतोय. असे प्रतिसाद देण्यातही धागा वरती राहावा व जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ही वैद्यकीय माहिती पोचावी असा त्यांचा पवित्र उद्देश असावा असं म्हणू आणि त्यांचेही आभारच मानुयात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

इरसाल 26/08/2011 - 18:11
हुम्म्म्म. लवकर मुरलास रे बाबा. नाहीतर ह्या बरणीत एवढी जागा नव्हती. बाकी गणपा जे म्हणेल त्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो.

In reply to by इरसाल

मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर बर्‍याच प्रदीर्घ कालावधीची रजा घेऊन मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे. धन्यवाद.

शाहिर 26/08/2011 - 19:50
चांगले लिहित आहत वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !! हा धागा छान आहे .. ( अल्केमिस्ट पटला नव्हता अर्थात ते वैयक्तीक मत होता त्य वे ळी सांगितला ..अम्ही स्पष्ट बोलतो ..राग मानत जाउ नका )

In reply to by शाहिर

चांगले लिहित आहत >> हा धागा छान आहे >> प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे. वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !! >> निश्चितच. तसेही इथले अनेक असंबद्ध प्रतिसाद उडविले गेले आहेत असे दिसते.

In reply to by धनंजय

निश्चितच पण एक अडचण आहे. वरती प्रतिसादात लिहीलंय तीच फॉन्टची अडचण परिवर्तन कन्वर्टर वापरूनही दूर झालेली नाहीय. काही मदत करू शकाल काय? धन्यवाद.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

धनंजय 26/08/2011 - 21:37
मूळ फाँट कुठला आहे? मूळ फाँट युनिकोड नाही, असे दिसते आहे. युनिकोडऐवजी रोमनसाठी राखीव कोड-क्रमांक-संख्यांसाठी वेगळी चित्र-चिन्हे (ग्लिफ) योजलेली आहेत. (युनिकोडमध्ये देवनागरी चिन्हांसाठी वेगळ्या कोड-क्रमांक-संख्या राखीव आहेत.) याचा वेगळा युनिकोड कन्व्हर्टर उपलब्ध असावा. (अ‍ॅल्गोरिदम सोपा वाटतो, पण माझे प्रोग्रॅमिंग कौशल्य नगण्य आहे.)

In reply to by चेतन सुभाष गुगळे

धनंजय 29/08/2011 - 21:35
एफ किरण फॉन्टचे संकेतस्थळ बघितले. त्यातून दोन पायर्‍यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्‍याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित. परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते. खुद्द किरणवाल्यांनी युनिकोड->किरण प्रणाली लिहिली आहे (दुवा); परंतु किरण->युनिकोड दिशेने जाणारी प्रणाली लिहिण्यात त्यांना रस नसावा.

In reply to by धनंजय

निनाद 31/08/2011 - 07:06
कुणी तरी करा रे! दोन पायर्‍यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्‍याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित. परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते. कुणीच जावास्क्रिप्ट प्रोग्रामर येथे नाही का? इतकी महत्त्वाची माहिती विकीवर जाऊ शकत नाहीये. कुणी धनंजयशी संपर्क साधून त्वरेने हे काम करेल का? नंतर ते फॉन्ट कन्व्हर्टर विविध स्थळांवर ठेवता येईल. मी जागा, सर्व्हर आदी मदतीला तयार आहे!

In reply to by धनंजय

चांगला उपक्रम आहे. विकिपेडियावर माहिती टाकण्याची सूचना मनावर घ्यावी.
असंच म्हणतो. convert kiran font to unicode असं शोधल्यावर मला खालील पान सापडलं. पुढे शोधलं नाही, हे उपयोगी पडेल की नाही हेही माहीत नाही. पण कोणीतरी कधीतरी असे प्रयत्न केलेले दिसतात. http://old.nabble.com/Unicode-Conversion-Gateway-with-new-font-converters-td14022924.html

सहज 27/08/2011 - 09:57
शीर्षक वाचून इतकी प्रकरणे, ललीत कथा समजुन इग्नोर केले होते. धागा वर आला होता तेव्हा वाद दिसला होता म्हणूनही सोडून दिला होता. आता बघतो तर मराठीतून स्त्री आरोग्य विषयावर माहीती असलेली ही प्रकरणे दिसली. वाचली नाही, पण आशा आहे की वैद्यकीय दृष्ट्या बरोबर माहीती असावी. आणि महत्वाचे म्हणजे अश्या विषयांवर मराठी मधे जालावर माहीती उपलब्ध करुन दिलीत याचे कौतुक करावेसे वाटते. मराठी विकीवर ही माहीती जरुर यावी.

In reply to by सहज

धन्यवाद. विकीपीडीयावर टाकण्याची सूचनाही रास्त च आहे. गणपा व गवि यांनी बरीच मदत केली पण अजूनही ते साध्य झालेले नाही. प्रयत्न चालु आहे.

इथे अनेकांनी सूचना केली होती की ही माहिती विकीपीडिया वर टाकावी. त्याकरिता युनिकोड मध्ये रुपांतर करण्याची जी अडचण होती ती श्री. प्रतिक ठाकूर यांनी सोडविली. त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8 आता यांना पुढचे लेख द्यावेत का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अभिज्ञ 30/08/2011 - 18:19
आताच हा लेख वाचला. अतिशय उत्तम उपक्रम. त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. मिपासदस्य निनाद हे बहुतेक आपल्याला या बाबतीत मदत करु शकतील. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

निनाद 31/08/2011 - 07:18
माहितीचा प्रसार व्हावा असे वाटत असेल तर विकीवर लेखन द्याच! माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. परंतु येथे चेतनरावांना नक्की काय अपेक्षित आहे ते माझ्या लक्षात आले नाहीये. मी ते पान पाहिले तेथे विविध सदस्यांनी अनेकदा संपादन केले आहे. तसेच चेतनरावांच्या मूळ लेखाचा दुवाही खाली दिलेला आहे. विकीवरचे लेखन आणि इतर संकेतस्थळांवरचे लेखन यात फरक आहे. विकी हा मुक्तस्रोत आहे. तुमचे नाव विकिच्या लेखात येणार नाही. कुणाचेच नाव येत नाही. पण लेखाचा इतिहास पाहिला असता त्यात तुम्ही काय काय केले ते दिसून येते. तुम्हाला तुमच्या लेखाचा प्रताधिकार ठेवायचा असेल तर विकिवर लेखन देता येणार नाही. तुम्ही नक्की काय ते ठरवलेत तर कळवावे. मी मदतीस सदैव उत्सुक आहे!

साती 30/08/2011 - 12:07
चांगली माहिती. उत्सुकतेपोटी १-२ फायली वाचून पाहिल्या. वैद्यकीय दृष्ट्याही योग्य आहेत. तुम्ही स्वतः कष्ट घेऊन इतकं लिहिलं असेल तर तुमच्या मेहनतीला सलाम. डॉ.साती

In reply to by साती

धन्यवाद. मीच लिहीलंय. फक्त लिहीण्यापूर्वी डॉक्टरांशी सल्लामसलत केलीय. त्यांच्या इंग्रजी सल्ल्याचा अनुवाद केलाय. शिवाय इथे प्रकाशित करण्यापूर्वी अनुवादित लेखन डॉक्टरांकडून पुन्हा तपासून घेतलेलं आहे.

शाहिर 25/08/2011 - 18:23
अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे .. ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा...

In reply to by शाहिर

अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे >> धन्यवाद. शास्त्रीय संगीत, नृत्य, खेळ व किचकट अर्थशास्त्रीय आकडेमोड सोडल्यास इतर सर्व विषयातील ज्ञान मिळविण्याचा माझा सदैव प्रयत्न चालु असतो. त्या दृष्टीने वाचन, चिंतन, चर्चा, तज्ज्ञांकडून सल्ले मिळविणे हेही घडत असतेच. हा वैयक्तिक विकासाकरिता गरजेचा एक भाग आहे असे मी मानतो. ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा >> पुरूषांना देखील उपयोगी ठरावी. नात्यातल्या, परिचित अशा महिलांची त्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे. त्यांच्यापर्यंत ते ही माहिती पोचवू शकतात.

ऋषिकेश 26/08/2011 - 10:21
छे छे.. कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे).. खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते..

In reply to by ऋषिकेश

कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे) >> ही माहिती डॉक्टरांना पर्याय नाहीच. सध्या इतक्या प्रकारचे डॉक्टर झालेत (आणि त्यामुळे तितक्याच प्रकारचे विकारही उजेडात येऊ लागले आहेत) की कुठल्या डॉक्टर कडे कशा साठी जावे हे ही काहींना ठाऊक नसते. तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे. खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते.. >> शक्य तितके मराठी प्रतिशब्द योजले आहेतच. जिथे मी योजले नसतील परंतू वाचकांपैकी कुणाला ठाऊक असतील त्यांनी जरूर सूचवावेत, समाविष्ट केले जातील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अन्या दातार 26/08/2011 - 15:50
>>तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे. छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे?? बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! ;)

In reply to by अन्या दातार

छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे?? >> त्याविषयीची माहिती लेखात दिली आहे, वाचल्यास कळेल. बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! >> ही हसण्यासारखी बाब नाही. या आजारांकरिता अनेक जण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांकडे जात नाही म्हणूनच अशा जाहिराती लावणार्‍या भोंदुंचे फावते. तुमचा फार वेळ न घालवता याबाबत कल्पना यावी असे वाटत असेल प्रकरण क्रमांक अठरा : पॅप स्मिअर चाचणी हे तीन पानांचे प्रकरण वाचा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ही हसण्यासारखी बाब नाही. या आजारांकरिता अनेक जण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांकडे जात नाही म्हणूनच अशा जाहिराती लावणार्‍या भोंदुंचे फावते.
सहमत आहे. संकोचापोटी अंगावरच आजार काढणार्‍यांमधे स्त्रियांची संख्या जास्त आहे

In reply to by अन्या दातार

गवि 26/08/2011 - 16:03
इथल्याच दुसर्‍या लेखाचीसुद्धा लिंक सहसा देत नाही. पण इथे मोह आवरेना.. हे वाचा प्लीज प्लीजः http://www.misalpav.com/node/16782

गवि 26/08/2011 - 11:00
मराठीत या विषयांवर विकीपीडियावर पेजेस बनवली आहेत का? बनवली नसतील तर कृपया बनवावीत ही विनंती. विकिपीडियावर मराठी माहितीची कमतरता आहे. तिथे याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.

