युपीए-२ आले आणि डाव्यांशिवाय बनलेले हे सरकार बरेच काही करेल अशी आशा जागृत झाली. मात्र प्रत्यक्षात एकच नव्हे तर अनेक आघाड्यांवर सत्ताधारी कोंडीत सापडले. खरं तर ते तसे सापडले असते. मात्र सध्या विरोधी पक्षाने एखादा मुद्दा हाती घ्यावा आणि तो पूर्णत्त्वास न नेताच दुसरीकडे वळावे असे चालले आहे.
गेल्या काहि दिवसांत भ्रष्टाचारासंबीधी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली. राष्ट्रकूल घोटाळा, आदर्श घोटाळा वगैरेंबरोबरच ३जी घोटाळ्याने तर भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात पुढे आला. (प्रथेप्रमाणे) विरोधी पक्ष आक्रमक झाला. जेपीसी साठी रान माजवले पण पुढे? जेपीसी नाही मिळाली तर लोकांमधे जाऊन आंदोलन करणार अश्या घोषणा झाल्या पण कसले काय? भ्रष्टाचाराविरूद्ध रान माजवून सरकारला पळता भुई थोडी करायची सोडून विरोधी पक्षांनी आपणहूनच प्रश्न सोडून दिला.
बरं पुढे अचानक कांदे आणि त्यापाठोपाठ भाज्या आणि शेवटी पेट्रोलचे भाव वाढले आणि महागाई विरूद्ध विरोधक आक्रमक होताहेत असं वाटलं. आपले थोर कृषीमंत्री तर बिंदास भाववाढ अटळ आहे वगैरे वक्तव्य करत असताना विरोधक अचानक शांत झाले.
याशिवाय लवासा, शेतकर्यांच्या आत्महत्या, तेलंगाणा वगैरे अनेक अंगांनी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याऐवजी आतापर्यंत विकासासाठी आक्रमक होतो आहे अशी अशा देणारा विरोधी पक्षाने पुन्हा एक'काश्मिरात झेंडा फडकवायचा' असे भावनात्मक आवाहन केले. अर्थातच महागाई, भ्रष्टाचार, शेतमालाला कमी भाव, चुकीची वितरण व्यवस्था वगैरेंवर सरकारचे आसन डळमळीत करू शकणारे प्रश्न सोडून विरोधी पक्षांचे काश्मिरातील झेंडे वगैरे भंपक आणि पोकळ भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण सुरू करणे सरकारच्या पथ्यावरच पडते आहे.
तुम्हाला काय वाटते? विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का? का अजूनही विकासाचे राजकारण करू न इच्छिता ते मुद्दामहून भावनाप्रधान, पण दिवसअखेर काहिहि न मिळवून देणार्या हीन दिशेलाच जाऊ इच्छितात?
वाचने
9379
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
गृहीतक तपासणे इष्ट आहे
दर पाच वर्षांनी जसे सरकार
In reply to गृहीतक तपासणे इष्ट आहे by पंगा
आणि सत्ता मिळाल्यावर?
In reply to दर पाच वर्षांनी जसे सरकार by ऋषिकेश
लेखातील विचारांशी सहमत आहे.
प्रश्न प्राथमिकतेचा
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
ऋ, प्राथमिकता ही राष्ट्राच्या
In reply to प्रश्न प्राथमिकतेचा by ऋषिकेश
अजुन किंचित भर
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
चुक विरोधी पक्षाची नाही आहे.
अपयशी सरकार
In reply to चुक विरोधी पक्षाची नाही आहे. by मृत्युन्जय
काँग्रेस हितचिंतक थत्तेचाचा ...
छान विषय...
सहमत मात्र..
In reply to छान विषय... by प्रसन्न केसकर
दादा...
In reply to सहमत मात्र.. by ऋषिकेश
वा!
In reply to दादा... by प्रसन्न केसकर
थोडा वेगळा प्रश्न...
हम्म्म प्रतिसाद आवडला.. सहमत
In reply to थोडा वेगळा प्रश्न... by विकास
उत्तम चर्चा
सदनातील दंग्याकडे...
In reply to उत्तम चर्चा by सहज
नैतिक बळ
बेगडी देशप्रेम
छान आणि समयोचित धागा
धन्यवाद काळेकाका...
In reply to छान आणि समयोचित धागा by सुधीर काळे
किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत?
In reply to धन्यवाद काळेकाका... by प्रसन्न केसकर
अनेक प्रश्न असतात...
In reply to किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत? by सुधीर काळे
बा प रे !! डें ज र !!
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
:-(
In reply to बा प रे !! डें ज र !! by टारझन
बघू भविष्यकाळात काय दडून बसले आहे!
In reply to :-( by सहज
मिडियाचे हितसंबंध
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
प्रायव्हेट ट्रीटीज...
In reply to मिडियाचे हितसंबंध by क्लिंटन
हितसंबंध
In reply to प्रायव्हेट ट्रीटीज... by प्रसन्न केसकर
बरोबर पण अर्धवट...
In reply to हितसंबंध by नितिन थत्ते
+१
In reply to बरोबर पण अर्धवट... by प्रसन्न केसकर
भाववाढीबाबत भाजपला दोष नाही
भाववाढीला काही प्रमाणात "
अशा वेळी सर्व माध्यमांनी खूप बोभाटा करायला हवा!