परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ३
२१ मे २०२४: ध्यानाचा दुसरा दिवस.
पहाटे ५:३०ला कोणताही अलार्म न लावता आपोआप जाग आली. खरेतर थंडगार हवेच्या झुळुकेने , समोरून येणाऱ्या उगवत्या सूर्याच्या किरणांनी , पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगेच किचन मध्ये येऊन गरम पाणी पिले. इथे चहा नाही , साखरही नाही, तस्मात मला प्रातःआवेगाची चिंता लागुन होती. पोट रिकामे असणे ही ध्यानासाठीची मुलभुत आवश्यकता आहे ! अर्थात योग्य वेळेस जेवण , योग्य वेळेस झोप अन योग्य वेळेस जाग असे केल्यास सर्वच शरीर नियमीतपणे यंत्रवत चालु लागते ह्याचा पुढील काही दिवसात अनुभव आला.
नित्यनेम आटोपले , त्यानंतर लगेच ध्यानाला पळालो.