गणपा 26/08/2011 - 17:21
कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत. मिपाने एखादा लेख उघडण्या पुर्वी लेखाच आणि लेखकाच नाव दिसेल अशी सोयही दिली आहेच. माउसच बटण तुमच्याच हातात आहे. तेव्हा तुम्हाला काय आणि कुणाचे लेख वाचायचेत त्यावरच क्लीक करा की लेको. का उगा एखाद्यचा जीव खाता. त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. :) एक विसु : गणपा आणि चेतन सुभाष गुगळे हे आयडी एकाच व्यक्तीचे नाहीत. एथे या धाग्यावर जरी चेतन सुभाष गुगळे यांना समर्थन असल तरी ते केवळ याच धाग्या पुरता मर्यादित आहे. अन्य धाग्यांवरच्या शिमग्याशी संबंध जोडु नये.

In reply to by गणपा

गवि 26/08/2011 - 17:22
हेच म्हणतो. मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.

In reply to by गणपा

गवि 26/08/2011 - 17:22
हेच म्हणतो. मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.

In reply to by गवि

मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. >> होय तुमची सूचना व त्यामागचा उद्देश नक्कीच चांगला आहे, पण हे किरण फॉन्ट मधलं लेखन तिथे चिटकविता येईल का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 17:46
पीडीएफ टू युनिकोड करुन देणारे परिवर्तन म्हणून सॉफ्टवेअर मला वाटते सीडॅकच्या साईटवर फ्री आहे. त्यातून पीडीएफचे कन्वर्ट करुन घेतलेले युनिकोड ९९.९ टक्के शुद्ध आणि एरर फ्री असते असा अनुभव आहे. माझ्या बाबतीतही असेच मोठे लिखाण जे तुम्ही म्हणता तशा फाँटमधे टाईप केले होते आणि पीडीएफ मधे होते. ते सर्व युनिकोड मधे टाईप करत बसणे अशक्यच होते. तेव्हा एका मित्राने असे परिवर्तन मधून कन्वर्ट करुन दिले. तीच चाळीस पानांत फक्त एका ठिकाणी एक कॅरेक्टर बदलावे लागले.

In reply to by गवि

http://www.ildc.in/Marathi/tools/5.htm या इथून मी परिवर्तन कन्वर्टर घेतला. तो पीडीएफ़ चं कन्वर्जन करीत नाही. वर्ड फाईलच करतो. तेही करून पाहिलं पण माझा kf kiran font त्याच्या कडून unicode मध्ये परावर्तित होऊ शकला नाही. अजून एखादा पर्याय सुचवू शकाल काय?

In reply to by अर्धवट

शुचि 26/08/2011 - 23:20
गणपा यांच्याशी विसूसकट सहमत. खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते. मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी.

In reply to by शुचि

खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते. >> धन्यवाद. आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी. >> अगदी सहमत. मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? >> हेही बरोबरच आहे. पण मी हा लढा फक्त स्वत:करिता दिलेला नाही इतकेच सांगतो. या त्रासाने पीडलेले इतरही काही सदस्य होते, ज्यांच्या कडे ही लढाई लढण्याची ऊर्जा नव्हती. मी ही लढाई त्यांच्या वतीने लढावी असा त्यांचा आग्रह होता. वास्तविक, त्यांच्याच आग्रहाखातर मी अनेक महिन्यानंतर या संकेत स्थळावर पुन्हा सक्रिय झालो आहे. आजच्या घडामोडीनंतर समाधान व्यक्त करणारे अनेक प्रतिसाद मला वैयक्तिक रीत्या संपर्क साधून देण्यात आले आहे. या लोकांच्या समाधानाने मी भरून पावलो.

In reply to by गणपा

कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. >> धन्यवाद. बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत. >> मलाही हेच म्हणायचंच, माझ्या बाकी धाग्यांवर काही खट्याळ प्रतिक्रिया दिल्यात त्याविषयी माझी काही तक्रार नाही पण इथे या धाग्यावर हे अपेक्षित नव्हतंच. हा पूर्णत: गंभीर वैद्यकीय विषयावरचा महत्वाची माहिती देणारा धागा आहे. त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. >> तेच करतोय. असे प्रतिसाद देण्यातही धागा वरती राहावा व जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ही वैद्यकीय माहिती पोचावी असा त्यांचा पवित्र उद्देश असावा असं म्हणू आणि त्यांचेही आभारच मानुयात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

इरसाल 26/08/2011 - 18:11
हुम्म्म्म. लवकर मुरलास रे बाबा. नाहीतर ह्या बरणीत एवढी जागा नव्हती. बाकी गणपा जे म्हणेल त्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो.

In reply to by इरसाल

मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर बर्‍याच प्रदीर्घ कालावधीची रजा घेऊन मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे. धन्यवाद.

शाहिर 26/08/2011 - 19:50
चांगले लिहित आहत वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !! हा धागा छान आहे .. ( अल्केमिस्ट पटला नव्हता अर्थात ते वैयक्तीक मत होता त्य वे ळी सांगितला ..अम्ही स्पष्ट बोलतो ..राग मानत जाउ नका )

In reply to by शाहिर

चांगले लिहित आहत >> हा धागा छान आहे >> प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे. वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !! >> निश्चितच. तसेही इथले अनेक असंबद्ध प्रतिसाद उडविले गेले आहेत असे दिसते.

In reply to by धनंजय

निश्चितच पण एक अडचण आहे. वरती प्रतिसादात लिहीलंय तीच फॉन्टची अडचण परिवर्तन कन्वर्टर वापरूनही दूर झालेली नाहीय. काही मदत करू शकाल काय? धन्यवाद.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

धनंजय 26/08/2011 - 21:37
मूळ फाँट कुठला आहे? मूळ फाँट युनिकोड नाही, असे दिसते आहे. युनिकोडऐवजी रोमनसाठी राखीव कोड-क्रमांक-संख्यांसाठी वेगळी चित्र-चिन्हे (ग्लिफ) योजलेली आहेत. (युनिकोडमध्ये देवनागरी चिन्हांसाठी वेगळ्या कोड-क्रमांक-संख्या राखीव आहेत.) याचा वेगळा युनिकोड कन्व्हर्टर उपलब्ध असावा. (अ‍ॅल्गोरिदम सोपा वाटतो, पण माझे प्रोग्रॅमिंग कौशल्य नगण्य आहे.)

In reply to by चेतन सुभाष गुगळे

धनंजय 29/08/2011 - 21:35
एफ किरण फॉन्टचे संकेतस्थळ बघितले. त्यातून दोन पायर्‍यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्‍याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित. परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते. खुद्द किरणवाल्यांनी युनिकोड->किरण प्रणाली लिहिली आहे (दुवा); परंतु किरण->युनिकोड दिशेने जाणारी प्रणाली लिहिण्यात त्यांना रस नसावा.

In reply to by धनंजय

निनाद 31/08/2011 - 07:06
कुणी तरी करा रे! दोन पायर्‍यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्‍याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित. परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते. कुणीच जावास्क्रिप्ट प्रोग्रामर येथे नाही का? इतकी महत्त्वाची माहिती विकीवर जाऊ शकत नाहीये. कुणी धनंजयशी संपर्क साधून त्वरेने हे काम करेल का? नंतर ते फॉन्ट कन्व्हर्टर विविध स्थळांवर ठेवता येईल. मी जागा, सर्व्हर आदी मदतीला तयार आहे!

In reply to by धनंजय

चांगला उपक्रम आहे. विकिपेडियावर माहिती टाकण्याची सूचना मनावर घ्यावी.
असंच म्हणतो. convert kiran font to unicode असं शोधल्यावर मला खालील पान सापडलं. पुढे शोधलं नाही, हे उपयोगी पडेल की नाही हेही माहीत नाही. पण कोणीतरी कधीतरी असे प्रयत्न केलेले दिसतात. http://old.nabble.com/Unicode-Conversion-Gateway-with-new-font-converters-td14022924.html

सहज 27/08/2011 - 09:57
शीर्षक वाचून इतकी प्रकरणे, ललीत कथा समजुन इग्नोर केले होते. धागा वर आला होता तेव्हा वाद दिसला होता म्हणूनही सोडून दिला होता. आता बघतो तर मराठीतून स्त्री आरोग्य विषयावर माहीती असलेली ही प्रकरणे दिसली. वाचली नाही, पण आशा आहे की वैद्यकीय दृष्ट्या बरोबर माहीती असावी. आणि महत्वाचे म्हणजे अश्या विषयांवर मराठी मधे जालावर माहीती उपलब्ध करुन दिलीत याचे कौतुक करावेसे वाटते. मराठी विकीवर ही माहीती जरुर यावी.

In reply to by सहज

धन्यवाद. विकीपीडीयावर टाकण्याची सूचनाही रास्त च आहे. गणपा व गवि यांनी बरीच मदत केली पण अजूनही ते साध्य झालेले नाही. प्रयत्न चालु आहे.

