✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(विचार)मंथन!

र
राघव यांनी
Fri, 01/23/2009 - 20:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5038 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/23/2009 - 20:39 नवीन

बुद्धी हे

बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही! सही.... सुहास (सध्यातरी मी कशासाठी जगतोयपेक्षा...कुठे जगतोय याचाच जास्त विचार करणारा...) ब॑गळूरात कुठे आहात(मीही सध्या ईथेच्...E-cityमध्ये)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 20:40 नवीन

चांगले

चांगले स्फुट ! कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आणि त्यामुळे शाश्वत असे ध्येय सुद्धा नाही. कितीही महापुरुषांची नावे घेतली तरी 'मातीवर चढणे एक नवा थर अंती' हीच वस्तुस्थिती आहे. आपण सुखासाठी जगतो. आज दु:ख असेल तर उद्या सुख मिळेल या आशेने दिवस ढकलतो. जीवन संपवावेसे वाटणे हे स्वाभाविक वाटते आणि तसे करणे गैर वाटत नाही. तरीही पुढे सुख येण्याची शक्यता असल्याने तिकडे डोळे लाउन जगणे हा जुगार फायदासुद्धा मिळवून देतो... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 01/23/2009 - 20:51 नवीन

खुपच छान

खुपच छान विचार व्यक्त केले आहेस... मनापासून आवडले. मी शेयर बझार मध्ये लुटला म्हणून आत्महत्या करणारे.... प्रेमासाठी जिव देणारे... काहीच करु शकत नाही ह्या निराशेतून जिव देणारे ह्या तीन कॅटेगिरीतील लोकांना ते जिवंत असताना .... त्याच्या मरनाच्या काही काळ आधी भेटलो आहे.... अक्षरशः त्यांची दुख: अंगावर येत होती त्यावेळी पण जसा जसा काळ गेला तसे तसे कळाले / समजले / उमजले की त्यांनी लास्ट पर्याय निवडावयास नको होता.. शक्यतो अजून एक चान्स मिळाला असताच त्यांना.. ! पण काय होतं की आपण त्यांना विचार व्यक्त करुच देत नाही व फक्त हे करु नकोस ते करु नकोस हेच सांगतो..... काही महिन्यापुर्वीच माझा एक जानकार त्याने आत्महत्या केली ! शेयर मार्केट मध्ये नको एवढं नुकसान खालं.. पण त्याच्या चेह-यावरील हसू कधीच संपल नाही मला वाटलं पण नव्हतं की तो आत्महत्या करेल.. पण त्यांने जे पत्र शेवटी लिहले होते ते वाचल्यावर असं वाटलं की तो मेलेचाच बरा.. ! एकच सांगतो... कृष्ण करे तो रास लिला , हम करे तो पाप ! त्याच भाषेत .... संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! प्रत्येकाच्या नजरेतून जग वेगळचं ! हेच खरं !
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 20:56 नवीन

जीवनात

जीवनात करण्यासारखे काही राहिले नाही असे वाटल्याने जीव देणे, दु:ख सोसत नाही म्हणुन जीव देणे, संकटांना सामोरे जाणे शक्य उरले नाही म्हणून आत्महत्या करणे आणि सुखाचा शोध लागला आहे असे जाणून त्यातच राहण्याचा प्रयत्न करताना प्राण त्यागणे या प्रत्येक कृतीत फर आहे असे मला वाटते. देह त्याग हे समान सूत्र असले तरी प्रत्येक क्रियेत हेतू आणि परिणाम वेगळे आसावेत. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Fri, 01/23/2009 - 21:52 नवीन

फरक कोण

फरक कोण व्यक्त करनार ? त्यांना सुखाचाच शोध लागला आहे हे कोण ठरवणार.... वर ज्याचा उल्लेख केला आहे त्यांन आपल्या शेवटच्या चिठी मध्ये हेच लिहलं होतं " मी जगताना खुप दुखः सोसलं पण मरताना मला अत्यंत सुख लाभत आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
र
राघव Sat, 01/24/2009 - 21:13 नवीन

संतांनी

संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! खरं आहे तुमचं म्हणणं. कारण संतांना अगदी लहानपणापासून त्यांचं जीवन प्रयोजन माहित असतं. त्यासाठीच ते जगत असतात. त्यांचं कोणतंही कार्य स्वार्थप्रेरीत नसतं. कारण स्वार्थ त्यागल्याशिवाय संत होऊच शकत नाही. सामान्य माणसांना सुख-दु:खाला तोंड देताना नाकी नऊ येतात. पण संतांच्याच म्हणण्यानुसार, संत "ही सर्व ईश्वरेच्छा" असं जाणून त्यात अलिप्त असतात. ते प्रपंचात दिसतात, पण त्यात नसतात. अगदी जरूरीपुरता प्रपंच करून ते त्यांच्या मूळ जीवनप्रयोजनात गुंतलेले असतात. मूळ मनोभूमिका, चित्तवृत्ती वेगळी असल्यामुळे असं घडतं. जसं आंब्याची कोय कितीही निपटली तरी त्यात थोडा तरी आंब्याचा मूळ रस शिल्लक राहतो, पण चिकूची बी अलिप्त असते.. मूळ फळाची प्रकृती वेगळी असल्यामुळे असं घडतं. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अनामिक Fri, 01/23/2009 - 20:54 नवीन

