उपनिषदे-६
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
-महावाक्ये
उपनिषदांमधील तत्वज्ञानाचे सार असलेली काही वाक्ये "महावाक्ये" म्हणून प्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचार्यांपासून अनेकांनी त्यावर विवरणे/भाष्ये लिहली आहेत. उपनिषदांचे सार काय ? आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य. हे एकत्व निरनिराळ्या उपनिषदांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहे.
पुढील वाक्यांना महावाक्ये म्हणतात.
(१) प्रज्ञानं ब्रह्म. ऐतरेय उपनिषद (३.३)
(२) अहं ब्रह्मास्मि बृहदारण्यक उपनिषद (१.४.१०)
(३) तत्वमसि छांदोग्य उपनिषद ( ६.८.७, ९.४, १०.३, ११.२ इत्यादि)
(४) अयमात्मा ब्रह्म मांडुक्य उपनिषद (१.२)
प्रज्ञानं ब्रह्म
ऐतरेय उपनिषदाची उपपत्ती आहे " सृष्टीतील समस्त स्थावर-जंगम वस्तू, पृथ्वीवरील समस्त प्राणी, आकाशातील समस्त पक्षी, तसेच समस्त पंचमहाभूते आणि देवता ही सारी "प्रज्ञे"मध्ये अंतर्भूत होतात आणि प्रज्ञेमुळेच ती जिवंत राहतात." मनाच्या आश्रयावाचून राहू शकणारी एकही स्वतंत्र वस्तू इहलोकी अस्तित्वात नाही. संज्ञान, अज्ञान, प्रज्ञान, मेधा, दृष्टि, धृति, मति, मनिषा, ससंकल्प, ऋतु, प्राण, इ. मनोवृत्तीही "चित्त" चीच नामांतरे होत. चित्त (चैतन्य) किंवा प्रज्ञा हे मनोभावनांचेच नव्हे तर ब्रह्माचेही अधिष्ठान आहे असा सिद्धांत येथे विशद केला आहे.प्रत्येक शरीरात शरीरेंद्रियसमुहापेक्षा विलक्षण असलेले हे चैतन्यच ब्रह्म होय.
अहं ब्रह्मास्मि
"अहं" म्हणजे "मी" नव्हे. मी, माझा असे म्हणणे म्हणजे अहंभाव. हा सोडून दिला पाहिजे. शरीराला वगळले म्हणजे काय उरते ? शरीरातील चैतन्य हे चैतन्य म्हणजेच आत्मा. हा आत्मा सर्वत्र आहे. आणि म्हणूनच आत्मा म्हणजेच ब्रह्म. अहं ब्रह्मास्मि याचा अर्थ आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत.
तत्त्वमसि
सृष्टीच्यापूर्वी जी वस्तु होती व नंतरही राहणार आहे ती वस्तु म्हणजेच "तत्" थोडक्यात "ब्रह्म" "त्वम्" म्हणजे "तू". वर पाहिल्याप्रमाणे तू म्हणजे तुझे शरीर नव्हे तर तुझ्या शरीरातील आत्मा. असि म्हणजे आहेस.
आरुणि ऋषी आपल्या मुलाला, श्वेतकेतूला निनिराळी उदाहरणे देवून सांगत आहेत की ब्रह्म (तत्) व आत्मा (त्वम्) एकच आहेत (असि)
अयमात्मा ब्रह्म
मांडुक्य उपनिषदात "ॐ" चे चार पद कल्पिले आहेत. अ, उ, म व तुरीय. त्यांचे काल भूत, वर्तमान, भविष्य व कालातीत. चतुर्विध मानसिक अवस्था "जागृति’, "स्वप्न", "सुषुप्ति" व "तुरीय" यांचेच विवरण येथे केले आहे. ॐ हा आत्म्याचेच वर्णन करत असला तरी त्याचा चतुर्थपाद हा स्वप्रकाशरूप व अपरोक्ष (प्रत्यक्ष) आहे.त्याला अयम् म्हटले असून हा आत्मा ब्रह्मच आहे असे प्रतिपादले आहे.
चारही महावाक्ये एकच गोष्ट वेगवेगळ्य़ा प्रकारांनी सांगतात. हत्तीची गोष्ट सर्वशृत आहेच, कुणी सोंड तर कुणी शेपुट वर्णन करतो, तसेच.
पुढील भागात उपसंहार करून निरोप घेतो. (हुss ष्य..ऐकले बरे का !}
शरद
प्रतिक्रिया
खूप छान.
आदरणीय शरद सर,
वाचते आहे.