इथे अनेकांनी सूचना केली होती की ही माहिती विकीपीडिया वर टाकावी. त्याकरिता युनिकोड मध्ये रुपांतर करण्याची जी अडचण होती ती श्री. प्रतिक ठाकूर यांनी सोडविली. त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8 आता यांना पुढचे लेख द्यावेत का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अभिज्ञ 30/08/2011 - 18:19
आताच हा लेख वाचला. अतिशय उत्तम उपक्रम. त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. मिपासदस्य निनाद हे बहुतेक आपल्याला या बाबतीत मदत करु शकतील. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

निनाद 31/08/2011 - 07:18
माहितीचा प्रसार व्हावा असे वाटत असेल तर विकीवर लेखन द्याच! माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही. परंतु येथे चेतनरावांना नक्की काय अपेक्षित आहे ते माझ्या लक्षात आले नाहीये. मी ते पान पाहिले तेथे विविध सदस्यांनी अनेकदा संपादन केले आहे. तसेच चेतनरावांच्या मूळ लेखाचा दुवाही खाली दिलेला आहे. विकीवरचे लेखन आणि इतर संकेतस्थळांवरचे लेखन यात फरक आहे. विकी हा मुक्तस्रोत आहे. तुमचे नाव विकिच्या लेखात येणार नाही. कुणाचेच नाव येत नाही. पण लेखाचा इतिहास पाहिला असता त्यात तुम्ही काय काय केले ते दिसून येते. तुम्हाला तुमच्या लेखाचा प्रताधिकार ठेवायचा असेल तर विकिवर लेखन देता येणार नाही. तुम्ही नक्की काय ते ठरवलेत तर कळवावे. मी मदतीस सदैव उत्सुक आहे!

साती 30/08/2011 - 12:07
चांगली माहिती. उत्सुकतेपोटी १-२ फायली वाचून पाहिल्या. वैद्यकीय दृष्ट्याही योग्य आहेत. तुम्ही स्वतः कष्ट घेऊन इतकं लिहिलं असेल तर तुमच्या मेहनतीला सलाम. डॉ.साती

In reply to by साती

धन्यवाद. मीच लिहीलंय. फक्त लिहीण्यापूर्वी डॉक्टरांशी सल्लामसलत केलीय. त्यांच्या इंग्रजी सल्ल्याचा अनुवाद केलाय. शिवाय इथे प्रकाशित करण्यापूर्वी अनुवादित लेखन डॉक्टरांकडून पुन्हा तपासून घेतलेलं आहे.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील. सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

जयंत कुलकर्णी ·

प्रचेतस 20/08/2011 - 09:41
हे नाणेघाटातील शिलालेख सातवाहन सम्राज्ञी राणी नयनिका (नागनिका) हिने खोदवून घेतले आहेत. ही सिमुक (श्रीमुख) सातवाहनाची सून व श्री सातकर्णीची पत्नी. सिमुक सातवाहनाला आज्ञ सातवाहन असे मानले जाते पण हे खरे नाही असे हल्लीच झालेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. सिमुक सातवाहनाचा पिता सातकर्णी (याचे नाव सातकर्णी असेच होते) याची काही नाणी नुकतीच मिळाली आहेत. या सातकर्णी नावावरूनच पुढच्या पिढ्यांना सातकर्णी हे पदनाम मिळाले. सिमुक सातकर्णी, श्री सातकर्णी आणि नयनिकेचा काळ अत्यंत वैभवशाली समजला जातो.
य व अलह....... सलसुर्य महतो मह......- अर्थ लागत नाही.
याचा अर्थ लेखक त्याची महती गात आहे असा होतो.
.४..सिरिस भारिया देवस पुत्रदस वरदस – कामदस धनदस – वेदसिरि-मातू सतिनो सिरिमतस च मातुय – सीम..... पथमय .... ५. वरिय ......आ – नागवरद्यिनिय मासोपवासिनिय गह- - तापसाय चरित ब्रह्मचरियाय दिखव्रतयणं सुंडाय – यणा हुता धूपनसुगंधानिय... .
याचा अर्थ ही श्रीला (श्री सातकर्णी)यास देवपण, काम, धन, पुत्र मिळवून देणारी अशी श्रीची भार्या आहे. नागाचे तिला वरदान आहे(म्हणून नागनिका). प्रत्येक महिन्याला उपवास करणारी ही गृहतापसी आहे. ब्रह्मचर्याचे पालन करणारी ही राणी आहे जिची किर्ती धूपाच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते. जयंतरावांच्या पुढच्या ओळींमध्ये सातवाहनांच्या काही यज्ञांचे व त्यात त्यांनी दिलेल्या दानांचे वर्णन आले आहे. त्यात अश्वमेध, अग्न्याध्येय, अन्वाध्येय, राजसूय, पुंडरीक, अतिरात्र इ. व अजूनही अनेक यज्ञांचे वर्णन आले आहे. पैकी अश्वमेध व राजसूय यज्ञ हे चक्रवर्ती सम्राटांनाच करता येत असत. त्यावरून त्या काळात भरतखंडातील सर्वाधिक प्रबळ साम्राज्य हे सातवाहनांचेच होते हे लक्षात येते. वर जयंतरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहनांना आंध्रभृत्य असे मानले जाते. त्यांनी आंध्र मावळचा जो उल्लेख केला आहे ते म्हणजे मावळातील आंध्रा नदीचे खोरे.(सध्याचे आंदर मावळ) पण या उपपत्तीला कसलाही पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. पण हे आंध्रप्रदेशातील खचितच नव्हेत. कारण सातवाहनांचे आजवर जे जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत ते सर्व ब्राह्मी प्राकृतात आहे (अगदी आंध्र प्रदेशातले सुद्धा) त्यातला एकही अपवादात्मकरित्याही तेलगूत (द्राविडी भाषांमध्ये) नाही. जयंत राव पुढचे भाग पटापट येउ द्यात आता.

In reply to by प्रचेतस

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते. वाचून गंमत वाटली. मातृसत्ताक पद्धती असली असे मानले जरी तर मग सर्वच राजे कसे काय झाले. कोणीच राणी शिलालेखात नाव येण्याच्या पलिकडे कशी काय गाजली नाही. स्त्रियाना मानसन्मान होता म्हणून सातकर्णी देखील गौतमीपुत्र असे बिरूद मिरवयचा व्गैरे ठी़क. मातृसत्ताक होते ना मग तरीपण राजाचीच नावे कशी काय टीकली. राण्यांची टिकायला पाहीजे होती. माझ्या बालबुद्धीला विवेचन पटले नाही. असो. पण भाषांतराबाबत मात्र आभार मानावे तितके कमीच. :) तुमच्या अभ्यासाचे, फिरस्तीचे कौतुक आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 20/08/2011 - 15:12
. मातृसत्ताक पद्धती असली असे मानले जरी तर मग सर्वच राजे कसे काय झाले.
येथे मातृसत्ताकचा शब्दशः अर्थ न घ्यावा. मातृसत्ताक अशा अर्थाने की सातवाहनाकाळात स्त्रियांना विशेषतः मातेला मान असे. सातवाहन हे वैदिक धर्माभिमानी असल्याने स्त्रियांना राज्यहक्क नव्हताच. तत्कालीन स्त्रीजीवनाची माहिती प्रामुख्याने आपस्तंभस्मृती, हालाची गाथासप्तशती व काही शिलालेखांवरून स्पष्ट होते. अर्थात हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय. पण राणी नागनिका आणि गौतमी बलश्री यांच्या हातामध्ये सत्ता मोठ्या प्रमाणावर एकवटली होती.

पैसा 20/08/2011 - 15:41
गाथा सप्तशती आणि सातवाहनांच्या शिलालेखाचं भाषांतर/रूपांतर दिल्याबद्दल जयंत कुलकर्णींना धन्यवाद! वल्लीची माहितीसुद्धा छान.

प्रचेतस 20/08/2011 - 20:31
त्या काळात प्रजापति हा एक महत्चाचा देव असावा असे दिसते
प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. यज्ञाच्या सुरुवातीला प्रजापतीला वंदन करणे हे वैदिक सातवाहनांच्या दृष्टीने उचितच आहे. इथे गणेश देवतेचा उल्लेख नाही. त्यामुळे सातवाहनकाळी गणपती हे दैवत फारसे प्रचलित नसावे. किंबहुना त्याकाळी मूर्तीपूजा अस्तिवात नसल्याने गणेशपूजन नसावेच.
महाभारतातला धर्मराज का “धर्म” याला हे कळत नाही
इथे 'धर्म' हाच यमधर्म नावानेही अभिप्रेत असावा. महाभारतातील धर्माला आजही दैवत मानले जात नाही व त्याकाळीही नसावे. यम हा लोकपालांपैकी एक असल्यानेही त्याचा परत उल्लेख आला असावा.
सातवाहनांना दक्षिणपथाचा राजा असे संबोधले आहे. याचा अर्थ दक्षिण दिशेच्या प्रदेशाचा राजा.
सातवाहनकाळी मथुरा ते पैठण असा उत्तर-दक्षिण दिशा जोडणारा प्रमुख सार्थवाहपथ होता. त्यालाच दक्षिणपथ असेही म्हणत. त्या प्रदेशावर सत्ता असणारा असाही एक समांतर अर्थ होउ शकतो.
महारठिचा अंगियकुलवर्धनाचा ?
अंगकुल किंवा अंगिरसकुल असेही असू शकेल. किंबहुना अंगिरस गोत्र आजही प्रचलित आहे. अग्नीची उपासना करणारे अर्थात यज्ञ करणारे असाही अर्थ होउ शकेल.
धेनू व गाई यातील फरक काय माहीत नाही.
धेनू म्हणजे बहुधा सवत्स गाई असाव्यात. कार्षपण म्हणजे चांदीची नाणी.
राया सिमुक-सात वाहनो सिरिमातो – राजा सिमुक शातवाहन श्रीमान याचा. देवि नायनिकाय रणो च सिर सातकनिनो. – देवी नायनिका राजा श्री शातकर्णी इचा. कुमारो भाय....- कुमार भाय.... महारथि त्र्यणकयिरो – मराठि त्र्यणकयिर कुमरो हकुसिरि.- कुमार हकुसिरि कुमारो सातवाहनो- कुमार सातवाहन.
इथे सातवाहनांचे समस्त कुल उल्लेखलेले आहे. सिमुख सातवाहन, त्याची सून नयनिका, तिचा पती श्री सातकर्णी, तिची मुले भाय(ल) (हा अल्पायुषी होता), हकुसिरी म्हणजे हकुश्री (हा स्त्रीलंपट होता आणि अल्पकाळच राज्यपदावर होता असे म्हणतात) आणि कुमार सातवाहन म्हणजे वेदिश्री सातकर्णी. महारठि त्र्यणकयिरो म्हणजे महारथी(येथे मराठी हा शब्द अभिप्रेत नाहीये) त्रिनकवीर. हा सातवाहनांचा महाअमात्य होता आणि राणी नयनिकेचा पिता. त्यामुळेच त्रिनकवीराचा उल्लेख नाणेघाटात आला आहे.
सोपारकर गोविंददास याचा दानधर्म असलेली ही पाणयोपी ( पाणपोयी)
सोपारकर म्हणजे सोपारा (शूर्पारक) अर्थात आजचा नालासोपारा येथील गोविंददास हा दाता. बघा म्हणजे या मार्गाला फक्त राजांचाच नाही तर जनतेचाही हातभार लागलेला दिसतो. हे पाण्याचे टाके कदाचित नंतरच्या काळात (म्हणजे नयनिकेनंतरच्या) खोदले गेलेले असावे.

In reply to by प्रचेतस

५० फक्त 22/08/2011 - 23:44
@ वल्ली, कंटाळा म्हणे, पोकळ बांबुचे फटके हवेत का, नाहीतर असं करा तुम्ही लेखमाला पुर्ण करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो थं***र्डसाठी, चालेल डील डील. पक्क्का. मग मला घेउन जा नाणेघाटात.

In reply to by प्रचेतस

स्पा 23/08/2011 - 10:06
श्रीयुत वल्ली यांना पुरेसा मस्का मारण्यात आलेला आहे हे ओळखून .. ते आता लेखमाला लिहायला सुरुवात करतील.. असे समजून चालत आहे... जकू लेख उत्तम... आणि वल्ली मस्त माहिती

मदनबाण 21/08/2011 - 11:25
उपयुक्त माहिती !!! यज्ञांची महती आपल्या ॠषी मुनींना ठावुक होती !!! १०० अश्वमेध यज्ञ केल्यास इंद्रपदाची प्राप्ती होते असा उल्लेख बर्‍याच पुराणात आढळुन येईल. जाता जाता :--- आता शास्त्रज्ञ मंडळींना देखील यज्ञाचे महत्व पटु लागले आहे... ;) संदर्भ :--- http://green.in.msn.com/greennews/article.aspx?cp-documentid=5200623 http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-05-27/vadodara/28157592_1_yagna-pollutants-banyan-tree

सूड 21/08/2011 - 11:35
अतिशय सुंदर लेख. वल्लीने दिलेली माहितीही आवडली. वल्ली: लेख लिहीच रे एखादा ( लेखमालिकाही चालेल, पण ही आपली बोलण्याची पद्धत ) !!

प्रचेतस 22/08/2011 - 17:38
जयंतराव, गाथासप्तशतीबद्दलही लवकरच येउ द्यात. अवांतरः गुणाढ्याची बृहत्कथाही सातवाहनकालीन आहे असे ऐकून आहे.

सविता००१ 23/08/2011 - 10:42
जयंत काका तुम्ही म्हणजे वर म्हट्ल्याप्रमाणे खरच पोटली बाबा की उघडून दाखवताय. मस्त. आणि वल्ली, तुम्हीही भराभर लिहा हो! खूप माहिती मिळते आहे.

In reply to by आशु जोग

प्रचेतस 24/08/2011 - 08:53
सातवाहनकालीन (सातवाहनांचे) शिलालेख हे ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत आहेत तर क्षत्रपांचे शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात आहेत. ब्राह्मीचेही प्राचीन ब्राह्मी, ब्राह्मी वगैरे प्रकार आहेत.

प्रचेतस 20/08/2011 - 09:41
हे नाणेघाटातील शिलालेख सातवाहन सम्राज्ञी राणी नयनिका (नागनिका) हिने खोदवून घेतले आहेत. ही सिमुक (श्रीमुख) सातवाहनाची सून व श्री सातकर्णीची पत्नी. सिमुक सातवाहनाला आज्ञ सातवाहन असे मानले जाते पण हे खरे नाही असे हल्लीच झालेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. सिमुक सातवाहनाचा पिता सातकर्णी (याचे नाव सातकर्णी असेच होते) याची काही नाणी नुकतीच मिळाली आहेत. या सातकर्णी नावावरूनच पुढच्या पिढ्यांना सातकर्णी हे पदनाम मिळाले. सिमुक सातकर्णी, श्री सातकर्णी आणि नयनिकेचा काळ अत्यंत वैभवशाली समजला जातो.
य व अलह....... सलसुर्य महतो मह......- अर्थ लागत नाही.
याचा अर्थ लेखक त्याची महती गात आहे असा होतो.
.४..सिरिस भारिया देवस पुत्रदस वरदस – कामदस धनदस – वेदसिरि-मातू सतिनो सिरिमतस च मातुय – सीम..... पथमय .... ५. वरिय ......आ – नागवरद्यिनिय मासोपवासिनिय गह- - तापसाय चरित ब्रह्मचरियाय दिखव्रतयणं सुंडाय – यणा हुता धूपनसुगंधानिय... .
याचा अर्थ ही श्रीला (श्री सातकर्णी)यास देवपण, काम, धन, पुत्र मिळवून देणारी अशी श्रीची भार्या आहे. नागाचे तिला वरदान आहे(म्हणून नागनिका). प्रत्येक महिन्याला उपवास करणारी ही गृहतापसी आहे. ब्रह्मचर्याचे पालन करणारी ही राणी आहे जिची किर्ती धूपाच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते. जयंतरावांच्या पुढच्या ओळींमध्ये सातवाहनांच्या काही यज्ञांचे व त्यात त्यांनी दिलेल्या दानांचे वर्णन आले आहे. त्यात अश्वमेध, अग्न्याध्येय, अन्वाध्येय, राजसूय, पुंडरीक, अतिरात्र इ. व अजूनही अनेक यज्ञांचे वर्णन आले आहे. पैकी अश्वमेध व राजसूय यज्ञ हे चक्रवर्ती सम्राटांनाच करता येत असत. त्यावरून त्या काळात भरतखंडातील सर्वाधिक प्रबळ साम्राज्य हे सातवाहनांचेच होते हे लक्षात येते. वर जयंतरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहनांना आंध्रभृत्य असे मानले जाते. त्यांनी आंध्र मावळचा जो उल्लेख केला आहे ते म्हणजे मावळातील आंध्रा नदीचे खोरे.(सध्याचे आंदर मावळ) पण या उपपत्तीला कसलाही पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. पण हे आंध्रप्रदेशातील खचितच नव्हेत. कारण सातवाहनांचे आजवर जे जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत ते सर्व ब्राह्मी प्राकृतात आहे (अगदी आंध्र प्रदेशातले सुद्धा) त्यातला एकही अपवादात्मकरित्याही तेलगूत (द्राविडी भाषांमध्ये) नाही. जयंत राव पुढचे भाग पटापट येउ द्यात आता.

In reply to by प्रचेतस

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते. वाचून गंमत वाटली. मातृसत्ताक पद्धती असली असे मानले जरी तर मग सर्वच राजे कसे काय झाले. कोणीच राणी शिलालेखात नाव येण्याच्या पलिकडे कशी काय गाजली नाही. स्त्रियाना मानसन्मान होता म्हणून सातकर्णी देखील गौतमीपुत्र असे बिरूद मिरवयचा व्गैरे ठी़क. मातृसत्ताक होते ना मग तरीपण राजाचीच नावे कशी काय टीकली. राण्यांची टिकायला पाहीजे होती. माझ्या बालबुद्धीला विवेचन पटले नाही. असो. पण भाषांतराबाबत मात्र आभार मानावे तितके कमीच. :) तुमच्या अभ्यासाचे, फिरस्तीचे कौतुक आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 20/08/2011 - 15:12
. मातृसत्ताक पद्धती असली असे मानले जरी तर मग सर्वच राजे कसे काय झाले.
येथे मातृसत्ताकचा शब्दशः अर्थ न घ्यावा. मातृसत्ताक अशा अर्थाने की सातवाहनाकाळात स्त्रियांना विशेषतः मातेला मान असे. सातवाहन हे वैदिक धर्माभिमानी असल्याने स्त्रियांना राज्यहक्क नव्हताच. तत्कालीन स्त्रीजीवनाची माहिती प्रामुख्याने आपस्तंभस्मृती, हालाची गाथासप्तशती व काही शिलालेखांवरून स्पष्ट होते. अर्थात हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय. पण राणी नागनिका आणि गौतमी बलश्री यांच्या हातामध्ये सत्ता मोठ्या प्रमाणावर एकवटली होती.

पैसा 20/08/2011 - 15:41
गाथा सप्तशती आणि सातवाहनांच्या शिलालेखाचं भाषांतर/रूपांतर दिल्याबद्दल जयंत कुलकर्णींना धन्यवाद! वल्लीची माहितीसुद्धा छान.

प्रचेतस 20/08/2011 - 20:31
त्या काळात प्रजापति हा एक महत्चाचा देव असावा असे दिसते
प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. यज्ञाच्या सुरुवातीला प्रजापतीला वंदन करणे हे वैदिक सातवाहनांच्या दृष्टीने उचितच आहे. इथे गणेश देवतेचा उल्लेख नाही. त्यामुळे सातवाहनकाळी गणपती हे दैवत फारसे प्रचलित नसावे. किंबहुना त्याकाळी मूर्तीपूजा अस्तिवात नसल्याने गणेशपूजन नसावेच.
महाभारतातला धर्मराज का “धर्म” याला हे कळत नाही
इथे 'धर्म' हाच यमधर्म नावानेही अभिप्रेत असावा. महाभारतातील धर्माला आजही दैवत मानले जात नाही व त्याकाळीही नसावे. यम हा लोकपालांपैकी एक असल्यानेही त्याचा परत उल्लेख आला असावा.
सातवाहनांना दक्षिणपथाचा राजा असे संबोधले आहे. याचा अर्थ दक्षिण दिशेच्या प्रदेशाचा राजा.
सातवाहनकाळी मथुरा ते पैठण असा उत्तर-दक्षिण दिशा जोडणारा प्रमुख सार्थवाहपथ होता. त्यालाच दक्षिणपथ असेही म्हणत. त्या प्रदेशावर सत्ता असणारा असाही एक समांतर अर्थ होउ शकतो.
महारठिचा अंगियकुलवर्धनाचा ?
अंगकुल किंवा अंगिरसकुल असेही असू शकेल. किंबहुना अंगिरस गोत्र आजही प्रचलित आहे. अग्नीची उपासना करणारे अर्थात यज्ञ करणारे असाही अर्थ होउ शकेल.
धेनू व गाई यातील फरक काय माहीत नाही.
धेनू म्हणजे बहुधा सवत्स गाई असाव्यात. कार्षपण म्हणजे चांदीची नाणी.
राया सिमुक-सात वाहनो सिरिमातो – राजा सिमुक शातवाहन श्रीमान याचा. देवि नायनिकाय रणो च सिर सातकनिनो. – देवी नायनिका राजा श्री शातकर्णी इचा. कुमारो भाय....- कुमार भाय.... महारथि त्र्यणकयिरो – मराठि त्र्यणकयिर कुमरो हकुसिरि.- कुमार हकुसिरि कुमारो सातवाहनो- कुमार सातवाहन.
इथे सातवाहनांचे समस्त कुल उल्लेखलेले आहे. सिमुख सातवाहन, त्याची सून नयनिका, तिचा पती श्री सातकर्णी, तिची मुले भाय(ल) (हा अल्पायुषी होता), हकुसिरी म्हणजे हकुश्री (हा स्त्रीलंपट होता आणि अल्पकाळच राज्यपदावर होता असे म्हणतात) आणि कुमार सातवाहन म्हणजे वेदिश्री सातकर्णी. महारठि त्र्यणकयिरो म्हणजे महारथी(येथे मराठी हा शब्द अभिप्रेत नाहीये) त्रिनकवीर. हा सातवाहनांचा महाअमात्य होता आणि राणी नयनिकेचा पिता. त्यामुळेच त्रिनकवीराचा उल्लेख नाणेघाटात आला आहे.
सोपारकर गोविंददास याचा दानधर्म असलेली ही पाणयोपी ( पाणपोयी)
सोपारकर म्हणजे सोपारा (शूर्पारक) अर्थात आजचा नालासोपारा येथील गोविंददास हा दाता. बघा म्हणजे या मार्गाला फक्त राजांचाच नाही तर जनतेचाही हातभार लागलेला दिसतो. हे पाण्याचे टाके कदाचित नंतरच्या काळात (म्हणजे नयनिकेनंतरच्या) खोदले गेलेले असावे.

In reply to by प्रचेतस

५० फक्त 22/08/2011 - 23:44
@ वल्ली, कंटाळा म्हणे, पोकळ बांबुचे फटके हवेत का, नाहीतर असं करा तुम्ही लेखमाला पुर्ण करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो थं***र्डसाठी, चालेल डील डील. पक्क्का. मग मला घेउन जा नाणेघाटात.

In reply to by प्रचेतस

स्पा 23/08/2011 - 10:06
श्रीयुत वल्ली यांना पुरेसा मस्का मारण्यात आलेला आहे हे ओळखून .. ते आता लेखमाला लिहायला सुरुवात करतील.. असे समजून चालत आहे... जकू लेख उत्तम... आणि वल्ली मस्त माहिती

मदनबाण 21/08/2011 - 11:25
उपयुक्त माहिती !!! यज्ञांची महती आपल्या ॠषी मुनींना ठावुक होती !!! १०० अश्वमेध यज्ञ केल्यास इंद्रपदाची प्राप्ती होते असा उल्लेख बर्‍याच पुराणात आढळुन येईल. जाता जाता :--- आता शास्त्रज्ञ मंडळींना देखील यज्ञाचे महत्व पटु लागले आहे... ;) संदर्भ :--- http://green.in.msn.com/greennews/article.aspx?cp-documentid=5200623 http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-05-27/vadodara/28157592_1_yagna-pollutants-banyan-tree

सूड 21/08/2011 - 11:35
अतिशय सुंदर लेख. वल्लीने दिलेली माहितीही आवडली. वल्ली: लेख लिहीच रे एखादा ( लेखमालिकाही चालेल, पण ही आपली बोलण्याची पद्धत ) !!

प्रचेतस 22/08/2011 - 17:38
जयंतराव, गाथासप्तशतीबद्दलही लवकरच येउ द्यात. अवांतरः गुणाढ्याची बृहत्कथाही सातवाहनकालीन आहे असे ऐकून आहे.

सविता००१ 23/08/2011 - 10:42
जयंत काका तुम्ही म्हणजे वर म्हट्ल्याप्रमाणे खरच पोटली बाबा की उघडून दाखवताय. मस्त. आणि वल्ली, तुम्हीही भराभर लिहा हो! खूप माहिती मिळते आहे.

In reply to by आशु जोग

प्रचेतस 24/08/2011 - 08:53
सातवाहनकालीन (सातवाहनांचे) शिलालेख हे ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत आहेत तर क्षत्रपांचे शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात आहेत. ब्राह्मीचेही प्राचीन ब्राह्मी, ब्राह्मी वगैरे प्रकार आहेत.
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.

दिवस फुलपाखरी (भाग १)

इंटरनेटस्नेही ·

गणपा 18/08/2011 - 17:23
नावावरुन ही गुडी गुडी कथा असावी असा समज होतोय. ते ढिश्क्लेमर का टाकलस उगा, खर सांग हे तुझं तुझ्या कालिजातल प्रकरण आहे का नाही? ;) किती भागांची मालीका आहे तेही आताच सांगुन टाक...इतरांसारख उगाच टांगुन ठेवलस तर याद राख.

In reply to by गणपा

धन्या 18/08/2011 - 17:34
गणपाभौशी आपण सहमत आहोत... वर जरी ढिश्क्लेमर टाकलं असलं तरी हे लेखकाच्या कॉलेजमधलंच (लेखकाचं ?) एक प्रकरण आहे हे लगेच कळतं. अनुभवाचे बोल ;) असो. छान लिहिलं आहे. (फुलपाखरी दिवसांवर काही लिहिलेलं छानच असणार राव ;) ) पुढचा भाग येऊदया लवकर... तुमच्या स्वारी, तुमच्या नायकाच्या प्रकरणात काय झालं ते भराभर सांगून टाका :)

प्रचेतस 18/08/2011 - 17:31
इंट्या, चांगले लिहित आहेस. फक्त कथा लिहिण्याच्या शैलीमध्ये थोडासा बदल कर. उदा. आपला नायक असे लिहिण्याऐवजी त्याच्या नावाने कथा सुरु कर. कदाचित पहिला भाग पात्रांची ओळख असल्यानेही या शैलीत लिहिले असशील.

In reply to by गणपा

'ती' दाक्षिणात्य आहे! कॅरेक्टर बदलंल असलं तरी, वय,जात, सोशल स्टेटस, फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे/होता तोच लिहिणार आहे मी. :)

In reply to by शुचि

सूड 18/08/2011 - 19:13
>>हाहाहा .... मग कितव्या भागात नायक विपश्यनेला जातोय रे ईंट्या शुचिकाकूंनी पार सिक्सरच मारलाय राव. बा द वे कथा वाचतोय, पुभाप्र.

In reply to by धन्या

शुचि 18/08/2011 - 19:16
बाजार नाही हो. तो इतका मनमिळाऊ आहे की त्याचे पाय ओढायला (पुलींगलेग्स) काही वाटत नाही. हक्काने त्याची खेचता येते. :)

In reply to by शुचि

हेच म्हणतो.. सर्व प्रतिसादकांना विनंती करतो की त्यांनी कसलीही भीड भाड न बाळगता, जो मनात येईल तो प्रतिसाद इथे द्यावा!

जाई. 18/08/2011 - 20:22
चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस. रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे. अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती. तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर . ती रसायने रोज डोक उठवायची. त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता. नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.

In reply to by जाई.

चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस.
धन्यवाद. :)
रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे.
ओके.
अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती. तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर . ती रसायने रोज डोक उठवायची. त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता. नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.
तुम्हा बी कॉमच्या विद्यार्थ्यांच्या शिव्याशापांमुळेच बहुदा आमच्या ७५ जणांच्या बॅच पैकी ३३ जणांना पहिल्याच सेमिस्टरला एटीकेटी लागली! :( पण बरं झालं तुम्ही आमच्या पेक्षा दोन वर्ष सीनीअर होतात ते.. नाहितर आणखीन जास्त शिव्याशाप खायला लागले असते. पण तरीदेखील तुम्हा बीकॉम स्टुडंट्सचे शाप इतके प्रभावी होते की तुम्ही पास आऊट होऊन दोन वर्ष होऊन सुद्धा, टीवायला.. म्हणजे महत्त्वाच्या वर्षाला देखील अर्ध्या बॅचची एटीकेटी शिवाय सुटका झाली नाही. :( - (बीएमएस रुपारेल), इंट्या.

पप्पु अंकल 18/08/2011 - 20:47
म्हणजे आता १०० नक्की
गणपा ओप्निंग ला व शुचि यांची बहारदार फटके बाजी........४ . ...६.....४......६......६..... १०० नक्की कथे सारख्याच प्रतिक्रिया पण शो...लेट

In reply to by कवितानागेश

आमची पहिली बॅच... रुपारेल बीएमएसची. मुंबई विद्यापीठा कडुन उशीरा परवानगी मिळाली म्हणुन ऑगस्ट मध्ये सुरु झाली.

In reply to by धनंजय

धन्या 18/08/2011 - 22:37
अ‍ॅनिव्हर्सरीच्या का? लेखक मराठी नायकाचे सौथ ईंडीयन पोरीशी लग्न लावेल, आणि मग ती दोघं सुखाने नांदू लागतील हा अंदाज तुम्ही कसा काय बांधलात ब्वा? :)

पैसा 18/08/2011 - 22:36
आत्मचरित्र लिहायला अजून खूप खूप वेळ आहे रे! ईस्टायल मात्र इतर कथांपेक्षा वेगळी वाटली, म्हणजे कॉलेजातली मुलं पिच्चरची ष्टोरी सांगतात तशी! अभ्यास चालू ठेवून पुढचे भाग लिही. कथेचा नायक व्हाया दारू विपश्यनेपर्यंत कसा पोचला हे वाचायची उत्सुकत आहेच!

In reply to by पैसा

धन्या 18/08/2011 - 22:41
इंटयाभौ, तुमचं आयुष्य ओपन बुक दिसतंय. सगळ्यांना सगळं माहितीय... ज्यांना माहिती नाही त्यांना या (सत्य) कथेतून माहिती होईल. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्पा 19/08/2011 - 12:13
परासरांचं क्यारेक्टर कसं रंगवलंय हे बघायची उत्सुकता आहे __/\__ बिका धन्य आहात :D नायकाचा पुणे भेटीचा प्रसंग वाचायला आवडेल इणत्या लिही रे बिनधास्त वाचतोय

५० फक्त 18/08/2011 - 23:08
आणि इंट्या लिहिता झाला, चला आजची तरुण पिढी फक्त बाबा, बुवा, बाई आणि अण्णाच्या मागे न लागता काहितरी त्या त्या वयात करण्यासारखं करतेय हे केवढं छान झालं. बादवे, इंट्या कोरीगडावर पोरगी बंगाली आहे असं बोलला होतास की रे, का तो भाग नंतर येईल , म्हणजे मी असं गॉप्यस्फोट नको होता करायला पण राहवलं नाही लं, असो पैसातै म्हणाल्या तसं अभ्यास सांभाळुन लिहि बरं उगा अडचण नको व्हायला अभ्यासात वपाडाव, अजुन एक पत्रिका घ्या छापायला.

अहो इंट्यास्वामी काही प्रश्नांची उत्तरे त्वरित देण्याचा प्रयत्न करावा अशी समस्त मिपाकरांकडून आपणास नम्र विनंती १. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईल २. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतो ३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो का ४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ? ५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ? (समस्त प्रतिक्रिया हलकीच घ्यावी ) माझीही छत्री :)

In reply to by माझीही शॅम्पेन

१. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईल
नायकाने ट्रेककरता म्हणुन रेनकोट वापरला होता. अदरवाईज मुंबई मध्ये अंब्रेलाच वापरणे सोयिस्कर आहे.
२. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतो
डिपेंड्स.. आजकाल नायकाला तिखट खायचा कंटाळा आला आहे.. म्हणुन.. नाहितर एकेकाळी आम्ही तिखट जेवणावर तुटुनच पडायचो.
३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो का
बीएमआय २५.१०. चालताना दम 'वैइगरे' लागत नाही.
४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ?
अजिबात नाही. नायकाला या दोन्ही वेगवेगळ्या परिवहन संस्थांबद्दल पुर्ण माहिती अजुन तो योग्य त्या नावानेच त्यांच्या सेवांचा निर्देश करतो.
५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ?
=)) प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही! :( -
माझीही छत्री
माझीही गावठी. ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

. . __/|\__ अरे मिपा स्टाईल उत्तरे त्वरित दिल्या बद्दल आतिजलद धन्यवाद
प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही
अरे लबाडा आतच सांगून टाकतोस की तूच नायक आहेस म्हणून बर पुढचे भाग लवकर यउद्या :)

In reply to by माझीही शॅम्पेन

किसन शिंदे 19/08/2011 - 12:53
ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा प्रतिसाद बघा कि त्यांच्या अंतर्यामी दॄष्टीने त्यांनी आधीच जाणलंय हि लेखकाचीच कहानी आहे. ;)

In reply to by किसन शिंदे

अरे किस्ना , गणपा ने केल ते प्रेडिक्षण आणि इंटेश ने केल ते कँफेक्शण :) माझीही वाइन आणि कँफेक्शरीज

In reply to by माझीही शॅम्पेन

सूड 20/08/2011 - 17:07
सौदिंडीयन नायकिणीचं आपलं ते हे.... नायिकेचं नाव शर्वरी वैगरे शोभत नाही. हरिप्रिया, दुर्गाभवानी, कनककिशोरी असं काहीतरी शोभलं असतं. नायिकेचं आजोळ मर्‍हाटी असल्यागत वाटतंय !! खरं का ??

स्पा 19/08/2011 - 12:28
छान इन्टया इंट्या छान कि लेख ;) --इंटुशा

५० फक्त 20/08/2011 - 07:24
''छान इन्टया येउ देत अजुन '' छान इन्ट्या यायला बराच वे़ळ लागेल हो अजुन, काही पुर्वतयारी केली असेल तर तसं काही बोलला नाही, का रे इंट्या ?

गणपा 18/08/2011 - 17:23
नावावरुन ही गुडी गुडी कथा असावी असा समज होतोय. ते ढिश्क्लेमर का टाकलस उगा, खर सांग हे तुझं तुझ्या कालिजातल प्रकरण आहे का नाही? ;) किती भागांची मालीका आहे तेही आताच सांगुन टाक...इतरांसारख उगाच टांगुन ठेवलस तर याद राख.

In reply to by गणपा

धन्या 18/08/2011 - 17:34
गणपाभौशी आपण सहमत आहोत... वर जरी ढिश्क्लेमर टाकलं असलं तरी हे लेखकाच्या कॉलेजमधलंच (लेखकाचं ?) एक प्रकरण आहे हे लगेच कळतं. अनुभवाचे बोल ;) असो. छान लिहिलं आहे. (फुलपाखरी दिवसांवर काही लिहिलेलं छानच असणार राव ;) ) पुढचा भाग येऊदया लवकर... तुमच्या स्वारी, तुमच्या नायकाच्या प्रकरणात काय झालं ते भराभर सांगून टाका :)

प्रचेतस 18/08/2011 - 17:31
इंट्या, चांगले लिहित आहेस. फक्त कथा लिहिण्याच्या शैलीमध्ये थोडासा बदल कर. उदा. आपला नायक असे लिहिण्याऐवजी त्याच्या नावाने कथा सुरु कर. कदाचित पहिला भाग पात्रांची ओळख असल्यानेही या शैलीत लिहिले असशील.

In reply to by गणपा

'ती' दाक्षिणात्य आहे! कॅरेक्टर बदलंल असलं तरी, वय,जात, सोशल स्टेटस, फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे/होता तोच लिहिणार आहे मी. :)

In reply to by शुचि

सूड 18/08/2011 - 19:13
>>हाहाहा .... मग कितव्या भागात नायक विपश्यनेला जातोय रे ईंट्या शुचिकाकूंनी पार सिक्सरच मारलाय राव. बा द वे कथा वाचतोय, पुभाप्र.

In reply to by धन्या

शुचि 18/08/2011 - 19:16
बाजार नाही हो. तो इतका मनमिळाऊ आहे की त्याचे पाय ओढायला (पुलींगलेग्स) काही वाटत नाही. हक्काने त्याची खेचता येते. :)

In reply to by शुचि

हेच म्हणतो.. सर्व प्रतिसादकांना विनंती करतो की त्यांनी कसलीही भीड भाड न बाळगता, जो मनात येईल तो प्रतिसाद इथे द्यावा!

जाई. 18/08/2011 - 20:22
चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस. रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे. अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती. तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर . ती रसायने रोज डोक उठवायची. त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता. नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.

In reply to by जाई.

चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस.
धन्यवाद. :)
रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे.
ओके.
अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती. तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर . ती रसायने रोज डोक उठवायची. त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता. नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.
तुम्हा बी कॉमच्या विद्यार्थ्यांच्या शिव्याशापांमुळेच बहुदा आमच्या ७५ जणांच्या बॅच पैकी ३३ जणांना पहिल्याच सेमिस्टरला एटीकेटी लागली! :( पण बरं झालं तुम्ही आमच्या पेक्षा दोन वर्ष सीनीअर होतात ते.. नाहितर आणखीन जास्त शिव्याशाप खायला लागले असते. पण तरीदेखील तुम्हा बीकॉम स्टुडंट्सचे शाप इतके प्रभावी होते की तुम्ही पास आऊट होऊन दोन वर्ष होऊन सुद्धा, टीवायला.. म्हणजे महत्त्वाच्या वर्षाला देखील अर्ध्या बॅचची एटीकेटी शिवाय सुटका झाली नाही. :( - (बीएमएस रुपारेल), इंट्या.

पप्पु अंकल 18/08/2011 - 20:47
म्हणजे आता १०० नक्की
गणपा ओप्निंग ला व शुचि यांची बहारदार फटके बाजी........४ . ...६.....४......६......६..... १०० नक्की कथे सारख्याच प्रतिक्रिया पण शो...लेट

In reply to by कवितानागेश

आमची पहिली बॅच... रुपारेल बीएमएसची. मुंबई विद्यापीठा कडुन उशीरा परवानगी मिळाली म्हणुन ऑगस्ट मध्ये सुरु झाली.

In reply to by धनंजय

धन्या 18/08/2011 - 22:37
अ‍ॅनिव्हर्सरीच्या का? लेखक मराठी नायकाचे सौथ ईंडीयन पोरीशी लग्न लावेल, आणि मग ती दोघं सुखाने नांदू लागतील हा अंदाज तुम्ही कसा काय बांधलात ब्वा? :)

पैसा 18/08/2011 - 22:36
आत्मचरित्र लिहायला अजून खूप खूप वेळ आहे रे! ईस्टायल मात्र इतर कथांपेक्षा वेगळी वाटली, म्हणजे कॉलेजातली मुलं पिच्चरची ष्टोरी सांगतात तशी! अभ्यास चालू ठेवून पुढचे भाग लिही. कथेचा नायक व्हाया दारू विपश्यनेपर्यंत कसा पोचला हे वाचायची उत्सुकत आहेच!

In reply to by पैसा

धन्या 18/08/2011 - 22:41
इंटयाभौ, तुमचं आयुष्य ओपन बुक दिसतंय. सगळ्यांना सगळं माहितीय... ज्यांना माहिती नाही त्यांना या (सत्य) कथेतून माहिती होईल. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्पा 19/08/2011 - 12:13
परासरांचं क्यारेक्टर कसं रंगवलंय हे बघायची उत्सुकता आहे __/\__ बिका धन्य आहात :D नायकाचा पुणे भेटीचा प्रसंग वाचायला आवडेल इणत्या लिही रे बिनधास्त वाचतोय

५० फक्त 18/08/2011 - 23:08
आणि इंट्या लिहिता झाला, चला आजची तरुण पिढी फक्त बाबा, बुवा, बाई आणि अण्णाच्या मागे न लागता काहितरी त्या त्या वयात करण्यासारखं करतेय हे केवढं छान झालं. बादवे, इंट्या कोरीगडावर पोरगी बंगाली आहे असं बोलला होतास की रे, का तो भाग नंतर येईल , म्हणजे मी असं गॉप्यस्फोट नको होता करायला पण राहवलं नाही लं, असो पैसातै म्हणाल्या तसं अभ्यास सांभाळुन लिहि बरं उगा अडचण नको व्हायला अभ्यासात वपाडाव, अजुन एक पत्रिका घ्या छापायला.

अहो इंट्यास्वामी काही प्रश्नांची उत्तरे त्वरित देण्याचा प्रयत्न करावा अशी समस्त मिपाकरांकडून आपणास नम्र विनंती १. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईल २. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतो ३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो का ४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ? ५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ? (समस्त प्रतिक्रिया हलकीच घ्यावी ) माझीही छत्री :)

In reply to by माझीही शॅम्पेन

१. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईल
नायकाने ट्रेककरता म्हणुन रेनकोट वापरला होता. अदरवाईज मुंबई मध्ये अंब्रेलाच वापरणे सोयिस्कर आहे.
२. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतो
डिपेंड्स.. आजकाल नायकाला तिखट खायचा कंटाळा आला आहे.. म्हणुन.. नाहितर एकेकाळी आम्ही तिखट जेवणावर तुटुनच पडायचो.
३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो का
बीएमआय २५.१०. चालताना दम 'वैइगरे' लागत नाही.
४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ?
अजिबात नाही. नायकाला या दोन्ही वेगवेगळ्या परिवहन संस्थांबद्दल पुर्ण माहिती अजुन तो योग्य त्या नावानेच त्यांच्या सेवांचा निर्देश करतो.
५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ?
=)) प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही! :( -
माझीही छत्री
माझीही गावठी. ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

. . __/|\__ अरे मिपा स्टाईल उत्तरे त्वरित दिल्या बद्दल आतिजलद धन्यवाद
प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही
अरे लबाडा आतच सांगून टाकतोस की तूच नायक आहेस म्हणून बर पुढचे भाग लवकर यउद्या :)

In reply to by माझीही शॅम्पेन

किसन शिंदे 19/08/2011 - 12:53
ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा प्रतिसाद बघा कि त्यांच्या अंतर्यामी दॄष्टीने त्यांनी आधीच जाणलंय हि लेखकाचीच कहानी आहे. ;)

In reply to by किसन शिंदे

अरे किस्ना , गणपा ने केल ते प्रेडिक्षण आणि इंटेश ने केल ते कँफेक्शण :) माझीही वाइन आणि कँफेक्शरीज

In reply to by माझीही शॅम्पेन

सूड 20/08/2011 - 17:07
सौदिंडीयन नायकिणीचं आपलं ते हे.... नायिकेचं नाव शर्वरी वैगरे शोभत नाही. हरिप्रिया, दुर्गाभवानी, कनककिशोरी असं काहीतरी शोभलं असतं. नायिकेचं आजोळ मर्‍हाटी असल्यागत वाटतंय !! खरं का ??

स्पा 19/08/2011 - 12:28
छान इन्टया इंट्या छान कि लेख ;) --इंटुशा

५० फक्त 20/08/2011 - 07:24
''छान इन्टया येउ देत अजुन '' छान इन्ट्या यायला बराच वे़ळ लागेल हो अजुन, काही पुर्वतयारी केली असेल तर तसं काही बोलला नाही, का रे इंट्या ?
(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच..

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

हवेतल्या गोष्टी - १

अर्धवट ·

योगी९०० 16/08/2011 - 10:19
वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका.. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?

प्रास 16/08/2011 - 10:22
अगदी विरळा विषय! आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल. :-)

निमिष ध. 16/08/2011 - 10:35
आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात. मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.

बद्दु 16/08/2011 - 11:59
वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

मेघवेडा 16/08/2011 - 18:04
ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;) लौकर फुडं लिवा मालक.. :)

समीरसूर 16/08/2011 - 17:38
सुरुवात आणि विषय! बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना.... अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)

श्रावण मोडक 16/08/2011 - 17:41
शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच. पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)

योगी९०० 16/08/2011 - 10:19
वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका.. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?

प्रास 16/08/2011 - 10:22
अगदी विरळा विषय! आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल. :-)

निमिष ध. 16/08/2011 - 10:35
आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात. मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.

बद्दु 16/08/2011 - 11:59
वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

मेघवेडा 16/08/2011 - 18:04
ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;) लौकर फुडं लिवा मालक.. :)

समीरसूर 16/08/2011 - 17:38
सुरुवात आणि विषय! बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना.... अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)

श्रावण मोडक 16/08/2011 - 17:41
शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच. पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)
3

अल्बर्ट स्पिअर - भाग - ६

जयंत कुलकर्णी ·

प्रास 15/08/2011 - 14:12
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीत खेळल्या जात असलेल्या राजकारणाची उत्तम माहिती या लेखात तुम्ही करून दिलेली आहे. ती वाचताना त्यावेळचा प्रसंगच नव्हे तर अगदी तो काळही विशेष करून डोळ्यापुढे उभा राहत आहे. पुन्हा एकदा म्हणतो, "उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्यावेत"
हा त्यावेळच्या जर्मनीतील राजकारणाचा नमुना होता....याच्यापेक्षाही भयंकर किस्से आहेत ते परत केव्हातरी....
नक्कीच वाचायला आवडतील. या लेखमालेतच होऊन जाऊ देत की...... तुमचा फ्यान :-)

In reply to by प्रास

पल्लवी 15/08/2011 - 19:34
>>>>>"उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्या" डिट्टो.

In reply to by प्राजु

प्राजू, माझ्या लेखनाचा वेग तुला भलताच आवडतो आहे असे दिसते. माझं "लेखन" तुला आवडण्यासाठी काय करावे लागेल ते सांग, म्हणजे प्रयत्न करता येईल. बहुतेक वेग कमी करावा लागेल का ? सध्या वेळ असल्यामुळे या गमजा चालल्या आहेत माझ्या ! :-)

५० फक्त 16/08/2011 - 10:35
या प्रकारचं राजकारण समजावुन करण्यासाठी जेवढी बुद्धीमता लागते जवळपास तेवढीच समजावुन घेण्यासाठी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करुन सांगितल्या बद्दल धन्यावाद जयंतसर. अवांतर - ५० वर्षांनी असेल लेखन अण्णा हजारेंबद्दल केले गेल्यास कसे होईल याची कल्पना करुन हसु येतंय .

किसन शिंदे 16/08/2011 - 11:37
हे काय, खाली क्रमश टाकायला विसरलात काय? लेखमाला पुढे चालू ठेवा, इतक्यात बंद करू नका. अवांतर: अल्बर्ट स्पिअरला बाजुला ठेवून हळूहळू हि मालिका हिटलर आणी त्याच्या आजूबाजूस असलेल्या राजकारणाच्या वाटेने जातेय असं वाटतयं.

In reply to by किसन शिंदे

अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता... मला वाटते असे केले तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल...

In reply to by जयंत कुलकर्णी

किसन शिंदे 16/08/2011 - 13:34
अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता... अल्बर्ट स्पिअरशी निगडीत राजकारण आणी घडामोडी आणी त्याबरोबरच न्युरेंबर्गचा खटला यावरच जास्त भर द्या, हेच म्हणायचं होतं मला

सविता००१ 16/08/2011 - 14:54
काका, मालिका इतकी सुंदर रंगत आहे की ती बंद करण्याची कल्पनाही सहन होत नाही. खूप माहीत नसलेल्या गोष्टी कळतायत मला.

प्रास 15/08/2011 - 14:12
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीत खेळल्या जात असलेल्या राजकारणाची उत्तम माहिती या लेखात तुम्ही करून दिलेली आहे. ती वाचताना त्यावेळचा प्रसंगच नव्हे तर अगदी तो काळही विशेष करून डोळ्यापुढे उभा राहत आहे. पुन्हा एकदा म्हणतो, "उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्यावेत"
हा त्यावेळच्या जर्मनीतील राजकारणाचा नमुना होता....याच्यापेक्षाही भयंकर किस्से आहेत ते परत केव्हातरी....
नक्कीच वाचायला आवडतील. या लेखमालेतच होऊन जाऊ देत की...... तुमचा फ्यान :-)

In reply to by प्रास

पल्लवी 15/08/2011 - 19:34
>>>>>"उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्या" डिट्टो.

In reply to by प्राजु

प्राजू, माझ्या लेखनाचा वेग तुला भलताच आवडतो आहे असे दिसते. माझं "लेखन" तुला आवडण्यासाठी काय करावे लागेल ते सांग, म्हणजे प्रयत्न करता येईल. बहुतेक वेग कमी करावा लागेल का ? सध्या वेळ असल्यामुळे या गमजा चालल्या आहेत माझ्या ! :-)

५० फक्त 16/08/2011 - 10:35
या प्रकारचं राजकारण समजावुन करण्यासाठी जेवढी बुद्धीमता लागते जवळपास तेवढीच समजावुन घेण्यासाठी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करुन सांगितल्या बद्दल धन्यावाद जयंतसर. अवांतर - ५० वर्षांनी असेल लेखन अण्णा हजारेंबद्दल केले गेल्यास कसे होईल याची कल्पना करुन हसु येतंय .