छान आणि

छान आणि विचार करायला लावणारा लेख! आपण जगतोय कारण आपल्या कुणालाच मरण नको असते म्हणून. 'ध्येय' हे तुमच्या लेखात उल्लेख झालेल्या (आणि तशाच) काही असामान्य व्यक्तींकडेच असु शकतं. नाहीतर आपण आणि आपले ध्येय म्हणजे आपल्यापुरतेच मर्यादित असतात. माझं घर, माझे आई-बाबा, माझी बायको-मुलं, भावंड यांच्यापुढे आपले ध्येय जातच नाही. आपल्यातला "मी" जपण्यातच आपलं आयुष्य जातं. खरं तर आपल्यात आणि जनावरात काहीच फरक नाही... पण तुम्ही म्हणता ते अगदी पटतं..."बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच..." आणि खेदाची बाब म्हणजे आपलं ध्येय हे आपणच आहोत... आणि तेवढंच आपल्याला जगण्यासाठी पुरेसं असतं (हे माझं मत). अनामिक
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 01/23/2009 - 21:53 नवीन

बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे

अगदी खरं आहे .. विचार करायला लावणारा लेख आहे . जगण्यासाठी प्रयोजन असणे फार मोठी गोष्ट आहे ... प्रत्येक सामान्याजवळ ते असतच असं नाही . मला वाटतं आपल्याला जे मिळालं आहे त्याचा स्विकार करणे हेच 'कारण' जगण्यासाठी पुरेसं आहे . आणि जे आपण देउ शकत नाही, निर्माण करु शकत नाही ... ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ...
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 01/23/2009 - 22:13 नवीन

>>ते

>>ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ... सहमत. पण तो अधिकार आहे का नाही हे ठरवणार कोन ? आपल्या पिनल कोड नुसार आत्महत्या पाप आहे व सजा होऊ शकते... पण केव्हा ? जर तो मेला नाही तर ! मेला तर ? सुखी ! नाही मेला तर ? जेल मध्ये .. दुखी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
अ
अवलिया Fri, 01/23/2009 - 22:54 नवीन

अंमळ

अंमळ विचारात पडायला लावणारा विचार --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 01/24/2009 - 22:51 नवीन

मुमुक्षु

मुमुक्षु स्फुट आवडले. सारे संत महात्मे तत्वज्ञानवाले तुम्ही उल्लेख केलेल्या जगण्या-मरण्याला शब्दात बांधायचा खेळ करुन गेले, करत आहेत व करतील. म्हणुन आज जगात जगताना फार भव्य दिव्य करायची गरज नाही आहे. तर माणस जितकी जोडता येतील तितकी जोडणे, यथाशक्ति यथामती दुसर्‍याला मदत बस्स. बाकी जे होईल ते होईल. जगात ज्ञान कमी नाही पण तरीही दु:ख, वाईट काम होतेच. तसेच चांगली कामे देखील होतात. जगात होणार्‍या चांगल्या कामात साथ द्यायची. बस झाले!! तसेच आचार, आहार व विचार आपल्या तब्येतीला झेपेल इतकाच करायचा. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 01/24/2009 - 23:31 नवीन

चांगले लिहीले आहे.

(विचार) मंथन, विवेचन, स्फुट जे काही आहे ते छान आहे. प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/27/2009 - 13:38 नवीन

प्रत्येका

प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. खरंय! इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. आयुष्य व्यर्थ आहे असे ज्या लोकांना वाटते तेच आत्मघात करतात. प्रत्येकासाठी निश्चित असे ध्येय तर असतेच. फक्त आपले आपण ओळखले म्हणजे झाले. :) पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ज्यांची मनं कमजोर आहेत त्यांना अशा अवस्थेत भगवंताची आठवणसुद्धा तारून नेते. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हे माहीत नसतांना सुद्धा लोकं ईश्वराला तो "आहे" अशा श्रद्धेने भजतात. ज्याचा त्याचा मार्ग वेगळाच. नाही? ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत. याबद्दल मतभेद राहतीलच. कारण परमार्थ समजण्यासाठी आधी तो करावा लागतो. अन् समजण्या अगोदर करण्याची बुद्धी होण्यासाठी भगवंताची कृपा लागते!! आम्हीसुद्धा अजुन त्याच प्रतिक्षेत आहोत. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्राजु Sat, 01/24/2009 - 23:37 नवीन

स्फुट आवडले.

लेख नीट वाचला.. आणि समजला सुद्धा! खूपच छान. आवांतर : जाता जाता मला हा प्रश्न दिलात तुम्ही आता.. मी कशासाठी जगते आहे? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/26/2009 - 00:44 नवीन

सुंदर

सुंदर लिहिलं आहे! (मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा