कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
-----
परवा तू अचानक आलीस
दारात तुला पाहुन चमकलो
मग सुखावलो
येतांना तू आणलेला मोगरा
सगळं घर व्यापून उरला
गजरा करायला घेतला
तुझ्या केसात माळतांना
अवचित एक गाठ सुटली
गजरा विखुरला, अन्
एकदम जाग आली
----
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फार जीवघेणी असते नाही?
------
किनार्यावर एकटचं भटकतांना
'तो' खडक दिसला
पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली
तासन् तास त्या खडकावर
सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं
आता कां कोण जाणे
'तो' खडक खुपच
ओबडधोबड वाटला
बेढब दिसला
---
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
----
शेवटी काय
पाऊस जाण्यासाठीच येतो
जीवघेणी शांतता
तेवढी राहते सोबतीला
---
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०८/२०१६)
वाचने
5387
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
सुरेख!
सुंदर!
अहाहा!!
अगदी..
In reply to अहाहा!! by निखिल निरगुडे
वाह मिका
मस्स्स्स्स्स्त
.
एक नंबर
Class
अप्रतिम रे
मस्त रे मिका...
अह्हाहाहा,
+१
In reply to अह्हाहाहा, by अभ्या..
कास्ताद!!!
सुंदर!!
सुंदर
सुंदर..
अप्रतिम!!
अरे खास च कविता मि का भाऊ.
मिका टच
In reply to अरे खास च कविता मि का भाऊ. by उडन खटोला
खूप छान
जीवघेणं लिहितोस.
छान....!
खासच !
मी कविता सहसा वाचत नाही. एकतर
सही?
In reply to मी कविता सहसा वाचत नाही. एकतर by मृत्युन्जय
अहा!
दंडवत!
परवा तू अचानक आलीस
मि.का ३वार _/\_
खूप सुंदर