किसन शिंदे 16/08/2011 - 11:37
हे काय, खाली क्रमश टाकायला विसरलात काय? लेखमाला पुढे चालू ठेवा, इतक्यात बंद करू नका. अवांतर: अल्बर्ट स्पिअरला बाजुला ठेवून हळूहळू हि मालिका हिटलर आणी त्याच्या आजूबाजूस असलेल्या राजकारणाच्या वाटेने जातेय असं वाटतयं.

In reply to by किसन शिंदे

अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता... मला वाटते असे केले तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल...

In reply to by जयंत कुलकर्णी

किसन शिंदे 16/08/2011 - 13:34
अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता... अल्बर्ट स्पिअरशी निगडीत राजकारण आणी घडामोडी आणी त्याबरोबरच न्युरेंबर्गचा खटला यावरच जास्त भर द्या, हेच म्हणायचं होतं मला

सविता००१ 16/08/2011 - 14:54
काका, मालिका इतकी सुंदर रंगत आहे की ती बंद करण्याची कल्पनाही सहन होत नाही. खूप माहीत नसलेल्या गोष्टी कळतायत मला.
3

आज श्री. श्रीकृष्ण सामंत यांचा वाढदिवस

सुधीर काळे ·

सामंत साहेबांनी, मिपावर नियमित लिहावं असं मला नेहमीच वाटलं आहे. लहान-लहान कथेतून तात्पर्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या फेरफटका मारणा-या लेखनातून वाचायला मिळाले आहे. मिपाच्या सुरुवातीच्या काळानंतर त्याच्या लेखनावर अनेक प्रतिसाद आलेत. कधी-कधी तर लेखनावर प्रतिसाद आलेच नाहीत त्याची तमा त्यांनी बाळगली नाही. नियमित लिहित राहीले. आणि अचानक त्यांना काही कारणाने वाटायला लागले असावे की मिपा माझ्यासाठी नाही. आणि त्यांनी मिपावर लिहिणं सोडलं. (माझा अंदाज) सर्वच क्षेत्रातील लहान-थोर मराठी माणसं मिपावर असावीत असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यापेकी मीही एक. गेल्या वर्षी सामंत साहेबांना मिपावर लिहायला या असं मी म्हटलं होतं त्यांचा स्पष्ट नकार नव्हता मात्र आपलं कृष्ण उवाच ठीक आहे, असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. असो, ज्यांचा ज्यांचा सामतंसाहेबांशी परिचय आहे, त्यांनी त्यांनी पुन्हा एकदा आपलं मिपा आता पूर्वीपेक्षा अधिक समजदार* झालंय तेव्हा पुन्हा लिहायला या असं प्रेमळ साकडं घालायला हरकत नाही. मी तर पुन्हा एकदा त्यांना विनंती करुन पाहणार आहेच. बहुतेक मागील वर्षी असाच एक धागा आला होता. तेव्हा त्या धाग्याची लिंक मी त्यांना दिली होती त्या धाग्यातील सहजराव यांचा प्रतिसाद त्यांना वास्तवाला धरुन असा वाटला होता असे त्यांनी म्हटल्याचे आठवते. आता धागा आणि प्रतिसाद शोधायचा कंटाळा आला आहे. सामंत साहेबांचा ब्लॉग कृष्ण उवाच इथे वाचायला मिळेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शैलेन्द्र 14/08/2011 - 11:35
प्रतीसाद आवडला.. सावंतकाकांचे लेखन न आवडणारा एक वर्ग मीपावर होता आणि आहे, पण आपल्याला न आवडणार्‍या लेखांकडे/ शैलीकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचा समंजसपणा बरेच जण दाखवतात(काहींनी त्यावेळी नाही दाखवला). टिका करावी, पण बोचकारु नये, खास करुन, हौशा- नवशा- गवश्यांसाठीच स्थापण झालेल्या आंतरजालीय संस्थळावर नेहमीच एका दर्जाचे लेखन येइल अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे आहे.. कधीकधी, लेखक घडत असताना सुरवातीचा माल कच्चा निघतो.. आपण चांगल वेचत पुढे सरकणे हेच आपल्या हाती असतं..

In reply to by शैलेन्द्र

प्रियाली 14/08/2011 - 17:51
सावंत नाही सामंत! सामंत हे स्वतंत्र आडनाव असून सावंतांशी त्यांचा फारसा संबंध नाही. बाकी, सामंत यांना दीर्घायुष्य लाभो.

रेवती 14/08/2011 - 21:10
सामंतकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांनी पुन्हा मिपावर यावं असं वाटतच आहे. पण मागच्यावर्षी दुसर्‍या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी लिहिलेल्या लेखातील क्षुल्लक चुका काढून तरूणांनी जो मोठेपण दाखवला त्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत. मी पुन्हा एकदा विनंती करते की ज्येष्ठ्यांच्या अनुभव कथनासाठी स्वतंत्र विभाग करावा म्हणजे ज्यांना वाचायचे असेल तेच फक्त तिथे येतील. कोणतेही फालतू प्रतिसाद खपवून घेतले जाऊ नयेत. सामंतकाकांची अनेकदा चेष्टा झाली होती. आपल्याला लेखन आवडले नसेल तर प्रतिसाद न देणे इष्ट पण खिल्ली उडवण्याइतके आपण समवयस्क नसतो आणि महान तर नसतोच नसतो.

सामंत साहेबांनी, मिपावर नियमित लिहावं असं मला नेहमीच वाटलं आहे. लहान-लहान कथेतून तात्पर्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या फेरफटका मारणा-या लेखनातून वाचायला मिळाले आहे. मिपाच्या सुरुवातीच्या काळानंतर त्याच्या लेखनावर अनेक प्रतिसाद आलेत. कधी-कधी तर लेखनावर प्रतिसाद आलेच नाहीत त्याची तमा त्यांनी बाळगली नाही. नियमित लिहित राहीले. आणि अचानक त्यांना काही कारणाने वाटायला लागले असावे की मिपा माझ्यासाठी नाही. आणि त्यांनी मिपावर लिहिणं सोडलं. (माझा अंदाज) सर्वच क्षेत्रातील लहान-थोर मराठी माणसं मिपावर असावीत असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यापेकी मीही एक. गेल्या वर्षी सामंत साहेबांना मिपावर लिहायला या असं मी म्हटलं होतं त्यांचा स्पष्ट नकार नव्हता मात्र आपलं कृष्ण उवाच ठीक आहे, असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. असो, ज्यांचा ज्यांचा सामतंसाहेबांशी परिचय आहे, त्यांनी त्यांनी पुन्हा एकदा आपलं मिपा आता पूर्वीपेक्षा अधिक समजदार* झालंय तेव्हा पुन्हा लिहायला या असं प्रेमळ साकडं घालायला हरकत नाही. मी तर पुन्हा एकदा त्यांना विनंती करुन पाहणार आहेच. बहुतेक मागील वर्षी असाच एक धागा आला होता. तेव्हा त्या धाग्याची लिंक मी त्यांना दिली होती त्या धाग्यातील सहजराव यांचा प्रतिसाद त्यांना वास्तवाला धरुन असा वाटला होता असे त्यांनी म्हटल्याचे आठवते. आता धागा आणि प्रतिसाद शोधायचा कंटाळा आला आहे. सामंत साहेबांचा ब्लॉग कृष्ण उवाच इथे वाचायला मिळेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शैलेन्द्र 14/08/2011 - 11:35
प्रतीसाद आवडला.. सावंतकाकांचे लेखन न आवडणारा एक वर्ग मीपावर होता आणि आहे, पण आपल्याला न आवडणार्‍या लेखांकडे/ शैलीकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचा समंजसपणा बरेच जण दाखवतात(काहींनी त्यावेळी नाही दाखवला). टिका करावी, पण बोचकारु नये, खास करुन, हौशा- नवशा- गवश्यांसाठीच स्थापण झालेल्या आंतरजालीय संस्थळावर नेहमीच एका दर्जाचे लेखन येइल अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे आहे.. कधीकधी, लेखक घडत असताना सुरवातीचा माल कच्चा निघतो.. आपण चांगल वेचत पुढे सरकणे हेच आपल्या हाती असतं..

In reply to by शैलेन्द्र

प्रियाली 14/08/2011 - 17:51
सावंत नाही सामंत! सामंत हे स्वतंत्र आडनाव असून सावंतांशी त्यांचा फारसा संबंध नाही. बाकी, सामंत यांना दीर्घायुष्य लाभो.

रेवती 14/08/2011 - 21:10
सामंतकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांनी पुन्हा मिपावर यावं असं वाटतच आहे. पण मागच्यावर्षी दुसर्‍या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी लिहिलेल्या लेखातील क्षुल्लक चुका काढून तरूणांनी जो मोठेपण दाखवला त्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत. मी पुन्हा एकदा विनंती करते की ज्येष्ठ्यांच्या अनुभव कथनासाठी स्वतंत्र विभाग करावा म्हणजे ज्यांना वाचायचे असेल तेच फक्त तिथे येतील. कोणतेही फालतू प्रतिसाद खपवून घेतले जाऊ नयेत. सामंतकाकांची अनेकदा चेष्टा झाली होती. आपल्याला लेखन आवडले नसेल तर प्रतिसाद न देणे इष्ट पण खिल्ली उडवण्याइतके आपण समवयस्क नसतो आणि महान तर नसतोच नसतो.
आज आपले एकेकाळचे वयोवृद्ध-ज्ञानवृद्ध सहसभासद (अजूनही सभासद आहेत?) श्री श्रीकृष्ण सामंत यांचा वाढदिवस! त्यांना त्याबद्दल शुभेच्छा आणि त्यांचे अभिष्टचिंतन! त्यांनी इथे संपर्क साधल्यास आनंद वाटेल. शुभचिंतक, सुधीर काळे